Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘शेतकरी वाचवा’ची सामूहिक हाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या १७ व्या जिल्हा अधिवेशनात उपस्थित शेतकरी बांधवांनी 'शेतकरी वाचवा, शेती वाचवा' अशी सामूहिक हाक दिली. किसान सभेच्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी लढायचे असा संकल्प व ठराव या अधिवेशनात करण्यात आला.

अधिवेशन स्थळाला कॉ. गोविंद पानसरे, व्यासपीठाला कॉ. भगवंत ठोंबरे तर प्रवेशद्वाराला कॉ. एल. एम .पाटील असे नाव देण्यात आले. यावेळी किसान सभेच्या जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. त्यात जिल्हाध्यक्षपदी भास्कर शिंदे तर कार्याध्यक्षपदी प्रा. के. एन. अहिरे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

किसान सभेच्या अधिवेशनाचा प्रारंभ क्रांतिसिह नाना पाटील यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आला. या वेळी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, कॉ. एल. एम. पाटील आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी उत्तम ठोंबरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य सचिव अॅड. हिरालाल परदेशी, शेतकरी वाचवा अभियानाचे निमंत्रक राम खुर्दळ, किसान सभेचे कार्याध्यक्ष प्रा. राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे यांची उपस्थिती होती.

अधिवेशनाला मार्गदर्शन करताना किसान सभेचे राज्य सचिव हिरालाल परदेशी म्हणाले की, किसान सभेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या म्हणून कसोशीने प्रयत्न करावे लागतील. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा देवून शेती मालाच्या घामाचा दाम शेतकऱ्याला देण्यासाठी लढा उभारू असेही ते म्हणाले. प्रा. राजू देसले यांनी प्रास्ताविकात शेतकरी वाचला तर देश वाचेल, यासाठी शेतकरी बांधवानो आता मरायचे नाही किसान सभेच्या माध्यमातून हक्कासाठी लढायचे असा नारा दिला. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनीही मनोगत व्यक्त केले .

अधिवेशनाच्या शेवटी किसानसभेची जिल्हा कार्यकारणी तीन वर्षांसाठी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. सचिवपदी कॉ. देविदास भोपळे (नांदगाव), उपाध्यक्ष नामदेव राक्षे (इगतपुरी), संजय बैरागी (घोटी), जगन माळी (सिन्नर), संपत थेटे (नाशिक) तसेच जिल्हा कार्यकारिणीत कॉ. किरण डावखर, शिवाजी शिंदे, देवचंद सुरसे, सूर्यभान शिंदे, बाळासाहेब काळे, विष्णुपंत गायखे यांची निवड करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. किरण डावखर, कॉ. रमजान पठाण, कॉ. अनिल देशमाने, अॅड. दत्तात्रेय गांगुर्डे, संपत शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

अधिवेशनातील ठराव

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या.

कांद्याचे निर्यातमूल्य कमी करा.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवा.

शेतकऱ्यांच्या शेतावर पोट रस्ता द्या, बांधावरील कामे रोजगार हमीतून करा.

स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार खर्च + ५० टक्के नफा हमीभाव यानुसार द्या.

शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प केंद्र व राज्य सरकारने जाहीर करावा.

कृषिमूल्य आयोगात शेतकरी प्रतिनिधी वाढवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिवाळी शिबिरामुळे होतात श्रमसंस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपळगाव बसवंत

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. हिवाळी शिबिरातून ग्रामीण भागाचा कायापालट होऊन श्रमसंस्कार होतात, असे प्रतिपादन मविप्रचे शिक्षणाधिकारी प्रा. एस. के. शिंदे यांनी केले.

के. के. वाघ कॉलेजच्या नारायणटेंभी येथील हिवाळी शिबिराचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, प्रा. डी. डी. काजळे, पंचायत समिती सदस्य अनिल बोरस्ते, बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते होते. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी स्वागत तर एनएसएस प्रमुख प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी प्रास्तविक केले. सतीश मोरे म्हणाले की, श्रमसंस्कार व मनोरंजन यांचा मिलाप म्हणजे हे शिबिर आहे. एनएसएसच्या माध्यमातून स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान यशस्वी होऊ शकते. गणेश बनकर म्हणाले, की गावाचा कायापालट करण्याची ताकद एनएसएसमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधावा. सरपंच शैला गवळी व उसरपंच अरुण गवळी यांनी अशा उपक्रमांमुळे नारायणटेंभी हे आदर्श व स्वच्छ गाव म्हणून साकारेल असे सांगून गाव आदर्श करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अप्पा मोरे, उपप्राचार्य एस. वाय. माळोदे आदी उपस्थित होते. प्रा. अल्ताफ देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. अश्विनी कदम यांनी आभार मानले. प्रा. अभिजित पवार, प्रा. उज्ज्वला डेरे, प्रा. गोकुळ बोरसे, नितीन सरोदे, रुपेश पवार, प्रियंका ढोकरे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत तीन कोटींची रस्ताकामे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

देवळाली मतदारसंघात तीन कोटींच्या रस्ता कामांना नागपूर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी बजेटमध्ये मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली.

रस्त्यांची कामे त्वरित करावीत, अशी देवळाली मतदारसंघातील अनेक गावांमधून मागणी होती. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अधिकारी व मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर २३ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याचे घोलप यांनी सांगितले. मतदारसंघातील मंजूर रस्त्यांची कामे पुढीलप्रमाणे- नवीन सामनगाव ते चाडेगाव फाटा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, राज्य मार्ग शिंदेगाव ते शिवाजीनगर कालनी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, जातेगाव ते दहेगाव रस्ता सुधारणा, राष्ट्रीय महामार्ग ३० ते तळेगाव जातेगाव रस्ता तसेच पिंपळद ते जातेगाव रस्ता सुधारणा, मुळेगाव जातेगाव रस्ता सुधारणा, चेहेडी बेलतगव्हाण ते संसरी रस्त्याची सुधारणा, आंबेबहुला गौळाणे ते महापालिका हद्द रस्ता सुधारणा, मातोरी ते दऱ्याबाई मंदिर रस्ता सुधारणा, ओढा ते गंगापाडळी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, सैय्यद पिंपरी ते ओढा लाखलगाव चेहेडी रस्ता बांधकाम, विल्होळी ते आंबडशिव रस्ता मजबुती व डांबरीकरण, साडगाव ते घोडेगाव रस्त्यावर पूल बांधणे, जाखोरी ते जोगलटेंभी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, लोहशिंगवे फाटा ते लोहशिंगवे गाव रस्ता करणे, पळसे गावातून जुना पळसे साखर कारखाना रस्ता डांबरीकरण.

पुलांच्या मंजूर झालेल्या कामांमध्ये दरी दऱ्याबाई मंदिर रस्त्यावर मोरीचे बांधकाम, रोहिले गंगाम्हाळुंगी रस्तायवर मोरी, पिंपळद (ना.) ते दहेगाव रस्त्यावर मोरी, राजुला बहुला ते लहांगेवाडी रस्तायवर मोरी, वासाळी दुडगाव

रस्त्यावर काकजळी नदी मोरीचे बांधकाम, धोंडेगाव शास्त्रीनगर गंगाम्हाळुंगी रस्त्यावर मोरीचे काम, ओझरखेड धोंडेगाव रस्त्यावर मोरीचे काम करणे, भगूर लहवित वंजारवाडी रसत्यावर पुलाचे काम करणे यांचा समावेश आहे. या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे रस्त्याचे प्रश्न लवकरच सुटतील. यामुळे वाहनचालकांची कसरत कती होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हितेश संजय पाटील, असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता.

मूळ अमळनेर जिल्ह्यातील रहिवाशी असलेला हितेश आडगाव परिसरातील मातृ दर्शन सोसायटी​ जवळील हरी ओम इमारतीत भाडेकरू म्हणून राहत होता. परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याची माहिती हितेशला समजल्यानंतर त्याने आत्महत्या केली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, घटनेचा पुढील तपास आडगाव पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेस्ट ड्राईव्हच्या नावाने सफारीची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टेस्ट ड्राईव्हसाठी घेऊन गेलेल्या नव्या कोऱ्या १३ लाख रुपयांच्या टाटा सफारीची चोरी झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, द्वारका परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास द्वारका येथील शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ होती. त्यावेळी रस्त्यावरून चालत आलेला एक भामटा थेट शोरूममध्ये आला. त्याने वाहनाबाबत थोडीफार चौकशी करून टेस्ट ड्राईव्ह करण्याची मागणी केली.

संबंधित चोरट्यांच्या वाहन परवान्याची किंवा इतर कोणत्याही कागदपत्राचौकशी केल्याशिवाय सेल्समन देवेंद्र मनोज पवार (वय २१) याला भामट्यांसोबत पाठवण्यात आले. मुंबई-आग्रा हायवेने मुंबईच्या दिशेकडे निघालेल्या भामट्याने साधारणतः एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर चाकू बाहेर काढून सेल्समन पवारला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, पवारला वाहनाबाहेर फेकून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर शोरूममध्ये सीसीटीव्ही नाहीत. या वाहनांची कोणतीही नोंदणी झालेली नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत असल्याचा दावा पोलिस सूत्रांनी ​केला.

राठी आमराईजवळ चेन स्नॅचिंग

पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व पेंडल चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना राठी आमराईजवळ सोमवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधुनमधून होणाऱ्या स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा दुचाकींसह दोघांना अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या दुचाकी टिटवाळा व वाशिंद रेल्वे स्टेशन येथून चोरल्या असल्याचे समजते.

या प्रकरणी बहिरू भीमा जाधव (वय २२) रा. आंबेडकर नगर, सिन्नर. मूळ रा. कोकण वाडी, ता अकोले, जि. अहमदनगर तसेच गोरख पुंडलिक खोकले (वय ३२) रा. आयटीआयजवळ, सिन्नर, मूळ रा. पाचपट्टे, ता. अकोले, जि अहमदनगर, अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन लाल रंगाच्या बजाज पल्सर, एक काळ्या रंगाची बजाज पल्सर, एक लाल व पांढऱ्या रंगाची यामाहा एफ झेड, एक काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर अशा सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. आणखी दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दुचाकी त्यांनी टिटवाळा व वाशिंद रेल्वेस्टेशन येथून चोरल्या असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, एएसआय रमेश निकम, पोलिस हवालदार मधुकर देशमुख, लक्ष्मण धकाते, प्रीतम लोखंडे, सुशांत मरकड, नितीन जाधव, सुदाम धुमाळ, सचिन पिंगळ, सचिन करंडे, भगवान शिंदे, किरण गांगुर्डे, नितीन मंडलिक, रवींद्र टर्ले, श्रीकांत दोंदे, आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम नियमांची रोखा पायमल्ली!

0
0

शहरातील पूर्ण झालेल्या सुमारे ४ हजार बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला मिळू शकलेला नाही. परवानगीधारक वास्तुविशारद व अभियंते यांना मंजूर आराखड्यानुसार बांधकाम नसल्यास जबाबदार धरणार असल्याची हवा निर्माण करण्यात आली. यातून बेकायदा बांधकामास चाप बसेल अशी वेडी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली. परंतु, दंड आकारून ती नियमित करण्यासाठी हितसंबंधित गट सक्रीय होऊन दंड आकारून बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा मार्ग यातून खुला झाल्याचे दिसत आहे. थोडक्यात 'अती ‍स्मार्ट' नाशिकच्या दिशेकडे पाऊल पडले आहे.

जाणते अजाणतेपणे फसविल्या गेलेल्या मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तींकडून बांधकाम नियमित करण्यासाठी दंड भरल्याने महापालिकेच्या खजिन्यात भर पडेलही. मात्र, बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबत अधिकारी वर्गास मुळातच असे अधिकार का असू नये, ही बाब मोठ्या प्रमाणातील अनागोंदी, अधोरेखित करीत आहे. किंबहुना अशी कामे नियमित अपरिहार्य आहे, याची टिपण्णी महासभेवर ठेऊन असे करताना आकारला जाणारा दंड हा भविष्यात अशी अनियमितता करण्यास कोणी धजावणार नाही इतका प्रचंड असावा. तसेच मंजूर आराखड्यानुसार बांधकाम केले नसल्यास संबंधित बिल्डर व परवानगीधारक वास्तुविशारद व अभियंते यांना काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व नगररचना विभागातील अधिकारी, चालू बांधकामे नियमित तपासून वेळीच बंद पाडण्याची जबाबदारी पार पाडणारी मंडळी यांची खातेनिहाय चौकशी करावी. लहान वा मोठी शिक्षा देणे आदी कारवाई करूनच बांधकाम नियमित करण्याची मार्गदर्शन लेखी जनहितास्तव आपण जाहीर करणार आहात काय?

सध्याचे बांधकाम अनुमती व पूर्णत्वाचे दाखले देतानाची प्रक्रिया अर्धवट असून त्यात तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. यानिमित्ताने दोन-तीन दशकातील अशा प्रकारे विकासनियमन नियमांचे उल्लंघन करून नियमित केलेल्या कामाची नमुना तपासणी आपण आदेश दिले तर स्मार्ट नाशिककडे दोन पावले निश्चित पडतील. त्यासाठी आपली प्रस्तावित करवाढ नागरिकास थोडी फार सुसह्य होईल!

आपण सामान्यांच्या बाजूने निर्णय ठामपणे घ्याल अशी बाळगावी काय?

आपला दिलीप ओढेकर, सल्लागार अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यालय स्थलांतरास कळवणमध्ये विरोध

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण शहरातील शासकीय कार्यालये स्थलांतरित होऊ नयेत, यासाठी कळवण व्यापारी महासंघ व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देण्यात आले. तसेच, या प्रश्नी त्वरित मार्ग न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कळवण शहरापासून पाच कि.मी. अंतरावर कोल्हापूर फाटा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय बांधण्यात आले आहे. या कार्यायालयास सुरुवातीपासून विरोध झाला असतानाही ही इमारत उभारण्यात आली. व्यापारी व नागरिकांचा वाढता विरोध पाहता विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार ए. टी. पवार यांनी या मध्यवर्ती इमारतीत शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज सुरू करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तसा पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, निवडणुकीचा निकाल वेगळा आल्याने ही प्रक्रिया थांबली. नवीन वर्षात शहरातील किमान भाडेतत्वावरील कार्यालये या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत हलविण्यात येणार असून, त्यानंतर टप्याटप्याने इतरही कार्यालये स्थलांतरीत होतील. म्हणून कळवण शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांचे नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देत या प्रश्नी कळवणची जनता गंभीर असून, जर कार्यालये स्थलांतरित झाले तर व्यापारी पेठ उद्ध्वस्त होऊन कळवण बकाल होईल याकरिता कार्यालये स्थलांतरीत करू नका, अशा आशयाचे निवेदन दिले.

या प्रश्नी मार्ग काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विलास शिरोरे, सागर खैरनार, दीपक वाघ, प्रवीण बिरारी, उमेश सोनवणे आदींसह व्यापारी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्राहक परिषदेच्या बैठकांकडे अधिकाऱ्यांची पाठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ग्राहकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून अनेकदा जागो ग्राहक जागोचा नारा दिला जात असला तरी नागरिक आणि प्रशासनातील अधिकारीही जागे होत नसल्याचे वास्तव आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या ग्राहक संरक्षणच्या बैठकांमध्ये अनियमितता असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकांना विविध विभागांचे अधिकारीच दांडी मारत असल्याने ग्राहक हित जपणार कोण, असा सवाल उपस्थित होतो आहे.

समाजात वावरणारी प्रत्येक व्यक्ती ग्राहक म्हणून व्यावसायिकासमोर जात असते. अगदी खाद्यपदार्थांपासून ते घर खरेदी करणारा प्रत्येक जण ग्राहक असतो. मात्र अशा वेगवेगळ्या स्तरांतील ग्राहकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येतात. फसवणूक झालेल्या अशा ग्राहकांना ग्राहक न्यायालयाचे दरवाजा ठोठावण्याचा अधिकार असला तरी तसे करण्याबाबत नागरिक उदासीन असल्याचा ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. तोंडी तक्रार करण्यासाठी शेकडो लोक पुढे येत असले तरी न्यायासाठी झगडणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही नसतात, अशी कैफियत चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन होतो की नाही, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात येते. ग्राहक संरक्षण तक्रार निवारण परिषदेच्या सदस्यांना या बैठकींना निमंत्रित करण्यात येते. अनेकदा ही बैठक अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली जाते. या बैठकीला वजनमापे विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, गॅस वितरण कंपन्या, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस, महावितरण, राज्य महामार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे असते. जिल्हाधिकाऱ्यांकडून तशी सक्ती केली जात असली तरी काही ना काही कारणे सांगून अधिकारी या बैठकांना उपस्थित राहणे टाळतात. त्याऐवजी ते लिपीक किंवा तत्सम प्रतिनिधींना बैठकीला पाठवून स्वत:ची सुटका करवून घेतात. गत बैठकीत उपस्थित तक्रारींवर काय कार्यवाही केली याची माहिती संबंधित प्रतिनिधींना देता येत नाही. तक्रारींचे वेळेत निरसन होत नसल्याने चळवळीतील कार्यकर्त्यांचाही हिरमोड होतो आहे.
महिन्याला किंवा किमान दोन महिन्यातून एकदा ग्राहक संरक्षणबाबत बैठक घेणे आवश्यक आहे. मात्र, चालू वर्षात अनियमितता दिसून आली. वर्षभरात तीन बैठका होऊ शकल्या. प्रशासनातील अधिकारीही ग्राहक हिताबाबत उदासीन आहेत. परिस्थिती सुधारणार का?

टी. बी. साळुंके
अखिल भारतीय ग्राहक पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची समायोजनाची अट शिथिल

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिका क्षेत्रात हद्दवाढीनंतर समाविष्ट झालेल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या ५९ कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत सामावून घेतल्यानंतर वेतन भत्त्यांसाठी आस्थापना खर्चाची ३५ टक्केची अट शिथिल करण्यात आली आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना देखील मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देता येणार आहेत. ही माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात शहारानजीक असलेल्या सोयगाव, भायगाव, द्याने, दरेगाव, म्हाळदे, सायने या गावांचा २००७ मध्ये हद्दवाढीत समावेश झाला. या गावात ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ५९ कर्मचाऱ्यांना मालेगाव मनपा आस्थापनेवर समायोजित करून घ्यावे यसाठी ना. भुसे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने ऑगस्ट २०१५ मध्ये मान्यता दिली. मात्र, ही मान्यता देते वेळी एकूण आस्थापना खर्च ३५ टक्के राहील, अशी अट अंतर्भूत करण्यात आली होती. त्यामुळे समायोजन झालेल्या ५९ कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकत नव्हता. ही अट शिथिल करावी यासाठी ना. भुसे यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केल्याने आस्थापना खर्चाच्या ३५ टक्क्याची अट शिथिल करण्यास मान्यता दिली असून, या कर्मचाऱ्यांना देखील मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्ष-किरण विभागातील बदलांवर मार्गदर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

रेडिओग्राफर्स असोसिएशनचे तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील संमेलन नुकतेच इगतपुरी येथील हॉटेल मानस लाइफ स्टाइल रिसॉर्ट येथे पार पडले. वैद्यकीय क्षेत्रातील क्ष-किरण विभागातील होणारे अत्याधुनिक बदल हा या संमेलनाचा मूळ उद्देश होता.

या संमेलनाचे उद्घाटन मविप्रचे क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. गाडगीळ यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष त्रिलोकी मिश्रा, जगदीश जगताप, वाजिद रेड्डी, शंकर भगत आदींनी मार्गदर्शन केले. या संमेलनात नाशिक विभागातून विलास भदाणे यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या संमेलनास भारतातून तसेच दुबई ,जर्मनी, जपान येथील काही रेडिओग्राफर्स उपस्थित होते. यावेळी क्ष किरण विभागातील बदलांवर चर्चा करण्यात आली.

या संमेलनाचे आयोजन सरचिटणीस विलास भदाणे यांनी नाशिक युनिटचे अध्यक्ष नरेंद्र वाघ, दीपक वाणी, अभिजीत पगारे, संदीप अहिरे, हरिष देसाई, अनुप नाडे, सनी शिंदे, गणेश काकडे, गणेश खालकर, नितीन बर्गे आदींच्यां सहकार्याने व प्रयत्नाने यशस्वी पार पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यांचा हंगाम, एटीएम कंगाल!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वर्षाअखेरीच्या तोंडावर सुट्यांचा हंगाम आल्यामुळे आगामी सलग ४ दिवस बँका तसेच सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पैशांची चणचण भासण्यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी बुधवारी पैसे काढण्याचा सपाटा लावल्याने शहरातील अनेक एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे दिसून आले. बँकांमध्येही दिवसभर गर्दी दिसून आली.

वर्षअखेर जवळ येतानाच ईद आणि नाताळच्या निमित्ताने सुट्यांचा बोनान्झा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे. गुरुवारपासून थेट रविवारपर्यंत सलग ४ दिवस सुट्या लागून आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी (२४ डिसेंबर) ईद ए मिलाद, शुक्रवारी (२५ डिसेंबर) नाताळ, शनिवारी (२६ डिसेंबर) महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवारी (२७ डिसेंबर) साप्ताहिक सुटी असे सलग चार दिवस सुट्यांमुळे बँका, सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट राहणार आहे.

सलग चार दिवस सुट्या मिळत असल्याने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे नियोजन केले आहे. खासकरुन पर्यटनाला जाण्याचा अनेकांचा कल आहे. बँका बंद राहणार असल्याने आगामी चार दिवस एटीएममध्ये पैशांची उपलब्धता होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. बुधवारी रात्रीच आम्ही एटीएममध्ये पैसे भरणार असल्याचे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, अवघ्या एक किंवा दोन दिवसाच्या सुटीतच एटीममध्ये पैशांचा खडखडाट होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात ग्राहकांची मोठीच पंचाईत होणार असल्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅरोलवरील कैद्यास कोनांबेत अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा व पॅरालेवर सुटलेल्या कैद्यास सिन्नर पोलिसांनी कोनांबे येथून जेरबंद केले. गुन्हा वणी पोलिसांच्या हद्दीत झाला असल्याने त्यास वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दौलत त्र्यंबक चतुर (रा. काजीमाळे, ता. दिंडोरी) यास सत्र न्यायालयाने भादवी कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याने दारूच्या नशेत देवचंद हरी गांगुर्डे याचा खून केला होता. त्याचा खून केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने न्यायालयाने दौलत चतुर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यात त्याने पाच वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर घरातील व्यक्तीच्या आजाराचे निमित्त करून तीन महिन्याच्या पॅरोलवर सुटला होता. मात्र, मुदत संपूनही तो सेंट्रल जेलमध्ये दाखल झाला नाही. तो वेषांतर करून कोनांबे शिवारात राहत होता. याची माहिती सिन्नर पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, पोलिस हवालदार नितीन मंडलिक, रवींद्र टर्ले, श्रीकांत दोंदे आदींनी आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणी वणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यास वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आला थंडीचा महिना, तब्येत सांभाळा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मागील आठवड्यापासून नाशिकमधील वातावरणात कमालीचा बदल होत आहेत. कडाक्याच्या थंडीचा सामना नाशिककर करीत आहेत. मंगळवारी पारा ६ अंशापर्यंत घसरल्याने आरोग्याच्या समस्यांनीही डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला याबरोबरच सांधेदुखीची समस्या अनेकांना जाणवत असल्याने दवाखान्यांमध्येही गर्दी असल्याचे चित्र होते.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अस्थिरता असल्याने या बदलाचा त्रास लहान बालके, आबालवृद्ध व संधीवाताचा त्रास असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. याबरोबरच प्रतिकारशक्ती कमी असल्याच्या कारणांनी अनेक जणांना वातावरणातील बदल सहन करण्यास अडथळे येत आहेत. लहान वयातील मुलांना या वातावरणाचा त्रास अधिक होत असल्याने ज्या व्यक्तींना इन्फेक्शन झाले आहे, अशांच्या सान्निध्यापासून लहान मुलांना दूर ठेवणे, तसेच ऊबदार कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवणे हितकारक असल्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत. याबरोबरच योग्य आहार घेण्यावर विशेष भर देण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर सुरक्षेसाठी अवघे दहा पोलिस

0
0

कैलास येवला, सटाणा

सरासरी दिवसाकाठी एक गुन्हा घडणाऱ्या सटाणा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवघे १० पोलिस कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सुमारे ५० हजार लोकसंख्येच्या संरक्षणासाठी अवघ्या दहा पोलिसांच्या पाठबळावर शहरवासीयांना निश्चित रहावे लागत आहे.

बागलाण तालुक्यातील १७९ गावांसाठी सटाणा व जायखेडा ही दोन पोलिस ठाणी कार्यरत आहेत. पैकी १०० गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या सटाणा पोलिस ठाण्यात अवघे ५१ पोलिस कर्मचारी काम करीत असले तरीही तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सटाणा शहरासाठी अवघे १० पोलिस बळ असल्याने शहरवासीयांनी शांत झोपावे कसे असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे शासनाने सटाण्यासारख्या संवेदनशील शहरात किमान पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याची मागणी होत आहे.

नोव्हेंबर २०१५ अखेर सटाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ३१० गुन्हे दाखल झाले. याचाच अर्थ ३६५ दिवसांत सरासरी एक गुन्हा या ठिकाणी घडत असताना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवघे १० पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत.

सटाणा कार्यक्षेत्रासाठी ५२ पोलिस कर्मचारी आहेत. त्यात सटाणा पोलिस ठाण्यासाठी १० कर्मचारी, डांगसौदाणे बीट असलेल्या २६ खेड्यांसाठी तीन पोलिस कर्मचारी, लखमापूर बीट असलेल्या २४ खेड्यांसाठी तीन पोलिस कर्मचारी, वीरगाव व ठेंगोडा या दोघा बीटकरिता प्रत्येकी दोन कर्मचारी देण्यात आले आहेत.

दोन पोलिस कर्मचारी कायमस्वरूपी गैरहजर असून, तीन कर्मचारी प्रतिनियुक्तीवर देण्यात आलेले आहेत. दोन हवालदारांची बदली झाली असली तरीही घोटी व जायखेडा येथून ते बदलून आलेले नाहीत. चार पुरूष व एक महिला कर्मचारी वैद्यकीय रजेवर आहेत. दोन पोलिस कर्मचारी कोर्टकामासाठी राखीव ठेवण्यात येतात. तर, एक कर्मचारी शेषन कोर्टासाठी आहे. या कर्मचाऱ्यांना समन्स देणे, कैदी ने-आण करण्याची कामे देण्यात आलेली आहेत. पोलिस मुख्यालयात असलेल्या तुरुंगांसाठी एक गार्ड व तीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना एक गार्ड व दोन कर्मचारी नियुक्तीवर आहेत. दोन ठाणे अंमलदार असून त्यांची नियुक्ती तक्रारी, गुन्हे दाखल करण्यासाठी आहेत. दोन कर्मचारी सीसीटीएनएस व तर दोन कर्मचारी वायरलेस यंत्रणेवर तैनात ठेवण्यात आले आहेत. तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर क्राईम रेकॉर्ड, गुन्हे तपास, चौकशी करण्याची कामे सोपविण्यात आली आहेत. तर, दोन कर्मचारी गोपनीय कामासाठी देण्यात आलेले आहेत.

सटाण्यात पोलिस यंत्रणेवर कामाचा ताण

तब्बल ४२ कर्मचाऱ्यांवर कामे सोपवून सटाणा शहरासाठी अवघे १० पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. एक पोलिस निरीक्षक व दोन पोलिस उपनिरीक्षकांचा यात समावेश आहे. यामुळ शहरातील कायदा सुव्यवस्था, सण उत्सव, मिरवणूक जयंती, पुण्यतिथी, बंदोबस्त या सारखे उपक्रम साजरे होत असल्याने पोलिसांची दमछाक होण्यास वेळ लागत नाही. यामुळे पोलिस यंत्रणेवर कामाचा ताण जाणवत आहे. दिवसभर उपरोक्त कामे करून आलेल्या कर्मचाऱ्यांना रात्री गस्तीसाठी पाठविण्यात येत असल्याने पोलिसांचे मनोधैर्य खचत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवशक्ती संगमसाठी साडेसात हजार स्वयंसेवक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सलग नऊ दशकांपासून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये सेवारूपाने कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण व्हावे, या उद्देशाने ३ जानेवारी रोजी पुण्यात आयोजितशिवशक्ती संगम सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातून सुमारे साडेसात हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

शंकराचार्य न्यास येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.देशभरात सुमारे दीड लाख सेवाप्रकल्पांमध्ये कार्यरत असणाऱ्या अफाट सेवाकार्याची माहिती स्वयंसेवकांना व्हावी. संघटनेच्या व्यापक कार्याचा आढावा त्यांच्यासमोर मांडला जावा, या उद्देशाने संघाच्या पश्चिम प्रांतातील सुमारे सात जिल्ह्यांमधून १ लाख स्वयंसेवक या सोहळ्यासाठी पुण्यात एकत्रित येणार आहेत.

पुण्यातील हिंजवडीच्या आयटी पार्क शेजारील मारुंजी, जांबे व नेरेत या गावांच्या परिसरात हा उपक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासमवेत सरकार्यवाह भैय्याजी जोशी उपस्थित राहणार आहेत. नाशिक शहरातून ७४३३ स्वयंसेवकांनी ह्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. गेल्या चार महिन्यापासून ह्या कार्यक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरु होती.

नाशिक शहरात दोन टप्प्यात नोंदणी करताना २३ विस्तारक कार्यकर्त्यांनी शहरातील ७ भागात प्रत्यक्ष घरोघरी आणि महाविद्यालयात संपर्क करून नोंदणी केली. संपर्क विभागाने ह्या निमित्ताने विशेष व्यक्तींचा संपर्क केला. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला एक बारकोड क्रमांक देण्यात

आला आहे. हा क्रमांक पाहून व शिवशक्ती संगमस्थळी सर्वाना प्रवेश देण्यात येणार आहे. नाशिक शहरातून अनेक नागरिक आणि मान्यवर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तीन गावातील ४५० एकर परिसरात हा भव्य शिवशक्ती संगम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांवर फीवाढीचा भुर्दंड

0
0

सरकारी निष्क्रियतेमुळे शाळांना १५ टक्के फीवाढीची मुभा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व विनाअनुदानित, इंटरनॅशनल स्कूल, अल्पसंख्याक शाळांना २०१६-१७ या शैक्षणिक वर्षी १५ टक्के फीवाढ करण्याची मुभा मिळणार आहे. मुंबई हायकोर्टात यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणीदरम्यान हा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच देण्यात आला.

महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक संस्था नियंत्रण कायदा २०११ ला आव्हान देणारी याचिका खासगी संस्थाचालकांनी दाखल केली होती. त्याची सुनावणी न्यायमूर्ती अनूप मोहता आणि न्या. ए. सय्यद यांच्या खंडपीठापुढे झाली. कायद्याला आव्हान देणारी याचिका असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल स्कूल्स इन इंडिया आणि अनएडेड स्कूल्स फोरम या संघटनांनी दाखल केली आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायदा आम्हाला लागू होत नाही. या कायद्याअंतर्गत आमच्या संस्था येत नाही. फीवाढीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. या कायद्यांतर्गत आमच्या शाळा येत नाहीत, अशी भूमिका या संस्थांनी मांडली आहे. फीवाढ करण्यासाठी पालक शिक्षक संघ व शासकीय यंत्रणेचीही परवानगी घेण्याची गरज नसल्याचाही दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. यावर निकाल देतांना १५ टक्के फीवाढ करण्याची मुभा हायकोर्टाने दिली.

या खासगी संस्थाचालकांना १५ टक्क्यांपेक्षा अधिक फीवाढ करायची असेल तर पालक शिक्षक संघ व शासकीय यंत्रणेची परवानगी घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील खासगी संस्थाचालकांनी या निकालाचे स्वागत केले आहे तर दुसरीकडे पालक वर्गाचे ‌प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांनी राज्य सरकारवर टीका करीत नाराजी व्यक्त केली आहे.


लक्ष पुढील सुनावणीकडे

या याचिकेसंदर्भात पुढील सुनावणी १८ जानेवारी २०१६ रोजी होणार आहे. त्यावेळी राज्य सरकार काय भूमिका मांडते, याकडे पालकवर्गाचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार आपली भूमिका ठोसपणे मांडण्यात यशस्वी झाल्यास या फीवाढीच्या भूर्दंडापासून मुक्तता होण्याची पालकवर्गाला आस आहे.


खासगी शाळांना दिलासा देणारा निकाल आहे. काळानुसार फीवाढ करणे गरजेचे आहे. साधारणपणे दरवर्षाला दहा टक्क्यांनी आपल्याला महागाईला सामोरे जावे लागते. त्यानुसार शाळांसाठीही फीवाढ योग्य आहे. मात्र, एकदा फीवाढ केल्यानंतर शाळांनी किमान दोन वर्षे तरी त्यात वाढ करू नये.

- सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक

सरकारने कोर्टासमोर व्यवस्थित बाजू न मांडल्याने पालकांना फटका बसणार आहे. पालकांच्या हिताचा विचार करतांना शाळांचे खर्च तपासल्यानंतर भूमिका घेणे योग्य ठरेल. असेल.

- मिलिंद वाघ,

शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीचा थांगपत्ता लागेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण समितीसाठी अर्थसंकल्पाच्या तरतुदीपैकी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. मात्र, अधिकारी त्याचा विनियोग करण्यासाठी इच्छुक नाहीत. कामात रस नसलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वत्सला खैरे यांनी केली. बुधवारी समितीच्या झालेल्या बैठकीत प्रत्येक विभागात सुसज्ज महिला केंद्र सुरू करण्याचा ठराव करण्यात आला.

महिला व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनांना राहण्याच्या दृष्टीने या केंद्राचा वापर होऊ शकतो. याच ठिकाणी​ रोजगार व आर्थिक मदत उपलब्ध करून देणारे केंद्र सुरू करण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला. त्यास सदस्यांनी मंजुरी दिली. शहरातील पीडित महिलांना समुपदेशन केंद्राची आवश्यकता असून, त्या दृष्टीने राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सन २००२ मध्ये महासभेने शहरातील विविध भागात समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. एका वार्डात त्याची सुरुवात देखील करण्यात आली होती. मात्र, थोड्याच दिवसात समुपदेशन केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांनी आपले काम बंद केले होते. परिणामी तेव्हापासून पीडित महिलांसाठी उपयोगी असलेल्या समुपदेशन केंद्राकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रत्येक विभागात कायमस्वरूपी केंद्र उभे राहिल्यास महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व योजना एकाच छताखाली राबवणे शक्य होऊ शकते. तसेच, बचत गटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. आम्ही ठराव केला. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाने करणे अपेक्षित असल्याचे मत खैरे यांनी व्यक्त केले. महिला व बालकल्याण समितीसाठी अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार कागदोपत्री हे काम होते. प्रत्यक्षात त्याचा कोणताही फायदा होत नसल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. याची सर्वस्वी जबाबदारी महिला व बालकल्याण समितीच्या अधिकारी वसुधा कुर्णावळ यांची असल्याचा ठपका खैरे यांनी ठेवला. अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या योजना अथवा प्रस्ताव समोर आणले तर महिलांसाठी अनेक उपक्रम राबवणे शक्य आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून असे कोणतेही काम होत नाही. वारंवार सूचना देऊनही कामात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करून याठिकाणी तत्काळ कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे करण्यात आल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. बैठकीला उपसभापती शीतल भामरे सदस्या नंदिनी जाधव, रूपाली गावंड आदी हजर होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा अवैध उपसा केल्यास करा गुन्हे दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ज्या गावांसाठी पाणी आरक्षित आहे ते त्याच गावापर्यंत पोहोचावे, यासाठी वहन मार्गावर अत्यंत कडक बंदोबस्त ठेवावा तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी बुधवारी दिले.

डवले यांनी महसूल विभागाच्या विविध विषयांचा त्रैमासिक आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पाणीटंचाईवर प्रामुख्याने चर्चा झाली. पाण्याचे आरक्षण सोडताना वहन मार्गावर बंदोबस्ताचे नियोजन करतानाच त्या मार्गावरील वीजपुरवठा खंडित करावा. अवैध उपशाविरोधात कठोर कारवाई करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. जलयुक्त शिवार योजनेची कामे धिम्या गतीने होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. योजनेच्या पुढील टप्प्यात प्रत्येक तालुक्यात दोन कामे सुरू करणे अपेक्षित आहे. जी कामे झालेली आहेत त्यांचे फोटो अपलोड करण्याबाबत अधिकारी उदासीन असल्याबाबत नाराची व्यक्त करण्यात आली. जलयुक्तची कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे आदेश त्यांनी दिले. जलयुक्तच्या कामांसाठी रोजगार हमी योजनेतून मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटकपेक्षा जास्तच वेतनवाढ करार करू

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

'आयटक'चे अध्यक्ष भालचंद्र कांगो मंगळवारी (दि. २२) अंबड एमआयडीसीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत द्वारसभा घेतली. कांगो यांना आव्हान देत 'सीटू' कामगार संघटनेचे नेते डॉ. डी. एल. कराडा यांनी आयटकपेक्षा अधिक रकमेचाच वेतन करार करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

कांगो कंपनीत आल्यावर उपस्थित काही कामगारांनी निर्दशने केली होती. यात सीटू युनियनचेही काही कार्यकर्ते होते. कांगो यांना 'सीटू'ने प्रसिद्ध पत्रकाद्वारे बुधवारी पुन्हा आव्हान दिले. आयटकचे कांगो यांनी पाच वर्षांसाठी कुठलाही महागाई भत्ता न वाढवता वेतनवाढ केली आहे. यामुळेच नाराज होऊन ९० टक्के कामगारांनी सीटू युनियनचे सभासत्व स्वीकारले असून आयटकपेक्षा निश्चितच चागंला करार करणार असल्याचे डॉ. कराड यांनी पत्रकात म्हटले आहे. सीटूकडे स्पष्ट बहुमत असतांना गुप्त मतदान घेण्याची आमची तयारी आहे. आयटकपेक्षा मोठा करार करणार, मग आयटक सीटूमध्ये समाविष्ट करा असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images