बेहिशेबी व्यवहारांद्वारे कोट्यवधींचा काळा पैसा चलनात आणणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट सहकारी पतसंस्थेच्या घोले रोड शाखेवर (पुणे) सीबीआयने छापा घातल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच, या पतसंस्थेच्या जळगावमधील मुख्य कार्यालयात ठेवीदार आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करीत आहेत.
ठेवी काढण्यासाठी गर्दी
↧
↧
शहरात तणाव; बंदोबस्तात वाढ
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि दिमवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर तसेच छायाचित्र टाकल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला. आक्रमक झालेल्या संघटना कार्यकर्त्यांनी बसेसची, दुकानांची तोडफोड आणि रास्तारोको केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
↧
मिस्डकॉलचा खेळ
काही दिवसांपूर्वी कलेक्टर कचेरीत एका पक्षाचा कार्यकर्ता निवेदन देण्यासाठी म्हणून आला होता. कॅम्पसमध्ये आल्यावर त्याला लक्षात आले आपला अजून एक सहकारी आलेला नाही. त्या सहकाऱ्याची विचारपूस करण्यासाठी महाशयांनी मोबाईल हातात घेतला.
↧
पालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा
नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील मुकादम श्रावण जावळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या ब्रह्मानंद परदेशी यांना तत्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
↧
मान्सूनपूर्वचा जिल्ह्याला पुन्हा तडाखा
नाशिक जिल्ह्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी धुमाकूळ घातला. सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला तर निफाड तालुक्यात गारपिटीसह पाऊस झाला.
↧
↧
बांधकाम प्रकल्पांची मर्यादा वाढवावी
बांधकाम प्रकल्पांना पर्यावरणाबाबतच्या परवानग्यांबाबत विलंब होत आहे. यामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे स्वत:चे घर घेऊ इछिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यवसायिकांना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
↧
पावसामुळे कोट्यवधीचे नुकसान
कळवण तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हिंगवे येथे ४० ते ५० लाखाचे तर पिळकोस येथे १५ ते २० लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे.
↧
प्रार्थनास्थळावर दगडफेक
मालेगाव शहरातील मोसमपूल येथील एका प्रार्थना स्थळावर दगडफेक करणाऱ्या एका माथेफिरू तरुणाला छावणी पोलिसांनी अटक केली आहे.
↧
राज ठाकरे यांनी नांदगावमधून लढावे
राज ठाकरे यांनी नांदगांव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी आणि मनमाडचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी आग्रहाची मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली जाणार आहे.
↧
↧
नांदगावात उपरा उमेदवार नको
विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने इच्छुक तयारीला लागले आहेत. यामुळे नांदगाव मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. उमेदवारीसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.
↧
`टोळधाडी`चा बंदोबस्त करा
मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर टोलच्या दरांत भरघोस वाढ करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील वाहनांना या टोलदरवाढीतून दिलासा देण्यात आला असला तरी इतर जिल्ह्यातील वाहनचालकांनी काय पाप केले आहे, म्हणून त्यांनी वाढीव टोल द्यावा.
↧
महापालिकेकडूनच पाण्याचा अपव्यय
जेलरोड येथील महापालिकेच्या कार्यालयावरील पाण्याच्या टाकीतून अनेक वर्षांपासून सकाळ-संध्याकाळ पाणी ओव्हरफ्लो होत असूनही कोणीच लक्ष देत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
↧
पोलिस ठाण्याला लागेना मुहूर्त
अंबड औद्योगिक वसाहतीतील पडून असलेल्या भूखंडावर पोलिस ठाण्याच्या उभारणीला मुहूर्त लागणार तरी कधी, असा सवाल उद्योजक उपस्थित करत आहेत. गेल्या वीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा भूखंड विना वापर पडून आहे.
↧
↧
कृषी शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान विद्याशाखेंतर्गत सर्व शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रातील ५७ कृषि शिक्षण केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे.
↧
डीटीएडच्या अर्जविक्रीला सुरुवात
शैक्षणिक वर्ष सन् २०१४-१५ साठी डीटीएड (अध्यापन शिक्षण पदविका) अर्जविक्रीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ही अर्जविक्री १६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तर १७ जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नितीन बच्छाव यांनी दिली.
↧
कॉपीच्या घटना घटल्या
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात कॉपीच्या घटनांमध्ये तुलनेने मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी २८१ कॉपीची प्रकरणे या विभागात उघडकीस आली होती. आता हे प्रमाण १४० वर आले आहे.
↧
समुपदेशकांशी संपर्क साधा
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नाशिक विभागीय मंडळाने हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून दिले आहे.
↧
↧
नाशिक विभागात सायन्स अव्वल
बारावीच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालात सायन्सच्या विद्यार्थ्यांचा दबदबा कायम राहिला. गुणांच्या स्पर्धेत नाशिक विभागासह चारही जिल्ह्यांत सायन्सच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व मिळविल्याची माहिती एसएससी बोर्डाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.
↧
आमंत्रण आहे तुम्हा सर्वांना...
महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील एक कोन म्हणून मुंबई, पुण्यापाठोपाठ झपाट्याने विकसित होणारे शहर असे नावलौकिक असणाऱ्या नाशिक महानगराला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या रूपाने तीन वर्षांपूर्वी एक ‘स्मार्ट’ मित्र मिळाला. नाशिककरांच्या मनात घर करून बसलेला ‘मटा’ यंदा चौथ्या वर्षात पदार्पण करतोय.
↧
...अन् २५० कामे प्रलंबित
सिंहस्थ कुंभमेळ्या संदर्भातील कामे वगळता महापालिकेची इतर कामे पैशांअभावी ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. ठेकेदारांना तब्बल ४० कोटी रुपयांची देणी बाकी असल्याने नवीन कामांचे टेंडर अनेकदा प्रसिध्द करूनही ठेकेदार पुढे येत नाही.
↧
More Pages to Explore .....