Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 49119

पाणीटंचाईची सोसवेना झळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीकरांना अभूतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मार्च महिन्यातच पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. मार्चमध्येच चार टँकरने देवळालीकरांना पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, पाणी जपून वापरा, असे कळकळीचे आवाहन केले जात आहे. देवळालीसह लष्करी भागावर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. प्रशासनाने देवळालीच्या सहा चाळ, हाडोळा, कॅथे कॉलनी, स्टेशनवाडी, साठे नगर परिसरात चार टँकरने सकाळी ११ वाजेपासूनच पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ केला. त्यासाठी बोर्डाच्या ताब्यात असलेल्या चार विहिरींमधून टँकरद्वारे गरजू भागात पाणी पोहचविण्यात येत आहे. या टँकमधून किमान दिवसभरात १० लाख लिटर पाण्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक वार्डासाठी आज दि. २० पासून स्वतंत्र टँकरची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती बोर्ड प्रशासनाचे जलअभियंता आर. सी. यादव यांनी दिली. २७ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी. टंचाई काळात महत्त्व ओळखून पाणी जपून वापर करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी केले आहे.

स्वखर्चातून पाणीवाटप लामरोड युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोडसे व त्यांच्या पत्नी नगरसेविका आशा गोडसे यांनी स्वखर्चातून वार्ड क्रमांक चारमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने खासगी टँकरद्वारे ओम शांती नगर, ६ नं. नाका, साकूरकर चाळ, विठ्ठलवाडी, लामरोड आदी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.

सहाचाळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांसाठी टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापुढेही टंचाईत मदत करावी. - संगीता जाधव, नागरिक

पाणीटंचाई ओळखून बोर्डाने किमान प्रत्येक घराला २०० लीटर पाणी उपलब्ध होईल, अशी सोय करावी. यामुळे टंचाईची झळ कमी होईल. - सुनीता आडके, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 49119

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>