Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विद्यापरिषदेच्या बैठकीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नर्सिंग अभ्यासक्रमाचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात आलेली स्वतंत्र ५० टक्के उत्तीर्ण पध्दती आता विद्यार्थ्यांच्या मागणीच्या रेट्यानंतर पुन्हा विद्यापरिषदेसमोर विचारार्थ ठेवण्यात येणार आहे. आता १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या विद्यापरिषदेत नर्सिंग अभ्यासक्रमाच्या परीक्षा पध्दतीतील घोळासंदर्भात हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिली.

विद्यापीठाकडून अचानकपणे परीक्षा पध्दत बदलण्यात आल्याचा मुद्दा मांडत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काही दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. या मुद्यावरून निवेदन, आंदोलन, घेराव पार पडल्यानंतर विद्यापीठाकडून समिती गठीत करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या समितीची बैठक विद्यापीठ कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीसाठी तत्सम विद्याशाखेच्या अधिष्ठाता हुतोक्क्षी रायटर यांच्या अध्यक्षतेखाली अर्जुन सोनटक्के, नरेंद्र कोलते, मीना गणपती, सुलभा पेडणेकर व नीता वाळोकर अधिकार मंडळ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती.

या बैठकीसाठी सर्व सदस्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र ५० टक्के उत्तीर्णतेच्या निकषाबाबत भारतीय परिचर्या परिषदेने नेमून दिलेला अभ्यासक्रम व विद्यापीठाचा अभ्यासक्रम याचे अवलोकन केले. यापूर्वीच्या परीक्षेत विद्यार्थ्याच्या निकालांतर्गत मूल्यमापनाचे ९० पेक्षा अधिक गुणदान काही महाविद्यालयांमार्फत करण्यात येत असल्याने काही विद्यार्थी विद्यापीठ प्रात्यक्षिक परीक्षा न देता उत्तीर्ण झाल्याचे विद्यापीठ अभ्यासमंडळ सदस्यांच्या लक्षात आले. यावर अभ्यासमंडळात चर्चा करून स्वतंत्र उत्तीर्ण शीर्षक असण्याबाबतचा निर्णय घेण्यात येऊन विद्यापरिषदेत सादर करण्यात आला असल्याचे समिती सदस्यांनी स्पष्ट केले.

याबाबत परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या बैठकीत बेसिक बी. एस्सी. नर्सिंग व पोस्ट बेसिक बी. एस्सी. अभ्यासक्रमांतर्गत विद्यापीठाव्दारे घेण्याऱ्या परीक्षेसंदर्भातील बदलांविषयी कॉलेजेसला सूचना केल्या होत्या. यानंतरही पूर्वीचा निकाल व नवीन नियमानुसार लागलेल्या निकालाच्या आकडेवारीत फारशी तफावत नाही. केवळ प्रथम वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्णांचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे.

दहा सप्टेंबरला निर्णय

सदर निर्णय विद्यापरिषदेच्या असल्यामुळे स्वतंत्र ५० टक्के उत्तीर्ण शीर्षकाबाबतचा निर्णय विद्यापरिषदेने घेणे आवश्यक असल्याने येत्या १० सप्टेंबर २०१५ रोजीच्या बैठकीत सादर करण्यात यावा, अशी शिफारस समिती सदस्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांच्या नावे बनावट आदेश

0
0

सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल; चौकशीला सुरुवात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सहीचा बनावट आदेश तयार करून होर्डिंग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उपायुक्त रोहिदास बहिरम आणि विविध कर संकलन विभाातील अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. मुंबईच्या प्लस मोअर अॅडव्हर्टायझिंग कंपनीच्या नावे हा आदेश तयार केला असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

महापालिकेच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तीन कंपन्यांना शहरात जाहिरात करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, मुंबईच्या प्लस अॅडव्हर्टायझिंग या कंपनीच्या नावे आयुक्तांच्या सहीचा आदेश तयार करून तो तीन वर्षासाठी संबंधित कंपनीला नाशिक शहराच्या हद्दीत जाहिरात करण्यास परवागनी देण्यात आल्याचा आशय त्यात आहे. सामाजिक उपक्रमांतर्गत व दुर्बल घटकांसाठी असलेल्या या योजनेतून हे काम देण्यात आले असून, आयुक्तांच्या सहीचे हे पत्र चक्क थेट विभागीय आयुक्तांच्या नावे लिहिण्यात आले आहे. त्यात सिंहस्थाचा एक महिना वगळता संबंधित कंपनीने थ्री व्हिलरवर जाहिरात करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

असा उघड झाला प्रकार

कंपनीचा प्रतिनिधी रवींद्र हिरे यांनी उपायुक्त रोहिदास बहिरम व विविध कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दाखवला. आयुक्त थेट विभागीय अधिकारी यांना कधीच आदेश देत नाहीत. आयुक्त उपायुक्तांना आदेश दिल्यानंतर उपायुक्त विभागीय अधिकाऱ्यांना पत्र देतात. त्यानंतर आदेशाची अंमलबजावणी होते. मात्र, या आदेशावर आयुक्तांची सही बनावट होती. विभागीय अधिकाऱ्यांना माननीय असा उल्लेख केला आहे. तीनच कंपन्यांना काम दिले होते. मात्र, ही चौथी कंपनी कशी आली यावरून अधिकारी बुचकाळ्यात पडले. संबंधित प्रतिनिधीला कार्यालयात थांबवून बहिरम यांनी थेट आयुक्तांना विचारणा केली. त्यावर आयुक्तांनी असा कोणताही आदेश दिला नसल्याचे सांगितल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

पदाधिकारी, कर्मचारी अडकणार?

महापालिका वर्तुळात फिरणाऱ्या एजटांच्या मदतीनेच हा बनावट आदेश तयार झाला असल्याची शक्यता आहे. महापालिकेचा पदाधिकारी किंवा कर्मचारी यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात पालिकेतील मोठा मासा यामागे अडकण्याची चर्चा असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित आदेश हा संशयास्पद असल्याचे पाहिल्यावर लक्षात आले. आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असा आदेश दिला नसल्याचे स्पष्ट झाले. बनावट सहीने हा आदेश तयार करण्यात आल्याने सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - रोहिदास बहिरम, उपायुक्त, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाज आजही मुलीला स्वीकारेना!

0
0

अजंग येथे नवजात अर्भक पुरले उकिरड्यात

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील अजंग गावात काही तासांपूर्वी जन्मलेल्या जिवंत अर्भकाला (मुलीला) उकिरड्यात पुरण्यात आले. मुलींना जन्म घेण्याचा हक्क आहे हे सत्य स्वीकारायला समाज आजही तयार नाही, हे या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

जन्माआधीच गर्भातच अशा कळ्या खुडून टाकण्याचे किंवा त्यांनी जन्म घेतला तरी त्यांचे जगणे असह्य करण्याच्या दुर्दैवी घटना आजही समाजात घडत आहेत. मालेगाव शहरापासून दहा ते पंधरा किमीवरील अजंग गावात अवघ्या काही तासापूर्वी जन्मलेल्या मुलीला गावाबाहेरच्या उकिरड्यात पुरण्याच्या निर्दयी घटनेने एकच खळबळ उडाली. तालुक्यातील अजंग या गावी सकाळी प्रातः विधीसाठी गावाबाहेर गावातील काही महिला गेल्या होत्या. तेव्हा जिजाबाई हरी दंडगव्हाळ या महिलेला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. भल्या पहाटे गावाच्या अशा आडवाटेवर बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने त्या महिलेला आश्चर्याचा धक्का बसला. रडण्याच्या आवाजाच्या दिशेने त्या महिलांनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी कुणाही संवेदनशील माणसाचे हृदय पिळवटून निघावे, अशा अवस्थेत त्या एकदिवसाच्या मुलीचे अर्भक उकिरड्यावरील खड्ड्यात पुरण्यात आल्याचे जिजाबाई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ तिला बाहेर काढले. दरम्यान, गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली.

जिजाबाई यांनीच त्या मुलीला अंघोळ घालून, दूध पाजून शांत केले. घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार मानकर त्या ठिकाणी आले आणि तत्काळ त्या चिमुरडीला उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.

मातृत्वाचे अनोखे दर्शन

अजंग गावात एकीकडे तिला जन्म देताच उकिरड्यावर फेकून देण्यात आल्याचा निर्दयी प्रकार घडला असला तरी त्याच गावातील जिजाबाई यांनी त्या एक दिवसाच्या चिमुरडीला आपल्या मातृत्वाच्या छायेत घेतले. उकिरड्यावर तिचा आवाज येताच त्यांनी तिला आपल्या पदरात घेत आपल्या मातृत्वाचे अनोखे दर्शन घडवीले. अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेली बाळ तशाही अवस्थेत जिवंत राहिले, याचे साऱ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीर्ण वंशावळीला तंत्रज्ञानाची संजीवनी

0
0

vinod.patil @timesgroup.com

नाशिक : माणसामाणसाच्या वंशावळीचा तपशील पिढ्यान् पिढ्या जीवापाड जपणाऱ्या पुरोहितांच्या नव्या पिढीने कात टाकत पारंपरिक जीर्ण वंशावळीला तंत्रज्ञानाचा परीसस्पर्श दिला आहे. तंत्रज्ञानाची नवसंजीवनी लाभलेली ही वंशावळ आता भाविकांच्या सेवेत एका क्लीकवर पिढ्यान् पिढ्याची माहिती क्षणार्धात हजर करणार आहे. रामकुंडावरील पुरोहितांकडे आता वंशावळीच्या गठ्ठयाऐवजी लॅपटॉप दिसणार आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यातून रामकुंडावर येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांच्या पूर्वजांचा संपूर्ण इतिहास त्यांचं नाव, तारीख आणि वारासोबत इथल्या पुरोहितांनी वंशावळींच्या रुपाने जपून ठेवलेला आहे. नाशिकच्या हायटेक गुरुजींनी मात्र या वंशावळींना सॉफ्टवेअरच्या मदतीने डिजिटायजेशन केलं आहे. बदलत्या काळानुरुप पुरोहितांची जनरेशन नेक्स्टही आता हायटेक झाली आहे. रामकुंडावर पौराहित्य करणाऱ्या महेंद्र पाराशेरे यांनी यात पुढाकार घेतला आहे.

वंशावळी म्हणजे हजारो वर्षांपासून रामकुंडावर कोण येत, कोण पूजाविधी करतं, त्यांच पूर्ण नाव, त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीचं नाव, त्यांचं गोत्र, त्यांचं हस्ताक्षर अथवा अंगठा याचा संपूर्ण हस्तलिखीत असा डेटा वंशावळीत साठवलेला असायचा. आता भाविकाचं नाव, गोत्र एंटर केलं की त्याच्या आठ पिढ्यांमध्ये कोण कोण रामकुंडावर आल होतं, त्यांनी इथं काय विधी केला होता, त्यांचं पौरोहित्य कोणी केलं होतं, कोण कोण उपस्थित होत, याची माहिती देणारे पेजच स्क्रिनवर दिसते.

अमूल्य ठेवा जपणार

पूर्वी वापरल्या जाणाऱ्या वंशावळी आकाराने मोठ्या आणि सांभाळायला अवघड असायच्या. मात्र, हा अमूल्य ठेवा आणि हजारो वर्षांची परंपरा पाण्यात जावू नये यासाठी झपाटलेल्या पाराशेरे यांनी स्वखर्चातून सॉफ्टवेअर तयार केले आहे. संपूर्ण देशात वंशावळी सॉफ्टवेअर बनवणारे ते एकटेच आहेत. त्यांच्या कामाची नोंद पुरोहित संघाने घेतली आहे. आता सर्व वंशावळींना हायटेक रूप दिले जाणार आहे. पाराशेरे यांनी केलेल्या या कामामुळे धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातली नवी पिढी तंत्रज्ञानाचा वापर करून जगाच्या स्पर्धेत मागे नाही, हे दाखवून देण्यात यशस्वी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीव्ही में देखते थे, अब दर्शन हुए...!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आपको ट‌ीव्ही में देखते हे, आपको मिलने की बहुत इच्छा थी. आज आपके साक्षात दर्शन हुए' हे उद् गार कुण्या नेत्याचे साधू-महंताबाबतीत नसून, साधुग्रामधील महंताचे राज ठाकरेंच्या बाबतीतले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेल्या ठाकरेंनी बुधवारी साधू-महंताचा आशीर्वाद घेण्यासाठी साधुग्रामला भेटी दिली. मात्र यावेळी त्यांनाच साधू-महंतानी आश्चर्याचा धक्का दिला. साधू-महंताच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या ठाकरेंच्या दर्शनाची ओढ महंतामध्ये दिसून आली. निर्वाणी आखाड्याचे महंत धरमदास यांनी तर आपले दर्शन झाल्याचे सांगून ठाकरे घराण्याची महती विशद केल्याने उपस्थितही आवाक झाले.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी दुसरा दिवस हा धार्मिक पुजा विधीत व साधुग्राममधील साधू-महंतासोबत घालवला. निर्वाणी आखाड्यात जाऊन धरमदास महाराजांची भेट घेतली. धरमदास यांनी उभे राहून ठाकरेंचे स्वागत केले. 'आपको टीव्ही में देखते है, आपको मिलने की बहुत इच्छा थी, आज आपके साक्षात दर्शन हुये, ठाकरे परिवार बडा परिवार है' असे सांगत, ठाकरेंचीच स्तुती केली.

घडले महाराष्ट्र दर्शन

'महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याच महाराष्ट्रात कुंभमेळ्याच्या निमित्ताने आलेल्या साधुमहंतांच्या दर्शनाने कृतकृत्य झालो, कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर अनेक साधू संत आले असल्याने महाराष्ट्र दर्शन झाले.' असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले.

राज ठाकरे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने बुधवारी साधुग्रामचा दौरा केला. यावेळी महापालिकेतर्फे देण्यात येत असेल्या सुविधांची पहाणी करुन साधु महंताशी चर्चा केली. त्यांच्या समावेत पत्नी शर्मिला ठाकरे याही उपस्थित होत्या.

राज ठाकरे हे ध्वजारोहणाला येतील अशी पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती मात्र या दिवशी न आल्याने कार्यकर्त्यांचा भ्रमनिरस झाला. सिंहस्थ कुंभमेळा मध्यावर आला असताना बुधवारी त्यांचे सपत्नीक नाशकात आगमन झाले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत साधुग्राममधील साधू महंताशी चर्चा करुन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्या आधी त्यांनी वणी येथील सप्तऋंगी देवीच्या दर्शन घेतले. साधुग्राममध्ये येताच त्यांनी अखिल भारतीय वारकरी संप्रदाय कुंभमेळा परिषदेच्या खालशाला भेट दिली. खालशात आगमन होताच प. पू. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनंतर आखाडी परिषदेचे महामंडलेश्वर काशीनाथदासजी महाराज यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रतील संत महात्म्याना भेटून आनंद झाला. एकाच व्यासपीठावर महाराष्ट्र दर्शन घडले. वारकरी सांप्रदायाची परंपरा मोठी असून, तीचे जतन करण्याचे काम महाराष्ट्रातील संत मंडळी करीत आहे. यावेळी राज ठाकरे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यानंतर शर्मिला ठाकरे यांचा देखील सत्कार करण्यात आला. तेथून ते निर्वाणी आखाड्यात जाऊन त्यांनी धर्म चरणदास यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लगेचच रवाना झाले.

यावेळी वारकरी सांप्रदायाचे महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर, महामंडलेश्वर अमृतदास जोशी महाराज, महामंडलेश्वर काशीनाथ दास महाराज, महामंडलेश्वर अनंतदास बोरसे महाराज, महामंडलेश्वर ईश्वरदास चर्हाटे महाराज, उपस्थित होते. आम्ही हरिभक्त परायण असलो तरी राज ठाकरे ही देशभक्ती परायण आहेत असे काशिनाथ दास महाराज म्हणाले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह मनमसेचे अनेक कार्यकर्ते अपस्थित होते.

ग्यानदासांकडे फिरवली पाठ

सिंहस्थ कुंभमेळ्यात वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे स्वयंघोषीत अध्यक्ष महंत ग्यानदास यांची भेट ठाकरेंनी टाळली. अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादामुळे त्यांच्यापासून सर्वच जण अंतर ठेवत आहेत. विहीपनेही ग्यानदासांवरील हात काढून घेतला आहे. त्यामुळे साधुग्रामच्या पाहणी दौऱ्यात ठाकरेंनी ग्यानंदासाना भेटणे टाळले. कोणाताही वाद नको म्हणून ते दोन हात दूर राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांची वाचन चळवळ

0
0

नाशिक टाइम्स टीम

उपनगर येथील 'इच्छामणी जेष्ठ नागरिक संघा'तर्फे 'ग्रंथ तुमच्या दारी' या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या योजनेअंतर्गत असलेल्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नाट्यकर्मी सदानंद जोशी यांच्या हस्ते या ग्रंथपेटीचे उदघाटन करण्यात आले.

वाचन संस्कृती लयाला चालली आहे असे अपण नेहमी ऐकत असतो. पण त्यसाठी सर्वच थरातून प्रयत्न होताना दिसत नाहीत. आजची तरुणाई मोबाइल, इंटरनेट, अशा गोष्टीमध्ये अडकत चालली असल्याचे दिसून येते. आपल्या मातृभाषेतील पुस्तके वाचण्याचा ओढा कमी होत चाललेला दिसतो आहे. म्हणूनच या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याची माहिती या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत देण्यात आली.

यावेळी ग्रंथापेटीचे जनक विनायक रानडे तसेच कैलास पाटील व सचिन शिंदे उपस्थित होते. हे वाचनालय सर्वच वाचकांसाठी मोफत असून यासाठी उपनगरमाधील वाचकांनी वाचनालयामध्ये अनिल सोमण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि वाचन चळवळीत सहभागी व्हावे असे कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग्य आहारातून पळवा आजार

0
0

नाशिक टाइम्स टीम

'महाराष्ट्र टाइम्स' व 'रिवायवल हेल्थ सेंटर' यांच्या संयुक्त विद्यमाने 'दुर्धर रोगांना टाळा-औषधांविना : केवळ योग्य आहाराच्या मदतीने' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (५ सप्टेंबर) गंगापूररोड येथील 'कुसुमाग्रज स्मारका'त सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. आहारतज्ज्ञ संगीता पत्की यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

आहाराचे महत्त्व जाणून न घेता आजची पिढी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. यामुळेच ब्लडप्रेशर, ह्रदयाचे विकार, लठ्ठपणा यासारख्या आजारांचे प्रमाण लहान वयातच त्यांच्यात वाढलेले दिसते. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार नेहमीच उपयुक्त ठरत असतो. मात्र त्यावर योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. हे मार्गदर्शन मिळत नसल्यानेच चुकीच्या आहाराचे सेवन केले जाते.

याबाबत मार्गदर्शन करण्यासाठीच या व्याख्यानानाचे आयोजन करण्यात आले आहे. आहाराच्या योग्य नियोजनामुळे कोणत्याही औषधांविना अनेक रोगांवर मात करता येते. आतापर्यंत अनेकांनी लठ्ठपणा, डायबिटीस, किडनीचे आजार, हृदयरोग, वंध्यत्व यावर योग्य आहारातून मात केली आहे. त्यांचे अनुभव प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून ऐकण्याची व खात्री करुन घेण्याची संधी या व्याख्यानामध्ये मिळणार आहे.

तसेच आरोग्यविषयक नवनवीन संशोधने, रेसिपी, दुर्धर आजारांवर मात करण्यास उपयोगी ठरलेली नविन उत्पादने, डाएट पाळताना येणाऱ्या अडचणी, डाएटविषयक शास्त्रशुद्ध माहिती यावेळी देण्यात येणार आहे. आरोग्य व आहार यावरील शंकांचे निराकरण यावेळी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपल्या ध्येयाकडे यशस्वीरित्या वाटचाल करणाऱ्या व्यक्तींचे मनोगतही ऐकण्याची संधी यावेळी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेववाडीत वसतेय अनधिकृत झोपडपट्टी

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागातील महादेववाडीत अनधिकृत झोपडपट्टी बसविली जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेत सत्ता असलेल्या मनसेच्याच एका कार्यकर्त्याकडून या झोपडपट्टीचा दिवसेंदिवस विस्तार केला जात आहे. त्याला स्थानिक नगरसेवक व माजी आमदाराचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. मात्र, महापालिकेचे पदाधिकारी या झोपडपट्टीवर कारवाई करण्याऐवजी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात गुंतल्याने सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'मराठी माणूस' हा मुद्दा पुढे करीत महापालिकेत सत्ता पटकाविणाऱ्या मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्याने झोपडपट्टी बसविली तर त्याला पक्षातून तत्काळ बाहेर काढले जाईल असे जाहीर केले होते. मात्र, सातपूर भागात महादेववाडीत मनसेच्याच पदाधिकाऱ्याने नगरसेवकास हाताशी घेत झोपडपट्टी वसविली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या जागेवरच ही झोपडपट्टी वसविण्यात आली असून सार्वजनिक शौचालयाचा ताबा स्थानिक गुंडांनी घेतला आहे. सत्ताधारी पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीच्या अतिक्रमाणावर कारवाई करणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

झोपडपट्टीला सुविधांच्या पायघड्या

महादेववाडीला माजी आमदार आणि स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने महापालिकेकडून पाण्याचे कनेक्शन, ड्रेनेजची लाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या जागेवर होत असलेल्या झोपडपट्टीच्या अतिक्रमणाबाबत कधी कारवाई केली जाणार? सातपूरमधील कामगारवर्ग महापालिकेचे सर्व कर भरतात. यामध्ये वेळेवर महापालिकेचे कर न भरल्यास दडांत्मक किंवा जप्तीची कारवाई होते. परंतु, महापालिकेच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टीवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

झोपड्यांची परप्रांतियांना विक्री

झोपडपट्टी वसवितांना मनसेच्या कार्यकर्त्याने आपल्या मालकीची जागा असल्याचे भासवित झोपड्यांची विक्री केली आहे. यात महाराष्ट्रादसह परराज्यातून आलेल्या गरजू व कष्टकरी लोकांकडून पैसे घेत त्याने झोपड्या विकल्या आहेत. तसेच संबंधित कार्यकर्ता स्थानिकांकडून विविध सणांसाठी वर्गणी देखील गोळा करत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे.

महापालिकेच्या जागेवर कुणी अनधिकृतपणे झोपडपट्टी बसविली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. याबाबत लवकरच विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले जातील. - आर. एम. बहिरम, अतिक्रमण निर्मूलन उपायुक्त, महापालिका

महादेववाडी भागात अनधिकृत झोपटपट्टी बसवण्यात आली आहे. याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. वरिष्ठांच्या आदेशावरून माहिती मिळाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल. - महेंद्रकुमार पगारे, विभागीय अधिकारी, सातपूर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साधुग्राममधील सेक्टर दोन भरलेच नाही

0
0

रिकाम्या जागांवर भटक्यांचा ताबा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याचे पडघम वाजल्यापासून पहिल्या शाही स्नानापर्यंत साधू महंत आणि प्रशासनात जागेच्या उपलब्धतेवरून वादविवाद सुरू होते. ३३५ एकर जागाही कमी पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. प्रत्यक्षात, साधुग्राममधील सेक्टर दोन एफमधील काही एकर जागेवर कोणतेही खालसे अथवा धार्मिक संस्था आल्या नसून प्रशासनाने उभारलेल्या सोयी सुविधांचा भटके-भाविक फायदा घेत आहेत.

साधुग्राममध्ये जून महिन्याच्या अखेरीस जागा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी जागेची उपलब्धता हा कळीचा मुद्दा ठरला. सुमारे ७५० खालसे असून त्यांना जागा मिळाली पाहिजे, असा आग्रह साधू महंतांनी धरला. तर, उपलब्ध आहे त्या जागेतच 'अॅटजेस्ट' करा असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला. रामसृष्टीतील २५ खालशांना औरंगाबादरोडवरील मोकळ्या जागेत हलवण्यात आले. तर काहींना धार्मिक संस्थांमध्ये जागा देण्यात आली. तरीही जागेची ओरड होत राहिली. कालातंराने हा वाद शांत होत गेला. गुरूपौर्णिमेनंतर साधूग्राम पूर्ण भरेल, असा विश्वास सुरुवातीस साधू महंत व्यक्त करीत होते. नंतर हेच कारण पहिल्या शाहीस्नानापर्यंत पोहचले. शाहीस्नान आटोपून आता पाच दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून अद्यापही साधूग्राममधील सेक्टर दोन एफचा बहुतांश भाग रिकामा असल्याचे दिसते. याबाबत, आजुबाजूच्या महंतांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. प्रशासनाने लाखो रुपये खर्चून या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यावर आता भटक्या नागरिकांनी कब्जा केला असून जागा उपलब्ध नसल्यावरून साधू-महंत आणि प्रशासनात निर्माण झालेला वाद निरर्थक होता, हेही स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये मंदीचे वातावरण

0
0

झालेला खर्च वसूल होण्याचे वांधे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहिल्या शाही पर्वणी दरम्यान भाविकांनी पाठ फिरवली. हेच चित्र अजूनही कायम असून लाखो रुपयांचा खर्च करून बसलेल्या साधू महंतांची चिंता यामुळे वाढली आहे. अतंर्गत भागातील खालशांपर्यंत दिवसभरात एखाद दुसरे भाविक पोहचतात. याचा आर्थिक फटका महंताना बसत असून साधुग्राममधील मंदीच्या वातावरणासाठी प्रशासनाचे कठोर नियोजन कारणीभूत असल्याचा दावा केला जातो आहे.

सिंहस्थादरम्यान येणाऱ्या साधू महंत आणि भाविकांच्या संख्येमुळे नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता होती. काही नावाजलेल्या संस्थांनी हा आकडा १० हजार कोटींपर्यंत असेल, असे भाकित वर्तवले होते. प्रत्यक्षात, भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावली. आजमितीस दिवसभरात काही हजार भाविक साधुग्राममध्ये दाखल होत असल्याचे दिसते. त्यातील बहुतांश भाविक तपोवनातील मुख्य रस्त्यावरील आखाडे आणि खालशांना भेट देतात. यानंतर, थोडीफार गर्दी तपोवनात होती. साधुग्रामचा परिसर मोठा असून बहुतांश खालशांपर्यंत भाविक पोहचत सुध्दा नाही. याबाबत सिंहस्थाचे व्यवस्थापक विश्वभंरदास महाराज यांनी सांगितले, की प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे भाविकांना सहज काहीच राहिलेले नाही. प्रत्येक पावलावर त्रास होतो. आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे भाविक साधुग्रामसह नाशिकला टाळू लागले आहेत. याचा फटका अनेक महंतांना बसतो आहे. एका खालशांला आपल्या मूळ ठिकाणापासून नाशिकला येणे, तिथे तंबू लावणे, दैनंदिन कामे यासाठी लाखो रुपये लागतात. हे पैसे शेवटी भाविकच देतात. त्याच भाविकांनी सध्या कुंभमेळ्याकडे पाठ फिरवली असून यामुळे साधू महंतांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. ज्यांची संस्था मोठी त्यांना तितकासा फरक पडत नाही. मात्र, छोटी आर्थिक उलाढाल असलेल्या संस्था यामुळे अडचणीत सापडल्या आहेत. पहिल्या शाही पर्वणीच्या दिवशी मुंबईहून रेल्वेने आलेले सुमारे २०० भाविक रेल्वे स्टेशनवरूनच परतले. थकून भागून आलेल्या भाविकांना पायपीट करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे विश्वभंरदास महाराजांनी स्पष्ट केले. दरम्यान, षडदर्शन साधू मंडळाचे सचिव नृसिंह दास यांनी सुध्दा अशीच भूमिका घेतली. फसलेले नियोजन, पायपीट आणि पाऊस यांचा एकत्रित परिणाम सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर झाला असल्याचा दावा नृसिंहदास यांनी केला.

इतरही व्यावसायिक अडचणीत

साधुग्राममध्ये साधूसमवेत इतर व्यावसायिक सुध्दा अडचणीत आले आहेत. साधुग्राममध्ये दररोज लाखो भाविक येतील, या आशेवर व्यावसायिकांनी लाखो रुपयांचा माल घेऊन ठेवला आहे. प्रत्यक्षात दररोजचा खर्चही भागत नसून आता सर्वांचे लक्ष दुसऱ्या पर्वणीकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेची टांगती तलवार

0
0

गर्दी वाढल्यास स्थिती कायम राहण्याची शक्यता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पहिल्या पर्वणीत नियोजनात अपयशी ठरलेल्या प्रशासनाने परिस्थिती सावरण्यासाठी आपला बी प्लॅन लोकप्रतिनिधीं समोर सादर केला असला तरी गर्दी वाढल्यास पहिलाच प्लॅन कायम राहणार असल्याचेही सूतोवाच केले आहे. त्यामुळे पूर्वीची परिस्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त केले जात असून सुरक्षेसाठी पहिला प्लॅन राबविला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. तर दुसरीकडे या बैठकीत पोलीसांच्या अतिरेकाच्या सुरस कहाण्या लोकप्रतिनिधींनी सांगितल्याने पालकमंत्रीही आश्चर्यचकीत झाले आहेत. आपल्या मतदारसंघात कुंभमेळा असतांनाही, आपल्यालाच प्रवेश दिला नसल्याचा धक्कादायक खुलासा आमदार निर्मला गावित यांनी केल्यानंतर पालकमंत्र्यांनाच धक्का बसला.

सिंहस्थाच्या फेरनियोजनाच्या बैठकीत लोकप्रतिनीधींनी आपल्या सूचना मांडता मांडता आपली आपबीतीही कथन केली. पोलिसांच्या अतिरेका फटका भाविकांनाच नव्हे तर, माध्यमे, लोकप्रतिनिधींनाही बसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा असतांनाही स्थानिक आमदार निर्मला गावित यांनाच त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहचू दिले नसल्याची आपबीती त्यांनी सांगितली. रस्त्यावर पोलीसांनी अडवल्यानंतर अधिकाऱ्यांना विनवण्या केल्यात. मी आमदार असूनही पोलिसांनी मला जावू दिले नाही. अखेर मी त्र्यंबकला न जाताच परत फिरल्याचे त्यांनी सांगितले. या कथनावर पालकमंत्र्यांना विश्वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी थेट पोलिस अधीक्षकांनाच विचारणा केल्यावर असे घडल्याचे समोर आले. त्यामुळे पालकमंत्रीही संतप्त होवून त्यांनी पोलिसांचीच कानउघाडणी केली. लोकप्रतिनिधीनाही पासेस द्या अशा सूचना त्यांनी केल्या.

या बैठकीत विभागीय आयुक्तांनी फेरनियोजन सादर करतांना भाविकांना थेट गावात आणणार असल्याचे नियोजन सादर केले. मात्र, गर्दी वाढल्यास पूर्वीच्याच पद्धतीने होल्ड अॅण्ड रिलीज सह पार्किंगपासून नागरिकांना पायपीट करावी लागेल असे स्पष्टीकरण दिले. फक्त गर्दी कमी असल्याच शहरात बसने प्रवेश दिला जाईल, असे सांगितल्याने पूर्वीची सुरक्षाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा वादविवादसह स्थिती कायम राहण्याची टांगती तलवार राहणार आहे.

पालकमंत्र्यांची टोलेबाजी

फेरनियोजनाच्या बैठकीत अंतर्गत कुजबूज करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधीनांही चांगलेच फटकारले. बैठक सुरू असतांनाच, या महिला लोकप्रतिनिधी आपआपसात चर्चा कर होत्या. त्यामुळे बैठकीत व्यत्यत येत होता. दोन तीन वेळा सागूंनही या महिला आमदारांसह इतर महिलांना दुर्लक्षित केले. त्यामुळे महाजना यांनी महिला एकत्रित आल्यानंतर अशी कुजबूज होत असल्याने पुढील बैठकीत सर्व महिलांना स्वतंत्र बसवा असे विनोदी फर्मान सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रीं’च्या मूर्ती महागल्या

0
0

किमतीत दहा टक्क्यांची वाढ; कच्च्या मालाची तीव्र टंचाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणरायाच्या आगमनाचे भक्तांना वेध लागले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट असून, डिझेल दरवाढ व कच्च्या मालाचे भाव वाढल्याने श्रीच्या मूर्तींच्या किमती सुमारे १० टक्क्याने महाग असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे. कच्च्या मालाचा तुटवडा व कारागिरांची टंचाई अशा दिव्यातून हा व्यवसाय मार्गक्रमण करीत आहे.

गणपती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्यामालात सातत्याने भाववाढ होत असल्याने यंदा श्रींच्या मूर्तींच्या किमतीत १० टक्के वाढ होणार आहे. प्रमुख्याने मूर्तीसाठी प्लास्टर व शाडूमातीचा वापर करण्यात येतो. परंतु, बाजारात शाडू माती नसल्याने अनेक मूर्तीकारांना ती जादा दराने विकत घ्यावी लागत आहे.

गणपती तयार करण्यासाठी लिक्वीड रबर साच्यांचा उपयोग केला जातो. प्रथम एक मूर्ती तयार करून त्या मूर्तीवर लिक्विड रबराच्या साह्याने मोल्ड तयार करण्यात येतो. या मोल्डसाठी लागणारे लिक्वीड रबर महाग झाले आहे. मागील वर्षी ७० ते ८० रुपये लिटर भाव असलेले रबर यंदा १८० रुपये लिटरने विकले जात आहे. तसेच प्लास्टरचा भाव ३५ किलोच्या गोणीसाठी ९० रुपये होता. त्यात वाढ होऊन १५० रुपये गोणी झाली आहे. तसेच रंगकामापूर्वी वापरला जाणारे इमल्शन २० लिटरच्या डब्ब्याला नऊशे रुपये भावावरून चौदाशे रुपये झाला आहे. तसेच रंगकामासाठी लागणाऱ्या एअर कॉम्प्रेसरची गन व रंग महाग झाले आहेत. तसेच ब्रशच्या किमतीतही ५० टक्क्यांनी वाढ झाली असून ४ ते ५ रुपयांना मिळणारा ब्रश ३५ ते ४० रुपयांना झाला आहे. गोल्डन पावडर हजार रुपये किलोवरून चौदाशे रुपये किलो झाली आहे. तसेच विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने जनरेटरची सोय करावी लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल लागत असून त्यामुळे किमतीत वाढ होत आहे.

कारागीरांचा तुटवडा

नाशिकमधील गणेशमूर्तींना चांगली मागणी असते. सुमारे १० इंच ते सात फुटांपर्यंतच्या मनमोहक मूर्ती ६० रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत किमतीत उपलब्ध होतात. मात्र, महागाईबरोबरच कारागिरांची कमतरता हे संकट मूर्तिकारांसमोर आहे. अनेक कारागिरांनी स्वत:च छोटे-मोठे कारखाने सुरू केले आहेत, तर काहींनी अन्य व्यवसाय स्वीकारले. राज्यभरातून गणेशमूर्तीची मागणी वाढत असून पुरेसे कारागीर नसल्याने बाहेरील शहरांतून होणारी मागणी पूर्ण कशी करावी? असा प्रश्न मूर्तिकारांना भेडसावत आहे. कारागिरांना वर्षभर रोजगार नसल्याने अनेक कारागिर दुसऱ्या व्यवसायाकडे वळत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून भावात सातत्याने वाढ होत आहे. आमच्याकडील ग्राहक वर्षांनुवर्षे आमच्याकडे येत असल्याने सध्या ७५ टक्के मूर्तींची बुकिंग झाले आहे. - भूषण विसपुते, मूर्तीकार, देवळालीगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रँडिंगमध्ये उज्जैनची बाजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैश्विक सोहळा असलेल्या कुंभमेळ्यासाठी अधिकाधिक भाविकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारकडून सुरू आहे. साधुग्राममध्ये मध्य प्रदेश सरकारने स्वतंत्र स्टॉल उभारला असून त्याद्वारे पुढील वर्षी आयो‌जित होणाऱ्या कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले जाते आहे. याउलट नाशिकची परिस्थिती असून ब्रँडिंगमध्ये महाराष्ट्र सरकार पिछाडीवर पडले आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या उज्जैनच्या कुंभमेळ्याचे शंभर देशांत शंभर प्रतिनिधींद्वारे ब्रँडिंग करण्यात येते आहे. देशांतर्गत ब्रँडिंगसाठी मध्य प्रदेश सरकारने स्वतंत्र पथक तयार केले असून ते वेगवेगळ्या शहरांना भेटी देऊन कुंभमेळ्याचे आमंत्रण देत आहेत. साधुग्राममध्ये मध्य प्रदेश सरकारने उज्जैन कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करण्यासाठी एका स्टॉल उभा केला असून त्यात उज्जैन कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पर्यटनाच्या दृष्टीने मध्य प्रदेश यांची माहिती दिली जाते आहे. कुंभमेळ्यातील गर्दी हा निकष पाहून भाविक कुंभमेळ्याला आले नाही तरी त्यांना पर्यटनांच्या दृष्टीने या स्टॉलमध्ये माहिती पुरविण्यात आली आहे. आज ना उद्या मध्य प्रदेशात येताना महाराष्ट्रातील पर्यटकांना त्याचा फायदा होईलच, असा दावा या स्टॉलवर थांबलेल्या एका कर्मचाऱ्याने केला. सध्या महाराष्ट्रच नव्हे तर वेगवेगळ्या प्रातांतील भाविक पर्यटक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतात, असेही या कर्मचाऱ्याने सांगितले. मध्य प्रदेश त्यांच्या राज्यात होणाऱ्या कुंभमेळ्याची जोरदार ब्रँडिंग करीत असल्याचे चित्र दिसते. उज्जैनच्या धर्तीवर नाशिकच्याही कुंभमेळ्याचे ब्रँडिंग जगभर करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह शासनाला प्रस्ताव पाठविणार होते. मात्र, त्यास अंतिम स्वरूप मिळालेच नाही.



महाराष्ट्र सरकारला उशिरा जाग

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या ९ दिवस आगोदर महाराष्ट्र सरकारने ब्रँडिंगसाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला. इतक्या कमी कालावधीत मिळालेल्या पैशांच्या जोरावर काय ब्रँडिंग करायचे असा प्रश्न उपस्थित झाला असून टेक्नोसेव्ही मानले जाणारे प्रशासन ब्रँडिंगच्या कामात मात्र पिछाडीवर असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघनखांची खुले आम विक्री

0
0

वनविभागाला मागमूसही नाही

bhavesh.brahmankar @timesgroup.com

नाशिक : राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाची संख्या धोक्यात आली असल्याने चिंतेचे वातावरण असले तरी वाघनखांची मात्र साधुग्राममध्ये खुलेआम विक्री होत आहे. विशेष म्हणजे, हजारो रुपये किंमतीची वाघ नघे हवी तेवढी पुरविण्याचा दावा विक्रेते करीत असल्याने या साऱ्या प्रकारातून वनविभागासमोर मोठे आव्हानच उभे झाले आहे.

सिंहस्थाच्या निमित्ताने वैविध्यपूर्ण आध्यात्मिक वस्तू आणि साधनांची साधुग्राममध्ये प्रचंड विक्री होत आहे. साधुग्राममध्ये रस्त्याच्या दुतर्फा विक्रीस असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्यांमध्ये बंदी असलेल्या वस्तूंचीही मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या बाजारात सध्या वाघनखांच्या खरेदी-विक्रीनेही सध्या जोर पकडला आहे.

मार्जार कुळातील प्राणी असलेला वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघ धोक्यात आल्याने विविध पातळ्यांवर वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनावर पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळेच वाघांच्या शिकारीवर तसेच वाघाच्या अवयवांच्या खरेदी-विक्रीवरही बंदी आहे. हे सारे असतानाही साधुग्राममध्ये वाघनखे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अमराठी विक्रेत्यांकडून साधुग्रामच्या रस्त्यांवर ग्राहकांना आकर्षित करून विक्रेते वाघ नखांचे मार्केटिंग करीत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात वाघ नखांना प्रचंड मागणी असल्याने या साऱ्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

किंमत हजारो रुपये

साधुग्राममध्ये विक्रीस असलेल्या वाघाच्या एका नखाची किंमत किमान पाच हजार रुपये आहे. वाघ नखांची जोडी घेतली त्याची किंमत दहा हजार रुपये. त्यातही काही विक्रेते तर २० हजार रुपयांनाही नखांची जोडी विक्री करीत आहेत.

काय सांगतो विक्रेता?

'शेर के नाखून लोगे तो तुम्हारा शरीर शेर के जैसे होगा। मनभी शेर के जैसे होगा। धीरे धीरे तुम्हारी आँखे नही तो तुम्हारी द्रिष्टी भी शेर की जैसे होगी। सबसे बडा मौका आया हे जल्दी से लेलो। शेर के नाखून

कभी मिलते नही, असे सांगून वाघांच्या नखांची विक्री केली जात आहे.

मार्केटिंगची पद्धत

साधुग्राममध्ये आलेल्या साधू, महंतांचे फलक ठिकठिकाणी लागले आहेत. त्यातील एका साधू महाराजांच्या डोक्यावर वाघनखे असल्याचे पोस्टर साधुग्राममध्ये बहुतांश ठिकाणी आहेत. याचाच आधार घेत विक्रेते 'वो देखो साधू महाराज जिस के सिर पर नाखून. आप भी पहनो तो तुम्हारा भी भविष्य उज्ज्वल होगा' ग्राहकांना वाघनखांच्या खरेदीसाठी गळ घालत आहेत.

वनविभाग अंधारातच

वाघनखांची दिवसाढवळ्या विक्री होत असली तरी वनविभाग मात्र अंधारातच आहे. ही वाघनखे कुठून येतात, यात मोठे रॅकेट आहे का, असे सारे प्रश्न असल्याने वनविभागाने वाघनखांच्या विक्रेत्यांना तातडीने ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्या जोरावरच वाघ नखे विक्रीची मोठी साखळी गवसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियाच्या मदतीने शेती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या तरुणांचा सर्वाधिक वेळ 'सोशल मीडिया'च्या वापरामध्ये जात असल्याची ओरड सुरू आहे. मात्र, त्याच 'सोशल मीडिया'चा योग्य वापर करून निफाड तालुक्यातील ज्ञानेश्वर बोरस्ते या तरुणानी द्राक्ष शेतीमध्ये लौकिक मिळवला आहे.

उच्चशिक्षित असलेल्या या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता पारंपारिक शेतीचे द्राक्ष बागेत रुपांतर केले. उत्तम गुणवत्ता आणि चमकदार द्राक्षाचे एकरी २५ टनापर्यंत विक्रमी उत्पादन घेऊन रशिया, युके आणि नेदरलँडपर्यंत पोहचवले. शेतीपासून दूर जाणाऱ्या तरुणासाठी ज्ञानेश्वरचे शेतीमधले 'करिअर' प्रेरणादायी ठरले आहे. द्राक्षाच्या उत्पादनासाठी काही अडचण आल्यास फेसबुकवर अडचण टाकून आपल्या मित्रांकडून त्याने सल्ले घेतले होते.

नैसर्गिक संकटाला तोंड देत उत्तम दर्जाचे उत्पादन घेतल्यानंतरही बाजारात योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी शेतीपासून दूर जात आहे. वडिलोपार्जित कितीही शेती असली तरीही शेतकऱ्यांची मुले नोकरीलाच पहिली पसंती देतात. मात्र, निफाड तालुक्यातील साकोरेच्या ज्ञानेश्वर बोरस्ते या ३० वर्षाच्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्धार केला. वडिलोपार्जित ६ एकर शेतीमध्ये द्राक्ष शेती करण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक शेतीला आधुनिकता आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन कमी खर्चात उत्तम शेती करण्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून तंत्र आत्मसात केले. पाण्याच्या कमी वापरासाठी शास्त्रोक्त ठिबक पद्धती शेतीमध्ये अमलात आणली. जमीन कसदार राहावी यासाठी सेंद्रीय आणि गांडूळ खताबरोबर शेण खताचा अवलंब केला.

फुलोरा, द्राक्ष वाढीच्या काळामध्ये बुरशी आणि आळी नियंत्रणासाठी ड्यूपॉन्ट कर्झेटचा वापर केला. द्राक्षांच्या आकारापेक्षा गुणवत्ता आणि चमककडे विशेष लक्ष दिल्याने परदेशामध्ये द्राक्षाला मागणी झाली. मागील २ वर्षामध्ये एकरी २५ टनापर्यंत विक्रमी द्राक्ष उत्पादन घेऊन चीनमधील शेतकऱ्यांनाही आचंबित केले आहे. यंदाही द्राक्ष उत्पादनाचा आणखी विक्रम करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे.

मोबाइल बनला मार्गदर्शक

पदवीचे शिक्षण घेऊन शेतीमध्ये उतरल्यानंतर सुरुवातीला कृषी तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. मात्र, वारंवार कृषी तज्ज्ञांकडे न जाता ज्ञानेश्वरनी आपल्या मोबाइलला कृषी तज्ज्ञ केले. हवामानातील बदल, बदलानुसार द्राक्ष शेतीमध्ये करावयाची कामे, द्राक्ष बाग वाढ होत असताना घ्यावयाची काळजी आणि द्राक्ष बाजारातील स्थिती मोबाइल इंटरनेटच्या माध्यमातून घेत राहतो. फेसबुक, व्हॉटस अपच्या माध्यमातून जिभेला सारखेसारखा गोडवा देणारे द्राक्ष नातेवाईक, मित्र आणि बाजारापर्यंत पोहचवले.

परदेशातील मागणीनुसार निर्यात कशी करायची याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतली. शेतीमधले तंत्र आत्मसात केल्याने कमी खर्चात मी शेती केली. द्राक्ष शेती पाहण्यासाठी चीनमधील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेट दिले. आतापर्यंत रशिया, युके, नेदरलँडमध्ये द्राक्षाची निर्यात केली. - ज्ञानेश्वर बोरस्ते, द्राक्ष उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठाकरेंचे दुरूनच त्र्यंबकदर्शन

0
0

तासाभराच्या धावत्या दौऱ्यात कार्यकर्त्यांकडे केले दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

महाराष्ट्र नवनिर्माण (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी त्र्यंबकेश्वरला धावती भेट दिली. त्र्यंबकराजाचे दर्शन घेत मंदिर विश्वस्त कार्यालयात चहापान आणि जाताजाता निरंजनी आखाड्यात साधू महंतांची भेट असा निव्वळ तासाभराचा त्यांचा दौरा होता. यामध्ये राज यांचा देवदर्शन हाच एकमेव हेतू असावा, असे दिसून आले. मराठी अभिनेते विनोद येडेकर हे त्यांच्या सोबत होते.

राज यांनी कुंभमेळ्यात येण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले. तसेच त्यांनी साधुंशी चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या, अशी माहिती पक्षाचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे यांनी सांगितले. मनसेचे नगरसेवक पक्षातून बाहेर पडले असले तरी कायकर्ते आजही पक्षासोबत आहेत हे दौऱ्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून लक्षात आले, असेही त्यांनी सांगितले. राज यांच्या दौऱ्यात प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, अनिल मटाले आदींसह ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत, समीर पाटणकर, आदी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त सचिन पाचोरकर यांनी राज यांना येथील व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली.

मन दुखावल्याचा परिणाम!

कुंभमेळ्याच्या प्रारंभी मनसे नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करून ठाकरे यांना दुखावले. त्यामुळे ठाकरे यांनी त्र्यंबकला अधिक वेळ दिला नाही, अशी चर्चा शहरात गुरुवारी सुरू होती. दौऱ्यात नगराध्यक्षा अनघा फडके स्वागतासाठी आल्या. मात्र, ठाकरे आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विशेष आस्था दाखविली नाही. त्र्यंबक नगरपालिकेत सत्तांतर घडतांना नगराध्यक्षा फडके यांच्यासह मनसेच्या ६ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रतीक्षा अन् कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग

राज ठाकरे येणार म्हणून आदल्या दिवसापासून कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. गुरुवारी सकाळपासून कार्यकर्ते थांबले होते. मात्र, ठाकरे दोन तास उशिरा आले. त्यांनी मंदिरात दर्शन घेतले. विश्वस्तांनी त्यांना सत्कार चहापानासाठी कोठी संस्थान कार्यालयात नेले. तेथे जवळपास अर्ध्या तासापेक्षा अधिक काळा ठाकरे थांबले याकाळात कार्यकर्ते मंदिराच्या बाहेर उन्हातच थांबले होते. ठाकरे कोणत्या आखाड्यात जाणार याची कल्पना नसल्याने सर्व वाहनांचा ताफा शिवनेरी चौकात उभा होता. ठाकरे निलपर्वत जुना आखाडा येथे जातील असा अंदाज होता. परंतु, त्यांनी निरंजनी आखाड्यात जाणे पसंती केले. दुपारची वेळ असल्याने तेथे साधुंचे जेवण सुरू होते. ठाकरे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत आत जात साधूंची विचारपूस केली. बाहेर आले आणि गाडीत बसून नाशिकला निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ साध्वींवर गुन्हा दाखल व्हावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी जीवनभर खस्ता खाणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना सापडवण्यासाठी साध्वी शिवानी दुर्गा यांनी अघोरी तंत्र मंत्राचे सहाय्य घेतले. अंनिस (अंधश्रध्दा निर्मूलन समिती) कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का असून साध्वी शिवानी दुर्गा यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येते आहे.

अंधश्रध्देविरोधात लढणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे शहरात हत्या करण्यात आली. या हत्याकांडातील मारेकरी व सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. यापूर्वी पुणे शहराचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी प्लँचेट केल्याचे समोर आले होते. त्यावेळी अंनिस कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन केले. राज्य सरकारने त्यांची बदली केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. आता, त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्यास असलेल्या साध्वी शिवानी दुर्गा डॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी प्लँचेट करीत असल्याची बाब समोर आली आहे. तंत्रमंत्राच्या सहाय्याने गुन्हेगार पकडून देणार असल्याचा दावा शिवानी दुर्गा यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील घनदाट जंगलात विधी सुरू असल्याचे दुर्गा यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

अंनिस कार्यकर्त्यांना ही बाब समजताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिवानी दुर्गा यांचे हे कृत्य जादुटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. यांची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. अठरा महिन्यात मारेकऱ्यांना पकडून देण्याचा दावा करणे, याचा अर्थ शिवानी दुर्गा यांना मारेकऱ्यांबाबत माहिती असू शकते. त्यामुळे या प्रकाराची चौकशी होणे महत्त्वाचे असल्याचा दावा संघटनेचे कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह सुधीर धुमाळ, शहर कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे, शहर अध्यक्ष व्ही. टी. जाधव, सिन्नर शाखेचे सचिव दिलीप गोसावी यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.

तर दुर्गा यांना २१ लाखांचे बक्षिस

'अंनिस' ही विवेकवादी संघटना आहे. शांतता व संविधानुसार अहिंसेच्या मार्गाने ती जनप्रबोधन करते. अ​वैज्ञानिक दाव्यांना संघटनेकडून नेहमीच आव्हान दिले जाते. अंनिसच्या प्रतिआव्हान प्रक्रियेनुसार शिवानी दुर्गा यांनी त्यांचे दावे सिध्द केल्यास त्यांना लोकवर्गणीतून जमा झालेले २१ लाख रुपये बक्षिस देऊन ही चळवळ बंद केली जाईल, असे 'अंनिस'ने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाकडून जनतेची मनधरणी

0
0

पहिल्या पवर्णीत चूक झाल्याची पालकमंत्र्यांची जाहीर कबुली

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ आपणा सर्वांचा आहे. आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे आणि सर्वांच्या सहकार्याने संपन्न करायवयाचा आहे असे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या बैठकीत उपस्थित नागरीकांच्या सहकार्याची आपेक्षा व्यक्त केली आहे. पहिल्या शाहीस्नानाच्या पर्वणीस चूक झाली असे जाहीर कबूल केले. पहिल्या शाहीस्नानाकडे भाविकांनी पाठ फिरविल्याने हादरलेल्या प्रशासनाने आता नागरिकांची मनधरणी सुरू केली आहे.

त्र्यंबकमध्ये झालेल्या बैठकीस व्यासपिठावर पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसींह कुशवाह, विभागीय पोलिस आयुक्त जे. जे. सिंग, ‌पोलिस अधीक्षक संजय मोहिते, नगराध्यक्षा अनघा फडके आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीत नागरिकांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली.

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी त्र्यंबकमधील घाटांना ड्रेनेजेचे पाणी असतांना तेथे नागरिकांनी स्नान करावे, अशा अपेक्षा तुम्ही ठेवू नका, आम्ही घाटावर अंघोळ करणार नाही. तसेच परिसरातील ग्रामीण जनतेला वेठीस धरू नका

असे बजावले.

सिंहस्थात बाय चान्स, बाय ड्युटी आणि बाय बर्थ अशा पद्धतीने व्यक्ती सहभागी होत असतात. आम्ही बाय बर्थ आणि बाय हार्ट येथे असतांना आमचा प्रथम अधिकार आहे तेव्हा सर्वात प्रथम आम्हाला येथे सिंहस्थ अनुभवण्याचा अधिकार द्या, अशी मागणी विशाल जोशी या तरुणाने केली. आम्हाला बाहेरच्या जनतेला बोलवणे शक्य होणार आहे तसेच स्वयंसेवक म्हणून ओळखपत्र व काम करण्याची संधी दिली आहे; मात्र पोलिस अधिकारी आम्हाला हुसकावून लावतात हे थांबवा, अशी मागणीही त्याने केली.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यादवराव तुंगार, विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी, युवा कार्यकर्ता कल्पेश कदम, माजी उपनगराध्यक्ष गिरीश जोशी, सभापती शांताराम मुळाणे, मंगेश धारणे, धनंजय तुंगार, उपनगराध्यक्ष संतोष कदम आदींसह आणखी काही नागरिकांनी मनोगत व्यक्त केले आणि मौलिक सूचना केल्या.

गैरसमज दूर करण्यासाठी खटाटोप

व्यासपिठावरील खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित आदींनी सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी माध्यमांद्वारे भाविकांना आवाहन करावे. पायपीट होते हा समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना केल्या. या सूचनांचा परामर्श व्यासपाठावरील जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते आणि जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी केला. येथे सुयोग्य नियाजन होईल नागरिकांना त्यात सहभाग मिळेल तसेच गर्दीचा ओघ पाहून बाहेरील वाहनतळांचा निर्णय घेता येईल, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासन, पालकमंत्री अखेर जमिनीवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरक्षेच्या अतिरेकामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन पावले मागे येत गुरूवारी लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सोपस्कार पार पाडले. पालकमंत्र्यांसह पोलिस आणि प्रशासनावर तुटून पडण्याची संधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी साधली. जमिनीवर आलेल्या प्रशासनाने `बी प्लॅन` सादर करून लोकप्रतिनिधींची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या नाराजीनंतर पालकमंत्र्यांनी परिस्थिती सावरत पुढील पर्वण्यांचे फेरनियोजन करीत, भाविकांची पायपीट कमी करण्यासह शहरातील व्यवहार सुरळीत राहतील, असे आश्वासन दिले.

पहिल्या पर्वणीत अपयश आल्यानंतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने नव्या नियोजनाची मांडणी प्रथम केली. लोकप्रतिनिधींनी अपयशाचे खापर पोलिस आणि प्रशासनावर फोडले. त्यांनी प्रशासन व पोलिसांच्या चुकांची जंत्री मांडत, नव्या सूचना केल्या. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, खासदार हेमंत गोडसे, जयंत जाधव, अजय बोरस्ते, गुरूमीत बग्गा, शिवाजी चुंभळे, विजयश्री चुंभळे, तानाजी जायभावे, दिनकर पाटील, संजय चव्हाण यांनी तक्रारी करतानाच सूचनाही केल्या.

भारत-पाकसारखी स्थिती नको

पालकमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांचे कान उपटले. पोलिसांनी सुरक्षेचा अतिरेक केल्याचे सांगून नागरिकांना त्रास दिल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी लोकांना घरातील लाईटही बंद करण्यास भाग पाडले. ओट्यावरही येवू दिले नाही. जणू भारत-पाकिस्तानचे युद्ध सुरू असल्याचे वातावरण तयार केल्याचे सांगून पोलिसांचा अतिरेक चव्हाट्यावर आणला. लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवण्याचे सांगून नागरिकांना त्रास होणार नाही, असे नियोजन करण्याचे फर्मान सोडले.



प्रशासनाचे आश्वासन

> पहिल्या पर्वणीनंतर फेरनियोजन, वाहतूक व्यवस्थेतही बदल

> भाविकांना जास्तीत जास्त दीड ते दोन किलोमीटर पायपीट

> शहर बससेवा सुरू राहणार

> शहरात सर्व व्यवहार सुरू ठेवणार, हॉटेल्सचाही समावेश

> आखाड्यांच्या मिरवणूकस्थळी भाविकांना परवानगी



लोकप्रतिनिधींच्या सूचना

> पोलिसांच्या बॅरिकेड्सचा केलेला अतिरेक कमी करा

> शहरातील अतंर्गत वाहतूक कायम ठेवून व्यवसाय व हॉटेल्स सुरू ठेवा

> भाविकांची पायपीट कमी करून थेट गावात प्रवेश करू द्या

> भाविकांसाठी दररोज शंभर क्युसेक पाणी सोडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ आवरा, दुष्काळ सावरा!

0
0

भाजप आमदाराचा पालकमंत्र्यांना घरचा आहेर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कुंभमेळ्याच्या आयोजनात गुंतल्याने ऐन दुष्काळात वाऱ्यावर सोडले गेलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथांना भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पालकमंत्र्यांच्या भर बैठकीत वाचा फोडली. साहेब, जरा सिंहस्थ बाजूला ठेवा, जिल्ह्यातील दुष्काळाकडे लक्ष घाला, शेतकऱ्यांचे हाल बघा, अर्धी यंत्रणा दुष्काळाकडे वळवा, असे खडे बोलच आहेर यांनी सुनावले अन् उपस्थिततही सुन्न झाले.

पालकमंत्र्यांनी सिंहस्थ हा जागतिक उत्सव असल्याचे सांगून टाळाटाळ करताच, डॉ. आहेर व पालकमंत्र्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर टंचाईच्या मुद्यावर दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.कुंभमेळ्याचा पुढील पर्वण्यांच्या नियोजनासाठी महाजन यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत सिंहस्थावर जोर असणारे पालकमंत्री यांना प्रशासनाला आमदार आहेर यांनी जिल्ह्यातील तीव्र दुष्काळाची जाणीव करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images