Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

माणिकराव कोकाटेंचे झुलेलाल यांना साकडे?

$
0
0

देवळाली कॅम्प : लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असतांना भाजपचे बंडखोर उमेदवार, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी देवळालीस भेट दिली. चेट्रीचंड उत्सवात सहभाग घेतला. येथील झुलेलाल मंदिरात जाणून भगवान झुलेलाल यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यांनी झुलेलाल यांना विजयासाठी साकडे घातले की काय, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. आपले जुने संबंध असलेल्या विविध राजकीय व सामाजिक व लोकप्रतिनिधींची गाठभेट घेत कोकाटे यांनी आपल्याला मतदान करीत निवडून देण्याची विनंती केली. चार दिवसांपूर्वी कोकाटे यांची कन्या व जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे यांनीही देवळालीच्या लोकप्रतिनिधींची भेट घेत चर्चा केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ

$
0
0

दाभाडीतील सभेत कुणाल पाटील यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भाजप सरकारच्या काळात शेतीमालास योग्य भाव मिळालेला नाही, तरुण बेरोजगार झाले, शेतकरी-तरुणांसह सर्वांनाच या सरकारने वाऱ्यावर सोडले. त्यामुळे भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कल्याणकारी सरकार देशात परत आणण्यासाठी मतदारांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन धुळे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार व आमदार कुणाल पाटील यांनी केले.

कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ मालेगावचा दौरा झाला. दाभाडी येथे झालेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अद्वय हिरे हे उपस्थित होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले, शांताराम लाठर, पवन ठाकरे, राकेश भामरे, जयंत पवार, संदीप पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले, की मतदारांनी मोठा विश्वास दाखवत डॉ. भामरे यांना निवडून दिले होते; मात्र गेल्या पाच वर्षात केवळ घोषणा झाल्यात मतदारसंघात विकास कुठेही दिसत नाही. विविध संस्थांच्या माध्यमातून निवडणुकांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. तसेच आमदार म्हणूनही अनुभव असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी शेतकऱ्यांच्या जिवावर निवडून आलेले भाजप आता शेतकऱ्यांच्याच जिवावर उठले आहे. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता विचार करून मतदान या निवडणुकीत करायचे आहे. आमदार कुणाल पाटील यांना विधानसभेत कामकाजाचा अनुभव असून त्यांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. हिरे यांनी खासदार सुभाष भामरे यांच्यावर टीका केली. भामरे यांनी एकनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला. न केलेल्या कामांचे श्रेय भामरे घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सभेस दाभाडी परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार गोडसे पोचले तुळजा भवानीच्या चरणी

$
0
0

जेजुरीच्या खंडेरायाचेही घेतले आशीर्वाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे सोमवारी (दि. ८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्यापूर्वी विजयासाठी गोडसे यांनी तुळजापूर आणि जेजुरीला जाऊन तुळजा भवानीला आणि खंडेरायाला साकडे घातले. गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज तुळजा भवानी तसेच खंडेरायाच्या चरणी ठेवत विजयाचा आशीर्वाद मागितला. यंदा २०१४ पेक्षाही मोठा विजय या निवडणुकीत मिळू दे, असे साकडेही त्यांनी यावेळी घातले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार गोडसे दुसऱ्यांचा नशीब आजमावत असून त्यांच्यासमोर 'राष्ट्रवादी'चे माजी खासदार समीर भुजबळ यांचे आव्हान आहे. गेल्या वेळी गोडसे यांनी 'राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा तब्बल पावणे तीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा भुजबळ कुटुंबीयांच्या समोर गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गोडसे यांच्यासमोर दुसऱ्यांदा खासदार होण्याचे आव्हान आहे. गेल्या वेळेसे मोदी लाटेचाही गोडसे यांना फायदा झाला होता. परंतु, मोदी लाटेपेक्षा भुजबळ कुटुंबाविरोधात असलेला रोष मतातून व्यक्त झाला होता. परंतु, यंदा परिस्थिती बदलली असून निवडणूक जिंकण्यासाठी गोडसे यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. येत्या सोमवारी गोडसे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यामुळे या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शनिवारी आपल्या परिवारासह तुळजापूर आणि जेजुरी येथे जात देवदर्शन घेतले. तुळजा भवानी आणि खंडेराव महाराज यांची विधीवत पूजा-अर्चा करून गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज काही काळ देवतांच्या चरणस्पर्शी ठेवला. निवडणूक जिकण्यासाठी बळ देण्याचे साकडे यावेळी गोडसे यांनी आई भवानी आणि खंडेराव महाराज यांना घातले. गेल्या वेळपेक्षा अधिक मतांनी विजयी होऊ दे, माझ्या हातून अधिकाधिक जिल्ह्याचा विकास होऊ दे, असे साकडेही त्यांनी घातले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर भुजबळांशी बुधवारी मुक्त सवांद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ हे मतदारसंघातील शेतकरी, महिला, तरुणांशी 'बोलू भाऊंशी' या कार्यक्रमाद्वारे 'मुक्त संवाद' साधणार आहे. कॅनडा कॉर्नर येथील व्ही. एन. नाशिक शिक्षण संस्थेत बुधवारी (दि. १०) सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, या मुक्त संवाद कार्यक्रमात समीर भुजबळ हे नाशिकचा विकास आणि प्रगती याबाबत असलेले व्हिजन नागरिकांसमोर मुक्तपणे मांडणार आहे. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघात २००९ ते २०१४ या कालावधीत नाशिक लोकसभा मतदारसंघात झालेली विकासकामे आणि २०१४ ते २०१९ या काळात नाशिकचा खुंटलेला विकास याबाबत उपस्थितांशी मुक्तपणे संवाद साधतील. यामध्ये उपस्थित शेतकरी, महिला, तरुण या समाजघटकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तर देखील देणार असून नाशिक लोकसभा मतदारसंघातील विकास आणि प्रगतीचे व्हिजन नागरिकांसमोर मांडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईची पहिली लॉटरी ८ एप्रिलला

$
0
0

जागा : ५ हजार ७६४

अर्ज : १४ हजार ९९५

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी अर्जप्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ५ हजार ७६४ जागांसाठी १४ हजार ९९५ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले असून, पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले आहे. यंदा राज्यस्तरावरून लॉटरी काढण्यात येणार असून, पुणे येथील आझम कॅम्पसमधील मुलांची उर्दू शाळेत सोमवारी (८ एप्रिल) ही प्रक्रिया पार पडणार आहे.

बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आरटीई प्रक्रिया राज्यभरात राबविण्यात येत आहे. प्रवेश देण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. नाशिक शहरासाठी गंगापूर रोड येथील होरायझन अॅकॅडमी, के. के. वाघ इंग्लिश मीडियम स्कूल सरस्वती नगर, गुरू गोविंदसिंग इंग्लिश मीडियम स्कूल इंदिरानगर, के. एन. केला इंग्लिश मीडियम स्कूल जेलरोड या केंद्रांवर कागदपत्र पडताळणी होणार असून, या केंद्रांना ९२ शाळा जोडण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पडताळणी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांचा पत्ता व नावे वेबसाइटवरील कागदपत्रे पडताळणी केंद्र या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सर्व शाळांना कागदपत्रे पडताळणी केंद्राचे नाव नोटीस बोर्डवर प्रदर्शित करणे गरजेचे असून, लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणी केंद्रावर पाठवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्याध्यापकांना कागदपत्रांची तपासणी व अॅडमिट करण्याची आवश्यकता नसून, हे काम कागदपत्रे पडताळणी केंद्र करणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायोमेट्रिकवरून दणका

$
0
0

कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी विभागप्रमुखांचे वेतन बंद

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कर्मचाऱ्यांसह विभागप्रमुखांकडे मोर्चा वळवला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीची संपूर्ण जबाबदारी आता विभागप्रमुखांवर टाकण्यात आली असून, अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू झाल्याची खात्री होईपर्यंत विभागप्रमुखांनी स्वत:चे वेतन काढू नये, असे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.

पालिकेतील रिक्तपदांचा आकडा २२०० च्या वर गेला असून, केवळ पाच हजार कर्मचाऱ्यांवरच पालिकेचा गाडा हाकावा लागत आहे. त्यातच दरमहा होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमुळे रिक्तपदांचा आकडा वाढतच आहे. वाढलेल्या आस्थापना खर्चाचे कारण देत राज्य शासनाने महापालिकेच्या रिक्तपदांच्या भरतीलाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच महापालिकेच्या कामकाजाचा ताण वाढत चालला आहे. प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी एकीकडे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अहोरात्र मेहनत घ्यावी लागत असताना काही कर्मचारी मात्र कामावर न येताच अनेकवर्षे पालिकेचे वेतन लाटत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली आहे. पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनाही सेल्फी अॅटेडन्स सक्तीचा केला आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांची मोठी फजितीच झाली आहे. बायोमेट्रीक हजेरीच्या आधारेच मार्च पेड इन एप्रिलचे वेतन अदा करण्याचे निर्देश आयुक्त गमे यांनी दिले होते. परंतु अद्यापही शिक्षण, आरोग्यासह अन्य काही विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे मार्च पेड इन एप्रिलचे वेतन अदा करताना एप्रिल पेड इन मेच्या वेतनाबाबत मात्र आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. बायोमेट्रिक हजेरी नसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करतानाच जोपर्यंत अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू झाल्याची खात्री होत नाही तोपर्यंत संबंधित विभागाप्रमुखाचे वेतन अदा न करण्याची भूमिका आयुक्तांनी घेतल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

...

शिक्षणाधिकाऱ्याला नोटीस

शिक्षण विभागालाही बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी देखील बायोमेट्रिक लागू झाले असून, तसे आदेश आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. वेळोवेळी सूचना देऊनही शिक्षण विभागाने महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी सुरू न केल्याने शिक्षणाधिकारी उदय देवरे यांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर पोलिस घरी येणार घ्यायला!

$
0
0

कामचुकार निवडणूक कर्मचाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षण सत्राला सुरुवात झाली असून या प्रशिक्षणाला दांडी मारू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी थेट पोलिसांचे वाहन त्यांच्या घरापर्यंत पाठविण्यात येणार आहे. विविध कारणांची ढाल पुढे करून निवडणूक कामाची जबाबदारी पार पाडू पाहणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांना इंगा दाखविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने कंबर कसली असून कर्मचाऱ्यांची नेतेगिरी करीत प्रशिक्षणाकडे पाठ फिरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.

लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखा कसोशीने प्रयत्न करीत आहे. मतदान प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी याकरीता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा प्रत्येक निवडणुकीच्या प्रक्रियेतील अविभाज्य भाग आहे. या निवडणुकीसाठी सुमारे ३० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नाशिक निवडणूक शाखेला हवे आहे. निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी बनविण्यात आली असून त्यांना ऑर्डर्सही पाठविण्यात आल्या आहेत. परंतु, अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आजारपणासह विविध अडचणीही त्यांच्याकडून सांगितल्या जात आहेत. मात्र, अडचणी सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही निवडणूक कामकाजाच्या जबाबदारीतून सुटका होणार नसल्याचा पवित्रा सुरुवातीपासूनच निवडणूक शाखेने घेतला आहे. त्यामुळेच आरोग्याबाबतच्या तक्रारी पुढे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ऑर्डर्स पाठवून प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. प्रशिक्षण घेतल्यास निवडणुकीच्या कामकाजात सक्रिय रहावे लागेल, अशी धास्ती कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे प्रशिक्षणालाच गैरहजर राहण्याची शक्कल कर्मचाऱ्यांकडून लढविली जाण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी निवडणूक शाखेने सुरू केली आहे. दिंडोरी आणि निफाड विधानसभा मतदारसंघात शनिवारी प्रशिक्षण सत्र पार पडले. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी (दि. ७) नियोजित ठिकाणी दिवसभर प्रशिक्षण सत्र सुरू राहणार असून उर्वरित ठिकाणी सोमवारी (दि. ८) प्रशिक्षण सत्र घेण्यात येणार आहे.

आधी फोन नंतर पोलिस व्हॅन

कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी कर्मचारी टाळू पाहात असतील तर हे काम कोणी करायचे, असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळेच कामचुकारपणा करणाऱ्या कुणाचीही गय न करण्याचा पवित्रा जिल्हा प्रशासनाने स्वीकारला आहे. प्रशिक्षणाला रविवारी (दि. ७) सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी प्रशिक्षण केंद्रावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून फोन करून प्रशिक्षण सत्रास हजर होण्याबाबत सांगण्यात येणार आहे. त्यानंतरही काही कर्मचारी प्रशिक्षण सत्रात सहभागी झाले नाहीत तर त्यांना आणण्यासाठी घरापर्यंत पोलिस व्हॅन पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली आहे. तरीही प्रशिक्षण सत्राकडे कुणी पाठ फिरविलीच तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राजकीय प्रतिनिधींनीही आवाहन

निवडणूक प्रक्रिया आणि त्यातील कायदेशीर तरतुदींची माहिती राजकीय पक्षांनाही असायला हवी. त्यामुळेच त्यांनी नेमलेल्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधी यांनाही निवडणूक प्रशिक्षणासाठी पाठवा, असे विनंतीपत्र सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्षांना निवडणूक शाखेकडून पाठविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कट्टा - युवक समन्वय समिती - प्रतिक्रिया

$
0
0

निवडणूका जवळ आल्या की, युवकांबाबत विविध घोषणाबाजी केली जाते. राजकारणी युवकांना केंद्रस्थानी ठेवून आश्वासने देतात. पण प्रत्यक्षात कार्य होताना दिसत नाही. दोन कोटी रोजगार देणार असे आश्वासन सत्ताधारी सरकारने दिले होते, मात्र ते प्रत्यक्षात उतरलेले नाही. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात इंजिनीअरिंग कॉलेजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी एकही मोठी कंपनी शहरात आलेली नाही. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

प्रसाद देशमुख

- -

निवडणुकांमध्ये तरुण व शेतकरी यांना समोर ठेवून प्रचार केला जातो. या प्रचारात मोठी आश्वासने दिली जातात. पण ते प्रत्यक्षात उतरत नसल्याने आमच्या भावनांचा खेळ होतो आहे. शहरी व ग्रामीण भागातील मुलामुलींचे प्रश्न वेगवेगळे आहेत. हे प्रश्न जाणत कार्य होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची सुविधा नाही, शहरात रहायचे म्हटले तर वसतिगृह नाही. या प्रश्नांना निवडणुकीच्या माध्यमातून वाचा फोडण्याची गरज आहे.

भूषण काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप सरकारला धडा शिकविण्याची वेळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव भाजप सरकारच्या काळात शेतीमालास योग्य भाव मिळालेला नाही, तरुण बेरोजगार झाले, शेतकरी-तरुणांसह सर्वांनाच या सरकारने वाऱ्यावर सोडले. त्यामुळे भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कल्याणकारी सरकार परत आणण्यासाठी मतदारांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन धुळे लोकसभेचे काँग्रेसचे

उमेदवार व आमदार कुणाल पाटील यांनी केले. कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ मालेगावचा दौरा झाला. दाभाडी येथे झालेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अद्वय हिरे हे उपस्थित होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले, शांताराम लाठर, पवन ठाकरे, राकेश भामरे, जयंत पवार, संदीप पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले, की मतदारांनी मोठा विश्वास दाखवत डॉ. भामरे यांना निवडून दिले होते; मात्र गेल्या पाच वर्षात केवळ घोषणा झाल्यात मतदारसंघात विकास कुठेही दिसत नाही. विविध संस्थांच्या माध्यमातून निवडणुकांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. तसेच आमदार म्हणूनही अनुभव असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक अपंगत्व कठीण

$
0
0

फोटो - पंकज फोटो

मानसिक अपंगत्व कठीण

निवृत्त लेफ्टनंट कर्नल बत्रा यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शारीरिक अपंगत्व असूनही स्वत:च्या हिंमतीवर आणि धैर्यावर उज्ज्वल यशप्राप्त करणाऱ्यांची संख्या देशभरात अधिक आहे. यश मिळविण्यासाठी आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वासाठी मानसिकता आणि मनोबल महत्त्वपूर्ण ठरते. पालकांनी आपली भूमिका बजावताना पाल्यांची मानसिकता सुदृढ ठेवण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण, मानसिक अपंगत्व आल्यास म्हणजेच, ताणतणावात पाल्य असेल तर त्याचा विकास होणे कठीण होते, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट कर्नल अमित बत्रा यांनी केले.

'समर्थ ट्रस्ट' आयोजित 'मेक युवर चाईल्ड युनिक इन दि वर्ल्ड' या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे 'व्हिजन २०२०' हे ध्येय समोर ठेवून समर्थ ट्रस्टतर्फे 'पालकत्व, समाज आणि देश' या उपक्रमाची मुहूर्तमेढ शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने रोवली गेली. प्रत्येक पालकाला आपला पाल्य जगात अद्वितीय असावा, असे वाटत असते. त्यासाठी पालकत्वात असताना साकारण्याच्या भूमिका आणि मानसिक समुपदेशन यावर भर देणारा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ट्रस्टचे सचिव मनिष मंजुल, निवृत्त लेफ्टनंट कर्नल अमित बत्रा, करिअर मार्गदर्शक डॉ. मंगेश भांगे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, मानसशास्त्रज्ज्ञ अश्विनकुमार भारद्वाज आणि रंजिथ कुमार रेड्डी होते. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रलय सरकार यांनी सर्वांचे स्वागत केले.

करिअर मार्गदर्शक आणि समुपदेशक डॉ. भांगे आणि भारद्वाज यांनी पाल्यांच्या मानसिकेतसह पालकांच्या मानसिकतेवर भाष्य केले. पाल्यांना प्रत्येक गोष्ट शक्य आहे याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यासाठी त्यांच्यासमोर शक्य होतील तितक्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असा सल्ला देण्यात आला. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे काही केस स्टडीज् पालकांना दाखविण्यात आल्या. कठीण परिस्थितीवर कठोर परिश्रमातून पाल्य उत्तुंग भरारी घेतात. पण, त्यासाठी मानसिकदृष्ट्या ते सकारात्मक आणि जिद्दी असतात. त्यामागे पालकांचे संपूर्ण पाठबळ आणि सकारात्मक मानसिकतेतून मिळणारे मार्गदर्शन लाभदायक असते, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारागाड्यांची यात्रा उत्साहात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या बारागाड्यांची यात्रा सातपूरला उत्साहात पार पडली. शनिवार कामगारांच्या सुटीचा दिवस असल्याने बारागाड्या यात्रेला तोबा गर्दी झाली होती. कुठलाही अनूचित

प्रकार होऊ नये याकरिता सातपूर ग्राम विकास मंडळ व पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गेल्या तीन वर्षांपासून मंगेश निगळ यांना गणेशाचा मान दिला गेला आहे. बारागाड्यांच्या यात्रेला आमदार सीमा हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, नगरसेवक शशिकांत जाधव, नगरसेविका पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, राधा बेंडकोळी, नयना गांगुर्डे, नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे, संतोष गायकवाड, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, कामगारनेते डॉ. डी. एल. कराड यांसह सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका सीमा निगळ यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन घाटोळ, कार्याध्यक्ष हर्षद काळे, सागर निगळ आदींनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.

पारंपारिक बारागाड्यांच्या यात्रेसाठी त्रंबकेश्वररोडवरील रस्ता दुपारपासून बंद ठेण्यात आला होता. दुपारी दोन वाजेनंतर बारागाड्या त्र्यंबकेश्वररोडवर लावण्यात आल्या. यानंतर सांयकाळी चारवाजेला बारागाड्या ओढणाऱ्या श्री गणेशाची वाजत गाजत शिवाजी चौकातून मिरवणूक काढण्यात आली. सातपूर गावातील मारूती मंदिराचे दर्शन घेत श्री गणेशाने एमआयडीसीत असलेल्या भवानी मातेचे दर्शन घेतले. गणेशाचे रूप धारण केल्याल्या मंगेश यांची मिरवणूक सायंकाळी सात वाजेला बारागाड्यांच्या जवळ आली. यानंतर गणेशाने बारागाड्यांना प्रदक्षिणा घातल्या. यावेळी ग्रामस्थ व आलेल्या मान्यवरांनी गणेशा व बारागाड्यांची विधिवत पूजा केला. भवानी माते की जय असा जय घोष करीत गणेशाने बारागाड्या ओढल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला संस्कृतिदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर गुढीपाडव्यानिमित्त सात ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कला, संस्कृतीचे दर्शन घडवत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जाधव संकुल तुळजा भवानी मंदिर, महालक्ष्मी मंदिर मौले हॉल, दक्षिणमुखी हनुमान मंदिर सातपूर कॉलनी, वरद विनायक मंदिर समतानगर, अमृतमनी गणेश मंदिर जुनी कॉलनी, संकट मोचन हनुमान मंदिर अशोकनगर, श्रीराम मंदिर विश्वास नगर येथून यात्रा काढण्यात येत दक्षिण मुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिर, बळवंतनगर, आनंद छाया येथे समारोप करण्यात आला. मतदान जनजागृती, बेटी बचाव, पाणीबचत, मोहीम राबवत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सातपूर नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोजने यांनी दिली. या यात्रेत सामाजिक संस्था, भजनी मंडळ, सामाजिक मंडळे, विविध शैक्षणकि संस्था, व्यायाम मंदिर यांचा सहभाग असतो. नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, नगरसेवक सलिम शेख, शशिकांत जाधव, डॉ. वृषाली सोनवणे, डॉ. मेघा वाणी, गणेश बोलकर, अमोल जोशी, सतीश धामणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 9

उपचारादरम्यान चिमुरड्याचा मृत्यू

$
0
0

उपचारादरम्यान

चिमुरड्याचा मृत्यू

देवळाली कॅम्प : येथील एअर फोर्स स्टेशन ते लहवित दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी चार वर्षीय शिवमचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी ढेरिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक नवनाथ कोठुळे यांच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहवित येथे राहणारे वामन ढेरिंगे हे गुरुवार (दि. ४) आपल्या नातवांसह यात्रेहून परतत असतांना चौधरी मळा येथून भगूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोने (एमएच १५ सीके ५३८४) धडक दिली. यात ढेरिंगे यांच्यासह आठ वर्षीय सत्यम व चार वर्षीय शिवम यांचा अपघात झाला. तिघांनाही उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना शिवमचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयो लाल झुलेलाल’चा जयघोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भगवान झुलेलाल यांची वेशभूषा असलेला चित्ररथ, ढोल ताशांचा दणदणाट अन् जय झुलेलालचा जयघोष करीत सिंधी बांधवांचा जल्लोष असे चैतन्यमय वातावरण शनिवारी सायंकाळी जुने नाशिक परिसरात पहायला मिळाले. निमित्त होते, 'भगवान झुलेलाल जयंती मिरवणुकीचे'.

सिंधी समाजबांधवांच्या वतीने चेट्रिचंड महोत्सवानिमित्त आणि भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. शालिमार येथील झुलेलाल मंदिरापासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. भगवान झुलेलाल यांची प्रतिमा व प्रज्ज्वलित ज्योतीसह मिरवणूक काढण्यात आली. शालिमारपासून सुरू झालेली मिरवणूक मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डमार्गे पंचवटी कारंजा येथे विसर्जित झाली. मिर‌वणुकीच्या विसर्जनावेळी भगवान झुलेलाल यांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान ढोल ताशांच्या निनादात सिंधी बांधवांचा जल्लोष सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यात शहरातील सर्व भागातून सिंधी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीचे संयोजन नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष नानिकराम मदनानी, राजू पंजाबी, शंकर जयसिंघांनी, किशोर अमरनानी, गुंदू खुबानी, मुकेश वालेचा, दीपक पंजाबी, सुरेश करमचंदानी, हरीश कटारिया, अशोक पंजाबी आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेठमध्ये पकडली १९ लाखांची रोकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेठ तालुक्यातील पिठुंदी नाका येथे एका खासगी वाहनातून आणण्यात येत असलेली सुमारे १९ लाखांची रोकड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे तैनात एसएसटी पथकाने ताब्यात घेतली. शनिवारी (दि. ६) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ही रक्कम कोणासाठी व कशासाठी आणण्यात येत होती, याची चौकशी आयटी विभागाकडून करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक काळात आचारसंहिताभंगाचे प्रकार उघडकीस आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. चोरट्या मार्गाने मद्य, रोकड जिल्ह्यात आणली जाऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने ठिकठिकाणी पथके तैनात केली आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघांतर्गत समाविष्ट महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पेठ तालुक्यातील पिठुंदी नाका येथे एसएसटी पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक कर्तव्यावर असताना शनिवारी मध्यरात्री साडेतीन वाजता एमएच १५/जीआर ४००७ हे सुरतहून आलेले क्रेटा वाहन तपासणीसाठी थांबविण्यात आले. या वाहनामध्ये विनायक भाऊसाहेब खरात व प्रदीप रामदास शेटे (रा. चांदोरी, ता. निफाड) हे दोघे होते. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १८ लाख ९० हजार ९७० रुपयांची रोकड आढळून आली. पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली असून, ती कोणासाठी आणि कशासाठी आणण्यात येत होती याची चौकशी केली जाणार आहे. ही रोकड पुढील चौकशीसाठी आयकर विभागाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप आहेर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांना याबाबतची माहिती दिली असून, मांढरे यांनी पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी निश्चितीनंतरही दिंडोरीत धाकधूक कायम

$
0
0

भाजपसह 'राष्ट्रवादी'च्या उमेदवारालाही चिंता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळूनही बदलाच्या चर्चेमुळे उमेदवारांमध्ये धाकधूक आहे. अनेक ठिकाणी ऐनवेळी उमेदवार बदलले जात असल्याने उमेदवारांची चिंताही वाढली आहे. या मतदारसंघात आता त्याची शक्यता कमी असली तरी राजकारणात काही होऊ शकते. हे वाक्य सर्वांची धडकी भरणारेच आहे. त्यामुळे या अधिकृत उमेदवारांची चिंता ९ एप्रिलनंतरच मिटणार आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी २ एप्रिलपासून सुरुवात झाल्यानंतर या मतदारसंघात आतापर्यंत अवघ्या दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवारी या सर्वांचे गर्दी उमेदवारी भरण्यासाठी नाशिक येथे होणार आहे. एकूण ३० जणांनी आतापर्यंत ५८ उमेदवारी अर्ज आतापर्यंत नेले आहे. पण, प्रत्यक्षात किती उमेदवार अर्ज भरतात आणि शेवटपर्यंत टिकतात हे माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या हालचालीकडे दोन्ही पक्षाचे लक्ष आहे. या ठिकाणी मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये असणार आहे. तर माकपने सुद्धा आपला उमेदवार रिंगणात उभा केला आहे. राष्ट्रवादीतर्फे धनराज महाले, भाजपतर्फे डॉ. भारती पवार तर माकपतर्फे जीवा पांडू गावित हे रिंगणात आहे. तसेच वंचित बहुजन आघीडीने बापू बर्डे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढतीची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

बिगर आदिवासी मते अधिक

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात बिगर आदिवासी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे उमेदवारांची मदार या मतदानावर जास्त असणार आहे. एकूण सहा विधानसभा मतदारसंघापैकी दिंडोरी व कळवण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. निफाड, येवला, चांदवड व नांदगाव हे बिगर आदिवासी मतदारसंघ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध नेत्यांच्या भेटीगाठींवर भर

$
0
0

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी मालेगाव मध्य मतदारसंघातील माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मौलाना मुफ्ती इस्माईल व जनता दल नेते बुलंद इक्बाल यांची भेट घेतली. तसेच मौलाना मुफ्ती यांच्या संपर्क कार्यालयात जाऊनही आमदार पाटील यांनी भेट घेत चर्चा केली. तसेच तेहरी चौकातील जनता दल पक्ष कार्यालयात बुलंद इक्बाल यांची त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांसमवेत सुमारे तासभर भेटीत चर्चा झाली. यावेळी 'राष्ट्रवादी'चे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. काँग्रेस उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी दोन्ही नेत्यांना पाठिंबा संदर्भात पत्र दिले तसेच धर्मनिरपेक्ष उमेदवार असल्याने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. दरम्यान, मुफ्ती तसेच बुलंद इक्बाल यांनीही पाठिंबा संदर्भात संसदीय समितीच्या बैठकीत चर्चेअंती निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दोन्ही नेत्यांनी पाटील यांना देत पाठिंबा संदर्भात सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा सुव्यवस्थेच्या पाहणीसाठीही निरीक्षक

$
0
0

उत्तराखंडमधील डीआयजी उद्या येणार शहरात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या लोकसभा निवडणुकांत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसाकडून विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. निवडणूक काळात पोलिसांकडून होणाऱ्या कार्यवाहीचे निरीक्षण करण्यासाठी यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उत्तराखंडमधील डी. आय. जी. एन.एस नापालचायल हे सोमवारी (दि. ८) नाशिकमध्ये निरीक्षक म्हणून दाखल होणार आहेत.

लोकसभा निवडणूक शांततामय वातावरणात आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाकडून यंदा विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने कायदा आणि सुव्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकसह दिंडोरी, धुळे आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघांसाठी उत्तराखंडमधील डीआयजी नापालचायल हे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत. नाशिकमध्ये ते सोमवारी येणार आहेत. निवडणूक काळात त्यांचे नाशिक विभागातच वास्तव्य राहणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीवर त्यांचे लक्ष असणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सरकारी विश्रामगृह येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांना गळती; तरी आरोग्य सर्वांसाठी!

$
0
0

तज्ज्ञ डॉक्टरांअभावी सार्वजनिक आरोग्य सुविधा विस्कळीत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'सार्वत्रिक आरोग्यसेवेची उपलब्धता प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी' अशी घोषणा जागितक आरोग्य दिनानिमित्त देण्यात आली आहे. मात्र, डॉक्टरांना गळती अन् आरोग्य सर्वांसाठी असा विरोधाभास यानिमित्ताने समोर येतो आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी एक घोषवाक्य ठरवून त्यादृष्टीने उपाययोजना राबविण्यासाठी सदस्य देशांना उद्युक्त करते. नाशिकचा विचार करता पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध असताना तज्ज्ञ डॉक्टरांअभावी सार्वजनिक आरोग्य सुविधा विस्कळीत झाल्याचे दिसते. जिल्ह्याभरात १३४ तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता असून, या जागा भरण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्याला मुलाखती पार पडल्या. मात्र, या खटाटोपातून अवघे २२ डॉक्टर्स शासकीय सेवेत दाखल करून घेण्यात प्रशासनाला यश मिळाले. १३४ पैकी जवळपास ११२ जागा अद्यापही रिक्त आहेत. या व्यतिरिक्त मागील वर्षापासून अनेक डॉक्टर्स निवृत्त झाले किंवा सेवा सोडून निघून गेले. नवीन तज्ज्ञ डॉक्टर्स मिळत नाही आणि आहे ते निवृत्त होत आहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे. याबाबत बोलताना शासकीय सेवेतील काही डॉक्टरांनी सांगितले, की सरकारी आणि खासगी असा फरक केला की डॉक्टरांना आर्थिकदृष्ट्या खासगी क्षेत्र समाधानकारक वाटते. वस्तुस्थिती तीच आहे. एखादा व्यक्ती शिक्षण घेतला की नोकरी स्वीकारताना ज्या बाबींकडे लक्ष पुरवितो, तीच बाब येथेही होते. आज शासकीय सेवेतील डॉक्टरांना आणि सरकारी अथवा निमसरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फारच कमी वेतन मिळते. दुसरीकडे सुरक्षितता हे एक महत्त्वाचे कारण आहे. तनमनधनाने काम करणाऱ्या डॉक्टरांना अनेक संकटांना समोरे जावे लागते. तिथे त्यांना दिलासा मिळत नाही. सार्वजनिक आरोग्यसेवेत दाखल होण्यासाठी नवीन तज्ज्ञ डॉक्टरांना काहीही कारण सापडत नाही. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता हळूहळू वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढविले. राज्य सरकारने याच धर्तीवर काम करायला हवे, असे मत डॉक्टरांकडून व्यक्त केले जाते आहे. आज नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध असताना फक्त डॉक्टरांच्या अभावामुळे याचा थेट फायदा होत नसल्याची खंत व्यक्त होते आहे.

...

डॉक्टरांची कमतरता असली तरी ती भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. खासगी डॉक्टरांना सरकारी हॉस्पिटल्समध्ये सेवा देता येते. त्यासाठी काही नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहे. डॉक्टरांची संख्या हळूहळू वाढेल.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images