शिवाजीनगर आणि श्रमिकनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली आहे. यामुळे रहिवासी भयभित होऊन रहात आहे, अशी तक्रार करणारे निवेदन परिसरातील उत्तर भारतीय रहिवाशांनी पोलिस उपायुक्त विजय पाटील यांना भेटून नुकतेच दिले. रहिवाशांनी ठिकठिकाणी नाक्यांवर उभ्या राहणाऱ्या टोळक्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून गुंडगिरी करणाऱ्यांचा त्रास रहिवाशांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या नागरिकांची गुंडांकडून लूट केली जात आहे. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नी गंगापूर पोलिस ठाण्यात अनेकदा तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रहिवाशांनी दिलेल्या निवेदनाची दखल पोलिस उपायुक्त यांनी घ्यावी अशी मागणी केली. याप्रसंगी नगरसेवक दिनकर पाटील, अमोल पाटील, ब्रिजेश यादव, धर्मेंद्रसिंह, नन्हेलाल यादव, राकेशसिंह, सुरेश यादव, राम चौहान आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट