Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आर्या कुलकर्णीची समिटसाठी भरारी

$
0
0

इंटरनॅशनल स्टुडंट एनर्जी समिटसाठी निवड

फणिंद्र मंडलिक

इंडोनिशिया बाली येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्टुडंट एनर्जी समिटमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकच्या आर्या मुकूंद कुलकर्णी हिची निवड झाली असून, ९ ते १३ जून या कालावधीत होणाऱ्या समिटमध्ये ती सहभागी होणार आहे. या समिटमध्ये संपूर्ण भारतातून फक्त दोन मुलींची निवड झाली आहे.

नैसर्गिक ऊर्जा स्त्रोताचा जास्तीत जास्त वापर व्हावा व त्यात जगभरातून संशोधन व्हावे यासाठी इंडोनिशिया सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एक समिट आयोजित करण्यात येत असते. ही समिट इंडोनिशिया सरकारच्या पेट्रोलियम विभागाकडून आयोजित करण्यात येते. या समिटचे यंदाचे सहावे वर्ष आहे. या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांकडून शोध निबंध सादर केले जातात. यावर्षी जगभरातून ९०० च्यावर शोधनिबंध सादर झाले होते. ते शोधनिबंध अभ्यासून दोनशे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आर्या कुलकर्णी हिने हायड्रो इलेक्ट्रीक एनर्जी, सोलर एनर्जी व न्युक्लिअर पॉवर प्लॅँट याविषयी संशोधन करून शोधनिबंध सादर केला होता. आयोजकांनी आर्याने सादर केलेल्या शोधनिबंधाची दखल घेत या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी ८९५ डॉलर्सची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. त्याच प्रमाणे बाली येथे होणाऱ्या समिटसाठी तिला तेथील सरकारकडून आमंत्रित करण्यात आले आहे. या समिटमध्ये भारतातून अवघ्या दोन मुलींची निवड झाली आहे. त्यातील एक तामीळनाडूची असून, दुसरी आर्या कुलकर्णी नाशिकची आहे. इंडोनिशिया सरकारच्यावतीने आयोजित या समिटमध्ये एनर्जी विषयावर तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येते. या आधीही जकार्ता येथे आयोजित सायन्स प्रोजेक्ट ऑलिम्पियाडमध्ये तिने दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी तिला सिल्वर मेडलने गौरविण्यात आले. आतापर्यंत आर्याने इंटरनॅशनल सायन्स प्रोजेक्ट ऑलिम्पियाड २०१४ जकार्ता, इंटरनॅशनल सायन्स प्रोजेक्ट ऑलिम्पियाड २०१४ जॉर्जिया, काठमांडू सिम्पोसिया ऑन अॅडव्हान्स मटेरियल, नेपाळ या ठिकाणी आपले शोधनिबंध सादर करून मेडल्स मिळवली आहेत. त्याचप्रमाणे नागपूर, पुणे, मुंबई पुणे येथे झालेल्या विविध प्रकारच्या सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सहभाग घेतला आहे. आर्याचे शालेय शिक्षण रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियममध्ये झाले असून, ती सध्या जोगेश्वरी येथील एच. के. कॉलेज ऑफ फार्मसी येथे बी.फार्मच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माईवाड्याचा प्रश्न अधांतरीच!

$
0
0

अनिल पवार, नाशिक

तोंडावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी १५ जूनपर्यंत मुदतवाढ करून दिली आहे. मात्र, मुदतवाढ देऊनही प्रशासनाला कामे पूर्ण करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर येथे काही आखाड्यांनाच सुविधा पुरविल्या जात असल्याचा आरोप साधू, महंतांकडून होत आहे. सिंहस्थासाठी संन्याशी माता, साध्वी मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी त्र्यंबकेश्वर येथे प्रशासनातर्फे त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

पूर्वी दशनामी महिला संन्यासी मातांचा आखाडा संयुक्तपणे होता. यामुळे त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज भासत नव्हती. मात्र, काही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी साध्वींसाठी वेगळी व्यवस्था म्हणजे माईवाडा उभारण्यात आला. अलाहाबाद, हरिव्दार येथे स्वतंत्र माईवाडा बांधण्यात आले आहेत. यामुळे संन्यासी मातांची व्यवस्था झाली. मात्र, त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थासाठी येणाऱ्या या संन्यासी मातांसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.

संन्यासी माता या फक्त पंच दशनाम जुना आखाड्याच्याच असतात. यामुळे तेथेच त्यांची व्यवस्था केली जाते. मात्र, त्र्यंबकेश्वर येथे जुन्या आखाड्यावर यावेळी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. जुना आखाडा माईवाड्यासाठी जागा द्यायला तयार आहे. याबाबत आखाड्यातर्फे शासनाला व आखाडा परिषदेला प्रस्ताव दिलेला आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सुमारे पंधराशे ते दोन हजार संन्यासी माता सिंहस्थासाठी त्र्यंबकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना मूलभूत सुविधा पुरविणे गरजचे असल्याचे पंच दशनाम जुना आखाड्याचे हर‌िगिरी महाराज यांनी सांगितले. तसेच काही आखाड्यांनाच सुविधा पुरविल्या जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

देशभरातून येणाऱ्या साध्वी, संन्यासी मातांना येथील भाषा येत नाही. यामुळे त्यांची अधिक गैरसोय होणार आहे. माईवाड्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यांना जागाच मिळाली नाही तर ऐनवेळी सर्व साध्वी, संन्याशी माता जिल्हाधिकारी, नगरपालिका कार्यालयात ठाण मांडतील, असे हरीगिरी महाराज यांनी सांगितले.

साध्वी, संन्यासी मातांच्या माईवाडाबद्दल विचारले असता याबाबत प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही. अल्पावधी शिल्लक असल्याने हे काम स्वतःच हाती घेतले आहे. - श्री महंत हरीगिरी महाराज, जुना आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाडावैभव कोंदणात जपण्याची नांदी

$
0
0

पालकमंत्र्यांच्या सूतोवाचानंतर धास्तावलेय 'वाडायुग'

प्रशांत भरवीरकर, नाशिक

वाडा संस्कृती हे नाशिकचे वैभव. आखीव रेखीव कोरलेले खांब, तुळया, आढे म्हणजे जणू एखादी अखंड कविताच. नाशिकला सोनवर्खी अशा वाड्यांचे वरदान लाभलेले आहे परंतु, कधी काळी अवघ्या शहरावर राज्य केलेले हे वाडे आता डागडूजीअभावी काळाच्या उदरात गडप होऊ पाहत आहे. गडप होतानाही मात्र ते आम्हाला नष्ट करू नका, आम्हाला कोंदणात जपून ठेवा, अशी सादच जणू घालत आहेत. प्रशासनानेही सरकारवाडा जसाच्या तसा जपण्याच्या प्रयत्नातून वाड्यांना हात देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले आहे. तरीही पालकमंत्र्यांनी वाडे सक्तीने काढून टाकण्याबाबत केलेले सूतोवाच वाडायुगावर गंडांतर येत असल्याची सूचना करणारेच असल्याने नाशिकच्या सौंदर्य व इतिहासप्रेमींमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

राज्यात अशी अनेक शहरे आहेत ज्यांनी आपली जुनी संस्कृती जपत नव्या इमारती उभ्या केल्या. यामुळे जुन्या व नव्या वास्तुवैभवाचा ताळमेळ साधला गेला. ही संस्कृती नाशिकमध्येही आता रूजू पहातेय. जुने वाडे काढून टाकण्यासाठी अनेकांनी धोशा लावला असून, तो योग्य नसल्याचे जाणकारांचे मत आहे. काही काळापुरते सौंदर्य टिकवण्यासाठी किंवा शहराचे सौंदर्य दिसण्यासाठी वाडा संस्कृतीला गालबोट लागता कामा नये, अशी मागणी इतिहासतज्ज्ञ व सौंदर्यप्रेमी करीत आहेत. नुकत्याच घेतलेल्या एका प्रशासकीय बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशकातील काही ढासळलेले वाडे सक्तीने काढावे लागतील, असे वक्तव्य केल्याने जुने नाशिक तसेच सराफ बाजार परिसरातील वाड्यांवर गंडांतर येते की काय अशी चिन्हे आहेत. मात्र, याच परिसरात असलेल्या व पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील अत्यंत जुन्या अशा सरकारवाड्याची पुनर्रचना करण्याचे काम अत्यंत जोरात सुरू आहे. त्यासाठी याठिकाणी रात्रंदिवस अनेक मजूर राबत असून, सरकारवाड्याचा दर्शनी तसेच आतील भाग जसाच्या तसा ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे. त्यासाठी राजस्थानसारख्या बाहेरच्या राज्यातून दगड मागविण्यात आले असून, त्यांचा खडबडीत स्पर्श पायांसाठी जुनेपणाची संवेदना देणारा ठरत आहे. सरकारवाड्याच्या पुनर्रचेनासाठी काही कोटी रुपये केंद्राकडून मंजूर झालेले असल्याने अशाच प्रकारे शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मोजक्या वाड्यांच्या पुनर्रचनेबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शहरातील काही वाडे अतिशय प्रेक्षणीय असून, त्यांच्या आतील भागात विविध प्रकारचा इतिहास जिवंत करणारे चित्र साकारण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाडा आकर्षणाचे केंद्र बनत असताना हे वाडे काढून टाकण्यापेक्षा त्याची जशीच्या तशी पुनर्रचना केली तर पर्यटनासही त्याचा लाभ होऊन प्रशासनाच्या खजिन्यात भरच पडणार आहे.

नाशकातील काही वाडे नादुरुस्त झाले आहेत, अगदी पडायलाही आले आहेत. त्यांच्या बाबतीत ठोस भूमिका घेतल्यास हरकत नाही परंतु, जे हेरिटेज आहे त्याचे मात्र जतन झालेच पाहिजे. आपल्याकडे सरकारवाडाचे उदाहरण आहेच, त्याच्यासारख्या वाड्यांचे जतन होणे आवश्यकच आहे, यात शंका नाही. - गिरिश टकले, इतिहासतज्ज्ञ

वाडा संस्कृती हे नाशिकचं वैभव आहे. परंतु, आज या जुन्या वास्तू तथा वाडे पाडून आज त्याजागी ज्या नवीन इमारती उभ्या राहत आहेत. त्यात केवळ स्टील, सिंमेट व खडी यांचाच वापर होत आहे. यात वाडा संस्कृतीचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही. तसे झाल्यास नाशकात कधी काळी वाडे 'होते' असे पुढील पिढीला सांगावे लागेल. - आनंद ढाकिफळे, शहर सौंदर्यशास्त्र अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महंतांच्या सुरक्षा दर्जाची प्रतीक्षा

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

कुंभमेळ्यासाठी शहरात दाखल होणाऱ्या महत्वाच्या महंतांना कोणती सुरक्षा कॅटेगरी असेल, याबाबतची माहिती अद्यापपर्यंत पोलिसांना मिळालेली नाही. विशेष सुरक्षा विभाग देखील याबाबत अनभिज्ञ असून, ऐनवेळेस या बंदोबस्तासाठी मोठा कर्मचारी वर्ग तैनात कसा करायचा असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

कुंभमेळ्यासाठी यंदा तीन लाखांपेक्षा अधिक साधू-मंहत हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसा आकडाच प्रशासनाने प्रत्यक्ष संशोधनानंतर नि​श्चित केला असून, मागील दोन कुंभमेळ्याच्या विचार करता साधू-मंहताच्या संख्येत तब्बल २ लाख ६० हजाराने वाढ झाल्याचे स्पष्ट होते. यात अनेक महत्वाच्या महंतांचा समावेश आहे. त्यातील काही महंतांना झेड, वाय किंवा एक्स अशा स्वरूपाची सुरक्षा पुरविली जाते. पर्वणीच्या काळातच राज्याचे मंत्रिमंडळ आणि केंद्रीय नेते नाशिकमध्ये अवतरणार आहे. यासर्व व्हीआयपींच्या बंदोबस्तसाठी किती मनुष्यबळ खर्ची पडेल, याचाच अंदाज पोलिसांना अद्यापपर्यंत लागलेला नाही. नाशिक विभागाच्या विशेष सुरक्षा विभागाकडे फारतर ४० ते ५० कर्मचारी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झेड किंवा वाय कॅटीगरीतील सुरक्षा पुरवावी लागली तर तारंबळ उडू शकते. साधारणतः ज्या व्यक्तिला अशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे, तेथील विशेष सुरक्षा विभागाने राज्याच्या गृहमंत्रालयाशी संपर्क साधून सुरक्षा कॅटेगरीची माहिती देणे अपेक्षित आहे. ही माहिती मिळाल्यानतंर स्थानिक पोलिस सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. मात्र, आजवर अशी एकही माहिती मुंबई कार्यालयाकडून नाशिक पोलिसांना मिळालेली नाही.

दोन लाख ४० हजार साधू-महंतांची भर

कुंभमेळ्यात येणारे साधू, महंत हे कोणत्या ना कोणत्या अखाड्याच्या झेंड्याखाली दाखल होत असतात. तसेच, त्यांच्या आखाड्यांच्या रुढीनुसार शाहीस्नानात सहभागी होतात. त्यांच्या परंपरांबाबत प्रचंड आग्रही, अधिकारांबाबत सदैव दक्ष असणाऱ्या या आखाड्यांतील प्रमुखांना महंत संबोधले जाते. नाशिक-त्र्यंबकच्या कुंभमेळ्यात दाखल होणाऱ्या आखाड्यांची संख्या १३ असून, त्यातील तीन वैष्णव आखाडे नाशिकला तर १० शैव आखाडे त्र्यंबकला राहतात. सिंहस्थाचे चित्र १९९२-९३ पासून बदलत आहे. १९९२ तील कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीसाठी ४० हजार साधू-महंत हजर होते. दुसऱ्या पर्वणीला साधूंची संख्या वाढून ६० हजारापर्यंत पोहचली तर तिसऱ्या पर्वणीला तेच प्रमाण ५० हजार इतके होते. सन २००३ मध्ये पहिल्या पर्वणीसाठी १ लाख ३३ हजार साधू-महंत शाहीस्नानासाठी आले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीसाठी अनुक्रमे १ लाख ५० हजार आणि १ लाख २० हजार साधू हजर होते. यंदा ही संख्या तीन लाख १६ हजाराच्या आसपास पोहचणार आहे. साधू-महंतांच्या संख्येत भर पडल्यानेच जवळपास ३५० हेक्टर जमिनीवर साधुग्राम उभारले जात असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडच रामभरोसे!

$
0
0

गोदाघाटावर वास्तव्य करणाऱ्यांची मोजदादच नाही

प्रवीण बिडवे, नाशिक

तपस्वी साधू-महंतांना कुंभमेळ्यात शाहीस्नान घडविणाऱ्या रामकुंडावर सिंहस्थापूर्वीच संधीसाधूंचा मेळा भरू लागला आहे. तिर्थाटनाच्या निमित्ताने येणारे भटके येथेच वास्तव्यास थांबत असून, त्यांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे त्यांची मोजदाद करणारी यंत्रणाच निपचित पडल्याने शहराची सामाजिक सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिका आणि पोलिस एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात धन्यता मानत असून, रामकुंड आणि गोदाघाट रामभरोसेच असल्याचे वास्तव आहे.

रामकुंड आणि गंगाघाटाभोवती कुंभमेळ्यापूर्वीच संधीसाधूंचा मेळा भरू लागल्याने शहराची सुरक्षितता धोक्यात आल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या कुंभातील पर्वण्यांपूर्वीच अनेक भटक्यांनी गोदाघाटावर चक्क जागा पटकावण्यास सुरुवात केली आहे. अशा शेकडो भटक्यांना येथे दोनवेळचे अन्न आणि निवाराही सहजगत्या उपलब्ध होतो. म्हणूनच की काय दिवसागणिक येथे अशा भटक्यांची संख्या वाढतच आहे.

रामकुंड तसेच गोदाघाट परिसरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक, पर्यटक अन् उत्तरकार्यासाठी येणाऱ्या नागरिकांपुढे हात पसरून पैसे मिळविण्याचा त्याचा दिनक्रम ठरला आहे.

या परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पाकीट, पर्स, बॅगा इतकेच नव्हे पर्यटकांचे कपडेही चोरीला जाऊ लागले आहेत. अशा चोरट्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी येथील व्यावसायिक तसेच पुरोहितांकडून होत असली तरी पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गोदाघाटावरील अशा भटक्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा फायदा दहशतवाद्यांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी दहशतवाद्यांनी नाशिकची रेकी केली असून, सिंहस्थापूर्वी किंवा सिंहस्थात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एटीएस पथक आणि पोलिसांनी येथे विशेष लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

भटक्यांकडून गोदाघाटावर अस्वच्छता

रामकुंड, गोदाघाट आणि गोदापात्र स्वच्छतेसाठी प्रशासन, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. दुसरीकडे गोदाघाटावर वास्तव्य करणारे भटकेच तेथे घाण करीत आहेत. रात्री दारू, गांजासारखी व्यसने करून तेथेच घाण करण्यात हे लोक पुढे असल्याची परिसरातील व्यावसायिकांची निरीक्षणे आहेत. अधाशापोटी जमा केलेले अन्नपदार्थही पूर्ण सेवन न करता उघड्यावरच फेकून अस्वच्छतेत भर टाकली जात आहे. त्यामुळे अशा भटक्यांना गोदाघाटावरून हटवायला हवे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर साधणार ‘स्मार्ट’ संवाद

$
0
0

मोबाइल अॅपवरून थेट तक्रारीची संधी; करभरणाही शक्य

विनोद पाटील,नाशिक

दैनंदिन तक्रारी आणि समस्या सोडविण्यासह विविध प्रकारचा कर भरणा, महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी थेट महापालिकेच्या कार्यालयामध्ये खेटा मारण्याची नागरिकांची तसदी आता कमी होणार आहे. पालिकेचा कारभार ऑनलाइन आणि पेपरलेस करण्यासाठी विशेष अॅप तयार करण्यात आला आहे. या अॅपवरून नागरिकांना आपल्या समस्या फोटोसह कळविता येणार असून, तातडीने प्रतिसादासाठी विशेष हेल्पलाइनही महापालिका राबविणार आहे. अॅपच्या माध्यमातून महापालिकेशी थेट संवाद साधता येईल अशा स्वरूपाचा अॅप डेव्हलप करणारी नाशिक महापालिका एकमेव ठरणार आहे.

महापालिकेची पायरी चढायची म्हणजे ती अनेक दिवस सतत चढत रहायची असा अनुभव सर्वसामान्यांचा असतो. अनेकदा तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याचाही अनुभव नागरिक वेळोवेळी घेतात. हा त्रास कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेचा कारभार अधिक स्मार्ट करण्याच्या दिशेन महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महापालिकेने स्मार्ट नाशिक नावाचा अॅप डेव्हलप केला असून, तो लवकरच नाशिककरांच्या सेवत दाखल होणार आहे. यामुळे नागरिकांना तक्रारींसाठी महापालिकेच्या दारात यायची गरज पडणार नाही तर महापालिकाच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांच्या दारात जाणार आहे. या अॅपवरून नागरिकांनी केलेली तक्रार थेट संबंधित विभागाकडे वर्ग होणार असून, त्यावर तातडीने फिडबॅक देण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. तक्रारी करताना संबंधित समस्येचा फोटोही अपलोड करता येणार आहे. त्याचबरोबर जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता कर, पाणीपट्टी आदी करभरणा व संबंधित कामे थेट अॅपवरूनच करण्याची सोय अॅपवर उपलब्ध करण्यात आल्याने घर बसल्या महापालिकेशी संवाद साधता येणार आहे. सध्या या अॅपचे टेस्ट‌ींग सुरू असून, पुढील महिन्यात त्याचे लॉन्चींग होणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेचा कारभार अधिकाधिक ऑनलाइन करण्याचा प्रयत्न होत आहे. टेक्नोलॉजीचा उपयोग कामाचा दर्जा व वेग वाढविण्यात कसा होईल. याचा प्रयत्न स्मार्ट नाशिक या अॅपमधून करण्यात आला आहे. या अॅपमुळे नाशिककरांचा महापालिकेशी अधिकाधिक संवाद वाढेल. - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेस्ट कॅम्प रोडला विकासकामांना प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

लष्करी आस्थापनाच्या माध्यमातून चालू वर्षी १५ लाख रुपयांची नागरी विकासासाठी केली जाणार आहे. बोर्डाच्या इतिहासात लष्करी विभागाने केवळ वॉर्ड ६ साठीच आतापर्यंत ६० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याचे नगरसेविका कावेरी कासार यांनी सांगितले.

लष्कराचे बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर संजीव तिवारी, कर्नल कर्नेलसिंग व मेजर अमित शर्मा यांच्या सहकार्याने रेस्ट कॅम्प रोड परिसरात भूयारी गटार योजना, कॅथे कॉलनी अंतर्गत पेवर ब्लॉक, फुटपाथ व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगरसेविका कावेरी कासार व रतन कासार यांच्या करण्यात आला. यावेळी विनोद पिल्ले, सतीश आडके, सन्नी खरालिया जेकब पिल्ले, राजू पगारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज अर्ज, आजच दाखला उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला आणि नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयांत राजस्व अभियानांतर्गत एकाच दिवसात जातीचा दाखला व नॉन क्रिमीलेयर दाखला देण्याचा उपक्रम प्रांताधिकारी कार्यालयाकडून ११ व १२ जून रोजी सकाळी दहाला राबविण्यात येणार आहे. विविध प्रमाणपत्र प्राप्त करताना विद्यार्थी व पालकवर्गाची होणारी दमछाक थांबविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १ व २ जूनला नांदगाव व येवल्यात या उपक्रमामधून अनुक्रमे ३९० व येवल्यात १६५० दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी किंवा नोकरीसाठी आवश्यक उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, नॉन क्रिमिलेअर व जातीचा दाखला यांसह विविध प्रकारचे दाखले सहजगत्या मिळवून देण्यासाठी येवला व नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात ११ आणि १२ जून रोजी सकाळी दहा ते सांयकाळी सहा यावेळेत राजस्व अभियानांतर्गत विविध दाखले देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील कार्यालयात तलाठ्यांकडून दाखले दिले जातील. येवल्यात ११ व नांदगावात १२ जून रोजी राजस्व अभियानांतर्गत उपक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठात आज गुणगौरव समारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १७ वा वर्धापनदिन बुधवारी (१० जून) संपन्न होत आहे. विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये दुपारी ४ वाजता एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध विद्यार्थी व शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

अनेक गुणवंत विद्यार्थी आणि विविध विद्याशाखांमधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सन २०१२-१३ व सन २०१३-१४ करीता उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना एकक पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार(पुरुष), उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार (महिला) तसेच सन २०१४-१५ करीता डॉ. शरदिनी डहाणूकर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, विविध विद्याशाखेतील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, विविध विद्याशाखेतील उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार व जीवनगौरव आदी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले.

या समारंभास विशेष अतिथी म्हणून नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. बी. विद्यासागर यांच्यासह खासदार हरीश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप उपस्थित राहणार आहेत.

डॉ. कमलाकर व्यवहारे, डॉ. अशोक रेगे, डॉ. सुदाम काटे, डॉ. वसंत देशपांडे, डॉ. श्रीकृष्ण फडके, डॉ. मधुकर परांजपे व डॉ. दिलीप पुराणिक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी सांगितले आहे.

आरोग्य विद्याशाखेनिहाय विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या एकूण ४४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात

येणार आहेत. यात वैद्यकीय विद्याशाखेचे १३ विद्यार्थी, दंत विद्याशाखेचे ३ विद्यार्थी, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे ८ विद्यार्थी, होमिओपॅथी विद्याशाखेचे ५ विद्यार्थी आणि तत्सम विद्याशाखेच्या १५ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक

डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले. या समारंभास मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकेवरील कोंडीला

$
0
0

'वनवे'चा पर्याय बागवानपुऱ्याचा रस्ता होणार एकेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारकेवर उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अमरधामकडे जाणारा (बागवानपुरा) रस्ता वन वे करण्याचा निर्णय घेतला आहे. सात दिवसात येणाऱ्या सूचना व हरकतींचा विचार करूनच निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

द्वारका सर्कल येथे मुंबई, पुणे, ना​शिक, औरंगाबद तसेच चांदवडच्या दिशेकडून हजारो वाहने येत असतात. सर्वच रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीची समस्येला तोंड द्यावे लागते. तासानतास वाहने अडकून पडतात. सकाळ व संध्याकाळच्या सुमारास तर त्रासात भरच पडते. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक विभागाचे कर्मचारी गुंतून पडतात. उड्डाणपूल व रस्त्यांच्या रूंदीकरणानंतर वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागेल, अशी शक्यता मावळली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून यावर पर्याय सुचवले जात आहेत. या ठिकाणी चार ते पाच रस्ते एकत्र येतात. तसेच सिग्नल बसवण्याच्य दृष्टीने योग्य जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बागवानपुरा भागात जाणारा रस्ता वन वे करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा या भागातून येणाऱ्या वाहनांमुळे मुंबईकडून तसेच सारडा सर्कलकडून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. अपघाताची देखील भीती कायम राहते. दरम्यान, बागवानपुरा भागाकडून द्वारकेकडे येणाऱ्या वाहनांना चौकमंडई मार्गे सारडा सर्कलकडे जाता येईल. तसेच अमरधामरोडने द्वारकेकडे जाणारी सर्व वाहने ही शिवाजी चौकातून टाकळी चौफुलीमार्गे आग्रारोडकडे जातील, असा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे.

वन वे बाबत स्थानिक नागरिकांची काही सूचना व हरकती असतील तर त्या त्यांनी सात दिवसाच्या आत सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा, जुने पोलिस आयुक्त कार्यालय, शरणपूररोड, या ठिकाणी पाठवाव्यात. मुदतीत हरकती प्राप्त न झाल्यास हा रस्ता एकरे म्हणून घोषित करण्यात येणार आहे.





हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

भद्रकाली फुलेमार्केट-वाकडीबारव- चौकमंडई- शिरसाठ हॉटेल- महात्माफुले चौकमार्गे द्वारकासर्कलकडे जाणारी वाहतूक

काजीपुरा-चौक मंडई-शिरसाठ हॉटेल-महात्मा फुलेचौकमार्गे द्वारकेकडे जाणारी वाहतूक

आझाद चौक-शिरसाठ हॉटेल-महात्माफुले चौकाकडून द्वारकेकडे जाणारी वाहतूक

अमरधामरोडने शिवाजीचौक- कथडा मार्गे महात्माफुले चौककडून द्वारकेकडे जाणारी वाहतूक



द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. त्यातील ही एक उपाययोजना असून, याचा थेट फायदा वाहनचालकांना होऊ शकतो. - पंकज डहाणे,पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्ष निवडणुकीसाठी नगरसेवकांची पळवापळवी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिकनंतर त्र्यंबकेश्वरमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुगीचे दिवस संपले असून, नगरसेवक इतर पक्षांची वाट धरू लागले आहेत. कालपर्यंत भाजपच्या वाटेवर असलेले नगरसेवक आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा झडू लागली आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत डावपेच कोणाचे सरस ठरतात यावरच सर्व गणित ठरणार आहे.

नगराध्यक्षपदाची लवकरच निवडणूक होत असून, सहा महिन्यांपासून विरोधात असलेल्या मनसेने नगरसेविका अनघा फडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या समवेत आठ नगरसेवक असल्याची चर्चा आहे. यामध्ये मनसे सहा, ‌शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक नगरसेवकांचा गट जानेवारी २०१५ पासून तयार झाला आहे. सत्तारूढ गटाच्या बाजूने भाजपच्या तृप्ती धारणे यांचा अर्ज दाखल झाला आहे. या गटात नऊ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजप एक, राष्ट्रवादी चार, काँग्रेस तीन आणि अपक्ष एक असे बलाबल आहे. हा गट सहा महिन्यांपूर्वी तयार झाला.

सद्यस्थितीला तृप्ती धारणे यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र मनसेने आशा सोडलेली नाही. मनसे गट एक सदस्य मिळवून सत्ता हस्तगत करू शकतो. गतवेळेस तृप्ती धारणे विरोधी गटास मिळाल्याने त्यांच्यामुळे सत्ता गमावावी लागली हे शल्य मनसेला आहे. त्यामुळे त्यांच्या गटातील अपक्ष व शिवसेना नगरसेवकांच्या नगराध्यक्षपदाची संधी हुकली आहे. यावर उपाय म्हणून काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करण्याचे घाटत होते. आता मनसे गटाने राष्ट्रवादीचा उमेदवार असल्यास आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वादळ तयार केले आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणाला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. दोन वर्ष सत्तेपासून दूर राहिलेल्या राष्ट्रवादीस भाजपाच्या एका सदस्याने तारले व सत्तेत सहभाग दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोदकामामुळे आश्रम अडचणीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

टेकडीवर भराव टाकणे, खोदकाम करणे, वृक्षतोड आणि तत्सम कारणांनी ठिसूळ झालेली टेकडी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने त्र्यंबकेश्वर येथील अन्नपूर्णा आश्रमास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये त्र्यंबकच्या तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाने उत्खनन आणि भराव तसेच दगड ढासळण्याची परिस्थती दृष्टिक्षेपात आली आहे. महसूल खात्याने पाहणी केली. तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे. येथे वृक्षतोड झाली आहे. रस्ता तयार करतांना दगडी शिळा लावणे, भराव टाकणे आदी कारणांनी हा भाग ठिसूळ झाला असून, तो पावसात कोसळण्याची शक्यता आहे. तसेच त्यामुळे टेकडीवरील आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांना धोका निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे मालमत्तेची हानी होऊ शकते. त्यास संरक्षक जाळी बसविणे तसेच

योग्य त्या उपाययोजना करण्याची नोटीस दिली असून, तसे न केल्यास संभाव्य हानीस सर्वस्वी जबाबदार राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अन्नपूर्णा आश्रमाच्या टेकडीवरील भराव गतवर्षी ८ ऑगस्ट २०१५ रोजी तळाच्या जमिनीत वाहून आला होता. येथील शेतकरी कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उभे पीक माती खाली दाबले गेले होते. तसेच बांध फुटून भाताचे नुकसान झाले होते. वर्ष उलटले तरी देखील यावर्षी या आश्रमाने संरक्षणात्मक कोणतीही उपाययोजना केलेली नाही. माळीणसारखी घटना घडू नये

म्हणून प्रशासनाने आश्रमास नोटीस बजावून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘२४’ च्या शुटिंगला प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

ना‌शिक जिल्ह्यात चित्रपटांच्या शुटींगला वाढती पसंती मिळत आहे. सिन्नर येथील गोंदेश्वर महादेव मंदिर परिसरात तामीळ '२४' या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाल्याने बघ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

तामीळ सुपरस्टार सूर्या या अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला '२४' या चित्रपटाचे सिन्नरला चित्रिकरण सुरू झाले आहे. सिन्नरचे यादवकालीन हेमाडपंती गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणात हे चित्रिकरण सुरू असून, आठवडाभर चालणार आहे. शिव आराधनेनंतर पर्जन्यवृष्टी झाल्याचा प्रसंग या कालावधीत चित्रित केला जाणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणात आकर्षक सेट उभारण्यात आला असून, गोंदेश्वर मंदिरासारखेच भव्य खांब उभारण्यात आले आहेत. भव्य आकाराचा नंदी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरावर फुलांच्या माळा सोडण्यात आल्या असून, परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. हे सर्व सेट थर्माकॉलपासून उभारण्यात आले असून, गोंदेश्वर मंदिराच्या दगडासारखे रंग काम केल्याने हुबेहूब मंदिरासारखा दिसणारा परिसर सेटच्या रूपाने उभा केला आहे.

या मंदिराच्या परिसरात शुटींगसाठी पुरातत्व विभागाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली असून, स्‍थानिक कामाचे नियोजन सोनांबे येथील दीपक पवार करीत आहे. पुरातत्व विभागाने घालून दिलेल्या अटीनुसार या मंदिर परिसरात शुटींग केली जाणार असल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात प्रीपेड रिक्षांची भाडेवाढ

$
0
0

बूथजवळ असणार दरपत्रकाची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची लूट थांबावी याकरिता गेल्या सोमवारी प्रीपेड रिक्षा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. पेट्रोलचे वाढलेले भाव आणि प्रादेशिक परिवहन विभागाने जाहीर केलेल्या नवीन दरपत्रकानुसार रिक्षांचा वापर करणाऱ्या प्रवाशांचा खिसा काही प्रमाणात हालका होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा आणि आर्थिक लूट थांबावी म्हणून ऑक्टोबर २०१३ मध्ये शहरात प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने आणि रिक्षाचालकांना देण्यात येणारे भाडे परवडत नसल्याने अनेकदा ही सेवा बंद पडली. दरम्यान, मागील चार महिन्यांपासून ही सेवा खंडित झाली होती. कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये दाखल होत असतात.

शहराची पुरेशी माहिती नसल्याने आलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना बहुतांश रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून अवास्तव भाडे आकारले जाते. ही आर्थिक लूट थांबावी म्हणून पुन्हा एकदा प्रीपेड रिक्षा सुरू करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयानुसार प्रीपेड रिक्षा व्यवस्थापनाने घेतला. शहरातल्या रिक्षा व्यवसायाला शिस्त लागावी, प्रवाशांची सुरक्षितता राहावी आणि या व्यवसायाला प्रतिष्ठा लाभावी, या उद्देशाने प्रीपेड रिक्षांचा हा बंगळुरू पॅटर्न नाशिकमध्ये राबविला जात आहे.

पहिल्या टप्प्यासाठी यापूर्वी ९.३० रुपये आकारले जात होते. मात्र, पेट्रोलचे दर वाढल्याने पहिल्या टप्प्यासाठी आता १३.७५ पैसे आकारण्यात येणार आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दोनशे प्रीपेड रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या रिक्षा नाशिकरोड रेल्वे स्टेशनबाहेर उभ्या असतात. स्थानकाबाहेरील प्रीपेड रिक्षाच्या कार्यालयात प्रवासी गेल्यानंतर प्रवाशाने आपले नाव, मोबाइल नंबर आणि जाण्याचे ठिकाण सांगायचे आहे. त्यानंतर प्रवाशाला दोन पावत्या मिळतील.

एक पावती प्रवाशाने त्याच्याकडे ठेवायची असून, इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर दुसऱ्या पावतीवर सही करून ती पावती रिक्षाचालकाकडे

परत करायची आहे. त्यामुळे रिक्षाचालकाने प्रवाशाला सुरक्षितपणे सोडले की नाही, हे कळू शकणार आहे. दरम्यान, नवीन दरपत्रक बुथजवळ लावण्यात येणार आहे. रिक्षाचालकांचे प्रश्न सुटल्याने प्रवाशांना चोवीस तास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रीपेड रिक्षा बूथचे संचालक गिरीश मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत खत येवल्यात जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील देवरगाव शिवारात सावरगाव-पाटोदा रोडलगत ५५ हजार २०० रुपये किमतीचे दुय्यम मिश्र खत ट्रकमधून अनधिकृतपणे विक्री करताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून जप्त केले. खरीप हंगामाच्या तोंडावरच परराज्यातून आलेला हा खतांचा साठा पथकाच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.

ट्रकमधून दुय्यम मिश्र खताच्या ६९ गोण्या (३.४५ मेट्रिक टन) शेतकऱ्यांना विक्री करताना जयकिसान अॅग्रोटेकचे मालक संदीप रमेश पाटील व गौरिलाल एकनाथ पाटील (शिरपूर, जि. धुळे) यांना रंगेहाथ पकडले. सदरचे खत त्यांनी गुजरात राज्यातील जी. बी. अॅग्रो इंडस्ट्रिजमधून आणले आहे. सदर खत खरेदी व विक्रीचे कायदेशीर बिले त्यांच्याकडे नसल्याने भरारी पथकाने ते जप्त केले. ही कारवाई जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी. आर. बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृषी अधिकारी जमधडे, ए. एन. साठे, पी. एन. वास्ते यांनी केली आहे.

रासायनिक खतांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून खते, बियाण्याची खरेदी करावी व सोबत खरेदी पावती घ्यावी, असे आवाहन पंचायत समिती कृषी अधिकारी येवला यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदा स्वच्छतेत हवे सातत्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाने नुकतेच राबविलेले 'गोदावरी स्वच्छता' अभियान हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामध्ये सातत्य ठेवा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. हे अभियान केवळ दिखाव्यापुरते न राहाता ती एक चळवळ बनावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शहरात राबविण्यात आलेल्या अभियानामुळे गोदातटाचे रूप पालटले, अशा शब्दांत पालकमंत्र्यानी प्रशासनाच्या या उपक्रमाचा गौरव केला. साधू-महंत, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, शासकीय यंत्रणा आणि जनतेचे असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तब्बल १९ हजार लोकांनी अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एक आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमांमुळे शहर स्वच्छ-सुंदर-हरित करण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, हे अभियान सातत्याने राबवून स्वच्छताप्रेमी नाशिकचे दर्शन जगाला घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. गोदावरी, नासर्डी, वाघाडी, कपिला नदीपात्राबरोबरच पंचशीलनगर, महामार्ग बसस्थानक, जुने सीबीएस, सरस्वतीनाला, काजीपुरा चौक, आकाश भाजी मार्केट, संतकबीरनगर, घारपुरे घाट, सिद्धेश्वर पूल या ठिकाणीही स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता केल्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली.

त्र्यंबकेश्वर येथील घाटांची तसेच रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. रेल्वेचे एक पथक लवकरच दिल्लीहून नाशिकमध्ये येणार असून ते देवळाली, भगूर व इतर स्टेशनांची पाहणी करणार आहेत. सिंहस्थात जादा गाड्या सोडाव्या, गाड्यांना अधिकच्या बोग्या लावाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शाही मार्गाचे सुशोभिकरणाचे काम करण्यात यावे, कुंभमेळ्यातील व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी, स्वयंसेवक, टूर्स अॅण्ड ट्रॅायव्हल्स यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत बैठकींचे आयोजन करण्यात यावे. त्र्यंबकेश्वर येथील घाटाजवळील सपाटीकरण आणि पिचिंगचे काम लवकर पूर्ण करावे. धरणामधून पाणी सोडण्याचे प्रमाण आणि त्यावेळची नवनिर्मित घाटावरची पाणीपातळी याचा आभ्यास करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

आठवडाभरात गुन्हेगारीला आळा

शहरात गुन्हेगारी वाढल्याचे दिसत असले तरी आठवडाभरात ती कमी झाल्याचे पहावयास मिळेल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांसह अनेक नवीन अधिकारी बदलून आले आहेत. कामाचा प्रभाव दाखविण्यास त्यांना वेळ द्यावा लागेल. गुन्हेगारी रोखण्याबाबतच्या सूचना पोलिसांना केल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी विद्यार्थी’चे

$
0
0

फी वाढीविरोधात आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर येथील इच्छामणी विद्यामंदिर शाळेच्या व्यवस्थापनाने डोनेशन शुल्कात दुप्पट वाढ केल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आंदोलन केले. मुख्याध्यापिका सीमा शिर्के व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

संघटनेचे शहराध्यक्ष चिन्मय गाढे, महेश सोनवणे, केविन संचेती, भूषण गायकवाड, दर्शन जोहरी, मनीष पवार, विशाल एलिंजे आदी उपस्थित होते. शाळेत उपनगर परिसरातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. पूर्वसूचना न देता बालवाडीसह सर्व वर्गांसाठी डोनेशन शुल्क २१०० रुपयांवरून ५६०० रुपये इतके भरमसाठ वाढविण्यात आले आहे. प्रवेश अर्ज शुल्क १० रुपयावरुन १०० रुपये करण्यात आले. वार्षिक शुल्क १३०० वरून २६०० करण्यात आले. शाळेत सुविधांची वानवा असताना शुल्कवाढीचा हट्टहास चुकीचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शोषण होत आहे. शुल्कवाढ त्वरित रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

अदिवासींचा आज मोर्चा

जुने नाशिक : आदिवासी विकास भवनातील जात वैधता तपासणी समितीचे सह आयुक्त इ. जी. भालेराव यांच्याकडून हिंदू महादेव कोळी समाजाने सर्व पुरावे सादर करूनही जात वैधता प्रमाणपत्र नाकारले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर निलंबनाची मागणी करण्यासाठी बुधवारी (दि. १०) मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू महादेव कोळी संघटनेने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मिशन अॅडमिशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारावीपाठोपाठ दहावीचा निकाल लागल्यानंतर सगळ्यांनाच आता कॉलेजांमध्ये अॅड‌मििशन घेण्याचे वेध लागले आहेत. सीनिअर कॉलेजांमध्ये तर अॅडमिशनची लगबग सुरू झाली आहे. मात्र, १५ जूननंतर मार्कशिटस हाती मिळाल्यानंतर ज्युनिअर कॉलेजमध्येही अॅडमिशन घेण्यासाठी गर्दी वाढणार आहे.

प्रथम वर्षाच्या प्रवेशांसाठीही विद्यार्थ्यांचे टॉप रँकींगमधील कॉलेजमध्ये वेटींग आहे. परिणामी, एकापेक्षा अधिक कॉलेजमध्ये अर्ज करण्याचा पर्याय विद्यार्थी अन् पालकांकडून निवडला आहे. अॅडमिशन मिशन पार पाडण्यासाठी विद्यार्थी कॅम्पसमध्येच तळ ठोकून आहेत. शहराच्या विविध उपगरांमधून येणारे विद्यार्थी अन् पालक मध्यवर्ती कॉलेजेसच्या कॅम्पसमधील रांगांमध्येच दिवस घालवित आहेत. अकरावीच्या अॅडमिशनला १६ जूनपासून सुरुवात होणार असल्याने दरम्यानच्या काळात ज्युनिअर कॉलेजही या प्रवेशांच्या व्यवस्थापनावर सद्यस्थितीत जोर दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासातील सातत्य हेच माझ्या यशाचं गमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अभ्यासात सातत्य असलं की यश मिळतंच. याचं उदाहरण म्हणजे साक्षी ततार ही विद्यार्थिनी. सीडीओ मेरी शाळेत साक्षी ९५.८० टक्के गुणांनी दुसरी आली आहे. विषय समजून घेणे, अभ्यासातील सातत्य या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात सायन्स आणि मॅथ्स हे तिचे आवडते विषय होते. मॅथ्समध्ये १०० पैकी १०० तर सायन्समध्ये १०० पैकी ९३ गुण तिने मिळविले आहे. दिवसातून पाच ते सहा तास नियमित अभ्यास केल्याने हे यश मिळाले असल्याचे साक्षी सांगते. अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाचीही तिला आवड आहे. 'आयएएस' होण्याचं तिचं स्वप्न आहे. आपली गुणवत्ता देशाच्या कामासाठी उपयुक्त ठरावी, या उद्देशाने तिने हे ध्येय अंगी बाळगले आहे. त्यासाठी बारावीनंतर लगेचच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ती सुरू करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी शाळांची बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक न्याया विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नाशिक विभागातील सातही शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. चार जिल्ह्यांमध्ये चालविल्या जाणाऱ्या ७ शाळांमधून १११ निवासी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत यश मिळविले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सन २०१० पासून राज्यात १०० निवासी शाळा सुरू केल्या आहेत. यातील नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात ७ निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये प्रथमच दहावीच्या वर्गांना मान्यता देण्यात आली होती. या निवासी शाळेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती व आर्थीक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता ५ वी ते १० पर्यंत आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो. या निवासी शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवास, भोजन, पुस्तके आदी सुविधा मोफत देण्यात येतात.

नाशिक विभागातील सर्व निवासी शाळांमधील परीक्षेस बसलेले सर्व १११ विद्यार्थी पास झाले. सामाजिक न्याय विभागांतर्गत नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगांव आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्यात मुला-मुलींच्या १० शासकीय निवासी आश्रमशाळा कार्यरत आहेत. पैकी ७ निवासी शाळांमध्ये पहिल्यादांच इयत्ता दहावीचे वर्ग सुरू झाले.

येवला तालुक्यातील बाभूळगांव येथील सर्व २७ विद्यार्थी पास झाले. धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील सर्व १२ विद्यार्थी, साक्री तालुक्यातील भांडणे येथील सर्व ८ विद्यार्थीनी, नंदुरबार जिल्ह्यातील (‌ता. शहादा) मोहिदे येथील सर्व २१ विद्यार्थी पास झाले. होळतर्फे हवेली येथील सर्व १५ विद्यार्थिनी, अहमदनगर, कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील सर्व १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जामखेड तालुक्यातील आरोळेनगर येथील सर्व १३ विद्यार्थी पास झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images