Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कांदा चारशे रुपयांनी घसरला

$
0
0
सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे लाल कांद्याचे भाव सोमवारी चारशे रुपयांनी कोसळले. शुक्रवारी प्रतिक्विंटल ३,८०० विकला गेलेल्या कांद्याचे भाव १,६०० रुपयांपर्यंत कोसळले. पंधरा दिवसांपूर्वी लाल कांदा प्रतिक्विंटल ३,८०० रुपयांपर्यंत विकला गेला.

भारतीय कुटुंब व्यवस्थेवर पाश्चात्यांचे आक्रमण

$
0
0
मागील पंचवीस वर्षांत सगळ्याच क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल झाले आहेत. आधुनिक साधने आणि पाश्चात्य संस्कृतीने भारतातील आदर्श कुटुंब व्यवस्थेवर घाला घातला आहे. तरुणांमधील वाढत चाललेल्या चंगळवादी आणि भौतिकवादी जीवनात पैसा सर्वात महत्त्वाचा झाला असून, प्रत्येक जण पैशांच्या मागे बेलगाम धावत आहे.

बिटको कॉलेजवर 'भाविसे'चा मोर्चा

$
0
0
प्रसाधनगृहाची दुरवस्था, पाण्याच्या टाकीतील अस्वच्छता दूर करण्यासह कॉलेज परिसरात नियमित साफसफाई राबविण्याच्या मागणीने भारतीय विद्यार्थी सेना कार्यकर्त्यांनी बिटको कॉलेज परिसर दणाणून सोडला.

शिक्षणपध्दती सुधारण्यासाठी लढा

$
0
0
‘सध्याची शिक्षणपध्दती कालबाह्य होत असल्याने कार्यकर्त्यांनी शिक्षणपध्दती सुधारण्यासाठी सतत लढा द्यावा.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी केले.

आत्मप्रेरणेने शिस्तीचा स्वीकार

$
0
0
‘विद्यार्थ्यांनी आत्मप्रेरणेने शिस्त आचरणात आणण्याची गरज आहे. आई-वडिलांशी मनमोकळा संवाद साधा. त्यांच्या अपेक्षांचा आव्हान म्हणून स्वीकार करा, चांगुलपणाचा शोध घ्या,’ असे प्रतिपादन निवृत्त शिक्षक व साहित्यिक नरेश महाजन यांनी केले.

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग रेल्वेमंत्र्यांना साकडे

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध रेल्वे विषयक समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार समीर भुजबळ यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण तसेच इतर समस्यांसाठी त्यांना साकडे घातले.

सुविधा केंद्राचा झाला ‘कट्टा’!

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वी सेतू कार्यरत असलेल्या जागेवर सुविधा केंद्र साकारण्यात जिल्हा प्रशासनाला सपशेल अपयश आल्याने हे ठिकाण आता कट्टाच बनले आहे. त्यामुळे या ठिकाणाचा वापर आता टाइमपास करणाऱ्यांना अधिक असल्याचे दिसून येत आहे.

सरकारी वसाहतींची फरफट

$
0
0
नाशिकरोड येथील सरकारी वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कामगारांसाठी सरकारतर्फे दिली जात असलेली ही घरे अखेरची घटका मोजत आहेत. अशा पडक्या घरांमध्ये रहायचे तरी कसे असा सवाल कामगारांनी केला आहे.

प्रेक्षकांचे पाठबळ महत्त्वाचे

$
0
0
‘नाटकाची शोभा प्रेक्षक वाढवतात, त्यामुळे प्रेक्षकच खऱ्या अर्थाने एकांकिकांमध्ये बळ भरू शकतात. मी याच स्टेजवरून एकांकिका केल्या; त्यानंतर नावारूपाला आले.’ असे प्रतिपादन सुप्र‌सिध्द अभिनेत्री विद्या करंजीकर यांनी केले.

घंटागाडीचा ठेका रद्द करा

$
0
0
पंचवटी विभागातील अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेल्या नगरसेवकांनी विभागातील घंटागाडी ठेका रद्द करण्याची मागणी लावून धरल्याने प्रभाग सभापतींनी ठेका रद्द करण्याच्या ठरावास मंजुरी दिली.

‘आधार’ला किंमतच नाय !

$
0
0
घरगुती गॅससारख्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तुला आधार क्रमांक महत्त्वाचा ठरत असला तरी आधार कार्ड हे निराधारच असल्याचे निदर्शनास येत आहे. मतदार नोंदणी तसेच पॅनकार्डसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

जीवनदायी योजनेला प्रारंभ

$
0
0
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यात कार्यान्वित झाली असून या योजनेचा लाभ घेण्यास सुरूवात झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील ११ लाख ७६ हजार ४४२ नाशिककरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

छेडछाडीचा जाब विचारला : तिघांना मारहाण

$
0
0
विद्यार्थिनींची छेड काढणा-यांना जाब विचारण्यास गेलेल्या तिघा तरुणांवर ४० ते ५० रोडरोमियोंच्या टोळक्याने हल्ला चढवल्याची घटना बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे घडली.

काटवन परिसरात डिसेंबरमध्येच पाणीटंचाई

$
0
0
बागलाण तालुक्यातील काटवन परिसरात सलग चार वर्षांपासून अपुऱ्या पाऊस पडत असून यंदा तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. अखेर टेंभे वरचे येथील संतप्त महिलांनी टँकरने पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

वीजबिलवसुली सक्तीने; मात्र पुरवठा धीम्या गतीनेच!

$
0
0
महावितरणने कळवण तालुक्यात सक्तीने वीजबिलांची वसुली करूनही शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा सहन करावा लागत आहे. विजेच्या कालावधीतही कृषीपंपासाठी पुरेशी वीज मिळत नसल्याने परिसरातील कांदा लागवड उन्हाने होरपळून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

गंगापूर ‘STP’चा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

$
0
0
गंगापूर गावातील मलनि:सारण केंद्राच्या (एसटीपी) जागेबाबत जमीनमालकांचे आठवड्याभरात म्हणणे ऐकून पुढील दोन ते तीन आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

भंगार बाजाराला पुन्हा स्थगिती

$
0
0
अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजाराबाबत पर्यायी जागेचा विचार करून तसा अहवाल राज्य सरकारने सहा आठवड्यांत कोर्टाला सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

उद्योगांना सेवा देण्यास BSNL असमर्थ

$
0
0
जिल्ह्यातील उद्योगांच्या मागणीनुसार त्यांना टेलिकॉम सेवा देण्यास भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) असमर्थ असल्याची प्रांजळ कबुली देतानाच आम्हाला एकदा संधी द्या, असे आर्जव महाप्रबंधक सुरेशबाबू प्रजापती यांनी केले. ‘जिल्हा उद्योग मित्र’च्या बैठकीला ते पहिल्यांदाच उपस्थित होते.

तरुणाईच्या प्रतिसादाने खुलली एकांकिका स्पर्धा

$
0
0
मनसे व बाबाज थिएटर्सतर्फे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा उत्साह दुसऱ्या दिवशीही कायम होता. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत सादर करण्यात आलेल्या विविध १२ एकांकिकांना उपस्थित तरूणाईने जोरदार प्रतिसाद दिला.

औद्योगिक भूसंपादनाला चालना

$
0
0
जिल्ह्यातील औद्योगिक भूसंपादन अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच येत्या शुक्रवारी आणि शनिवारी वाटाघाटीसाठी तब्बल चार बैठका होणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images