न्यूयॉर्क येथील डॉ. जोसफ मॅकगिन हे असेच एक सृजनशील शल्यविशारद आहेत. २१ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी उरोस्थी न चिरता डाव्या बाजूच्या दोन बरगड्यांमधील जागा फाकवून बायपासची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत अनुभवी व कुशल शल्यविशारद आवश्यक असतो. ह्रदयापर्यंत पोहचण्यासाठी कमी जागा उपलब्ध असल्यामुळे विशेष उपकरणांचा वापर करावा लागतो. आजमितीस, जगात फारच थोडया ठिकाणी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. याला मिनिमली इन्व्हेसिव्ह करोनरी आर्टरी सर्जरी म्हणजे 'मिकास' असे संबोधले जाते. चौथ्या आणि पाचव्या बरगडीच्यामध्ये ५ ते ७ सेमींचा छेद घेतला जातो. रिट्रॅक्टरच्या सहाय्याने हा छेद फाकविला जातो. त्यामुळे ह्रदयाची दृष्यता वाढून शस्त्रक्रिया करणे सुलभ होते. सहाव्या आणि सातव्या बरगड्यांमध्ये विशेष उपकरणांसाठी एक छिद्र केले जाते. तसेच रक्ताचा निचरा होण्यासाठी उरोस्थीच्या खाली एक छिद्र केले जाते. मात्र विशारद जसाजसा अनुभवी होतो, तसा तसा या अतिरिक्त छिद्रांशिवायही शस्त्रक्रिया करू शकतो. रुग्णाचा रक्तदाब कमी करून क्रिया करू शकतो. रुग्णाचा रक्तदाब कमी करून तो १०० मिमि. मर्कयुरीवर स्थिर ठेवावा लागतो. त्यामुळे महारोहिणीवरचा ताण कमी होतो, तसेच रक्तस्त्रावही कमी होतो. पूर्वी ह्रदयाची स्पंदने औषधांद्वाता बंद करून ह्रदयस्थिर झाल्यानंतरच शस्त्रक्रिया केली जायची. या नवीन पध्दतीच्या शस्त्रक्रियेत मात्र ह्रदयाचा आवश्यक तेवढाच भाग स्थिर केला जातो. त्यासाठी स्टॅबिलायझर या उपकरणाची वापर केला जातो. ह्रदयाचा उर्वरित भाग आपले काम करत रहातो. त्यामुळेच याला बिटिंग हार्ट सर्जरी असे म्हणतात.
उरोस्थी न चिरता, छातीच्या पिंजऱ्याच्या डाव्या बाजूला छेद घेऊन ह्रदयरोहिणी शस्त्रक्रिया (बायपास सर्जरी), मायट्रल व्हॉल्व दुरूस्ती (झडप बदलणे), मायट्रल व्हॉल्व बदलणे (झडप बदलणे), एओर्टिक व्हॉल्व बदलणे, कर्णिकांमधील पडद्याचे छिद्र बंद करणे (एट्रियल सेपट्ल डिफेक्ट) या प्रकारच्या शस्त्रक्रिया पार पडतात.
मिश्र शस्त्रक्रिया : मिकासद्वारा डाव्या बाजूच्या प्रमुख रक्तवाहिनीस छातीच्या स्नायूंना पुरवठा करणारी रक्तवाहिनी जोडली जाते व इतर एक किंवा दोन ठिकाणी अँजियोप्लास्टी करून स्टेन्ट बसविण्यात येतो. यामुळे रूग्णाचे आर्युमान वाढते व मोठी शस्त्रक्रिया टाळता येते. सर्वसाधारण बायपासनंतर रूग्णाला सात दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागते. याउलट मिकास शस्त्रक्रियेनंतर रूग्णास चौथ्या दिवशी घरी पाठविले जाते. त्यामुळे रूग्णालयात होणाऱ्या जीवाणूसंसर्गाची शक्यता कमी होते. ऑपरेशननंतर दुसऱ्याच दिवशी रूग्ण चालू फिरू शकतो. याआधी त्याला ४ दिवस अंथरूणाला खिळवून रहावे लागत असे. कृत्रिम श्वास ऑपरेशन टेबलवरच थांबविला जातो. त्यामुळे फुफ्फुस लवकर सक्षम बनतात. दोन आठवडयात रूग्णाला आपली कामे सुरू करता येतात. उरोस्थी न चिरल्यामुळे, हालचालींवर मर्यादा येत नाहीत. बायपासच्या काही रूग्णांमध्ये हाड न जुळ्ल्यामुळे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मिकासमध्ये ही भीती नसते. शस्त्रक्रियेनंतर वेदनाही कमी होतात. या शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव कमी होतो. रूढ बायपास शस्त्रक्रियेत रक्त देण्याची गरज पडू शकते. मिकासमध्ये ही शक्यता कमी होते. आसीयू तसेच रूग्णालयात कमी दिवस रहावे लागल्यामुळे, तसेच इतर रूग्णांपेक्षा लवकर सुरूवात केल्यामुळे रूग्णाची मानसिकता सकारात्मक बनते. आजाराचे शस्त्रक्रियेचे दडपण कमी होते व नैराश्य येण्याची शक्यता कमी असते.
अनेक हॉस्पिटल्समध्ये मिकास शस्त्रक्रियेनंतर, त्याच्या निकालांशी रूढ बायपास ऑपरेशनशी तुलनात्मक शोध निबंध प्रसारीत झाले आहेत. त्यामध्ये असे आढळ्ले की, मिकास ही एक बायपास इतकीच परिणामकारक व फायदेशीर आहे. मात्र मिकासमध्ये रूढ बायपासपेक्षा फार कमी कॉम्प्लिकेशन होतात व रूग्ण लवकर बरा होतो व त्याच्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो.
श्री सार्इबाबा हार्ट इन्स्टिटयूट येथे शल्यविशारद डॉ. स्वप्निल कर्णे व भूलतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर खैरनार व त्यांच्या चमूने मिकास ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. नाशिकमध्ये ही शस्त्रक्रिया नियमित झाल्यामुळे अनेक रूग्णांना त्याचा लाभ होर्इल व ह्रदयशस्त्रक्रियेची भीती कमी होर्इल. स्त्रियांना दर्शनी भागात व्रण निर्माण होणार नसल्यामुळे त्यांना याचा फायदा अधिक आहे. सारांश काय तर ह्रदयशस्त्रक्रियेसाठी आता हनुमान होण्याची गरज नाही. उलटपक्षी मिकासचे फायदेच अधिक आहेत.
(लेखक प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट