Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धुळे मनपात वसुलीतून १२ कोटी ८५ लाख जमा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेत विविध करांसाठी हजार व पाचशे रुपयांचे जुने चलन स्वीकारण्याची गुरूवारी (दि. २४) शेवटची मुदत होती. त्यामुळे मनपात करदात्यांची गर्दी फारशी दिसून आली नाही. कारण १० नोव्हेंबरपासून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याने पहिल्याच दिवपासून कर भरण्यासठी मनपामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.

शेवटच्या दिवशी शहरातील वृद्ध, अपंग, आजारी असलेल्या करदात्यांसाठी ‘महापालिका आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली. या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेत विविध कर भरण्यासाठी मनपाने काही दिवसांपासून थकीत कर दात्यांकडे धडक वसुली मोहीमही सुरू केली आहे. याद्वारे मनपाच्या तिजोरीत आतापर्यंत १२ कोटी ८५ लाख रुपये जमा झाले आहेत. नागरिकांनी कर भरण्यासाठी मोठे सहकार्य मनपाला केल्याने मनपातर्फे आयुक्त धायगुडे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. तर ज्या नागरिकांचे कर भरणा बाकी असले त्यांनीदेखील तत्काळ भरणा करावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात संघर्ष मूकमोर्चा उद्या

$
0
0

अॅट्रॉसिटी महामोर्चाची तयारी जाेरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरात शनिवार (दि. २६) रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दलित-आदिवासी अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीने केले आहे. दरम्यान मोर्चाला अनेक संघटनांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

दलित-आदिवासी-मुस्लिम-भटक्या विमुक्त जमाती-ओबीसी यांच्यातर्फे अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे कोणीही नेतृत्व करणार नसून समावेशक मोर्चा असणार आहे. तसेच मोर्चाचे निवेदन महिला, मुली हे उपस्थित जनसमुदायास मंचावरून संबोधित करणार आहेत. या मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला असून बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक मार्गे पोलिस कवायत मैदान, मनोहर चित्रमंदिर, आग्रारोड, कराचीखुंट, मनपा, झाशी राणी पुतळा या मार्गाने जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर त्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्ष मोर्चासाठी मोटारसायकल रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीच्यावतीने आज शनिवारी (दि. २६) रोजी शहरात अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सहभागी होणार आहे. त्यासाठी मोर्चाची संपूर्ण तयारी झाली असून सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे.

या मोर्चासाठी गेल्या तीन महिन्यांपासून नियोजन व तयारीचे काम सुरू होते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे समाजबांधवामध्ये मोठा उत्साह संचारला असून तर मोर्चामध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. तर मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पाडावा, असे आवाहनही संघर्ष मोर्चा समितीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्ष मोर्चात लाखोंचा जनसमुदाय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गावाबाहेर राहत असलेले दलित आदिवासी, भटके विमुक्त हे जसे जाती व्यवस्थेचे बळी आहेत. त्याचप्रमाणे गावामधील माळी, साळी, कोळी, लोहार ओबीसी जातीदेखील व्यवस्थेचे बळी ठरले आहेत. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वंचित असलेल्यांसाठी घटनात्मक तरतूद करून ठेवली आहे. त्यानुसारच मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र गेल्या चाळीस वर्षांत मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी होऊ शकली नाही. म्हणूनच आज दलित आदिवासींवर अन्याय व अत्याचार होत आहेत, अशा प्रतिक्रिया मोर्चात व्यक्त करण्यात आल्या.

आता परिवर्तनाची आणि प्रबोधनाची लढाई करावी लागणार आहे. तसेच रस्त्यावर उतल्याशिवाय व संघर्ष करून मागण्या मागाव्या लागत आहेत. जर अॅट्रॉसिटी कायदा प्रभावीपणे राबविला गेला तर दलित आदिवासींनाच नाही तर इतरांनादेखील न्याय मिळणार आहे. धुळ्यात शनिवारी (दि. २६) दलित अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने भाषणातून या प्रतिक्रिया समोर आल्या. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात मोर्चातील पाच युवतींनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले. शहरातील निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातून सुमारे दोन लाख मोर्चेकरी सहभागी झाले होते.

अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीतर्फे शनिवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून महामोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अत्यंत शिस्तीने मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चाचे रूपांतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहसमोर दुपारी एक वाजता सभेत झाले. मोर्चात दलित आदिवासींसह समाजातील लोकांसह स्थानिक राजकीय नेते, वकील, डॉक्टर, प्राध्यापक यांची सहभाग होता. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून नऊशे पोलिस अधिकारी व कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले होते. तर शहरातील पंधरा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल पाटील यांची प्रकृती स्थिर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अमळनेरमधील आर. के. नगरात आमदार शिरीष चौधरी यांनी केलेल्या मारहाणीत जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्यातील आस्था या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी पाटील हे बेशुद्ध अवस्थेत होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थ‌रि असल्याचे सांगण्यात आले.

वाहनांची तोडफोड

जमावाने एम.एच. ३९ अर्थात नंदुरबार जिल्ह्यातील नोंदणी असलेल्या गाड्या अडवून त्या फोडण्यास सुरुवात केली. जमावाने १५ ते २० गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. शहरात इतर ठिकाणाही तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमाव एकूण घेण्याच्या परिस्थित नव्हती. आर. के. नगर विश्रामगृह, सुखांजनी दवाखाना या भागात पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहादा नगरपालिकेत नगराध्यक्ष भाजपचा; काँग्रेसला जास्त जागा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेत दिवंगत पी. के. आण्णा पाटील यांच्या हयातीत सतत विरोधात राहूनही कधी विजय न मिळविलेल्या मोतीलाल पाटीलांना मात्र यावेळी जनतेने न्याय दिला. परिणामी शहादा पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले आहेत. नगरपालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले असले तरी नगराध्यक्षपदी भाजपचे मोतीलाल पाटील असणार आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच एमआयएमने आपले खाते उघडले आहे.

शहादा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी दहा उमेदवार रिंगणात असले तरी मोतीलाल पाटील यांची खरी लढत दिली ती अपक्षाने. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, लोकभारती या कुठल्याही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला भाजपचे पाटील यांना जवळपासही फिरकता आले नाही. या निवडणुकीत भाजपचे मोतीलाल पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेख जहीर शेख मुसीर यांना ७३० मतांनी पराभव करीत विजय मिळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोंडाईचात परिवर्तन; पटेलांनी गड राखला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील दोंडाईचा व शिरपूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल अखेर अपेक्षितच लागला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे पर्यटनविकास मंत्री यांनी या निवडणुकीत पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. गेल्या दहा वर्षांपासून नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या ताब्यात होती ती त्यांनी खेचून आणली आहे.

मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल या प्रचंड मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. भाजपने एकूण २४ पैकी २० जागा जिंकल्या असून माजीमंत्री डॉ. हेमंत देखमुख यांना जोरदार धक्का देत काँग्रेसला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

तर शिरपूर नगरपालिकेत अमरिश पटेल यांची सत्ता अबाधित राहिली आहे. काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या तर काँग्रेसने तीसपैकी एकवीस जागा मिळविल्या आहेत. जिल्ह्यातील शिरपूर आणि दोंडाईचा निवडणुकीत प्रस्थापितांनी आपापले गड शाबूत राखल्याचे या निकालावरून दिसून आले.

दोंडाईचा नगरपालिकेत भाजपच्या आजी-माजी मंत्र्यांमधील अटीतटीच्या लढतीत परिवर्तन घडले. यात भाजपला सत्ता काबीज करण्यात यश मिळाले आहे. नगरपालिकेच्या २४ पैकी भाजपला २०, मनसेला १, तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयनकुंवर रावल या १७ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांची दोंडाईचा पालिकेवरील सत्ता रावल गटाने काबीज केली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण ३० जागांपैकी २१ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर उर्वरित नऊ जागांमध्ये भाजपला ५, भाजप पुरस्कृत ४ आणि २ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी १९ हजार मतांनी विजय मिळविला आहे. शिरपुरला परंपरेप्रमाणे काँग्रेसने नगरपालिकेवर पकड कायम ठेवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनी भरले ५,६२९ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाला असून, नाशिककरांनी महिनाभरात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांद्वारे तब्बल पाच हजार ६२९ कोटी रुपये विविध बँका, तसेच पोस्ट ऑफिसेसमध्ये भरले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्याला आतापर्यंत एक हजार ७४० कोटींचे नवीन चलन प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून एक महिना पूर्ण झाला. अशा नोटा बदलून घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पेट्रोलपंप, एसटी तसेच रेल्वे प्रवास अथवा सरकारी करांसाठी या नोटा वापरण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे बँकांमध्ये नोटा जमा करणे एवढाच पर्याय नागरिकांपुढे आता खुला आहे. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीत नाशिककरांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांद्वार तब्बल पाच हजार ६२९ कोटी रुपये बँकांमध्ये भरल्याची माहिती प्रशासनाने दिली. दोन हजार रुपयांची नवीन नोट सरकारने चलनात आणली आहे. अशा नोटांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा नाशिक जिल्ह्याला करण्यात आला आहे. चलनात वापरता येतील असे एक हजार ७४० कोटी रुपयांचे चलन नाशिक जिल्ह्याला आतापर्यंत प्राप्त झाले आहे. त्यापैकी एक हजार ४२५ कोटी रुपये बँका तसेच एटीएमच्या माध्यमातून नागरिकांनी काढल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

अनेक राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांचे एटीएम सेंटर्स केव्हा उघडणार याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. एसबीआयचे एटीएमएम वगळता अन्य बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट आहे. १०० रुपयांच्या नोटांचा प्रचंड तुटवडा असल्याने नागरिकांना एटीएम सेंटर्समधून केवळ दोन हजाराची नोटच मिळते आहे. ५०० च्या नोटांची अजूनही नाशिककरांना प्रतीक्षा आहे. पाचशेच्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने बँकांकडूनही हतबलता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेची धडधड वाढली

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केल्यानंतरही दिवाणी न्यायालयाने प्रभाग रचनेवर दिलेली स्थगिती शुक्रवारीही कायम ठेवल्याने प्रशासनाची धडधड वाढली आहे. दिवाणी न्यायालयाच्या न्यायकक्षेत प्रभाग रचना येत नसल्याचा युक्तिवाद महापालिकेच्या वकिलांनी केल्यानंतरही न्यायालयाने स्थगिती कायम ठेवत येत्या मंगळवारी पुढील सुनावणी ठेवली आहे. स्थगिती दिल्यानंतरही मतदारयाद्यांच्या कार्यक्रमावरही न्यायालयात आक्षेप नोंदवण्यात आला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्यास काही दिवसच शिल्लक असताना दिवाणी न्यायालयाच्या पवित्र्यामुळे प्रशासनातील अधिकारीही बुचकाळ्यात पडले आहेत. त्यामुळे पुन्हा राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा खटाटोप प्रशासनाने सुरू केला आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतदार हर्षल जाधव यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागितली आहे. चुकीच्या पद्धतीने गुगल मॅपवर प्रगणक गटाची रचना केल्याचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाचे नियम डावलण्यात आल्याचा आरोप केला आहे. न्या. काशीकर यांनी हा अर्ज दाखल करून घेत प्रभाग रचनेला स्थगिती दिली होती. महापालिकेने प्रारंभी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. दिवाणी न्यायकक्षेत प्रभाग रचनेेचे प्रकरण येत नसल्याचा दावा करत थेट दिवाणी न्यायालयाच्या कक्षेलाच आव्हान दिले. त्यांसदर्भातील अर्ज शुक्रवारी न्या. काशीकर यांनी दाखल करून घेत महापालिकेच्या वकिलांचा युक्तिवादही ऐकून घेतला. परंतु, प्रभार रचनेवरील स्थगिती मात्र जैसे थेच ठेवली, तसेच यापुढील सुनावणी १३ डिसेंबरला घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या दाव्यावरच आता पाणी फेरले गेले आहे.

प्रभाग रचनेवरील स्थगिती न उठल्याने आता प्रशासनाची धडधड वाढली आहे. त्यातच दिवाणी न्यायालयाची स्थगिती असताना महापालिकेने मतदार याद्यांसंदर्भातील आवाहनाचे प्रसिद्धीपत्रक जारी केल्याची तक्रार हरकतदारांनी घेतली आहे. त्यामुळे अधिकारी अधिकच बुचकाळ्यात पडले असून, आता करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायकक्षेत येत नसल्याचा अर्ज देऊनही सुनावणी कायम ठेवली आहे. त्यामुळे मार्गदर्शनासाठी प्रशासनाने पुन्हा राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानंतर मंगळवारी महापालिका कोर्टात बाजू मांडणार आहे. या दिवशीही दिवाणी न्यायालयाने दिलासा दिला नाही, तर त्याचा थेट परिणाम निवडणूक कार्यक्रमांवर होणार आहे. १५ मार्चपर्यंत सर्व निवडणूक कार्यक्रम पार पाडायचा आहे. त्यामुळे मंगळवारी कोर्टात तज्ज्ञ वकिलांची फौज उतरवण्याची तयारी महापालिकेने केली आहे.


निवडणूक कार्यक्रम विस्कळीत?

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रभागनिहाय मतदारयाद्या फोडण्यासाठी सध्या निवडणूक शाखेकडून काम सुरू आहे. त्यासाठीचे प्रसिद्धीपत्रकही प्रसिद्ध केले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असली, तरी स्वेच्छा निधीच्या कामांवर १४ डिसेंबरपासून निर्बंध आले आहेत. मंगळवारी न्यायालयाने दिलासा दिला नाही, तर मात्र संपूर्ण निवडणूक कार्यक्रमावरच त्याचे विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. हरकतदाराचा अर्ज फेटाळला जरी गेला, तरी त्याला हायकोर्टात जाण्यासाठी मुदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या खूपच कमी आहे. अशा तालुक्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तपासणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, लिंग गुणोत्तर कमी आढळून येणाऱ्या आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय, तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह सोनोग्राफी सेंटर्सवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.

‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानाबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. लिंग गुणोत्तरात नाशिक जिल्ह्याची परिस्थिती वाईट आहे. २०११ मध्ये जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण हजार पुरुषांमागे ८४० महिला असे होते. सद्यःस्थितीत दर हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९२० ते ९३० पर्यंत पोहोचले आहे. सिन्नर, निफाड, त्र्यंबकेश्वर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये ० ते ५ वयोगटातील दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ८०० ते ८५० आहे. गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची शक्यता गृहित धरून असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित सरकारी-अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या-त्या स्तरावर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत लिंग-गुणोत्तर कमी असलेल्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. पाचवी आणि सहावीनंतर मुलींचे गळतीचे प्रमाण अधिक असल्याची बाब निदर्शनास आली असून, या कारणांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत. शाळेत स्वच्छतागृहे नाहीत किंवा मासिक पाळीमुळे मुली शाळा सोडतात का, याबाबत शहानिशा करून मुली पुन्हा शाळेत येतील यासाठी उपाययोजना करा, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असलेल्या तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. ही फोर्स नियमितपणे फिरतीवर राहील. सोनोग्राफी सेंटरमध्ये येणाऱ्या महिलांचे रेकॉर्ड वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी या फोर्सवर सोपविण्यात आली आहे.


‘त्या’ गर्भवतींवर लक्ष

पहिली मुलगी झालेल्या गर्भवती महिला आणि त्यांचे कुटुंबीय दुसरी मुलगी होऊ नये यासाठी आग्रही असतात. त्यामुळे अशा गर्भवती महिलांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. अंगणवाडी सेविकांपासून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच सरकारी यंत्रणांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. अशा महिलांचे मानसिक समुपदेशन करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटेरिअर डिझायनिंगला ऑनलाइनचा धोका

$
0
0



bhavesh.brahmankar@timesgroup.com

Tweet - @BhaveshBMT


नाशिक ः इंटरनेट आणि स्मार्ट फोनने मानवी जगण्याला नवा आयाम प्राप्त झाला आहे. व्यवसायवृद्धीसाठी ऑनलाइनची कास धरली जात असली, तरी प्रत्यक्षात ऑनलाइन हे इंटेरिअर डिझायनिंग या क्षेत्राला थेट धोका निर्माण करीत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात इंटेरिअर डिझायनर्स तीव्र चिंतेत आहेत. हा धोका दूर कसा करायचा याचे मोठे आव्हानही त्यांच्यापुढे आहे.

एकविसाव्या शतकात इंटरनेट आणि स्मार्ट फोनने अामुलाग्र बदल घडविला आहे. त्यामुळेच हाती असलेल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून चुटकीसरशी अनेक बाबी सहजसाध्य झाल्या आहेत. ऑनलाइनच्या विश्वाने तर तरुणांना असंख्य संधी प्राप्त झाल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ऑनलाइनकडे आणखीच कल वाढला आहे. या साऱ्या परिस्थितीत मात्र ऑनलाइनचा मोठा धोका इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्राला निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. घर, ऑफिस किंवा दुकानाचे इंटेरिअर (सजावट) करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू, उपकरणे आणि साहित्यांची ऑनलाइन खरेदी अगदी सहजगत्या केली जात आहे. विविध ऑफर्स, पर्याय आणि प्रभाव यामुळे क्षणार्धात ग्राहकांवर ऑनलाइन वस्तूंची भुरळ पडत आहे. त्यामुळे इंटेरिअर डिझायनर्सकडे न येता अनेक ग्राहक ऑनलाइन वस्तू खरेदी करूनच घराचे इंटेरिअर करू लागले आहेत. परिणामी, आर्किटेक्टसारखेच शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्यांबरोबरच गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या इंटेरिअर डिझायनर्सच्या व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. देशात तब्बल दहा हजार इंटेरिअर डिझायनर्स कार्यरत असून, त्यांना ऑनलाइनची झळ बसू लागली आहे. याची गंभीर दखल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनर्स (ट्रीपल आयडी)ने घेतली आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून ग्राहकाला योग्य वस्तू मिळत तर नाहीच, पण त्याची दिशाभूल होतानाच त्याच्या माथी अनावश्यक वस्तू मारण्याचेही प्रकार घडत आहेत. घराची सजावट ही आपल्या जीवनशैलीशी निगडित आहे. त्यामुळे सुयोग्य शिक्षण घेतलेल्या व्यावसायिकाकडूनच करून घेणे आवश्यक असल्याचे मत ट्रीपल आयडीचे नाशिकचे अध्यक्ष हेमंत दुगड यांनी व्यक्त केले. ट्रीपल आयडीच्या नाशिक शाखेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये शनिवारी दिवसभर झाली. याच बैठकीत इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्राला असलेल्या ऑनलाइनच्या धोक्याबाबत विशेषत्वाने चर्चा करण्यात आली. शिवाय हा धोका परतवून कसा लावायचा याचा खलही या बैठकीत करण्यात आला.


काय वाचायचं, पाहायचं, घ्यायचं हे अनेकांना ठाऊक नसते. चुकीच्या माहितीवर आधारित वस्तू खरेदीतून फसवणूकच होते. ऑनलाइनचा धोका परतवून लावण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. त्यामुळेच आम्ही कंटिन्युएशन ऑफ एज्युकेशन प्रोग्राम सुरू केला आहे. त्यात आमच्या सभासदांचे ज्ञान अद्ययावत ठेवणे आणि त्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून अधिकृत माहिती देणे याचा समावेश आहे.

-प्रताप जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष, ट्रीपल आयडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्ता मेळाव्यातून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शिवसेना पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल असे वागू नका, असा सल्ला शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना दिला. याबरोबरच भाजपसोबत युती होवो अगर न होवो पण नाशिक मनपा व जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी जिवाचे रान करा. एकहाती सत्ता आणा, अशी सादही उपस्थित शिवसैनिकांना घातली.

विकासासाठी कोरे चेक देण्याची भाषा करणाऱ्यांप्रमाणे शिवसेनेला मेळाव्यासाठी भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागत नाहीत, असा घणाघाती आरोपही भाजपवर केला. या मेळाव्यातून शिवसेनेने शक्तीप्रदर्शन करून इतर पक्षांवर आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक पुणे महामार्गावरील इच्छामणी लॉन्स येथे शनिवारी दुपारी शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात खासदार अनिल देसाई बोलत होते. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेना उपनेते बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, योगेश घोलप, सत्यभामा गाडेकर उपस्थित होते.

देसाई म्हणाले, शिवसेनेने अनेक राजकिय स्थित्यंतरे अनुभवली आहेत. सेना लयाला जाण्याची भाकितंही माध्यमांनी व्यक्त केली होती. परंतु शिवसैनिकांच्या प्रेमावर शिवसेना तरली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या विचारांवर चालणारा हा पक्ष असून शिवसैनिकांनी सामान्य जनतेचे आधार बनले पाहिजे, असेही ते म्हणाले.

दगडही झेलू
तब्बल चार नगरपालिकांत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नावर शिवसेनेची दगडही झेलण्याची तयारी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुखच घेतील असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी भरती, मग जुन्या शिक्षकांचे काय?

$
0
0



ashwini.kawale@timesgroup.com

ashwinikawaleMT

नाशिक : चार वर्षे उलटून गेली, तरी शिक्षक भरती होत नसून, भरतीच्या आशेवर नोकरी स्वीकारलेल्या असंख्य शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार भरतीचे आश्वासन मिळत असलेला शिक्षकवर्ग या प्रश्नांनी पुरता ग्रासलेला असून, भरतीप्रक्रियेबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. एकीकडे नवीन भरती होणार, अशी चर्चा असल्याने कार्यरत असलेल्या शिक्षकांचे काय? या प्रश्नाने त्यांची झोप उडविली आहे.

ऑक्टोबर २०११ मध्ये झालेल्या संचमान्यतेतून अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला होता. त्यामुळे जोपर्यंत या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत नवीन शिक्षक भरती

करण्यास शिक्षण विभागाने २०१२ मध्ये बंदी घातली. तेव्हापासून आजपर्यंत ही बंदी कायम असली, तरी पूर्वी कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांच्या जागा विविध कारणांनी रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यास शिक्षकच नसल्याच्या समस्येला संस्थांना सामोरे जावे लागले. यावर उपाय काढत काही संस्थांनी अल्प मानधन देण्याचे कबूल करीत, तसेच शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू झाल्यावर प्राधान्य देऊ, या आशेवर शिक्षकांची भरती केली. मात्र, चार वर्षे उलटून गेली, तरी भरतीप्रक्रियेबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने शिक्षकवर्गाचा संयम सुटत चालला आहे. त्यातच येत्या जानेवारी महिन्यापासून नव्याने शिक्षक भरती होणार असल्याच्या चर्चा रंगत असल्याने भरतीप्रक्रियेच्या आशेवर रुजू झालेले शिक्षक चिंतेने ग्रासले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१५-१६च्या शिक्षक संचमान्यतेत ५७०० शिक्षक अतिरिक्त असल्याचे समोर आले असून, २०१६-१७च्या सुरू असलेल्या संचमान्यतेतूनही यापेक्षा मोठा आकडा समोर येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यास सरकार सक्रिय झाले असले, तरी कोणतीही गती या प्रक्रियेला मिळत नसल्याने, तसेच संस्थाचालकांचाही पाठिंबा मिळत नसल्याने हा वर्ग अजूनही प्रतीक्षेतच अडकला आहे. वर्षानुवर्षे आहे त्या शिक्षकांच्या समायोजनाचा आणि भरतीचा प्रश्न मार्गी लागत नसताना आता नव्याने भरती होण्याच्या चर्चांनी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवली आहे. प्रथमतः भरतीच्या आशेवर असलेल्या शिक्षकांचाच विचार केला जावा, अशी मागणी राज्यभरातील शिक्षकांकडून केली जात आहे.



‘त्या’ संस्थांची चौकशी होणार

शिक्षक भरतीस विरोध असतानाही वेगवेगळ्या माध्यमातून चार वर्षांच्या कालखंडात राज्यभरात अडीच हजार शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व शिक्षकांचे वेतनही सरकारी तिजोरीतूनच होत असल्याने स्पष्ट झाल्याने त्याची कठोर चौकशी केली जाणार आहे. त्याबरोबरच ज्या अधिकारीवर्गाने अशा संस्थांना सहकार्य केले, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.


शिक्षक भरती करताना कार्यरत असलेल्या शिक्षकांचा विचार केला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. मात्र, हे समायोजन कशा पद्धतीने होईल, याविषयी स्पष्टता देण्यात आलेली नाही. बंदी आल्यापासून ज्या संस्थांनी बेकायदेशीरपणे शिक्षक भरती केली त्यांच्यावर चाप बसविण्यासाठी संस्थांचे भरती अधिकार काढून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले असले, तरी मग त्याला पर्यायी व्यवस्था काय, याबद्दलही कोणतीही घोषणा केलेली नाही. शिक्षकांच्या मागण्यांची पुन्हा आठवण करून देण्यासाठी नागपूरला यशवंत स्टेडियमवर १५ डिसेंबरला एक दिवसाचे ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहोत. शिक्षकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील, अशी आशा आहे.

- भगवान साळुंखे, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुसेंची भाजपवर टीका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्यभरात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्र्यांनाही पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरावे लागले होते. यावेळी त्यांनी विकासासाठी कोरे चेक देण्याचे आश्वासन देऊनही जनतेने त्यांना नाकारले, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आपला मित्र पक्ष भाजपचा पाणउतारा केला. त्यांच्या उपरोधिक टीकेमुळे राज्याच्या सत्तेत भागीदार असलेले भाजप व शिवसेनेतील दुफळी नाशिककरांसमोर आली.

नाशिकमध्ये आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. मंत्री दादा भुसे शनिवारी नाशिकच्या शासकीय दौऱ्यावर आलेले असतांना त्यांनी या मेळाव्यालाही हजेरी लावली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांचा शब्द खरा ठरावा यासाठी नाशिक मनपा व जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी जीवाचे रान करा. नाशिकच्या जनतेला शिवसेनेकडून मोठी अपेक्षा आहे. पक्षाची ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कामही निष्ठेने करा. येत्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असली तरी गाफिल राहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिकमध्ये शिवसेनेत स्थानिक पातळीवर कोणतीही गटबाजी नसल्याचा खुलासा जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केल्याने गटबाजीचा मुद्दा चांगलाच रंगला. ‘कुणी आमच्यावर कुदलं तर आम्ही सर्व एक होतो’, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. एका अर्थाने त्यांनी अंतर्गत खदखदच व्यक्त केली. या मेळाव्यास उपस्थित शिवसैनिकांना दत्ता गायकवाड, सत्यभामा गाडेकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांच्या सुरक्षेसाठी तज्ज्ञ समिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील तब्बल ४०० धरणे असुरक्षित असल्याचा अहवाल महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) राज्य सरकारला सादर केल्यानंतर सरकारला जाग आली असून, आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्यातील विविध तज्ञांची १० जणांची समिती तयार केली आहे. त्यात नाशिकच्या अविनाश शिरोडे यांचा व्यावसायिक तज्ज्ञ म्हणून समावेश केला आहे. शिरोडे यांनी जलसंपदेसाठी चांगले काम करायला मिळेल याबाबत आनंद व्यक्तज केला आहे.

गेल्या कित्येक वर्षांत धरणांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर जलसंपदा विभाग काम करीत आहे. पण ही कामे कुचकामी ठरत असल्यामुळे नवीन धरण बांधणे व दुरुस्ती करणे यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. वर्षानुवर्षे जलसंपदा विभाग आपल्या पारंपरिक पद्धतीतत अडकल्यामुळे अनेक कामे धोकादायक व खर्चिक होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने कात टाकत हा नवा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञान नवीन असले तरी ते व्यावहारिक व शाश्वत आहे का त्यांचा किती फायदा होईल, याबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.
या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष मेरीचे महासंचालक असतील. मुख्य अभियंता सह सचिव असतील. त्यात व्यावसायिक तज्ज्ञ म्हणून शिरोडे यांच्यायह मुंबईचे मेहश तेंडुलकर, राज्य व केंद्र सरकारमधील निवृत्त कर्मचारी व जलसंपदाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ कुटुंबाला मिळणार आर्थिक मदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुलाला स्वेटरसाठी आलेले नऊशे रुपयांचे अनुदान काढण्यासाठी बँकेबाहेर रांगेत जीव गमवाव्या लागणाऱ्या दिनेश जाधव यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदतीचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिले. स्वेटरच्या पैशांसाठी जीव गमावलेल्या दिनेशचे वृत्त ‘मटा’त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार जयंत जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसपरिषेदत उपस्थित केला होता. त्यावर सभापतींच्या आदेशानंतर सभागृह नेते चंद्रकात पाटील यांनी संबंधित जाधव यांच्या कुटुंबीयाना आदिवासी विभागामार्फत मदत देण्याचा सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. त्यामुळे या कुटुंबाला काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आदिवासी विभागातील दिरंगाईमुळे दोन वर्षांपासून आदिवासी मुलांना स्वेटर मिळाले नाहीत. जेमतेम चालू वर्षी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे पडले. परंतु नोटाबंदीचा फटका त्यांना बसला आहे. जव्हार तालुक्यातील झोप येथील दिनेश जाधव हा आपला मुलगा श्रावणच्या स्वेटरचे पैसे बँकेतून काढण्यासाठी गेला होता. परंतु रांगेतच चक्कर येऊन तो पडला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यांसदर्भातले वृत्त ‘मटा’ने गुरुवारी (दि. ८) प्रसिद्ध केले होते. नोटाबंदी आणि आदिवासी विभागाच्या दिरंगाईने दिनेशचा जीव गेल्याने संपूर्ण कुटूंबच रस्त्यावर आले होते. आमदार जयंत जाधव यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत औचित्याच्या आधारे हा मुद्दा उपस्थित केला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी दखल घेण्याचे आदेश दिले. मंत्री चंद्रकात पाटील यांनी या घटनेची सरकार गंभीर दखल घेईल असे आश्वासन दिले. संबंधित कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यांसदर्भात सरकार निर्देश देईल, असे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे आ. जाधव यांनी सांगीतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूबंदी मसुदा मंजूर होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडलेला दारूबंदी मसुद्यातील काही मागण्या मंजूर करण्यासाठीचा मसुदा विधानसभेत मंजूर करून त्याचे कायद्यात रुपांतर करण्याचे आश्वासन उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीला दिले आहे.

अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दारूबंदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीच्या वतीने राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. मागील आठवड्यात राज्य उत्पादन आयुक्त व्ही. राधा आणि उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दारूबंदी मसुदा हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यासाठी नागपूर येथे बैठक घेण्याचे आश्वासन दारूबंदी जन आंदोलन समितीला दिले होते. त्यानुसार त्यांनी विधानसभेतील कार्यालयात शुक्रवारी समितीचे अध्यक्ष गणेश कदम व त्यांच्या सहका-यांसमवेत बैठक घेतली. मंगळवारी विधानसभेत दारूबंदी संबंधीच्या काही मागण्या मंजूर करण्यासाठीचा मसुदा मांडला जाईल, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. दारूबंदीच्या दिशेने आश्वासक पावले टाकण्याबाबतही या वेळी सहमती दर्शविण्यात आली. बैठकीस सचिव श्रीवास्तव, आयुक्त व्ही. राधा, समितीचे अध्यक्ष गणेश कदम, संदीप मुठाळ, यश बच्छाव, अनिल गायकवाड, संतोष टिळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटबाजी रोखली; विकासाचे काय?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेत टोकाला गेलेले गटबाजीचे राजकारण नुकत्याच झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या निम‌ित्ताने काहीसे थांबले आहे. सर्व सतरा नगरसेवक एकत्र आले तसे यापुढे राहतील आणि शहर विकासाचा गाडा वेगाने धावेल, असे मत शहरातील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. या पंचवार्षिकचे पहिले वर्ष वगळता वारंवार नगराध्यक्षांच्या निवडणुका आणि त्यामुळे झालेली गटबाजी आता थांबली आहे.

दरम्यान झालेल्या पक्षांतराने पाल‌िकेत भाजप आणि शिवसेना हे दोन मोठे गट तयार झाले आहेत. आता हे दोन्ही गट एकत्र आले तर खऱ्या अर्थाने युतीच्या माध्यमातून शहराचा विकास साध्य होणार आहे. आगामी निवडणुकीवर डोळा ठेऊन सर्व एकत्र आले, असे म्हंटले जात असेल मात्र जे हाते ते चांगल्यासाठी होते असे आजची परिस्थिती सांगत आहे. शहराच्या प्रलंब‌ित समस्या मार्गी लावणे गरजेचे ठरले आहे. वाढते अतिक्रमण आणि सिंहस्थाच्या निम‌ित्ताने बेरोजगार झालेल्या व्यवसाय‌िकांचा प्रश्न आता निकाली काढण्याची आवश्यकता आहे. एक वर्षापेक्षा कमी कालावधीत त्र्यंबक नगरपालिकेची सार्वत्र‌िक निवडणूक होईल तिला सामोरे जातांना सर्वच राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार व समर्थक यांना प्रलंब‌ित समस्यांचा जाब विचारला जाणार आहे. याचा करत आज त्र्यंबक नगरपालिकेत समन्वयाचे सुरू असलेले राजकारण हे देर आये दुरूस्त आहे, असे म्हणावे लागेल. सिंहस्थसारखा विश्वमेळा झाला मात्र आपसातील वादाने नगर परिषदेचा म्हणावा असा ठसा यावेळेस उमटला नाही. त्यानंतर विद्यमान नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांची वर्षभरातील कामगिरी तशी बऱ्यापैकी राह‌िली आहे. उन्हाळ्यात झालेले तलाव आणि धरणांच्या गाळ काढण्याचे काम अथवा अन्य महत्त्वपूर्ण योजना येथे राबविण्यासाठी केलेले प्रयत्न पाहता विरोधी गट आणि त्यांचे समर्थक यांनीदेखील या कामास सहकार्य करत आपली जबाबदारी निभावली आहे. एकूणच यापुढे पालिकेत सुरू झालेले सहमतीचे राजकारण यापुढे त्र्यंबकच्या राजकारणास नवी दिशा देणारे ठरणार आहे. अर्थात सभागृहात सतरा विरुद्ध शून्य असे चित्र पहायला मिळाल्यास ते नगरिच्या विकासासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

शहराच्या प्रलंब‌ित समस्यांमध्ये अग्न‌िशमन बंब शोभेचा ठरला आहे. येथे अग्न‌िशमन अस्थापना निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. कचरा डेपोचा प्रलंब‌ित प्रश्न अद्याप सुटलेला नाही. हातावर व्यवसाय करणारे टपरी धारक, मासळी व मटन मार्केट यांच्या जागा अद्याप निश्च‌ित झालेल्या नाहीत, असे एक ना अनेक प्रलंब‌ित समस्या यापुढील कालावधीत निकाली निघतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गुरुवारी रात्री कुत्र्याची शिकार करताना विहिरीत पडालेला मादी जातीचा बिबट्याला वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. शिंगवे येथील साहेबराव डेर्ले यांच्या शेतातील विहिरीत ही मादी पडली होती.

एक ते दीड वर्षाची ही मादी येवला वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने विहिरीतून जिंवतपणे बाहेर काढण्यात आली. शिंगवे येथे साहेबराव रंगनाथ खंडेराव डेर्ले हे शेतात वस्ती करून राहतात. गुरुवारी सायंकाळी डेर्ले कुटुंबीय हे जेवण करीत असताना अचानक मोठा आवाज झाला. डेर्ले कुटुंबाने विहिरीकडे धाव घेतली तेव्हा बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आले. येवला वन विभागाला कळविल्यानंतर बी. आर. ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा टाकून बिबट्याला बाहेर काढण्यात आले. बिबट्या विहिरीत विद्युत पंपाच्या पाइपला आणि वायररोपाच्या आधाराने पाण्यात थांबून होता. बिबट्या जिथे आधाराला पकडून होता त‌िथपर्यंत दोरखंडाच्या सहाय्याने पिंजरा सोडण्यात आला. रात्री अकरा वाजता त्याल बाहेर काढण्यात आले. निफाड तालुक्यात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने १५ पिंजरे लावलेले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून बिबटे पिंजऱ्यात जेरबंद होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौजे सुकेणेत ‘परवड’चे चित्र‌ीकरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर मराठीत येत असलेल्या ‘परवड’ या चित्रपटाचे शूटिंग निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे गावात सुरू आहे. शेतकरीने आत्महत्या केल्यानंतर कुटुंब‌ीयांची होणारी होरपळ आणि सावकाराकडून होणारी पिळवणूक याविरूद्ध कुटुबीयांचा लढा यावर भाष्य करणारा हा मराठी सिनेमा आहे.

मौजे सुकेणे येथील राजू परभणीकर यांच्या वस्तीवर या चित्रपटाच्या चित्र‌ीकरणास प्रारंभ झाला आहे. दिग्दर्शक दिनेश परसावत, जीतू वायकर, विनय गिरकरक यांची ही निर्मिती असून चित्रपटाचे लेखक व गीतकार पुणे येथील आसाराम कसबे हे आहेत. सुबोध चांदवडकर आणि मधुसूदन ओझा यांचे संगीत आहे.

कर्जबाजारी शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची समाजात होणारी परवड आणि त्याविरुद्ध जागी झालेली स्त्रीशक्ती यातून शेतकरी आत्महत्येपासून कसे परावृत्त होतील, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबीयांनी संघटीतपणे केलेला प्रतिकार या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसणार असल्याचे दिग्दर्शक दिनेश परसावत यांनी सांग‌ितले. पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानी परवडच्या शूटिंगचा मुहूर्त झाला. या चित्रपटात गणेश कंबे, प्रीया जाधव, मधू ओझा, पूजा भागवत वैष्णवी काळे, सार्थक कसबे शशिकला काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चार दिवस मौजे सुकेने येथे शूटिंग केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images