Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जलशिवार योजनेला राज्य सरकार देणार गती : पंकजा मुंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील कै. गोपीनाथ मुंडे जलकुंभाचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते संपन्न झाला. मुंडे यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलशिवार योजनेला गती देणार असल्याचे या वेळी सांगितले. मराठवाडा व विदर्भापेक्षा नाशिक विभाग सर्वगुण संपन्न असून, या भागात आमची मुलगी दिली असल्याचेही त्या म्हणाल्या. महापौर अशोक मुतर्डक यांनी सिंहस्थ कामात महापालिकेने केलेला खर्च महाराष्ट्र शासनाने द्यावा, अशी आग्रहाची मागणी ग्राम विकास मंत्री मुंडे व कामगार मंत्री मेहता यांच्याकडे केली.

लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे जलकुंभाचा लोकार्पण सोहळा गंगापूर गाव शिवारातील धृवनगर येथे संपन्न झाला. यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ व गंगापूररोड बारदान फाटा ते त्र्यंबकेश्वररोड समृद्धनगर रोडला आत्मा मालिक जंगलीदास महाराज असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी ग्राम विकास मंत्री पंकडा मुंडे, कामगार मंत्री प्रकाश मेहता व महापौर अशोक मुतर्डक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनीही नाशिकच्या विकासाचे कौतुक केले. जनसामान्यांमध्ये धडपड करणाराच नेता होतो, असे सांगतानाच मेहता यांनी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर मुर्तडक यांनी सिंहस्थ कामात महापालिकेने केलेला खर्च महाराष्ट्र शासनाने द्यावा अशी विनंती सौ. मुंडे व मेहता यांच्याकडे केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगरसेवक पाटील यांनी सर्व धर्म समभाव म्हणून विकास कामे करत असल्याचे सांगितले. नव्याने विकसीत होत असलेल्या धृवनगर भागातील रस्तांची कामे अर्धवट असून, त्यासाठी महापालिकेने निधी द्यावा अशी मागणीही नगरसेवक पाटील यांनी केली. याप्रसंगी उपमहापौर गुरुमीत बग्गा, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, विक्रांत चांदवडकर, नगरसेविका लता

पाटील, सभागृहनेते सलिम शेख, एन. एम. आव्हाड यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गारठे ओसरले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या चार दिवसांपासून नाशिककारांना हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा जोर शनिवारी काहीसा ओसरला. शुक्रवारी पाच अंशांपर्यंत खाली उतरलेला थंडीचा पारा दोन अंशाने वाढून ७.४ अंशापर्यंत पोहोचला. निफाड तालुक्यात मात्र अजूनही थंडीचा जोर कायम असल्याचे पहावयास मिळते आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा उत्तर महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. गेल्या चार दिवसांपासून केवळ नाशिकचाच नव्हे तर अहमदनगर, जळगाव, धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा खाली उतरला. विशेष म्हणजे राज्यात सातत्याने सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमध्येच झाली. द्राक्ष बागायतदारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाडची राज्यात सर्वाधिक थंडीचा तालुका म्हणून ओळख अधोरेखित झाली. शुक्रवारी निफाडमध्ये या वर्षातील सर्वात निचांकी ५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मात्र शनिवारी येथे ५.२ अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले. शहरात आणि निफाड वगळता जिल्ह्यातील अन्य भागात थंडीचा जोर ओसरल्याचे पहावयास मिळते आहे. येथे किमान ७.४ अंश सेल्सियस, तर कमाल २६.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील किमान तापमान ७.४ अंश सेल्सियस होते. बुधवारी ते घसरून ६ अंश सेल्सियसवर स्थिरावले. गेले दोन दिवस थंड हवा चालत असल्याचा अनुभव नागरिक घेत होते. मात्र आज हवेचा जोरही कमी झाल्याचे पहावयास मिळाले. नाताळपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असला तरी तो नाताळ सणानंतर उतरत जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. वातावरणातील तापमान घटून थंडीचा पारा हळहळू वाढू लागल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० ठिकाणी रंगणार ‘न्यू इयर सेलिब्रेशन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नववर्षाच्या स्वागताला अवघे तीन दिवस उरले असून, २०१५ सालाची 'गोड' सांगता करण्याची जोरदार तयारी सध्या शहरात सुरू आहे. त्यातच सलग सुट्यांमुळे सेलिब्रेशनचा डबल धमाका पाहण्यास मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, शहरातील विविध ५० पेक्षा जास्त ठिकाणी नाशिककरांना रंगारंग अनुभवता येणार आहे.

नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईला गती दिली आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, ट्रिपल सिट, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून, सोमवारनंतर त्यात वाढ केली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. कोर्टाने घालून दिलेल्या वेळेच्या बंधनाचा नियम प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून, ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसेल त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक परवानगी घेऊनच नियोजन आखावे, असे आवाहन पाटील यांनी केले. नववर्षाच्या स्वागतावेळी पहाटे पाच वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मुभा असून, त्याबाबतची मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्यावर्षी साधारणतः ५० ते ५५ कार्यक्रमांना मंजुरी देण्यात आली होती. यंदाही तसाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या कार्यालयीन सुट्या असून, सोमवारनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे उपायुक्त पाटील म्हणाले. गत वर्षांनी बोटवर मोजता येईल, इतक्या हॉटेल्सने पहाटे पाच वाजेपर्यंत कार्यक्रमांच्या आयोजनाची मंजुरी घेतली होती. इतरांनी फारतर दोन वाजेपर्यंतची वेळ मागितली होती. रात्री एक ते दोन वाजेपर्यंत शहरात शांतता पसरली होती. आपल्या शहरात लेट नाईट लाईफची संकल्पना अस्तित्वात नाही. नागरिक सुद्धा सहकार्याच्या दृष्टीने पोलिसांना मदत करीत असल्याचा दावा पाटील यांनी केला. दरम्यान, कायदेशीर मंजुरी असलेल्या कार्यक्रमाव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी होणारे इतर कोणत्याही कार्यक्रमाचे प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला. शहर वाहतूक शाखेमार्फत बेशिस्त वाहनचालकांवर, तर पोलिस स्टेशनकडून टवाळखोरांवर सातत्याने कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पैसे न मिळाल्याने चाकूहल्ला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भाशय मुखाचा कर्करोग

$
0
0

गर्भाशयाच्या मुखाला होणारा कॅन्सर हा गर्भाशय मुखाच्या पेशी जास्त वाढल्याने होतो. या पेशी आजूबाजूच्या अवयवांपर्यंत पोहचू शकतात. सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढला तर लक्षणं दिसायला लागतात. हा कॅन्सर ह्युमन पॅपीलोमा व्हायरस या इन्फेक्शनमुळे होतो. धुम्रपान करणाऱ्या महिला, शारीरिक संबंध कमी वयात येणे, एका पेक्षा जास्त व्यक्तीशी शारीरिक संबंध असणे, जास्त प्रसूती होणे, गर्भरोधक गोळ्या जास्त वर्ष घेणे. साधारणपणे ४० ते ५० वयाच्या दरम्यान या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. गर्भाशयमुखाचा कॅन्सर होण्यापूर्वी १० ते २० वर्ष तो होण्याच्या स्थितीमध्ये असतो.

गर्भाशयमुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त, गर्भाशयाचा व स्त्रीरोग बिजाचाही कॅन्सर होऊ शकतो. गर्भाशयमुखाच्या कॅन्सरनी मृत्यू होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण, इतर कर्करोगापेक्षा जास्त आहे. अजूनही बऱ्याच भारतीय स्त्रिया या स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. अज्ञान व लाज यामुळे डॉक्टरकडे जायची टाळाटाळ करतात. अती झाल्यावरच वैद्यकीय तपासणी करायला तयार होतात, अशावेळी कर्करोग हा शेवटच्या स्टेजला असू शकतो व त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. पण हा कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळखता आला तर पूर्ण बरा होऊ शकतो. या रोगाचा शोध घेण्यासाठी पॅप स्मिअर नावाची सोपी अशी चाचणी आहे. ही टेस्ट गर्भाशयमुखाचा कर्करोग पुढील दहा वर्षात व्हायची शक्यता आहे किंवा नाही याविषयी माहिती देऊ शकते. अशा तऱ्हेने लवकर निदान झाल्यास साध्या उपचारांनीही हा आजार बरा करता येतो म्हणुन सर्व विवाहित स्त्रियांनी पॅप स्मिअर नावाची टेस्ट नियमितपणे करून घेणे आवश्यक आहे. या टेस्टमध्ये कर्करोगाचा संशय आल्यास आणखी काही तपासण्या करून निदान पक्के केले जाते. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी त्याला काल्पोस्कोपी म्हणतात. यावेळी गर्भाशायचा तुकडा काढून तपासला जातो.

कर्करोग अगदीच प्राथमिक अवस्थेत असेल तर छोट्या शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात. गर्भाशय काढून टाकणे, योनी मार्गाचा वरचा भाग काढणे व आजूबाजूचे आवरण काढणे हे केले जाते. काहीवेळा शस्त्रक्रिये ऐवजी रेडीयोथेरपीचा उपयोग केला जातो. कुठल्या स्टेजला कर्करोगाचे निदान झाले यावरून ती व्यक्ती पुढे किती दिवस जगू शकते हे ठरते. गर्भाशयमुखाचा कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अप्रगत देशात जास्त आहे. प्रगत देशामध्ये जागरूकता व लवकर उपचार करून घेणे यामुळे गर्भाशयमुखाचा कर्करोग खूप कमी झाला आहे. या कर्करोगाची लक्षणे म्हणजे बऱ्याच वेळेला काहीच त्रास होत नाही. नियमित तपासणी केली तर त्या तपासणीमध्ये कॅन्सर आढळून येतो. इतर लक्षण म्हणजे रक्तस्त्राव होणे, पांढरे पाणी जाणे, शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे, ओटीपोटात दुखणे, कधी कधी गर्भाशयाच्या मुखाला मोठी गाठ असणे, व त्यातून रक्तस्त्राव होणे, असेही दिसून येते. कॅन्सर जास्तच वाढला असेल तर तो इतर अवयवांपर्यंत पोहचतो. तेव्हा भूक न लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे, ओटीपोटात दुखणे, कंबर पाठ दुखणे, पाय दुखणे, पाय सुजणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे, तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे, अशी लक्षणे दिसून येतात.

नियमितपणे शारीरिक तपासणी आणि पॅप स्मिअर केली तर कॅन्सरचे प्रमाण आणि परिणामी मृत्यूचे प्रमाण देखील कमी होईल. दर ३ वर्षांनी पॅप स्मिअर केल्यास ८० टक्के कॅन्सरचे प्रमाण कमी होईल म्हणून पॅप स्मिअर व नियमित तपासणी करणे गरजेचे ठरते. लिक्विड बेसड् सायटॉलॉजी ही अजून एक तपासणी आहे. यामध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सर चे निदान जास्त अचूक होते. शारीरिक संबंध ठेवतांना जर निरोध वापरला तर कॅन्सरचे प्रमाण कमी होऊ शकते. असं अभ्यासात दिसून आलं आहे. निरोधामुळे बाकीचे शारीरिक संबंधांमुळे होणारे आजारही टाळले जातात.

सध्या दोन प्रकारचे व्हॅक्सीन उपलब्ध आहे गार्डासील व सर्व्हीरीक्स. हे व्हॅक्सीन घेतले तर ९३ टक्के कॅन्सर होण्यापासून वाचू शकतो. या व्हॅक्सीनचे तीन डोसेस असतात व ते वयाचा ११ वर्षापासून ते ४५ वर्षापर्यंत दिले जातात. व्हॅक्सीन घेतले तरी नियमितपणे शारीरिक तपासणी आणि पॅप स्मिअर करणे गरजेचे आहे. भारतामध्ये गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग व बिजकोशाचा कर्करोग ही होऊ शकतो. उशिरा लग्न होणे, कुमारिका असणे, मुल न होणे, मुल उशिरा होणे, स्तनपान न करणे यामुळे स्तनांचा किंवा गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग ५० टे ६५ या वयात होऊ शकतो. ज्या व्यक्तीमध्ये मधुमेह, अतिरक्तदाब, आणि स्थूलता असते अशा स्त्रीमध्ये गर्भाश्याचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये पाळी जास्त दिवस येणे, अंगावर जास्त रक्तस्त्राव होणे, पाळी लवकर लवकर येणे, किंवा पाळी बंद झाल्यावरही अंगावर रक्तस्त्राव व्हायला लागणे, अशी लक्षणे दिसून येतात. अशावेळी शारीरिक तपासणी करून, सोनोग्राफी, क्युरेटिंग करून निदान करतात. सध्याच्या काळात नियमित तपासणी, जागरूकता, योग्य उपचार असतील तर गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो.

(लेखिका स्त्र‌ीरोग तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे न मिळाल्याने चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मखमलाबाद पाटाजवळील मारूती मंदिर येथून सायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न झाला. संबंधित व्यक्तीकडे पैसे नसल्याने तिघा अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्यावेळी सर्वसामान्यांना लुटण्याच्या अनेक घटना पंचवटीत होत असून, दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अशाच गुन्ह्यात कुमावतनगर येथील दोघांना अटक केली होती.

गणेश वसंत झिरवळ, असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ते २४ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मखमलाबाद येथे सायकलवर जात असताना तिघा भामट्यांनी त्यांना पाटाजवळ थांबवले. पैशांची मागणी करणाऱ्या संशयितांना झिरवळ यांच्याकडे पैसे सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी झिरवळ यांच्या हातावर तसेच पोटावर चाकू हल्ला करून पळ काढला. गेल्या काही दिवसांत पंचवटीमध्ये असे लुटीचे प्रकार सर्रास घडत असून, पोलिसांनी आरोपींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

प्रवासादरम्यान दागिन्यांची चोरी

हुबळी ते नाशिक प्रवासादरम्यान कनार्टक येथे राहणाऱ्या संगमेश रामचंद्र खताडे यांच्या बॅगेतील १ लाख ४६ हजार रूपये किंमतीचे सहा तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. २३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास खताडे यांनी आपला प्रवास सुरू केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास द्वारका येथे पोहचल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दीड लाखांचा ऐवज लंपास

बंद घराच्या खिडकीचे गज कापून आत घुसलेल्या चोरट्यांनी १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी मंगेश दिगंबर खोडदे यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. मंगेश व त्यांचे कुंटूंब ५ डिसेंबरपासून बाहेरगावी गेले होते. ते २५ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता परत आले. या काळात चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला होता.

नदीत बुडून एकाचा मृत्यु

खेकडे पकडण्यासाठी वालदेवी नदीपात्रात उतरलेल्या तुळशीराम झोंबाड (४०) यांचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास झोंबाड वालदेवी पात्रात उतरले होते. विहीतगाव येथे राहणारे झोंबड खोल पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यु झाला. याप्रकरणी संगिता तुळशीराम झोंबाड यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नाशिककरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलीममामूंच्या चायटपरीवर झाली आठवणींची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सकाळची बोचरी थंडी... बऱ्याच दिवसांनंतर झालेल्या भेटी... सोबतीला वाफाळलेला चहा अन् आठवणींत रमलेली मित्रमंडळी... कॉलेजरोवरील सलीम चाय टपरीमध्ये शनिवारी हे चित्र साकारले होते. निमित्त होते, 'आठवणीतील चहा' या उपक्रमाचे. 'जनस्थान' या कलावंतांच्या व्हॉट्स अप ग्रुपतर्फे या उपक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते.

कॉलेज लाईफ अन् सलीम मामूंची चायटपरी हे कॉलेजरोडवरील प्रत्येकासाठीच गेल्या अनेक वर्षांपासून समीकरण झाले आहे. थंडीत तर या समीकरणाला चहासारखाच आकर्षक गर्द रंग चढलेला असतो. अनेकांचा कॉलेज ते राजकारण, नाटक, सिनेमा असा प्रवास आज झालेला आहे. काहींना येथेच गाणे सुचले तर काहींना नाटकाच्या कथा. या सर्वांच्या प्रवासाचा खरा साक्षीदार सलीम चायटपरीवरचा चहा ठरला. मित्रांसोबत आपली स्वप्न शेअर करण्याबरोबरच आयुष्यातील हळव्या बाजूही या टपरीवर व्यक्त केल्या गेल्या आहेत. परीक्षांमध्ये अभ्यासाच्या नियोजनाबरोबरच कॉलेजमधील गुलाबी आठवणींचीही साक्षीदार ही चायटपरी ठरली आहे. या सर्वच आठवणींची उजळणी या उपक्रमामुळे नव्याने झाली.

अनेक दिवसांनी झालेल्या या भेटीमध्ये एकमेकांविषयीच्या किती आठवणी सांगू अन् किती नको, अशी अवस्था प्रत्येकाची झाली होती. प्रत्येकाकडचा आठवणींचा खजिना यानिमित्त उघडला गेला. प्रत्येकाचे वेगळे ऋणानुबंध असलेल्या या टपरीशी आणखी एक अविस्मरणीय आठवण यानिमित्ताने जोडली गेली. नाशिकबरोबरच बाहेरगावांमधूनही सलीम चायटपरीच्या चाहत्यांनी या उपक्रमास हजेरी लावली होती. आरजे. भूषण मटकरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला होता. यावेळी जनस्थान ग्रुपचे मुख्य अभय ओझरकर, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, अतुल चांडक, सदानंद जोशी, शाहू खैरे, मनिष आंबेवाडीकर, विश्वास ठाकूर, गीतकार मिलिंद गांधी, कवी किशोर पाठक, नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम

यांसह अनेक मान्यवर, कॉलेजियन्स उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरमयी भक्तीसंध्येने लागली ब्रम्हानंदी टाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अवीट गोडीच्या अभंगांमधून पाझरणारा भक्तीभाव... पखवाज आणि तबल्यामध्ये रंगलेली जुगलबंदी... टाळांच्या किनकिनाटानेही या जुगलबंदीत घेतलेली उडी... अन् हृदयात खोलपर्यंत उतरणाऱ्या संतवाणीमधून रसिकजनांची ब्रम्हानंदी लागलेली टाळी अशा भारावलेल्या वातावरणामुळे नाशिककर रसिकांची शनिवारची सायंकाळ रम्य ठरली. निमित्त होते पंडित चंद्रकांत नाईक यांच्या स्वरमय भक्तीसंध्येचे.

गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात संस्कार भारती आणि रवी नांदुर्डीकर यांच्या संयुक्त विद्यमाने संतवाणी या भाव भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जय जय राम कृष्ण हरीचा गजर झाला अन् टीपेला पोहोचलेल्या स्वराभिषकात रसिकमन न्हाऊन निघाले. पं. जितेंद्र अभिषेक यांचे शिष्य पं. चंद्रकांत नाईक यांनी मैफलीच्या श्रीगणेशातच रसिकांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतर सादर झालेल्या प्रत्येक अभंगाने रसिकांना आनंदाची अनूभूती दिली. रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी या गीतावर रसिकांच्या माना न डोलतील तरच नवल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया या अभंगाला टाळ्यांच्या गजरात दाद देण्यात आली. ध्यान करू जाता मन हरपले हा अभंग गायला जात असताना रसिकांचीही ब्रम्हानंदी टाळी लागली. आम्हा न कळे ज्ञान कळे पुराण या अभंगानेही उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संतवाणीचा हा कार्यक्रम उत्तरोत्तर बहरतच गेला. नाईक यांना एच. सी. जाधव, भक्ती नांदुर्डीकर, समीर कटू या सहगायकांनी साथ केली. दिगंबर सोनवणे (पखवाज), दत्तात्रेय भावे यांनी साथसंगत केली. ८९ व्या वर्षात पदार्पण करूनही तरुणांनाही लाजवेल, अशा उत्साहाने टाळ वाजविणाऱ्या माऊली टाकळकर यांना रसिकांनी विशेष

दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयआयटीयन्स पेस’चे KVPI स्पर्धेत यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) या परीक्षेत यावर्षी आयआयटीन्स पेस नाशिक संस्थेचे सात विद्यार्थी निवडले गेले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही पेस नाशिकने आपली यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेत आयआयटीयन्स पेस नाशिकचे इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा मानस बेदमुथा, अंकुर सोनवणे, साहिल रणदिवे, व इयत्ता ११ वी विज्ञान शाखेचा अनुपकुमार सोनार, ऋषभ डहाळे, वेद तांबट व मुलींमध्ये नाशिकची एकमेव वृंदा राठी या विद्यार्थीनीची निवड झाली आहे. इयत्ता अकरावीला फक्त नाशिक पेसचेच विद्यार्थ्यांचीच निवड झाली आहे. केव्हीपीवाय ही स्पर्धा ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, व वैद्यकिय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून घेण्यात येते. ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येते. परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र या विषयावर लेखी परीक्षा घेण्यात येते.

या परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येते. मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बीएस्सी, बीएससी स्टॅटिस्टिक्स, बीएस्सी, मॅथेमॅटिक्ससाठी दरमहा ५००० रू. शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आयआयटीयन्स पेस नाशिकचे संचालक प्रमोद पाटील यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषि टर्मिनल मार्केटला लवकरच मंजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिकमधील प्रस्तावित कृषि टर्मिनल मार्केटला राज्य कॅबिनेटमध्ये लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. या कृषि टर्मिनलच्या जागेचा प्रश्नही निकाली निघणार असून, नागपूर व ठाण्याप्रमाणेच विनामूल्य शंभर एकर जागा उपलब्ध होणार आहे. तसा प्रस्ताव मुख्य सचिवांकडून कॅबिनेट समोर येणार असल्याने टर्मिनल मार्गी लागणार असल्याचा दावा गोडसे यांनी केला आहे.

नाशिक येथे केंद्र शासनाच्या योजनेतून सुमारे ६० कोटी प्रकल्प किंमतीचे नाशिक टर्मिनल मार्केट सार्वजनिक व खाजगी भागिदारातून करण्यात येणार आहे. प्रस्तावित टर्मिनल मार्केट केंद्र शासनाच्या विहित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात येणार असून, त्यासाठी एकूण ६० कोटींचा खर्च आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक लिलावगृह, हाताळणी यंत्रणा, क्लिनींग, ग्रीडिंग, पॅकिंग, बँकिंग, प्रक्रिया व निर्यात सुविधा प्रस्तावित आहेत. या टर्मिनल मार्केटमध्ये ७० टक्के फळे, भाजीपाला, १५ टक्के अन्नधान्य व १५ टक्के मांस पोल्ट्री दुग्धजन्य पदार्थ इत्यादी हाताळणी अपेक्षित आहे. फळे व भाजीपाल्यांसाठी स्वतंत्र शीतसाखळी स्थापन करण्यात आलेली आहे. नाशिक विभागातील नाशवंत फळांसाठी व भाजीपाल्यासाठी वातानुकूलित वाहने, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग चेंबर इत्यादींचा आवश्यकतेप्रमाणे समावेश असलेल्या ७ शीतसाखळ्या स्थापन करण्यात येणार आहेत.

नाशिक टर्मिनल मार्केटसाठी अंदाजे १०० एकर जमिनीची आवश्यकता होती. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने सदर प्रकल्पासाठी मौजे पिंप्री सैय्यद येथील गट नं. १६२१ व गट नं. १६५४ पैकी १०० एकर जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे सन २०१० पासून प्रलंबित होता. या प्रस्तावाबाबत खा. हेमंत गोडसे यांनी स्वतः लक्ष घालून महसूल, ग्रामविकास व वित्तविभाग येथे वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठीची ही जागा ठाणे व नागपूरच्या धर्तीवर विनामूल्य उपलब्ध करून देणेबाबत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे मागणी केली. त्याला क्षत्रिय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येऊन त्यास मंजुरी मिळणार आहे. नाशिकमधील शेतकऱ्यांना टर्मिनल मार्केटचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पेशल बीएड’ अपंगांसाठी महत्त्वाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'स्पेशल बीएड हा अभ्यासक्रम अपंगांच्या शैक्षणिक सत्रात अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरेल. अपंगांच्या विकासाच्या दृष्टीने व सामान्य शाळा-कॉलेजात नोकऱ्या उपलब्ध करुन देण्यास हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. अशी संधी अपंगांसाठी महाराष्ट्रात प्रथमच मराठी माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने नॅब महाराष्ट्राच्या दृष्टीने हे प्रगतीचे एक पाऊल आहे', असे प्रतिपादन नॅब महाराष्ट्रचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी व्यक्त केला.

या अभ्यासक्रमाचा डॉ. सिंधू काकडे यांच्या हस्ते नॅबमध्ये प्रारंभ झाला. हेलन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद् घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मुनशेट्टीवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी या अभ्यासक्रमाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना गौरवास्पद कामगिरी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, 'विद्यार्थ्यांनी श्रम व जिद्द मनात ठेवून अभ्यास केला पाहिजे. नॅब कॉलेजची ही पहिलीच बॅच असल्याने त्याचा गौरव वाढेल अशा रितीने हा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे.'

यावेळी उपस्थित शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रृती बोबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,'पारंपरिक शिक्षण पद्धतीत अपंगांच्या संदर्भात त्यांच्या अपंगत्त्वानुसार शैक्षणिक तरतुदी असणे महत्त्वाचे आहे. त्यांचे भविष्य हे स्वावलंबी असावे, यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.' तसेच संपूर्ण डिग्रीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा व नऊ दिवसाच्या संपर्कसत्र नियोजनाची थिअरी व प्रॅक्टीकल संदर्भातही त्यांनी यावेळी भाष्य केले.

डॉ. प्रा. सिंधु काकडे यांनी स्पेशल बीएडचे महत्त्व विषद केले. तर या अभ्यासक्रमाचे स्वरुप व प्रास्ताविक विनोद जाधव यांनी केले. चक्रधर जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक पोलिस पोचले राजस्थानला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक खोदकामात सापडलेले सोने स्वस्तात देतो, असे सांगून दीड लाखात एक किलो बनावट सोने देणाऱ्या टोळीतील साथीदारांचा अधिक तपास करण्यासाठी उपनगर पोलिस स्टेशनचे एक पथक नुकतेच राजस्थानला रवाना झाले आहे. याच गुन्ह्यात उपनगर पोलिसांनी तीन लोकांना अटक केली असून, त्यांचे काही साथीदार अद्याप फरार आहेत.

खोदकाम करताना काही किलो सोने हाती लागले. आम्ही गरीब असून, तुम्ही हे सोने निम्म्या किंमतीत विकत घ्या, अशा भूलथापा देत सर्वसामान्यांना गंडविणाऱ्या कानाजी सोळंकी, दलाराम राठोड आणि सुखराम वाघेला या तिघांना उपनगर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी शिताफीने अटक केली. त्यांचे आणखी साथीदार फरार असून, राजस्थानमध्ये याचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दुसरीकडे गंगापूररोड परिसरात राहणाऱ्या स्मिता कुलकर्णी या महिलेला राजस्थानमधूनच कॉल करून सोने घेण्यासाठी पाचारण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्रामचा तिढा सुटता सुटेना!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा कायमची अधिग्रहीत करण्याच्या शासनाच्या प्रयत्नाला शेतकऱ्यांनीच खो लावला आहे. राज्य सरकारने जागा मालकांना देवू केलेला एकास अडीचपट टीडीआर शेतकऱ्यांनी नाकारला असून, सरकारच्या अल्टीमेटमही झुगारून लावला आहे. टीडीआर घेवून जमीन देण्यास शेतकऱ्यांना नकार घंटा कळविल्यानंतर महापालिकेसह सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणेच पुढील सिंहस्थही कुंभमेळ्या भाडे कराराच्या जागेवरच भरण्याची वेळ येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील ३०० एकर जागा साधुग्रामसाठी कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्यासाठी २००२ पासून प्रयत्न सुरू आहेत. महापालिका व शेतकरी यांच्यात तडजोडीचा प्रयत्न सुरू आहे. या कुंभमेळ्यापूर्वी महापालिकेने ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जागा त्वरित पालिकेला ताब्यात द्यावी यासाठी विशेष म्हणून सध्याच्या अनुज्ञेय टीडीआरपेक्षा अधिक टीडीआर प्रोत्साहन म्हणून देण्याची तयारी करत महापालिकेच्या महासभेने एकास सहा टीडीआर देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु, त्याला यश आले नाही. त्यामुळे अखेरीस भाडेकरारावरच जागा घेवून सिंहस्थ साजरा करण्याची वेळ आली

होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी जागा कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्याची घोषणा केली होती. कुंभमेळा आटोपल्यानंतर राज्य शासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी साधुग्रामच्या जागामालकांना एकास अडीच असा बोनस टीडीआर देण्याचा निर्णय घेतला. ४ डिसेंबरच्या अधिसूचनेनंतर पंधरा दिवसांच्या आत जागामालक स्वेच्छेने जागा देण्यासाठी येईल त्याला आणखी अर्धा टक्का बोनस म्हणजेच एकूण तीन टीडीआर देण्याचा निर्णय जाहीर केला होता. राज्य सरकारने दिलेली मुदत उलटली असून, एकाही शेतकऱ्याने या टीडीआर साठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे टीडीआरचा हा प्रस्ताव बारगळण्यातच जमा आहे. नगररचना विभागाकडे एकही अर्ज आला नसल्याने आता टीडीआरवर जागा घेण्याचे महापालिकेचे प्रयत्न फोल ठरले आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने पालिका ही जागा विकत घेवू शकत नाही. तर शेतकऱ्यांनी टीडीआरही नाकारला आहे. त्यामुळे साधुग्रामच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आता संपली असून, पुढील सिंहस्थही भाडेकराराच्या जागेवरच भरणार असल्याचे चित्र आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेले प्रेक्षक कुणीकडे?

$
0
0

संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेकडे प्रेक्षकांनी फिरविली पाठ; आयोजक हैराण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोठ्या जल्लोषात रविवारी सुरू झालेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेला केवळ पाच ते सहा प्रेक्षकच असल्याने या 'भरजरी भाषे'ला भविष्य आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला. हौशी राज्य नाट्य स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता व बाल नाट्याला प्रेक्षकांनी केलेली गर्दी पाहता संस्कृत नाटकांच्या वेळी 'प्रेक्षक गेले कुणीकडे?' असे विचारण्याची वेळ आयोजकांवर आली.

संस्कृत ही ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचिन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. महाकवी कालिदास हे संस्कृत भाषेचे आद्यकवी असून मेघदूत, ॠतुसंहार, रघुवंशम्, कुमारसंभवम् ही त्यांची खंडकाव्ये आणि दीर्घकाव्ये, तर विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम्, मालाविकाग्निमित्रम ही त्यांची नाटके संस्कृत भाषेतून त्यांनी लिहिली. त्यामुळे आजचे साहित्य खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले. परंतु असे असताना संस्कृत भाषेतून होणाऱ्या नाटकांकडे नाशिककर प्रेक्षकांनी चक्क पाठ फिरवली. रविवारी सादर झालेल्या नाटकाला केवळ पाच ते सहा प्रेक्षकांची उपस्थिती होती. त्यामुळे गुरूवारपर्यंत होणाऱ्या २० नाटकांना प्रेक्षक येतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

नाट्य स्पर्धांचा

संस्कृतला फायदाच

पूर्वीच्या काळी नाटक हे रुढी परंपरा यांच्या विरोधात प्रबोधन करण्याचे साधन म्हणून वापरले जात असे. त्यामुळे नाटकातून प्रबोधन करता येते हे आतदेखील जनमानसावर ठसायला हवे. तसेच या नाट्य स्पर्धांचा संस्कृत भाषेला फायदा होत आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी व्यक्त केले. ५५ व्या राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की या स्पर्धांमधून भाषेचा अभ्यास होणे गरजेचे असून समाजाचे मनोरंजनही व्हावे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धा ३१ डिसेंबरपर्यंत स्पर्धा चालणार असून यात २० नाटके होणार आहेत.

उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम होते. तर व्यासपीठावर परीक्षक श्रीनंद बापट, अंजली पर्वते, तरंगिणी खोत, समन्वयक राजेश जाधव, मीना वाघ यांची उपस्थित होती. यावेळी प्रा. कदम म्हणाले की, रामायणासारखे नाट्य या भूमीवर झाल्याने नाशिक ही पहिली रंगभूमी असल्याचे त्यांनी सांगितले. वेदांग जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विद्याधर निरंतर, भगवान हिरे, अरुण गिते यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सुरेश गायधनी, माणिक कानडे, रोहित पगारे आदी उपस्थित होते. नाट्यस्पर्धेत सोमवारी (दि. २८) नदीसूक्तम, वक्रतुंड, ऐकक संघ, कथा वार्धक्यस्य इयम ही नाटके होणार आहेत.



'विशतिचक्रयोग:' नाटक सादर

स्पर्धेत सांगलीच्या संस्कारज्योती संस्थेच्या वतीने 'विशतिचक्रयोग:' नाटक सादर झाले. शालेय जीवनातील दोन मैत्रिणींपैकी एक भविष्यात शिक्षिका तर दुसरी वेश्या होते. या दोघींची अचानक भेट होते, एकमेकींची ओळख पटते; पण शिक्षिकेला आपली मैत्रीण वेश्या असल्याचे कळताच ती तिला 'यापुढे आपल्याला कधीच भेटू नको' सांगत निघून जाते. समाजातील स्थानापुढे मैत्रीचे बंधही कसे फिके पडतात, याचे चित्रण या नाटकात करण्यात आले. यतिन माझिरे लिखित व नम्रता इंगळे दिग्दर्शित या नाटकात योगिता पवार व नम्रता इंगळे यांनी भूमिका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू इअर सेलिब्रेशनला हिंदू जनजागृतीचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाश्चात्यांच्या अंधानुकरणातून साजऱ्या होणाऱ्या नववर्ष सोहळ्याचे प्रतिकूल पडसाद समाजात उमटतात, असा मुद्दा उचलून धरत हिंदू जनजागृती समितीने ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनला विरोध केला आहे. समितीच्या वतीने ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्याविषयी रॅलीद्वारे प्रबोधन करण्यात आले.

संस्कृती रक्षणाच्या उद्दिष्टाखाली काही राजकीय पक्षांनी यापूर्वी व्हॅलेंटाईन डे सारखे इव्हेंट लक्ष्य केले होते. याच राजकीय पक्षांचा कित्ता चालवित हिंदू जनजागृती समितीने शहरातून घोषणा देत मोठी रॅली काढली. भोसला मिलीटरी स्कूल जवळून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या नावाखाली घालण्यात येणारा धुमाकूळ आणि पायी तुडविली जाणारी नीतीमूल्य समाजासाठी घातक असल्याने त्यास विरोधाची समितीची भूमिका आहे.

राज्य व केंद्रातील सत्ताबदलानंतर हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका आक्रमक होते आहे. रविवारी शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या प्रबोधन फेरीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष साजरे करावे, असे आवाहन करण्यात आले. या रॅलीमध्ये शशीधर जोशी, जयंत भातंब्रीकर, प्रवीण सोनवणे, शिवाजी उगले, दीपक बैरागी, शैलेश कादवे आदींनी सहभाग घेतला.

नाशिककरांना आवाहन

३१ डिसेंबरच्या दिवशी सेलिब्रेशनच्या नावाखाली रिचवले जाणारे कोट्यवधींचे मद्य, बेधुंदपणे वाहन चालवून होणारे अपघात, या दिवशी वाढणारे गुन्हेगारीचे प्रमाण यासारख्ये नकारात्मक मुद्दे आकडेवारीसह मांडत चुकीच्या पध्दतीने हे सेलिब्रेशन करू नये, असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने नाशिककरांना करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्र विकासासाठी युवाशक्ती आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवकांची शक्ती हा फार मोठा ऊर्जास्रोत आहे. ही शक्ती राष्ट्र उभारणीच्या व राष्ट्र विकासाच्या कामी उपयोगी आणल्यास देश निश्चितपणे महासत्ता होईल, असा विश्वास प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी व्यक्त केला. नागलवाडी येथील केटीएचएम कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागलवाडीचे सरपंच लक्ष्मण पोटींदे होते. प्राचार्य धोंडगे पुढे म्हणाले, 'युरोप अमेरिकेतील खेडीही अतिशय स्वच्छ व सुंदर आहेत. तशी स्वच्छ, सुंदर खेडी भारतात निर्माण व्हायला हवीत. भारतात महात्मा गांधी, विनोबा भावे, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, बाबा आमटे या थोर पुरुषांनी स्वच्छतेचे काम केले व काम करण्याची प्रेरणा दिली.

आपण सर्वांनी ती प्रेरणा घेऊन स्वच्छतेचे काम करायला हवे', अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वीच या गावातील श्रमसंस्कार शिबिरात स्वयंसेवकांनी सुमारे १५० शोषखड्डे खोडून ग्राम स्वच्छतेचे काम उभारले. केंद्राने या कमाची दखल घेत गावाला स्वच्छता विषयक पुरस्काराने सन्मानित केले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक प्रा. अशोक सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते शांताराम भोर, उपप्राचार्य डी. जी. गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर जागेचा प्रश्न मार्गी

$
0
0

किरकोळ वाद वगळता नाईक संस्थेची सभा शांततेत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूरजवळील हिजडवाहळ जागेच्या सुरू असलेल्या न्यायालयीन वादावर तोडगा काढत किरकोळ वाद वगळता व्ही. एन. नाईक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. संस्थेच्या प्रांगणात रविवारी संस्थेची सभा झाली. दरवर्षी गदारोळ होणारी ही सभा शांततेत झाल्याने संचालक मंडळानी सुटकेचा सुस्कारा सोडला.

सभेत सर्व्हे नंबर ७१७/१अ/२ हिजडवाहळ जागेचा प्रश्न केंद्रस्थानी होता. संस्थेने २६ कोटी रुपयांना विकलेल्या या जागेचे सव्वा दोन कोटी रुपये अद्यापही संस्थेला मिळालेले नाहीत. ही जागा विकल्यानंतर काही घटकांनी त्यावर आक्षेप घेतल्याने तसेच सरकारी वटहुकूमामुळे खरेदीदाराचे नाव या जागेवर लागण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, जागेचे राहिलेले पैसे वसूल करण्यास संचालक मंडळ हतबल ठरले. त्यामुळे संचालक मंडळ व सभासद यांच्यात यावेळी जुंपली होती. 'हे पैसे कधी व कसे मिळवणार?' असा जाब पंढरीनाथ मोरे यांनी विचारला. तर मनोज बुरकुल यांनी 'एवढी मोठी सवलत देण्याची गरज नव्हती', असे मत मांडत संचालक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले. त्यावर संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी 'हा पैसा व्याजसकट मिळवून आणू', असे आश्वासन दिले. यावरून हा वाद निवळला. अॅड पी. आर. गिते यांनी 'संचालक मंडळ संस्थेच्या हितासाठी कार्य करते की निविदाधारकांच्या हितासाठी?' असा प्रश्न उपस्थित केला. निविदाधारकांसंबंधी व होणाऱ्या करारासंबंधी कायदेशीर बाबी तपासून अंतिम निर्णय घेण्याची सूचना त्यांनी यावेळी संचालकांना दिली. तसेच कोणत्याही कारणाने संस्थेचे नुकसान होता कामा नये, याची खबरदारी घेण्याची सूचना दिली.

तसेच किशोर सूर्यवंशी शाळेसमोर असलेली जागा कॉलेजसाठी विकत घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच कॉलेजसाठी सिन्नर येथील जागा सुचविण्यात आली. सर्व सभासदांच्या संमतीने ही जागा पाहून निश्चित करायचे सभेत ठरले. याशिवाय इंग्लिश मी‌डियम पब्लिक स्कूल सुरू करणे, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज सुरू करणे, संस्थेच्या माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध करुन देणे. शहरालगत नवीन जागा खरेदी करणे आदी योजनांना मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मागील सभेचे इतिवृत्त वाचून यावेळी मंजूर करण्यात आले. अशोक कातकाडे, रामनाथ कातकाडे यांनीही सभेत सहभाग घेतला. नगरसेवक दामोदर मानकर यांनी संस्थेचे कार्य पारदर्शकपणे सुरू असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगरसेवक तानाजी जायभावे, संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५३ सहकारी संस्था बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सहकार खात्याने केलेल्या सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात एकूण २०३ संस्थांपैकी एकूण ५३ सहकारी संस्था कागदावर किंवा बंद असल्याचे आढळून आले आहे. लेखापरीक्षण न झालेल्या व अनेक दिवसांपासून कामकाज बंद असणाऱ्या कळवण तालुक्यातील या बंद संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली आहे.

सहकार विभागातर्फे जून ते ऑक्टोबर या कालावधीत सहकारी संस्थांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये ज्या संस्थांचे लेखापरीक्षण झालेले नाही, तसेच ज्यांचे अनेक दिवसांपासून कामकाज बंद आहे, अशा ५३ संस्था आढळून आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे. त्या संस्थांच्या अनेक उघडकीस आल्या आहेत. काही संस्थांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये, तर काहींच्या

खात्यात काहीच रक्कम शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील या ५३ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्यांना अवसायनाच्या अंतरिम नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर या सहकारी संस्थेने सहकार खात्याकडे उत्तर सादर करायचे आहे.

बंद ५३ संस्थांचे अंतरिम आदेश काढले आहेत व २० संस्थांचे अंतिम आदेश काढण्यात आले आहेत. उर्वरित संस्थांचे अंतिम आदेश काढण्याचे काम चालू असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सविता शेळके यांनी दिली. राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी यापूर्वीच बंद संस्थावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. राज्यातील हजारो संस्था बंद अवस्थेत असल्याने ही कार्यवाही केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सांसद आदर्श ग्राम योजनेला निधी द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत केली.

सांसद आदर्श ग्राम योजना महात्मा गांधी यांच्या विचारधारेतून व पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेली आहे. मोदी यांनी योजनेची घोषणा जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीला (११ ऑक्टोबर २०१४) केली. गावातील नागरिकांचा वैयक्तिक, सामाजिक व आर्थिक विकास करणे हा योजनेचा उद्देश आहे. खासदार गोडसे यांनी अंजनेरी गावाची निवड या योजनेसाठी ५ नोव्हेंबर २०१४ ला केली. १५ जून २०१५ ला झालेल्या बैठकीत ग्रामविकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये १८१ गावे समाविष्ट होती. गेल्या पाच डिसेंबरला झालेल्या बैठकीत १८१ पैकी काही कामे एकत्रित करण्यात आली व काही कमी करण्यात आली. १८१ पैकी ८० टक्के कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या नव्हत्या. त्याबद्दल सरकारकडून सांगण्यात आले की, या योजनेसाठी संबंधित विभागाकडे निधी नाही.

त्यामुळे या योजनेंतर्गत केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने निधी उपलब्ध करावा अशी मागणी खासदार गोडसे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-भाजपात चुरस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी आज होत असलेल्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले शिवसेना-भाजप मित्रपक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे सेनेच्या एका सदस्याचे मत निर्णायक ठरणार आहे.

शिवसेनेने अंजना मधुकर कडलग आणि सिंधू दत्ता मधे असे दोन अर्ज दाखल केले आहेत. तर, भाजपने विजया दीपक लढ्ढा यांचा अर्ज दाखल केला आहे. सेना गटात आठ सदस्य आहेत, तर भाजप गट नऊ सदस्यांसह सहलीला गेला आहे. यामध्ये बहुमतासाठी असलेले सेना सदस्य संतोष कदम हे भाजपच्या गोटात आहेत. यामुळे ते त्यांच्या सोबतच राहणार असा ठाम विश्वास समर्थक व्यक्त करीत आहेत.

शिवसेनेने ही लढत प्रतिष्ठेची केली असल्याचे दिसून येत आहे. भाजप गटासमवेत असलेल्या संतोष कदम यांच्यासाठी खासदार हेमंत गोडसे हे जिल्हास्तरीय नेत्यांसमवेत ठाण मांडून बसले आहेत. अर्थात संतोष कदम यांनी आपण पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीपासून विरोधात असलेल्यांसोबत जाणार नाही असे वारंवार स्पष्ट केल्याने पेच निर्माण झाला आहे. भाजपातील सदस्य देखील सहा महिन्यापूर्वी भाजपाच्याच उमेदवाराचा पराभव करून सत्तेत आल्याने त्यांच्याबाबत भाजपास ममत्व नसल्याचे जाणवतेे. दोन्ही पक्षातील जिल्हास्तरीय नेत्यांनी पस्परांना शह देण्यासाठी ही निवड प्रतिष्ठेची केली आहे. सहा महिन्यापूर्वी मनसे आणि राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष नेस्तनाबूत झाले. सेना-भाजपचे संख्याबळ वाढले. मात्र, यामुळे सेना आणि भाजप दोन्ही पक्षात अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. आज त्र्यंबक पालिकेवर भगवा फडकणार की भाजपची सत्ता कायम राहणार याचीच उत्सुकता लागली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या संघर्षाची नांदी झाली होती.

पोलिस यंत्रणा सज्ज

नगराध्यक्षांची आजची निवडणूक चर्चेची झाली असून, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपालीका परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच बॅ‌रिकेडिंग केले आहे. जास्तीची कुमक मागविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा निर्यातमूल्य कमी करण्यास उशीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कांदा निर्यातमूल्य कमी करण्यास आपणास उशिरा यश आले असले तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण नेहमीच संसदेत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आगामी काळात देखील शेतकरी हाच केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून केंद्र शासनाच्या माध्यमातून कामकाज करण्यासाठी आग्रही भूमिका घेऊ, असा आशावाद खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

येथील कसमादे कृषी प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपा जेष्ठ नेते सुरेश पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, भाजपा नेते डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विलास बच्छाव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड, संजय सोनवणे उपस्थित होते.

खासदार चव्हाण पुढे म्हणाले की, तालुकास्तरावर उभारण्यात आलेले कृषी प्रदर्शन अत्यंत सुंदर आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे व शेती उपयुक्त तंत्रज्ञान ग्रामाीण पातळीवर उपलब्ध करून देण्याचा संयोजकांचा मानस निश्चितपणे कौतुकास्पद आहे. यामुळे शेतक-यांना एकाच छताखाली विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन मिळाले.

याप्रसंगी डॉ. विलास बच्छाव, संजय चव्हाण, लालचंद सोनवणे यांची भाषणे झाली. यावेळी कसमादे परिसरातील गुणवंत शेतकऱ्यांना गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संयोजक नंदकुमार शेवाळे, भूषण निकम यांनी स्वागत व आभार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images