Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कायदेशीर शिक्षणातील बदल स्वीकारार्ह

$
0
0

न्या. राज शेखर मंथा यांचे प्रतिपादन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अलिकडच्या काळात कायदेशीर शिक्षणात मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून, हे बदल चांगले आहेत. कायदेविषयक शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष काम करताना एखाद्या घटनेतील सत्य समजून घेणे किंवा निर्णय देणे यासाठी प्रथम व्यक्तीला समजून घेणे आवश्यक आहे', असे प्रतिपादन कोलकात्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजशेखर मंथा यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एनबीटी लॉ कॉलेज व डी. टी. जायभावे प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व्या राष्ट्रीय मूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेचे आयोजन कारण्यात आले होते. एनबीटी कॉलेजच्या आरएनटी हॉलमध्ये सकाळी ही स्पर्धा पार पडली. यावेळी न्या. मंथा बोलत होते. यावेळी त्यांनी निकाल लेखन स्पर्धेचे कौतुक केले. तसेट, मूट ट्रायल स्पर्धा यशस्वी वकील होण्यासाठी कशी महत्त्वाची ठरेल याविषयी मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मो. स. गोसावी होते.

नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी ट्रायल कोर्टामध्ये काम करण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी माहिती दिली. ॲड डॉ. सुधीर कोतवाल यांनी उपस्थितांना स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे प्रत्यक्ष खटला चालवताना येणाऱ्या अडचणी कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अॅड. अनिल सिंग यांनी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे न्यायालयात प्रत्यक्ष काम करणे सहजासहजी शक्य आहे, असे सांगितले. जिल्हा न्यायालयात नव्याने सामील झालेले मुख्य न्यायाधीश, आर. एन. जोशी यांनी न्यायाधीशांनी नोकरीमध्ये समाधानी असणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अॅड. जयंत जयभावे यांनी न्यायव्यवस्था ही लोकशाहीची सर्वात विश्वासार्ह संस्था असल्याचे सांगितले. यावेळी बॉम्बे हायकोर्टाचे न्यायाधीश आर. जी. अवचट यांचीही उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वासंती भूमकर, डॉ. सापटनेकर व अॅड. काचवाला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. प्रा. कादरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून प्रा. हेमा बुरुग व प्रा. बबन भालेराव यांनी संयोजन केले. आज (१३ जानेवारी) सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.

..

देशभरातील १८० विद्यार्थ्यांचा सहभाग

देशातील विविध राज्यातील सुमारे तीस टीम व १८० विद्यार्थी १३ व्या राष्ट्रीय मूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगाना, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील सोळा टीम्स होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिजामाता जयंती लीड

$
0
0

जिजा माऊली गे..

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था तसेच शासकीय कार्यालयांमध्ये यावेळी अभिवादन करण्यात आले. तसेच विविध उपक्रमांचेही यानिमित्त आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावरील ट्रालीविरोधात निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कळवण

सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉली (रोपवे) परिसरात बेकायदेशीर बांधकाम केलेले व्यापारी संकुल व लॉजिंग तत्काळ बंद करावे, ट्रॉलीचा वेळ ठरवून द्यावा अशी मागणी गडावरील व्यावसायिक व ग्रामस्थांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

गडावर ट्रॉली सुरू होण्याच्या आधीपासून या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. आता ट्रॉली सुरू झाल्यानंतर हा विरोध आणखीनच वाढला आहे. ट्रॉली सुरू झाल्यामुळे डोलीवाले, छोटे मोठे व्यावसायिक व ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक भाविक हे ट्रॉलीपासूनच परतत आहेत. गावात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत कमालीची घट आल्याने येथील व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे. ट्रॉलीबाबत योग्य निर्णय न झाल्यास गडावरील व्यावसायिक व ग्रामस्थही आत्महत्या करतील असा इशारा निवेदनात दिला आहे. रामप्रसाद बत्तासे, राजू वाघ, तुषार बर्डे, प्रकाश कवडे, विजय दुबे, प्रदीप कदम, जि. प. सदस्य नितीन पवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या महिला शिष्टमंडळाने दिली भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोल्हापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी शनिवारी नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाला भेट दिली. शहरात महिला व बालकांसाठी सुरू असलेल्या योजनांची त्यांनी माहिती घेतली. शहरातील अंगणवाडी प्रकल्प, बालकांना दिला जाणारा पोषण आहार, निराधार, विधवा व घटस्फोटित महिलांकरिता राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. कोल्हापूरच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा, उपसभापती छाया पोवार यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या. महापालिकेच्या पाथर्डी येथील खत प्रकल्प व वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला कोल्हापूरच्या प्रतिनिधींनी भेट दिली. महिला व बालकल्याण समिती सभापती कावेरी घुगे यांनी कोल्हापूरच्या महिला व बालकल्याण समिती सभापती शहा, उपसभापती पोवार यांचे स्वागत केले. या वेळी नगरसेविका सीमा ताजणे, मंगला आढाव, हेमलता कांडेकर, आशा तडवी, अर्चना थोरात, सीमा निगळ, शीतल माळोदे, रंजना बोराडे, अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रजासत्ताक दिन साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये, यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी घालण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लास्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करणे यावर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) बंदी घालण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाणे गरजेचे आहे. काही वेळेस राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला-क्रीडाप्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर टाकले जातात. हे दृष्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभणारे नाही. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोध चिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम तसेच, ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकृष्णांकडून विवेकानंदांना विश्वकल्याणाची दृष्टी

$
0
0

डॉ. उल्हास रत्नपारखी यांचे प्रतिपादन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे अतिशय आवडते शिष्य होते. रामकृष्णांनी त्यांना एक वेगळी दृष्टी दिली. सुरुवातीच्या टप्प्यात स्वामीजींना स्वत:चा आध्यात्मिक विकास साधण्याचे उद्दिष्ट होते. पण, विवेकानंदांचे जीवनकार्य स्वत:पुरतेच सीमित नसून, त्या कार्याला विश्वाच्या भौगोलिक मर्यादाही नाहीत, याची जाणीव त्यांना रामकृष्ण परमहंसांनी करून दिली. या जाणिवेतूनच स्वामी विवेकानंद यांना विश्वकल्याणाची दृष्टी मिळाली, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी केले.

लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड व क्वेस्ट टूर्स यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'अखेर स्वामीजी इष्टस्थळी पोहोचले' या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबक रोडवरील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेत ही व्याख्यानमाला होत आहे. डॉ. रत्नपारखी पुढे म्हणाले, की आध्यात्मिक गुरू रामकृष्ण परमहंस यांच्यापासून जीवनकार्याची प्रेरणा घेत स्वामी विवेकानंद हे कोलकात्त्यातील रामकृष्ण मठापासून ते शिकागो धर्म परिषदेपर्यंत कसे पोहोचले, याचा वृत्तांत त्यांनी व्याख्यानाच्या पहिल्या दिवशी सांगितला. 'शिव सेवा, जीव सेवा', असे रामकृष्ण नेहमी म्हणत. गुरुंच्या या मार्गदर्शनानुसार हा मंत्र जपण्यासाठी त्यांनी मठातून बाहेर पडा. त्यांना समाज कल्याणासाठी सर्वदृष्ट्या सक्षम करा, असे आवाहन गुरूबंधूंना केले. पुढे त्यांनी भारतीय विचारांचा, विद्येच्या प्रचार आणि प्रसारासाठी बाहेर पडण्याचा मनस्वी संकल्प केला. यासाठी १ फेब्रुवारी १८९१ पासून त्यांनी एकाकी भारत भ्रमण सुरू केले. या भ्रमणात भारतभरातील अनेक मोठ्या संस्थानिकांनी त्यांचे स्वागत केले. २४ डिसेंबर १८९२ ला ते कन्याकुमारीला पोहोचले. येथे त्यांना रामकृष्णांना काय अपेक्षित आहे, याचे भान आले, असे ते म्हणाले.

उत्कर्षा वेताळ-पठाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेडचे विभागीय प्रबंधक अशोक कुलकर्णी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानदानात ब्राह्मण समाजाचे मोठे योगदान

$
0
0

कायदेतज्ज्ञ अॅड. लक्ष्मण उगावकर यांचे प्रतिपादन

\B...

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

\Bज्ञानदानासाठी ब्राह्मण समाजाचे मोठे योगदान आहे. भगवान परशुराम या दैवतामध्ये शौर्य आणि विद्वत्ता या गुणांचा समन्वय आढळून येतो. ज्ञातीबांधवांनी कालबाह्य परंपरांचा त्याग करून काळाशी सुसंगत परंपरांचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. लक्ष्मण उगांवकर यांनी केले.

विश्व ब्राह्मण महापरिषदेच्या वतीने आयोजित ब्राह्मण समाजाच्या जनगणना मोहीम व समाजातील दहावी उत्तीर्ण व १८ ते ३५ वयोगटातील मुला-मुलींसाठी रोजगार संधी मिळवून देणाऱ्या मोफत असलेल्या शासनाच्या दोन वर्षीय पदविका उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. हेमंत दीक्षित, डॉ. श्यामला दीक्षित, संदीप भानोसे, मिलिंद तारे व रोहित उगावकर उपस्थित होते. विश्व ब्राह्मण महापरिषदेच्या निमित्ताने होणारे सर्वशाखीय बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या एकीकरणाचे काम स्तुत्य असल्याचे सांगताना संघटन ही एकविसाव्या शतकाची गरज असल्याचेही अॅड. उगावकर यांनी नमूद केले.

याप्रसंगी महापरिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. श्यामला दीक्षित म्हणाल्या, की समाजातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेतर्फे बुधवारी व शुक्रवारी मोफत कौटुंबिक समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना कायदा, वैद्यकीय बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ते पूर्णत: गोपनीय राहील, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. संदीप भानोसे, व्यापार सेना प्रदेशाध्यक्ष मिलिंद तारे, युवसेना प्रदेशाध्यक्ष रोहित उगावकर, महाराष्ट्र महासचिव महेश जोशी व नाशिक जिल्हा प्रमुख अंबादास जोशी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे नियुक्तीपत्र वितरणही यावेळी झाले.

..

सर्वसमावेशक जनगणनेचा फायदा होणार

महापरिषदेचे राष्ट्रीय कार्यवाहक हेमंत दीक्षित म्हणाले, की जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या विश्व ब्राह्मण महापरिषदेतर्फे समाजातील युवा, महिला, व्यापार व विवाह यासाठी ही संस्था कार्य करेल. समाज एकत्रिकरण व जागृतीसाठी जिल्हास्तरावर विविध नियुक्ती करण्यात येत असून, अनेक समाजबांधव यात जोडले जात आहेत. ब्राह्मण समाजाची नेमकी संख्या किती याबाबत निश्चित माहिती नसल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळेच शास्त्रशुद्ध प्रकारे होणाऱ्या या सर्वसमावेशक जनगणनेनंतर शासन दरबारीही अनेक योजनांचा लाभ मिळवून देता येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बायोमेट्रिक’ हजेरीच नापास

$
0
0

लोगो

मटा वॉच

संकलन : जितेंद्र तरटे, अश्विनी कावळे

फोटो : पंकज चांडोले

\B

\Bसायन्स शाखेत निव्वळ प्रवेशापुरता ज्युनिअर कॉलेजचा उपयोग करून बड्या पॅकेजच्या ट्युशन ग्रुप्सला जॉइन होण्याचा ट्रेंड राज्यात रुजू पाहत आहे. हा ट्रेंड मोडीत काढण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने बायोमेट्रिक हजेरी विद्यार्थ्यांसाठी सक्तीची केली. सेल्फी अटेंडन्ससारखाच हा निर्णयही टीकेचा धनीच ठरला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना शिक्षण विभागाच्या नाकी नऊ आले आहेत. नाशिक विभागात अवघ्या ३१ टक्के कॉलेजांनीच 'बायोमेट्रिक' हजेरी पद्धत स्वीकारली आहे. हा विषय उर्वरित संस्थांच्या गावीही नसल्याची वस्तुस्थिती शिक्षण विभागाची आकडेवारीच सांगते. एकंदरीतच बायोमेट्रिक हजेरीमागील अध्यादेशाचा हेतू चांगला असला तरीही त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान कुठली आव्हाने आहेत, काय वास्तव आहे आणि संबंधित घटकांच्या कोणत्या अपेक्षा आहेत, याचा घेतलेला हा वेध.

\Bमुदतवाढीची तारीख पे तारीख\B

राज्यात शिगेला पोहोचलेल्या खासगी क्लासेसच्या स्पर्धांमुळे 'इंटीग्रेटेड क्लासरूम' हा ट्रेंड काही वर्षांपासून उदयाला आला आहे. प्रवेशापुरताच कॉलेजच्या खिडकीचा उपयोग करून वर्षभर मात्र संस्थेशी साटेलोटे असणाऱ्या क्लासमध्ये शिकायचे असा हा फंडा. या प्रकारामुळे केवळ कॉलेजांची परीक्षा केंद्रे बनण्याचा धोका लक्षात घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २०१८-१९ या वर्षापासून बायोमेट्रिक हजेरीचे फर्मान काढले. सुरुवातीच्या टप्प्यात व्यवस्थेला न जुमानणाऱ्या बहुतांश संस्थांनी या अध्यादेशालाही शून्य प्रतिसाद दिला. नंतर शिक्षण खात्याच्या वारंवारच्या सूचना आणि बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यास दिलेल्या मुदतवाढीमुळे या मोहिमेचा श्रीगणेशा झालेला दिसतो आहे; पण नाशिक विभागाची आकडेवारी पाहता नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चारही जिल्ह्यांत मिळून केवळ ३१.६९ टक्के संस्थांनी बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा बसविली आहे. उर्वरित संस्थांनी या अध्यादेशाकडे दुर्लक्षच केलेले दिसते. मात्र, पुढील शैक्षणिक वर्षात उर्वरित संस्थांमध्ये ही यंत्रणा बसविली जाण्याचा विश्वास शिक्षण उपसंचालक कार्यालयास आहे.

\Bकेवळ ३२ टक्के संस्था टप्प्यात

\Bनाशिक विभागात नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांत ४६५ अनुदानित, १८२ विनाअनुदानित, तर १०७ स्वयंअर्थसहाय्यित शिक्षणसंस्था आहेत. चारही जिल्ह्यांची बायोमेट्रिकची सरासरी पाहता केवळ ३१.६९ टक्के संस्थांनी या अध्यादेशास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार यातही नंदुरबारमध्ये हे प्रमाण विभागात सर्वाधिक म्हणजे ५९.२१ टक्के, धुळ्यात अत्यल्प म्हणजे अवघे साडेचार टक्के, जळगावमध्ये ३२.७० टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ३८.५६ टक्के इतके नोंदविले गेले आहे.

\Bउशिरा अध्यादेशाचा फटका

\Bअध्यादेशाचा उद्देश शिक्षण क्षेत्रातील गैरप्रवृत्तींवर वचक बसविण्याचा असल्याने विद्यार्थीहिताचाच हा निर्णय आहे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. चालू शैक्षणिक वर्षात उशिराने हा अध्यादेश निघाल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीसाठी फारसा वेळ हाती नसतानाही शिक्षण संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा आहे. बायोमेट्रिक यंत्रणेपासून दूर असणाऱ्या उर्वरित संस्थाही या निर्णयाच्या अंमलबजावणीत पुढील वर्षात सहभागी होतील, अशी आशा शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

\B१५ जून २०१८ चा अध्यादेश

\Bराज्यामध्ये 'इंटीग्रेटेड क्लासरूम'च्या फंड्यामुळे नफेखोरी करणाऱ्या काही क्लासेस चालकांचे व्यवसाय तेजीत असून, परीक्षा केंद्र बनणारी महाविद्यालये मात्र ओस पडली आहेत, या मुद्द्याकडे विधिमंडळाच्या सदस्यांनी गेल्या वर्षी सभागृहात लक्ष वेधले होते. ज्युनिअर कॉलेजांमध्ये लेक्चर्सला सर्रास अनुपस्थित राहत केवळ प्रॅक्टीकलसाठी कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पितळ या लक्षवेधीमुळे उघडे पडले होते. याला प्रोत्साहन देणारी यंत्रणाच काही नफेखोर क्लासेस आणि विशिष्ट कॉलेजांमध्ये तयार झाल्याच्या तक्रारीही राज्याच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या परिस्थितीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने १५ जून २०१८ रोजी बायोमेट्रिक हजेरी विद्यार्थ्यांसाठी लागू करण्याचा अध्यादेश काढला होता. यात राज्यातील खासगी विनाअनुदानित, अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, अंशत: अनुदानित आदी प्रकारांतील शिक्षण संस्थांसाठी हा नियम लागू करण्यात आला होता.

\Bप्रॅक्टीकलच्या गुणांची खैरात

\Bबायोमेट्रिक हजेरीचा अध्यादेश नाशिकसह मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागांसाठी लागू आहे. या पाचही विभागांमधील क्लासेसमध्ये काही वर्षांपासून तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. काही महाविद्यालये आणि काही क्लासेस एकत्रित येऊन इंटीग्रेटेड क्लासरूमचे छुपे करार अमलात आणतात. प्रवेश विशिष्ट कॉलेजमध्ये अन् लेक्चर्स विशिष्ट क्लासेसमध्ये, असे साटेलोटे जमल्यानंतर उरतो प्रश्न केवळ प्रॅक्टीकलच्या गुणांचा. हे गुण कॉलेजांच्या हाती असतात; पण छुप्या करारानुसार विद्यार्थ्याचे गुण वाढविण्याची हमी घेतलेल्या क्लासेसच्या हस्तक्षेपांमुळे प्रॅक्टीकलच्या गुणांचीही चांगलीच खैरात संबंधित कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांवर होते. प्रॅक्टीकलच्या गुणांचाही फायदा इंटीग्रेटेडमुळे विद्यार्थ्यांना मिळतो.

\Bबायोमेट्रिकबाबत नाराजी का?

\Bबायोमेट्रिक हजेरीमागील सरकारच्या उद्देशाबाबत संस्थाचालकांमध्ये दुमत नसले तरीही त्याच्या अंमलबजावणीबाबत मात्र अनेकांच्या मनात अद्याप शंका आहेत. अध्यादेशानुसार बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचा खर्च महाविद्यालयांनाच करायचा आहे. मोजक्या नामवंत संस्था सोडल्या तर लहान संस्थांची या बाबींसाठी खर्च करण्याची क्षमता नसल्याचे छोट्या संस्थाचालकांचे म्हणणे आहे. शिवाय मोठ्या संस्थांमध्ये एकाच सत्रात जेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात, ते सर्व एकाच वेळेत शाळेत हजर होतात. प्रत्येकाच्या बायोमेट्रिक उपस्थितीचा विचार करता त्यांच्या जाणाऱ्या वेळेत शाळेतील काही तासिकांचा कालावधी वाया जाण्याची भीतीही काही संस्था व्यक्त करतात, शिवाय बायोमेट्रिकचे हे रेकॉर्ड सांभाळणाऱ्या शिक्षकाने दिवसागणिक यासाठी वेळ द्यावा की विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर, असाही प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे. ग्रामीण भागात अद्याप तंत्रज्ञान व पूरक संसाधने पोहोचलेली नाहीत. वीज किंवा तांत्रिक अडचणींमध्ये बायोमेट्रिकचा निर्णय ग्रामीण व दुर्गम भागातील संस्थांनी कसा अमलात आणावा, याबाबात काहीच स्पष्टता नाही, तर क्लासेस अन् महाविद्यालयामधील छुपे करार मोडण्यासाठी ही यंत्रणा वापरणार असाल, तर यातूनही पळवाटा शोधण्याचा प्रयत्न होईल. त्याला सरकार कसा पायबंद घालेल, असे प्रश्न बायोमेट्रिक हजेरीच्या संदर्भाने उपस्थित होत आहेत.

\Bसरकारी व्यवस्थेची फसवणूक

\Bमहाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशिनची सक्ती करण्यात आली असली तरी क्लास आणि महाविद्यालयाच्या 'समन्वया'मुळे कॉलेजांना लिंक असलेले मशिन क्लासमध्ये लावून दिले असल्याचे समोर येत आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन तास करण्याचा उद्देश पुन्हा मागे पडत असून, याची गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे. सरकारी आदेशांना न पाळता त्याच्यावर सोयीस्कर उपाय शोधले जात असून, सरकारी व्यवस्थेची फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे.

\Bभरमसाट शुल्कातून लूट

\Bबायोमेट्रिक हजेरीच्या शासननिर्णयानंतरही या निर्णयाला न जुमानता विद्यार्थी, पालकांना चांगल्या करिअर संधींचे आमिष दाखवून लाखो रुपयांची लूट इंटिग्रेटेड क्लासेसकडून होत आहे. देशातील नामांकित औद्योगिक संस्थांमध्ये प्रवेश मिळेल, अशा स्वरूपाची तयारी क्लासेसमध्ये करून घेणार असल्याचे सांगण्यात येते आणि दीड ते चार लाख रुपये शुल्क अकरावी, बारावी या दोन वर्षांसाठी अशा क्लासेसकडून आकारले जाते, शिवाय महाविद्यालयात जाण्याची गरजही नसल्याने विज्ञान शाखेतील काही विद्यार्थ्यांना ही क्लासेस सोयीची वाटत आहेत.

\Bप्राध्यापकांना आराम?

\Bइंटिग्रेटेड क्लासेसमुळे विद्यार्थी क्लासलाच जात असल्याने प्राध्यापक व विद्यार्थी यांचा संबंध क्वचितच येतो. विद्यार्थी, प्राध्यापक हे दोघेदेखील एकमेकांसाठी अनोळखी असतात. या प्रकारांमुळे अशा कॉलेजांमधील प्राध्यापकांना तासिकांचीही चिंता नसते. गलेलठ्ठ पगार असूनही विद्यार्थीच येत नसल्याने प्राध्यापकांवर होणारा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारी व्यवस्थेकडून कठोर कारवाई केली गेली तर हे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

बायोमेट्रिक हजेरीचा शासननिर्णय हा विद्यार्थ्यांची वर्गात उपस्थिती वाढविणारा आणि विद्यार्थीहिताचा आहे. शैक्षणिक संस्थांकडून याच्या अंमलबजावणीसाठी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुढील टप्प्यात उर्वरित संस्थांमध्येही बायोमेट्रिक यंत्रणा सुरू होऊन निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करू.

- रामचंद्र जाधव, उपसंचालक, शिक्षण विभाग, नाशिक

बायोमेट्रिकच्या निर्णयामागील उद्देश स्वागतार्हच आहे; पण राज्यभरातील संस्थांचा व्यापक विचार करता या अंमलबजावणीत अनेकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही विचार व्हायला हवा. सर्वच कामे यांत्रिक पद्धतीवर शक्य नसल्याने या संसाधनांवर होणारा खर्च शिक्षकांची प्रशिक्षणे व विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तावाढीच्या प्रयोगांकरिता करता येऊ शकतो.

- प्रा. संजय शिंदे, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ

बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय स्वागतार्हच आहे. इंटिग्रेटेड क्लासेसला आम्ही वेळोवेळी विरोधाचीच भूमिका घेतली आहे. या विरोधात सरकारी यंत्रणेने प्रत्यक्ष भेटी देऊन सत्य पडताळून पाहिले पाहिजे व इंटिग्रेटेड क्लासेसला चाप बसविला पाहिजे. कॉलेज आणि क्लास या दोन वेगळ्या बाबी असून, त्या वेगळ्याच ठेवल्या पाहिजेत. इंटिग्रेटेड क्लासेसमुळे विद्यार्थ्यांना कॉलेज जीवनाचा आनंदही लुटता येत नाही.

- जयंत मुळे, अध्यक्ष, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस डायरेक्टर असोसिएशन

इंटिग्रेटेड क्लासेसचे शुल्क सामान्यांना परवडण्यासारखे नाही. हा प्रकार नवीनच आला असून, पूर्वी विद्यार्थी कॉलेज आणि क्लास यांचा योग्य समन्वय साधूनही चांगले मार्क्स मिळवत होते, शिवाय त्यांना महाविद्यालयाचा आनंदही लुटता येत होता. विद्यार्थीहितासाठी या क्लासेसला विरोध होणे गरजेचे आहे.

- अविनाश जाधव, पालक

- - - -

\Bनाशिक विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या

\Bजिल्हा -अनुदानित - विनाअनुदानित-स्वयंअर्थसहाय्यित- बायोमेट्रिक हजेरी (फक्त विज्ञान शाखेसाठी)

नाशिक-१४७ - ९१ - ६८ - ११८

धुळे - १२४ - २४ -१३- ०७

जळगाव -१४१ - ५० - २० - ६९

नंदुरबार - ५३ - १७ - ०६ - ४५

एकूण - ४६५ - १८२ - १०७ - २३९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिजाऊ जयंती

$
0
0

व्हिजन अॅकॅडमी

जेलरोड : जेलरोड येथील व्हिजन अॅकॅडमी शाळेत राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका सुनिथा थॉमस यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी दीपाली भट्टड, जयश्री बोरोले, वृषाली बोराडे, मेघा कनोजिया, सुवर्णा झळके, सुनीता चौधरी, सुचित्रा पवार, प्रवीण अहिरे, देविदास मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका थॉमस म्हणाल्या की, स्वराज्य निर्माण करणारे, पिढ्यानपिढ्या असंख्य मातांना प्रेरणा देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता जिजाऊ. त्यांनी लहानपणापासून शिवरायांना मैदानी खेळाचे प्रशिक्षण दिले. राजकारभार कसा करावा यांचे धडे महाराजांना दिले. महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी राजमाता जिजाऊ या नेहमी आग्रही असत. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे. दीपाली भट्टड यांनी ही राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

००००००००००००

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान

देवळाली कॅम्प : स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या पुत्राच्या हृदयात स्वाभिमान अन डोळ्यात स्वप्न पेरणाऱ्या अन संस्कारांचा आदर्श उभा करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने तत्कालीन कालखंडामध्ये मोघल सत्ता उलथवून लावण्यात शिवाजी व संभाजी महाराजांचा बळ मिळाल्याचे प्रतिपादन नगरसेविका आशा गोडसे यांनी केले. जुने बस स्थानक परिसरात भारतीय मराठा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने काल राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी गोडसे बोलत होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

----

कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळा

देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या जडणघडणीमध्ये जिजामातांची भूमिका अतुलनीय असून त्या शिवरायांच्या प्रमुख मार्गदर्शक व प्रेरणास्थान होत्या असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रभावती धिवरे यांनी केले. तर आजच्या भारतातील तरुण पिढीपुढे स्वामी विवेकानंद हे एक प्रेरणादायी उदाहरण असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांनी केले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रभावती धिवरे, प्रा. सुनीता आडके, भीमराव धिवरे, वैशाली संत, नुजत शेख आदी उपस्थित होते. त्यानंतर बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी बिस्कीट, इडली, पाववडा, पाणीपुरी, सरबत, गाजरहालवा, साबुदाणावडा इत्यादी पदार्थांचे दुकाने थाटली.

-----

सकल बहुजन मराठा समाज

पंचवटी : सकल बहुजन मराठा समाज शिवजन्मोत्सव समितीतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. पंचवटी कारंजा येथे झालेल्या कार्यक्रमास महापालिका स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, भिकुबाई बागूल, वत्सला खैरे, वैशाली भोसले आदी उपस्थित होते.

----

हिरे कॉलेज

पंचवटी : हिरे कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ व हिरे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. डॉ. एन. बी. पवार, डॉ. विनीत रकिबे आदी उपस्थित होते. डॉ. किरण पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एन. व्ही. देशमुख यांनी परिचय करून दिला.

----

एबीपी सोशल ऑर्गनायझेशन

पंचवटी : एबीपी सोशल ऑर्गनायझेशनतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेविका शालिनी पवार, योगविद्याधामचे रमेश धस, प्रतिभा धस, लक्ष्मी पवार, राहुल पवार आदी उपस्थित होते.

----

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव महिला समिती

नाशिकरोड : राजमाता जिजाऊंचे कार्य आजही आदर्शवतच आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी केलेल्या संस्कारांचे अवलोकन केले असता आजचा समाजही सुदृढ बनु शकतो असे मत खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शिवजन्मोत्सव समिती व राजमाता जिजाऊ जन्मोत्सव महिला समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित असलेले आमदार योगेश घोलप म्हणाले की, मातोश्रींच्या कार्याचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या संस्कारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपण सर्वजण सामुहिक प्रयत्न करू असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक रमेश धोंगडे आदी उपस्थित होते.

----

महावितरण परिमंडल कार्यालय

नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात शनिवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी झाली. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते यांच्यासह परिमंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा

$
0
0

खासगी क्लासच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या असहायतेचा फायदा घेत खासगी क्लासमधील एका शिक्षकाने तिच्यवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने नाशिकरोड पोलिस ठाण्यात या शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल करण्याचे धाडस दाखविल्याने या प्रकाराचा वाचा फुटली. अनिल भरत अवचारे (वय २८ रा. अरिंगळे मळा, एकलहरे रोड) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. अवचारे याला न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुणावली आहे. या घटनेमुळे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला गेला असून खासगी क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

पिडित मुलीच्या फिर्यादीनुसार, ती सन २०१६ या वर्षी दहावीच्या वर्गात शिकत असताना शहरातील कोरडे क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जात होती. याच क्लासमध्ये तिच्या घरासमोरच वास्तव्यास असणारा अनिल अवचारे हा इंग्रजी विषय शिकवित असे. सप्टेंबर २०१६ मध्ये अनिलने पीडितेच्या घरी जाऊन मोबाइलमध्ये तिचे नग्नावस्थेतील फोटो काढले आणि धमकावत तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. यानंतर अनिल हा पीडित मुलीच्या रिक्षाचा पाठलाग करीत तिच्या कॉलेजपर्यंत जात असे. तिच्या घरी कोणी नसताना त्याने फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यासोबत वारंवार अत्याचार केले. सतत दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. डिसेंबर २०१८ मध्ये अनिलकडून होणारा त्रास वाढल्याने पीडितेने घरीच राहणे पसंत केले. त्यानंतर अनिलने तिच्या घरासमोर चिठ्ठ्या टाकून तिला धमकावण्यास सुरुवात केली. तिचे फोटो तिच्या वडिलांना दाखवण्याची धमकी देत घराबाहेरील पटांगणात भेटण्यासाठी जबरदस्ती केली. यावेळी पीडित मुलगी सकाळी सहा वाजता त्याला भेटण्यासाठी गेली असता तिच्याशी त्याने पटांगणावरही अत्याचार केला. या प्रकाराने पीडित मुलगी अस्वस्थ झाली. तिची अस्वस्था तिच्या बहिणीच्या लक्षात आल्यावर या प्रकाराला वाचा फुटली. त्यानंतर आईच्या मदतीने तिने नाशिकरोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री फिर्याद दिली. पोलिसांनी अनिल अवचारे याच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक मनिषा राऊत या गुन्ह्याचा पुढील तपास करित आहेत.

अवास्तव भीतीही कारणीभूत

या गुन्ह्यातील पीडित मुलीने वडिलांच्या भीतीपोटी तब्बल दोन वर्षे त्रास सहन केल्याचे तिच्या फिर्यादीतून उघड झाले आहे. शिवाय संशयित हा घरासमोरच राहणारा असल्याने तिच्या पालकांचाही त्याच्यावर विश्वास होता. हा प्रकार वडिलांना माहित झाल्यास शिक्षणासही मुकावे लागेल, अशी भीती या पीडित मुलीने फिर्यादीत व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला पालिकेत ‘राडा’

$
0
0

शिवीगाळ व मारहाण केल्याची मुख्याधिकाऱ्यांची पोलिसांत तक्रार

नगरसेवक दांपत्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

...

म. टा. वृत्तसेवा, येवला

सभापटलावर ठेवलेल्या नियोजित विषयांव्यतिरिक्त ऐनवेळचा एक विषय घेण्यावरून येवला नगरपालिकेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच 'राडा' झाला. विषय घेण्यावरून पालिकेतील काही सदस्य अन् मुख्याधिकारी यांच्यात बाचाबाची होतानाच, भरसभेत आपणास शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण केली गेल्याची फिर्याद पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी येवला शहर पोलिसांत दिली आहे. नांदूरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी येवला पालिकेतील नगरसेवक पतीपत्नीसह एकूण सात जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही महिन्यात येवला पालिकेतील एका कर्मचारी संघटनेचे नेतेगण आणि पालिका मुख्याधिकारी यांच्यातील वादविवाद समोर येत आहेत. पूर्वीच्या या नानाविविध घटनांच्या पार्श्वभूमीवर येवला नगरपालिकेची शुक्रवारी (दि. १२) दुपारी बोलवलेली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सभेतील पुढे केला गेलेला ऐनवेळचा एक विषय सभागृहात मोठा राडा करून गेल्याचे बोलले जात आहे. सभेत प्रारंभी सभापटलाच्या विषयपत्रिकेमधील सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. पुढे पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक दयानंद जावळे यांनी आपल्याकडील एक ऐनवेळचा विषय समोर आणला असता, त्यावरून सभागृहात वादाची ठिणगी पडली. नगरसेवक दयानंद जावळे यांच्यासह त्यांच्या पत्नी शिवसेनेच्याच नगरसेविका किरणबाई जावळे यांनी आपला आवाज वाढविताना सभागृहात चांगलीच बाचाबाची झाली. त्यात सभागृहात मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ असा 'राडा' झाला.

नगरसेविका किरणबाई जावळे यांनी आपणास हाताने चापट्या मारीत धक्काबुक्की केली, तर नगरसेवक दयानंद जावळे यांनी शिविगाळ केली. सभागृहात इतरांनी जोडजमाव करून आपल्याला लज्जा उत्पन्न होईल, अशी शिवीगाळ करीत धमकी दिली असल्याची फिर्याद पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली. इतर पाच जणांनी नगरपालिकेच्या सभागृहात अनाधिकृतपणे प्रवेश करून आपल्याला शिवीगाळ करीत लज्जा होईल, अशी शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी किरणबाई जावळे, त्यांचे पती नगरसेवक दयानंद जावळे या दोघा नगरसेवकांसह नितू कंडारे, मुकेश जावळे, दीपक जावळे, भीम जावळे, नीलेश जावळे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत निर्माण करणे, दमदाटी व शिवीगाळ करणे आदी कलमान्वये येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

चुलत भाऊ प्रल्हाद जावळे यांच्या स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज ऐनवेळच्या विषयात घेऊन मंजूर करावा, अशी मागणी सभागृहात माझ्यासह इतर नगरसेवकांनी केली होती. मुख्याधिकाऱ्यांनी या विषयास हेतूपुरस्पर अनुमती दिली नाही. आमच्यावर खोटी फिर्याद दाखल केली आहे.

- दयानंद जावळे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात पाणीबाणी

$
0
0

दहा दिवसाआड मिळणार पाणी; गिरणा, आरमपात्र कोरडे

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा व आरम नदीपात्र कोरडे पडले आहे. सध्या शहराला पाच दिवसाआड पााणीपुरवठा होत आहे. ऐन यात्रोत्सव कालावधीत शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतानाच नदीपात्रातील विहिरींनी तळ गाठल्याने सटाणा शहराला आता तब्बल दहा दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात अल्प पाऊस झाला. पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणारे आरम व गिरणा नदीपात्र देखील कोरडेठाक पडले आहे. या दोन्ही नदीपात्रात आता केळझर, चणकापूर, पुनद धरणातून आवर्तन मिळाल्यानंतरच पाणी येणार आहे. नदीपात्र वाहते राहिल्यास शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तसेच लगतच्या विहिरींना पाणी उतरल्यानंतर शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतो.

यात्रोत्सवातच जलसंकट

सद्यस्थितीत नदीपात्रासह विहिरी देखील आटल्याने आता शहरवासियांना पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दहा दिवसाआड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव सुरू आहे. यात्रोत्सवानिमित्ताने शहरात भाविकांसह नातेवाइकांची रेलचेल आहे. या दरम्यानच पालिका प्रशासनाने तब्बल दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे.

नगरसेवक सरसावले

अनके नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचे टँकरची सुविधा निर्माण केली आहे. मात्र तरीही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरासह हद्दवाढ भागात होणार ८ कोटीची विकासकामे

$
0
0

विकासाला गती

मालेगावसाठी आठ कोटींच्या निधीला मान्यता

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून महापालिकेच्या हद्दवाढ भागातील विविध विकासकामांसाठी आठ कोटींच्या निधीला मान्यता मिळाली असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. नववर्षनिमित्ताने हद्दवाढ भागातील नागरिकांना विकासकामांची भेट मिळाली असून, फेब्रुवारीअखेर या विकासकामांचा शुभारंभ होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या विकासकामांविषयी माहिती दिली

पत्रकार परिषदेत उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयराज पाटील, गटनेते नीलेश आहेर, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे उपस्थित होते.

मागील वर्षी नगरविकास विभागाने हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात पायाभूत सोईसुविधा निर्मितीकरिता महापालिकेस १४.५५ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. या निधीसाठीची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर शिल्लक राहिलेल्या ३ कोटींचा निधी अन्य विकासकामांसाठी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने ३ कोटींच्या निधीस मान्यता दिली असून यातून शहरातील कलेक्टर पट्टा, सोयगाव, द्याने, रमजानपुरा, सायने बु. भायगाव, दरेगाव, म्हाळदे या हद्दवाढ भागात ३ कोटींची विकासकामे होणार आहेत.

रस्त्यांचे डांबरीकरण

या ३ कोटींसह नगरविकासने अन्य ५ कोटींच्या विकासकामांना देखील प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातून शहरातील जुना आग्रा रोड, सटाणा रोड, कॅम्प रोड, चर्च ते डिके रोड अशा प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण होणार आहे. या कामांसाठीचे प्रस्ताव येत्या आठवडाभरात तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून फेब्रुवारी अखेर प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली. आमदार निधीतून हुतात्मा स्मारकात वाचनालय, अभ्यासिका व जेष्ठ नागरिकांसाठी उद्यान अशा सोई सुविधा करण्यात आल्या असल्याचे भुसे यांनी सांगितले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणित अन् विज्ञान कृतिपत्रिकेवर आज मार्गदर्शन

$
0
0

'रेषा एज्युकेशन सेंटर' आणि 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाषा अन् विज्ञानाच्या कृतिपत्रिकांना दहावीच्या विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे याबबतचे तंत्र समजावून घेतल्यानंतर आज, रविवारी (दि. १३) गणित आणि विज्ञानाच्या कृतिपत्रिकेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. रेषा एज्युकेशन सेंटर आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीने हा उपक्रम पार पडणार आहे.

गंगापूर रोड आणि नाशिकरोड अशा दोन परिसरात रविवारी सत्र पार पडेल. यामध्ये गंगापूर रोड परिसरातील सत्र रेषा एज्युकेशन सेंटर, ३ बी, कौस्तुभ, एस. टी. कॉलनी येथे होईल. नाशिकरोड परिसरातील सत्र हॉटेल सेलिब्रेटा, बिग बझारच्या जवळ, नाशिकरोड येथे होणार आहे. गंगापूर रोड येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या गणित विषयक सत्रात मुख्याध्यापिका संध्या भातखंडे मार्गदर्शन करतील. नाशिकरोड येथे सकाळी गणित आणि विज्ञान या विषयाची दोन सत्र होणार आहेत. गणिताचे सत्र सकाळी ९.३० ते ११ या वेळेत होईल. या सत्रासाठी मुख्याध्यापिका संध्या भातखंडे या मार्गदर्शन करतील, तर सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या विज्ञान विषयक सत्रात अंजली ठोके या मार्गदर्शन करतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १०० रुपये नोंदणी फी आहे. कार्यक्रम वेळेतच सुरू होणार असल्याने वेळेअगोदर कार्यक्रमस्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

..

याबाबत मिळणार मार्गदर्शन

- पारंपरिक परीक्षेच्या प्रचलित पद्धतीशिवाय कृतिपत्रिका सोडविण्यासाठी आवश्यक घटक कोणते

- या घटकांची तयारी पालकांनी कशी करून घ्यावी

- विद्यार्थ्यांनीही कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेक्सपिअरची पात्रे वैश्विकच

$
0
0

प्राचार्य पद्माकर पुंडे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकांची मानसिकता हा शेक्सपियरच्या साहित्याचा आत्मा आहे. त्याची पात्रे वैश्विकच होती. माणसाचे स्वभाव कसे असतात, याचा ऊहापोह त्याने साहित्यातून केला, असे प्रतिपादन प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी केले.

संवाद संस्थेच्या वतीने शेक्सपिअरच्या नाटकातील 'आपली माणसं' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. पुंडे म्हणाले, की माणूस विचार करीत बसला तर त्याच्या हाती काही लागणार नाही. त्यासाठी त्याने कृती करणे गरजेचे आहे. शेक्सपिअरच्या नाटकांनी हेच सांगितले.

हॅम्लेट, ज्युलियस सिझर, किंगलियर या नाटकांमधील पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये या वेळी त्यांनी सांगितली. सुरेखा बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. संवाद संस्थेचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, डॉ. बाळासाहेब गुंजाळ, संजय करंजकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेकीद्वारे व्याधी दूर करणे शक्य

$
0
0

डॉ. खर्डीकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेकी हा शब्द जरी जपानी भाषेतला असला, तरी रेकी ही मूळ संकल्पना भारतीय आहे. रेकीद्वारे ब्रह्मांडातील ऊर्जा शरीरात आणणे शक्य होते. त्यातून शरीराला पूरक ऊर्जा मिळून, शरीर निरोगी राहणे शक्य होते, तसेच शारीरिक व्याधीदेखील रेकीद्वारे दूर होऊ शकतात, असे प्रतिपादन डॉ. विपुल खर्डीकर यांनी केले.

नाशिक सेवा समिती ट्रस्टतर्फे डॉ. खर्डीकर यांचे 'रेकी विद्येची माहिती' या विषयावर व्याख्यान झाले. गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात शनिवारी दुपारी ४ वाजता हे व्याख्यान झाले. डॉ. खर्डीकर म्हणाले, की रेकी ही विश्वव्यापी ऊर्जा असून, याद्वारे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविणे यासह शारीरिक आजारांपासून मुक्ती मिळवणे शक्य होते. रेकी या संकल्पनेवर अनेकांचा विश्वास बसत नाही; पण कित्येक रुग्णांना याचा सकारात्मक परिणाम जाणवला आहे. व्यक्ती सतत नकारात्मक विचार करीत असेल, तर व्यक्तीच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. व्यक्तीला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी रेकी फायदेशीर ठरते, असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी शरीरातील सात चक्रे आणि त्यांचे कार्य, तसेच या चक्रांचा जीवनावर होणारा प्रभाव यांची माहिती उपस्थितांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूट करणाऱ्या तिघांना अटक

$
0
0

तीन लुटारूंना अटक

नाशिक : पंचवटीतील मार्केट यार्डात भाजीपाला खरेदी करणाऱ्या तरुणासह त्याच्या साथीदाराला ओळखीतीलच तिघांनी मारहाण करून लुटले. संशयितांनी मोबाइल फोन व पाच हजार रुपये काढून घेतले. पंचवटी पोलिसांनी गुन्हा घडल्यावर काही तासांतच तिघांना अटक केली. दीपक अनिल नामेकर (२१, रा. तेली गल्ली, रविवार कारंजा), प्रीतम प्रशांत बेलेकर (रा. विंचूरकर वाडा, भद्रकाली) आणि प्रथमेश प्रकाश शेलार (२२) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी सूर्याकुमार शिवपलटण मौर्या (रा. १८, कळवा, ठाणे) याने फिर्याद दिली.

रिक्षाचालकास अटक

नाशिक : गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली. महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात झालेल्या या कारवाईप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिशान जावेद शेख (वय ३०, रा. नाईकपुरा, जुने नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ऑटो रिक्षातून बेकायदा गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जत्रा हॉटेल भागात सापळा लावला. या वेळी संशयित रिक्षाची (एमएच १५ ईएच ०७०८) झडती घेतली असता त्यात गोमांस आढळून आले. उपनिरीक्षक सदाफुले तपास करीत आहेत.

उंटवाडीत सात जुगारी पकडले

उंटवाडीतील सिटी सेंटर भागातील आरुषी हॉटेल परिसरातील बांबूच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी छापा मारला, त्या वेळी रवी गुंजाळ व त्याचे सहा साथीदार मुंबई मेन बाजार नावाचा मटका जुगार खेळताना आढळले. संशयितांच्या ताब्यातून १७ हजार ८० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस शिपाई गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून, गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

भाजलेल्या महिलेचा मृत्यू

समईची ज्योत कमी करीत असताना साडीने पेट घेतल्याने गंभीर भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ५ डिसेंबर रोजी जयभवानी रोड भागात घडली होती. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. रेखा शशिकांत निर्गुण (वय ५२, रा. जय भवानी रोड, नाशिकरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. घराच्या देव्हाऱ्यातील समईची ज्योत कमी करीत असताना अचानक त्यांच्या साडीने पेट घेतला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हवालदार विंचू तपास करीत आहेत.

शेकोटीत पडून वृद्धाचा मृत्यू

शेकोटीजवळ शेकत असताना अचानक चक्कर येऊन शेकोटीत पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना नाशिक तालुक्यातील तिरडशेत येथे घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दौलत पुंजा गांगुर्डे (वय ६०, रा. तिरडशेत) असे या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या घरासमोर शुक्रवारी सकाळी शेकोटी पेटवून गांगुर्डे शेकत असताना ही घटना घडली. अचानक चक्कर आल्याने ते पेटत्या शेकोटीत पडले. यामुळे त्यांचे तोंड, छाती व हात गंभीर भाजले गेले. श्याम गांगुर्डे यांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. हवालदार माळोदे तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

औद्योगिक वसाहतीतील संजीवनगर भागातील रफिक रमजू शेख (वय २६) याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा सप्ताहास प्रारंभ

$
0
0

युवा सप्ताहास प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शक्ती विकास अॅकॅडमीतर्फे युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, १२ ते १९ जानेवारी या काळावधीत विविध स्पर्धा आणि स्वच्छता अभियान या सप्ताहात होणार आहे. या सप्ताहाला शनिवारी प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचलनालाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र आणि शक्ती विकास अॅकॅडमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 'स्वामी विवेकानंद' व 'राजमाता जिजाऊ' यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अॅकॅडमीतर्फे आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी अरविंद चौधरी, क्रीडा शिक्षक डॉ. मीनाक्षी गवळी आणि अकादमीचे अध्यक्ष मनोहर जगताप उपस्थित होते. अकादमी तर्फे १२ ते १९ जानेवारी या कालावधीत युवा सप्ताह घेण्यात येणार आहे. यामध्ये वक्तृत्व, निबंध, रांगोळी यांसह विविध क्रीडा स्पर्धा आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येईल, असे अॅकॅडमीतर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपतींचे नाव समाज जोडण्यासाठी वापरा

$
0
0

प्रशांत देशमुख यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजांनी मोठ्या धैर्याने औरंगजेबासह इतर पाच पाच आघाड्यांविरोधात पूर्ण ताकद एकवटून स्वराज्याचे संरक्षण केले. मराठी मातीला असलेल्या फुटीरतेच्या शापाने त्यांचा घात केला. साक्षात मृत्यू समोर असतानाही त्यांनी रायगडच्या सिंहासनाशी तडजोड केली नाही. कसे जगावे हे छत्रपती शिवरायांकडून तर कसे मरावे हे शंभू अर्थात संभाजी राजेंकडून शिकावे, असे प्रतिपादन वक्ते प्रशांत देशमुख यांनी मनमाड येथे केले. तसेच छत्रपतींचे नाव समात जोडण्यासाठी वापरा, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील सीता लक्ष्मी सभागृहात संस्कृती संवर्धन समितीतर्फे सुरू असलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प 'छत्रपती वीर संभाजी' या विषयावर त्यांनी गुंफले. संस्थेचे अध्यक्ष किशोर नावरकर, माजी आमदार संजय पवार, नरेश गुजराथी, पुरुषोत्तम दिंडोरकर, दिनेश धारवाडकर उपस्थित होते.

यावेळी आपल्या ओघवत्या शैलीत संभाजी राजे यांचा इतिहास मांडत प्रशांत देशमुख यांनी इतिहासातील अनेक प्रसंग सभागृहात प्रभावीपणे उभे केले. ते म्हणाले की, संभाजी राजांनी प्राण मोलाने शिवरायांचे स्वराज्य जपले. त्यांच्या बलिदानाने महाराष्ट्राला बलदान दिले. जनता पेटून उठली आणि स्वराज्यासाठी लढली. अखेर औरंगजेबाची कबर याच मराठी मातीत करावी लागली. औरंगजेबाला मराठी राज्य जिंकता आले नाही. शिवरायांची प्रेरणा आणि शंभू राजांचे हौतात्म्य! ही त्याची दोन कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी माणसानं पहिल्यांदा खेकडी वृत्ती सोडली पाहिजे. दुसऱ्याच्या वाटेत फुले नाही पेरली तरी चालतील पण किमान काटे तरी टाकणार नाही एवढा तरी निश्चय मनात करायला हवा, असे देशमुख यांनी सांगितले.

तरुणाईला आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही दोन नावे समाज तोडण्यासाठी नाही तर समाज जोडण्यासाठीच आहेत, या नावांचा वापर आम्ही समाज जोडण्यासाठीच करू, असा निश्चय तरुणाईने मनात केला पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, शुक्रवारी छत्रे विद्यालयातील प्राथमिक शिक्षक वृत्तपत्र लेखक प्रशांत कुलकर्णी यांच्या 'गाथा शिवरायांची' या पुस्तकाचे प्रकाशन वक्ते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात : पुस्तक प्रकाशन

$
0
0

'अ थॉट फॉर युवर पेनी' पुस्तकाचे आज प्रकाशन

नाशिक : समुपदेशिका शुभा बलदोटालिखित 'अ थॉट फॉर युवर पेनी' या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. अण्णासाहेब मुरकुटे सभागृह, मुरकुटे कॉलनी, पंडित कॉलनी येथे हा कार्यक्रम होईल. वनाधिपती विनायकदादा पाटील, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती अॅड. मनीष बस्ते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images