Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिककरांसाठी ‘अब दिल्ली दूर नही’

$
0
0

जेलरोड:

उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असलेली अतिवेगवान राजधानी एक्सप्रेस पश्चिमऐवजी मध्य रेल्वेच्या मार्गाने १९ जानेवारीपासून धावणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकादरम्यान धावणारी गाडी नाशिकरोड, मनमाड, भुसावळ येथे थांबणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईत जाऊन दिल्लीची गाडी पकडावी लागणार नाही. केवळ १७ तासांत नाशिककरांना दिल्लीत पोहचणे शक्य होणार आहे. गाडीला घाटामध्ये पुश-पुल तंत्र वापरले जाणार असल्याने वेळेत बचत होणार आहे.

नाशिक, नगर, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, धुळे येथील रेल्वे प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी मुंबई येथून रेल्वेगाडी पकडावी लागत असे. यामुळे वेळ आणि पैसे यांचा भुर्दंड बसत होता. तसेच शारीरिक व मानसिक ताण सहन करावा लागत होता. आता त्यातून सुटका होणार आहे. खासदार गोडसे यांनी राजधानी एक्सप्रेस पश्चिमऐवजी मध्य रेल्वे मार्गाने धावावी यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तसेच विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. राज्यात मध्य रेल्वेचे ४६५ किमीचे जाळे असूनही दिल्लीला जाण्यासाठी अतिवेगवान रेल्वेगाडी उपलब्ध नसल्याचे गोडसे यांनी रेल्वे मंत्रालयाचे सचिव प्रवीण गेडाम यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

आठवड्यातून दोनदा

राजधानी एक्सप्रेस मुंबई-कल्याण, नाशिक-मनमाड-भुसावळ या रेल्वेस्थानकांवरुन दिल्लीकडे रवाना होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बुधवार आणि शनिवारी मुंबईहून ही गाडी मध्य रेल्वेमार्गे धावेल. मुंबईहून ही गाडी दुपारी २.२० वाजता सुटणार असून, दिल्लीत दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२० वाजता दिल्लीत पोहचेल. येताना दिल्लीहून गुरुवारी आणि रविवारी सुटणार आहे. दिल्लीहून ती दुपारी ३.४५ वाजता सुटून मुंबईला सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल. शनिवारी सायंकाळी प्रथमच ही गाडी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणार असल्याने शिवसेना कार्यकर्ते, प्रवासी संघटनांचे पदाधिकारी स्वागताला उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही टोकांना इंजिन

राजधानी एक्सप्रेससाठी पुश-पुल तंत्र वापरले आहे. या तंत्रात रेल्वेगाडीच्या दोन्ही टोकांना इंजिन असते. दोन्ही इंजिने रेल्वेला एकाच दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करतात. घाटात पुढील इंजिन गाडीला ओढते तर मागील इंजिन पुढे ढकलते. कसारासारख्या अवघड घाटात पुश-पुल तंत्र वापरणे आवश्यक आहे. सध्या अतिरिक्त इंजिन (बॅकर) संबंधित रेल्वेस्थानकांमध्ये गाडीला जोडले जाते. त्यामुळे गाडी घाट जोमाने चढते; मात्र, इंजिन जोडण्यासाठी कसारा आणि इगतपुरीत गाडीला वीस मिनिटे जास्त लागतात. राजधानी एक्सप्रेसला मुंबईपासूनच मागेही इंजिन जोडले जाणार असल्याने गाडीला इगतपुरी, कसाऱ्यात थांबावे लागणार नाही. पुश-पुल तंत्राच्या सहाय्याने मुंबई विभागातील कसारा आणि इगतपुरी दरम्यानच्या घाटांच्या प्रदेशात राजधानी एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली. चाचण्या समाधानकारक झाल्याने गाडीला हिरवा झेंडा मिळाला आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पुश-पुल ट्रायल्स लवकरात लवकर पूर्ण करुन गाडी नियमितपणे सोडण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदारराजासाठी टोल फ्री क्रमांक

$
0
0

जिल्हास्तरावर प्रशासनाचा पहिलाच उपक्रम

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : राज्यासह देशात निवडणुकांचे वारे वाहत असून मतदारांच्या शंका निरसनासाठी निवडणूक विभागाने पुढचे पाऊल टाकले आहे. जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच निवडणूक विभागाची टोल फ्री सुविधा निर्माण करण्यात आली असून हा टोल फ्री क्रमांक आता कायमस्वरुपी कार्यान्वित राहणार आहे. १८००२५३३१९५० या टोल फ्री क्रमांकावरून नागरिक निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती जाणून घेतानाच तक्रारी, सूचना आणि अभिप्राय देखील नोंदवू शकणार आहेत. विशेष म्हणजे या क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज जतन केले जाणार असून तक्रारीचा ऑनलाइन पाठपुरावा तक्रारदार करू शकणार आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे राबवितानाच मतदानाचा टक्का वाढविण्यावर निवडणूक आयोगाचा यंदा विशेष जोर आहे. त्यामुळेच दोषरहित मतदार यादी बनविण्यासह निवडणूक प्रक्रीयेबाबतची विश्वासार्हता वाढविण्याकरीता निवडणूक आयोग कमालीचा आग्रही असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुर्वीच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबतची विश्वासार्हता वाढावा, यासाठी जनतेमध्ये जाऊन त्याबाबतची प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत. याखेरीज विविध स्तरावर मतदान प्रक्रीयेविषयी जनजागृती सुरू आहे. आता यापुढचे पाऊल टाकत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेने जिल्ह्यातील मतदारांसाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला आहे. तूर्तास या टोल फ्री क्रमांकावर लँड लाइनद्वारे संपर्क साधता येत असला तरी मोबाइलद्वारेही त्यावर लवकरच संपर्क साधता येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

शंका निरसन होणार

सद्यस्थितीत सकाळी ९ ते रात्री ८ या कालावधीत १८००२५३३१९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदार आणि मतदान याविषयीची माहिती घेण्यासाठी नागरिक संपर्क साधू शकतील. मतदारयादीमध्ये नाव कसे नोंदवावे, या प्राथमिक स्वरूपाच्या माहितीसह निवडणूक प्रणालीशी संबंधित दुरुस्त्या कशा कराव्यात व मतदान प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही शंकांचे निरसन नागरिकांना येथे करवून घेता येणार आहे.

तर तक्रारीचा पाठपुरावाही शक्य

तक्रार सहज सुटण्यासारखी असेल तर संबंधितांकडून फोनद्वारे माहिती देऊन ती लगेचच सोडविली जाईल. या टोल फ्री क्रमांकावर येणारा प्रत्येक कॉल राष्ट्रीय तक्रार निवारण प्रणाली (नॅशनल ग्रिव्हान्सेस सर्व्हिस पोर्टल) वर जतन केला जाणार आहे. तक्रारीच्या निरसनाला काही कालावधी लागणार असेल तर संबंधित तक्रारदाराचा आयडी क्रमांक तयार होईल. तो निवडणूक शाखेकडून संबंधित तक्रारदाराला दिला जाईल. या क्रमांकाच्या आधारे या प्रणालीवर तक्रारीसंदर्भात पाठपुरावा करता येणार आहे. परंतु, मोबाइल पोर्टेलिटीवर टोल फ्रीची सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच ते होऊ शकेल असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

जिल्हास्तरावर पहिल्यांदाच निवडणूक विभागाचा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. यापुढे तो जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेत कायमस्वरुपी कार्यान्वित राहील. टोल फ्री क्रमाकांवर संवाद साधण्यासाठी कर्मचारी नियुक्त केला असून नागरिकांच्या शंकाचे तो कशाप्रकारे निरसन करतो यावर प्रशासनाचे लक्ष असणार आहे. प्रत्येक कॉलचे रेकॉर्डींग तसेच सीसीटीव्ही फुटेज राष्ट्रीय तक्रार निवारण प्रणालीकडे जतन केले जाणार आहे. नागरिकांनी या टोल फ्री सेवेचा लाभ घ्यावा.

- गणेश राठोड, तहसीलदार निवडणूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगरला ‘हॅप्पी स्ट्रीट’चा कल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने रविवारी (दि.२० जानेवारी) सकाळी ७ ते ९ या वेळेत गोविंदनगर येथे 'हॅप्पी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी झुंबा, जादूचे खेळ, कॅलिग्राफीची नजाकत, जुन्या गाड्यांचा नजराणा अशा अनेक गोष्टी नाशिककरांना पुन्हा अनुभवता येणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स आणि 'हॅप्पी स्ट्रीट' हे जणू समीकरणच झाले आहे. दर्जेदार बातम्यांबरोबरच वाचकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मटाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून 'हॅप्पी स्ट्रीट'ने नाशिककरांना अक्षरश: वेड लावले आहे. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटांतील व्यक्ती या उपक्रमाची वाट पाहत असतात. मागील आठवड्यात नाशिकरोड व त्या अगोदर व्हिरिडीयन व्हॅली व कॉलेजरोड येथे झालेल्या 'हॅप्पी स्ट्रीट'ला नाशिककरांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदनगर येथे 'हॅप्पी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लहान मुलांसाठी विविध खेळ खेळण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जादूचे प्रयोगदेखील सादर केले जाणार आहेत. क्लासिकल व वेस्टर्न म्युझिकचा बॅँड सादर होणार आहे. कॅलिग्राफीचे विविध प्रकार सादर केले जाणार आहेत. झुंबासाठी स्वतंत्र टीम असेल. इंग्रजी, हिंदी, मराठी गीतांच्या चालीवर थिरकण्याची मजा यावेळी अनुभवता येईल.

कलाकारांना नाव नोंदविण्याची संधी

तुमची कला 'हॅप्पी स्ट्रीट'वर सादर करण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धनगर समाजाचे नेते अण्णा विश्राम सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. १६) दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या हातातील रॉकेलचा डबा शहर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागातील पोलिस कर्मचारी नरेंद्रसिंह कचवाह, भूषण खेडवण व सहकाऱ्यांनी हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला.

तालुक्यातील उडाणे गावातील इंदाई देवी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक मंडळ संचलित आश्रमशाळा जळीत प्रकरणी दाखल गुन्हाचा योग्य तपास करून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी आत्मदहनाचा इशारा अण्णा सूर्यवंशी यांनी दिला होता. मात्र, याबाबत पोलिस विभागाने दखल घेतली नाही, म्हणून बुधवारी अचानक त्यांनी अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रयत्न केला. पोलिस विभागाकडून याबाबत योग्य तो तपास करून आश्रमशाळा जळीत प्रकरणी दोषीवर कठारे कारवाई करण्याचे आश्वासन शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांनी दिले आहेत. जर येत्या काही दिवसात न्याय न मिळाल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांवरून उडी घेवून आत्महत्या करेल, असा इशारा पोलिस यंत्रणेला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोट चालकावर गुन्हा

$
0
0

भुशा पॉईंटच्या घटनेत मृतांचा आकडा सातवर; प्रशासनाकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवारी (दि. १५) नर्मदा नदीत क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवासी बसल्याने बोट पाण्यात उलटल्याची घटना घडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. यात बुधवारी (दि. १६) मोनिका विरसिंग पावरा (वय ५) व चिमल भाईदास पावरा या दोघांचे महाराष्ट्र व गुजरात आपत्ती निवारण विभागास मृतदेह सापडले आहेत. यामुळे आता मृतांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख मदत देण्याचे जाहीर केले. तर बोटचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मकरसंक्रांतीला भुशा पॉईंटवर बोट उलटल्याने पाच भाविकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बुधवारी (दि. १६) आणखी दोन जणांची वाढ झाली असून, शोध पथकाला सकाळी दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेतील बोटचालक मालक वसंत भामट्या पावरा यांच्यावर कलम ३०४ प्रमाणे धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बोटीचा पंचनामा करून बोट जप्त करण्यात आली असून, मृत सातही जणांवर बुधवारी दुपारी तेलखेडी गावात शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी धडगाव तालुक्यातील विविध पाडे व गावांतून हजारोच्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते.

अशी घडली घटना
धडगाव तालुक्यातील भूशा गाव उदय आणि नर्मदाच्या नदीच्या संगमावर वसले आहे. दरवर्षी संक्रांतीला या ठिकाणी भाविक नर्मदा नदीची पूजा आणि स्नान करण्यासाठी येतात. याठिकाणी सर्व आदिवासी भाविक एकत्र येतात आणि त्यांना भूशा पॉईंटवरून दुसऱ्या ठिकाणी काठावर जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. यावर्षीदेखील संक्रांतीला मंगळवारी भाविक नदीपूजनासाठी आले होते. यात एका बंदिस्त बोटीमध्ये जवळपास ७० भाविक बसले. मात्र, या बोटीची क्षमता केवळ ३० जणांची होती. त्यामुळे ही बोट अवघ्या १५ ते २० फुटांपर्यंत गेल्यानंतर वजनाने एका बाजूला उलटली आणि बोटीतील भाविकांचा जीव गुदमरू लागला. बोटीतील महिला व बालके आरडाओरड करू लागल्याने जवळच असलेल्या भाविकांनी नदीत उड्या घेवून बचावकार्य सुरू केले. मात्र, यात ७० पैकी ७ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर उर्वरितांपैकी ज्यांना पोहता येत होते त्यांनी काठ गाठून आपले प्राण वाचविले. जिल्हा प्रशासनाकडून अजूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

धोका पत्करून जीवदान दिले
बोट उलटल्याची घटना घडल्यानंतर मदतकार्य करताना मगरींचा मोठा धोका निर्माण झाला होता. नर्मदा नदीत मोठ्या प्रमाणावर मगर असल्याने व स्थानिकांना याची माहिती असल्याने तेथे मदत करणाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता नदीत उड्या घेतल्या. त्यांनी या वेळी बोटीतील बुडालेल्या अनेकांना काठापर्यंत सुरक्षित आणण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. नर्मदा नदीतील मगरींबाबत जिल्हा प्रशासनासह स्थानिकांना माहिती होती. मात्र, बचावकार्यात सर्वांनीच प्रयत्न करून अनेकांना जीवदान दिले आहे.

धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीवरील भुशा येथे बोट उलटल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करण्यात आले. पुन्हा एकदा नदीत शोध कार्य सुरू असून, याबाबत बोट चालकासह संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
-डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारवा, वटवाघळाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
संक्रांतीचा दुसरा दिवसही पक्ष्यांच्या जीवावर बेतला असून, बुधवारी मांजामुळे दोन पक्ष्यांना जीव गमवावा लागला. कॉलेजरोडला पारवा, तर महात्मानगर येथे वटवाघळाचा मृत्यू झाल्याची माहिती पक्षीमित्रांनी दिली.
नाशिक शहरात मंगळवारी मकरसंक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली. पतंगबाजीमुळे पक्ष्यांवर मात्र संक्रांत ओढावली. मंगळवारी शहरातील विविध भागात १२ पेक्षा अधिक पक्षी मांजामुळे जखमी झाले. यात काही पक्ष्यांचे पंख, तर काहींचे पाय कापले गेले. या पक्ष्यांवर पक्षीमित्रांनी उपचार करून आकाशात सोडून दिले. पण संक्रांतीचा दुसरा दिवस दोन पक्ष्यांचा जीव घेणारा ठरला. सकाळी ११ च्या सुमारास महात्मानगर मैदानाजवळील एका बंगल्याच्या आवारात असलेल्या नारळाच्या झाडावर मांजात वघवाघळाचा पंख अडकले. त्यामुळे वटवाघूळ गंभीर जखमी झाले. पक्षीमित्रांनी मांजातून वटवाघळाची सुटका केली. पण तोपर्यंत ते मृत झाले होते. चांदशी गावाकडील मोकळ्या जागेत खड्डा करून, ते पुरण्यात आले. दुपारी कॉलेजरोड येथील थत्तेनगर परिसरातील एका झाडावरील मांजात अकडून पारव्याचे पंख कापले गेले. दुपारी २ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. पक्षीमित्र अभिजित खेडलेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घंटागाडीवर चढून पारव्याची मांजातून सुटका केली. पंख पूर्णत: कापले गेल्याने पारव्याने झाडावरच मान टाकली होती. शहरातील विविध भागात मांजामुळे जखमी झालेले पक्षी आढळून आले. इंदिरानगरमध्ये मांजा अडकल्याने कबुतराच्या पायाला जखम झाली असून, त्यावर उपचार सुरू आहेत. नायलॉनसह इतर मांजांचा वापर पतंगोत्सवात झाल्याने, पक्ष्यांना जीव गमवावा लागत असल्याचे पक्षी मित्रांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पक्ष्यांचे जखमी होण्याचे प्रमाण कमी असले, तरी येत्या दोन ते तीन दिवसांत मांजामुळे पक्षी जखमी होण्याची शक्यता असल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत, हिंदीच्या कृतिपत्रिकेवर मार्गदर्शन

$
0
0

रेषा एज्युकेशन सेंटरसोबत 'मटा'चा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदललेली पाठ्यपुस्तके आणि मूल्यमापन पदधती यांना सोबत घेऊन दहावीचे विद्यार्थी यंदा कृतिपत्रिकेवर आधारित परीक्षेस सामोरे जाणार आहेत. दहावीची पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यामध्ये नेमका फरक काय, हे इतर विषयांच्या बाबतीत समजावून घेतल्यानंतर आता अंतिम टप्प्यात हिंदी आणि संस्कृत या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या दोन्ही विषयांच्या कृतिपत्रिकेसंदर्भात विद्यार्थ्यांना रविवारी (दि. २०) मार्गदर्शन केले जाणार आहे.

पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यातील फरक, कृतिपत्रिका सोडविताना घ्यायची काळजी आदी मुद्द्यांवर यावेळी संस्कृत विषयासाठी मार्गदर्शक कुमुदीनी फेगडे आणि हिंदी विषयासाठी मार्गदर्शक सुरेखा बोंडे या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी व पालक सहभागी होऊ शकतात.

येथे साधा संपर्क

कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असला तरीही यासाठी नोंदणी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत या विषयाचे मार्गदर्शन रविवारी सकाळी १० ते ११.३० या वेळेत तर हिंदी या विषयाचे मार्गदर्शन दुपारी १२ ते १.३० या वेळेत मिळेल. अधिक माहिती व नोंदणीसाठी रेषा एज्युकेशन सेंटर, ३ ब, कौस्तुभ, एसटी कॉलनी, गंगापूर रोड या पत्त्यावर किंवा ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना उद्योजकतेचे धडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर व मिटकॉन तर्फे एक महिना ३० महिलांना उद्योजकतेचे धडे देण्यात आले. त्यानंतर या महिलांना प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागाचे प्रमाणपत्र व उद्योग आधार नोंदणीपत्राचे वाटप स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, महिला समितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या प्रशिक्षणात ३० महिलांनी उद्योग सुरू केले हे विशेष.

महिला घरातील शक्तीस्थान आहे. नियमित कामे सांभाळून त्या इतर कामे उत्तम प्रकारे करतात. एकाचवेळी अनेक कामे करण्याची कला त्यांना उपजत असते. त्यामुळे महिलांनी व्यापार-उद्योग केला पाहिजे. कुठलाही कमीपणा न बाळगता विचारावे व प्रगती करा असे सांगत स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. उद्योजकता विकास प्रशिक्षणाची चौथी बॅच आहे. तीन दशकांपूर्वी नाशिकमध्ये असाच प्रशिक्षण वर्ग घेतल्यानंतर चेंबरच्या पाठपुराव्याची दखल घेऊन औद्योगिक वसाहतीत के झोनमध्ये महिलांसाठी वेगळी जागा आरक्षित करण्यात आल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष मंडलेचा यांनी सांगितले. तसेच याआधीच्या प्रशिक्षणार्थीसाठी नाशिकमध्ये फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. आताच्या वर्गाच्या प्रशिक्षणार्थीही यशस्वी उद्योजिका बनतील व चेंबर त्यांना नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

महिला समितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे यांनी प्रास्ताविक केले. नीता वैद्य यांनी स्वागत केले हेमा दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपा चांगरानी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एचएएल’कडे भरपूर काम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)कडे कामाची कुठलीही कमी नााही. त्यांच्याकडे भरपूर काम आहे. विद्यमान केंद्र सरकारने २८ हजार कोटी रुपयांच्या कामावर स्वाक्षरी झाली आहे, तर ७३ हजार कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव आहेत. त्यावरही लवकरच अंतिम निर्णय होईल. त्यामुळे एचएएलविषयी कुठलेही संभ्रम नसून, संरक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान भरीव राहणार आहे.' असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले.

डिफेन्स हबच्या घोषणेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले,'नवीन संरक्षण धोरणानुसार लघु व मध्यम उद्योगांना संरक्षण क्षेत्रात पदार्पण करण्यात येणारे अडथळे कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. डिफेन्स एक्सलेन्स फ्रेमवर्क, डिफेन्स इंडिया स्टार्ट अप चॅलेंज, मिशन रक्षा ज्ञान शक्ती, मेक २ योजना यामुळे मेक इन इंडिया ही मोहीम अधिकाधिक फायदेशीर ठरत आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतानाच परदेशी गुंतवणूकही वाढत आहे. यातूनच संरक्षण सामर्गीसाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज संपुष्टात येत आहे.'

प्रदर्शानाला प्रतिसाद

संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या सरकारी उद्योगांमार्फत आयोजित प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट देवून पाहणी केली. एचएएल, बेल, बीडीएल, एमडीएल, जीएसएल, बीएईएमएल, मिधानी सारख्या संस्थानी आपली उत्पादने प्रदर्शित केली होती. त्याचबरोबर ओएफबी, डीआरडीओ, भारतीय लष्कराचे विविध विभाग, नौसेना आणि वायुसेनेनेदेखील आपल्या उत्पादन आणि सेवेचे प्रदर्शन याठिकाणी करण्यात आले होते.

संघटनांचे सहकार्य

निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, लघु उद्योग भारती, सोसायटी ऑफ डिफेन्स मॅन्युफॅक्चरर (एसआयडीएम), कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थांचे सहकार्य या सेमिनारसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. तसेच, भाजपचे डॉ. प्रशांत पाटील, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, निमाचे तुषार चव्हाण, शशिकांत जाधव, धनंजय बेळे आदींनी त्यासाठी परीश्रम घेतले. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी सेमिनारच्या शेवटी नाशिकबाबत सादरीकरण केले. डिफेन्स हबसाठी नाशिक कसे पोषक आहे, येथील क्षमता काय आहेत आणि येत्या काळात काय करण्याच गरज आहे, याचा वेध त्यांनी या सादरीकरणात घेतला.

'राफेल' ही गरज

कारगील युद्धावेळीच अत्युच्च उंचीवर जाणाऱ्या विमानांची आपल्याकडे कमतरता असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधुनिक पिढीच्या विमानांची गरज स्पष्ट झाली. म्हणूनच राफेलची निवड करण्यात आली. आघाडी सरकारने या खरेदीसाठी अतिशय दिरंगाई केली. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात या कराराला चालना देण्यात आली. ही खरेदी प्रक्रिया अतिशय पारदर्शक असून, राफेल विमाने या वर्षी भारतात दाखल होतील. या विमानामुळे हवाई दल सशक्त होतानाच देशाच्या संरक्षण सिद्धतेला नवा आयाम लाभणार असल्याचे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.

यांनी केले सादरीकरण

'भारतीय सशस्त्र दलातील भांडवली गरजांसंदर्भात उद्योजकांसाठी असलेल्या संधी' तसेच 'महसूली गरजा (पार्ट्स, कॉंसुमेबल्स) यांच्या देशांतर्गत उत्पादनातुन निर्माण होणाऱ्या संधी' या विषयांवर पॅनल डिस्कशन्सचे आयोजन करण्यात आले. यात वायुसेनेचे एअर वाईस मार्शल जे चलपती, सैन्यदलातील ब्रिगेडियर अजय सूद, नौदलाचे कॅप्टन नितीन बिश्नोई, भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व सीईओ आर एस भाटिया, हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लि.चे चीफ मॅनेजर डिसाइन विजय शिंदे, डीआरडीओचे डीजी डॉ. पी. के. मेहता, बोर्ड लार्सन अँड टुब्रोचे उपाध्यक्ष व सदस्य सीएमडीई मुकेश भार्गवा, ब्रिगेडिअर आर. ए. मंदार, नौदलाचे असिस्टंट चीफ ऑफ नेव्हल स्टाफ रिअर ऍडमिरल व्ही. एम. दॉस, लार्सन अँड टुब्रो चे सतीश भारतन, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.चे डॉ. जे. एम. जहांगीर यांनी उपस्थितांना सत्रांत मार्गदर्शन करीत संवाद साधला व उपस्थितांच्या प्रश्न व शंकांचे समाधान केले. या सेमिनारला उद्योजकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाखांचा गुटखा नाशिकरोडला जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड परिसरातील सुभाष रोडवरील लक्ष्मी मार्केटमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोमधील पावणेपाच लाख रुपयांचा पानमसाला (गुटखा) जप्त करण्यात आला. क्राइम ब्रँचच्या सेंट्रल युनिट आणि अन्न व औषध विभाग (एफडीए) यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या प्रकरणी संशयित व्यावसायिकाविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

रामविलास शिवनारायण लोहिया (५५, रा. लोकमान्यनगर, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. बंदी घालण्यात आलेल्या गुटखाची विक्री लक्ष्मी मार्केटमध्ये होत असल्याची माहिती युनिटचे पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी छापा मारला. यावेळी 'एफडीए'चे अन्न सुरक्षा अधिकारी डी. के. सोनवणे आपल्या पथकासह हजर होते. या संयुक्त पथकाने लक्ष्मी मार्केटमधील चोरडिया भवनच्या पाठीमागे कोपऱ्यात उभ्या असलेल्या टेम्पोकडे (एमएच १५ एफक्यू ००१३) मोर्चा वळविला. पथकाने केलेल्या तपासणीत चार लाख ७३ हजार ९८० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू (पानमसाला) आढळून आला. पोलिसांनी गुटखा आणि टेम्पो असा एकूण सहा लाख २३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी डी. के. सोनवणे यांच्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये रामविलास लोहियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन सावंत करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक के. डी. पाटील, कुमार चौधरी, सहायक निरीक्षक एस. सी. सावंत, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक उपनिरीक्षक शंकर गोसावी, हवालदार बी. आर. कर्डीले, हवालदार ए. व्ही. रेवगडे, दिपक पाटील, पोलिस नाईक जी. एस. केदार, एस. पी. गामणे, एस. एस. पवार, रेखा गायकवाड, शिपाई भरत दिंडे, कॉन्स्टेबल जर्नादन जाधव, अतुल पाटील आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाकडून विनयभंग

$
0
0

मॅरेथॉन चौकात घटना; महिलेला दुखापत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाठलाग करीत रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला. रिक्षात खेचल्याने महिलेला दुखापत सुद्धा झाली. ही घटना गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात घडली असून, याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नीलेश कोठुळे असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारच्या सुमारास महिला गंगापूररोडवरील ज्योती बुक स्टोअर्सजवळ उभी असताना हा प्रकार घडला. या ठिकाणी आलेल्या संशयित आरोपीने तिचा हात पकडला. यानंतर सदर महिला बसमध्ये बसून निघाली असता त्याने तिचा रिक्षाने (एमएच १५, झेड ८३८५) थेट घरापर्यंत पाठलाग केला. बसमध्ये उतरून घराकडे निघालेल्या महिलेला थांबवून संशयिताने तिला रिक्षात बसण्यासाठी बळजबरी सुरू केली. यात महिलेच्या डोक्यास रॉड लागून दुखापत झाली.

किरकोळ कारणातून मारहाण

किरकोळ कारणातून कुरापत काढून तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. यावेळी संशयितांनी फिर्यादीच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची चेन लांबविली असून, ही घटना बिटको कॉलेजजवळील आत्मतीर्थ कॅफेजवळ घडली. याबाबत तिघांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी शुभम दिलीप चौधरी (२१, रा. गवळीवाडा, देवळाली कॅम्प) याने फिर्याद दिली. शुभम बुधवारी (दि. १६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास आत्मतीर्थ कॅफेजवळ चहा पित होता. याच वेळी संशयित अनिकेत वाजे (रा. फर्नांडिसवाडी, नाशिकरोड) व त्याचे दोन साथीदार शुभमजवळ आले. त्यांनी त्याला "बाजूला हो," असे म्हणून कुरापत काढत शिवीगाळ केली, तर मारहाण करून त्याच्या गळ्यातील अर्धा तोळे सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून नेली. संशयितांनी त्यास ठार मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पोबारा केला.

शेकोटीच्या कारणावरून घरावर दगडफेक

शेकोटीत पालापाचोळा टाकल्यामुळे धूर झाल्याने संशयितांनी तरुणाला शिवीगाळ करीत त्याच्या घरावर दगडफेक केली. ही घटना देवळाली गावातील महात्मा फुले रोडवर असलेल्या भैरवनाथ मंदिरासमोर घडली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भैरवनाथ मंदिरासमोर संजय वर्मा (१८, रा. महात्मा फुले रोड, देवळाली गाव) आणि त्याचा मित्र ओमकार साखला हे रात्री शेकोटी करून शेकत होते. शेकोटीत त्यांनी पालापाचोळा टाकला. त्यामुळे धूर होऊन संशयित उद्देश चंदेल, किशोर निकम, राहुल निकम, बाबू मणियार (सर्व रा. देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी संजय वर्मा यास शिवीगाळ सुरू करीत धक्काबुक्की केली. तसेच तो घरी असताना त्याच्या घराजवळ येऊन संशयितांनी त्याच्या घराच्या दरवाजावर दगडफेक करून लाथा मारल्या. यानंतर संशयित उद्देश चंदेल याने धारदार तलवार संजय वर्मा याच्या घराच्या दरवाजाच्या फटीतून आत घालून दरवाजा तोडला, तसेच त्याला ठार मारण्याची धमकी दिली.

चॉपर बाळगणारा अटक

चॉपर व गावठी कट्ट्यासारखे दिसणारे लायटर बाळगणाऱ्या तरुणास पंचवटी पोलिसांनी अटक केली. पंचवटीतील अमरधाम रोडवर बुधवारी (दि. १६) दुपारी सव्वाचार वाजता ही कारवाई करण्यात आली. विजय राजेंद्र पाटील (२०, लाकडी वखारीजवळ, अमरधाम, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. विजयकडे धारदार चॉपर व गावठी कट्ट्यासारखे दिसणारे लायटर असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार, त्याला अटक करण्यात आली. पोलिस नाईक काकड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

..........

हौदात पडल्याने तरुणाचा मृत्यू

पाणी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला फिट येऊन हौदात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना हेडगेवारनगर परिसरात झाली असून, याबाबत अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

लखन कारभारी जाधव (२८, रा. मनपा ऑफिससमोर, हेडगेवारनगर, अंबड) असे तरुणाचे नाव आहे. जाधव हा मंगळवारी (दि. १५) रात्री ८ वाजेच्या सुमारास घराजवळील हौदात पाणी आणण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला अचानक फिट आल्याने तो हौदात पडला. पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

कुंभारवाड्यात आत्महत्या

अमरधामरोडवरील कुंभारवाड्यात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कामधंदा नसल्याच्या नैराश्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नरेंद्र नंदूशेठ इखनकर (३२, रा. साईबाबा मंदिराच्या मागे, कुंभारवाडा) असे या व्यक्तीचे नाव आहे. नरेंद्र इखनकर याने बुधवारी (दि. १६) रात्री सव्वाआठ वाजता घरातील हॉलमधील सिलिंगला हुकाच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

जाधव संकुलमध्ये तरुणाचा गळफास

अंबड येथील जाधव संकुलाजवळ असलेल्या पाटील पार्कमध्ये २६ वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण कळले नसून, याबाबत अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दिलीप पामेश्‍वर मल्हा (रा. पाटील पार्क, जाधव संकुल) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दिलीप मल्हा याने अज्ञात कारणातून घरी असताना मंगळवारी (दि. १५) रात्री ८ वाजेच्या सुमारास गळफास लावून घेत आत्महत्या केली.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चित्रपट चावडी’ मध्ये उद्या ‘नाझरीन’

$
0
0

'चित्रपट चावडी'त उद्या 'नाझरीन'

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि. यांच्यावतीने 'चित्रपट चावडी' उपक्रमांतर्गत उद्या (१९ जानेवारी) सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध स्पॅनिश दिग्दर्शक लुई ब्युनेल यांचा 'नाझरीन' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे. १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या स्पॅनिश चित्रपटाचा कालावधी ९४ मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाख रुपये आणायचे कोठून?

$
0
0

लोकहितवादी मंडळाचा संतापजनक सवाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्योतिकलश सभागृह पूर्ववत सुरू करण्यासाठी महापालिकेने ३,१८,५१५ रुपये त्वरित भरण्याची सूचना करून त्यासोबत काही अटी शर्ती ठेवलेल्या आहेत. परंतु, लोकहितवादी ही लोकोपयोगी संस्था असून इतकी रक्कम आणायची कोठून, असा संतापजनक सवाल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिकेने राका कॉलनीतील ज्योतिकलश सभागृह सील केल्यानंतर सांस्कृतिक वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणी महापालिका चुप्पी साधून होती; परंतु राजकीय क्षेत्रातील मंडळींनी यात हस्तक्षेप केल्यानंतर महापालिकेने अधिकारी वर्ग आणि लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात तोडगा काढण्याऐवजी मंडळाला कोड्यात टाकल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेने या प्रकरणी जो तोडगा काढला आहे तो अत्यंत खर्चिक असून इतकी रक्कम उभी कोठून करायची असा सवाल मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत. स्वतंत्र गेटसाठी पैसा आणायचा कोठून, तसेच पैसा उभा करण्यासाठी या जागेचा वापर होऊ न देण्याची अट तर विचित्र आहे. असे असेल तर संस्था पैसा कोठून उभा करणार, असा पेच पदाधिकाऱ्यांपुढे पडला आहे. नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेणे, त्यासाठी साहित्य आणणे, रंगमंच किंवा इतर वस्तू, चहा, नाश्ता यांचा खर्च भागविण्यासाठी कलाकार खिशातून खर्च करेलही; परंतु तो किती दिवस करणार? कलाकार एकवेळ आपला वेळ देऊ शकेल. परंतु, रोज पैसा कसा खर्च करणार, असाही प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिकेने या अटीशर्तींच्या बाबतीत शिथिलता बाळगावी, अशी विनंतीदेखील लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी पुढे काय होते, याबाबत कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा आहेत अटी-शर्ती

- तीन लाख वीस हजार रुपये भरणे,

- भाडे भरल्यावरच करारनामा होणार,

- उद्यान विकसित करून त्याचा वापर नागरिकांसाठी खुला करणे

- उद्यानाच्या जागेसाठी स्वतंत्र गेटची व्यवस्था ठेवावी

- २४ तास सुरक्षारक्षक नेमावा

- जागेचा गैरवापर वा गैरकृत्य होणार नाही याची काळजी घ्यावी

- जागेचा व्यावसायिक वापर न करणे

- करारनाम्यातील इतर अटी-शर्तींचे पालन करणे

लोकहितवादी मंडळ संस्थेला कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. ना महापालिकेचे ना सरकारचे. त्यामुळे इतकी रक्कम आणायची कोठून, असा प्रश्नच आहे. लोकोपयोगी कामासाठी लोकहितवादी मंडळ काम करते. समाजसेवेचे वसा घेऊन काम करणाऱ्या संस्थेकडून इतके पैसे मागणे योग्य वाटते का?

- मुकुंद कुलकर्णी,

कार्याध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यसाठा लुटण्याचा प्रयत्न

$
0
0

शस्त्रे दाखवून ट्रक पळविला; उत्पादन शुल्ककडून ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात बंदी असलेला दमणमध्ये उत्पादित तब्बल ४७ लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला. मद्यसाठा घेऊन जाणारा ट्रक शस्त्रास्त्रांच्या जोरावर तस्करांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सतर्कता दाखवत तस्करांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

या प्रकरणी संशयित जावीद अलाउद्दीन तेली (३१, रा. शास्त्रीनगर, नवापूर), अमर कैलास वर्मा (२२, रा. जनता पार्क, नवापूर), राहुल राजू गायकवाड (२८, रा. चिंचबन, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी), शरदभाई नारायण ठाकूर (३७, रा.जयशक्तीनगर, जलालपूर, नवसारी, गुजरात) यांना अटक करण्यात आली. दमणमध्ये उत्पादित मद्य स्वस्त असल्याने तस्करी करून ते राज्यात आणले जाते. या मद्यामुळे राज्याचा महसूल घटतो. नाशिकला असे प्रकार सातत्याने घडतात. त्यामुळे येथील भरारी पथकांना सातत्याने कारवाई करावी लागते. याच मद्याचा मोठा साठा चांदवड तालुक्यातील नाशिक-देवळा रोडवरील खेलदरी शिवारातून शहराकडे येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण, उपआयुक्त प्रसाद सुर्वे, चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक एम. बी. चव्हाण, देवदत्त पोटे, कैलास कसबे आदिंनी या मार्गावर सापळा रचला.

संशयित दहा चाकी ट्रक (जी.जे ३१ टी. १५४९) यावर पथकाला संशय आला. पथकाने तो ट्रक रोखून तपासणी केली असता पोत्यांमागे मद्याचा साठा आढळून आला. त्यानुसार भरारी पथकाने विविध कंपनीची व्हिस्की, बियर बॉक्स असा ४७ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा मद्दसाठा तसेच ट्रक आणि स्विफ्ट कार असा ६५ लाख ९१ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, जप्त करण्यात आलेला ट्रक मुख्यालयात जमा करण्यासाठी आणत असताना तस्करांनी चारचाकी, दुचाकीवरून पाठलाग करत ट्रक घेऊन जाणाऱ्या पथकावर दगडफेक करुन शस्त्रे रोखली. पिंपळगाव बसवंत येथील उड्डाणपुलावर संशयित आरोपी मिलींद मधूकर पवार (४०, रा. चिंचबन, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी) व त्याचे चार साथिदार झायलो कारमधून आले. त्यांनी ट्रक रस्त्यात अडवून शस्त्रे दाखवून ट्रक पळवून देण्यास हातभार लावला. मात्र, भरारी पथकाने सर्तकता दाखवून संबंधित ट्रक दुसऱ्या पथकाच्या मदतीने पकडला. या प्रकरणी वरील संशयितांसह मद्यविक्रेते, मद्य पुरवठादार, मद्य विकत घेणार अशा ज्ञात व अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगर हत्येतील तिसरा संशयित अटकेत

$
0
0

भुसावळ येथे सापळा रचून कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर येथील सुपरमार्केटचे मालक अविनाश शिंदे यांच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी भुसावळ येथे दडून बसलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीस गुरुवारी अटक केली. या प्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या दोघा संशयितांना कोर्टाने २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तिसऱ्या आरोपीच्या अटकेमुळे या गुन्ह्याची स्पष्ट उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

विलास राजू मिरजकर (२६, रा. तेलंगवाडी, पेठरोड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. शिंदे हत्याकांडानंतर परागंदा झालेल्यापैकी दोघा संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र, त्यांचे इतर साथिदार फरार आहेत. आरोपींपैकी एक असलेला मिरजकर भुसावळ येथे दडून बसल्याची माहिती पंचवटी स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना समजली होती. त्यानुसार, एसीपाअय शेगर यांच्यासह एक पथक भुसावळला रवाना झाले. तिथे अत्यंत शिताफीने पोलिसांनी तपास करीत मिरजकरला ताब्यात घेतले. मिरजकरने खूनाच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत कबुली दिली. दरम्यान, शिंदे हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. पोलिसांनी यापूर्वी चिमा नाना पवार आणि सुनील रामचंद्र पवार यांना अटक बुधवारी (दि. १६) केली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले.

२५ जानेवारीपर्यंत कोठडी

फरार झालेल्या आरोपींचा शोध घेणे, चाकू आणि रोकड हस्तगत करणे आदी कारणांसाठी संशयितांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. त्यानुसार कोर्टाने दोघांना २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आज ताब्यात घेण्यात आलेल्या मिरजकरला शुक्रवारी (दि. १८) कोर्टात हजर करण्यात येईल. अटक झालेले आणि फरार आरोपी यांच्यापैकी शिंदे यांच्यावर नक्की हल्ला कोणी केला. तसेच लूट करून नेण्यात आलेली रक्कम कोठे आहे, याचा तपास अद्याप सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक संघटनेचेआज आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक महासंघाच्या वतीने आज, शुक्रवारी गोल्फ क्लब येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक महासंघाचे सचिव संजय शिंदे यांनी दिली.

शिक्षक संघाच्या वतीने हे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन आहे. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कायम विनाअनुदान तत्त्वावरील मूल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करून त्यांना त्वरित अनुदान देणे, २०११-१२ पासूनच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजुरी देणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. शिंदे, अनिल महाजन यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप

$
0
0

सराईत गुन्हेगाराच्या हत्येचा घेतला होता बदला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील सराईत अल्पवयीन गुन्हेगार ऋतिक उर्फ पाप्या शेरगीलच्या खुनाचा बदला घेण्यासाठी चेतन पवार या अल्पवयीन संशयित आरोपीची हत्या केल्या प्रकरणी जिल्हा कोर्टाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हत्येची घटना १९ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गजबलेल्या तिबेटियन मार्केट येथे झाली होती.

हरिश राजू शेरगील उर्फ हऱ्या (२२, रा. फुलेनगर, पंचवटी) आणि ललित सुरेश राऊत उर्फ लल्या (१९, रा. फुलेनगर, पंचवटी) अशी कोर्टाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. हरिशचा भाऊ पाप्या शेरगील या सराईत आरोपीची पंचवटीतील उन्नती शाळेजवळ ७ फेब्रुवारी २०१७ रोजी हत्या झाली होती. पाप्याच्या हत्येत चेतन पवार हा एक संशयित आरोपी होता. इयत्ता दहावीच्या सराव परीक्षेचा पेपर देऊन शाळेबाहेर पडणाऱ्या पवारसह त्याच्या तीन ते चार शाळकरी मित्रांनी पाप्याची हत्या केली होती. चेतनवर हत्येप्रकरणी बालन्याय मंडळात खटला सुरू झाला होता. १९ ऑगस्ट २०१७ रोजी चेतन त्याच्या आई-वडील आणि भावासह सुनावणीसाठी बालन्याय मंडळासमोर हजर झाला होता. सुनावणीनंतर हे सर्व खरेदीसाठी तिबेटियन मार्केट येथे पोहचल्यानंतर आरोपींनी आपल्या अल्पवयीन साथिदारांसह चाकू, चॉपर आणि कोयत्यानिशी हल्ला चढविला. यावेळी चेतनच्या पालकांसह त्याच्या भावासही मारहाण करण्यात आली. यात गंभीर जखमी झालेल्या चेतनचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सहायक पोलिस निरीक्षक विलास शेळके यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. रवींद्र एल. निकम यांनी काम पाहिले. समोर आलेले साक्षीदार, फिर्यादी, पंच तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार कोर्टाने दोघा सज्ञान आरोपींना हत्येप्रकरणी दोषी ठरवित जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पोलिस नाईक रवींद्र पानसरे, पैरवी अधिकारी हवालदार व्ही. एन. लांडे, पोलिस नाईक आर. आर. जाधव यांनी खटल्याच्या कामाचा बारकाईने पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिफेन्स हबवर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकला जाहीर झाले आहे. तशी अधिकृत घोषणा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली. ओझर टाऊनशिप येथे आयोजित 'डिफेन्स इंडस्ट्री स्टेकहोल्डर्स सेमिनार'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी डॉ. भामरे म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेवर देशाच्या लष्कराची क्षमता अवलंबून आहे. त्या दृष्टीने संरक्षण सामग्रीसाठी स्थानिक पातळीवर संशोधन व उत्पादन होण्यासाठी पहिले डिफेन्स हब कोईम्बतूर येथे असून, दुसरे हब नाशिक येथे सुरू करण्यात येत आहे. या क्षेत्रातील सहभागीदारांना याचा लाभ होईल आणि देशांतर्गत उद्योगांनादेखील प्रोत्साहन मिळेल. या हबचा फायदा राज्यभरातील लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, संरक्षण निर्मिती विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार, एअर मार्शल व्ही. आर. चौधरी, भारतीय नौसेनेचे व्ही. मोहनदास, डीआरडीओचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. के. मेहता, एचएएलचे अध्यक्ष आर. माधवन, भारत फोर्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. भाटिया, संरक्षण सचिव संजय जाजू आदी उपस्थित होते. डिफेन्स हबसाठी देशातील पाच शहरांनी जोर लावला होता. मात्र, नाशिकध्ये हे हब व्हावे, अशी आग्रही मागणी आपण केली. अखेर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांनी त्यास दुजोरा दिला. त्यामुळे नाशिकमध्ये हे हब जाहीर करताना आपणास विशेष आनंद होत असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

उद्योजकांना प्रोत्साहन

हबसाठी सर्वप्रथम आता विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे. त्यात 'निमा' या उद्योजकांच्या संस्थेची भूमिका मोलाची राहणार आहे. नाशिक परिसरात कुठले संरक्षण उद्योग आहेत, त्यांना नक्की काय मदत हवी आहे, कुठल्या सुविधा हव्या आहेत, येथे संरक्षण उद्योगवाढीसाठी काय उपाययोजना करायच्या आहेत, आदी बाबी अहवालातून स्पष्ट होतील. त्यानंतर याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी एचएएल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बेल) या दोन सरकारी संस्थांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येईल. खासगी उद्योगांना संशोधन व विकासासाठी अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांची उत्पादने खरेदी केली जातील. लष्कर, हवाईदल आणि नौदलाला नक्की काय हवे आहे, हे उद्योगांना सांगितले जाईल. आयात घटवून देशांतर्गत भागात उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. यातून नाशिक, तसेच उत्तर महाराष्ट्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येईल आणि रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होईल, असे भामरे यांनी स्पष्ट केले.

देशांतर्गत उत्पादन

जागतिक पातळीवर शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे स्थान होते. शस्त्रांची मागणीही वाढत आहे. लष्करी सामग्री निर्मिती क्षेत्रात स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. परेदशी उद्योगांना या बाजारातील संधी साधण्यासाठी स्थानिकांच्या सहकार्याने देशातच शस्त्र सामग्री उत्पादनाचा प्रयत्न 'डिफेन्स इनोव्हेशन हब'च्या माध्यमातून करण्यात येईल, असेही डॉ. भामरे म्हणाले.

रोजगार निर्माण होणार

हबमुळे उद्योजकांना अनेक संधी प्राप्त होतील. प्रगत शैक्षणिक संस्थांमुळे मिळणारे कुशल मनुष्यबळ, विमानसेवा, मुंबई- आग्रा महामार्ग, रेल्वेमार्ग, धरणांमुळे असणारी पाण्याची उपलब्धता असल्याने नाशिकचा विकास आणि विस्तार वेगाने होत आहे. देशाच्या संरक्षण सिद्धतेत नाशिकचे यापुढे योगदान राहणार आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. हबमुळे स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीलादेखील चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत पहिल्या पाचमध्ये

संरक्षण उत्पादन धोरणांतर्गत २०२५ पर्यंत संरक्षण क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या पहिल्या पाच देशांत भारताला आणण्याचे व ३५ हजार कोटी निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सुविधा आणि भविष्यातील तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी उद्योग जगताचा संरक्षण मंत्रालयाशी असणारा संवाद महत्वाचा आहे. दोघांच्या परस्पर सहकार्याने संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णता आणि सिद्धतेसाठी मदत होईल, असे डॉ. भामरे यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रातील नव्या धोरणानुसार संरक्षण क्षेत्रातील भारतीय खासगी क्षेत्राच्या भागीदारीला चालना मिळण्यासाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हनी ट्रॅपची दखल

पाकिस्तानकडून हनी ट्रॅपसारख्या तंत्रांचा वापर केला जात आहे. याप्रकरणी लष्कराने संबंधित जवानांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच. पण, संरक्षण मंत्रालयानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार चव्हाण अनुपस्थित

$
0
0

खासदार चव्हाण अनुपस्थित

हा कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला ते ओझर टाऊनशीप दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येते. मात्र, तेथील भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे कार्यक्रमाला अनुपस्थित होते. तर, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे थेट व्यासपीठावर उपस्थित होते. ज्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम आहे तेच गायब असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. दरम्यान, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची समिती लक्षद्वीप दौऱ्यावर गेलेली असून, यात खासदार चव्हाणही सहभागी झालेले असल्याने ते कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत, अशी माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात संशयितांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रिणीशी ठेवलेल्या प्रेमसंबंधांमुळे उद्भवलेल्या वादातून अरबाज शेरू पठाण या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सात संशयितांना कोर्टाने २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भिमवाडी परिसरात संक्रांतीच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास हत्येचा प्रकार घडला होता. हत्येच्या गुन्ह्यात कुणाल बापू कापसे (२१), बॉबी बथुवेल जगदाने (१९), विशाल बेकारू भगवती (१८), राहुल दत्तू लहांगे (१८, सर्व रा. मल्हारखान, अशोकस्तंभ), अनिकेत नितीन टोपले (२०), गौरव दिलीप उन्हवणे (१८,) आणि विकी पाटील अशा सात जणांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती. या संशयितांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी व बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने संशयितांना २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images