‘राज्यभर दुष्काळाची भयावह स्थिती असल्याने दात्यांनी मुख्यमंत्री निधीसाठी मदत करावी’, असे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच तोंडघशी पाडण्याचे काम प्रशासन करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कार्यतत्परतेचाही ‘दुष्काळ’
↧
↧
महापालिकेला कर वसुली झेपेना
महापालिका प्रशासनाला घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली झेपत नसल्याचे निदर्शनास येत आहे. २५ मार्चपर्यंत प्रशासनाने अवघी ६५ टक्केच करवसुली केली असून येत्या ५ दिवसात सुमारे ३५ टक्के वसुली करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
↧
१० बालकामगारांची सुटका
शहरातील सराफ बाजार आणि बेकरींमध्ये काम करणा-या १० बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. यातील बहुतांश बालकामगार हे परप्रांतीय असून त्यांना अनेक तास राबवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧
३१ मार्चलाही अर्ज स्विकारणार
राज्य सरकारने २००७ साली लागू केलेल्या उद्योगांसाठीच्या सामुदायिक प्रोत्साहन योजनेची मुदत ३१ मार्चला संपत आहे. ३१ मार्चला रविवार असला तरी त्यादिवशी उद्योजकांचे अर्ज स्विकारले जातील. उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा, अशी माहिती उद्योग सहसंचालक प्रदीपकुमार दाबेराव यांनी दिली.
↧
जकातीवर मंदीचा फेरा
औद्योगिक क्षेत्रातील मंदी आणि वाळू, खडी क्रशरवरील बंदी याचा परिणाम महापालिकेच्या जकात वसुलीवर झाला आहे. त्यामुळे सुमारे ६० कोटी रुपयांचा फटका महापालिकेला बसला आहे.
↧
↧
रस्त्यावरील खडी ठरतेय धोकेदायक
प्रमोद महाजन उद्यानाच्या बाजूने कुसुमाग्रज स्मारकाकडे जाणा-या रस्ताच्या वळणावरच मोठ्या प्रमाणात खडी टाकण्यात आल्याने वाहने चालविणे मुश्किल होत आहे. या वळणावर घसरुन आजवर अनेक छोटे- मोठे अपघातही घडले आहेत.
↧
पेट्रोलची शुद्धता तपासणार कोण?
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना त्याच्या शुद्धतेबाबत अनेक वेळा ग्राहकाच्या मनात प्रश्ननिर्माण होतात. भेसळयुक्त पेट्रोलद्वारे नागरिकांकडून दररोज लाखो रुपयांची लूट होते.
↧
केबल ऑपरेटर्सने भरपाई द्यावी
'एसटीबी' (सेट टॉप बॉक्स) बसविण्यासाठी मुदत असतानाही मनमानी करत पूर्णतः किंवा अंशतः प्रक्षेपण बंद करणाऱ्या केबल ऑपरेटर्सने ग्राहकांना आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केली आहे.
↧
महापालिकेकडून पाणीबचतीचे आवाहन
राज्यात पडलेल्या दुष्कळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिकांना पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. यात नाशिक महापालिकेला २० टक्के पाणीबचतीचे निर्देश देण्यात आले असून त्याआधारे नाशिक महापालिकेने नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले आहे.
↧
↧
'मेळा'ला उतरत्या कळा
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला नाशिकमार्गे जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना मेळा बसस्थानकात प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. यामुळे मेळा बसस्थानक छळछावणी झाली असून प्रवाशांचा व विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरतो आहे.
↧
जमिनीलाही 'आधार'ची सक्ती
जमिनीच्या व्यवहारामध्ये होत असलेले गैरव्यवहार रोखण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी सरकारने जमीन खरेदी करणारा व जमीन विकणारा या दोघांनाही आधार कार्ड असणे अनिवार्य केले आहे.
↧
लाच घेताना तलाठ्यास अटक
मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील तलाठी पांडूरंग धोंडीराम आहेर यांना ७/१२ च्या उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडून ५५० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले.
↧
अभिनयातला राजा
'राजा शिवछत्रपती' मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला, मालिका असो वा चित्रपट प्रत्येकवेळी जीव ओतुन काम करणारा एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. आपल्या अभिनयामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळणार असेल तर ही संधी कोणीही सोडणार नाही.
↧
↧
पायाचा पाव होतो तेव्हा...
एक आनंदी महाशय मुंबईला फिरायला गेले होते. फिरता फिरता त्यांचा पाय वाकडा पडला (वय मोठ असूनही) आणि मुरगळला. पुढे काय होणार याची कल्पना नसल्याने त्यांनी मुंबईत फिरण्याचा मनमुराद आनंद तसाच घेतला.
↧
गोदाघाटावर आज 'फोटो वॉक'
नाशिकमधील तरुण व हौशी फोटोग्राफरना व्यासपीठ देण्यासाठी त्यांची फोटोग्राफी सर्वांसमोर मांडता यावी म्हणून आज (बुधवार) गोदाघाटावर 'फोटो-वॉक' म्हणजेच स्ट्रीट फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. 'फोटो सर्कल नाशिक' या संस्थेतर्फे आयोजित ही स्पर्धा नाशिकमधल्या अनोख्या उपक्रमांपैकी एक आहे.
↧
कवयित्री मंगला गोखले यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिका व कवयित्री मंगला गोखले (वय ९३) यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मंगला गोखला यांनी बालसाहित्य, संस्कार साहित्य, अध्यापन साहित्य, भक्तीरचना असे विविध साहित्य प्रकार हाताळले होते.
↧
तांगा शर्यतीच्या आयोजकांवर गुन्हे
घोडा आणि बैल किंवा भिन्न प्राण्यांच्या शर्यतीला बंदी असतानाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी आयोजन होत असल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत
↧
↧
विडी कामगारांचा ‘तहसील’वर मोर्चा
महाराष्ट्र शासनाने विडी उत्पादनावर १२. ५ टक्के व्हॅट लावला आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे विडी उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॅट रद्द करावा, या साठी हजारो विडी कामगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला.
↧
सोनगीर सूतगिरणीच्या आगीतून राजकारणाचा धूर
धुळे तालुक्यातील सोनगीर येथील बंद पडलेल्या सूत गिरणीच्या गोडावूनला लागलेल्या आगीच्या निमित्ताने काँग्रेसच्या दोन गटांमधील राजकीय वैमनस्याचा धूर निघण्यास सुरुवात झाली आहे.
↧
उमविच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दि २८ मार्च पासून सुरू होणा-या कला,विज्ञनान व वाणिज्य शाखेच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होतील असे प्रभारी परीक्षा नियंत्रक अमूलराव बोरसे यांनी आज एका पत्राव्दारे कळविले आहे.
↧
More Pages to Explore .....