Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

त्र्यंबकला पावसामुळे टोमॅटोबागा जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बेमोसमी पावसाचा जोर कायम राहिल्याने टोमॅटो पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारात चांगला भाव मिळत असताना नेमका अवकाळी पाऊस कोसळला आणि टोमॅटोच्या निगा राखलेल्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत.

सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावत टोमॅटो पिकाचे नुकसान केले आहे. जोपासना केलेली टोमॅटो बाग भुईसपाट होत असल्याने यापुढील उत्पनाला मुकावे लागणार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड झाली आहे. वाघेरा, वेळुंजे, अंबोली, शिरसागाव, तळवाडे अंजनेरी, बेझे, चाकोरे या बागायती पट्ट्यात टोमॅटोचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अंबोली येथील सुनील मेढे यांनी यावर्षी लागवड केलेले टोमॅटो पीक जोमदार आले होते. बाजारात भाव चांगला असल्याने पहिली तोडणी त्यांनी उत्साहात सुरू केली. मात्र, सायंकाळी त्याच वेळेस पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आणि डोळयासमोर झाडे जमीनदोस्त झाली. यावर्षी टोमॅटोसाठी केलेला भांडवली खर्च निघणे दुरापास्त झाले असून, आपल्या सारखेच शिवारात किमान शंभर एकरांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

मदतीची गरज

तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहता शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे. भात, नागली, वरई तसेच टोमॅटा आदी पिकांना नुकसानभरपाई देतानाच पशुधनासाठी साठवत असलेला चारा देखील सडला आहे. याची दखल घेण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन्यथा सरकारचा काटा काढू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दलित जनतेच्या पाठिंब्यावरच राज्यात युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेत आम्हाला वाटा आवश्यक आहे. तो मिळाला नाही, तर आम्ही या सरकारचा काटा काढू, असा इशारा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी दिला आहे. आपल्याला राज्यातच नव्हे, तर केंद्रातही मंत्रिपद देण्याचे लेखी आश्वासन भाजपने दिलेले असल्याचा दावाही त्यांनी केला.

खासदार आठवले यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. माझी पत्नी मंत्री होणार ही आवई कोणी उठवली हे माहिती नसल्याचे सांगतानाच, रिपाइंमध्ये भाजपपेक्षा चांगले कार्यकर्ते अन् चांगले

चेहरेही असल्याचा टोला त्यांनी लगावला. मला केंद्रात मंत्रिपद देण्याचे भाजपने कबूल केले असून, तसा लिखित करारच आहे. मित्र पक्षांमध्ये आरपीआय सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपने आश्वासने पाळली पाहिजेत. मंत्रिपदांबरोबरच महामंडळे सुद्धा आरपीआय कार्यकर्त्यांना मिळाले पाहिजेत, असे आठवले यांनी निक्षून सांगितले.

राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आपला विरोध असून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. २६ नोव्हेंबर हा दिवस आरपीआयच्या वतीने संपूर्ण देशभर संविधान दिवस म्हणून पाळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भाजप-सेनेतील वाद मिटवू

सध्याचे भाजप-सेनेमधील भांडण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, आता या दोन्ही पक्षांतील दुही ८० टक्के कमी झाल्याचा दावा आठवले यांनी केला. उर्वरीत दुही कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. सर्व पक्षांनी एकत्रित येवून कामाला लागले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


आमिरचे कान टोचले

देश राज्यघटनेवर चालत असून, देशात गोधरा सारखी स्थिती नसल्याने आमिर खानने देश सोडू नये, अशा शब्दांत आठवले यांनी आमिरचे कान टोचले. नरेंद्र मोदींनी राज्यघटनेला धर्मग्रंथ मानला आहे. आरएसएसचा अजेंडा वेगळा आहे. परंतु, मोदी हे राज्यघटनेवरच राज्य चालवत आहे. देशातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आमीर खानने असे वक्तव्य करू नये, असा सल्ला देतानाच आमिरने देश सोडला तरी त्याला आपण परत आणू, असा दावा त्यांनी केला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहाव्दारे ‘जल हैं तो कल हैं’ चा संदेश

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

नांदगावसह ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे नांदगाव येथील सामाजिक भान जपणाऱ्या भैय्यासाहेब चव्हाण या शिक्षकाने आपल्या मुलाच्या लग्नात सेव्ह वॉटर उपक्रम राबविण्याचे ठरवले असून, लग्नपत्रिकेबरोबर चक्क पाणी वाचवा, पाणी काटकसरीने वापरा हे सांगणारे भावनिक निवेदन देखील वऱ्हाडी मंडळींसह निमंत्रितांना पाठवले आहे.

येत्या १४ डिसेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नात जल हैं तो कल हैं आणि सेव्ह वॉटर, सेव्ह फ्यूचर हा संदेश डिजिटल बॅनर्सद्वारे सर्वांसमोर पोहचणार आहे. पाण्याविषयी जागरूकता आणि पाण्याचे मोल सांगण्यासाठी भैय्यासाहेब चव्हाण यांनी

मुलाच्या लग्नाचा योग्य मुहूर्त शोधला याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या मुलीच्या लग्नात ही चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत आणि समानतेचा नारा देत बेटी बचाव उपक्रम राबवला होता. तसेच, दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या अकरा दाम्पत्याचा थेट लग्नात हृदय सत्कार करून आपले वेगळेपण दाखवले होते.

नांदगाव येथील व्ही. जे. हायस्कूलमधील तांत्रिक विभाग प्रमुख आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य असलेले भैयासाहेब चव्हाण यांचा मुलगा सम्राट याचा विवाह येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे. पण, या लग्नाची पत्रिका पाणी वाचवाचा संदेश देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. पत्रिकेसोबत भोजनाच्या निमंत्रणासह वेगळी अशी पाण्याचे मोल जाणा हे सांगणारी वेगळी पत्रिका पण आवर्जून दिली जात आहे. नवरदेवाच्या वडिलांचे हे सामाजिक भान इतरांनाही अनुकरणीय ठरणारे आहे.

कितना घाटा उठा चुके हैं

हम अपनी मनमानी मै

पानी नही हैं अब गांवों मे

ना ही अब हैं शहरो मैं

हे शब्द लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवले जात आहेत. जल हैं तो कल हैं हा वास्तव मंत्र ही अक्षदांप्रमाणे सर्वत्र वाटला जात आहे. राज्यातील दुष्काळ आणि पाणी परिस्थिती याची जाणीव ठेवत लग्नपत्रिकेद्वारे सकलजन शहाणे करून सोडण्याचा भैयासाहेब चव्हाण यांचा हा प्रयत्न सर्वांची दाद मिळवित आहे. आपल्या परीने हा सामाजिक कार्यातील छोटासा वाटा आणि पाणी जपून वापरण्याची कळकळीची विनंती चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० टक्के लोकांना मिळते अशुद्ध पाणी !

$
0
0

४० टक्के नाशिककरांकडे नाही पक्के घर; २४ टक्के लोक अजूनही वीजेपासून वंचि‌त Jeevan.bhawasar @timesgroup.com २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील ४० टक्के कुटुंबांना राहण्यासाठी पक्के घर उपलब्ध नाही. तर ४८ टक्के लोकांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. समाधानाची बाब म्हणजे तब्बल ७६ टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचली आहे, अर्थात दिवसातून कितीवेळ त्यांना वीज मिळते हा भाग अलहिदा. नाशिक जिल्ह्यातील सुमारे ७ लाख कुटुंब वीट, सिमेंट, पत्रा वापरून बनविलेल्या घरामध्ये राहतात. तर ९५ हजार ३९७ कुटुंबांना झाड्यांची पाने, बांबू, मातीच्या भिंती असलेल्या घरांमध्ये रहावे लागते. बागलाण तालुक्यामधील सर्वाधिक २१ टक्के कुटुंब कच्च्या घरांमध्ये राहत असल्याचे २०११ च्या जनगणनेतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ५२ टक्के लोकांना नळाद्वारे प्रक्रिया केलेले पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. हे शुद्ध पाणी अपेक्षेप्रमाणे नाशिक शहरातील लोकांना सर्वाधिक मिळते. तरीदेखील सुमारे ३००० लोकांना विहिरी उघड्या विहिरीतील पाणी वापरावे लागते. हॅंडपंपद्वारे कळवण, सुरगणामधील सुमारे १३ टक्के नागरिकांना पाणी घ्यावे लागते. जिल्ह्यात या दोन तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्हाभरातील ६ लाख २० हजार कुटुंबांना नळाचे शुद्ध पाणी मिळते. तर पावणे तीन लाख कुटुंब पाण्यासाठी उघड्या विहिरींवर अवलंबून आहेत. जिल्ह्यात धरणे, विहिरी, पाणी पुरवठा योजना यांचे इतके प्रमाण असले तरी सुमारे पावणे ८ हजार कुटुंबाना नळ, विहिर, नदी, हँडपंप, तलाव, बोअरवेल, कालवे अशा कुठल्याच मार्गाने पाणी मिळत नाही. ८,६९० कुटुंबे अंधारात जिल्ह्यातील ११ लाख ८० हजार कुटुंबांपैकी ९ लाख ४ हजार कुटुंबांपर्यंत वीज पोहोचली आहे. तर अडीच लाख लोक रॉकेलचे दिवे वापरतात. सुरगणा, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमारे ६० टक्के कुटुंबांपर्यंत वीज पोहोचली नसल्याने त्यांना रॉकेलचाच आधार आहे. जिल्ह्यातील सुमारे ९ हजार कुटुंब सौर ऊर्जा किंवा इतर माध्यमातून घरात प्रकाश आणतात. मात्र तब्बल ८,६९० कुटुंबांकडे प्रकाश मिळवण्याचा कुठलाही स्रोत नाही. विशेष म्हणजे त्यातील २ हजार कुटुंबे जिल्ह्याच्या शहरी भागातील आहेत. यातील जवळपास निम्मी म्हणजे ९१७ कुटुंबे ही नाशिक शहरातील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईग्रस्त गावांनी प्रस्ताव पाठवावेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

ज्या गावात पाणीटंचाई भासणार आहे, अशा गावांचे प्रस्ताव सरपंच व ग्रामसेवकांनी त्वरित पाठवावे, अशी सूचना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली. मालेगाव तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला पंचायत समितीचे सभापती भरत पवार, उपसभापती यशवंत मानकर, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार सुरेश कोळी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. के. खताळे, पंचायत समित लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. टी. मोराणकर, जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता जयवंत खरे, तसेच कृषी व विद्युत विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

खासदार भामरे पुढे म्हणाले की, ज्या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही अशा विहिरीतील पाणी शुध्द करून घ्यावे. चारा टंचाईसाठी शासनाने सर्व मदत केली आहे. कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांनी

प्रत्येक गावात जाऊन चाराटंचाई विषयी माहिती घ्यावी. मालेगाव तालुक्यासाठी असलेल्या खासदार निधीतून विकासकामे होतील परंतु, केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या राबविण्यासाठी निधी कमी पडणार नाही. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतनिहाय गावांचा पाणीटंचाई, वीजपुरवठा, पाणीपुरवठ्याच्या योजनांबाबत सविस्तर आढावा घेतला.

बैठक केवळ फार्स

संपूर्ण मालेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना येथे झालेल्या आढावा बैठकीत मात्र पंचायत समिती व महसूल विभागाचे अधिकारी, पदाधिकारी याबाबत गंभीर नसल्याचे चित्र पहायला मिळाले. पाणीटंचाई असलेल्या गावांचा आराखडा असेल किंवा टँकर सुरू करण्याची मागणी असेल, कोणत्याही बाबतीत पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात ताळमेळ दिसला नाही. बैठकीत एकाही अधिकाऱ्याकडे संपूर्ण माहिती नसल्याचे खासदार सुभाष भामरे यांच्या निदर्शनास आले. त्यात आपल्या अकार्यक्षम कारभाराला पांघरून घालण्यासाठी पंचायत समिती व महसूल अधिकारी-पदाधिकारी यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलणे, तोंडसुख घेण्यातच धन्यता मानली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

$
0
0

नाशिक : दुष्काळ, अवकाळी पाऊस यांसारख्या आसमानी संकटांबरोबरच कर्जबाजारीपणामुळे हतबल ठरलेल्या दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. गेल्या ४८ तासांत तीन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७० हून अधिक झाली आहे. शामकांत देवराम ठाकरे (वय २९, रा. राहूड, ता. बागलाण) यांनी आणि भगवान लक्ष्मण दिवे (वय ३२, रा. दावचवाडी, ता. निफाड) अशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. सोमवारी तालुक्यातील डांगसौंदाणे येथील शेतकरी रामदास देवरे (४८) यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. ठाकरे यांचा दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला असून, त्यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे. तर दिवे यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीईटी अर्जातील चुका दुरुस्तीसाठी संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अर्जातील चुकांच्या दुरूस्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाइन पध्दतीने माहिती अपडेट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टीईटी १६ जानेवारी २०१६ रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडून या अर्जांमध्ये चुकीची माहिती भरण्यात आली. तर काही प्रकरणांमध्ये यासाठी तांत्रिक चुकाही कारणीभूत होत्या. यानंतर उमेदवारांकडून झालेली ओरड विचारात घेत परिषदेने उमेदवारांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी आता अखेरची संधी उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा अर्ज भरताना उमेदवारांनी स्वत:च्या नावे केलेले लॉग इन उपयोगात आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती अपडेट केल्यानंतर उमेदवारांनी या हार्ड कॉपीपंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे जमा कराव्यात. टपाल किंवा इ मेल पध्दतीने पाठविण्यात येणाऱ्या दुरूस्ती स्वीकार होणार नाहीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांच्या तोंडचे पळाले पाणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईतल्या पाणी वाटप बैठकीत शहराचे ६०० दशलक्ष घनफूट पाणी कपात केल्याने आता आणखी पा‌णीकपातीचा सामना नाशिककरांना करावा लागणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्येच नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाण्याचे आरक्षण टाकतांना बाष्पीभवनाचा विचार झाला नसल्याने महापालिकेवर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळ येणार आहे. त्यामुळे पाणी संकट आणखी गहीरे होणार आहे.

पालकमंत्र्यांनी नाशिक शहरासाठी जुलै अखेरपर्यंत गंगापूर धरण समूहात २७०० तर दारणा धरणसमूहात ३०० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले आहे. शहराचा पाणीपुरवठा गंगापूर धरणावरच जास्त अवलंबून असल्याने ३३०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली होती. मात्र त्यात ६०० दशलक्ष घनफूटची कपात करण्यात आली आहे. तर दारणाच्या पाण्याचा शहराला काहीच उपयोग नाही. तर बाष्प‌ीभवन हे २० टक्के होणार असून हा साठा आणखीनच खालावणार आहे.

सद्यस्थितीत १५ ते २० टक्के पाणीकपात सुरू आहे. ही कपात कायम ठेवल्यास सध्याचे पाणी हे मे अखेरपर्यंत पुरणार आहे. जुलै अखेरपर्यंत हा साठा पुरवायचा असेल तर आणखी १५ ते २० टक्के कपात करावी लागणार आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळ महापालिकेवर येणार असून, हा पाणीपुरवठा करताना पालिकेची कसोटी लागणार आहे.

महापालिकेची कसोटी मुंबईतल्या पाणीवाटप बैठकीत मंजूर झालेल्या पाण्यातून उर्वरीत आठ महिन्यांसाठी पाणीपुरवठा करणे ही महापालिकेसाठी कसोटी ठरणार आहे. सध्याच्या पुरवठ्याप्रमाणे पाणीपुरवठा केल्यास तो केवळ सात महिनेच पुरणार आहे. तर, या मंजूर साठ्याचे बाष्पीभवन गृहीत न धरल्याने त्यात आणखी घट होणार आहे. त्यामुळे महापालिकेला पाण्याची मोठी तूट भरून काढावी लागणार असून, आणखी पाणीकपातीशिवाय पर्याय नाही.

गंगापूर धरणातून उर्वरीत दिवसांसाठी महापालिकेला ३३०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असताना केवळ २७०० दशलक्ष घनफूट पाणी दिले आहे. दारणातून ३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले आहे. सध्या महापालिकेकडून १५ ते २० टक्के पाण्याची कपात केली जात आहे. राखीव साठ्यातून बाष्पीभवन २० टक्के गेल्यास २१०० दशलक्ष घनफूट पाणीच पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे जूनपर्यंत हा साठा पुरणार आहे. ऑगस्ट अखेपर्यंत हे पाणी पुरवायचे असेल तर, सध्याची पाणीकपात आणखी वाढवावी लागणार आहे. सध्या महापालिका दररोज १२.३५ दशलक्ष घनफूट पाणी दररोज उचलते. त्यात आणखी घट झाल्यास कपात २५ ते ३० टक्क्यांच्यावर जाणार आहे. यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठाच बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे एकतर दररोजच्या पुरवठ्यात कपात नाहीतर एक दिवस बंद असा पर्याय स्वीकरावा लागणार आहे. त्यामुळे शहरवासीयांसमोर पाणीकपातीचे गंभीर संकट ओढावणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

विशेष महासभेची शिवसेनेकडून मागणी

राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी नाशिककरांना वेठीस धरले असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी केला असून, पाण्याचे नियोजन करण्यासाठी तातडीने विशेष महासभा बोलविण्याची मागणी केली आहे.

ठाकरेंकडे लक्ष

मुकणे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या पाणीप्रश्नावर काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असून, नागरिकांवर आताच पाणीकपातीचे संकट गहिरे आहे. यावर ठाकरे काय भाष्य करतात याकडे नाशिककरांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमिर खानकडून अतिरेक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील असहिष्णुतेच्या मुद्यावर अनेक साहित्यिकांनी आपले पुरूस्कार परत केले. मात्र, असहिष्णुतेबाबत अभिनेता आमिर खानचे वक्तव्य म्हणजे अतिरेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील युती सरकारवरही ताशेरे ओढले. मंत्रिमंडळात जाण्यासाठी शिवसेना लाचार असून, भाजप त्यांना गाजर दाखवत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

आमिर खानने अतिरेक केला असला तरी त्याचे वक्तव्य प्रातिनिधीक स्वरूपात घेण्याची गरज असून, त्यामागच्या भावना तेवढ्या समजून घ्यायला हव्यात, असेही विखे पाटील म्हणाले. भाजप-सेना सरकारच्या कामकाजावर टीका करताना, हे सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्यातील सत्तेत वाटा मिळवण्यासाठी शिवसेना लाचार झाली आहे. त्यामुळे सेनेने ही लाचारी सोडली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत मांजरीसह बिबट्याचाही मृत्यू

$
0
0

सटाणा : तालुक्यातील देवळाणे शिवारात मांजरीची शिकार करीत असताना मांजरींसह बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. बिबट्याला विहिरीतून काढताना तरुणावर दगड पडल्याने तो गंभीर जखमी झाला.

देवळाणे शिवारात शंकर बुधा चव्हाण यांच्या विहिरीचा कृषिपंप चालू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीतून वास येऊ लागला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत मृत बिबट्या व मांजर आढळून आले. यानंतर तत्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. कड्याकपाऱ्यांच्या विहिरीत बिबट्या बाज लावूनही वरती येत नसल्याने अखेर सुरेश निंबा जाधव या तरुणाने विहिरीत उतरून मृत बिबट्याला बाजेवर ठेवण्यासाठी वनविभागाला मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीए अखेर स्वायत्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमीला स्वायत्तता देण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अखेर मंजुरी देण्यात आली. राज्यातील पोलिस उपनिरीक्षक आणि उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेला स्वायत्त करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच घोषणा केली होती. मागील सात ते आठ महिन्यापासून या निर्णयाची उत्सुकता पोलिस दलाला लागली होती. यशदाच्या धर्तीवर एमपीएला स्वायत्त केले जाणार असून, कॅबिनेटच्या लेखी मंजुरीची अद्याप प्रतीक्षा असल्याचे एमपीएचे संचालक नवल बजाज यांनी स्पष्ट केले. २६० एकरवर उभारण्यात आलेल्या एमपीएमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. यशदाच्या धर्तीवर असेच प्रकाराचे प्रशिक्षण खासगी संस्थांना देणे यामुळे शक्य होऊ शकते. राज्य सरकारच्या आदेशानुसार गेले काही महिने अधिकाऱ्यांनी स्वायतत्तेसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतला. एमपीएच्या स्वनिधीच्या क्षमता तपासून पाहण्यात आल्या. स्वनिधी उभा राहणार स्वायत्ता मिळाल्यानंतर पाच वर्षे सरकारी अनुदान मिळणे अपेक्षित असून, त्यानंतर एमपीए स्वतःचा निधी उभारू शकते. यशदाच्या धर्तीवर एमपीएच्या विविभ विभागामार्फत अभ्यासक्रमांची निर्मिती केली जाऊ शकते. सायबर गुन्हे, दहशतवादी हल्ले, धमकी, धमक्यांविरुध्द खबरदारीचा उपाय आणि मदत करण्यासाठी अकादमी येथे प्रशिक्षण आयोजित केले जाऊ शकते. संबंधित कंपनीच्या काही लोकांना प्रशिक्षण देण्यात आल्यास ते त्यांच्या कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करू शकतील. याचा थेट फायदा शेवटी पोलिसांनाच होणार असल्याचा दावा केला जात आहे. यातून निधी संकलनाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली. आधुनिक समाजात तपासाचे काम पाहणारा कर्मचारी तेवढाच आधुनिक असला पाहिजे. आजमितीस, अशी आधुनिकता जोसपणारे सरकारी मानधनावर काम करण्यास राजी होत नाहीत. एमपीएला स्वायतत्ता मिळाल्यास देशातूनच नव्हे तर परदेशातील तज्ज्ञांना मार्गदशर्नासाठी बोलवणे शक्य असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. असे होणार फायदे पोलिस प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध होतील. पोलिसांकडील सायबर क्राईम, दहशतवादी हल्ले, धमकी आणि त्याबाबत करावयाची उपाययोजना याची माहिती आणि प्रशिक्षण संस्था आणि सर्वसाधारण व्यक्तींना मिळू शकेल. आधुनिकतेसाठी एमपीएला स्वनिधी उभा करता येणार.

महाराष्ट्र पोलिस दलाची शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून निवड.

आधुनिक प्रशिक्षणातील बदल लागलीच स्वीकारले जाऊ शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून असंतोषाची पेरणी

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाने नाशिक- नगरमधील वादासोबतच आता शहर विरुद्ध ग्रामीण संघर्ष उभा राहिला आहे. शहराचे पाणी शेतीला दिल्याची भावना नाशिककरांमध्ये बळावणार आहे, तर महापालिकेच्या वाट्याला आलेल्या पाण्यातून जुलै अखेर सध्याच्या आरक्षणाप्रणाणे पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याने आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पाणीपुरवठाच बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेची कसोटी लागणार असून, पाण्याची धग वाढेल तसतसा शहर व ग्रामीण असा असंतोष वाढणार आहे.

जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर पाणीवाटपाचा वाद शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. जायकवाडीला पाणी सोडताना जिल्ह्याला आवश्यक पाण्याचा अंदाज घेतला नाही. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर उर्वरीत पाण्यातून शेतीला पाणी मिळावे म्हणून शेतकरी आक्रमक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी धनश्री आहेर

$
0
0

सटाणा : देवळा नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्षपदासाठी देवळा विकास आघाडीच्या नगरसेविका धनश्री केदा आहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारी (दि. २४) प्रारंभ झाला. जि. प. चे सभापती केदा आहेर यांच्या पत्नी धनश्री केदा आहेर यांनी अध्‍यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दोन प्रतीत तहसीलदार कैलास पवार यांच्याकडे सादर केला. यामुळे दि. ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. या प्रसंगी गटनेते अशोक आहेर, योगेश आहेर, पुंडलीक आहेर, लक्ष्मीकांत आहेर, बाळासाहेब आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस उपायुक्त बारगळ अखेर सक्तीच्या रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक पत्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी चौकशीस समोरे जाणाऱ्या पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. याबाबतची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पत्रकारांच्या बैठकीत दिली. नाशिकमधील पाणी जायकवाडी धरणात सोडल्याच्या निषेधार्थ २१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो शेतकरी जमले होते. याच दरम्यान पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी पत्रकार महेंद्र महाजन यांच्यासह अन्य दोघांना मारहाण केली. याबाबत महाजन यांनी रितसर तक्रार केल्यानंतर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन या प्रकरणाची जातीने चौकशी करीत आहेत. आजवर काही प्रत्यक्षदर्शी व पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले असून, आणखी माहिती देण्याची कोणाची इच्छा असल्यास त्यांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, बारगळ यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पत्रकारांकडून सातत्याने होत होती. यापार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी वरिष्ठ संपादक शैलेंद्र तनपुरे, श्रीमंत माने, चंदूलाल शहा, विश्वास देवकर, वेणुगोपाल पिल्ले, भालचंद्र पिंपळवाडकर यांच्यासह अनेक वरिष्ठ पत्रकारांनी जगन्नाथन यांची भेट घेतली. यावेळी, बारगळ यांना आजपासूनच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर रंगतेय ‘कॉपीचित्र’ चर्चा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थळसाधर्म्य की नक्कल यावरून वादात सापडलेले चित्रकार प्रफुल्ल सावंत यांचे 'दि इव्हिनिंग अॅट इस्तंबूल' हे चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. चिन चूंग वी यांनी मूळ चित्र व त्यावरून मिरर केलेले चित्र असे दोन्ही फेसबूकला टाकल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अमेरिकेतही सावंत बंधूंनी चित्र कॉपी केल्याचा प्रकार केल्याचे एका चित्रकाराने ब्लॉग वर टाकले आहे. चित्रकार चिन चूंग वी यांच्या फेसबूकवरील कमेंटमध्ये हे आढळून आले आहे.

'दि इव्हिनिंग अॅट इस्तंबूल' हे चित्र प्रत्यक्षात 'दि मॉस्को नॉक्ट्रयून' या चित्राची मिरर इमेज वापरून रेखाटण्यात आल्याचा आरोप तैवानचे जागतिक कीर्तीचे चित्रकार चिन चूंग वी यांनी केला. त्यांच्या आरोपाचे समर्थन अनेक जणांनी केले असून, सोशल मीडियावर या कॉपी चित्राची चर्चा चांगलीच रंगत आहे. विशेष म्हणजे फेसबूकला ही पोस्ट आल्यानंतर चर्चेला अधिकच उधाण आले आहे. याविषयी चिन चूंग वी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये देखील उल्लेख केला आहे. चिन चूंग वी यांच्या फेसबूकवरील कमेंटचे समर्थन करताना अमेरिकेच्या एका चित्रकाराने त्याच्या ब्लॉगमधील काही भाग टाकलेला आहे. त्यात सावंत बंधूंच्या अमेरिकेतील एका किश्श्याचा उल्लेख आला आहे. तेथेही या ब्लॉगधारकाच्या चित्राची कॉपी करून सावंत बंधूंपैकी एकाने असाच प्रकार केल्याचे लिहिण्यात आलेले आहे. त्या ब्लॉगधारकाने चित्र कॉपी केल्याचा हा प्रकार जजेसच्या कानावरही घातला, तेव्हा जजेसने सावंत बंधूंना बोलावून या प्रकाराबाबत चौकशी केली असता, हे चित्र आम्ही फोटोग्राफ्सवरून काढले असल्याचे सांवत बंधूंनी सांगितले. यापुढे त्यांना असे न करण्याची सूचनाही जजने केली, असेही ब्लॉगमध्ये लिहिण्यात आले आहे.

यावर प्रफुल्ल सावंत यांनीही उत्तर दिले असून, इस्तंबूल ट्रीपमध्ये हे चित्र मी काढले आहे. यातील कार, कलरस्किम, आकाश, गल्ल्यांचे आर्किटेक्चर असे सारे निरखून पहा. बदल तुमच्या लक्षात येतील. मि. चिन यांच्या पेंटिगपेक्षा माझे पेंटिंग वेगळे आहे. सोशल मीडियावर मात्र हा विषय चांगलाच व्हायरल झाला असून, याबाबत विविध मते मतांतरे व्यक्त होताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रोटरी आय हॉस्पिटलचे कार्य प्ररेणादायी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रोटरी आय हॉस्पिटलचे कार्य स्‍तुत्य असून, या संस्थेद्वारा हजारो रुग्णांना दृष्टीचा प्रकाश प्राप्त होत आहे. रोटरीच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य रोटरी द्वारा होत आहे, असे प्रतिपादन येथील अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले.

येथील रोटरी चॅरिटी ट्रस्टच्या रोटरी आय हॉस्पिटलच्या सुपरस्पेशालिस्ट विभाग व संकेतस्थळ लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मामकोचे संस्थापक हरी अस्मर तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे डिस्ट्रिक सेक्रेटरी डॉ. दिलीप भावसार, अध्यक्ष अॅड. उदय कुलकर्णी, सचिव डॉ. विनोद गोरवाडकर, विजय खानकरी, डॉ. आर. बी. भंडारी, नीरज खांडेलवाल, कृष्णा अमृतकर आदी उपस्थित होते.

रोटरी आय हॉस्पिटलमधील सुपर स्पेशालिस्ट विभागातील बहुसंख्य यंत्रसामग्री ही उत्तर महाराष्ट्रात प्रथमच उपलब्ध होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीलाल अस्मर यांनी देखील रोटरी संस्थेच्या जनसेवेच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी संस्थेविषयी अजय शाह, दिनेश जाधव, चंद्रकांत शिरापुरे, राजेश गगराणी यांनी वेगवेगळ्या विभागांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक स्वप्निल कसार व रोटरी आय हॉस्पिटलच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. अभय दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच नगरपंचायतींचे अध्यक्ष बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी अर्ज चांदवड वगळता देवळा, कळवण, पेठ, निफाड व सुरगाणा येथे अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ‌बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सहापैकी चार नगरपंचायतींवर भाजप-सेनेने सत्ता काबीज केली आहे तर कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी अधिकृत घोषणा करण्यात येईल, देवळा नगरपंचायतीसाठी देवळा विकास आघाडीच्या धनश्री केदा आहेर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. कळवण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता पगार यांचा अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला. सुरगाणा येथेही भाजपच्या रंजना लोहकरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. निफाड नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपचे राजाराम शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, उपनगराध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पेठ येथे शिवसेनेच्या लता भुपेंद्र सातपुते यांची अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. चांदवड येथे तीन अर्ज दाखल झाले असले तरी अध्यक्षपदी भाजपचे भूषण कासलीवाल आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे जगन्नाथ राऊत यांची निवड निश्चित मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक रुपयाच्या करकरीत नोटा पुन्हा चलनात

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

दुर्मीळ झालेल्या एक रुपयाच्या नोटा पुन्हा चलनात आल्या आहेत. स्टेट बॅँकेत या नोटा दाखल झाल्या असून, काही ग्राहकांना त्याचे करकरीत बंडल मिळाले आहे. गौरस्वापद बाब म्हणजे नाशिकरोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयात या नोटा छापण्यात आल्या आहेत.

चलार्थपत्र मुद्रणालयात दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे व हजाराच्या नोटांची छपाई होते. सरकारच्या धोरणामुळे एक रुपयाच्या नोटांची छपाई दोन दशकांपूर्वी बंद करून नाण्यांची निर्मिती सुरू झाली. त्यांचीही तीव्र टंचाई झाल्याने नागरिकांनाच घाटा सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर एक रुपयाच्या नोट छपाईचे स्वागत होत आहे.

२५ वर्षानंतर छपाई

नाशिकरोड प्रेसमध्ये पंचवीस वर्षापूर्वी एक रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात आली होती. सरकार व रिझर्व्ह बॅँकेने व्यावहारीक अडचणी लक्षात घेऊन या नोटा पुन्हा छापण्याचा निर्णय घेतला. कुशल व मेहनती कामगार असलेल्या नाशिकरोड प्रेसलाच ही ऑर्डर मिळाली. येत्या मार्चपर्यंत एक रुपयाच्या तीनशे दशलक्ष नोटा छापण्यात येतील. फेब्रुवारीत नवीन लक्ष्य मिळेल, अशी माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली. सध्याच्या मशिनवर एक रुपयापासून एक हजाराच्या नोटांची छपाई केली जाते. वर्षाला अशा एकूण साडेपाच हजार दशलक्ष नोटांची छपाई होते. त्यासाठी प्रेसकडे कुशल व पुरेसे मनुष्यबळ आहे.

कामगार बांधवांचे सहकार्य आणि व्यवस्थापनाचे मार्गदर्शन यामुळे एक रुपयांच्या नोटांचे लक्ष्य पूर्ण होत आले आहे. नवीन वर्षात आणखी नोटा छपाईची तयारी झाली आहे.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

पूजा, दक्षिणा, आहेर आदी शुभकार्यासाठी एक रुपयाची नोट उपयोगी पडायची. ती उपलब्ध नसल्याने रूखरूख वाटायची. आता चलनात या नोटा आल्याने सोय होणार आहे. टंचाई लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने एक रुपयांच्या आणखी छपाई करावी.

- तुळशीदास इंगळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीथॉनमध्ये उद्यापासून मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबक रोड येथील ठक्कर्स डोममध्ये कृषीथॉन २०१५ कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी‌ दिली. ठक्कर्स डोममध्ये कृषीथॉनबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, यंदाचे प्रदर्शन हे दीड लाख चौरस फुटांचे वॉटर प्रूफ वूडन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले असून, डोम देखील वॉटर प्रूफ उभारण्यात आले आहे. यंदाच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी कृषी उद्योगाशी निगडीत नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार असली तरी प्रामुख्याने राज्यात दुष्काळ परिस्थिती पाहता पाण्याचे नियोजन कसे करावे, यावर प्रदर्शनात विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच या प्रदर्शनात डेअरी एक्स्पोचा स्वतंत्र डोम असणार आहे. तसेच, विविध नवीन तंत्रज्ञानाचे कंपन्यांचे स्टॉल असणार आहेत. संपूर्ण प्रदर्शनात साधारणत: ३२५ स्टॉल असणार आहेत. दररोज विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन शि‌बिरांचे आयोजन केले आहे. आयोजक साहील न्याहारकर यांनी सांगितले की, दि. २९ नोव्हेंबर रोजी पॅकेजिंग टेक्नॉलाजी या विषयावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शि‌बिराचे आयोजन केले आहे. त तसेच दि. २८ नोव्हेंबर रोजी राज्यातील पाच विभागांमधून कृषी वितरकांना एका ठिकाणी बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात देश विदेशातील प्रामुख्याने इस्त्राइल, सिंगापूर आणि मलेशिया देशातील कंपन्यांचे स्टॉल असणार आहेत. या प्रदर्शनात सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाडाचे अध्यक्ष विजय नाना पाटील यांनी केले. यावेळी मंगेश तांबट, चंद्रकांत ठक्कर, लक्ष्मीकांत जगताप आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारपीट नुकसानीसाठी चार कोटींची तरतूद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गारपिटीमुळे संबंधित गावांमध्ये होणाऱ्या नुकसानीला तात्पुरत्या उपाययोजनांद्वारे मदतीचा हात देता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने चार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या निकषांनुसार मदत मिळत असली तरी संबंधित गावात ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी या निधीची मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

गारपीट आणि अवकाळी पाऊस यासारखी नैसर्गिक संकटे अचानक ओढवतात. गारपिटीमुळे काहीवेळा एखाद्या भागातील रस्ता खचणे, लाकडी पूल तुटणे, समाज मंदिरांचे पत्रे वाकणे यांसारखे नुकसान होते. परिणामी परिसरातील जनजीवन आणि दळणवळणावर त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीत तत्काळ निधी उपलब्ध करून देऊन गावात तात्पुरत्या स्वरुपाच्या उपाययोजना करता याव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने राखून ठेवलेल्या या निधीचा उपयोग होऊ शकणार आहे. सलग चार वर्षांपासून गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे होणाऱ्या अतोनात नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आहे. संबंधित गावांमध्ये होणाऱ्या सामूहिक नुकसानीवर निधी अभावी तत्काळ उपायोजना करणे शक्य होत नसल्याचे पहावयास मिळत होते. ही अडचण लक्षात घेऊनच यंदा जिल्हा नियोजन समितीने प्रारूप आराखडा बनवतेवेळी गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानीवर हा तोडगा शोधला आहे. विविध प्रकारच्या निधींमधील काही भाग बाजूला काढून चार कोटींचा निधी उभा करण्यात येणार आहे. सुदैवाने गारपिटीसारखे विघ्न ओढावले नाहीच, तर हा निधी अन्य कुठल्याही कामांमध्ये समायोजित करण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>