Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नि‌ळवंडे कलाव्यासाठी एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील निळवंडे कालव्याचे बंद केलेले काम पुन्हा सुरू करावे. तसेच काम बंद करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. कालव्या संदर्भातील अडचणी दूर करून, संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासन जलसंपदा विभागाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

निळवंडे कालवा कृती समितीतर्फे सोमवारी सकाळी त्र्यंबक रोडवरील जलसंपदा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलनास पुकारण्यात आले. नगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्यासाठी केंद्रीय जलआयोगाने केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला आहे. औरंगाबाद खंडपीठाने या प्रकल्पाला निधी देण्याचे आदेश दिले असूनही, या प्रकल्पाचे काम सुरू करण्यास बिलंब करण्यात येत आहेत. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना याचा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांत मोठा असंतोष असल्याने आंदोलन पुकारल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

प्रकल्पासाठी 'जलसंपदा'कडे २५० ते ३०० कोटींचा निधी शिल्लक आहे. या निधीतून अकोले तालुक्यातील २८ किलोमीटरच्या खडकाळ भागाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी समितीने 'जलसंपदा'कडे अनेकदा केली. मात्र, काही लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामुळे हे काम पूर्ण झाले नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. प्रकल्पाच्या समस्येवर योग्य निर्णय व्हावा, यासाठी नाशिकच्या मुख्य जलसंपदा कार्यालयासमोर समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. सुमारे ४५० शेतकरी यात सहभागी झाले. यावे‌‌ळी समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, नानासाहेब गाढवे, विठ्ठल पोकळे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, गंगाधर राहणे, रमेश दिघे ,नामदेव दिघे, सोमनाथ दरंदले, बाबासाहेब गव्हाणे, उत्तम जोंधळे, तानाजी शिंदे, अशोक गांडूळे, दत्तात्रय आहेर आदी उपस्थित होते.

\Bउशिरा मिळाले आश्वासन \B

महिन्याभरात काळवंडे कालव्याच्या प्रकल्पात भेडसावणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या जातील. तसेच हे काम बंद करण्यासाठी दोषी असलेल्यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन जलसंपदाचे मुख्य अभियंता कि. बा. कुलकर्णी यांनी दिले. त्यानंतर सायंकाळी उशिराने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॅप्पी स्ट्रीटची धमाल आता गोविंदनगरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

झुम्बा, जादूचे खेळ, कॅलिग्राफीची नजाकत, जुन्या गाड्यांचा नजराणा अशा अनेक गोष्टी येत्या रविवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी नाशिककरांना पुन्हा अनुभवता येणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने रविवारी (दि. २० जानेवारी) सकाळी ७ ते ९ या वेळेत गोविंदनगर येथे 'हॅप्पी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स आणि 'हॅप्पी स्ट्रीट' हे जणू समीकरणच झाले आहे. दर्जेदार बातम्यांबरोबरच वाचकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन 'मटा'च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून 'हॅप्पी स्ट्रीट'ने नाशिककरांना अक्षरश: वेड लावले आहे. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील व्यक्ती हॅप्पी स्ट्रीटची वाट पाहत असतात. मागील आठवड्यात नाशिकरोड व त्याआधी व्हिरिडियन व्हॅली व कॉलेजरोड येथे झालेल्या 'हॅप्पी स्ट्रीट'ला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षी प्रमाणे यंदाही गोविंदनगर येथे 'हॅप्पी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लहान मुलांसाठी विविध खेळ खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जादूचे प्रयोगदेखील होणार आहेत. क्लासिकल व वेस्टर्न म्युझिक बॅँडद्वारे विविध गाणी सादर केली जाणार आहेत. कॅलिग्राफीचे विविध प्रकार शिकायला मिळतील. झुम्बाच्या तालावर थिरकताना शरीर फिट ठेवण्याचा मंत्र मिळणार आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी गीतांच्या चालीवर थिरकण्याची मजा यावेळी अनुभवता येईल.

कलाकारांना नाव नोंदविण्याची संधी

तुमची कला हॅप्पी स्ट्रीटवर सादर करण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी कलाकारांनी महाराष्ट्र्र टाइम्सच्या ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ गाव पाणीयोजना बंद

$
0
0

चांदवड, नांदगाव तालुक्यात पाणीटंचाई

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

चांदवड तालुक्यातील १६ व नांदगाव तालुक्यातील २६ गावांसाठी नागासाक्या धरणावरून सुरू असलेली ४२ गाव पाणीपुरवठा योजना गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा योजना पुन्हा बंद पडल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोंमैल भटकंती करावी लागत आहे.

ही योजना थकित विजेच्या बिलापोटी बंद होती. गावातील जनतेच्या आंदोलनानंतर जाग आलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने योजनेच्या थकित वीजबिलाचा भरणा केला. त्यानंतर सुरू झालेली योजना कशीबशी दोन महिने सुरू होती. मात्र आता पुन्हा बंद पडली आहे. तालुक्यातील पूर्व भागातील कानडगाव, कुंदलगाव, दहेगाव, वाद, वराडी, निमोण, दरेगाव, डोणगाव, मेसनखेडे-खुर्द, मेसनखेडे-बुद्रुक, शिंगवे, कातरवाडी, वडगावपंगु, वागदर्डी, रापली, भडाणे आदी गावांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. या गावांमधील नदी-नाले कोरडेठाक असून, विहिरींनी तळ गाठला आहे. गावातील नागरिकांना गावातील ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला थोडेफार पाणी शिल्लक आहे, तेथे हंडाभर पाण्यासाठी देखील महिलांना जीवाचे रान करावे लागत आहे. नागरिकांचा दिवसेंदिवस रोष वाढत चालला असून, काही गांवांमध्ये महिलांना हंड्डा मोर्चा काढून प्रशासनाला जाग आलेली नाही.

नांदगाव पंचायत समितीत बैठक

४२ गावांना पाणीपुरवठा बंद असल्यामुळे प्रशासनाने तातडीने ४२ पाणीपुरवठा समितीची बैठक घेतली. या बैठकीत समितीने जमा झालेला पैसा नक्की कुठे खर्च केला, असा संतप्त सवाल केला. तसेच खर्चाचा सविस्तर माहित देण्याची मागणी करण्यात आली. समिती व प्रशासनाच्या समन्वयासाठी दर महिन्याला मासिक बैठक घेण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला. तसेच झालेल्या खर्चाचा तपशील पुढील बैठकीत सादर करण्याचे अध्यक्ष बापू जाधव व सचिव विस्तार अधिकारी विजय जाधव यांनी मान्य केले. या बैठकीसाठी नांदगावचे गट विकास अधिकारी, पाणीपुरवठा समितीचे उपाध्यक्ष तथा दरेगावचे सरपंच अमोल देवरे, सहसचिव सुनील पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळाला फिटनेसचा मंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर होणारा नृत्यरुपी व्यायाम, तसेच ध्यान अन् योगासनांद्वारे महिलांना फिटनेसचे धडे देण्यात आले. 'मटा कल्चर क्लब' आयोजित 'झुम्बा आणि पॉवर योगा' कार्यशाळेला महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत सहभागींना नृत्य आणि योगासनांद्वारे फिट राहण्याचा गुरुमंत्र देण्यात आला.

व्यायामासाठी नवे ट्रेंड येत असून, सध्या झुम्बा या व्यायाम प्रकाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परंपरागत योगसाधनेचेही महत्त्व आजच्या पिढीला समजू लागले असून, योगा शिकण्यासाठी नागरिक पुढाकार घेत आहेत. बदलत्या जीवनशैलीत फिटनेस राखता यावा, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' तर्फे २ ते १६ जानेवारी या कालावधीत 'झुम्बा आणि पॉवर योगा' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मानगर येथील 'द फिटनेस स्टुडिओ बाय सई संघई' या ठिकाणी सकाळी ७ ते ८ व ८ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ६ व ६ ते ७ या वेळेत ही कार्यशाळा घेण्यात आली. सई संघई यांनी झुम्बा आणि योगाचे धडे सहभागार्थींना दिले. बदलत्या जीवनशैलीत झुम्बा आणि योगाचे महत्त्व वाढत असून, व्यायामासोबतच हा उत्साही राहण्याचा मंत्र असल्याचे सई संघई यांनी सहभागींना सांगितले. यावेळी हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर झुम्बा नृत्याद्वारे व्यायाम करवून घेतानाच, प्राणायम आणि आसनांद्वारे योगाचे महत्त्व विशद करण्यात आले. महिलावर्गासह पुरुषांनीही या कार्यशाळेत सहभाग घेतला. दररोज एक ते दीड तास व्यायाम केल्यास केवळ फिटनेस नाही तर बॉडी टोनिंग, चेहऱ्यावरील तजेलता, शरिराचा हलकेपणा, ताजेपणा या सर्वच पद्धतीने लाभ होऊ शकतो, असे संघई यांनी सहभागींना सांगितले. या कार्यशाळेतून महिलांनी फिटनेसचा मंत्र जाणून घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित पवार-भुजबळ आज ओझरमध्ये

$
0
0

अजित पवार-भुजबळ आज ओझरमध्ये

निफाड : पिंपळगाव बसवंत येथील स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा ओझर शाखा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दि. १५) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आणि छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत सायंकाळी चार वाजता भगवा चौक, ओझर मिग येथे हा कार्यक्रम होणार आहे. माजी आमदार दिलीप बनकर हे या संस्थेचे संस्थापक असून राजकीय प्रतिस्पर्धी आमदार अनिल कदम यांच्या गावात या शाखेचे उद्घाटन होत आहे. राष्ट्रवादीचे नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तन यात्रेद्वारे राष्ट्रवादीचे कूच!

$
0
0

जिल्ह्यात १६ व १७ जानेवारीला होणार सहा सभा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली परिवर्तन यात्रा १६ व १७ जानेवारी रोजी जिल्ह्यात सहा ठिकाणी जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले जाणार आहे.

विविध प्रश्न घेऊन सरकारविरुद्ध एल्गार पुकारत ही यात्रा १० जानेवारीपासून रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरू झाली. पहिली सभा महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या ठिकाणी झाली. त्यानंतर पाच दिवस ही यात्रा विविध ठिकाणी गेली. आता ही यात्रा १६ व १७ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध सहा ठिकाणी सभा होणार आहेत. या यात्रेत सरकारचा भ्रष्टाचार, अनेक गंभीर चुका, आतापर्यंत झालेल्या घोटाळ्यांचे आरोप, खोटी कर्जमाफी, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश, नागरी प्रश्न, चार वर्षात पेट्रोल-डिझेल, गॅसची दरवाढ मुद्दे घेण्यात आले आहेत. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले आहे.

अशी असेल यात्रा

परिवर्तन यात्रा बुधवार (दि. १६) सिन्नर येथील हुतात्मा चौक येथे दुपारी ११ वाजता सभा होईल. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील घोटीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ३ वाजता तर सिडकोतील पवननगर स्टेडियम येथे सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. याशिवाय गुरुवार (दि. १७) दिंडोरी येथे दुपारी ११ वाजता, सायखेडा येथे दुपारी ३ वाजता सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मनमाडमधील आययूडीपीतील महर्षी वाल्मीकी स्टेडियम येथे जिल्ह्यातील शेवटची परिवर्तन सभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन नगरसेवकांची ‘वनहक्क’वर नियुक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासींच्या वनहक्क दाव्यांबाबत सरकारने गठीत केलेल्या जिल्हा वनहक्क समितीत महापालिकेकडून तीन नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे सुरेश खेताडे, पुंडलिक खोडे, सरिता सोनवणे यांची या समितीवर वर्णी लागली आहे.

महासभेच्या ठरावानुसार ही नियुक्ती झाली असून तीन नगरसेवक या समितीवर महापालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आदिवासींच्या वनहक्क दाव्यांच्या निपटारा करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात वन हक्क समिती स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत ग्रामीण, नागरी क्षेत्राचेही प्रतिनिधी असतात. त्यानुसार महापालिका हद्दीतून या समितीवर तीन जणांची नियुक्ती केली जाते. महापालिकेच्या कोट्यातील या तीन जागा अनेक दिवसापासून रिक्त होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठवून समितीवर सदस्याची नियुक्ती करण्याचा मागणी केली होती. त्यानुसार महासभेने ठराव करत या समितीवर सुरेश खेताडे, पुंडलिक खाडे व सरिता सोनवणे अशा तीन जणांची शिफारस केली आहे. त्यामुळे या तीन सदस्यांना महापालिका कार्यक्षेत्रासंदर्भातील वनहक्क दाव्यांसदर्भात पाठपुरावा करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर-रुबेलाचा विरोध मावळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोवर-रुबेला लसीकरणाला शहरातील उर्दू शाळांनी दर्शविलेला विरोध अखेर मावळला आहे. पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुस्लिम समाजातील धर्मगुरू, समाजसेवकांसह शाळा प्रशासनाच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत शहर-ए-खतीब आणि धर्मगुरूंनी त्यास संमती दिली असून, शुक्रवारच्या नमाजावेळी लसीकरणाबाबत पालकांना आवाहन केले जाणार आहे. पुढील तीन दिवस मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार असून, शनिवारी(दि. १९) ३५ उर्दू शाळांमध्ये लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.

मनपा कार्यक्षेत्रात २७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण ही मोहीम सुरू असून, याअंतर्गत ४ लाख ९० हजार २१८ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी नेमलेल्या 'सिटी टास्क फोर्स'ची आढावा बैठक गेल्या आठवड्यात आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात उर्दू शाळांकडून या मोहिमेला होणाऱ्या विरोधाची माहिती समोर आली आहे. या मोहिमेविरोधात राज्यभरात अफवांचे पीक पसरले असून, लस दिल्यानंतर बालकांना अपाय होत असल्याच्या वावड्यांमुळे राज्यातील काही शाळांमध्ये लसीकरणास विरोध झाला आहे. त्यामुळे ३५ शाळांमधील १६ हजार ८४ बालकांपैकी अवघ्या ६२९५ बालकांनाच लस देण्यात आली होती. दोन शाळांना लसीकरणाला थेट विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आयुक्तांच्या दालनात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीस शहर-ए-खतीब इसामुद्दीन खतीब, धर्मगुरू शातीन अमरुद्दीन खतीब, नगरसेवक शाहीन मिर्झा, समिना मेमन, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अब्बास निसम, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल गायकवाड यांच्यासह ३३ शाळांचे मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख उपस्थित होते. यावेळी डॉ. अब्बास निसम यांनी या लसीकरणाबाबत सादरीकरण केले. या लशीमुळे नंपुसकत्व येत नसून, मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी लस आवश्यक असल्याचे सांगितले. या लशीबाबत शहर-ए-खतीब आणि धर्मगुरूंमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यात आला. धर्मगुरूंच्या शंका दूर झाल्यानंतर त्यांनी लसीकरणाला होकार दर्शवला. त्यानुसार आता पुढील तीन दिवस मुस्लीम बहुल भागांसह शाळांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. येत्या शुक्रवारी मशिदीमधून अजान तसेच नमाजावेळी पालकांना लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले जाणार आहे. मदरशांमधूनही जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. शनिवारी उर्दू शाळा तसेच मदरशांमध्ये लसीकरणाची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली आहे.

७८ टक्के उद्दिष्ट पूर्ण

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरात ४ लाख ९० हजार २१८ बालकांचे लसीकरण केले जाणार होते. आतापर्यंत या मोहीमेअंतर्गत ३ लाख ८३ हजार ९३४ बालकांचे लसीकरण झाले असून, ७८ टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट साध्य झाले आहे. अद्याप एक लाख ६ हजार बालकांचे लसीकरण बाकी असून, २० जानेवारीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.त्यामुळे एका आठवड्यात लाखभर मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट वैद्यकीय विभागाला गाठायचे आहे. त्यासाठी येत्या शुक्रवारी खासगी बालरोग तज्ञांच्या दवाखान्यांमध्येही लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. या ठिकाणी पालिकेची टीम उपलब्ध करून दिली जाणार आहे.

धर्मगुरू, नगरसेवकांसोबत लसीकरणाबाबत चर्चा झाली. त्यांच्या मनातील शंका दूर झाल्या असून, शहर-ए-खतीब यांनीही लसीकरणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार तीन दिवस जनजागृती मोहीम राबवून येत्या शनिवारी सर्व ३५ शाळांमध्ये लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.

- डॉ. राहुल गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संक्रांतीच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी झुंबड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मकरसंक्रातीच्या खरेदीसाठी सोमवारी बाजारपेठ फुलल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील दुकानांमध्ये संक्रांतीच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. सुकडी, साखरेचा हलवा, तीळ-गुळाचे लाडू, काळ्या रंगाचे कपडे, वाण देण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह पूजेचे साहित्य घेण्यासाठीची लगबग महिलावर्गात दिसून आली.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होऊन, सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. उत्तरायणात सूर्य असण्याचा काळ हा शुभ काळ मानला जातो. यावेळी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला मकरसंक्रांती म्हणतात. या सणाच्यानिमित्ताने एकमेकांना तीळगूळ देत, शुभेच्छा दिल्या जातात. तसेच महिलावर्ग हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत, सौभाग्याचे वाण एकमेकींना देत असतात. त्यामुळे संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाजारात उपलब्ध असलेले वैविध्यपूर्ण वाण वाण खरेदीसाठी महिलावर्गाची सकाळपासूनच बाजारात लगबग दिसली. मुख्य बाजारपेठेसह उपनगरांतील दुकानांत गृहोपयोगी वस्तूंसह सौंदर्य प्रसाधने व इतर वस्तूंच्या खरेदीकडे महिलांचा कल होता. तसेच संक्रांत सणाला काळ्या रंगाच्या वस्त्रांचे महत्त्व असल्याने, कपड्यांच्या दुकानांत काळी वस्त्रे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. काळ्या वस्त्रांवर साजेशी ज्वेलरी खरेदी करण्याकडे महिलावर्गाने पसंती दिली. तीळगूळ, साखर फुटाणे यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी रविवार कारंजा, मेनरोड, दहीपूलसह उपनगरांतील दुकांनात गर्दी केली. तसेच विविध आकाराच्या कापडी पतंग खरेदीला यंदा तरुणांनी पसंती दिल्याचे यावेळी दिसून आले. या सर्व खरेदीमुळे बाजारात ग्राहकांची झुंबड उडाल्याचे दिसले.

\B

संक्रांतीचा शुभ मुहूर्त

\Bसंक्रांत सणाचा शुभ मुहूर्त सकाळी ७.१४ ते सायंकाळी ६.१९ पर्यंत असून, संक्रांतीच्या दिवशी नदीपात्रात स्नान करण्यास महत्त्व आहे. संक्रांतीची पूजा करताना सूर्य देवाला नमस्कार करुन, घरात प्रसाद ग्रहण करण्यापूर्वी आगीत थोडासा गूळ आणि तीळ टाकून अग्नीदेवतेलाही नमस्कार करावा. तसेच यावेळी 'सूर्याय नम: आदित्याय नम: सप्तार्चिषे नम:' या मंत्राचे उच्चारण करावे, असे पुरोहितांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाऱ्याने दिली साथ, पतंग आकाशात

$
0
0

येवल्यातील पतंगोत्सवास दिमाखात सुरुवात; पतंगप्रेमींचा उत्साह द्विगुणीत

म. टा. वृत्तसेवा, येवला

मकरसंक्रांतीनिमित्त तीन दिवस चालणाऱ्या येवला शहरातील प्रसिद्ध पतंगोत्सवास सोमवारी दिमाखात सुरुवात झाली. दिवसभर वाहत्या वाऱ्याने साथ दिल्यामुळे पतंगने आकाशात भरारी घेतली. पहिल्याच दिवशी 'उडी उडी जाय'चा अनुभव आल्यामुळे पतंगप्रेमींचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. दिवसभर ढिल दे ढिल...च्या किलकाऱ्या ऐकू येत होत्या.

येवल्यातील तीन दिवशीय पतंगोत्सवाचा मकर संक्रांतीच्या भोगीच्या सोमवारच्या (दि.१४) पहिल्या दिवशी शानदार श्रीगणेशा झाला. पतंगाला हवेत वरवर घेवून जाणारा अगदी सकाळपासून ते पुढे सायंकाळपर्यंत कायम टिकून राहिलेला वारा बघता येथील पतंगप्रेमींच्या पतंगबाजीला सोमवारी दिवसभर अगदी मोठे उधाण आले होते. पहाटेपासूनच वारा वाहत असल्याने पतंगोत्सवासाठी आसुसलेल्या शहरातील अनेक पतंगप्रेमींनी उगवतीच्या दिनकराचे दर्शन होण्याअगोदरच 'आसारी' अन् 'पतंग' घेवून आपल्या घराची गच्ची गाठली. पुढे दिवसभर शहरातील प्रत्येक घरादारांच्या गच्ची व धाब्यांवरील पतंगप्रेमींची गर्दी वाढत जाताना, आकाशात असंख्य पतंग इकडून तिकडे व तिकडून इकडे घिरट्या घालत होते. हवेतील वाऱ्यासरशी आकाशात भिरकणाऱ्या पतंगांचा मांजावर मांजा पडून एकमेकांचे पतंग काटाकाटीसाठीचा 'पेच' रंगला होता. पतंगबाजीतील या पतंग कापाकापीत कुणी याचा, तर कुणी त्याचा पतंग कटल्यावर होणारा 'वकाट...वकाटे' चा जिंकल्यागतचा जल्लोष देखील लक्ष वेधून घेत होता.

दोन दिवस धमाल

पुढील दोन दिवस शहरात उत्साहाने पतंगबाजी करण्यात येणार आहे. पतंगोत्सवातील सोमवारी साथ देणारा 'वारा' पुढील दोन दिवसात कशी साथ साथ देतो, यावर देखील सर्व काही अवलंबून असणार आहे. वाऱ्याची साथ मिळाल्यास पुढील दोन दिवस परंपरेप्रमाणे पतंगबाजीचा धमाका पाहायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीतही खोडा

$
0
0

घोटी-सिन्नर रस्त्याचे काम रखडले

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील सर्वात वर्दळीचा समजला जाणाऱ्या घोटी-सिन्नर महामार्गाच्या दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे काम पुन्हा रखडले आहे. त्यामुळे वाहनचालक हतबल झाले आहेत. महत्त्वाचा महामार्ग असूनही या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. घोटी-सिन्नर महामार्गावरून धावणाऱ्या हाईस्पीड वाहनांचा वेगही यामुळे कमी होत आहे. दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनांना अर्धा तास लागत आहे.

गेल्या वर्षभरापासून या महामार्गाला खड्ड्यांचे ग्रहण लागले असून, यामुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र महामार्गावर केवळ कच, खडी पसरविण्यात आले. त्यानंतर डांबरिकरणाचे काम रखडले आहे. आमदार निर्मला गावित यांनी आढावा बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरले होते. दिशाभूल करणाऱ्या सबंधित उपअभियंत्यांची तत्काळ बदली करण्याबाबतही सूचित केले होते. बैठकीनंतर 'सांबा'ने महिनाभरात दुरुस्तीचे काम करण्याची ग्वाही दिली होती.

आमदार राजाभाउ वाजे यांच्या उपस्थितीतील बैठकीतही बांधकाम विभागाने शब्द दिला होता. त्यानंतर काम सुरू करण्याबाबत दोन दिवसाचे नाटक करण्यात आले. मात्र आता पुन्हा महिना उलटला तरी या महामार्गाची दुरुस्ती व डांबरिकरणाचे काम रखडले आहे. अनेकवेळा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही, आंदोलने करूनही बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुरुस्ती, व डांबरिकरणाचे काम का रखडले? असा प्रश्न माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पांडुरंग शिंदे, कचरू डुकरे, बाळासाहेब गाढवे, रमेश परदेशी आदींनी उपस्थित केला आहे.

येत्या दोन दिवसात या महामार्गाचे काम सुरू झाले नाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा पांडुरंग शिंदे, पांडुरंग वारुंगसे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षांच्या नावाचा बोर्ड लावा

$
0
0

लोगो - दाद फिर्याद

\Bवृक्षांच्या नावाचा बोर्ड लावा

\Bचंद्रशेखर विधाते, कामटवाडे, मटा वाचक

शहरातील अनेक उद्यानांमध्ये आणि जॉगिंग ट्रॅकवर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावण्यात आले आहेत. मात्र, या वृक्षांना संरक्षक जाळ्या लावण्यात आलेल्या नाहीत. महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन या वृक्षांना संरक्षक जाळ्या बसविल्या पाहिजेत. जेणेकरुन या वृक्षांचे संवर्धन करणे सोपे जाईल. तसेच हरित नाशिकच्या या निर्सगसंपत्तीची माहिती अनेकांना होत नाही. अनेकांना हे वृक्ष कोणते आहेत, हे ठाऊक नाही. त्यामुळे वन विभागाने प्रत्येक वृक्षाच्या संरक्षक जाळीवर संबंधित वृक्षाचा प्रकार आणि नावाची पाटी लावायला हवी. जेणेकरुन नाशिककरांना निसर्गत: देखील 'स्मार्ट' होता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वामी समर्थ सेवामार्गाचा २५ पासून कृषी महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाचा शुभारंभ २५ रोजी गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री गिरीश महाजन, पशू-संवर्धन आयुक्त कांतिलाल उमप आदींच्या उपस्थितीत होणार आहे.

महोत्सवाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन सोमवारी डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्यात आले. शेतकऱ्यांचे आत्मबल वाढवून त्यांना मानसिक, अर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. कृषी महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व शेती डेमो मॉडेल असणार आहे. कृषी दिंडी, शेतकरी वधू-वर परिचय मेळावा, कृषी युवा नवचैतन्य अभियान, सरपंच व ग्रामसेवक मांदियाळी, पर्यावरण कार्यशाळा, कृषी माऊली पुरस्कार, पशुधन-गोवंश प्रदर्शन, बारा बलुतेदारांचे गांव असे विविध उपक्रम या महोत्सवांतर्गत होणार असून, या सर्व उपक्रमांमध्ये दरवर्षीप्रमाणे शेतकरी, नागरिक, समर्थ सेवेकऱ्यांचा मोठा सहभाग राहणार असल्याची माहिती आयोजक आबासाहेब मोरे यांनी दिली. महोत्सवात कृषी माऊली पुरस्कार दिले जाणार आहेत. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देऊन त्यांचे संशोधन लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयोगशील शेतकरी व विद्यार्थ्यांना काही स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

असे आहेत कार्यक्रम

२५ जानेवारीला सकाळी ८ वाजता रामकुंड ते डोंगरे वसतिगृह निघणाऱ्या कृषी दिंडीने या महोत्सवास प्रारंभ होईल. ही दिंडी डोंगरे वसतिगृह मैदानावर येईल. १० वाजेपासून उद्घाटन सोहळ्यास प्रारंभ होईल. याच दिवशी दुपारी नैसर्गिक शेतीतून शाश्वत समृद्धी या विषयावर चर्चासत्र होईल. २६ तारखेला सकाळी शेतकरी वधू-वर मेळावा तर दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी पर्यावरण जनजागृतीवर चर्चा तर कृषी पर्यटन व जोडव्यवसायावर मार्गदर्शन, २८ तारखेला दुग्धव्यवसायातील संधी तर अखेरच्या दिवशी २९ जानेवारीला दुपारी सरपंच व ग्रामसेवक मांदियाळी आणि सायंकाळी कृषी माऊली पुरस्कार वितरणाने कृषी महोत्सवाचा समारोप होईल, असे मोरे यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या नाशकात १५ फूट पतंग

$
0
0

नाशिक:

मकर संक्रांतीनिमित्त जुन्या नाशकात १५ फुटांचा पतंग साकारण्यात आला आहे. हा पतंग नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे. प्लास्टिकच्या कागदापासून तयार करण्यात आलेल्या या पतंगाच्या माध्यमातून 'नायलॉन'चा वापर टाळा, असा संदेश देण्यात येत आहे.

जुने नाशिक परिसरातील काझीपुरा येथे राहणाऱ्या वाहिद शेख, शोएब पठाण, एहसान शेख आणि माही सैय्यद यांनी १५ फूटाची पतंग तयार केली आहे. वाहिद शेख आणि त्यांचे सहकारी दहा वर्षांपासून संक्रांतीला १० फुटांचा पतंग तयार करतात. यंदा पतंगाचा आकार वाढविण्यात आला आहे. पतंग उडविण्याचे प्रमाण कमी झाले असून, परंपरेपासून नागरिक लांब जाऊ लागले आहेत. पतंगासाठी पांढरा व सोनेरी प्लास्टिकचा कागद वापरण्यात आला आहे. स्मार्ट फोनच्या वापरामुळे लहानग्यांना सणाचे विशेष महत्त्व समजत नसल्याने, दरवर्षी मोठ्या आकाराचा पतंग तयार करून प्रबोधन करतो, असे वाहीद शेख व सहकाऱ्यांनी सांगितले. या १५ फुटांच्या पतंगाला बांबूपासून आधार देण्यात आला असून, दोरखंडाच्या सहाय्याने पतंग उडविण्यात येणार आहे. त्यामुळे हा अनोखा पतंग जुन्या नाशकातील पतंगप्रेमींना आकर्षित करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांचा पाऊस; तुरुंगात भागणार हौस!

$
0
0

निफाड:

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या दोघा साथीदारांना निफाड पोलिसांनी अटक केली. संशयितांविरोधात महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ कलम ३ भादंवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारात फिर्यादी महिलेने जीवावर उदार होऊन या प्रकारचा भांडाफोड करण्यासाठी प्रयत्न केला. यात तिला तिचे साथीदार अंधश्रद्धा विरोधात काम करणारे आणि छत्रपती सेनेचे तुषार गवळी, तानाजी शेलार, नीलेश शेलार, धीरज खोळंबे (रा. राणेनगर, नाशिक) यांनी महत्त्वाची साथ दिली. पीडित महिलेने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार आणि पूजेसाठी स्वतःला मागणी घातल्याची बाब आपल्या साथीदारांना सांगितली आणि या प्रकाराचा पर्दाफाश करण्याची योजना आखली.

याबाबत पीडित महिलेने निफाड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या महिलेची आणि संशयित भोंदूबाबा योगेश नागरे याची प्रसाद जाधव याने निफाड येथे १२ जानेवारी रोजी शिवपार्वती लॉन्स येथे भेट घडवून आणली. या भेटीत बाबाने महिलेला शुद्धीकरण विधी व पूजा याची माहिती देऊन १३ जानेवारीला बोलावले. ही बाब महिलेने साथीदारांना सांगितली. यानंतर पीडित महिला प्रसाद जाधव आणि डॉ. योगेश सोनार यांच्यासह नाशिक येथून निफाड येथे आले. शिवपार्वती लॉन्सजवळ बाबाच्या अल्टो गाडी (एमएच १४, ईएक्स १५७९) मध्ये पीडित महिला व बाबा हे बसले. बाबा आपल्यासोबत काहीतरी वाईट करणार हे लक्षात आल्याने महिलेने तिच्या सहकाऱ्यांना एसएमएस केला. ही बाब सहकाऱ्यांनी पोलिसांना कळवली. भोंदूबाबाला व उपस्थितांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी या सर्व प्रकारची माहिती पीडित महिलेने सांगितली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी निफाड तालुक्यातील दोघांसह नाशिकमधील एकास ताब्यात घेतले. योगेश नागरे (शिवरे, ता. निफाड), योगेश सोनार (पवननगर, सिडको, नाशिक) प्रसाद जाधव (टाकळी विंचूर, ता. निफाड) या तिघांना सोमवारी पहाटे पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले.

नेमके घडले काय?
ओळखीतल्या प्रसाद जाधव याने निफाड येथे एक बाबा पैशांचा पाऊस पाडतो, त्याला पूजेसाठी एका मुलीची गरज आहे, तुम्ही मदत कराल का, अशी विचारणा संबंधित महिलेला केली होती. या महिलेचा फोटो काढून बाबाला मोबाइलवर पाठवित नंतर भेटही घडवून आणली. यावेळी भोंदूबाबा योगेश नागरेने महिलेला सांगितले, की एक जीन येऊन आपल्याला पैसे देईल. त्यासाठी तुझे शुद्धीकरण करावे लागेल. तुला सुरुवातीला जीनसोबत व नंतर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील. त्यासाठी लॉजवर जाऊ, तेथे जीन तुझ्याशी शारीरिक संबंध केल्यानंतर तुला हवे तितके पैसे देईल. ते सर्व आपण आपसात वाटून घेऊ असे सांगत महिलेला उत्तेजक द्रव्याच्या गोळ्यांची पुडी दिली. ही माहिती संबंधित महिलेने आपल्या सहकाऱ्यांना एसएमएसद्वारे कळवली. त्यांनी पोलिसांना कळवत या प्रकरणाचा भांडाफोड केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पतंग उडवताना पडून मुलाचा मृत्यू

$
0
0

नाशिक :

जेलरोड येथे पतंग उडवताना पडून एका मुलाचा मृत्यू झाला. राज राजेश्वरी परिसरातील मोरे मळ्यात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पतंग उडवत असताना हा मुलगा पडला.

सुफियान निजाम कुरेशी असे या मुलाचे नाव आहे. तो १६ वर्षांचा आहे. सुफियान हा पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडला. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तो पतंग उडवण्यासाठी गेला. पतंग उडवण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीएम’मधून दीड लाख लांबवले

$
0
0

जेलरोड :

तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर सांगा, असे फोन करून ओटीपी नंबर घेत अज्ञाताने एक लाख ४४ हजार ३८६ रुपये काढून घेतल्याची घटना जय भवानीरोड परिसरात घडली.

नाशिकरोडच्या जय भवानीरोड येथील कमला पार्कमध्ये राहणारे नंदू दत्तू भिसे यांना अज्ञात व्यक्तीने फोन केला. तुमचे एटीएम कार्ड बंद पडलेले असून आम्ही तुमच्या मोबाइलवर ओटीपी नंबर पाठवत आहोत तो आम्हाला द्या तुमचे, एटीएम कार्ड लगेच सुरू होईल, अशी बतावणी करत अज्ञाताने मोबाइलवरून ओटीपी नंबर घेतला. नंतर भिसे यांच्या खात्यावरील सुमारे दीड लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार भिसे यांना लक्षात आल्यावर त्यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये तत्काळ जाऊन याबाबत माहिती दिली. उपनगर पोलिस ठाण्यात सायबर गुन्ह्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो ओळ

$
0
0

आर्मी डे...

१५ डिसेंबर १९४८ रोजी भारतीय लष्कराला स्वातंत्र्य मिळाले होते. यानिमित्त नवी दिल्ली येथील कारिप्पा परेड ग्राउंडमध्ये आर्मी डे परेडमध्ये आर्मी डेअरडेव्हिल्स मोटारसायकलवर स्टंट सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरच्या नायगाव संघाने मारली बाजी

$
0
0

कै.विजय भोर चषकाचे ठरल मानकरी

म. टा. वृत्तसेवा,देवळाली कॅम्प

गणेश शिरसाठ, तुषार बोडके व अजय चव्हाण यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सिन्नरच्या नायगाव संघाने बलाढ्य अशा रिसेंट खतवड संघाचा ४ गडी राखून पराभव करीत २२ व्या कै. विजय भोर चषकावर नाव कोरले.

स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात मास्टर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. ८ षटकांच्या लढतीत रिसेंट संघाने ७४ धावांचे दिलेले आवाहन नायगाव संघाने २ चेंडू व ४ गडी राखून पार केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी हिंदी चित्रपट अभिनेत्री भूमिका चावला, महाराज बिरमानी, दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेता अनिकेत चव्हाण, नरेश दोशी, कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षा प्रभावती धिवरे, नगरसेविका आशा गोडसे, एडीसीसीचे विनोद शहा, समीर रकटे, अर्जुन टिळे, निवृत्ती जाधव, रोहीत कासार, दीपक बलकवडे, भाऊसाहेब धिवरे, सतीश मेवानी, गुंडाप्पा देवकर, सुनीता भोर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय दर्जाच्या खेळ व खेळाडू देवळाली घडावा, असे मत व्यक्त केले. सर्वच मान्यवरांच्या हस्ते विजयी नायगाव संघाला १ लाख रुपये व चषक प्रदान करण्यात आला. पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी

क्लबचे अध्यक्ष सुनील दिनकर, उपाध्यक्ष अनिल दिवाने, प्रसाद कळमकर, विलास जाधव, राजू जानी, संजय सुरसे, रितेश गायकवाड, प्रसाद कळमकर, संजय व्यास, दीपक झुटे आदींसह क्लबचे सदस्य प्रयत्नशील होते.

यांनाही पारितोषिके प्रदान

उपविजेता संघ : रिसेंट खतवड ५१ हजार व चषक

तृतीय संघ :- जयश्री रॉयल क्लब २१ हजार व चषक

चतुर्थ संघ - देवपूर संघ ११ हजार व चषक

मालिकावीर :- अक्षय चव्हाण (नायगाव)

सामनावीर :- तुषार बोडके (नायगाव)

क्रीडाप्रेमी जॉन बाबा पुरस्कार :- मधुकर गवळी

उत्कृष्ट गोलंदाज :- विकी म्हात्रे (खतवड)

उत्कृष्ट फलंदाज :- गणेश शिरसाठ (नायगाव)

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक :- सर्वेश सिंग (ऍरॉन बॉईज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेश घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांमधील गणवेश घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने दिल्यानंतर आयुक्तांनी या चौकशीसाठी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती नियुक्त केली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच विस्तार अधिकारी या घोटाळ्याची चौकशी करणार आहेत. महिनाभरात या घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे ठेकेदारांसह समर्थक नगरसेवकांचेही धाबे दणाणले आहे.

सरकारच्या समग्र शिक्षण योजनेंतर्गत महापालिकेच्या २३ हजार विद्यार्थ्यांना दिलेल्या गणवेश खरेदीत गैरप्रकार झाल्याची तक्रार आमदार सीमा हिरे यांनी राज्य सरकारकडे केली होती. २३ हजार ४८८ विद्यार्थ्यांना प्रति गणवेश ३०० रुपयाने गणवेश पुरवठा करण्यात आला होता. दोन गणवेशासाठी ६०० रुपये देण्यात आले होते. परंतु, शालेय व्यवस्थापन समिती मार्फत ही खरेदी होणार असतांनाही, तीन ठेकेदारांच कामे मिळाली आहेत. त्यामुळे या खरेदीसाठी दबाव आणला गेल्याच्या तक्रारी झाल्या होत्या.

त्यापार्श्वभूमीवर सरकारने या चौकशीचे आदेश होते. त्यानुसार प्रशासनाने या चौकशीसाठी प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती नियुक्त केली आहे.

पाच विस्तार अधिकाऱ्यांच्या मदतीने महिनाभरात ही चौकशी पूर्ण करायची आहे. शाळांमध्ये जाऊन विस्तार अधिकाऱ्यांमार्फत गणवेशाची गुणवत्ता तपासली जाणार असल्याने अधिकारी, ठेकेदार आणि काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images