Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महापालिकेला प्रतीक्षा आदेशाची

0
0
मुख्यमंत्र्यांनी एलबीटी की जकात हे ठरवण्याचा अधिकार महापालिकांना दिल्यापासून प्रशासनाला राज्य सरकारच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा आहे. व्यापारी उद्योजकांकडून एलबीटीस प्राधान्य देण्यात येत आहे. तर जकात सुरू करण्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी अनुकूल असल्याचे चित्र दिसून येते.

उघड्या डीपी ठरताहेत जीवघेण्या

0
0
वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने जुन्या नाशिकमध्ये रविवारी एका चिमुरड्याचा शॉक लागून मृत्यू झाला. जुन्या नाशिकसह अनेक भागांत उघड्या डीपी आणि धोकादायक ट्रान्सफार्मर असून, महावितरण त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. शहरात सुमारे चार हजार डीपी आहेत. यातील बहुतांश धोकादायक स्थितीत आहेत. अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

भुजबळांचा विकासाचा मुद्दा ऐरणीवर

0
0
विकासवंचित येवला विधानसभा मतदारसंघाला सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या निमित्ताने विकासाभिमुख नेतृत्व लाभले. भुजबळ यांनी तालुक्याच्या राजकारणातील मुख्य प्रश्‍न असणार्‍या पाटपाण्याच्या प्रश्‍नाला गती दिली. निधी उपलब्धतेने उत्तर-पूर्व भागाला जलसंजीवनी ठरणार्‍या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोच कालव्याचे काम वेगाने सुरू असून, भविष्यात या कालव्याने पाणी प्रवाहीत होईल, अशी येवलेकरांना आशा आहे.

हिंदुत्ववादी संघटनांची चौकशी?

0
0
धुळे शहरातील मच्छिबाजार परिसरात जानेवारी २०१३ मध्ये झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती श्रीकांत मालते आयोगापुढे हिंदुत्ववादी संघटनांची लवकरच चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. या दंगलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला होता.

शिवसेनेचे मिशन आदिवासी मतदारसंघ

0
0
भाजपपाठोपाठ शिवसेनेनही जिल्ह्यातील आदिवासी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, सेनेच्या कोट्यातील तीनही आदिवासीबहुल मतदारसंघ जिकंण्याची रणनीती आखली आहे. याच रणनितीचा भाग म्हणून इगतपुरीत बुधवारी (ता.२०) शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नाशिकरोडला स्वच्छता कार्यालयाचा शुभारंभ

0
0
स्वच्छतेच्या ठिकाणीच आरोग्य संपदा असते. नागरिकांनी वृक्षलागवड करून हरित नाशिक, सुंदर नाशिक ही संकल्पना राबवावी. प्लॅस्टिक पिशव्या आणि वस्तूंचा वापर टाळावा. कचरा हा घंटागाडी अथवा कचराकुंडीतच टाकावा, असे प्रतिपादन महापालिकेचे आरोग्य अधिकारी सुनिल मुकाणे यांनी मंगळावारी येथे केले.

मविप्रच्या पुरस्कारांचे वाटप

0
0
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या समाजदिनाचे निमित्त साधून संस्थेतर्फे व‌िव‌िध क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारे पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. समाज दिनाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्‍येष्ठ साह‌ित्यिक राजन गवस उपस्थित होते.

गुणवत्तेच्या संकल्पनाच बदलायला हव्यात

0
0
श‌िक्षणाने समाजातील व‌िषमता हद्दपार व्हायला हवी. सध्याच्या श‌िक्षण पध्दतीत मात्र नेमके याउलट घडते आहे. श्रीमंत अन् गरीब अशी व‌िषम दरी ही पद्धती न‌िर्माण करते आहे. गुणवत्तेच्या आपल्या संकल्पनाही जीवनाला केवळ उपभोगवाद अन् व‌िध्वंसाकडे घेऊन चालल्या आहेत. या संकल्पनांची जोखड दूर करण्याची गरज या वळणावर न‌िर्माण झाली आहे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साह‌ित्यिक राजन गवस यांनी व्यक्त केली.

जेईईच्या तयारीसाठी एमकेसीएलचे ऑप्शन

0
0
बारावीनंतर जेईई प्रवेश परीक्षेला सामोरे जाणाऱ्या व‌िद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी एमकेस‌ीएलने ‘मास्टरींग जेईई’ ही सुव‌िधा उपलब्ध करून द‌िली आहे. ‘ई टेस्ट’, ‘मॉक टेस्ट’ अशा चाचण्यांच्या समावेशातून अकरावी आण‌ि बारावी या दोन वर्षाच्या कालावधीत व‌िद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाणार आहे.

महाव‌िद्यालयांची संलग्नता काढणार

0
0
सातत्याने नोटीस द‌िल्यानंतरही व‌िद्यापीठाचे आदेश धुडकावणाऱ्या महाव‌िद्यालयांची संलग्नता काढण्याचा इशारा साव‌ित्रीबाई फुले पुणे व‌िद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना द‌िला आहे.

एमकेसीएल घडव‌िणार ड‌िजिटल फ्र‌िलान्सर

0
0
प्रॉडक्ट बेस्ड संकल्पनेचा उंबरठा ओलांडत रोल बेस्ड नव्या अभ्यासक्रमांची आखणी करून व‌िद्यार्थ्यांमधून आता ड‌िजिटल फ्र‌िलान्सर घडव‌िण्यासाठी एमकेसीएल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन) ने नवे पाऊल टाकले आहे. नव्या प्रवाहातील व‌िद्यार्थ्यांसाठी रोजगार न‌िर्मितीला या प्रयोगातून चालना म‌िळेल, असा आशावाद एमकेसीएलकडून व्यक्त होत आहे.

अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू

0
0
शहरातील अशोकनगर येथील बसस्टॉपवरील पास केंद्र बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हे केंद्र त्वरित सुरू न केल्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा ‘छावा’ या संघटनेमार्फत देण्यात आला आहे.

ओझरला दहीहंडीचा थरार

0
0
मुंबई, पुण्याच्या धरतीवर गोपालकालानिमित्त ओझर येथे दहीहंडीचा थरार अनुभवायला आला. आर. के. हेल्‍थ क्लब व आर. के. मेमोरियल हॉस्पिटलतर्फे रांगोळी स्पर्धा, नटखट बाल गोपाल स्पर्धा, नवीन तोलानी ग्रुप डान्‍स स्पर्धा घेण्यात आल्या. सिने अभिनेत्री सुदिपा सिंग हिच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

कळवाडी गावठाणातील अतिक्रमण काढणार

0
0
तालुक्यातील कळवाडी गावठाणमध्ये सातत्याने वाढत असलेले अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात येईल, असा निर्णय स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. ही माहिती सरपंच गिरधर देसले यांनी दिली.

कळवणची सांडपाण्याची समस्या सुटणार

0
0
कळवणच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच नगरांची समस्याही वाढत आहे. रस्ते, गटार व सांडपाणी या प्रमुख समस्या जनतेला भेडसावत आहेत. कळवण शहरात गटार व सांडपाण्याचे निर्मूलन करण्याची मोठी समस्या आहे.

राष्ट्रवादीचे युवा नेते शिवसेनेत दाखल

0
0
राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस संजय गोडसे, जिल्हा उपाध्यक्ष राजू चौधरी, संदीप घुले यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

खासगी शाळांमध्ये मैदानांची वानवा

0
0
वाढत्या लोकवस्तीत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी सातपूर भागात अनेक खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा वाढल्या पण, विद्यार्थ्यांसाठी मैदानेच नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळांपासून वंचित रहावे लागत आहे. सरकारने शाळांना मंजुरी देताना मैदाने असणे सक्तीचे करायला हवे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

‘सिन्नर तालुक्यातील समस्या सोडविणार’

0
0
आगामी काळात राज्यात महायुतीचेच सरकार येणारआहे. भगवा सप्ताह व शाखा उद्घाटनांच्या निमित्ताने तालुक्याच्या ग्रामीण भागात फिरत असताना समस्यांचे भीषण वास्तव समोर येत आहे. या सर्व समस्या समजावून घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून सरकार दरबारी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राजाभाऊ वाजे यांनी शहा येथे झालेल्या सभेत दिली.

‘वीज नियामक आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी करा’

0
0
वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वीज ग्राहकांना विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार सेवा देण्यात येत नाही. आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षक कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ‘बुरे दिन’

0
0
पाकिस्तान, इजिप्तमधून होत असलेल्या कांद्याच्या आयात तसेच डाळिंबास केलेल्या निर्यात बंदीमुळे केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांवर ‘बुरे दिन’ लादल्याने उद्ध्वस्त होण्याची वेळ येवून ठेपली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images