Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आदिवासींना आणा विकासाच्या प्रवाहात

0
0

आदिवासी समाज अजूनही मागासलेपणाचे जीवन जगत आहे. त्याच त्या समस्या व दारिद्र्य, बेरोजगारीमुळे ते स्थलांतरीत होतात. पाल्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही. अशिक्षितपणामुळे त्यांच्या समस्यांमध्ये भरच पडते. सरकार कोणतेही असो आदिवासींकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत नाही, असा अनुभव आहे. सत्तारूढ भाजप सरकारने आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणले तर आनंदच होईल, अशी भावना राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष रामेश्वर ओरान यांनी व्यक्त केली.

अनेक घटकांना आरक्षण हवंय, तुम्हाला काय वाटते?

अलीकडे आरक्षण मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातही धनगर समाजाने अन्य राज्यांचे दाखल देत आदिवासी म्हणून आरक्षण मागितल्याने पेच वाढला आहे. झारखंडमध्ये ओराव धांगड अशी जमाती आहे. धांगड आणि धनगर यांचा मेळ घालणे संयुक्तिक वाटत नाही. सरकारने धनगर समाजाला आदिवासी म्हणून आरक्षण दिलेच तर तो राजकीय स्वरुपाचा निर्णय असेल. समाज त्याला स्वीकारलेच असे नाही.

महाराष्ट्र पाहणी दौऱ्यात काय आढळले?

मी संगमनेर तालुक्यातील कोळवाडे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळ येथील आश्रमशाळांची पाहणी केली. आदिवासी भागात पुरेसे अन्न, रोजगार, शिक्षण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह अशा सर्वच मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. परिणामी हा भाग विकासापासून अजून बराच दूर आहे.

आदिवासी समाजापुढील मुख्य आव्हाने कोणती?

आदिवासी समाजाला दोनच गोष्टी प्राधान्याने हव्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे संरक्षण आणि दुसरे म्हणजे विकास. प्रकल्पांसाठी त्यांच्या जमिनी संपादीत केल्या जातात. मात्र, त्यांना पर्यायी जमीन किंवा पुरेसा मोबदलाही दिला जात नाही. उत्पन्नाचे साधन गेले की स्थलांतराशिवाय पर्याय उरत नाही. निवारा, पिण्याचे पाणी, औषधोपचार अशा सर्वच बाबतीत त्यांची परवड सुरू आहे.

आदिवासींचे स्थलांतर वाढण्याचे कारण काय?

स्थलांतर हे चांगले आणि वाईट देखील असू शकते. एखादी व्यक्ती झारखंडमधून बाहेर पडून दिल्लीत रूळते हे स्थलांतर त्या व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीने पोषक ठरते. मात्र, स्थलांतर करूनही रोजीरोटीचा प्रश्न सुटत नसेल तर ते मारक ठरते.

रोजगाराच्या समस्येवर तोडगा कसा निघेल?

राज्य आणि केंद्र सरकारची इच्छाशक्ती असेल तर आदिवासी समाजाच्या समस्या सोडविणे कठीण नाही. नाशिकमधीलच उदाहरण घ्यायचे तर त्र्यंबकेश्वर विभागात जलसंपदाचे नऊ प्रकल्प रखडले आहेत. ९५ टक्के कामे पूर्ण झाली असली तरी पाच टक्के कामे बाकी आहेत. त्यांना रोजगार मिळू शकेल. ओरीसा, झारखंड आणि काश्मिर आणि महाराष्ट्रातही आदिवासींसाठी काही चांगले प्रयोग होत आहेत. असे प्रयोग व्यापक स्तरावर होण्यासाठी पाऊले उचलली गेली पाहिजेत.

शिक्षणाचा प्रश्न कसा सोडवावा?

आदिवासी भागात पाचवीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पाच ते सात किलोमीटर दूर जावे लागते. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना शिक्षण सोडावे लागते. म्हणूनच प्रत्येक गावात किमान दहावीपर्यंत शाळा असायला हवी. रोजगारासाठी पालकांसमवेत स्थलांतरीत होणाऱ्या मुलांना ते जातील तेथे शाळेत प्रवेश दिला गेल्यास शिक्षणाचा खर्च निकाली निघेल.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड बाजार समितीसाठी शांततेत मतदान; आज निकाल

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक शांततेत पार पडली. आज (१ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

छत्रे विद्यालयात मतदान प्रक्रिया पार पडली. उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या भाऊगर्दीमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. व्यापारी गटात अधिक उत्साह दिसून आला. माजी आमदार संजय पवार, सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, बापूसाहेब कवडे यांच्या शिवनेरी पॅनलला जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर, प्रकाश घुगे यांच्या नम्रता पॅनलने आव्हान निर्माण केल्याचे चित्र होते. अपक्षांचाही बोलबाला दिसून आला.

दोन्ही पॅनलचे नेते मतदान केंद्र परिसरात तळ ठोकून होते. एकूण १८ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले. सोमवारी सकाळी ६ वाजता मनमाड सार्वजनिक वाचनालय इथे मतमोजणी होणार असून, मनमाड बाजार समितीवर कोणाची सत्ता हे दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

नांदगाव बाजार समितीत शिवसेनेने आमदार पंकज भुजबळ व माजी आमदार अनिल आहेर यांच्या पॅनलचा पराभव केला होता. यामुळे मनमाड बाजार समितीत नांदगावची पुनरावृत्ती होते का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसाळ फळांच्या मागणीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थंडीचा जोर हळूहळू ओसरू लागला असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. यामुळे रसाळ फळांना मागणी वाढू लागली आहे. चौकाचौकात रसवंती व ज्यूसचे हातगाडे दिसू लागले आहेत. मात्र, मागणी वाढूनही फळांच्या किमतीत फारसा फरक पडलेला नाही. पपई, संत्री यांच्या किमती वीस रुपये किलोपर्यंत स्थिर असून, इतर फळांच्या किमतीही जैसे थे आहेत.

पपई, संत्री पाठोपाठ शहरात अॅपल बोरांची आवक वाढली आहे. वीस ते तीस रुपये किलोप्रमाणे अॅपल बोर मिळत आहेत. नाशिकची खास ओळख असलेले द्राक्ष तूरळक ठिकाणी नजरेस पडू लागले आहेत. शंभर रुपये किलोने द्राक्षांची विक्री होत आहे. सफरचंद, चिकू, सीताफळ, अननस, नारळ, केळी यांच्या किमती जैसे थे आहेत.

फळांचे दर (किलोमध्ये)

द्राक्ष - ११० रुपये

डाळिंब - ४० ते ७० रुपये

पपई - २० रुपये

चिकू - ६० ते ८० रुपये

संत्री - २० ते ३० रुपये

सीताफळ - ६० रुपये

सफरचंद - ८० ते १००

नारळ - ३० रुपयाला एक

किवी - ३० रुपयाला एक

केळी - ३० डझन

अननस - ३० ला एक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कुटुंबीयांना मिळणार अॅपमधून मदत

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी येथील यश कॉम्प्युटर्सचे संचालक योगेश अहिरे यांनी सटाणा ए टू झेड या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपचा शुभारंभ शिवचरित्राचे अभ्यासक प्रशांत देशमुख व सटाणा कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सटाणा ए टू झेड या अ‍ॅपद्वारे नागरिकांना सटाणा शहरातील सर्व शाळा, कॉलेज, डॉक्टर्स, रुग्णवाहिका, विविध व्यापारी प्रतिष्ठाने, व्यापारी, शासकीय व निमशासकीये कार्यालये, खासगी प्रवाशी वाहतूक, शुभविवाह, उपहारगृहे, शेतीमाल बाजारभाव, गॅस एजन्सीज, गॅस उपकरणे, सुतार, पेंटर, कारागीर, माध्यमे यांच्याशी संपर्क साधणे सुलभ होणार आहे.

मोबाइलमध्ये प्ले स्टोअरला जाऊन सटाणा ए टू झेड असे टाईप करून हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येणार आहे. सध्या अ‍ॅपची पहिली १.० ही नमुना आवृत्ती ठेवण्यात आली असून, येत्या ९ रोजी या अ‍ॅपची परिपूर्ण आवृत्ती शहरवासीयांच्या सेवेत रूजू होत आहे. या अ‍ॅपमध्ये नाव नोंदणीसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. हे जमा झालेले शुल्क आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीसाठी देण्यात येणार आहे. यामुळे या दुहेरी उद्देश साजरा होणार असून, नागरिकांनाही मदत होणार आहे.

अ‍ॅपद्वारे मिळणारे उत्पन्न नाम फाऊंडेशनला मदतीसाठी देण्यात येणार आहे. संगणक क्षेत्रात काम करीत असताना नाम संस्थेला २६ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी दिला. अ‍ॅपद्वारे नागरिकांना अनेक गरजवतांसाठी संपर्क साधणे सुलभ होणार आहे. - योगशे अहिरे, यश कॉम्प्युटर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच सराईत गुन्हेगार जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला इंदिरानगर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा येथून अटक केली. हे सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून, एका रिक्षातून पळून जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली.

समीर अब्दुल रहेमान (वय ४२, रा. नानावली), सादीक इस्माईल शहा (वय २३, रा. द्वारका), वसीम निसार शेख (वय २३, रा. भारतनगर), गुलाम अलीबक्ष अन्सारी (वय २५, रा. जुने नाशिक) आणि वसीम अब्दुल शेख (वय २३, रा. भारतनगर) अशी या संशयितांची नावे आहेत. यातील, वसीम शेख तसेच गुलाम अन्सारीविरोधात भद्रकाली, सरकारवाडा आणि विल्होळी पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी रात्री, इंदिरानगर पोलिस स्टेशनचे एपीआय जी. आर. शेख, एपीआय राजेंद्र गवळी व कर्मचाऱ्यांचे पथक गस्त घालत असताना एमएच १५ झेड ८३८९ संशयित पध्दतीने पाथर्डी फाटा येथून वेगात जाताना दिसली. रिक्षात वरील पाच संशयित आढळून आले. पाथर्डी फाटा परिसरात घरफोडी करण्याच्या इराद्याने ते संशयित फिरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून धारदार शस्त्रे जप्त केली असून, त्यांना कोर्टात एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यंगावर मात करीत शोधली जगण्याची वाट

0
0

संदीप देशपांडे, मनमाड

लहानपणी डोळ्यात बाभळीचा काटा गेल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला. त्याची दृष्टी गेली. नंतर तर दुसऱ्या डोळ्यानेही दिसेनासे झाले. अंधत्चाचा शाप त्याच्या माथी बसून सारं आयुष्यच अंधारमय झालं. पण, जगणे अवघड झालेले असताना आणि पराकोटीची वेदना, काळीज कुरतडत असताना तो हरला नाही. अठरा विश्वे दारिद्र्य घरात नांदत असताना हार न मानता पोटाची खळगी भरण्यासाठी तो ऊसतोड करू लागला. ही कथा आहे नांदगाव तालुक्यातील शंकर पवार या बावीस वर्षीय तरुणाची.

स्वतःच्या आयुष्यातील काळोख जिगरबाजपणाने बाजूला सारत ऊसतोडीसारखे अवघड काम दोन्ही डोळ्यांनी अंध असतानाही लीलया करणारा नांदगाव तालुक्यातील शंकर पवार हा बावीस वर्षीय तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तुफानातुनी पुढे जायचे हे आव्हान स्वीकारू या हा त्याचा बाणा एखाद्या दीपस्तंभासारखा इतरांनाही लढण्याचे धडे देणारा आहे. धारदार कोयत्याने ऊस तोडताना हाताला लागेल, जखमी होऊ या चिंतेपेक्षा घरी जाताना थोडे पैसे तरी मिळतील का ही काळजी शंकरला भेडसावत असते. मग, जगण्याची वाट चालताना त्याने आपल्या व्यंगावर मात करीत दुःखाचे ही गाणे केले.

अंध शंकरची ऊसतोडीची करामत भल्याभल्यांना अगदी डोळस, धडधाकट लोकांनाही अचंबित करते. परधडी येथे शंकर ऊसतोडीचे काम करीत असून, तसूभरही दृष्टी नसताना तो करीत असलेले ऊसतोडीचे काम माणसाला जगण्यासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते याचा मूर्तिमंत पुरावा आहे. लहानपणी डोळे गेले. अंधत्व आल्याने आयुष्याचीही वाट लागली. पोटाचे चटके सहन होईना. परिस्थिती हलाखीची....दोन घास खाण्याचे वांदे तिथे डोळ्यांवर उपचार कसले होणार? तिथूनच झाली शंकरच्या आयुष्याच्या कथेची व्यथा! रोजच्या जीवन मरणाचा

प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याने हातात चक्क कोयता घेतला. शंकरचे धाडस आणि जिद्द त्याला ऊसतोड कामगार म्हणून ओळख आणि रोजगार देणारी ठरली. त्याची ही कहाणी हसू आणि आसू यांचा मिलाफ आहे. अंध म्हणून मदत सवलत योजना असं काही त्याच्या वाट्याला आले नाही. सरकार आधार देतं, मदतीचा हात देतं हे त्याच्या गावीही नाही. पोट भरतंय काम मिळतंय, चुल पेटतेय हीच गोष्ट शंकरसाठी लाखमोलाची आहे. कणखर मन आत्मविश्वास हाच त्याचा जणू डोळा आहे. म्हणून की काय कोयत्याने हात रक्तबंबाळ होतात. कुठेतरी जखम होते. तरी तो कोणाच्या तरी शेतात उसावर घाव घालतोच आहे. संकटांशी झुंजतोच आहे. त्याची जबरदस्त इच्छाशक्ती हीच त्याची जणू दृष्टी ठरली, एवढं मात्र नक्की!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार आरोपी दुर्री पोलिसांच्या ताब्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील न्यायालय इमारतीच्या आवारातून २७ जानेवारी रोजी फरार झालेला आरोपी इब्राहीम मोहम्मद अब्दुल गणी उर्फ दुर्री यास पकडण्यात नाशिक ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पथकाने गुजरातमधील सुरत येथून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नाशिक कारागृहातून मालेगावी गुन्हा संदर्भात कारवाईसाठी दुर्री यास न्यायालयात हजर करण्यासाठी आणणयात आले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याने पोलिस हवालदाराच्या हातास झटका देऊन बेडीसह पलायन केले होते. या घटनेने मालेगाव शहरात खळबळ माजली होती. येथील कुप्रसिद्ध बालगुन्हेगारी टोळीतील तो एक महत्त्वाचा गुन्हेगार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर देशाची आर्थिक समस्या निकाली

0
0

नाशिक बार असोशिएशन, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन्स लॉयर आणि अविष्कार फोरम फॉर लीगल स्टोरी या संस्थांतर्फे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रि. टी. ए. कुलकर्णी सभागृहात 'बँकेचे कायदे व त्याचा सराव: सध्याची स्थिती' याविषयावर रविवारी सेमिनार झाला.

यावेळी अॅड. जायभावे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सेमिनार दोन सत्रात घेण्यात आले. पहिल्या सत्रात बँक ऑफ महाराष्ट्रचे डीजीएम मोहन यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की मोबाइल, इंटरनेट बँकिंग वापरली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ग्राहकांच्या सोयीतून या सुविधा सुखद आहेत. भारताची अर्थव्यवस्था बँकेतील जमा होणाऱ्या व्याज दरावरही अवलंबून आहेच. याचसोबत ज्या स्मार्ट सिटी घोषित करण्यात आल्या, त्यांची आर्थिक परिस्थिती सोबत तेथे होणारी इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. नाशकात देखील असं काही झाल्यास नाशिक स्मार्ट होऊ शकेल. यासाठी आर्थिक कारभार हा सर्वत्र महत्त्वाचा ठरतो. याबाबतचे कायदे देखील कठोर करण्यात आले आहेत.

दुसऱ्या सत्रात उपस्थितांना बँक विषयक कायदे-कॉन्ट्रॅक्ट कायदे, बँकिंग रेग्युलेशन कायदे, को-ऑपरेटिव्ह कायदे, मुंबई स्टॅम्प कायदा यासोबत बँक-ग्राहक, कर्ज-व्याज, वसुली, बँकेतील गुह्यांबाबत कोर्टाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी नाशिक डिस्ट्रिक्ट माजी न्यायाधीश अॅड. परतवार, नाशिक बार असोशिएशन अध्यक्ष अॅड. नितिन ठाकरे, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर अध्यक्ष अॅड. जयश्री अकोलकर, आविष्कार फोरम चेअरमन अॅड. इंद्रायणी पाटणी याच्यासह विविध बँकेतील कायदे विषयक सल्लागार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवगांधार सभेत रंगला ‘जोगेश्री’

0
0

निनादिनी संगीत संस्था व शंकराचार्य न्यासचा सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देवगांधार या वार्षिक संगीत सभा झशली. यावेळी मीरा नवसाळकर, पंडिता अलका देव-मारूलकर, शिवानी मारूलकर-दसककर यांचे गायन झाले. पंडित राजाभाऊ देव यांच्या ८५ व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त तसेच पंडित मधुसूदन कानेटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त या कार्यक्रमाची सुरूवात अमरावती येथील प्रतिभावंत गायिका मीरा नवसाळकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग श्री ने सुरूवात करीत 'कहाँ में गुरू ढुँढन जाऊँ' ही बंदिश सादर केली. हा एकताल ख्याल झाल्यानंतर एक विलंबित ख्याल त्यांनी सादर केला. त्यांना तबल्यासाठी राम नवसाळकर यांनी तर संवादिनीवर आशिष कुलकर्णी यांनी तर तानपुऱ्यावर ईश्वरी दसककर यांनी साथ केली.

त्यानंतर पंडित राजाभाऊ देव तसेच पंडित मधुसूदन कानेटकर यांच्या शिष्या ख्यातनाम गायिका पंडिता अलका देव मारूलकर व त्यांच्या कन्या व शिष्या सूरमणी शिवानी मारूलकर यांचे विशेष गायन रंगले. अलका देव यांनी राज जोगकंस विलंबित एकताल बंदिश तसेच 'पीर पराई' ही छोटी बंदिश सादर केली. त्यानंतर जोगेश्री हा स्वरचित राग मारूलकरांनी सादर केला. 'माता शारदा' हे मध्य लयीतील रूपक त्यांनी सादर केले. कार्यक्रमात त्यानंतर उपशास्त्रीय ख्याल, दादरा, ठुमरी सादर करण्यात आली. त्यांना संवादिनीवर पंडित सुभाष दसककर, तब्लयावर अरविंदकुमार आझाद यांनी साथसंगत केली.

रंगले श्रीराम तत्त्ववादींचे गायन देवगांधार सभेच्या दुसऱ्या सत्रात पंडिता अलका देव मारूलकर यांचे शिष्य श्रीराम तत्त्ववादी यांचे गायन रंगले. त्यांनी कोमल रिषभ आसावरी मध्ये 'प्रीत न किजीए' ही बंदिश सादर केली. त्यानंतर अहिरभैरव मध्ये 'रुपक तालात दिन नाही चैन' ही बंदिश सादर केली. तराना व पिलू रागात 'अँखियन कलना परत माई' ही ठुमरी सादर केली. त्यांना सारंग तत्त्ववादी यांनी तबल्यावर तर आशिष कुलकर्णी यांनी संवादिनीवर साथ संगत केली. तानपुऱ्यावर आरोह ओक व राजेंदर कौर होते. त्यानंतर तबलावादक अरविंदकुमार आझाद यांचे स्वतंत्र तबलावादन झाले. आझाद हे पंडित किशन महाराज यांचे शिष्य आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्राचा संकल्प

0
0

थॅलेसेमिया या गुणसुत्रीय आजाराच्या परिणामी रुग्णास सातत्याने रक्तसंक्रमणाची गरज पडते. ही प्रक्रिया रुग्णासाठी अत्यंत खर्चिक व सामान्य घरातील रुग्णांच्या आवाक्याबाहेरील आहे. परिणामी या आजाराने ग्रस्त मुले उपचारांअभावी दुर्लक्षितच राहत असल्याची बाब अर्पणच्या लक्षात आल्यानंतर या रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा देणारे देशातील पहिले केंद्र अर्पणने नाशिकमध्ये साकारले होते. या केंद्राच्या यशानंतर मुंबईतही या धर्तीवर केंद्र उभारण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे १८१ थॅलेसेमिया पीडित रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात. यात उपचारांसाठी येणारा प्रतिरूग्ण खर्च हा सुमारे ६० हजारांच्या घरात आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध खाजगी कंपन्यांनीही या खर्चासाठी योगदान दिले आहे.

राज्यभरात सुमारे ३५० रक्तपेढ्या असून 'अर्पण'च्या दहा रक्तपेढ्या राज्यातील एकूण रक्तपुरवठ्यात सात टक्के वाटा उचलतात. सन २०२० पर्यंत हे योगदान १० टक्क्यांपर्यंत वाढवून यापुढेही आरोग्य क्षेत्रातील सामाजिक उपक्रम वाढविण्यावर भर देण्यात येईल, असेही उद्दिष्ट्य यावेळी कार्यकारी संचालिका वर्षा उगांवकर, डॉ. रत्नाकर कासोदकर व वैद्यकीय संचालिका डॉ. वैशाली काळे यांनी मांडले. 'अर्पण'च्या माध्यमातून आजवर ६ लाख ५१ हजार रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून १३ हजारांवर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत. रक्तपेढीचा फायदा आजवर १६ लाख गरजू रुग्णांना झाला असल्याची माहितीही डॉ. तातेड यांनी दिली. रुग्णाच्या सुरक्षेसाठी नॅट टेस्टेड हे आधुनिक प्रणालीच्या चाचणीतील रक्त वापरण्यासाठी डॉक्टरांचे व रुग्णांचे विशेष प्रबोधन रक्तपेढीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही डॉ. तातेड म्हणाले.

दोन दशकांचा प्रवास पूर्ण करताना रक्तपेढीने नवी उद्दिष्ट्ये समोर ठेवली आहेत. यात थॅलेसेमियामुक्तीसह रक्तदान शिबिरांची संख्या वाढविणे आणि नॅट टेस्टेड प्रणालीतील अधिक सुरक्षित रक्ताचा पुरवठा करणे, आरोग्य विषयक प्रबोधनावर भर देणे अशा सामाजिक उद्दिष्टांना रक्तपेढीकडून प्राधान्य दिले जाणार आहे. - डॉ. एन. के. तातेड, चेअरमन, अर्पण रक्तपेढी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरियत माध्यमातून तंटामुक्ती गौरवास्पद

0
0

पखाल रोडवरील अल-अशरफ फाउंडेशन मदरशात ए 'दहशतवाद आणि तरुण', 'समाजातील घटस्फोटाचे वाढते प्रमाण' आदी विषयावर परिसंवाद झाले. परिसंवादात आमदार प्रा. देवयानी फरांदे, ज्येष्ठ सुन्नी मुस्लिम धर्मगुरु अल-अशरफ फाउंडेशनचे संस्थापक हजरत सय्यदअली अशरफ अशरफी जिलानी, पोलिस उपायुक्त एन. अंबिका, सुन्नी दावते इस्लामीचे मौलाना जहुर अहेमद अशरफी, प्रा. किशोर शिंदे, हनिफ बशीर, अजिम सय्यद, अहेमद काझी, डॉ. इज्हार खान, डॉ. खान अख्तर-उल-इमान आदी सहभागी झाले.

धार्मिक बाबीवर दहशतवादाचा समर्थन होऊ शकत नाही. इस्लामला दहशतवाद मान्य नाही. जिहाद अथवा कोणत्याही धार्मिक बाबीवर दहशतवादाला इस्लाममध्ये स्थान नाही. तेव्हा कोणत्याही दहशतवादी संघटनेचा इस्लामशी कोणतेही संबंध होऊच शकत नाही. इस्लामच्या नावावर दहशतवाद पसरविणारे दहशतवाद्यांना पितळ उघडे पडले पाहिजे, असे मत सुन्नी दावत-ए-इस्लामीचे प्रमुख जहुर अहेमद अशरफी यांनी मांडले. यावेळी मौलाना व मुफ्ती जुबेर साहब यांनी अल अशरफ फाऊंडेशनचे धार्मिक शरियतवर आधारित कार्याचा आढावा सादर केला. साबीर शेख यांनी सूत्रसंचालन केले तर मोहम्मद हुसेन अशरफी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रमाच्या भोवऱ्यात सापडलेले ‘अरण्यभूल’

0
0

डॉन क्विक्झोट हा जगातून हद्दपार होत चाललेली जीवनमूल्ये पुन्हा प्रस्थापित करण्याच्या हेतूने प्रवासाला निघतो. त्याला वाईट गोष्टी नष्ट करून जगाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी तो सॅँको पान्झा नावाच्या साध्या शेतकऱ्याला सोबतीला घेतो; पण तो प्रत्येक आघाडीवर पराभूत होऊन परत येतो; त्याला गावात शिरायची लाज वाटते म्हणून ते दोघे अंधाराची वाट पहात आपल्या गावाच्या वेशीजवळ येऊन थांबतात आणि येथून नाटकाचा प्रवास सुरू होतो. डॉन हा पाप-पुण्य, सुख-दु:ख, मोह यांच्या फेऱ्यात अडकलेला असतो आणि सँको हा वर्तमानाशी जुळवून घेणारा असतो. भ्रम आणि वास्तव यांच्या प्रवासात त्यांना अनेक प्रवासी भेटतात. डॉन या प्रवासामध्ये सैरावरा पळत धावत सुटतो. शेवटी त्याची धुंदी ओसरते.

नाटकाचे निर्माण लक्ष्मीकांत खैरनार यांचे होते. लेखन प्रा. रमेश कोटस्थाने तर दिग्दर्शन विजय जगताप यांची होते. रितेश गायकवाड, चारुदत्त हिरे, भाऊसाहेब साळवे, योगेश बागुल, दीपक सूर्यवंशी, सुमन शर्मा, अनुप खैरनार यांच्या भूमिका होत्या. गोपाल भगत यांनी सूत्रधाराची जबाबादारी सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजमुळे वाहनचालक हैराण

0
0

शहरात ड्रेनेज व सांडपाणी यांची समस्या प्रत्येक भागात भेडसावत आहे. सातपूर एमआयडीसीतील सीएट कंपनी समोरील असलेल्या ड्रेनेज महिन्यातून ७ ते ८ वेळा चोकअप होत असल्याने वाहनचालक तसेच पायी चालणारे देखील हैराण झाले आहेत. चोकअप झालेल्या ड्रेनेजचे सांडपाणी मुख्य रस्त्यावर येऊन तळे साजत असते. यात एमआयडीसीत वाहतूक करणारी मोठी लहान, मोठी वाहने सांडपाण्यातून जातात. पायी चालणाऱ्या नागरिकांनाही सांडपाण्यातूनच प्रवास करावा लागतो. सतत चोकअप होणाऱ्या ड्रेनेजची अनेकदा चोकअप काढण्याचे काम करुन देखील पुन्हा पुन्हा ड्रेनेज चोकअप का, होते याचा तपास महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने लावण्याची गरज आहे. केवळ तुंबलेली ड्रेनेजचे चोकअप काढून महापालिकेच्या ड्रेनेजचे कर्मचारी मोकळे होतात. परंतु, पुन्हा काही दिवसांनी त्याच ठिकाणी ड्रेनेच चोकअप होऊन सांडपाणी रस्त्यावर वाहत असते. यावर महापालीच्या ड्रेनेज विभागाने कायमस्वरूपी मार्ग शोधण्याची मागणी वाहनचालक तसेच पायी चालणाऱ्यांनी केली आहे.

सातपूर एमआयडीसीत सीएट कंपनी समोर नेहमीच ड्रेनेजचे चोकअप होते. याबाबत वाहनचालक महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करतात. परंतु, महापालिकेचा ड्रेनेज विभाग तात्पुरती दुरुस्ती करतात. परंतु, नेहमीच चोकअप होणाऱ्या ड्रेनेजची कायमस्वरुपी दुरुस्ती का केली जात नाही, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. - हरिष सुतार, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वालदेवी’मधील जलविसर्ग थांबला

0
0

गोदावरी कॅनलसाठी राखीव असलेल्या जलसाठ्यामधून सुमारे दोन टीएमसी पाणी अहमदनगर जिल्ह्यासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, जलसंपदा विभागाने अहमदनगर जिल्ह्याची मागणी लक्षात घेतला राखीव असलेले पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. आमदार घोलप यांनी हिवाळी अधिवेशनात देवळाली मतदार संघ व निफाड तालुक्यातील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. पाणी सोडण्याचे व बंद करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित विभागाने रोटेशननुसार पाणी सोडले. ते शनिवारपर्यंत सुरू होते.

ठरविण्यात आलेल्यापेक्षा अधिक पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत इतरत्र जात होते. त्याचा तालुक्याला फायदा होत नसल्याने रोटेशन बंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार घोलप यांच्याकडे केली.

घोलप यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रोटेशन बंद करण्याबाबत चर्चा केली. पाणी बंद केले नाही तर आपण धरणावर जाऊन रोटेशन बंद करू असा इशारा घोलप यांनी दिला.

जनतेवर अन्याय नको आमदार घोलप म्हणाले, की नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड, दिंडोरी आदी तालुक्यातील विहिरींनी आताच तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जिल्हावासियांचे कसे होणार हा प्रश्न आहे. संबंधित विभागाने रोटेशन सोडताना त्याचे वेळापत्रक व प्रत्येक रोटेशनचा कालावधी निश्चित करावा आणि पाणीटंचाई होणार नाही याची काळजी घ्यावी. इतरत्र पिण्यासाठी पाणी सोडण्यास आमची हरकत नाही मात्र, लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच वेळापत्रकानुसार रोटेशन सोडावे. तालुक्यातील जनतेवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा घोलप यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात तेरावा महिना..!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील जनता यंदाच्या भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असतानाच आता तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना व्यवस्थापन समितीने पाणीपट्टीत तब्बल २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. योजना चालविताना तिचा खर्च वाढत असल्याचे कारण देत समितीने ही पाणीपट्टी वाढ करत असल्याचे म्हटले असले तरी ही वाढ अन्यायकारक असल्याचा सूर गावोगांवच्या ग्रामपंचायती अन् गावांमधील ग्रामस्थांमध्ये उमटू लागला आहे.

जनता दुष्काळाच्या दाहकतेचे चटके सोसत असताना ३८ गावे पाणीपुरवठा योजना व्यवस्थापन समितीने पाणीपट्टीत केलेल्या वाढीमुळे साहजिकच योजनेतून पाणी घेणाऱ्या येवला तालुक्यातील गावोगावच्या ग्रामपंचायतींना देखील वाढ करावी लागणार आहे. यापूर्वी प्रतीलक्ष लिटरला एक हजार रुपये दर होता. आता या वाढीमुळे ग्रामपंचायतींना एक हजार २५० रुपये पाण्यासाठी मोजावे लागणार आहेत.

येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा व्यस्थापन समितीने ग्रामपंचायतीना नोटीस देऊन यासंदर्भात सूचना करताच नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावोगावी ही दरवाढ करण्याची माहिती दिली. ३८ गावे योजनेला नव्याने जोडलेली गावे धरून सध्या ४१ गावांना पाच ते सहा दिवसाआड पाणी उपलब्ध करून दिले जाते.

गेली तीन वर्ष नऊ महिने व्यवस्थापन समितीने योजना सांभाळताना आता दिवसेंदिवस खर्चाचा बोजा वाढू लागल्याचे समिती सदस्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल, रसायन खर्च, देखभाल व दुरुस्ती, पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी इतर खर्च वाढला असून, वसुलीच्या तुलनेत तो जास्त होत आहे. सन २०१४ मध्ये योजनेचा खर्च २६.६२ टक्के होता. आता २०१५ मध्ये ३७.३९ टक्के झाला आहे. हा खर्च वाढत असताना पाटबंधारे विभागाकडून दिल्या जाणाऱ्या बिगर सिंचन पाणीपट्टीत देखील वाढ होत आहे. त्यातच सप्टेंबर २०१५ पर्यंतची थकबाकी १६ लाखांवर गेली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी व योजना सुरळीत चालावी यासाठी समितीने पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

३८ गावे पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षांनी आजपर्यंत कुठल्याही गावांच्या सरपंचांना माहिती दिलेली नाही. आजवर योजनेची बरीच वीज बिले माफ झाली. पाटबंधारे खात्याचे पैसे देणे बाकी आहे. ३८ गावे योजनेतील समाविष्ट गावांच्या सरपंचांची मिटिंग घेण्यात येऊन त्यातच पाणीपट्टी वाढीबाबत सर्वसंमतीने निर्णय घेण्यात यावा. - संभाजी पवार, माजी सभापती, येवला पंचायत समिती

दिवसेंदिवस योजनेचा खर्च वाढू लागला आहे. त्यामुळे दरवाढ करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील ही बाब लक्षात घेता पाणीपट्टी वाढ स्वीकारायला हवी. - सचिन कळमकर, अध्यक्ष, ३८ गावे योजना पाणीपुरवठा व्यवस्थापन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यांतील धरणांत २४ टक्केच पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांमधील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील २३ धरणांमध्ये केवळ २४ टक्के पाणी शिल्लक आहे. धरणांच्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ एक चतुर्थांश पाणी शिल्लक असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही केवळ ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने धरणांचा घसा कोरडाच राहीला. जिल्ह्यातील २३ धरणांपैकी अनेक धरणे यंदा ५० टक्केही भरू शकली नाहीत. त्यामुळेच यंदा पिण्यासाठी आणि सिंचनासाठीही काटकसरीने पाणी वापरण्याची वेळ जिल्हावासियांवर आली आहे. जिल्ह्यात गंगापूर, पालखेड आणि गिरणा असे तीन धरणसमूह असून, त्यामध्ये अनुक्रमे ३२, २५ आणि १७ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ६६ हजार १६१ दशलक्ष घनफूट आहे. त्यापैकी मोठ्या प्रकल्पांची क्षमता ४८ हजार २९१ दशलक्ष घनफूट तर मध्यम प्रकल्पांची क्षमता १७ हजार ८७० दशलक्ष घनफूट आहे. मात्र धरणांमध्ये आजमितीस १५ हजार ८३४ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये गतवर्षी या कालावधीत ४ हजार ४६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७२ टक्के पाणी होते. यंदा हा साठा अवघ्या ३९ टक्क्यांवर आला असून, धरणामध्ये दोन हजार २०४ दशलक्ष घनफूट एवढेच पाणी शिल्लक आहे. २० लाखांहून अधिक लोकसंख्येला जुलैपर्यंत हे पाणी पुरविण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे असून, त्याचसाठी पाणी कपातीचा निर्णय अंमलात आणण्यास सुरूवात झाली आहे. गंगापूर धरण समूहातील काश्यपी धरणात ३२ टक्के तर गौतमी गोदावरीत १२ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

धरणाचे नाव गतवर्षीचा पाणीसाठा चालूवर्षीचा पाणीसाठा

गंगापूर ७२ ३९

काश्यपी ८५ ३२

गौतमी गोदावरी ५२ १२

पालखेड १८ १६

करंजवण ७३ ३२

वाघाड ४१ २२

ओझरखेड ४१ २७

दारणा ५५ ३३

मुकणे ५५ ६

वालदेवी ४५ ३०

कडवा ४५ १७

आळंदी ७६ ४६

पुनद ९० ६६

हरणबारी ७२ ६७

केळझर ६४ ५१

नागासाक्या १६ ०

गिरणा २६ ३

धरणसमूह उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.फू) टक्केवारी

गंगापुर २२०४ ३२

पालखेड ४९६१ २५

गिरणा ४३१७ १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानाचा वापर कृतीत करावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
'शिक्षकांनी ट्रेनिंग प्रोग्रॅम्सचा उपयोग केवळ सर्टिफिकिट मिळविण्यासाठी न करता ज्ञानाचा विकास करण्यासाठी करावा. मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करुन आपल्या कृतीतून त्याचे दर्शन घडवावे', असे प्रतिपादन महाष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे प्रभारी सहसंचालक ज्ञानदेव नाठे यांनी केले.
महावीर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इंजिनीअरिंग विभागातर्फे 'न्यू ट्रेंड्स इन नेटवर्क टेक्नॉलॉजी अॅण्ड सायबर सिक्युरिटी' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'टेक्नॉलॉजीचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी क्रिएटीव्ह असले पाहिजे. समाजाला उपयोगी पडतील अशी यंत्रे, उत्पादने, सॉफ्टवेअर्सचा विकास करुन त्याची अंमलबजावणी करायला हवी. देश-विदेशातून इम्पोर्ट केलेले कम्प्युटर्सच्या विविध भागांची जोडणी विद्यार्थ्यांना करण्यास सांगणे, पुस्तकी माहितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, हे शिकविल्यास त्यांना प्रात्याक्षिकाचे ज्ञान मिळेल. याचाच उपयोग नवनिर्मिती करण्यासाठीही होईल.'
'औद्योगिक समूहात काही वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूकच तांत्रिक शिक्षणासाठी केली पाहिजे. शिक्षकांच्या ज्ञानाची तपासणीही कठोररितीने झाली पाहिजे. तरच विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यास मदत होईल', असे मत संस्थेचे अध्यक्ष हरिष संघवी यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेत नाशिकसह जळगाव, अहमदनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, रायगड या जिल्ह्यांमधील प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. विंडोज१०, ऑपरेटिंग सिस्टीम, इन्स्टॉलेशन, सिक्युरिटी, व्हायरस डिटेक्शन यासारख्या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सीईओ डॉ. माया पडवळ, प्राचार्य मनोज बुरड, उपप्राचार्य सागर पाटील, प्राचार्य प्रकाश कडवे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठूनामाच्या गजराने दुमदुमले शहर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या शहरातील वातावरण विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेले असून, संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेकरिता विविध गावांमधून दिंड्या नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. दिंड्यांचे रथ शहरामध्ये जागोजागी थांबलेले असून, प्रत्येक रस्त्यावर एका बाजूने शिस्तीत वारकऱ्यांची दिंडी त्र्यंबकेश्वराकडे प्रयाण करीत आहे. यातील अनेक जण त्र्यंबकनगरीत दाखलही झाले असून, तेथे कीर्तनाचा गजर सुरू आहे.

बुधवार ३ फेब्रुवारी रोजी दशमी, ४ रोजी एकादशी व ५ रोजी द्वादशी असे तीन मुख्य यात्रेचे दिवस असून, त्यासाठी दिंड्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. एकादशीला रात्री संस्थानची पूजा, शासकीय पूजा पहाटे पाच वाजता, दुपारी पालखी रथ मिरवणूक सोहळा असे मुख्य नियोजन असते. यंदा पाच लाखाहून अधिक वारकरी येतील, असा अंदाज आहे. त्याप्रमाणे यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

दिंड्याचे स्वागत, दिंड्यांना कॅलेंडर वाटप, भाविकांसाठी रांगदर्शन बारी पूर्व दरवाजाने संत निवृत्तीनाथ मंदिरात प्रवेश, पश्चिम दरवाजाने बाहेर पडणे असे नियोजन असते. नाशिक शहरातून जाताना वारकऱ्यांना ठिकठिकाणी खिचडी तसेच चहाचे वाटप होत आहे. काही ठिकाणी मोफत जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनात गाड्यांच्या घरघरीला कंटाळलेल्या चाकरमान्यांसाठी चार क्षण टाळांचा किणकिणणारा सुमधूर स्वर सुखावणारा ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१८ सहकारी संस्था होणार रद्द

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

केवळ वैयक्तिक स्वार्थ आणि नाशिक जिल्हा बँकेच्या मतदानासाठीचे आर्थिक लक्ष्य पूर्ण व्हावे या हेतूने सन १९७६-२०१० या काळात निफाड तालुक्यात निर्माण झालेल्या जवळपास २१८ सहकारी संस्था रद्द होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या विशेष सर्वेक्षण मोहिमेतंर्गत मान्यता रद्द करण्याची नोटीस निफाडच्या सहाय्यक निबंधकांनी काढली आहे. यामुळे या संस्थेच्या चेअरमन व संचालकांचे धाबे दणाणले आहे.

राज्य सरकारच्या सहकार खात्याने राज्यातील फक्त नावाला असलेल्या सहकारी संस्था ज्यांचे कामकाज बंद आहे किंवा फक्त कगदोपत्री कामकाज असून, त्यांचा कुठेही ठावठिकाणा नाही, कार्यालय नाही अशा संस्था सर्वेक्षणांनतर नोटीस काढून रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार तालुक्यातील सहकार विभागाने कार्यवाहिला सुरुवात केली आहे. तालुक्यात २८१ संस्थांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, ६१ संस्थांना नोटीस पाठवली आहे. या नोटिसीत संबंधित संस्थांनी सहकारी तत्त्वानुसार काम केलेले नाही, नोंदणी व व्यवस्थापनाबाबतचे शर्तीचे अनुपालन केलेले नाही, कामकाज बंद आहे, संस्थांचे अस्तित्व कगदोपत्री आहे आदी कारणे नमूद केली आहेत.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम २१ अन्वये नोंदणी रद्द करण्यासाठी हरकती मागवल्या असून, ६२ संस्थांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुदत संपून अवघ्या १ ते २ हरकती आल्या आहेत. उर्वरित संस्थांची यादी हरकतीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये फडकला भगवा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सर्वत्र औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय बनलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार संजय पवार व शिवसेनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या शिवनेरी शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली. नांदगाव बाजार समितीप्रमाणे मनमाड बाजार समितीवरही शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. शिवनेरी पॅनलने १२, नम्रता पॅनलने तीन व अपक्षांनी तीन जागा पटकावल्या.

माजी आमदार संजय पवार, सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी पॅनलने ग्रामपंचायत गटात जोरदार मुसंडी मारत सर्वच्या सर्व दहा जागा जिंकून ग्रामीण भागातील सेनेच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले. नांदगावचे बापूसाहेब कवडे यांची साथ लाभल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले. नांदगाव बाजार समितीची पुनरावृत्ती होऊन मनमाड बाजार समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर यांचे समर्थन असलेल्या चंद्रकांत गोगड यांच्या नम्रता पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या. त्यांना माजी सभापती प्रकाश घुगे, राजेंद्र पवार यांचाही पाठिंबा मिळाला होता.

आता लक्ष उमराणे, मालेगावकडे मालेगाव व उमराणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीकडे आता देवळा व मालेगाव या दोन तालुक्यांचे लक्ष लागले आहे. मालेगावमध्ये सेना विरुध्द भाजप असा संघर्ष रंगणार आहे. उमराणेत डॉ. राहुल आहेर यांनी लक्ष घातल्यामुळे भाजपचे पारडे जड मानले जात आहे. - निवडणुकीचा निकाल शिवनेरी पॅनल - १२ नम्रता पॅनल - ३ अपक्ष - ३ - विजयी उमेदवार सोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण - मच्छिंद्र हाके, गंगाधर बिडगर, आनंदा मार्कंड, दीपक गोगड, उत्तम व्हरगळ, भगिनाथ यमगर, किशोर लहाने. सर्वसाधारण गट - राजू सांगळे, आप्पा कुणगर. आर्थिक दुर्बल गट - अशोक पवार. व्यापारी संघ - कल्याणचंद ललवाणी, माणकचंद गांधी. विशेष मागास वर्ग - संजय सांगळे. इतर मागास वर्ग - भाऊसाहेब जाधव. महिला राखीव- सुभद्राबाई उगले, मीराबाई गंधाक्षे. हमाल मापारी संघ - मधुकर उगले. अनुसूचित जाती गट - दशरथ लहिरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images