Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पतंगबाजी बेतली जीवावर

$
0
0

नाशिकरोड : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पतंग उडविण्याच्या प्रयत्नात तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जेलरोड भागात घडली. मकरसंक्रांतीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली.

मंगळवारी (दि.१५) मकरसंक्रांतीनिमित्त जेलरोड भागातील राजराजेश्वरी रोडवरील मोरे मळ्यातील बालाजीनगर भागात राहणारा सुफियान निजाम कुरेशी (वय १६) हा प्रगतीनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पतंग उडवत होता. पतंग उडविताना तोल गेल्याने तो जमिनीवर पडला. या घटनेत सोफियानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास उपचारार्थ नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सोफियान त्याचा सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोगोई घेणार राहुल गांधीची भेट

$
0
0

गुवाहाटी : कृषक मुक्ती संग्राम समितीचे नेते अखिल गोगोई लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांची नागरिकत्वाच्या मुद्द्याबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेणार आहेत. 'आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांबाबतचे विधेयक अद्याप प्रलंबित आहे. ईशान्य भारतातील काँग्रेसच्या खासदारांनी नागरिकत्व विधेयकातील दुरुस्त्यांना विरोध केला आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेणार आहे,' असे गोगोई यांनी स्पष्ट केले आहे. विधेयकाला विरोध करणाऱ्या ७० संस्थांच्या प्रतिनिधींसह गोगोई यांनी सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचोरीचा उलगडा सहा महिन्यांनंतर!

$
0
0

दिंडोरीतील चोरट्यास पोलिसांची अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहा महिन्यांपूर्वी चोरीस गेलेली रिक्षा शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी रिक्षा हस्तगत केली असून संशयितांच्या चौकशीत अन्य गुन्हेही उघड होण्याची चिन्हे आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश वसंत बर्वे (३५ रा. वरवंडी राजवाडा, ता. दिंडोरी) असे संशयित रिक्षा चोरट्याचे नाव आहे. शहरात वाहनचोरीच्या घटना वाढल्याने युनिटचे पथक चोरट्यांच्या मागावर असतांना हवालदार विजय गवांदे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. दिंडोरी रोडवरील बसथांबा परिसरात चोरटा रिक्षा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिटचे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. ११) सापळा लावण्यात आला. रिक्षातून (एमएच १५ झेड ११३१) उतरताच पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी रिक्षा हस्तगत केली. संशयिताने सहा महिन्यापूर्वी जिल्हा रुग्णालय आवारातून रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे. संशयितास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयिताच्या अटकेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला एक गुन्हा उघडकीस आला आहे. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपास हवालदार गवांदे करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, उपनिरीक्षक बलराम पालकर, जमादार बाळासाहेब दोंदे आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगरला ‘हॅप्पी स्ट्रीट’ची ट्रीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनोरंजनाची सफर कॉलेजरोड, व्हिरिडियन व्हॅली आणि नाशिकरोडच्या रस्त्यावर घडविल्यानंतर आता 'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅप्पी स्ट्रीट' उपक्रम गोविंदनगरमध्ये धमाल करण्यासाठी येत आहे. रविवारी (दि. २०) सकाळी ७ वाजता ही धमाकेदार ट्रीट गोविंदनगरवासीयांना मिळणार आहे.

रोजची धावपळ, रस्त्यावर असणारी वर्दळ, कामाचे टेन्शन यांपासून सुटका करुन घेत, 'हॅप्पी स्ट्रीट'मध्ये नाशिककर निवांत होतात. या उपक्रमात धमाल, मस्ती करीत आठवडाभर उत्साही राहण्याची उमेद अनेकांना मिळते. कायम वाहनांचा गोंगाट असलेला रस्ता यानिमित्ताने आनंददायी होतो. या उपक्रमाला नाशिककरांचा कायम उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. एकाहून एक बहारदार कलाविष्कारांच्या सादरीकरणातून तसेच अनोख्या खेळांतून या उपक्रमाची आनंदपर्वणी अनुभवता येणार आहे. झुम्बावर थिरकण्यासह जुन्या गाड्या बघण्याची, सेल्फी अन् फोटोसेशन करण्याची, हटके गेम्स खेळण्यासह आकाश निरीक्षण, नेल आर्ट, क्विलिंग आर्ट, म्युझिक कॉन्सर्ट अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या धमाल, मस्तीच्या पर्वणीत कल्ला करताना, गोविंदनगरवासियांची सकाळ यादगार ठरणार आहे.

\Bकलाकारांना नाव नोंदविण्याची संधी \B

आपली कला या उपक्रमात सादर करण्यासाठी नावनोंदणी करायची आहे. यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या ०२५३ ६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाखरांवरच संक्रांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक\B

\Bशहरात मकरसंक्रांतीनिमित्त पंतगोत्सवाला उधाण आले असतानाच पक्ष्यांवर मात्र संक्रांत आल्याचे पहायला मिळाले. शहराच्या विविध भागात १० ते १२ पक्षी जखमी झाल्याचे दिसून आले. पक्षीप्रेमींनी पुढाकार घेत पक्ष्यांवर उपचार केले.

पतंगांच्या मांजामुळे पक्ष्यांवर ओढावणारी संक्रांत टळली नसल्याचे मंगळवारी दिसून आले. नायलॉन मांजा विक्रीस बंदी असूनही छुप्या पद्धतीने हा मांजा विकला गेला. पतंगोत्सवात नायलॉनसह इतर घातक मांज्याचा वापर झाल्याने, संक्रांतीच्या दिवशी यंदाही पक्षी जखमी झाल्याचे समजले. दुपारी १ वाजता पेठेनगर येथील पुष्पवर्षा इमारतीच्या गच्चीवर 'होला' हा पक्षी मांजात अडकला. हा पक्षी कबुतर पक्षाची प्रजाती असून, पायात नायलॉन मांजा अडकल्याने त्याचे पाय व पंख जखमी झाले. ही माहिती स्थानिकांनी पक्षीमित्र वैभव भोगले यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी जात भोगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी होलावर प्रथमोपचार केले. तसेच पाथर्डी फाटा येथील रायबा हॉटेलजवळ देखील मांजा अडकल्याने कबुतराचे पंख कापले गेले. पक्षीमित्रांनी दिवसभरात जखमी झालेल्या १० ते १२ पक्ष्यांवर उपचार केले. सायंकाळी उशिरापर्यंत पक्षी जखमी झाल्याचे फोन पक्षी मित्रांना येत होते. शहरात अनेक ठिकाणी पक्षी ‌जखमी असून, त्याची माहिती पक्षीमित्रांपर्यंत पोहचू शकलेली नाही. \B

\B

\Bदोन कबुतरांचे पंख कापले

\Bगंगापूर रोडवरील केबीटी चौकाजवळील थत्तेनगर येथील अष्टविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मांजामुळे कबुतराचा एक पंख कापला गेला. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. परिसरातील व्यावसायिकाने या घटनेची माहिती पक्षीमित्र राहुल कुलकर्णी यांना दिली. राहुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी कबुतराचा शोध घेतला. कबुतरावर प्रथमोपचार केल्यानंतर सोडून देण्यात आले. सायंकाळी ६ वाजता खुटवटनगर येथील सीटू भवनाजवळील इमारतीच्या गच्चीवर मांजा अडकून कबुतराचे पंख कापले गेले. सायंकाळी उशिराने त्यावर उपचार करण्यात आले.

\Bते 'कबुतर' सुखरुप\B

शरणपूर रोडजवळील कुलकर्णी गार्डन येथे वीजेच्या तारांना लटकलेल्या मांजामुळे कबूतराची मान कापली गेली. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मि‌ळाल्यानंतर पक्षीमित्र जयेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कबूतरावर प्रथमोपचार केले. त्यामुळे कबूतराचा जीव वाचला.

\B'पक्षी वाचवा'चे आवाहन\B

'नाशिककर मकरसंक्रांतीच्या दिवशी व त्यापुढील काही दिवस एक महत्त्वाचे काम करा. तुम्हाला पक्षी मित्रांचे संपर्क क्रमांक पाठविले आहेत. जर तुमच्या परिसरात मांजामध्ये अडकलेला पक्षी आढळला. तर लगेचच पक्षी मित्रांना संपर्क साधा', असा मेसेज सोशल मीडियावर मंगळवारी व्हायरल झाला. या मेसेजद्वारे 'पक्षी वाचवा, नायलॉन मांजाचा वापर टाळा', असे आवाहन करण्यात आले. या मेसेजमध्ये देण्यात आलेल्या संपर्क क्रमांकाद्वारे अनेक नागरिकांनी पक्षी मित्रांना संपर्क साधला.

थत्तेनगर येथे झाडाला लटकलेल्या मांज्यामुळे कबुतरांचे पंख कापले गेले. कबुतर झाडाला लटकल्याचे दिसल्यावर पक्षीमित्रांना कळविले. नागरिकांनी नायलॉनचा वापर पूर्णत: बंद करायला हवा.

- सुहास गोरे, व्यावसायिक, थत्तेनगर

नायलॉन मांजाला बंदी असल्याने यंदा पक्ष्यांना दुखापत होणार नाही असे वाटले. शाळा कॉलेजांमध्ये नायलॉनच्या वापराबाबत प्रबोधन होऊनही नागरिकांनी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा खरेदी केला. त्यामुळे अनेक पक्षी जखमी झाले.

- वैभव भोगले, पक्षी मित्र

नायलॉनसह इतर मांजामुळे पक्ष्यांना इजा झाल्याचे दिसले. दिवसभरात शहरातील विविध भागात १० पेक्षा अधिक पक्षी जखमी झाल्याचे समजले. जखमी पक्ष्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

- राहुल कुलकर्णी, पक्षी मित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजे, मिरवणूक अन् फेटा प्रथेला फाटा

$
0
0

\Bतळवाडेत \Bगावविकास सभेत एकमताने ठराव मंजूर

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामस्थांनी लग्नसमारंभ, विविध उत्सव यामध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. तळवाडे गावात आता नवरदेवाची मिरवणूक निघणार नाही की, डीजेसारखे जास्त आवाजाचे वाद्यही वाजणार नाही. विवाहासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींना फेटे बांधले जाणार नाहीत. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वरातीसह हळदीला जाताना नवरदेवाची मिरवणूकही निघणार नाही, असा अभूतपूर्व निर्णय ग्रामस्थांनी मंगळवारी गावविकास बैठकीत घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

मंगळवारी ग्रामस्थांची 'गावविकास' सभा झाली. कोणत्याही धार्मिक कार्यात शाल, टोपी घेण्यादेण्यास बंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. तसे न केल्यास २१ हजार रुपये दंडदेखील ठोठावण्यात येणार आहे. सरपंच ज्ञानेश्वर भिवसेन, उपसरपंच संतोष बोडके, चेअरमन मोहन बोडके, माजी सरपंच रोहीदास बोडके, बाळू बोडके, समाधान आहेर, महीपत बोडके, शिवाजी कसबे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात विवाह सोहळ्यात होणाऱ्या अनावश्यक खर्चात काटकसर आणि काही खर्चावर बंदीच आणण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व ठरावांना बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यासह दिवट्या, वास्तूशांती, दशक्रिया या सारख्या धार्मिक कार्यात टॉवेल-टोपी देणेही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गावविकासासाठी चालना मिळून गाव प्रगती करेल, असा आशावाद उपसरपंच संतोष बोडके यांनी व्यक्त केला. हळदीसह, लग्नातील हळदीच्या अनावश्यक खर्चावरून हळदी व लग्न समारंभातील अनावश्यक खर्च टाळून पारंपरिक पद्धतीनेच समारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विवाह सोहळ्यातील फेट्यासही बंदी घालण्यात आली.

गावात विविध ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळ उत्सव साजरा करतात. तसाच प्रकार नवरात्रोत्सवाही होतो. यावर उपाय म्हणून तळवाडे येथे 'एक गाव एकच उत्सव' साजरा करण्यात येणार आहे. गावात फक्त यापुढे गणपती, नवरात्री, छपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडर जयंतीलाच मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

--संतोष बोडके, उपसरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिमेन्शियाग्रस्तांचीसेवा हे उदात्त कार्य

$
0
0

डॉ. धनंजय चव्हाण यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगभरात हृदयविकार व कॅन्सरवर जेवढा खर्च होतो, त्यापेक्षा जास्त खर्च डिमेन्शियावर होतो; पण अनेक गैरसमजांमुळे या आजाराला लपवून ठेवण्यात येते. यामुळे डिमेन्शियाच्या रुग्णांची सेवा करण्याइतके अवघड, अनपेक्षित, न योजलेले व समाजाकडून दुर्लक्षित काम क्वचितच दुसरे असेल. म्हणूनच हे एक उदात्त आणि थोर कार्य आहे, असे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.

कुसुमाग्रज स्मारकात डिमेन्शियाच्या रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित मार्गदर्शनपर भाषणात डॉ. चव्हाण बोलत होते. सत्राच्या सुरुवातीला डॉ. चव्हाण यांनी या गंभीर आजाराची व्याप्ती सांगितली. ते म्हणाले, की भारतातील वाढत्या आयुर्मानाबरोबर डिमेन्शियाचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्याची पुरेशी माहिती नसल्याने डिमेन्शियाच्या रुग्णांची, त्यांच्या परिवाराची आणि पर्यायाने समाजाची मोठी मानसिक व आर्थिक हानी होते. भारतात डिमेन्शियाबद्दल इतके अज्ञान आहे, की अगदी सुशिक्षित परिवारातसुद्धा योग्य वेळी डॉक्टरचा सल्ला घेतला जात नाही.

या आजाराविषयी सांगताना डॉ. चव्हाण म्हणाले, की डिमेन्शिया हा पूर्ण बरा न होणारा आजार असला तरी सुरुवातीच्या स्टेजमध्ये औषधोपचाराने काही अंशी त्याला ब्रेक देता येतो. रुग्णाचा व कुटुंबीयांवरील ताण कमी करता येतो. त्यांना पुढील नियोजन करायला बहुमोल वेळ मिळतो. त्यामुळे त्याचे वेळेवर निदान आणि योग्य औषधोपचार गरजेचा असतो. डिमेन्शिया मानसिक नाही तर मेंदूचा आजार आहे. या आजारात अनेक मानसिक व वर्तणुकीच्या समस्या निर्माण होतात म्हणून सायकियाट्रिस्ट या आजारावर उपचार करतात. यात मानसिक क्षमतांमध्ये उत्तरोत्तर अधिकाधिक ऱ्हास होत जातो आणि त्याचा व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम होतो.

डॉ. चव्हाण यांनी सांगितले, की डिमेन्शियाचे रुग्ण अनेकदा त्यांच्याच सेवेला विरोध करतात, अडथळा आणतात. त्यामुळे त्यांना मदत करणे अधिक अवघड होते. त्यावर मात करायला संयम लागतोच, पण काल्पनिकताही लागते. पुढे त्यांनी सांगितले, की पुरेसा वेळ दिला तर अनेक कुटुंबीयांना छोट्या-मोठ्या बाबींमध्ये जवळीकतेचे, स्नेहाचे, आनंदाचे, समाधानाचे अनेक क्षण मिळतात. सहाय्यकांनी आपल्या अपेक्षा आजाराच्या स्थितीनुसार बदलल्या म्हणजे अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाहीत तर त्यांच्यावरचा मानसिक ताण कमी होतो. एकीकडे अवास्तव अपेक्षा नको; पण दुसरीकडे आपण पूर्ण निरुपाय वा असहाय आहोत, असे टोकाचे नैराश्यही नको.

या वेळी डॉ. चव्हाण यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. वृद्धावस्थेत डिमेन्शिया होऊ नये म्हणून उच्च रक्तदाब, डायाबिटिसचे योग्य उपचार, तसेच मानसिक, शारीरिक व सामाजिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैली यांचे महत्त्व सांगितले. पुण्याच्या डिग्निटी होम फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम झाला. गिरीश पगारे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिफेन्स हबची घोषणा उद्या?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील दुसऱ्या डिफेन्स हबची घोषणा गुरुवारी (ता. १७) होण्याची चिन्हे आहेत. ओझर येथे संरक्षण उद्योगाशी निगडित भव्य सेमिनार होणार असून, त्याला संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारतीय संरक्षण दलातील संरक्षणनिर्मिती विभाग आणि संरक्षण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी संरक्षण क्षेत्रातील सहभागधारकांचा महत्त्वपूर्ण सेमिनार होणार आहे. यात संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशनतर्फे या क्षेत्रातील भागधारकांचा हा सेमिनार असेस. ओझर टाऊनशिपमध्ये होणाऱ्या या सेमिनारच्या माध्यमातून भारतीय संरक्षण, तसेच हवाई वाहतूक क्षेत्रात असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या निमित्ताने संरक्षण क्षेत्रातील संधी, त्यासाठी असलेल्या प्रक्रिया, सुटे भाग आणि साधनांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मिलिटरी हार्डवेअर सिस्टीम, तसेच सद्य:स्थितीत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची, तसेच डीआरडीओ यांच्या संदर्भातील एक प्रदर्शनदेखील या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. डॉ. भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षणनिर्मिती विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार आणि आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधील उच्चपदस्थ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. देशांतर्गत उत्पादनाच्या प्रक्रियेमुळे संरक्षण क्षेत्रात व्यवसाय संधींबाबत सेमिनारमध्ये सहभागी उद्योजकांना माहिती मिळणार असून, व्यवसायवाढीसाठी अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण आदींनी केले आहे. सेमिनारला प्रवेश विनामूल्य असला तरी पूर्वनोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी निमा कार्यालयास प्रत्यक्ष किंवा २३५०२७७, ७७७००२५५७२ किंवा nimanashik@gmail.com या ई- मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन निमा औद्योगिक धोरण व विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार व मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मांसविक्रीसाठी परवाना आवश्यक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका कार्यक्षेत्रात उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीला प्रतिबंध बसावा म्हणून, त्यासाठी परवाना निश्चितीचे धोरण पालिकेने स्वीकारले आहे. शहरातील मांसविक्रेत्यांची नोंदणी सक्तीची करण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला असून, त्यांना परवाना घ्यावा लागणार आहे.

महापालिकेकडून सध्या स्वच्छ सर्वेक्षणाची तयारी सुरू असून, शहराच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर उघड्यावर मांस विक्री होत असल्याने दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे शहराच्या सौंदर्यालाही बाधा निर्माण होते. शहरात जागा मिळेल तेथे कुठेही मांसविक्री होत असून, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मांसविक्री केल्यानंतर घाण तेथेच टाकली जाते. यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढतो. त्यामुळे महापालिकेने आता शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांना परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते या ठिकाणी उघड्यावरच मांस विक्री होते. चिकन, मटन, मासे या दुकानांमुळे अस्वच्छतेत वाढ होते. मांसविक्रेत्यांना परवान्याबाबतचा एक प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित असला तरी, पालिकेने स्वत:च नोंदणी व परवाने देण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पालिका अधिनियम कलम ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१ (अ) ३८२, ४६८ या कायदेशीर तरतुदीस अधीन राहून मांस, चिकन, मासळी विक्री करणाऱ्या व्यक्ती वा दुकानास परवाना दिला जाणार आहे.

प्रकार शुल्क

मांस व चिकन एकत्रित विक्री परवाना - ५०००

मासळी विक्री व्यवसाय परवाना - २५००

मांस विक्रीसाठी व्यक्ती परवाना - ५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलात भरणारी अंगणवाडी सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

चुंचाळे शिवारात बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेत भाडेकरू असल्याच्या तक्रारी वाढल्याने मंगळवारी दुसऱ्या दिवशीही महापालिकेची सदनिका जप्त करण्याची मोहीम सुरू होती. यावेळी एका सदनिकेत अंगणवाडी सुरू असल्याचे लक्षात आल्याने ती सील करण्यात आली.

महापालिकेतर्फे चुंचाळे शिवारातील या घरकुल योजनेची तपासणी सुरू झाली असून, त्यात येथे अनेकजण घरकुलात भाडेतत्त्वावर राहत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. सोमवारी एक सदनिका सील केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही गीताबाई आश्रुबा लहाने यांच्या नावे असलेल्या सीएच /ए /१ मधील फ्लॅट नंबर १०४ मध्ये सुरू असलेली अंगणवाडी सील करण्यात आली आहे. नागरिकांनी ज्यांच्या नावावर या सदनिका असतील, त्यांनीच तेथे राहणे बंधनकारक असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे. यापुढेसुद्धा ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चुंचाळे शिवारात या घरकुल योजनेअंतर्गत सुमारे ४० इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यातील काही सदनिका धारकांना देण्यात आल्या आहेत, तर काही बंद अवस्थेत आहेत. ज्यांच्या नावाने सदनिका आहे, त्यांनीच येथे राहावे असा सरकारचा नियम आहे. परंतु, हा नियम धुडकावला जात आहे, म्हणून ही कारवाई सुरू झाली आहे. दरम्यान, मोहीम सुरू असताना बरेच सदनिकाधारक कारवाईच्या भीतीने आपल्या फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरखाली सापडल्याने क्लिनरचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दुधाच्या टँकरची हवा तपासात असताना वाहनचालकाकडून अचानक पडलेल्या रिव्हर्स गिअरमुळे क्लिनर चाकाखाली चिरडला. मुंबई-आग्रा महामार्गावर जत्रा हॉटेलच्या समोरही ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडली. विष्णू बालाजी पोटावळे (वय २२) असे या क्लिनरचे नाव आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुपारी दीडच्या सुमारास जत्रा हॉटेलच्यासमोर दुधाने भरलेला मालवाहतूक टँकर (एमजीएफ ०२७७) इंदूरकडून मुंबईला जात होता. जत्रा हॉटेल येथे पोचल्यावर वाहनचालक मधुकर महादेव महानवर याने क्लिनर विष्णू यास हवा चेक करण्यास सांगितले. तो हवा चेक करीत असताना चालक मधुकर महानवर याच्याकडून अचानकपणे टँकर सुरू होऊन रिव्हर्स गिअर पडला. टँकरचे चाक मानेवरून गेल्याने विष्णूचा जागीच ठार झाला.

चालक मधुकर महानवर व विष्णू पोटावळे हे दोघे मामा-भाचे असून ते तळेगाव (जि. लातूर) येथील रहिवाशी आहेत. मामाकडूनच भाच्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती कळविताच आडगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

कारच्या धडकेत सिडको मुलगी ठार

सिडको : संजीवनगर भागात घरासमोर खेळत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर कारचालक रूपेश फरार असून त्याचा साथीदार प्रितम कांबळे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अंजली गौड (१२) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. घरासमोर खेळत असताना अचानकपणे भरधाव वेगाने आलेल्या लान्सर कारने (एमएच ०२ केए १३५०) अंजलीला जोरदार धडक दिली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ऐन संक्रांतीच्या दिवशी सकाळीच ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्री गार्ड खरेदीची होणार चौकशी

$
0
0

मनमाड : मनमाड पालिकेने खरेदी केलेल्या सहाशे ट्री गार्ड मधील कथित भ्रष्टाचार संदर्भात प्रशासनाने चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. ही समिती महिनाभरात अहवाल देणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी सांगितले. सोमवारी मनमाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक कैलास पाटील,अमजद पठाण यांनी टेबल लाथाडून, खुर्च्या फेकून राडा घातला होता. ट्री गार्ड खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. त्यामुळे समिती नेमण्यात आली असून, श्यामकांत जाधव, कर अधिकारी अशोक पाईक, कार्यालयीन पर्यवेक्षक राजेंद्र पाटील यांचा या समितीत समावेश आहे. पालिकेने ६०० ट्री गार्ड खरेदी केले आहेत. ट्री गार्डच्या वजनाबाबत व तांत्रिक बाबींबद्दल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आक्षेप घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीच्या तक्रारी वाढता वाढता वाढे...

$
0
0

पावणे दोन वर्षात अडीच हजार तक्रारी

...

- आतापर्यंत ३ कोटी १५ लाखांचा दंड

- नागरिकांच्या २४१३ तक्रारी प्राप्त

- सर्वाधिक तक्रारी व दंड या सिडको, पंचवटी विभागात

- माहिती अधिकारातून मिळाली माहिती

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर स्वच्छतेचा कणा असलेल्या महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी घंटागाडी योजनेला ऑनलाइन ट्रॅकिंगची जोड देऊनही नागरिकांच्या घंटागाडीबाबतच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत. जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान तब्बल दोन हजार ४१३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रभागाऐवजी विभागनिहाय घंटागाडीचा ठेका देऊनही तक्रारी कमी होत नसल्याने प्रशासनानेही हात टेकले आहेत. दरम्यान, घंटागाडीच्या अनियमिततेप्रकरणी पावणेदोन वर्षांत तब्बल तीन कोटी १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शहरातील घंटागाड्यांच्या अनियमिततेचा प्रश्न हा प्रभाग, स्थायी आणि महासभेत नेहमीच गाजत असतो. महापालिकेच्या या आदर्श घंटागाडी प्रकल्पाबाबतच्या तक्रारीबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील ओसवाल यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्यात प्रशासनाने उत्तर दिले असून, त्यात दंडात्मक आकारणीचीही माहिती दिली आहे.

महापालिकेने गेल्या वर्षी जानेवारीत घंटागाडी प्रकल्पाला ऑनलाइनची जोड दिली होती. प्रभागात घंटागाडी फिरताना तिचे ऑनलाइन ट्रॅकिंगसाठी जीपीएस यंत्रणाही बसविण्यात आली. परंतु, या घंटागाडीबाबत नागरिकांच्या तक्रारी या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे मिळालेल्या माहितीवरून समोर येत आहे.

जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत घंटागाडीसंदर्भात २४१३ तक्रारी प्राप्त झाल्याचे लेखी उत्तर देण्यात आले. नागरिकांच्या एवढ्या तक्रारी पाहता नागरिक या योजनेबाबत समाधानी नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ठेकेदारांना मोठ्या प्रमाणावर दंडही ठोठावण्यात आला आहे.

- सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नात्यांमध्ये रंगणार हसवाफसवीचा खेळ!

$
0
0

करिदिनानिमित्त आज उडणार धम्माल

रामनाथ माळोदे, पंचवटी

तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला, असे म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत स्नेहाचा गोडवा वाढविण्याची मकरसंक्रांतीला प्रथा आहे. संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी झोपून उठविताना हाक मारली जाते, समोरच्या व्यक्तीने काय? असे विचारले की त्याला 'अर्धी भाकरी घे अन् गाढवं वळायला जा' असे बोलून त्याची गंमत केली जाते. खेड्यापाड्यात आजही अशी गंमत केली जाते. मेहुणा-मेहुणी, दीर-भावजय,मेहुणे-मेहुणे अशा चेष्टमस्करीच्या नात्यांमध्ये या दिवशी धम्माल उडविली जाते. अशाच गमती बुधवारी (दि. १६) सकाळीही होणार आहेत.

एप्रिलच्या पहिल्या दिवशी एप्रिल फूल करून फसवा-फसवीचे प्रकार केले जातात. त्याही अगोदरपासून कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात विशेषतः खेडोपाडी करिदिनाच्या दिवशी सकाळी-सकाळी गाढव वळायला जा असे सांगण्याची जुनी प्रथा सुरू असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. रोजच्या रुक्ष जगण्यातून काही वेगळे करण्याचे आणि त्यातून प्रेरणा घेऊन नव्या उत्साहाने काम करण्यासाठी सण आणि उत्सव साजरे केले जातात. बदलणारे ऋतू आणि मराठी सण यांची सांगड अत्यंत योग्यरितीने घालण्यात आलेली आहे. आज कितीही आधुनिकीकरण झाले असले तरी सणाच्या दिवशी ठरल्याप्रमाणेच त्या-त्या गोष्टी केल्या जातात.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा आणि तीळगुळाचे फोटो यांचे मेसेज फिरू लागले आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात भेटून तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिळगुळाचा गोडवा एकमेकांना दिल्यानंतर दुसरा दिवस हा किंक्रातीचा असतो. त्याला करिदिन म्हटले जाते. या दिवशी कुणाशी भांडायच नाही. नाहीतर वर्षभर कर-कर लागते आणि वर्षभर कटकटी मागे लागतात, असा समज जुन्या जाणत्या लोकांनी रुढ केलेला आहे. त्यामुळे या दिवशी कोणते शुभकार्य करण्याचे टाळले जाते.

मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी एकमेकांना उठविताना समोरून प्रतिसाद मिळताच त्याला 'अर्धी भाकरी घे अन् गाढवं वळायला जा' असे म्हणत फसविणे आणि त्यानंतर मनमुराद हसण्याची धम्माल लहानपणे करायचो. ही प्रथा कधी सुरू झाली हे काही सांगता येणार नाही.

- कृष्णकुमार नेरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षयपात्रचा प्रस्ताव महासभेवर

$
0
0

२८ हजार विद्यार्थ्यांना सकस व दर्जेदार आहार मिळणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या ९४ शाळांमधील २८ हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळावा, यासाठी आता राज्य सरकारच्या सूचनेनुसार 'इस्कॉन मंदिर' संचलित अक्षपात्र फाउंडेशनच्या मदतीने अक्षयपात्र योजना राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने महासभेवर ठेवला आहे. शिक्षण समितीने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता महासभेवर हा प्रस्ताव सादर झाला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर त्याची लागलीच अंमलबजावणी केली जाणार असल्याने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सकस आणि दर्जेदार आहार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बचतगटाकडून सध्या आहार दिला जातो; परंतु या आहाराबाबत पालकांसह विद्यार्थ्यांच्याही तक्रारी असतात. त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत अक्षयपात्र योजनेवर चर्चा झाली होती. सेंट्रल किचनच्या माध्यमातून शाळांना सकस आहार देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी मांडला. राज्य सरकारनेही याबाबत सूचना केल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले होते. इस्कॉन मंदिर संचलित अक्षयपात्र फाउंडेशनच्या वतीने महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस व दर्जेदार पोषण आहार देण्याचा प्रस्ताव आल्याचे सांगत देवरेंनी त्याला मंजुरी देण्याची मागणी केली होती. या योजनेत सध्याच्या बचत गटांनाही सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षण समितीने त्याला मंजुरी दिली होती. आता शिक्षण समितीच्या मंजुरीनंतर शिक्षण विभागाने महासभेवर प्रस्ताव दाखल केला आहे. महापालिकेच्या ९४ शाळांमधील २७ हजार ५८७ विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाक प्रणालीअंतर्गत भोजनपुरवठा करण्याचा प्रस्ताव महासभेवर आला आहे. बचतगटातील महिलांना या योजनेत समाविष्ट केले जाणार असल्याने १९ तारखेच्या महासभेत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

१२ राज्यांत विस्तार

या संस्थेकडून देशातील १२ राज्यांमधील १४०० शाळांमध्ये अक्षयपात्र योजना राबविली जाते. जवळपास १७ लाख विद्यार्थ्यांना सकस आहाराचा पुरवठा केला जातो, तर महाराष्ट्रात ठाणे महापालिकेतील २३ हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. या संस्थेच्या माध्यमातून चविष्ट सकस आणि गरम भोजन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. शासकीय अनुदानापेक्षा जास्त रक्कम खर्च करून संस्था पोषण आहार पुरवणार आहे. त्या माध्यमातून शुद्ध तुपातील चांगले सकस आणि चविष्ट पदार्थ महापालिका शाळांमधील गोरगरीब मुलांना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेनऊ कोटी गेले कुठे?

$
0
0

कालिदास कलामंदिरासाठी ६६ लाखांचे आऊटसोर्सिंग; दोन जणांचीही नियुक्ती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल साडेनऊ कोंटीचा खर्च करूनही महाकवी कालिदास कलामंदिरातील त्रुटी दूर न झाल्याने अखेरीस महापालिकेने पुन्हा ६६ लाखांची उधळण करण्यास सुरुवात केली आहे. कालिदासमधील तांत्रिक बाबींचे नियोजन पुन्हा ठेकेदाराकडे सोपविण्याची तयारी केली असून वातानुकूलित यंत्रणा, प्रकाश योजना ध्वनी योजनेच्या संचालनासाठी आता ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे. या ठेकेदाराला आगामी दोन वर्षांसाठी ६६ लाख रुपये अदा केले जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे कोट्यवधी रुपये गेले कुठे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून महाकवी कालिदास कलामंदिराकडे बघितले जाते. परंतु, या कलामंदिराच्या दुरवस्थेबाबत तीन वर्षांपूर्वी अभिनेता प्रशांत दामले, मोहन जोशींसह अनेक कलावंतानी टिकेची झोड उडवली होती. प्रशांत दामले यांनी तर सोशल मीडियावर फोटा शेअर करीत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. त्यामुळे मनसेच्या सत्ता काळातच या कलामंदिराचा मेकओव्हर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनसेच्या सत्ताकाळातच यासाठी नऊ कोटीची तरतूदही केली होती. मात्र, पालिकेतून मनसेची सत्ता जाताच, भाजपच्या सत्ताकाळात स्मार्ट सिटी अंतर्गत या कलांमदिराचा पुनर्निमाणाचा निर्णय घेण्यात आला होता. स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल साडे नऊ कोटींची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली होती. त्यामुळे गेले वर्षभर हा प्रकल्प बंद करण्यात आला होती. परंतु, मेकओव्हर होऊनही कालिदासमधील त्रुटी संपत नसल्याचे समोर आले आहे.

आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही त्रुटी असल्याचे कलावंताचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात हॅम्लेट नाटकादरम्यान तब्बल आठ ते दहा वेळा वीज गायब झाली. तर कलावंताना अंधारात जेवण करावे लागत असल्याची तक्रार आहे. प्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन यांनी याबाबतचे ट्विटही केले होते. तसेच महापालिकेच्या कारभारावर टीकाही केली आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने याची दखल घेत, पुन्हा यंत्रणा चालविण्यासाठी खासगी ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला दोन वर्षांसाठी ६६ लाख रुपये दिले जाणार आहे.

पुन्हा खर्च का?

वातानुकूलित यंत्रणेच्या संचलनासाठी २३ लाख ६२ हजार रुपये, प्रकाश योजनेसाठी १८ लाख ६० हजार रुपये तर ध्वनी योजनेसाठी १७ लाख ५० हजार रुपये ठेकेदाराला दिले जाणार आहे. परंतु, स्मार्ट सिटी अंतर्गत साडेनऊ कोटी खर्च करूनही पुन्हा ६६ लाखांचा खर्च का, असा सवाल आता केला जात आहे.

दोघांची नियुक्ती

महापालिकेवर झालेल्या टिकेनंतर प्रशासनाने तडकाफडकी दोन जणांची कालिदास कलामंदिरात नियुक्ती केली आहे. विद्युत विभागातील शाखा अभियंता संतोष बेलगावकर यांच्याकडे कालिदास कलामंदिरातील वीजविषयक तांत्रिक बाबींचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर पंचवटी विभागातील वीजतंत्री डी. एस. करके यांची कालिदास कलामंदिरात बदली करण्यात आली आहे. नवीन ठेकेदार नियुक्तीपर्यंत या दोघांवर तांत्रिक बाबींचा प्रभार सोपविण्यात आला आहे. तक्रारी कमी करण्यासाठी महापालिकेने या उपयोजना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश पाठक यांचे शनिवारी व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वामी विवेकानंदांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या नाशिक शाखेतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक यांच्या व्याख्यानाचे शनिवारी (दि. १९) आयोजन करण्यात आले आहे. नाशिक-पुणे रस्त्यावरील अंबासोसायटी, समाजमंदिर, नाशिकरोड येथे सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे. 'विवेकानंदांचे विचारपुष्प : कौटुंबिक, मानसिक, अध्यात्मिक आणि सामाजिक प्रगतीसाठी' या विषयावर यावेळी पाठक मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने यतीन मुजूमदार, अमोल अहिरे, राजेंद्र पवार, शिरीष समर्थ आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या मनीषा, निशाचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तराखंड मधील रुद्रपूर येथे झालेल्या २९ व्या राष्ट्रीय किशोर खो-खो स्पर्धेत ओडिशाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. या संघात नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेतील मनीषा पडेर व खिर्डी सुरगाणा आश्रमशाळेतील निशा वैजल यांनी महाराष्ट्र संघाला विजेतेपदाचा बहुमान मिळवून दिला. या दोन्ही खेळाडूंचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सत्कार करण्यात आला.

निशा वैजल ही या वर्षात दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे. २१ तारखेपासून परभणी येथे होणाऱ्या सराव शिबिरात ती सहभागी होणार असून, २८ ते ३१ जानेवारी दरम्यान कर्नाटक येथील मंड्या येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. या दोन्ही खेळाडूंचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षी याच स्पर्धांमधून नाशिक मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाला पराभवाचा धक्का बसला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या पराभवाची परतफेड काढल्यामुळे या आदिवासी लेकींच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सत्काराच्यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी नरेश गीते म्हणाले की, नाशिक जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत नाशिक मधील शासकीय कन्या शाळेतील विद्यार्थिनीं बाजी मारली आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब असून खेळाडूंना प्रोस्ताहित करणारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्योतिकलश’ प्रकरणी दोन दिवसांत तोडगा काढू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्योतिकलश सभागृह महापालिकेने सील केल्यामुळे शहरात होणारी चर्चा आपल्यालाही योग्य वाटत नसल्याचे सांगत या प्रकरणी दोन दिवसांत तोडगा काढू, असे आश्वासन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आमदार हेमंत टकले यांना दिले. ज्योतिकलश प्रकरणी मंगळवारी टकले यांनी गमे यांची भेट घेतली असता, गमे यांनी वरील आश्वासन दिले.

लोकहितवादी मंडळाचे राका कॉलनी येथील ज्योतिकलश सभागृह कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेने सील केल्याप्रकरणी लोकहितवादी मंडळाचे माजी अध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. आयुक्त गमे यांची त्यांनी मंगळवारी भेट घेतली. हे सभागृह, लोकहितवादी मंडळाची पार्श्वभूमीदेखील टकले यांनी गमे यांना सांगितली. तात्यासाहेब शिरवाडकर यांनी या मंडळाची स्थापना केली असून, ज्योतिकलश उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते महापालिकेने अशा तऱ्हेने बंद करायला नको होते, असे सांगतानाच लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा, असे टकले यांनी सांगितले. गार्डनमध्ये झोपडपट्टीतील लोक गोंधळ घालत असतील तर लोकहितवादी, महापालिका व स्थानिक नागरिकांनी मिळून या प्रकरणी काही तरी तोडगा काढायला हवा, असे सांगितले. स्थानिकांनादेखील त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचे म्हणणे ऐकून यातून सुवर्णमध्य काढावा असे पुढे त्यांनी सांगितले. याबाबत आयुक्तांनी सर्व म्हणणे ऐकून घेत अतिरिक्त आयुक्त, तसेच इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोनच दिवसांत या प्रश्नी तोडगा काढू, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमने सामने : प्रशांत भरवीरकर

$
0
0

आमने सामने : प्रशांत भरवीरकर

---

लोकहितवादी मंडळाचे, राका कॉलनीतील 'ज्योतीकलश' सभागृह महापालिकेने सील केले असून, स्थानिकांच्या तक्रारीमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी कॉलनीतील प्रतिनिधी समितीवर यावा, अशी साद घातली असून लोकहितवादीने आमच्यावर खोटे आरोप केले आहेत असे स्थानिक रहिवासी सुरेश दाते यांचे म्हणणे आहे.

---

कॉलनीतील प्रतिनिधी समितीवर यावा

राका कॉलनीतील रहिवासी अनेकदा आमच्याशी व्यक्तिगत संवाद साधतात. त्यावेळी मी राका कॉलनीमध्ये पोहोचतो आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करतो. अनेकदा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आम्ही कारवाई केली असून, सरकार वाडा पोलिस स्टेशनला तशी तक्रारही देण्यात आली आहे. दारू, गांजा पीत असणाऱ्यांची तक्रार आम्ही अनेकवेळा केलेली आहे. राका कॉलनीतील रहिवाशांचे जे म्हणणे आहे, ते त्यांनी आमच्यासमोर येऊन मांडावे.

या कॉलनीतील लोकांना, स्वाध्यायासाठी आम्ही आठवड्यातून तीन दिवस ज्योतीकलश सभागृह उपलब्ध करून देतो. तसेच कायमस्वरूपी योगा क्लास येथे चालतात. रोज गार्डनमध्ये सगळे जमतात. त्यापेक्षा मला असे वाटते की, कार्यकारिणीवर एक त्यांचा माणूस असावा. यातून आमच्या समस्या त्यांना कळतील, तशी मी त्यांना साद घालतो आहे. लोकहितवादी मंडळाच्या ज्योतिकलश सभागृहामध्ये सातत्याने नाटकाच्या प्रॅक्टिस चालतात. नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्यांसाठी तसेच एकपात्री प्रयोग करणाऱ्यांसाठी फ्रीमध्ये हे सभागृह दिले जाते. तात्यासाहेबांच्या नावाने एक काव्य स्पर्धा येथे घेतली जाते. उर्दू हायस्कूलची मुले त्यात कविता म्हणतात. नव्या पिढीला, कॉन्व्हेंटला तात्यासाहेब कोण होते हे त्यातून माहीत होते. त्यामुळे लोकहितवादी हे चांगले कार्य करत आहे, असे मला वाटते. तात्यासाहेबांनी लोकहितवादी मंडळाची मुहूर्तमेढ रोवली, ज्योतिकलश सभागृह लोकसहभागातून उभे केले. ब. चिं. सहस्रबुद्धे यांनी करारनामा केला. त्या करारनाम्यानुसार आम्ही येथे आहोत.

५० हजार रुपये पावतीचा जर विषय असेल तर त्या बाईंनी वर्षभर सभागृह वापरले त्यामुळे त्यांना हे शुल्क भरावे लागले. महिन्याकाठी पाच हजार रुपये ती देणगी म्हणून आम्ही त्यांच्याकडून स्वीकारले. त्याचे व्यवस्थित ऑडिट झालेले आहे. लाखाच्या आत उत्पन्न आहे तर देणगी स्वरुपात आम्ही पैसे घेणार ना! कारण इतर खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसा कुठून येणार? कलाकार मंडळी त्यांचा वेळ देऊ शकतात. परंतु, पैसे देऊ शकत नाही. पन्नास-साठ लोकांचा राबता येथे असतो, नाटक बंद पडू नये अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही शहरासाठी काहीतरी करीत आहोत स्थानिक रहिवाशांचे म्हणणे असेल की मागे शेड बांधले. तेथे नाटकाचे साहित्य ठेवलेले आहे. त्याव्यतिरिक्त काहीही असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगण्यासाठी आम्ही तयार असून, सामान सांभाळावेच लागणार आहे. कॉलनीतील लोकांची कोणतीही तक्रार आम्ही सोडवायला तयार आहोत. बिल्डिंग आमची आहे, असे आम्ही अजिबात वागत नाही तर ती स्थानिकांची बिल्डिंग आहे असेच आम्ही वागतो. ते म्हणतात की, सिक्युरिटी ठेवा परंतु इतके पैसे आम्हाला परवडणार नाही. आमची अशी विनंती आहे की त्यांनीही यात खारीचा वाटा घ्यावा. दोघे मिळून ठरवू. ते सांगतील तसे होईल. त्यांना वाटते बगीचा डेव्हलप करावा, आम्ही त्यासाठी तयार आहोत. करारानुसार आम्ही सर्व गोष्टी करण्यासाठी बांधील आहोत. मुलांना खेळण्यासाठी गार्डन पाहिजे आम्ही दिवसभर ते उपलब्ध करून देतो. आम्हाला तेथे राहायचे असेल तर आम्ही आमचा त्रास कशाला होऊ देऊ? स्थानिक रहिवासी म्हणत असतील की इतर कार्यक्रमांसाठी हे सभागृह उपलब्ध करून द्यावे, ते ही आम्ही देण्यासाठी तयार आहोत. परंतु, येथे जेवणाची परवानगी आम्ही देत नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची इच्छा आहे. आमचा जन्म नाशिक शहरात झालेला आहे, आम्ही बाहेरचे नाही. दोघांच्या समन्वयाने जे होईल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत

-जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

---

लोकहितवादीने केलेले आरोप खोटे

राका कॉलनीतील 'ज्योतिकलश' या नावाने ओळखली जाणारी वास्तू व क्रीडांगण गेल्या अनेक वर्षांपासून लोकहितवादी मंडळाच्या ताब्यात असून ही जागा महानगरपालिकेने कॉलनीतील रहिवाशांसाठी आरक्षित केलेली आहे. लोकहितवादी मंडळ अनेकदा ही जागा इतर संस्थांना वापरण्यास देते, असे दिसते. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तूचे व क्रीडांगणाची कुठलीही देखभाल होत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने लोकहितवादी मंडळाकडून ही जागा ताब्यात घेऊन कॉलनीचा रहिवाशांसाठी जागेचा वापर करावा अशी विनंती महापालिकेला करण्यात आलेली आहे.

लोकहितवादी मंडळाच्या ताब्यातील जागा अत्यंत वाईट अवस्थेत आहे. येथे बाहेरील लोकांचा नेहमी उपद्रव होतो. स्थानिकांना या जागेचा कोणताही उपयोग होत नाही. त्यांना कुठल्याही कामासाठी ही जागा हवी असेल तर त्यासाठी पैसे भरावे लागतात. ओपन स्पेस स्थानिकांची असेल तर त्यासाठी पैसे कशाला भरावे लागले पाहिजे? लोकहितवादी मंडळाने वेळोवेळी स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यापेक्षा त्यांनी स्थानिकांवर आरोप करण्याला जास्त प्राधान्य दिले आहे. गार्डन करण्यासाठी स्थानिकांनी त्यांना कुठलाही अटकाव केला नाही. त्यांनी ग्रीन जीम करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नव्हता, तसे असेल तर त्यांनी पुरावा द्यावा. महापालिकेच्या कोणत्याही अटी-शर्तींचे पालन लोकहितवादी मंडळाने केलेले नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओपन स्पेसची मालकी स्थानिकांकडे असते त्यामुळे ही मालकी आमच्याकडे मिळावी असे आमचे म्हणणे आहे. गेल्या ३८ वर्षांपासून स्थानिकांनी लोकहितवादी मंडळाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केले आहे. परंतु, आता या गार्डनमध्ये बाहेरील लोकांचा उपद्रव वाढलेला आहे. येथे येऊन लोक मद्य पितात, गांजा पितात, जुगार खेळतात. या गोष्टींचा विपरीत परिणाम होत असून स्थानिकांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकहितवादी मंडळाने अनेक खोटे आरोपही केले असून नाटकाची तालीम चालू असताना कुठलेही दगड आम्ही फेकलेले नाही. दगड फेकता हा खोटा आरोप त्यांनी केला आहे तसेच स्थानिकांनी बोर्ड फाडला असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, स्थानिक लोक बोर्ड फाडतील कशाला, तो आम्हीच लावला आहे. याउलट स्थानिकांचाच वेळोवेळी अपमान झालेला आहे.

-सुरेश दाते, स्थानिक रहिवासी

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images