Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक काँग्रेस कार्यालयावर जप्तीचे संकट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसच्या नाशिक शहर कार्यालयावर जप्तीचे संकट घोंगावत आहे. महापालिकेने जप्ती वॉरंट बजावूनदेखील घरपट्टीची २२ लाख ३९ हजारांची थकबाकी मुदतीत न भरल्याने अखेर कॉँग्रेस कार्यालयावर महापालिकेने जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. काँग्रेससोबतच शहरातील १६५४ थकबाकीदारांच्याही मालमत्ता जप्तीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भातील आदेश जारी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेने २५ हजारांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांकडून थकबाकी वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने जवळपास १६५४ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट बजावले आहे. या सर्व मिळकतधारकांना ३ मार्च रोजी जप्ती वॉरंट बजावत त्यांना थकबाकी भरण्यासाठी २५ मार्चची मुदत दिली होती. वॉरंट बजावल्यापासून २१ दिवसांच्या आत थकीत कर भरणे बंधनकारक होते. मात्र ही थकबाकी भरायची कोणी, यावरून कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादात थकबाकी भरण्याची मुदत २५ मार्च रोजी संपुष्टात आली. महापालिकेने बजावलेल्या जप्ती वॉरंटवर काँग्रेसने आक्षेप घेत महापालिकेकडून चुकीच्या पद्धतीची आकारणी होत असल्याचा आरोप केला होता. गटनेते शाहू खैरे यांनी तसे पत्र प्रशासनाला दिले होते. मात्र विविध कर विभागाने काँग्रेसला मागील थकबाकीसह येणे, दंड व तो न भरल्यामुळे वॉरंटपोटी चढलेला बोजा आदी तपशील कळवत त्यांचा आक्षेप खोडून काढला. काँग्रेस कमिटीला २२ लाख ३९ रुपयांच्या थकबाकीसाठी जप्ती वॉरंट काढले होते. त्यामुळे २५ तारखेपर्यंत ही रक्कम न जमा झाल्याने आता महापालिकेकडून जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. पुढील आठवड्यापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ऐन निवडणूक काळात कार्यालय जप्त झाल्यानंतर त्याचा लिलावही केला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेससमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

१६५४ थकबाकीदारांना नोटिसा

आर्थिक वर्ष संपत आल्याने महापालिकेने करवसुली मोहीम तीव्र केली आहे. पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेल्या ११५२ मिळकतधारकांना पहिल्या टप्प्यात जप्ती वॉरंट बजावल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ५०२ थकबाकीदार मिळकतधारकांना जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १६५४ थकबाकीदारांवर अशा प्रकारे कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढणार आहे. दरम्यान, महापालिकेची वसुली ही शंभर कोटींच्या पार गेली आहे.

दोनशे नळजोडण्या तोडल्या

पाणीपट्टीच्या थकीत करवसुलीसाठी महापालिकेने मोहीम तीव्र केली असून, पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ३३ हजार नळजोडणी धारकांना नोटिसा बजावल्यानंतर आता थकबाकी न भरणाऱ्यांच्या नळजोडण्या तोडण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल २०० थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणीपट्टीची वसुली ही ४२ कोटी ३८ लाखांवर पोहचली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रचारापेक्षा मानपानावरच खल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मदत न केल्याने काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाले. असे असताना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का म्हणून आपण मदत करावी, अशी खदखद काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी व्यक्त केली. आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी त्यांचे कुटुंबीय प्रभागात येऊन जातात, तरीही स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जात नाही. आदरभाव दाखविला जात नसल्याबद्दलही या वेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर (जिल्हा) व ग्रामीण (जिल्हा) काँग्रेस प्रभारी पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवनात बुधवारी दुपारी एकला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, रतन जाधव, रमेश कहाडोले, सुनील आव्हाड आदी उपस्थित होते.

शहरासह जिल्हाभरातून आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत न केल्याने महापालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे शल्य हनीफ बशीर यांनी बोलून दाखविले. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, भुजबळ कुटुंबीय प्रभागात प्रचाराला येतात तरी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांप्रती त्यांच्याकडून आदरभाव दाखविला जात नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अपमानाचे घोट गिळून लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असे ते म्हणाले. मनमाड येथील माजी नगराध्यक्ष रहेमान शाह यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. नाशिकरोड येथील एका पदाधिकाऱ्यानेही अशीच भावना व्यक्त केली. हेवेदावे सोडून राहुल गांधी यांचे सत्तेचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी योगदान द्यावे, अशी अपेक्षा गायकवाड आणि चौधरी यांनी व्यक्त केली. नाशिक, दिंडोरीसह धुळे येथील आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मनापासून काम करा, असे आवाहन शहराध्यक्ष आहेर यांनी केले. अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी उमेदवारांच्या विजयासाठी जिल्हा पिंजून काढणार असल्याचे सांगितले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, सुरेश मारू यांनीही मनोगत व्यक्त केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्तेमध्ये आणायचे आहे. त्यामुळे आघाडीने आपल्या मतदारसंघांमध्ये दिलेल्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी योगदान द्या, असे आवाहन करीत काँग्रेसचे नाशिक लोकसभा समन्वयक माजी आमदार शिरीष चौधरी, दत्ता गायकवाड यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कान फुंकले. राहुल गांधी यांच्या सत्तास्थापनेच्या स्वप्नपूर्तीसाठी काँग्रेस मरगळ झटकून निवडणुकीच्या रणधुमाळीत सक्रिय होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठरोडला तडीपारास अटक

$
0
0

पेठरोडला

तडीपारास अटक

पंचवटी : पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याने नाशिक शहर तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतांना पेठरोड म्हसोबा झोपडपट्टी वास्तव्य करणाऱ्या संदीप पगारे या संशयित तडीपाराला पंचवटी पोलिसांनी अटक केली. पंचवटी पोलिसांना संदीप पगारे हा कोणतीही परवानगी न घेता पंचवटी हद्दीत वास्तव्य करीत असल्याचे शनिवारी (दि.२३) रात्री आढळून आले होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटकोंटी फुटणार

$
0
0

२७५५ प्लॉटधारकांनी जागा केली वर्ग, एफएसआय मिळण्याचा मार्ग होणार मोकळा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या बांधकाम व्यावसायिकांच्या मागे गेल्या चार वर्षांपासून लागलेले कपाटाचे ग्रहण आता हळूहळू दूर होत असल्याचे चित्र आहे. कंपाउंडिंग पॉलिसी अंतर्गत नगररचना विभागाकडे कपाट क्षेत्राशी संबंधित दाखल असलेली २७५५ प्रकरणांमागील शुक्लकाष्ट संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित विकसकानी ६ आणि ७.५ मीटर रस्ते नऊ मीटरपर्यंत रुंदीकरणासाठी महापालिकेकडे अखेर जागा सुपूर्द केली आहे. या जागांवर महापालिकेचे नाव लावू दिल्याने आता त्यांना अतिरिक्त एफएसआय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, कपाटकोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

शहरातील बांधकाम व्यावसायिक गेल्या तीन ते चार वर्षांपासून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोंडीत सापडला आहे. कधी एनजीटीची बंधी, कधी डीसीपीआरमधील गोंधळ, टीडीआर धोरण, प्रीमियम बंदी, त्यात नव्याने आलेल्या ऑटो डिसीआरमुळे बांधकाम व्यावसायिक संकटात सापडले. टीडीआर धोरणामुळे सरकारने ६ आणि ७.५ मीटरवरील रस्त्यांवर टीडीआर व एफएसआयवर बंदी आणल्याने बांधकाम व्यवसायाचे कंबरडेच मोडले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कपाट प्रकरणावर प्रहार केला. कोंडी टीडीआरमुळे सुटेल अशी अपेक्षा असतानाच टीडीआर धोरणामुळे पुन्हा संकट ओढ‌ले होते. या सर्वांना राज्य शासनाने कलम २१० अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्याचा पर्याय दिला होता. त्यानुसार ६ मीटर रस्ता ९ मीटर करणे आणि ७.५ मीटर रस्ता ९ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार आतापर्यंत २७५५ प्लॉटधारकांनी महापालिकेकडे जागा रुंदीकरणाचे प्रस्ताव दाखल करून देत महापालिकेचे नाव सातबाऱ्यावर लावून दिले आहे. या सर्व प्लॉटधारकांना आता अतिरिक्त एफएसआय मिळणार असून, कपाटकोंडी फुटणार आहे. तसेच, पालिकेला शंभर कोटींचाही महसूल मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरच्या शौचालय स्वच्छतेला ‘मुहूर्त’

$
0
0

महापालिका प्रशासनाला अखेर आली जाग

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नांदूरगावच्या सुलभ शौचालयामागे अस्वच्छता असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. 'दुर्गंधीने नागरिक त्रस्त' अशी बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये सोमवारी (दि. २५) प्रसिद्ध होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची दखल घेत परिसराची तात्काळ स्वच्छता केली.

हागणदारीमुक्तीचा दावा करणाऱ्या महापालिका हद्दीतील नांदूरगावातील सुलभ शौचालयामागे साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरली होती. हा परिसर अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त झाल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. येथील दूरवस्थेचे स्थिती 'मटा'ने मांडताच त्याची आरोग्य विभागाने त्वरित दखल घेतली.

शौचालयाला जोडलेली ड्रेनेज लाइन बंद आहे की अन्य काही कारणामुळे येथील घाण वाहून जाण्यास अडचण येत आहे, याची साधी पाहणी देखील प्रशासनाकडून केली जात नव्हती. त्यामुळे येथील समस्या गंभीर बनली होती. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याचे या प्रकारावरून लक्षात येत होते. दुर्लक्षित असलेल्या या भागात शौचालयाची दुरवस्था झाली आहे. घाणीबरोबरच प्लास्टिक आणि जुन्या कपड्यांचा कचराही मोठ्या प्रमाणात साचला होता. त्याचीही अखेर स्वच्छता करण्यात आली.

स्थानिकांकडून वापर

नांदूर गावठाणमध्ये नाल्यालगतच्या सुलभ शौचालयातून बाहेर पडणारी घाण ड्रेनेज लाइनमधून वाहून जात नव्हती. याउलट ती नाल्याच्या बाजूने उताराने वाहून परिसरात साचली होती. तेथील खोलगट भागात घाण साचत असल्याने त्याची दुर्गंधी पसरत होती. नांदूरगावात अनेक घरांमध्ये अजूनही शौचालये नाहीत. त्यामुळे या सुलभ शौचालयाचा वापर होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊन तापले, रस्ते मोकळे

$
0
0

सनकोट, रुमालांना वाढली मागणी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्चअखेरीस दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. या कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे नाशिककरांना नकोसे होऊ लागले असून, त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हाळ्यातील तीव्र सूर्यकिरणांचा त्वचेवर घातक परिणाम होण्यासही सुरुवात झाली असल्याने त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनकोट, रुमाल, हातमोजे यांना मागणी वाढू लागली आहे.

वाढत्या उन्हामुळे नाशिककरांच्या अंगाची लाहीलाही होत असून, नाशिककर मार्च महिन्यातच हैराण झाले आहेत. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शहरवासीयांची पावले रसाची दुकाने, कापड मार्केट यांकडे वळू लागली आहेत. कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले असून, लवकरच चाळिशी गाठण्याची शक्यता आहे. कडक उन्हामुळे त्वचा रापत, काळी होत असल्याने त्वचेचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे रुमाल, सनकोट, हातमोजे, सनस्क्रिन लोशन घ्यायला गर्दी होत आहे. याबरोबरच, दुपारी घरातून बाहेर निघण्याचे टाळण्यात येत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.

....

\Bबाजारात शुकशुकाट\B

एरवी बुधवारचा बाजार दिवसभर गजबजलेला दिसून येत असला तरी कडाक्याच्या उन्हामुळे बाजारातही शांतता दिसून आली. डोक्यावर छत्र्या, छप्पर आदींची तयारी करूनच विक्रेते बाजारात दाखल झाले होते.

...

मार्चच्या सुरुवातीपासूनच रुमाल, सनकोट्सला मागणी सुरू झाली आहे. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून ही मागणी दुपटीने वाढली आहे. फिक्या रंगाचे कापड असलेल्या सनकोट, रुमालाला अधिक पसंती मिळते आहे.

- अतुल भोळे, विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिणाबाईंच्या कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा जागर नुकताच झाला. मंजुषा सोमण यांचे निवेदन आणि गीता गद्रे यांनी स्वरबद्ध केलेल्या या कविता ऐकतांना उपस्थित प्रत्येकालाच आपल्या आयुष्याचे बोलके चित्रण डोळ्यासमोर उभे राहिले. अक्षरांशी ओळख नसल्याने त्यांना निरक्षर म्हणणे योग्य आहे मात्र अशिक्षित म्हणणे अयोग्य असल्याचा विचार मंजुषा सोमण यांनी मांडला आणि उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी असे रोजच्या जीवनातील आहेत. गीता गद्रे यांनी सादर केलेल्या रचनांतून शेती, सणवार आदी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. गीता गद्रे यांनी याच स्वरबद्ध केलेल्या शब्दांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.'आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!' किंवा 'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' अशा किमान शब्दांत अर्थाची कमाल गाठणारे शब्द, 'अरे संसार संसार.. या त्यांनी सादर केलेल्या रचना बोलक्या होत्या. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारं शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान हा बहिणाबाईंच्या रचनेचा नेमका बाज मंजुषा सोमण आणी गीता गद्रे यांनी सांभाळला. विकास आणी अनुराधा गरुड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात दरोडेखोर जेरबंद

$
0
0

सिनस्टाइल पाठलागनंतर तिघांना अटक; दोन फरार

...

- आडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील घटना

- दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

- दरोड्याचे साहित्यही हस्तगत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सराफी दुकान फोडत असताना पोलिस आल्याने सराईत दरोडेखोरांना पळता भुई थोडी झाली. चोरीच्या कारमधून दरोडेखोरांनी पलायनाचा प्रयत्न केला. आडगाव पोलिसांनी संशयित आरोपींचा पाठलाग केला. अगदी सिनेस्टाइल पद्धतीने आरोपी आणि पोलिसांमध्ये गोळीबारसुद्धा झाला. प्रयत्नांअंती पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली. ही यशस्वी कामगिरी करणाऱ्या पथकाला पोलिस आयुक्तांनी ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.

राजेश गोलासिंग टाक (वय २५, रा. संजयनगर, अहमदनगर, हल्ली भीमवाडी, गंजमाळ), सुनीलसिंग जुनी, हरदीपसिंग बबलू टाक (दोघे रा. संजयनगर, काटून खंडोबा, अहमदनगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अमनसिंग टाक (रा. गंजमाळ), सुनीलसिंगचा मित्र (नाव गाव नाही) असे दोघे संशयित मात्र फरार झाले आहेत.

आडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील वृदांवननगर येथील साकार युग इमारतीत ऋषिकेश कुलथे यांचे आर. जे. ज्वेलर्स हे सराफी दुकान असून, वरील संशयित हे दुकान फोडण्याच्या तयारीत आले होते. दरोड्याच्या पूर्ण तयारीनिशी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित दुकानाजवळ पोहचले. संशयितांच्या संशयास्पद हालचाली असल्याने एका सजग नागरिकांनी लागलीच ही माहिती आडगाव पोलिस ठाण्याला कळविली. ठाणे अंमलदाराने हा संदेश गस्तीवरील पथकांपर्यंत तसेच कंट्रोल रूमला कळविला. रात्र गस्तीवर नियंत्रण ठेवणारे अधिकारीसुद्धा यामुळे सजग झाले. वृदांवननगरपासून सर्वात जवळ असलेले गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे, चालक झेंडे, आरटीपीसी विनोद पाटील, गुन्हे शोध पथकातील हवालदार लक्ष्मण बोराडे, पोलिस नाईक अनिल केदारे, मिथून गायकवाड यांच्या पथकास संशयिताची कार (एमएच १५, बीडी ९०६६) दिसली. पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहून आरोपीने पलायन सुरू केले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. भरधाव वेगातील कार हॉटेल विहान येथील कच्चारोडने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार तीनवेळा पलटी झाली. पाठीमागून पोलिसांचे पथक आले. मात्र यावेळेपर्यंत कारमधील चौघे संशयित कारमधून बाहेर पडले. आपल्या पाचव्या साथिदाराला ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांची कार जवळ येताच संशयितांनी पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. पीएसआय घाडगे यांनीसुद्धा इशारा देऊन एक राउंड फायर केला. मात्र, यामुळे चौघे संशयित फरार झाले. कारमधील संशयित राजेश टाक याने बाहेर येऊन पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. घटनास्थळावरून फरार झालेल्या हरदीपसिंग टाक आणि सुनीलसिंग टाक यांना रेल्वे पोलिसांनी मनमाड येथून अटक केली. हे सर्व सराईत गुन्हेगार असून, मागील १५ दिवसांपासून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी करून दरोड्याचा प्लॅन आखला होता.

...

नागरिक, आडगाव पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित मिळून केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळाले. आडगावच्या पथकाने खूप चांगली कामगिरी केली. यामुळे परजिल्ह्यातील तसेच, परराज्यातील गुन्हेगार नाशिकच्या दिशेने येताना विचार करतील.

- विश्वास नांगरे पाटील, पोलिस आयुक्त

...

गस्ती पथकाला ३५ हजारांचे बक्षीस

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असून, त्यांच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी गोळीबार केला तरीही गस्ती पथकाने त्यातील एका संशयितास अटक केली. त्यामुळे पथकाला ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जाहीर करीत सर्वांचा सत्कार केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली आणि या कारवाईचे समन्वय करणारे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनाही पोलिस आयुक्तांनी शाबासकीची थाप दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रभाग समित्यांना हिरवा कंदील?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ येत्या ३१ मार्च रोजी संपत येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असली तरी, या नवीन सभापतींच्या निवडीसाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागीय महसूल आयुक्तांकडे सभापती निवडीचा प्रस्ताव पाठविला आहे. या निवडीला आचारसंहितेची अडचण येत नसल्याने या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता असल्याने एप्रिलच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने निवडणुकांसाठी निवडणूक शाखेची परवानगी आवश्यक असते. पालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीसह सभापतीपदाची निवडणूक या कारणामुळेच रखडली आहे. जिल्हा निवडणूक शाखेंने महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीबाबत संभ्रमाचे उत्तर दिल्याने आता प्रभाग समित्यांची तसेच विषय समित्यांची निवड रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

प्रभाग समित्यांची सभापतीपदाची मुदत ही ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक घेणे आवश्यक असून, त्यांचा आर्थिक लाभाशी कोणताही संबंध नसल्याने प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा विभागीय आयुक्तांकडून जाहीर केला जातो. त्यामुळे आचारसंहितेच्या कात्रीत या निवडणुका अडकणार नसल्याचा दावा करत नगरसचिव विभागाने सहाही प्रभाग सभापतींच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याकरीता विभागीय महसूल आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. विभागीय आयुक्तांकडून या सभापती निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, विषय समित्यांच्या निवडणुकांबाबत मात्र अजूनही संभ्रम कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी रजेवर, जबाबदारी वाऱ्यावर!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहरातील तिन्ही सेतू कार्यालयांद्वारे रेशन कार्डसाठी सादर करण्यात आलेले शेकडो अर्ज गेल्या दोन ते तीन महिन्यांपासुन धान्यवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धूळ खात पडलेले असल्याचे स्पष्ट झाले. आगोदरच मनुष्यबळाची कमतरता असलेल्या या कार्यालयातील बहुतेक कर्मचारी निवडणूक कामासाठी जुंपण्यात आल्याने आणि धान्य वितरण अधिकारीही वैद्यकीय रजेवर गेल्याने रेशनकार्ड वितरण ठप्प पडले आहे. अधिकारी रजेवर आणि जबाबदारी वाऱ्यावर, अशी स्थिती सध्या या कार्यालयाची झाली आहे.

शहरात सध्या नाशिकरोड, सिडको आणि पंचवटी अशा तिन्ही ठिकाणी जिल्हा सेतू केंद्र सुरू आहेत. या सेतू केंद्रांकडे नवीन रेशनकार्ड काढणे, नावे वगळणे, नावे वाढविणे, दुरुस्ती करणे अशा स्वरुपाचे अर्ज सादर केली जातात. या सेतू केंद्रांकडे प्राप्त झालेल्या अर्जानुसार डाटा एंट्रीसाठीचा ठेका दिलेल्या साक्षात महिला आदिवासी संस्थेतर्फे ऑनलाइन डाटा अपलोड केला जातो. या संस्थेतर्फे युआरसीआयडी नंबर दिला जातो. त्या आधारे नाशिकरोड येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयात या माहितीची खातरजमा केल्यावर सदरचा अर्ज धान्य वितरण अधिकाऱ्यांकडे सहीसाठी जातो. त्यानंतरच नवीन रेशन कार्ड मिळते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासुन रेशनकार्ड वितरण ठप्प झाले आहे. रेशनकार्ड वितरण ठप्प झाल्याने नागरिकांवरही धान्यवितरण अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.

आधारक्रमांक लिंकिंगही चुकीचे

अनेक नागरिकांचे आधारक्रमांक भलत्याच नागरिकांच्या रेशनकार्डला लिंक झाल्याचे प्रकार उघड होऊ लागले आहेत. नाशिकरोड येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयात याविषयीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांचे आधारक्रमांक शेजारील धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या रेशनकार्डला लिंक झाल्याचे प्रकार घडलेले असल्याने सबंधित नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. परंतु नाशिकरोड येथील धान्यवितरण अधिकारी मनिषा राशनकर या एक महिनाभर रजेवर गेलेल्या असल्याने ही सर्व कामे ठप्प पडलेली आहेत. या सर्व परिस्थितीचा गैरफायदा एजंट लोकांकडून घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जैन समाजातीलजागृतीचे कार्य मोठे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आचार्य आर्यनंदी महाराजांना जैन समाजातील पहाटेचा शुक्रतारा म्हटले जाते. त्यांनी जैन समाजात मोठ्या प्रमाणात जागृती केली. जैन समाजातील आंतरजातीय बंधने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गुरुकुल स्थापन करून जैन समाजात शैक्षणिक क्रांती केली,' असे उद्गार जैन धर्माचे अभ्यासक व ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. गजकुमार शहा यांनी काढले.

दिगंबर जैन सैतवाल मंडळातर्फे आचार्य आर्यनंदी महाराजांच्या ११२ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी सैतवाल जैन मंडळाचे अध्यक्ष दीपक काळे, सतीश मुद्दलकर, जीवन बिटोडे, विनोद आंबेकर, शरद सराफ, बबलू जैन आदी उपस्थित होते.

शहा म्हणाले,'तीर्थरक्षा कमेटीसाठी एक कोटी रुपयांचा फंड जमा करून जैन तीर्थक्षेत्रांचे रक्षण करणे हे मोठे काम आहे. समाजातील श्रावकांवर उत्तम संस्कार व्हावेत म्हणून ठिकठिकाणी पाठशाळा सुरू केल्या. जुन्या मंदिरांचा जीर्णोध्दार केला. मंडळाचे कोषाध्यक्ष मुद्दलकर यांनी कचनेर येथे झालेल्या सभेची माहिती दिली. मंडळाचे मार्गदर्शक अरुण भागवतकर यांनी मंडळाच्या स्थापनेमागील पार्श्वभूमी सांगितली. नीलिमा अथतकर यांनी आर्यनंदी महाराजांची माहिती सांगून पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे दीपक काळे होते. स्वाती माडीवाले यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालार्थ आयडीच्या फाइल्स निघणार निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालार्थ आयडीच्या गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित फाइल्स निकाली काढण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले असून, येत्या १ एप्रिलपासून त्याची अंमलबाजवणी करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिले आहे. पुणे येथे शिक्षण संचालक व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकारी बैठकीत याविषयी माहिती देण्यात आली.

शालार्थ आयडीचे सर्व अधिकार शिक्षण उपसंचालक व विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत. परंतु, प्रत्यक्षात हे कामकाज सुरू झालेले नाही. १ एप्रिलपासून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण संचलाकांनी मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत दिले. नाशिक विभागाच्या ३४७ फाइल गेल्या तीन वर्षांपासून शिक्षण संचालक कार्यालयात पडून होत्या. या सर्व फाइल तपासून दहा दिवसांच्या आत शालार्थ आयडी देण्याचे आश्वासन शिक्षण संचालाकांनी मुख्याध्यापक संघाला दिले. याबाबत राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना व उपसंचालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालार्थ आयडी देण्याबाबत कागदपत्रांची पडताळणी कशी करावी व पडताळणी करून दहा दिवसाच्या आत त्या फाइलवरती निर्णय द्यावा लागणार असून, याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शालार्थ आयडीसाठी शिक्षकांची मोठी फरफट यामुळे थांबणार असल्याने मुख्याध्यापक संघाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीसाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, संजय देसले, प्रकाश पानपाटील, भरत गांगुर्डे, ए. बी. काटे, संगिता बाफना, सुरेश शेलार उपस्थित होते.

\Bबैठकीत अनेक विषयांवर चर्चा\B

बैठकीत १८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार शाळांच्या मुल्यांकनाबाबत फेर मूल्यांकन करून घ्यावे, वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत पूर्वीप्रमाणे हमीपत्रवर मान्यता घ्यावी, शाळा सिद्धीमधील ए ग्रेड ही अट त्वरीत रद्द करावी, १४ नोव्हेंबरच्या शासन आदेशाने राज्यातील मुख्याध्यापकांच्या मान्यता प्रलंबित आहे. याबाबत त्वरीत निर्णय घेऊन मान्यता देण्याचे काम सुरू करावे, राज्यभरातील आकृतीबंधाबाबत एप्रिल मे महिन्यात संच मान्यता कम्प लावून भरतीला परवानगी द्यावी, अशा मागण्यांबाबत संचालकांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अनुकंपा तत्त्वाखाली सर्वांना १० एप्रिलपर्यंत मान्यता देणे, अर्धवेळ शिक्षकांच्या बाबतीत त्यांना शालार्थ आयडी देऊन जूनपर्यंत त्यांचे पगार ऑनलाइन करणे, अर्धवेळ ग्रंथपाल पूर्ण वेळ करण्याच्या प्रक्रियेत सेवाज्येष्ठता यादी एप्रिलमध्ये प्रसिद्ध केले जाईल, असे संचालकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोक्का’ लावणार

$
0
0

पोलिस आयुक्तांचे निर्देश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सराफी दुकान फोडण्याच्या तयारीत शहरात दाखल झालेल्या संशयित दरोडेखोरांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. चोवीस तासांच्या आत दोन ठिकाणी वाहनचोरी, दोन ठिकाणी दरोड्याचा असफल प्रयत्न, पोलिसांवर हल्ला असे क्रमाने गुन्हे केले. या सराईतांवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल असून, या टोळीचे कृत्य मोक्कासाठी फिट असल्याने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

हरदीपसिंग बबलू टाक हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, त्याच्याविरूद्ध दरोडा, दरोड्याची तयारी, लूटमार यांसह गंभीर स्वरूपाचे किमान ३९ गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील उर्वरित संशयितांविरुद्ध किमान १० ते १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील एक सदस्य असलेला राजेश गोलासिंग टाक या संशयिताचे गंजमाळ येथे सासूरवाडी आहे. त्यामुळे त्याने मागील १५ दिवसांपासून विविध भागात रेकी करून त्याची माहिती इतर आरोपींना दिली. या टोळीने इंदिरानगर भागातून एमएच १५ बीडी ९०६६ ही इंडिका कार चोरी केली. यानंतर टोळीने थेट सायखेडा गाठले. तिथे एका ठिकाणी सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश मिळाले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी पुन्हा शहरात दाखल झाली. आडगाव परिसरातील वृदांवननगर येथे त्यांनी पुन्हा सराफी दुकानास लक्ष्य केले. मात्र, दुकानमालकास याची माहिती मिळाली. वायफाय कनेक्ट असलेल्या सीसीटीव्हींमुळे दुकानमालकास हा प्रकार पाहता आला. त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली आणि टोळीचा हा प्रयत्न फसला. पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या चौघांपैकी सुनीलसिंग जुनी आणि हरदीपसिंग टाक यांनी पंचवटीतून एक दुचाकी चोरी केली. यानंतर त्यांनी मनमाड गाठले. मात्र तेथे शहर पोलिसांची आधीच सूचना पोहचलेली असल्याने रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली. या टोळीने गुन्हे करण्याचा कळस केला असून, याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, आर. आर. पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कारमूर्तींचे कार्य समाजाला दीपस्तंभासारखे

$
0
0

अॅड. अविनाश भिडे यांचे प्रतिपादन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नि:स्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणाऱ्या गुणवंतांचा पूर्णवाद परिवारातर्फे झालेला गौरव हा त्यांच्या कार्याची पावती असून, त्यांच्या नि:स्वार्थ कार्याने समाजातील सर्वांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ अविनाश भिडे यांनी केले. नाशिकमध्ये आयोजित पूर्णवाद विद्या कला नीती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

या समारंभात वेदांचा प्रचार व प्रसार करणारे औरंगाबादचे वे. मु. श्रीराम धानोरकर गुरुजी यांना पूर्णवाद विद्या पुरस्कार, अहमदनगरच्या प्रख्यात चित्रकार अनुराधा ठाकूर यांना पूर्णवाद कला उपासक पुरस्कार व परभणीचे सुभाकरराव जोशी (हिंगणीकर) यांना पूर्णवाद समाजभूषण नीती पुरस्काराने गौरविण्यात आले.

समाजात सध्या असलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी या पुरस्कारार्थींचे कार्य दीपस्तंभासारखे असून, उद्याचे भविष्य असलेल्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रसाद मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात वेदमंत्र पठण व श्री सरस्वती स्तवनाने करण्यात आली. पुरस्कारामागची भूमिका विषद करताना राहुल भावे म्हणाले, की हे पुरस्काराचे बारावे वर्षे असून, जीवनाशी निगडीत विविध रंगांचे प्रतिनिधित्व या पुरस्कार्थींच्या कार्यात आढळते. डॉ. विष्णू महाराज सातारकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या पुरस्काराने जीवनातील महत्त्वाच्या अशा कला, विद्या व नीतीचे महत्त्व अधोरेखित होते.

याप्रसंगी विशेष उपस्थित पूर्णवाद भूषण गुणेशदादा पारनेरकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की विद्या व कलेला नीतीच्या माध्यमातून जोडणे म्हणजे पूर्णवाद. आधुनिकतेशी जवळीक करताना शास्त्र व परंपरा समजून घ्या, असे पूर्णवाद सांगतो. वेद व कला यांनी देशाला बांधून ठेवले असून, जो आचरणाने बांधील पण विचाराने मोकळा तो भारतीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. नरेंद्र जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबाद रोडवर तीन लाखांचा दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद रोडवरील मंडलिक मळ्याजवळ एका बंद सदनिकेचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. २८) रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मखमलाबाद रोडवरील शिवनेरी प्राईड इमारतीत राहणाऱ्या सुजित प्रभाकर खांदवे यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. खांदवे हे मंगळवारपासून दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथे शेतावर गेले होते. त्याच कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सुमारे ६ तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. इमारतीत राहणाऱ्या सदस्याला गुरुवारी सकाळी खांदवे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. याबाबत त्यांनी खांदवे यांना माहिती दिली. खांदवे तातडीने घरी आले. त्यांना घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच सव्वा लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घरफोडी तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शस्रे बाळगल्याने भगूरला दोघांना अटक

$
0
0

शस्रे बाळगल्याने

भगूरला दोघांना अटक

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर बस स्थानक परिसरात अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने दोन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

प्रेम उर्फ सनी बाजीराव कदम आणि जुबेर महम्मद हनीफ हनीफ जुबेर अशी शस्रे बाळगणाऱ्या दोघांची नावे आहेत. तलवार व पिस्तूल घेऊन ते अन्य साथीदारांसह भगूर बस स्थानक आवारात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक विजय लोंढे, शामराव भोसले, विजय पगारे व पोलिस नाईक गुलाब सोनार आदींच्या पथकाने या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शालीत गुंडाळलेली तलवार आणि एअर पिस्तूल हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’ लोकसभेनंतरच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलविण्याची परवानगी मागणाऱ्या महापालिका प्रशासनाला जिल्हा निवडणूक शाखेच्या आचारसंहिता कक्षाने सदस्य नियुक्तीबाबत स्पष्ट उत्तर न दिल्याने महापालिकेने आता तुर्तास लोकसभा निवडणूक होईपर्यंत सदस्य निवडीचा विषय थांबवला आहे. स्थायी समिती सदस्य पद हे लाभाचे पद असल्याने आणि शिवसेनेकडून सदरचा विषय उच्च न्यायालयात नेला जाण्याची शक्यता असल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तुर्तास स्थायीच्या सदस्य निवडीवर पडदा टाकला आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य निवडीसह सभापती निवडीची प्रक्रिया आता लोकसभा निवडणुकीनंतरच होणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीवर सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महापालिकेत भाजप नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे भाजपची सदस्य संख्या एकने कमी झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीवर सदस्यत्वाचे गुणोत्तर प्रमाण देखील बदल्याचा दावा करत, शिवसेनेने भाजपचा एक सदस्य कमी करून शिवसेनेचा सदस्य नियुक्ती मागणी केली आहे. शिवसेनेच्या पाच सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्त व उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विभागीय आयुक्तांकडे तर विभागीय आयुक्तांनी महासभेचा अधिकार असल्याचा निकाल देत, महासभेच्या कोर्टात चेंडू टाकला होता. सदस्य नियुक्तीचा निर्णय आता महासभेवर निर्णय घ्यायचा असल्याने आणि सध्या आचारसंहिता सुरू असल्याने नगरसचिव विभागाने जिल्हा निवडणूक शाखेतील आचारसंहिता कक्षाशी पत्रव्यवहार करत विशेष महासभा बोलविण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात स्थायी सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा घ्यावी की नाही, याबाबत या पत्रात थेट मार्गदर्शन न करता आचारसंहितेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देर्शित केलेल्या सूचनांमधील प्रश्न क्रमांक २७ मधील उत्तरानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अस्पष्ट उत्तर दिले होते. त्यामुळे आयुक्तांच्या उपस्थितीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार होता. त्यामुळे आयुक्त गमे सुटीवरून परतल्यानंतर गुरुवारी नगरसचिवांनी सदरचे प्रकरण त्यांच्यापुढे ठेवले. आयुक्तांना महसुली कामाचा अनुभव असल्याने त्यांनी पुन्हा स्वयंस्पष्ट अहवाल मागवण्याऐवजी सदरची नियुक्ती लोकसभा निवडणुकीनंतरच करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायीचे सदस्यपद आणि सभापतीपद हे लाभाचे असल्याने लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतरच निवडणूक घ्यावी या निर्णयापर्यंत आयुक्त आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाशी आता संपर्क न करण्याचे आदेश त्यांनी नगरसचिवांना दिले आहेत. त्यामुळे स्थायीचे सदस्य निवडीसह सभापती निवड ही आता लोकसभा निवडणुकीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे क्लोजिंग शनिवारीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रिझर्व्ह बँकेने रविवारी (३१ मार्च) देखील बँकांना आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिले असले तरी महापालिकेच्या वित्त विभागाने त्याला बगल देत, पालिकेचे आर्थिक व्यवहार ३० मार्चपर्यंतच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० तारखेनंतर कामांची देयके स्विकारले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण वित्त विभागाने दिले आहेत. मार्च महिना पूर्ण झाल्यानंतर देयके स्विकारणार नसल्याचा निर्णय घेतल्याने देयके सादर करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू झाली आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने मार्चमध्ये जवळपास ५०० कोटींची देयके अदा करण्यात आली आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिकेच्या वित्त विभागाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच देयके काढून घेण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू आहे. महापालिकेने ठेकेदारांना देयके सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. परंतु, तरीही ठेकेदारांकडून हळूहळू देयके सादर करण्यात येत आहेत. आतापर्यंत बांधकाम विभागाकडून सर्वाधिक देयके सादर करण्यात आली आहेत. त्या देयकांपोटी वित्त विभागाने पाचशे कोटी रुपये अदा केले आहेत. २५ मार्चपर्यंत देयके सादर करण्याचे आदेश देवूनही अद्यापही काही विभाग प्रमुखांकडून देयके सादर केली जात असल्याने वित्त विभागाचे गणित बिघडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढलेले आदेशच अंतिम मानून आता देयके स्विकारणे बंद केले जाणार आहेत. ३१ मार्च अखेरचा दिवस असला तरी, त्या दिवशी रविवार असल्याने महापालिकेला सुटी असल्याने महापालिकेने लेखा विभागाचे दप्तरे ३० मार्च रोजी क्लोज करण्याचे आदेश दिले आहेत.

थेट आरटीजीएस

वित्त विभागाकडे देयके मिळविण्यासाठी ठेकेदारांची रिघ लागते. त्यातून टक्केवारीला चालना मिळत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठेकेदारांचे देयकांची रक्कम थेट बँकेत जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 'आरटीजीएस'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देयके ठेकेदारांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने यंदा वित्त विभागात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त गर्दी दिसून येत नव्हती. थेट आरटीजीएस होत असल्याने दलालांची संख्याही रोडावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डोंगरार्त’चा झेंडा फडकला

$
0
0

राज्य नाट्य स्पर्धेत सात पारितोषिके

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित ६६ व्या राज्यस्तरीय कामगार नाट्य महोत्सव व ११ वा औद्योगिक व व्यावसायिक कामगार राज्यस्तरीय नाट्य महोत्सव, चंद्रपूर येथे झालेल्या कामगार कल्याण राज्य नाट्य स्पर्धेत नाशिकच्या 'डोंगरार्त' नाटकाने सात पारितोषिके पटकावली.

स्पर्धेत सांघिक गटामध्ये द्वितीय : डोंगरार्त, दिग्दर्शनसाठी द्वितीय : पल्लवी पटवर्धन, अभिनयासाठी द्वितीय : अपर्णा क्षेमकल्याणी, अभिनयासाठी द्वितीय : योगेश वाघ, संगीतासाठी द्वितीय : आनंद ओक, गौरव खैरनार, नेपथ्यासाठी तृतीय : श्याम लोंढे, प्रकाश योजनेसाठी द्वितीय : प्रफुल्ल दीक्षित यांना पारितोषिके जाहीर झाली आहेत.

रुदाली विषयावर प्रकाश टाकणारं आणि शोषित महिलांच्या आयुष्यावर बेतलेलं नाटक डोंगरार्त. राजस्थानी भाषेचा लेहजा मराठीतून सांभाळत पुढे सरकणारे नाटक म्हणजे मराठी नाट्य रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरत आहे. स्त्री जीवनाच्या अंधाऱ्या वाटा अतिशय वास्तववादी पद्धतीने या नाटकातून मांडल्या आहे. त्यामुळेच रसिकांची चांगलीच दाद या नाटकाला मिळत आहे.

असे आहे कथानक

रुदालीचे आयुष्य जगणाऱ्या चार बायकांची ही कथा आहे. मा, जलपा, सावित्री, मोरणी या चौघी एकाच घरात राहून स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. एकमेकींशी केवळ बाईपणाच्या धाग्यात बांधल्या गेलेल्या या बायका आहेत. या घरातील तरुण मोरणीला या तिघींपैकी तिची आई कोण हे माहीत नसते. लग्नाचे फेरे संपण्याच्या आत विधवा झालेल्या मोरणीला घेऊन सावित्री घरी येते आणि या बायकांच्या नात्यात सुरुंगाचे स्फोट व्हायला सुरुवात होते. घरातील कर्त्या स्त्रीचे स्थान असलेल्या जलपाच्या अस्तित्त्वालाच आव्हान देऊ बघणाऱ्या मोरणीला सांभाळत असताना पूर्ण घराला बाईपणाची उब देणाऱ्या सावित्रीची दमछाक होत आहे. परिस्थितीच्या तडाख्यामुळे मौन झालेली मा, मोरणीची शिक्षणाची आस, जलपाच्या राठ वागण्यात दडलेली स्त्री या सगळ्यांना सांभाळत भूतकाळातील घटनांना उरात दाबत जगणारी सावित्री या कुटुंबातील खऱ्या अर्थाने वर्तमानात जगणारी स्त्री आहे. या सगळ्यांनाच ज्याच्या त्याचा डोंगर पार करून सुखाचा शोध घ्यायचा आहे. पण प्रत्येकीचा रस्ता वेगळा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानाचा पारा चाळिशी पार

$
0
0

\Bगुरुवारी नाशिकचे तापमान ४०.४ अंशांवर

...

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात उष्णतेची लाट दिवसागणिक तीव्र होत असून, कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. उन्हाच्या चटक्यांनी नाशिककरांना मार्च महिन्यातच हैराण केले आहे. गुरुवारी ४०.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवातीपासून राज्यात तापमानाचा पारा सर्वत्र वाढत आहे. यामुळे नाशिककरांनाही कडक उन्हाचा अनुभव येत आहे. गुरुवारी तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेला. दिवसभर अंगाची लाहीलाही करणारे ऊन होते. दिवसभर तीव्र झळा बसत होत्या. रात्रीसुध्दा नाशिककरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. २६ मार्चपर्यंत तापमान ३८ अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. २७ मार्च रोजी त्यात वाढ होऊन ३८.५ अंश सेल्सिअस इतके झाले. गुरुवारी दोन अंशांनी वाढ होत कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. यामुळे नाशिककर मार्च महिन्यातच हैराण झाले आहेत.

..

\Bथंड पदार्थांकडे वळली पावले\B

उन्हापासून संरक्षण करण्याबरोबरच गारवा मिळविण्यासाठी शहरवासीयांची थंड पदार्थांकडे पावले वळली आहेत. ऊस, लिंबाचा रस, वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेत शरीराला गारवा देण्यास प्राधान्य दिले जात आहे. शहरात ठिकठिकाणी रसाची गुऱ्हाळे, ज्युसची दुकाने थाटलेली असून, येथे गर्दी होताना दिसत आहे.

...

मालेगाव @ ४२ अंश

मालेगाव शहरात सलग चौथ्या दिवशी तापमानाचा पारा चाळिशी पार गेला. गुरुवारी शहरात कमाल ४२ अंश सेल्सिअस, तर किमान १९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मार्च एंडलाच तापमान चाळीशी पार गेल्याने मालेगावकर उकाड्याने हैराण झाले आहेत. दुपारी सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे. मार्चच्या अखेरीलाच तापमान चाळिशी पार गेल्याने एप्रिल, मे मध्ये उन्हाळा अधिकच तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images