Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लाखभर रुपयांची रोज ‘सफाई’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नदीतील पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा साफ करण्यासाठी महापालिका तीन महिन्यांच्या कालावधीसाठी फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिन भाडेतत्त्वावर घेणार आहे. यासाठी दिवसाला एक लाख १० हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे ठेकेदाराला ९९ लाख रूपये भाडे देण्यात येणार आहे. सिंहस्थात हे काम अगदी किरकोळ खर्चात करण्यात आले होते. त्यामुळे या प्रस्तावाबाबत स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोदावरी नदीच्या धार्मिक महत्त्वामुळे लाखो भाविक दरवर्षी याठिकाणी स्नान व धार्मिक विधीसाठी येतात. यातून नदीपात्रात निर्माल्यासह इतर प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. हा कचरा साफ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिन भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ९ जून रोजी ई-निविदा सूचना प्रसिध्द करण्यात आली. मात्र, दोनच ठेकेदार पुढे आल्याने प्रशासनाने २४ जून रोजी पुन्हा हीच सूचना प्रसिध्द केली. त्यानुसार क्लिनटेक प्रा. लि. मुंबई, जे. एम. इन्व्हायरो प्रा. लि. मुंबई आणि अमिन प्रा. लि. अहमदाबाद या कंपन्यांनी ई-निविदा सादर केल्या. १६ जुलै रोजी कागदपत्रांची पडताळणी केली असता, अमिन एक्युपमेंट कंपनीच्या कागदपत्रांमध्ये पूर्तता आढळून आली नाही. उर्वरित दोन कंपन्यांपैकी क्लिनटेक प्रा. लि. कंपनीचे काम चांगले असल्याचा निष्कर्ष महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीनंतर काढला. तीन महिन्यांच्या करारासाठी तब्बल ९९ लाख रूपये यासाठी खर्ची पडणार असून, पैशांच्या उधळपट्टीनंतरही गोदा स्वच्छ होण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान महापालिका प्रशासनाने अगदी किरकोळ खर्चात नदी स्वच्छतेसाठी यंत्रणा उभारली होती. सिंहस्थ संपताच ही यंत्रणा दूर सारत आता खर्चिक मशिनरी तीही भाडेतत्त्वावर चालवण्याचा घाट घातला जातो आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावावर स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेमोसमीने घेतले दोन बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कळवण/सटाणा दुष्काळ, गारपीट व बेमोसमी पाऊस यामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे दडपण वाढत असून, अस्मानी संकटाला धास्तावलेल्या कळवण व सटाणा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून झालेल्या बेमोसमी अवकाळी पावसाने शेतातील कांदा पीक पूूर्णत: उद्धवस्त झाल्याने मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या सावकारी कर्ज फेडणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने सटाणा तालुक्यातील बुंधाटे येथील शेतकरी रामदास काशीराम देवरे (४८) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात पावसाची संततधार सुरूच आहे. रविवारी (दि.२२) सायंकाळी झालेल्या बेमोसमी पावसाने दीड एकर शेतातील कांदा पिकाचे नुकसान झाले. यामुळे अंगावरील कर्जाच्या दडपणाने रामदास देवरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक अल्पवयीन मुलगा आहे. मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून शोकाकुल वातावरणात अंतविधी करण्यात आला. दरम्यान, सहकारी संस्था, फायनान्स व हात उसणवार घेतलेल्या कर्जाच्या वाढत्या भारामुळे कळवण येथील शेतकरी दीपक मोतीराम निकम (४१) यांने गुरुवारी घरात इंजेक्शनद्वारे विषप्राशन करून आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली. निकम यांनी कळवण बु. विविध कार्यकारी सोसायटीकडून व शहरातील पतसंस्थाकडून कर्ज घेतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांविरोधात रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणी प्रश्नाहून कलेक्टर ऑफिसच्या आवारात पेटलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शेतकरी तसेच पत्रकारास केलेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी सोमवारी निदर्शने केली. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर रास्तारोको करण्यात आल्याने या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला.

शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र महाजन यांच्यावर पोलिसांनी हेतूपुरस्सर हल्ला केल्याच्या निषेधार्थ डावी लोकशाही आघाडी व पुरोगामी संघटना आणि आयटक कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करीत पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांना निलंबित करण्याची मागणी या संघटनाच्या वतीने करण्यात आली. निदर्शनांना सुरुवात झाल्यानंतर या परिसरात थोडाच वेळात ट्रॅफिक जाम झाली. यामुळे सीबीएस, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, एमजी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा या परिसरातील वाहतुकीवर चक्काजामचा परिणाम सुमारे तासभर दिसून आला. ट्रॅफिक पोलिसांना वाहतुकीच्या नियोजनासाठी चांगलीच धावपळ करावी लागली.

पुरोगामी संघटनांच्या वतीने डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, राजू देसले, मनीष बस्ते, वसुधा कराड, मिलींद वाघ, शांताराम चव्हाण, विजय बागूल, पद्माकर इंगळे तर नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष यशवंत पवार, मोतीराम पिंगळे, सुभाष पुरकर, शशीकांत पगारे, दीपक निकम आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कानेटकर उद्यान कोमात!

$
0
0

प्रेमीयुगलांसह टवाळखोरांचा बनला अड्डा; महापालिकेच्या खर्चावर पाणी नामदेव पवार, सातपूर नाशिक महापालिकेने गंगापूर गावातील शिवारात निर्सग रम्य परिसरात तब्बल १७ एकरमध्ये उभारलेले वसंत कानेटकर उद्यान सध्या कोमात गेले आहे. उद्यानात पर्यटकांपेक्षा प्रेमीयुगल व टवाळखोरांचाच अड्डा बनला आहे. महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारेल्या कानेटकर उद्यानाला उभारी येणार कधी? असा प्रश्न ना‌शिककरांनी उपस्थित केला आहे. नागरी सुविधा देतांना महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी उद्यानांची निर्मिती केली आहे. परंतु, काही ठराविकच उद्याने सोडली तर, इतर उद्याने आजारी पडलेल्या रुग्णांसारखीच आहेत. गंगापूर परिसरात महापालिकेचे तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांनी सन २००४ मध्ये वसंत कानेटकर उद्यानाची मुहूर्तमेढ रोवली होती. यानंतर उद्यानात जाँगिग ट्रॅक व वृक्षांची लागवड करण्यात आली. नगरसेवक दिनकर पाटील यांच्या कार्यकाळ सन २००८ मध्ये दुसऱ्या टप्याचे काम हाती घेण्यात आले. यावेळी उद्यानात खेळणी तसेच संरक्षक भिंत महापालिकेने बांधली होती. परंतु, १७ एकरमधील उद्यानाची देखभाल करण्यासाठी केवळ दोन कर्मचारी असल्याने नगरसेवक पाटील यांनी बचतगटाकडे उद्यानाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी तत्कालीन आयुक्तांकडे केली होती. नगरसेवक पाटील यांची मागणी मान्य होत चार महिला बचतगटांच्या माध्यमातून कानेटकर उद्यानाची देखभाल केली जात होती. परंतु, महापालिका प्रशासनाचे महिला बचतगटांकडून उद्यानांची कामे काढून घेतल्यानंतर उद्यानांची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप नगरसेवक पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे सतरा एकरच्या उद्यानात केवळ एकाच कर्मचाऱ्याची नेमणूक केल्याने संबंधित कर्मचारी काय आणि कोणती कामे करणार हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्यानात मोठ्या प्रमाणावर गाजर गवत झुडपे वाढली असून जाँगिंग ट्रॅक गायब झाला आहे. नगरसेविका लता पाटील यांनी उद्यानाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेविका पाटील यांनी केला. महापालिकेने आतापर्यंत पाच कोटी रुपये कानेटकर उद्यानावर खर्च केले आहे. तो सर्व खर्च व्यर्थ गेल्याचा आरोपही नगरसेविका पाटील यांनी केला आहे. संरक्षक जाळ्या झाल्या गायब महापालिकेने कानेटकर उद्यानात दुसऱ्या टप्प्यात संरक्षक जाळ्या उभारल्या होत्या. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून महिला बचतगटांकडून काम महापालिकेने काढून घेतल्यानंतर उद्यानाला बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्याच चोरट्यांनी गायब केल्या आहेत. यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम पावसाळ्या अगोदर महापालिकेच्या सहाही उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांकडून कानेटकर उद्यानाची स्वच्छता करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर महापालिकेतील उद्यानाचे एकही अधिकारी कानेटकर उद्यानात पाहाणीसाठी गेले नाही. त्यामुळे डोक्याहून अधिक उंचीचे जंगली गवत उद्यानामध्ये वाढले आहे. वाढत्या गवतामुळे या उद्यानात साप आणि अन्य जनावरांची गर्दी दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनई चौघड्याचे स्वर गुंजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चातुर्मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तब्बल सहा महिन्यांपर्यंत लग्नसमारंभांना लागलेला ब्रेक आता तुलसी विवाहानंतर पुन्हा मोकळा झाला आहे. यामुळे आजपासून (दि.२४) पुन्हा सनई चौघड्याचे स्वर गुंजणार आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षात विवाहाचे तब्बल ८० मुहूर्त आहेत. यामुळे आता बाजारपेठही गजबजणार आहे.

गत कालावधीत कुंभमेळ्यामुळे सलग सहा महिन्यांपर्यंत विवाहाचे मुहूर्त नव्हते. सोमवारी तुलसी विवाह पार पडल्यानंतर आजपासून पुन्हा विवाह सोहळ्यांना सुरुवात होत आहे. यामुळे आता मंगल कार्यालय, लॉन, फुले, केटरिंग, टेण्ट हाऊस बुकिंग, सोने खरेदी, कापड खरेदी, फर्निचर खरेदी आदी व्यवसाय तेजीत येणार आहेत. साधारणत: एप्रिल महिन्यापर्यंत सर्वाधिक मुहूर्तांवर वधू-वर पक्षांचा भर असण्याची शक्यता पंचागकर्ते प्रा. हर्षद महाजन यांनी व्यक्त केली. पुढील वर्षात मे आणि जून महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने तत्पूर्वीच विवाहाच्या आयोजनावर भर दिला जाणार आहे. यानंतर जुलै महिन्यातही अत्यल्प मुहूर्त हाती आहेत. यामुळे डिसेंबर ते एप्रिल या कालावधीदरम्यान सर्वाधिक विवाह सोहळ्यांचे आयोजन होणार आहे.

ज्योतीष शास्त्राच्या संदर्भानुसार सिंह राशीमध्ये गुरू असताना विवाह मुहूर्त नसतात. मात्र, यास अपवाद म्हणजे १६ अंश आणि ४० कलांनी पुढे सरकणारा गुरू विवाह मुहूर्तास ग्रीन सिग्नल देतो, अशी माहिती नाशिक पंचागकर्ते प्रा. हर्षद महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-लर्निंगमुळे भार होणार हलका

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : दप्तराचे ओझे कमी करण्याविषयी शाळांना देण्यात आलेल्या सूचनांवर मार्ग काढत 'ई-लर्निंग' शिक्षणपद्धतीचा अवलंब शहरातील शाळा करीत आहेत. वह्या-पुस्तकांच्या भारावर तंत्रज्ञानात्मक पद्धतीने मार्ग काढत तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा स्तुत्य उपक्रम शाळांमध्ये राबवत असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल साक्षरता आणण्यासाठी सध्या सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी डिजिटल हा शब्द विशेष ठरत आहे. प्रत्येक विषयाची वही व पुस्तक यामुळे दप्तराचा भार हा गरजेपेक्षा कित्येक पटीने वाढत असतो. हा भार कमी करण्याच्या दृष्टीने पुस्तके आणण्याच्या संख्येवर शाळा आता मर्यादा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. याचसाठी ई-लर्निंग लॅबला प्राधान्य दिले जात आहेत.

अनेक महत्त्वाच्या अभ्यासक्रम प्रकाशकांनीही अभ्यासक्रम ऑनलाइन स्वरुपात आणला आहे. यामध्ये बालभारती, नवनीत यांसारख्या प्रकाशनांचाही समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही विषयाचे पुस्तक घेऊन जात दप्तराचे ओझे वाढविण्यापेक्षा थेट स्क्रिनवर पाहून अभ्यास करणे व त्याच्या नोट्स काढणे, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शाळांच्या आर्थिक क्षमतेनुसार या लॅब तयार करण्यात आल्या आहेत. तर काही शाळांमध्ये आमदार निधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनुसार लॅब तयार करण्यात आल्या आहेत. प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्रिनवर विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगणे, कॉम्प्युटर लॅबमध्ये त्याबाबत उजळणी करुन घेणे आदी बाबी या माध्यमातून दिली जात आहे. सध्या उन्नती विद्यालय, सरस्वती पाटील विद्यालय, बालविद्या प्रसारक संचलित आदर्श बालविद्यामंदिर, नाशिक एज्युकेशन सोसायटीची सारडा कन्या विद्यालय, के. व्ही. एन. नाईक संस्था संचलित नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा आदींमध्ये अशा प्रकारची लॅब कार्यरत असून, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

असा होणार लाभ

शाळांमध्ये ई-लर्निंग लॅबमुळे विद्यार्थ्यांना कमीत कमी वह्या-पुस्तके आणावी लागणार आहे. कारण शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी कॉम्प्युटरवरच केली जाणार असल्याने पेपरलेस ही संकल्पना येथे रुजवली जाणार आहे. याचा मोठा लाभ दप्तराचे ओझे घटवण्यास होणार आहे.

आजच्या काळात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. हे या माध्यमातून मिळू शकेल. शिवाय, दप्तराच्या ओझ्याविषयी ज्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजवू शकेल.

नंदलाल धांडे, मुख्याध्यापक, उन्नती विद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोड प्रक्रियेवर संशय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड शहरातील वृक्षतोडीला हरकतीसाठी महापालिकेने फक्त २४ तासाची मुदत दिली आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वृक्षसमिती सदस्य व महापालिका यंत्रणेवर गुन्हा दाखल करावा, असा विनंती अर्ज वृक्षप्रेमींतर्फे कोर्टाला करणार असल्याचे वृक्षप्रेमी अश्विनी भट यांनी नमूद केले. शहरातील ६३ झाडे तोडण्यासाठी आणि ४९ झाडांचा विस्तार कमी करण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, हायकोर्टाच्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप होत आहे. वृक्षतोडीला हरकतीसाठी एक महिना अगोदर नोटीस न देता महापालिकेने २४ तासाचा अवधी दिला आहे. मोजक्या खपाच्या एकाच वृत्तपत्रातून ही नोटीस दिल्याचे भट यांचे म्हणणे आहे. गेल्यावेळी हायकोर्टाच्या आदेशाने जनसुनावणी झाली तेव्हा आघाडीच्या सर्व वृत्तपत्रांमधून महापालिकेने वृक्षतोडीची नोटीस दिली होती. यंदा नोटीसमध्ये झाडांचे वय, उंची घेर, प्रजाती, पुनर्रोपणाचा उल्लेख नाही. झाडांवर पंधरा दिवस आधी नोटीस चिकटवणे कायद्याने आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत बरसला पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प गेल्या तीन दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसाने देवळाली परिसराला झोडपून काढले. पावसामुळे व्यावसायिकांसह विद्यार्थी व नोकरदारांची धावपळ उडाली. हिवाळ्यात रेनाकोट शोधण्यासाठी घराघरांमध्ये धावपळ दिसून आली. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पावसाने अचानक हजेरी लावल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. शाळेतून सुट्टी होण्यापूर्वी आलेल्या पावसाने अनेक विद्यार्थी शाळेच्या आवारातच थांबले. रविवारीही आलेल्या पावसामुळे येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात व्यावसायिकांची पळापळ झाली होती. सोमवारीही मुसळधार सरींनी दुकानदार तसेच शालेय विद्यार्थ्यांची त्रेधातिरपिट उडवून दिली. जुने बस स्थानक परिसरात थांबलेल्या प्रवाशांना अचानक आलेल्या पावसाने कुठे आडोसा घ्यावा याचा उलगडा होत नव्हता. दिसेल त्याजागी दुकानांसमोर गर्दी करीत पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिक धावतांना दिसून आले. वाहनांमुळे लामरोडसह बाजार भागात साचलेले पाणी अनेकांच्या अंगावर उडत होते. द्राक्षउत्पादक धास्तावले बेमोसमी पावसाला सुरूवात झाल्यापासून द्राक्ष बागाईतदार वर्गाची द्राक्षाला लागणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी फवारणीही सुरू केली. मात्र सायंकाळच्या सुमारास पुन्हा आलेल्या पावसाने हजारो रुपयांच्या औषधांचे नुकसान झाले. अशा बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागासोबत शेतात उभे असलेल्या पिकालाही डावण्या आणि अन्य तत्सम रोगांची भीती असते. यामुळे देवळालीसह ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग धास्तावला आहे. ढगाळ वातावरणाचा पिकावर गंभीर परिणाम होण्याची त्यांना धास्ती आहे. रेस्ट कॅम्प रोडवर वृक्ष कोसळला रेस्ट कॅम्प रोडवर असणाऱ्या वर्कशॉप समोरील बाजूस अचानक बाभळीचा वृक्ष कोसळल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेस्ट कॅम्प रोडवर अशी अनेक जुनी व एक बाजूला कललेली अनेक वृक्ष असून याबाबत लष्करी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशी अनेक जुनी झाडे कोसळून ‌जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देवळालीत सातत्याने जुनी वृक्ष कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिनकर पाटलांचा पालकमंत्र्यांना `घरचा आहेर`

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडताना नाशिककरांचा कोणताही विचार झाला नाही. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा अन्याय केला असल्याची टीका भाजपाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी पालकमंत्र्यांवर टीका करून पक्षाला घरचा आहेरच दिला आहे.

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडताना नाशिककरांवर अन्याय झाला. विरोधी पक्षांनी राजकारण करण्यात रस दाखवला. पालकमंत्री महाजन यांनी पाणी सोडण्याचा निर्णय दुख:दायक होता. विरोधी पक्षांनी आंदोलन करण्यापेक्षा जलसंपदामंत्र्यांना भेटून हा निर्णय बदलण्यासाठी दबाव आणणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता या पक्षांनी राजकारण करण्यात धन्यता मानली. आता, धरणे कोरडीठाक पडली असून शेतकरी म्हणून आपण ही शोकांतिका मांडत असल्याचे पाटील म्हणाले. पाणी सोडण्याच्या निर्णयानंतर भाजपातील अनेक पदाधिकारी अस्वस्थ आहेत. मात्र, पक्षविरोधी भूमिका घेण्यास कोणीही धजावलेले नाही. पाटील यांनी पालकमंत्र्यांना घरचा आहेर दिला असून पाटील याच्या या भूमिकेनंतर भाजपमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व पाण्यासारख्या संवेदनशील प्रश्नावर राजकारण करणाऱ्या पक्षांना सर्वसामान्य नागरिक कधीही आपलेसे करणार नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरेशा वेळेअभावी रंगकर्मींची दमछाक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कमी कालावधीत नेपथ्य उभे करणे, प्रकाशयोजनेला पुरेसा वेळ देणे, रंगभूषा व वेशभूषेची जय्यत तयारी करणे या कामांसाठी लागणारा वेळ कमी पडत असल्याने किमान दोन तास आधी रंगमंच ताब्यात मिळण्याची गरज रंगकर्मींकडून व्यक्त होत आहे. पुरेशा वेळेअभावी त्यांची दमछाक होत असून, कोणत्याच गोष्टीसाठी हवा तितका वेळ देता न आल्याने नाटकावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची रंगकर्मींची ओरड आहे.

नाशिकला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात गेल्या आठवड्यापासून हौशी मराठी नाट्य स्पर्धा सुरू आहेत. याठिकाणी धुळे आणि नगर येथूनही नाटक करण्यासाठी रंगकर्मी येतात. नाशिक हे तीन केंद्रांचे मिळून एक केंद्र बनलेले आहे. असे असताना बाहेरगावाहून येणाऱ्या नाटकांसाठी व स्थानिक नाटकांसाठी ठराविक वेळेलाच रंगमंच उपलब्ध करून दिला जातो. परंतु त्यामुळे होते काय की नेपथ्य, प्रकाशयोजना टेस्टिंग, रंगभूषा व वेशभूषा यासाठी जितका वेळ दिला जावा तितका मिळत नसल्याने चटावरचे श्राध्द उरकावे तसे नाटक उरकून घ्यावे लागते. ही बाब प्रतीच्या दृष्टीने विपरित ठरत असल्याची रंगकर्मींची भावना झाली आहे. रंगमंच उशिरा ताब्यात मिळाल्याने एकीकडे नाट्य दिग्दर्शकच रंगमंच तपासून बघत असतो, नेपथ्याकडे तोच लक्ष ठेवतो, परीक्षकांना हवे नको ते पुरविण्याची जबाबदारीही दिग्दर्शकाकडेच असते. या सर्व बाबींमुळे त्याला हवा तितका वेळ सर्व गोष्टींसाठी देणे शक्य होत नसल्याची ओरड होत आहे.

रंगमंच ताब्यात मिळणे ही नाटकासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. पूर्वी आधीचे नाटक संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या नाटकासाठी रंगमंच ताब्यात देण्यात येत असे. त्याचा फायदा असा होत असे की दिग्दर्शक रात्रीच सेट लावून तयार असत. दुसऱ्या दिवशी अंतिम हात फिरविण्यासाठी थोडा वेळ मिळून जात असे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊनंतर रंगमंच ताब्यात मिळायला लागला. त्यावेळीही धकून जात असे मात्र शासनाच्या धोरणामुळे आता केवळ एका शोसाठीच नाट्यगृह घेतले जात असल्याने रंगमंच लावण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळत असल्याची तक्रार रंगकर्मी करीत आहेत.

शासनाच्या दुर्लक्षाची रंगकर्मींना शिक्षा

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे ही हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात येते. परंतु एकूणच राज्यातील या स्पर्धांकडे शासनाचे किती लक्ष असते हे सर्वश्रृतच आहे. दोन किंवा तीन शोसाठी नाट्यगृह बूक करण्याचे औदार्य शासन दाखवणार आहे की नाही असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होत आहे. एका शोसाठी नाट्यगृह बूक असेल तर रंगकर्मींना वेळेच्या अडचणी येणारच अशी प्रतिक्रिया रंगकर्मींच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंद्रिय दूध निर्मितीवर चर्चासत्र

$
0
0

कृषीथॉन २०१५ चे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ह्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीथॉन - २०१५ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दि. २८ नोव्हेंबर रोजी सेंद्रिय दूध उत्पादन निर्मितीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

कृषीथॉन प्रदर्शनात दुग्ध व्यावसायिकांसाठी डेअरी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सेंद्रिय दूध उत्पादन काळाची गरज या विषयावर चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्रात दूध उत्पादकांना सेंद्रिय दुधासंदर्भात डॉ. मिलिंद भणगे व डॉ. प्रकाश झांबरे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आदर्श दूध उत्पादनांचे तंत्र व मंत्र या विषयावर पशुवैद्यकीय कॉलेजचे प्राध्यापक डॉ. नितीन मार्कंडेय यांचे मार्गदर्शन करणार आहेत. दुग्ध व्यवसायाला पुरक असलेले असंख्य तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत. त्याची माहिती दुग्ध उत्पादन तंत्र, उपाययोजना, वितरण व्यवस्था याचे मार्गदर्शन तसेच संभाव्य मार्केट, संधी, व्यवसाय वृध्दी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डेअरी एक्स्पोमध्ये पशु आहार, औषधोपचार याची माहिती, डेअरीपुरक उपकरणे, उत्पादक पुरवठादार यांची माहिती, दूध प्रक्रिया आणि पॅकिंग साधने, पशू पोषक आहार आणि त्याचे पुरवठादार, डेअरी उत्पादने, प्रक्रिया आणि वितरण व्यवस्था, संशोधन संस्थांची माहिती आणि डेअरी व्यवसायपुरक उत्पादनांचे

उद्योग, सेवादार यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या एक्स्पोमध्ये दुग्ध व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक साहील न्याहारकर यांनी केले आहे.

तयारी पूर्णत्त्वाकडे

गेल्या काही दिवसांपासून कृषीथॉन-२०१५ या कृषिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. शहरातील ठक्कर्स डोम, एबीबी सर्कल पी. टी. सी. समोर, त्र्यंबक रोड येथे प्रदर्शन भरणार आहे. मोठे डोम उभारण्यात येत असून, पावसाने स्टॉलधारकांचे नुकसान होऊ नये याकरिता वॉटरप्रूफ डोम उभारले आहेत. तसेच, संपूर्ण डोम हे वूडन प्लॅटफॉर्मवर बांधण्यात येत आहे. कृषीथॉन प्रदर्शनात २५० ते ३०० स्टॉल्स असणार आहेत. ज्यात डेअरी एक्स्पो, फ्रूट अॅण्‍ड व्हेजिटेबल एक्स्पो, अॅग्रो करिअर जॉब फेअर, शासनाच्या कृषी विभागाचे स्टॉल्स असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रामन्यायालयाचा निश्चितच उपयोग’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जगण्याच्या अधिकारात न्यायाची हमी मिळावी. गावागावातील शांतता सलोखा व सामजंस्य टिकावे. तसेच, न्यायप्रक्रिया अधिक जलद गतीने व्हावी, यासाठी या ग्रामन्यायालयाचा निश्चित उपयोग होईल. मात्र, न्यायालयाचे दार ठोठावण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी व कर्तव्य ओळखून स्वतःला तपासून पहावे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

देवळा येथील प्रथमच सुरू केलेल्या ग्रामन्यायालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद करंजकर होते. न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले की, खरे तर नात्यातील दुरावा संपणे, सामाजिक स्थिती बिघडणे, तंटे बखेडे निर्माण होणे यातून न्यायालयाची गरज भासू शकते. यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा खर्च होतो. तसे होऊ नये म्हणून वकीलवर्गाने योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त व्यक्त केली. अॅड. शशिकांत पवार यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी कळवणचे दिवाणी न्यायाधीश सखाराम नाईक, सहन्यायाधीश सुनीता पैठणकर, अॅॅड. नितीन ठाकरे, उषा बच्छाव, केदा शिरसाठ, जनुभाऊ आहेर, जि. प. गटनेते रवींद्र देवरे, प्रांताधिकारी भीमराव दराडे, तहसीलदार कैलास पवार, प्राचार्य हितेंद्र आहेर जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात माघार; जिल्ह्यात धुंवाधार

$
0
0

नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाची सर्वाधिक नोंद; सुरगाणा तालुका कोरडाच!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मान्सून हंगामात पाठ फिरविणारा पाऊस अवकाळीच्या रुपाने संकट घेऊन पुन्हा शेतकऱ्यांच्या उरावर बसला आहे. नांदगावसह, देवळा, कळवण, येवला, चांदवड आणि बागलाण तालुक्यामध्ये हजेरी लावत या अवकाळी पावसाने उभी पिके अक्षरश: झोडपून काढली. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बीची पिकेही हातची जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरता कोलमडला आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत २३९ मिलीमीटर तर शहरात ३.४ मिमी पावसाची नोंद झाली.

अवकाळीने धिंगाणा घालण्याचे यंदाचे सलग चौथे वर्ष आहे. पिकांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेणाऱ्या शेतकऱ्याचा खरिपाचा हंगाम वाया गेला. मान्सूनने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले. त्यामुळे खरिपातील पिके शेतकऱ्याच्या हाती लागू शकली नाहीत. धरणेही भरू न शकल्याने पिके जगवायची कशी या चिंतेत शेतकरी असताना आता अवकाळी पावसाने धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने रब्बी पिकेही हातची जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. रविवारी जिल्ह्यातील नऊच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली

होती. मात्र, सोमवारी पावसाने सुरगाणा वगळता अन्य सर्वच तालुक्यांकडे मोर्चा वळवला. एकट्या नांदगाव तालुक्यात सोमवारपासून ते मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत सर्वाधिक ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल देवळ्यातही ४२ मि. मी. पाऊस पडल्याची मा‌हिती जिल्हा प्रशासनाने दिली. कळवणमध्ये ३३.९ मि. मी. पाऊस झाला. सिन्नरमध्ये २९.० तर बागलाण आणि चांदवडमध्ये अनुक्रमे २२ आणि १६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. रविवारी सर्वात कमी पाऊस निफाड तालुक्यात २.८ मि.मी. इतका झाला.

पिकांवर रोगांचे सावट

या पावसामुळे द्राक्ष बागांवर डावण्या व बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता बळावली आहे. असेच वातावरण आणखी दोन दिवस कायम राहिले तर कांदा पिकावरही रोग पडण्याची भीती शेतकऱ्याला सतावू लागली आहे. या पावसामुळे भात पाण्यात भिजला आहे. टोमॅटोवर करपा रोग पडून पाने गळण्याची शक्यता बळावली आहे. सध्याच्या रोगट वातावरणामुळे मानवी आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता देखील बळावली आहे.

धरण क्षेत्र कोरडेच

अवकाळीमुळे एकीकडे पिकांना धोका निर्माण झाला असताना धरणक्षेत्रालाही या पावसाचा फारसा फायदा नसल्याचे पहावयास मिळत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यासारख्या क्षेत्रांमध्ये अवघा सहा आणि तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढण्याकामी या पावसाचा उपयोग नाही. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला तरच गंगापूर, दारणासह अन्य धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होऊ शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गारपीट टळल्याने दिलासा

जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात २२ ते २४ नोव्हेंबर या तीन दिवसात गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, त्यातील २२ आणि २३ नोव्हेंबर या दोन दिवसात गारपीट न झाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. हवामानाचा अंदाज चुकला असला तरी मंगळवारी देखील गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने अजूनही शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.


शहरात ३.४ मि.मी. पाऊस

सलग तिसऱ्या दिवशी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले. त्यामुळे सायंकाळी पाचपासूनच अंधार होण्यास सुरुवात झाली. नाशिकचे सोमवारचे तापमान किमान २०.४ अंश सेल्सियस तर कमाल तापमान ३० अंश सेल्सियस ऐवढे राहिले. सकाळी साडेआठपर्यंत शहरात ३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी मात्र केवळ पावसाची भूरभूर झाली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर परिसरात दुचाकी पेटवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडसह उपनगर परिसरात वाहन जाळपोळीचे सत्र सुरूच आहे. उपनगर येथे घरासमोर उभी दुचाकी जाळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पंचशीलनगरमध्ये राहणारे हरेंद्र जग्गनाथ पगारे यांनी रविवारी रात्री घरासमोर आपली दुचाकी (एम.एच.१५ए.ई. ८६६२) उभी केली होती. मध्यरात्री अज्ञात व्यक्तांनी त्यांची दुचाकी पेटवून दिली. जळण्याचा वास आल्याने पगारे घराबाहेर आले असता दुचाकी पेटलेली दिसली. तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बसचालकाचा मृत्यू

शिंदे गावात महामार्गावर बसची वाट पाहत असलेल्या बसचालकाला ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गावाचे रहिवासी भरत लक्ष्मण निंबाळकर हे एसटी महामंडळात सेवेत आहेत. ते कामावर जाण्यासाठी सोमवारी पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर बसची प्रतीक्षा करीत होते. त्याचवेळी सिन्नरहून नाशिककडे वेगाने चाललेल्या ट्रकने (एम.एच.१२ क्यू. क्यू. ८८९२) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात निबांळकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जेलरोडला घरफोडी

जेलरोड येथे सुमारे पावणेतीन लाखाची घरफोडी झाली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश गणपती करंजकर (वय ६५, आसावरी बंगली, लोखंडे मळा, सायखेडा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २० ते २१ नोव्हेंबरला करंजकर कुटुंबीय घरी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून बेडरूममध्ये प्रवेश केला. लाकडी कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली.

महिलेचा मृत्यू

सातपूर : सातपूर कॉलनीतील समतानगर भागात राहणाऱ्या सुरेखा विजय जाधव (वय ३५) यांना पहाटे साडेसात वाजता घरातील पिण्याच्या इलेक्ट्रिक पंपाचा झटका लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. भाऊ सोमनाथ शिंदे यांनी सुरेखा यांना जिल्हा रुग्णालायत दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. सातपूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सहाय्यक पोलिस निरिक्षक वाघ अधिक तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

सातपूर : सातपूरच्या अशोकनगर भागात राहणारा आशिष दत्तात्रय खांडगे (वय २७) या तरुणाने २१ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास विषारी औषध सेवन केले होते. यानंतर पहाटे आशिषचे वडील दत्तात्रय खांडगे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. सातपूर पोलिसात नोंद करण्यात करण्यात आली आहे.

युवकाचा मृत्यू

वेगात जाणाऱ्या अल्टोकारने फ्लायओव्हरवरील डिव्हायडरला धडक दिल्याने सौरव शंकर आव्हाड (वय १८) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई नाक्याकडून द्वारकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात आणखी दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्याबाबत अधिक माहिती घेण्याचे तसेच अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्याचे उशिरापर्यंत भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड कारागृहात कैद्यांकडून मोबाइल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांकडे मोबाइल आढळल्याने खळबळ उडाली आहे. कारागृहाचे रक्षक अब्दुल गणी शेख हे शनिवारी (ता.२२) दुपारी गस्तीच्या ड्युटीवर होते. गस्त घालत असताना मंडल क्रमांक ७ मधील यार्ड क्रमांक दोनमध्ये असलेला कैदी लक्ष्मण धनेश चव्हाण याच्या हालचालींबाबत शेख यांना संशय आला. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निर्दशनास आणून दिली. दरम्यानच्या काळात चव्हाणने प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली वस्तू बाहेर फेकली. त्याचा साथादीर अनिल रामशकल शर्मा याचीही चौकशी केली असता त्याने यार्डा नजिकच्या शौचालयाजवळ एका प्लास्टिकच्या पिशवीत लपवलेले दोन मोबाइल कारागृह अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

८० किलो मांस जप्त

भद्रकाली परिसरात बैलाचे ८० किलो वजनाचे मांस व इतर अवयव जवळ बाळगणाऱ्या संशयित आरोपीविरोधात भद्रकाली पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायद्यानुसार कारवाई करीत अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन कोटींचा खर्च वाया!

$
0
0

उद्यान वापराविना पडून; महापालिकेकडून प्र‌लंबित कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा
नामदेव पवार, सातपूर शहरात येणाऱ्या पर्यटकांना विशेष आर्कषण असलेल्या सोमेश्वर धबधब्याजवळ महापालिकेने उभारलेले गोदावरी परिचय उद्याने वापराविनाच पडून आहे. या उद्यानासाठी महापालिका प्रशासानाने आतापर्यंत तब्बल तीन कोटी रुपरे खर्च केले आहेत, ते वाया गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उद्यान खुले करण्याची मागणी केली जात असतांना महापालिका प्रशासनाकडून प्रलंबित कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा असल्याचे उत्तर दिले जात आहे. नदीकाठी गोदावरीचा परिचय पर्यटकांना व्हावा या हेतूने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्रूत्थान योजनेतून या उद्यानाची उभारणी केली जात आहे. तत्कालीन नगरसेविका नगरसेविका इंदुमती काळे यांच्या कार्यकाळात तत्कालीन महापौर विनायक पांडे, तत्कालीन आयुक्त भास्कर सानप यांच्या उपस्थितित डिसेंबर २०११ मध्ये या उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर वर्षभरात उद्यान कंत्राटदाराने बरीच कामे केली मात्र, उद्यान अद्याप पूर्ण झालेले नाही. गोदावरी परिचय पर्यटकांना व्हावा असा उद्यान निर्मितीमागील मूळ उद्देश होता. मात्र, कंत्राटदाराने केवळ झाडे लावून, संरक्षक भिंत उभारत आणि डोम बांधले. यातून गोदावरीचा कोणताही परिचय होत नाही. त्यामुळे नगरसेवक विलास शिंदे यांनी उद्यानात गोदावरीचा परिचयाची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आता पर्यंत चार वेळा महापालिका प्रशासनाकडे उद्यान पूर्ण करण्याची मागणी केली मात्र, आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. साहित्य गेले कुठे? गोदावरी परिचय उद्यानाच्या भुमिपूजनावेळी माजी महापौर विनायक पांडे यांनी गोदावरीचा इतिहास गोदावरी परिचय उद्यानातून साकारला जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु, सध्या उद्यानाचे साहित्य गेले कुठे ? गोदवरी परिचय उद्यान असे नाव केवळ नाममात्र ठेवले की, काय असा सवाल पर्यटक उपस्थित करत आहेत. मद्यपी-जुगारींचा अड्डा गोदावरी परिचय उद्यानात मद्यपी आणि जुगाराचे अड्डे सर्रासपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. धबधब्याला पाणी असो वा नसो सुट्टीच्या दिवशी हमखास पर्यटक येथे येतात. मद्यपी व जुगाऱ्यांचा पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोदावरी तीरावर सोमेश्वर धबधब्याला लागून महापालिकेने गोदावरी परिचय उद्यान उभारले आहे. मात्र, तीन वर्षांपासून उद्यान बंद आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक नाराज होतात. महापालिकेने उद्यान पूर्ण करून त्याचे लोकार्पण केले पाहिजे. - योगिता खताळे, रहिवाशी, गंगापूरगाव

सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची नेहमी गर्दी असते. बालाजी मंदिरात देखील भाविक मोठ्या संख्येने येतात. मात्र, गोदावरी परिचय उद्यान बंद असल्याचे पाहून पर्यटकांचा हिरमोड होतो. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - अरुण सोनवणे, पर्यटक

नाशिकसह मराठवाड्यातील महत्त्वाची नदी म्हणून गोदावरीची ओळख आहे. गोदावरीचा परिचय पर्यटकांना व्हावा या हेतून या उद्यानाची उभारणी करण्यात आली. मात्र, येथे गोदावरीचा परिचय कुठे आहे? उद्यान सुरू कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतो. - बाळासाहेब पाटील, रहिवाशी, गोवर्धनगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोसाठी महापालिकेची धावाधाव

$
0
0

स्थायीवर प्रस्ताव; २२ हजार वृक्षारोपणही हातघाईवर म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबाद येथील कचरा डेपोसाठी आरक्षित असलेली ४१ हेक्टर जमीन हातातून जाण्याची शक्यता असल्याने ही जमीन वाचविण्यासाठी पालिकेने धावाधाव सुरू केली आहे. शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत या जमिनीसाठी ३८ कोटी रुपये मोबदला देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर शहरात वृक्षारोपणाची घाईही महापालिकेला झाली असून, तब्बल २२ हजार वृक्षरोपे ठेकेदारामार्फत लावण्याचेही प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आले आहेत.

शुक्रवारी महापालिकेची स्थायी होणार असून, त्यात मखमलाबाद येथील प्रस्तावित कचरा डेपोच्या ४१ हेक्टर जमीनच्या आरक्षण बदल्यात ३८ कोटी ५८ लाख रुपये अदा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. कचरा डेपोचे आरक्षण असलेल्या एका शेतकऱ्याच्या जमिनीवर आरक्षण हाय कोर्टाने उठविले आहे. त्यामुळे उर्वरीत आरक्षण जावू नये म्हणून प्रशासनाने घाई गडबडीत ३८ कोटी ५८ लाख रुपये अदा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे स्थायीला हा प्रस्ताव मंजूर करावा लागणार आहे. तर दुसरीकडे स्थायीवर तब्बल २२ हजार वृक्षरोपे कंत्राटदारामार्फत शहरातील विविध भागात लावण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंनाही नकोय आऊटसोर्सिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी भरती करण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विरोध दर्शवला आहे. स्थानिक भूमिपुत्रांनाच न्याय देण्याच्या सूचना त्यांनी महापौरांसह आयुक्तांना केल्या आहेत. सोबतच घंटागाडी व पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यांचे प्रस्ताव तत्काळ मार्गी लावण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. शहरांतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

राज ठाकरे मंगळवारी दुपारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी महापौरांसह, आयुक्तांशी चर्चा केली. या बैठकीपूर्वी त्यांनी टाटा फाऊंडेशन व एल अॅन्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वनोद्यानाचा करार तत्काळ

मार्गी लावण्यासह दादासाहेब फाळके स्मारक सीएसआरमधून करण्यावर चर्चा झाली.

दरम्यान, महापौर व आयुक्तांशी चर्चा करतांना, त्यांनी घंटागाडी व पेस्ट कंट्रोलचे विषय तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. हा विषय जास्त दिवस लांबवू नका, अशा सूचना त्यांनी केल्या. सोबतच स्वच्छता कर्मचारी आऊटसोर्सिंगद्वारे भरण्यात त्यांनी विरोध केला. शहरातील स्थानिक भूमिपुत्रांमार्फतच ही कामे करावीत, असे त्यांनी सांगितले. तर शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, त्यांची कामे त्वरित लावा, असेही त्यांनी आदेशित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलीप स्वामी यांनी पदभार स्वीकारला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नांदेडचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मालेगाव अपर‍ जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, त्यांनी नुकताच या पदाचा पदभार रघुनाथ गावडे यांच्याकडून स्वीकारला.

स्वामी यांनी अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो, उपआयुक्त अमरावती महानगरपालिका आदी विविध पदांवर काम केले आहे. पुसद उपविभागीय अधिकारी, नांदेड उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी महसूल विभागाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. मालेगावचे निलंबित अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे.

येथील अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्यावर लाचलुचपत विभागाने कार्यवाही केल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. याआधी देखील येथील प्रांत संदीप पाटील यांच्यावर अशीच कार्यवाही झाली होती तर, तहसीलदार दीपक पाटील यांच्या अनियमित कारभारामुळे ते चर्चेत राहिले होते. नुकतीच त्यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मालेगाव तहसीलदारपदी सुरेश कोळी तर प्रांताधिकारीपदी अजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारीपदी अद्यपा नियुक्ती झालेली नव्हती. आता दिलीप स्वामी यांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता तरी महसूल विभागाच्या कारभारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदु जनजागृती समितीला गोरक्षणासाठी हवीत शस्त्रे

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

गोरक्षणाचे काम करणाऱ्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना गोवंशाची रक्षा करण्यासही मर्यादा येत आहेत. गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना शस्त्र परवाने द्यावेत, अशी मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

अनेकदा गोवंश कत्तलीसाठी नेला जात असल्याचे उघड झाले आहे. गोवंशाची हत्या होऊ नये यासाठी कायदेही करण्यात आले आहेत. मात्र, या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांकडून गोवंश रक्षणाचे कार्य केले जाते. मात्र कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याचे प्रकार हल्ली घडू लागले आहेत. गोरक्षणाचे काम अखंडीतपणे करता यावे यासाठी शस्त्र परवाने द्या, अशी मागणी समितीने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images