‘शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा’ या श्लोकापासून आपण आपल्या नववर्षाची शुभ सुरूवात करुया, असे मला वाटते. २०१५ हे वर्ष नाशिककरांसाठी खुपच महत्त्वाचे आहे. नाशिक हे विश्वपटलावर अग्रणीय शहर म्हणून गणले जाऊ लागले आहे. लोकांचा नाशिककरांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. नाशिककर हे निसर्गप्रेमी, कला-संस्कृतीचे प्रणेते व जागरुक नागरिक म्हणून ओळख प्राप्त करत आहेत.
नवे वर्ष नवे पर्व
↧
↧
काही कमावलं... काही गमावलं
नवीन वर्षात नवे संकल्प केले जातील, भविष्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स केले जातील. पण माणसाचं मन ही एक अचाट गोष्ट आहे. समोर उभं आयुष्य असताना भुतकाळातल्या झुल्यावर वेड्यासारखं झुलत राहतं. मागे वळून पाहताना काय कमावल, काय गमावल यात रमून जातं. याबद्दलचे अनुभव तरुणाईने ‘मटा’सोबत शेअर केले आहेत.
↧
ट्रेकिंग ग्रुप नव्हे एक परिवाऱ!
गेल्या रविवारी कळसुबाई शिखरावर एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. निर्सगाच्या सानिध्यात नागरिकांनी फिरावे. जास्तीत जास्त लोकांनी ट्रेकिंगचा आनंद लुटावा, ट्रेकिंगचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी हा विवाह आयोजित करण्यात आला होता. अशा मोहमिांमुळे एकमेकातील संबंध वृध्दींगत होत असून एकमेकांची मने देखील जुळत आहेत.
↧
आरोग्य क्षेत्राला बळ द्या
नाशिक शहर परिसराची लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढते आहे. त्या तुलनेत नाशकात आरोग्य सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. हॉस्पिटल्सची संख्या, कुशल मनुष्यबळ, हॉस्पिटल्ससाठी पोषक वातावरण आदींची उपलब्धता होणे गरजेचे आहे.
↧
योगा विद्यापीठ व्हावे
आगामी सिंहस्थासाठी नाशकात सध्या मोठी तयारी सुरु आहे. साधुग्रामसाठी आवश्यक जमिनीचे अधिग्रहण भाडेतत्वावर केले जाणार आहे. मात्र, साधुग्रामसाठीची जमीन ही कायमस्वरुपी घेण्यात यावी. त्यासाठी महापालिकेने संबंधित जमीन मालकांना टीडीआर द्यावा.
↧
↧
हवे सक्षम इन्फ्रास्ट्रक्चर
सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे आता राज्य सरकारसाठी महत्त्वाचे शहर बनू पाहत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकला विमानसेवेची मोठी प्रतीक्षा आहे. याच सेवेवर नाशिकचा केवळ औद्योगिक नाही तर सर्वांगीण विकास अवलंबून आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
↧
बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळावा
मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक हे शहर रिअल इस्टेट क्षेत्रात झपाट्याने पुढे आले आहे. मात्र, काही अडथळ्यांमुळे नाशिकच्या या क्षेत्राला काहीसा फटका बसत आहे. त्याची राज्य सरकारने योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी सरकारने एक धोरण नुकतेच लागू केले आहे.
↧
नाशिकला व्हावे इनोव्हेशन क्लस्टर
नाशिक हे उत्तर महाराष्ट्रासाठी एज्युकेशन हब म्हणून नावारुपाला येत आहे. अनेक शैक्षणिक संस्था नाशकात कार्यरत झाल्या आहेत. पण, नाशिकची क्षमता लक्षात घेता आणखी मोठ्या संस्था नाशकात कार्यन्वित होऊ शकतात. यातूनच शैक्षणिक क्षेत्रात राज्यही अग्रेसर होऊ शकते.
↧
‘बजेट होम’ सर्वसामान्यांचे स्वप्न
अन्न, वस्त्र व निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा हे सर्वपरिचीत असे वाक्य आहे. सर्वसाधारनपणे जगण्याच्या चौकटीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे राहण्यासाठी घर...
↧
↧
वैतरणा येथे गुणवंतांचा सन्मान
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक, साहित्य परिषद प्रकाशन संस्था आहुर्ली व साहित्य परिषद दिवाळी अंक यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.१) वैतरणा येथे सकाळी ११ वाजतासमाजातील विविध गुणवंत व्यक्ती व संस्था यांचा भव्य गुणगौरव सोहळा, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळ्यासह भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
↧
आदिवासी संमेलनाची एकता रॅली
कळवण तालुक्यातील चणकापूर येथील हुतात्मा स्मारकातून नांदुरी येथे होणाऱ्या २२ व्या अखिल भारतीय आदिवासी एकता संमेलनाच्या रॅलीची सुरुवात होणार आहे. यासाठी आमदार जे. पी. गावित यांनी स्मारकास भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
↧
सर्व संशयितांना पोलिस कोठडी
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अघोरी कृत्याच्या हत्याकांडातील सर्व दहा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून या गुह्यात वापरलेली काही साहित्य मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.
↧
द्राक्ष उत्पादक चिंतेत
बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. निफाड तालुक्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने द्राक्ष उत्पादकांसह शेतकरीवर्ग धास्तावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
↧
↧
गॅस एजन्सी अन् बँका गजबजल्या
केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने पूर्वीचेच धोरण पुढे चालू ठेवत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत होती.
↧
मिळाला सूर्यनमस्कारामुळे मूलमंत्र
व्यायामाचा सर्वोत्कृष्ट व सोपा प्रकार असलेल्या सूर्यनमस्कारामुळे जीवन निरोगी होते, दृष्टीकोन सकारात्मक होतो हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना मिळाला. सामनगाव पालिटेक्निक कालेजमध्ये बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांनी सामूहिक १०८ सूर्यनमस्कार घातले. त्यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती.
↧
मेहनतीच्या जोरावरच यश
शैक्षणिक आयुष्यातील दहावीचे वर्ष हे जीवनाला कलाटणी देणारे वर्ष म्हटले जाते. कारण याच वर्षात आपण आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित करायचे असते अन् त्या दृष्टिने प्रयत्नांची सुरुवात करणे गरजेचे असते.
↧
भंगार साहित्य, सौरउर्जेवरील बाइक
शोध ही मानवाच्या गरजेची जननी आहे, असे म्हटले जाते. संशोधक वृत्ती तुमच्यात असेल तर या शोधासाठी कोणतिही चौकट रहात नाही. फक्त दहावी शिक्षण असलेल्या रसूल सरदार पठाण या अवलियाने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनाची निर्मिती केली आहे.
↧
↧
जेसीजच्या अध्यक्षपदी पराग जोशी
जेसीजने दीर्घकालीन प्रकल्प राबविण्याची आवश्यक्ता असल्याचे मत विश्वास बँकेचे विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केले. नाईस सभागृहात पार पडलेल्या जेसीआय ग्रेपसिटीच्या २० व्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात १९ वे अध्यक्ष जेसी डॉ. पंकज जैन यांनी जेसी पराग जोशी यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली
↧
मविप्र मॅरेथॉन ४ जानेवारीला
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने होणाऱ्या दुसरी राष्ट्रीय व सातवी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी, ४ जानेवारी रोजी सकाळी होणार असून स्पर्धेला उदघाटक म्हणून प्रख्यात नेमबाज गगन नारंग उपस्थित रहाणार आहे.
↧
उपकरणांचा प्लंबर्सने वापर करावा
प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अनुभवातून नाही तर दुसऱ्याच्या अनुभवातूनही शिकता येते. वेळेपेक्षाही माणसाचा जीव त्याची सुरक्षा ही महत्त्वाची असून आधुनिक तंत्राचा वापर करून प्लंबरने जास्त सुरक्षा उपकरणांचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन इंडिया प्लंबिंग असोसिएशनचे चेअरमन मिलिंद शेटे यांनी केले.
↧
More Pages to Explore .....