Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पुढारी तुपाशी; स्वातंत्र्यसैनिक उपाशी

$
0
0

आमदार-खासदार व स्वातंत्रसैनिक यांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये कमालीची तफावत आहे. देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांवर सरकारकडूनच अन्याय केला जात आहे, असा आरोप ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक वसंतराव हुदलीकर यांनी 'मटा'शी बोलतांना केला. ही पेन्शन अनियमित येत असल्याचेही ते म्हणाले. एकदा आमदार झालेल्या व्यक्तीला सरकार तब्बल ४० हजार पेन्शन लागू करते. मात्र, स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना ४ ते ८ हजार इतकीच पेन्शन मिळते. ही इतकी तफावत का? असा संतप्त सवालही स्वातंत्र्यसैनिकांनी केला. त्यातही ही पेन्शन अनियमित मिळत असल्याने अनेकदा बँक, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कोषागार विभागात सारख्या खेटा घालाव्या लागतात. याउलट आमदारांची पेन्शन मात्र वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होत असते. माजी आमदारांना महिन्याला ४० हजार रुपये पेन्शन मिळत असतांना त्यांना त्यासाठी एकही रुपया कर का आकारला जात नाही, असा देखील सवाल उपस्थित होतो.

देश, राज्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा सरकार करीत असल्याचे हुदलीकर म्हणाले. याबाबत काही तक्रार करावयाची असल्यास जावे कुठे असा प्रश्न स्वातंत्र्यसैनिकांसमोर आहे. कारण पेन्शन देते कोण याची माहिती बँक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी देत नाहीत.

हुतात्मा स्मारकाला तुटपुंजे अनुदान एकीकडे माजी आमदार व स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमध्ये मोठी तफावत असताना दुसरीकडे माजी सैनिकांच्या हुतात्मा स्मारकाला सरकार वर्षांकाठी केवळ १० हजार रुपये अनुदान देत असल्याचेही स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांनी सांगितले. यात महापालिका व सामाजिक संस्थेकडून निधी उपलब्ध करून हुतात्मा स्मारकाची देखभाल केली जात असल्याचे ते म्हणाले.

माजी आमदारांसाठी २५ लाख पेन्शन नाशिक जिल्हात ५९ माजी आमदारांसाठी महिन्याकाठी २५ लाख ६४ हजार रुपयांच्या पेन्शनचा बोजा सरकारवर येत आहे. वर्षाला जिल्हातील ७० ते ८० स्वातंत्र्यसैनिकांना केवळ ५ ते ६ लाखइतकीच पेन्शन दिली जाते. माजी आमदारांची पेन्शन सर्वसामान्यांनी दिलेल्या करातूनच दिली जात असल्याने यावर आपण सरकारकडे दाद मागण्याची काही स्वातंत्र्य सैनिकांची तयारी आहे.

स्वातंत्र्यसैनिकांची सरकारने क्रूर चेष्टा केली आहे. सुरुवातीला केवळ शंभर रुपयांपासून पेन्शन सुरू केली. आता ती ४ ते ८ हजारपर्यंत झाली आहे. तीदेखील अनियमितच. माजी आमदारांना वेळेवर पेन्शन तर स्वातंत्र्यसैनिकाच्या पदरी ससेहोलपट का? मेक इन इंडिया म्हणणारे पंतप्रधान नरेंद मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. - वसंतराव हुदलीकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नऊ महिन्यांच्या मुलीसह आई आढळली मृतावस्थेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील करंजाड येथे नऊ महिन्याच्या तान्हुल्या बालिकेसह आई विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर माहेरच्या मंडळींनी जायखेडा पोलिसांसमोर तीव्र निर्देशने केल्यानंतर सासरकडील मंडळीविरुद्ध खुनाचा दाखल करण्यात आला.

तालुक्यातीलच मुळाणे येथील माहेर असलेल्या उज्वला ह्याळीज (वय २३) हिचे करंजाड येथील भूषण सुपडू बोरसे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना नऊ महिन्याची नियती नावाची गोंडस मुलगी होती. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उज्वला व ही आपल्या नऊ महिन्याच्या नियती या मुलीसह विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती. याच वेळी सासरच्या मंडळीचा शोध घेतला असता ते कुणीही घरी सापडले नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अधिकच चर्चेला उधाण आले. माहेरील मंडळींनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. जायखेडा पोलिसांसमोर तीव्र निर्देशने केल्यानंतर सासरकडील मंडळीविरुद्ध खुनाचा दाखल करण्यास भाग पाडले.

या प्रकरणी मृत उज्वला हिचा भाऊ राकेश ह्याळीज यांनी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल केला असून पती भूषण बोरसे, सासरे सुपडू बोरसे, सासू द्रौपदाबाई बोरसे, जेठ भटू बोरसे, जेठानी रोहिणी बोरसे, नणंद प्रगती बागुल, भाचा दर्शन बागुल, अशोक पवार, राणी पवार आदींवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रकाश होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मायलेकींवर शवविच्छेदन करून उशिरा अत्यंसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस ग्राहकांच्या अधिकारांवर वितरक आणि डिलिव्हरी बॉयकडून गदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गॅस सिलिंडरचे वजन करून देण्याची मागणी ग्राहकांकडून होत असली तरी मशीन पासिंगला टाकल्याची सबब सांगत गॅस वितरकांचे कर्मचारी वजन केल्याशिवायच गॅस सिलिंडर ग्राहकांच्या माथी मारत आहेत. त्यामुळे गॅस कंपन्या आणि पुरवठा विभाग वितरकांना कागदोपत्री कितीही सक्ती करीत असले तरी त्यांचे नियम सर्रास धाब्यावर बसविण्याचा उद्योग वितरकांकडून सुरू आहे.

भरलेल्या सिलिंडरमधील एक ते दोन किलो गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात असल्याचा उद्योग पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलीकडेच उघडकीस आणला. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या राणेनगर येथील भगवती गॅस एजन्सीच्या एका कर्मचाऱ्यासह तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली. परस्पर गॅस चोरीचे प्रकार घडू नयेत यासाठी सिलिंडरला प्लास्टिकऐवजी अॅल्युमिनियमचे सील बसविण्याची मागणी वितरकांकडून होऊ लागली आहे.

अशा गॅस चोरीच्या प्रकारांमुळे ग्राहक सावध झाले असून, सिलिंडर घरपोच आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वजनाचा आग्रह धरू लागले आहेत. वैधमापन शास्त्र अधिनियम २००९च्या अंतर्गत ग्राहकांना सिलिंडर वितरण करतेवेळी वजन काट्यावर सिलिंडरचे वजन करून देणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित वाहनातच वजन काटा ठेवणे अनिवार्य आहे. सिलिंडर ग्राहकाकडे सुपूर्द करतानाच वजन करून देणे आणि सिलिंडर दोषरहित असल्याची तपासणी करून देणे बंधनकारक आहे. मात्र कर्मचारी स्वत:हून अशा प्रकारची सेवा ग्राहकांना पुरवित नाहीत. ग्राहकांनी मागणी करूनही सिलिंडरचे वजन करून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.

वजनकाटा नादुरुस्त आहे, वजनकाटा पासिंगसाठी टाकल्याची सबब कर्मचाऱ्यांकडून सांगितली जाऊ लागली आहे. वजनकाटा पासिंगसाठी टाकला असेल तरी पर्यायी व्यवस्था करणे हे संबंधित वितरकाचे काम आहे. परंतु, तसे करण्यात वितरकांकडून स्वारस्य दाखविले जात नसल्याने वितरक आणि कर्मचारी यांच्या संगनमताने फसवणूक होत असल्याचा आरोप ग्राहक करीत आहेत.

सिलिंडर ग्राहकांकडे सुपूर्द करतेवेळी ग्राहकासमोरच त्याचे वजन करून द्यावे, असे वितरकांना लेखी आदेश दिले आहेत. सिलिंडर वजन करूनच घेणे हा ग्राहकांचा अधिकार असून तो त्यांना मिळायला हवा. मात्र, डिलिव्हरी बॉयकडून वजन करून दिले जात नसेल तर याबाबत पुन्हा सूचना दिल्या जातील.

- सुनील सौदाणे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाड्यांवरील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिक्षणाचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पारंपरिक पध्दतीने शिक्षण घेणाऱ्या अन् सामान्य सुविधांपासूनही वंचित असणाऱ्या पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर 'प्रयास' या समाजसेवी संस्थेने कॉम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. प्रयासच्या कॉम्प्युटर ट्रेनिंग अन् इतर प्रशिक्षणाच्या उपक्रमांना पेठ तालुक्यातील २६ शाळांचा प्रतिसाद लाभला.

आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे योग्य शिक्षण मिळत नसल्याचे प्रयासचे ‌निरीक्षण होते. यानुसार पेठ तालुक्यात करंजळी आणि कोहोळ या दोन केंद्रांसह २ आश्रमशाळांतर्गत २५ शाळांपर्यंत प्रयासचे कार्यकर्ते पोहचले. कॉम्प्युटर म्हणजे काय? या प्रश्नापासून तर इंटरनेटद्वारे ग्लोबल प्लॅटफॉर्म कसा मिळवाल, या प्रश्नापर्यंतच्या विद्यार्थ्याच्या शंकांचे या कार्यकर्त्यांनी निरसन केले. सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. संगणक साक्षरतेसोबतच करिअर मार्गदर्शन, वैज्ञानिक खेळ, वैदिक गणिते, पथनाट्य सादरीकरण, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रमांचाही यात सहभाग होता. पथनाट्यांमध्ये सामाजिक विषयांवर सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय पाच शाळांमध्ये ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले. यात प्रत्येक शाळेस सुमारे ५०० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक या पाच दिवसीय उपक्रमाच्या अखेरच्या दिवशी सर्व शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व यांसह खो खो, धावणे आदी क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या.शिबिरात प्राचार्य केशव नांदूरकर, प्रा. नानासाहेब गुरूळे, स्वप्नील पाटील यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वीज अधिकाऱ्यांनी ज्ञान वाढविण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जागतिकीकरणामुळे स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी वीज अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करावा व ज्ञान वाढवावे, असे प्रतिपादन महावितरणचे कार्यकारी संचालक निलेश गटणे यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकरोड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.

महापारेषणचे कार्यकारी संचालक सूरज वाघमारे, मानव संसाधनचे मुख्य महाव्यवस्थापक विजय शिरुरकर, नाशिक परिमंडळचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, एकलहरे येथील मुख्य अभियंता (सुरक्षा) कांचन अजनाळकर, संजीब राय यांनी अधिवेशनाचे उदघाटन केले. स्वागताध्यक्ष रमेश शंकपाळ, प्रवीण बागूल, प्रशांत लहाने, संजय गायकवाड, दत्ता कुलकर्णी, सतीश तळणीकर व्यासपीठावर होते.

विजय शिरुरकर म्हणाले, की वीज थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल करण्याची गरज आहे. इआरपी व सॅप प्रणाली स्वीकारणारी राज्य विद्युत कंपनी जगातील पहिली कंपनी आहे. सरचिटणीस दिलिप शिंदे म्हणाले, की कमी कर्मचारी, वाढलेली कामे, वीजबील वसुलीवेळी होणारी कोंडमारी आदी समस्या अधिकाऱ्यांपुढे आहेत. आर. के. भालेराव, चेतन पाटील, अभिजित रासकर आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद शंकरच्या आठवणीत बुडाले गाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील भयाळे गावात आज प्रत्येकाच्या ओठी चर्चा आहे, ती काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झुंजताना प्राण पणाला लावून लढणाऱ्या आणि मातृभूमीसाठी आपले बलिदान देणाऱ्या झुंजार शंकर चंद्रभान शिंदे या वीर जवानाची. ग्रामस्थांच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सैन्यात जाऊन पोहचलेल्या आणि आपल्या लढवय्या वृत्तीने देशाच्या कामी आलेल्या या शूर शिलेदाराला आता अखेरचा सलाम ठोकून त्याचा कायमचा निरोप घेण्याच्या कल्पनेने भयाळे ग्रामस्थांचे डोळे भरून येत आहेत.

आपला शंकर आता पुन्हा सुटी घेऊन आनंदाने गावी पुन्हा कधीच परतणार नाही, या भावनेने इथले समाज मन थरारून गेले आहे. पण, त्याचाही अभिमान आहे असा सार्वत्रिक सूर चांदवड तालुक्यात कानी पडतोय. 'शंकर अमर रहे'चे फलक, पोस्टर्स देखील दृष्टीस पडतात.

गरिबीच्या वेदना अन् स्वप्न शंकरचे वडील चंद्रभान शिंदे एक सामान्य शेतकरी आहेत. आई-वडील, भाऊ केशव, भावजयी, पत्नी, दोन मुले, पुतण्या-पुतणी असा मोठा परिवार शंकरच्या मागे आहे. घरची परिस्थिती हलाखीची असून, अवघी एक एकर शेती त्यांच्याकडे आहे. त्यात दुर्दैव असे की शेती चार महिने पाण्याखाली असल्याने शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. शंकर अत्यंत हुशार व समजूतदार विद्यार्थी होता. गरीब परिस्थितीची त्याला जाणीव होती. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, दहावीपर्यंत शिक्षण वडाळी भोई शाळेत झाले. पिंपळगांव बसवंत येथे कला शाखेत कॉलेजचे शिक्षण घेत असताना सैन्यात भरती होण्याची क्रेझ शंकरच्याही मनात पुरती भिनली. सैन्यात त्याला संधी मिळाली. सोळा वर्षात नाईक पदापर्यंत तो पोहचला. गावाकडची घरची परिस्थिती मातीचे पत्र्याचे घर हे सारं त्याला बदलायचं होतं. असे त्याचे वर्गमित्र आणि गावचे सरपंच रवींद्र पुरकर सांगतात.

शंकर माझा वर्गमित्र. आमच्या गावाची शान. देशासाठी तो शहीद झाला. त्याचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्याच्या गौरवासाठी गावात स्मारक उभारणार आहोत. त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आयुष्यभर उभे राहू. - रवींद्र पुरकर, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युरोपसाठी द्राक्ष झाली‘गोड’

$
0
0

गत सप्ताहापासून नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे या विभागांतील द्राक्षांच्या शिवारसौद्यांना वेग वाढला आहे. सर्व भागांतील बागांना यंदा बहुतांशी पूरक वातावरण मिळाल्यामुळे द्राक्षांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ दिसत आहे. परिणामी पश्‍चिम बंगाल, दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, जम्मू व काश्‍मीर या राज्यातील बाजारपेठेतून चांगली मागणी वाढली. दीर्घकाळापासून रेंगाळलेली थंडी आता कमी होत असल्याने यामुळेही द्राक्षांना उठाव वाढत असल्याचे परराज्यात माल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले.



द्राक्षनिर्यातीची आगेकूच कायम यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरच्या सप्ताहापासूनच निर्यात हंगामाची दमदार सुरुवात झाली आहे. गतवर्षीच्या दुपटीने यंदा द्राक्ष निर्यातीचा वेग आहे. गत सप्ताहाच्या अखेरपर्यंत तब्बल ७०० कंटेनरमधून ९००८ मेट्रिक टन द्राक्षे युरोपकडे रवाना झाली आहेत. गतवर्षी याचवेळी २६८ कंटेनरमधून ३३५७ कंटेनर द्राक्षे युरोपला पाठविली होती. या शिवाय लगतचा बांगलादेश, थायलंड, दुबई, मलेशिया, रशिया, चीन या देशांतूनही द्राक्षांना मागणी वाढली आहे.

चांगले वातावरण आणि उच्च गुणवत्ता यामुळे आपली द्राक्षे देशांतर्गत व निर्यातीच्या बाजारपेठेत चांगला भाव घेत आहेत. प्रत्येक टप्प्यात योग्य काळजी घेणाऱ्या मेहनती द्राक्षउत्पादकांच्या गुणवत्ता व्यवस्थापनाचे हे फळ आहे. यापुढील काळात सातत्याने पूर्ण पक्व झालेला, किमान १८ ब्रीक्‍स साखरनिर्मिती झालेला गोड मालच बाजारात आणावा म्हणजे बाजारातील तेजी टिकून राहील. - जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना



देशांतर्गत बाजारातील द्राक्षांचे दर (प्रतिकिलो) द्राक्षवाण----किमान दर ---कमाल दर ----सरासरी दर थॉमसन---३५---४५---४० सोनाका---५०---६०---५५ शरद सीडलेस---४५---५५---५० जम्बो/ नानासाहेब पर्पल---५५---६५---६० फ्लेम सीडलेस---४०---५०---४५

निर्यातक्षम द्राक्षांचे दर (प्रतिकिलो) द्राक्षवाण---किमान दर---कमाल दर---सरासरी दर थॉमसन---८५---९६---९० सोनाका---५०---६०---५५ शरद सीडलेस---८५---९६---९० जम्बो/नानासाहेब पर्पल---९०---१०००---९५ फ्लेम---८५---९०---८५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधांनी अनुभवली सायकल राईड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड महाराष्ट्र (नॅब) आणि नाशिक इंडस्ट्रीज वेल्फेअर सेंटर (निवेक) यांच्या संयुक्त विद्यमाने अंध अपंगांसाठी झालेल्या डिव्हाईन सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिकच्या साठ अंध सायकलपटूंनी रॅलीत सहभाग घेतला.

महात्मानगर येथील क्रिकेट मैदानाजवळून सुरू झालेल्या रॅलीत महानॅब स्कूलच्या अंध विद्यार्थिनी, नॅब बहुविकलांग केंद्रातील मुले, डेफ ब्लाईंड, नॅब कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी तसेच नॅबतर्फे चालविल्या जाणाऱ्या विशेष डी. एड - बी. एड कॉलेजचे विद्यार्थी व नाशिक ब्लाइंड फेडरेशनचे विद्यार्थी तीन चाकी सायकली, व्हिलचेअर व साध्या सायकलींसह मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सर्वसामान्यांंप्रमाणेच अंध-अपंग व्यक्ती सुद्धा तितक्याच सक्षमतेने सर्व काही करू शकतात हे या 'डिव्हाईन राईड'च्या निमित्ताने नाशिककरांना अनुभवायला मिळाले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, ज्येष्ठ क्रीडा तज्ज्ञ भीष्मराज बाम, पोलिस उपायुक्त विजय पाटील, नाशिक सायक‌िस्टचे संस्थापक हरिश बैजल, डॉ. महाजन बंधू यांच्या हस्ते सायकलस्वरांना टी- शर्ट आणि हेल्मेटचे वाटप करण्यात आले. एकूण ५५ सायकलस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी सर्वांचे स्वागत केले. मानद महासचिव गोपी मयूर व माजी अध्यक्ष अशोक बंग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग, श्रीकांत जोशी, सुनील खालकर तसेच 'निवेक'चे श्रीयुत सोनार यांनी सायकलपटूंना मार्गदर्शन केले. महात्मानगर मैदानापासून सुरू झालेली रॅली पारिजात नगर मार्गे भोसला मिलिटरी स्कूलच्या कॉलेजरोड गेटवर संपली. रॅलीच्या यशस्वीतेसाठी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, श्याम पाडेकर, सतीश भावे, चक्रधर जाधव, विनोद जाधव, वर्षा चकोर, ज्योती आव्हाड, संपत जोंधळे, डॉ. मनीषा रौंदळ आदींनी परिश्रम घेतले.

सायकल पार्किंग स्टँड उदघाटन

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे रविवारी सकाळी ९ वाजता गोल्फ क्लब मैदान येथे सायकल पार्किंग स्टॅँडची उभारणी करण्यात आली. दररोज गोल्फ क्लब येथे सकाळी सायकलवर फिरायला येणाऱ्या सायकलप्रेमींना त्यांची सायकल व्यवस्थित पार्क करून लॉक करता यावी यासाठी या स्टॅँडची उभारणी केली आहे. महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते या स्टँडचे उदघाटन करण्यात आले.

सायकल स्टॅम्पचे मार्किंग

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे नाशिक-त्र्यंबकरोडवर दररोज सायकलिंग करणाऱ्या नाशिककरांसाठी रविवारी सकाळी ७ वाजता पपया नर्सरी ते त्र्यंबक रोड या ३ किलोमीटर मार्गावर महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते सायकल स्टॅम्पचे मार्कींग करण्यात आले. यावेळी नाशिक सायकलिस्टचे योगेश शिंदे, शैलेश राजहंस, दत्तू आंधळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहीद शंकर शिंदे यांचे पार्थिव नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काश्मिरमधील कुपवाडा येथे अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेल्या शहीद शंकर शिंदे यांचे पार्थिव रविवारी लष्कराच्या विशेष क्राफ्टने नाशिकमध्ये आणण्यात आले. ओझर विमानतळावर शासकीय इतमामात त्यांना मानवंदना देण्यात आली. सोमवारी सकाळी चांदवडमधील भयाळे या त्यांच्या गावी त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

काश्मिरमधील कुपवाडा जिल्ह्यातील झोंरेशी गावात अतिरेक्यांशी दोन हात करताना शिंदे यांना वीरमरण आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ओझर विमानतळावर त्यांचे पार्थिव आले असता शिंदे यांना सैन्यदलातर्फे मानवंदना देण्यात आली. मेजर जनरल जे. एस. बेदी, ब्रिगेडीअर पी. आर. मुरली, एअर कमोडोर विभास पांडे, पोल‌िस अधीक्षक संजय मोहिते आदींनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद शिंदे यांना मानवंदना दिली. जिल्हा प्रशासनातर्फे तहसीलदार संदीप आहेर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शिंदे यांचे बंधु केशव शिंदे, चुलतभाऊ कैलाश शिंदे, अंबादास शिंदे व मित्र उपस्थित होते. ओझर येथून लष्कराच्या विशेष वाहनाने शहीद शिंदे यांचे पार्थिव देवळाली आर्टीलिअरी सेंटर येथे नेण्यात आले. तेथील मिलेट्री हॉस्पिटलमधील शवागारात हे पार्थिव ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास देवळाली येथून शहीद शिंदे यांचे पार्थिव भयाळे गावी नेण्यात येणार आहे. तेथे हे पार्थिव कुटुंबीयांकडे सोपविले जाईल. सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठीची तयारी प्रशासनाकडून केली जात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

सेनेने जम्मू आणि काश्मिरमधील चौकीबल (झोंरेशी गाव) येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान जखमी झाले असतानाही शहीद शिंदे यांनी अतिरेक्यांचा धैर्याने प्रतिकार केला. या चकमकीत त्यांना वीरमरण आले. कुपवाडा येथे देखील सैन्यदलाने शहीद शिंदे यांना मानवंदना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची विजयी सलामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडाळा रोड येथील जे. एम. सी. टी. (जुम्मा मस्जिद च्यारीटेबल ट्रस्ट) तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या बास्केटबॉल सामन्यात यजमान नाशिक संघाने नांदेड संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. या वेळी जे. एम. सी. टी. ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अद्ययावत बास्केटबॉल क्रीडांगणाचे उद्‍घाटनही झाले.

पहिल्या दिवशीच्या सामन्यात नाशिकच्या संघाने नांदेड संघाचा ३० विरुद्ध १७ अशा गुणांनी पराभव करून विजयी सलामी दिली. नाशिक संघाकडून खेळताना संकेत पाटोळे, शेख मुनाफ, अल हसन मन्सुरी, हकीफ, केतन लांडगे आणि साकीब शेख यांनी चांगला खेळ करून संघाला विजयी केले, तर पुणे आणि मुंबईच्या संघानेही सहज विजय मिळवून आपले विजयी अभियान सुरू केले. रविवारी सर्व प्राथमिक सामने घेण्यात आले.

सामन्यांचे निकाल

१) नाशिक विजयी विरुद्ध नांदेड (३० - १७), २) पुणे वाघोली विजयी विरुद्ध मलकापूर (३८ - ०२), ३) मुंबई विजयी विरुद्ध ब्रह्मपुरी (२५ - १६)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेतील कलह शिगेला

$
0
0

महापालिका वर्चस्वासाठी पदाधिकाऱ्यांमध्येच संघर्ष सानेंचा बोलविता धनी कोण?

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक शिवसेनेमधील गृहकलह शिगेला पोहचला आहे. शिवसेनेला संकटात पाठ दाखवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी सक्रीय झालेले जुने पदाधिकारी व विद्यमान पदाधिकारी यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी संघटना ताब्यात रहावी यासाठी काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीची तयारी करायची की गटबाजीचा सामना करायचा अशा चक्रव्यूहात पदाधिकारी अडकले आहेत.

पुढील वर्षी फेब्रुवारीत नाशिक महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेनेही जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण संघटनेत फेरबदल केले आहेत. त्यामुळे महानगरातील इच्छुक पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. ग्रामीण प्रमाणे शहरातील संघटनेतही फेरबदल व्हावे, अशी या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या अडचणी वाढण्याबरोबरच डोक्याचाही ताप वाढला आहे.

शिवसेनेत सध्या अडगळीत पडलेल्या काही जुन्या नेत्यांचा गट निवडणुकीच्या तोंडावर सक्रीय झाला आहे. महापालिका निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात यावीत यासाठी प्रयत्नशील झाला आहे. त्यासाठी कधीकाळी नाशिकचे संपर्कप्रमुख असलेल्या मातोश्रीवरील एका बड्या नेत्यालाच हाताशी धरण्यात आले आहे. पक्षातून बाहेर पडलेल्या काही नेत्यांची नव्याने जमवाजमव करून त्यांच्या पुनरप्रवेशाचे प्रयत्न सुरू केले आहेत. सेनेला संकटात पाठ दाखविणाऱ्या या नेत्यांना मातोश्रीवरूनच नकार देण्यात आला. त्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी कायम ठेवल्याने गटबाजीला उत आला आहे. त्यामुळे पक्षाने गटबाजीला कंटाळून अखेरीस बदलाची चाचपणी सुरू केली आहे. सध्याच्या पदाधिकाऱ्यांना बदलल्यास पक्षाला काय फटका बसू शकतो याचाही विचार केला जात आहे.


भाजप, मनसेशी दोन हात

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्ताधारी मनसेसह भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठ्या ताकदीची गरज असून आतापासून मायक्रो प्लॅनिंग करावे लागणार आहे. विशेषत: मित्रपक्ष असलेल्या भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे नेमके उद्दिष्ट ठरवून पदाधिकाऱ्यांनी एकोप्याने निवडणूक तयारी करणे अपेक्षित असतांना, गटबाजीला उत आल्याने वरिष्ठांचीही डोकेदुःखी वाढली आहे. मनपा निवडणुकीच्या वेळेस ऐनवेळी शिवसेनेत बदल करण्यात आले होते. त्याचा फटका पक्षाला बसला होता. त्यामुळे वरिष्ठांनीच हा तीढा सोडवावा, अशी वर्तमान पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी फाळके स्मारकाच्या ठेक्यावरून शिवसेना नगरसेवक शिवाजी सहाणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना म्युनिसीपल कामगार सेनेचे प्रमुख असलेल्या सहाणे यांनी फाळके स्मारक कामगारांच्या वेतनावरून तांबडे यांच्या संस्थेची तक्रार केली होती. त्यामुळे तांबडे यांनी थेट आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीकास्र सोडत त्यांचा बोलविता धनी कोणीतरी तिसराच असल्याचे सांगून गटबाजीला तोंड फोडले आहे. सदरील ठेका आपण कधीच सोडला असून सहाणे हे वकील असल्याने त्यांचा आदर करतो. मात्र, त्यांची माहिती अज्ञानातून आली असून शिवसेनेच्या दृष्टीने दुर्दैवी असल्याचा खुलासा त्यांनी दिला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीला वेध नव्या सदस्यांचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २९ फेब्रुवारी रोजी पूर्ण होत असून स्थायीला आता नव्या आठ सदस्यांच्या नियुक्तीचे वेध लागले आहेत. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूक असल्याने स्थायीचे हे शेवटचे वर्ष असेल. त्यामुळे नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात निवडणुकीची तारीख निश्चित होणार आहे.

स्थायी समितीतून दरवर्षी आठ सदस्य निवृत्त होतात. त्यामुळे येत्या २९ फेब्रुवारीला भाजपच्या रंजना भानसी, कुणाल वाघ, आरपीआयच्या ललिता भालेराव, अपक्ष गटाच्या रशीदा शेख, काँग्रेसचे राहुल दिवे, मनसेच्या सुरेखा भोसले, शिवसेनेचे शैलेश ढगे, शोभा फडोळ असे आठ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे या रिकाम्या होणाऱ्या जागांसाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. स्थायी समितीची ही शेवटची टर्म आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थायीत कोट्यवधीचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. नव्या सदस्यांची निवड ही २९ फेब्रुवारी पूर्वीच होणार आहे. त्यामुळे नगरसचिव विभागाने नव्या सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली असून विभागीय आयुक्तालयाकडे संपर्क साधला आहे. त्यामुळे एक-दोन दिवसात निवडणूक तारखांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

तर १५ नवीन सदस्य

स्थायीत दरवर्षी आठ सदस्य निवृत्त होत असले तरी प्रत्येकाला एक वर्ष संधी मिळावी म्हणून पक्ष उर्वरित सदस्यांचे राजीनामे घेऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसच्या विमल पाटील वगळता सर्व सदस्यांना पायउतार व्हावे लागणार आहे. नव्याने १५ सदस्यांची निवड होवून स्थायीला नवे रुप मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेकंड होमचे अर्थकारण

$
0
0

किशोर अहिरे

आतिथ्यक्षेत्रात नजीकच्या काळात सेकंड होम या संकल्पनेने महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आतिथ्याच्या क्षेत्रात सेकंड होमच्या प्रवेशामुळे एक नवे अर्थकारण निर्माण झाले आहे. याची व्याप्ती इतकी मोठी आहे की यात देखील आता नव्या नव्या संकल्पनाचा उदय होतांना दिसतो आहे. हे क्षेत्र गुंतवणुकदार, स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) क्षेत्रातील मोठे उद्योजक, पर्यटक तसेच विविध सेवा पुरवणाऱ्या सेवा क्षेत्रातील कंपन्यांना देखील आकर्षित करते. गेल्या दशकापर्यंत सेकंड होम म्हणजे शहरापासून दूर कुठे तरी निसर्गरम्य ठिकाणी बांधलेले छोटेसे, टुमदार असे सुरेख घर व त्याभोवती विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड येथपर्यंतच मर्यादित होते. परंतु गेल्या दशकभरात या संकल्पनेत मोठ्या प्रमाणात बदल होत गेले.

कुठल्यातरी एकांताच्या ठिकाणी एकटे घर बांधण्यापेक्षा एखाद्या मोठ्या क्षेत्रावर सुनियोजित पद्धतीने सर्व सुविधांयुक्त अशा सेकंड होमच्या प्रकल्पांना लोक अधिक पसंती देऊ लागले आहेत. या सेकंड होमच्या संकल्पनेत झालेल्या मूलगामी बदलास अनेक महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरलेले दिसतात. यात प्रामुख्याने तेथील सुरक्षेचा प्रश्न, तेथील मुलभूत नागरी सुविधा म्हणजे वीज, पाणी, रस्ते यांचा प्रश्न व यासोबतच तेथे थांबल्यावर आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या मनोरंजन करणाऱ्या सुविधांची आवश्यकता हे होत. भारतात सुनियोजित अशा सेकंड होम प्रकल्पांना गेल्या दशकभरात सुरुवात झाली. यात पुण्याजवळ असलेला लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली प्रकल्प, पुण्याच्या खडकवासला, पानशेत धरणांच्या परिसरात उभे राहिलेले भव्य असे सेकंड होम प्रकल्प यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

नाशिक व परिसरात देखील गेल्या दशकभरात या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे राहिलेले दिसतात. यात प्रामुख्याने नाशिक, त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत अत्यंत सुंदर सेकंड होम प्रकल्प मोठ्या प्रमाणात विकसित झालेले दिसतात. कल्पतरू हिल्स, ई.एन.जी ग्रीन व्हॅली, ग्रेप कंट्री यांसारख्या प्रमुख प्रकल्पांची प्रामुख्याने नोंद घ्यावी लागेल. नशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये सेकंड होम संकल्पनेचा अलीकडच्या काळात झपाट्याने विकास होतांना दिसतो आहे. याचे कारण म्हणजे तेथील आल्हाददायक वातावरण, डोंगरदऱ्या, नद्यानाले यांच्यातील विविधता कुठल्याही सेकंड होम घेणाऱ्याला आकर्षित करणारी अशीच आहे. त्यासोबतच नाशिक शहरापासून या परिसरातल्या कुठल्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची उपलब्धता यामुळेच कुठलीही व्यक्ती आपल्या सेकंड होमपर्यंत अर्ध्यातासाच्या आत पोहोचू शकते. या परिसरात विविध संकल्पनांवर आधारित सेकंड होम प्रकल्पांना चांगलीच मागणी आहे. पावसाळ्यात तर हा परिसर अक्षरशः नंदनवनच वाटतो. येथे असलेली पाण्याची मुबलकता देखील तिथल्या विकासास कारणीभूत ठरते आहे. मोठ्या क्षेत्रावरील सेकंड होम प्रकल्प हे लोकांना अधिक आकर्षित करतात. याची कारणे म्हणजे तेथे असलेल्या सुविधांची उपलब्धता वीज, पाणी, रस्ते यासोबतच विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या साधनांमुळे लोक सुटीच्या काळात आपल्या परिवारासोबत राहण्यास पसंती देतात. सेकंड होमच्या प्रकल्पांमध्ये रेस्तराँ, स्विमिंग पूल, कॉन्फरन्स हॉल यासारख्या सुविधांमुळे सेकंड होमच्या मालकांसोबतच, पर्यटन तसेच उद्योग क्षेत्रातील लोकदेखील त्यांच्या कॉन्फरन्स व संमेलनांसाठी याला पसंती देतांना दिसतात.

या सेकंड होममधल्या गुंतवणुकीत अलीकडच्या काळात लोकांचा कल वाढलेला दिसतो आहे. याचे कारण म्हणजे एक तर गुंतवणुकदाराला विशिष्ट अशा क्षेत्राच्या जमिनीचा मालकी हक्क मिळतो. सोबतच सर्व सुविधांयुक्त असे त्याच्या आवडीचे घर तो तेथे बांधू शकतो. तसेच त्याच्या आवडीच्या झाडांची, पालेभाज्या, फुलझाडे यांची लागवड तेथे करू शकतो. त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आवश्यक अशा ठिकाणाची यातून पूर्तता होते. बऱ्याच सेकंड होम प्रकल्पांमध्ये प्रवर्तक कंपनी इतर वेळी तेथे येणाऱ्या पर्यटकांना उपलब्ध करून देतात. हा रेंट-बॅक पर्याय अलीकडच्या काळात सेकंड होम धारकांना आकर्षित करू लागलेला दिसतो. यामुळे ते वापरत नसलेल्या काळात देखील ते घर वापरले जाते व यातून त्यांना अर्थप्राप्ती होते. याचबरोबर त्याची योग्य अशी देखभाल देखील होते. या सगळ्यामुळेच सेकंड होम प्रकल्प ही नवीन पर्यटन क्षेत्रे विकसित होतांना दिसतात. यातून नव्या आतिथ्याच्या नव्या अर्थव्यवस्थेचा उदय होतांना दिसतो. या प्रकल्पांमुळे त्या परिसरातल्या शेतजमिनींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात. याचा फायदा येथील जमीन धारकांना होतांना दिसतो. यामुळे या परिसरात स्थानिकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होते आहे. सोबतच हा परिसर विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी नटतांना पाहायला मिळतो. अत्यंत संरक्षित अशा क्षेत्रात यामुळे आपसूकच जैव-विविधता जपली जाते आहे.

या परिसरात अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा भात, नाचणी, वरई अशा पिकांचे उत्पादन होते. या स्थानिक जातींचा भाताचे जरी योग्य असे मार्केटिंग केले तर या नैसर्गिकरित्या पिकवलेल्या (ऑर्गेनिक) धान्याला येथे येणाऱ्या पर्यटकांसोबतच सेकंड होम धारकांकडून देखील मोठी मागणी वाढू शकते. या परिसरातल्या जंगलात येणाऱ्या करवंद, जांभूळ, आंबा अशा रानमेव्याची तसेच पावसाळी भाज्या जर येथे येणाऱ्या पर्यटकांना तसेच प्रवाशांना जर आपण उपलब्ध करून दिल्या तर यातून स्थानिक तसेच आदिवासी कुटुंबांना चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते.

त्र्यंबकेश्वर परिसर व इगतपुरी परिसर या भागात सेकंड होम प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्यामुळे या भागाची अर्थव्यवस्थाच बदलून गेली. तसेच आता वैतरणा धरण क्षेत्राला लागूनच असलेल्या परिसराचा या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात विकास होईल असे दिसते आहे. सेकंड होम या क्षेत्राने संधीचे नवीन दालनच खुले केले आहे. फक्त गरज आहे ती आपण या अर्थकारणात आपला वाटा निर्माण करण्याची.

(लेखक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा आतुरला भुजबळांच्या भेटीसाठी!

$
0
0

समर्थक, कार्यकर्ते नाराज; नाशिक भेटीची अपेक्षा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संकटात सापडलेल्या माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी मुंबई विमानतळावर शक्तीप्रदर्शन केले. या समर्थकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी भुजबळांकडून तातडीने नाशिक दौरा अपेक्षित होता. परंतु, भुजबळांना मुंबईत येवून आठवडा झाला तरी ते नाशिकमध्ये फिरकले नसल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी चिंतेत सापडले आहे. भुजबळांनी नाशिकमध्ये येवून समर्थक व कार्यकर्त्यांचे बळ वाढवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आर्थिक गैरव्यवहारावरून भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ सध्या 'ईडी'च्या अटकेत आहेत. सोबत पंकज भुजबळही चौकशीच्या फेऱ्यात आहे. तर भुजबळांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. समीरच्या अटकेने थेट भुजबळ विरुद्ध केंद्र व राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा संकटातही गेल्या मंगळवारी अमेरिकेहून परतलेल्या छगन भुजबळांच्या पाठीशी नाशिकमधील त्यांचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वागतासाठी थेट मुंबईत गेले. आपल्या समर्थकांच्या माध्यमातून भुजबळांनी सरकारसह पक्षालाही ताकद दाखवली.

संकटाच्या काळात नाशिकमधील त्यांचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने करत पोलिसांच्या लाठ्या काठ्या झेलल्या. त्यामुळे भुजबळांनी लागलीच त्यांच्या समर्थकांच्या पाठीशीही भुजबळांनी तात्काळ उभे राहून नाशिकचा दौरा करणे अपेक्षित होते. विशेषत: येवल्यातील त्यांचे समर्थक व मतदार त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, भुजबळ यांना मुंबईत येवून आठवडा लोटला तरी भुजबळ नाशिककडे फिरकले नाहीत. नाशिक व येवल्यात येवून भुजबळांनी समर्थक व कार्यकर्त्यांचे बळ वाढवतील अशी अपेक्षा होती. मात्र, भुजबळांनी मुंबईतच तळ ठोकल्याने समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे भुजबळ समर्थक आता भुजबळांच्या नाशिक दौऱ्याची वाट पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सद्भावना रॅलीतून मानवतेचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांप्रतीच्या संवेदना जपणे हीच खरी मानवता असून सदभावना हाच समाजात शांती प्रस्थापित करण्याचा मार्ग असल्याचा संदेश सद्भावना रॅलीमधून देण्यात आला. मानवधर्म प्रणेते सदगुरूदेव श्री सतपालजी महाराज यांच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सातपूर कॉलनी परिसरात दोन दिवसीय सदभावना संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सातपूर कॉलनी, सावरकरनगर परिसरातून ही सद्भावना रॅली काढण्यात आली. आपण कोणत्याही धर्माचे असण्यापूर्वी सर्वप्रथम मानव आहोत या विचारधारेला मानणारे शहरातील शेकडो मानवधर्म प्रेमी या रॅलीमध्ये सहभागी झाले. नगरसेवक सलीम शेख यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.

श्री हंस कल्याण धामच्या प्रबंधक साध्वी आराधनाजी, साध्वी प्रियंवदाजी आदींच्या मार्गदर्शनाखाली सातपूर कॉलनीतील नवीन पाण्याच्या टाकीजवळील समाज मंदिरापासून रॅली मार्गस्थ झाली. हिंदु, मुस्लिम, सीख इसाई आपस में सब भाई भाई, हमारा देश कैसा हो रामराज्य जैसा हो, विश्व शांती कैसे होगी केवल आत्मज्ञान से यांसारख्या घोषणा देऊन मानवधर्म प्रेमींनी सद्भावनेचा संदेश दिला. मौले हॉल, निळकंठेश्वर मंदिर, सावरकर नगरमार्गे पुन्हा समाज मंदिराजवळ रॅलीचा समारोप झाला. यावेळी अध्यात्मावर आधारित प्रवचनांचा लाभ भाविकांनी घेतला. दुसऱ्या दिवशीही भाविकांनी सत्संगाचा लाभ मिळाला. त्यानंतर संमेलनाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक जिमखान्याच्या क्रीडा महोत्सवाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिमखान्यातर्फे दरवर्षीप्रमाणे वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. शिवछत्रपती पुरस्कारविजेते शेखर भंडारी यांच्या हस्ते लॉन टेनिस स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. उद्‍घाटनप्रसंगी नाशिक जिमखाना, व्यवस्थापक संजय मराठे, जयंत कर्पे, भारत दाभाडे आदींसह खेळाडू व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत बिलियर्ड्‍स व स्नूकर या खेळात ओपन स्नूकर, हँडीकॅप स्नुकर व ओपन बिलियर्ड्‍स या स्पर्धा सुरू आहेत. १० व १२ वर्षांखालील मुले व मुली यांच्या टेनिस स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली, तर १४ वर्षांखालील मुले व मुली यांचे सामने सकाळच्या सत्रात खेळविले जाणार आहेत.

बॅडमिंटनच्या सर्व गटातील स्पर्धा सकाळच्या सत्रात सुरू होतील. टेबल टेनिस स्पर्धा १७ फेब्रुवारी व बुद्धिबळ रॅपिड स्पर्धेला २१ फेब्रुवारी रोजी सुरुवात होईल. या स्पर्धा विविध वयोगटांत खेळवल्या जाणार आहेत. विजयी खेळाडूंना विशेष पारितोषिके व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा शाळांमधील विद्यार्थी होणार टेक्नोसॅव्ही

$
0
0

शिक्षकच तयार करणार ई-लर्निंगचे सॉफ्टवेअर

ashwini.kawale @timesgroup.com

नाशिक : हलके दप्तर, तंत्रज्ञानाशी नाळ जोडण्याची गरज, शाळांचा विकास या सर्वांसाठी सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा 'ई-लर्निंग'ला प्राधान्य देत आहेत. मनपाच्या शाळांनीही तंत्रज्ञानाच्या या वाटेवर प्रवास सुरू केला खरा, मात्र तो पूर्ण होण्यापूर्वीच संपला. शाळांमधील तंत्रज्ञानाचा हाच प्रवास मजबूत करण्यासाठी आता थेट मनपा शाळांचे शिक्षक विडा उचलणार आहेत. तंत्रज्ञानाची कास धरुन ते स्वतः विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगचे सॉफ्टवेअर तयार करणार आहेत.

शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरल्यास विद्यार्थ्यांना आपोआपच त्याचे ज्ञान मिळेल, तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज, अभ्यासक्रम यांची माहिती असल्याने शिक्षकांचा सहभाग सॉफ्टवेअर निर्मितीत अग्रगण्य ठेवण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेने ई-लर्निंगसाठी खास सॉफ्टवेअर लाखो रुपये खर्च करुन विकत घेतले होते. मात्र हे सॉफ्टवेअर शिक्षणक्षेत्राची जाण नसलेल्यांनी तयार केली असल्याची तक्रार केली गेली. त्यातच इयत्ता तिसरी व चौथीचा अभ्यासक्रमही बदलल्याने हा खर्चही वाया गेला आणि हे सॉफ्टवेअर केवळ नावापुरते उरले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याप्रकारची परिस्थिती समोर आली होती. परिणामी, विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित ठरले.

यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेतर्फे घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व शिक्षा अभियानातील समावेशित शिक्षक या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स)चे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. यासाठी अद्याप राज्यातील २० हजार ४८७ शिक्षकांनी नोंदणी केली आहे. विद्या परिषदेकडून निवडलेले तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद व महारपालिकेतील शिक्षकांना या सॉफ्टवेअरसाठी दोन दिवसांचे रितसर प्रशिक्षण दिले जाणार आहे. मार्चअखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकणार आहेत.


संशोधनातून होणार निर्मिती

ई-लर्निंग सॉफ्टवेअर निर्मिती करुन घेण्यासाठी 'संशोधन' ही जमेची बाजू असणार आहे. इंटरनेटवरील सॉफ्टवेअर्सचा अभ्यास, ज्या शाळांमध्ये ई-लर्निंग उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे, अशा शाळांना भेटी, कॉम्प्युटर तज्ज्ञांशी विचारविनिमय अशा अनेक बाबींच्या संशोधनातून या सॉफ्टवेअरची निर्मिती शिक्षक करणार आहेत.



विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख शालेय वयापासूनच व्हावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. शिक्षकांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजी, आजोबा अन् नातवंडांची धमाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजी आजोबा आणि नातवंडं असं उबदार नातं, तीन पिढ्यांच्या घट्ट बंधनात टिकून असतं. आजी-आजोबा व नातवंडे यांच्यातील अनामिक प्रेमाला उजाळा देण्यासाठी व्हॅलेंटाइन डे या प्रेम अधोरेखित करणाऱ्या दिवशी आजी आजोबा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.

आजी आजोबा हे जगातील पहिले विकिपीडिया असल्याचे सांगत तरुणांनी घडवून आणलेल्या आजी आजोबा कृतज्ञता सोहळा या अनोख्या उपक्रमाचे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कौतूक केले. गंगापूर रोडवरील स्व. प्रमोद महाजन उद्यान येथे नातवंडं आणि आजी-आजोबा यांचे नाते दृढ करण्यासाठी सनविवि, एकनिष्ठ व नमस्कार फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त डॉ. गेडाम यांची उपस्थिती होती. तसेच सचिन जोशी, आमदार देवयानी फरांदे, प्रा. सुहास फरांदे, सीताबाई मोरे, समुपदेशक डॉ. संदीप भानोसे, नंदकुमार भुतडा, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांची कार्यक्रमात उपस्थिती होती.

यावेळी सचिन जोशी यांनी आपल्या आजी आजोबांच्या आठवणींना उजाळा देत आजी आजोबांबद्दल प्रेमभाव व्यक्त केला. तसेच कार्यक्रमाच्या सेलिब्रिटी ठरलेल्या सीताबाई मोरे यांनी आजी आजोबांनी वार्धक्याने खचून न जाता आनंदाने आयुष्य जगण्याचा सल्ला उपस्थितीतांना दिला तसेच ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी आजी आजोबा यांच्यात संवाद घडवून आणून त्यातून आजी आजोबा, नातवंडं तसेच कुटुंब पद्धती यातील विविध गोष्टींचा उलगडा केला. गीता माळी यांनी गायलेल्या गीतांवर आजी आजोबांनी आपल्या नातवंडांसमवेत ठेका धरला. आजी आजोबांनी समवेत फुगड्या खेळून आनंद लुटला.

या कार्यक्रमाला नाशिक शहरातील आजी आजोबा आपल्या नातवंडांसमवेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सनविविचे धीरज बच्छाव, एकनिष्ठचे योगेश गांगुर्डे आणि नमस्कारचे हर्षल खैरनार यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पसच्या सुरक्षेसाठी हवी प्राचार्यांमध्ये एकजूट

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

गोखले एज्युकेशन कॅम्पसमधील काही कॉलेजेसमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेली गुंडागर्दी आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने सोमवारी आरवायके कॉलेजात विद्यार्थी सभेची ब्रीफ म‌िट‌िंग पार पडली. यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये असलेल्या एचपीटी आरवायके, एसएमआरके, एनबीटी लॉ, गोखले इंजिनीअरिंग, बिवायके, फार्मसी, इंटरपरिनिअरशीप कॉलेजेसच्या प्राचार्यांचे यासाठी एकमत झाल्यासचं या कार्यवाही यशस्वीपणे राबविल्या जाऊ शकते असाही सूर यावेळी प्रकटला.

उपप्राचार्य यांच्या कार्यालयात ही मिटिंग पार पडली. यात प्रामुख्याने कॉलेजच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला गेला. कॉलेजच्या आवारात सातत्याने घडणाऱ्या मारामाऱ्या, सीसीटीव्हींची दुरूस्ती, लेडीज रूमसाठीच्या सुविधा या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या सर्व मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना पार्किंगसाठी स्ट‌िकर सिस्ट‌िम सुरू करणे, कॉलेजियन्स व्यक्तिरिक्त येणाऱ्याना काम विचारून गेट पास देत त्याची योग्य शहानिशा करणे, कॉलेजमध्ये असलेला सिक्युरिटी स्टाफ महिन्याला बदलण्यात यावा, यासोबतच ड्रेस कोड ठरवत पार्किंग उपलब्ध करून देऊन त्यानुसार फॉलोअप घेणे, असे कार्यवाहीचे निकष मांडण्यात आले. हे निकष आंमलात आणण्यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसनी यासाठी पाठिंबा दर्शवल्यास हे शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश ताजने सहावा

$
0
0

गणेश ताजने सहावा अखिल भारतीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळगाव येथे ९ ते १४ पेब्रुवारी दरम्यान झालेल्या अखिल भारतीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकचा आंतरराष्ट्रीय मानांकीत खेळाडू गणेश ताजनेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सहावा क्रमांक पटकावत सात हजारांचे बक्षीस जिंकले.

जळगावच्या स्पर्धेत तीन आंतरराष्ट्रीय मास्टरसह शंभर आंतरराष्ट्रीय मानांकीत खेळाडू सहभागी असूनसुद्धा गणेशने या स्पर्धेत चमक दाखविली तर दिल्लीच्या स्पर्धेत भारतासह आशियाई देशातील एकूण सहाशे खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी ५३८ खेळाडू आंतरराष्ट्रीय मानांकीत होते. स्पर्धा अतिशय अटीतटीच्या झाल्या. तरीसुद्धा गणेशने आत्मविश्वास कायम ठेवून यश मिळविले. त्याने या स्पर्धेमधून तब्बल शंभर एलो रेटिंग गुणाची कमाई केली. त्याअगोदर दिल्ली येथे झालेल्या १४व्या आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर (बी ग्रुप) बुद्धिबळ स्पर्धेत त्याने १३वा क्रमांक मिळवला व रोख १५ हजारांचे बक्षीस जिंकले. तो शताब्दी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असून गेल्या वर्षीपासून तो विविध राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन उल्लेखनीय यश मिळवत आहे. बुद्धिबळचे प्रशिक्षण तो नाशिकचे राष्ट्रीय खेळाडू व नामवंत प्रशिक्षक विनोद भागवत व तुषार गोसावी यांच्याकडे घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images