Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अमेरिकन कुटुंबात फुलणार ‘जाई-जुई’

$
0
0

आधाराश्रमातील जुळ्या चिमुकल्यांना मिळाले परदेशात हक्काचे आई-बाबा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जन्माच्या अवघ्या बारा दिवसांनंतर त्या दोघींना मायेच्या उबेपासून जन्मदात्या आईनेच पारखे केले.. पोलिसांना त्या एका रुग्णालयाबाहेर सापडल्या. त्यांना घारपुरे घाटावरील आधाराश्रमात दाखल करण्यात आले... त्यांची आरोग्य तपासणी करताना दोघींच्या हृदयाला छिद्र असल्याचे निष्पन्न झाले.. चिमुकल्या वयात एकामागे एक खेळ त्यांच्या नियतीने त्यांच्यासोबत खेळले... मात्र, एक अमेरिकन जोडपे त्यांच्या आयुष्यात आता आशेचा किरण बनून आले आहे. घारपुरे घाटावरील आधाराश्रमातील जाई-जुई या दोघी जुळ्या मुलींची ही कहाणी. ख्रिस्तोफर मायकल हिटगर व तारा हिटगर या दाम्पत्यामुळे आता त्यांना हक्काचे आई-बाबा मिळाले आहेत.

जाई व जुई या जुळ्या मुली बारा दिवसाच्या असताना पोलिसांना सापडल्या होत्या. त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्या ह्रदयाला छिद्र असल्याचे दिसून आल्याने या मुलींचे भविष्य काय याबाबत आधाराश्रमातील कर्मचाऱ्यांनाही चिंता होती. जानेवारी महिन्यापासून या मुलींना दत्तक घेण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या कारा (सेंट्रल अॅडॉप्शन रिसॉर्स अॅथॉरिटी) मार्फत राबविली जात होती. ख्रिस्तोफर व तारा या दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी आहे. पण त्यानंतर त्यांना मूल होत नसल्याने मूल दत्तक घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या मुलींचा पुढील उपचार करणार असल्याचे या दाम्पत्याने यावेळी सांगितले.


हे दाम्पत्य या मुलींसाठी योग्य वाटले. या मुली तीन महिन्याच्या होईपर्यंत त्यांची तब्येत अतिशय नाजूक होती. हळूहळू त्यात सुधारणा होत गेली. आता त्यांची योग्य वाढ होत आहे. आधाराश्रमातील प्रत्येकालाच त्यांचा लळा लागला होता. त्यांना चांगले कुटूंब मिळाल्याने आनंद वाटतो

- राहुल जाधव, समन्वयक, आधाराश्रम


आम्हाला मुलगीच हवी होती. परंतु, जुळ्या मुली दत्तक मिळतील याचा आम्ही स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. या मुलींमुळे आम्ही खूप आनंदी आहोत.

- ख्रिस्तोफर मायकल हिटगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ परिपत्रकाची शिक्षकांकडून होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणाविरोधात जिल्ह्यातील कला व क्रीडा शिक्षकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. इयत्ता पहिली ते आठवीसाठी नवीन विषय तासिका धोरण अवलंबण्यात येणार असून, यानुसार कला, क्रीडाच्या तासिका कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे या विषयांच्या शिक्षकांचे नुकसान होण्याची मोठी शक्यता असल्याने या परिपत्रकाची होळी करुन शिक्षकांनी निषेध केला.

२८एप्रिल २०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार पहिली ते दुसरीसाठी कला, आरोग्य शारीरिक शिक्षणाच्या प्रत्येकी ४ तासिका, तिसरी ते पाचवीसाठी प्रत्येकी तीन तासिका तर सहावी ते आठवीसाठी प्रत्येकी दोन तासिका असे ठरविण्यात आले आहे. या निर्णयानुसार कला व क्रीडा शिक्षकांवर गदा येणार असून, त्यांच्या आठवडी तासिका कमी होणार असल्याने शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. यापूर्वी पाचवी ते आठवीसाठी प्रत्येकी चार तासिका होत्या. त्या निम्म्यावर आल्याने याविरोधात जिल्ह्यातील कला व क्रीडा शिक्षकांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात २८ एप्रिल २०१७चे परिपत्रक रद्द करणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे पुनर्रचित अभ्यासक्रम, तासिका नियोजनाचे परिपत्रक रद्द करावे, राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये कार्यभारापासून पूर्ण वेळ कला व शारीरिक शिक्षक नियुक्त करण्यात यावे, संच मान्यतेमध्‍ये ‘विशेष शिक्षक -कला’ असे स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावे आदी मागण्या यात मांडण्यात आल्या. त्याचबरोबर फलकांद्वारेही आपली नाराजी यावेळी दर्शवली गेली. यावेळी प्रशांत भाबड, एस. बी. देशमुख, एस. बी. शिरसाठ आदी शिक्षक उपस्थित होते.

पुढील महिन्यात धरणे आंदोलन

या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा जून महिन्यात शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा पवित्रा या शिक्षकांनी घेतला. या आंदोलनांची दखल न घेतल्यास व मागण्या मान्य न झाल्यास शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्‍ये आयोजित सर्व क्रीडा स्पर्धा, सरकारी रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा व बालदिनानिमित्त आयोजित सरकारी चित्रकला परीक्षांवर बहिष्कार घालू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरभाडेकरूंची पोलिसांकडे अल्प नोंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

उच्चभ्रू वस्तीतील इमारतींसह स्लम एरियातील झोपडपट्टीतील भाडेकरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा भाडेकरूंची माहिती शहरांतील पोलिस ठाण्यांना देणे घरमालकांवर बंधनकारक आहे. मात्र, या नियमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याने असे फ्लॅट व झोपड्यांत शहरातील गुन्हेगारांचे अड्डे निर्माण झाल्याचे अलीकडी काही गुन्ह्यांद्वारे उघड झाले आहे.

शहरातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या वर्षभरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांतील काही आरोपींकडून रिकामे अथवा भाडेतत्त्वावरील फ्लॅट किंवा झोपड्या वास्तव्यास वापरले जात असल्याचे उघड झाले आहे. भाडेतत्त्वावर दिलेली घरे नेमकी कुणाला दिली आहेत याची माहिती पोलिसांकडे दिली जात नसल्याने गुन्हेगारांचे आयते फावते आहे. शहरातील काही भागातील इमारतींतील फ्लॅट वर्षानुवर्षे वापराविना पडून असतात. अशा घरांचा वापरही गुन्हेगारांकडून लपण्यासाठी केला जात आहे. घर भाडेतत्त्वावर दिल्यास त्याची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक असूनही शहरात या नियमाच्या अंमलबजावणीकडे संबंधित घरमालकांकडून सर्रास काणाडोळा होत आहे.

---

साबळे खूनप्रकरणातून सिद्ध

जेलरोडच्या मंगलमूर्तीनगरातील हर्ष अपार्टमेंटमध्ये गेल्या आठवड्यात तुषार साबळे या अल्पवयीन व निष्पाप मुलाचा हकनाक बळी गेला. पुढे पंचवटीतील किरण निकम खून खटल्यातील बंड्या मुर्तडक या फरार आरोपीच्या हत्येचा कट फसल्याचे पोलिस तपासात उघड झाले. बंड्या मुर्तडक हा पंचवटीतील एका गुन्ह्यात आरोपी असताना हर्ष अपार्टमेंटमध्ये एका गुन्हेगाराकडे आश्रयाला होता. येथे त्याचे अधूनमधून येणे-जाणे होते, अशी माहिती समजते. बंड्या मुर्तडक ज्या गुन्हेगाराकडे येत असे तो सॅम पारखेदेखील या अपार्टमेंटमधील एका बंद फ्लॅटमध्ये अधून-मधून वास्तव्यास येत असे, अशी माहिती समोर आली आहे. याच संदर्भाने बंडू मुर्तडक हा तुषार साबळे याच्या हत्येच्या दिवशी हर्ष अपार्टमेंट येथे आल्याची माहिती या कटातील इतर आरोपींनी मृत किरण निकम याचा भाऊ शेखर निकमला पुरविली होती. त्यातून या गँगने बंडू मुर्तडक समजून तुषार साबळे या निरागस मुलाची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. यापूर्वी उपनगर येथेच एक घरभाडेकरू राहत्या घरात बनावट नोटा छापत असल्याचे रॅकेट उघडकीस आले होते. एका भाडेतत्त्वावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे उघडकीस आले होते.

--

नाशिक-पुणे-मुंबई ट्रँगल

उपनगर व नाशिकरोड परिसरात भाडेतत्त्वावर दिलेल्या घरांची संख्या काही हजारांच्या घरात असण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांकडे यापैकी अगदी मोजक्याच घरभाडेकरूंची नोंद मूळ घरमालकांनी केलेली आहे. रेल्वे स्थानकामुळे नाशिक-पुणे-मुंबई असा ट्रँगल निर्माण झाला आहे. सातपूर, अंबड, इंदिरानगर, मध्य नाशिक, पंचवटी, जेलरोड, वडाळा, गंगापूर, देवळाली अशा भागांतील गुन्ह्यांशी संबंधित गुन्हेगार नाशिकरोड व उपनगर परिसरात आश्रयाला असतात, ही बाब आता उघड झाली आहे. पोलिसांचा ससेमिरा लागलाच तर या भागातील सुलभ दळणवळणाच्या सोयी व रेल्वे स्थानकामुळे मुंबई-पुण्याकडे सहज पोबारा करता येणे शक्य होते. आजही नाशिकरोड रेल्वे स्थानक, बस स्थानकावर मध्यरात्रीनंतर शहरातील गुन्हेगारांचा अड्डा जमलेला बघावयास मिळतो.

--

पोलिसांचेही होतेय दुर्लक्ष

जे घरमालक आपल्या घरभाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यास देत नाहीत, अशा घरमालकांवर पोलिसही कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. परिणामी गुन्हेगारांना आश्रय सहज मिळतो. रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारीकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’ प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची दाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूर येथे आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक वाचनालय नाशिकने भरविलेल्या सावरकरांच्या जीवनावरील पुस्तकांच्या प्रदर्शनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाद दिली. या प्रदर्शनाचे त्यांच्याच हस्ते पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वत: लिहिलेली, तसेच सावरकरांच्या कार्यावर विविध मान्यवर लेखकांनी लिहिलेली १३५ पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. ही दुर्मिळ पुस्तके पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनी हे प्रदर्शन जरूर पाहावे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

‘सावाना’चे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सावानातर्फे आनंदविधान हे पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आले. २६ जुलै १९१७ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘सावाना’स भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी दिलेला अभिप्राय फडणवीस यांनी आनंदनिधानमधून वाचला आणि सावरकरांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे, ग्रंथ सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रदर्शनातील पुस्तकांविषयी माहिती दिली. भारतातील नामांकित वाचनालयांमध्ये सावानाचा समावेश असून, हा दर्जा कायम राखण्याबद्दल सर्वांनी जागरूक राहावे, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास सावानाचे स्वीय सहायक सचिव अॅड. भानुदास शौचे, सांस्कृतिक कार्यसचिव जयप्रकाश जातेगावकर, बालभवनप्रमुख संजय करंजकर, उद्यान वाचनालयप्रमुख उदयकुमार मुंगी, धनंजय बेळे, सी. जे. गुजराथी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कामगारांचे आंदोलन आणखी तीव्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या मागण्या आंदोलनाच्या आठव्या दिवशीही मान्य न झाल्याने आंदोलन सुरूच राहिले. काल सोमवारी नाशिकरोड येथील महावितरण, एकलहरे येथील महानिर्मिती व महापारेषण कंपनीतील कंत्राटी कामगारांनी द्वारसभा घेत जोरदार घोषणाबाजी केली.

महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांतील हजारो कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या आंदोलक कामगारांचे प्रतिनिधी व वीज कंपनीचे व्यवस्थापन यांच्यात वेळोवेळी झालेली चर्चा फिस्कटल्याने या आंदोलनाचा तिढा अद्याप कायम आहे. सोमवारी वीज कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींनी नाशिक येथे आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही भेट घेतली व कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

नाशिकरोड व एकलहरे येथे कंत्राटी वीज कामगार कृती सम‌ितीने सोमवारी द्वारसभा घेत कामगारांना आंदोलनाबाबत माहिती दिली. यावेळी वीज कामगारांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. व्ही. डी. धनवटे, अरुण म्हस्के, अशोक घेगडमल या कामगार नेत्यांनी यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले.

कायम कामगारांचा पाठिंबा

वीज कंत्राटी कामगारांच्या कामबंद आंदोलनाला कायम वीज कामगारांनीही पाठिंबा देण्याचे आवाहन कृती समीतीच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज मंगळवारपासून कायम कामगार काळ्या फिती लावून कामावर हजर होणार आहेत. द्वारसभेस उपस्थित कायम कामगारांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने आता वीज कंत्राटी कामगारांच्या संपास आणखी बळ मिळाले आहे. एकलहरे येथे सुमारे ४०० तर नाशिकरोड येथे सुमारे ३०० वीज कंत्राटी कामगार द्वारसभेस उपस्थित होते.

वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यांप्रश्नी जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. कायम कामगारांनीही या संपास पाठिंबा दर्शविला असून आजपासून कायम कामगार काळ्या फिती लावून कामावर हजर होणार आहेत.

-अरुण म्हस्के, राज्य सरचिटणीस, कंत्राटी वीज कामगार कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठी भरली शेकडो ‘पक्ष्यांची शाळा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दरवर्षीप्रमाणे नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे यंदाही ‘पक्ष्यांची शाळा’ हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच नेचर क्लबने हा उपक्रम सुरू केला. नाशिकच्या संत गाडगे महाराज धर्मशाळेत यावर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेचे कार्यकर्ते गेल्या तीन महिन्यांपासून शाळा चालवीत असून, आत्तापर्यंत या शाळेत तीस जातीच्या शेकडो पक्ष्यांनी किलबिलाट केला आहे.

उन्हाळ्यात पक्ष्यांना दाणापाणीची सोय व्हावी, विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ओळख व्हावी, नदी काठावरील पक्ष्यांची निरीक्षणे करून संवर्धन अभ्यास करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. ‘टाकाऊतून टिकाऊ’चा प्रयोग हे या शाळेचे प्रमुख उद्दिष्ट्ये आहे.

या परिसरात बगळे, नाईट हेरॉन, कावळे, वटवाघळे, पानकावळे आदींचा अभ्यास यावेळी करण्यात आला. या पक्ष्यांच्या शाळेला रशियन नागरिकांनी भेट देवून कौतुक केले.

गाडगे महाराज धर्मशाळेचे अध्यक्ष उत्तमराव देशमुख यांनीही या शाळेस भेट दिली. नाशिकचे चित्रकार योगेश रोकडे, महेश जगताप, अनुपमा चव्हाण व प्रीतम महाजन या कलावंतांनी शाळेत सुंदर चित्रे देखील साकारली आहे.

शाळा चालविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा, भीमराव राजोळे, अप्पा कोरडे, सागर बनकर, आकाश जाधव, आशिष बनकर, धनंजय

बागड, अभिषेक रहाळकर, रोहित नाईक, समीर ठाकूर आदी परिश्रम घेत

आहेत.

५ जूनला शाळा खुली

जागतिक पर्यावरण दिनी (५ जून) ही शाळा सर्व नाशिकरांसाठी खुली असेल. याठिकाणची छायाचित्र प्रदर्शन भरविले जाणार आहे. फूडर बनविण्याच्या प्रात्यक्षिकही दाखविले जाणार आहे. गाडगे महाराज धर्मशाळेचे व्यवस्थापक कुणाल देशमुख यांचे मोलाचे सहकार्य याकामी मिळाले आहे.

यांची भरतेय शाळा

चिमणी, बुलबुल, सनबर्ड, पॉण्ड हेरॉन, नाईट हेरॉन, कार्मोरंट, साळुंक्या, दयाळ, शिंपी, स्विप्ट,धोबी, कावळे, भारद्वाज, कोकिळा आदी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचा विभागीय उपसंचालकांना घेराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्यासह नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासूनच बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी सोमवारी येथे दिला. येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांच्या विविध मागण्यांसदर्भात राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी गाणार यांनी हा इशारा दिला. या आंदोलनात सहभागी शिक्षकांनी थेट विभागीय शिक्षण उपसंचालकांना घेराव घातला व आपल्या मागण्या शासनाला तातडीने कळविण्याची मागणी केली.

राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे रखडलेले वेतन, जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेतून पगार व्हावेत, कला व क्रीडा विषयांच्या तासिकांत कपात करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा अशा प्रमुख मागण्यांसाठी माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी सोमवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. शासनदरबारी आपल्या मागण्या मंजूर होण्यासाठी शिक्षकांत ऐक्याची गरज असून लढ्याशिवाय न्याय मिळणार नाही असे मत या आंदोलनाप्रसंगी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी व्यक्त केले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शासनाने शिक्षकांच्या मागण्या मान्य न केल्यास बेमुदत शाळाबंद आंदोलनाचाही त्यांनी यावेळी इशारा दिला. या मागण्यांचे निवेदन यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, मविप्रचे सभापती अॅड. नितीन ठाकरे यांनीही या आंदोलनात सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले व आंदोलनाच्या आगामी भूमिकेबद्दल माहिती दिली. या आंदोलनात राज्य शिक्षक परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद हिरे, कार्यवाह दिलीप अहिरे यांच्यासह प्रांत सदस्य गुलाब भामरे, सुमन हिरे, विभाग उपाध्यक्ष नरेंद्र ठाकरे, जिल्हा अध्यक्ष दत्ता वाघे, नीलेश ठाकूर, शरद निकम, शंकर सांगळे, सुभाष पाटील, संजय पाटील, अर्जुन सावंत यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्थानिक ‌शिक्षक आमदारांचे दुर्लक्ष

या शिक्षक आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी नाशिकच्या शिक्षकांना नागपूरहुन शिक्षक आमदार आयात करावे लागल्याचे यावेळी दिसून आले. स्थानिक शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी विभागातील शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यानेच नागपूर विभागाचे शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आल्याची चर्चा यावेळी उपस्थित शिक्षकांत सुरू होती.


आज शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक

या आंदोलक शिक्षकांच्या मागण्यांविषयी विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठांना कळविले असता आज मंगळवारी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्रतिनिधींसोबत शिक्षण मंत्र्यांनी या मागण्यांवर चर्चा करण्यास वेळ दिली आहे.


शिक्षक मागण्यांप्रश्नी केल्या जाणाऱ्या प्रत्येक आंदोलनाचे आमंत्रण स्थानिक शिक्षक आमदारांना दिले जाते. परंतु, त्यांच्याकडून शिक्षक आंदोलनांची दखल घेतली जात नाही. त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ दिला पाहिजे. परंतु, शिक्षकांना वाऱ्यावर सोडले जाते.

- दिलीप आहिरे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैदानापेक्षा संघटनेतच ‘खोखो'

$
0
0

महेश पठाडे, नाशिक
maheshpathadeMT

नाशिकमध्ये २४ मेपासून सुरू असलेली उपकनिष्ठ गटाची २८ वी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा दिमाखात पार पडली असली तरी या स्पर्धेने महाराष्ट्र खो-खो संघटनेतील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आले आहेत. या स्पर्धेला भारतीय ऑलिम्पिक समितीचे सचिव व भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, सचिव सुरेश शर्मा आदी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली असताना महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या सचिवांसह अन्य पदाधिकारी मात्र हेतुपुरस्सर गैरहजर राहिले. या गैरहजेरीमागे राज्य संघटनेतील अंतर्गत वादाची किनार असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे मैदानापेक्षा संघटनेतच सर्वाधिक 'खोखो' खेळला जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय ऑलिम्पिक समितीचे सचिव राजीव मेहता शनिवारी प्रथमच नाशिकमध्ये आले होते. भारतीय खो-खो महासंघाचे सचिव सुरेश शर्माही हजर राहिले. मात्र, यजमान महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव चंद्रजित जाधव अन्य पदाधिकारी गैरहजर राहिले. तब्येत साथ देत नसतानाही भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव व विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव रामदास दरणे राष्ट्रीय स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिले. मात्र, हृदयविकाराने त्यांचे नाशिकमध्येच निधन झाले. ज्यांनी आपले आयुष्य खेळासाठी समर्पित केले ते निष्ठावान दरणे मोठे की रुसव्याफुगव्यासाठी स्वतःचा मोठेपणा सिद्ध करणारे पदाधिकारी मोठे याचीच चर्चा यानिमित्ताने सुरू होती.
राज्याला निमंत्रण नाही
नाशिकमध्ये ज्या ज्या वेळी स्पर्धा झाल्या त्या त्या वेळी महाराष्ट्र खो-खो संघटनेतील वाद उफाळून आले आहेत. मात्र, राष्ट्रीय स्पर्धेत पाहुण्यांसमोर या वादाचे प्रदर्शन व्हावे हे दुर्दैवी आहे. याबाबत चंद्रजित जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की या स्पर्धेच्या मार्चमधील तारखा मी दिल्या होत्या. नंतर त्या परस्पर बदलण्यात आल्या. मला त्याची माहितीही दिली नाही आणि माझ्यासह एकाही पदाधिकाऱ्याला स्पर्धेचे साधे निमंत्रणही दिले नाही. मात्र आपली ही नाराजी खो-खो महासंघावर नसून, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांच्यावर असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. स्पर्धेच्या तारखा परस्पर
ठरवल्या गेल्या असतीलही, पण त्याची माहिती जाधव यांना मिळणार नाही असे होणार नाही. मंदार देशमुख यांनी सांगितले, की ही स्पर्धा नाशिकमध्ये होत असली तरी राष्ट्रीय स्पर्धेचे प्रमुख आयोजक महासंघ आहे,
दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र, तर तिसऱ्या स्थानी नाशिक आहे. त्यामुळे नाराजी
कोणावरही असली तरी ती
महासंघाविरुद्ध असेल.
अर्थात, हे वाद आजचे नाहीत. नाशिकमध्ये गेल्या वर्षी झालेल्या भाई नेरूरकर खो-खो स्पर्धेपासून आहेत. या स्पर्धेत मैदानांचे मोजमाप चुकीचे असल्याचे सांगून ते ऐनवेळी जाधव यांनी पुन्हा करण्यास सांगितले. राज्य शासनाचे आयोजन योग्य नसल्याची टीका जाधव यांनी केली. या टीकेचा रोख नकळतपणे नाशिक जिल्हा संघटनेकडेही होता. या स्पर्धेनंतर संघटनेतील धुसफूस वाढत गेली आणि त्याचे पडसाद नाशिकमधील स्पर्धेतून समोर येत गेले. मात्र, राष्ट्रीय स्पर्धेतही या वादाचे पडसाद उमटतील अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. जाधव यांच्या गैरहजेरीने ही नाराजी स्पष्ट
झाली. महासंघाची एकूणच भूमिका पाहता, या वादात ते कोणतीही थेट भूमिका घेणार नाहीत. हे वाद महाराष्ट्रालाच मिटवावे लागणार आहेत. तेच महाराष्ट्र खो-खोच्या हिताचे आहे.

चंद्रजित जाधव (सचिव, महाराष्ट्र खो-खो संघटना) ः मी कुटुंबासह हिमाचल प्रदेशात गेलो होतो. मला स्पर्धेची काहीही माहिती नाही. मुळात स्पर्धेच्या तारखा मला न विचारता परस्पर ठरविल्या गेल्या. तसेच या स्पर्धेचे निमंत्रण माझ्यासह संघटनेतील एकाही पदाधिकाऱ्याला दिले गेलेले नाही.

मंदार देशमुख (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो संघटना) ः आला असता तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्याशिवाय आम्ही स्पर्धा घेतली. मुळात ही राष्ट्रीय स्पर्धा होती आणि त्याची प्रमुख आयोजक भारतीय खो-खो महासंघ होता. त्या खालोखाल महाराष्ट्र आणि नाशिकचा क्रमांक लागतो.

सुरेश शर्मा (सचिव, भारतीय खो-खो महासंघ) ः आम्हाला महाराष्ट्रातल्या अंतर्गत वादात कोणतेही स्वारस्य नाही. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव चंद्रजित जाधव यांच्यासह जे पदाधिकारी का गैरहजर राहिले, त्याबद्दल मला माहिती नाही. गैरहजेरीबाबत आम्ही त्यांना नक्कीच विचारणा करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भगुर्डीच्या ग्रामसेवकाला अभय कुणाचे?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील भगुर्डी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर. डी. मगर यांनी सरपंच, उपसरपंच यांच्या खोट्या सह्या करून सात लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मगर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची चांदवड तालुक्यात बदली करण्यात आल्यामुळे सरपंच, उपसरपंचांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

मगर यांनी अपहार केल्याबाबत सरपंचांसह सर्व सदस्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना पुराव्यांसह माहिती देवूनही याप्रकारावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. याऊलट ग्रामसेवक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या दबावात येऊन गट विकास अधिकाऱ्यांनी मगर यांना समज देऊन त्यांचा अपहार केल्याबाबतचा माफीनामा लिहून घेतला. तसेच भगुर्डी ग्रामपंचायतीच्या नावाने धनादेश लिहून घेत या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हे धनादेश न वटल्यामुळे ग्रामपालीका अडचणीत सापडली आहे.

जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सदर ग्रामपंचायतीने निवेदन दिले असतानाही कुठलीही चौकशी न करता मगर यांची बदली झालीच कशी?असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित केला आहे. चेक देऊन प्रकरण मिटल्याचा अहवाल वरिष्ठांना देणारे गटविकास अधिकारी आता चेकचे पैसे स्वत: भरून देणार आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. भगुर्डी येथे येण्याआधीही मगर यांनी तालुक्यातील इतर दोन ग्रामपालिकेत भ्रष्टाचार केला आहे. त्यावेळीही प्रशासनाने त्यांना पाठ‌शिी घातले होते, असा आरोप करण्यात आला आहे. मगर यांनी पेसा निधीतीन एक लाख ८० हजार व वित्त आयोगाच्या खात्यातील पाच लाख चाळीस हजार रुपये लंपास केले.

ग्रामसेवक रवींद्र मगर यांच्यावर पंचायत समिती स्तरावरून योग्य कार्यवाही करण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यांची बदली जिल्हा स्तरावरून झाली आहे.

-तुकाराम सोनवणे, गटविकास अधिकारी, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जश्न-ए-मौसिकी’ने थिरकवले...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तो आला.. त्याने गायले.. आणि त्याने जिंकले... असेच काहीसे वर्णन ‘रॉकस्टार’ जावेद अलीच्या लाइव्ह इन कॉन्सर्ट अर्थात, जश्न-ए-मौसिकीबाबत म्हणावे लागेल. त्याने स्टेजवर उपस्थिती लावली अन् रसिकांची मने जिंकली. या तरुण हरहुन्नरी गायकाने पहिल्या गीताबरोबरच उपस्थितांना तालावर ठेका धरायला लावला. सर्वांनीच त्याच्या स्वरात स्वर मिसळला अन् रविवारच्या रात्रीचे अाल्हाददायक वातावरण टाळ्यांच्या गजराने भरून गेले.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, तसेच उपक्रमांचे आयोजन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. २८) सायंकाळी हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये जावेद अलीचा ‘जश्न-ए-मौसिकी’ हा लाइव्ह इन कॉन्सर्ट पार पडला. सुरुवातीपासून झालेली तुफान गर्दी शेवटच्या गीतापर्यंत कायम राहिली. बॉलिवूडमध्ये पर्दापण केल्यापासून जावेद अलीने एक से बढकर गीते गायली. काही त्याने स्वतः तयार केली. त्याच्या गाण्यांची जादू तरुणवर्गात निर्माण झाली असून, त्याच्या स्वागतालाच टाळ्या आणि शिट्यांचा वर्षाव उपस्थितांनी करीत प्रोत्साहन दिले.

--

नाशिककरांनी मनमुराद साथ

ऊन आणि गरम वातावरणाची सुरुवातीला चिंता होती. मात्र, येथील अाल्हादायक वातावरण खरोखर मनाला भावले असून, संगीताचे विविध रंग आज सादर करणार असल्याचे जावेदने सुरुवातीलाच स्पष्ट केले. त्यानंतर त्याने हिंदी, तसेच मराठी गीतांची मेजवानी सादर करीत श्रोत्यांची मने चिंब भिजवली. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्याने ‘तू मेरी अधुरी प्यास प्यास... तू आ गयी मन को रास रास’ हे सुमधूर गाणे सुरू केले. या गाण्याला उपस्थितांनी मनमुराद साथ दिली. त्यानंतर त्याने सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटातील लोकप्रिय गीत सादर केले. जावेद अलीने चित्रपटाचे नाव सांगताच श्रोत्यांमधून गाण्याचे बोल गाण्यास सुरुवात झाली. ‘आशियाना तेरा साथ मेरे...’ या गाण्याचे बोल जावेद गात होता, तर त्याच्यासोबत ‘क्योंकि तू धडकन में दिल’चे बोल रसिकांकडून आले. इश्कजादे चित्रपटाचे टायटल साँग सादर करीत आपल्या गायकीची अदाकारी दाखवून दिल्यानंतर जावेदने महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्राचे नाते सांगत अजरामर ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ हे गाणे सादर केले. जावेद अलीकडून उपस्थितांना मिळालेली ही भेट प्रत्येकाच्या कायमच स्मरणात राहील हे निश्चित.

--

रमजान अन् सुरांचे साज

रॉकिंग परफॉर्मन्सनंतर त्याने रॉकस्टार चित्रपटाचे नाव घेतले. इतक्या वेळ धमाल मूडमध्ये असलेल्या जावेदने रमजानच्या पवित्र महिन्याची आठवण करून देत प्रत्येकाच्या मनावर सुरांचे साज चढविण्याची तयारी सुरू केली. एकदमच शांत झालेल्या जावेदने खिशातून रुमाल काढून डोक्याला बांधला. त्यानंतर त्याने ‘कून फाया कून’ हे गीत सादर करीत उपस्थितांचे कान तृप्त केले. अखेरच्या टप्प्यात त्याने ‘नगाडा नगाडा...’ हे अत्यंत लोकप्रिय गीत सादर करून उपस्थितांना वन्स मोअर करण्यास भाग पाडले.

--

ड्युएट साँग्सने रंगत

जावेद अलीने गझल, सूफी, आयटम साँग्ज, रोमँटिक साँग्ज अशा विविध प्रकारांतली गाणी सादर केली. जावेद अलीला साथ दिली ती नवोदित गायिका श्रीनिधीने. ‘मैं तेनू समजा वाकी...’, ‘सिखा मैंने जिना कैसे तेरे बिना हमदम...’, ‘नजर जो तेरी लागी मैं दिवानी हो गई...’ अशी एक से बढकर गीते श्रीनिधीने सादर केली. श्रीनिधी आणि जावेद अली यांनी, दिल इबादत, चाँद छुपा बादल में, आखों की गुस्ताखियाँ, एक दिन तेरी राहों मे, तेरा यू मुस्कुराना, अपनी तो ऐसे तेसे अशी ड्युएट साँग्स सादर केली. अनेक रसिकांच्या फर्माईशदेखील यावेळी जावेद अलीने सादर केल्या.

--

नाशिकचे वातावरण मला भावले आहे. या रम्य सायंकाळी गाणे गाण्याची संधी मला मिळाली, यातच सर्व आले. ‘मटा’ अनेक स्तुत्य उपक्रम वाचकांसाठी राबवत आहे. रसिक-श्रोत्रे बघून माझा हुरूप आणखी वाढला आहे. ‘मटा’च्या वर्धापन दिनानिमित्त, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

-जावेद अली, गायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गाळमुक्ती’साठी पुढाकार घ्यावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार हे शासनाचे महत्त्वाकांक्षी उपक्रम आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून सिंचनासाठी जलसाठा उपलब्ध होणार आहे. धरणातील गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकून जमिनीची सुपिकता वाढविताना ‘गाळमुक्त धरण’ उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

तालुक्यातील लामकानी येथील लालबर्डी धरणातील गाळ काढण्याच्या कामाचे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते उद््घ्‍ााटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, सरपंच नानाभाऊ पाटील, उपसरपंच धनंजय कुवर, तहसीलदार अमोल मोरे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गाळमुक्त धरणाच्या उद््घाटनानंतर जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी केली. तसेच लामकानी ग्रामस्थांनी लोकसहभागातून डॉ. धनंजय नेवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षित केलेल्या वनक्षेत्राची पाहणी केली. तसेच तेथे आगीच्या घटनांना प्रतिबंध बसावा म्हणून वनविभागाच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या फायर ब्रेकरच्या कामाचीही पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी लामकानी ग्रामपंचायतीच्या कार्यालयास भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांचा वाढला हुरूप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

हल्ली कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय यश मिळणे अवघड झाले आहे. बारावी, पदवीनंतर उपलब्ध असलेल्या नोकरी आणि उच्च शिक्षणाच्या संधीसाठी स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. त्यामुळे विद्यार्थीही एका बैठकीत अभ्यास करणे पसंत करत आहेत. यासाठी योग्य मार्गदर्शन, ग्रुपने अभ्यास करण्यासाठी अ‌भ्यासिकेची सुविधा असल्यास यशात भर पडू शकते. शहरातील स्पर्धा प‌रीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आता अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हुरूप आला असून, दररोज विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येथे जमत आहेत.

याआधी मनमाड शहरातील तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाठी नाशिकला जावे लागत होते. मनमाड परिसरात स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन व संदर्भ पुस्तके उपलब्ध होत नव्हते. म्हणून मनमाड जनहित संस्थेने आयुडीपी भागातील नगरपालिकेच्या नव्या इमारतीत अभ्यासिका सुरू केली आहे. या अभ्यासिकेला तरुणांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

मनमाड शहरात यापूर्वी अभ्यासिका नसल्याने तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व उपयुक्त पुस्तके उपलब्ध नसल्याने मनमाडच्या विद्यार्थ्यांना नाशिकला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मनमाड परिसरात अशा संधी मिळणे गरजेचे होते. मनमाडच्या युवा पिढीची ही गरज लक्षात घेऊन मनमाड जनहित संस्थेने पालिकेच्या नव्या इमारतीत कै. वर्धमान बरडीया वाचनालय व अभ्यासिका सुरू केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन देवरे, मनोज गांगुर्डे, उपाली परदेशी, नीलेश वाघ आदी या अभ्यासिकेचे कामकाज निष्ठेने पाहत आहेत. या अभ्यासिकेत एमपीएसएसी व यूपीएससीसाठी लागणारी संदर्भ पुस्तके आहेत. स्पर्धा परीक्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिकादेखील या ठिकाणी आहेत. मनमाडमधील विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. रविवार वगळता ही अभ्यासिका सुरू असते.

वाचनालय उपयुक्त

अभ्यासिकेच्या जोडीने कै. बरडीया वाचनालयात ऐतिहासिक वैचारिक साहित्य क्रीडा चरित्र या प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. संजोग बरडीया रविशंकर गुप्ता यांच्यासह अनेकांनी या अभ्यासिकेसाठी उपयुक्त सुविधा देऊन विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नागरिकांनी देणगी किंवा पुस्तकांच्या रुपाने योगदान द्यावे, असे आवाहन अशोक परदेशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनकार्डधारकांना साखर ‘कडू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महागाई कमी करण्याची आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारने रेशनवर दिली जाणारी साखरही महाग केली आहे. अंत्योदय आणि दारीद्रये रेषेखालील लाभार्थ्यांना एक किलो साखरेमागे आता पाच रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे प्रतिमाणसी अर्धा किलो साखर वितरणाची पद्धत सरकारने मोडीत काढली असून लाभार्थी कुटुंबाला दरमहा केवळ एकच किलो साखर मिळणार आहे. त्यामुळे गरीबासाठी साखर काहीशी कडू झाली आहे.

आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या कुटुंबांना सरकारच्यावतीने सवलतीच्या दरामध्ये धान्य, साखर आणि केरोसिन उपलब्ध करून दिले जाते. परंतु सरकारची धोरणे बदलल्याने गेल्या काही वर्षांत गहू आणि तांदूळ वगळता अन्य धान्य मिळणे जवळपास बंदच झाले आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली साखरही आता सरकारने महाग केली आहे. केंद्र सरकार साखरेसाठी सबसिडी देते. एप्रिलपासून साखरेवर दिली जाणारी सबसीडी एका किलोसाठी १८ रुपये ५० पैसे ऐवढेच देण्याचे न‌िश्च‌ित केले आहे. परिणामी राज्य सरकारने रेशनवरील साखरेच्या दरातही वाढ केली आहे. त्यामुळे पुर्वी १५ रुपये किलो दराने मिळणारी साखर आता २० रुपये किलोने खरेदी करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतील उद्यानांना घरघर

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

सिडको परिसरातील बहुतांश उद्यानांना घरघर लागली असून, गणेश चौकातील मयुरी गार्डन आणि महात्मा फुले गार्डन अक्षरशः उजाड बनल्याची स्थिती दिसून येत आहे. एेन सुटीच्या कालावधीतच येथील खेळण्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने बच्चेकंपनीचा हिरमोड होत आहे. अस्वच्छता, दुर्गंधीसह अन्य समस्यांमुळे स्थानिक रहिवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोप परिसरातून करण्यात येत असून, येथे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

एेेन सुटीतच मयुरी गार्डन आणि महात्मा फुले गार्डनमधील खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. झोक्यांची मोडतोड झालेली असून, घसरगुंंडी आहे, पण त्यावर चढण्यासाठी पायऱ्या नाहीत, अशी अवस्था आहे. गार्डनमध्ये विजेचे खांब उभे आहेत, पण त्यावर दिवेच नाहीत. येथील सिमेंटच्या बाकांचीही तूटफूट झालेली आहे. हिरवळ, वृक्षसंपदा कोमेजली आहे. या गार्डन्समध्येे दैनंंदिन स्वच्छतेचा अभाव असून, कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस तसेच पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली असून, त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.

--

पाण्याच्या टाकीकडे दुर्लक्ष

मयुरी गार्डन आणि महात्मा फुले गार्डनमध्येे पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याचे दिसून येते. या गार्डन्समधील पाणपोयांची दुरवस्था झालेली आहे. पाण्याचे नळ तुटलेले आहेत. स्थानिक प्रशासन पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.

--

परिसरातील लहान मुले महात्मा फुले गार्डनमध्येे जातात. परंतु, तेथे पुरेशी खेळणी, लाइट आदींचा अभाव असल्याने त्यांचा हिरमोड होतो. अस्वच्छतेने रोगराईची भीती वाढली आहे. लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होते.

-ऋषिकेश वाघचौरे,

--

स्थानिक रहिवासी

दैनंंदिन स्वच्छतेचा अभाव असल्याने मयुरी गार्डन परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.

-सदाशिव पवार, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संपाची ‘ट्रायल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक-त्र्यंबक रास्त्यावरील तळवाडे फाटा तुपादेवी मंदिर येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको करीत एकपासून सुरू होणाऱ्या संपाचा इशारा दिला. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी रस्ता रोखल्याने दोन्ही बाजूला काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकरी एक जूनपासून कोणकोणते पर्याय वापरणार आणि त्याची काय परिणाम होणार याची जाणीव करून देण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.

दर सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मांदियाळी असते. उन्हाळी सुट्या संपल आल्याने परप्रांतीय भाविकांची गर्दी झाली आहे. भाविकांसह बस वाहतुकीचा चांगलाच खोंळबा या अंदोलनाने झाला. दरम्यान नायब तहसीलदार निरगुडे यांनी घटनास्थळी पोहचून शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले. पोल‌सि निरीक्षक सुधाकर मांडवकर, उपनिरीक्षक कैलास अकुले यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी शेतकरी संपाची रुपरेषा स्पष्ट करण्यात आली.

तालुक्यात धरण परिसरात भाजीपाला घेण्यात येतो. हा भाजीपाला येत्या दोन दिवसात आहे तसा काढून विकावा, असे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकरचा भाजीपाला शेतातून काढण्यात येणार नाही. शेतमाल येणार नसल्यामुळे मार्केट कम‌टिी, छोटे मोठे व्यापारी यांचे व्यवहार बंद राहतील. कोणाही शेतकऱ्याने बाजारात अथवा थेट गावात भाजीपाला व्रिकीस नेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दूध विक्री पूर्ण बंद राहणार आहे. एकही दूधवाला शहरात व गावात दूध दही आदी विक्रीस आणणार नाही अथवा डेअरीस घालणार नाही. बाहेरच्या जिल्ह्यातही संपामुळे तेथून दूध येणार नाही. तसेच दूध नेणारी वाहने आढळयास ती आडवण्यात येतील, वाहनांचे नुकसान झाल्यास ते स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. पोल्ट्री उत्पादनेही बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे.

‘पेरणीबंद’वर शेतकरी ठाम

सटाणा ः स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा येत्या एक जूनपासून शासनाचा निषेध करण्यासाठी ‘पेरणीबंद’ आंदोलन करून शेतकरी संपावर जाणार, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी दिला आहे.

उद्योगधंदे व नोकरदारांना महागाई व परिस्थितीनुसार लाभ दिले जातात. त्याप्रमाणो शेती हा पण एक मोठा उद्योग असल्याने काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनाही लाभ द्यावा, त्यांचा ७/१२ कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, ६0 वर्ष वस असलेल्या शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन, दुधाला योग्य, भाव सक्षम पीकविमा, अनुदानीत ठिबक व तुषार सिंचन योजना सुरू करावा आदी ठराव तालुक्यात ग्रामसभांमधून एकमताने मंजूर करण्यात आले आहे. शासनाने या ठरावांची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच एक जूनपासून शेतकऱ्यांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन जि. प. सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे, जितेंद्र वाघ, साहेबराव पगार, सुधाकर पगार आदींनी केले आहे.

मोटरसायकल रॅलीद्वारे संपासाठी प्रबोधन
निफाड ः कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी एक जूनपासून शेतकरी संपावर जात आहे. निफाड तालुक्यातील गावागावात ग्रामपंचायत, सोसायटी स्तरावर बैठका होऊन संपावर जण्याबाबत ठराव करण्यात आले आहेत. मोटरसायकल रॅली काढून संपात सहभागी होण्यासाठी प्रचार प्रसार सुरू आहे. सोमवारी सकाळी शेतकरी संपासाठी प्रयत्न करणाऱ्या किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी निफाड तालुक्यातील गावांमध्ये मोटारसायकल रॅली काढली.

चांदोरी, सायखेडा, लासलगाव, खडकमाळेगाव, दिक्षी सुकेणे या भागातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत सोसायटी स्तरावर शेतकऱ्यांना एकत्र करून कोणत्याही परिस्थितीत एक जूनपासून संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. सायखेडा, सुकेणे या ठिकाणचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद ठेवावी यासाठी निवेदने देण्यात आले आहे. चांदोरी, सायखेडा, चितेगाव या भागातून रोज साधारण १२५ ट्रक इतका भाजीपाला बाहेर जातो. त्यामुळे नाशिक, मुंबईला पुरवठा होणारा भाजीपाला बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. कसबे सुकेणे परिसरातून रोज दोन ट्रक गुलाबाची फुले मुंबईला जातात. ही निर्यातही बंद करण्यात येणार आहे. यासह दूध, धान्य, फळांची वाहनांद्वारे होणारी निर्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंबापुरीत आज वाजणार ‘मेक इन नाशिक’चा ढोल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगभरातील उद्योजकांना नाशिकचे महत्त्व सांगण्यासाठी मुंबईत ३० व ३१ मे रोजी नेहरू सेंटरमध्ये होणाऱ्या ‘मेक इन नाशिक’या मेगा इव्हेंटची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे उद‌्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, अनंत गिते, सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू व्हावेत व १० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक व्हावी, असे टार्गेट ठरवत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

‘मेक इन नाशिक’च्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली आहे. जळपास सर्वच स्टॉलचे वाटप झाले असून, आमंत्रण पत्रिकाही मान्यवरांना व उद्योजकांना देण्यात आली आहे. हा कार्यक्रम लक्षवेधी व्हावा व त्यातून नाशिकची ओळख व्हावी, असा प्रयत्न सर्वांनी केला आहे.

या कार्यक्रमाचे प्रेझेन्टेशन चांगले व्हावे यासाठी सर्वांनी भर दिला आहे. उद्योजकांना नाशिकच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आलेखही यात मांडण्यात आला आहे. दोन दिवसाच्या या कार्यक्रमात नाशिकच्या औद्योगिक सक्सेस स्टोरीही दाखवण्यात येणार असून, त्यात नाशिकचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या प्रझेन्टेशनमध्ये संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात नाशिकच्या औद्योगिक प्रगतीची माहिती देण्यात आली आहे.

मंगळवारी सकाळी उद‌्घाटन सोहळा झाल्यानंतर दुपारी २ ते ४ पर्यंत सक्सेस स्टोरी व प्रेझेन्टेशन होणार आहे. त्यानंतर बुधवारी मोठ्या कार्पोरेट कंपन्यांचे उत्तर महाराष्ट्र काय योगदान आहे यावर सेमिनार होणार आहे. त्यानंतर वाईन ते आयटी सेंटर व उद्योग यावर

चर्चा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ‘मेक इन नाशिक’ या मेगा व्हेंटचा समारोप होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकहो, होऊ द्या खर्च

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे १७९९ कोटी ३० लाखांचे बजेट सोमवारी महासभेपुढे सादर करण्यात आले. महासभेनेने या बजेटला उपसूचनांसह मंजुरी दिली. सात तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौरांनी चालू वर्षाच्या बजेटमध्ये नगरसेवकांचा निधी ४० लाखांवरून ७५ लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तर शहरात समाविष्ठ झालेल्या २० खेड्यांसाठी प्रतिखेडे ५० लाख रुपयांप्रमाणे १० कोटींची तरतूद करण्यात आली. सोबतच शहरात एलईडी दिवे बसविण्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आल्यामुळे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी नगरसेवकांसह खेड्यांनाही खूश केले आहे.

स्थायी समितीने तयार केलेले बजेट सोमवारी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेपुढे सादर करण्यात आले.

शिवाजी गांगुर्डे यांनी हे बजेट सादर केले. प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या १४१० कोटींच्या बजेटमध्ये स्थायी समितीने ३८९ कोटी २३ लाखांची वाढ सुचवली आहे. त्यात रस्ते क्राँक्र‌िटीकरणासाठी ९५ कोटी, इमारती बांधकामासाठी ३४ कोटी, जलकुंभासाठी ३१ कोटी, उद्यानांसाठी दोन कोटी, आरोग्यासाठी ३.५० कोटी, एलईडी दिव्यांसाठी ३१ कोटींचा त्यात समावेश आहे. पालिकेच्या इमारती, गाळे, खुल्या जागा, ट्रक टर्मिनस भाडेतत्त्वावर देवून त्यांचा बीओटीवर विकास करण्याची शिफारस स्थायी समितीने केली आहे. सभापतींनी सादर केलेल्या बजेटवर तब्बल सात तास मॅरेथॉन चर्चा झाली.

सात तास चाललेल्या महासभेनेत सदस्यांनी उत्पन्न वाढीसाठी विविध सूचनांचा वर्षाव केला. या बजेटमध्ये १७९९ कोटी ३० लाख जमा राशी तर १७९३ कोटी ३२ लाख रुपये अपेक्षित खर्च धरण्यात आला असून पाच कोटी ९८ लाख रुपये शिल्लक दाखवण्यात आली आहे. नगरसेवकांनी आपल्या भाषणात नगरसेवक निधी वाढविण्यासह शहराच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यांच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौर भानसी यांनी स्थायी समितीने शिफारस केलेला नगरसेवक निधीत ३५ लाखांची वाढ करत तो पाऊण कोटींपर्यंत नेला. त्यामुळे एका प्रभागात चारही नगरसेवकांचा मिळून आता दरवर्षी तीन कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. सोबतच खेड्यांच्या विकासासाठी अतिरिक्त दहा कोटी रुपये देण्यांची घोषणा केली आहे. प्रती खेडे ५० लाखांचा निधी दिला जाणार आहे.

शहरभर एलईडी

स्थायी समितीने शहरात एलईडी दिवे बसवण्यासाठी बजेटमध्ये ३१ कोटींचा निधी धरला आहे. महापौरांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देत, एलईडी खरेदीचा प्रस्ताव पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. महिनाभरात प्रस्ताव तयार करण्यासह खरेदीची प्रक्रिया सुरू होईल.

रस्ते, ड्रेनेजचा प्रस्ताव करा

महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यानी शहरातील वाहतूक व्यवस्था, घनकचरा, पाणीपुरवठा या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच यासाठी आवश्यक आर्थिक मदतीचेही आश्वासन दिले आहे. त्यानुसार महापौरांनी प्रशासनाला सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्याना सादर केला जाणार आहे.

स्मशानभूमीसाठी दहा कोटी

महासभेत बहुतेक सदस्यांनी शहरातील स्मशानभूमींच्या दुरावस्थेवर बोट ठेवले. आंनदवल्ली, मोरवाडी येथे स्मशानभूमी बंद असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे महापौरांनी या बजेट मध्ये दहा कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्याची घोषणा केली आहे.


करवाढीला फाटा

महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या बजेटमध्ये घरपट्टी व पाणीपट्टीत दहा ते पंधरा टक्के वाढ सुचवली होती. परंतु स्थायी समीतीने व्यावसायिक वापराच्या पाणीपट्टी वगळता घरपट्टी व पाणीपट्टीच्या दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला होता. महासभेनेही घरपट्टी व पाणीपट्टीतल्या दरवाढीला फाटा दिला आहे. त्यामुळे नागरिकांवरील करवाढींता टांगती तलवार तूर्तास टळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधकांकडून बजेटचे वाभाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेने सादर केलेल्या बजेटमध्ये असंख्य त्रुटी काढूत विरोधकांनी सोमवारच्या महासभेत सत्ताधाऱ्यांवर पुन्हा कुरघोडी केली. विरोधाकांनी केलेल्या आरोपांमुळे बजेटमधील त्रुटी दूर करण्याचे आदेश महापौरांनी दिलेत.

कायद्यानुसार कोणत्याही करात करवाढ ही २० फेब्रुवारीच्या आत करणे बंधनकारक आहे. तरीही प्रशासनाने या बजेटमध्ये घरपट्टीत दहा तर पाणीपट्टीत पाच कोटींचे वाढीव उत्पन्न करवाढीतून अपेक्षित धरल्याचा आरोप बग्गा यांनी केला. ही करवाढ धरून बजेट हे १४१० कोटींचे करण्यात आले आहे. प्रत्यक्षात करवाढ झाली नसल्याने हे बजेट आता १३९५ कोटींचे झाले आहे. तर खर्च हा १४०५ कोटींचा धरला आहे. त्यामुळे या बजेटमध्ये नऊ कोटींची तूट असल्याचा आरोप त्यांनी केला. बजेटमधील लेखा विभागाने असंख्य चुका केल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी पुराव्यानिशी केला. आयुक्तांच्या सहमतीशिवाय कोट्यावधी रुपये अन्य विभागात वळते केल्याचा आरोप त्यांनी केला.

वेतन आयोग लागू करा

बजेटवरील चर्चेत विरोधकांनी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. गजानन शेलार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही सातवा वेतन आयोग द्यावा अशी मागणी केली.

दौऱ्यावरून राजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महापालिकेत केलेल्या दौऱ्याचेही पडसाद या महासभेत उमटलेत. मुख्यमंत्र्यानी नाशिकच्या विकासासाठी निधी न दिल्याबददल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. सोबतच इतर नगरसेवकांना या बैठकीसाठी का बोलवले नाही,यावरून मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा कमी झाली असती का,असा आरोप बग्गा यांनी केला. बजेटमध्ये शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटा प्रोटोकॉलनुसार लावण्यात न आल्यावरून शिवसेनेसह काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. डी. जी. सूर्यवंशी, काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी कोंडी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगभारतीतर्फे जूनमध्ये इस्राईल अभ्यास दौरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य कृषी पदवीधर संघटनेच्या उद्योगभारती या उद्योजकता प्रशिक्षण विभागातर्फे इस्राईल कृषी अभ्यास दौऱ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात आतापर्यंत महाराष्ट्रातून सुमारे १४५ प्रगतिशील शेतकरी व उद्योजक सहभागी झाले होते. येत्या जून महिन्यात दौरा नेण्याचे आयोजन सुरू असून, उद्योगभारतीतर्फे या वर्षी ऑगस्टमध्येच आगाऊ प्रवेश नोंदणीस उद्योजक आणि शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

इस्राईलमधील गट शेती भेट, किबूत्झ, इरिगेशन सिस्टिम्स, खजूर वृक्षांचा अभ्यास यानंतर मृत समुद्रास भेट, जेरुसलेम शहर भेट, जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनी तसेच जैन इरिगेशन कंपनी आणि इस्राईल तसेच जगातील प्रख्यात कृषी विद्यापीठ वोल्क्यांनी या संस्थेस भेट, तेथे विद्यापीठातील डाळिंब, द्राक्षे, फळबाग लागवड तंत्रज्ञानाचा अभ्यास, हरितगृहाच्या आधुनिक तंत्राचा अभ्यास, वाईन उत्पादन अभ्यास व संबंधित प्रकल्पांना भेटी, इस्राईलमधील सर्वात यशस्वी हॅचेरी व अंडी उत्पादक कंपनीस भेट, उत्पादन पोल्ट्री व्यवस्थापनाचा अभ्यास, यानंतर मत्स्य व्यवसाय व डाळिंब बाग व्यवस्थापन आणि उत्पादन तंत्राचा अभ्यास, शेतकरी कुटुंबाबरोबर संवाद साधण्याची संधी सहभागी युवकांना व शेतकऱ्यांना या दौऱ्यात मिळेल. माहितीसाठी www.agams.org.in ही वेबसाईट पहावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचाऱ्याचा मोबाइल पळविला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार भामट्यांनी पळवून नेला. ही घटना वर्दळीच्या द्वारका परिसरात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत दीपचंद बलदोटा (४५, रा. नवरत्न अपार्ट. द्वारका) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. रविवारी रात्री शतपावली करण्यासाठी अभिजीत घराबाहेर पडले असता ही घटना घडली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते परिसरातील गुरूकृपा बंगल्यासमोरून पायी जात असतांना पल्सरस्वार दोघांनी त्यांच्या हातातील मोबाइल खेचून धूम ठोकली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक पानसरे करीत आहेत.

महिलेच्या पर्सची चोरी

खरेदीसाठी दुकानात आलेल्या महिलेने व्यावसायिक महिलेची पर्स चोरून नेल्याची घटना गणेश कॉलनीत घडली. पर्समध्ये तीन हजार रुपयांची रोकड व महत्वाची कागदपत्रे होती. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयभवानी रोडवरील जाचकनगर भागात राहणाऱ्या शुभ्राली अशोक सरकार यांच्या तक्रारीनुसार, सरकार यांचे गणेश कॉलनीतील साई यश सोसायटीत कॉन्सिल्फ बुटीक आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक महिला ग्राहक म्हणून त्यांच्या दुकानात आली. या महिलेने सरकार यांची नजर चुकवून दुकानातील काउंटरच्या बाजूला ठेवलेली पर्स चोरी केली. घटनेचा अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.

महिलेचे मंगळसूत्र खेचले

पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोपेड दुचाकीवरील भामट्याने तोडून नेल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावरील टागोरनगर भागात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा संजय केदारे (रा. आशियाना सोसा. टागोरनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास केदारे घराकडे पायी येत असताना स्नॅचिंगचा प्रकार घडला. कमलकुंज बंगल्यासमोरून त्या पायी जात असतांना पाठीमागून मोपेड दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून नेले. साधारणतः स्नॅचिंग करणारे चोरटे भरधाव वेगाच्या दुचाकी वापरतात. मात्र, या घटनेत चोरट्यांनी मोपेडचा वापर केला आहे.

तीन दुचाकी चोरी

शहरातील तीन दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. मखमलाबाद रोडवरील सचिन संपत तांबे (रा. इंदू प्लाझा, क्रांतिनगर) यांची स्प्लेंडर (एमएच १५ सीई ९२०५) ७ मे रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुचाकी चोरी केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात घडली. खुटवडनगर येथील स्वप्निल रमेश पगारे बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कामानिमित्त त्रिमूर्ती चौकात गेले होते. विशाल वाईन शॉपजवळ पार्क केलेली त्यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ इएन १३६७) चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार कांडेकर करीत आहेत. तर जयभवानीरोडवरील विजय शिवाजी कदम (रा. कदम मळा) यांची स्प्लेंडर (एमएच १५ बीआर ४०३९) बुधवारी दसक गावातील स्मशानभूमी परिसरात पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images