Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संविधानाचा स्वीकार म्हणजेच धम्म स्वीकार

$
0
0

पत्रकार संजय आवटे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा ही जगातील मानवी इतिहासातील सर्वात मोठी अहिंसक क्रांती असून अखंड विश्वातील तमाम प्रकारच्या गुलामीतून मानवास मुक्त करणारी अभूतपूर्व क्रांती होती. त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा स्वीकार म्हणजे धम्माचा स्वीकार असे म्हटल्यास वावगे ठरू नये, असे प्रतिपादन पत्रकार संजय आवटे यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती आणि ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने धर्म, धम्म आणि भारतीय संविधान या विषयावरील व्याख्यानात आवटे बोलत होते.

जगातील सर्व धर्म देव-ईश्वर दैवताला देवालयात शोधत असताना तथागत बुध्दाने तो समस्त गणराज्यात संघ शासनात असल्याचे सांगून धम्म आणि भारतीय संविधान हेच जगाला तारक असल्याचे सांगितले. मानवतावादी, समतावादी कार्यकर्ते, विचारवंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी नाते सांगणाऱ्यांनी त्यांच्या विचार कार्याशी इमान राखा, असे आवटे म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष शरद शेजवळ, सल्लागार प्रकाश वाघ, प्रा. कविता कर्डक, शिवाजी भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अर्जुन कोकाटे होते. प्रारंभी बोधी वृक्षाला पाणी देत मुक्ती काव्य संमेलन व आंबेडकरी प्रबोधन शाहिरी जलशा व जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. शंकर जाधव यांनी सूत्रसंचलन केले. काव्य संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी शिवाजी भालेराव होते. लक्ष्मण बारहाते, सचिन साताळकर, राहुल आढांगळे, महेश शेटे, रतन पिंगट, भास्कर चव्हाण यांनी सामाजिक प्रबोधनपर कविता सादर केल्या. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कला पथक नाशिकच्या कलावंतांनी प्रबोधनपर शिवाजी, फुले, आंबेडकरी शाहिरी जलशा सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, क्रीडा प्रबोधिनी आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ६२व्या वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांच्या अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धेला सुरुवात झाली.

यशवंत व्यायाम शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यांमध्ये बाद पद्धतीच्या सामन्यातून मुख्य साखळीसाठी एकलव्य (मनमाड), उत्कर्ष (सय्यद पिंपरी), ब्रह्म स्पोर्ट (आडगाव), राजभाऊ तुंगार पतसंस्था (शिंदे), कलिका माता (मनमाड), नाशिक शहर पोलिस, भारतमाता (मनमाड), एन. व्ही. एच. (मालेगाव), जय भवानी (मनमाड), अशोक (मनमाड), यशवंत क्रीडा प्रबोधिनी (नाशिक) हे संघ पात्र ठरले आहेत.

स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील पुरुषांचे ३६ तर महिलांचे ८ संघ सहभागी झाले आहेत. संघांची मोठी संख्या लक्षात घेता पाच अद्ययावत मैदाने तयार करण्यात आली असून या सर्व मैदानावर प्रकाशझोतात सामने खेळविले जात आहेत.

स्पर्धेचे उद्‍घाटन भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते झाले. 'खेळाडूंनी पोलिस भरतीस प्राधान्य दिल्यास त्याचा फायदा खेळाचे कौशल्य दाखविण्यास होईल. त्याचप्रमाणे पोलिस दलालाही चांगले मनुष्यबळ मिळेल,' असे आवाहन कड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक चार्टड अकाउंट सस्थेचे अध्यक्ष उल्हास बोरसे, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जयंत जाधव, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, महाराष्ट्र कबड्डी असो. सहसचिव प्रकाश बोराडे, क्रीडा अधिकारी, महेश पाटील, सतीश सूर्यवंशी, रंगनाथ शिंदे, बाळासाहेब जाधव, सुरखा काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलजित सेठींचे आज व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत नाशिक आल्याने आता स्थानिक संस्था-संघटनांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनर्स (ट्रिपल आयडी)च्या नाशिक शाखेच्या वतीने जगप्रसिद्ध वास्तूविशारद ग्रुप कार्लसनचे उपाध्यक्ष दिलजीत सेटी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता तिडके कॉलनीतील हॉटेल एसएसके येथे या शहरातील निवडक व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सेटी हे स्मार्ट सिटीबाबतचे सादरीकरण करणार असल्याचे ट्रीपल आयडीचे अध्यक्ष हेमंत दुगड यांनी सांगितले आहे. सेटी हे अमेरिकेत नामांकीत वास्तुविशारद म्हणून ओळखले जातात. वॉशिंग्टन येथील मायक्रोसॉफ्ट कॅम्पससह जगभरातील अनेक वास्तूंचे डिझाईन्स त्यांनी बनविले आहे. संध्याकाळी ६ वाजता हे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सेठी यांचे व्याख्यान होणार आहे. विविध देशांमधील नोकरी व व्यवसायाच्या संधी याबाबत ते मार्गदर्शन करुन सादरीकरण करणार असल्याचे सचिव तरन्नुम कादरी यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वास ठाकूर यांना बेस्ट चेअरमन पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्लोकल स्ट्रेटेजिज् अ‍ॅण्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या संस्थेमार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणाऱ्या बँकांसाठी व व्यक्तींसाठी 'फ्रँटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार २०१५ जाहीर झाला असून यात विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांना 'बेस्ट चेअरमन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

गुणवत्ता, व्यवस्थापन कौशल्य, दर्जा यात सातत्याने लक्षणीय प्रगतीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. गोवा येथील हॉटेल हॉलीडे ईन रिसोर्ट कॅव्हीलेसीममध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे व संचालक घनःश्याम येवला यांनी पुरस्कार स्व‌ीकारला. नॅफकॅबचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर व रिझर्व्ह बँकेचे जनरल मॅनेजर राधाकृष्णन, बँकिंग फ्रंटीयर्सचे मनोज अग्रवाल, बाबू नायर आदी उपस्थित होते.

भारतातील सहकारी बँकिंग विश्वात माहिती तंत्रज्ञान व आधुनिक व्यवस्थापन प्रणाली या गुणांवर आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक या नामांकित बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसुत्रता आणणे व गुणात्मक मूल्य वाढविण्याच्या दृष्टीने सहकारी धोरणांचा आढावा घेणाऱ्या शासनाच्या अनेक समित्यांमध्ये ठाकूर यांनी प्रातिनिधीत्त्व केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि.,मुंबई या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. पुरस्कारानंतर बोलतांना विश्वास ठाकूर म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कार्यक्षम व तत्पर ग्राहकसेवा या त्रिसूत्रीच्या वापरामुळे बँकेची वाटचाल कॉर्पोरेट बँकिंगकडे सुरु आहे. या पुरस्काराबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय, सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेदाच्या परिभाषेला संस्कृतचे कोंदण

$
0
0

संस्कृत अभ्यासक अतुल तरटे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयुर्वेद या प्राचीन शास्त्राच्या मांडणीसाठी समृध्द अशा संस्कृत भाषेचे कोंदण लाभले आहे. या भाषेच्या सामर्थ्याने आयुर्वेदातील सूक्ष्म निरीक्षणे आणि अचूकता समर्थपणे अधोरेखित केली आहे. पुरातन विज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ साधून मानवाचे कल्याण साधण्यासाठी संस्कृत भाषेचा अभ्यास दुवा ठरेल, असा विश्वास संस्कृत विषयाचे अभ्यासक अतुल तरटे यांनी व्यक्त केला.

पंचवटीतील सप्तशृंगी आयुर्वेद कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी सात दिवसीय 'संस्कृत व्याकरण व संभाषण कौशल्य' या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आयुर्वेदातून संस्कृत वजा केल्यास आयुर्वेदाची कल्पना करता येणार नाही. शास्त्र आणि भाषा यांच्यातील एकरुपता हीच आयुर्वेदाचे वैशिष्ट्य बनली आहे. आयुर्वेदात चरक आणि सुश्रूत यांसारख्या महान ऋषींनी रचलेल्या ग्रंथांमधील ज्ञान आत्मसात करण्यासाठी संस्कृत अध्ययनाच्या साधनेला पर्याय नाही. आधुनिक विज्ञानालाही काही प्रसंगी थक्क करणारे तर काही प्रसंगी काळानुरून पोषक ठरणारे संदर्भ सूत्र हे आयुर्वेद ग्रंथांमधून प्रकटतात. ही काळाच्याही पल्याड जाणारी व मानव जातीसाठी उपकारक ठरणारी संदर्भ सूत्रे आकलन करण्याचा ध्यास आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी बाळगावा. हा दृष्टीकोनच भविष्यात निष्णात वैद्यांची घडवणूक करेल, असाही विश्वात तरटे यांनी व्यक्त केला.

उपक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलींद आवारे, प्रथम वर्ष वर्गाचे समन्वयक डॉ. प्रा. अरुण भुजबळ, डॉ. प्रा. ज्ञानदा भुजबळ आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कॉलेज पत्रव्यवहार संस्कृत भाषेतून करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. आवारे यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ. भुजबळ यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. भुजबळ यांनी प्रास्तविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेमा कट्टामध्ये आज ‘मुलादे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विश्वास को-ऑप बँकच्या वतीने 'सिनेमा कट्टा' उपक्रमांतर्गत रसिकांसाठी शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी साडे सहा वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक ओसमान सेम्बेने यांचा 'मुलादे' हा आफ्रिकन भाषेतील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकर नगर, गंगापूर रोड येथे दाखविण्यात येणार आहे.

सेनेगलचे जगप्रसिद्ध दिग्दर्शक ओसमान सेम्बेने स्वतंत्र वसाहत्तोत्तर अफ्रिक्रेचे पहिले महत्वाचे चित्रपट दिग्दर्शक आहेत. आफ्रिकेतील स्त्रियांचे प्रश्न त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आहेत. त्यापैकीच हा मुलादे किंवा जादुई संरक्षण. आफ्रिकेतील प्रचलीत मुलींच्या पारंपारिक प्रथेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महिलांची ही गोष्ट आहे. एका खेडेगावात घडणारी ही गोष्ट त्याच गावात येणारी आधुनिकता व गावातील जुन्या परंपरा प्रथा यांचा संघर्ष व त्यात गावातील महिलांची भूमिका मांडणारा हा चित्रपट नक्कीच स्फूर्तीदायक ठरावा. स्त्रियांच्या संघर्षाबरोबर खेडेगावातील आफ्रिकेचे रंगतदार व वास्तववादी चित्र या चित्रपटातून आपल्या समोर येते.

या चित्रपट सफरीत सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या रंगीत चित्रपटाचा कालावधी १२५ मिनिटांचा आहे. 'मूलादे' हा चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष विलास हावरे, जनसंपर्क संचालक मंगेश पंचाक्षरी, संचालिका वैशाली होळकर, संचालक डॉ.वासुदेव भेंडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात विद्यार्थी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगात असलेल्या कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात शाहू सुनील पाटील (वय २१) हा इंजिनीअरींगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ठार झाला. ही घटना आज, गुरूवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास के. के. वाघ इंजिनीअरींग कॉलेजसमोरी तारवालानगर-हिरावाडी रिंगरोडवर घडली.

गंगापूररोडवरील निर्माला कॉनव्हेंट हायस्कूल जवळी चैतन्यनगर परिसरात राहणारा शाहू पाटील आपल्या मैत्रणीसमवेत रिंगरोडने जात असताना कमलनगरच्या पाठीमागील बाजुस त्याच्या कारचे (एमएच १५ सीडी ८४३६) टायर फुटले. यावेळेस कार वेगात होती. टायर फुटल्याने शाहूचा कारवरील ताबा सुटून कारने दोन ते तीन पलट्या मारल्या. यात, शाहूसह त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाली. शाहूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्दावस्थेत होता. तर त्याच्या मैत्रणीला दुखापत झाली होती. कारमध्ये सापडलेल्या कॉलेजच्या प्रोजेक्ट रिपोर्टवरून नागरिकांनी शाहूची ओळख पटवली. त्याला तत्काळ सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोष‌ित केले. शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. खेळामध्ये विशेष रूची असलेल्या शाहूच्या अकाली मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीनंतरही प्रचाराचे एसएमएस

$
0
0

फैज बँकेच्या एकता, अपना पॅनलचा प्रचार संपेना

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

बहुसंख्य मुस्लिम सभासद असलेली दि फैज मर्कंटाईल को-आप. बँकेची पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रीया पूर्ण झाली. या बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही निवडीची प्रकिया पार पडली. मात्र, निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन करणारे दूरध्वनी आणि एसएमएस येत असल्याने बँकेचे मतदार असलेले सभासद बुचकळ्यात पडले आहेत.

फैज बँकेची निवडणूक पूर्ण होऊन महिना उलटला आहे. या निवडणुकीत सर्व जागांवर अपना पॅनल नमवित एकता पॅनलने‌ विजय मिळविला. तर सपाटून मार खाल्लेच्या अपना पॅनलचा अद्यापही निवडणूक सुरू असल्याचा भास निर्माण करणारा प्रचार संपला नाही.

फैज बँकेच्या निवडणुकीत मातब्बर उमेदवार असलेल्या अपना पॅनलला पराभावाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत हार पत्करावी लागली. तर एकता पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता खेचून आणली; मात्र निवडणूक संपल्यानंतरही दोन्ही पॅनलची प्रचार यंत्रणा जागीच आहे. दोन्ही पॅनलशी सभासदांमध्ये दूरध्वनी एसएमएसव्दारे प्रचार करणाचा करार करणाऱ्या कंपनीला निवडणूक संपल्याचा विसर पडला आहे. दोन्ही पॅनलचा दूरध्वनी एसएमएस प्रचार सुरु आहे. त्यामुळे सभासदांमध्ये निवडणूक पुन्हा होत असल्याचा संभ्रम निर्माण झाला आहे. हा प्रचार चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे सभासदांचे चांगलेच मनोरंजनही होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनांच्या परीक्षेत हेडलाइट 'नापास'

$
0
0

तपासणीत सरासरी ८५ टक्के हेडलाइटस एव्हीइएसकडून निकाली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑटोमेटीक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरच्या (एव्हीइएस) तपासणीत व्यावसायिक वाहनांचे हेडलाइट दोषी असण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांच्या पुढे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अगदी नवीन वाहनांबाबत सुध्दा असे प्रकार घडत असून, वाहन कंपन्यांकडून हेडलाईटच्या नियमांचे पालन होत नाही की, युरोप देशातून आयात केलेले हे यंत्रच सदोष आहे, असा प्रश्न वाहनचालकांना सतावतो आहे.

प्रादेशीक परिवहन विभागातील (आरटीओ) ५ एकर जागेत साकारल्या जाणाऱ्या राज्यातील पहिलीच एव्हीइएस यंत्रणा बुधवारी कार्यन्वित झाली. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) सहकार्याने हा प्रकल्प साकारला गेला असून, याद्वारे ट्रक, बसेस, रिक्षा, व्यावसायिक कार, जीप आदी वाहनांचे ब्रेक, हेडलाइट, टायर्स व इंजिनाची स्थिती, चेसीज, ध्वनी व वायू प्रदूषणाचे प्रमाण या बाबी तपासण्याचे काम सुरू झाले आहे. बुधवारी, याठिकाणी एकूण ११३ व्यावसायिक वाहने तपासण्यात आली. त्यातील अवघी आठ वाहने यंत्रणेच्या मानकांनुसार उत्तीर्ण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोषी वाहने आढळून आल्यानंतर वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली असून, आरटीओ अधिकारीही चिंतेत आहेत. याबाबत परिवहन अधिकारी जीवन बनसोड म्हणाले,'बुधवारी वाहनांच्या डावी बाजुकडील ९५ हेडलाइटची तपासणी करण्यात आली. त्यात १२ वाहनांचे हेडलाइट योग्य असल्याचे अॅटोमेटीक यंत्रणेने स्पष्ट केले आहे. याबरोबर, उजव्या बाजुच्या ९३ हेडलाइटपैकी १५ वाहनांचे हेडलाइट मानकांनुसार कार्यन्वित होते. हेडलाइट सुरू केल्यानंतर किती प्रकाश असावा याचा निकष असून, तो पाळला जात नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.'

दरम्यान, नवीन वाहनांनाही या यंत्रणेचा फटका बसला असून, वाहन कंपन्या सर्व नियमांचे पालन करतात किंवा नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.

वाहनांची तपासणी

प्रकार - वाहनांची संख्या - उत्तीर्ण वाहने - सदोष वाहने - सदोष वाहनांची टक्केवारी

ब्रेक - ९६ - ९३ - ३ - ३.१

प्रदूषण- ७५ - ४१ - ३४ - ४६

डाव्या बाजुचे हेडलाइट- ९५ - १२ - ८३ - ८७

उजव्या बाजुचे हेडलाइट- ९३ - १५ - ७८ - ८३

हे सेंटर नुकतेच कार्यन्वित झाले आहे. हेडलाइटमुळे वाहन सदोष ठरण्याचे प्रमाण जास्त असून, याबाबत परिवहन आयुक्तांना कळवण्यात आले आहे. सदोष ठरणाऱ्या वाहनांच्या मालकांनी आवश्यक ते बदल करून पुन्हा तपासणी करून घ्यावी. यात मानवी हस्तक्षेप नसल्याने छोट्यातील छोट्या चुकांमुळे सुध्दा वाहन सदोष ठरते.

- जीवन बनसोड, प्रादेशीक परिवहन अधिकारी

हे यंत्र युरोपमधून आयात करण्यात आले आहे. तेथील रस्त्यांची स्थिती, वाहनांचा दर्जा यात फरक आहे. नवीन वाहनांचे हेडलाइट दोषी ठरवले जात असून, यात सर्वसामन्य वाहनचालक भरडला जातो आहे. तपासणीसाठी तीन दिवस वाहन उभे करावे लागते. या नियमात सुधारणा व्हावी.

- गोविंद लोखंडे, माजी तालुका प्रमुख, शिवसेना, सिन्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत पुन्हा समितीचे नियंत्रण

$
0
0

भुजबळाकडून पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी; निवडणुका असल्याने वाद टाळण्याचा सल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीची सत्ता असून, पक्षातीलच सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री छगन भुजबळांच्या दरबारात वाद नेला. भुजबळांनीही अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना वाद विवाद थांबवून तात्काळ प्रश्न मार्गी लावा अन्यथा घरी बसावे लागेल, असा इशारा अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना दिला. सोबतच वाद टाळण्यासाठी जिल्हा प‌रिषदेतील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीची घोषणा केली. जयश्री पवार अध्यक्ष असतानाही अशीच समिती नियुक्त करण्यात आली होती.

जिल्हा परिषदेतील सध्याच्या कारभाऱ्यांनी गतवेळच्याच कारभाऱ्यांचा कित्ता गिरवला असून, गेल्या वेळेप्रमाणेच फाईलींची अडवाअडवी करत, बुद्धीबळाचा खेळ खेळला जात आहे. सध्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना कारभार हातात घेऊन एक वर्ष होवूनही विकास कामे मार्गी लागत नाहीत. फाईली मध्येच अडविल्या जात असल्याचा तक्रारी या विरोधकांच्या नव्हे, तर सत्ताधारी गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या आहेत. जयश्री पवार अध्यक्ष असतानाही सत्ताधाऱ्यांचीच कामे अडवली जात होती. त्यामुळे पहिले अडीच वर्ष असेच वाया गेले होते. त्यानंतर ही परिस्थिती सुधारेल असे चित्र होते. मात्र वर्तमान पदाधिकाऱ्यांनीही पूर्वीचाच कित्ता गिरवल्याने आता सत्तेचा वाद भुजबळांपर्यंत पुन्हा पोहचवण्यात आला. हा वाद आणखीन वाढू नये म्हणून भुजबळांनी राष्ट्रवादी भवनात या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेत, त्यांचीच खरपट्टी काढली. प्रत्येक पदाधिकाऱ्यांची तक्रार त्यांनी ऐकून घेतली. सर्वांच्या तक्रारींचा सूर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्याकडून विकासकामांच्या फाईलींची अडवणूक करण्यात येत असल्याचा लक्षात आल्यानंतर भुजबळ संतापले.

'वर्षभरानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जनतेला कामे दिसली पाहिजेत अशी कृती करा' असा सल्ला त्यांनी दिला. 'तुम्हाला निवडायचे नसेल तर, तसे सांगा' असा दमही त्यानी सदस्यांना भरला. 'जनतेची जास्तीत जास्त कामे करावीत, कोणत्याही कामांना विलंब होता कामा नये,' अशा सूचना त्यांनी सदस्यांना देत, कारभारावर नियंत्रण देण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. सदस्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांची कामे मार्गी लागण्यासाठी ही समिती काम करणार असून, त्यात अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती उषा बच्छाव, किरण थोरे, गटनेते रवींद्र देवरे, यतिन पगार, बाळासाहेब गुंड, शैलेश सूर्यवंशी यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वजनी फाईल्सला लागतो ब्रेक

गेल्याच सत्ताधाऱ्यांचा कित्ता वर्तमान पदाधिकाऱ्यांनी कायम ठेवला आहे. अर्थपूर्ण घडामोडींशिवाय फाईल्स पुढे सरकावायच्या नाहीत, असा प्रघातच जिल्हा परिषदेत पडला असून त्या घडामोडी पूर्ण झाल्याशिवाय फाईल्सला गती दिली जात नाही. त्यामुळेच ठिकठिकाणी फाईल्सना ब्रेक लावला जातो. पदाधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण वादामुळे प्रशासनाचीही अडचण होत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील सुंदोपसुंदीने अधिकारी भरडले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासबिहारी आयोजित विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विज्ञानाचा प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचा गुरुवारी समारोप झाला. सिटी सेंटर मॉल येथे या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विज्ञानविषयक संकल्पना समजावून घेतल्या.

मुंबईच्या 'होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन' येथील विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेले मॉडेल्स येथे सादर करण्यात आले होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्यामुळे देशाला विज्ञान क्षेत्रात एक नवी ओळख मिळाली. जागतिक स्तरावर भारताचे नाव त्यामुळे उंचावले गेले. त्यांच्या कार्याला समाल करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी शाळेने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. दैनंदिन वापरातील गोष्टींमागे विज्ञान कशाप्रकारे दडले आहे? याची जाणीव विद्यार्थ्यांना यामार्फत करुन देण्यात आली. रासबिहारीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थितांना माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कीर्ती कला मंदिराची बालाजी मंदिरात नृत्यसेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कापडपेठेतील बालाजी मंदिरात यंदाही परंपरेनुसार ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्ती कला मंदिराच्या शिष्यांनी 'उत्सव नुपूरांचा' हा कार्यक्रम सादर केला. रुद्र म्हणजे महादेवाचा उग्र अवतार याचं प्रगटीकरण शिव तांडवामधून यावेळी दाखवण्यात आले. या नृत्य प्रकारातून होणारा क्रूरतेचा आणि नकारात्मक शक्तींचा नाश कथ्थक रूपातून मांडण्यात आला.

नुपूर, नाद व स्वरांचा मेळ साधत पं. विष्णू दिगंबर पलुस्कर रचित यांच्या ' दिजे दरसमोहे चतुर भूजन कर' या अनवट बंदिशीने वंदना सदर करून कार्यक्रमाला सुरवात झाली. पंडित गोपिकृष्णजी यांच्या शिष्या रेखा नाडगौडा यांच्या शिष्यांनी 'रुद्र' ही संकल्पना सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली. तराणा आणि `दिजे` यांचे नृत्य दिग्दर्शन आदिती पानसे यांनी तर 'रुद्र' संकल्पनेचे दिग्दर्शन अश्विनी काळसेकर यांचे होते. त्यानंतर शिववंदना सादर करण्यात आली. 'सोहम हर डमरू बाजे' हे तांडव नृत्य सादर केले. तराणा आणि भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. रमेश बालाजीवाले, विक्रम बालाजीवाले, हर्षवर्धन बालाजीवाले आणि आदिती पानसे यांनी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केले तर वैशाली बालाजीवाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिविज्ञान केंद्रातर्फे कृषि तंत्रज्ञान महोत्सव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषि विज्ञान केंद्र आणि आत्मा, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रात होणाऱ्या या महोत्सवादरम्यान रब्बी शेतकरी संमेलन कार्यक्रमाचेही यानिमित्ताने खास आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्‍घाटन आज, शुक्रवार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते होणार असून, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंके कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कृषि तंत्रज्ञान महोत्सवानिमित्त कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, कृषि प्रदर्शन, केंद्रावर असलेल्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना भेटींचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भरविण्यात येणाऱ्या कृषि प्रदर्शनात सर्व शासकीय संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली शेतकऱ्यास मिळावी या उद्देशाने कृषि व कृषि संलग्न विविध शासकीय विभाग, या कार्यक्रमानिमित्त कृषि प्रदर्शनात आपापल्या विभागाचे माहितीपर स्टॉल मांडून शेतकऱ्यांना विविध योजनांबद्दल माहिती पुरविणार आहेत.

गोविलकरांचे व्याख्यान

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांचे शंका समाधान करण्यात येईल. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे 'सामाजिक संरक्षण आणि कृषि ग्रामीण गरिबी निवारण' या विषयावर शनिवार १७ रोजी तर भात शास्रज्ञ डॉ. विजय देशपांडे यांचे 'आधुनिक भात शेती पद्धती' या विषयावरील व्याख्यान रविवार १८ रोजी होणार असून, या महोत्सवाचा समारोप विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी खरेदीसाठी आता कार्यपध्दती निश्चित

$
0
0

तेवीस वर्षांनंतर प्रथमच खरेदी धोरणात बदल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य शासनाची विविध कार्यालये, शासकीय उपक्रम, स्वायत्त संस्था इत्यादींसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी करण्याबाबत तयार करण्यात आलेल्या नवीन खरेदी धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. गेल्या तेवीस वर्षांनंतर प्रथमच खरेदी धोरणात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला आहे. दर करार पद्धत काही अपवाद वगळता जवळपास संपुष्टात आणली गेली आहे. महाराष्ट्र टाइम्सने तीन महिन्यांपूर्वी निविदेचा घोळ अशी वृत्तमालिका चालवली होती व यासाठी सुयोग्य खरेदी धोरण असावे, अशी भूमिका मांडली होती.

यावर १४ ऑक्टोबर रोजी सरकारने एका शासकीय निर्णयाद्वारे नवीन खरेदी धोरणास मान्यता दिली आहे. सरकारी पातळीवर होणाऱ्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकतेची गरज, संगणकीकरण व वस्तूंच्या वाढलेल्या किंमती या सर्व गोष्टींचा विचार करुन खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी नवीन खरेदी धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ३० जुलै २०१५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे प्रारूप सादर करून त्यास तत्त्वत: मान्यता घेण्यात आली होती. बैठकीत या प्रारूपावर चर्चा होऊन करण्यात आलेल्या सूचना व सुधारित निर्णयांचा या नव्या नियमावलीत समावेश करण्यात आला आहे.

नवीन खरेदी धोरण लागू झाले असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सर्व संबंधित तीन महिन्याच्या आत उद्योग विभागाच्या निदर्शनास आणून देणार आहेत. या खरेदी धोरणामध्ये स्विस चॅलेंज व इलेक्ट्रॉनिक रिव्हर्स ऑक्शन या नवीन खरेदीच्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या अधिनियमाप्रमाणे शासकीय खरेदीत महाराष्ट्र राज्य हातमाग महासंघ व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर या दोन संस्थांच्या ११ वस्तूंसाठी आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. अंध व अपंग यांच्या धर्मादाय संस्था यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या दरनिश्चितीसाठी आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.

खरेदीसाठी ई-निविदाच!

नवीन धोरणानुसार खरेदीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी यापुढे ३ लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याची

सर्व खरेदी ई-निविदा पद्धतीने करण्यात येणार आहे. सूक्ष्म व लघू उद्योगांमार्फत खरेदी करण्यासाठी एकूण २४१ वस्तू राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अशा वस्तूंसाठी निविदा प्रक्रिया अवलंबिण्यात येणार आहे. राखीव वस्तूंची खरेदी शंभर टक्के सूक्ष्म व लघू उद्योगांकडून करताना त्यापैकी वीस टक्के खरेदी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून करण्या‍त येणार आहे. ज्या वस्तू दोन किेवा अधिक प्रशासकीय विभागांना खरेदी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी मागणी केल्यास अशा वस्तूंची खरेदी मध्यवर्ती भांडार खरेदी समितीकडून (सीएसपीओ) करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क. का. वाघ महाविद्यालयाचे नौकानयन स्पर्धेत नेत्रदीपक यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंगोली जिल्ह्याच्या औंढ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणावर झालेल्या राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पिंपळगाव येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या नौकानयनपटूंनी कॅनॉईंग या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक यश प्राप्त केले.

सागर गाढवे याने २०० मीटर, ५०० मीटर व १ हजार मीटर अंतराच्या शर्यतीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना तीनही सुवर्णपदके पटकविली. तसेच सीटू या प्रकारात सुलतान देशमुख व सागर नागरे या जोडीनेदेखील २०० मीटर, ५०० मीटर व १ हजार मीटर अंतराच्या शर्यतीत सुर्वणपदके मिळविली. स्पर्धेत ३ सुवर्णपदके मिळविणाऱ्या पिंपळगावच्या सागर गाढवेला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

हे सर्व खेळाडू पिंपळगावच्या कादवा नदीत प्रा. हेमंत पाटील व पी. एम. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. नौकानयनमधील कॅनॉइंग या साहसी व अवघड प्रकाराच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत एकूण ९ सुवर्णपदके पटकविणाऱ्या नौकानयनपटूंचा सत्कार मविप्रच्या सरचिटणीस नी‌ल‌िमाताई पवार, सभापती नानासाहेब दळवी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लायन्स क्लबचा सप्ताह आगळ्या पद्धतीने साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजोपयोगी कामे करण्यास नेहमीच तत्पर असलेला लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारच्या ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत अनेक सेवकार्ये करण्यात आली. यात शिक्षणासाठी मुली दत्तक घेणे, स्त्री भ्रूण हत्येविरोधी जनजागृती करणे, चिंचोली गावांत गावकऱ्यांची मोफत रुग्ण तपासणी शिबिर यांचा समावेश आहे

अध्यक्ष ऊर्जा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक स्टारने प्रामुख्याने प्लास्टिक विरोधी अभियान हाती घेतले. या उप्रकमाचा आकाशवाणी टॉवर , गंगापूर रोड येथे प्रारंभ करण्यात आला. यावेळी क्लबच्या सदस्यांनी अनेकांच्या हातून प्लास्टिक पिशव्या घेऊन त्या बदल्यात कापडी पिशव्या दिल्या. पर्यावरण समतोल राखण्यात महत्त्वाचा भाग असलेल्या चिमण्या कमी होत असल्याच्या कारणावरून चिमणी घरटे वाटप सुद्धा वर्षभरात करण्याचे योजिले आहे.

सेवा सप्ताहाची सांगता १५० मुलींना स्व संरक्षणाचे धडे देऊन करण्यात आली. सेल्फ डिफेन्स अॅकॅडमीचे जितेंद्र यांनी आरंभ कॉलेज, नाशिकरोड येथील मुलींना स्व संरक्षणाचे धडे व निर्भय बना असा सल्ला दिला. लायन्स क्लब नाशिक स्टारचे पदाधिकारी नितिन मराठे, राम व नीलिमा डावरे, सचिव निशा व प्रशांत भारबट, खजिनदार डॉ. नुपूर प्रभू व डॉ. अमित प्रभू, डॉ विशाल व नीतू ठाकूर आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाई आरतीने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला वाढदिवस गोदामाईच्या आरतीने करावी, असे आवाहन सनविवि फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

आजची तरुणाई चंगळवादी, पाश्चात्य संस्कृतीच्या मोहजाळात अडकलेली असून सामाजिक भान विसरून बेभानपणे वागणारी असल्याची नकारात्मक टीका केली जाते. मात्र, या टीकेला बहुसंख्य तरुण अपवाद ठरतात. याचा प्रत्यय रामकुंडावर गंगा गोदावरीच्या महाआरतीच्या औचित्यावर गोदाकाठावर अनेकांना आला. नाशिकची जीवनदायिनी गोदावरीच्या सन्मान प्रित्यर्थ व तिचे पावित्र्य जपण्यासाठी नागरिकांनी त्यांचा वाढदिवस गोदाईच्या आरतीने साजरा करावा, असे आवाहन सनविवि फाऊंडेशन व हरितकुंभ समन्वय समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. याची सुरवात सनविविचे अध्यक्ष धीरज बच्छाव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुकतीच करण्यात आली.

सिंहस्थ पर्वणी झाल्यानंतर पुन्हा गोदावरी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे गोदेच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महाआरतीची संकल्पना समाजाला प्रेरक ठरेल, असा विश्वास सनविवि फाऊंडेशनच्या वतीने व्यक्त झाला. या महाआरतीला पर्यावरण प्रेमी राजेश पंडित, सुनील मेढेंकर, देवांग जानी, अभिजित हुदलीकर, हृषिकेश नाझरे, प्रितेश जाधव, सतीश विंचाळ, केयूर कुलकर्णी, अजिंक्य करंजुले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुदर्शन दिग्विजय रथ मिरवणूक यात्रा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कापड पेठेतील बालाजी मंदिरात सुदर्शन दिग्विजय रथ मिरवणूक नगर परिक्रमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. हा रथ लाकडी असून त्यावर जय विजय यांच्या सुंदर मूर्ती विराजमान आहे.

प्रथेनुसार रथासमोर मंदिराचे महंत विक्रम बालाजीवाले यांनी रथाकडे तोंड करून पूर्ण परिक्रामा उलट्या पावली केली. प्रतिवर्षी प्रमाणे यंदा अश्विन शुध्द प्रतिपदे पासून अश्विन शुध्द १५ पौर्णिमेपर्यंत 'श्रीं'चा ब्रह्मोत्सव साजरा होत आहे. रथाच्या मार्गावर सुवासिनींनी औक्षण केले. गावातील मंडळानी श्री बालाजी देवाचे फोटो, मूर्ती उभारून, फटाके वाजवीत मिरवणुकीचे स्वागत केले. घंटानाद, शंखनाद, ढोलताश्यांच्या गजरात रथयात्रा संपन्न झाली. रथयात्रा, दहीपूल, सोमवार पेठ, म्हसरुळ टेक, तिवंधा, जुनी तांबट लेन, पार्श्वनाथ लेन, हुंडीवाला लेन, पगडबंद लेन, सराफबाजार परत बालाजी मंदिर या पारंपरिक मार्गावरून काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी केला डॉ. कलामांना सलाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व समाजाला वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचनाचे महत्त्व त्यांना समजावे, या उद्देशाने राज्य स्तरावर हा दिवस साजरा करण्यात आला. व्याख्यान, भाषण, चर्चासत्र, सामूहिक वाचन, अनुभवकथन या माध्यमांतून हे प्रदर्शन पार पडले. डॉ. अब्दुल कलाम यांचे लेखन व विचार समाजापर्यंत पोहोचावे, यासाठी शैक्षणिक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. यानिमित्ताने अनेक ग्रंथालयांमध्ये खुले ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच जागतिक हॅण्डवॉश दिनानिमित्त स्वच्छतेविषयी जनजागृतीही या संस्थांमार्फत करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळा

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती नि‌मित्त जिल्हा परिषद शाळा शिलापूर येथे वाचन प्रेरणा दिन वाचनकट्ट्याचे उद् घाटन करण्यात आले. वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, यासाठी हा कट्टा येथे तयार करण्यात आला आहे.

यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अग्निपंख, प्रकाशवाटा, शामची आई, काळे पाणी या पुस्तकांची ओळख करुन दिली. शाळेतील उपशिक्षक प्रदिप शिंदे यांनी डॉ. कलामांच्या जीवनावर माहिती सांगितली. कलाम यांच्या जीवनावरील माहितीपट संग्रहाचे प्रकाशनही यानिमित्ताने करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मी वाचलेले पुस्तक विषयावर निबंध स्पर्धा, चर्चासत्र, कथा, कविता, गायन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. सरपंच मीना कहांडळ यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जागतिक हॅण्डवॉश डेदेखील साजरा करीत विद्यार्थ्यांना स्वत्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक नंदलाल अहिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिराबाई भावसार, रेखा चौधरी, कल्पना मोरे, जनाबाई मोरे आदींनी परिश्रम घेतले.

रंगुबाई जुन्नरे प्राथमिक शाळा

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनि‌मित्त नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित रंगुबाई जुन्नरे प्राथमिक शाळेत वाचन आणि वैज्ञानिक प्रयोगांतून साजरी करण्यात आली. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकर्ते अजित टक्के यांनी मुलांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन कसा वाढवावा, याबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच काही वैज्ञानिक प्रयोग सादर करून व काही ध्वनिचित्रफित दाखवून मुलांशी संवाद साधला. यावेळी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद लुटला. त्याचबरोबर मुख्याध्यापिका रेखा रडके यांनी वाचाल तर वाचाल या उक्तीद्वारे मुलांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले.

वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनि‌मित्त मराठा विद्या प्रसारक संचलित वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर शाळेत माई खैरनार यांनी कलाम यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वाचन प्रेरणा दिवसानिमित्त पुस्तकांचे वाचनही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला गुळे यांनी केले. यावेळी शालेय शिक्षिका रंजना घुले, कल्पना पाटील, मनिषा जाधव आदी उपस्थित होते.

उन्नती विद्यालय

उन्नती एज्युकेशन सोसायटी संचलित उन्नती प्राथमिक विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. लायन्स क्लब नाशिक सेंट्रल यांच्या वतीने शंभर पुस्तके असलेली ग्रंथपेढी शाळेस देण्यात आली. तसेच चार्टड अकाऊंट भूषण कोतकर यांनी डॉ. कलाम लिखित पुस्तके खरेदी करण्यासाठी शाळेस रुपये २१०० तर निळकंठ नेक यांनी पुस्तकांसाठी रुपये ११०० ची देणगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर अलई यांनी तर आभार मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी मानले. यावेळी लायन्स क्लब नाशिक सेंट्रलचे अध्यक्ष किशोर शिरुडे, माजी अध्यक्ष विनोद कोठावदे, सेक्रेटरी विनोद सोनजे आदी उपस्थित होते.

महापालिका शाळा

नाशिक : महापालिका शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. अंबड येथील शाळा क्रमांक ७२ येथे शाळेतील उपशिक्षिका रुपाली चव्हाण यांनी या शाळेच्या ग्रंथालयास १०१ पुस्तक भेट स्वरुपात दिली. तसेच जागतिक हॅण्डवॉश दिनानिमित्त मनपा शाळांमध्ये शिक्षकांच्या वतीने स्वच्छतेची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानगी आता ऑनलाइन

$
0
0

तीन महिन्यात ऑटो डीसीआर कार्यान्वित होणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बिल्डर व आर्किटेक्ट यांना यापुढे बांधकाम परवानग्या घेण्यासाठी महापालिकेत जाण्याची गरज पडणार नाही. नामांकित सॉफ्टवेअर कंपनीच्या मदतीने महापालिका बांधकाम परवानग्या ऑनलाइन करण्याचे सॉफ्टवेअर विकसीत करीत आहे. येत्या तीन महिन्यांत ऑटो डीसीआर प्रणाली (अॅटो डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स) महापालिकेत कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे बिल्डर व आर्किटेक्ट यांना घरबसल्या बिल्डींग प्लॅन मंजूर करता येणार असल्याचे सूतोवाच महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. `मटा`तर्फे आयोजित राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.

मंजूर प्लॅनपेक्षा बिल्डरांकडून अधिकचे बांधकाम करण्यावरून सध्या बिल्डर- महापालिकेत संघर्ष सुरू आहे. कपाट व एफएसआय उल्लघंनाचा विषय शासनाच्या विचाराधीन आहे. बिल्डर महापालिकेत भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्जच करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेत तब्बल ४३०० फाइल्स बिल्डरांच्या प्रतीक्षेत आहेत.

सीएसआरमधून सॉफ्टवेअर

ऑटो डीसीआरसाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची किंमत ही ६० ते ७० लाखाच्या आसपास आहे. यासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित सॉफ्टवेअर परिपूर्ण नव्हते. त्यामुळे संपूर्ण अद्ययावत असे हे सॉप्टवेअर चांगल्या कंपनीकडून तयार करण्यात येणार आहे. ते सीएसआर अॅक्टिव्हिटीतून पालिका घेणार असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images