Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अच्छे दिनचे स्वप्नच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी
अच्छे दिन कधी येणार? असा सवाल करत तळागाळातील माणसांचे प्रश्न सुटले तरच खरे अच्छे दिन येतील. पण हे सरकार शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना लुटणारे सरकार आहे. त्यामुळे यांच्या राज्यात कधीच अच्छे दिन येणार नाहीत, असा प्रहार आमदार बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर केला. वाडीवऱ्हे येथे शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
इगतपुरी तालुक्यात प्रथमच वाडीवऱ्हे येथे कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्‍घाटन आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा झाला. त्या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तसेच वाडीवऱ्हेचे उपसरपंच आंबादास कातोरे, दिलीप शेजवळ, माजी उपसरपंच रावसाहेब कातोरे, बाणेश्वर मालुंजकर, भास्कर गुंजाळ, विलास मालुंजकर, चेअरमन भारत कातोरे, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब मालुंजकर, नितीन गवळी, विनोद कातोरे, रामा कातोरे, सनील मालुंजकर, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

कडू म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. अपंगांचे प्रश्न सोडविले गेले पाहिजे. जातीपातीच्या राजकारणाला स्थान न देता काम करणाऱ्या माणसाला मतदान करा; तरच सगळे सुखी होतील, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने अपंगांना प्रातिनिधिक स्वरूपात निधीचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोगस अपंग शिक्षकांवर कारवाई करा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा परिषदेत बोगस अपंग प्रमाणपत्र घेऊन शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बदल्या करून घेतल्याप्रकरणी महिन्याभरात कठोर कारवाई करावी, अशा कर्मचाऱ्यांना सेवेतून बाद करून त्यांना बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाईची मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दीपककुमार मीना यांच्याकडे केली.
अपंगांसाठीच्या तीन टक्के राखीव निधीतील चार वर्षांपासून अखर्चित असलेले ५ कोटी रुपये अपंगासाठी सुविधांसाठी खर्च करावे तसेच जिल्हा परिषदेत अपंगासाठी लिफ्टची व्यवस्था करण्याचीही मागणी आमदार कडू यांनी केली. त्यांच्या या सर्व मागण्यांना सीईओ यांनी प्रतिसाद देत हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
दोन महिन्यापूर्वी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्या या भेटीदरम्यान पोलिसांनी जिल्हा परिषदेत बुधवारी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १९९५ चा अपंग पूनर्वसन कायद्याची जिल्हा परिषद व ग्रामपंचायतमध्ये अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याच्या कारणावरून आमदार कडू यांनी ही भेट घेतली. विशेष म्हणजे ‘सीईओं’च्या दालनात आमदार कडू यांच्यासोबत फक्त पाच जणांनाच प्रवेश देण्यात आला. यावेळी वरिष्ठ दोन पोलिस अधिकारी सुद्धा दालनात होते. कडू यांच्या आक्रमक स्वभावामुळे अधिकाऱ्यांनी घेतलेली काळजी मात्र सामान्यांसाठी त्रासदायक ठरली. बैठकीच्या वेळी ‘सीईओं’च्या कॅबिनकडे जाण्यास बंदी करण्यात आली. ‘सीईओं’नी सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कडू यांनी समाधान व्यक्त केले.

महिनाभरानंतर पुन्हा येऊ
‘सीईओं’ यांच्याबरोबरच झालेल्या बैठकीनंतर आमदार कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अखर्चित निधीतून अपंगासाठी काम सुरू करावे त्यासाठी महिनभरानंतर पुन्हा येऊ असे सांगितले. यावर्षी ७३ लाख खर्च झाले आहे. उर्वरित रक्कमही खर्च करावी, अशीही मागणी केली.

१० ऑक्टोबरपर्यंत नोंदणी
अपंगाची नोंदणी झाली नसल्याचे कारण चर्चेत पुढे आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहिम घेऊन २ ते १० ऑक्टोबरपर्यंत अपंगाची जिल्हा भरातून नोंदणी ग्रामपंचायतद्वारे करावी अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही कडू यांनी सांगितले.

मनपाचे अभिनंदन
दोन महिन्यापूर्वी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी वाद झाल्यानंतर महापालिकेने अपंगासाठी विविध कामे सुरु केली असल्याचे निदर्शनात आणून दिल्यानंतर आमदार कडू यांनी महापालिकेचे अभिनंदन केले. अपंगाचे प्रश्न सुटावे, हीच आमची अपेक्षा आहे. अमंलबजावणी होत नाही म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत पोलिस छावणी
जिल्हा परिषदेत आमदार बच्चू कडू येणार असल्याने संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी एक पोलिस व्हॅनही बाहेर उभी करण्यात आली. मुख्य गेटपासून ‘सीईओं’च्या कॅबिनपर्यंत सर्वच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांच्यासह भद्रकाली पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महिला पोलिसही मोठ्या प्रमाणात हजर होत्या.

आंदोलनाची दिली आठवण
नाशिक जिल्हा परिषदेत ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील बहुतांशी शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र घेऊन बदली, पदोन्नतीचा लाभ घेतल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद व कृती समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते. पण त्यावर कठोर कारवाई न झाल्यामुळे आमदार कडू यांनी या प्रश्नाकडे बुधवारी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
येथील युवा लेखक कृष्णा पवार लिखित ‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. एक ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता होणार आहे. गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा अनोखा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आर्य योगेश ठोके या लहानग्या मुलाच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. आर्यच्या संघर्षगाथेच्या सत्यघटनांवर आधारित हे पुस्तक आहे. पुस्तक प्रकाशनप्रसंगी कवी अशोक बागवे, बाळासाहेब जोशी, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुनील कुटे हे उपस्थित असणार आहेत. यावेळी कवी अशोक बागवे यांचे ‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ या विषयावर व्याख्यानही आयोजित केले आहे.

दुर्धर आजाराशी झुंज देण्याच्या बिकट परिस्थितीत सुद्धा जगण्यातला आनंद कसा जपावा, याचा संदेश विज्ञान व अध्यात्म देऊ शकते अशी मांडणी या सत्य घटनेवर आधारीत पुस्तकात करण्यात आली आहे. नाशिककरांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सुजप चॅरिटेबल फाऊंडेशन आणि हृदयाक्ष हार्ट अॅण्ड केअर सेंटरच्या वतीने डॉ. हिरालाल पवार आणि डॉ. स्मिता पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेपत्ता मोहनदासांची सरकारने घ्यावी दखल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
बेपत्ता महंत मोहनदास यांच्याबाबत राज्य सरकारने गांभिर्याने दखल घेतली पाहिजे, अशी मागणी आखाडा परिषदेने केली आहे. याच विषयावरून महामंत्री महंत हरिगिरी महाराज येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते.
बेपत्ता झालेले महंत मोहनदास हे मूळचे मुंबईचे आहेत. त्यांचा बहुतांश रहिवास मुंबईमध्येच होता. राज्य सरकारने त्याच्या बेपत्ता होण्याची दखल घेतली पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्याशी संपर्क करणे गरजेचे आहे. शासन पातळीवर तपासास चालना मिळावी अशी अपेक्षा साधूंनी व्यक्त केली. महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीच कळविले आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचीही आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. अष्टमीला विशेष तर दसऱ्यासही पूजा असते. सर्व आखाड्यांमध्ये आदिमाया शक्तीची पूजा होत आहे. साधू-महंत यात व्यस्त आहेत. उत्सव संपताच महंत मोहनदास यांच्या बाबत चौकशीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यास साधू बाहेर पडणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. महंत मोहनदास यांनी देशभरातील १४ भोंदू महाराजांची यादी जाहीर केली होती. दरम्यान, वेळ पडल्यास आणखी भोंदूंची नावे केली जातील, अशी चर्चा साधू-महंतांमध्ये सुरू आहे.

महंत मोहनदास याचे बेपत्ता होणे चिंता निर्माण करणारे आहे. त्यांचा शोध लागला पाहिजे. साधू-संत अशा दहशतीला घाबरणारे नाहीत.
- नरेंद्रगिरी महाराज,
अध्यक्ष, आखाडा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर चूल मांडून निदर्शने

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
पेट्रालची मूळ किमंत प्रती लिटर ३१ रुपये असताना ८० रुपये दराने त्याची विक्री सुरू आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनांवरील अन्य कर काढून केवळ जीएसटी लागू करावा तसेच इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. प्रवेशद्वारावरच रिकामे सिल‌िंडर, गॅस शेकडी आणि लाकडे मांडून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
राज्यात प्रचंड प्रमाणात इंधनाची दरवाढ लागू करण्यात आली असून महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाजप सरकारने जनतेची लूट थांबवावी या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकवटले. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारचा निषेध असो, फडणवीस सरकारचा निषेध असो यासारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. गॅस सिलिंडर, शेगड्या आणि लाकूड रस्त्यावर मांडून हे अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. गेल्या ७२ दिवसांमध्ये इंधनाचे दर प्रती लिटर १६ रुपयांनी वाढल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या दरवाढीमुळे जनतेच्या मनात रोषाचे वातावरण आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर साडे सहाशे रुपयांच्यावर गेले आहेत. इंधनाच्या किमती सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत कडधान्ये, तेल, तुपाच्या किमती वाढल्या आहेत. रेशन दुकानांवर साखर तसेच धान्य मिळणेही कमी झाले आहे. या जीवनावश्यक वस्तुंच्या किमती कमी करून दर नियंत्रणात ठेवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला नाही. तर यापुढे रस्त्यांवर उतरून अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेच्या लुटीतून निवडणूक पॅकेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
निवडणुकीपूर्वीच्या सहा महिन्यांत जनतेसाठी काहीतरी ठोस घोषणा करण्याची पंतप्रधान मोदी यांची रणनीती असते. सध्या जनतेच्या खिशातील पैसे लुटण्याचे काम मोदी सरकारकडून सुरू असून याच पैशांतून आगामी काळात ते मोठे पॅकेज जाहीर करतील, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी बुधवारी नाशिकमध्ये केली.

इंधन दरवाढी विरोधात नागरिकांचे प्रबोधन करण्याचे काम युवक काँग्रेसने राज्यभरात हाती घेतले. त्यासाठी ते शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्या की नागरिकांसाठीही इंधन स्वस्त व्हायला हवे होते. परंतु तसे होताना दिसत नाही. २००९ मध्ये १५० डॉलर प्रति बॅरल असलेले इंधनाचा दर गतवर्षी २८ डॉलरपर्यंत खाली आला. आताही तो ५० डॉलर प्रती डॉलर आहे. एक डॉलरने दर कमी झाले तरी देशाचा आठ हजार ५५६ रुपयांचा फायदा होतो. आता तर हे दर खूपच कमी झाले आहेत. तरीही आपल्याकडे इंधनाचे दर वाढत आहेत. या माध्यमातून भाजप सरकार सामान्यांची लूट करीत असल्याचा आरोप तांबे यांनी केला.
दुष्काळात इंधन व तत्सम अनेक वस्तुंवर उपकर लावण्यात आले. गतवर्षीपासून राज्यात चांगला पाऊस पडतो आहे. तरी हे कर कमी केले नाही. जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचा उद्योग भाजप सरकारकडून सुरू असून इंधनावरील सर्व कर रद्द करून केवळ जीएसटी लावावा, अशी मागणी तांबे यांनी केली. इंधन दरवाढीविरोधात अनेक पक्ष स्वतंत्ररित्या आंदोलने करीत आहेत. जनहितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलने करायला हवीत, अशी अपेक्षा तांबे यांनी यावेळी व्यक्त केली.

घरोघरी जाऊन प्रबोधन
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर वाढले, की आपल्याकडेही दर वाढतात, असा सर्वसामान्य नागरिकांचा समज आहे. म्हणूनच लोकांचे प्रबोधन करण्यासाठी कॉलेजेस, पेट्रोलपंप तसेच घरोघरी जाऊन याबाबतची माहितीपत्रके वाटण्याचा निर्णय युवक काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते पुढील पाच दिवस ही मोहीम राबविणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दांडिया नाईट’मध्ये भाग्यश्री महागंडे प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सातपूर कॉलनीतील मुक्ती महिला संस्थेतर्फे महिलांसाठी आयोजित दांडिया नाईटमध्ये भाग्यश्री महागंडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. जिजामाता विद्यालयात दांडियाचा बहारदार कार्यक्रम रंगला.
मुक्ती महिला संस्थेतर्फे महिलांसाठी १२ दिवसांचा वर्कशॉप झाला. यात परिसरातील अनेक महिलांनी सहभाग घेतला. वर्कशॉपच्या शेवटच्या दिवशी ‘दांडिया नाईट’चा कार्यक्रम झाला. यात भाग्यश्री महागंडे प्रथम आल्या. त्यांना बक्षिस म्हणून सोन्याची नथ देऊन गौरविण्यात आले. ज्योती मांडगे आणि सदफ शेख यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना अनुक्रमे १० आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात आले. याव्यतिरिक्त १३ जणींना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. तसेच नगरसेविका सीमा निगळ यांच्याकडून लकी ड्रॉद्वारे दोन विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक व मनसे गटनेते सलिम शेख, सीमा निगळ, फरिदा शेख, रोहिणी नायडू, रंजना गुंजाळ, आशा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगिता भदाणे, पूनम भारद्वाज, रेखा शर्मा, मनीषा गवळी, सुवर्णा काकुस्ते, इंदुमती भामरे, सुनंदा सोनवणे, अलका गायकवाड, शशिकला पाटील, अलका तरटे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीआयपी ट्रीटमेंट पडली महागात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंगी गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीची भक्तांना प्रतिक्षा असतानाच काही व्हीआयपी लोकांसाठी मात्र ही सेवा तात्पुरती सुरू केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आपत्ती प्रसंगीच ही सेवा देण्यात यावी, असे स्पष्ट आदेश महसूल प्रशासनाने देऊनही व्हीआयपींच्या सेवेमुळे ही अत्यावश्यक सेवा अडचणीत सापडली आहे. तसेच व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे प्रशासनाकडून ट्रॉली व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व खातेप्रमुखांची बैठक पार पडली होती. ट्रॉलीचे काम पूर्ण झालेले नाही. मानवी वाहतूक धोक्याची ठरू शकते. लोकार्पण होईपर्यंत ट्रॉलीचा वापर करू नये. आपत्ती व्यवस्थापनात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी तिचा वापर करावा. अन्य कुणालाही त्यातून सोडू नये, असे स्पष्ट संकेत कळवणचे प्रांत व तहसीलदार यांनी दिले होते. मात्र प्रशासनाच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत व्हीआयपींना ही सेवा दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे.

रोप वे टाकून चौथा ब्रेक

ट्रॉलीचे तीनही ब्रेक व्यवस्थित कार्य करीत असले, तरी हे ब्रेक फेल झाले तर सुरक्षेच्या दृष्टीने टॉली थांबविण्यासाठी ट्रालीस हूक लावून स्वतंत्र वायरलोप टाकण्याची सूचना परदेशी अभियंत्यांनी केली होती. त्यानुसार कंपनीने ट्रॉलीला नवीन रोपवे टाकून चौथा ब्रेक लावला आहे. हे काम होवूनही आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. गेल्या १ मे रोजी ट्रॉली भाविकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्तविण्यात आली होती. मात्र हे दोन्हीही मुहूर्त टळले. आता उत्सव सुरू आहे. तरीही ट्रॉली सुरू झाली नाही. त्यामुळे ट्रॉलीची प्रत्यक्ष सेवा मिळण्यास भाविकांना दसरा-दिवाळीचीच वाट बघावी लागते की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे.


प्रकल्पाच्या लोकार्पणास विलंब का?

अगोदरच तीन वर्षांपेक्षा वाढीव मुदत लाभलेली असतांना आता आणखी किती दिवस या सेवेपासून भाविकांना वंचित राहावे लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०१३ चा हा प्रकल्प २०१७ अखेर तरी पूर्ण होईल का? असा सवाल आता भाविक विचारत आहेत. सप्तशृंगी गडावरील देशातील पहिली फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. मंद‌िराच्या पायथ्यापासून ते सभामंडपापर्यंत सुयोग गुरुबक्षाणी कंपनीच्या माध्यमातून ट्रॉलीचे काम पूर्ण झाले आहे. यासह सर्व प्रकारच्या चाचण्या आवश्यक बांधकाम व सुविधा पूर्णत्वास आले आहे. वर्षभरापूर्वी कोलकाता येथून आणलेल्या वातानुकुलित दोन ट्रॉलींचीही चाचणी घेण्यात आली आहे.


गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकल्प पूर्ण होणार तरी कधी? असा प्रश्न तर आहेत. शिवाय या प्रकल्पाचे सतत वाढणारे बजेट आणि दिरंगाई कोणामुळे होत आहे? मंत्र्यांनी गेल्या महिन्यात गडावर भेट दिली. मात्र या भेटीनंतरही या प्रकल्पाला लोकार्पण का होत नाही.

- विनोद मालपुरे,

शिवसेना, उपशहरप्रमुख, कळवण.

प्रशासनाने दिलेली नोटीस मिळाली आहे. त्यामुळे ट्रॉलीतून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. फॉरेन कन्सल्टंटने सुचविलेल्या बाबींची पूर्तता अवघ्या दहा दिवसात आम्ही पूर्ण करू.
– राजीव लुम्बा, व्यवस्थापक, फ्युनिक्युलर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पगार-पाटील आमने-सामने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येत्या २ ऑक्टोबरला माजी केंदीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिकला येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित बैठकीत किसान मंचप्रमुख माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासमोर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी बागलाण राष्टवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कामे करा अन्यथा पदे खाली करा असा निर्वाणीचा इशारा पगार यांनी दिला. शेतकरी संघटनेचे माजी प्रत‌िक अध्यक्ष रामचंद्र पाटील यांना बोलण्यास मनाई केल्यामुळे पगार व पाटील यांच्यातही तणाव निर्माण झाला होता.

किसान मंच वतीने शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात आले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत पगार आणि पाटील यांच्यात वाद झाला. बागलाण तालुक्यात राष्ट्रवादी सुस्तावला आहे. पक्षाच्या युवक, महिलांसह, फादर काँग्रेस कामे करीत नाही. दरमहा आढावा बैठक होत नाही. केवळ फोटो सेशन करीत आंदोलने होत आहेत, असा आरोप जिल्हाध्यक्ष पगार यांनी बैठकीत केला. यावेळी शेतकरी संघटना माजी प्रतीक अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी आपण पक्षाचं व्यासपीठावर आलो नसून जिल्हाध्यक्ष यांनी काळजी करू नये, असे खडसून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णाला मिळाले नाशिकचे हृदय!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, अकोले

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आठ वर्षांच्या कृष्णा सदगीर याला अखेर हृदय मिळालं. नाशिकमधील ११ वर्षांच्या मुलाच्या अवयवदानामुळे कृष्णाला दुसरे हृदय मिळून त्याच्यावर बुधवारी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता कृष्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

डिसेंबर २०१६ मध्ये कृष्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले होते. तेव्हापासून त्याला हृदय मिळण्याची प्रतीक्षा होती. अखेर ९ महिन्यांची ही प्रतीक्षा संपली. नाशिकमधील ११ वर्षांच्या चिमुकल्याच्या अवयवदानामुळे कृष्णाला हृदय मिळालं. मुलाला हृदय मिळावे या करिता कृष्णाचे वडील गणेश सदगीर दिवसरात्र वाट पाहत होते. मंगळवारी अखेरीस तो दिवस उजाडला. मंगळवारी सकाळी गणेश सदगीर यांना कृष्णासाठी हृदयदाता मिळाल्याचा फोन आला. नाशिकहून हृदय मुंबईत आणण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आला होता.

यासंदर्भात बोलताना फोर्टिस रुग्णालयातील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती गारेकर म्हणाल्या की, अखेरीस कृष्णाला हृदय मिळाल्याने आम्ही खूश आहोत. कृष्णाचे वडील गणेश सदगीर निवृत्त आर्मी अधिकारी आहेत. ते म्हणाले की, हृदय मिळत नसल्याने पेसमेकर शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही कृष्णाला पुण्यातील मिलिटरी रुग्णालयात दाखल केले होते. उशिरा फोर्टिस रुग्णालयातून फोन आला की आनंदाची बातमी आहे. कृष्णाला हृदय मिळालं आहे. तुम्ही तातडीने रुग्णालयात दाखल व्हा. हे ऐकल्यावर क्षणभर विश्वासच बसला नाही. कोणताही विचार न करता पुण्यातील रुग्णालयातून मध्यरात्री २.३० वाजता डिस्जार्च घेऊन मुंबईच्या दिशेने निघालो. सकाळी १० च्या सुमारास रुग्णालयात पोहोचलो.

२० ऑगस्टला १३ वर्षांच्या सुहानावर यशस्वी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आराध्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता कृष्णाचेही हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. यासंदर्भात फोर्टिस रुग्णालयाच्या विभागीय संचालिका डॉ. एस. नारायणी म्हणाल्या की, मुळात राज्यात लहान मुलांचे हृदय प्रत्यारोपण आता मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने अशा रुग्णांना जीवनदान मिळू लागल्याने खूप आनंद होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानपीठ विजेत्यांना २२ वर्षे हेलपाटे

$
0
0

भालचंद्र नेमाडेंना नोकरशाहीचा फटका
म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्ञानपीठविजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना एका किरकोळ कामासाठी नोकरशाहीने तब्बल २२ वर्षे हेलपाट्यांची यात्रा घडविल्याचे समोर आले आहे. अखेर विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी छडी उगारल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली आणि ‘झिरो पेन्डन्सी’ मोहिमेतून घर नावावर करण्याचे नेमाडे यांचे स्वप्न साकार झाले.

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज परिसरात पाटबंधारे विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सरकारी जागा घेऊन बांधलेल्या इमारतीतील एक फ्लॅट नेमाडे यांनी १९९५ मध्ये खरेदी केला होता. फर्ग्युसन कॉलेजचा परिसर आणि तेथील वसतिगृहातील जीवन हा मराठी साहित्यात मैलाचा दगड मानल्या गेलेल्या त्यांच्या ‘कोसला’ कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. या फ्लॅटच्या खिडकीतून पूर्वी ‘फर्ग्युसन’च्या होस्टेलचे दर्शन होत असल्यामुळे त्यांना या घराविषयी जिव्हाळा निर्माण झाला होता. निवृत्तीनंतर येथेच स्थायिक व्हावे, या उद्देशाने त्यांनी हा फ्लॅट घेतला आणि त्याची रीतसर नोंदणीही केली.
सरकारकडून घेतलेल्या जागेवरील फ्लॅट पाच वर्षांनंतर विकण्याची तरतूद आहे. मात्र, नियमानुसार काही शुल्क भरून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी हे घर नव्या मालकाच्या नावावर करण्यात येते. त्यानुसार नेमाडे यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्जही दाखल केला. तेव्हापासूनच त्यांची हेलपाट्यांची यात्रा सुरू झाली. कराडमध्ये नोकरी करीत असताना ते वेळोवेळी पुण्यात येऊन या कामासाठी पाठपुरावा करीत होते. तसेच त्यांच्या परिचितांनीही यासाठी हेलपाटे घातले. मात्र, प्रत्येकवेळी काहीतरी कारणे सांगून त्यांची बोळवण केली जात असे. सर्व पूर्तता करूनही प्रश्न मार्गी का लागत नाही, या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळाले नाही. बुजऱ्या स्वभावामुळे त्यांनी कोणा वरिष्ठांनाही ही बाब सांगितली नाही. मात्र, अनेक वर्षे हे काम प्रलंबितच राहिले. अखेर एका परिचिताने त्यांना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची भेट घालून दिली आणि सर्व प्रकार कानावर घातला.

प्रशासनाचा अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या दळवी यांना सर्व पूर्तता केलेली फाइलही रखडते, यामागील ‘कारणे’ एका नजरेतच लक्षात आली आणि त्यांनी छडी हाती घेतल्यानंतर चक्रे फिरली. त्यांच्याच पुढाकाराने सुरू झालेल्या ‘झिरो पेन्डन्सी’ मोहिमेअंतर्गत या विषयाचा निपटारा करण्यात आला आणि काही दिवसांपूर्वीच सर्व प्रशासकीय पूर्तता होऊन प्रकरण मार्गी लागले. दरम्यान, फ्लॅट खरेदी केल्यानंतर नेमाडे यांनी सरकारकडे सुमारे ८० हजार रुपये भरणे अपेक्षित होते. हे प्रकरण प्रलंबित राहिल्याच्या काळात नियम बदलले आणि जवळपास दुप्पट रकमेचा भुर्दंड नेमाडे यांना बसला. तो सोसून घर आपल्या नावावर करण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण झाल्याची मालुसरे यांची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गौण खनिजांच्या अवैध उत्खननाविषयी तक्रारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना या व्यवसायातील व्यावसायिकांकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सुनील मालुसरे यांनी केला आहे. याबाबतचा तक्रार अर्ज त्यांनी पेठ पोलिस स्टेशनला दिला असून आपणास मारहाण झाल्याची तक्रार त्यामध्ये केली आहे.
पेठ तालुक्यात गौण खनिजांचे अवैध उत्खनन होत असल्याची तक्रार मालुसरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा गौणखनिज अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले. तसेच पेठ तालुक्यातील संबंधित खाणींच‌ी मोजणीही करण्यास सांग‌ितले होते. मोजणी सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी करण्याचे निश्च‌ित झाले. तक्रारदार असल्यामुळे मालुसरे यांनाही मोजणीवेळी हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ते पेठ तहसील कार्यालयात पोहोचले. तेथे भास्कर गावित नावाच्या व्यक्तीने आपणास शिवीगाळ व दमबाजी केल्याचा आरोप मालुसरे यांनी केला आहे. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मोजणीच्या ठिकाणीही आपणास दोघांनी मारहाण केल्याचा तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मालुसरे यांनी केला आहे. याबाबत पेठ पोलिसांशी संपर्क साधला असता सोमवारी (दि. २५) दुपारी चारच्या सुमारास खडी क्रशर संदर्भातील चौकशीवेळी प्रभाकर गावित यांना गणेश गवळी याने मारहाण केल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमाडमध्ये भरते गाण्यांची शाळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मध्य प्रदेशच्या निमाड परिसरातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताच्या तालावर पाठ्यपुस्तकातील धडे शिकवले जात असून त्यामुळे आमच्या या शाळेला आता गाण्यांची शाळा बोलले जात आहे. या शाळेत मध्य प्रदेश सरकारच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अभ्यासक्रमावर सॉफ्टटवेअर बनवले असून त्यांना डिजिटल शिक्षणही दिले जात असल्याची माहिती नर्मदा परिक्रमा या पुस्तिकेच्या लेखिका भारती ठाकूर यांनी दिली.
निमाडमधील महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनानिमित्त भारती ठाकूर या नाशिकला आल्या आहे. त्यांनी निमाड परिसरात केलेल्या शैक्षणिक कामांबद्दल माहिती दिली. नाशिक येथील आर्टिलरी सेंटरमध्ये काम करतानाच ठाकूर यांनी नर्मदा परिक्रम केली आणि या यात्रेवर पुस्तकही लिहले. त्यानंतर निवृत्ती घेऊन त्यांनी नर्मदा परिक्रमा परिसरातील मागस भागात शैक्षणिक काम करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या बरोबर १५ गावांमधील ६२ स्वयंसेवक काम करत आहेत. या शाळांना अत्याधुनिक करून त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. लोकवर्गणीतून सुरू झालेल्या या उपक्रमात अनेकांनी मदतीचे हात दिल्यानंतर निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट डेव्हलपमेंट असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यात आता वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहे.

रविवारपर्यंत प्रदर्शन
शैक्षणिक कामांसोबतच परिसरातील महिलांना प्रशिक्षण देणे, त्यांना प्रोत्साहन देण्याचे कामही केले जात आहे. त्यांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन नाशिक येथे ठेवण्यात आले असून त्यात इंदिरानगर येथे शनिवारपर्यंत (दि. ३०) अजय मित्र हॉल तर कल्पनानगर येथे हे प्रदर्शन रविवार, एक ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन महामंडळातर्फे टुरिस्ट फ्रेण्डसचा सत्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जागितक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे विभागातील पर्यटन क्षेत्रात मौल्यवान योगदान देणाऱ्या टुरिस्ट फ्रेंण्डस सत्कार करण्यात आला.
सिनिक टुरिझम, वाईन टुरिझम, ट्रेकिंग टुरिझम, वेलनेस टुरिझम, टेंट टुरिझम, डॅम टुरिझम, आर्ट टुरिझम, फूड टुरिझम, धार्मिक टुरिझम, मेडिकल टुरिझम यामधील व्यक्ती व संस्थेचा सत्कारार्थींमध्ये समावेश होता. पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय झालेल्या या कार्यक्रमात प्रादेशिक अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंडावरे म्हणाले, की पर्यटन विकासासाठी अनेक विभागातील व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे. पर्यटन विकासासाठी सर्व स्तरावरील सहकार्य आवश्यक आहे. अनेक स्तरातील व्यक्तींचे प्रयत्न, सहकार्य, पर्यटन आवड, पर्यटनात नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती, नवीन संकल्पना मांडून त्या पूर्णत्वास नेणे या गोष्टींचीही गरज असते. पर्यटन विकास हे शासकीय आणि खासगी अशा सर्व क्षेत्रांशी एकत्र गुंफलेली माळ असून एकाच उद्देशाने एकमेका सहाय्य करू या धर्तीवर काम चालते. त्यामुळे अशा व्यक्ती व संस्थेचा सत्कार करण्यात आला आहे.

यांचा झाला गौरव
टुरिस्ट फ्रेंण्डस म्हणून जयपालसिंग रावल, किरण चव्हाण, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. राजेंद्र नहाते, सुला विनेयार्डस, हॉटेल एक्सप्रेस इन, मनोज वासवानी, सागर वाघचौरे, विनायक पाटील, संजय खताळे, भूषण देशमुख, संजय देवधर, उमेश पठारे, विजयालक्ष्मी शंकर, श्रीधर सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गाळमुक्ती’च खोलात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी वरदान ठरू पाहणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट्य साध्य करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनाही गाळात रुतली आहे. या योजनेची विभागातील नाशिक आणि नगर ‌या दोनच जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून दोन-तीन वर्षांत राज्यात लोककल्याणकारी योजनांचा पाऊस पडत असला तरी या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे सध्या उघड झाले आहे. यातील कित्येक योजनांचे अस्तित्व तर निव्वळ कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मे २०१७ मध्ये मंत्रिमंडळाने गाळमुक्त धरण व गाळगुक्त शिवार योजना राज्यभर राबविण्यास मंजुरी दिली. राज्यातील सुमारे ३१ हजार धरणांतील गाळ काढण्याचे उद्दिष्ट्य आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी खास निधी उपलब्ध करून दिला. मात्र, अद्यापही या योजनेच्या अंमलबजावणीला विभागात मुहूर्त सापडलेला नाही. विभागातील नाशिक व नगर या दोन जिल्ह्यांचा अपवाद वगळता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनाच गाळात रुतल्याचे उघड झाले आहे.

खान्देशात योजनेला हरताळ
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेच्या अंमलबजावणीचा विभागातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत प्रशासनाला विसरच पडला आहे. या तिन्हीही जिल्ह्यांमध्ये छोट्या धरणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अद्यापही या तिन्ही जिल्ह्यांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीला मुहूर्त सापडलेला नाही. नाशिक व नगर या दोन्ही जिल्ह्यांत केवळ श्रीगणेशाच्या पुढे या योजनेला गती मिळालेली नाही.

मजुरी-इंधनाचा खर्च सरकारकडे
राज्यात नवीन धरणांची निर्मिती, त्यासाठी जमिनींचे अधिग्रहण, विस्थापितांच्या पुनर्वसनाचा खर्च परवडणारा नसल्याने अस्तित्वात असलेले लघु पाटबंधारे विभागाचे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव यातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करावयाचे असून मशिन व इंधनाचा खर्च सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे.

योजनेला घरघर
नाशिक विभागात या योजनेंतर्गत ५६९ कामाचे उद्दिष्ट्य होते. त्यापैकी ३८९ कामे पूर्ण झाली असून १३८ कामे सुरू आहेत. झालेल्या कामांमधून आतापर्यंत १० लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. या कामावर आतापर्यंत ३ कोटी २१ लाख रुपये इतका निधी खर्च झाला आहे. या योजनेचा विभागातील २१०१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून उपसलेला गाळ ६६१ हेक्टर क्षेत्रावर टाकण्यात आला. यात सुमारे २ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी लोकसहभागातील तर अवघा ७२ लाख रुपयांचा निधी शासनाने खर्च केला आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना चांगली आहे. मात्र, प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सहकार्य मिळत नाही. लवकर प्रस्ताव मंजूर होत नाही. झालेच तर केलेल्या कामाचा खर्चही देण्यास टाळाटाळ केली जाते.
- तुकाराम सोनवणे, शेतकरी

योजनेचा लेखाजोखा
जिल्हा.....उद्दिष्ट्य.....पूर्ण कामे.....लाभार्थी शेतकरी
नाशिक.....३०९.....११०..........१८२२
धुळे.....१००..........०..........००
नंदुरबार.....००.......०........००
जळगाव.....५० ०.....०.४९.....००
नगर..........११०.....२७९.....२७९
एकूण.....५६९.....३८९.....२१०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेयजल नाशकात तहानलेली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजा आणि आरोग्याचा विचार करून ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत नाशिक विभागाला ३६० कोटी निधी देऊनही दीड वर्षात एकही काम सुरू न झाल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची गुरुवारी खरडपट्टी केली. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपकुमार मीना यांना पगाराइतके तरी काम करा असे सांगून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनाही तंबी दिली.

विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यातील पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामांची आढावा बैठक नाशिकच्या विभागीय कार्यालयात घेण्यात आला. या बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उज्ज्वला पाटील, आमदार डॉ. राहुल अहिरे, दीपिका चव्हाण, सुरेश भोळे, विभागीय आयुक्त महेश झगडे, उपसचिव रुपेश जयवंशी, विभागातील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी लोणीकर यांनी हागणदारीमुक्ती व पाणी पुरवठ्यासंबधी कामांचा आढावा घेतला. नाशिक जिल्हा परिषदेसंदर्भात ते म्हणाले, की नाशिकला ४० योजनेसाठी ६४ कोटी रुपये दिले. त्यातील २२ योजनेला प्रशासकीय मान्यता दिली पण त्यातील एकही काम सुरू झाले नाही. अशीच स्थिती सर्वच विभागातील जिल्ह्यांमध्ये आहे. यापूर्वी केंद्र सरकारने निधी दिला. पण, तो खर्च न केल्याने पडून राहिला तर काही कामे अपूर्ण राहिली. त्यामुळे केंद्राने निधी बंद केला. त्यानंतर मुख्यमंत्री पेयजल योजना सुरू केली. पण, त्यात निधी देऊनही खर्च होत नसेल तर त्यास कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न करीत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्वच्छता व पाणीपुरवठा योजना हे राष्ट्रीय काम आहे. हे काम युद्ध पातळीवर करण्याची गरज आहे. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची वेतनवाढ कमी करा व सीआरवर शेरे मारा. यावेळी त्यांनी हागणदारीमुक्ती सुद्धा २०१८ मध्ये होणे गरजेचे आहे. त्यात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष्य घालणे गरजेचे आहे. काम झाले नाही तर जिल्हाधिकाऱ्यांसह जि. प. चे सीईओ यांनी बढती दिली जाणार नाही असा दमही भरला.

तक्रारीची संधी देऊ नका
हागणदारीमुक्तीची संकल्पना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. प्रत्येक जिल्हा व तालुका हागणदारीमुक्त करण्याच्या कामी प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी ते गटविकास अधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक पुढाकार घेतला पाहिजे. राज्य सरकारने भरीव निधी दिला आहे. कोणत्याही विरोधाला किंवा तक्रारीला, जागा राहणार नाही यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छता अभियानात पुढाकार न घेणाऱ्या गाव, तालुक्यात मुक्कामी जाऊन आढावा घ्यावा.

स्वच्छता अभियानासाठी १९४ कोटी
स्वच्छता अभियासाठी विभागाला १९४ कोटीचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने गरज भासल्यास सीएसआर निधीतून सहकार्य करण्यात येईल. निधीच्या उपलब्धतेबरोबर लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणणे गरजेचे असून त्यासाठी लोकजागृती आणि प्रबोधनावर भर द्यावा, असे आवाहन लोणीकर यांनी केले.

पाण्यासाठी ५१२ कोटी
लोणीकर यांनी विभागात राबविल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, की मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी ३६० कोटी, जलस्वराज्य टप्पा २ साठी ९४ कोटी राष्ट्रीय पेयजलसाठी ५८ कोटी अशी एकूण ५१२ कोटीचा निधी विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हागणदारी मुक्तीत नाशिक दुसरा
बेसलाइन सर्वेक्षणानुसार नंदुरबार जिल्ह्यात ६१ टक्के, धुळे ६९ टक्के, नाशिक ७८ टक्के, जळगाव ६३ टक्के तर नगर जिल्ह्यात ८२ टक्के शौचालये बांधण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गाव हागणदारीमुक्तीसाठी अनेाखी कल्पना राबवित विशेष प्रयत्न करणाऱ्या ग्रामसेवक किशोर विभुते, सुनील तुपे, संदीप जाधव यांचा मंत्री लोणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विशेष प्रयत्न करा
विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी या बैठकीत जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत. उद्दिष्टपूर्तता कमी असलेल्या कामांबाबत बैठक घेण्यात यावी. विभागाची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक होईल या दिशेने प्रयत्न करावे. मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे एक ते दीड महिन्यात सुरू होतील याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

शासकीय कार्यालयांना भेटी
आढावा बैठकीनंतर लोणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलिस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागा या विविध कार्यालयांना भेट दिली. जनतेपर्यंत स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे जाण्यासाठी कार्यालय स्वच्छ ठेवण्यात यावे आणि कार्यालयातील कागदपत्रांचे स्कॅनिंग करून कागदपत्रांच्या डिजिटल प्रती जतन करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बालकल्याण निधीची पुनर्स्थापना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या बजेटमध्ये महिला व बालकल्याण विभागासाठी राखीव असलेला पाच टक्के निधीवर अन्य विभागाकडून डल्ला मारण्याचे प्रकार बंद होणार आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बांधकाम विभागाने खर्च केलेला निधी महिला बालकल्याणकडे परत करण्याचे आदेश दिले आहेत.

महिला व बालकल्याण निधीची पुनर्स्थापना होणार असून हा निधी आता कॅपिटल कामांवर खर्च होणार आहे. तसेच महिला बालकल्याणचा निधी वापरतांना यापुढे महिला व बालकल्याण उपायुक्तांचा शेरा आवश्यक करण्यात आला आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाची पळवापळवी थांबणार आहे.

महिला व बालकल्याण विभागासाठी बजेटमध्ये स्वतंत्र पाच टक्के निधीची तरतूद करण्यात येते. यावर्षी महापालिकेने १३ कोटी २४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. परंतु, महिला बालकल्याण विभागाने पाच कोटींच्या वर कामे मंजूर केली आहे. तर उर्वरित निधीवर बांधकाम विभागाने डल्ला मारत तो परस्पर खर्च केला होता. त्यामुळे महिला बालकल्याण सभापती सरोज अहिरे व सदस्यांनी याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत गुरूवारी सभापती व सदस्यांसोबत बैठक झाली. त्यात महिला बालकल्याण विभागाच्या जीआरप्रमाणेच त्यांचा निधी खर्च करण्यात यावा, असे आयुक्तांनी आदेश देण्यात आले. यापूर्वी महिला बालकल्याण विभागाचा निधी जो दुसऱ्या विभागांनी खर्च केला आहे, तो छाननी करून पुन्हा त्यात विभागाकडे परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने खर्च केलेला साडेसहा कोटींचा निधी परत महिला व बालकल्याण विभागाला मिळणार आहे. तसेच बांधकाम विभागाने खर्च केलेला निधी रेग्यूलर फंडात टाकले जाणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण विभागाला मिळालेल्या निधीच्या ७५ टक्के निधी हा भांडवली कामांसाठीच वापरता येणार असून २५ टक्के निधी प्रशिक्षण व अन्य कामांसाठी वापरावा, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

उपायुक्तांचा शेराच महत्त्वाचा
महिला व बालकल्याण विभागाच्या निधीमधून कोणत्याही विभागाला यापुढे काम करायचे झाल्यास महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्तांचा फाईलवर शेरा हा सक्तीचा करण्यात आला आहे. या समितीला पाच लाखांपर्यंत कामे करण्याचा अधिकार आहे. परंतु महिला व बालकांच्या कल्याणासाठी अन्य विभागाने प्रस्ताव दिला असला तरी त्या प्रस्तावावर या विभागाचे उपायुक्तांची सही सक्तीची राहणार आहे. त्याशिवाय या विभागाचा निधी खर्च करता येणार नाही असा फतवा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ नगरपालिका हागणदारीमुक्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि सहा नगरपंचायत हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्र आता हागणदारी झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यातील मनमाड, येवला, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव, सटाणा, भगूर, त्र्यंबकेश्वर, चांदवड या नऊ नगरपालिकांचा हगणदारी मुक्त शहरांमध्ये समावेश झाला आहे. तर नगरपंचायतमध्ये पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, निफाड, दिंडोरी, यांचा समावेश आहे.
या नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग पथके कार्यान्वित करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील उघड्यावर हागणदारी क्षेत्रांना दैनंदिनी भेटी देत आहेत. तसेच पालिकेतील मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उघड्यावर हागणदारी ठिकणे मुक्त झाल्याचे जाहीर करीत तशी प्रमाणपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर केली. यानंतर जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी नगरपालिका व नगरपंचायत यांना भेटी देऊन उघड्यावर हागणदारींची ठिकाणे मुक्त झाल्याची खात्री करुन घेतली आणि त्यानंतर ही घोषणा केली. या भागात काही ठिकाणी सामूदायिक शौचलायांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवानगड मेळाव्यात वंजारी परिषद सहभागी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
भगवान गडावरील दसरा मेळाव्यास सामाजिक प्रबोधनाची परंपरा आहे. हा मेळावा यंदा कुठल्याही परिस्थितीत होणारच असा नारा देत पंकजा मुंडे यांना अखिल वंजारी विकास परिषदेने समर्थन दिले आहे.
व्ही. एन. नाईक शैक्षणिक संस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत समाजाचे नेते एन. एम. आव्हाड, प्रभाकर धात्रक आदींनी याबाबत भूमिका मांडली. आव्हाड यावेळी म्हणाले, की भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा ही समाजाच्या विचारांना दिशा देण्यासाठीचे सामाजिक व्यासपीठ अशी आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या या परंपरेस गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप विरोध करीत आहेत. हा नियोजित मेळावा गडावरच व्हावा, यासाठी अखिल वंजारी विकास परिषदेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात समन्वय आणि सामोपचाराने याबाबत निर्णव व्हावा, यासाठी परिषदेच्या वतीने महंतांना विनंती करण्यात आली आहे.
या विषयावर पार पडलेल्या परिषदेच्या बैठकीत पंकजा मुंडे यांच्यासोबत रहाण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यात मुंडे यांच्या भाषणात केवळ सामाजिक मुद्दे असतील. राजकीय मुद्दे पूर्णत: यातून वजा केले जातील. यामुळे या मेळाव्यास राजकीय दृष्टीने बघू नये, असे आवाहनही परिषदेने केले आहे. भगवानगड हा सर्व समाजाचा असल्याने तेथे राजकारण विरहीत संघटन होणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका मुंडे यांनीही मांडल्याने या मतासोबत परिषद असल्याची माहिती नेत्यांनी यावेळी दिली.

यंदाच्या दसरा मेळाव्यात नाशिक जिल्ह्यातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, एन. एम. आव्हाड, प्रभाकर धात्रक, प्रकाश घुगे, कावेरी घुगे, दामोदर मानकर, रमेश आव्हाड, शिवाजी बर्के, भगवान सानप, बाळासाहेब गामणे, संपत वाघ आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाल्यासाठी मिळेना जादा डबे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून परराज्यात जाणाऱ्या भाजीपाल्याच्या वाहतुकीस रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाने अडथळा निर्माण झाला आहे. जादा रेल्वे डबे उपलब्ध होत नसल्याने नाशिकरोड स्टेशनवर खराब होत आहे.

भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी जादा डब्याप्रश्नी खासदार हरिशचंद्र चव्हाण व खासदार हेमंत गोडसे थेट रेल्वे मंत्रालयात या अधिकाऱ्यांच्या आडमुळेपणाबाबत तक्रार करणार आहेत. तसेच जादा डबे त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रतन चावला यांनी दिली आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेद्वारे पाठविण्यात येतो. उत्तरेकडील राज्यात जाणारा बहुतांश भाजीपाला येथील शेतकरी रेल्वेने पाठविण्यास अग्रक्रम देतात. नाशवंत असल्याने जनतेपर्यंत हा माल जलद पोहचला तरच शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना जादा भावही मिळतो. या स्थानकावरून दररोज किमान २०० टन शेतमाल पाठविण्यात येतो. त्यासाठी रोज पाच डब्यांची गरज असताना रेल्वेखात्यामार्फत ही सुविधा देण्यास रेल्वे खाते टाळाटाळ करते. तसेच बड्या व्यापाऱ्यांसाठी ५६ डब्यांचा संपूर्ण रॅक उपलब्ध करून दिला जात आहे. रेल्वे मंत्रालयाने शेतमालासाठी डबे उपलब्ध करून न दिल्याने जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने रतन चावला यांच्यामार्फत खासदार चव्हाण आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या कानावर घातली. दोन्ही खासदारांनी रेल्वेच्या भुसावळ डी. आर. एम. यादव तसेच वाणिज्य अधिकारी नाईक व जनरल मॅनेजर साकेत मिश्रा, मध्य रेल्वेचे ए. जी. अग्रवाल यांना ही समस्या सोडविण्याबाबत निर्देश दिले. मात्र, दोन्ही खासदारांच्या या आवाहनाकडे रेल्वे प्रशासनाने कानाडोळा करीत आपला हेकेखोरपणा कायम ठेवला आहे.

भाजीपाल्याची वाहतूक होत नसल्याने शेतकऱ्यांसह रेल्वे विभागाचेही नुकसान होत आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास रेल्वे प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनाला सामोरे जावे लागेल. खासदार चव्हाण आणि खासदार गोडसे याप्रश्नी आता थेट दिल्ली येथे रेल्वे मंत्र्याची भेट घेणार आहे.
- रतन चावला,
सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images