मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील
विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यात टाळाटाळ होत असल्याने कामकाजावर
परिणाम होत आहे. यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक संघाने
गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेत विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले त्वरित
मिळावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
मुख्याध्यापक संघाचे आंदोलन
↧
↧
नगरपालिकांचे कामकाज ठप्प
रोजंदारी कर्मचारी कायम करणे, वेतन
व पेन्शनसाठी १०० टक्के अनुदान देऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासह इतर
मागण्यांसाठी जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत कामबंद
आंदोनल दुस ऱ्या दिवशीही सुरू राहिल्याने नगरपालिकांचे कामकाज ठप्प झाले.
↧
सरी आल्या धावून...
पावसाळ्याला प्रारंभ होऊन तब्बल दीड महिना उलटल्यानंतर पावसाने नाशिक शहर परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार हजेरी लावली. इगतपुरी व त्र्यंबकमध्ये दिवसभर संततधार सुरू होती. दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर असताना पावसाच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण असून, आगामी काही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहण्याची चिन्हे आहेत.
↧
रविवार पेठेत सहा दुकाने फोडली
बॅग लिफ्टींग, चेन
स्नॅचिंगच्या लागोपाठ घडणाऱ्या घटना कमी म्हणून की काय, चोरट्यांनी
शहरातील मध्यवस्तीतल्या बाजारपेठेलाही बुधवार (ता. १६) पहाटे लक्ष्य केले. रविवार
पेठ आणि घनकर गल्लीतील सहा किराणा दुकाने फोडत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला.
दुर्दैवाने त्यांच्या हाती फारशी रोकड न लागल्याने व्यापाऱ्यांनी सुस्कारा सोडला
असला तरी बराच माल चोरीस गेला. दुकानाबाहेर ट्रक उभा करून माल लांबविण्यात आला.
↧
शनिवारी रंगणार ‘मौनराग’चा प्रयोग
प्रायोगिक रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवणारी अनेक नाटके सध्या सुरु आहेत. 'आविष्कार'सारख्या अनेक संस्था आपले वेगवेगळे प्रयोग घेऊन प्रायोगिक रंगभूमीवर ठामपणे उभ्या आहेत.
↧
↧
आगीत दोन लाखांचे नुकसान
येवला तालुक्यातील विखरणी शिवारातील शेतकऱ्याच्या घरालगतच्या शेडला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आगीत उन्हाळ कांदा, मोटरसायकल, सायकली व शेती उपयोगी साहित्य भस्मसात झाले.
↧
शहर कारभाराचा उडाला बोजवारा
सटाणा शहरात गत तीन दिवसांपासून पालिका कर्मचारी संपात सहभागी असल्याने शहरातील पाणी, आरोग्य व स्वच्छता यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. महिला व पुरूषांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर हंडे घेवून उतरावे लागत आहे.
↧
शेततळे निर्मितीचे गौडबंगाल
तालुक्यातील दहिदी येथील हरियाली पाणलोट विकास योजनेअंतर्गत शेततळे न बांधताच निधीचा अपहार करून हे प्रकरण उघडकीस येते आहे हे लक्षात आल्यावर अर्ध्यारात्रीत शेतावर शेततळे निर्मितीचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री आमदार दादा भुसे यांच्या प्रयत्नातून हाणून पडण्यात आला.
↧
‘सिन्नर नागरीमधील ज्येष्ठांच्या ठेवी परत करा’
सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेतील जेष्ठ नागरिक व अल्पबचत ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्थेने प्राधान्याने परत कराव्यात, अशी मागणी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
↧
↧
गंगापूर धरणावर मद्यपींचा हैदोस
गंगापूर धरणाभवती मद्यपींचा हैदोस पहायला मिळत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रासले आहेत. तर यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात येत असल्याची तक्रार गंगावऱ्हे, सावरगाव येथील ग्रामस्थ करत आहेत. सिंचन विभाग व पोलिसांकडून यबाबत गंभीर दखल घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
↧
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे काम सुरू करा
नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी चालू अधिवेशनात आर्थिक तरतूद करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे काम तत्काळ सुरू करावे यासाठी खासदार गोडसे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली.
↧
प्रचार अंतिम टप्प्यात
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून तीनही पॅनलचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी बरोबरच सोशल मीडियाचाही वापर करीत आहेत. यामुळे निवडणुकीत चांगीच रंगत आली आहे.
↧
पूररेषेबाबत निघणार कायमचा तोडगा?
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पूररेषेतील मिळकतीबाबत चर्चा करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा अॅड. यतीन वाघ यांनी केली. यापूर्वी अनेकदा अशा घोषणा करण्यात आल्या असून यावेळी तरी या प्रश्नावर तोडगा निघेल का असा प्रश्न पूररेषा बाधितांकडून उपस्थित केला जातो आहे.
↧
↧
साधुग्रामची ४७ एकर जमीन आरक्षित
साधुग्रामसाठी आरक्षित असलेल्या ३२२. ९० एकर जमिनीपैकी ४७ एकर जमीन आरक्षित करण्यासाठी महासभेने मंजुरी दिली. ४७ एकर जमिनीमध्ये पांजरपोळ ट्रस्टसह स्वामी नारायण मंदिर ट्रस्टच्या जागेचा समावेश आहे.
↧
उद्यापासून टाइम्स प्रॉपर्टी शो
शेकडो प्रॉपर्टीजची माहिती एकाच छताखाली ओझरककरांना उपलब्ध व्हावी या हेतूने टाइम्स ग्रुपतर्फे आयोजित ‘टाइम्स प्रॉपर्टी शो-२०१४’चा शुभारंभ उद्या (दि. १९) होणार आहे.
↧
सुरक्षा कर्मचारी मानधनावरच
महापालिका हॉस्पिटलच्या सुरक्षेसाठी मानधन तत्त्वावर १५२ कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय महासभेने घेतला. अभ्रक चोरींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेसमोर ठेवला होता.
↧
नियोजन विभाग होणार ‘पेपरलेस’
राज्य व केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांसह आमदार आणि खासदारांच्या निधीतून जिल्ह्यात होणाऱ्या कामांची मंजुरी मिळणाऱ्या नियोजन विभागाचे कामकाज `पेपरलेस` होणार आहे.
↧
↧
निर्माल्याचा प्रस्ताव फेटाळला
त्र्यंबकेश्वर येथे गोदापात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी नारायण नागबली आणि अन्य विधीनंतरचे पिंड व निर्माल्य नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पावर प्रक्रियेसाठी पाठविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळण्यात आला.
↧
केबीसी विरोधात ३४६ तक्रारी
केबीसी कंपनीने केलेल्या फसवणुकीविरोधात तक्रार देण्यासाठी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुंतवणकदारांची गर्दी होऊ लागली आहे. गुरुवारपर्यंत पोलिसांना ३४६ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत १३ कोटी ६२ लाखांची फसवणूक झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
↧
रिलायन्सच्या खड्ड्यात ३ जखमी
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ४ जी कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून शिखरेवाडी परिसरात गुरुवारी तीन जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून दोन जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.
↧
More Pages to Explore .....