Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पोलिसांचा ‘मिल्खा’ ऑस्ट्रेलियात

$
0
0

अरविंद जाधव, ना​शिक

नोकरी-प्रपंचात गुरफटल्यावर व्यक्ती आपल्या इच्छा आकांश गुंडाळून ठेवतात. शालेय जीवनातील चांगला खेळाडू नंतर त्या खेळाकडे ढुंकूनही पाहत नाही. असे अनेक चांगले खेळाडू समाजात दिसतात. त्यातीलच एक असलेले अंबड पोलिस स्टेशनचे हवालदार नंदू रामभाऊ उगले हे होय. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर उगलेंनी आपला धावण्याचा छंदच जोपासला असे नाही तर या कर्तृत्वाचा झेंडा रोवण्यासाठी ते लवकरच ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

पोलिस दलात १९९० मध्ये भरती झालेल्या उगलेंचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील समशेरपूर. दहावीपर्यंत गावातच शिक्षण घेतलेल्या उगलेंना व्यायमासह धावण्याची आवड सुरुवातीपासूनच होती. पुढे शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर हाच छंद त्यांना पोलिस दलापर्यंत घेऊन आला. भरती प्रक्रियेमध्ये सर्वांत जलद धावण्याच्या त्याच्या विक्रमामुळे तत्कालीन आयुक्त के. के. कश्यप यांनी त्यांचा सत्कार केला.

पोलिस म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या उगलेंवर प्रापंचिक जबाबदारी येऊन पडली. जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेतलेल्या उगलेंना मग धावण्यासाठी वेळ अपूरा पडू लागला. त्यातच पैशांचे सोंगही घेण्यासारखे नव्हते. हळूहळू उगलेंच्या खेळातील व्यवसायिकात मागे पडली. दोन मुलांले झाल्यानंतर त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या खेळातील आवड जोपसण्यावरच उमले यांनी भर दिला. २०१२ त्यांची मुलगी अंकिता तायक्वादो स्पर्धेसाठी नागपूरला गेली. तिथे तिने मेडल मिळवले.

पाल्यांच्या आग्रहामुळे सरावाला सुरुवात

मुलीच्या यशामुळे नंदू उगलेंमधील खेळाडू जागा झाला. अंकीता व मुलगा मेघनील यांनी वडिलांच्या छंदाला जोपसण्याचा विडाच उचलला. उगलेंनी धावण्याचा सराव सुरू केला. पत्नी सुरेखा यांनीही जोड व्यवसाय सुरू करून पतीला आर्थिक मदत करण्यात खारीचा वाटा उचलला. त्यांनी सर्वात प्रथम मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. २१ किलोमीटरचे अतंर त्यांनी दोन तासात पार पाडले. अवधी जास्त लागला. मात्र, त्यामुळे खचून न जाता सराव सुरूच ठेवला. त्यानंतरच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये हेच अंतर त्यांनी दीड तासात कापले. पुढे मविप्र,

केरळ, हैदराबाद, ठाणा, गोदा मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला. दरम्यान, हरियाणा येथील रोहतकमध्ये ३५ वी नॅशल मास्टर अॅथेलिटिक्स स्पर्धा पार पडली. त्यातील चार प्रकारापैकी १५०० मीटर धावणे आणि २ बाय २ १०० मीटर रिलेमध्ये त्यांना रजत पदक मिळाले. ४३ वर्षिय उगले यांच्यातील उत्साह पाहून इंडिया मास्टर अॅथेलिटिक्स संघटनेने ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे.

खेळातील व्यावसायिकता जपण्यासाठी वेळ आणि पैसा लागतो. विशेषतः राष्ट्रीय किंवा आतंरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याची आवश्यकता भासते. दोन्ही मुले इंजिनीअरिंगला असून वडील १४ वर्षांपासून पक्षघाताने आजारी आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियात कसे जायचे याची विवंचना समोर आहे. त्यातून काही मार्ग निघाला तर नक्कीच यश मिळवेन.

- नंदू उगले, हवालदार, अंबड पोलिस स्टेशन

दिलीप दातीर यांच्यातर्फे मदत

अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले नंदू रामभाऊ उगले यांची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. घराची बेताची परिस्थिती असलेल्या उगले यांना माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी अन्य दानशूर व्यक्तींनीही उगले यांना मदत करावी, असे आवाहन दातीर यांनी केली.

प्रश्न आर्थिक जुळावाजुळवीचा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठी आर्थिक तरतुदीची गरज आहे. पोलिस कल्याणनिधीमधून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिले असून अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उगले यांचे सहकारीही मदतीसाठी एकटवले आहे. समाजातील इतर स्तरातून मदतीचा ओघ मिळाल्यास ऑस्ट्रेलियाला पोहचणे शक्य होईल, अशी अपेक्षा उगलेंना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्ञानगंगा सक्षमतेसाठी ‘थिंक टँक’

$
0
0

विविध क्षेत्रातील ९ तज्ज्ञ मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वैविध्यपूर्ण उपक्रम सुरु केले असून ज्ञानगंगेला सशक्त करण्यासाठी 'थिंक टँकची' निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञ आणि संशोधकांना विद्वत परिषदेवर संधी देवून त्यांच्या सूचनांद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या किंवा शिक्षणापासून कोसो दूर असलेल्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना केली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठाद्वारे विद्वत परिषद कार्यरत असते. या परिषदेवर मात्र बहुतांशवेळा कुलगुरुंच्या मर्जीतले किंवा विद्यापीठाशी संबंधित व्यक्तींना घेतले जाते.

त्यामुळे या परिषदेच्या व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर केला जात नाही. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी या परिषदेला थिंक टँकचा दर्जा देत विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यात नियुक्त केले आहे. या मान्यवरांनी केलेल्या विविध सूचना आणि शिफारशींचा विचार करुन वैशिष्ट्यपूर्ण अशा अभ्यासक्रमांची रचना केली जाणार आहे. त्याद्वारे विविध विभाग आणि विषयातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्याचा अमेरिकेत जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैश्विक सोहळा असलेला सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या अडीच महिन्यांवर येवून ठेपला असताना या सोहळ्याचा जागर आता अमेरिकेत होत आहे. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)च्या प्रांगणात होणाऱ्या कुंभथॉन या आंतरराष्ट्रीय परिषदेत मंगळवारी रात्री (अमेरिकेत सकाळी) विशेष चर्चासत्र होत आहे.

दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला येत्या जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे. लाखो साधू आणि भक्तांच्या आगमनामुळे हा सोहळा वैश्विक होतो. या सोहळ्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, या सोहळ्याचे योग्य ते नियोजन होणेही आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची जोड देवून या सोहळ्यात आपत्ती घडू नये आणि अत्याधुनिक तंत्रांचा वापर करुन या सोहळ्याला चार चाँद लावण्यासाठी कुंभथॉन ही संकल्पना मांडण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून या संकल्पनेद्वारे इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांसह आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांपर्यंत सर्वांना सामावून घेण्यात आले आहे. कुंभथॉनमधील विचार मंथनातून पुढे आलेल्या दहा विविध संकल्पनांवर सध्या काम केले जात आहे. या संकल्पना येत्या जून महिन्यात प्रत्यक्षात येणार असून, तत्पुर्वी या संकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी अमेरिकेतील जगविख्यात एमआयटी संस्थेमध्ये विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

कुंभथॉनच्या आयोजनात सहभागी असलेले आयटी तज्ज्ञ सुनील खांडबहाले, टीसीएसचे संदीप शिंदे, एमकेसीएलचे सुभाष पाटील, टेन एक्स ग्रोथचे अजय सिंगानिया हे पाच जण एमआयटीत दाखल झाले आहेत. एमआयटीचा वार्षिक महोत्सव गेल्या रविवारपासून (१२ एप्रिल) सुरु झाला आहे. गेल्या वर्षभरात एमआयटीच्या विद्यार्थी व संशोधकांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे सादरीकरण त्यात केले जाते. आता त्याच महोत्सवात कुंभथॉनचेही सादरीकरण होत असल्याचे शिंदे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले आहे.

इनोव्हेशन सेंटर

साथीचे रोग, मेडिकल ट्रॅकिंग, क्राऊड मॅनेजमेंट, २डी अँड ३डी मॅप, लोकल कम्युनिटी रेडिओ, अन्नदान, अशा एकूण १० प्रकल्पांवर कुंभथॉनमध्ये काम केले जात आहे. तसेच, हे प्रकल्प अत्यंत प्रभावशाली कसे होऊ शकतील, यावर तेथे विचारमंथन केले जाणार आहे. नाशिकसारख्या शहरात अशा प्रकारच्या वैश्विक सोह‍ळ्याला संशोधनाची जोड देण्यात येत असल्याने नाशिकला इनोव्हेशन सेंटर व्हावे असा विचार आम्ही तेथे मांडत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याद्वारे एकूणच नाशिक शहराचे ब्रँडिंग होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ!

$
0
0

तीन वर्षांपासून प्रथमोपचार पेट्यांची खरेदी बंद; उपचारांभावी दहा वर्षांत आठशे मृत्यू

विनोद पाटील, नाशिक

आदिवासी विकास विभागाने आदिवासी आश्रमशाळांसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रथमोपचार पेट्यांची खरेदीच केलेली नाही. त्यामुळे साडेचार लाख विद्यार्थी जीव मुठीत धरूनच शिक्षण घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रथमोचाराअभावी दहा वर्षांत ७९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी विभागाच्याच सर्व्हेक्षणात समोर आली आहे. मोठ्या योजनांच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी करणारा हा विभाग विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचेच स्पष्ट होत आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा या शिक्षणापेक्षा गैरप्रकारांसाठीच चर्चेत असतात. भ्रष्टाचार, नोकरभरती, निकृष्ठ आहारपुरवठा, मुलींचे विनयभंग अशा घटना नित्याचाच बनल्या आहेत. त्यास राजकीय उदासीनतेसोबतच प्रशासकीय पातळीवरील उदासीनताही कारणीभूत आहे. राज्यात शासकीय आश्रमशाळांची संख्या ५५२, तर खाजगी अनुदानित आश्रमशाळांची संख्या ५५६ आहे. या ११०८ आश्रमशाळामंध्ये दरवर्षी साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, आश्रमशाळांमधील गैरसोयींमुळे दरवर्षी सरासरी ५० ते ६० मुलांचा मृत्यू होतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णतः हेळसांड विभागाकडून केली जात आहे.

आश्रमशाळा दुर्गम भागात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना, अपघात, विविध आजार, विंचू व सर्पदंश सारख्या घटनांमध्ये प्रथमोपचार मिळाला नाही, तर त्यांचा मृत्यू ओढावतो. त्यामुळे आश्रमशाळांसाठी प्रथमोपचार पेट्यांची खरेदी करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने २०११ मध्ये घेतला होता. पहिल्या वर्षी सव्वा कोटी रुपये खर्चून या पेट्यांची खरेदी करण्यात आली. या पेट्यांचे आयुष्य एक वर्षाचेच असल्याने दरवर्षी या पेट्या हाफकीन संस्थेतर्फे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लालफितीचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांना बसला असून, सन २०१२ पासून या पेट्यांची खरेदीच लालफितीत अडकली आहे. दरवर्षी साधारणतः दीड ते दोन कोटींची आवश्यकता असतांनाही गेल्या तीन वर्षांपासून खरेदी झाली नाही.

राज्यातील ११०८ आश्रमशाळांमध्ये २००२ ते २०१२ दरम्यान ७९३ मुलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यात सर्पदंशाने ५५, नैसर्गिक मृत्यू व आत्महत्या १७६ तर प्राथमिक उपचार न मिळाल्याने ४३४ मुलांचा मुत्यू झाल्याचे आढळून आले.

हायकोर्टाचा इशारा

आदिवासी आश्रमशाळांची दयनीय स्थिती आणि तोकड्या सुविधांसंदर्भात पुण्यातील याचिकाकर्ते रवींद्र तळपे यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुलांच्या मुत्यूसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात ७ एप्रिलला सुनावणी झाली असून, पंधरा दिवसांत उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. माहिती सादर न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा कोर्टाने दिला आहे. त्यामुळे विभागाच्या वतीने सध्या कागदोपत्री उपाययोजनांची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, अहवालानंतरही आश्रमशाळांमधील उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एवढ्या मुलांचा जीव जावूनही आदिवासी विभागाने झोपचे सोंग पांघरले आहे.

एकीकडे विभागात शेकडो कोटींचे घोटाळे उघड होत असताना, केवळ दीड ते दोन कोटींच्या खरेदीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आदिवासी मुलांबद्दल आदिवासी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असून, आता न्यायालयच यांदर्भात निर्णय घेणार आहे.

- रवींद्र तळपे, याचिकाकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाचा वाद संपता संपेना!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण मंडळाच्या वादग्रस्त प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांच्या बदली नंतर वसुधा कुरणावळ यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. कुरणावळ या कुंवर यांच्यापेक्षाही वादग्रस्त असून त्यांच्याकडे प्रभार देवू नये अशी मागणी मनसेचे नगरसवेक संदीप लेनकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे कुरणावळ यांचे अनेक प्रताप महासभेसमोर आले असतांनाही आयुक्तांनी त्यांच्याकडे सोपवलेल्या पदभारावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. कुरवणावळ यांच्याऐवजी चांगल्या अधिकाऱ्याकडे शिक्षण मंडळाचा कारभार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

किरण कुंवर यांच्या जागेवर बदली होवून आलेले राजीव म्हसकर रूजू न झाल्याने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सहाय्यक आयुक्त वसुधा कुरणावळ यांच्याकडे शिक्षण मंडळाचा तात्पुरता पदभार सोपवला आहे. कुरणावळ यांनीही या आधी प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्या काळात अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यात आले आहेत. आर. टी. ई. २००९ चे उल्लघंन, विविध स्पर्धा घोटाळे, एकतर्फी शिक्षक भरती घोटाळा, आदेश खाडाखोड घोटाळा, स्कॉलरशिप पुस्तक खरेदी प्रकरण, अशी विविध प्रकरणांमध्ये कुरणावळ यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. माकपच्या तानाजी जायभावे यांनी महासभेत लक्षवेधी मांडून कुरणावळ यांचे घोटाळे बाहेर काढले होते. त्यामुळे अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांकडे पुन्हा पदभार देणे योग्य नसल्याचा दावा संदीप लेनकर यांनी केला आहे.

महासभेत लक्षवेधी मांडणार

शिक्षण मंडळाचा कारभार स्वच्छ व पारदर्शी अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा; अन्यथा पुढील महासभेत लक्षवेधी मांडू असा इशारा नगरसेवक संदीप लेनकर यंनी दिला आहे. शिक्षण उपसंचालकांकडे चांगल्या अधिकाऱ्याची मागणी करण्यात यावी किंवा राजीव म्हसकर यांच्याकडे तत्काळ पदभार देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटी रस्त्यावरही वाळूच्या वळूंवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी येथील निवासी नायब तहसीलदारांच्या पथकाने सिन्नर घोटी मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई केली. या पथकाला गुंगारा देऊन एक वाळू वाहतुकदार वाहनासह पसार झाला. उर्वरित चार वाहनांकडून सुमारे तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे चार ते सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

'मटा'ने प्रसिध्द केलेल्या 'वाळूचे वळू' या वृत्त मालिकेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: बागलाण, चांदवड येथे अवैध वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर कारवाई केली. प्रांत, तहसिलदारांच्या कार्यक्षेत्रात जाऊन ही कारवाई करीत जिल्हाधिकाऱ्यांनी एकप्रकारे त्यांना चपराक लगावली. जिल्हाधिकारीच रस्त्यावर उतरल्याने महसूल विभागातील त्यांची सेनाही रस्त्यावर उतरली. नाशिकचे तहसीलदार गणेश राठोड यांनी नाशिक औरंगाबाद रस्त्यावर अशी सहा वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. रविवार आणि सोमवारी जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २३ वाहनांवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे इगतपुरी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदारांनी टाकेद ते सिन्नर रस्त्यावर कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक करणारे एमएच १७ ए ३७१०, एमएच १५ इजी ६०८८, एमएच ०४ बी ९७११ या क्रमांकांचे ट्रक ताब्यात घेतले. तर एका ट्रकवरील क्रमांकात खाडाखोड करण्यात आल्याचे आढळून आले. निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, सर्कल सुभाष गीते, तलाठी सागर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

‍आम्ही पाच वाहने अडविली. त्यातून क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. ही वाहने तहसील कार्यालयात घेऊन जात असताना एक चालक गुंगारा देऊन वाहनासह पसार झाला. चार वाहनांकडून सुमारे तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

- संघमित्रा बाविस्कर, निवासी नायब तहसीलदार इगतपुरी

महिला अधिकाऱ्याकडून प्रथम कारवाई

जिल्हा प्रशासनाने वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारल्यापासून एखाद्या महिला अधिकाऱ्याने रस्त्यावर उतरून अशा प्रकारची बेधडक कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाईवेळी पथकाकडून गोपनियता पाळण्यात आली. तलाठी पाटील यांच्यावर पाथर्डी फाटा येथे झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असल्याने वाहने ताब्यात घेताच सर्वप्रथम वाहनचालकांचे मोबाईल काढून घेण्यात आले. त्यांनतर ही वाहने तहसील कार्यालयात नेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २८०७ हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील अडीच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, मंगळवारी सलग पाचव्या दिवशीही जिल्ह्यासह शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

अवकाळी पावसाने कहर सुरूच ठेवला असून त्याने शेतकऱ्यांचे जगणे नकोसे करून ठेवले आहे. जिल्ह्यात ९ एप्रिलपासून सलग पाचव्या दिवशीही अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. गारपीटीने पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ११ आणि १३ एप्रिल रोजी बेमोसमी पावसाने अक्षरश: जिल्हावासियांना झोपडून काढले आहे.

या दोन दिवसांत अनुक्रमे ११२३ आणि १००६ शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी केली आहे. या पाच दिवसांत २ हजार ८०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून २ हजार ५१४ शेतकऱ्यांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. नांदगाव, कळवण, मालेगाव, निफाड आणि बागलाण या तालूक्यांमध्ये पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यामध्ये २२३ घरांचे नुकसान झाले असून एकजण वीज पडून ठार झाला. ६ मोठी तर १० लहान जनावरे आणि १५३ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. याखेरीज एक पोल्ट्री फार्म आणि एका कांदा चाळीचे त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील काही भागात तसेच शहरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रेडाई’तर्फे ७०० अधिकाऱ्यांना निवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिक शहरात उपस्थित राहणाऱ्या सुमारे सातशे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था 'क्रेडाई' या संस्थेच्या वतीने करण्याचे आश्वासन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. 'क्रेडाई'च्या वतीने नवे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने जगन्नाथन यांना आश्वस्त करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या विविध विभागांची जय्यत तयारी सुरू आहे. या नियोजनासाठी शहरात मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहणार आहे. या अधिकारी वर्गाच्या निवासासाठी 'क्रेडाई'ने सहकार्य करावे, अशी अपेक्षा नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी केली होती. यावर अधिकारी वर्गाच्या निवासासह सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेच्या वतीने देण्यात आले.

या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने 'शहर विकास व कुंभमेळा २०१५' या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. अधिकारी वर्गाच्या बरोबरच देशविदेशातून नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सहकार्यासाठीही 'क्रेडाई'च्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. शहराचा डिजीटल नकाशाही 'क्रेडाई'च्या वतीने बनविण्यात आला. हा नकाशा पोलिस आयुक्त कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने वेळोवेळी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असून या माध्यमातून विविध आव्हानांवर तोडगा शोधला जाईल, अशी भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी मांडली.

पोलिस आयुक्त जगन्नाथन यांचे स्वागत 'क्रेडाई'चे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी केले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण, नेमिचंद पोद्दार, सुरेश पाटील, सदाशिव शुक्ल, उपाध्यक्ष अभय तातेड, राजेंद्र ठक्कर, सचिव नरेश कारडा, खजिनदार सुनील कोतवाल, कमिटी सदस्य सुनील गवांदे आदी उपस्थित होते. मानद सचिव नरेश कारडा यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामाजिक समस्यांवर राज्यघटना रामबाण उपाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय राज्यघटना सर्व सामाजिक समस्यांवरील रामबाण उपाय आहे. राज्यघटनेची व्यवस्थित अंमलबजावणी झाल्यास अनेक सामाजिक समस्या दूर होतील, असे प्रतिप्रादन राज्य सरकारच्या अनूसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक समितीचे सदस्य कायदेतज्ज्ञ अॅड. बी. के. मोरे यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा मंगळवारी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर होते. यावेळी इंग्रजी भाषेचे अभ्यासक प्रा. एकनाथ सोनवणे, प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे व सहाय्यक आयुक्त वंदना कोचुरे आदी उपस्थित होते.

बर्वे म्हणाले, की डॉ. आंबेडकरांनी बौध्द धर्माची दीक्षा केवळ देशात समानता, एकात्मता निर्माण व्हावी यासाठीच घेतली. सध्या देशात अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधवा सुनेचा पंचवटीत छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

पतीच्या निधनानंतर सासू आणि सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सासऱ्या विरोधात सुनेचा विनयभंग केल्याचा गुन्हा देखील दाखल केला आहे.

पीडीत महिलेच्या पतीचे ​१ ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले. पतीच्या निधनानंतर ती महिला सासरी राहते. पतीच्या निधनानंतर सासू, सासरे छळ करीत असल्याचे पीडीत महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. १२ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित सासऱ्याने बाथरूमला जायचे आहे असे सांगून दरवाजा उघडून देण्यास सांगितले. पीडीत महिला दरवाजा उघडून देत असताना सासऱ्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणातील सासूही मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचे पीडीत महिलेची तक्रार आहे. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनाचे हरितकुंभसाठी पाऊल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 'हरितकुंभ'बाबत जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय ऑडिओ व व्हिडिओ जिंगल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद मिळेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.

कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे हा वैश्विक उत्सव असल्याने त्यात अधिकाधिक घटकांना सामावून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. म्हणूनच जिंगल्स स्पर्धेच्या माध्यमातूनही हरितकुंभच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिंगल्स ३० ते ६० सेकंदांची असणे आवश्यक आहे. प्लास्टिकमुक्ती, नदी प्रदूषण रोखण्यात नागरिकांचा सहभाग, पर्यावरण रक्षण या संकल्पनेवर आधारित जिंगल्स स्पर्धकांकडून मागविण्यात आल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याला अनुरूप चित्रीकरण व संकल्पना असणे अपेक्षित आहे. जिंगल्स निर्माता सादर करणार असलेली कलाकृती ही त्याची मूळ कलाकृती असावी. तसे प्रतिज्ञापत्रही स्पर्धकाला सादर करावे लागणार आहे. स्पर्धकांच्या संकल्पनांचा उपयोग प्रशासनाकडून जनजागृतीसाठी केला जाणार आहे. पुरस्कारप्राप्त जिंगल्सचे प्रसारण विविध दृकश्राव्य माध्यमाद्वारे करण्याचे अधिकारही जिल्हा प्रशासन राखून ठेवणार आहे.

उ‌त्कृष्ट जिंगल्सला पुरस्कार

व्हिडिओ जिंगल्स स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रुपये २५ हजार, द्वितीय रुपये २० हजार, तृतीय रुपये १५ हजार आणि उत्तेजनार्थ रुपये ५ हजाराची दोन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ऑडिओ जिंगल्स स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रुपये २० हजार, द्वितीय रुपये १५ हजार तृतीय रुपये १० हजार आणि उत्तेजनार्थ रुपये ५ हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. इच्छुकांनी जिंगल्स प्रवेशिका सीडी/डीव्हीडी फॉर्मेटमध्ये जिल्हा माहिती अधिकारी, सारडा संकुल, तिसरा मजला, महात्मा गांधी रोड, नाशिक (दूरध्वनी क्रमांक - ०२५३/२५७८६८६) येथे ३० एप्रिलपर्यंत सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडचा ‘लढा’ सोशल मीडियावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विकासकामांना अडथळा ठरणारी गंगापूर रोडवरील झाडे हटवावीत यासाठी गंगापूर रोड विकास कृती समितीने चळवळ हाती घेतली आहे. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यात येत असून फेसबुक पेजही सुरू करण्यात आले आहे.

गंगापूर रोडवर मधोमध असणारी झाडे धोकादायक ठरत असून त्यामूळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा कृती समितीचा दावा आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने गंगापूर रोडच्या विकासासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, वृक्षप्रेमींकडून टाकण्यात आलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील झाडे तोडण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने रस्ता रुंदीकरण आणि तत्सम विकासकामे मार्गी लावण्यावर मर्यादा आल्या आहेत. रस्त्यालगत तसेच मधोमध असलेल्या झाडांमुळे येथे दुभाजकही बसू शकलेले नाहीत.

एकाच रस्त्यावरून गंगापूर आणि नाशिक अशा दोन्ही बाजूची वाहतूक होत असल्याने अपघातांनाही निमंत्रण मिळते आहे. विकासाची मागणी असलेल्या समविचारी नागरिकांनी एकत्रित येऊन गंगापूर रोड विकास कृती समिती स्थापन केली आहे. त्या माध्यमातून रविवारी मानवी साखळी आणि स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी दोन दिवसापूर्वी 'जीआरव्हीकेएस नाशिक' या नावाने फेसबुक पेज सुरू करण्यात आले आहे.

त्यावर गंगापूर रोडच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या झाडांची छायाचित्रेही टाकण्यात आली आहेत. नागरिकांचा पाठींबा वाढावा आणि ही चळवळ पुढे घेऊन जाता यावी या उद्देशाने सोशल मीडियाची मदत घेण्यात येत असल्याचे समितीकडून सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमित करदात्यांना अपघात विमा

$
0
0

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीत नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी व स्लमचार्जेस भरणा करणाऱ्या करदात्यांना अपघात विमा देण्याचा निर्णय महापालिकेन घेतला आहे. गेल्या वर्षी या अपघात योजनेचा केवळ नऊच करदात्यांनी लाभ घेतला आहे.

नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेन अपघात विमा योजना सुरू केली आहे. त्यात मार्च अखेरपर्यंत नियमित कराचा भरणा केल्यास करदात्यास ५० हजार रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण दिला जातो. मात्र, सन २०१३-१४ या वर्षात नऊ अर्जदारांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरल्यास नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. या अपघात विम्याचे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा ‘मिल्खा’ ऑस्ट्रेलियात

$
0
0

अरविंद जाधव, ना​शिक

नोकरी-प्रपंचात गुरफटल्यावर व्यक्ती आपल्या इच्छा आकांश गुंडाळून ठेवतात. शालेय जीवनातील चांगला खेळाडू नंतर त्या खेळाकडे ढुंकूनही पाहत नाही. असे अनेक चांगले खेळाडू समाजात दिसतात. त्यातीलच एक असलेले अंबड पोलिस स्टेशनचे हवालदार नंदू रामभाऊ उगले हे होय. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर उगलेंनी आपला धावण्याचा छंदच जोपासला असे नाही तर या कर्तृत्वाचा झेंडा रोवण्यासाठी ते लवकरच ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

पोलिस दलात १९९० मध्ये भरती झालेल्या उगलेंचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील समशेरपूर. दहावीपर्यंत गावातच शिक्षण घेतलेल्या उगलेंना व्यायमासह धावण्याची आवड सुरुवातीपासूनच होती. पुढे शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर हाच छंद त्यांना पोलिस दलापर्यंत घेऊन आला. भरती प्रक्रियेमध्ये सर्वांत जलद धावण्याच्या त्याच्या विक्रमामुळे तत्कालीन आयुक्त के. के. कश्यप यांनी त्यांचा सत्कार केला.

पोलिस म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या उगलेंवर प्रापंचिक जबाबदारी येऊन पडली. जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेतलेल्या उगलेंना मग धावण्यासाठी वेळ अपूरा पडू लागला. त्यातच पैशांचे सोंगही घेण्यासारखे नव्हते. हळूहळू उगलेंच्या खेळातील व्यवसायिकात मागे पडली. दोन मुलांले झाल्यानंतर त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या खेळातील आवड जोपसण्यावरच उमले यांनी भर दिला. २०१२ त्यांची मुलगी अंकिता तायक्वादो स्पर्धेसाठी नागपूरला गेली. तिथे तिने मेडल मिळवले.

पाल्यांच्या आग्रहामुळे सरावाला सुरुवात

मुलीच्या यशामुळे नंदू उगलेंमधील खेळाडू जागा झाला. अंकीता व मुलगा मेघनील यांनी वडिलांच्या छंदाला जोपसण्याचा विडाच उचलला. उगलेंनी धावण्याचा सराव सुरू केला. पत्नी सुरेखा यांनीही जोड व्यवसाय सुरू करून पतीला आर्थिक मदत करण्यात खारीचा वाटा उचलला. त्यांनी सर्वात प्रथम मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. २१ किलोमीटरचे अतंर त्यांनी दोन तासात पार पाडले. अवधी जास्त लागला. मात्र, त्यामुळे खचून न जाता सराव सुरूच ठेवला. त्यानंतरच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये हेच अंतर त्यांनी दीड तासात कापले. पुढे मविप्र,

केरळ, हैदराबाद, ठाणा, गोदा मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला. दरम्यान, हरियाणा येथील रोहतकमध्ये ३५ वी नॅशल मास्टर अॅथेलिटिक्स स्पर्धा पार पडली. त्यातील चार प्रकारापैकी १५०० मीटर धावणे आणि २ बाय २ १०० मीटर रिलेमध्ये त्यांना रजत पदक मिळाले. ४३ वर्षिय उगले यांच्यातील उत्साह पाहून इंडिया मास्टर अॅथेलिटिक्स संघटनेने ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे.

खेळातील व्यावसायिकता जपण्यासाठी वेळ आणि पैसा लागतो. विशेषतः राष्ट्रीय किंवा आतंरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याची आवश्यकता भासते. दोन्ही मुले इंजिनीअरिंगला असून वडील १४ वर्षांपासून पक्षघाताने आजारी आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियात कसे जायचे याची विवंचना समोर आहे. त्यातून काही मार्ग निघाला तर नक्कीच यश मिळवेन.

- नंदू उगले, हवालदार, अंबड पोलिस स्टेशन

दिलीप दातीर यांच्यातर्फे मदत

अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले नंदू रामभाऊ उगले यांची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. घराची बेताची परिस्थिती असलेल्या उगले यांना माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी अन्य दानशूर व्यक्तींनीही उगले यांना मदत करावी, असे आवाहन दातीर यांनी केली.

प्रश्न आर्थिक जुळावाजुळवीचा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठी आर्थिक तरतुदीची गरज आहे. पोलिस कल्याणनिधीमधून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिले असून अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उगले यांचे सहकारीही मदतीसाठी एकटवले आहे. समाजातील इतर स्तरातून मदतीचा ओघ मिळाल्यास ऑस्ट्रेलियाला पोहचणे शक्य होईल, अशी अपेक्षा उगलेंना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानगंगा सक्षमतेसाठी ‘थिंक टँक’

$
0
0

विविध क्षेत्रातील ९ तज्ज्ञ मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वैविध्यपूर्ण उपक्रम सुरु केले असून ज्ञानगंगेला सशक्त करण्यासाठी 'थिंक टँकची' निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञ आणि संशोधकांना विद्वत परिषदेवर संधी देवून त्यांच्या सूचनांद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या किंवा शिक्षणापासून कोसो दूर असलेल्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना केली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठाद्वारे विद्वत परिषद कार्यरत असते. या परिषदेवर मात्र बहुतांशवेळा कुलगुरुंच्या मर्जीतले किंवा विद्यापीठाशी संबंधित व्यक्तींना घेतले जाते.

त्यामुळे या परिषदेच्या व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर केला जात नाही. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी या परिषदेला थिंक टँकचा दर्जा देत विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यात नियुक्त केले आहे. या मान्यवरांनी केलेल्या विविध सूचना आणि शिफारशींचा विचार करुन वैशिष्ट्यपूर्ण अशा अभ्यासक्रमांची रचना केली जाणार आहे. त्याद्वारे विविध विभाग आणि विषयातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंभमेळ्याचा अमेरिकेत जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैश्विक सोहळा असलेला सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या अडीच महिन्यांवर येवून ठेपला असताना या सोहळ्याचा जागर आता अमेरिकेत होत आहे. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)च्या प्रांगणात होणाऱ्या कुंभथॉन या आंतरराष्ट्रीय परिषदेत मंगळवारी रात्री (अमेरिकेत सकाळी) विशेष चर्चासत्र होत आहे.

दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला येत्या जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे. लाखो साधू आणि भक्तांच्या आगमनामुळे हा सोहळा वैश्विक होतो. या सोहळ्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, या सोहळ्याचे योग्य ते नियोजन होणेही आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची जोड देवून या सोहळ्यात आपत्ती घडू नये आणि अत्याधुनिक तंत्रांचा वापर करुन या सोहळ्याला चार चाँद लावण्यासाठी कुंभथॉन ही संकल्पना मांडण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून या संकल्पनेद्वारे इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांसह आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांपर्यंत सर्वांना सामावून घेण्यात आले आहे. कुंभथॉनमधील विचार मंथनातून पुढे आलेल्या दहा विविध संकल्पनांवर सध्या काम केले जात आहे. या संकल्पना येत्या जून महिन्यात प्रत्यक्षात येणार असून, तत्पुर्वी या संकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी अमेरिकेतील जगविख्यात एमआयटी संस्थेमध्ये विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

कुंभथॉनच्या आयोजनात सहभागी असलेले आयटी तज्ज्ञ सुनील खांडबहाले, टीसीएसचे संदीप शिंदे, एमकेसीएलचे सुभाष पाटील, टेन एक्स ग्रोथचे अजय सिंगानिया हे पाच जण एमआयटीत दाखल झाले आहेत. एमआयटीचा वार्षिक महोत्सव गेल्या रविवारपासून (१२ एप्रिल) सुरु झाला आहे. गेल्या वर्षभरात एमआयटीच्या विद्यार्थी व संशोधकांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे सादरीकरण त्यात केले जाते. आता त्याच महोत्सवात कुंभथॉनचेही सादरीकरण होत असल्याचे शिंदे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले आहे.

इनोव्हेशन सेंटर

साथीचे रोग, मेडिकल ट्रॅकिंग, क्राऊड मॅनेजमेंट, २डी अँड ३डी मॅप, लोकल कम्युनिटी रेडिओ, अन्नदान, अशा एकूण १० प्रकल्पांवर कुंभथॉनमध्ये काम केले जात आहे. तसेच, हे प्रकल्प अत्यंत प्रभावशाली कसे होऊ शकतील, यावर तेथे विचारमंथन केले जाणार आहे. नाशिकसारख्या शहरात अशा प्रकारच्या वैश्विक सोह‍ळ्याला संशोधनाची जोड देण्यात येत असल्याने नाशिकला इनोव्हेशन सेंटर व्हावे असा विचार आम्ही तेथे मांडत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याद्वारे एकूणच नाशिक शहराचे ब्रँडिंग होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ!

$
0
0

तीन वर्षांपासून प्रथमोपचार पेट्यांची खरेदी बंद; उपचारांभावी दहा वर्षांत आठशे मृत्यू

विनोद पाटील, नाशिक

आदिवासी विकास विभागाने आदिवासी आश्रमशाळांसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रथमोपचार पेट्यांची खरेदीच केलेली नाही. त्यामुळे साडेचार लाख विद्यार्थी जीव मुठीत धरूनच शिक्षण घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रथमोचाराअभावी दहा वर्षांत ७९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी विभागाच्याच सर्व्हेक्षणात समोर आली आहे. मोठ्या योजनांच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी करणारा हा विभाग विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचेच स्पष्ट होत आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा या शिक्षणापेक्षा गैरप्रकारांसाठीच चर्चेत असतात. भ्रष्टाचार, नोकरभरती, निकृष्ठ आहारपुरवठा, मुलींचे विनयभंग अशा घटना नित्याचाच बनल्या आहेत. त्यास राजकीय उदासीनतेसोबतच प्रशासकीय पातळीवरील उदासीनताही कारणीभूत आहे. राज्यात शासकीय आश्रमशाळांची संख्या ५५२, तर खाजगी अनुदानित आश्रमशाळांची संख्या ५५६ आहे. या ११०८ आश्रमशाळामंध्ये दरवर्षी साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, आश्रमशाळांमधील गैरसोयींमुळे दरवर्षी सरासरी ५० ते ६० मुलांचा मृत्यू होतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णतः हेळसांड विभागाकडून केली जात आहे.

आश्रमशाळा दुर्गम भागात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना, अपघात, विविध आजार, विंचू व सर्पदंश सारख्या घटनांमध्ये प्रथमोपचार मिळाला नाही, तर त्यांचा मृत्यू ओढावतो. त्यामुळे आश्रमशाळांसाठी प्रथमोपचार पेट्यांची खरेदी करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने २०११ मध्ये घेतला होता. पहिल्या वर्षी सव्वा कोटी रुपये खर्चून या पेट्यांची खरेदी करण्यात आली. या पेट्यांचे आयुष्य एक वर्षाचेच असल्याने दरवर्षी या पेट्या हाफकीन संस्थेतर्फे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लालफितीचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांना बसला असून, सन २०१२ पासून या पेट्यांची खरेदीच लालफितीत अडकली आहे. दरवर्षी साधारणतः दीड ते दोन कोटींची आवश्यकता असतांनाही गेल्या तीन वर्षांपासून खरेदी झाली नाही.

राज्यातील ११०८ आश्रमशाळांमध्ये २००२ ते २०१२ दरम्यान ७९३ मुलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यात सर्पदंशाने ५५, नैसर्गिक मृत्यू व आत्महत्या १७६ तर प्राथमिक उपचार न मिळाल्याने ४३४ मुलांचा मुत्यू झाल्याचे आढळून आले.

हायकोर्टाचा इशारा

आदिवासी आश्रमशाळांची दयनीय स्थिती आणि तोकड्या सुविधांसंदर्भात पुण्यातील याचिकाकर्ते रवींद्र तळपे यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुलांच्या मुत्यूसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात ७ एप्रिलला सुनावणी झाली असून, पंधरा दिवसांत उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. माहिती सादर न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा कोर्टाने दिला आहे. त्यामुळे विभागाच्या वतीने सध्या कागदोपत्री उपाययोजनांची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, अहवालानंतरही आश्रमशाळांमधील उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एवढ्या मुलांचा जीव जावूनही आदिवासी विभागाने झोपचे सोंग पांघरले आहे.

एकीकडे विभागात शेकडो कोटींचे घोटाळे उघड होत असताना, केवळ दीड ते दोन कोटींच्या खरेदीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आदिवासी मुलांबद्दल आदिवासी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असून, आता न्यायालयच यांदर्भात निर्णय घेणार आहे.

- रवींद्र तळपे, याचिकाकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलनाका प्रशासन नरमले

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

प्रसारमाध्यमे व राजकीय नेत्यांचा दबाव वाढल्यानंतर पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त टोल प्रशासनाने स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. याबाबत एक मे नंतर निर्णय घेतला जाईल, असे टोल प्रशासनाने स्थानिक कामगारांना कळविले आहे. त्यामुळे या कामगारांना पंधरा दिवसांचे तरी अभय मिळाले आहे.

टोलनाक्यवरील नोकरी कायम राहावी यासाठी टोल प्रशासनाशी लढा देण्याचा निर्धार स्थानिक कामगारांनी व्यक्त केला असून, त्यासाठी भारतीय मजदूर संघ प्रणित महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनेचे स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेत पिंपळगाव टोलनाक्यावर काम करणा-या स्थानिक कामगारांसह शंभरपेक्षा अधिक कामगार सहभागी

झाल्याने संघटनेचा लढा तीव्र होणार आहे. त्यामुळे नेहमी या ना त्या कारणावरून वादात असलेला हा टोलनाका नव्याने वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

टोल नाक्यावरील स्थानिक सुरक्षा कामगार स्थानिक वाहनचालकांशी मिलीभगत करीत असल्याचा आरोप करीत टोल प्रशासनाने या कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. किमान ७० ते ७५ जणांना नोकरीपासून मुकावे लागणार होते. मात्र, स्थानिक राजकीय पदाधिकारी व काही संस्थांनी आवाज उठविल्याने हा विषय चांगलाच गाजला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धन्य धन्य निवृत्ती देवा...

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

धन्य धन्य निवृत्ती देवा असे म्हणत हजारो भाविक उटीच्या वारीच्या निमित्ताने नाथांच्या चरणी लिन झाले. चैत्र वद्य एकादशीस दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीस दाहक उन्हाळ्या शितल चंदनाचा लेप म्हणजेच उटी लावली तेव्हा सभामंडपात उपस्थित वारकरी संत एकनाथांचा अभंग म्हणत तल्लीन झाले होते.

चैत्र वद्य एकादशीचे दुपारी दोन ते तीन वाजेच्यादरम्यान शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा हरिनामाच्या गजरात संपन्न झाला. सभामंडपात ह. भ. प. सुरेशमहाराज गोसावी यांनी अभंग सेवा सादर केली. दुपारी दोन वाजता दर्शनरांग थांबवून संत निवृत्तीनाथांच्या समाधीस चंदनाची उटी लावण्यात आली. या प्रसंगी समाधी मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर पाटील तसेच विश्वस्त महामंडलेवर डॉ. राधाकृष्ण महाराज लहवीतकर, सुमनताई खुळे आदिंसह जयंत महाराज गोसावी तसेच नित्यसेवेकरी भाविक उपस्थित होते. क्षेत्र ञ्यंबकेवर येथे दशमीपासूनच भाविकांची मांदियाळी अनुभवास आली आहे.

चैत्र वद्य दशमीचे सायंकाळपासूनच शहरात भाविकांचा ओघ सुरू झाला होता. मंदिर आणि परिसरात पेंडाल टाकून भजन कीर्तनाची सोय केली होती. एकादशीच्या पहाटेपासूनच तीर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी रिघ लागली होती. टाळ मृदुंग भगव्या पताका यांनी पौष वारीच्या आठवणींना उजाळा देत शहर वारक-यांनी यात्रा पटांगणासह संपूर्ण शहर गजबजले होते. सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरू होता. त्र्यंबकराजाच्या मंदिरात देखील वारकरी भाविकांची गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या गंगापूर नाक्यावर वाहतुकीचा बोजवारा

$
0
0

प्रवीण बिडवे

रोगापेक्षा इलाज कसा भयंकर असतो हे महापालिकेचा उफराट्या ‍कारभारामुळे नागरिकांना दिसू लागले आहे. गंगापूर रोडवरील जुन्या गंगापूर नाक्यावर वाहतुकीचा बोजवारा उडविणारे बोलके चित्र सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय बनले आहे. या चौकातील सर्कल काढून वाहतूक सिग्नल बसविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले खरे, मात्र उघड्या पडलेल्या या चौकात वाहने एकमेकांसमोर उभी येऊन ठाकल्याने अपघातांना निमंत्रण मिळू लागले आहे. सिग्नल बसविल्यांनतर सर्कल तोडले असते तर चालू शकले नसते का असा सवाल उपस्थित होतो आहे.

वाहतूक व्यवस्था सुरळीत हवी असेल तर त्याचे नियोजन असायलाच हवे. ते नसेल तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांना सर्वांनाच सामोरे जावे लागते. शहरातील वाहतुकीचे नियोजन करताना काही मुख्य चौकांमध्ये वाहतूक सिग्नल बसवायला हवेत हा विचार पुढे आला. त्याबाबतची कार्यवाही आता सुरू होऊ लागली आहे. मात्र, त्यातही महापालिकेचे नियोजन चुकू लागले की काय अशी विचारणा नागरिकांकडून होऊ लागली आहे.

अशोकस्तंभ ते गंगापूर गाव हा रस्ता गंगापूर रोड म्हणून प्रचलित आहे. उच्च आणि उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत म्हणूनही या परिसराकडे पाहिले जाते. या रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्या सुटाव्यात अशी नागरिकांची नेहमीचीच मागणी राहिली आहे. त्यादृष्टीने महापालिका, पोलिसांचा वाहतूक विभाग प्रयत्न करताना दिसतात. त्याला काही अंशी यश आले असले तरी अजूनही या रस्त्यावरील वाहतूकीत बऱ्याचशा सुधारणा व्हाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

जुना गंगापूर नाक्याचा परिसर वर्दळीचाच आहे. डोंगरे वसतिगृह, प्रमोद महाजन उद्यान, शहरातील मोठे लॉन्स, मंगल कार्यालये, मखमलाबाद, कॅनडा कॉर्नर आणि थेट पंचवटीकडे जाण्यासाठीचा मुख्य मार्ग म्हणून या चौकाकडे नागरिकांकडून पसंती दिली जाते. या चौकातील वाहतुकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. तसे होण्याचे कारणही महापालिकेच्या चुकलेल्या नियोजनात दडले आहे. गेल्या आठवड्यात या चौकातील सर्कल काढून टाकण्यात आले. त्यामुळे हा चौक मोठा आणि मोकळा झाल्यासारखे वाटत असले तरी तेथील वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे. या चौकात वाहनधारकांच्या वेगाला कमी करण्याचे काम या सर्कलमुळे होते. सर्कलवरच हातोडे पडल्याने हा चौक मोकळा झाला असला तरी तो वाहनधारकांना वेगाने वाहने दामटविण्याचे ठिकाण वाटू लागले आहे. यातूनच या चौकामध्ये लहान मोठे अपघात आणि अशा अपघातांची शक्यता बळावली आहे. पूर्वी लोक सर्कलला वळसा मारून जात असत. त्यामुळे चौकात येणाऱ्या वाहनधारकाचा वेग आपसूकच कमी होत असे. आता वेगावर नियंत्रण आणणारा सर्कलच भुईसपाट झाला आहे. परिणामी मोकळ्या रस्त्यावर वाहनधारकांकडून वहानेही वेगाने दामटविली जात आहेत.

या चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठीच महापालिकेकडून सर्कल काढण्यात आले याबाबत दुमत नाही. चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय झाल्याने सर्कल काढण्याचा निर्णय झाला. परंतु, सिग्नल न बसविताच सर्कल काढणे कितपत व्यवहार्य आहे, याचाही विचार व्हायला हवा होता. तो न झाल्याने या चौकातील वाहतुकीच्या समस्या वाढल्य आहेत. सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतर सर्कल काढला असता तर सध्या होत असलेले अपघात रोखता आले असते असे मत जाणकारांकडून व्यक्त होऊ लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images