‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटस् ऑफ इंडिया’ च्या वतीने (आयसीएआय) घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेत दोन्ही ग्रुपचा निकाल अवघा साडेनऊ टक्के लागला आहे.या निकालात पहिल्या ग्रुपमध्ये १६.४१ टक्के तर दुसऱ्या ग्रुपमध्ये १३.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा निकाल घटला आहे.
CA इंटरमिजिएटचा निकाल ९.५ %
↧
↧
जिल्ह्यातील ६ धरणातून विसर्ग
जिल्ह्यातील धरणक्षेत्रात शुक्रवारी दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सहा धरणांमधून तब्बल १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दारणा, नांदूरमध्यमेश्वर, कडवा, भावली, आळंदी, वालदेवी या सहा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
↧
घोलपांची आमदारकी रद्द
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कोर्टाकडून तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेले शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री बबनराव घोलप यांची आमदारकी राज्यपालांनी रद्द केली असून त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
↧
४० लाखांची ‘धुळधाण’
मोठा गाजावाजा करून तसेच तब्बल ४० लाख रुपये खर्च करून महापालिकेने खरेदी केलेली कार्डियाक व्हॅन दोन वर्षांपासून धुळखात पडली आहे. कार्डियाक व्हॅन घेणाऱ्या महापालिकेने त्यासाठी किती कर्मचारी लागतील, याचा विचारच न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
↧
सिंहस्थ कामांकडे ठेकेदारांनीच फिरवली पाठ
सिंहस्थ तोंडावर आला असताना कोट्यवधींच्या आराखड्यास मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, कामांना शुभारंभ झाला नाही. याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. इतर वेळेस कामांसाठी साठमारी होत असताना येथे मात्र कामांकडे ठेकेदारांनी पाठ फिरवीली आहे.
↧
↧
पक्षभेद बाजूला सारूनच विकासकामे
इगतपुरी मतदारसंघातील जनतेच्या पाठबळावरच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजकारण बाजूला सारून प्रयत्नशील आहे. मतदारसंघातील विकासकामे करताना कोणताही पक्षभेद, राजकारण केले नाही आणि यापुढेही करणार नाही.
↧
सर्वांना एकत्र येण्याची गरज
राज्यातील अपंग बंधू भगिनींनी जात-पात बाजूला सारून प्रमाणपत्र व इतर सुविधा मिळविण्यासाठी एकत्र येऊन मोठे जनआंदोलन छेडावे, असे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले.
↧
उंबरदरी, कोनांबे, सरदवाडी धरण भरले
सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम पट्यात असलेल्या उंबरदरी, कोनांबे धरणा पाठोपाठ सरदवाडी धरण पूर्ण पणे भरले आहे. सर्वात मोठे भोजापूर धरण ८० टक्के भरल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
↧
शिवशाहीसाठी कामाला लागा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेने गाडले असून आता सिन्नर तालुक्यातील गद्दाराला गाडण्यासाठी भगवी लाट उभी राहिली आहे. शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी सिन्नर येथे केले.
↧
↧
साठेबाजीमुळे युरियाची टंचाई
येवला तालुक्यात विशेषत: पूर्व भागात युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील वितरक, विक्रेते व ग्रामीण भागातील दुकानांमध्ये युरिया शिल्लक नसल्याचे सांगितले जात असून भाववाढीच्या अफवेने व्यापाऱ्यांनी युरिया खताचा साठा केल्याचा आरोप शेतकऱ्याकडून केला जात आहे.
↧
विद्यार्थ्यांच्या श्रेणीच्या खोट्या नोंदी
शैक्षणिक गुणवत्ता विकास कृती कार्यक्रमाच्या पाहणीसाठी आयुक्त एकनाथ डवले यांनी तालुक्यातील मोरेनगर व ताहाराबाद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेटी दिल्यात.
↧
संजय चव्हाण यांची याचिका सुनावणीसाठी
बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या जातपडताळणी संदर्भात उच्च न्यायालयाने सदरची याचिका अंतिम सुनावणीसाठी पहिल्या १ ते १० याचिकांमध्ये समाविष्ट करून घेतल्याने अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात आली आहे.
↧
पवारांच्या निर्णयाला शनिवारचा मुहूर्त
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देणारे माजी आमदार संजय पवार यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शनिवारचा (दि. ३०) मुहूर्त निवडला आहे. नांदगाव येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्ते सांगतील त्या पक्षात जाण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
↧
↧
शिक्षकांनी गुणवत्ता सुधारावी
शैक्षणिक सुविधेबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. शिक्षणाच्या माध्यमातूनच आदिवासी समाजाचा विकास होऊ शकतो. समाजाला मार्गदर्शन ठरणारी पिढी निर्माण करावी, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केले.
↧
रेनफ्रो इंडियामध्ये कामगारांना वेतनवाढ
गोंदे येथील रेनफ्रो इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या १५२ कामगारांना ७००० ते ७२५० रुपये अशी वेतनवाढ लागू करणारा करार सीटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्यात नुकताच झाला.
↧
‘मविप्र’ला उज्ज्वल परंपरा
सर्वांना सोबत घेऊन विधायक मार्गावर पावले टाकणारी स्वप्न क्रांतीकारी असतात. अशी स्वप्न समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कारक ठरतात. मराठा विद्या प्रसारक संस्थेला अशाच क्रांतीकारी स्वप्नांची परंपरा आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी काढले.
↧
‘पंचक’ मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार
पंचकच्या समर्थ सेवा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि माजी प्रभाग सभापती अॅड. सुनील बोराडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, नगरसेविका ललिता भालेराव, वास्तुविशारद उमेश गायधनी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख बाळासाहेब गाडगीळ, चंद्रभान टिळे उपस्थित होते.
↧
↧
विक्रेत्यांचे स्टॉल करणार ट्रॅफिक जाम
सातपूर रस्त्यावर गणपती विक्रेत्यांचे स्टॉल लागल्याने उत्सव काळात या रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होणार आहे. स्टॉल रस्त्यावर थाटल्याने आतापासूनच वाहनचालकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
↧
बेरोजगार तरुणांना संधी
लोकनिर्माण प्रकल्प व व्हर्लपुल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराची निश्चित संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. किमान दहावी उत्तीर्ण बेरोजगार तरुणांसाठी २२ दिवासांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.
↧
धनगर आरक्षण, ‘ध’ चा ‘मा’
आदिवासींच्या विरोधात धनगर समाज मुळात कधी नव्हताच. कारण धनगर हे आदिवासीच आहे. त्यामुळे हा समाज आदिवासींच्या विरोधात कसा असणार? नेतृत्वहीन असलेल्या धनगर समाजाच्या अज्ञान, निरक्षरपणामुळे या समाजाला आजपावेतो आपल्या हक्कापासून वंचित रहावे लागले.
↧