Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फायरमनसाठी आगविरोधी सुटस्

$
0
0
अग्निशमन दलातील १२५ कर्मचाऱ्यांना फायर प्रोक्सिमिटी सुटस् खरेदी करण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आजच्या बैठकीत हिरवा कंदील दर्शवला. या खरेदीसाठी एक कोटी १९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून बुधवारच्या बैठकीत महत्वपूर्ण विषयांना चर्चेविना मंजुरी देण्यात आली.

अंधश्रद्धेविरोधात तीव्र लढा उभारा

$
0
0
भारतात अंधश्रद्धांचे प्रकार वाढले आहेत. सर्व समाजाने एकत्र येत या विरोधी लढा उभा केला पाहिजे' असे आवाहन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी नाशिक येथे केले.

भुजबळ पिता-पुत्र पुन्हा रिंगणात

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. जिल्ह्यातील १५ जागांसाठी तब्बल ५८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातून, तर आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगावमधूनच इच्छुक म्हणून अर्ज दाखल केल्याने दोघांच्या उमेदवारीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

माझा महाराष्ट्र सर्वात मागे

$
0
0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीची बुधवारी खिल्ली उडवली आणि महाराष्ट्र सर्वात पुढे नव्हे सर्वात मागे असल्याची टीका केली.

महापालिकेचे पैसे वाचवा!

$
0
0
पेस्ट कंट्रोल ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे किंवा त्यांना किमान वेतन कायद्यानुसार मानधनावर घ्यावे, अशी मागणी करीत संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर बुधवारी धरणे आंदोलन केले. पेस्ट कंट्रोलसाठी चार कोटींचा ठेका देण्याऐवजी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिल्यास दोन कोटी रुपयांची महापालिकेची बचत होऊ शकते. राज ठकारेंनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सवंग वक्तव्यांमुळेच तपास भरकटला

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास विचित्र पद्धतीने हाताळला जात असल्याचा आरोप करतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून केलेल्या सवंग वक्तव्यांमुळे हा तपास भरकटल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही मारेकरी पकडू, असे आश्वासनही त्यांनी बुधवारी दिले आहे. पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया सुरूच असून, पाकचे एकदाचे कंबरडे मोडावे, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्ष्यांच्या शिकारीवर बंदी घालावी

$
0
0
दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या घटत असून यास आदिवासी भागातील काही शेतमजुरांकडून पक्ष्यांची होत असलेली शिकार हे मुळ कारण असल्याचे अॅग्री ऑरगेनिक रिसर्च फाऊंडेशनने म्हटले आहे. पक्षांच्या शिकारीवर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.

महापौरांची ‘निवृत्ती’

$
0
0
महापौरपदासाठी ओबीसी आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर इच्छुकांची ‘भाऊगर्दी’ होण्यास सुरूवात होऊ लागली. ओबीसेंचे प्रमाण जरा जास्त असल्याने काही प्रबळ उमेदवार पूर्ण शक्ती पणाला लावून शहराचे प्रथम नागरिकपद आपल्याकडे खेचून आणतील.

रामवारीने गजबजली त्र्यंबकनगरी

$
0
0
त्र्यंबकेश्वर शहरासह आणि नाशिक त्र्यंबक मार्ग बुधवारी टाळ मृदुंगांच्या ठेक्याने हरीनामात दंग झाला होता. गुरुवारी अजा एकादशी रामवारी म्हणून परिचित असल्याने हजारोंच्या संख्येने नाशिक येथील भाविक तसेच पायी दिंड्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शनघेतले.

निर्यातमूल्य घटले, पण भाव `जैसे थे`

$
0
0
केंद्र शासनाने कांद्याच्या एमईपी दरात अर्थात किमान निर्यात मूल्यात १५० डॉलरची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला असून, गेल्या काही महिन्यांपासून ५०० डॉलर प्रती टन असणारे कांद्याचे निर्यात मूल्य १५० डॉलरने घटल्याने आता ३५० डॉलर प्रती टन झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज शेतकरी मोर्चा

$
0
0
केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी कृषी धोरणांचा निषेध करण्यासाठी मालेगावला शुक्रवारी (ता. २२) प्रांत कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मोर्चा काढला जाणार आहे.

डोळ्यावर पट्टी बांधून फोडली दहीहंडी

$
0
0
कोणत्याही गोविंदाला इजा होऊ नये व दहीहंडी उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, या उद्देशाने घोटी शहरात दहीहंडीचा उपक्रम आगल्या वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. डोळ्यावर पट्टी बांधून काठीच्या आधाराने दहीहंडी फोडण्याच्या या उपक्रमाला महिलासह युवाकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत

$
0
0
राजीवनगर येथील युनिक ग्रुपतर्फे यावर्षीच्या गणेशोत्सवात `लकी ड्रॉ`च्या माध्यमातून जमा झालेली वर्गणी आत्महत्या केलेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या विजेत्यांना अनेक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती युनिक ग्रुपचे अध्यक्ष आणि नगरसेवक सतीश सोनवणे यांनी दिली.

सातपूर बस स्थानकाचे भूमिपूजन

$
0
0
महाराष्ट्रात रस्ते वाहतूकीत अनेक अडथळे असतानाही सार्वजनिक वाहतूक सेवेत एसटीने मातृत्वाचे स्थान आजही कायम ठेवले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील यांनी केले.

‘त्यांनी’ही लुटला गोपाळकाल्याचा आनंद

$
0
0
राजीवनगर येथील डे केअर सेंटर शाळेत निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांसमवेत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, या विद्यार्थ्यांना धान्याची मदतही देण्यात आली.

‘रंगभूमीच्या समृद्धी’चं स्वप्न नेमकं कुणाचं?

$
0
0
नाशिकच्या नाटकावर ते करणार्यांचं खूप प्रेम आहे. बघणाऱ्यांचं मात्र मिळता मिळत नाहीए. नाशिककर रंगकर्मी चांगलं आणि - (पुढचं हे वाक्य लिहायला मला कधीच आवडत नाही!) – आणि मुंबई-पुण्याच्या दर्जाचं नाटक देऊ लागले असतानाही नाशिकच्या प्रेक्षकांचा अजूनही नाशिककर रंगकर्मींवर विश्र्वास बसत नाहीए.

अन् दंगा काबू पथकाची तत्परता दिसली

$
0
0
सण आणि उत्सवांच्या काळात शहरात दंगल उसळलीच तर दंगा नियंत्रण काबू पथक अवघ्या १० ते १२ मिनिटांत वर्दळीच्या ठिकाणी पोहोचू शकते, याचा प्रत्यय गुरुवारी आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या प्रात्यक्षिकात दंगल काबू नियंत्रण पथकाची तत्परता स्पष्ट झाली.

मुक्त‌ व‌िद्यापीठही देणार उत्तरपत्र‌िकांच्या झेरॉक्स

$
0
0
‘परीक्षा पध्दतीतील पारदर्शकता वाढव‌िण्यासाठी काही नवे उपक्रम हाती घेऊ. यामध्ये व‌िद्यार्थ्यांना त्यांच्या शंका समाधानासाठी उत्तरपत्र‌िकेच्या झेरॉक्स म‌िळवून देण्यापासून सुरुवात करू,’ असे आश्वासन मुक्त व‌िद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माण‌िकराव साळुंखे यांनी द‌िले.

हक्क द्या, अन्यथा बहिष्कार !

$
0
0
‘जन्मगावी जातीचा दाखला’ हा शासनाचा निर्णय जाचक असून, अशा निर्णयांमुळे मागासवर्गीयांचे हक्क डावलेले जात आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी जातीच्या दाखल्याचा निर्णय तसेच नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या जाचक अटी सरकारने तातडीने रद्द कराव्यात अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती संशोधन संस्थेतर्फे आयोजित पंचवटीत आयोजित शिक्षण हक्क परिषदेत घेण्यात आल्याची माहिती सरचिटणीस बापू बैरागी यांनी दिली.

१६ अधिकाऱ्यांवर जबाबदारी

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील १६ अधिकाऱ्यांना निवडणूक काळातील जबाबदारी सोपविली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images