Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 49119

शेतकऱ्यांनाच निर्यातदार बनविण्याचा उद्देश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांनी पिकविलेला अधिकाधिक माल निर्यात व्हावा. त्यास चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, या उद्देशाने कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या कंपन्या बनविण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनाच निर्यातदार बनविणे हा आमचा उद्देश असून, त्यांना आठ दिवसांचे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये दिली. ताजी फळे व भाजीपाला निर्यातीक‌रिता हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. विभागीय कृषी सहसंचालक आणि संचालक फलोत्पादन यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब थोरात सभागृहात ही एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वास, कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन संचालक डॉ. एस. एस. अडसूळ, मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधक केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, शेतकरी मूळ उत्पादक आहे. त्यामुळे त्याचा माल कोणत्या साखळीतून जातो याची माहिती त्याला पारदर्शक पध्दतीने मिळायलाच हवी. ही माहिती त्याच्यापासून लपवून ठेवणे योग्य नाही. निर्यातीचा परवाना कसा मिळवावा, स्वत: माल कसा निर्यात करावा याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार करून एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांना ही माहिती देता यावी त्यांचे आठ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग घेणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. युरोप, जापान, अमेरिका आणि तत्सम देशांमध्ये जास्तीत जास्त शेतमाल निर्यात करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशातून परदेशात जेवढी द्राक्ष निर्यात होतात, त्यापैकी ९५ टक्के द्राक्ष महाराष्ट्रातून जातात. देशातून निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी ७७ टक्के आंबा महाराष्ट्रातील असतो. देशात परदेशात निर्यात होणाऱ्या कांदा आणि डाळिंबापैकी ४८ टक्के कांदा तर ८१ टक्के डाळिंब महाराष्ट्रातूनच पाठविले जातात, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

तालुकानिहाय कृषी ट्रेनर करणार तयार निर्यातक्षम माल कसा पीकवावा, तो परदेशात पाठविण्यासाठीची प्रक्रिया आदींबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कृषी प्रशिक्षक नेमण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्या त्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम हे प्रशिक्षक करतील, अशी माहिती या कार्यक्रमात देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 49119

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>