Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जेईईच्या विद्यार्थ्यांना ‘आधार’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या गुणपत्रिकेवरीलच नाव आधारकार्डवर सक्तीचे करण्यात आल्याने जेईईच्या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. मुदतीत ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक असले तरी आधार अपडेशनअभावी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी याची नोंद घेतली आहे. शहरात सोमवारपासून १४ नवीन आधार सेंटर्स कार्यान्वित होणार असून, त्यापैकी चार आधार सेंटर्स केवळ जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतील अशी ग्वाही जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

नवीन आधार काढण्यासाठी, आहे त्या आधारकार्डचे अपडेशन करण्यासाठी नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिला वर्गाची त्यामध्ये अधिक फरफट सुरू आहे. याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्याने आमदार देवयानी फरांदे यांनी काही नगरसेवक आणि भाजप पदाधिकाऱ्यांसह शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचत शहरात आधार केंद्रांची संख्या वाढवा, अशी मागणी करण्यात आली. याखेरीज पेन्शनरांची तसेच जेईईच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्याकरिता स्वतंत्र आधार सेंटर्स सुरू करा, अशी मागणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. या सर्व विषयाकडे प्रशासनाचे लक्ष असून उपाययोजना देखील सुरू असल्याची माहिती यावेळी राधाकृष्णन बी. यांनी फरांदे यांच्यासह उपस्थ‌तिांना दिली. आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेशांसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘जेईई-मेन’ या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंत‌मि मुदत आहे. आधारकार्ड व शैक्षणिक कागदपत्रांमध्ये नावात थोडाही बदल असला तरी अर्ज स्वीकारला जात नाही. आधारकार्ड दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना आधार केंद्रांची शोधाशोध करावी लागत आहे. या परीक्षार्थींसाठी स्वतंत्र केंद्र सुरू करावे अशी मागणी आमदार फरांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी चार स्वतंत्र केंद्र सुरू करावीत असे आदेश महाऑनलाईनच्या समन्वयकांना दिले.

ऑनलाईन नोंदणी करा

युआयडीच्या सकेतस्थळावरही आधारकार्ड अद्यावत करता येते. युआयडीएआयडॉटइन या संकेतस्थळावर त्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर सांगितल्याप्रमाणे अपलोड केल्यास अपडेशनचे काम ऑनलाइन करता येणार आहे. अपलोड करण्यापूर्वी प्रत्येक कागदपत्रे स्वतःच्या सहीने सांक्षाकित करणे आवश्यक आहे.

…तर आमच्याकडे करा तक्रार

शहरात सर्वत्र नवीन आधार कार्ड मोफत काढून दिले जाते तर आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी २५ रुपये शुल्क आहे. त्याहून अधिक पैशांची मागणी कोणी केली तर १९४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सोमवारपासून शहरात १४ नविन केंद्रे सुरू करण्यात येतील. प्रत्येक नागरिकाचे कागदपत्र स्कॅन करून युआयडीकडे अपलोड करावे लागते. त्यामुळे एका केंद्रावर दिवसभरात ३० ते ३५ नागरिकांची नोंदणी होते. मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी यापूढे टोकन द्यावा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित

यंत्रणेला केली. तसेच शहरात आधार केंद्र सुरू करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्ते विकासाची प्रशासनालाही घाई

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक


शहरातील २५७ कोटींच्या रस्ते विकासाचा ठराव सत्तारूढ भाजपने मागच्या दाराने मंजूर केल्यानंतर प्रशासनानेही सत्ताधाऱ्यांचीच री ओढत याबाबतचा ठराव प्राप्त नसतांना हा खर्च स्पीलओव्हरमध्ये समाविष्ट केला आहे. पालिकेची आर्थिक स्थिती डामडौल असतांनाही, सत्ताधाऱ्यांचे लाड पुरवण्याच्या या प्रयत्नाने पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची शक्यता आहे.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या जादा विषयांतील प्रस्तावांना मागच्या दाराने मंजुरी दिली होती. विरोधी पक्षाच्या गोंधळानंतर महापौरांनी महासभा गुंडाळली होती. या मंजुरीवरून दीड महिन्यापासून गोंधळ सुरू आहे. मनसेच्या सत्ताकाळात मंजूर झालेल्या १९२ कोटींच्या रस्ते विकास योजनेत हाती घेतलेल्या रस्त्यांवरच डांबर ओतण्याचे काम सत्तारूढ भाजपकडून केला जात असल्याचा आरोप शिवसेना, मनसेसह विरोधकांनी केला. या आरोपांना उत्तर देत महापौरांनी २५७ कोटींच्या रस्ते विकास योजनेअंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. मात्र, त्याबाबतचा ठराव अद्याप प्रशासनाला प्राप्तच झालेला नाही.

सध्या सन २०१७-१८ चे सुधारित बजेट अंतिम करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात आयुक्त कृष्णा यांनी चालू आर्थिक वर्षातील स्पीलओव्हर अर्थात मागील मंजूर कामांच्या दायित्वात रस्ते विकास कामांचा समावेश करण्यात आल्याची माहिती दिली. यामुळे पालिकेवरील स्पीलओव्हर ७०० कोटींवर पोहोचला. महासभेचा ठराव प्राप्त झालेला नसताना स्पीलओव्हरमध्ये ही कामे गृहीत धरण्याच्या प्रशासनाच्या घाईमुळे आर्थिक डोलारा कोसळण्याची चिन्हे आहेत.

बजेटमध्ये तूट नाही

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी १४१० कोटींचे प्रारूप बजेट स्थायीवर सादर केले होते. त्यानुसारच या आर्थिक वर्षात पालिकेला उत्पन्न मिळणार असून, बजेटमध्ये कोणतीही तूट येणार नसल्याचा दावा आयुक्त कृष्णा यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलखोलनंतर ‘आरोग्य’चा हास्यास्पद खुलासा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली शहरातील बाजारपेठांमध्ये लावलेल्या कचरापेट्यांच्या खरेदीतील आरोपांबाबत आरोग्य विभागाने केलेल्या खुलाशानंतर या खरेदीतील भ्रष्टाचाराभोवतीचा संशय गडद झाला आहे. कचरापेट्यांच्या किमतींपेक्षा ओव्हरहेड व अन्य करांमुळे कचरापेट्यांची किंमत वाढल्याचा केविलवाणा दावा आरोग्य विभागाने केल्यानंतर आरोग्याच्या दाव्याची शिवसेने पुन्हा चिरफाड केली आहे. प्रशासनाने सादर केलेले बिलाची चिरफाड करत, शिवसेनेने आरोग्याची पुन्हा पोलखोल केली आहे. दरम्यान या गैरव्यवहाराचे पुरावे शिल्लक राहू नये यासाठी कचरापेट्या चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत.

शहरात लावण्यात आलेल्या कचरापेट्यांची किंमत व बाजारात उपलब्ध असलेल्या कचरापेट्यांच्या किमंतीत प्रचंड तफावत आहे. आरोग्य विभागाकडून अकरा हजार १२१ रुपयांना खरेदी करण्यात आलेले कचरापेटी बाजारात केवळ २३०४ रुपयांना उपलब्ध असल्याचे पुरावे शिवसेनेने सादर केले आहे. त्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी हास्यास्पद खुलासा केला आहे. अकरा हजार १२ रुपयांना कचरापेटी उपलब्ध करून देताना जीएसटी, ओव्हरहेड चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस आदी कारणांमुळे किंमत वाढल्याचा दावा केला आहे. परंतु शिवसेनेने इतर चार्जेस पकडून बाजारभावात हीच किंमत पाच हजारापर्यंत जात असल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेकडून पुन्हा चिरफाड

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेवून आरोग्य विभागाचा दावा खोडतांना यासंदर्भातील आकडेवारी सादर केली आहे. तसेच मुंबई महापालिकेने स्टील स्टॅण्डपोस्ट कचरापेट्या अवघ्या साडे तीन हजार रुपयांना खरेदी केल्याचा दावा केला आहे. परंतु नाशिक महापालिकेने चार पट अधिक रक्कम देवून प्लास्ट‌किच्या कचरापेट्या खरेदी करून त्यात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला. याप्रकरणी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त डॉ. बुकाणे यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काडेपेट्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

$
0
0

मनमाड

काडेपेट्या घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला या काडेपेट्यांमुळेच आग लागल्याचा प्रकार मनमाडमध्ये घडला आहे. या अपघातात हा संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. मनमाड-मालेगाव मार्गावर पहाटे ६ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

आगीचे वृत्त कळताच मालेगाव तालुका पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी आले. या अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावर सकाळी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. कारण आग विझवेपर्यंत वाहतूक थांबवण्यात आली होती.

संपूर्ण आग सुमारे ३ तासानंतर विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. तोपर्यंत वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार कार्डची डोकेदुखी सोडवा संवादातून

$
0
0

आधार कार्डच्या समस्यांवर उद्या ‘मटा संवाद’; अधिकारी देणार प्रश्नांना उत्तर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्तीसाठीच्या सक्षम यंत्रणेअभावी नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना या समस्या खुलेपणाने मांडता याव्यात आणि त्यांच्या समस्यांवर प्रशासनाकडून लगेचच उत्तरेही मिळावीत यासाठी महाराष्ट्र टाइम्सने ‘मटा संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. उद्या (दि.१९) गंगापूर रोडलगतच्या आकाशवाणी टॉवरजवळील केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दुपारी चार ते सहा यावेळेत हा संवाद होईल. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि त्यांचे सहकारी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत.

सरकारने आधारलिंकिंग सक्तीचे केले आहे. त्यासाठी आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. बहुतांश लोकांनी २०११ व आसपासच्या काळात आधार नोंदणी केली आहे. या आधार कार्डवर संबंधित व्यक्तींची पूर्ण जन्मतारीख, मोबाइल क्रमांक नाहीत. निवासाचा पत्ता, नाव, फोटो यामध्येही चुका आहेत. अशा सर्वांनाच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे अनिवार्य झाले आहे. केवळ या दुरुस्त्या न केल्यामुळे त्यांना बँक, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, विमा कंपन्या, मोबाइल कंपन्या, हॉस्प‌िटल्स, शाळा, कॉलेजेस यांसह बहुतांश ठिकाणी अपडेटेड आधार कार्डस् सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आधार कार्ड दुरुस्तीसाठी नागरिकांनी आधार सेंटर्सवर धाव घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

आधार लिंकिंगअभावी नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून, त्यामुळे वादाचेही‌ प्रसंग उद्भवू लागले आहेत. याबाबतच्या तक्रारींचा ओघ वाढू लागल्याने महाराष्ट्र टाइम्सने आधार या विषयावर ‘मटा संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये आधारबाबत येणाऱ्या अडचणी नागरिकांना खुलेपणाने मांडता येणार आहेत. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि त्यांचे सहकारी नागरिकांना देणार आहेत. या उपक्रमात नागरिकांना आधारबाबतच्या समस्यांची उत्तरे जाणून घेता येणार असल्याने त्यांनी या ‘मटा संवाद’ उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र टाइम्सतर्फे करण्यात आले आहे.

या प्रश्नांची मिळणार उत्तरे

आधार सेंटर्सचे कोठे आहेत, आधार दुरुस्ती‌ कोणासाठी आवश्यक आहे, परिपूर्ण आधार कार्डवर कोणती माहिती असावी, आधार दुरुस्तीसाठी काय करावे, बोटांचे ठसे जुळत नसतील तर काय करावे, प्रशासन आधारसाठी टोकन कोठे देते, आधार दुरुस्तीसाठी ठरलेले शुल्क किती, अधिक शुल्क आकारल्यास तक्रार कोणाकडे करावी, आधार कार्ड हरविल्यास काय करावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुळेना शस्त्रसाठ्याचा हिशेब!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून चोरी करून मुंबईकडे जाणारा शस्त्रसाठा नेमका किती होता, याची जुळवाजुळव करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. पोलिसांनी चुप्पी साधल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले असून, मुंबईकडे जाणाऱ्या शस्त्रसाठ्याचे नक्की काय होणार होते हे समोर येऊ शकलेले नाही.

नाशिक ग्रामीण पोलिस दलाने जप्त केलेला आणि प्रत्यक्षात उत्तर प्रदेशातून चोरीस गेलेल्या शस्त्रसाठ्यात तफावत आढळून येते. वाहनचालक नागेश राजेंद्र बनसोडे (वय २३), तसेच सलमान अमानुल्ला खान (१९, रा. शिवडी, मुंबई) बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमित (२७, रा. शिवडी, मुंबई) या तिघांनी मिळून बांदा जिल्ह्यातील सर्वांत मोठे समजले जाणारे पंजाब आर्म्स सेंटर या दुकानावर दरोडा घालून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र लंपास केले. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. निवडणूक काळात लायसन्स असलेली शस्त्रे जमा करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. महाराष्ट्रात अशा प्रकारे आदेश निघाल्यास परवानाधारक शस्त्रे जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जमा केली जातात. उत्तर प्रदेशमध्ये मात्र परवानाधारक शस्त्रे बंदुकीची विक्री करणाऱ्या दुकानातच ठेवली जातात. दुकानदार शस्त्रे जमा करणाऱ्या व्यक्तींची, तसेच शस्रास्रांची नोंद करून घेतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान या दुकानात २०० रायफल, रिव्हॉल्व्हर, तसेच सहा हजारांहून अधिक काडतुसे जमा करण्यात आली होती. याशिवाय दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेला शस्त्रसाठादेखील होता. या दुकानातील काही अनियमित कामांमुळे हिशेबाचा गोंधळ उडतो आहे. संशयित आरोपींनी रेकी करीत बुधवारी रात्रीच्या सुमारास दुकानाच्या चौकीदारास बंधक बनवून शस्त्रास्त्रे लुटली. नाशिकमध्ये गुरुवारी सायंकाळी हा शस्त्रसाठा पकडला त्या वेळी फक्त ४१ शस्त्रे आणि ४,१४३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शस्त्रांच्या संख्येत मोठी तफावत असून, हाच पोलिसांसाठी कळीचा मुद्दा ठरतो आहे. उर्वरित शस्त्रे कोठे गेली, याचा शोध लागणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामीण पोलिस दलाच्या आडगाव येथील कार्यालयात रविवारीदेखील वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकून होते. याशिवाय इतर ठिकाणावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील हजेरी लावली. मात्र, प्रकरण संवेदनशील असल्याचे सांगत पोलिसांनी चुप्पी साधली आहे.

तीन राज्ये, १९ तासांचा प्रवास!

संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांनी रेकी करून बांदा जिल्ह्यात दरोडा घातला. मागील महिन्यातच १४ नोव्हेंबर रोजी एका कंपनीवर छापा मारून स्थानिक पोलिसांनी अवैध हत्यारांचा मोठा साठा जप्त केला होता. अवैध हत्यारांच्या तस्करीत हा परिसर सक्रिय असल्याचे दिसते. अशा स्थितीत मुंबईतील तीन गुन्हेगार वाहनाने प्रवास करीत बांदा येथे पोहोचले. तिथे दरोडा घालून त्यांनी चक्क बंदुकांचे दुकान लुटले. तेथून तीन राज्ये ओलांडून एक हजार किलोमीटरचे अंतर कापून ते नाशिकमध्ये पोहोचले. सलग प्रवास केला तरी या प्रवासासाठी २० तास लागतात. एवढ्या मोठ्या कालावधीत तीन राज्यांमधील गुप्तचर यंत्रणा, दहशतवादविरोधी पथक, स्थानिक पोलिस, बॉर्डर चेक पोस्ट अशा कोणालाच भनकही लागली नाही हे विशेष. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह महाराष्ट्र या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असून, पोलिस यंत्रणेतील सुस्तीबाबत खुद्द पोलिस यंत्रणांमध्येच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये पेट्रोलपंपावर ही घटना घडली नसती तर संशयित विनासायास मुंबईत दाखल झाले असते.

आणखी एकास अटक

मुंबईकडे जाणाऱ्या मोठ्या शस्त्रसाठ्याच्या तस्करीत पोलिसांनी रविवारी एका संशयितास मुंबई येथून अटक केली. या गुन्ह्यात संशयित आरोपींची संख्या चार झाली असून, या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान अद्याप कायम आहे. पोलिसांनी रविवारी अटक केलेल्या संशयित आरोपीची ओळख उघड करण्यास नकार दिला. संशयिताला नाशिकला आणून चौकशी केल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. नागेश राजेंद्र बनसोडे (वय २३), तसेच सलमान अमानुल्ला खान (१९, रा. शिवडी, मुंबई), बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमित (२७, रा. शिवडी मुंबई) या तिघांसमवेत हा संशयित उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात गेला होता. तिथे शस्त्रांची लूट केली. पैकी तिघांना गुरुवारी सायंकाळी नाशिक ग्रामीण पोलिस दलाने चांदवड टोलनाक्याजवळ अटक केली. एकूण शस्त्रे आणि जप्त झालेली शस्त्रे यांच्यात तफावत असल्याने या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असावा, असा पोलिसांचा कयास होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी तीन पथके तपासासाठी मुंबईला रवाना केली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी आज एका संशयितास अटक केली. परतीच्या प्रवासात तो अटक केलेल्या आरोपींसमवेत नव्हता. त्यामुळे उर्वरित शस्त्रसाठा त्याच्याकडून हस्तगत होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. हा आरोपीदेखील सराईत असून, अंडरवर्ल्ड गँगशी संबंधित असल्याची माहिती समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगांच्या फटकाऱ्यांतून निसर्गचित्रांची मांडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सभोवतालचे पर्यावरण, निसर्ग सौंदर्य, त्यांत ऋतूनुसारच ओघाने बदलणाऱ्या लुब्ध रंगछटा यांतली संवेदनशीलता सूक्ष्मतेने एखाद्या कलाकाराला खुणावू शकते, आकर्षित करू शकते. अशाच एक प्रयत्न चित्रकार किरण सोनार यांनी त्यांच्या विविध कलाकृतीतून केला आहे.

सौंदर्यात्मकच नव्हे तर त्यापलीकडे जाऊन मानवी जीवनाचे, गहिरे रूप, मानवी भावभावना आणि वास्तव यांतील सुप्त संघर्ष रसिकांना पहावयास मिळत आहेत. प्रदर्शनामध्ये सोनार यांनी अ‍ॅक्रिलिक रंगाचा वापर करून काढलेल्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन शिखरेवाडी येथील पासपोर्ट कार्यालयाशेजारी असलेल्या पी. एन. जी. च्या कलादालनात भरविण्यात आले आहे. हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, बुधवार (दि. २०) पर्यंत सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत पाहता येणार आहे.

माझे मन शांत, निर्मल आणि निर्भय राहते. त्याच शांतीतून मला अमोघ ऊर्जा मिळून रंग बोलू लागतात, ब्रश खेळू लागतात.

किरण सोनार, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा पारा १२.६ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या २४ तासांत नाशिकमध्ये तापमानाचा पारा २.२ अंश सेल्स‌िअसने घसरला असून, वातावरणातील गारठा वाढल्याचा अनुभव रविवारी नाशिककरांनी घेतला. शहरात रविवारी किमान तापमान १२.६ अंश सेल्स‌िअस नोंदविले गेले. पुढील आठवड्यात तापमान आणखी खाली घसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

डिसेंबरचा दुसरा आठवडा संपला असून, अजूनही नाशिकमध्ये हुडहुडी भरेल अशा थंडीला सुरुवात झालेली नाही. गेल्या आठवडाभरात तर तापमानाचा पारा सातत्याने कमी-अधिक होत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. १० डिसेंबर रोजी १५.४ अंश सेल्स‌िअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली होती. आठवडाभरात सर्वांत कमी तापमान १४ डिसेंबर रोजी ११.४ अंश सेल्स‌िअस एवढे नोंदविण्यात आले. त्यानंतर शनिवारी (दि. १६) पुन्हा हे तापमान १४.८ अंश सेल्स‌िअसपर्यंत पोहोचले होते. गेल्या २४ तासांमध्ये ते १२.६ अंश सेल्स‌िअसपर्यंत खाली आले आहे. महाबळेश्वर आणि पुण्यामध्ये १३ अंश सेल्स‌िअस तापमान नोंदविण्यात आले. त्यापेक्षाही कमी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. शनिवारी राज्यातील किमान तापमानाची (१२.८) ब्रह्मपुरी येथे नोंद झाली होती. त्याहूनही कमी तापमान रविवारी नाशिकमध्ये नोंदविले गेले. आठवडाभरात कमाल तापमानात मात्र फारसे चढ-उतार राहिलेले नाहीत. ते २८ ते ३० अंश सेल्स‌िअस एवढे नोंदविण्यात आले आहे.

--

पुढील आठवडा गारेगार

नाशिकमध्ये पुढील आठवड्यात थंडीचा जोर वाढेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी १२.६ अंश सेल्स‌िअस तापमान नोंदविण्यात आले असले, तरी सोमवारपासून ते कमी कमी होत जाईल. २२ डिसेंबरपर्यंत किमान तापमान ३.६ अंशांनी खाली उतरून ९ अंश सेल्स‌िअसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून नाशिककरांना थंडीचा आनंद घेता येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

--

आठवड्यातील तापमान असे...

--

दिनांक किमान तापमान कमाल तापमान

--

१० डिसेंबर १५.४ २९.२

११ डिसेंबर १४.० २९.१

१२ डिसेंबर १३.२ २८.१

१३ डिसेंबर ११.६ २८.०

१४ डिसेंबर ११.४ २९.६

१५ डिसेंबर १३.० २९.८

१६ डिसेंबर १४.८ ३०.०

१७ डिसेंबर १२.६ २८.१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृतिका जंगीनमठ स्वरनेत्र स्पर्धेत अव्वल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि नॅब डॉ. मोडक सेंटरतर्फे झालेल्या स्वरनेत्र या दोन दिवसीय मराठी- हिंदी गायन स्पर्धेत कृतिका जंगीनमठ या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अर्जुन वाघमोडे याने द्वितीय, तर आशिक पाटील याने तृतीय क्रमांक मिळवला. पूजा मालधुरे, अभिजित राऊत, कासिम बेग यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

स्पर्धेसाठी १५० स्पर्धकांनी हजेरी लावली होती. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात हा कार्यक्रम झाला. रोटरीचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल, सचिव मनीष चिंधडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे मकरंद हिंगणे, अॅड. विलास लोणारी, नॅब मोडक सेंटरच्या शाहीन शेख, श्याम पाडेकर, डॉ. बापये, पी. एन ट्रस्टच्या वाघ उपस्थित होते. प्रसिद्ध गायक आनंद अत्रे, मीना परुळेकर-निकम परीक्षक होते. अनिल सुकेणकार, सोनाली जोशी, गौरव सामनेरकर, गौरी पाठक, शिल्पा येवले यांनी सहकार्य केले. मनीष चिंधडे यांनी सूत्रसंचालन केले. मृदुला बेळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधराशे टन द्राक्ष निर्यात

$
0
0

यंदा निर्यातीत होणार भरघोस वाढ; सर्वाधिक निर्यात रशियामध्ये

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत १५०० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. डिसेंबरअखेर आणि जानेवारी महिन्यापासून द्राक्ष निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी एकट्या नाशिक जिल्ह्यांतून ९० टक्के द्राक्ष निर्यात केले जातात.

नाशिक जिल्ह्यातून या हंगामातील द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून, १३६० टन द्राक्ष रशिया, ६० टन मलेशिया आणि ८० टन द्राक्ष हे श्रीलंका या देशांमध्ये निर्यात करण्यात आले आहेत. मागील वर्षी २०१६-१७ च्या वार्षिक हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यातून १ लाख ३१ हजार टन द्राक्ष निर्यातची विक्रमी नोंद झाली होती. कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३.५ लाख एकर एकरमध्ये द्राक्षाची लागवड झाली असून, त्यापैकी दोन लाख एकर एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाली आहे. द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी एकट्या नाशिक जिल्ह्यांतून ९० टक्के द्राक्ष हे निर्यात केले जातात.

निर्यातक्षम क्षेत्रातही वाढ

नाशिक जिल्ह्यातून युरोपसाठी निर्यातक्षम द्राक्षांची नोंदणी ४० हजार ११० एकर इतकी झाली आहे. सुमारे २५,०५७ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. परंतु, निर्यातक्षम द्राक्षांसाठी रशिया, चीन, इंडोनेशिया, अरब राष्ट्रासाठी नियम खूप कडक केले आहेत. हे नियम जर शिथिल केले तर भारतीय द्राक्ष निर्यातीत भरघोस वाढ होऊ शकते, असे निर्यातदार व्यापारी मधुकरराव क्षीरसागर यांनी सांगितले.

गुणवत्तेमुळे मागणीत वाढ

सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ द्राक्षांनी केवळ गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले असून, दरवर्षी भारतातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी वाढतीच आहे.

भारतीय द्राक्षांची चिलीशी स्पर्धा

निर्यातक्षेत्रात भारतीय द्राक्षांची अनेक वर्षांच्या मोनोपॉलिला मागच्या वर्षापासून चिली या देशाने आव्हान दिले आहे. मागील वर्षी चिलीच्या द्राक्षांनी चांगलाच भाव खाल्ला होता. त्याचा परिणाम भारतीय द्राक्षाच्या निर्यातीवर झाला होता. चिलीत द्राक्षाच्या ३० ते ३५ व्हरायटी आहेत. भारतीय द्राक्षांच्या मात्र तीन ते चार व्हरायटीच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जसरंगी जुगलबंदीने हरखले नाशिककर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पं. भानुदास पवार स्मृती समारोहाचा समारोप रविवारी झाला. या वेळी जसरंगी जुगलबंदी सादर करण्यात आली. या अनोख्या जुगलबंदीमुळे नाशिककर प्रेक्षक हरखून गेले.

जसरंगी जुगलबंदीचा प्रारंभ ज्ञानेश्वर कासार आणि मधुरा बेळे यांच्या जसरंगी जुगलबंदीने झाला. यात ज्ञानेश्वर कासार यांनी राग अभोगीमध्ये ‘पिया के घर’, तर मधुरा बेळे यांनी कलावती रागातील ‘प्यारा बनरा’ या विलंबित एकतालातील ख्यालाने या जुगलबंदीची सुरुवात केली. यानंतर ‘कारी घटा घिर आयी’ ही द्रुत एकतालातील बंदीश सादर केली. यानंतर काही भक्तिगीते सादर करण्यात आली. संवादिनीला पंडित सुभाष दसककर, तर तबल्यावर पंडित नितीन पवार, पंडित नितीन वारे यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमादरम्यान सत्यजित तळवलकर यांच्या हस्ते सुदर्शन कांबळे, विनय निकम, आशुतोष इप्पर, स्वयम तांबट या चार होतकरू विद्यार्थ्यांना सरावासाठी तबलाजोडी प्रदान करण्यात आली. उत्तरार्धात पंडित सत्यजित तळवलकर यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी एकतालात उठाण, पेशकार, कायदे, रेले, चलन, गत, तुकडे, मोहरे, चक्रदार, परण आदी रचना सादर केल्या. त्यांच्या वादनावर श्रोते मुग्ध झाले. तळवलकर यांना संवादिनीची साथ प्रशांत महाबळ यांनी केली.

कार्यक्रमात एसडब्लूएस कंपनीतर्फे गुरुकुल परिवार संघ, महाराष्ट्र समाजसेवा संघ यांना रघुवीर अधिकारी यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली. प्रारंभी रघुवीर अधिकारी, मनीषा अधिकारी, नितीन पवार, संदीप देशमुख, दीपक कुलकर्णी, अविराज तायडे, भास भामरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. या वेळी महोत्सवाबद्दल तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनेत्रा महाजन-मांडवगणे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तोतया पोलिसांपाठोपाठ शहरात चेन स्नॅचर्स सक्रिय झाले असून, चोरट्यांनी एकाच दिवसात दोन ठिकाणी हात साफ केला. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारची ही तिसरी घटना ठरली आहे. शनिवारी पाथर्डी फाटा येथील वासननगर, त्यानंतर अशोका मार्ग परिसरात चोरट्यांनी महिलांचे मंगळसूत्र तोडून धूम ठोकली.

अशोका मार्ग येथील राजकुमारी देवेंद्रसिंग ठाकूर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलीसह घराकडे पायी निघाल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी राजकुमारी यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन तोडून धूम ठोकली. घटनेची मुंबई नाका पोलिसांनी नोंद केली. दरम्यान, मंदा कैलास अहिरे (रा. वासननगर) यांच्याही गळ्यातील एक लाख रुपयांची सोन्याची चेन चोरट्यांनी हातोहात लंपास केली. शुक्रवारी (दि. १५) रात्री आठच्या सुमारास मंदा अहिरे वासननगर येथून घराकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची पोत तोडून पोबारा केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनोरंजन’चा आज फैसला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या बोटी पर्यटनमंत्र्यांनी पळविल्याचा मुद्दा गाजत असतानाच गंगापूर धरणालगत जलसंपदा विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मनोरंजन पार्कची निविदा आज, सोमवारी (दि. १६) उघडणार अाहे. आता ही निविदा निकषांत बसते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, या पार्कचा फैसला आज होण्याची चिन्हे आहेत.

याअगोदर काढलेल्या निविदेवरून विजय वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राजकीय पाठिंबा असलेल्या कंपनीला हा ठेका मिळावा म्हणून निविदा प्रक्रियाच रद्द केल्याचा आरोपही त्यांनी मागील निविदेवर केला आहे. तब्बल सात एकरवर तयार करण्यात आलेले हे मनोरंजन पार्क पर्यटकांसाठी खुले करावे, अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर जलसंपदा विभागाने हे काम पूर्ण केले. त्यानंतर या मनोरंजन पार्कची देखभाल करण्यासाठी निविदा काढली. त्यात पहिली २६ जुलैला काढलेली ई निविदा वादात सापडली. लक्ष्मी एंटरप्रायजेसचे पार्टनर विजय वानखेडे यांनी ही निविदा भरली होती. सर्वाधिक सात कोटींची निविदा भरूनही ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आल्यामुळे त्यांनी थेट न्यायायलात धाव घेतली. सात जणांनी या निविदा भरल्या होत्या. या निविदेमध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नव्हती. एका कंपनीला निविदा देण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू होती. त्यासाठी वेळोवेळी कायदा मोडून बदल केले, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर दुसरी निविदा काढण्यात आली. त्यात तीन जणांनी टेंडर भरले आहेत. आता त्यातून काय निर्णय होतो, हे पुढे येणार आहे. मनोरंजन पार्कच्या निविदांमध्ये तीन वर्षांचा अनुभव हा महत्त्वाचा निकष होता. गेल्या वेळेसच्या निविदांमध्ये फक्त एकाकडेच हा अनुभव असल्याचे जलसंपदाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे वानखेडेंचा दावाही ते खोडून काढतात. त्यामुळे या निविदा प्रक्रियेचा घोळही वाद निर्माण करणारा ठरला, तर पुन्हा मनोरंजन पार्क रखडणार आहे.

--

मागणीकडे होतेय दुर्लक्ष

नाशिकमध्ये पर्यटनाला चालना मिळावी यासाठी बोट क्लब व मनोरंजन पार्क सरकारच्या अनास्थामुळे सुरू झालेले नाही. ते पर्यटकांसाठी खुले करावे, अशी मागणी पर्यटकांसह नागरिकांकडून होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संतापही आहे. मनोरंजन पार्कमध्ये उद्यान, हॉटेल, भव्य लॉन्स व राहण्यासाठी प्रशस्त कॉटेज बनविण्यात आले आहेत. ते सुरू झाल्यास त्याचा आस्वाद सर्वांना मिळणार आहे. आता त्याचा फैसला आज होणार आहे.

---

मनोरंजन पार्कसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात तीन निविदा आल्या आहेत. एक-दोन दिवसांत त्या उघडल्या जाणार आहेत. त्यात तांत्रिक व आर्थिक असे दोन निकष आहेत. तांत्रिक निकषांच्या निविदा आधी उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर आर्थिक निकषांची निविदा उघडली जाईल. त्यात या निविदा नियमानुसार असेल, तर संबंधितांना हे काम दिले जाणार आहे.

-राजेंद्र शिंदे ,कार्यकारी अभियंता, जलसंपदा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धविहाराची सभा मुद्द्यावरून गुद्द्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

येथील देवी चौकातील दीनबंधू डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि महाकर्मभूमी बुद्धविहाराच्या विश्वस्तांच्या अनागोंदी कारभारावर भारतीय बौद्ध महासभेतर्फे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची सभा बोलावण्यात आली होती. आरोप- प्रत्यारोपांमुळे ही सभा मुद्द्यावरून थेट गुद्द्यावर आल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. या वादात ज्येष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर वादावर पडदा पडला. प्रकाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकरोड बुद्धविहार बचाव कृती समितीची स्थापना या वेळी करण्यात आली.

नाशिकरोडमधील देवी चौकात महाकर्मभूमी बुद्धविहार आहे. बुद्धविहाराच्या देखभालीसाठी १९९४ मध्ये बुद्धविहार पब्लिक ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. ट्रस्टच्या स्थापनेवेळी असलेल्या २१ पैकी सध्या केवळ १० विश्वस्त कार्यरत आहेत. या विश्वस्तांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभा व इतर काही संघंटनांनी केला. त्या पार्श्वभूमीवर ही सभा देवी चौकात झाली. बुद्ध विहाराच्या सध्याच्या विश्वस्तांकडून मनमानी कारभार सुरू असून भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून ही सभा भरकटली. शेवटी मुद्द्यावरून ही सभा थेट गुद्द्यावर येऊन पोहोचल्याने काही वेळ बुद्धविहाराचा जणू आखाडाच झाला. हा वाद काही वेळाने सार्वजनिक रस्त्यावरही पोहोचला.

बौद्ध महासभेचे आरोप

बुद्धविहाराच्या विद्यमान विश्वस्तांनी ठरल्याप्रमाणे विहारातील मूळ मूर्तीचे संवर्धन केले नाही, असा आरोप भारतीय बौद्ध महासभेचे चारुदास भालेराव यांनी केला. मूळ मूर्तीसह डॉ. बाबासाहेबांनी वापरलेली येथील ऐतिहासिक खुर्ची गायब असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांना बुद्धविहार ट्रस्टचे सभासद होण्यास मज्जाव करणे, समाजबांधवांना धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाई करणे, विहाराच्या नावाखाली निधी उकळणे आदी आरोपही त्यांनी केले. या विहाराच्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला असल्याचा जाहीर आरोप अमोल घोडे यांनी या सभेत केला.

वादाला फुटले तोंड

विश्वस्तांवर झालेल्या आरोपांवर भीमशक्ती संघटनेचे जगदीश पवार यांनी आक्षेप नोंदवला. ज्याचे चुकले असेल त्यांना जरूर जाब विचारा, तसेच आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या, असा आग्रह त्यांनी धरला. येथेच वादाला तोंड फुटले. समाजबांधवांना एकमेव बुद्धविहार सांभाळता येत नसल्याबद्दल पवार यांनी खेद व्यक्त केला. त्यानंतर बौद्धाचार्य पी. के. गांगुर्डे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रीतसर तक्रार करण्याची सूचना मांडली. राजू जगताप, प्रकाश भालेराव, सभेचे अध्यक्ष शैलेंद्र गांगुर्डे यांनीही सभेत विश्वस्तांच्या कामकाजाला कडाडून विरोध दर्शविला.

सभेस बुद्धविहाराचे विलास गांगुर्डे एकमेव विश्वस्त उपस्थित होते. याशिवाय रविकांत भालेराव, इंद्रजित भालेराव, आर. पी. पगारे, रवींद्र जाधव, स्वप्निल घायवटे, राहुल माने, विजय धीवर, गौतम कर्डक, जी. जी. चंद्रमोरे, मनोज बर्वे, दिलीप भालेराव, शंकरराव नेटावणे, सुनील खडांगळे, सागर भालेराव, रवींद्र शिरसाठ आदींसह बौद्ध महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३५४ शेतकऱ्यांना कर्जमाफी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील ३३५४ शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत तालुक्यात कर्जमाफीपोटी एकूण १२ कोटी ७२ लाखांची रक्कम मिळाली आहे. यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के प्रोत्साहन अनुदानही प्राप्त झाले आहे. तर, दीड लाखाच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम माफ झाली आहे. बँकाकडून ही कर्जमाफीचा रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखाती वर्ग करण्यात आल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जखाती कर्जमाफीच्या रक्कम वर्ग होण्यास प्रारंभ झाला असून, शेतकऱ्यांना याबाबत संदेशही मोबाइलवर प्राप्त होऊ लागले आहेत. इगतपुरी तालुक्यात एनडीसीसी बँकेकडून सर्वाधिक कर्जाचा पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, दीड लाखावरील थकीत कर्जदारांना उर्वरित रक्कम ३१ मार्चपर्यंत भरावी लागणार आहे.

इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक शेतकरी कर्ज जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले होते. शासनाच्या या कर्जमाफी योजनेनुसार ३ हजार ३५४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून, १२ कोटी ७२ लाख २० हजार २३७ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यापैकी ३२११ शेतकरी लाभार्थ्यांना १२ कोटी ३५ लाख ४२ हजार ३८४ रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपट्टीचा नाहक भुर्दंड

$
0
0

नाशिकरोड बसस्थानकावरील टाकी कोरडी; कर्मचारी पाण्याविना

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांसह एसटीच्या कर्मचाऱ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या बसस्थानकावरील पिण्याच्या पाणीची टाकी दररोज कोरडीठाक राहूनही एसटी प्रशासनाला पाणीपट्टी भरावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नाशिकरोड बसस्थानकावरील पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन गायब झाले आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून डोळे झाकून पाण्याची पट्टी भरणे सुरूच आहे. या बसस्थानकावरील नळ कनेक्शनचा इतरत्र बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वापराकडेही एसटीचे वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत असल्याने एसटीचे वरिष्ठ अधिकारी व बेकायदेशीरपणे येथील नळ कनेक्शनचा वापर करणाऱ्यांत साटेलोटे असल्याचे यावरून उघड झाले आहे.

शहरातील प्रमुख बसस्थानकांपैकी एक बसस्थानक असलेल्या नाशिकरोड बसस्थानकावर गेल्या दोन वर्षांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत महापालिकेच्या पाणीपट्टी वसुली विभागाकडून नाशिकरोड बस स्थानकाला पिण्याच्या पाण्याचे बील दिले जात आहे. एसटी प्रशासनाकडूनही या बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसतानाही डोळे झाकून ते भरणे सुरू आहे. या बसस्थानकावर दिवसभरात सुमारे चारशे बसेसच्या फेऱ्या होतात. या बसद्वारे सुमारे २५ हजार प्रवाशांची दररोज या बसस्थानकात ये-जा होत असते. तरीही या बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

नाशिकरोड बसस्थानकावर सिंहस्थ कुंभमेळ्यापासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही. बस स्थानकाच्या नावाने पाण्याचे अधिकृत कनेक्शन आहे. याबाबत विभागीय कार्यालयाकडे लेखी कळविले होते. त्यांनी पाण्यासाठी सिंटेक्सची टाकीही दिली. परंतु, त्यासाठी पाण्याचे कनेक्शन अद्यापही जोडून मिळालेले नाही.

-सोमनाथ जाधव, वाहतूक नियंत्रक, नाशिकरोड बसस्थानक

महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर दबाव

येथील बसस्थानकावर गेल्या सिंहस्थापूर्वी पिण्याच्या पाण्याचे अधिकृत नळ कनेक्शन होते. मात्र सिंहस्थ काळात नाशिकरोड बसस्थानकावर विकासकामे झाली. त्यादरम्यान येथील पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आले होते, तेव्हापासून येथील पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन बसस्थानकावरील सुलभ शौचालयाचा ठेकेदार बेकायदेशीररित्या वापरत असल्याचा आरोप या बसस्थानकावरील अधिकाऱ्यांनी केला. त्यासंदर्भात एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी कळवूनही वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने या प्रश्नावर सर्वांनीच तोंडावर बोट ठेवणे पसंत केले आहे.

रेकॉर्डवरील नळ कनेक्शन गायब

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या रेकॉर्डनुसार नाशिकरोड बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून बसस्थानकावरील पिण्याच्या पाण्याची पट्टी दरवर्षी भरली जाते. परंतु, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असून, हे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन सिंहस्थ कुंभमेळ्यापासून गायब झालेले आहे. नाशिकरोड बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन नसतांनाही राज्य परिवहन महामंडळाचे स्थानिक कार्यालयातील अधिकारी राजरोसपणे पाणीपट्टीचा भरणा करीत आहेत. त्यामुळे आता या गायब झालेल्या कनेक्शनचे बील का भरले जातेय, हाही संशोधनाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिसमस केक वर्कशॉपद्वारे मिळाल्या टिप्स

$
0
0

कल्चर क्लबच्या आयोजनास सहभागींचा प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ब्लॅक फॉरेस्ट, व्हाइट फॉरेस्ट, पाइनॅपल केक, वॉलनट बनाना ब्राऊनी, मोचा हेजलनट ब्राऊनी अशा एकापेक्षा एक उत्तम प्रकारच्या केकचे व ब्राऊनीचे प्रकार रविवारी (दि. १७) कल्चर क्लबच्या सभासदांना शिकायला मिळाले.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ख्रिसमसनिमित्त सिझलिंग ब्राउनी आणि ख्रिसमस स्पेशल फ्रूट केकचे वर्कशॉप स्व. प्रमोद महाजन गार्डनच्या मागे असलेल्या ऑलिव्ह गार्डन रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आले होते.

या वर्कशॉपला उपस्थित असलेल्या महिलांना ख्रिसमस स्पेशल फ्रूट केकमध्ये ड्रायफ्रूटपासून ते मसाले कसे वापरले जातात, तसेच हा केक नेमका कसा बनवितात हे शिकवण्यात आले. त्याचप्रमाणे फ्रूट केक बनविताना त्यात कोणकोणत्या प्रकारची फळे वापरायची याची माहिती सांगण्यात आली. घरात असलेले जिन्नस वापरून केक कसा चांगल्या पद्धतीने तयार केला जातो याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

घरात असलेले गव्हाचे पीठ वापरुन कशाप्रकारे केक तयार केला जाऊ शकतो हेदेखील दाखवण्यात आले. याच वर्कशॉपमध्ये मोका हेजलनट सिझलिंग ब्राउनी, बेक न करता सिझलिंग ब्राउनी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिझलिंग ब्राउनी शिकवण्यात आल्या. केक तयार झाल्यानंतर बेक करण्याची सर्वात मोठी प्रोसेस असते. तो जर व्यवस्थित बेक झाला तरच त्याचा चांगला स्वाद येतो. अनेकदा काही लोकांकडे बेक करण्यासाठी मायक्रोवेव्ह नसतो अशावेळी कुकरमध्ये तो कसा बेक करायचा, त्याला तडे न जाऊ देण्यासाठी काय करायचे अशा विविध प्रकारच्या टिप्स यावेळी देण्यात आल्या.

कुकरमध्ये बेक केलेल्या केकला शक्यतो तडे जात नाही असेही सांगण्यात आले. केक झाल्यानंतर तो चांगला दिसला पाहिजे याची देखील खबरदारी घेणे महत्त्वाचे असते यावेळी त्याला आयसिंग करताना कोणते टूल्स वापरायचे. फुल तयार करताना कोणते टूल्स वापरायचे याचेही मार्गदर्शन करण्यात आले. केक बनवण्याची पद्धती व त्यात कोणत्या प्रकारचे इसेन्स कसे वापरायचे हेदेखील दाखवण्यात आले. या वेळी ब्लॅक फॉरेस्ट, व्हाईट फॉरेस्ट, पाइनॅपल केक, ऑरेंज केक, स्ट्रॉबेरी केक, मिक्स फ्रूट केक, बटर स्कॉच केक इत्यादींची माहिती सांगण्यात आली. प्रसिद्ध शेफ विवेक सोहनी यांनी केक बनवण्याची कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

अनेकदा नेटवर पाहून केक तयार केला जातो, मात्र त्यातील जिन्नस घरात नसल्याने केक चांगला होत नाही. परंतु, घरात असलेल्या पदार्थांपासून कसा चांगल्याप्रकारे केक बनवता येऊ शकतो, हे या वर्कशॉप मधून शिकायला मिळाले. एक आत्मविश्वास आल्याने आता घरात कधीही केक बनवू शकते.

वैद्य यामिनी चौधरी, सहभागी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गांधी हत्या हा पूर्वनियोजित कट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आपला देश अद्याप समजू शकलेला नाही. गांधी हत्येनंतर समोर आलेली हत्येची कारणे अत्यंत निराधार होती, हे समजून घेणे गरजेचे आहे. हत्येमागचा हेतू काही वेगळा होता, तर हत्येनंतर सांगण्यात आलेली कारणे वेगळी होती. गांधीजींची हत्या ही तात्कालिक व आकस्मित प्रतिक्रिया जरी वाटत असली तरी तो एक पूर्वनियोजित कट होता ही वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयातर्फे शनिवारपासून ग्रंथसाप्ताह व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाप्रसंगी ‘लेट अस किल गांधी : गांधी हत्येचा शोध आणि बोध’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह, मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले, शरद दुसाने, प्रदीप कपाडिया, पुरुषोत्तम तापडे आदी उपस्थित होते. यावेळी व्याख्यानाच्या पूर्वार्धात बोलताना तुषार गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येपूर्वीच्या घटनाक्रम आणि त्यामागचे कंगोरे, कारणमीमांसा उलगडून सांगितली.

गांधी पुढे म्हणाले, की आपल्या देशात सतत दोन जाती धर्मियात संशयाचे, शंकेचे वातावरण राहिले आहे. त्याचाच फायदा इंग्रजांनी घेतला. महात्मा गांधींनी मात्र जीवनभर हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गांधीजींच्या हत्येचा शोध घेण्यासाठी मी सातत्याने पाच वर्षे संशोधन केले. या संशोधांतून एक बाब ठळकपणे समोर आली ती म्हणजे गांधीजींच्या हत्येमागे एकाच विचारधारेची माणसे होती. याविषयीचे पुस्तक मी लिहिल्यावर त्यावर वाद झाले. परंतु, गांधीजींची हत्या करणारे ब्राह्मण होते हे सत्य नाकारता येणार नाही. परंतु, याचा अर्थ समस्त ब्राह्मण समाज दोषी आहे असा अर्थ काढणे चुकीचे आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, की आमच्यात एकमेकांच्या प्रति द्वेष व संशय नसेल तर आम्हाला कोणीच वेगळे करू शकणार नाही. हिंसा किंवा आतंकवादाला कुठलाही धर्म किंवा जात नसते, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ पक्षीय अजेंड्यावर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन आधार कार्ड काढणे, तसेच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे नागरिकांसाठी अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष पुढाकार घेऊ लागले आहेत. आधारशी संबंधित तक्रारी राजकीय पक्षांनी अजेंड्यावर घेतल्या असून, यंत्रणेत सुधारणा व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनावरही दबाव वाढू लागला आहे.

नाशिक शहरामध्ये आधार सेवा केंद्रे नेमकी कोठे चालू आहेत याची माहितीच नागरिकांना नाही. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी काही सेंटर्सची यादी जाहीर केली. परंतु, तेथेही आधारशी संबंधित सेवा सुरळीतपणे मिळत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले. अशा बंद सेंटर्सची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जाहीर करीत ती जिल्हा प्रशासनाच्याही निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अशा काही आधार सेवा केंद्रांवरील किटही जिल्हा प्रशासनाकडून जप्त करण्यात आले. त्यानंतरही आधारची घडी विस्कटलेलीच आहे. आधार कार्ड मिळविताना, तसेच आहे त्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करताना नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही केंद्रे प्रशासनाच्या लेखी सुरू असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे ती बंद ठेवली जात असल्याचे स्पष्टीकरण केंद्रचालकांकडून दिले जाऊ लागले आहे. आधार केंद्रांशी संबंधित तक्रार टोल फ्री नंबरवर कॉल करूनही‌ समाधान होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. अचूक मार्गदर्शन मिळत नसल्याची कैफियत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन अलीकडेच गाऱ्हाणे मांडले आहे. आधार सेंटरवरील कर्मचारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याची तक्रारदेखील करण्यात आली. अनेक नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डबाबतची कार्यवाही पूर्ण केली आहे. परंतु, अजूनही अनेकांना नवीन, तसेच दुरुस्ती केलेले आधार कार्ड मिळू शकलेले नाही. शहरातील सर्व आधार केंद्रे सुरळीत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी मनसेने केलेली आहे.

--

आमदारांकडूनही पाठपुरावा

विद्यार्थी संघटनांपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह काही नगरसेवकांनीही शनिवारी थेट जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिक, जेईईचे विद्यार्थी, पेन्शनर्स यांच्यासह सर्वच स्तरांतील नागरिकांना आधारशी संबंधित कामे मार्गी लावताना येणाऱ्या अडचणींचे गाऱ्हाणे यावेळी मांडण्यात आले. कितीही तांत्रिक अडचणी असल्या, तरी आधार केंद्रांची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली. विशेष म्हणजे जेईईच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र चार केंद्रे सुरू करण्याची ग्वाहीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. एकूणच आधारमुळे होणारी फरपट सद्यःस्थ‌ितीत सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरत असून, सर्वच राजकीय पक्षांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे.

---

अवघ्या १७ सेंटर्सवर भ‌िस्त

शहरात आजमितीस क‌िमान ६० आधार सेंटर्सची आवश्यकता आहे. तशी मागणीदेखील जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाकडे केली आहे. परंतु, सद्यःस्थ‌ितीत केवळ १७ सेंटर्सद्वारे आधारशी संबंधित कामे सुरू आहेत. आज, सोमवारपासून नव्याने आणखी १४ सेंटर्स सुरू होतील, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आधार सेंटर्सची संख्या ३१ होणार असली, तरी आणखी २९ सेंटर्स केव्हा सुरू होणार, हा प्रश्न जैसे थेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. चौरसियांच्या बासरीवादनावर रसिक मुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘वसंतोत्सव’ कार्यक्रमात रविवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन व उर्दू गझल, शायरी, नज्म, कव्वाली, सुफी गायकी असलेला ‘सुखन’ या कार्यक्रमावर रसिक मुग्ध झाले.

तीन तासांहून अधिक चाललेल्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम झाला. चौरसिया यांनी यमन रागाने बासरीवादनाला सुरुवात केली. त्यानंतर झपताल व तीन ताल बासरीवर सादर केला. त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पंडित विजय घाटे यांनी साथ दिली. तीन तालामध्ये पं. चौरसिया व पं. घाटे यांच्यात झालेल्या जुगलबंदीने रसिकांना तृप्त केले. दुसऱ्या सत्रात उर्दू गझल, शायरी, नज्म, कव्वाली, सुफी गायकी यांची वेगळी ओळख असलेला ‘सुखन’ या कार्यक्रमाने सत्राची सांगता झाली.

दोन दिवसांच्या या वसंतोत्सवामध्ये शनिवारी प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वादक तौफिकभाई कुरैशी यांचा कार्यक्रम झाला. मनोरमाबाई पोळ स्मृती पुरस्कार यंदा संगीत क्षेत्रात भरीव काम केलेल्या शिक्षिका अलका नारूलकर- देव व संगीत शिकणाऱ्या उदयोन्मुख विद्यार्थ्याचा पुरस्कार प्रीतम नागील यांना देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images