तब्बल पंधरा महिन्यांच्या कालावधीनंतर एव्हरेस्ट कंपनीतील संप मिटला असला तरी बडतर्फ कामगारांचा निर्णय महिना उलटूनही झालेला नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना या समस्येचा विसर पडला आहे की काय, अशी विचारणा करणारे निवेदन नाशिक वर्कर्स युनियनने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्हाधिका-यांना 'एव्हरेस्ट'चा विसर?
↧
↧
जळगावात संपाला पाठींबा, प्रभाव मात्र नाही
विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला बँक व शासकीय कर्मचारी यांनी पाठिंबा दिला मात्र त्यांच्या सेवेवर परिणाम जाणवला नाही. देशव्यापी बंदची हाक दिली गेली असली तरी जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.
↧
केमिस्ट संपावर, एफडीएचा हेल्पलाइनचा उतारा
राज्यभरातील केमिस्टने 'नियमानुसार काम' करण्याचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हेल्पलाइन जाहीर केली आहे. तसेच, औषधांअभावी पेशंट मृत झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही एफडीएने दिला आहे.
↧
पदोन्नतीच्या ठरावाने केला भरतीचा मार्ग मोकळा
सुमारे महिन्यानंतर महापौरांनी पदोन्नतीबाबतचा महासभेचा ठराव उपायुक्तांकडे पाठविल्याने पदोन्नत्यांबरोबरच पुढील नोकर भरतीचाही मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नोकर भरतीत ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल, असे बुधवारी महापौरांनी जाहीर केले.
↧
'सिद्धिविनायक'ला निकाल पावला
नाशिक विभाग अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीचा राखून ठेवण्यात आलेला निकाल बुधवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला. त्यानुसार सिद्धिविनायक पॅनलला जीवनदान मिळाले असून त्यांच्यावरील संकट टळले आहे.
↧
↧
१२ हजार कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
विविध कामगार संघटनांनी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस 'भारत बंद'चे आवाहन केले आहे. बुधवारी जनजीवनावर या बंदचा फारसा परिणाम झाला नाही. दरम्यान, नाशिक जिल्हा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
↧
यंदा पदरात काही पडेल का?
रेल्वेचा अर्थसंकल्प येतो आणि जातो; परंतु नाशिकबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पात आगामी सिंहस्थाचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच नाशिक ते पुणे रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण होऊन काम सुरू होणे अत्यावश्यक आहे. मात्र यंदा तरी पदरात काही पडेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
↧
प्रमाणित शब्दकोष निर्मिल्यास मराठीला संजीवनी
मराठी भाषेचा प्रमाणित शब्दकोष नाही ही मोठी समस्या असून त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मराठीत पन्नासहून अधिक शब्दकोष आहेत, मात्र ते वैयक्तिक असल्याने भाषेविषयक अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्याच आहेत, यावर उपाय म्हणून सरकार प्रमाणित शब्दकोष निर्माण करण्याचे काम हाती घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. प्रमोद तलगेरी यांनी केले.
↧
मनमाडमधील पाणीटंचाई दूर होणार
मनमाडमधील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येवला नगरपालिकेची बंद पडलेली येसगाव (ता. कोपरगाव) येथील पाणी योजना पुनर्जिवित करण्याची शक्यता आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत या संदर्भात चर्चा केली.
↧
↧
ऊर्जा संवर्धनाला पालिकेचा 'बुस्ट'
'ग्लोबल वॉर्मिंग'ने सर्वदूर चिंता पसरवली असताना आणि जागतिक पातळीवर त्यावर उपाययोजना केली जात असताना नाशिक महापालिकेनेही आपला खारीचा वाटा उचलला आहे. ऊर्जा संवर्धनाच्या हेतूने महापालिकेने यंदाच्या बजेटमध्ये काही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत.
↧
वर्षभरात केवळ ४ हजार श्वानांचे निर्बीजीकरण
गेल्या वर्षभरात मोकाट कुत्र्यांनी शहरात धुमाकूळ घातला असताना महापालिका प्रशासन मात्र निर्बीजीकरणाची आकडेवारी जाहीर करुन आपल्याच पाठीवर थाप मारुन घेत आहे. गेल्या वर्षभरात केवळ ४ हजार १६५ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे प्रशासनाच्याच वतीने सांगण्यात आले.
↧
दुष्काळाला कारणीभूत सरकारच
राज्यभरात निर्माण झालेली दुष्काळाची परिस्थिती ही निसर्गाच्या प्रकोपाने नाही तर सिंचनाच्या बाबतीत सरकारच्या नियोजन शुन्यतेमुळे ओढावली असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाने केला आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवि देवांग यांनी हा आरोप पत्रकार परिषदेत केला.
↧
गणवेश घोटाळ्याप्रकरणी गुन्हा
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पंचायत समितीतील गणवेश घोटाळा प्रकरणात अडकलेले सटाणा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी.टी.पाटील गेल्या २१ दिवसांपासून फरार असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अक्षरशः वा-यावर असून शैक्षणिक कामकाज पूर्णपणे रखडले आहे.
↧
↧
पुरातन वास्तुंवर पालिकेचा 'स्पॉट लाइट'
रामाची नगरी म्हणून लौकिक असलेल्या नाशिकमध्ये मंदिरांबरोबर अनेक पुरातन वास्तुदेखील आपले अस्तित्व टिकवून आहेत. किंबहुना, या वास्तुंमुळे नाशिकच्या लौकिकात भरच पडली आहे.
↧
अवकाळी तडाखा ८० कोटींचा
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे तब्बल ८० कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. या तडाख्यामुळे आधीच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींत भरच पडली आहे. सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागायतदारांचे झाले आहे.
↧
आरोपीने न्यायाधीशांवर खुर्ची भिरकावली
कोर्टासमोर हजर केलेल्या आरोपीने न्यायाधीशांना अर्वाच्य भाषेत सुनावत त्यांच्या दिशेने खुर्ची भिरकावल्याची घटना बुधवारी जिल्हा कोर्टात घडली. महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक केलेल्या या आरोपीने सादर केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
↧
नाशिकच्या उद्योगांमध्ये पॉझिटीव्ह इन्व्हेस्टमेंट
मंत्र भूमी ते यंत्र आणि आता तंत्र भूमी म्हणून नावारुपाला येत असलेले नाशिक केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील झपाट्याने विकसीत होणारे ठरत आहे. देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबई तसेच ऑटो हब म्हणून ख्यात असलेल्या पुणे आणि औरंगाबाद नाशिकपासून जवळ आहे. शिवाय आल्हादायक हवामान आणि पाण्याची उपलब्धता ही नाशिकची जमेची बाजू आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये गुंतवणुकीचा ओघ पॉझिटीव्ह झाल्याचे दिसत आहे. नाशिकमध्ये यापूर्वी झालेल्या आणि होऊ घातलेल्या गुंतवणुकीवर टाकलेला हा फोकस...
↧
↧
हक्कांसाठी माथाडी कामगारांचा मोर्चा
मालधक्क्यावरील अधिकृत कामगारांना मंडळाच्या नियोजनाप्रमाणे काम द्यावे, तसेच अनधिकृत कामगारांना काम देणे बंद करावे अशा विविध मागण्यासाठी नाशिक जिल्हा माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मालधक्क्यावरील बहुसंख्य कामगार उपस्थित होते.
↧
स्टॅडिंगचं 'अंडरस्टॅडिंग'
महापालिकेची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या स्थायी समिती अर्थात 'स्टॅंडिंग कमिटीला' काही वर्षांपासून कमालीचं महत्त्व प्राप्त झालंय. या समितीतील सर्वच मंडळी बसलेली असतात, तरीही तिला 'स्टॅडिंग' का म्हणतात, याचं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही. या कमिटीत कुठलाही पक्ष नसतो. सर्वच सदस्य अगदी मिळून मिसळून, गुण्या गोविंदाने नांदतात.
↧
मोकाट जनावरांचा थांबा जीवघेणा
रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे वाहतूकीत अडथळा निर्माण होत आहे. यामुळे शहरातील सिडको, उपनगर, पेठरस्ता, गंगापूर रोड परिसरात चक्काजाम होण्यास मोकाट जनावरांचा रस्त्यातील ठिय्याच कारणीभूत ठरत आहे. वर्षानुवर्षे नाशिककरांची डोकेदुखी ठरणाऱ्या या समस्येकडे महापालिकेने डोळेझाक करू नये अशी नागरिकांची मागणी आहे.
↧
More Pages to Explore .....