इगतपुरी या तालुक्यात रेल्वे वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणात असूनही सुविधा मात्र मिळत नाही. यामुळे रेल्वे प्रवाशाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घोटी-इगतपुरी रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधिंनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे.
रेल्वे स्टेशनला विकासाची प्रतीक्षा
↧
↧
शहाणपण देगा देवा!
पुढच्याला ठेच मागचा शहाणा अशी म्हण आपण नेहमी वापरत असतो. मात्र, नाशिकमध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने अनेकांना जमिनीवर आणले तरीही केबीसीमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करून अनेकांनी स्वतःची फसवणकू करून घेतली.
↧
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यामुळे नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वतीने राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.
↧
मतदारांच्या भेटीगाठीवर भर
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण २९ जागांसाठी ८० उमेदवार आपले नशीब आजमावत असून परिवर्तन, श्री विजय, लोकनेते अशा तीन पॅनलची निर्मिती झाली आहे. निवडणूक जवळ येऊन ठेवल्याने उमेदवार मतदारांच्या भेटीगाठीवर भर देत आहेत.
↧
छावाचे आजपासून उपोषण
संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज समाधी संस्थानच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी छावा संघटनेने १४ जुलै पासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.
↧
↧
`त्या` निघाल्या पाकिटमार
दिंडोरी शहरात धामण नदी किना-यालगत सीताफळ बागातून पाच-सहा महिला भर दुपारच्या वेळेत तान्ह्या मुलांना कडेवर घेवून पेठ गल्लीत घुसल्या. कुणाला वाटलं भीक मागणाऱ्या महिला असाव्यात. पण त्या कुणाकडे भीक मागत नव्हत्या की काही नाही.
↧
नाशिक-पुणे मार्गावर कोंडी
नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीने पुन्हा डोकेवर काढले आहे. गेल्या आठवडाभरापासून वाहनचालकांना कसरत करतच वाहने दामटावी लागत आहेत. आज रुंदीकरणाला सुरुवात होईल. उद्या होईल, या आशेवर नागरिक आहे.
↧
शहरात नाकाबंदी
शनिवारी एकाच दिवसात सोनसाखळीच्या चार घटना घडल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चोरट्यांचा उच्छाद रोखण्यासाठी शहरात रविवारी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.
↧
‘केबीसी’चा तपास सेबीकडे ?
केबीसीने केलेल्या फसवणुकीचा तपास हा स्थानिक पोलिसांनी करावा एवढा हा मर्यादीत विषय नाही. परदेशातही तपासाची परवानगी असलेल्या सेक्युरीटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे हा तपास जावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
↧
↧
पैसे बाळगताना घ्या काळजी
बँकामध्ये आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी याच्या मार्गदर्शक सूचनाच पोलिसांनी आता प्रसिध्दीसाठी दिल्या आहेत. शहरातील सर्व बँकांना या सूचनापत्रांचे वाटप केले जाणार असून बँकांनी नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
↧
कांदा उत्पादकांच्या मांडल्या समस्या
येवल्यातील भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. कांदा, टोमॅटो, बटाटे या शेती पिकांसाठी धोरण ठरवून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान व फसवणुकीला आळा घालण्याचे नियोजन असल्याचे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी यावेळी सांगितले.
↧
मालेगाव महापालिकेचे लेखापरीक्षण करावे
मालेगाव महापालिकेत सत्तारूढ काँग्रेस व तिसरा महाजने संगनमताने सफाई ठेक्यासह विविध विकासकामांत भ्रष्टाचार सुरू केला आहे. निविदा न काढता काही विकासकामे देण्यात आली आहेत.
↧
राणेनगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
प्रभाग क्रमांक ५३ मधील राणे नगर परिसर चक्क कचऱ्याने माखला आहे. परिसरात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी नियमित येत असूनही नागरिक उघड्यावर व मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे.
↧
↧
आषाढीनंतर पावसाने फिरवली पाठ
अगोदरच कोरड्याठाक गेलेल्या रोहिण्या, नंतरच्या महत्वपूर्ण 'मृगा'च्या पाठोपाठ आलेल्या 'आर्द्रा' ने दिलेला मोठा दगा असा तब्बल महिना सव्वामहिना यंदा वरुणराजाने येवला तालुक्यातील बळीराजाला आकाशाकडे आशाळभूतपणे नजरा लावत मानपाठ एक करावयास लावले.
↧
हरसूलला दुबार पेरणीही वाया
हरसूल परिसरात पावसाच्या भरवशावर टाकलेली रोपे पाण्याअभावी करपू लागली आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र, आता दुबार पेरणीही वाया गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. परिसरावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.
↧
क्रीडा धोरणाला अखेर लागला मुहूर्त
महापालिकेच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत क्रीडा धोरणास महापौर अॅड. यतीन वाघ यांनी सोमवारी (ता.१४) मंजुरी दिली. या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात येत असले तरी या धोरणाची अंमलबजावणी हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. विरोधकांनीही हाच मुद्दा चर्चेदरम्यान लावून धरला.
↧
सटाण्यात अपघातात दांपत्य ठार
सटाणा शहरापासून १३ किमी अंतरावर असलेल्या विंचूर शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील हॉटेल तकदीर नजीक रविवार रात्री साडे दहावाजेच्या सुमारास दोघा मालमोटारमध्ये मोटारसायकल दबून झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याने सटाणा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
↧
↧
सिमेंटचे दर वाढविण्याचा घाट
केवळ नफेखोरीसाठी सिमेंट कंपन्या सिमेंट गोणीचे दर अव्वाच्या सव्वा वाढवत असून येत्या काही दिवसातच हे दर ४०० च्या आसपास करण्याचा घाट सिमेंट कंपन्यांनी घातल्याचा आरोप, क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने पत्रकार परिषदेत केला आहे.
↧
केबीसीचे दोन बळी
जुन्या नाशकातील कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या मायलेकांनी केबीसी कंपनीत गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने सोमवारी (ता.१४) पहाटेच्या सुमारास राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली.
↧
राजाभाऊ वाजेंचा गुरुवारी शिवसेनेत प्रवेश
जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजता मुंबई येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे वाजे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत तालुक्यात सुरू असलेल्या तर्क वितर्कांना पूर्ण विराम मिळणार आहे.
↧
More Pages to Explore .....