Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रंगभूमीवरची एक्झिट म्हणजेच परतण्याची कमिटमेन्ट!

0
0
परवा प्रख्यात अभिनेता प्रशांत दामले यांनी दोन वर्षांसाठी रंगभूमीला टाटा केला. नाशिककरांचं भाग्य हेच, की ही चोवीस महिन्यांची एक्झिट या ज्येष्ठ अभिनेत्यानं नाशिककर रसिकांच्या साक्षीनं घेतली.

पाणीपुरवठा पूर्ववत करा

0
0
सटाणा शहरात गत दहा ते बारा दिवसांपासून पालिका प्रशासनाकडून होणारा पाणीपुरवठा बंद असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सद्यस्थिती पालिका कर्मचाऱ्यांचा संप मिटला असून गिरणानदी देखील वाहू लागल्याने तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.

खंडित वीजपुरवठ्याचा उद्योगांवर परिणाम

0
0
सिन्नर तालुक्यातील मुसळगाव व माळेगाव औद्योगिक वसाहतीत काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे अनेक उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर निमाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच वीजवितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पी. एस. नेवासकर यांची भेट घेवून तक्रारी मांडल्या.

राज्यात 'महायुती'चा भगवा फडकणार

0
0
एखादा कार्यकर्ता शिवसेनेत प्रवेश करतो म्हणून त्याच्या केवळ स्वागताची सभा एवढी मोठी होती, ही गोष्ट आपणास फार मोठी वाटते. या सभेच्या प्रचंड उपस्थितीवरूनच महायुतीचा भगवा येवल्यासह संपूर्ण राज्यात दिमाखाने फडकेलच याची साक्ष पटते.

पाणी योजनेचा त्र्यंबकवासीयांना भुर्दंड?

0
0
सिंहस्थ नियाजना अंतर्गत त्र्यंबक शहराकरीता नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. गौतमी बेझे धरणातून पाणीपुरवठा होणार असून या योजनेचाच एक भाग म्हणून शहरातील वितरण व्यवस्था नव्याने तयार करण्यात येत आहे.

इगतपुरीत एकाच रात्रीत चार घरफोड्या

0
0
इगतपुरी येथील पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खालची पेठ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चार घर फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वच्छतेऐवजी दंडवसुलीचा अजेंडा

0
0
शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून अवघ्या दीड वर्षात अमूल्य क्लिनअप संस्थेने ४७ लाख रुपये वसूल केले आहेत. अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून जनजागृती करण्यासाठी महापालिकेने या संस्थेची नियुक्ती केली असली तरी जनजागृतीकडे दुर्लक्ष करून संस्थेकडून फक्त दंड वसुलीलाच प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अशोकनगरला कंटेनरचे जाळे

0
0
अशोकनगर रस्त्यावर चोवीस तास कंटेनर व ट्रकांचे जाळे पसरले आहे. त्यातच महापालिका व पोलिस प्रशासन कारवाई करताना कानाडोळा करत असल्याचा आरोप रहिवाशी करत आहेत. आरटीओचे अधिकारीही या ठिकाणी केवळ पाहणी करुन निघून जात असल्याचा आरोप केला जात आहे.

जात पडताळणी प्रलंब‌ित

0
0
समाज कल्याण व‌िभागाच्या नाश‌िकमधील जात पडताळणी सम‌ितीला पूर्णवेळ अध्यक्षच नसल्याने ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळात पाच हजारांवर जात पडताळणी प्रकरणे प्रलंब‌ित आहेत.

‘इंडिया बुल्स’साठी पर्यावरण सुनावणी

0
0
सिन्नर येथील इंडिया बुल्सच्या प्रस्तावित विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसइझेड) जाहीर पर्यावरण विषयक सुनावणी पुढील महिन्यात होणार आहे. या प्रकल्पामुळे होणारी पर्यावरण तसेच इतर हानीबाबत नागरिकांनी लेखी तक्रारी नोंदविण्याचे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.

पठाण, दोंदे यांना अटक

0
0
जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याला मारहाण केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी टिप्पर गॅंगचा म्होरक्या समीर नासीर पठाण तसेच संदीप दोंदे या आरोपींना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी कोर्टामध्ये हजर केले जाणार असल्याची माहिती नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिली.

वॉटर स्पोर्टस् - प्रगतीचा ‘नॉटिकल माईल’

0
0
पाण्याशी माणसाचं ‘जीवानाचं’ नातं आहे. त्यामुळे पाण्यात खेळण्याची आवडही जन्मजात! आधी पोहणं, मग तराफ्यावरून तरंगत किनारा गाठणं त्यानं लाटांच्या साक्षीनं अनुभवलं, तलावापासून समुद्रापर्यंत संचार करताना या छंदासाठी लागणारं वाहन आधुनिक होत गेलं. बोटी यांत्रिक तशा तांत्रिकही झाल्या.

गडकरींच्या भेटीने विमानसेवेचा टेक ऑफ!

0
0
केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यार येत असून, ओझरला येताच ते विमानतळ व टर्मिनलची पाहणी करणार असल्याने नाशिकच्या विमानसेवेच्या टेक ऑफचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नाशिककरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मोबाईल टॉवरच्या नावाखाली फसवणुकीचा फंडा

0
0
केबीसी, इमू, कपालेश्वर या सारख्या अनेक फसव्या योजनांमध्ये नाशिककरांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अशा फसव्या योजनांना बळी पडणाऱ्यांबरोबरच मोबाईल टॉवर लावून लाखो रुपये कमविण्याचे स्वप्न पाहून अनेक जण फसत आहेत. मात्र, तक्रार करण्यास कुणी पुढे येत नसल्याने कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र सदनाचे ‘लॉजिंग’ करा

0
0
महाराष्ट्र सदनात निकृष्ठ जेवण मिळत असल्याने शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन केले. या आंदोलनाचे समर्थन करीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्य सरकारवर टीका केली.

ओव्हरसीज् नकाशावर नाशिक

0
0
जलक्रीडेची मजा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर कलात्मक, रोमांचक साहसी व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या जलक्रीडांच्या विविध प्रकारांमध्ये सहभाग घ्यायला हवा.

बे‌शिस्त ‌रिक्षाचालकांना दणका

0
0
बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कायद्याचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे सर्व कागदपत्रे जवळ बाळगा, वाहतुकीचे सर्व नियम पाळा, असे आवाहन पोलिस उपायुक्तांनी करूनही बेशिस्त रिक्षाचालकांनी नियम धाब्यावर बसविल्याचा प्रत्यय आला.

ठाकरेंकडून मतदारसंघांची चाचपणी

0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील ३५ मतदारसंघाचा आढावा घेऊन इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. ३५ मतदारसंघातील २० ​जागा शिवसेनेकडे तर १५ भाजपकडे असून शिवसेनाही स्वबळाचे कार्ड पुढे करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

गंगापूर धरणावर युरो-३ बोटी

0
0
गंगापूर धरणाजवळ अंतिम टप्प्यात असलेल्या बोटक्लबसाठी जलसिंचन विभाग व पर्यटन विभागाकडून युरो २ आणि युरो ३ मापदंड असलेल्या बोटी वापरल्या जाणार आहेत. त्यातील २८ बोटी धरणावर दाखल झाल्या असून, काही दिवसांत उर्वरित १९ बोटी दाखल होणार आहेत.

‘कांद्याबाबत फेरविचार करावा’

0
0
केंद्र शासनाने पणन कायद्यातून कांदा वगळणे हे अत्यंत अव्यवहार्यपणाचा व घाईतील निर्णय आहे. शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार आहे. बाजार समितीमध्ये साठीबाजीचा संबंधच येत नसल्याने केंद्र शासनाने उपरोक्त निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी माणगी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images