Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

छगन भुजबळांच्या समर्थनार्थ मूक मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये पावसाच्या सरी कोसळत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीत त्यांचे लाखो समर्थक सोमवारी रस्त्यावर उतरले. ओबीसी बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवत भुजबळांवरील कथित अन्यायाचा मूक मोर्चाद्वारे निषेध नोंदवून शांत व शिस्तबद्ध मोर्चा काढून सरकारला जाब विचारला. राज्य सरकार सूड बुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करतानाच, ओबीसींचा देशातील विक्रमी मोर्चा ठरल्याचा दावा संयोजन समितीने केला.

आठवडाभरापूर्वीच मराठा समाजाने शहरातून विराट मोर्चा काढला. त्याचवेळी ओबीसी बांधवांनी मोर्चाची जय्यत तयारी सुरू केली. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आल्याने सर्वांचेच त्याकडे लक्ष लागले. शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. पावसाची तमा न बाळगता केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले. महिला, मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय होती.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना विविध जाती धर्माच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर एका समर्थकाने मोर्चेकऱ्यांसमोर निवेदनाचे वाचन केले. राष्ट्रगिताने मोर्चाची सांगता झाली.

बीडमध्ये २० ला मोर्चा

भुजबळांच्या समर्थनासाठी ओबीसी समाजाच्या वतीने मराठा मोर्चांच्या धर्तीवर नाशिकपाठोपाठ अन्य जिल्ह्यांतही मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील भुजबळ समर्थक मोर्चांमध्ये बीड येथे येत्या २० ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुजबळ समर्थक एकवटले

$
0
0

नाशिकमध्ये पावसाच्या सरी कोसळत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीत त्यांचे लाखो समर्थक सोमवारी रस्त्यावर उतरले. कोणतीही तमा न बाळगता लाखो ओबीसी बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवत भुजबळांवरील कथित अन्यायाचा मूक मोर्चाद्वारे सोमवारी निषेध नोंदविला. शांत व शिस्तबध्दपणे मोर्चा काढून सरकारला जाब विचारला. राज्य सरकार सूड बुध्दीने कारवाई करीत असल्याचा आरोप करतानाच, ओबीसींचा देशातील विक्रमी मोर्चा ठरल्याचा दावा संयोजन समितीने केला.

आठवडाभरापूर्वीच मराठा समाजाने शहरातून विराट मोर्चा काढला. त्याचवेळी ओबीसी बांधवांनी मोर्चाची जय्यत तयारी सुरू केली. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आल्याने सर्वांचेच त्याकडे लक्ष लागले. शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. पावसाची तमा न बाळगता केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले. महिला, मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय होती.

बहुजन व ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून छगन भुजबळ यांनी ओळख प्रस्थापित केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ भर पावसात निघालेल्या विराट मूक मोर्चात सर्व जातीधर्मातील १५ लाख नागरिक सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला. मात्र, अडीच ते तीन लाख बांधव सहभागी झाले असावेत, असा अंदाज पोलिस प्रशासनाने व्यक्त केला. दुपारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

तपोवन येथील स्वामीनारायण मंदिरापासून चव्हाण मळा, आठवण लॉन्स मार्गे तपोवन कॉर्नर, आईस फॅक्टरी, काट्या मारुती मंदिर, जुना आडगाव नाका, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बस स्थानक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चेकरी आले. यावेळी मोर्चाचे दुसरे टोक पंचवटीत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना विविध जाती धर्माच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर एका समर्थकाने मोर्चेकऱ्यांसमोर निवेदनाचे वाचन केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.

बीडमध्ये २० ला मोर्चा
भुजबळांच्या समर्थनासाठी ओबीसी समाजाच्या वतीने मराठा मोर्चांच्या धर्तीवर नाशिकपाठोपाठ अन्य जिल्ह्यातही मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील भुजबळ समर्थक मोर्चांमध्ये बीड येथे येत्या २० ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जिल्ह्यातच मोर्चा काढून सरकावर दबाव टाकला जाणार आहे. या मोर्चाबाबत मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कानावर हात ठेवले आहेत. या मोर्चासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे सांगून त्यांनी माहिती घेऊन बोलतो, असे उत्तर दिले आहे.

मोर्चा एक तास आधी...
मोर्चाची वेळ दुपारी एकची होती. मात्र, सकाळी १०.३० पासून शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. तरीही स्वामी नारायण मंदिराच्या दिशेने मोर्चेकऱ्यांचा ओघ सुरूच होता. पावसातही मोर्चेकरी रस्त्यातच थांबून होते. त्यामुळे दुपारी बारा वाजताच मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तसेच पावसामुळे नियोजित वेळेआधीच मोर्चाची सांगता झाली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या मोर्चेकऱ्यांचा ओघ मोर्चा संपल्यानंतरही सुरू होता. त्यामुळे अनेकांना पंचवटी परिसरातूनच माघारी परतावे लागले.

घोषवाक्यांनी वेधले लक्ष्य
मोर्चात सहभागी समर्थकांच्या हातात छगन भुजबळ यांचे छायाचित्र तसेच झेंडे व घोषवाक्य असलेले फलक होते. काही मोर्चेकरी काळ्या फिती लावून मोर्चात सहभागी झाले. अनेक समर्थकांनी ‘मी भुजबळ’ असे नाव असलेल्या टोप्या तर काहींनी भुजबळ यांच्या चेहऱ्याचे मुखवटे परिधान केले होते. विविध जिल्ह्यांमधून सहभागी झालेल्या समर्थकांनी हातात त्यांच्या जिल्ह्याचे फलक घेतले होते. विविध घोषवाक्य नागरिकांचे लक्ष वेधत होते.

महापुरुषांचा लक्षणीय पेहेराव
छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या विराट मूक मोर्चामध्ये काही बालकांनी महापुरुषांचा पेहराव केला होता. हे सर्व चिमुकले मोर्चाच्या मध्यभागी वाहनातून चालले होते. अपंग समर्थकांचाही मोर्चात लक्षणीय सहभाग होता.

मोर्चात वैद्यकीय सुविधा
मोर्चात सहभागी मोर्चेकऱ्यांच्या सुविधेसाठी प्रथमोपचारांची व्यवस्था करण्यात आली होती. ८० डॉक्टर, १३ रुग्णवाहिका मोर्चेकऱ्यांच्या सोयीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी मदत केंद्र तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

मोर्चेकऱ्यांनी घडविले शिस्तीचे दर्शन
मूक मोर्चा असल्याने सर्व ओबीसी बांधवांनी शिस्तीचे दर्शन घडविले. कोणत्याही घोषणा न देता मोर्चकरी शांतेतेचे दर्शन घडवित होते. पाऊस असूनही मोर्चात सहभागी अबालवृध्दांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. संपूर्ण मार्गावर लाऊड स्पीकरचा वापर करून मोर्चेकऱ्यांना सूचना देण्यात येत होत्या.

मोर्चानंतर मार्गाची स्वच्छता...
मोर्चा आटोपल्यानंतर तपोवन येथील साधुग्राम, आठवण लॉन्स, जी. टी टायर कॉर्नर, आडगाव नाका, निमाणी बस स्टॅण्ड, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बसस्थानक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नल, जिल्हा अधिकारी कार्यालय हा सर्व मार्ग स्वयंसेवकांनी स्वच्छ केला.

आंदोलनकर्ते चुकले मार्ग!
भुजबळ समर्थकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला तेव्हा येथे मोठी गर्दी झाली. सीबीएस चौकापासून मेहेरपर्यंत आंदोलनकर्ते पावसात थांबून होते. कोर्टाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्यांचा तेच जिल्हाधिकारी कार्यालय असल्याचा समज झाला. ते थेट प्रवेशद्वार ओलांडून कोर्टात जाऊ लागले. ही बाब सरकारवाडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक शंकर कोल्हे यांच्या लक्षात आली. त्यांनी मोर्चेकऱ्यांना रोखले. यावेळी कोर्टाच्या प्रवेशद्वारावरील पोलिस कर्मचारी पावसामुळे चौकीत बसले होते.

अधिकाऱ्यांची पोलिसांकडून अडवणूक
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीदिनाचे आयोजन केले होते. सर्व विभागांचे अधिकारी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत होते. परंतु, त्यांना पोलिस प्रवेशद्वारावरच अडवित होते. स्वतःचे ओळखपत्र दाखवूनही पोलिस अधिकारी त्यांना प्रवेशद्वारावरच ताटकळत उभे ठेवत असल्याचे पहावयास मिळाले. प्रवेशद्वार उघडणे, बंद करणे आमचे काम नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात होते.

येवल्यातून भुजबळ समर्थक सहभागी
येवला : येवला तालुक्यातून मोठया संख्येने भुजबळ समर्थकांनी नाशिकच्या मोर्चात हजेरी लावली. सोमवारी सकाळी तालुक्याच्या विविध भागातून नाशिकच्या दिशेने असंख्य वाहने धावताना दिसत होती. येवला शहरातील भुजबळ संपर्क कार्यालयापासून देखील सकाळी असंख्य वाहने नाशिकला रवाना झाली. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने भुजबळ समर्थक नाशिकच्या मोर्चात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची मत्सरापोटी भुजबळांवर कारवाई

$
0
0

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबीयांवर काही हितशत्रूंनी वैयक्तिक आकस, मत्सरापोटी व राजकीय वैमनस्यातून कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या विरोधात बनावट व खोटे साक्षीदार उभे करून तपास यंत्रणांना चुकीची माहिती पुरविली जाते आहे. ही माहिती कायद्याच्या चौकटीवर कधीच खरी ठरणार नाही. लाखो भुजबळ समर्थकांची ही भावना जिल्हाधिकारी म्हणून सरकारदरबारी पाठवावी, असे निवेदन ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना सोमवारी देण्यात आले.

ओबीसी बांधवांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकल्यानंतर राधाकृष्णन यांना निवेदन देण्यात आले. मुक्ताबाई मोटकरी, सुगंधा टोपले, जी. जी. चव्हाण, मधुकर जेजुरकर, अ‍ॅड. जालिंदर ताडगे, हाजी शाह, ज्ञानेश्वर शेवाळे, गोपीचंद पगारे, वसंत दुकळे, सुगंधा टोपले, अशोक सूर्यवंशी, मनोहर कोरडे यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यापूर्वी त्याचे जाहीर वाचन करण्यात आले. भुजबळ यांच्या विरुद्ध पद्धतशीर राजकीय कट व त्याद्वारे त्यांचे चरित्रहनन करण्याची नियोजनबद्ध साखळी व प्रयत्न झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाची जाणीवपूर्वक नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच मराठा व अन्य समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. परंतु, ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका निवेदनातून व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळाने दिलेले निवेदन आणि मोर्चाची माहिती सरकारस्तरावर कळवली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मोर्चाचे सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केले.

पंकज भुजबळ यांनी मानले आभार
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात देशभरातून सहभागी झालेल्या लाखो समर्थकांचे आमदार पंकज भुजबळ यांनी आभार मानले. एवढ्या पावसात भुजबळांना समर्थन देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर दिल्ली, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात यासारख्या राज्यांतूनही समर्थक आले. अतिशय शांतपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा पार पडला. भुजबळ संपलेले नाहीत, ते एकटे नाहीत हे मोर्चेकऱ्यांनी दाखवून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या फलकांनी वेधले लक्ष
- एकच वादळ, छगन भुजबळ
- न्याय हक्कासाठी हा एल्गार, हा लढा नेणार आर या पार
- मुंडे साहेब आपण असता तर भुजबळांवर ही वेळ आली नसती
- मोर्चा नाही शक्ती आहे, नाशिक फक्त निमित्त आहे.
- जमलो फक्त साहेबांसाठी, त्यांनी दिलेल्या समतेच्या विचारांसाठी
- अन्यायाने अटकेत टाकणाऱ्या सरकारचा धिक्का असो
- नवे पर्व, ओबीसी सर्व
- नाही कोणत्या जातीसाठी, नाही कोणत्या समाजासाठी
- साहेबांचा लढा सर्वसामान्यांच्या विचारासाठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोर्चांना सूडाग्नीच कारणीभूत’

$
0
0

मुस्लिम बांधवांना आरक्षण द्यावे असे कोर्टाने सांगूनही सरकारने त्यांना आरक्षण डावलले. मराठा समाजाने कधीही अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी मागणी केली नाही; तरीही तसा अपप्रचार केला गेला. बहुजनांना डावलणे हे सूडाचे आणि क्रोधाचे राजकारण असून ते केले जात आहे. हा सूडाग्नीच मोर्चांना कारणीभूत ठरला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी नाशिकमध्ये केला.

मराठा समाज आमचा मोठा भाऊ असून त्यांना आरक्षण मिळायलाच हवे, अशी भावनाही आव्हाड यांनी व्यक्त केली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे समतावादी विचाराचे नेते असून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा दावाही त्यांनी केला. भुजबळ हे साडेसहा महिन्यांपासून कारागृहात आहेत. राज्य सरकार त्यांना सूडभावनेने वागवित असल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातून मुक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये आव्हाडदेखील सहभागी झाले.

‘मराठा समाज मोठा भाऊ’
मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे. सर्वात जास्त अल्पभूधारक शेतकरी तसेच अल्प उत्पन्न असलेले लोक मराठा समाजात आहेत. आरक्षण मिळणे हा मराठा समाजाचा हक्क व अधिकार आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

ओबींसींनी कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, अशी मागणी केलेली नाही. किंवा मराठा समाजाने ओबींसींच्या हक्काचे आरक्षण कधी मागितलेले नाही. याउलट सर्व समाज आपापल्या हक्कांसाठी एकत्रित येऊ लागले आहेत. विखुरलेले समाज एकत्र येताहेत याचा आनंद आहे. मराठा, ओबीसी आणि दलितांचा आपापसात संघर्ष नाही. असा संघर्ष कुणी पेटवू शकत नाही. परंतु, हा संघर्ष आपोआप पेटविला जातो आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. कुणाच्या हक्कांवर गदा आणली जाणार असेल तर मोर्चे निघणार, असे आव्हाड यावेळी म्हणाले. सामाजिक व्यवस्थेतून आम्हाला उध्वस्त करत आहेत, अशी भावना समाजमनाची होऊ लागल्याने त्याचे पडसाद अशा मोर्चांमधून उमटते आहे.

‘कोण उदयनराजे?’
उदयनराजे भोसले मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करीत आहेत. ओबीसी मोर्चाचे नेतृत्व कोण करीत आहे, अशी विचारणा आव्हाड यांना करण्यात आली. त्यावेळी ‘कोण उदयनराजे?’ असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. मराठा बांधवच मराठा समाजाचे नेतृत्व करीत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा क्रांती मोर्चात सर्व कार्यकर्ते आहेत कुणीही नेता नसल्याचे ते म्हणाले. ओबींसींच्या या मोर्चात पाच ते दहा हजार मुस्लिम बांधव, अठरापगड जातींचे बांधव सहभागी झाले आहेत. ते सर्वच नेतृत्व करीत असून पुढील दिशाही तेच ठरवतील असे आव्हाड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकार कुणालाच आपलं वाटत नाही’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील बहुजनांसह अठरापगड जातींना युतीचे सरकार आपलेसे वाटत नाही. त्यामुळे जनतेमध्ये प्रंचड नाराजी आहे. ती खदखद मोर्चांच्या माध्यमातून अठरापगड जनता रस्त्यावर उतरून व्यक्त करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

भुजबळांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या समर्थन मोर्चात धनंजय मुंडेदेखील सहभागी झाले. मोर्चानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी मोर्चाची भूमिका व राज्य सरकारमध्ये जनतेमध्ये असलेल्या असंतोषावर भाष्य केले. मोर्चात भुजबळांच्या सुटकेशिवाय दुसरी मागणी नाही; परंतु तरीही काही जणांकडून ओबीसी मोर्चा विरुद्ध मराठा मोर्चा असा तर्क लावून भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे जनतेने सावध असावे. असे आवाहन मुंडे यांनी केले. तसेच पंकजा मुंडे यांना भुजबळांबद्दल ऐवढ प्रेम होत तर किरीट सोमय्या यांना आवर का घातला नाही, असा प्रश्न मुंडे यांनी पंकजा यांना विचारला आहे.

भुजबळप्रेमापोटी जनता रस्त्यावर
ओबीसी समाजाचा मोर्चा म्हणजे न्याय व्यवस्थेवर दबावतंत्र नाही. भुजबळांवर प्रेम दाखवण्यासाठी राज्यातील जनता या मोर्चात सहभागी झाली आहे. परंतु, काही जण या मोर्चाला मराठा विरूद्ध ओबीसी असा तर्क लावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाला ओबीसींचा पाठिंबा आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावताही त्यांना आरक्षण दिले पाहिजे. आघाडी सरकारने ज्या पद्धतीने आरक्षण दिले त्याच पद्धतीने आरक्षण कायम ठेवले पाहिजे, असे मत मुंडे यांनी मांडले. राज्यात निघणाऱ्या मोर्चांमधून अनेक अर्थ काढले जात आहे.राज्य सरकारकडून अनेकांना टार्गेट केले जात आहे. सरकार व व्यवस्थेविरुद्ध बहुजन समाजासह अठरापगड जातींमध्ये असंतोष आहे. म्हणूनच जनता रस्त्यावर उतरल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला आहे. भुजबळांच्या समर्थनासाठी निघालेल्या मोर्चात केवळ ओबीसीच नव्हे, तर सर्व समाजातील भुजबळांवर प्रेम करणारे नागरिक सहभागी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

तर सोमय्यांना आवरले असते
धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भुजबळ भेटीवरही टीकास्र सोडले. पंकजा यांचे भुजबळांप्रति एवढेच प्रेम होते, तर त्यांनी खासदार किरीट सोमय्या यांना आवरले असते, अशी बोचरी टीका केली आहे. आता स्वतः सरकारमध्ये टार्गेट होत असल्यानेच त्यांनी भुजबळावर प्रेम दाखवल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पकंजावर केली आहे. एवढा उशिरा प्रेम दाखवून काय फायदा, असा प्रश्न मुंडे व आव्हाड यांनी पंकजाच्या भेटीची खिल्ली उडविली.

धनंजय मुंडेंचा यू-टर्न
पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला हा मोर्चा ओबीसींचा असल्याचा दावा केला. परंतु, पत्रकारांनीच त्याला हा मोर्चा ओबीसींचा की भुजबळ समर्थकाचा असा प्रश्न विचारल्यावर मुंडेची बोबडी वळली. आपली भूमिका मागे, घेत या मोर्चात मुस्लिमांसह इतर समाजही सहभागी झाल्याचा दावा करत, भुजबळ समर्थकांचा मोर्चा अशी कबुली दिली. ओबीसी विरुद्ध मराठा अशा वाद निर्माण केला जाऊ शकतो, यावर अगोदरच खुलासा का असे विचारल्यावर मुंडे गडबडले. मोर्चाचा विपर्यास काढला जाऊ शकतो, म्हणूनच अगोदरच स्पष्टीकरण दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलनीती संपविण्याचा कुटील डाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी आपल्या अटी-शर्ती मान्य केल्या नाहीत तर त्यांची हरप्रकारे कोंडी करण्याची खेळी भाजप सरकारकडून केली जात आहे. संघाच्या ब्राह्मणवादावर श्रद्धा असलेल्या भाजप सरकारकडून मंडलवाद विचारसरणीच संपविण्याचा कुटील डाव खेळला जात असल्याची भावना ओबीसी मूक मोर्चातील समाजबांधवांनी व्यक्त केली.

बेहिशेबी मालमत्ता आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपावरून आमदार छगन भुजबळ सध्या ‘ईडी’च्या कारागृहात आहेत. त्यांच्यावर राजकीय आकसातून कारवाई केली जात असल्याची खदखद मोर्चात सहभागी झालेल्या अभ्यासू मंडळींनी व्यक्त केली आहे. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने आपल्याच पक्षातील नेत्यांना सोडले नाही. माजी मंत्री छगन भुजबळ तर विरोधी पक्षातील आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये आपले म्हणणे ठामपणे मांडण्याची किंमत एकनाथ खडसे यांना मंत्रिपद गमावून करावी लागली. पंकजा मुंडे-पालवे आणि विनोद तावडे यांची मंत्रिपदे बदलण्यात आली. हे कसले लक्षण आहे, असा प्रश्न ओबीसी मोर्चातील मंडळींनी केला. आताही भुजबळांवर सुरू असलेली कारवाई हे त्याचे उदाहरण मानता येईल.

भाजप सरकारपुढे भुजबळ झुकणार नसल्याने या कारवाईला भुजबळ यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यातील काही बड्या नेत्यांची देखील भाजपला साथ असल्याचा दावा काही ज्येष्ठ मंडळींनी केला आहे. वयाची पासष्टी पार केलेल्या काही मंडळींनी ओबीसी लढ्याचे समर्थन केले. या मोर्चाकडे मराठा समाजाला प्रतिमोर्चातून दिलेले उत्तर म्हणून बघू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मराठा मोर्चाच्या मागण्या वेगळ्या आहेत. त्यांच्या आंदोलनाशी ओबीसी मोर्चाचा कोणताही संबंध नाही. मराठा मोर्चा नेतृत्वविरहीत संघटन होते, तर ओबीसी मोर्चा भुजबळ यांच्या समर्थनार्थ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप नेतृत्वाकडून समाजातील मराठा, मुस्लिम, ओबीसी समुदायाची उपेक्षा केली जात आहे. मराठा आरक्षणाचा लांबलेला मुद्दा, मुस्लिम समाजबांधवांचे विविध पातळीवर होत असलेले खच्चीकरण आणि भुजबळांवर केली जात असलेली कारवाई या बाबी म्हणजे भाजपच्या ब्राह्मणवादी विचारसरणीच्या राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप एका निवृत्त शिक्षकाने केला.

एकजूट रोखण्याचा प्रयत्न
मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे ओबीसी समाजाला त्यांची खरी ताकद आणि हक्कांची जाणीव झाली. देशात किती ओबीसी आहेत, अशी मागणी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि आता ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्या भुजबळ यांनी केली. मात्र, ओबीसींची गणना जाहीर न करता या प्रश्नी ओबीसींची एकजूट रोखण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे, असा आरोप एका निवृत्त अधिकाऱ्याने केला.

फोडा अन् राज्य करा!
ब्रिटीशांची ‘फोडा अन् राज्य करा’ ही नीती विद्यमान भाजप सरकार अतिशय चोखपणे बजावत असल्याची बोचरी टीका ओबीसी मोर्चातील काही जणांनी व्यक्त केली. राज्यातील ओबीसी काय अन्य कोणताही समाज एकत्र येणार नाही, यासाठी भाजप सरकार खटाटोप करीत आहेत. त्यासाठी कधी मंत्रिपद काढून घेणे तर कधी राजकीय आकसातून कारवाई करणे, असे विविध प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही मोर्चेकरांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरवलेल्या पत्नीचा व्हॉटसअॅपमुळे शोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पतीशी किरकोळ वाद झाल्यानंतर संतापून घराबाहेर पडलेल्या महिलेला व्हॉटसअॅपच्या सहाय्याने शोधून पतीच्या ताब्यात देण्यात नाशिकरोड रेल्वे पोलिसांना यश आले. चंदा तिवारी (नाव बदलले आहे) या वडाळा, मुंबई येथील २५ वर्षीय महिलेस कामयानी एक्स्प्रेसमधून शनिवारी ताब्यात घेण्यात आले.

चंदा यांचे पतीशी किरकोळ किरकोळ कारणावरून वाद झशला. रागावलेली चंदा काही न सांगता घराबाहेर पडली. सायंकाळ पत्नी परत न आल्याने पतीने वडाळा रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. सोबत तिचा फोटोही दिला. पोलिसांनी याबाबतची माहिती फोटोसह नाशिकरोड व अन्य रेल्वे पोलिसांना पाठविली. चंदा ही कामयानी एक्स्प्रेसने मध्य प्रदेशला जात असल्याचा अंदाज आल्याने नाशिकरोडच्या रेल्वे सहाय्यक निरीक्षक नितीन पवार, विष्णू भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र पाटील, सुजाता निचड, बेबीताई गायकवाड, जयश्री साळवे आदी पोलिसांनी कामायनी गाडीची तपासणी केली. व्हॉटसअॅपवरील फोटोशी मिळती जुळती महिला गाडीत बसलेली दिसली. तिला पोलिस ठाण्यात येण्याची विनंती पोलिसांनी केली. मात्र, तिने नकार दिला. महिला पोलिसांनी तिची समजून घातली आणि तिला पोलिस ठाण्यात आणले. वडाळा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान, चंदा यांचा पती पंचवटी एक्स्प्रेसने नाशिकरोडला आल्यावर खातरजमा करून पोलिसांनी चंदाला त्याच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याला पावसाचा तडाखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरासह जिल्हाभरात परतीच्या पावसाने मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून जोरदार तडाखा दिला. यामुळे धुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्यातील शेती पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह पिकांची वाढ खुंटली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी शेतीपिकांना मोठा आधार मिळाला आहे. पावसामुळे पांझरा, बुराई नदीला पूर आला असून, नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी जाऊन कांदा, कापूस, भुईमूग, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, रब्बी हंगामातील पिकांना या पावसामुळे फायदा होऊन, जिल्ह्यातील तलाव, धरणे, विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

शहरात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारी तीन वाजता विश्रांती घेतली. मात्र, या कालावधीत शहरातील प्रमुख रस्त्यावरील गटारी पावसाच्या पाण्याने तुंबल्याने ते पाणी रस्त्यावर आले होते. तसेच देवपूरातील जयहिंद चौक, बसस्थानक परिसर, फाशीपूल चौक, मनपा परिसर यासह अन्य ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे मोठ-मोठे तळे साचले होते.

नंदुरबारचे रस्ते जलमय

नंदुरबार शहरातही परतीच्या पावसामुळे सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. ग्रामीण भागात पावसामुळे नदीनाल्यांना पूर आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे खरीप हंगाम वाया गेल्याने या पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नवापूर तालुक्याचा पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने रंगवली नदीला पूर आला आहे. तर करणाऱ्या धरणक्षेत्रातही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयटीआय’ला दुकानांचा विळखा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या जागेवर कुणीही यावे व काहीही व्यवसाय करावा, अशी परिस्थिती शहराच्या मुख्य रस्त्यांवर पाहायला मिळते. त्र्यंबकेश्वररोडवरील आयटीआयच्या मैदान परिसरातदेखील अशीच स्थिती असून, या मैदानाला अनधिकृत व्यावसायिकांचा विळखा पडला आहे. त्यामुळे त्र्यंबकरोडलाच बाजाराचेच स्वरूप आले आहे.

या प्रकारामुळे शासन व महापालिकेचे सर्व कर भरून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी अशा अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेची मेहेरबानी का, असा सवाल उपस्थित केला आहे. महापालिका प्रशासनाने शहरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील अधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न महापालिकेकडून सुटत नसताना आता शहरातील मुख्य रस्त्यांवर अनधिकृत व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. त्र्यंबकेश्वररोडवरील आयटीआयच्या मैदानाला अशाच प्रकारे अनधिकृत व्यावसियाकांनी विळखा घातला आहे. चप्पल, बुटांपासून ते कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी येथे सर्रासपणे उघड्यावर दुकाने थाटली आहेत. महापालिकेच्या विविध कर विभागाकडून केवळ जागेचा वापर करतात म्हणून २० ते ३० रुपयांची पावती फाडण्यातच धन्यता मानली जात आहे. मात्र, या अनधिकृत व्यवसायांमुळे त्र्यंबकरोडला बाजाराचेच स्वरूप आले आहे. एकाने अनधिकृत दुकान थाटले म्हणून दुसरा, तिसरा असे करत अनेकांनी त्र्यंबकरोडवर दुकाने थाटली आहेत.

महापालिकेचे अनेक अधिकारी या रस्त्यावरून जात असताना त्यांना अनधिकृत व्यावसायिकांचे अतिक्रमण दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होतो. त्यातच काही राजकीय पुढाऱ्यांचीदेखील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर मोठी मेहेरबानी असल्याने अशा दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी शासनाचे सर्व कर भरणाऱ्या व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

भाविकांची नेहमीच वर्दळ असलेल्या त्र्यंबकेश्वररोडवर आयटीआय सिग्नलच्या मैदानाला लागून अनधिकृत व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग हे अतिक्रमण कधी हटविणार, असा आमचा सवाल आहे.

-चिंतामण काळे, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरची रामलीला एेक्याचे प्रतीक

$
0
0


गांधीनगरची रामलीला आणि बंगाली बांधवांचा दुर्गोत्सव नाशिकरोडचीच नव्हे, तर नाशिकची शान आहे. रामलीला ही संस्कार आणि सामाजिक एक्याचे प्रतीक झाली आहे. रामलीलेने रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. रामलीलेचा हा सोहळा आता ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त रामलीला समितीचे महासचिव कपिल शर्मा यांच्याशी केलेली बातचीत.

रामलीला केव्हा सुरू झाली?

देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातून हिंदीभाषक दिल्लीत आले. तेथून काही जण नाशिकरोडला स्थायिक झाले. त्यांनी १९५५ मध्ये ही रामलीला सुरू केली. सुरुवातीला दोन वर्षे ती उर्दूत सादर होत असे. १९५७ पासून दिग्दर्शक सुरेंद्रसिंग बिश्त, देवीलाल शर्मा यांनी ती हिंदीमधून सादर करणे सुरू केले.

रामलीलेची वैशिष्ट्ये काय आहेत?

या रामलीलेस सर्व जाती-धर्मीयांचे योगदान मिळते. दिलबागराय त्रिखा ४० वर्षांपासून लक्ष्मणाची भूमिका करीत आहेत. दिवंगत दिग्दर्शक फ्रान्सिस वाझ यांनी इंद्रजीत, शरीफ शेख यांनी परशुराम आणि तस्लिम पठाण यांनी रावणाची भूमिका केली. सुनील मोदियानी रावणाचा पुतळा तयार करतात. गुरुदयाल त्रिखा स्टेज व्यवस्था बघतात. धीमन यांनी सर्वात प्रथम फिरता रंगमंच केला होता. पूर्वी रावणदहन गोल्फ क्लबवर होत असे. ते आता गांधीनगरला होते. त्यासाठी लाखभर प्रेक्षक येतात.

साठ वर्षे पूर्ण झाल्याचे रहस्य काय?

सर्व कलाकार विनामूल्य काम करतात. प्रेस कामगार, वकील, डॉक्टर, इंजिनीअर, व्यावायसिक, लोकप्रतिनिधी अशा अनेकांमुळे रामलीला सुरू आहे. लहान मुलांचा सहभागही महत्त्वाचा आहे. संगमनेरचे जमीर फायर वर्क्स १९५५ पासून मोफत फटाके पुरवीत आहेत. रामलीलेत भूमिका केलेले मनोज कदम (न्यूझीलंड), सचिंदर पालसिंग मारवा (दिल्ली), प्रकाश राजानी (इंदूर), मनोज कुलथे (ठाणे) असे अनेक जण यथाशक्ती मदत करीत आहेत.

रामलीलेसाठी कोणाचे सहकार्य लाभते?

मल्होत्रा ब्रदर्स, गुप्ता डेकोरेटर्स, आनंद ट्रान्सपोर्ट, आदर्श लॉड्री, एलआयसी, कारडा कन्स्ट्रक्शन्स, श्यामराव विठ्ठल बँक, प्रेस युनियन, पोलिस, सीपीडब्ल्यूडी आदी संस्था, संघटना, तसेच राजेंद्र जाधव (मेकअप), आर. पी. सिंग, प्रदीप भुजबळ, अशोक लोळगे, संजय लोळगे, हरीश परदेशी, अनिल ताजनपुरे, मनोहर बोराडे, सुनील मोदियानी आदींसह असंख्य व्यक्तींचे सहकार्य लाभत आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे?

केबल टीव्हीमुळे मनोरंज होते. परंतु, रामलीलेमुळे संस्कार होतात. आदर्श पुत्र, आदर्श पत्नी, भाऊ कसा असावा हे रामलीलेतून कळते. नेहमी सत्याचाच विजय होतो, हेदेखील ध्वनित होते. त्यामुळे आजही लोक मुलाबाळांसह रामलीला बघण्यासाठी येतात. पूर्वी सिन्नर, भगूर, लहवित, देवळाली, म्हसरूळ आदी भागातून लोक बैलगाड्यांतून येत

असत. आजही प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे.

रामलीला संयोजकांपुढील अडचणी कोणत्या?

रामलीलेचा खर्च दर वर्षी चार-पाच लाखांच्या घरात जातो. त्याची तोंडमिळवणी करताना नाकीनऊ येतात. मुंबईहून ड्रेसेस व अन्य साहित्य आणावे लागते. पूर्वी हौशी कलाकार सहज उपलब्ध होत असत. आता नोकरी-धंद्यामुळे कलाकार सहज उपलब्ध होत नाहीत. प्रेस कामगारांमुळे रामलीला सुरू आहे. पूर्वी साडेतीन हजार प्रेस कामगार होते. मात्र, आता सुमारे सव्वादोनशे प्रेस कामगार आहेत.

कलाकारांना काेणता फायदा झाला?

रामलीला कलाकारांचा कारखाना आहे. रामलीलेतील कलावंत नाटक, चित्रपटसृष्टीत चमकत आहेत. त्यामध्ये महेश बोराडे, हरीश परदेशी, प्रदीप भुजबळ, सुजाता देशमुख, प्रिया तुळजापूरकर आदींचा समावेश आहे.

पुढील योजना काय आहेत?

पैशाची तरतूद झाली तर चित्रपटाप्रमाणे ट्रीक सीन्स सादर करायचे आहेत. सध्याचे स्टेज छोटे आहे. ते मोठे करायचे आहे. रामलीलेचा प्रसार-प्रचार दूरवर करायचा आहे.

(संकलन ः डॉ. बाळकृष्ण शेलार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार सुळे घेणार निवडणुकीचा आढावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून, पक्ष तयारीचा आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे बुधवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. निवडणुकीचा आढावा घेण्यासह सुळे या सटाण्यातील कांदा परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांची तयारी पक्षाने सुरू केली असून, खासदार सुळे पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी, नगरसेवक, फ्रंट सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. प्रभागनिहाय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून इच्छूक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.

दुपारी सटाण्यात कांदा परिषद

खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार बुधवारी सटाणा येथे कांदा परिषदेत उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. सटाणा येथील आनंद मंगल कार्यालयात दुपारी अडीच वाजता खासदार सुळे यांच्या उपस्थितीत कांदा परिषद होणार आहे. कांद्याचे भाव वाढल्यावर भाव स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याचप्रमाणे कांद्याचे भाव अत्यंत कमी झाल्याने सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेद्वारे कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. त्यावर सुळे या आगामी आंदोलनाची दिशा मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉवरग्रीडची चर्चा फिस्कटली

$
0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना योग्य मोबदला तसेच द्राक्ष बाग उभी करण्यासाठी येणारा खर्च दिला जावा, प्रकल्पाचे काम सुरू करण्याआधी शेतकऱ्यांच्या नावावर एकरकमी भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांवर पॉवरग्रीड प्रकल्पग्रस्त कायम आहेत. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंड‌ियाची अतिउच्च दाबाची विद्युत लाइन निफाड, दिंडोरी तसेच चांदवड तालुक्यातून टाकण्यात येत आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. कंपनीने योग्य मोबदला देण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे शेतकरीही सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले. मात्र त्यांना आश्‍वासनापलीकडे ठोस काही न मिळाल्याने हा प्रश्न जैसे थे आहे. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रकल्पबाधित उपस्थित होते. पॉवरग्रीडच्या टॉवरखालील द्राक्षबागांचे मोठे नूकसान होणार आहे. त्यामुळे योग्य मोबदला मिळायलाच हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बैठकीत शेतकऱ्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मात्र ठोस निर्णय होऊ शकला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या आहेत मागण्या

द्राक्ष निर्यातीचा दर विचारात घेवून मोबदला द्यावा

नूकसान भरपाईत कुठलीही वजावट करू नये

जेथे द्राक्षबाग नाहीत त्या शेतकऱ्यांना भरीव मोबदला द्यावा

टॉवरच्या आजूबाजूचे एक ते दीड एकर क्षेत्र नापिक होते त्यास पूर्ववत करण्यासाठी खर्च दिला जावा

प्रकल्पबाधित म्हणून दाखला देण्यात यावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या वैद्यकीय विभागात भरती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेत मानधनावर नोकरभरती करण्याची नगरसेवकांची मागणी प्रलंबित असली तरी महापालिकेने विविध ७० पदासांठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, ही भरती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) केली जाणार असून त्याचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. सोबतच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही भरती केली जाणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना महापालिकेला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळणार आहे. दरम्यान, वैद्यकीय विभागाच्या मानधनावरील भरतीप्रक्रियेमुळे नगरसेवकांच्या संभाव्य भरतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महापालिकेत विविध रिक्त पदांसाठी नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकारने या नोकरभरती करण्याऐवजी आऊटसोर्सिंगद्वारे कामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील नोकरभरतीचा प्रश्न अनेक दिवसांपासून रेंगाळला आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत महापालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समितीच्या वतीने नोकरभरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. वैद्यकीय विभागातील सुमारे ७० पदे या भरतीत भरली जाणार आहे. त्यात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, नर्स, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, ए. एन. एम, लॅब टेक्निशिएशन, लेखापाल, शिपाई अशी पदे भरली जाणार आहे. याव्यतिरिक्त अन्य सात पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्त आहेत. ती सर्व पदे या मोहिमेअंतर्गत भरली जाणार आहे. महापालिकेमार्फत ही भरती केली जाणार असली तरी हा सगळा खर्च मात्र केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. ही पदे कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहे. परंतु, या भरतीप्रक्रियेने नगरसेवकांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहेत. या भरतीच्या निमित्ताने महापालिकेची नोकरभरती निवडणुकांपूर्वी तरी मार्गी लागेल, अशी चर्चा नगरसेवकांमध्ये रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोळीत फास लागल्याने चिमुकल्याचा अंत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

झोळीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना ओढणीत अडकून श्वास कोंडल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत झाला. अंबड गावालगतच्या महालक्ष्मीनगर परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

महालक्ष्मीनगरमध्ये संदीप साळुंखे हे आपल्या परिवारासह राहतात. मंगळवारी त्यांचा दीड वर्षांचा चिमुकला पृथ्वी हा झोळीत झोपलेला होता. पृथ्वी झोक्यातून खाली पडू नये यासाठी त्याच्या आईने झोळीला ओढणी बांधली होती. परंतु काही वेळाने पृथ्वीला जाग आली आणि तो झोळीतून खाली येण्यासाठी खटपट करू लागला. पृथ्वीची आई कामात असल्याने तिचेही इकडे लक्ष नव्हते. पृथ्वी झोळीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतांना झोळीला बांधलेल्या ओढणीत त्याचा गळा आवळला गेला आणि त्याला गळफास लागला. आईच्या लक्षात येताच त्यांनी त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याबाबत रात्री अंबड पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हागणदारीमुक्तीसाठी डिसेंबरपर्यंतचे टार्गेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने आता शहर हागणदारीमुक्तीचे टार्गेट डिसेंबरपर्यंत वाढविले आहे. प्रभाग हागणदारीमुक्त जाहीर करण्याची जबाबदारी प्रभागातील लोकप्रतिनिधी, शिक्षक व मुख्यध्यापकांवर टाकण्यात आली आहे. संबंधित घटक पब्लिक नोटीस देऊन आपला प्रभाग हागणदारीमुक्त जाहीर करणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. दरम्यान, आतापर्यंत पाच हजार कुटुंबाकडे शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावाही आरोग्य विभागाने केला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेत हागणदारीमुक्त शहर मोहीम राबविण्यात आली आहे. त्यासाठी शहरात शौचालय नसलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शहरात ७ हजार २६४ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे. या कुटुंबांसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधले जात आहेत. आतापर्यंत पाच हजार ९ कुटुंबाकडे शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर अकराशे कुटुंबाकडे बांधकाम सुरू आहे. २६९ नागरिकांनी शौचालय बांधण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कुटुंबाचे काऊन्सि‌लिंग केले जात आहे. १४० कुटुंबासाठी सामूहिक शौचालय बांधले जात आहे.

आरोग्य विभाग स‌क्रिय
डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना शौचालय बांधून देवून शहर हागणदारीमुक्त घोषित केले जाणार आहे. त्याची जबाबदारी आता लोकप्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली असून त्यासंदर्भातील डिक्लरेशन त्यांच्याकडूनच केले जाणार आहे. संबंधितांनी डिक्लेरेशन दिल्यानंतरच महापालिकेकडून संबंधित प्रभाग हागणदारीमुक्त म्हणून घोषित केला जाणार आहे. डिसेंबरपर्यंत स्वच्छ भारत अभियानाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५ हजार विद्यार्थ्यांचे डेंग्यू प्रबोधनासाठी बळ ​

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यूला अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शिक्षण विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून, मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा गुरूवारी (दि. ६) आयोजित केली आहे. महापालिकेचे सुमारे ९५० शिक्षक जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांना डेंग्यूच्या काळजी संदर्भात प्रशिक्षित करणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याला पाच घरांची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

शहराच्या हद्दीत डेंग्यून थैमान घातले आहे. सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांनी वर्षभरातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता खळबळून जागे झाली आहे. डेंग्यूच्या अळ्या नागरिकांच्या घरातच सापडत असून जनतेमध्ये जनजागृती आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेकडून घरोघरी तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेपाठोपाठ आता महापालिकेने महापालिकेचे शिक्षक व विद्यार्थ्यांची मदत घेण्याच निर्णय घेतला आहे. शिक्षण मंडळांतर्गत कार्यरत असलेल्या ९५० शिक्षकांसाठी महापालिकेने डेंग्यसंदर्भात प्रशिक्षण वर्ग गुरूवारी दिले जाणार आहे. शिक्षक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यूचे प्रबोधन करणार आहे. एक विद्यार्थ्याला पाच घरांचे प्रबोधनाचे टार्गेट दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागाचा सिमसिम खुलणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होत असून या निवडणुकीची प्रभाररचना तयार झाल्यानंतर आता प्रभागांची आरक्षण सोडत शुक्रवारी, सात ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. महापालिका क्षेत्राचे ३१ प्रभागात विभाजन करण्यात आलेले असून, त्या अंतर्गत १२२ सदस्य संख्या निश्चित झालेली आहे.

प्रभागांमधील १२२ जागांच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यापैकी एकूण ६१ प्रभाग महिलांसाठी राखीव असणार आहेत. तर अनुसूचित जातीसाठी १८, अनुसूचित जमातीसाठी ९, इतर मागासवर्गीयांसाठी ३३ जागा आरक्षित राहणार आहेत. उर्वरित ६६ जागा या सर्वसाधारण गटासाठी असून, त्यापैकी ३१ जागा सर्वसाधारण महिलांसाठी असणार आहेत. त्यामुळे कोणाच्या प्रभागावर कोणते आरक्षण पडते, याकडे नगरसेवकांसह सर्व इच्छुकांच्या नजरा लागून आहेत.

महापालिकेची प्रभागरचना येत्या १० ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. दोन प्रभागांचा एक प्रभाग झाला असल्याने नगरसेवकांची धाकधूक अगोदरच वाढली आहे. त्यात आता कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडते यावर विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांच्या नजरा लागून आहेत. चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे शहरात नव्याने ३१ प्रभाग तयार झाले आहेत.

महिलांसाठी ६१ जागा
अनुसूचित जातींसाठी १९ जागा असून त्यात महिलांसाठी नऊ जागा आरक्षित राहणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी नऊ जागा असून, त्यात पाच महिलांसाठी राखीव असणार आहेत. ओबीसींसाठी ३३ जागा आरक्षित असून, त्यात १७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण गटासाठी ६२ जागा असून, त्यात ३० जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. अशाप्रकारे १२२ पैकी महिलांसाठी ६१ जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत.

प्रोजेक्टरद्वारे तयारी
महाकवी कालिदास कलामंदिरात शुक्रवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासह महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागांची सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीच्या ‍ठिकाणी नागरिकांना पाहणेसाठी सर्व प्रभागांचा एकत्रित नकाशा तसेच सर्व प्रभागांचे स्वतंत्र नकाशे लावण्यात येणार आहेत. तसेच सोडतीत निघालेला जागा क्रमांक सर्व उपस्थित नागरिकांना सहज दिसावा, म्हणून प्रोजेक्टरद्वारे पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे नगरसेवकांसह सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांचे लक्ष लागून आहे.

आज रंगीत तालीम
दरम्यान, शुक्रवारी काढण्यात येणार आरक्षण सोडतीसाठी महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि. ५) रंगीत तालीम केली जाणार आहे. शुक्रवारच्या आरक्षण सोडतीत घ्यावयाच्या काळजीसंदर्भात ही तयार केली जात आहे. त्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा बुधवारी उपस्थित राहणार आहे.

नगरसेवकांची वाढली धडधड
आरक्षित जागांची संख्या निश्चित झाल्यानंतर आता प्रभागांमधील आरक्षणाकडे नगरसेवकांचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे नगरसेवकांची धडधड वाढली आहे. मुंबईत महापालिकेत दिग्गजांचे वॉर्ड आरक्षणामुळे गायब झाले आहेत. त्यामुळे अगोदरच प्रभागाची मोडतोड असतांना, पुन्हा प्रभाग आरक्षित झाल्यास राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे. त्यामुळे या सोडतीपूर्वीच नगरसेवकांकडून कोणता प्रभाग सुरक्षित याची चाचपणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासाका समितीला लागेना मुहूर्त

$
0
0

आमदार सानप यांच्यापुढील अडचणी वाढल्या

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला सध्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या भाराने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना येत्या गळीत हंगामापासून सुरू करण्याचे शिवधनुष्य आमदार बाळासाहेब सानप यांनी उचलले आहे. त्यासाठी गठीत करावयाच्या समितीवर आपली वर्णी लागावी, यासाठी कारखाना रसातळाला नेण्याचे ‘पुण्यकर्म’ ज्यांच्या सत्ताकाळात झाले त्यांनीच पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यामुळे आता आमदार सानपांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. ही समिती तयार करण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.

नासाका कर्ज न फेडल्याने गेल्या तीन गळीत हंगामापासून बंद आहे. तेव्हापासून कामगार, ऊस उत्पादक शेतकरी सभासद, वाहतूकदार यांच्यावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी नासाका कामगार युनियनसह काही स्थानिक माजी पदाधिकाऱ्यांनी गेल्या एक-दोन वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले. सभासदांना विश्वासात घेत नासाका कामगार युनियनने हा साखर कारखाना भाडे तत्त्वावर देण्यासाठीही निकराचे प्रयत्न केले. परंतु त्यातही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

त्यातच जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी कायदेशीर मार्गाचा पाठपुरावा सुरुच ठेवल्याने हा कारखाना अवसायनात निघण्याचे चित्र स्पष्ट झाले होते.

या नवीन समितीवर लोकप्रतिनिधींना स्थान नसल्याने आता साखर कारखानदारीची सखोल माहिती असलेल्यांची या समितीवर वर्णी लावावी लागणार आहे. त्यासाठी जुन्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ‘चाळ’ बांधल्याने आमदार सानप यांच्यापुढील पेच वाढला आहे. त्यामुळे ही समिती अस्तित्वात येते की नाही, अशीही शंका निर्माण झाली आहे. या राजकीय पेचावर लवकर तोडगा न निघाल्यास नासाकाची चाके फिरण्याचा हा अंतिम प्रयत्नही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पा’वर पोलिसांची धाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कॉलेजरोडवरील स्पा आड सुरू असलेला कुंटणखाना शहर पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी उद‌्ध्वस्त केला. पोलिसांनी एका व्यवस्थापक महिलेसह पाच मुलींची सुटका करीत स्पा मालकास जेरबंद केले आहे. कॉलेजरोडवरील इजी डे मॉलसमोरील ठक्कर मॅजेस्टी इमारतीत हा अड्डा सुरू होता. विशेष म्हणजे याच ठिकाणी पोलिसांनी मागील वर्षी छापा मारून काही मुलींची सुटका केली होती.

कॉलेजरोड परिसरातील हॉलमार्क चौक, इझी डे मॉल परिसरातील काही इमारतींमध्ये अवैध व्यवसायाचे पेवच फुटले आहे. पोलिस सातत्याने रौलेटसह इतर अवैध गेम्स पार्लरवर छापे मारतात. टवाळखोरांसाठी हा परिसर नंदनवन म्हणून ओळखला जात असून, कॉलेजचे विद्यार्थी या अवैध व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणीच ठरत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस सातत्याने हॉलमार्क चौकात कारवाई करताना दिसतात.

ठक्कर मॅजेस्टी इमारतीतील एनझी या स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना समजली होती. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. संध्याकाळच्या सुमारास पोलिस उपायुक्त पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह गंगापूर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या स्पावर छापा मारला. पोलिसांनी येथून सहा मुलींची सुटका केली. यातील एक मुलगी स्पामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते. पोलिसांनी स्पा मालक हेमंत अशोक परिहार यास अटक केली. छापा मारला त्यावेळी एक ग्राहक स्पा मध्ये हजर होता.

दुसऱ्यांदा टाकली धाड

याच स्पावर गेल्या वर्षी पोलिसांनी छापा मारून काही मुलींची सुटका केली होती. मात्र, त्यावेळी स्पा मालक वेगळाच होता. पोलिसांच्या कारवाईनंतरही स्पा आड सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाला आळा बसत नसेल तर पोलिसांनी यापेक्षा कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे.

माहिती मिळाल्यानंतर आम्ही खात्री करून छापा मारला. संबंधित संशयित आरोपींविरोधात पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. स्पा मालकाविरोधात कारवाई होईल. मात्र, हे दुकान कोणाच्या मालकीचे आहे, त्याचाही शोध घेऊन त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपर्डीप्रकरणी चार्जशीट दाखल करा, अन्यथा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । नाशिक

कोपर्डी बलात्कारप्रकरणी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करीन, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. पण अजूनही तसं केलं नाही. तीन महिन्यात आरोपपत्र दाखल झालं नाही तर, आरोपींना जामीन मिळू शकतो. त्यामुळं येत्या दोन दिवसांत आरोपपत्र दाखल झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात दिला.

नाशिकमध्ये आलेल्या सुळे यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला. कोपर्डीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात कोणत्या तांत्रिक अडचणी आहेत, हे जनतेला सांगावे. तसंच आमच्या भगिनींना न्याय द्यावा, असं त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या सुळे?

> शिवसेनेला एकच सांगणं आहे, तुम्हालाही लेकी-सुना आहेत. आता त्यांनी माफी मागीतली आहे. यापुढे काळजी घ्या.

> मुख्यमंत्रिपद झेपत नसेल तर, राजीनामा द्या. आमच्याकडे समर्थ नेते आहेत.

> कपिल शर्माच्या तक्रारीची दखल घेतात. पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बाबा आढाव यांच्या उपोषणाची मुख्यमंत्र्यांनी साधी दखलही घेतली नाही.

> राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलं आहे.

> सरकार काय करते आहे, हे त्यांनाच समजत नाही. शिक्षकांवर लाठीमार केला जातो.

> सावरा यांचे वक्तव्य लाजिरवाणे आहे. त्यांनी राजीनामा द्यावा.

> राष्ट्रवादी रत्यावर उतरणार आणि कोपर्डीच्या पीडितांना न्याय मिळवून देणार.

> भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ला समर्थन, पण राज्यातील प्रश्न महत्त्वाचे आहेत.

> पंतप्रधान बोलले होते, "न खाऊंगा, न खाने दूंगा"...हे आता खरे झाले आहे. कारण शेतकऱ्याला काहीच मिळत नाही.

> मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजचं स्वागत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images