सामान्य माणूस समजून घेण्याच्या भूमिकेत असलेल्या ‘आप’च्या प्रचाराचा या टप्प्यातील जोर ग्रामीण परिसर आणि कामगार वर्गाच्या भेटीगाठींवर दिसून येत आहे. या टप्प्यात उपनगरातील मतदारांच्या बरोबरीनेच ग्रामीण परिसरही ‘आप’चे उमेदवार आणि कार्यकर्ते पिंजून काढत आहेत.
ग्रामीण परिसर अन् कामगारांच्या भेटीगाठींवर ‘आम आदमी’चा भर
↧
↧
कर्मचारी प्रशिक्षण केंद्र धूळखात
↧
उमेदवारांचा भर `पर्सोनॅलिटी डेव्हलपमेंट`वर!
निवडणूक म्हटलं की, डोक्यावर टोपी, अंगात खादीचे कपडे चढवून हात जोडून मतांचा जोगवा मागणारे उमेदवार असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. सध्याचे उमेदवार मात्र स्टायलिश पेहरावासह, ट्रेण्डी राहत मतदारांसमोर जाताना दिसत आहेत.
↧
उमेदवारांच्या पत्रप्रपंचाला सुरुवात
लोकसभा निवडणुकीचा मोसम सध्या चांगलाच तापलेला असून, इच्छुकांचे मनोगत व हितगुज सोप्या शब्दात मांडणारी पत्र घरोघर वाटली जात आहे. यात प्रामुख्याने भाषा हा कळीचा मुद्दा ठरत आहे. मराठी, अहिराणी, इंग्रजी, उर्दू तसेच मतदाराला जवळची वाटेल, अशा भाषेत ही पत्र लिहिली जात आहेत.
↧
डाव्यांची भिस्त आडम अन् येच्युरींवर
विकासाचा दावा करणाऱ्या नेत्यांच्या या संकल्पनांवरच हल्ला चढविणाऱ्या डाव्या लोकशाही आघाडीच्या प्रचाराची भिस्त पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येच्युरी अन् माजी आमदार नरसैय्या आडम यांच्यावरच असणार आहे.
↧
↧
कान्हेरे मैदानात धडाडणार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
जाहिर सभांसाठी गर्दी जमावताना राजकीय पक्षांच्या नाकीनऊ येते. त्यातच ती जागा अनंत कान्हेरे मैदान असेल तर सभेच्या भाषणापेक्षा तेथील गर्दीच्या आकड्यांचीच अधिक चर्चा होते. गर्दी जमविण्यासाठी आव्हान ठरणाऱ्या अनंत कान्हेरे मैदानावर बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींची सभा पार पडली.
↧
खान्देशातील सुंदोपसुंदीचे नाशिकमध्ये उमटणार पडसाद?
खान्देशात भाजपा-सेनेतील सुंदोपसुंदीचे चव्हाट्यावर आली असून, त्याबाबत थेट मातोश्रीवर तक्रारी करण्याची चढाओढ सुरू आहे. विशेषतः धुळे, चोपडा याठिकाणी युतीत सख्य निर्माण करण्यात पदाधिकाऱ्यांना अपयश येत असल्याने याचे पडसाद नाशिकमध्ये उमटतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
↧
सुट्यांसाठी जादा गाड्यांचा दिलासा
परीक्षा संपल्यानंतर बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने बुधवार (२ मार्च) पासून ते २८ जूनपर्यंत हॉलिडे स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुट्यांमध्ये प्रवासाला जाणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
↧
‘आधी पुनर्वसन करा, मग अतिक्रमण काढा’
अतिक्रमण काढण्यापूर्वी महापालिकेने पुनर्वसन करावे, अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा गंगापूरोडवरील एसटी कॉलनीतील टपरीधारकांच्यावतीने जनहक्क संघटनेने दिला आहे.
↧
↧
नाशिकरोड विभागाच्या घरपट्टी वसुलीत वाढ
महापालिकेच्या नाशिकरोड विभागाने सरत्या अर्थिक वर्षात घरपट्टीच्या वसुलीत मागील वर्षीपेक्षा २ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. २०१३-१४ या वर्षासाठी कर्मचाऱ्यांना १४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात १२ कोटीची वसुली झाली असून ती ८० टक्के इतकी आहे.
↧
कारसूळचे पुन्हा पंचनामे करा
निफाड तालुक्यातील कारसूळ परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पुन्हा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार कारसूल परिसरातील ग्रामस्थ त्यांचे उपोषण मागे घेण्याची चिन्हे आहेत.
↧
एक खिडकी कक्षाचा बोजवारा
आचारसंहिता काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या कक्षाचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याच्या कुठल्याही भागात छोटी रॅली काढण्यासाठीही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाशिकची वाट धरावी लागत आहे.
↧
विवाहितेचा विनयभंग
पत्नीचा छळ करणाऱ्या पतीसह विनयभंग करणाऱ्या सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर उत्तम घुगे याच्यासह तिघांवर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो बदलापुर पोलिसांकडे वर्ग केला आहे. अक्षदा मयुर घुगे (रा. बदलापुर, सध्या पिंपळगाव बहुला) यांनी फिर्याद दिली आहे.
↧
↧
पवन एक्सप्रेसमध्ये जुळ्यांना जन्म
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पवन एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची प्रसूती होऊन तिने जुळ्यांना जन्म दिला. प्रसूती झालेल्या महिलेला नंतर नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्य़े दाखल करण्यात आले असून, दोन्ही बाळं व महिला सुखरुप आहे.
↧
‘एलईडी’चा आज फैसला
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनीच्या लढाईत प्रतिष्ठेच्या बनलेल्या एलईडी प्रश्नावर हाय कोर्ट आज, बुधवारी फैसला सुनावणार आहे. ऑक्टोबर २०१३ पासून सुरू झालेल्या सुनावणीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
↧
आजपासून ‘मिशन नॉमिनेशन’
चैत्र मासारंभाने वातावरणातील पारा तापू लागला असतानाच लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेमुळे आजपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापणार आहे. आजपासून (बुधवार) प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल होणार असल्याने खऱ्या अर्थाने रणधुमाळीस प्रारंभ होईल.
↧
बुद्धीला पटेल तेच करणार!
पहिल्यांदाच मतदान करण्याचा हक्क ज्या तरुणांना मिळाला आहे, त्यांच्या दृष्टीनेही आगामी निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. मतदार म्हणून पहिल्यांदा मत देणाऱ्या या युवकांवर पक्षांच्या विचारधारा, आश्वासने, मते-मतांतरे आणि चर्चांचा परिणामही होत आहे.
↧
↧
फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू असताना महापालिकेने भद्रकाली परिसरातील हॉकर्सना हटवून कायद्याची पायमल्ली केली आहे. असा आरोप करीत महापालिकेने फेरीवाल्याविरोधातील कारवाई थांबवावी, अशी मागणी नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीव गांधी भवनसमोर मंगळवारी आंदोलन करून केले.
↧
‘राम’ आणि ‘नाथ’ घोळ
सध्या निवडणुकांची धामधूम आहे. अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून प्रत्येक उमेदवार आपल्या सोबत जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे येतील याचा विचार करतोय. नुकतीच एका पक्षाने इदगाह मैदानावर सभा आयोजित केली होती. सभेला गर्दी करण्यात आयोजक चांगल्या प्रकारे यशस्वी झाले होते.
↧
हे कसले लोकप्रतिनिधी ?
एरवी लोकांचे प्रतिनिधी म्हणून साधेपणा मिरविणारे लोकप्रतिनिधी ज्यावेळी सर्वसामान्यांची फिकर बाळगत नाहीत त्यावेळी हे नक्की लोकांचेच प्रतिनिधी का असा प्रश्न निर्माण होतो.
↧
More Pages to Explore .....