Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्वत: स्वत:ला केलेली मदत ही उत्तम

$
0
0

अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीवनातील कोणतीही अवघड परीक्षा द्या; परंतु तुम्ही स्वत: स्वत:ला केलेली मदत ही उत्तम मदत असते हे विसरू नका, ते तुमच्या यशाचे गमक बनू शकते. अभ्यास करताना स्वत:चा आदर्श ठेवा, स्वत: किती कष्टातून संघर्षातून शिकत आहात हे लक्षात घ्या. वेळ आहे, आणखी पुढे जा, वेळेचा सदुपयोग करा, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे यांनी केले.

युनिक अॅकॅडमीच्या वतीने यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झाला. याप्रसंगी सोनवणे बोलत होते. व्यासपीठावर प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा. ज्ञानेश्वर राठोड, कपिल हांडे, विनोद भोई यांची प्रमुख उपस्थिती होती.

युनिक अॅकॅडमीच्या ६८ विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात प्रथम आलेला वैभव पवार, कावेरी जाधव, साहेबराव भोरे, अर्चना निकम, उमा ढेकळे, राहुल केदारे, नीलेश गंगावणे, विजय चौरे यांच्यासह यशस्वी गुणवंतांचा त्यात समावेश होता. प्रा. चंद्रकांत मोरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अॅकॅडमीच्या वतीने १५ एप्रिल ते १५ मे यादरम्यान १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी-यूपीएससी संदर्भात सेमिनार होणार आहे. त्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

आई-वडिलांना विसरू नका

सोनवणे म्हणाले, की आपण कितीही अभ्यास करा, कितीही परीक्षा पास व्हा; परंतु एक सार्वत्रिक सत्य आहे, की आपण ज्या आई-वडिलांचे बोट धरून शाळेत गेलो. त्यांना कधीही विसरू नका. त्यांना नेहमी आनंदी ठेवा. आई-वडिलांनी यश दिले आहे. त्यामुळे तुम्ही यशस्वी झाल्यानंतरही त्यांना नेहमी सन्मान द्या, तरच तुमच्या अधिकारी पदाचे तुम्ही चिज केले असा वाटेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात तडाखा तापमान ४३ अंशांवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोमवारी या मोसमातील उच्चांकी तापमान नोंद झाले. कमाल तापमान ४३.२ अंश तर किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरवासीय घामाघूम झाले आहेत.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमान ४२ अंशांपलिकडे गेले होते. त्यामुळे मालेगाववासीय रोजचं उकाड्याने हैराण होत आहेत. सोमवारचा दिवस चांगलाच तापदायक ठरला. उकाडा आणि उन्हाच्या झळा यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. सकाळी ११ वाजेपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असून यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. तापमान विक्रमी वाढत असल्याने आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष उभारण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेस कामगाराचा मुलगा झाला कलेक्टर

$
0
0

प्रेस कामगाराचा मुलगा कलेक्टर

जेलरोडच्या रियाजला यूपीएसीत २६१ वे रँकिंग

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडचे नाव घेतले की टवाळखोर पोरांचे चेहरे समोर येतात, तर गुंडगिरीची चर्चा होते. पण आता ही ओळख जेलरोडचा रियाज अहमद सय्यदने बदलली आहे. रियाज यूपीएसस्सी परीक्षेत देशात २६१ आला आहे. लवकरच तो कलेक्टर होणार आहे. गरिबी जवळून पाहिलेली असल्यामुळे रियाजने दिल्ली, मुंबई ऐवजी झारखंड, बिहार, सिक्कीम अशा मागास राज्यांमध्ये कलेक्टर होण्याचा प्राधान्यक्रम नोंदवला आहे. सोमवारी तो नाशिकमध्ये आल्यावर त्याचे नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे नागरिक व मित्रांनी जोरदार स्वागत केले.

रियाज गेल्या सहा महिन्यांपासून दार्जिलिंग येथे रेंज फॉरेस्ट ऑफिसरचे ट्रेनिंग घेत आहे. पुरुषोत्तम स्कूल आणि बिटको कॉलेजमध्ये कायम टॉपर राहिलेला रियाज बिटकोचा जनरल सेक्रेटरी होता. एम.एसस्सीनंतर त्याने आयएएसची जोरदार तयारी सुरू केली. त्यासाठी सखोल वाचन केले. स्पर्धा परीक्षेसाठी मुंबई-पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये वातावरण नसल्याने रियाजने अभ्यासाठी दिल्ली गाठली. दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात मागासांसाठी स्पर्धा प्रशिक्षण केंद्र आहे. त्यात त्याने प्रवेश मिळवला. तीन वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर रियाजला स्पर्धेचा अंदाज आला. प्रेरणी मिळाली. रात्रीचा दिवस केल्यानंतर तो यशस्वी झाला. या केंद्रातून यावर्षी तब्बल ४२ विद्यार्थी आयएएस पास झाले.

---

कुटुंबाचा पाठिंबा

पंचक गावठाण भागात पत्र्याच्या घरात रियाजचे कुटुंब राहते. त्याचे वडील नाशिकरोड प्रेसमध्ये कामगार होते. तिसरे शिकलेले असले तरी त्यांनी चार मुली व दोन मुलांना प्रेरित केले. रिजायच्या बहिणीदेखील उच्चशिक्षित आहेत. वडील अहमद, आई जुलेखा, सलिम चौधरी, आरिफ शेख, मुबारक सय्यद, जी. आर. कलाल, सुनील बोराडे, तारीक सर यांची प्रेरणा तर पुरुषोत्तम स्कूल, बिटको कॉलेज, जामिया विद्यापीठातील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे रियाजने सांगितले.

----

मागास भागात काम करणार

मटाशी बोलताना रियाज म्हणाला की, प्रशासकीय सेवेद्वारा समाजाचे कल्याण करता येते. आदिवासी हा माझा संशोधनाचा विषय असल्याने मी झारखंड, बिहारसारख्या राज्यांमध्ये सेवेसाठी इच्छुक आहे. एक जिल्हाधिकारी पंधरा लाख लोकांचे कल्याण करू शकतो. या संधीचे मी नक्कीच सोनं करेन. नाशिकरोडला स्पर्धा परीक्षांचा ट्रेण्ड वाढत आहे. भविष्यात नाशिकचे युवक आयएएस होतील अशी खात्री आहे.

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जय इलेक्ट्रॉनिक्सने थकविला कामगारांचा पीएफ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर एमआयडीसीतील एकेकाळच्या नामांकित असलेल्या जय इलेक्ट्रॉनिक कंपनीमधील कामगारांचा प्रलंबित पीएफ आर्मस्ट्राँग कंपनीने भरलेला नाही. त्यामुळे कामगार पेन्शनपासून वंचित आहेत. आर्मस्ट्राँग कंपनी ही पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांची आहे.

...

नी पीएफचे पैसेचे अदा केले नसल्याचे सांगितले.

एकेकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीत नावाजलेल्या जय इलेक्ट्रॉनिक कंपनीत शेकडो कामगार काम करत होते. टेपरेकाँर्डरची कँसेट बनविणारी कंपनी २००४ मध्ये बंद झाली होती. यानंतर आर्मस्ट्राँग या फर्मने जय इलेक्ट्राँनिक्स कंपनी विकत घेतली होती. परंतु, यात कामगारांची देणी नवीन कंपनी मालकाने दिली असली तरी त्यांचा पीएफ भरला नसल्याने पेन्शन मिळत नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत कामगारांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत आर्मस्ट्राँग कंपनीचे मालक पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांनी पीएफचे पैसेचे अदा केले नसल्याचे सांगितले. याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयानेही कामगारांचा पीएफ थकविण्यात आला असल्याचे पत्राद्वारे पोलिसांना कळविले. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी कामगार, सिटू संघटना व पीएफ कार्यालयाने केली. मात्र, पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

..

अमित पटेल व अमिषा पटेल यांच्या मालकीची जय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी भुजबळ यांच्या आर्मस्टाँग फर्मने २०१२ मध्ये खरेदी केली होती. यावेळी 'निमा'चे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, सिटू संघटनेचे कामगारनेते डॉ. डी. एल. कराड व मनोज पिंगळे यांच्या मध्यस्तीने कामगारांच्या देणी असलेल्या चेकचे वाटप सिटू भवनात करण्यात आले. यात कामगारांची उर्वरित देणी लवकरच दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच पीएफचे पैसेही अदा केले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु, आजतागायत कामगारांचा लाखो रुपयांचा पीएफ भरला गेला नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत आर्मस्ट्राँग कंपनीचे मालक उमेदवारी करीत आहेत. परंतु, दुसरीकडे त्यांच्याच अधिपत्याखाली असलेल्या कंपनीतील कामगारांचा पीएफ भरला जात नसल्याने कामगारांची आर्थिक कोंडी होत आहे. या प्रश्नी कारवाई करणार कोण, असा प्रश्न कामगारांनी केला आहे.

पोलिसांकडून दुर्लक्ष

याप्रश्नी भविष्य निर्वाह निधी कार्यालयानेही आर्मस्ट्राँग कंपनीकडूनही कामगारांचा पीएफ थकविण्यात आला असल्याचे पत्राद्वारे पोलिसांना कळविले. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी कामगार, सिटू संघटना व पीएफ कार्यालयाने केली. मात्र, पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

जय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आर्मस्ट्राँग कंपनीने घेतल्यावर कामगारांचा हिशोब करण्यात आला. त्यावेळी पीएफचे पैसैही भरले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. पीएफचे पैसे कंपनी मालकाने भरले नसल्याने कामगारांची पेन्शन सुरू झाली नाही. याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय यांच्याकडे तक्रारी केल्या. यावर ठोस निर्णय झालेला नाही.

- राजेंद्र नेमाडे, कामगार, जय इलेक्ट्रॉनिक्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुसेन यांच्यासारखे गुरू योगायोगाने लाभतात

$
0
0

हुसेन यांच्यासारखे गुरू

योगायोगाने लाभतात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोहम्मद हुसेन यांनी अनेक नामवंत संगीताकारांसोबत काम केले असल्यामुळे त्यांना सर्वच वाद्यांची उत्तम जाण होती. भारतीय पलुस्कर पद्धतीची स्वरलिपी तसेच पाश्‍चात्य संगिताचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी आपल्या हजारो कलावंत घडवले. हुसेन यांच्यासारखे गुरू केवळ योगायोगाने मिळत नाही तर ते ऋणानुबंधाने लाभतात, अशा शब्दात त्यांच्या चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या.

शालिमार येथील आयएमए सभागृहात संगीत दिग्दर्शक मोहम्मद हुसेन यांची श्रद्धांजली सभा झाली. यावेळी मधुकर झेंडे म्हणाले की, नाशिक ही कलाकारांची पावनभूमी आहे. त्यातीलच एक दिग्गज कलावंत म्हणजे मोहम्मद हुसेन. नाशिकचे नाव त्यांच्यासारख्या कलाकारांमुळेच मोठे झाले आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. डॉ. सुनील बुकाणे म्हणाले की, नाशिकला आल्यानंतर हुसेन सरांकडे संगीत शिकण्यासाठी जा असा सल्ला अनेकांनी दिला. मी त्यांच्याकडे शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकलो. कोणतीही गायनाची ओळ परफेक्‍ट झाल्याशिवाय ते पुढे जाऊ देत नसत. संगीत हे चांगले मेडिटेशन आहे, असे ते मला नेहमी सांगायचे. संगितामुळे रक्तदाब, मधुमेह तसेच ताणतणाव व्यवस्थापनासाठी कसा फायदा होतो, हे त्यांनी मला शिकवले.

मेघा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश साळवे, शशांक इखणकर, सकलेन शेख, सना शेख, शबाना शेख, मयुरी सोनार, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारकीत वाढला पैका!

$
0
0

हेमंत गोडसे यांच्या संपत्तीत पाच कोटींनी वाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान खासदार आणि शिवसेना, भाजप आणि रिपाइं महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या मालमत्तेमध्ये गेल्या पाच वर्षांत एकूण पाच कोटींनी वाढ झाली आहे. जंगम मालमत्तेत दोन कोटी ३५ लाखांनी तर स्थावर मालमत्तेत २ कोटी ७९ लाखांनी वाढ झाली आहे. गोडसे यांच्याकडे आजमितीस सहा कोटी ३५ लाखांची जंगम मालमत्ता असून सहा कोटी १७ लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

गोडसे यांनी सिव्हिल इंजिनीयरिंग या अभ्यासक्रमाची पदविका घेतली आहे. त्यांचा शेती आणि बांधकाम व्यवसाय आहे. गोडसे यांचे गतवेळी वार्षिक उत्पन्न १७ लाख २९ हजार ५४ रुपये एवढे होते. परंतु, यंदा हे उत्पन्न सात लाख ४७ हजार ४६६ रुपये म्हणजेच कमी झाले आहे. त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ४ लाख २१ हजार ७९५ रुपये होते. ते सहा लाख ७९ हजार रुपये झाले आहे. त्यांच्या एका मुलाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख तर दुसऱ्या मुलाचे वार्षिक उत्पन्न चार लाख ५७ हजार रुपये आहे. गोडसे यांच्याकडे सहा लाख ७० हजार रुपयांची रोकड आहे. त्यांच्या पत्नीकडे तीन लाख ३८ हजार, दोन्ही मुलांकडे अनुक्रमे १ लाख १६ हजार आणि २ लाख ३३ हजारांची रोकड आहे. गोडसे यांच्याकडे २९ लाख ९० हजारांची वाहने आहेत. त्यांच्या पत्नीकडे १३ लाखांचे वाहन असून मुलांकडे १० आणि नऊ लाखांची वाहने आहेत. हेमंत गोडसे यांच्याकडे १२० ग्रॅम सोने असून पत्नीकडे १६० ग्रॅम सोने आहे. मोठ्या मुलाकडे ९८ ग्रॅम आणि धाकट्या मुलाकडे ६१ ग्रॅम सोने आहे.

गोडसे कुटुंब चार कोटींचे कर्जदार

खासदार गोडसे यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर ३ कोटी २८ लाख ५५ हजार १९५ रुपयांचे तर पत्नीच्या नावे ७२ लाख ३२ हजार ५२६ रुपयांचे कर्ज आहे. मुलगा अजिंक्य याच्यावर पाच लाख ७० हजार ४०५ रुपयांचे तर सागर याच्या नावे ४ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज आहे. म्हणजे गोडसे परिवारावर एकूण चार कोटी १० लाख ८३ हजार १२६ रुपयांचे कर्ज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’चा रौप्यमहोत्सवी दीक्षांत सोहळा शुक्रवारी

$
0
0

दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा रौप्यमहोत्सवी पदवीदान समारंभ शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता विद्यापीठ आवारात होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात मुक्त विद्यापीठातर्फे तब्बल १ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.

३० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा यंदाचा हा रौप्यमहोत्सवी पदवीदान समारंभ आहे. विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि एक हजार ८७४ अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत विद्यापीठातर्फे राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य चालते. यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी सहा लाख १५ हजाराहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. पीएच. डी. - एम. फील, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या सुमारे १३८ अभ्यासक्रमांच्या एक लक्ष ४८ हजार २६० विद्यार्थ्यांना यंदा या समारंभात पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. पदवीदान समारंभासाठी विद्यापीठात विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासाठी नाव पडताळणी व दुरुस्तीसाठी ५ एप्रिलपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिमखान्याला विजेतेपद

$
0
0

एसएमबीटी मान्सून लीग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व एसएमबीटी मेडिकल कॉलेजतर्फे झालेल्या १६ वर्षांखालील एसएमबीटी मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिमखाना संघाने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात नाशिक क्रिकेट अॅकॅडमीचा ७ गडी राखून पराभव केला. यापूर्वी नाशिक जिमखान्याने १९ वर्षांखालील एसएमबीटी मान्सून लीग स्पर्धा जिंकली होती.

नाशिक क्रिकेट अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, रोशन वाघसरेच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे नाशिक क्रिकेट अॅकॅडमीचा संघ ३४ षटकांत १०० धावांत गारद झाला. रोशनने १९ धावांत ६ गडी टिपले. रवींद्र मच्छा याने ४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात नाशिक जिमखान्याने ४१ षटकांत सर्व बाद १३४ धावा केल्या. येतेंद्र कार्लेकरने ३३, तर आकाश बोरसेने २२ धावा केल्या. साहील पारीखने ६ गडी बाद केले. ३४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या नाशिक क्रिकेट अकॅडमीला दुसऱ्या डावातही फारशी चमक दाखवता आली नाही. रोशन वाघसरे व रितेश तिडकेच्या गोलंदाजीपुढे त्यांचा डाव ४५ षटकांत ११६ धावांत संपुष्टात आला. साहील पारीखने ३२, तर रवींद्र मच्छाने २५ धावांचे योगदान दिले. रोशन व रितेशने प्रत्येकी ३ गडी बाद केले. विजयाचे ८३ धावांचे लक्ष्य नाशिक जिमखान्याने २५ षटकांत ३ गड्यांच्या बदल्यात पूर्ण करीत एसएमबीटी मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दुसऱ्या डावात यशराज तिडके याने नाबाद ३४ धावा व रितेश तिडकेने नाबाद २४ धावा केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

$
0
0

नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून डॉ. भारती पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना, भाजप, रिपाइं व रासप महायुतीचे नाशिकमधील उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. 'शिवसेना-भाजप महायुतीचा विजय असो', 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात मिरवणूक काढली. भाजप-सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाचेही दर्शन या निमित्ताने घडून आले. महायुतीच्या या शक्तिप्रदर्शनाने परिसर भगवेमय बनला होता.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने महायुतीने मिरवणुकीद्वारे आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच, बी. डी. भालेकर शाळेलगतच्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उमेदवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो युतीच्या कार्यकर्त्यांनी हाती उंचावून धरलेले धनुष्यबाण आणि कमळाचे चिन्ह लक्ष वेधून घेत होते. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने आबालवृद्ध, महिला या मिरवणुकीत सहभागी झाले होत्या. हाती भगवा डौलाने फडकत कार्यकर्ते युतीच्या उमेदवाराच्या विजयाच्या घोषणा देत पुढे सरकत होते. बी. डी. भालेकर मैदानावरून निघालेली ही मिरवणूक अण्णा भाऊ साठे पुतळा, बी. डी. भालेकर शाळेसमोरून गंजमाळ सिग्नलमार्गे दूधबाजार, भद्रकाली मार्केट, संत गाडगे महाराज चौक, मेनरोड, वंदे मातरम चौक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, मेहर सिग्नलमार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. भव्य मिरवणुकीमुळे अवघा परिसरच भगवा झाला होता. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

मिरवणुकीनंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गोडसे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे, तर डॉ. पवार यांनी अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना उमेदवारी अर्ज सादर केले.

....

दिग्गजांची हजेरी

मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेल्या रथावर उमेदवार गोडसे, डॉ. भारती यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापौर रंजना भानसी, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हा बॅँक अध्यक्ष केदा आहेर, भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, आमदार देवयानी फरांदे, अनिल कदम, सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, राहुल आहेर, योगेश घोलप, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, प्रथमेश गिते, दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे आदी उपस्थित होते.

...

डमी मोदीने वेधले लक्ष

महायुतीच्या उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शन मिरवणुकीत नरेंद्र मोदींची हुबेहूब छबी असलेल्या विकास महंते हा कलाकारही सहभागी झाला होता. खासदार गोडसे व डॉ. भारती पवार यांच्यासोबत मिरवणूक चित्ररथावर असलेल्या महंतेनेही मोदींसारखेच हातवारे आणि शब्दफेकी केल्याने ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. मिरवणूक मार्गावर ते सर्वांनाच अभिवादन करीत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना जोश चढला होत, तर दुसरीकहे सर्वसामान्य मतदार कुतूहलाने बघत होते.

...

एकीचे घडविले दर्शन

शक्तिप्रदर्शनात शिवसेना-भाजपच्या नेत्यांमधील एकीचे दर्शनही दिसून आले. महापालिकेतील भाजप-सेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेतील सदस्यासंह नगरपालिका ते ग्रामपंचायतीतील सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या शक्तिप्रदर्शनाकडे रिपाइंच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती असली, तरी प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली.

....

पाच वर्षांच्या संधीचे सोने केले आहे. मतदारसंघासाठी अनेक प्रकल्प आणून मार्गी लावले आहेत. त्यामुळे मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता मतदारसंघाच्या विकासासाठी पुढच्या पाच वर्षांसाठी सुद्धा जनतेकडून मलाच संधी दिली जाणार आहे.

- हेमंत गोडसे, शिवसेना उमेदवार

..

दिंडोरी मतदारसंघात शेती, शिक्षण, आरोग्य क्षेत्रावर काम करण्यासाठी मतदारांनी मला संधी दिली पाहिजे. मतदारसंघाचा अनुषेश भरून काढण्यासाठी निवडणूक लढवत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करण्याचा अनुभव असून, द्राक्ष निर्यात आणि आदिवासींच्या विकासाला प्राधान्य देणार आहे.

- डॉ. भारती पवार, भाजप उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

एक एकर शेती विकूनही कर्ज फिटेना

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यात शिंगवे येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष यशवंत शिंदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. शिंदे यांच्यावर कर्ज होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एक एकर जमीन विकून कर्ज फेडले; मात्र परिस्थितीमुळे नवीन कर्ज वाढावे लागले. मानसिक हानी होत असल्याने त्यांनी गळफास घेत आयुष्याची अखेर केली.

सुभाष शिंदे यांच्यावर ५० हजार रुपयांचे पतसंस्थेचे, ५० हजार रुपयांचे एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि खासगी सावकाराचे एक लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच अनेक दुकानदार आणि नातेवाइकांकडे त्यांची उधारी झाली होती. केवळ अर्धा एकर जमीन शिल्लक राहिल्याने त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे त्यांना अवघड झाले होते. पिकाचे पडलेले बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती, कुटुंबाचा वाढता खर्च, शेतीसाठी लागणारे भांडवल याचा आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी करंजगाव-कोठूरे मार्गावरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत आपले जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी सरला, मुलगा राहुल, मुलगी रुपाली असा परिवार आहे. निफाड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून झाल्यानंतर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल गोटेंची अखेर भाजपला सोडचिठ्ठी

$
0
0

धुळ्यातून आज अपक्ष अर्ज दाखल करणार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळ्याचे भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा सोमवारी (दि. ८) भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे मुंबईत जाऊन दिला. गेल्या काही दिवसांपासून आमदार अनिल गोटे यांनी स्वकीयांच्याविरोधात बंड पुकारले होते. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. अखेर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत धुळे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णयदेखील सायंकाळी जाहीर केला आहे.

भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी धुळे महापालिकेतही भाजपविरोधात पॅनल उभे केले होते. त्यांनी सोमवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे दिला आहे. अनिल गोटे यांनी विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले असून, शिवतीर्थ चौकात सायंकाळी लोकसभा उमेदवारीची प्रचार सभादेखील घेण्यात आली. या वेळी आमदार गोटे यांनी आज (दि. ९) अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचे सांगितले.

बॅनरवर पंतप्रधानांचा फोटो का?
दरम्यान, या जाहीर सभेच्या बॅनरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकण्यात आला होता. त्यामुळे अनिल गोटे यांचे नेमके कोणाला समर्थन आहे, याबाबत संभ्रम कायम आहे. सभेच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर अनिल गोटे यांचा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला होता. तसेच ‘अनिल गोटे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत’ असेही म्हटले होते. यामुळे धुळेकरांसमोर जाताना अनिल गोटे हे त्यांनी सोडलेल्या पक्षातील व्यक्तींचे फोटो वापरत असल्याने नेमके कोणत्या पक्षाचे हा प्रश्नही कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणाल पाटलांचा अर्ज दाखल

$
0
0

कुणाल पाटलांचा अर्ज दाखल

धुळ्यात काँग्रेस आघाडीचे शक्तिप्रदर्शन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे लोकसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी सोमवारी (दि. ८) प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे समर्थक, शेतकरी, तरुण, विद्यार्थी, महिलांसह सर्वच घटकांतील लोक रस्त्यावर एकत्रितपणे उतरल्याने कॉंग्रेस आघाडीचे हे ऐतिहासिक शक्तिप्रदर्शन विरोधकांना सूचक इशारा देणारे ठरले आहे.

देवपूरातील एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय येथून सोमवारी (दि. ८) सकाळी १० वाजता आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी कै. चुडामण आण्णा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ढोल ताशांच्या गजरात काँग्रेस आघाडीच्या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली आग्रा रोडमार्गे गांधी पुतळा येथे पोहोचली. महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली नगरपट्टीमार्गे जिल्हा बँक चौकात आल्यावर तिचे सभेत रुपांतर झाले. या सभेनंतर कुणाल पाटील यांनी निवडक नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना होऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.

या वेळी माजी मंत्री अमरिश पटेल, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मालेगावचे आमदार आसिफ शेख, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, मालेगावचे महापौर रसीद शेख, माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, अद्वय हिरे, प्रसाद हिरे, डॉ. तुषार शेवाळे, नाशिक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे महेश मिस्तरी काँग्रेसमध्ये
काँग्रेसच्या जाहीर सभेत शिवसेनेचे धुळे लोकसभा संघटक महेश मिस्तरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी या वेळी कुणाल पाटील यांना पाठींबा जाहीर करून युतीचे उमेदवार डॉ. भामरे यांच्यावर टीका केली. कट्टर शिवसैनिक अशी छबी असलेल्या महेश मिस्तरी यांना कॉंग्रेसच्या मंचावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी हे डॉ. भामरेंसोबत गेल्या अनेक दिवसांपासून युतीचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे मतदारसंघात शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून, एक गट आमदार कुणाल पाटलांकडे असून दुसरा गट भाजपसोबत असल्याचे चित्र दिसत आहे.

सात उमेदवारांचे नंदुरबारला अर्ज
धुळे : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ८) सात उमेदवारांनी चौदा नामनिर्देशनपत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांच्याकडे सादर केले. आतापर्यंत एकूण नऊ उमेदवारांनी सोळा नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये भाजपतर्फे डॉ. हिना गावीत यांनी तीन तर आमदार डॉ. विजयकुमार कृष्णराव गावीत आणि डॉ. सुहास नटावदकर यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र सादर केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आमदार अॅड. के. सी. पाडवी यांनी दोन नामनिर्देशन पत्र सादर केले. तसेच रेखा सुरेश देसाई यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच भरत जाल्या पावरा आणि अशोक दौलतसिंग पाडवी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

मतदारांच्या भेटीगाठींवर भर
रावेर : केंद्र व राज्य सरकारने अध्यात्मिक व वारकरी संप्रदायासाठी गत पाच वर्षात भरीव विकास कामे केली आहेत, असे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी तामसवाडी (ता. रावेर) येथे बोलताना व्यक्त केले. तामसवाडी येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यानंतर दुपारी अध्यात्मिक आघाडीच्या मेळाव्यात खडसेंनी मतदारांशी संवाद साधला. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनीदेखील मुक्ताईनगरला प्रचार दौरा करीत मतदारांसोबत संवाद साधला. दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांकडून आता मतदारांच्या भेटीगाठींवर भर देण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी पायपीट सुरू केली आहे.

रोहिदास पाटील यांचे शालक भाजपच्या वाटेवर?
धुळे : धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सुभाष देवरे आज (ता. ९) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे देवरे भाजपप्रवेश करतात की ही केवळ अफवा आहे, याबाबत आज चित्र स्पष्ट होणार आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुतणे उत्कर्ष पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता रोहिदास पाटील यांचे सख्खे शालक सुभाष देवरेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सुभाष देवरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नुकतीच भेट घेतल्याचेही वृत्त आहे. या भेटीनंतरच देवरे यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाल्याचे बोलले जात आहे. देवरे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असून, ते बोरीस गटातून जिल्हा परिषदेवर अनेक वेळा निवडून गेले आहेत. शिवाय त्यांनी काही वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. आता ते धुळे बाजार समितीचे सभापती आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही देवरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांनी शिवसेनेतर्फे आमदारकीसाठी उमेदवारीही केली होती. मात्र, आमदार गोटे यांनी त्यांचा पराभव केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीची हत्या; पतीस जन्मठेप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कारणातून पत्नीची निर्घुण हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे ३ मे २०१६ रोजी घडली होती. या खटल्यात १४ वर्षांच्या मुलाची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

सुशांत विलास पठारे (रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नांदूर शिंगोटे येथील संपत भाबड यांच्या दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर पठारे दाम्पत्य राहत होते. ३ मे २०१६ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुशांत व पत्नी वैशाली यांच्या शंभर रुपयाच्या कारणातून वाद झाला होता. पत्नीने शंभर रुपये देण्यास नकार दिल्याने संतप्त सुशांतने तिला मारहाण केली. यावेळी पतीच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी तिने आत्महत्या करीत असल्याची सुसाईट नोट लिहून त्यास घाबरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त सुशांतने ही संधी साधत वैशालीचा ओढणीने गळा घोटला. यानंतर आत्महत्येचा बनाव करीत त्याने वैशालीच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी तिच्या कुर्त्यामध्ये छातीजवळ ठेवली. यानंतर रक्ताने माखलेला शर्ट पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या आईकडे सुपूर्द केला होता. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, शवविच्छेदनात वैशालीने आत्महत्या केलेली नसून तिचा घातपात झाल्याचा अहवाल समोर आला. गुह्याचा तपास उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे यांनी केला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पंकज चंद्रमोरे यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यात १४ वर्षांच्या मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. परिस्थीतीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा व लहान मुलाची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिता-पुत्राला टोईंगवरून मारहाण

$
0
0

नाशिक : खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी अरेरावी करीत पिता-पुत्रास भरचौकात मारहाण केल्याची घटना जिल्हा कोर्टाच्या प्रवेशद्वारावर घडली. बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी हे कर्मचारी थेट मारहाण करू लागल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवारी (दि.९) दुपारी खोदलेल्या मात्र मुरूम टाकून सपाट केलेल्या स्मार्ट रस्त्यावर दुचाकी लावून लोंढे (नाव समजू शकले नाही) पिता-पुत्र नोटरीच्या कामासाठी न्यायालयात आले होते. यावेळी त्यांची दुचाकी टोइंग वाहनावरील कामगारांनी उचलली. ही बाब लक्षात येताच पोलिस कर्मचाऱ्यास विनंती करीत जागेवर दंडाची रक्कम घेऊन वाहन देण्याचा पिता-पुत्राने आग्रह केला. मात्र उर्मट कामगाराने वाद घालत पितापुत्रास मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होय...मी मतदान करणारच!

$
0
0

जनजागृतीवर भर; जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांसह समाजिक संघटनांचे आवाहन

टीम मटा

निवडणुकीत अनेक मतदार मतदानाचा हक्का बजावत नाही. मात्र जोपर्यंत प्रत्येक मतदार मतदानाचा हक्क बजावत नाही तोपर्यंत स्थिर आणि सक्षम सरकार मिळणार आहे. त्यामुळेच मतदानाचा टक्का वाढावा, मतदारांमध्ये जागृती व्हावी यासाठी करण्यात येत आहे.

नवरदेव, नवरा, अन् वऱ्हाडींनी दिले वचन

सटाणा : येथील नर्मदाई कृषी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी वडनेर येथील एका विवाह सोहळ्यातील वऱ्हाडींकडून 'होय...मी मतदान करणारच', असे अभिवचन घेऊन मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले.

तालुक्यातील वडनेर येथे लक्ष्मण वसंत शेवाळे आणि राजश्री अनिल महाजन यांचा विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी नर्मदाई कृषी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी दोन हजार प्रती वाटप केल्या. मतदारांमध्ये जागरूकता व्हावी यासाठी अध्यक्ष प्रकाश शेवाळे, उपाध्यक्षा धनश्री शेवाळे, सदस्य तुषार अहिरे, सोमनाथ बागुल, योगेश अहिरे, सुरेश वाघ, समाधान शेवाळे, अमर शेवाळे, गणेश भामरे, बबलू भामरे यांनी मतदार साक्षरता अभियान राबविले. यासाठी त्यांनी थेट वडनेर येथील लग्नमंडप गाठून विवाह सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता केली.

नर्मदाई कृषी फाउंडेशनच्यावतीने मतदानाचा अधिकार निर्भय वातावरणात राबविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी महिला आणि पुरुषांकडून मतदान करण्याचे अभिवचन घेण्यात आले. विवाह सोहळा असणाऱ्या लक्ष्मण-राजश्री, वर-वधूंचे वडील यांनीही मतदान करण्याविषयी लेखी अभिवचन दिले. विवाह सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे अभिवचन उत्साहाने दिले.

देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. यासाठी आमच्या फाउंडेशनमार्फत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. - प्रकाश शेवाळे, अध्यक्ष, नर्मदाई कृषी फाउंडेशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यात आता कृत्रिम पाणी टंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणा नदी दुथडी भरून वाहत असताना रविवारी मध्यरात्री ठेंगोडा येथील महावितरणचे रोहित्र जळाल्याने सोमवार व मंगळवार या दोन दिवस शहरवासियांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. त्यामऊळे शहरवासियांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे.

सटाणा शहरात गेल्या आठ दिवसांपासून चणकापूर धरणातील गिरणा नदीपात्रात आवर्तन आल्याने २८ मार्चपासून शहरात एक दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा सुरू होता. मात्र रविवारी ७ एप्रिल रोजी मध्यरात्री महावितरण कंपनीचे ठेगोंडा येथील रोहित्र जळाले. परिणामी शहरात गत दोन दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गिरणा नदीपात्र दुथडी भरून वाहत असतांना शहरातील जनतेला केवळ तांत्रिक अडचणींमुळे पाणीटंचाई भासू लागल्याने पालिका प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

वीज रोहित्र तातडीने दुरूस्ती करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. बुधवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरळीत होईल.- सुनील मोरे, नगराध्यक्ष सनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमांतर : सौरभ रत्नपारखी

$
0
0

माध्यमांतर : सौरभ रत्नपारखी

---

इतिहासाची ऐशीतैशी

'भारतीय इतिहासकार' हे शब्द उच्चारल्यावर अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतात.

रियासतकार गो. स. सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे, जदुनाथ सरकार, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ते थेट अलीकडच्या काळात निनाद बेडेकर यांच्यापर्यंत अनेक महनीय इतिहासकरांनी इतिहास लेखनाच्या क्षेत्रात अजोड कामगिरी करून ठेवली आहे. हे करत असताना त्यांना अनेकदा पदरमोड करावी लागली. वाळवींनी पोखरलेल्या आणि भग्न होत चाललेल्या प्राचीन वास्तूंमधून त्यांना अनेक ऐतिहासिक पत्रव्यवहार, पोथ्या, बखरी शोधून काढाव्या लागल्या. खेड्यापाड्यात बंबात पाणी तापविताना आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या मार्गावर असलेली अनेक दुर्मिळ कागदपत्रे त्यांनी मोठ्या कष्टाने मिळवली. जुन्या वाड्यांच्या माळ्यावर धूळ खात पडलेल्या गाठोड्यांच्या आत त्यांना अनेकदा इतिहासाचा अनमोल ठेवा मिळाला.

आपली हयात घालवून त्यांनी फारसी, संस्कृत, इंग्रजी, भाषांवर प्रभुत्व मिळवून त्या-त्या भाषेतली ग्रंथसंपदा मराठीत आणली. मोडी, ब्राह्मीसारख्या लिपींची लेखन-वाचनकौशल्ये आत्मसात केली. पण आज हे सर्व सांगण्याचं कारण काय तर परवा एका मित्राने व्हाट्सअॅपवर 'दुर्मिळ माहिती' या शीर्षकाखाली एक मेसेज पाठवला होता. त्या संपूर्ण मेसेजमध्ये एका इतिहासप्रसिद्ध महापुरुषाचे गुणगान होते. त्या महापुरुषाचे रणभूमीवरचे अचाट कर्तृत्व, अफाट शारिरीक ताकद, त्याची विद्वत्ता यांचे रसभरीत वर्णन केलेले होते. हा महापुरुष कोण हे सांगण्यात काहीच अर्थ नाही, कारण दोन दिवसांपूर्वी तोच मेसेज दुसऱ्या एका महापुरुषासंदर्भात मी वाचला होता.

'इतिहास' हा विषय सोशल मीडियावर इतका हास्यास्पद आणि स्वस्त का झाला आहे, असा कधीकधी प्रश्न पडतो. ज्या घटनांचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही, ज्याला संदर्भसाधनांचा कोणताच पाया नाही किंवा कोणत्याही समकालीन कागदपत्रात नोंद नसताना हे इतिहासपर मेसेजेस इतके व्हायरल कसे होत असतात?

जे कोणी उत्साही गडी हे मेसेजेस फॉरवर्ड करतात, त्यांच्याकडेदेखील याची उत्तरे नसतात, कारण 'Use and throw' प्रमाणेच नव्याने जन्माला आलेल्या 'Read and forward' संस्कृतीने एका विचित्र सामाजिक विकाराला जन्म दिला आहे.

आपण महापुरुषांची जातवार विभागणी केली आहे, मग त्यांच्या अनुयायांमध्येदेखील दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठत्व दाखवण्याची अहमहमिका लागते. इतिहासात कुठेच न सापडणारे चमत्कारिक पराक्रम बळेच त्यांच्या माथी मारण्यात येतात, कारण त्या महापुरुषाला न्यूनत्व यायला नको. एखादवेळा भाबडेपणा किंवा अज्ञान यातून होणारे फॉरवर्ड्स समजू शकतो, पण चक्क IAS/IPS दर्जाचे अधिकारीदेखील या विकाराला बळी पडताना दिसतात.

आपापल्या जातीतील साधू-संत, राजे-महाराजे यांच्याबद्दल असणारे प्रेम व आकर्षण समजण्यासारखे असले तरी त्यासाठी दुसऱ्या महापुरुषांची निंदानालस्ती करण्याची गरज नसते. दोन जातीधर्मांत कलुषित इतिहासाच्या साहाय्याने वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक गेल्या कित्येक वर्षात करताना दिसत आहेत. या समाजकंटकांचे हेतू अनेकदा राजकीय असतात. भावनिक होणारी जनता म्हणजे त्यांच्यासाठी आयतं गवसलेलं घबाडच! मग आपल्या महापुरुषाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन समोरच्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यांच्याशी विचार जुळत नाहीत, अशा एखाद्याविरुद्ध पक्षाचा पाया रचणाऱ्या महापुरुषाला बदनाम करायचे, त्याचे चारित्र्यहनन करायचे, त्याच्याभोवती संशयाचे धुके निर्माण करायचे, त्यासाठी त्याच्या पुस्तकातील सोयीची वाक्ये उचलायची (तर कधी स्वतःच्या मनाची वाक्ये त्याच्या तोंडी घालायची), एखाद्या ललित कादंबरीला इतिहास समजून त्याचे दाखले द्यायचे, तर कधी एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापरून त्याच्या फोटोचे विकृतीकरण करायचे. हे प्रकार सर्रास चालू आहेत.

'IF YOU WANTS TO KILL SOMEONE KILL HIS HISTORY FIRST' एखाद्याला संपवायचे असेल तर आधी त्याचा इतिहास संपवा हे इंग्रजांनी शिकवलेलं ब्रीद आपण फार कसोशीने पाळताना दिसत आहोत. पण इतिहासाचा अभ्यास करताना एक प्रमुख पथ्य नेहमी पाळावे लागते, ते म्हणजे 'STUDY THE HISTORIAN BEFORE YOU STUDY THE HISTORY' (इतिहास अभ्यासण्याआधी इतिहासकाराचा अभ्यास करा.) तुम्हाला इतिहासपर किंवा धार्मिक मेसेज फॉरवर्ड करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? ते पाठविण्याचा उद्देश काय आहे? पाठविणाऱ्याचा त्याविषयी स्वत:चा अभ्यास किती आहे? कोणत्या समकालीन कागदात तशी नोंद आहे? या सर्वांची उत्तरे जोवर मिळत नाहीत, तोवर सोशल मीडियावर येणारे मेसेज हे 'इतिहास्यास्पद' श्रेणीतच गणले जातील.

(लेखक ब्लॉगर आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज मिळत नसल्याने बँक मॅनेजरला शिवीगाळ

$
0
0

कर्ज मिळत नसल्याने बँक मॅनेजरला शिवीगाळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्ज मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने बँक व्यवस्थापकास शिवीगाळ करीत दमदाटी केली. ही घटना अमृतधाम परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अजय राधाकृष्ण धंजल (रा. शांतीनिकेतन सोसा. कुणाल हॉटेल मागे) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी शक्ती प्रसाद रथ (रा. बळीमंदिरासमोर) यांनी तक्रार दिली. शक्तीप्रसाद हे युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आहेत. गेल्या बुधवारी (दि. ३) त्यांना शिवीगाळ करण्याची घटना घडली. संशयित अजयने बँकेकडे व्यवसायासाठी मुद्रा लोनची मागणी केली होती. ११ मार्च रोजी त्याने अमृतधाम येथील शाखेत अर्ज दाखल केला होता. यावेळी त्याने व्यवस्थापक रथ यांचा नंबर मिळवित कागदपत्रांची पूर्तता केली होती. बँकेच्या तपासणीत संशयिताने अन्य एका बँकेतून कर्ज काढलेले असून, ते थकबाकीदार असल्याचे समोर आले. तसेच कागदपत्रात त्रुटी असल्याने बँकेने मुद्रा लोन देण्यास नाकारले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने अमृतधाम शाखा गाठून व्यवस्थापक शिवप्रसाद यांच्या कॅबीनमध्ये बेकायदेशीर प्रवेश करीत शिवीगाळ व दमदाटी केली.

--

लेबर ठेकेदारास मारहाण

मजूर पुरविण्याचा ठेका घेण्याच्या कारणावरून दोन परप्रांतीय लेबर कॉन्ट्रक्टरमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. एका ठेकेदाराने आपल्या साथिदारांच्या मदतीने गोळी झाडण्याची धमकी दिली. तसेच दुसऱ्याचे अपहरण करीत त्यास बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली.

धनंजय सिंग (रा. विठ्ठल अपार्ट. कामटवाडे), विक्रम उल्हास जाधव (रा. आंबेडकरनगर, अंबड) आणि विजय अशोक सिंग (रा. कॅनलरोड, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी इंदल बुद्धिमान सिंग (रा. कारगिल चौक, दत्तनगर) यांनी तक्रार दिली. सिंग आणि संशयितांमध्ये एस. आर. फायबर ग्लास या कंपनीत लेबर पुरविण्याच्या ठेका घेण्यावरून वाद सुरू आहे. याच कारणातून संशयितांनी शनिवारी (दि. ६) सिंग यास कारगिल चौकातील मारूती संकुल भागात असलेल्या बिअर शॉप येथे बोलावून घेत शिवीगाळ केली. यावेळी संतप्त टोळक्याने बेदम मारहाण केली असता धनंजयसिंग याच्या भाच्याने 'इसको गोली मारो असे म्हणत बळजबरीने पांढऱ्या कारमध्ये बसविले. यानंतर टोळक्याने कारमधून अपहरण करीत सिंग यास एका वर्क शॉपमध्ये घेवून जात बेदम मारहाण केली.

--

मुलीचा विनयभंग

नाशिक : शाळेतून घराकडे परतणाऱ्या मुलीस गाठून तरूणाने विनयभंग केला. ही घटना सिडकोत घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास पोलिसांनी अटक केली. दिलीप नामदेव कोळी (३१ रा. गणेशचौक) असे संशयिताचे नाव आहे. गणेश चौक भागातील शाळकरी मुलगी सोमवारी दुपारी शाळेतून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली.

--

एकास अटक

रात्रीच्या वेळी महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर चॉपर घेवून फिरणाऱ्या सिद्धार्थ नाना शिंदे (२० रा. नागसेननगर, वडाळानाका) या संशयितास पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ शिंदे हा रविवारी मध्यरात्री वडाळानाका उड्डाणपुलाखाली आरडाओरड करीत असतांना गस्तीपथकाने त्यास ताब्यात घेतले असता त्यांच्या अंगझडतीत धारदार चॉपर मिळून आले. त्याच्याविरूद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

--

वैद्यनगरला घरफोडी

जनरल वैद्यनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे आणि मनगटी घड्याळाचा समावेश आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुलाब किसन जगताप (रा.आस्ता सोसा. पाटीदार भवन जवळ वैद्यनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. जगताप कुटुंबिय बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी रविवारी (दि.७) हात साफ केला.

--

शारदानगरला घरफोडी

गंगापूररोडवरील शारदानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १९ हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोदकुमार लालबहाद्दूर माथूर (रा. स्वीटहोम बंगला, शारदानगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. माथूर कुटुंबिय २७ ते २९ मार्च दरम्यान फिरण्यासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी डल्ला मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साकारली ७५ फुटांची महारांगोळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडीरोडवरील लक्षिका सभागृहात रश्मी विसपुते यांनी ३ हजार ३७५ चौरस फूट जागेत ७५ फूट उंचीची महारांगोळी साकारली आहे. गुरुवारपर्यंत (दि. ११) ही रांगोळी नाशिककरांना पाहता येणार आहे.

महागुढी आणि महारांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या वरिष्ठ समन्वयक अमी छेडा, अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, हरिओम सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष शामराव बिरारी उपस्थित होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून साकारण्यात आलेल्या या रांगोळीची नोंद 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे छेडा यांनी सांगितले. रांगोळी पाहण्यासाठी येणाऱ्या नाशिककरांनी बुधवारी (१० एप्रिल) सकाळी १० वाजता महेंद्र जगताप यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक, तर सायंकाळी ५ वाजता शिल्पकार यतिन पंडित व संदीप लोंढे यांचे शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक होणार आहे. गुरुवारी (दि. ११ एप्रिल) श्रीरामपूर येथील डी. डी. कचोळे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष निसर्गचित्र रेखाटनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएड, एमएड सीईटी २२ मे रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्यात येणार असून त्यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मे व जून महिन्यात सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. इंटिग्रेटेड बीएड व एमएड पदव्युत्तर प्रवेशासाठीही अर्जप्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना २३ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. २२ मे रोजी या अभ्यासक्रमाची सीईटी राज्यभरात होणार आहे.

इंटिग्रेटेड बीएड व एमएड हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी सीईटी सेलकडून काही निकष लावण्यात आले असून, त्यामध्ये अर्ज भरणारी व्यक्ती हा भारतीय असावी, तिने विज्ञान, कला, सामाजिक शास्त्र विषयात पदवी, पदव्युत्तर असणे आवश्यक आहे, या परीक्षांना किमान ५५ टक्के गुण मिळालेले असावे, या निकषांचा समावेश आहे. सीईटीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातूनच घेण्यात येणार आहेत. सरकारी, अनुदानित, सरकार अनुदानित अल्पसंख्याक, विद्यापीठीय विभाग आदी ठिकाणी प्रवेश मिळू शकणार आहेत. प्रवेश अर्जासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर इतर प्रवर्गांसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पोस्ट, कुरिअरच्या माध्यमातून पाठविलेले अर्ज विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली असून ०२२-२२०१६१५७/ ५९ या क्रमांकावर संपर्क साधू शकणार आहेत.

\Bअशा आहेत तारखा

\Bप्रवेश अर्ज - सुरू. २३ एप्रिलपर्यंत मुदत

हॉल तिकीट उपलब्धता - १३ मेपासून

सीईटी - २२ मे

परीक्षेचा निकाल - ७ जून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images