Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महायुतीचे नगरसेवक सरसावले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे नाशिकचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी एकीकडे प्रचारासाठी ग्रामीण भागावर जोर दिला असतानाच नाशिक शहरात गोडसेंच्या प्रचाराची धुरा आता महापालिकेतील शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी खांद्यावर घेतली आहे.

शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांवर शहरातील सर्व ३१ प्रभागांत स्वंतत्रपणे प्रभागातील प्रचाराची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात मते मागणारे शिवसेना-भाजपचे नगरसेवक प्रथमच युतीसाठी मत मागत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, नगरसेवकांची झालेली ही दिलजमाई पाहून नागरिक मात्र सुखावले आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीच्या जागावाटपानुसार शिवसेनेकडे आली असून, शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा आमदार असून, तीन आमदार भाजपचे, तर दोन आमदार शिवसेनेचे आहेत. सोबतच नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढलेली असली, तरी शिवसेनेला उमेदवारी कायम ठेवण्यात यश मिळाले आहे. गेली साडेचार वर्षे एकामेकांविरोधात भांडत असलेले शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीनिमित्त एकत्र आणण्याचे प्रयत्न युतीकडून सुरू आहेत. दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली दुश्मनी मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांतील नगरसेवक आणि नेते मात्र विसरताना दिसत आहेत. मतदारसंघात भाजपची ताकद असली आणि शिवसेनेचा उमेदवार असला, तरी भाजपने आता नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एकदिलाने काम सुरू केले आहे.

--

नागरिक मात्र सुखावले

महापालिकेत भाजपचे ६५, तर शिवसेनेचे ३५ नगरसेवक आहेत. या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांवर गोडसेंच्या प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरात ३१ प्रभाग असून, या प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवकांवर त्या प्रभागात शिवसेना-भाजपच्या प्रचाराचे काम सोपविण्यात आले आहे. या प्रभागातील सर्व नगरसेवक एकदिलाने गोडसेंच्या प्रचारात उतरल्याचे चित्र आहे. सातपूर, नाशिकरोड, सिडको, पंचवटी, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व या सहा विभागांतील ज्येष्ठ नेत्यांकडे या नगरसेवकांच्या प्रचारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणारे आणि भांडणारे नगरसेवक मात्र गोडसेंच्या प्रचारासाठी एकदिलाने मत मागत असल्याचे पाहून प्रभागातील नागरिक सुखावले आहेत.

--

विकासासाठीही एकत्र या

महापालिकेत भाजप सत्तेत असून, शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेना-भाजपचे नगरसेवक एकमेकांविरोधात भूमिका घेतात. प्रभागांमध्येही शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये फारसे सख्य नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी शिवसेना-भाजपचे नगरसेवक एकदिलाने एकत्रितपणे प्रभागांमध्ये फिरत आहेत. त्यामुळे प्रभागातील विकासकामांसाठीही आपले नगरसेवक आता भांडण-तंटे बाजूला सारून एकदिलाने काम करतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

--

शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे. त्यामुळे केंद्रात नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे नाशिकमधील उमेदवार हेमंत गोडसेंना विजयी करणे दोन्ही पक्षांचे ध्येय आहे. त्यामुळे महापालिकेत आम्ही एकमेकांच्या विरोधात असलो, तरी विकास आणि देशहितासाठी शिवसेना-भाजपचे नगरसेवक एकत्रित येऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत.

-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाव तेथे मानसोपचार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. मानसिक आजारांबाबत समाजात अनेक गैरसमज असून, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरातील समविचारी मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन गाव तेथे मानसोपचार- राज्यव्यापी मनस्वास्थ जनजागृती अभियान हाती घेतले आहे.

या उपक्रमाचा प्रात्यक्षिक प्रकल्प ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त संपूर्ण राज्यात मुख्यतः ग्रामीण भागात राबविला जाणार आहे. या वेळी प्रकल्पाची संकल्पना 'नैराश्य -एक मानसिक आजार' ही असणार आहे. समाजातला मानसिक आजाराविषयीचा गैरसमज दूर करून समाजात मानसिक साक्षरता निर्माण करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. हे अभियान सफल करण्यासाठी राज्यातील मानसोपचारतज्ज्ञ प्रयत्न करीत आहेत. गाव तेथे मानसोपचार या राज्यव्यापी अभियानांतर्गत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उमेश नागापूरकर रविवारी (दि.७) साई मंदिर, सोनार आळी, जव्हार जि. पालघर येथे सकाळी ८ वाजता ग्रामस्थांना याबाबत मार्गदर्शन करतील. याच दिवशी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोनानीस हे हरसूल तालुक्यातील देवीचा माळ येथे संवाद साधतील. या चर्चासत्रात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांसाठी घेतला उमेदवारी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या समर्थकाने त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला. काँग्रेसचे दिनेश उन्हवणे यांनीही स्वत:च्या उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे. शुक्रवारी नऊ जणांनी १२ अर्ज घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत चार जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह अन्य तिघांचा समावेश आहे. शुक्रवारी अमावस्या असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघातील एकही इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फिरकला नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यासाठी गणेश पगार या समर्थकाने चार उमेदवारी अर्ज घेतले. याशिवाय काँग्रेसचे दिनेश शंकर उन्हवणे यांनीही काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संघर्ष सेनेचे संजय किवळे यांच्यासह प्रिया जैन, वाळिबा जगताप, भारत आवारी, प्रसाद सांडभोर, विलास देसले आणि भाऊसाहेब सोनवणे यांनी अपक्ष लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. परंतु, आज कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. शनिवार आणि रविवार सुटी असल्याने आता सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी अर्जांसाठी आस्तेकदम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा येथील विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अॅड. टिकाराम बागूल यांनीही आज पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे शुक्रवारीदेखील सर्वच प्रमुख उमेदवारांचे अर्जांसाठी आस्तेकदम धोरण दिसून आले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपच्या वतीने आमदार गावित यांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढतही बहुरंगी आणि चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावित शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या समवेत मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, वसंत बागूल आदी उपस्थित होते. अर्जासमवेत द्यावयाचे प्रतिज्ञापत्र सोबत न जोडल्याने अर्ज दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला. दरम्यान, माजी सनदी अधिकारी टी. के. बागूल यांनी गुरुवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी पुन्हा त्यांनी तिसऱ्यांदा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गावित आणि बागूल शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शुक्रवारी पाच व्यक्तींनी एकूण ११ उमेदवारी अर्ज घेतले. त्यामध्ये अशोक त्र्यंबक जाधव यांनी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे. याच पक्षाच्या उमेदवारीसाठी विष्णू कराटे यांच्याकरिता धर्मेंद्र जाधव यांनी अर्ज नेला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बापू बर्डे यांनीही दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज घेतला असून, शिवाजी मोर यांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे. दिंडोरी मतदारसंघात आतापर्यंत ३० जणांनी ५८ उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शनिवारी व रविवारी सुटी असल्याने उर्वरित सर्वच उमेदवार अर्ज भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवारचा मुहूर्त साधणार असल्याने हे दोन्ही दिवस प्रशासनाचा कस पाहणारे ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करसवलतीला नकारघंटा

$
0
0

मालमत्ता करसवलत योजना राबविण्यास आयुक्तांचा नकार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या करसवलत या प्रोत्साहनपर योजनेपासून नाशिककरांना यंदाही वंचित रहावे लागणार आहे. एकाच वेळी वर्षभराचा कर भरल्यास नागरिकांना प्रोत्साहनपर काही रक्कम सूट देण्यास महापालिकेच्या कायद्यात तरतूद असतानाही तुकाराम मुंढे यांच्यापाठोपाठ आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही ही योजना राबविण्यास नकारघंटा दर्शवली आहे. बजेटमध्ये तरतूद नसल्याने तसेच, सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याचे सांगत गमेंनी सवलत योजनेबाबत कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे नाशिककरांना यंदाही पाच, तीन, दोन टक्के सवलतीला मुकावे लागणार आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी करदात्या नाशिककरांना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात सवलत देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना घरपट्टीच्या देयकात पाच टक्के सवलत दिली जात होती. घरपट्टीची रक्कम मेमध्ये भरल्यास तीन, तर जूनमध्ये भरल्यास दोन टक्के सवलत दिली जात होती. तसेच, ही रक्कम ऑनलाइन भरली तर एक टक्का अधिक सवलत देण्यात येत होती. गेडाम यांच्या या योजनेला नाशिककरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गेडाम यांच्या या योजनेमुळे एप्रिल, मे, जून या महिन्यातच घरपट्टीचा तब्बल ४० टक्क्यांपर्यंत भरणा झाला होता. त्यामुळे नागरिकांसह पालिकेला त्याचा फायदा होत होता.

गेडाम यांच्यानंतर आयुक्तपदी विराजमान झालेल्या अभिषेक कृष्णा यांच्या कार्यकाळातही ही योजना सुरू राहिली. मात्र त्यानंतर आलेल्या मुंढे यांनी नाशिककरांवर एकीकडे अवाजवी करवाढ लादताना कायद्यात अंतर्भूत असलेली ही करसवलत योजना तोंडी आदेशाद्वारे बंद केली. महासभेने या योजनेच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली असताना सभागृहाचे आदेश डावलत ही योजना बंद केली गेली. परंतु, मुंढेंनंतर आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेल्या गमे यांनीही करसवलत योजनेपासून नाशिककरांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे आता महासभा आणि स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

...

आचारसंहितेचा अडसर

करसवलत योजना लागू करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी लागते. परंतु, प्रशासनाला या योजनेचा बजेटमध्ये समावेश करण्याचा विसर पडला. स्थायी समिती व महासभेतही या योजनेबाबत वेळीच निर्णय घेतला गेला नाही. तरीही प्रशासनाने आयुक्तांपुढे या योजनेबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने ही योजना लागू करता येत नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे नाशिककरांना यंदा या करसवलतीपासून वंतिच रहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना आज बैठक

$
0
0

सावानामध्ये आज

सचिवपदासाठी बैठक

नाशिक : प्रमुख सचिवपदाच्या निवडीसाठी सार्वजनिक वाचनालय, नाशिकमध्ये आज (६ एप्रिल) सकाळी १० वाजता कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. सावानामध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटातून प्रमुख सचिवपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. संस्थेचे सर्वच निर्णय या पदाकडे असल्याने आपली या जागी निवड व्हावी, यासाठी काहीजण इच्छुक आहेत. पैकी विद्यमान कार्याध्यक्ष आणि नाट्यगृह सचिव यांच्यापैकीच एकाकडे हे पद जाणार असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७० मतदान केंद्रांवर ‘वॉच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बोगस मतदान व निवडणुकीत प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी बीएसएनएल लाइव्ह वेबकास्टिंग आणि व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर या निवडणुकीत केला जाणार असल्याची माहिती 'बीएसएनएल'चे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी दिली. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांद्वारे 'बीएसएनएल'ची इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स (संशयितांवर पाळत ठेवण्यासाठी)साठी नेमणूक केली आहे.

जिल्ह्यात एकूण ४७०० पोलिंग बूथ आहेत. त्यापैकी १० टक्के म्हणजे ४७० पोलिंग बूथ वेबकास्टिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सखाली येणार आहेत. या ४७० पोलिंग बूथवर कॅमेरे बसविले जाणार असून, बूथवरील सर्व हालचाली तहसील मुख्यालयात असलेल्या निवडणूक कार्यालयात वेबकास्टिंगद्वारे थेट लाइव्ह दिसणार आहेत. त्यातून फेस रिकग्नायझेशनद्वारे जर कोणी व्यक्ती दुसऱ्यांदा गैर पद्धतीने मतदान करायला आली, तर सॉफ्टवेअर त्याला अचूक ओळखणार आहे. त्यासाठी त्वरित अॅलर्ट देऊन निवडणूक कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून घेता येणार आहे. त्यामुळे मतदान करण्यापूर्वीसुद्धा त्याला रोखता येणार आहे. या घटनेचे चित्रीकरण सेव्हदेखील करता येणार आहे.

--

वाहनांवर ट्रॅकिंग स्टिस्टीम

निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर लाइव्ह ट्रॅकिंग सिस्टीम बसविली जाणार आहे. वाहन कुठे किती वेळ थांबले, कुठे फिरले वा कक्षेबाहेर गेले का, या सर्व घटनेचे लाइव्ह अपडेट मिळणार आहे. त्यात काही तफावत असल्यास सॉफ्टवेअर अॅलर्ट देणार आहे. या सिस्टीममध्येसुद्धा सेव्ह हा ऑप्शन देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी बाटल्या जप्त

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानकात अनधिकृतपणे खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून पिण्याच्या पाण्याच्या साडेचारशे सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. प्लास्टिक पिशव्यांना बंदी असूनही रेल्वेत विक्रेत्यांकडून त्याचा वापर होत असल्याने या ठिकाणी महापालिका कर्मचारीही तपासणी करीत आहेत. रेल्वेतून खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिकृत विक्रेत्यांची नेमणूक केलेली आहे. मात्र, अनधिकृत विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी आल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकात रेल्वे स्टेशन मास्तर आर. के. कुठार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी अनधिकृत विक्रेत्यांकडून पाण्याच्या साडेचारशे सीलबंद बाटल्या जप्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकांसाठी आज समुपदेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या पाल्याने जगात उल्लेखनीय कार्य करावे, अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. या अपेक्षेला अनुसरुन 'समर्थ ट्रस्ट'तर्फे पालकांसाठी समुपदेशन उपक्रमाची मुहूर्तमेढ गुढीपाडव्यानिमित्ताने रोवली जाणार आहे. 'मेक युवर चाइल्ड युनिक इन द वर्ल्ड' या संकल्पनेंतर्गत नामवंत समुपदेशक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आज, शनिवार (६ एप्रिल) रोजी नाशिककरांना मिळणार आहे.

दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 'व्हिजन २०२०'चे ध्येय समोर ठेऊन समर्थ ट्रस्टने 'पालकत्व, समाज आणि देश' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत पालकांच्या भावविश्वावर आधारित समुपदेशनाचे विविध कार्यक्रम शहरात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी (६ एप्रिल) दुपारी १२.३० वाजता होणार आहे. कालिदास कलामंदिरात १२.३० ते ४ या वेळेत समुपदेशक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन पालकांना मिळणार आहे. ट्रस्टचे सचिव मनीष मंजुल, निवृत्त लेफ्टनंट कर्नल अमित बत्रा, करिअर मार्गदर्शक डॉ. मंगेश भांगे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर आणि रंजिथ कुमार रेड्डी या तज्ज्ञांचे व्याख्यान कार्यक्रमात होईल. प्रत्येक तज्ज्ञ ३० मिनिटे मार्गदर्शन करणार असून, त्यानंतर पालकांना तज्ज्ञांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. पालकांनी उपस्थित राहण्याचे ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रलय सरकार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाण यांचे ‘वेट अॅण्ड वॉच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी 'वेट अॅण्ड वॉच' भूमिका घेतली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी आता सोमवार व मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे चव्हाण कधी ते दाखल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत चव्हाण यांना विचारले असता त्यांनी अद्याप कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. राजकारणात काहीही घडू शकते असे सांगत त्यांनी सस्पेन्सही कायम ठेवला.

भाजपने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे कमालीचे नाराज असलेले चव्हाण बंड करणार असल्याची चर्चा आहे. पण, त्यांनी अद्याप कोणतीच भूमिका जाहीर न केल्यामुळे अनेकांचे हृदयाचे ठोके वाढले आहेत. २९ मार्च रोजी त्यांनी सुरगाणा येथील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यावेळेस संपूर्ण मतदार संघातील विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यकर्त्यांची चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. पण, आता त्याला आठवडा उलटला असला तरी त्यांची भूमिका समोर न आल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

राष्ट्रवादीमध्ये चलबिचल

राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदरच शिवसेनेतून आलेले माजी आमदार धनराज महाले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रचाराच्या तीन फेऱ्यासुद्धा पूर्ण केल्या आहेत. असे असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चाही रंगली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये चलबिचल सुरू आहे. या विषयावर चव्हाण यांना विचारले असता राजकारणात काहीही घडू शकते. जळगावमध्ये घडलेच ना, असे सूचक उत्तरही त्यांनी दिले. दरम्यान, भाजपचे नेते चव्हाण यांच्या संपर्कात असून त्यांनी बंड करू नये यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे. त्यांना वेगवेगळी आश्वासनेही दिली जात असल्याची चर्चा आहे. पण, याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुढीपाडवा मतदान वाढवा उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जास्तीत जास्त मतदारांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी 'गुढीपाडवा मतदान वाढवा' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. आज, शनिवारी (दि. ६) सकाळी सात वाजता गोल्फ क्लब मैदान येथून मतदान जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. लोकशाही सशक्त व सुदृढ करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्हा प्रशासनही प्रयत्नशील आहे. यामुळेच जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी सात वाजता गोल्फ क्लब मैदान येथून रॅलीला सुरुवात होईल. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र गिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सरकारी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्र्यंबकनाका-शालिमार- रेडक्रॉस-मेहेर सिग्नल-सीबीएस-त्र्यंबकनाका-गोल्फ क्लब असा रॅलीचा मार्ग आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून मतदान करण्याबाबत आवाहन करणे तसेच रॅलीत सहभागी सदस्यांनी प्रत्येकी पाच व्यक्तींना पत्र पाठवून मतदान करण्याचे आवाहन करावे, असे आवाहन जिल्हा समन्वय समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजात भारतीय संगीताची उद्या मैफल

$
0
0

तिकिटावर खास सवलत

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या 'कल्चर क्लब' सदस्यांसाठी मराठी नववर्ष दिनानिमित्त सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा अभिजात भारतीय संगीताची दुर्मिळ मैफल रविवारी (७ एप्रिल) सायंकाळी ७ वाजता नंदनवन लॉन्स, सावरकरनगर, गंगापूर रोड या ठिकाणी रंगणार आहे.

नववर्षाचे स्वागत सुरेल संगीत मैफलीने करण्याची संधी कल्चर क्लब सदस्यांना मिळणार आहे. महेश काळे यांच्या मैफलीचे तिकीट खास सवलतीच्या दरात कल्चर क्लब सदस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मैफलीचे एक तिकीट ५०० रुपयांचे असून, दोन तिकिटे खरेदी केल्यावर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच, नव्याने कल्चर क्लब सदस्य होणाऱ्यांना सदस्य शुल्कासह तिकीट खरेदी करावे लागेल. प्रत्येक सदस्याला किमान दोन तिकिटांपुरतीच सवलत देण्यात येईल. या सुरेख संधीचा लाभ घेण्यासाठी आणि सवलतीच्या दरात तिकिटे खरेदी करण्यासाठी दुपारी १ ते ६ या वेळेत ९४२२५१३५६९ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर संपर्क साधा.

..

\B२९९ रुपयांत व्हा सदस्य\B

'मटा कल्चर क्लब'चे सदस्यत्व केवळ २९९ रुपयांत होता येणार आहे. त्यासाठी आजच ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला किंवा महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाला भेट द्या.

...

\Bकार्यक्रम : महेश काळे यांची मैफल\B

कधी : ७ एप्रिल २०१९

किती वाजता : संध्याकाळी ७ वाजता

कुठे : नंदनवन लॉन्स, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आयुक्तांची लोकायुक्ताकडे तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूरमधील स्वागत हाइटस इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर इमारत अनधिकृत ठरवून पाणीपुरवठा खंडित केल्याप्रकरणी इमारतीतील रहिवाशांनी थेट लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्यासाठीच आयुक्तांकडून रहिवाशांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप करीत संबंधित दोषी अधिकाऱ्यांसह आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे.

सातपूर विभागातील स्वागत हाइट्स या इमारतीला महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे १९ डिसेंबर २०१३ रोजी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला होता. परंतु, सोसायटीतील अंतर्गत वादातून झालेल्या तक्रारींनंतर २७ मार्च २०१८ रोजी अचानक मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी या इमारतीची उंची मोजली असता ती मंजुरीपेक्षा ३५ सेंटिमीटर अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेने ही इमारत अनधिकृत ठरवून २१ ऑगस्ट २०१८ पासून इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गेल्या २२५ दिवसांपासून इमारतीतील ६० रहिवाशांना पाण्यावाचून रहावे लागत आहे. या इमारतीतील रहिवाशांनी आयुक्त गमे यांची भेट घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. परंतु, जोपर्यंत मंजुरीपेक्षा अधिक असलेली इमारतीची उंची कमी करून सुधारित लेआऊटला मंजुरी घेतली जात नाही अथवा अग्निप्रतिबंधक उपाययोजना बसविली जात नाही, तोपर्यंत इमारतीचा पाणीपुरवठा जोडता येणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. या सगळ्या प्रकारात इमारतीतील रहिवाशांची चूक नसतानाही, त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच तिची मोजणी करून पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारात अधिकाऱ्यांचा दोष असताना, पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सोसायटीच्या रहिवाशांना शिक्षा दिली आहे. यावर उपाय म्हणून इमारतीची उंची पालिकेने कमी करून द्यावी, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे. परंतु, त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. स्थानिक रहिवाशांनी दोषी बांधकाम व्यावसायिकाविरोधात पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून त्यासही विलंब केला गेला. यातून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे, अशी तक्रारही इमारतीतील रहिवाशांकडून आता थेट लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक मार्गात सातपूरला बदल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर गाव येथे गुढीपाडव्यानिमित्ताने आज (दि. ६) सायंकाळी भरत असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्याच्या हेतूने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दुपारी २ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत हे बदल लागू राहतील.

वाहतूक बदलांतर्गत आयटीआय सिग्नल ते सातपूर गाव या मार्गावरील दोन्ही बाजूने वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. त्र्यंबकच्या दिशेने जाणारी वाहने आयटीआय सिग्नलवरून एमआयडीसी रोडने परफेक्ट सर्कलमार्गे टपारिया टूल्स कंपनीसमोरून महिंद्रा सर्कलमार्गे सातपूर व त्र्यंबकच्या दिशेने जातील. त्र्यंबक व सातपूरकडून शहराकडे येणाऱ्या वाहनचालकांनासुद्धा याच मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त सातपूर गावात दरवर्षी ग्रामदेवता असलेल्या भवानीमातेची यात्रा भरते. यात्रोत्सवापूर्वी श्री गणेशा अर्थात अर्धनारीनटेश्वराच्या वेषातील तरुणाची गावातून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर एमआयडीसीतील श्री भवानी माता मंदिरात पूजा होते. पूजा होताच ज्या तरुणाला बारा गाड्या ओढायचा मान मिळालेला असतो, त्याच्यासह इतर भाविक त्र्यंबकरोडवरपर्यंत धावत येऊन तेथे बांधलेल्या बारागाड्या गावच्या वेशीपर्यंत ओढून नेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोरण अन् गुढीने सजणार शहर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी नववर्षाचा प्रारंभ आज, शनिवारी मोठ्या उत्साहात होणार असून, गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी तोरण व गुढ्या उभारल्या जाणार आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. या दिवशी घरात वस्तूंची खरेदी करणे, वाहन खरेदी, सोने खरेदी तसेच गृहप्रवेश या दिवशी केले जातात.

संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाजारात वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होते. पाश्चात्य संस्कृतीमुळे १ जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्यात येत असले तरी हिंदू धर्मात गुढीपाडव्याला मोठे महत्त्व आहे. हे हिंदूधर्माचे नवीन वर्ष असल्याने सर्व हिंदू बांधव ते आनंदाने साजरे करतात.

सकाळी अभ्यंगस्नान करून सूर्योदयापूर्वी गुढी उभारली जाते. त्या गुढीच्या काठीला तांब्याचा कलश बांधला जातो. त्याला चंदन हळद-कुंकू लावले जाते. त्यावर कापड (खण), फुलांचा हार, कडूनिंबाची पाने बांधली जातात. ही गुढी सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत डौलाने घराच्या बाहेर फडकत असते. त्याचप्रमाणे आपण घरही सजवत असतो. दारात तोरण बांधले जाते, घर फुलांनी सजवले जाते. सर्वजण सकाळी अभ्यंगस्नान करतात. काही लोक पाण्यात कडूनिंबाची पाने घालून स्नान करतात, अशी प्रथा आहे. गुढीपाडव्यानिमित्त गोडधोड पदार्थ तयार केले जातात. नवीन घरात प्रवेश करण्यासाठी लोक मुहूर्त शोधत असतात. गुढीपाडव्याचा चांगला मुहूर्त असल्याने या दिवशी गृहप्रवेश समारंभ आयोजित केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदानासाठी द्या सुटी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड मतदानाच्या दिवशी विविध आस्थापनांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी अथवा दोन किंवा तीन तासांची सवलत द्यावी, असे आवाहन कामगार उपायुक्त जी. जे. दाभाडे यांनी केले आहे. अशी सुटी किंवा सवलत न दिल्यास व त्याबाबत तक्रार आल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दिंडोरी - २० व नाशिक- २१ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या २९ एप्रिल रोजी होत आहे. त्यामुळे निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील खासगी कंपन्या व त्यामधील आस्थापना, सर्व दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स रिटेलर्स आदी आस्थापनांतील कामगारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार चव्हाणांचे 'वेट अॅण्ड वॉच'

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी 'वेट अॅण्ड वॉच' भूमिका घेतली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी आता सोमवार व मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे चव्हाण कधी ते दाखल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत चव्हाण यांना विचारले असता त्यांनी अद्याप कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. राजकारणात काहीही घडू शकते असे सांगत त्यांनी सस्पेन्सही कायम ठेवला. भाजपने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे कमालीचे नाराज असलेले चव्हाण बंड करणार असल्याची चर्चा आहे. पण, त्यांनी अद्याप कोणतीच भूमिका जाहीर न केल्यामुळे अनेकांचे हृदयाचे ठोके वाढले आहेत. २९ मार्च रोजी त्यांनी सुरगाणा येथील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यावेळेस संपूर्ण मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यकर्त्यांची चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. पण, त्यांची भूमिका समोर न आल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’ बैठक बेकायदेशीर

$
0
0

श्रीकांत बेणी यांचा दावा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०१९-२० च्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी सावाना अध्यक्षांनी बोलावलेली बैठक बेकायदेशीर असल्याचा दावा माजी प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केला आहे. अध्यक्षांना निवड बैठक बोलावण्याचा अधिकारच नसल्याचे सांगत, या निवडीला भविष्यात एखाद्या पदाधिकाऱ्याने किंवा सभासदाने आव्हान दिल्यास ती बेकायदेशीर ठरू शकते आणि तसे झाल्यास त्यास केवळ सावाना अध्यक्ष जबाबदार असतील असे बेणी यांनी सांगितले.

कार्यक्षम आमदार पुरस्कार कार्यक्रमात श्रीकांत बेणी यांनी आमदार धनंजय मुंडे यांची निवड केल्याने धमक्या आल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर कार्यकारिणीमध्ये बैठक होऊन त्याची परिणती भांडण, हाणामाऱ्यांत झाली. अर्वाच्च शिवीगाळ आणि फर्निचरची तोडफोड यामुळे ही बैठक चांगलीच गाजली. यासह अनेक विषयांच्या केंद्रभागी असलेल्या श्रीकांत बेणी यांना त्यांच्या कार्यशैलीमुळे राजीनामा द्यावा लागला. तसेही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नूतन निवडीसाठी कार्यकारी मंडळाची बैठक बोलिवण्यात येणार होती. त्याआधीच बेणी यांनी राजीनामा दिला. घटनेत नमूद केल्याप्रमाणे प्रमुख सचिवांच्या अनुपस्थितीत कार्यकारी मंडळाची बैठक बोलाविण्याचा अधिकार सहायक सचिवाला असतो. कार्याध्यक्षांच्या संमतीने ते बैठक पाचारण करू शकतात. मात्र, सावानात उलटे वारे वाहत असून, अध्यक्षांनीच बैठक बोलावली. सहायक सचिव अॅड. भानुदास शौचे यांनी अध्यक्षांना याबाबत लेखी कल्पना दिली की बैठक नियमाप्रमाणे मी बोलवायला हवी. परंतु, अध्यक्षांनी त्यांचे निवेदन ठेवून घेतले आणि बैठक बोलावली. मुळात हे बेकायदेशीर असल्याचे शनिवारच्या बैठकीच्या प्रारंभीच अॅड. शौचे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, बेणी यांनीदेखील ही बैठक म्हणजे नियमभंग असून, यातील निवड बेकायदेशीर ठरेल व त्यास सर्वस्वी अध्यक्ष जबाबदार असतील, असे सांगितले. अध्यक्षांनी मला कुणाचेही ऐकून घ्यायचे नाही याबाबत काही पत्रे द्यायची असतील तर ऑफिसमध्ये जमा करा, अशी सूचना करून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली.

...

नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नियमभंगाचा डाग लावून झाली आहे. अध्यक्षांना बैठक बोलावण्याचा कोणताही अधिकार घटनेत नाही. यामुळे ही निवड बेकायदेशीर ठरू शकते. निवडीला पाठिंबा आहे, परंतु उद्या काही पेचप्रसंग उदभवला तर जबाबदारी अध्यक्षांची असेल.

- श्रीकांत बेणी, माजी प्रमुख सचिव, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला संस्कृतीदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गुढीपाडव्यानिमित्त सात ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कला, संस्कृतीचे दर्शन घडवत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

जाधव संकुल तुळजा भवानी मंदिर, महालक्ष्मी मंदिर मौले हॉल, दक्षिणमुखी हनुमान मंदिर सातपूर कॉलनी, वरद विनायक मंदिर समतानगर, अमृतमनी गणेश मंदिर जुनी कॉलनी, संकट मोचन हनुमान मंदिर अशोकनगर, श्रीराम मंदिर विश्वास नगर येथून यात्रा काढण्यात येत दक्षिण मुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिर, बळवंतनगर, आनंद छाया येथे समारोप करण्यात आला. मतदान जनजागृती, बेटी बचाव, पाणीबचत, मोहीम राबवत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सातपूर नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोजने यांनी दिली. या यात्रेत सामाजिक संस्था, भजनी मंडळ, सामाजिक मंडळे, विविध शैक्षणकि संस्था, व्यायाम मंदिर यांचा सहभाग असतो. स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषा करीत सातपूरकर सहभागी झाले होते. नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, नगरसेवक सलिम शेख, शशिकांत जाधव, डॉ. वृषाली सोनवणे, डॉ. मेघा वाणी, गणेश बोलकर, अमोल जोशी, सतीश धामणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील १९ टेरेस हॉटेल बंद

$
0
0

महापालिकेने बजावल्या ३५ हॉटेल्सचालकांसह ६४ लॉन्सचालकांना नोटिसा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील अनधिकृत लॉन्ससोबतच आता इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतरित्या उभारलेल्या ३५ टेरस हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने अनधिकृतपणे टेरेसवर सुरू असलेल्या ३५ हॉटेलचालकांना नोटिसा बजावल्या असून, त्यापैकी १९ अनधिकृत टेरेस हॉटेल्स बंद करण्यात आले आहेत. तसेच, शहरात ६४ अनधिकृत लॉन्सलाही नियमितीकरणासाठीच्या नोटिसा बजावल्या आहेत.

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत शहरातील अनधिकृत टेरेस हॉटेल्स, अतिक्रमित, अनधिकृत लॉन्स, मंगल कार्यालये तसेच जनावरांच्या अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या गोठ्यांवर कारवाईबाबतचा आढावा घेतला. त्यावेळी नगररचना विभागाच्या वतीने हॉटेल्स, लॉन्सचा तर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गोठ्यांवरील कारवाईचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील ३५ अनधिकृत टेरेस हॉटेल्सला महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे या ३५ पैकी १९ हॉटेल्सचालकांनी नोटीस मिळताच टेरेसवरील हॉटेल्स बंद केले आहेत. दोन हॉटेल्समालकांनी अधिकृतरित्या पालिकेची परवानगी घेतली आहे. तसेच, सहा प्रकरणे कंपाउंडिंग अंतर्गत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल झाली असून, आठ अनधिकृत टेरेस हॉटेल्सवर कारवाईसाठी अतिक्रमण निमूर्लन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती दिली. नगररचनाच्या सर्वेक्षणात महापालिका क्षेत्रात १६७ लॉन्स, मंगल कार्यालये असल्याचे आढळून आले. त्यापैकी १०३ अधिकृत आढळले असून, ६४ अनधिकृत लॉन्सला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, ३० लॉन्सची प्रकरणे शासनाच्या प्रशमित संरचना अधिनियम अर्थात कंपाउंडिंग अंतर्गत नियमितीकरणासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल झाली आहेत.

...

५४ गोठे अनधिकृत

महापालिकेच्या पशुंसवर्धन विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ५४ गोठे अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले आहेत. त्यात नाशिकरोड विभागात १६, नाशिक पूर्व ३८, पंचवटी विभागात ५५ व नाशिक पश्चिम विभागामध्ये ७ जनावरांचे गोठ्यांचा समावेश आहे. हे सर्व गोठे बंद करण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गोठेधारकांनी स्वत:हून गोठे हटवले नाहीत, कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images