Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘आदर्श‌ विमा ग्राम’ सायगावला पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीला 'एलआयसी' अर्थातच भारतीय जीवन विमा निगमच्या वतीने ७५ हजारांचा धनादेश देवून 'आदर्श विमा ग्राम' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय जीवन ‌विमा निगम ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था असून, देशभरातील समाजाच्या सुख सोयीसाठी आजपर्यंत संस्थेने भरीव स्वरूपाची मदत करताना राष्ट्रकार्यात हातभार लावला आहे. या कार्याचा एक भाग म्हणून पुरस्काराच्या धनादेशातून ग्रामीण भागातील मूलभूत सोयी पुरवण्यासाठी एलआयसीने आदर्श विमा ग्राम पुरस्कार एक अभिनव उपक्रम हाती घेतला असल्याचे यावेळी नाशिक विभागाचे मार्केटिंग मॅनेजर अभय कुलकर्णी यांनी सांगितले.

विमा प्रतिनिधी अनिल सोनवणे यांनी केवळ सायगावमधून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांत सुमारे ९ लाख रुपयांच्या पॉलिसिंचे धेय्य पूर्व केल्याने भारतीय जीवन विमा निगम कंपनीने हा पुरस्कार देऊन सायगाव या गावाचा गौरव केला. धनादेश प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगीता भालेराव होत्या. मनमाड शाखेचे विकास अधिकारी सुनील वाढवणे, पी. जी. जोशी, गजहंस यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. भारतीय जीवन विमा निगमचे अभय कुलकर्णी यांच्या हस्ते सरपंच योगीता भालेराव यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थित ७५ हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

प्रा. शिवाजी भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. ग्रामविकास अधिकारी रवींद्र शेलार यांनी आभार मानले. कार्यक्रमास येवला पंचायत समितीचे माजी सभापती आर. डी. खैरनार, उपसरपंच सुनील देशमुख, अॅड. सुभाष भालेराव, चेअरमन लहानु भालेराव, ग्रामपंचायत सदस्य दिनेश खैरनार, गोरख भालेराव, बाबुराव पठारे, बाळासाहेब बोराडे, विजय खैरनार, प्रकाश कोथमीरे, कैलास पुंड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रवींद्रनाथ, रचना विद्यालयाचा दणदणीत विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

१६ वर्षांखालील मुलांसाठी रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्यारवींद्रनाथ टागोर चषक आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत यजमान रवींद्रनाथ तसेच रचना विद्यालयाने दणदणीत विजय मिळवला.द्वारका येथील मैदानात मंगळवारी रवींद्र विद्यालय आणि केंद्रीय विद्यालयात झालेल्या सामन्यात केंद्रीय विद्यालयाने प्रथम फलंदाजी केली. मात्र रवींद्र विद्यालयाच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांचा डाव १६ षटकांत ८२ धावांत आटोपला. रवींद्रनाथने हे आव्हान चार फलंदाजांच्या बदल्यात पेलले आणि विजयाची नोंद केली.

२५ धावा काढणाऱ्या आणि तीन बळी घेणाऱ्या रवींद्रनाथचा कर्णधार दीपक काळे याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.दुसऱ्या सामन्यात रचना विद्यालयाने के. एन. केला शाळेचा ४९ धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रचना विद्यालयाने २० षटकांत १२० धावा केल्या. बदल्यात आव्हानाचा पाठलाग करताना के. एन. केलाचा संघ ७१ धावांवर गारद झाला. रचना विद्यालयाच्या चिन्मय सोनवणे याने ४ षटकांत १२ धावा देत ३ बळी घेतले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. विजेत्यांना मंडळाचे संचालक वसंतराव राऊत, ज्ञानेश्वर बरकले आणि रवींद्रनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास गायधनी यांच्या हस्ते सामानावीराचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १९ वर्षांखालील मुलांचा जिल्हा संघ निवड चाचणी शनिवार व रविवार, २६ व २७ डिसेंबर रोजी गोल्फ क्लब येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी २१ जिल्हा व पुण्यातील क्लब अशा एकंदर ३० संघांत इन्व्हिटेशन लीग स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत होणार आहेत. ह्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघासाठी संभाव्य खेळाडू म्हणून निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी तरुण व होतकरू खेळाडूंसाठी ही अतिशय नामी संधी असून, ह्या संधीचा जास्तीतजास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन एन. डी. सी. ए.तर्फे आवाहन करण्यात आले आहे. ज्या खेळाडूंचा जन्म १ सप्टेंबर १९९७ नंतर झालेला आहे, अशा इच्छूक खेळाडूंनी आपली नावे नोंदवावी व क्रिकेटच्या गणवेशात क्रिकेट साहित्यासह २६ किंवा २७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर चाचणीसाठी हजार राहावे. अधिक माहितीसाठी असोसिएशनचे अनंत कान्हेरे मैदानावरील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅडव्होकेट चॅम्पियन क्रिकेट स्पर्धेत १०३ संघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, नाशिक बार असोसिएशन आणि स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय अॅडव्होकेट चॅम्पियन २०१५ क्रिकेट स्पर्धा होत आहे. राज्यभरातील सुमारे दीड हजार वकीलबांधवांसह बेळगाव, गोवा येथूनही अनेक वकील स्पर्धेच्या निमित्ताने नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरविली जाणारी ही वकिलांची सर्वात मोठी स्पर्धा असेल, असा दावा आयोजकांनी केला आहे.

या स्पर्धेचे उद्‍घाटन गुरुवारी, २४ डिसेंबर रोजी सायंकाळी सातला पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. उद्‍घाटन सोहळ्याला माजी क्रिकेटपटू बलविंदरसिंग सिंधू उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके राहतील. यावेळी जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे, चित्रपट दिग्दर्शक जालिंदर कुंभार, अॅड. दौलतराव घुमरे, का. का. घुगे, अॅड. यतिन वाघ, श्रीधर माने, मनिष बस्ते, अशोक खुटाडे, भास्करराव पवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील १०३ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून त्यामध्ये मुंबईच्या १६ आणि पुण्यातील आठ संघांचाही समावेश आहे. दरवर्षी जिल्हापातळीवरील संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत असले तरी यंदा तालुका पातळीवरील संघांनी देखील हिरीरीने सहभाग घेतल्याची माहिती अॅड. विवेकानंद जगदाळे यांनी दिली. या स्पर्धेंतर्गत शहरातील २० मैदानांवर १३५ सामने खेळविण्यात येणार आहेत. प्रत्येक सामना २० षटकांचा ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेंतर्गत साधारणत: १५० सामने खेळविले जाणार असून प्रत्येक संघाला किमान दोन सामने खेळता यावेत, असा आयोजकांचा प्रयत्न आहे. स्पर्धेचा समारोप ३१ डिसेंबरला सय्यद पिंप्री येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार आहे. अॅड. विलास लोणारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण केले जाणार आहे. स्पर्धकांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल बावटा आमने-सामने

$
0
0

क्रॉम्प्टन ग्रीव्हजप्रकरणी आयटकच्या नेत्यांसमोर कामगारांची निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीच्या मुद्यावर आयटकच्या वतीने आयोजित सभेदरम्यान संघटनेच्या केंद्रीय नेत्यांना विरोधी युनियनकडून काळे झेंडे दाखवित व घोषणाबाजी करीत मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आले. क्रॉम्प्टन युनीटच्या परिसरात सुमारे तीन तास चाललेल्या या निदर्शनांमुळे तणाव होता. अखेरीस पोलिसांनी काही आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरण नियंत्रणात आले. मात्र, लाल बावट्याच्या सावलीतील दोन कामगार संघटनात आमने-सामने ठाकल्याचे चित्र या परिसरात मंगळवारी होते.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या नाशिक युनीट कामगारांनी पगारवाढ आदी मुद्यांवरून संप पुकारला होता. सलग १०४ दिवस चाललेल्या या संपाचे पडसादही नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रावर बघण्यास मिळाले होते. सन २०१३ मध्ये आयटक कामगार युनियनपासून काही कामगार वेगळे होते ते सीटू प्रणित नाशिक वर्कर्स युनियनमध्ये सहभागी झाले. यानंतरही आयटकच्या वतीने कामगारांचा प्रश्न मांडण्यात येत होता. मात्र, युनियन बदलणाऱ्या काही कामगारांना आयटकची भूमिका मान्य नसल्याने या आयटक कामगार आणि नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. कामगार उपायुक्तांनी या वादात मध्यस्थी केल्यानंतर संप मिटविण्यात यश आले. यानंतरही काही मुद्यांवर हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आहे.

या पार्श्वभूमिवर आयटकचे अध्यक्ष व राष्ट्रीय नेते भालचंद्र कांगो, सरचिटणीस माधव रोहम आणि पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी नाशिक दौऱ्यात क्रॉम्प्टनच्या गेटवर द्वारसभेचे आयोजन केले होते. कामगार हिताच्या मुद्यांवर ते भूमिका मांडत असताना हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचा मुद्दा काही कामगारांनी उचलत घोषणाबाजीस सुरुवात केली. कांगो व इतर नेत्यांच्या निषेधार्थ त्यांनी काळे झेंडे फडकाविल्यानंतर वातावरण तप्त झाले. दोन्ही बाजूंच्या कामगारांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी काही आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर निदर्शने निवळली.

आयटकच्या द्वारसभेत राज्य सचिव राजू देसले, माधव रोहम, कदम आदी सहभागी होते. तर सीटू प्रणित नाशिक वर्कर्स युनियनच्या वतीने अध्यक्ष पंकज काकडे, सचिव कल्पना शिंदे, उपाध्यक्ष साधना झोपे आदी पदाधिकारी व कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणधारकांचा गोंधळ

$
0
0

सातपूर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाकडून कार्बननाका येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात असतांना मंगळवारी परिसरातील अतिक्रमणधारक व्यावसायिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सातपूर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोचल्याने संभाव्य अर्नथ टळला.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या एका पथकाने मंगळवारी पंडित कॉलनी लोखंडी शेड, होलाराम कॉलनीत आठ ठिकाणी व जेहान सर्कल गंगापूररोड येथील चंद्रवीर अर्पाटमेंटमध्ये कारवाई केली. तर दुसऱ्या पथकाने गंगापूर गावात महापालिका हद्दीतील टपऱ्यांचे अतिक्रमण हटविले. यावेळी गंगापूर पोलिस ठाण्याचे पथक उपस्थित होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास पथक कार्बननाका येथे दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवित असतांना टपरीचा धक्का लागल्यामुळे एका महिला पडली. त्याचवेळी सातपूर महापालिका कार्यालयाचे विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांनी दुसऱ्या महिलेला ढकलल्याचा आरोप करीत अतिक्रमणधारक चालून आले. पगारे यांच्या संरक्षणासाठी अन्य कर्मचारी सरसावले. संतप्त व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांनाही अरेरावी केली. गोंधळ सुरू असतांना सातपूर पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी पगारे आणि अन्य कमचाऱ्यांची सुटका केली आणि त्यांना सातपूर पोलिस ठाण्यात आणले.

अफवांना ऊत

पगारे यांच्यावर हल्ला झाल्याची अफवा महापालिकेत पसरली. अनेक अधिकारी व कर्मचारी पोलिस ठाण्यात हजर झाले. दुपारी १ वाजता झालेल्या घटनेत सायंकाळी उशिरापर्यंत पगारे यांना संरक्षणासांठी सातपूर पोलिस ठाण्यात थांबवून ठेवण्यात आले होते. पगारे यांच्या फिर्यादीवरून संबंधित अतिक्रमणधारकांविरूद्ध गुन्हा दाखल केला जात असल्याचीही चर्चा होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यापूर्वीही एका भाजी विक्रेत्याने पगारे यांना भाजीची जुडी मारून फेकली होती.

बंदोबस्तावरील पोलिस गेले कुठे?

अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील तीन ठिकाणी अतिक्रमण हटविले. त्यावेळी पथकासोबत पोलिस होते. मात्र, कार्बननाका येथील अतिक्रमण हटवितांना बंदोबस्तावरील पोलिस गायब झाले. याबाबत पगारे यांना विचारले असता, पोलिस बंदोबस्त दुसरीकडे असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेत अतिक्रमण काढत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस उपलब्ध असते तर कार्बन नाका येथे गोंधळ तत्काळ टाळता आला असता, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावसाहेब दानवेंच्या दौऱ्याकडे सर्वच पक्षांचे लक्ष

$
0
0



नेत्यांच्या पक्षांतर चर्चेमुळे ढवळले राजकीय वातावरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षांतर करणार असून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

लोकसभा, विधानसभेत मुसंडी मारणाऱ्या भाजपने आता महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना केली आहे. भाजपची पक्षांतर नाट्याची धुरा माजी आमदार वसंत गिते, सचिन ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गिते यांनी भाजप प्रवेश करताना मनसेला खिंडार पाडण्याची तयारी केली. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. आता, फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपने संघटनेची ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप प्रवेशावेळी गितेंसोबत आलेल्या नगरसेवकांना कारवाईला समोरे जावे लागले असते तसेच निधीलाही कात्री लागली असती. आता परिस्थिती बदलली असून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. गेल्या काही दिवसांपासून गुप्त बैठकांचे सत्र पार पडते आहे. दानवे याच्या उपस्थितीत रविवारी (दि. २७) होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख राजकीय पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी दिली. मनसे, काँग्रेस व इतर पक्षाचे किमान २८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. मनसेच्या काही नगरसेवकांनी तर २०१६ मध्ये ब्रॅण्डींगसाठी वापरले जाणारे कॅलेडर व इतर साहित्य सुध्दा भाजपच्या नावाने तयार केल्याची चर्चा सुरू आहे. मनसेचे २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत ४० सदस्य निवडून आले. हेमंत गोडसे, संपत शेलार, नगरसेवका शिंदे यांच्या रुपाने मनसेला खिंडार पडले. माजी महापौर यतीन वाघ सुध्दा अज्ञातवासात असून त्यांचा भाजपप्रवेश पक्का मानला जातो आहे. दरम्यान, होणाऱ्या डॅमेज कंट्रोलला रोखण्यासाठी मनसेकडून कोणतीही तयारी केली जात नसल्याचे चित्र सध्या तरी दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थाचे ६४ कोटी महापालिकेच्या खात्यात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कामांचे राज्य सरकारकडे बाकी असलेल्या २०२ कोटीपैकी ६४ कोटी रुपये सोमवारपर्यंत (दि. २८) महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने २० विभागांच्या कामांचे गुणवत्ता तपासणी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सोमवारी हे काम पूर्ण केल्याने महापालिकेला पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने खर्च केलेल्या निधीपैकी २०२ कोटी रुपये राज्य सरकारकडून येणे बाकी आहेत. राज्य सरकारने महापालिकासहीत इतर विभागांसाठी १७१ कोटी सिंहस्थ निधी अंतर्गत सिंहस्थ कक्षाकडे जमा सुध्दा केला आहे. मात्र, निधी देण्यापूर्वी संबंधित विभागाने गुणवत्ता तपासणी अहवाल सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कळवले होते. सिंहस्थ कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाल्याने महापालिकेची सध्या वाईट अवस्था आहे. अनेक कामे रखडली असून १७१ कोटीपैकी किमान १०० कोटी रुपये महापालिकेला पदरात पडण्याची शक्यता होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने गुणवत्ता अहवाल सादर करण्यास सांगितल्याने सर्व गडबड झाली. महापालिकेने कामांचा गुणवत्ता अहवाल सादर करताना घोळ घातला. ​त्यामुळे जेवढ्या कामांचा गुणवत्ता अहवाल सादर केला तेवढाच निधी महापालिकेला मिळाल्याचा दावा केला जातो आहे.

सिंहस्थ कामांची १३० कोटींची देयके प्रलंबित आहेत. आता फारतर ६४ कोटी रुपये हातात मिळणार असल्याने महापालिकेच्या विवंचनेत भर पडणार आहे. महापालिकेने केलेल्या सर्व कामांचा गुणवत्ता अहवाल सादर झाला नसल्याने महापालिकेच्या निधीवर सक्रांत आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या तिजोरीत आता राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात ६४ कोटी रुपये जमा होणार असल्याने महापालिकेवरील आर्थिक भार कमी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट सोनं विकणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर पोलिसांनी बनावट सोनं विकणाऱ्या राजस्थानच्या तीन जणांना शिंदे गावाजवळील ब्राह्मणवाडे येथे अटक करून त्यांच्याकडून पाच किलोचे बनावट सोनं जप्त केले. कानाराम जेठाजी सोळंकी (वय ६०, मांडवा), दलारामा देवाराम राठोड (वय ४०, उमेदाबाद), सुखराम भीमाराम वाघेला (वय ३०, कावतारा, सर्व राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहाय्यक आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, निरीक्षक बाळासाहेब कोटकर उपस्थित होते. कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चन्ना, गायकवाड, कडभाने, शिंदे, शेख, अहिरे, धारणकर, वाजे, आरोटे, जगताप, संगभोर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

जगदीश नागरे (वय ३६, शिखरेवाडी कार्नर, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. १९ डिसेंबरला नागरे उपनगरनाक्याहून सिन्नरला जात असताना दोघांनी त्यांची टाटा टेम्पो गाडी थांबविली. जेसीबीने जमीन खोदताना जुने सोनं सापडल्याचे सांगून पाच लाखाला एक किलो सोनं विकण्याचा प्रस्ताव ठेवला. पुरावा म्हणून त्यांनी नागरे यांना खऱ्या सोन्याची माळ दाखवत दोन मणी काढून दिले. सोनाराकडे जाऊन खात्री करण्यास सांगितले. दोघांना शिंदेगावाजवळ सोडून दिल्यानंतर नागरे यांनी सराफाकडे जाऊन मणी सोन्याचे असल्याची खात्री केली. २२ डिसेंबरला सकाळी पावणे नऊला फोन करून संशयितांनी त्यांना शिंदे गावाजवळ बोलावले. नागरे यांनी एक किलो सोन्यासाठी दीड लाख रुपयेच दिले. मात्र, संशयितांनी पाच लाखाचा आग्रह धरला. नागरेंना घेऊन ते ब्राह्मणवाडे गावाजवळील तीन पालांवर (तंबू) गेले. तेथे आणखी तीन जण होते. त्यांनी सोन्याची माळ नागरे यांना देऊन दीड लाख रुपये घेतले. नाशिक येथे सोनाराकडे नागरे यांनी माळ दाखविली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

नागरे यांनी उपनगर पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल केल्यानंतर श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कोटकर व सहकाऱ्यांनी शिंदे पळसेत जाऊन संशयितांना फोन लावला. मात्र, तो बंद होता. नागरे पोलिसांना घेऊन ब्राह्मणवाडे येथे गेले. पोलिसांनी राजस्थानी लोकांच्या पालाला घेराव घालून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मण्यांच्या माळाचे सहा व साखळ्यांचे तीन गुच्छ तसेच पिवळ्या धातूचे तारांचे बंडल असे पाच किलो बनावट सोने, पाच मोबाइल जप्त केले.

लोक बोध घेत नाहीत

पाच वर्षापूर्वी उपनगरच्या कॅनलरोड भागात अशाच पद्धतीने बनावट सोनं दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालून एका टोळीने पोबारा केला होता. दोन वर्षापूर्वी गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सिन्नरफाटा येथे बनावट सोने विकणाऱ्या टोळीला पकडले होते. अशा घटना वारंवार घडूनही लोक आमिषामुळे बोध घेत नसल्याचे चित्र आहे.

राजस्थानी टोळीने गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रासह अन्य राज्यातही अनेकांना ठकविल्याचा संशय आहे. त्यादिशेने तपास सुरू आहे. दोन फरार संशयितांचा शोध सुरू आहे.

- श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजीव गांधी जीवनदायी’चे लाभार्थी वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक दुर्बल घटकांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना उपयुक्त असली तरी लाभार्थ्यांचे प्रमाण अवघा एक टक्का असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी २६ जानेवारीपूर्वी शि‌बिर घेऊन प्रत्येक तालुक्यात किमान तीन हजार लोकांपर्यंत ही योजना पोहोचवा, असे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंगळवारी आरोग्य यंत्रणेला दिले.

राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ घेता येतो. २१ नोव्हेंबर २०१२ पासून जिल्ह्यात ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. सुमारे ९७१ आजारांवर त्यांतर्गत मोफत उपचार होतात. सुमारे दीड लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च या योजनेंतर्गत केला जातो. जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटल्समध्ये ही योजना राबवली जाते.

जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या आर्थिक दुर्बल घटकामध्ये समाविष्ठ आहे. जिल्ह्यात एकूण ३२ लाख लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सर्वच लोक आजारी पडत नाहीत हे वास्तव असले तरी प्रत्यक्षात केवळ ३२ हजार १८५ रुग्णांनीच आतापर्यंत योजनेचा लाभ घेतल्याची माहिती बैठकीतून पुढे आली. योजना अजून अनेक लोकांपर्यंत पोहोचली नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, ती पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आदेश देण्यात आले आहेत.

बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांसह अधिकारी उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांत ८२ कोटी रुपये खर्चापर्यंतचे उपचार रुग्णांना मोफत देण्यात आल्याची माहिती डॉ. जगदाळे यांनी दिली.

महिनाभरात उपचार देणे आवश्यक

राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या प्रसाराकरिता शिबिरांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले असून, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रत्येक शिबिरासाठी एक लाख रुपयांचा निधी देण्याचे विचाराधीन आहे. २६ जानेवारीपूर्वी १५ तालुक्यांमध्ये ही शिबिरे घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक शिबिरातून किमान १०० रुग्णांना पुढील महिनाभराच्या काळात उपचार मिळवून देण्याची जबाबदारी यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा शल्य ‌चिकित्सक अंमलबजावणीसाठी समन्वयक म्हणून काम पहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसूचनांमध्ये हरवले महासभेचे बजेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महासभेसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरणारे यंदाचे बजेट उपसूचनांमध्ये हरविल्याची कबुली खुद्द महापौरांनीच दिली आहे. स्थायीने सादर केलेल्या बजेटला उपसूचनांसह मंजुरी देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात प्रशासनाला ठरावच सादर केला नाही. आतातर सुधारित बजेट तयार करण्याची लगबग सुरू झाली असून, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकप्रतिनिधींच्या बजेटशिवाय कामकाज झाल्याचा दावा केला जातो आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी प्रशासनाने एक हजार ४३७ कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते. स्थायी समितीने त्यात जवळपास ३०० कोटी रुपयांची वाढ सुचवून महासभेला १ हजार ७६९ कोटी रुपयांचे बजेट सादर केले. अर्थसंकल्पाच्या विशेष महासभेत लोकप्रतिनिधींनी नगरसेवक निधी, विविध कामे यात वाढ करण्यासाठी उपसूचना मांडल्या.

महापौर अशोक मुर्तडक यांनी सर्व सदस्यांच्या उपसूचनांसह बजेट मंजूर केले. प्रत्यक्षात याबाबत कोणताही ठराव तयार करून तो प्रशासनाला सादर करण्यात आला नाही. याबाबत महापौरांना विचारणा केली असता, महासभेत प्रत्येक सदस्यांच्या मागणीचा विचार करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. तसेच उपसूचनांचाही विचार करावा लागतो. सदस्यांच्या उपसूचनांची यादी मोठी होती. यामुळे बजेटचे काम पुढे जाण्यास विलंब झाल्याचे मुतर्डक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटनुसारच सुधारीत बजेट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे महासभेच्या बजेटला आता कोणतीही किंमत नसल्याचे स्पष्ट होते. महासभेचा अधिकार यामुळे डावलला गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना हुडहुडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून, मंगळवारी नाशिकमध्ये ७.४ अंश इतके राज्यातील नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान ६.७ अंश नोंदविले गेले आहे. पहाटेच्या सुमारास हा पारा आणखी उतरण्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून लौकीक असलेल्या महाबळेश्वपेक्षा नाशिकचे तापमान अधिक घसरले असून, नाशिककर सध्या हुडहुडीचा अनुभव घेत आहेत. मंगळवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवत होता. थंडीचा कडाका वाढल्यामुळे दिवसाही उबदार कपडे परिधान करण्यास नागरिकांकडून प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

विशेष म्हणजे नाशिक लगतच्या जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातही तापमानाचा पारा खाली घसरला आहे. मंगळवारी जळगाव जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश, तर नगर जिल्ह्यात हेच तापमान १०.६ अंश नोंदविले गेल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये हेच तापमान १३.१ अंश नोंदविले गेले.

दरवर्षी नाताळच्या कालावधीत थंडीचा कडाका वाढत असल्याचा अनुभव नाग‌रिक घेतात. यंदाही तसा अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळेच शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असल्याचे पहावयास मिळत आहे. सायंकाळनंतर गारठा वाढत आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे ते अधिक घसरण्याचीही शक्यता आहे. थंडीचा फायदा गहू, हरभरा या पिकांना होणार असला तरी कडाका वाढत गेल्यास द्राक्ष पिकांचे मणी तडकून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत

आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशिन जाळल्याने कोटमगावला तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कोटमगाव येथील सोसायटीच्या मतदानप्रकरणी निर्माण झालेला वाद अद्याप मिटलेला नाही. मतदानावरून झालेल्या भांडणाची कुरापत काढून सहा संशयितांनी एका घरावर दगडफेक करून कुटुंबीयांना दमबाजी केली. तसेच, ५० लाखांचे पोकलॅण्ड मशीन पेटवल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी कोटमगाव येथे जाऊन नागरिकांची बैठक घेतली. गुंडांना अटक करावी, गावातील अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, कोटमगाव हाणामारी प्रकरणी नाशिकरोड कोर्टाने भानुदास शिवाजी घुगे व केशव सुहास म्हस्के यांना न्यायालयीन कोठडी दिली. तसेच, अन्य सात आरोपींना जामीन मंजूर केला.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात पुष्पा ज्ञानेश्वर घुगे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी (दि. २०) रात्री दोन वाजेच्या सुमारास पुष्पा, त्यांची जाऊ आणि मुली घरात झोपल्या होत्या. संशयित भानुदास शिवाजी घुगे, अक्षय सुभाष म्हस्के, गौरव शिवाजी घुगे, योगेश अशोक घुगे, पंडित रामदास घुगे आणि त्यांचा एक साथीदार यांनी घरावर दगडे फेकली. तसेच त्यांचे मशीनही जाळण्‍यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीचा विचार करताना...

$
0
0

विजय संकलेचा


आपले लाडके शहर अखेर सर्वानुमते सशर्त स्मार्ट सिटी होण्यास हिरवा कंदिल मिळाला आणि आता खऱ्या अर्थाने आपले शहर वेगाने घोडदौड करू लागेल अशा आशा तमाम नाशिककरांच्या मनात पल्लवित झाल्या आहेत. एसपीव्हीबद्दल गेले काही दिवस आपण उलटसुलट बरेच ऐकत होतो. सदर एसपीव्हीबद्दल दस्तरखुद्द महापौर, उपमहापौर तसेच नगरसेवक यांना महानगरपालिकेची विश्वस्त या नात्याने तिची स्वायत्तता धोक्यात येईल अशी शंका होती व ती रास्तदेखील होती. परंतु सर्वांशी चर्चेअंती ती आता सशर्त व अटीशर्तीवर ती आता दूर झाली आहे व नाशिक महानगर पालिका कंपनी म्हणून तिचे स्वतंत्र व तरीदेखील स्मार्ट सिटी अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना यावर तिचा अंकुश राहणार हे आता निर्विवाद आहे. अर्थात इथे हेही विशेष नमुद करावयास हवे की या दृष्टीने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रथम पासूनच लोकांचा सहभाग यावर भर दिला व नाशिककरांनी देखील आता त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

मुळात स्मार्ट सिटी म्हणजे काय? याचे आयुक्तांनी सर्वार्थाने उत्तम सादरीकरण लोकांपुढे तसेच संबंधित अधिकाऱ्यापुढे केले व त्याचा योग्य तोच परिणाम झाला. आजची युवा पिढी टेक्नो-सॅव्ही होऊ घातली आहे. किंबहुना आहेच व याच भविष्यात बहुपयोगी पडणाऱ्या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून शहरवासियांचे वास्तव्य अधिक सुखकर कसे होईल हा त्याचा गाभा तर आहेच. त्याचबरोबर, एरवी शहराला भेडसावणारे पाणी, वीज, रस्ते, गटार-नाले, साफ-सफाई, इ. चे सुव्यवस्थापन या तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक सुकर होणारे ठरणार आहे. तसेच शहराच्या सौंदर्यात अधिक आकर्षक रस्ते दुभाजक निर्माण होऊ शकतात. यात उत्तम रस्त्यांच्यामध्ये सुशोभित वाहूतक बेटांपासून ते अधिक आकर्षक रस्ते दुभाजक निर्माण होऊ शकतात. असे म्हणतात की, रस्ते हे कोणत्याही शहराच्या रक्तवाहिन्याच आहेत व ते परतीला पोषकच ठरतात. शहराच्या हद्दीतले काही आजमितीस दुर्लक्षित राहिलेले भाग या अशा अनेक रस्त्यांच्या जाळ्यामुळे केवळ अधिक जवळ येणार नाहीत तर अशा भागांचा विकास देखील लवकर होण्यात सहाय्यभूत ठरतील याचा निश्चितच योग्य तो परिणाम शहरातल्या नागरिकांच्या राहणीमानात तर पडणार आहेच. त्याच बरोबर नवनवीन उद्योग धंदे व त्यात प्रामुख्याने सेवा उद्योग (सर्विस इंडस्ट्री) यांना हे वातावरण अधिक पोषक ठरेल. हे सर्वश्रूतच आहे की, शहरात सेवा उद्योगाच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार व तोदेखील कुशल तंत्रज्ञानाधिष्ठीत रोजगाराची उपलब्धता वाढीस लागणार आहे.

याचा थेट परिणाम दर माणसी Affordabale income वाढ होऊन शहरातल्या अर्थ चलनाला गती प्राप्त होईल व पर्यायाने शहराचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार आहे. या उद्योगधंद्यांना लागणारे सर्व infrastructure बरोबरीने शहर वाय-फाय देखील होणार आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांचा उत्तम संपर्कासाठी व तसेच बहुविध उपयोग होणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीतीत देखील याचा उपयोग प्रामूख्याने होऊ शकतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बीआरटीएस, मेट्रोसारखी साधने उपलब्ध झाल्यास रस्त्यावरची वाहतूक सुरळीत व प्रदूषणमुक्त होण्यास देखील मोठा हातभार लागणार आहे. शहराच्या निकोप वाढीसाठी जशा या वरील सर्व सुखसुविधा लागतात त्याचप्रमाणे, शहराचे सौंदर्य खुलविण्यासाठी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहर कलासक्त व सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. किंबहुना तो त्याचा गाभाच आहे. त्यातूनच आपल्या शहराची ओळख पटत असते.

स्ट्रीट आर्ट ही पाश्चात्य देशांच्या धर्तीवर आधारित अशीच एक नाविन्यपूर्ण योजना आहे. ज्यात शहरातल्या रस्त्यालगत दुर्लक्षित व पडीक जमिनीचा वापर उत्तम पेंटिंग्स वा अन्य कलात्मक गोष्टींना अधिक उठावदार होऊ शकतील व शहरातला एक कलासक्त शहर म्हणून नवीन आयाम देऊन जाईल. त्याच्याच जोडीला न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअरप्रमाणे आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहरातल्या नागरिकांना एकत्र जमून आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळावे हा यामागील उद्देश आहे, मध्यंतरी आयुक्तांनी याबद्दल सुतोवाच केले आहेच. तसेच मुंबईसारख्या शहरापासून आता केवळ दोन तासाच्या अंतरावर वसलेल्या आपल्या नाशिक शहराला आपल्या शहराला अनेक स्तरावर उपयोग होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन सिस्टर सिटीज- मुंबई, ठाणे व नाशिक ही संकल्पना राबविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यातून कला, सांस्कृतिक, वाणिज्य, पर्यटन व त्या अनुषंगाने अनेक उद्योग धंद्यांना चालना मिळू शकेल. या दोन शहरातील सुज्ञजन एकत्र येऊनच हे सहज साध्य होणार आहे. वाहतुकीचा सर्व वाढत्या शहरांबरोबरीने आपल्या शहराला देखील भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. त्याकरिता मेट्रो सुरू करण्यासाठी आपल्या शहरातल्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेल्या कॅनालवरील जागेचा विचार केल्यास सर्वोत्तम ठरणार आहे. यामुळे त्यावर व त्याच्या आजूबाजूला वाढणाऱ्या बकाल वस्तींचा प्रश्नदेखील सुटू शकतो. ही तर केवळ नांदी आहे. असे अनेक उपक्रम, योजना शर वासीयांच्या दृष्टीने सर्वार्थाने हितकारक व शहराच्या विकासात व सौंदर्यात भर टाकणारे आता सहजतेने उभे राहू शकतात व २१ व्या शतकातले सर्वांगसुंदर शहर म्हणून आपल्या नाशिक शहराचा बोलबाला न झाल्यास नवल!!

(लेखक नगररचना आणि बँकिंग क्षेत्राचे अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोदाकाठचं रामायण’ ला पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर येथे झालेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात नाशिकमधील लेखक दत्तात्रेय बैरागी यांच्या 'गोदाकाठचं रामायण' या पौराणिक कादंबरीस 'सुधा-कुसूम' कादंबरी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार संस्थेतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार असून राज्यभरातून आलेल्या अनेक कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. निवडक उत्तमोत्तम साहित्यकृतींची निवड करुन त्यांना पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने वाङमय पुरस्कारांनी गौरवण्यात येते. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, साहित्य विहारच्या अध्यक्ष आशा पांडे, राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वि. स. जोग, समारोह सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. मनोहर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व एक हजार रुपये देऊन बैरागी यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अनेक नामवंत साहित्यिक व रसिक बहुसंख्येने उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोट्यवधींचे दावे एलआयसीकडे पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उत्तर महाराष्ट्रातील तब्बल अडीच लाख विमाधारकांचे बँक खाते एलआयसीशी (भारतीय आयुर्विमा महामंडळ) जोडलेले नसल्याने तब्बल ७०० कोटी रुपयांची रक्कम धोक्यात आली आहे. येत्या मार्चपर्यंत खाते जोडण्याचे फर्मान एलआयसीने सोडल्याने विमाधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आयुर्विम्यापेक्षाही वर्षानुवर्षे आयुष्याची पुंजी म्हणून सामान्य नागरिक एलआयसीकडे पहात आले आहेत. वयाच्या उत्तरार्धात मिळालेली रक्कम हाती पडावी, अशी त्यांची अपेक्षा असते. काही वेळा कर्त्या माणसाचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या वारसांना ताबडतोब रक्कम मिळणे गरजेचे असते. मात्र, काही ग्राहकांचे राष्ट्रीयकृत बॅँकेत खाते नसल्याने त्यांना रक्कम देण्यास एलआयसीने असमर्थता दर्शवली आहे. याबाबत २०१४-१५ या आर्थिक वर्षात एलआयसीच्या नाशिक विभागाने शंभर टक्के दावे निकाली काढले आहेत. निकाली काढलेल्या ग्राहकांची संख्या अडीच लाख आहे. त्यांना नाशिक विभाग सातशे कोटी रुपये देणे लागते. यापैकी जास्तीत जास्त दावे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील आहेत. भारत सरकारच्या आदेशानुसार १ जुलै २०१५ पासून सर्व प्रकारची रक्कम नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरद्वारे द्यावेत, असे सूचित करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक ग्राहकाने मॅँडेट फॉर्म देणे आवश्यक आहे. या फॉर्म मध्ये पॉलिसीधारकाने त्यांच्या बॅकेच्या खात्याचा नंबर आयएफएस कोड एमआयसीआर कोड इत्यादी माहिती भरुन एकदाच एलआयसीच्या शाखेत जमा करायचा आहे. एकदा फॉर्म भरल्यानंतर भविष्यात देण्यात येणाऱ्या सर्व रकमा या त्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. या पध्दतीमुळे ग्राहकांचा फायदाच होणार आहे. चेक हरवणे, गहाळ होणे असे प्रश्न उद्भवणार नाही. त्याच प्रमाणे मिळालेली चेक बँकेत भरण्यासाठी जावे लागणार नाही. कुणाला खाडाखोडही करता येणार नाही. त्यामुळे गैरव्यवहार टळतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतपुरवठा आराखड्यात कृषीला झुकते माप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना देणारा ९ हजार ५०० कोटींचा विक्रमी पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. गत वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये सुमारे एक हजार कोटी रुपयांची वाढ केली असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गेली दोन तीन वर्ष सातत्याने अस्‍मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकरी खचत असून, त्यातूनच आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग त्याच्याकडून स्वीकारला जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याद्वारे दिलासा देण्याचा प्रयत्न आगामी वर्षाच्या आराखड्यातून करण्यात आला आहे. गतवर्षी त्यामध्ये कृषी विकासासाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा ती वाढवून ३ हजार ५०० कोटी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पतपुरवठा धोरणाबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी मिलिंद शंभरकर, स्टेट बँक ऑफ इंडिया व सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गतवेळेचे पतपुरवठा धोरण, सद्यस्थिती आणि यंदा आराखड्यात कोणत्या क्षेत्राला किती प्राधान्य द्यावे यावर चर्चा करण्यात आली.

याबाबत कुशवाह म्हणाले, चालू वर्षी एप्रिलमध्ये ८ हजार ५०४.१९ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा घोषित करण्यात आला होता. मात्र, यंदा त्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून, एक हजार कोटींनी तो वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी वर्षाचा आराखडा ९ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामध्ये ३५०० कोटी रुपये केवळ कृषी कर्जाशी संबंधित बाबींवर ठेवण्यात आले आहेत.

पीककर्जावर भर देण्यात आला असून, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल, असे बोलले जात आहे. याखेरीज लघु उद्योगांवरही यंदा ९०० ऐवजी १५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व क्षेत्रांत क्षमता दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात आपली क्षमता दाखविली पाहिजे. यात केवळ खूप अभ्यासानेच विद्यार्थी घडत नसतात, तर इतर कला गुणांमध्ये देखील विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे. असे मत प्राचार्य पी. टी. कडवे यांनी व्यक्त केले.

अंबड इंडस्ट्रीज् अॅण्ड मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे उद्योजकांच्या पाल्यांचा कौतुकाची थाप म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य पी. टी. कडवे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयमाच्या के. आर. बूब सभागृहात झालेल्या कार्यक्रमात यावेळी ७० उद्योजकांच्या पाल्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल आयमा ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पालकांना मार्गदर्शन करताना कडवे म्हणाले, आपल्या पाल्यांना शालेय जीवनापासूनच आयएएस, आयपीएस अशा परीक्षांबाबत पाल्यांना माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आयएएस व आयपीएसच्या परीक्षा देताना सोपे जाईल. तसेच शिक्षण संस्थांनी देखील पैसे कमविणे हाच उद्देश न ठेवता विद्यार्थी कसे घडतील याचा विचार करावा असा सल्ला देखील त्यांनी शिक्षण संस्थांना दिला.

आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी मुलांना टीव्ही, मोबाइल या सर्वांचे फायदे व तोटे सांगितले. टीव्ही, मोबाइलमुळे मुलांची बौद्धिक क्षमता खालावत जात असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत असतो. पर्यायाने मुलांना नैराश्य प्रसंगी येऊ शकते. मुलांना सर्वगुणसंपन्न बनविण्यासाठी

पालकांनी रोजच मुलांशी संवाद साधला पाहिजे असेही मत पाटील यांनी मांडले.याप्रसंगी आयमाचे सरचिटणीस राजेंद्र आहिरे, आयपीए कन्सल्टंन्ट व पेटंट अॅटोर्नी, अॅड. उमा भट्टड, माजी अध्यक्ष सुरेश माळी, निलीमा पाटील, जे. आर. वाघ, प्रमोद वाघ, प्रज्ञा पाटील, एन. डी. ठाकरे, आर. एस. नाईकवाडे यांसह उद्योजक व त्यांचे पाल्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांमध्ये रुजवा व्यायाम संस्कार

$
0
0

स्वाती पाचपांडे, नाशिक

सुमेधाकडे तिची बारा वर्षांची भाची इरा सुटीनिमित्त आली होती. सुमेधाने ठरविले की भाचीला छानसा वेळ देऊन तिचा व्यक्तीमत्व विकास घडवून आणावा. इराचा मात्र बव्हंशी वेळ टीव्ही पाहण्यात जात होता. एकदा टीव्हीसमोर बसली की सोबत खाऊचे बकाणे भरणे सुरूच असायचे. इराला समजावून सांगावे तरी कसे हा प्रश्न आता सुमेधाला पडला होता. तिला राहावलेच नाही आणि तिने इराला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थातच इराला ते आवडले नाही.

इरा लहान असताना आई कामात असली की तिला कार्टून लावून द्यायची आणि आईची सुटका होऊन जायची. जेवणही पोगो पाहत पाहत, त्यामुळेच तर ती अशी टीव्हीभक्त झाली होती. नंतर तिला खेळायला बाहेर पाठवायचा प्रयत्न करून पाहिला पण ती आता सामाजिकदृष्ट्या एकलकोंडी झाली होती. तिचे कुणाशीच पटत नव्हते. इराने असं एकलकोंडं व्हावं हे आईबाबांना तरी कुठे वाटत होतं?, पण तसंच तर होत होतं. इराने चुकीची जीवनशैली स्वीकारल्याने तिचे वजन वाढले होते. ती बारा वर्षाच्या मानाने बेढब दिसू लागली होती.

हे इराच्याच नव्हे तर आजकाल अनेक मुलांच्या बाबतीत दिसून येते. हे टाळण्यासाठी आजच्या पालकांनी लहान वयापासूनच आपल्या मुलांना हलक्या-फुलक्या व्यायामाची सवय लावली पाहिजे. व्यायाम केला की दमायला होते, मग भाजीपोळी आरामात पोटात जाते आणि त्याचे उत्तम पचन देखील होते. या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांची सुयोग्य वाढ होऊन आरोग्य उत्तम राहते. व्यायाम म्हणजे जिममध्ये जाऊन करावयाचा व्यायाम नसून त्यांना मोकळ्या हवेत मैदानी खेळ खेळायला घेऊन जाणे. शाळेतील विविध क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये त्यांना जाणीवपूर्वक भाग घ्यायला लावला पाहिजे. सोपी योगासने किंवा जिमनॅस्टिक याची आवड मुलांमध्ये रुजवायला हवी. खेळताना शरीराचा तोल कसा सांभाळावा तसेच खेळताना डोळे आणि हातपाय यांचा योग्य समन्वय कसा राखावा हे देखील शिकवावे. योग्य वेळापत्रक आखून द्यावे ज्यात अभ्यासाबरोबर खेळालाही वेळ राखून ठेवता येईल. सायकलिंग, पोहणे, पतंग उडवणे हे सोपे व्यायम प्रकार आहेत. त्यात काही पारंपरिक खेळांचा समावेश करता येईल.

खेळाला महत्त्व दिल्याने सर्वांगीण विकास तर होतोच आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हारजीत कशी स्वीकारावी याचे जणू प्रशिक्षणच लहान वयात मिळते. मुलांमध्ये खिलाडूवृत्ती विकसित होते. आयुष्यात यश तसेच अपयश सारख्याच वृत्तीने स्वीकारण्याचे बाळकडू मुलांना अवगत होत असते. म्हणूनच मुलांनी रोज अभ्यास करणे जितके गरजेचे आहे तितकेच व्यायाम व खेळ यांना प्राधान्य देणेही गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलखान्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

राज्यात बंदी असलेल्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणलेल्या जुने नाशिकच्या नाईकवाडीपुरा परिसरातील एका घरातील कत्तलखान्यावर भद्रकाली पोलिसांनी छापा टाकून दहा गोवंश जनावरे हस्तगत केली. या प्रकरणी बेकादेशीर मटण विक्री करणारा रईस नामक व्यक्तीस पोलिसांनी अटक केली असून, दुकानातील मटणही ताब्यात घेतले आहे.

कत्तल करण्यात आलेला जनावर कोणता याविषयी माहिती घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या सहकारी यांनी सकाळी नऊच्या सुमारास छापा घालत ही कारवाई केली. जुने नाशिक परिसरात राज्यात बंदी असलेल्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर मिळून येत असून, ही गोवंश जनावरे कोठून व कोण पुरवठा करतो याची पोलिस चौकशी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images