Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आरोग्य मंत्र्यांच्या डुलक्या!

0
0

सिंहस्थासाठी औषध खरेदीचा प्रस्ताव वर्षभरापासून वेटींगवर

रमेश पडवळ, नाशिक

महापालिकांची मागणी नसताना कोट्यवधींच्या जंतूनाशक खरेदीचा धडाका एकीकडे डायरेक्टरेट ऑफ हेल्थने (आरोग्य संचालनालय, मुंबई) लावला आहे तर दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्यात लागणाऱ्या ८ कोटी रूपयांच्या औषधे व वैद्यकीय साधनांच्या खरेदीसाठी तेरा महिन्यात तब्बल २७ वेळा स्मरण पत्रे पाठवूनही फाईल्सवर 'वजन' पडत नसल्याने त्या हलत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य मंत्र्यांच्या डुलक्यांमुळे अनावश्यक औषधांयेच खरेदीत डायरेक्टरेट ऑफ हेल्थ गुंतले आहे, तर गाढ झोप लागल्याचे ढोंग करून सिंहस्थातील संवेदनशील आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हेल्थ विभागाचा 'डर्टी' कारभार सुरूच आहे.

नाशिक सिव्ह‌लि हॉस्प‌टिलमध्ये फक्त १५ दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा शिल्लक असून, सिंहस्थात सिव्ह‌लि हॉस्प‌टिल व जिल्हा परिषदेला महापालिकेकडे औषधांची भिक मागावी लागणार अशी चिन्हे निर्माण झाली आहे. सिंहस्थात नाशिकमध्ये सुमारे एक कोटी भाविक येणार अशी शक्यता आहेत. या काळात आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. तसेच अपघातही होत असल्याने आपत्कालीन सोय म्हणून शहरातील सर्व हॉस्प‌टिल्सला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिव्ह‌लि हॉस्प‌टिलमधील जागेत २०० बेडचे व त्र्यंबकेश्वर येथे ७० बेडच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीचा वापर पूर्ण क्षमतेने व्हावा व सिंहस्थ काळात दुर्दैवाने दुर्घटना घडलीच तर पूर्ण क्षमतेने आरोग्यसुविधा तातडीने मिळाव्यात यासाठी पुरेसा औषधांचा व वैद्यकीय साधनांची गरज आहे. ही साधने नसतील तर डॉक्टर हतबल ठरतात. यासाठी १६ जुलै २०१४ रोजी सिव्ह‌लि हॉस्प‌टिलने ४ कोटी ९४ लाख ९९ हजार ८९६ रूपयांचा तर जिल्हा परिषदेने २ कोटी ४९ लाख ९ हजार ३९५ रूपयांचा औषधे साहित्य खरेदीचा प्रस्ताव सादर केला होता.

प्रस्ताव सादर केल्यानंतर डायररेक्टरेट ऑफ हेल्थशी संबंधित आरोग्य सचिव, डायरेक्टर यांनी अनेकदा नाशिकच्या दौऱ्यावर येऊन सिंहस्थांच्या बैठकांना हजेरी लावली व परिस्थिती जाणून घेतली. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंतही नाशिकला येऊन गेले. पण जुलै २०१४ नंतर २७ वेळा औषध खरेदींचे स्मरणपत्र पाठवूनही आरोग्य मंत्री वा डायरेक्टरेट ऑफ हेल्थकडून साधा दोन ओळींचा प्रतिसादही मिळालेला नाही. आता परिस्थिती इतकी भयंकर झाली आहे की, ३१ मेपर्यंत या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही झाली नाही तर सिंहस्थात सिव्ह‌लि व जिल्हा परिषदेला औषधांसाठी महापालिकेकडे भिक मागण्याची वेळ येणार आहे. एक महिन्यावर आलेल्या सिंहस्थांसाठी ३१ मेपर्यंत या खरेदी प्रस्तावाला मंजूरी दिली तरी टेंडर प्रक्रियेसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आरोग्य मंत्र्यांच्या डुलक्या व डायरेक्टरेट ऑफ हेल्थच्या झोपा नाशिकला महागात पडतील अशी स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेलिकॉम कंपन्या धारेवर

0
0

सेवेबाबत ग्राहक नाराज; सुविधा सुरळीत पुरविण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या स्पर्धेतही ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळत नसल्याचे सांगत ग्राहकांनी टेलिकॉम कंपन्यांवर तीव्र आगपाखड केली. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीने (ट्राय) बुधवारी शहरात घेतलेल्या बैठकीत ट्रायच्या अधिकाऱ्यांना तक्रारींद्वारे चक्क घामच फोडला. याची गंभीर दखल घेत तत्काळ सेवा सुधारण्याचे निर्देश ट्रायच्या अधिकाऱ्यांनी मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

ट्रायच्या वतीने बुधवारी हॉटेल सेव्हन हेवन येथे ग्राहक मेळावा आयोजित केला होता. भारतातील हा पहिलाच उपक्रम असल्याने ग्राहकांनी व दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी हजेरी लावली. अनेकदा तक्रारी करूनही दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या ग्राहकांना चांगली सेवा पुरवत नाही. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होऊन मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. भारतात या दूरध्वनी सेंवावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कार्य करते. या विभागाच्यावतीने बंगळुरू येथील महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, तामिळनाडू राज्याचे रिजनल हेड सिबेचीन मॅथ्यू यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रायच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांची ग्राहकांना माहिती दिली. त्याचप्रमाणे दूरध्वनी कंपन्यांनी ग्राहकांना कोणत्या सुविधा देणे बंधनकारक आहे, हे सुध्दा त्यांनी सांगितले. दूरध्वनी सेवा, डीटीएच व ब्रॉडबॅन्ड सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ट्राय करीत असते. भारताची लोकसंख्या १२५ करोड इतकी आहे. मात्र, टेलिफोन वापरणाऱ्यांची संख्या ८७ कोटी इतकी आहे. म्हणजेच प्रत्येक माणसाकडे पाच मोबाइल वापरले जात असल्याचा निर्ष्कष यातून काढला जातो. यापूर्वी अनेक कंपन्यांकडून मोबाइल कनेक्शन्स देताना कागदपत्रांची पूर्तता करीत नसत. ग्राहकांना अवघ्या १० रुपयात कनेकश्न दिली जात होती. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. गुन्हेगारांनी हे सीमकार्ड वापरल्याचे सिध्द झाले होते. त्यामुळे यावर कडक निर्बंध घालण्यात आले असून, नवीन कनेक्श्न घेताना ग्राहकांना रहिवासी पुरावा व इतर कागदपत्रे देणे बंधनकारक केले असल्याचे त्यांनी सांगितले. हे नियम बंधनकारक केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे. अनेकदा ग्राहक फोनवर बोलत असताना कॉल ड्रॉप होण्याच्या समस्या वाढल्या होत्या. त्याबाबत ट्रायने दखल घेतली असून, आपण कोणत्या विभागात सेवा पुरवू शकतो व कोणत्या विभागात सेवा देऊ शकत नाही याची यादी ग्राहकांना देणे बंधनकारक केले आहे. ग्राहक ही यादी न पहाताच कनेक्शन घेतात. त्यानंतर आपल्या परिसरात सेवा नसल्याचे समजते. त्यामुळे कनेक्शन घेताना आपल्या विभागात सेवा घेत असलेल्या कंपनीचे नेटवर्क आहे की नाही हे तपासणे गरजेचे असल्याचे मॅथ्यू यांनी सांगितले. मोबाइल कंपन्या ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी टोल फ्री नंबर देतात हा नंबर लागत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केल्या. याबाबत ट्रायने कडक धोरण अवलंबले असून, ग्राहकाने कॉल केल्यानंतर एक मिनिटाच्या आत तो कॉल उचलला गेला पाहिजे, अशी सक्ती करण्यात आली आहे. ग्राहाकांनी थ्रीजीचे कनेक्शन घेतल्यानंतर त्यांना स्पीड मिळत नाही, याबाबत ग्राहकांनी ट्रायकडे तक्रार कारावी, असेही त्यांनी सांगितले. ग्राहक कनेक्शन घेताना कॉलरेटची चौकशी करीत नाही. बिल आल्यांनतर ग्राहकांना मनस्ताप होतो, त्याकरता ग्राहकांनी कनेक्शन घेताना दराची चौकशी करावी असे त्यांनी आवाहन केले. प्रत्येक वेळा पोस्टपेड बिल देताना वेगवेगळे चार्जेस लावले जातात. त्याकरिता कंपन्यांकडे त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच प्रीपेड सेवेचे देखील बिल मिळते हे ग्राहकांना माहीत नाही.

याकरिता ग्राहकाने पन्नास रुपये भरल्यास त्याला सहा महिन्याचे बिल देणे बंधनकारक केले आहे. तसेच, ग्राहकांना भविष्य अथवा तत्सम सेवा देण्याच्या नावाखाली ग्राहकांकडून लूट करण्यात येते. ही सेवा ग्राहकांना नको असल्यास कंपनीला कळवल्यास ती रद्द करण्यात येईल. तसेच ट्रायकडून तुम्हाला बक्षिस लागले असून अमूक लाख रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात हे खोटे असून ट्राय कधीही कुणाला पैसे देत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

अनेकदा टेली मार्केटिंग करणाऱ्या कपन्यांकडून कॉल केले जातात. त्यांच्या भूलथापांना बळी पडून ग्राहक वस्तू खरेदी करतात. या कंपन्या भारतातून कॉल करीत नसल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. यावेळी ग्राहकांनी अशा कंपन्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

बीएसएनएल आघाडीवर

या वेळी ग्राहकांच्या सर्वात जास्त तक्रारी बीएसएनएलबाबत होत्या. महाराष्ट्र पोलिस अॅकादमीतील ग्राहकांना गेल्या पाच वर्षापासून बील मिळत नसून याबाबत जनरल मॅनेजर पासून सगळ्यांकडे तक्रारी केल्या. परंतु, अद्यापही तक्रारीचे निराकरण झाले नाही. त्याचप्रमाणे शहरातील ग्राहकांना बिले मिळत नसून, डुप्लिकेट बिल काढून ते भरावे लागते. त्याचप्रमाणे अनेक ग्राहकांकडे जुने इंन्स्ट्रूमेंट आहे ते नीट काम करीत नाही. ग्राहकांनी तक्रार करूनही त्यांना ते बदलून मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे होते. समाज कल्याण विभागाच्या आडगाव नाका येथील वसतिगृहास नंबर मिळून दोन वर्ष झाली. मात्र, अद्यापही याभागात कनेक्शन दिलेले नाही. याबाबत तक्रार केली असता या ठिकाणी लाइन टाकली नसल्याचे अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. यावेळी शहरातील सर्व दूरध्वनी कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. ग्राहकांनी जागृक राहून कंपन्यांबाबत ट्रायकडे तक्रार दाखल करावी. त्यासाठी शुल्क आकारले जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवतरली कार्टूनची दुनिया

0
0

नाशिक टाइम्स टीम

मुलांसाठी खास सुटीनिमित्त आयोजित केलेल्या किड्स कार्निवलमध्ये गुरुवारी 'द मास्क' हे वर्कशॉप घेण्यात आले. आपल्या आवडत्या कार्टूनचे मास्क तयार करण्याचा अनुभव यावेळी मुलांनी घेतला. 'महाराष्ट्र टाइम्स' व 'रुचीर आर्ट गॅलरी'तर्फे या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

अंकित शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी मास्क बनवण्याचा अनुभव घेतला. मास्क घालून मिरवण्यात बच्चे कंपनीला खूप आनंद मिळतो मात्र जर आपल्या आवडीच्या कार्टूनचे मास्क आपण तयार केले तर त्याचा आनंद काहीतरी औरच असतो. हाच अनुभव मुलांना देण्यासाठी हे वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते.

सर्वप्रथम या वर्कशॉपमध्ये मास्कसाठी चित्रकला कशी करावी, त्याचे कटींग कसे करावे याचे तंत्र शिकवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कार्टून ड्रॉ करून त्यात रंग भरण्यात आले आणि शेवटी त्याचे डिझाइन आणि डेकोरेशन याबाबत माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या तीनही स्टेप्समध्ये मुलांच्या उत्साह पाहण्याजोगा होता. यावेळी प्रत्येकाने आपल्या आवडीचे कार्टून कॅरॅक्टर मास्क बनवण्याचा अनुभव घेतला. यामध्ये डोरेमॉन, पिकाचू, डोनाल्ड डक यासारख्या कार्टूनची जत्रा जणू याठिकाणी भरली होती. सर्वांनीच या वर्कशॉपचा आनंद घेतला. रुचीर आर्ट गॅलरी या वर्कशॉपसाठी व्हेन्यू पार्टनर होते.

शिका ओरिगामी

महाराष्ट्र टाइम्स व रुचीर आर्ट गॅलरीतर्फे आयोजित किड्स कार्निवलमध्ये आज ओरिगामी शिकण्याची संधी मुलांना मिळणार आहे. यामध्ये मुलांना ओरिगामीतील विविध वस्तू बनवण्याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये प्राणी, फुले यासारख्या वेगवेगळ्या वस्तू शिकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी लागणारे साहित्य कार्यक्रमस्थळी मिळणार आहे. दुपारी बारा ते तीन यावेळेत हे वर्कशॉप होणार असून यासाठी कल्चर क्लब सदस्यांना १५० रुपये आणि इतरांसाठी २५० रुपये फी असणार आहे. यासाठ नावनोंदणी थेट कार्यक्रमस्थळी होणार आहे.

वर्कशॉपचा पत्ताः रुचीर आर्ट गॅलरी, पंचगंगा सोसायटी, निलेश ड्रायफ्रुट्सच्या मागे, तिडके कॉलनी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद लुटण्याची अखेरची संधी

0
0

नाशिक टाइम्स टीम

गेल्या दोन महिन्यांपासून नाशिककरांचा संडे फंडे करणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅपी स्ट्रीट्स' यंदाच्या सीझनचा शेवटचा हॅपी स्ट्रीट्स असणार आहे. त्यामुळेच आनंद लुटण्याची या सीझनची ही शेवटची संधी आहे. नवनवीन अॅक्टिव्हिटीजनी भरलेल्या हॅपी स्ट्रीट्सवर धमाल करण्याची संधी हॅपी स्ट्रीट्सने दिली. मॉडेल सर्कल ते बिज बजार सर्कलपर्यंतचा रस्ता सकाळी सात ते साडेनऊ यावेळेत फक्त नाशिककरांचाच असणार आहे.

दर रविवारी होणाऱ्या अॅक्टिव्हिटीज नाशिककरांचा रविवार स्मरणीय करतात. यावेळी हॅपी स्ट्रीट्सची सुरुवात प्रतीक हिंगमिरे यांच्या झुम्बा डान्सने होणार आहे. तसेच यावेळी निसर्गानंद हास्यक्लबतर्फे हास्ययोगाचे प्रकारही सादर केले जाणार आहेत. त्यानंतर ध्रुव डान्स अकॅडमीतर्फे डान्स परफॉर्मन्स सादर केला जाणार असून विजय राज यांच्या मॅजिक शोचीदेखील यामध्ये धमाल असणार आहे. तसेच अनिरुद्ध जोशी यांचाही मॅजिक शो यावेळी होणार आहे.

हॅपी स्ट्रीट्सवर चालणाऱ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये सौंदर्य निर्मिती आणि वूडतर्फे नाटकाचे सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर स्त्री शक्ती महिला बचत गटातर्फे मोफत पिशवी वाटप होणार आहे. एचपीटी कॉलेजसमोर श्रीरचना चित्रकला महाविद्यालयातर्फे नेल आर्ट, मेंदी आणि टॅटू मेकिंग होणार आहे. नंदू गवांदे यांच्यातर्फे कॅलिग्राफी करून घेण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. एसएमआरके कॉलेजसमोर वन एट वन टॅटूतर्फे टॅटू मेकिंग होणार असून याचठिकाणी रुचीर आर्ट गॅलरीतर्फे पेंटिंग एग्झिबिशन होणार आहे. दीप्ती शुक्ला, प्रियांका मोरवाल यांचेही पेंटिंग एग्झिबिशन यावेळी असणार आहे. महेश जगताप यांच्यातर्फे कॅलिग्राफी असणार आहे. बीवायके कॉलेजसमोर नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनतर्फे व्हॉलीबॉल खेळता येणार आहे. विजूज सर्कलजवळ इस्ट अँड वेस्ट म्युझिक अकॅडमीतर्फे गिटार वादन आणि गायन होणार आहे.

विनेश नायर आणि गणेश जाधव यांच्या ड्रम्स लॅबतर्फे ड्रम वादन होणार असून राहुल म्युझिक अकॅडमीतर्फे इन्स्ट्रुमेंट वादन होणार आहे. मित्रो रॉक बँडतर्फे रॉक साँग, फ्युजन सादर होणार आहे. नाशिक ऑर्थोडिक ग्रुपतर्फे स्माइल कॉन्टेस्ट होणार असून हेनरी सरदार यांच्यातर्फे फाइंड द ऑपोझिट वर्ड कॉम्पिटीशन होणार आहे. हेमल शहा यांच्यातर्फे ओरिगामीच्या वस्तुंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच किरण तांबट यांच्यातर्फे २००३ मधील नाशिकच्या कुंभमेळ्यातील काही दुर्मिळ छायाचित्रे पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच सपना चौधरी यांच्यातर्फे कॅन्वास शूज पेंटिंगही यावेळी होणार आहे. यासारख्या आनंद देणाऱ्या संडे रिलॅक्स करणाऱ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हा आणि आनंद लुटा. हॅपी स्ट्रीट्ससोबतचा तुमचा हा रविवारही एन्जॉय करत हॅपी स्ट्रीट्सवरील हे क्षण स्मरणीय करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकपासून डिझेलनिर्मिती!

0
0

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे पर्यावरणपूरक संशोधन

नाशिक टाइम्स टीम

प्लास्टिक ही खरे तर डोकेदुखीचीच बाब आहे. मात्र, याच प्लास्टिकपासून डिझेलची निर्मिती झाली तर! ही बाब संशोधनातून प्रत्यक्षात अवतरली आहे. महावीर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिकपासून इंधननिर्मितीचे संशोधन केले आहे. त्यात त्यांना यश आल्याने येत्या काळात प्लास्टिकचा वापर प्रत्यक्ष डिझेलनिर्मितीसाठी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्लास्टिकची विल्हेवाट लावणे ही पर्यावरणाच्या दृष्टीने मोठी समस्या आहे. याला अनुसरुन जगभरात अनेक संशोधने होत असूनदेखील अद्याप ठोस असा कोणताही उपाय त्यावर निघालेला दिसत नाही. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासही अपयश येत असल्याचे दिसते. याचा विचार करुन महावीर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिकपासून इंधननिर्मिती यांवर संशोधन करुन ते यशस्वी करुन दाखविले आहे. मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने, प्रकल्प यांमध्येही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मात्र संशोधनाद्वारे या प्लास्टिकचा वापर इंधननिर्मितीसाठी केला तर प्रदूषणमुक्तीच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, असा विश्वास या विद्यार्थ्यांना वाटतो.

महावीर पॉलिटेक्निकच्या यशराज मोरे, स्वप्नील विसे, रुचीर पटेल, अक्षय आवारे, ऋषीकेश चव्हाण, समाधान नाडेकर, अक्षय आहिरे, प्रथमेश गोसावी या विद्यार्थ्यांनी एक किलो प्लास्टिकपासून एक लीटर डिझेल तयार केले आहे. इलेक्ट्रिक ओव्हन, कुकिंग पॉट, ऊर्ध्वपतनासाठी लागणारे पाण्याचे पात्र, गाळण, तापमान नियंत्रक यंत्र, शुद्ध पाणी या साहित्याचा वापर त्यांनी यासाठी केला. सात महिने या प्रकल्पावर काम करुन विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प यशस्वी करुन दाखविला. केवळ दोन हजार रुपये खर्चातून हा प्रकल्प यशस्वी झाल्याचे विद्यार्थी सांगतात. अमेरिका, जपान या देशांमध्येही याबाबत यशस्वी प्रयोग झाले आहेत आणि विशेष म्हणजे काही ठिकाणी अमलातही आणले गेले आहेत. कॉलेजचे उपप्राचार्य संभाजी सागरे व प्रा. रुपाली तहाराबादकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अशी झाली डिझेलनिर्मिती

विद्युत प्रवाह तापमान नियंत्रणयंत्राला व त्यामार्फत हा विद्युतप्रवाह इलेक्ट्रिक ओव्हनला दिला. इलेक्ट्रिक ओव्हनला तापमान मापन यंत्र जोडून इलेक्ट्रिक ओव्हन व ऊर्ध्वपातानासाठी असलेले पाण्याचे पात्र १२ मिली मीटर व्यास ५.५ फूट लांब तांब्याच्या नळीने जोडले. ऊर्ध्वपतनासाठी तीन चतुर्थांश शुद्ध पाणी असलेले पात्र वापरले. वाया गेलेले प्लास्टिक पदार्थ उदा. प्लास्टिक बॉटल, तेलाचे डबे, प्लास्टिक कॅरीबॅग, वैद्यकिय प्लास्टिक इत्यादी स्वच्छ धुवून प्लास्टिकचे छोटे तुकडे अथवा चुरा कुकिंग पॉटमध्ये टाकले व हवाबंद असलेला कुकिंग पॉट ओव्हन मध्ये ठेवला. त्यानंतर इलेक्ट्रिक ओव्हन तापमान यंत्राच्या साहाय्याने उच्च तापमानाला सेट करुन तो ५०० डिग्री सेंटी ग्रेडवर एक ते दीड तास हे तापमान ठेवले. ही प्रक्रिया चालू असताना टाकाऊ प्लास्टिकचे स्थायू (घन पदार्थ) रूपातून वायू रुपात तयार झाला. तयार झालेले वायुरूप प्लास्टिक तांब्याच्या नळीद्वारे पाण्याच्या पात्रात जमा केले. पाण्याच्या पात्रात तयार झालेले वायुरूप प्लास्टिक द्रवरुपात जमा होते. यालाच इंधनाचे ऊर्ध्वपातन म्हणतात. ते पाण्यात मिसळत नाही त्यामुळे ते वेगळे करणे सोपे आहे. वेगळे केलेले इंधन हे रिफायानिंग प्रक्रियेद्वारे डिझेल, पेट्रोल, ग्रीस आदि स्वरुपात रुपांतरित करता येते. विद्यार्थ्यांनी एक लिटर झालेली स्वरुपात रुपांतरीत केलेल्या इंधनाचे वैज्ञानिक परिक्षण प्रयोगशाळेतून करण्यात आले. यातून डिझेलचे घटक तंतोतंत जुळलेले दिसले. विद्यार्थ्यांचा हा यंत्र प्रकल्प महाविद्यालयाच्या मार्गदर्शकांच्या देखरेखी खाली करण्यात आला असून, सुरक्षितता लक्षात घेऊन तो करण्यात आला आहे. त्यामुळे इतरांनी घरी अशा प्रकारचा प्रयोग करू नये, असे या वेळी विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न

ही पद्धत अनुसरुन देशाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा विचार असून भविष्यात यासाठी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचाही आमच्या टीमचा प्रयत्न आहे. प्लास्टिकची मोठी समस्या याद्वारे दूर होऊ शकेल, असे वाटते.

- यशराज मोरे

संकल्पना प्रत्यक्षात उतरली याचा आनंद

आम्ही मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरली हे बघताना खरोखरच आनंद होतो आहे. हा प्रोजेक्ट सर्व पातळ्यांमध्ये यशस्वी झाला तर प्रदूषणमुक्तीसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास आम्हाला वाटतो.

- रुचीर पटेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टात ज्येष्ठांच्या खेटा, म्हणतात नंतर भेटा!

0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतरही पैसे देण्यास उशीर लागत असल्याचा प्रकार शहरातील पोस्टांमध्ये सुरू आहे. सरकार एकीकडे पोस्टाला बॅँकेचा दर्जा देत असताना ज्येष्ठांची होणारी परवड बघता लोकांनी गुंतवणूक करायची की नाही, असा सवाल नागरिकांना पडला आहे.

हक्काचे पैसे मिळविण्यासाठी शेकडो ज्येष्ठांना पोस्ट कार्यालयांमध्ये खेटा घालाव्या लागत आहेत. वारंवार चकरा मारल्यानंतरही अनेकांची नंतर येण्यास सांगून बो‍ळवण करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. इंदिरानगर येथील रहिवासी प्रतिभा विजय पाठक यांनी १९९३ मध्ये राष्ट्रीय बचत पत्राद्वारे इंदिरानगर पोस्टात गुंतवणूक केली. या बचतपत्राची मुदत ५ जानेवारी २०१५ रोजी संपल्याने प्रतिभा पाठक व त्यांचे पती विजय पाठक यांनी इंदिरानगर येथील पोस्टात राष्ट्रीय बचत पत्र दाखल करून पैसे देण्याची विनंती केली. येथील क्लार्कने मूळ राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ठेवून घेत आम्हाला पैसे देण्याचे अधिकार नाही, तुम्ही तीन दिवसानंतर या, त्यानंतर तुम्हाला धनादेश देण्यात येईल, असे पाठक यांना सांगितले. यावर पाठक यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पोस्टमास्टर यांची भेट घेऊन मॅच्युरिटीच्या रकमेची मागणी केली. मात्र, तेथेही त्यांनी तुम्ही ७ जानेवारी रोजी या तुम्हाला आम्ही चेक देऊ, असे सांगितले. तसेच, आमच्या इंदिरानगर शाखेला पैसे देण्याचे अधिकार नाहीत, तेव्हा तुम्ही जनरल पोस्टऑफिसमध्ये जा तेथे तुम्हाला ताबडतोब पैसे मिळतील, असे सांगितले. पाठक यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्यामागे असलेल्या जीएसआर ४९६ (ई) या कलमान्वये माझी मुदत संपताच मला चेक मिळायला हवा, असे सांगितले. तरीही त्यांना नकार देण्यात आला.

बचतीची मुदत संपूनही पोस्टाने पैसे देण्यास नकार दिला. जेष्ठांचे असे हाल होत असतील तर सामान्यांनी पोस्टात कसे पैसे गुंतवायचे? लवकरच केंद्रीय मंत्री रवीशंकर यांची भेट घेणार आहे. - विजय पाठक, ज्येष्ठ नागरिक

पदरी उडवाउडवीच...

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खरेदी करताना मुदत संपल्यानंतर पैसे मिळणार नाहीत, असे सांगणे गरजेचे होते. पाठक यांनी पोस्ट ऑफिसमध्ये माहितीच्या आधाराखाली चेक मॅच्युरिटीची रक्कम देण्यास उशीर का झाला याची विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यांनी औरंगाबाद येथील अपिलीय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. तेथेही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सामान्य माणूस पोस्टात कसे पैसे गुंतवेल, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. पाठक यांनी अनेकदा जनरल पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर एन. एस वानखेडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेथेही त्यांना उलटसुलट उत्तरे देत परतून लावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला नगराध्यक्षपदी प्रदीप सोनवणे बिनविरोध

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदीप पंढरीनाथ सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी सोनवणे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने पालिकेच्या शुक्रवारच्या विशेष सर्वसाधारण सभेत पीठासनाधिकारी तथा प्रांताधिकारी वासंती माळी यांनी सोनवणे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. पालिकेच्या सभेला लोकनिर्वाचित २३ व नियुक्त दोन अशा एकूण २५ नगरसेवकांपैकी १९ नगरसेवक उपस्थित होते. सभागृहात वेळेत न पोहचू शकलेल्या काही नगरसेवकांनी नंतर त्‍यांचे अभिनंदन केले. प्रदीप सोनवणे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होताच पालिकेत जमा झालेल्या त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत व फटाके फोडत एकच जल्लोष केला.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी टाकलेला विश्वास अन् पालिकेतील सर्वच नगरसेवकांनी बिनविरोध निवडीसाठी केलेले सहकार्य याची जाण ठेवत येवला शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहू.

- प्रदीप सोनवणे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी माहात्म्य अन् साधू

0
0

रमेश पडवळ, नाशिक

गोदावरी सर्व नद्यांमध्ये ही प्राचीन व श्रेष्ठ असून, तिच्या केवळ स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो, असे म्हटले जाते. प्रभू रामचंद्रांनी पंचवटीच्या वास्तव्यात तिच्या तीरावर पितृश्राद्ध घातले. सिंहस्थ पर्वणीत स्नान हे विशेष पुण्यदायक असल्याचे ब्रह्मांड पुराणात म्हटले आहे. सिंहस्थ काळात साधू महंत गोदावरीत स्नान करीत असल्याने त्यांनी वर्षोंवर्ष केलेल्या तपाची ऊर्जा या पाण्यात उतरते अन् म्हणूनच याकाळात गोदावरीत स्नान केल्याने सकारात्मक व आध्यात्म‌िक ऊर्जा आपल्याला मिळते, असे म्हटले जाते. गोदेचा जन्म आणि सिंहस्थाचे अजोड नाते असल्यानेही गोदावरी माहात्म्य अन् साधू ही संकल्पनेचा मिलाफ झाला आहे...

सिंहस्थ काळात गोदावरीतच स्नान का करावे? नाशिककरांच्या तर घरातच गोदावरीचे पाणी येत असल्याने त्यासाठी रामकुंडावर अथवा कुशावर्तावर जाण्याची गरज का? असा प्रश्न अनेकदा मनात निर्माण होतो. पण, हेच या सिंहस्थाचे शास्त्र आहे. सिंहस्थात गुरू, रवि आणि चंद्र एकाच राशीत असतात. या तिन्ही ग्रहांवरून प्रक्षेपित होणारी ऊर्जा सगळीकडे पोचत असली, तरी काही विशिष्टस्थानी ती अधिक प्रमाणात मिळते, असे म्हटले जाते. ऋषीमुनींनी या शास्त्राचा अभ्यास करून अशी ऊर्जाकेंद्रे तयार केली. या ऊर्जेची मूळस्थाने कपिलधारा व चक्रतीर्थ ही आहेत. मात्र, पेशव्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपराच बदलल्याने भाविक आता त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर अन् नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी जातात. पण, ऋषीमुनींनी अभ्यासातून ही ऊर्जाकेंद्र निर्माण केली अन् पाण्याच्या साहाय्याने ही ऊर्जा आपल्यात जाते हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक पूजाअर्चा करताना पाण्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्याला आपण जलपूजनही म्हणतो. पाण्याच्या आजूबाजूला ज्या भावना व हालचाली असतात तसे पाण्यातील स्पटिकांचे स्वरूप होते. त्यामुळे सिंहस्थ काळात स्नान करण्याने अंगात उत्साहन संचारतो असे म्हटले जाते. पाण्यावर आतापर्यंत झालेल्या संशोधनातूनही पाण्यालाही भावना असतात हे सिद्धही झाले आहे.

सिंहस्थकाळात गोदावरीतील अद्भुत चैतन्याचा परिणाम माणसाच्या मनावर, शरीरावर होतो. यातून मनुष्य प्रगल्भ होतो, असे म्हटले गेले आहे. गुरू ऊर्जा हा सिंहस्थाचा एक घटक असला तरी सिंहस्थाचा मूळ उद्देश गुरूबरोबरच सूर्याशीही निगडित आहे. सूर्य सृष्टीचा जीवनदाता असल्याने त्याच्या शक्तीवरच अन् प्रभावांवरच कुंभमेळ्याचे विज्ञान अधोरेखित झाले आहे. हे विज्ञान पूर्वी धर्मशास्त्राच्या माध्यमातून सांगितले जात असे. म्हणूनच सिंहस्थाला ऊर्जेचे स्त्रोत म्हटले गेले आहे.

`गंगा गोदावरी महाभागे, महापापविनाशिनी' म्हणजे सर्व पापांचा नाश करणारी गोदावरी मोक्षाचं सुलभ साधन मानलं गेलं आहे. पापसागरात डुंबलेल्यांचा उद्धार करण्यासाठीच भाविक, साधू लाखोंच्या संख्येने उद्धारासाठी सिंहस्थ पर्वणीकाळात गोदातिरावर येतात. म्हणूनच असेही म्हटले जाते की, भागीरथीत साठ हजार वर्षे स्नान करून जेवढे पुण्य मिळत नाही, तेवढे पुण्य सिंहस्थात गंगास्नानाने मिळते. शरीरशुद्धी, मनशुद्धी आणि आत्मशुद्धी हा गंगास्नानाचा खरा उद्देश असला तरी गोदामाहात्म्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे गोदेचे प्रदूषण वाढतच आहे. यामुळे ती ऊर्जा मानसिक स्वरूपात यंदा मिळणार असली तरी तिचे शाश्वत स्वरूप काय असेल याबाबत चिंता वाटते. गोदावरीचे माहात्म्य लक्षात घेऊन तरी गोदास्वच्छतेसाठी आपण प्रत्येकाने आपापल्यापरिने झटले पाहिजे हे नक्की !

साधूंच्या विचारमंथनाचे केंद्र

कुंभमेळ्यात साधू नेमके काय करतात अन् त्यांची कुंभमेळ्यात सहभागी होण्यामागची भूमिका काय असते, कोणत्या उद्देशाने जगभरातील साधू गोदाकाठावर जमतात, अशी अनेक ही कोडी पडतात. साधुंनी कुंभमेळा का सुरू केला ही संकल्पनाही गंमतीशीर आहे. या संकल्पना समजून घेतल्यावर साधूंबद्दल मतपरिवर्तन व्हायलाही मदत होते. असे म्हटले जाते की, इ.स. ५ व्या शतकात भारत प्रदेशावर परकीय आक्रमणे वाढली होती. ही आक्रमणे थोपविण्यासाठी नेहमी धार्मीक कार्यात मग्न असलेल्या साधुंना हातात शस्त्र घ्यावी लागली होती. याकाळात धर्म वाचविण्यासाठी देशभरातील साधू एकत्र आले अन् आखाडे निर्माण झाले. आखाड्यांनी धर्माच्या संरक्षणासाठी जबाबदारी वाटून घेतली. त्याकाळी काहींनी हातात शस्त्र घेऊन सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली तर काहींनी धर्माच्या मार्गावर कसे चालायचे याचे तत्त्वज्ञान घराघरापर्यंत पोचविण्याचा विडा उचलला. दरचार वर्षांनी कुंभमेळ्याच्या निमित्ताने आखाडे विचारमंथनासाठी एकत्र येऊ लागली. यासाठी भारताच्या चार दिशांना त्यांनी चार मठ स्थापन केले. ज्योर्तीमठ, श्रंगारमठ, गोवर्धनमठ, सरधमठ अशी या मठांची नावे आहेत. साधूंसाठीही त्यांनी दशनामी नियम तयार केले आणि त्यातून साधुंच्या दहा विभागांची निर्मिती झाली. सरस्वती, पुरी, बना, त्रिथा, गिरी, पार्वता, भारती, अरण्य, आश्रमवसागर असे हे साधूंचे दहा विभाग आहेत. यातून कुंभमेळ्यांचे स्वरूप अधिक व्यापक होत गेले. प्रत्येक आखाड्यात तत्त्वज्ञान, संख्याशास्त्रज्ञ, अध्यात्म, धर्म अशा शाखांचे गाढे अभ्यासक पूर्वी असायचे. संस्कृती, संस्कार, भक्ती, प्रार्थना, जगण्याच्या पद्धती अन् सेवावृतावर कुंभमेळ्यात चर्चा, विचारविनिमय व अभ्यास करून धर्मकारण आणि समाजकारणावर धोरण ठरविले जात असे. त्याकाळी एक विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले हे साधू आद्यक्रांतीकारकच होते. मात्र, हे स्वरूप काही प्रकरणात उद्देशाअभावी हर‌वल्यासारखे वाटते. अनेक आखाडे शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कामांच्या माध्यमातून समाजासाठी झटण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सिंहस्थातही गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न, धार्मिक स्थळांची स्वच्छता व प्राचीन मंदिरांना वाचविण्यासाठी प्रयत्न होण्याच्यादृष्टीने व्यापक चर्चा अपेक्षित आहे. तरच सिंहस्थ कुंभमेळा मानवाच्या उत्कांतीचा नवा पैलू ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गटबाजी खपवून घेणार नाही

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

आगामी काळात नाशिक जिल्हा शिवसेनेत कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता गट तट मोडीत काढू, असा इशारा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांनी दिला.

आमदार अजय चौधरी यांनी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच जिल्हा दौऱ्यात इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील शिवसैनिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात आमदार चौधरी यांनी आगामी काळातील रूपरेषाच जाहीर केली. तसेच, आगामी तीन वर्षासाठी पक्षाच्या वाढीसाठी त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर केला. आमदार चौधरी म्हणाले की, शिवसेना हा रडणारांचा नव्हे तर लढणाऱ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भगवामय जिल्हा करण्यासाठी साथ द्या. आगामी काळात महापालिका, नगरपालिका ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार व्यक्त केला.

आगामी तीन वर्षाच्या वाटचालीत मजबूत संघटन, लोकाभिमुख उपक्रम व संघटनात्मक आंदोलने या तीन सूत्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात होम टू होम सेना उभी करण्याचा कार्यक्रम दिला. या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड, माजी आमदार शिवराम झोले, समाधान बोडके, निवृत्ती जाधव, म सत्यभामा गाडेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्हा दौऱ्यास विलंब

जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यात येण्यास विलंब झाला. मात्र, याबाबत उलटसुलट उहापोह केला. तीन महिन्यापूर्वी माझ्या गाडीला झालेला अपघात, त्यात हाताला असलेले प्लास्टर, त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन यामुळे जिल्ह्यात येण्यास विलंब झाला, असे आमदार चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णव पंथियांचा सर्वात मोठा आखाडा

0
0

वैष्णवपथियांचा सर्वांत मोठा आखाडा म्हणून दिगंबर आखाड्याचे वर्णन करता येईल. दिगंबर असे जरी या आखाड्याचे नाव असले, तरी हे साधूवेश परिधान करतात. या आखाड्याला श्री पंच रामनंदीय दिगंबर आखाडा असे म्हटले जाते. या आखाड्याची स्थापना आचार्य बालानंदजींनी केली. दिगंबर आखाड्यात सुमारे साडेत‌ीनशे खालसे आहेत. एका खालशात २०० पासून दोन हजार साधू असतात. अयोध्या येथे या आखाड्याची मुख्य गादी असून, चित्रकुट, त्रिकुट, वृदांवन, नाशिक अशा पाच ठिकाणी बैठक म्हणजे शाखा आहेत. दिगंबर आखाड्याला श्री रामजी दिगंबर अनी व श्री श्यामजी दिगंबर अनी अशा दोन अनीया आहेत. नाशिकच्या आखाड्यात दिगंबर आखाड्याचे स्थान मोठे असून, दिगंबर आखाड्याच्या नाशिकमध्ये दोन बैठका आहेत. तपोवनात असलेल्या दिगंबर आखाड्याचे कामकाज महंत श्री रामकिशोरदासजी व पंचमुखी हनुमान मंदिर आडगाव नाका येथील आखाड्याचे काम महंत श्री भक्तीचरणदासजी पाहतात. नाशिकच्या आखाड्यात दिगंबर आखाड्याचे स्थान मोठे आहे.

केवलंस्वेष्टदेवस्य स्मरणें वर्तते सदा !

दिशोम्बराणियस्य स्यात्संमतस्स दिगम्बर !!

म्हणजे, आपल्या इष्ट देवतेच्या स्मरणात गुंग असणारे अन् दिशा रूपी वस्त्र असणारा आखाडा म्हणजे दिगंबर आखाडा होय. हा आखाड्याची निर्मिती धर्मरक्षणासाठी आचार्य बालानंदजींनी केली होती. त्यामुळे हा आखाडा शस्त्रअस्त्रधारी आखाडा म्हणून ओळखला जातो. यवनांच्या आक्रमणांपासून हिंदूधर्म व देशाच्या रक्षणासाठी साधूंना हातात शस्त्र घ्यावे लागले. यात दिगंबर आखाडा सर्वात आक्रमक होता. आजही दिगंबर आखाडा शस्त्रअस्त्र घेऊन शाहीस्नानासाठी रस्त्यावर उतरतो. आता याचे स्वरूप शस्त्रांचे खेळ दाखविण्यापुरता असला तरी दिगंबर आखाड्याची महती आजही तेवढीच आहे.

पंचरंगी ध्वज; इष्टदेव हनुमान

दिगंबर आखाड्यातील साधूंचा इष्टदेव हनुमान आहे. तर आखाड्याचा ध्वज काळा, पिवळा, पांढरा, हिरवा व लाल या पाच रंगाचा समावेश होतो. पंचरंगी ध्वजातील प्रत्येक रंगाला धर्म, भक्ती, श्रद्धा, रक्षण अन् उपासना असे अर्थ आहेत. या ध्वजाचा वापर खालसाही करतात.

गोदा स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न

सिंहस्थ ‌निर्विघ्न पार पाडणे, या काळात साधूंना वैद्यकीय सोयीसुविधा, अन्नछत्र व त्यांच्या राहण्याची व्यवस्था पाहणे, जिल्हा प्रशासनासह संवाद ठेवणे व कामात विस्कळीतपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे काम दिगंबर आखाडा पाहते. सध्या गोदाप्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सिंहस्थ काळात गोदावरीचे प्रदूषण होऊ नये यासाठी आखाड्यातील साधू विशेष प्रयत्न करणार आहेत. गोदा आहे म्हणून नाशिकमध्ये सिंहस्थ आहे. त्यामुळे आता तिच्या संरक्षणासाठी दिगंबर आखाडा प्रयत्नशील राहणार आहे, असे पंचमुखी हनुमान मंदिर येथील दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास यांनी सांगितले.

(संकलन : रमेश पडवळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकवासीय एकवटले

0
0

झोपडपट्टींचे अतिक्रमण काढण्यास विरोध

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकमधील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने शहरात असंतोष निर्माण झाला असून, प्रशासन आणि नागरिक यांच्यात निर्माण झालेल्या बेबनावाचा फटका सिंहस्थ नियोजनावर होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अतिक्रमणे काढताना नागरिक स्वखुशीने पुढे आले. मात्र, गोरगरिबांची घरे पाडण्यास सुरुवात होताच एकजुटीने विरोध करण्यास नागरिक पुढे सरसावले आहेत.

अतिक्रमण निर्मूलन मोहीम आता झोपडपट्टी भागात पोहचली असून, याचा फटका अनेक वर्षांपासून रहात असलेल्या गोरगरिबांना बसला आहे. नगराध्यक्षा अलका शिरसाठ यांच्यासह नगरसेवकांनी येथे धाव घेऊन पावसाळा होईपर्यंत कारवाई थांबवावी तसेच, पुनर्वसन करण्यासाठी तजवीज करा, अशी प्रशासनास गळ घातली आहे. याबाबत काय निणर्य होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना प्रशासनाने आपला मोहरा रस्त्यांच्या अतिक्रमणाकडे वळविल्याने तेथील तणाव काहीसा निवळला आहे.

यात्रा पटांगणावरील घरे हटवितांना प्रथम पुनर्वसन करा, असे म्हणत नगराध्यक्षा अलका शिरसाठ, नगरसेवक धनंजय तुंगार, ललित लोहगावकर, रवींद्र सोनवणे, विजया लढ्ढा, सिंधू मधे, शकुंतला वाटाणे, संतोष कदम, यशवंत भोये त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, दीपक लढ्ढा, राजेंद्र शिरसाठ, पंकज धारणे आदींनी धाव घेऊन मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, सर्व नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेणार असून, याबाबत निर्वासित कुटुंबीयांना आधार देण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करणार आहेत.

नागरिक आणि प्रशासन यांचा समन्वय संपला असून, याचा परिणाम सिंहस्थ नियोजनावर होऊ शकतो. शाहीमार्गांचे अतिक्रमण काढा असे देखील साधूंनी म्हटलेले नाही. मागील एका बैठकीत आम्हास गोरगरीब जनतेचे शिव्याशाप नको, असे साधूंनी जाहीर केले होते. त्याचप्रमणे डॉ. बिंदुजी महाराज यांनी अतिक्रमण काढण्याच्या नावाने जनतेस बेरोजगार आणि बेघर करू नका, असे सांगितले.

अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच

मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी रस्त्यांचे अतिक्रमण काढणे सुरू ठेवले असल्याची माहिती दिली. तसेच, अतिक्रमित मालमत्ता सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये एकापेक्षा अधिक घरे असणे, पक्के आरसीसी बांधकामांचे अतिक्रमण काढले जाईल. तसेच सन २०० पर्यंतच्या घरांना १५ बाय १५ पेक्षा अधिक जागा असेल तर ते अतिक्रमित ठरविण्यत येणार असल्याची माहिती दिली. एकूणच कोट्यवधी भाविकांच्या उपस्थित होणारा उत्सव करण्यासाठी सज्ज होत असलेल्या त्र्यंबक नगरीत सर्वसामान्य ग्रामस्थांना बेघर होण्याची आलेली वेळ चिंताजनक ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साऊंड ऑफ म्युझिक!

0
0

>> सई बांदेकर

स्लमडॉग मिलेनीअरच्या निमित्ताने ए. आर. रहमानच्या बरोबरीने आणखी एका नावाशी ओळख परिचय झाला ते म्हणजे रसूल पुकुट्टी. रीचर्ड प्राईक आणि इआन टॅप्प बरोबर या चित्रपटासाठी २००९ मध्ये बेस्ट साऊंड मिक्सिंगचा अॅकॅडमी पुरस्कार त्याने पटकावला. संगीताच्या जगतामध्ये आपल्यासाठी ए. आर. रहमान व्यतिरिक्त ही नवीन ओळख तयार झाली. रसुलमुळे टेक्निकल किंवा बॅकग्राऊंड तंत्रज्ञांचे महत्त्व सगळ्यांना पटले. किंबहुना ते महत्त्वाचे असतातच परंतु त्यांना या निमित्ताने मेनस्ट्रीममध्ये मानाचे स्थान मिळाले.

तर सांगायचा मुद्दा असा की रसूलच्या यशाची दखल सर्वसामान्यांनी घेतली. त्याचे कौतुक केले आणि काही तरुणांचे तो प्रेरणास्थान ठरला. साऊंड इंजिनीअरिंगला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले. गेल्या तीन-चार वर्षांत नाशिकमध्ये साऊंड इंजिनीअरिंगचा ट्रेंड चांगलाच रुजलेला दिसतो. बरीच मुलं आजकाल आठवड्यातून एक-दोन वेळा मुंबई-नाशिक अपडाऊन करून या क्षेत्रात काम करतात.

या सगळ्यांमध्ये काहीजणांना पुढचा टप्पा आकर्षित करतो. कोणत्या तरी प्रोफेशनल कोर्सचे शिक्षण घेता घेता या क्षेत्रामध्ये सूर गवसतो. मात्र अजूनही आपल्याकडे नवीन वाटांवर बेधडक चालण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी खासकरून पालकांची तयारी नसते. अर्थात आजकालच्या स्पर्धेच्या जगात त्यांचाही दोष आहे, असे म्हणता येणार नाही. पण आजचे यंगस्टर्स तेवढी फ्लेक्झिबीलिटी दाखवतात आणि एकीकडे अभ्यास करीत आपला छंददेखील जोपासतात.

असेच डॉक्टर बनण्याचे आईबाबांचे स्वप्न एकीकडे पूर्ण करत जगदीश भांडगेने स्वतःला म्युझिकली अपग्रेड केले आहे. आवड म्हणून गिटार वाजवता वाजवता तो रेकॉर्डिंगच्या जगात शिरला. गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये एक-एक इन्स्ट्रुमेंट घेत त्याने गिअर अपडेट केला. आज त्याचा स्वतःचा घरीच होम स्टुडिओ आहे. तसेच वेळ मिळेल तसा त्याने मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये जाऊन साऊंडॅथॉन वर्कशॉप केला. जिथे साऊंड रेकॉर्डिंग प्रोग्रॅमिंग, मिक्सींग, मास्टरिंग हे सगळं तंत्र शिकवले जाते.

असाच अजून एक होतकरू साऊंड इंजीनिअर म्हणजे सौरभ काकडे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून प्रसिद्ध संगीतकार अली डिसुझांकडून पियानोचे बाळकडू त्याला मिळाले. परंतु प्रथम अभ्यास आणि मग आवड त्यामुळे त्याने आधी कम्प्युटर इंजीनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर मुंबईला दमन सूद यांच्याकडे डिजीटल अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. आज तो मुंबईमध्ये स्वतःच्या कामाचा ठसा उमटवतो आहे. त्याच्या मते बरेच तरूण या क्षेत्राबद्दल उत्सुकता दाखवतात. म्युझिकल बँडसचा ट्रेंड जसा वाढीस लागला तसा मुलांना रेकॉर्डिंगसाठी चांगल्या तंत्रज्ञांची गरज भासू लागली. म्युझिक व्यतिरिक्त त्याला साऊंडमध्ये परफेक्ट करणारे, टेक्निकलची जाण असणारे लोक लागायला लागले आहेत. त्याच्या मते नाशिकमध्ये एखादी व्यावसायिक प्रशिक्षण संस्था जर आली तर याचा दुहेरी फायदा होईल. मुलं इथेच प्रशिक्षण घेऊ शकतील आणि साऊंडच्या कामासाठी मुंबईला जे काम जातं ते इथेच होऊ शकेल आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

निखिल सिंघदेखील त्याच्या बँडची गरज म्हणून या क्षेत्राकडे वळला. त्यानेही डिजिटल अॅकॅडमीमधून प्रशिक्षण घेतले आहे. नाशिकमध्ये नोकरी सांभाळून तो आठवड्यातून दोन दिवस मुंबईला अपडाऊन करून हे काम करतो. एकूण साऊंड मास्टरिंगच्या प्रक्रियेबद्दल तो मनापासून बोलत होता. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अजून पुढे स्पेशलायझेशन करू शकतो असे त्याने सांगितले.

तर रितेश इंगळे हा लाईव्ह साऊंड करतो. कोणत्याही संगीत कार्यक्रमाचा जीव हा साऊंड कसा लागला आहे यात असतो. रितेशच्या घरी त्याच्या लहानपणापासून स्टुडिओ आणि लाईव्ह साऊंडचे वातावरण. मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी आधी नाशिकमध्ये लाईव्ह साऊंडवाले तंत्रज्ञ मुंबईहून बोलावले जायचे. टेक्निकल परफेक्शन हा त्याच्यामधला महत्त्वाचा भाग असायचा. आज हळूहळू चित्रं बदलते आहे. अर्थात हेदेखील तो सांगायला विसरत नाही, की स्थानिक तंत्रज्ञावर विश्वास टाकणारे क्लायंटस् मिळाले पाहिजेत. तरच नवीन होतकरू तरुणांना इथे जम बसविण्यात त्रास होणार नाही. डिजिटायझेशनमुळे कामाचा वेग आणि दर्जा दोन्ही सुधारला आहे, असे त्याचे मत आहे. नाशिकच्या तरुणाईच्या जगात दिसणारा हा म्युझिकल ट्रेंड दिवसेंदिवस वाढीला लागो ही आशा व्यक्त करुयात. अॅनिमेशन, पार्श्वसंगीत, अॅडव्हर्टायझिंग, रेडिओ जिंगल्स सगळीकडे या क्षेत्राला वाव आहे. संगीत देणारा जरी संगीतकार असला तरी साऊंड ऑफ म्युझिक परफेक्ट करण्यासाठी साऊंड इंजिनीअरच लागणार हे निश्चित.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरांचे निर्विवाद दोषत्व अपेक्षित

0
0

अरविंद जाधव, नाशिक

कोट्यवधींच्या घबाडापासून अगदी पाचशे रुपये स्वीकरणाऱ्या सरकारी बाबूंची लाचखोरीची प्रवृत्ती रोखण्यासाठी अटक झालेल्या संशयितांचे निर्विवाद दोषत्व कोर्टात सिध्द होणे आवश्यक आहे. नेमके यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) काही प्रमाणात कमी पडताना दिसते. शिक्षेत होणारा उशिर आ​णि निर्दोष सुटण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे एसीबीच्या कार्यपध्दतीबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात.

गाळ्याची अनामत रक्कम परत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या लिपिकास कोर्टाने दोषी ठरवून १ वर्षाची सक्तमजुरी तसेच चार हजार रुपये दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली. २१ फेब्रुवारी २०१३ रोजी एसीबीने अंबादास मुरलीधर भालेराव या लाचखोर लिपिकास अटक केली होती. महापालिकेच्या गाळ्याची अनामत रक्कम परत देण्यासाठी भालेरावने ही रक्कम स्वीकारली होती. या शिक्षेतून महापालिकेचा निर्ढावलेला कारभार अधोरेखीत तर झालाच पण लाचखोरांसाठी चांगला संदेश मिळाला. खरेतर यशस्वी सापळ्यांच्या पाठोपाठ कोर्टात गुन्हा सिध्द होण्याचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. नाशिक परिक्षेत्रात सध्या हे प्रमाण ३० टक्क्यांच्या आसपास आहे. गत वर्षात हेच प्रमाण ४३ टक्के इतके होते. म्हणजे गेल्या वर्षातील एकूण ४० निकालांमध्ये २३ जणांना पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष सोडले. चालू वर्षात ११ जणांना ​शिक्षा ठोठवण्यात आली. तर २६ जण निर्दोष सुटले आहेत. निर्दोष सुटण्याचे प्रमाण खूपच जास्त असल्याने यशस्वी सापळ्यांच्या संख्येबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. अर्थांत यात फिर्यादी, साक्षीदार यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते, हे नाकारून जमणार नाही. अनेकदा फिर्यादीच ऐनवेळी गुडघे टेकून मोकळे होतात. कोर्टात चालणाऱ्या दीर्घकालीन खटल्यांचेही आव्हान एसीबीसमोर आहे. आजमितीस नाशिक विभागाचे ४४३ खटले विविध कोर्टात प्रलंबित आहेत. यातील एक खटला तर १९९६ पासून प्रलंबित पडला आहे. वेळ वाया घालवूनही संशयित आरोपींना क्लिन चीट मिळणार असेल तर एसीबीने पुरावा संकलन, पंच व साक्षीदारांशी संवाद, केसचा फॉलोअप याबाबत गांर्भियाने विचार करणे गरजेचे आहे.

जानेवारी ते २१ मे २०१५ या कालावधीत नाशिक एसीबीने तब्बल ६१ केसेस दाखल केल्या. यात दोन अपसंपदेच्या गुन्ह्याच्याही समावेश आहे. २०१४ च्या तुलनेत केसेसच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसते. अर्थात एसीबीच्या कामाचे मूल्यमापन करताना संख्या गौण ठरू शकते. शेवटी तक्रारदार पुढे आल्यानंतरच एसीबीकडून कारवाई होते. पण, आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारीचे झीज होणे आवश्यक आहे. चिखलीकर व वाघ प्रकरणानंतर नाशिक एसीबीकडे पाहण्याचा सर्वसामन्यांचा दृष्टीकोन नि​श्चितच बदलेला आहे. निर्ढावलेल्या प्रशासनात यामुळे किंचित का होईना जरब बसली आहे. हे काम पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आता नुकतेच सूत्रे हाती घेतलेल्या एसीबीच्या पोलिस अधीक्षक डी. पी. प्रधान यांच्यावर आली आहे. प्रधान यांनी कामकाज सुरू केल्याबरोबर आपल्यासह इतर अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर प्रसिध्द केले. तसेच पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये एसीबीचे खटले चालवण्यासाठी स्पेशल कोर्टची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले. तक्रारदाराने तक्रार करताना कोणताही किंतू ठेऊ नये, असा त्यामागचा त्यांचा उद्देश आहे. उद्देश चांगला असला तरी उद्देशपुर्तीचे आवाहन ते कसे पेलतात, हे लवकरच स्पष्ट होईल. एसीबीला सर्वसामन्यांकडून काही अपेक्षा आहेत. त्या पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी सर्वांनी पेलली तर निश्चितच लाचखोरीच्या प्रमाणात काही बदल झालेला दिसून येऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुउद्योगांच्या सहकार्याने ‘मेक इन महाराष्ट्र’!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारने लघुउद्योजकांना प्रोत्साहीत केल्यास तेच लघुउद्योग मध्यम किंवा मोठे उद्योग बनू शकतात. तसे झाले तर 'मेक इन महाराष्ट्र'ची संकल्पना मूर्तरूपात येणे शक्य आहे, असा विश्वास काकूयो कॅम्लिनचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांनी शुक्रवारी नाशि‌कमध्ये व्यक्त केला.

लघुउद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेशचे अधिवेशन गंगापूर रोडवरील नक्षत्र लॉन्स येथे झाले. उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लघुभारतीचे अध्यक्ष योगेश कनानी, राष्ट्रीय उपाध्यक्ष भूषण वैद्य, आबासाहेब देशपांडे, राष्ट्रीय महामंत्री जयप्रकाशजी मित्तल, माजी राष्ट्रीय अध्यक्ष वज्जूभाई वगासिया, लघुभारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री श्री प्रकाशचंद्र, मारुती कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. दांडेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन झाले.

ते म्हणाले, की स्थानिक गावकरी, वनवासी, शेतकरी अशा सर्वांना विश्वासात घेऊन उद्योजक ग्रामीण भागात लघुउद्योग स्थापन करतात. तरीही त्यांना तेथील स्थानिक मूठभर लोकांकडून त्रास दिला जातो. अशा लोकांच्या दादागिरीमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. सरकारने याची गांभार्याने दखल घेऊन उद्योजकांना दिलासा द्यायला हवा. खेळते भांडवल आणि कच्च्या मालाचा पुरवठा ही उद्योगांपुढील आव्हाने आहेत. या समस्या दूर व्हायला हव्यात. लघुउद्योगांचे रुपांतर मध्यम आणि मोठ्या उद्योगांमध्ये होण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन मिळाल्यास मेक इन महाराष्ट्रची संकल्पना अस्तित्वात येणे शक्य असल्याचा विश्वास दांडेकर यांनी व्यक्त केला.

अधिवेशनातील सूचना

- लघुउद्योजकांनी एकत्रित जागा घेऊन कोऑपरेटीव्ह सोसायटीच्या माध्यमातून उद्योगांची रचना करावी

- उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी करावी. चार्टर्ड इंजिनीयर्सचे पॅनल तयार करून त्याद्वारे उद्योगांसाठी परवानगी द्यावी

- जिल्हा उद्योग केंद्रात लघुउद्योजकांचे सल्लागार मंडळ निर्माण करावे

- उद्योजकांच्या संस्थांनी सहकार औद्योगिक संस्था उभी केल्यास तेथे प्राधान्याने वीज, पाणी, रस्ते यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी

- एमआयडीसी क्षेत्रात पाणी, रस्ते, पथदीप यांसारख्या सुविधा कोलमडल्या आहेत. एमआयडीसीने सल्लागार मंडळ नेमून त्यावर उद्योजकांचे प्रतिनिधी नेमल्यास पाठपूरावा करणे सोपे होईल

- भ्रष्टाचार व उद्योजकांची अडवणूक टाळण्यासाठी उद्योगांचे इन्स्पेक्शन करतेवेळी त्या पथकात उद्योग संघटनेचे दोन प्रतिनिधी असावेत

- लघुउद्योग एकप्रकारे शिकाऊ कामगारांसाठी प्रशिक्षण संस्थेचेच काम करतात. त्यामुळे त्यांना मनरेगा व स्कील डेव्हलपेंट या योजनांमध्ये सहभागी करून त्यांचा आर्थिक भार सरकारने हलका करावा

नाशिक-पुणे रस्ता तापदायक

पुणे-नाशिक हा अरुंद महामार्गही उद्योजकांसाठी तापदायक ठरू लागला आहे. मालवाहतुकीवर व पर्यायाने उद्योगांवरही त्याचा परिणाम होतो आहे. एमआयडीसीमधील अनेक भूखंड रिकामे असून ते सरकारने लघूउद्योगांसाठी उपलब्ध करून द्यायला हवे अशी अपेक्षा यावेळी आबासाहेब देशपांडे यांनी व्यक्त केली. भूषण वैद्य यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉम्प्टनमध्ये आंदोलक ठाम

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन कंपनीत शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात स्टाप व कंत्राटी कामगारांना प्रवेश देण्यात आला. कामगारांनी मात्र कंपनी व्यवस्थापन कामबंद आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. कुठल्याही परिस्थितीत सिटू युनियनचे सभासद असलेल्या कामगारांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला.

क्रॉम्प्टन कंपनीतील कामगारांनी ११ मे पासून सिटू युनियनबरोबर कराराची बोलणी करावी यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. एकाच विचारसरणीच्या दोन युनियन क्रॉम्प्टन कंपनीत आहेत. आंदोलन सुरू असताना गुरुवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर कंत्राटी कामगारांच्या गाडीला कामगारांनी अडवणूक केली म्हणून तब्बल १६८ कामगारांना पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी कंपनीने तीस ते चाळीस पोलिसांचा ताफा बोलावत स्टाप व कंत्राटी कामगारांना कंपनीत प्रवेश दिला. परंतु, कामगारांनी कंपनी व्यवस्थापन कामगारांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे.

विविध संघटनांच्या भेटी

क्रॉम्प्टन कंपनीत सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाला विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. यात कामगारांनी एकजूट ठेवत मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचे संघटनांनी सांगितले.

कामाच्या मोबदल्यात चांगला पगार मिळेल या आशेने ३५ वर्ष काम केले. परंतु, कंपनीने कामगारांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत. आता आठ दिवस निवृत्तीसाठी राहिले आहेत. यात निवृत्त होत असताना कंपनी व्यवस्थापनाने इतर कामगारांचा विचार करून बोलणी केली पाहिजे.- अर्जून देवरे, कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थासाठी औषधांचा पुरेसा साठा देण्याचे आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औषध खरेदीचा विषय आरोग्यमंत्र्यांच्या कक्षेत येत नसल्याचे नाशिक आरोग्य सेवाचे उपसंचालक व सिव्ह‌िल सर्जन यांनी म्हटले आहे. सिंहस्थासाठी पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध असल्याचे सांगत आरोग्यमंत्र्यांनी रखडलेल्या औषधखरेदीबाबत सावरासावर केली आहे. तसेच, सिंहस्थ काळात भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा व औषधे ३० जूनपर्यंत उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश शुक्रवारच्या बैठकीत दिले.

सिंहस्थासाठी शिखर समितीने स‌िव्हिल सर्जन यांना १० कोटी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर निधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वार्षिक नियमित अनुदानातून खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स‌िव्हिलच्या १० कोटी निधीपैकी फक्त साडेपाच कोटी निधीलाच २०० बेडच्या हॉस्प‌िटलसाठी प्रशासकीय मान्यता आहे, असे उपसंचालकांनी निवेदनात म्हटले आहे. सिंहस्थासाठी लागणाऱ्या औषधांच्या पुरवठ्यासाठी खरेदीचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र औषधांचा पुरवठा नियमित असता तर उपसंचालक व सिव्ह‌िल हॉस्प‌िटला २७ स्मरणपत्र देण्याची काय गरज होती, असा प्रश्न निर्माण होतो. याबाबत गप्प राहणेच उपसंचालकांनी व सिव्ह‌िल सर्जन यांनी पसंत केले आहे. औषध खरेदीशी आरोग्यमंत्र्यांना संबंध नसल्याने त्यांना या स्मरणपत्रांची माहितीच नसल्याचाही विचित्र खुलासा करून आरोग्य संचालकांनी अडचण वाढवली आहे. रखडलेली आरोग्य खरेदीचा प्रश्न आरोग्य संचालकांनी आतापर्यंत आरोग्यमंत्र्यांना कळूच दिला नाही, असे यातून सूच‌ित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादात लाभार्थ्यांचीच फरफट

0
0

महसूल-पुरवठा विभागात वाद; जिल्हा प्रशासनापुढे पेच

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

तहसीलदारांच्या निलंबनानंतर जिल्ह्यातील धान्य वितरण प्रक्रिया कोलमडून पडली आहे. गोदामांमध्ये पडून असलेले दीड लाख क्विंटल धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे कसे असा प्रश्न आता पुरवठा विभागापुढे उपस्थित झाला आहे. महसूल आणि पुरवठा विभागाच्या या वादात लाभार्थी भरडला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे गुदामांमधील मालाच्या वाहतुकीसाठी वाहतूकदारही उदासीन असून, शुक्रवारी राब‌विलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये केवळ दोनच वाहतूकदार सहभागी झाल्याने जिल्हा प्रशासनापुढील पेच वाढला आहे.

सुरगाणा येथे झालेल्या रेशन धान्य घोटाळा प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन जिल्ह्यातील सात तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याचा निषेध करीत नायब तहसीलदार व तहसीलदार संघटनेने पुरवठा विभागाशी संबंधित कामांवरच बहिष्कार टाकला आहे. त्याचा परिणाम आता धान्य वितरणावर जाणवू लागला आहे.

नाशिकरोड येथील सेंट्रल वेअर हाऊसच्या गोदामातून जिल्ह्यातरील निम्म्या अधिक तालुक्यांमध्ये रेशन धान्याचा पुरवठा केला जातो. गोदामातून धान्य बाहेर पडल्यापासून ते प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या हाती पडेपर्यंतच्या प्रक्रियेत तहसीलदार तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची महत्वाची भूमिका असते. परंतु, तहसीलदारांवरील कारवाईच्या निषेधार्थ महसूलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच पुरवठा विभागाशी संबंधित कामांची जबाबदारी घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. परिणामी पुरवठा विभागाची कामे ठप्प होऊ लागली आहेत.

यंत्रणा सुरळीत काम करीत असतानाही धान्य वेळेत आणि पुरेसे मिळत नाही, अशी सामान्य नागरिकांची ओरड होती. आता तर पुरवठा विभागाची कामेच ठप्प झाल्याने लाभार्थीच त्यामध्ये भरडला जाऊ लागला आहे. इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, पिंपळगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर, हरसूल, या भागात १६ लाख ९५ हजार लोकांना पुरू शकेल एवढे धान्य साठविता येते. साधारणत: २० हजार ७५७ क्विंटल गहू, १३ हजार ८३८ क्विंटल तांदूळ तेथे साठ‌विता येतो. मे-जून महिन्यासाठी ५० हजार ८४५ क्विंटल गहू, ३३ हजार ८९७ क्विंटल तांदूळ मंजूर आहे. तर मनमाड येथील भारतीय अन्नधान्य गुदामात नांदगाव, मनमाड, सटाणा, चांदवड, कळवण, उमराणेसह शहरातील काही भागांतील ४० हजार ११६ शहरी, एक लाख ३९ हजार ५७५ ग्रामीण अशा एक लाख ७९ हजार ६९१ शिधापत्रिका धारकांसाठी ३७ हजार ७३५ क्विंटल गहू, २५ हजार १५७ क्विंटल तांदूळ आहे. तर ८९ हजार ३५२ क्विंटल गहू, ५९ हजार ५६८ क्विंटल तांदळाचा कोटा मंजूर आहे. ऐन पावसाळ्यापूर्वीच धान्य वितरणाबाबतची परिस्थिती बिकट झाल्याने गरजू लाभार्थ्यांची उपासमार होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

वाहतूकदार मिळेना

एकेकाळी पुरवठा विभागातील धान्य वितरणाचे कंत्राट मिळावे यासाठी वाहतूकदारांच्या उड्या पडत असत. परंतु, आता वाहतूकदार हे काम स्वीकारण्यासाठी उत्सुक नसल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. सुरगाणा येथे उघडकीस आलेल्या धान्य घोटाळा प्रकरणात संबंधित वाहतूक ठेकेदारासह त्याच्या सहकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा परिणाम धान्य वाहतुकीवर झाला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तीन वेळा निविदा काढूनही हे काम आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने वाहतूकदार तिकडे फिरकत नाही. शुक्रवारी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्यामध्ये केवळ दोनच वाहतूकदार सहभागी झाले असून, पुरवठा विभागाच्या कामांवर बहिष्कार असल्याने पुढील कार्यवाही करण्यास महसूल विभागाने असमर्थता दर्शविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदासाठी हालचाली गतिमान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कर्मवीर भाऊराव हिरे पॅनलकडे १३ सदस्य असल्याचा दावा आमदार अपूर्व हिरे यांनी केला असून, अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

हिरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून जिल्हा बँकेतील घडामोडींची माहिती दिली. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही मुख्यमंत्र्याची भेट घेत बहुमताचा दावा केला. गुरूवारी जिल्हा बँकेच्या जाहीर निकालात कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सत्तेसाठी दोन्ही गटांना शेवटी सोसायटी गटाच्या सदस्यांची मदत घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार कायदे बदलणारच!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सध्याचे कामगार कायदे हे वेळकाढूपणाचे असून, ते उद्योग आणि कामगारांनाही संरक्षण देणारे नाहीत. त्यामुळे आमच्या सरकारने या सर्व कायद्यामंध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. आपल्याकडे कामगार कायदे बदलणे म्हणजे फाशीला जाण्यासारखे असल्याची खंत व्यक्त करतानाच, लेबर प्रॅक्टीसची गरज भासणार नाही, असे कायदे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लघुउद्योग भारतीच्यावतीने नाशिकमध्ये आयोजित प्रदेश अधिवेशन आणि लघुउद्योग संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, की देशाच्या अर्थव्यवस्थेत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा मोठा वाटा रोजगाराची मोठी निर्मिती करून देशाच्या उत्पादकतेत मोठा वाटा असलेले क्षेत्र म्हणून या उद्योगांकडे पाहिले जाते. या क्षेत्रात लघुउद्योग भारतीने पथदर्शी काम केले आहे. जगातील आव्हानांचा सामना करायचा असेल, तर आपणही वेगाने बदलले पाहिजे. चार गोष्टी मनाविरूद्ध गेल्या तर त्या सहन करण्याची क्षमता आपल्यात हवी. सध्याचे कामगार कायदे कोणाच्याच फायद्याचे नाहीत. त्यामुळे कामगार कायद्यांमध्ये सकारात्मक बदल केले जातील. कामगारांच्या हिताचे, त्यांना संरक्षण व रोजगार देणारे कायदे बनवले जातील.

उत्पादनाच्या बाबतीत जगाची भूक भारत भागवू शकतो. त्यामुळे मॅन्युफॅक्चरींगमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक होईल. उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जगातले उत्कृष्ट मॅन्युफॅक्चरींग हब देशात तयार होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

सेल्फ सर्टीफिकेशनला प्राधान्य

लघुउद्योग क्षेत्रातील इन्स्पेक्टरराज संपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे. यापुढच्या काळात उद्योगांसाठी संबंधितांचे 'सेल्फ सर्टिफिकेशन' घेऊन आवश्यक परवानग्या देण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. निश्चित मानके तयार करून स्वःताच तुमचे मुल्यांकन करा अशी प्रणाली विकसीत केली जात आहे.

फाशीचा फंदा बांधून घेऊ...

सध्या आपल्याकडे कामगार कायदे बदलणे म्हणजे स्वतःचा फाशीचा फंदा तयार करून घेण्यासारखे आहे. मात्र, आम्ही त्यासाठी तयार आहोत, अशी ठाम भूमिका फडणवीस यांनी मांडली. नव्या कायद्यांमध्ये उद्योजक व कामगार दोघांचे हित जपले जाईल, असा दावाही त्यांनी केला.

सरकारी बाबूंनाही 'काम तसे दाम'

सरकारी कारभाराची गुणवत्ता सुधारावी यासाठी 'काम तसे दाम' देणारी घालणारी कॉर्पोरेट जगतातील 'की रिझल्ट एरिया' (केआरए) प्रणाली सरकारी अधिकाऱ्यांनाही लागू होणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागात ‘भूकंप’

0
0

रमेश पडवळ, नाशिक

सिंहस्थासाठीच्या औषध व इतर साधनसामुग्रीच्या मुद्यावर आरोग्य विभाग अखेर खडबडून जागा झाला आहे. मागणी नसताना कोट्यवधी रूपयांच्या जंतुनाशकांची खरेदी, कुंभमेळ्यात लागणाऱ्या औषध खरेदीचा रखडलेला प्रश्न अन् जिल्हा वैज्ञानिक प्रयोगशाळेला मिळत नसलेली साधनसामुग्री यावर 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाश टाकला होता. त्यानंतर आरोग्य विभागात जणू भूकंपाचे धक्क जाणवल्याने आरोग्य मंत्रालय व आरोग्य संचालनालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. शुक्रवारी नाशिक व मुंबईतील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविण्यात आली.

नाशिक सिव्ह‌लि हॉस्प‌टिलमध्ये फक्त १५ दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा शिल्लक असून, गेली तेरा महिन्यात सिव्हिल हॉस्प‌टिल व जिल्हा परिषदेकडून आरोग्य संचालनालयाला ८ कोटींच्या औषध खरेदीसाठी २७ वेळा स्मरणपत्रे देऊनही औषधे व साधनसामुग्री मिळत नसल्याने सिंहस्थात आरोग्य सेवेचे काय होईल, अशी धास्ती निर्माण झाली होती. तशीच स्थिती जिल्हा वैज्ञानिक प्रयोगशाळेतही होती. प्रयोगशाळेला पाणी तपासण्यासाठी रसायने व इतर साधनसामुग्री मिळत नसल्याने गोदावरीसह पाणीसाठ्यांचे पाणी तपासणार कसे असाही प्रश्न या निर्माण झाला होता. आरोग्यमंत्री डॉ. दिलीप सावंत यांनी तातडीची बैठक बोलविल्याने नाशिकचे सिव्ह‌लि सर्जन डॉ. एकनाथ माले यांनी शुक्रवारी सकाळी सात वाजताच हॉस्प‌टिलमध्ये हजेरी लावली आणि प्रत्येक वॉर्डनुसार औषधांच्या स्टॉकची माहिती संकल‌ति केली. ही माहिती घेऊन डॉ. माले व उपसंचालक बी. डी. पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाले. औषध खरेदीच्या प्रकरणांची चौकशी व्हावी व कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उपविभागप्रमुख नाना काळे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तर गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे निमंत्रक देवांग जानी यांनी औषधांच्या खरेदीच्या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे संबंधीत प्रकरणाची तक्रार केली आहे.

सीआयडीकडूनही दखल

सिंहस्थाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा असल्याने गुप्तचर संघटनाही ‌याच्या नियोजनाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. औषधांच्या कमतरतेचा आणि रखडलेल्या खरेदीचा प्रश्नाची सीआयडीनेही दखल घेतली असून, याबाबतची कागदपत्रे गोळा करण्यास सुरूवात केल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images