Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चला, पुन्हा पेटवा मशाली !

$
0
0

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील हुतात्मा स्मारक येथून आम आदमी पार्टी, माकप व इतर पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी आंदोलन केले. सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

'मिळून सारे होऊ आपण दाभोलकर आणि पानसरे' अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. मेनरोड, धुमाळ पाँईट, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ मार्गे हा मोर्चा पोल‌िस आयुक्तालयाजवळ येऊन धडकला. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोल‌िस आयुक्तालयात प्रवेश केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. या मोर्चात सहभागी झालेले 'आप'चे समन्वयक जितेंद्र भावे, महेंद्र जातरंगे, कृष्णा चांदगुडे, माकपचे अॅड. तानाजी जायभावे, अॅड. मनिष बस्ते, प्रा. लक्ष्मीकांत कावळे, शांताराम चव्हाण, कवी कैलास पगारे यांना अटक करून पंचवटी पोल‌िस स्टेशन येथे आणण्यात आले. याठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या मागणीवरून पोल‌िस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी त्यांची भेट घेतली.

डॉ. दाभोलकरांसह कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडा व या दोन्ही खुनातील सुत्रधारांचाही तपास लावा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी पोल‌िस आयुक्तांकडे केल्या. आंदोलनकर्त्यांचा हा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन देखील पोल‌िस आयुक्तांना यावेळी करण्यात आले असून 'आप'च्या दहा स्वयंसेवकांचे शिष्टमंडळ या हल्ल्याविरोधात आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आपचे समन्वयक जितेंद्र भावे यांनी दिली.

कॉ. पानसरे यांच्या निधनामुळे शहरातील आपसह, कम्युनिस्ट, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संताप व शोक व्यक्त केला. या आंदोलनात जवळपास ४०० आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनकर्त्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. मारेकऱ्यांना अटक करा, या मागणीकरीता माकपने आंदोलन केले. माकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरदेखील निदर्शनं केली. या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यामुळे पोल‌िस आणि कार्यकर्त्यांत झटापट झाली.

समाजमनावर भ्याड हल्ले होत असतील तर महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र का म्हणायचे? हा हल्ला या महान व्यक्तींवर नसून त्यांच्या विचारावर, नेतृत्वावर हल्ला आहे. या हल्ल्याच्या निषेध करावा तेवढा कमीच आहे.

- महेश दातरंगे, अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष


‘व्हीआयपी’ पगारवाढीचा तिढा सुटता सुटेना

$
0
0

तीन मार्चला पुन्हा कामगार उपायुक्तांच्या दालनात बैठक

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाही. यामुळे शुक्रवारी कामगार उपायु्क्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत तीन मार्च पुन्हा तारीख देण्यात आली असल्याचे कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी सांगितले. परंतु तब्बल २७ महिन्यांपासून पगारवाढीचा प्रश्न प्रलंबित असल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाच्या नियमांनुसार निवृत्तीचे वय ६० वर्ष असताना व्हीआयपी कंपनीतील कामगारांना निवृत्तीचे वय ५६ वर्ष करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्तीचे वय ५६ चे ६० करावे या मागणीसाठी कामगार झटत आहेत. असे असताना दुसरीकडे तब्बल २७ महिन्यांपासून कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांच्या पगारवाढीचा तिढा सुटता सुटलेला नाही. शुक्रवारी कामगार उपायुक्त जाधव यांच्या दालनात कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांची एकत्रित बैठक झाली. बैठकीत कामगारांच्या बाजूने आमदार देवयानी फरांदे व कामगार उपायुक्तांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात मध्यस्थी करीत तोडगा काढण्याची मागणी केली. कंपनी व्यवस्थापनाने पगारवाढीच्या मुद्यावर व्हीआरएस व कामगारांची पगारवाढ यावर योग्य विचार करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. कामगार उपायुक्तांनी पगारवाडीबाबत कंपनी व्यवस्थापनाने तीन मार्चपर्यंत निर्णय घ्यावा, असे सांगितले.

तसेच, तीन मार्चला कामगार उपायुक्त कार्यालयात बैठक होणार असून त्यादिवशी तरी पगारवाढीचा तिढा सुटेल अशी आशा कामगार बाळगून आहेत. कामगार उपायुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीस कंपनी व्यवस्थापनाचे त्रेयश त्रिवेदी, गोडसे, तळोले व कामगार युनियनच्या वतीने अध्यक्ष अरूण ठाकरे, लहू माळी, उत्तम वाळके, आधार पगार यांसह कामगार उपस्थित होते.

उड्डाणपुलाला एक्झिट पॉईंट

$
0
0

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्प्लेंडर हॉलजवळ होणार पॉईंट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उड्डाणपुलावरील वाहनांना इंदिरानगर येथील अंडरपास आणि द्वारका वगळता इतर ठिकाणी उतरण्यास जागा नाही. यामुळे या दोन्ही ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने (न्हाई) स्प्लेंडर हॉलजवळ आणखी एक एक्झिट पॉईंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चांदवडच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनचालकांना द्वारका टाळून सिडको भागात सहज प्रवेश मिळू शकतो.

शहरातील उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनांना पहिला एक्झिट पॉईंट इंदिरानगर येथील अंडरपासजवळ आहे. तर, दुसरा एक्झिट पॉईंट द्वारका येथे तयार करण्यात आला आहे. तसेच, चांदवडकडून येणाऱ्या वाहनांसाठी फक्त द्वारका येथील रॅम्पच्या मदतीने शहरात प्रवेश करता येतो. चांदवडच्या दिशेकडून येणाऱ्या आणि सिडको किंवा इंदिरानगर भागात जाणाऱ्या वाहनचालकांना देखील द्वारका येथेच उतरावे लागते.

द्वारका येथे शहराच्या चहुबाजूंनी वाहने येतात. त्यामुळे हा चौक नेहमीच वाहतूककोंडीच्या गर्तेत अडकलेला असतो. तेच इंदिरानगर अंडरपासबाबत होत आहे. मुंबईकडून येणारी वाहने याच ठिकाणाहून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे उड्डाणपुलाच्या एन्ट्री व एक्झिट पॉईंटमध्ये योग्य ते बदल करण्याची वारंवार मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर न्हाईच्या तंत्रज्ञांनी काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाची पाहणी केली होती. त्यात राजीवनगर परिसरातील स्प्लेंडर हॉल समोरील जागेचा एक्झिट पॉईंट म्हणून उपयोग होऊ शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आला. सध्या, त्या दृष्टीने विचारविमर्ष सुरू असून, लवकरच या निर्णयाची​ अंमलबजावणी होऊ शकते. चांदवडच्या दिशेकडून येणाऱ्या आणि राजीवनगरसह सिडको, इंदिरानगर या भागात जाणाऱ्या वाहनचालकांना यामुळे द्वारकेला उतरावे लागणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, वाढती मागणी लक्षात घेऊन क. का. वाघ कॉलेज व रासबिहारी स्कूलजवळ अंडरपास करण्यात येणार आहेत. यामुळे तेथीलही वाहतूक कोंडी नियंत्रणात येणार आहे. मात्र, अमृतधाम व जत्रा हॉटेल चौफुलीचा प्रश्न जैसे थे चा राहणार आहे.

नाशिकला इंड‌ियाज् मोस्ट प्रॉमिसिंग सिटीचा किताब

$
0
0

फस्ट स्मार्ट स‌िटीज कौन्सिलतर्फे गौरव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक स्तरावरील फस्ट स्मार्ट स‌िटीज कौन्सिलतर्फे नाशिक शहराला इंड‌ियाज मोस्ट प्रॉमिसिंग सिटीचा किताब शनिवारी दिल्लीत बहाल करण्यात आला. उपमहापौर गुरूमीत बग्गा आणि स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नाशिक शहराचा विस्तार आणि विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे गेल्याच वर्षी जगातील वेगवान वाढणाऱ्या सोळा शहरात नाशिकचा समावेश करण्यात आला होता. नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा, धार्मिक वातावरण, उद्योगांमधील गुंतवणूक, गुन्हेगारीचे कमी प्रमाण यामुळे नाशिक जागतिक स्तरावर उदयास आले आहे. त्यामुळे राज्यात मुंबई-पुण्यानंतर नाशिकचा विकास आता झपाट्याने होत आहे. जागतिक स्तरावरील फस्ट स्मार्ट सीटीज कौन्सिलतर्फे नुकताच भारतातील शहरांचा अभ्यास करण्यात आला. त्यात भारतातील २० शहरांची इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग सिटीज म्हणून निवड करण्यात आली होती. त्यात राज्यातील चार शहरांचा समावेश असून, नाशिक त्यात अव्वल आहे. शनिवारी उपमहापौर गुरूमीत बग्गा आणि स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कुंभमेळ्यात स्वच्छतेची जनचळवळ उभारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या निमित्ताने स्वच्छतेची चळवळ उभारावी. राज्यातील स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून या चळवळीला जनचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा प्रशासन, महापालिका तसचे पोलिसांसह विविध प्रशासनांनी केलेल्या नियोजनाबाबत फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. कुंभमेळा तयारीस कमी कालावधी लक्षात घेऊन विभाग आणि जिल्हा पातळीवर अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नियोजनाविषयी माहिती दिली. प्रारंभी जिल्हाधिकारी कुशवाह,मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी विकासकामांविषयी तर पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी नियोजनाची माहिती दिली.

आराखडा बनवणारे आम्हीच

मठ, आश्रम, आखाड्यांमध्ये सोयीसुविधा पुरविण्यासाठी आराखड्यात तरतूद करा, अशी सूचना महंतांनी केली. तुम्हाला सुविधा पुरविण्यासाठी कटिबध्द आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. रामकुंडाचा परिसराचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागा संपादन करण्याची प्रक्रिया दोन वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

‘सिंहस्थाला निधी कमी पडू देणार नाही’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ यशस्वीतेसाठी सर्व प्रयत्न करू. निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. तसेच, त्र्यंबकेश्वरला धार्मिक तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंतांना दिले.

मुख्यमंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी त्र्यंबकेश्वरला भेट देवून साधू-महंताशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सिंहस्थ कामांचा आढावा घेतला. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज, नरेंद्रगिरी महाराज, महंत सागरानंद, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी कुशवाह यांच्यासह अधिकारी आणि साधू-मंहत या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत साधू महतांनी गोदावरी स्वच्छतेसह त्र्यंबकच्या तीन किलोमीटर परिसरात मांस आणि अंड्यांना बंदी घालण्याची मागणी केली. तसेच, नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्र घोषित करावे आणि सिंहस्थासाठी अधिकचा निधी द्यावा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री म्हणाले, सिंहस्थ कामांना अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. आमचे सरकार नवीन आहे. त्यामुळे साभांळून घ्या, असेही सांगण्यास मुख्यमंत्री विसरले नाहीत. कमी वेळ मिळाल्याने गोदावरी स्वच्छतेच काम पूर्ण होवू शकले नाही, असे सांगत पालकमंत्र्यांवरही निशाना साधला.

सुरक्षेचा फटका महतांसह राज्यमंत्र्यांनाही

सुरक्षेचा पोलिसांकडून अतिरेक झाला. पोलिसांनी शंकरानंद सरस्वती यांची गाडी अडवून ठेवली. चुक लक्षात येताच पोलिसांनी त्यांना विनवणी केली. एका पोलिस उपअधीक्षकांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचा उल्लेख थेट आमदारसाहेब असा करीत कार्यकर्ते मध्ये घेऊन जाऊ नका, अशी विनंती केली. भुसे हे मंत्री असल्याचे भानही या अधिका-याला राहिले नाही.

शाहीमार्गावरून साधू, महंतांचा आखाडा

$
0
0

मुख्यमंत्र्यांसमोरच प्रशासन खिंडीत; विश्वासात घेतले नसल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थासाठी नवीन शाहीमार्गाचा घाट घातला जात असला तरी तो साधू, महंतांसाठी आहे की, प्रशासनासाठी असा आम्हाला प्रश्न पडला आहे. विश्वासात न घेता नियोजित केलेला शाहीमार्ग आम्हाला कदापि मान्य नाही. त्यामुळे पारंपरिक शाहीमार्गानेच जाणार असल्याचा पवित्रा साधू, महंतांनी मुख्यमंत्र्यांसमोरच घेतल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. तसेच, आगामी काळात हा प्रश्न अधिक कळीचा ठरण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक नाशिकरोड येथील विभागीय महसूल कार्यालयात शनिवारी पार पडली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी, महसूल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महंत भक्तीचरणदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

नवीन शाहीमार्गाबाबात साधू, महंत समाधानी नसल्याचे या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आम्हाला विश्वासात न घेताच नवीन शाहीमार्ग निश्चित केल्याचा आरोप दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामकिशोरदास महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच केला. गतवेळी घडलेल्या दुर्घटनेआड लपून शाहीमार्ग बदलता येणार नाही. तसेच साधूंना जुन्या शाही मार्गावरून येण्याची मुभा असावी, नवीन शाहीमार्ग साधुंसाठी बंधनकारक करता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्याचे नियोजन सादर केल्यानंतर महंतांना बोलण्याची संधी देण्यात आली. प्रशासनाने तयारी उत्तम केली अशी पाठ थोपटतानाच महंत रामकिशोरदास यांनी दिगंबर, निर्मोही आणि निर्वाणी आखाड्यांच्या प्रमुख सहा महंतांशी चर्चा न करताच प्रशासनाने परस्पर नवीन शाहीमार्ग निश्चित केल्याचा आरोप करीत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. कुंभमेळ्याच्या नावाखाली तपोवनात घेतलेल्या अनेक जमिनींवर उद्यान, शाळा विकसित करण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी कायमस्वरुपी जागेची व्यवस्था करा, नाहीतर नाशिकच्या कुंभमेळ्याचे भवितव्य धोक्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा देत त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर शरसंधान साधले. कुंभमेळ्यासाठी साधू आले तरी ते लगेचच साधुग्राममध्ये निवासाला जाणार नाहीत. सुरुवातीला ते स्थानिक आखाड्यांमध्येच थांबतील. आखाड्यांची अवस्था दयनीय झाली असून, तेथे दोनशे लोकही व्यवस्थित बसू शकत नाहीत. साधू नाराज होऊ नयेत तसेच राज्याचे नाक कापले जाऊ नये यासाठी नाशिकमधील मठांचे, आश्रमांचे, आखाड्यांचे नूतनीकरण करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आमच्या आखाड्यांचे ७०० खालसे असून, साधूंची संख्या लाखांमध्ये आहे. शाही मिरवणुकीसाठी पारंपरिक मार्गाचे महत्त्व अबाधित रहावे, अशी विनंती करतानाच नवीन शाहीमार्ग मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महंत भक्तचरणदास महाराजांच्या मागण्या

- अलाहाबाद, प्रयाग आणि उज्जैनप्रमाणेच नाशिकमध्येही राज्य सरकारने कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी.

- नाशिकला कुंभमेळा होतोय, हे देशाला समजावे यासाठी ब्रॅण्डिंग करावे.

- कुंभमेळ्यासाठी पाच लाख साधू येतील. त्यांच्यासाठी धान्य, रॉकेल, लाकूड व तत्सम सामग्रीची व्यवस्था करावी.

पुरोहित संघांच्या मागण्या

- गोदावरीच्या पाण्यात किडे पडले आहेत. ती वाहती ठेवा.

- गांधी तलावावर घाट बांधावेत. तेथे भाविकांना स्नानाची परवानगी असावी.

- रात्री बारानंतरही भाविकांना स्नान करू द्यावे.

- प्रशासनाने यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था करावी.

‘मनवीकासे’चे १ मार्चला राज्यस्तरीय अधिवेशन

$
0
0

नाशिक : वीज कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १ मार्च रोजी होणार आहे. जेलरोड येथे होणाऱ्या या अधिवेशनासाठी उद्घाटन सत्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, उत्तमराव ढिकले, मंगेश सांगळे जयप्रकाश भोसले, आ. शरद सोनवणे आदी उपस्थित राहणार आहेत. वीज कर्मचारी व अधिकारी यांच्या पाल्यांना वीज कर्मचारी भरतीत आरक्षण देण्यात यावे, वीज कंपन्यांमधील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, मराठी भूमीपुत्रांना भरतीमध्ये ८० टक्के आरक्षण द्यावे, खासगीकरण थांबविण्यात यावे, अनुकंपा नोकरी प्रक्रियेतील जाचक अटी रद्द कराव्यात, मागासवर्गीयांचा अनुशेष भरावा, अन्यायकारक बदली धोरण थांबवावे, पेन्शन योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला द्यावा आदी मागण्या या अधिवेशनांत मांडण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस राकेश जाधव, सुमंत तारी, दिलीप राजे, भाऊसाहेब गांगुर्डे आदी उपस्थित होते.


वक्फ बोर्ड सीईओ हटविण्यासाठी हालचाली

$
0
0

भूखंड माफियांचा कट; वक्फ विश्वस्तांचा बदलीस विरोध कायम

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डचा कारभार हाती घेतल्यानंतर भूखंड माफियांना न जुमानता धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सय्यद एजाज हुसेन यांना हटविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. आपली बदली करण्यात यावी, यासाठी आता खुद्द सय्यद यांनीच अर्ज केला आहे. मात्र, त्यांना सोडण्यास वक्फ बोर्डाचे विश्वस्त राजी नाहीत. या विश्वस्तांनी सय्यद यांची बदली करण्यात येऊ नये, असे राज्य सरकारला साकडे घातले आहे.

पदभार स्वीकारल्यापासून वक्फ बोर्डाच्या हिताचे अनेक निर्णय सय्यद यांनी घेतले. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या कोट्यवधींच्या जमिनी व मिळकतींवर डोळा असलेले अनेक दुखावले गेले. यामुळे सय्यद यांचा इतरांसह बोर्डाच्याच काही सदस्यांकडून छळ सुरु झाला. शेवटी या सर्व प्रकाराला वैतागून सय्यद यांनी आपली अन्यत्र बदली करण्यात यावी, असा विनंती अर्ज राज्य सरकारला दिला असून यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक वक्फ विश्वस्तांनी वक्फ बोर्डाच्या मिळकती व जमिनीं हिताचे रक्षण करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करू नये असे निवेदन राज्य सरकारला केले आहे. त्यामुळे सरकारने सीईओ सय्यद यांची औरंगाबाद न्यायालयात न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आल्यानंतरही त्यांना वक्फ बोर्डातून सोडलेले नाही.

वक्फ बोर्डाच्या अधीन राज्यभरातील वक्फ जमिनी व मिळकतींवर देखरेख नियंत्रण असून वक्फच्या मिळकती अनेक ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असल्याने त्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. वक्फ बोर्डाच्या या जमिनी व मिळकती बळकावण्याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. या जमिनी व मिळकतींसाठी वक्फ बोर्डाच्या सीईओ आपल्या मर्जीतील असला म्हणजे काम सोपे होईल, असा कयास भूखंडमाफियांनी बांधला होता. मात्र, सीईओ सय्यद यांनी आपल्या कार्यपध्दतीमुळे त्यांच्या मनसुब्यांमध्ये अडथळे आले.

त्यामुळेच सय्यद यांच्या बदलीसाठी राजकीय पातळीवर षडयंत्र रचण्याचे मानले जात आहे. तसेच त्यांना बोर्डाच्याच काही सदस्यांकडून त्रास देण्यास सुरुवात झशली. या सर्व प्रकारांना कंटाळून सीईओ सय्यद यांनी स्वत:हून बदलीसाठी राज्य सरकारकडे अर्ज दिला. मात्र, त्यांची बदली होऊ नये यासाठी बोर्डाचे विश्वस्त सरसावले आहेत. राज्य सरकारचे अत्यंत सावधगिरीने हे प्रकरण हाताळत आहे.

बदली कोठेही करावी असा विनंती अर्ज मी राज्य सरकारला दिलेला आहे. त्यानुसार औरंगाबाद न्यायालयात माझी न्यायाधीश म्हणून बदलीचे आदेश जारी झाले आहेत. परंतु, मला वक्फ बोर्डातून सोडण्यात आलेले नाही.

- सय्यद एजाज हुसैन,

सीईओ, राज्य वक्फ बोर्ड, औरंगाबाद

गार्डनसिटीला लागली प्रतीक्षा ‘राजा’श्रयाची

$
0
0

जेलरोडला उभारणार 'ऑल इन वन गार्डन'; शिखर प्रतिष्ठानचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडच्या शिखर प्रतिष्ठानतर्फे जेलरोड येथे ६० लाख रुपये खर्चून १६०० चौरस मीटरच्या भूखंडात 'ऑल इन वन गार्डन' उभारले जाणार आहे. महापालिकेला कोणताही खर्च नसताना दोन महिन्यांपासून आयुक्तांच्या सहीसाठी दोन महिने फाईल थांबली आहे.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी परदेशातील आधुनिक गार्डनचा अभ्यास करून या गार्डनचे स्केचेस तयार केले आहेत. डिसेंबरमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असता ते दाखवले. राज यांनीही या प्रकल्पाचे कौतुक करताना नाशिकला गार्डन सिटी करण्यासाठी हे पहिले पाऊल असल्याचे प्रशस्तीपत्र दिले होते. त्यांनी १२ डिसेंबरपर्यंत भूखंड हस्तांतरित करण्याची सूचनाही महापौर अशोक मुर्तडक यांना केली होती.

आयुक्त सही कधी करणार?

राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ १६०० चौरसमीटरच्या भूखंडावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. वर्षाला दीड लाख देखभाल खर्च असून तो प्रतिष्ठान करणार आहे. सात वर्षांनंतर गार्डन महापालिकेला हस्तांतरीत केले जाईल. गार्डनमध्ये प्रवेश विनामूल्य राहील, व्यवसायासाठी त्याचा वापर केला जाणार नाही, अशी लेखी हमी प्रतिष्ठाने दिली आहे. उद्यान विभाग, नगररचना विभागाने प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिला आहे. नगरसेवकांचा, महासभेचा ठरावही आहे. मात्र, दोन महिन्यांपासून आयुक्तांची फाईलवर सही झालेली नाही.

असा आहे प्रकल्प

गार्डनसिटीमध्ये ध्यान केंद्र व जॉ‌गिंगची सोय आहे. मुलांची आधुनिक खेळणी, कॉलेजची आठवण जागवणारा महिला कट्टा तर ज्येष्ठांसाठी सुख-दुःखाच्या गप्पांसाठी पार. वैशिष्ठ्यपूर्ण प्रवेशव्दाराशेजारी पाण्याचे तळे. पार्किंगसाठी स्वतंत्र सोय. मशरुमचे छत असलेली बैठक व्यवस्था. वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे व लॉन्स देखील असेल.

बोरसे खून प्रकरणातील तिघा संशयितांच्या कोठडीत वाढ

$
0
0

नाशिक : संदीप फांऊडेशनच्या आवारात झालेल्या रवींद्र बोरसे खून प्रकरणात अटकेत असलेल्या तिघा संशयितांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने बुधवार, २५ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.

रवींद्रची महिरावणी येथील संदीप फांऊडेशन कॉलेजच्या आवारात १६ फेबुवारी रोजी हत्या करण्यात आली होती. खुटवडनगर येथीर रहिवाशी असलेला रवींद्र इलेक्ट्रीक डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला होता. कॉलेजच्या आवारात डेज साजरा केला जात असताना काही विद्यार्थी व कॉलेजबाहेरील मुलांनी दोन गटातील वैमनस्यातून रवींद्रवर प्राणघातक हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने रवींद्र मृत्युमुखी पडला. हत्या झाली त्याच दिवशी भूषण थोरात आणि आकाश निगळ या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. नंतर दिवेश आवारे याला अटक केली. या तिघांना कोर्टाने २२ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली होती. अन्य संशयित आरोपी किरण जाधवाचा अजून शोध सुरू आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार, संशयितांच्या अंगावरील कपडे आदी महत्त्वपूर्ण पुरावे संकलित करणे बाकी आहे. पुढील चौकशीसाठी आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी वाढवली.

रेल्वे प्रबंधकांकडून सिंहस्थ कामांची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्टेशन परिसरातील कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी नवनियुक्त भुसावळ मंडल रेल्वे प्रबंधक सुधीर गुप्ता यांनी केली. मावळते प्रबंधक महेशकुमार गुप्ता, नाशिकरोडचे स्टेशनप्रमुख एम. बी. सक्सेना आदी उपस्थित होते. दोन वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वीच महेशकुमार यांची बदली झाली आहे.

कुंभमेळ्यात प्रवाशांची गर्दी नियंत्रणासाठी चौथा प्लॅटफार्म उभारला जात आहे. नवीन पादचारी पुलाचे कामही वेगात सुरू आहे. सिन्नरफाटा प्रवेशव्दार, तिकीट आरक्षणगृह, मालधक्का प्रवेशव्दार आदी कामांची माहिती सुधीर गुप्ता यांनी घेतली. वरिष्ठ अधिकारी अनिल बागले, आत्रे, रेल्वे सुरक्षा दलाचे मुख्य निरीक्षक बी. डी. इप्पर आदी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या कामांबाबत सुधीरकुमार यांनी समाधान व्यक्त केले. पर्वणी काळात रेल्वेस्टेशन आवारात खासगी पार्किंग तसेच रिक्षा, टॅक्सी यांना प्रतिबंध केला जाईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय महसूल कार्यालयात कुंभमेळा आढावा बैठक झाली. सुधीर गुप्ता आणि महेशकुमार गुप्ता यांनी रेल्वेच्या कामाचा अहवाल सादर केला.

रेल्वे जवानांकडून वाहनांची नासधूस

सुधीरकुमार गुप्ता पाहणीसाठी येणार असल्याने रेल्वे स्टेशनबाहेर पार्किंगला प्रतिबंध होता. त्यामुळे आंबेडकर पुतळ्यापासून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर काहींनी दुचाकी उभ्या केल्या होत्या. मात्र, साहेबांच्या गाड्यांना अडथळ नको म्हणून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सात-आठ दुचाकी बाजूला ढकलून दिल्या.

प्रेस महापालिकेची थकबाकीदार

$
0
0

तब्बल पावणेसहा कोटी रुपयांची घरपट्टी बाकी

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

भारत प्रतिभूती आणि चलार्थ पत्र मुद्रणालयाकडे एकूण पावणे सहा कोटीची घरपट्टी थकलेली आहे. थकबाकी वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेचे विभागीय अधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. दरम्यान, घरपट्टी थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्याची व सातबाऱ्यावर नोंद करण्याची कारवाई सुरू झाल्याने थकेबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

महापालिका विभागीय कार्यालयाने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूलीची मोहीम सुरू केली आहे. या आर्थिक वर्षात घरपट्टीसाठी २२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. पैकी नऊ कोटी ८८ लाखाचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षीपेक्षा तो ३९ लाख ६५ हजार रुपयांनी जास्त आहे. ४६३ मोठ्या मिळकतधारकांना जप्तीचे वॉरंट देखील बजावण्यात आले आहे. बारा हजार जणांना नोटीस बजवाण्यात आली असून ९८७ जणांनी पूर्ण तर ९०१ जणांनी निम्मी घरपट्टी भरली आहे.

या वर्षात पाणीपट्टीपोटीचे १४ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी सव्वा सहा कोटींचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षीपेक्षा तो एक कोटी नऊ लाखांनी जास्त आहे. पाणीपट्टी न भरल्यास नळकनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीही महापालिकेचे कार्यालय वसूलीसाठी उघडे ठेवण्यात आले आहे.

केंद्राशी पत्रव्यवहार

प्रेसकडे पावणे सहा कोटींची थकबाकी आहे. प्रेस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने घरपट्टी लागू होत नाही, असा दावा व्यवस्थापन करत आहे. तर प्रेसचे रुपांतर आता महामंडळात झाल्याने त्यांनी घरपट्टी भरावी म्हणून महापालिका आग्रही आहे. वसुलीसाठी केंद्राशीही पत्रव्यवहार केला जात आहे. उपायुक्त बहिरम यांच्याकडे सुनावणी सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

स्थायी सदस्य निवडीसाठी शुक्रवारी विशेष सभा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या येत्या २९ फेब्रवारी रोजी रिक्त होणाऱ्या आठ जागांवर नव्याने सदस्य निवडीसाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २७) घेण्यात येणार आहे. निवृत्त सदस्यांच्या रिक्त जागी वर्णी लागावी यासाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत मनसेचे विद्यमान सभापती राहुल ढिकले यांच्यासह शीतल भामरे, अर्चना थोरात, दीपाली कुलकर्णी, काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शोभा आवारे, राजेंद्र महाले, रुपाली गांवड निवृत्त होत आहेत. निवृत्त सदस्यांमध्ये मनसे आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे.

त्यामुळे नव्याने नियुक्तीसाठी या दोन पक्षातील सदस्यामंध्येच सर्वाधिक चढाओढ असून, वरिष्ठांमार्फत फिल्डींग लावण्याचे काम सदस्यांनी सुरू केले आहे. मनसे, राष्ट्रवादी सोबतच सेना आणि भाजपही उर्वरित सदस्यांना संधी देण्यासाठी आपला सदस्यांचा कार्यकाल कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षातील इच्छुकांनाही धुमारे फुटले आहेत. या सदस्यांची निवड शनिवारी (दि. २८) आत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पुढील शुक्रवारी या आठ सदस्यांची निवड करण्याकरीता विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत या सदस्यांची निवड केली जाईल.

कडाका उन्हाचा अन् थंडीचाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवसा ऊन तर सायंकाळनंतर थंडी अशा विपरित वातावरणामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. नाशिकमध्ये कमाल ३३ तर किमान १३ अंश सेल्सीअस तपमानाची नोंद हवामान खात्याकडे झाली असून ऊन आणि थंडीच्या कडाक्यात साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे.

फेब्रुवारीअखेरीस शहरात उन्हाचा कडका वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसात उन्हाचा पारा ३३ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळ्या बसत असून बाजारापेठेत शुकशुकाट होते आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे थंडीचाही मुक्काम कायम असल्याचे दिसते. नाशिकमध्ये १३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली असून ऋतू बदलाचा परिणाम आरोग्यावर जाणवतो आहे. विशेषतः लहान मुलांना सर्दी, खोकला, कफ अशा आजारांना सामोरे जावे लागते आहे. प्रत्येक ऋतू बदलादरम्यान ही परिस्थिती उद्भवते. अशा वेळी सर्वांनीच खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.


जेतवनगर वसतिगृहाला जाच समाजकंटक अन् श्वापदांचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील जेतवनगरमधील निवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना समाजकंटकांसह जंगली श्वापदांनाही तोंड द्यावे लागत आहे. वसत‌िगृह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे, अशी मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.

अनाथ व गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, ते मुख्य प्रवाहात यावेत या उद्देशाने महापालिका आणि सर्व शिक्षा अभियान यांच्यातर्फे २०१३ मध्ये जयभवानी रोडवरील जेतवननगरमध्ये हे वसत‌िगृह स्थापन करण्यात आल‌ी. शिक्षणाबरोबरच दोन वेळचे जेवण आणि निवासाचीही सोय येथे आहे. सध्या सुमारे ५० विद्यार्थी आहेत. चांगल्या सुविधा दिल्यास आणखी विद्यार्थी प्रवेश घेतील असे सूत्रांनी सांगितले.

भय बिबट्याचे

लष्कराच्या हद्दीजवळ हे वसत‌िगृह आहे. विंचू, साप यांचे दर्शन विद्यार्थ्यांना नित्यनियमाने घडत असते. परंतु, काही दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याचेही दर्शन झाले. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने उपनगर पोलिस ठाण्याजवळ नेहरुनगरच्या प्रवेशद्वाराजवळच पिंजराही लावला होता. बिबट्या व जंगली श्वापदांच्या भयाने मुलांना रात्री बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

समाजकंटकांचा त्रास नित्याचा

गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा त्रास विद्यार्थ्यांबरोबरच व्यवस्थापनालाही होत असतो. रात्री अपरात्री वसतिगृहाशेजारीच मद्यपान सुरू असते. परिसरात नेहमीच शिवीगाळ, भांडणे-तंटे सुरू असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा बाराही महिने त्रास होत असतो. त्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि मानसिकतेवर परिणाम होत आहे. मद्यपींना हटकले म्हणून वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

स्थलांतर हाच उपाय

वसतिगृहापासून थोड्याच अंतरावर गांधीनगर विमानतळ असल्याने हेलिकाप्टर्स दिवसभर उड्डाण भरत असतात. त्यांच्या आवाजामुळेही विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. समाजकंटक, जंगली जनावरे अशा विविध जाचांवर उपाय म्हणून हे वसतीगृह स्थलांतरीत करावे, अशी पालक व नागरिकांची मागणी आहे.

बंदला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे पितामह, ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. मेनरोड, भद्रकालीसह शहरातील बहुतांश उद्यानांमध्ये व्यवहार सुरळीत सुरू होते. शालिमार, एमजीरोडसह काही उद्यानांमध्ये व्यावसायिकांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेऊन बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला.

पानसरेंसह त्यांच्या पत्नी ऊमा यांच्यावर कोल्हापूरात भ्याड हल्ला करण्यात आला होता. गोळीबारात गंबीर जखमी झालेल्या पानसरेंची ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षसह सर्व डाव्या संघटनांनी रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बारावीच्या परीक्षार्थींचे नुकसान होऊ नये, म्हणून बंदसाठी सुटीचा दिवस निवडल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सचिव भालचंद्र कांगो यांनी स्पष्ट केले होते. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादीसह रिपाइंनेही पाठिंबा दर्शविला होता. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात दोन दिवस तीव्र आंदोलनचे दडण्यात आले होते. शनिवारी पोलिस आयुक्तालयाबाहेर मुख्यमंत्र्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शहरात बंदला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी चिन्हे होती; मात्र शालिमार, एमजीरोडवर दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला. अन्य बाजारपेठांमध्ये चारनंतर दुकाने खुली होऊ लागली. मेनरोड, भद्रकाली, पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, रविवार कारंजा परिसरात सकाळी दहापर्यंत बंदची चिन्हे होती. हळूहळू या परिसरांतील व्यावसायिकांनी दुकाने खुली करण्यास सुरुवात केली. मेनरोड, भद्रकाली, सातपूर, नाशिकरोड परिसरातील बाजारपेठा दहानंतर खुली झाली. सिडकोत बंदचे वातावरणही दिसले नाही. सकाळपासूनच तेथील बाजारपेठांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू होते. दुपारी चारनंतर शहरातील सर्वच बाजारपेठा खुल्या होऊन व्यवहार सुरळीत सुरू झाले. शहरात संमिश्र वातावरण दिसून आले. अनुचित प्रकार घडू नये, कार्यकर्त्यांनी आंदोलन करून तणावाची परिस्थिती निर्माण करू नये, यासाठी पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये बंदोबस्त तैनात केला होता.

२२ जण पोलिसांच्या ताब्यात

व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शालिमार चौकात पोहोचले. गोंधळाची परिस्थिती हाताळण्यासाठी शालिमार चौकात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यावसायिकांनी दुकाने बंद करावीत अशी जबरदस्ती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून होऊ लागली. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्यासह २२ जणांना ताब्यात घेतले. त्यांना नंतर सोडून देण्यात आले.

समस्या निवारणाची रहेनुमानगरवासीयांना आस

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

प्रभाग क्रमांक ३८ मधील रहेनुमानगर परिसरातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले असून समस्यांचे निवारण होण्यासाठी त्रस्त नागरिकांनी महापालिका आयुक्त, पूर्व विभाग अधिकारी व प्रभागच्या नगरसेविका नीलिमा आमले यांना समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

अशरफी चौक, रहेनुमानगर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यातील म्हशींचे मल-मूत्र मिश्रीत घाण पाणी भूखंडावरच सोडर्यात आले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तसेच याच गोठामालकाने स्वत:च्या बंगल्यावर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारला आहे. या टॉवरच्या घातक किरणांमुळे परिसरातील हृदयविकाराचे रुग्ण व गर्भवती महिलांसह लहान मुलांना त्रास होत आहे. रहेमुमानगरमधील अनेक पथदीप बंद असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. भुरट्या चोऱ्यांचा धोका वाढला आहे. परिसरातील रस्तेही ठिकठिकाणी उखडले आहे. तसेच नवीन वसाहती असलेल्या भागातही पक्के रस्तेच नसल्याने नागरिकांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे.

तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता आणि वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने परीक्षा कालावधीत विद्यार्थी हैराण झाले आहेत. रहेनुमानगर परिसरातील समस्या त्वरित सोडविण्याची मागणी शेख हमीद, शेख आसिफ, हाजी नौशाद, काजी सलिम, शेख शकील, अकबर भाई, हाजी करीम, मतीन अन्सारी, सइमरान शेख, सादीक शेख, आदींनी केली आहे.

रेल्वेस्थानक विकासापासून वंचित

$
0
0

घोटी-इगतपुरीत स्थानकावर सुविधांची वानवा

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात रेल्वे वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणात असूनही सुविधा मात्र मिळत नाही. यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे घोटी-इगतपुरी रेल्वे प्रश्नी लोकप्रतिनिधिंनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. रेल्वेच्या समस्या मार्गी लागल्यास या भागाचा झपाट्याने विकास होईल व पर्यटनाला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

येत्या काही दिवसात रेल्वे अंदाजपत्रक सादर होणार असल्याने त्यात खासदारांच्या व संबंधित लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांनी या प्रश्नांना न्याय मिळू शकतो. घोटी शहरात रेल्वे स्टेशन असूनही त्याचा फारसा उपयोग होत नाही. एक शटल व पॅसेंजर या दोन रेल्वेगाड्यांशिवाय कोणतीही रेल्वे थांबत नाही. व्यापारानिमित्त घोटी व परिसरातील शेकडो गावांच्या प्रवाशांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर जावे लागते. रात्री परतताना त्यांना घोटीकडे येण्यास वाहन मिळत नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

घोटी रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे स्टेशन असूनही विकासापासून वंचित आहे. घोटीत तातडीने निवारा शेड उभारण्याची गरज आहे. आजही प्रवाशांना उन्हाळ्यात भर उन्हात उभे राहावे लागते. पावसाळ्यात कार्यालायांचा आडोसा घ्यावा लागतो. तसेच या स्टेशनवर फुटवेअर नसल्याने प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या स्टेशनवर प्रवाशांसाठी तर घोटी रेल्वेगेट लगत पादचाऱ्यांसाठी फूटवेअरची नितांत गरज आहे.

या विकासकामांना चालना देण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार निर्मला गावित यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक दृष्टीने याप्रश्नी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. हे प्रश्न मार्गी लागल्यास रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ होऊन व्यापार गतिमान होईल. एवढेच नव्हे तर शिर्डी, टाकेद, कावनई, त्र्यंबकेश्वर, भंडारदरा, कळसुबाई शिखर व धरणांच्या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांची, भाविकांची वाढ होऊन पर्यटनाला चालना मिळू शकेल.



या सुविधांची गरज

> घोटी रेल्वेस्‍थानकावर निवारा शेडची गरज

> मनमाड-इगतपुरी दरम्यान दिवसातून किमान तीन वेळेस ही शटल सेवा अपेक्षित.

> पंचवटी, गोदावरी, तपोवन राज्यराणी व पुणे एक्स्प्रेसला घोटी येथे थांबा द्यावा.

> मनमाड-नाशिक दरम्यान धावणारी शटल/पॅसेंजर ही इगतपुरीपर्यंत नेण्यात यावी.

> या मार्गावर वाहतुकीसाठी पाच डब्ब्यांची विशेष सवारी रेल सुरू करावी.

वसतिगृह जागा खरेदीस मजूर संस्थांचा ‌विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघ, मर्यादीत या संस्थेच्या वतीने वसतिगृहासाठी जागा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला जिल्ह्यातील मजूर संस्थांनी विरोध दर्शविला आहे. उपनिबंधक कार्यालयाने हा जागा खरेदीचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, अन्यथा आंदोलन आणि न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा मजूर संस्थांनी दिला आहे. ‍

‍नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघ मर्यादीत या संस्थेच्या संचालक मंडळाने ३ सप्टेंबर २०१४ रोजी वार्षिक सभेचे आयोजन केले होते. या सभेत जागेच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, बहुतांश मजूर संस्थांच्या विरोधानंतरही गोंधळाची स्थिती निर्माण करून त्या वातावरणात संचालक मंडळाने याबाबतचा ठराव मंजूर करून घेतल्याचा मजूर संस्थांचा आरोप आहे.

मंजूर संस्थांच्या रोजगारावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ घातली आहे. या स्थितीत मजूर संघाने संस्थांना नवी कामे मिळवून देण्याच्याऐवजी संघाच्या सभासदांच्या पाल्यांसाठी वसतीगृहास जागा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला प्राधान्य दिले आहे. मजूर संघाकडे उपलब्ध असणारा निधी शिल्लक राहीलेल्या स्थितीत संस्था बंद पडल्यास शासनाकडे जमा होईल असा धाक दाखवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून आगामी निवडणूकीचे राजकारण त्यामागे दडले असल्याचा आरोपही मजूर संस्थांनी केला आहे.

आगामी सहा महिन्यात नाशिक मजूर संघाच्या होणाऱ्या निवडणूकीत संचालक मंडळ निवडणूक निधीसाठी या जागेचा वापर करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप अन्याय विरोधी मजूर सहकारी संस्थेने केला आहे. याबाबतचे निवेदनही जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहे. या निवेदनावर निफाड येथील नवनाथ मजूर संस्था, हर्ष मजूर बांधकाम सहकारी संस्था, माता धनदाई मजूर संस्था, सप्तर्षी मजूर बांधकाम सोसायटी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महापालिकाही रुसली

सद्यस्थितीत शासनाकडून मजूर संस्थांना मिळणारी कामे बंद झाली असून, दहा लाख रूपयांपर्यंतची मिळणारी कामे सद्यस्थितीत ३ लाख रूपयांवर येऊन ठेपली आहेत. पूर्ण वर्षभरही मजूर संस्थांना कामांपासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपल्याचे संस्थांचे म्हणणे आहे. यातच भर म्हणजे नाशिक महापालिकेनेही सुमारे सहा महिन्यांपासून मजूर संस्थांना कामे देणे बंद केले आहे.

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images