म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
नाशिक-त्र्यंबक रास्त्यावरील तळवाडे फाटा तुपादेवी मंदिर येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको करीत एकपासून सुरू होणाऱ्या संपाचा इशारा दिला. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी रस्ता रोखल्याने दोन्ही बाजूला काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकरी एक जूनपासून कोणकोणते पर्याय वापरणार आणि त्याची काय परिणाम होणार याची जाणीव करून देण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.
दर सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मांदियाळी असते. उन्हाळी सुट्या संपल आल्याने परप्रांतीय भाविकांची गर्दी झाली आहे. भाविकांसह बस वाहतुकीचा चांगलाच खोंळबा या अंदोलनाने झाला. दरम्यान नायब तहसीलदार निरगुडे यांनी घटनास्थळी पोहचून शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले. पोलसि निरीक्षक सुधाकर मांडवकर, उपनिरीक्षक कैलास अकुले यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी शेतकरी संपाची रुपरेषा स्पष्ट करण्यात आली.
तालुक्यात धरण परिसरात भाजीपाला घेण्यात येतो. हा भाजीपाला येत्या दोन दिवसात आहे तसा काढून विकावा, असे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकरचा भाजीपाला शेतातून काढण्यात येणार नाही. शेतमाल येणार नसल्यामुळे मार्केट कमटिी, छोटे मोठे व्यापारी यांचे व्यवहार बंद राहतील. कोणाही शेतकऱ्याने बाजारात अथवा थेट गावात भाजीपाला व्रिकीस नेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दूध विक्री पूर्ण बंद राहणार आहे. एकही दूधवाला शहरात व गावात दूध दही आदी विक्रीस आणणार नाही अथवा डेअरीस घालणार नाही. बाहेरच्या जिल्ह्यातही संपामुळे तेथून दूध येणार नाही. तसेच दूध नेणारी वाहने आढळयास ती आडवण्यात येतील, वाहनांचे नुकसान झाल्यास ते स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. पोल्ट्री उत्पादनेही बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे.
‘पेरणीबंद’वर शेतकरी ठाम
सटाणा ः स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा येत्या एक जूनपासून शासनाचा निषेध करण्यासाठी ‘पेरणीबंद’ आंदोलन करून शेतकरी संपावर जाणार, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी दिला आहे.
उद्योगधंदे व नोकरदारांना महागाई व परिस्थितीनुसार लाभ दिले जातात. त्याप्रमाणो शेती हा पण एक मोठा उद्योग असल्याने काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनाही लाभ द्यावा, त्यांचा ७/१२ कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, ६0 वर्ष वस असलेल्या शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन, दुधाला योग्य, भाव सक्षम पीकविमा, अनुदानीत ठिबक व तुषार सिंचन योजना सुरू करावा आदी ठराव तालुक्यात ग्रामसभांमधून एकमताने मंजूर करण्यात आले आहे. शासनाने या ठरावांची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच एक जूनपासून शेतकऱ्यांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन जि. प. सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे, जितेंद्र वाघ, साहेबराव पगार, सुधाकर पगार आदींनी केले आहे.
मोटरसायकल रॅलीद्वारे संपासाठी प्रबोधन
निफाड ः कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी एक जूनपासून शेतकरी संपावर जात आहे. निफाड तालुक्यातील गावागावात ग्रामपंचायत, सोसायटी स्तरावर बैठका होऊन संपावर जण्याबाबत ठराव करण्यात आले आहेत. मोटरसायकल रॅली काढून संपात सहभागी होण्यासाठी प्रचार प्रसार सुरू आहे. सोमवारी सकाळी शेतकरी संपासाठी प्रयत्न करणाऱ्या किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी निफाड तालुक्यातील गावांमध्ये मोटारसायकल रॅली काढली.
चांदोरी, सायखेडा, लासलगाव, खडकमाळेगाव, दिक्षी सुकेणे या भागातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत सोसायटी स्तरावर शेतकऱ्यांना एकत्र करून कोणत्याही परिस्थितीत एक जूनपासून संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. सायखेडा, सुकेणे या ठिकाणचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद ठेवावी यासाठी निवेदने देण्यात आले आहे. चांदोरी, सायखेडा, चितेगाव या भागातून रोज साधारण १२५ ट्रक इतका भाजीपाला बाहेर जातो. त्यामुळे नाशिक, मुंबईला पुरवठा होणारा भाजीपाला बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. कसबे सुकेणे परिसरातून रोज दोन ट्रक गुलाबाची फुले मुंबईला जातात. ही निर्यातही बंद करण्यात येणार आहे. यासह दूध, धान्य, फळांची वाहनांद्वारे होणारी निर्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट