Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मृगाच्या हजेरीने बळीराजाला दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

मृग नक्षत्राला सुरुवात होवून चारपाच दिवस उलटले तरीही तालुक्याला हुलकावणी देणाऱ्या वरुणराजाने मंगळवारी मध्यरात्री दमदार हजेरी लावत तालुकावासियांच्या झोळीत पावसाचे दान टाकले. या पावसामुळे शेतकऱ्यांना खरिपाचा श्रीगणेशा करण्यासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.

पावसाळ्यात बळीराजाचे लक्ष असते ते मृग नक्षत्राकडे. यंदा गेल्या ८ तारखेला ‘मेंढा’ वाहनावर स्वार होत प्रवेशकर्ते झालेल्या या मृगाने पाच दिवस उलटूनही कृपादृष्टी न केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली होती. आकाशात मळभ दाटून येते न येते तोच वाहता उनाड वारा आलेल्या काळ्याभोर मेघांना हुसकावून लावत होतो. मात्र पाच दिवसांच्या या खेळानंतर सोमवारी सायंकाळी तालुक्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावली होती. मध्यरात्री बारानंतर पावसाने चांगलाच जोर धरला. जोरदार सरींनिशी कुठे एक तास तर कुठे दीड तास हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हायसे वाटले आहे.

सोमवाररात्रीपासून मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत येवला तालुक्यातील महसूल यंत्रणेच्या येवला मंडळात ८ मिलीमीटर, अंदरसूल २५.२, नगरसूल २१, सावरगाव १०, पाटोदा १९, तर जळगाव नेऊर मंडळात १६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस तालुक्यातील उत्तरपूर्व पट्ट्याला दिलासा देणारा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरपदासाठी अनोखी युती

$
0
0

मालेगावात काँग्रेस-शिवसेना एकत्र; आज निवड

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक आज, बुधवारी (दि. १४ ) होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेना अशी अनोखी युती झाल्याने महापौरपदासाठी भिवंडी पॅटर्नची पुनरावृत्ती होते का? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. एमआयएमची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

मनपा सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे माजी आमदार शेख रशीद, मालेगाव महागठबंधन आघाडीचे नबी अहमदुल्ला, बुलंद इक्बाल यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे सखाराम घोडके, भाजपचे सुनील गायकवाड तर मालेगाव महागठबंधन आघाडीचे अन्सारी मन्सूर शब्बीर अहमद यांनी अर्ज दाखल केले आहेत.

निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू होती. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे जवळपास समसमान बलाबल असल्याने १३ जागी विजयी झालेल्या शिवसेना तसेच एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांशी दोन्ही पक्षांकडून बोलणी सुरू होती.
एमआयएमची भूमिका निर्णायक

सत्तास्थापनेसाठी ४३ इतके संख्याबळ गरजेचे आहे. काँग्रेस व शिवसेना यांच्यात युती होऊन देखील दोन नगरसेवकांची गरज असल्याने नऊ जागी विजयी झालेल्या एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्यास काँग्रेस व सेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे एमआयएम नेत्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस-शिवसेनेने प्रयत्न सुरू आहेत. एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज हे सभागृहात काय भूमिका घेतात यावर काँग्रेस व शिवसेनेच्या सत्तास्थापनेचे गणित ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरडीने जीव टांगणीला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या मेटघर किल्ला वस्तीवर पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने लोकवस्तीचे स्थलांतर करून पुनर्वसन करण्याचे आव्हान शासनापुढे उभे राहिले आहे. गत आठवड्यात विनायक खिंड या वस्तीतील तरुणाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनला जाग आली आहे.

सन २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण घटना घडल्यानंतर शासन यंत्रणांनी डोंगराच्या कुशीत असलेल्या वस्त्यांचे मान्सूनपूर्व काळात सर्वेक्षण सुरू केले. धोकादायक स्थितीत असलेल्या वस्ती सुरक्ष‌ित जागी स्थालंतरीत करण्याचे ठरविण्यात आले होते. तथापि विनायक खिंड येथील दुर्घटना घडली तोपर्यंत प्रशासनाला या संभाव्य आपत्तीबाबत पुरेशी कल्पना नव्हती. ४ जून २०१७ रोजी विनायक खिंड येथे दरड कोसळल्याने एका युवकाचा त्यात बळी गेला. त्यानंतर ग्रामपंचायतीने हालचाली सुरू केल्या. तहसीलदारांनीही येथे भेट देऊन पुनर्वसनाबाबत अश्वासन दिले.

ब्रह्मगिरीच्या पायथ्याला सुपलीची मेट, गंगाद्वार, जावाची वाडी, विनायक खिंड, पठारवाडी व महादरवाजा मेट या वस्त्या आहेत. हे सर्व पाडे मिळून ३२५ मिळकतदार आहेत. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीने याबाबत विभागीय आयुक्तांना पत्र दिले आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मेटघर किल्ला ग्रामपंचायत लोकवस्तीचे विस्थापन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र मान्सून तोंडावर असल्यामुळे जवळपास दोन हजार लोकवस्तीचे विस्थापन करणे अवघड आहे.

जागेचा प्रश्न

पावसाळ्यात दरडींचा धोका पत्करत शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधव येथे तग धरून आहेत. येथे नागली, वरईची शेती केली जाते. बहुतेकांकडे पशुधन आहे. काही ग्रामस्थ भाविक पर्यटकांना चहापान, प्रसाद आदी सेवा पुरवितात. या सर्वांच्या उपजीविकेचे काय? अशा अडचणी निर्माण होणार आहेत. विस्थापनासाठी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

प्रशासनाचा ढिसाळपणा उघड

वास्तव‌िक ४ जूनची दुर्घटना घडण्यापूर्वी १ जून रोजी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली होती. त्या बैकठीस बहुतांश अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती. तेव्हाच हा विषय चर्चेला आला असता, तर अधिक सोयीचे झाले असते. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अशा प्रकारे दरड कोसळणे, डोंगररांगा ढासळणे, जमीन खचणे, पूर परिस्थिती निर्माण होणे आदींबाबत रहिवाशांनी काय काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पराभूतांची कामे गोठवणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही, महासभेत नगरसेवकांचा निधी ७५ लाख रुपये करण्याची घोषणा करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी आता घोषणेच्या पूर्ततेसाठी जुन्या नगरसेवकांच्या निधीवर गंडांतर आणण्याची तयारी सुरू केली आहे. नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या ७५ लाखांच्या निधीचा ताळमेळ जमवण्यासाठी पराभूत झालेल्या सर्व नगरसेवकांची कामे ब्रेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गत नगरसेवकांच्या शिलकी रकमेतून विद्यमान नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी देता येईल, असा दावा महापौर रंजना भानसी यांनी केला आहे. त्यामुळे जवळपास ४९ पराभूत नगरसेवकांना त्याचा फटका बसणार आहे. या निर्णयावरून वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात अजूनही करवाढीचा विचार असून, त्यासाठी नगरसेवकांशी चर्चा करणार असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले.

महापौर भानसी यांनी गेल्या महासभेत नगरसेवकांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी मंजूर केला आहे. स्थायी समितीने ४० लाखांची शिफारस केली होती. त्यात महापौरांनी ३५ लाखांनी वाढ केली होती. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना नगरसेवकांना एवढा निधी दिल्यावरून आश्चर्य व्यक्त केले जात होते. एकीकडे करवाढ नाकारली असताना नगरसेवकांना निधी कसा द्यायचा, या पेचात प्रशासन पडले होते. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर नाशिकच्या पदरात सरकारकडून निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली आहे. त्यामुळे नगरसेवकांना ७५ लाख निधीचा जुगाड कसा लावायचा, यावरून सत्ताधारी पेचात आहे. १२२ नगरसेवकांना तब्बल ९३ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, तर दुसरीकडे भांडवली कामांसाठी केवळ १३० कोटींचा निधी शिल्लक आहे. यात नगरसेवकांना निधी देताना तारेवरची कसरत होणार आहे.

महापौर रंजना भानसी यांनी यातून मधला मार्ग काढला आहे. मनसेच्या सत्ताकाळात प्रतिनगरसेवकाला ६० लाखांचा निधी दिला होता. शेवटच्या सत्रात हा निधी मिळाल्यानंतर कामांसाठी नगरसेवकांनी घाई केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परिपत्रक काढून हा निधीच गोठवला होता. त्यामुळे जवळपास निम्म्या नगरसेवकांचा हा निधी निवडणुकीमुळे अडकला होता. निवडणुका झाल्यानंतर ही कामे मार्गी लावण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले होते. आता महापौरांनी केवळ विद्यमान नगरसेवकांच्याच कामांना प्राधान्य देत, माजी नगरसेवकांच्या कामांच्या फाइल्सना ब्रेक लावला आहे. जवळपास ४२ नगरसेवक पराभूत झाले आहेत, तर २२ नगरसेवकांनी निवडणूकच लढवली नाही. त्यामुळे या लोकांची पाइपलाइनमध्ये असलेली २५ कोटींची कामे थांबवून हा निधी विद्यमान नगरसेवकांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांना दिलासा मिळेल, असा दावा केला जात आहे.

जुना-नवा वाद

दरम्यान, महापौरांच्या या निर्णयावरून जुन्या आणि नवीन नगरसेवकांमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. एखाद्या माजी नगरसेवकाची फाइल मंजुरीच्या अंतिम टप्यात असेल आणि त्याच प्रभागातील नवीन नगरसेवकाने पुन्हा तीच फाइल टाकल्यास त्यावरून वाद निर्माण होणार आहे. पराभूत नगरसेवकांची कामे गोठवण्याची ही पहिलीच वेळ असल्याने यावरून भाजपविरोधात पुन्हा वातावरण तापवले जाण्याची शक्यता असून, या निर्णयाला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.

करवाढीचे पुन्हा संकेत

दरम्यान, महापालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने करवाढ करणे गरजेचे असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी करवाढीला विरोध केल्याने हा प्रस्ताव बासनात गुंडाळला जाईल अशी चर्चा होती. मात्र, महापौरांनी पुन्हा करवाढीचे संकेत दिले आहेत. नगरसेवक व गटनेत्यांशी चर्चा करून करवाढीचा विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे करवाढीची टांगती तलवार नाशिककरांवर कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुंबाने दिला तंदुरुस्तीचा मंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांना रोजच्या धावपळीत आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. व्यायामालाही वेळ देता येत नाही. वेळ मिळाला तरीही व्यायाम करणे कंटाळवाणे होते. या सर्वांवर उपाय म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केवळ महिलांसाठी मंगळवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सहाव्या वर्धापन दिनाननिमित्त झुम्बा वर्कशॉपचे आयोजन केले होते.

वर्कशॉपमध्ये नामवंत तज्ज्ञ प्रतीक हिंगमिरे यांनी मार्गदर्शन केले. हिंगमिरे सर्टिफाइड तज्ज्ञ आहेत. या वर्कशॉपसाठी अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था (ए. पी. कॅटरर्स) हे व्हेन्यू पार्टनर होते. अनेक महिलांना वाटते, आपण बारीक असावे, सुडौल बांधा असावा. अशा महिलांसाठी या वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, ज्या महिलांना आपण अत्यंत बारीक आहोत, आपला प्रभाव पडत नाही असे वाटते, अशा महिलांसाठीदेखील या वर्कशॉपमध्ये टिप्स देण्यात आल्या. केवळ बारीक होणे आणि जाड होणे म्हणजे शरीर सुदृढ करणे असे होत नाही. व्यायामाचा कंटाळा येणार नाही, अशा पद्धतीने विविध गाण्यांच्या चालींवर कसा व्यायाम करायचा, अवयवांची हालचाल किती करायची, किती वेळ करायची, पोट कमी करण्यासाठी कोणते व्यायाम केले पाहिजेत, त्याचप्रमाणे आहार, विहार, विचार कसे असावेत हेदेखील या वर्कशॉपमधून नागरिकांना सांगण्यात आले. झुंबाच्या प्रात्यक्षिकाबरोबरच त्यांनी आहाराच्यादेखील टिप्स दिल्या.

ते म्हणाले, की रोज सकाळी उठल्याबरोबर लिंबू-पाणी पिणे आवश्यक आहे. त्यात काय गोष्टी असाव्यात हेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रोजच्या जेवणात काय असावे, दोन जेवणामधील अंतर किती असावे, रात्रीचे जेवण किती घ्यावे, कोणत्या वेळेला घ्यावे, त्यात कसला समावेश असला पाहिजे, याबद्दल त्यांनी माहिती दिली. या वेळी त्यांनी झुंबा म्हणजे काय, याविषयीही माहिती दिली. ते म्हणाले, की झुंबा म्हणजे म्युझिकल एक्सरसाइझ. पाश्चात्त्य देशात या प्रकाराला खूप महत्त्व असून, भारतातही या प्रकाराने चांगला जम धरला आहे. या प्रकाराने शरीराच्या केसापासून नखापर्यंत सर्वच अवयवांचा व्यायाम होत असल्याचे सांगितले. हिंगमिरे यांना मनीषा हिंगमिरे व मानसी महाजन यांनी साथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के, तर जिल्ह्याचा निकाल ८७.७६ टक्के लागला आहे. राज्यातील नऊ विभागांमध्ये नाशिक सहाव्या स्थानावर असून, शहरातून रचना विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षता पाटील ‌हिने ९९.८० टक्के गुण मिळविले आहेत. ऑनलाइन पध्दतीने जाहीर झालेल्या या निकालाच्या गुणपत्रिका आगामी आठ दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात येतील. याबाबतची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातून ९१ हजार १७९ विद्यार्थ्यांपैकी ७९ हजार ७१० विद्यार्थ्यांनी यश मिळविले. धुळे जिल्ह्यातून २८ हजार ७३२ पैकी २५ हजार ७९९ जणांनी यश ‌मिळविले. जळगावमधून ६१ हजार ८२५ पैकी ५४ हजार २६७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. नंदुरबारमधून २० हजार ७४२ पैकी १७ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी यश ‌मिळविले. नाशिक विभागात एकूण २ लाख २ हजार ४७८ पैकी १ लाख ७७ हजार ६९३ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

विभागात धुळे अव्वल

धुळे : ८९.७९ टक्के, जळगाव : ८७.७८ टक्के, नाशिक : ८७.४२ टक्के, नंदुरबार : ८६.३८ टक्के

नाशिक विभागाच्या निकालात यंदा दोन टक्क्यांची घट दिसून येत असली तरीही या विभागात मुली मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक आहे.

- राजेंद्र गोधने, विभागीय अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टक्क्यांना नव्हे, जिद्दीला सलाम!

$
0
0

नाशिक: समोर आलेल्या नकारत्मक परिस्थितीला कवटाळायचे की त्यास लाथ मारून चांगले शोधायचे, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. उंटवाडी रोडवरील निरीक्षण गृहातील पाच अनाथ मुलींचे आयुष्य हाच धडा देणारे. यशाचे मोजमाप कागदावरील आकडे नाही तर आपली जिद्द करणार आहे, याची जाणीव त्यांना नक्कीच आहे.

इयत्ता १० वी किंवा १२ वीचा अभ्यास म्हटले की पालकांच्या पोटात गोळा येतो. पाल्यासाठी काय करू अन काय नाही, या मानसिकतेपर्यंत पालक पोहचतात. पालकांकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेत मुले आपल्या भविष्याच्या पुस्तकावर धडा गिरवण्याचा प्रयत्न करतात. पण, घरच्यांची अशी साथच नसेल तर! क्षणभर विचार केला तरी समोर अंधार दिसतो. नुकतेच १२वीचे निकाल घोष‌ित झाले. त्यात उंटवाडी रोडवरील निरीक्षण गृहातील मुलींनी प्रयत्नाअंती चांगले यश मिळवले. कोणाला पोलिस खात्यात जायचे, तर कोणाला वकील व्हायचे. मात्र, १८ वर्षांच्या मुला-मुलींना कायद्यानुसार निरीक्षण गृह सोडावे लागतेच!

जन्म देऊन सतत जगण्याची परीक्षा घेणारी नियती कमी म्हणून की काय असे माणूसकीशून्य कायदेही या मुलांसाठी अडचणी निर्माण करतात. या मुलींच्या यशोगाथेबाबत बोलताना बालनिरीक्षण गृहाचे मानद सचिव चंदूलाल शहा यांनी सांगितले की, यंदा पूनम गरूड (६९ टक्के), पूजा जाधव (६६ टक्के), माधुरी व्यवहारे (६२. ३० टक्के), रुपाली जाधव (६१.६८ टक्के) आणि योगेश्वरी देशपांडे (५६ टक्के) या मुली उत्तीर्ण झाल्यात. यातील प्रत्येक मुलीचे एक स्वप्न आहे. मात्र, कायदेशीर बाबींमुळे या मुलींची रवानगी अनुरक्षण गृहात करण्यात आली आहे. येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था होते. मात्र, मनाप्रमाणे शिक्षणाची सोय उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाच ते सहा दानशूर व्यक्तींनी मदतीचे हात पुढे केले. पूनमला पोलिस व्हायचे आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच तिने प्रॅक्ट‌िस सुरू केली. तिच्या मदतीला एक ट्रेनरदेखील धावून आल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. योगेश्वरीला एका ब्युटी पार्लर कोर्ससाठी पाठवले असून, इतर मुलींना त्यांच्या आवडीनुसार करियर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. कोणतेही क्लास नाही. पालकांची मायेची ऊब नाही. मात्र, या मुलांची जिद्द प्रचंड असून, त्यांच्या यशासाठी टक्क्यांची स्पर्धा कधी आडवी येण्याची शक्यता देखील नाही.

यातील काही मुली ११ वर्षांपासून निरीक्षण गृहात राहतात. अनाथ या शब्दाची जाणीव अनाथ झाल्याशिवाय येत नाही. ही मुले विपरीत परिस्थिती सतत नशिब लिहीण्याचा प्रयत्न करतात. येथे शिकलेल्यांपैकी काही पोलिस झाले, तर काही अधिकारी. या मुलीही जिद्दीने आपले नशीब नक्कीच घडवतील.

- चंदूलाल शहा, मानद सचिव, निरीक्षण गृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी सेवा केंद्रांना प्रतिसाद वाढला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने नागरिकांच्या सुविधांसाठी सुरू केलेल्या नागरी सेवा केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना विविध प्रकारच्या परवानग्या व दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने या केंद्रांवरील गर्दी आता वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत पालिकेने सहा विभागांत सुरू केलेल्या २२ नागरी सुविधा केंद्रांचा लाभ ६७ हजार ५०१ नागरिकांनी घेतला आहे. यात ४८ हजार ६२८ नागरिकांनी या केंद्रांमधून मालमत्ता कराचा भरणा केला आहे. त्यापाठोपाठ ९ हजार ५३५ नागरिकांनी पाणीपट्टीचा भरणा केला आहे. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रांना चांगले दिन आले आहेत.

महापालिकेतील ४५ सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी शहरात जवळपास २२ नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली होती. यात मालमत्ता कर, पाणीपट्टी कर भरण्यासह झोन बदल, जन्म व मृत्यू दाखला, बांधकाम परवानग्या, पूर्णत्वाचा दाखला, नळजोडणी, मालमत्ता हस्तांतरण, जाहिरात परवानग्यांचा समावेश होता. येस बँकेने ही नागरी सुविधा केंद्रे चालविण्यासाठी विनामूल्य मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. या केंद्रांमध्ये येस बॅँकेमार्फत कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याकरिता बॅँकेमार्फत डेबिट व क्रेडिट कार्डाद्वारे नागरिकांना कर भरणा करण्यासाठी प्रत्येक नागरी सुविधा केंद्रास प्रत्येकी एक पीओएस मशीन उपलब्ध करून दिले आहे. राजीव गांधी भवनसह सहा विभागांत ही केंद्रे ५ एप्रिल रोजी सुरू झाली होती. पहिल्या महिन्यात या केंद्रांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता या केंद्रांना प्रतिसाद वाढला आहे. सहा महीने एस बँकेच्या वतीने ही केंद्रे चालविली जाणार आहेत.

लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या

मालमत्ताकर भरणा ः ४८,५०१, पाणीपट्टी कर भरणा ः ९,५३५, अग्निशमन विभाग ः ९१, बांधकाम परवाना ः ७७०, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ः ८४९, नळजोडणी ः ४६०, मालमत्ता कर उतारा ः ३६८, मालमत्ता हस्तांतरण ः ६०३, मृत्यू दाखला ः १३९९, सुधारित बांधकाम परवानग्या ः १२४, डॉग लायसन्स ः ७१, विवाह नोंदणी ः २८.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाच स्वीकारताना लिपिकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध कर विभागाने लावलेला जाहिरात कर कमी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पूर्व विभागातील वरिष्ठ लिपिकास अॅन्‍टी करप्शन ब्युरोने पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१३) संध्याकाळी मेनरोडवरील पूर्व विभागीय कार्यालयाच्या दक्षिण बाजूच्या दरवाजाजवळील बोळीतील झेरॉक्स दुकानासमोर करण्यात आली.

रमाकांत प्रभार क्षीरसागर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. एसीबीकडे तक्रारदाराने शहरात सुयश क्लासेस नावाचे बॅनर्स लावले होते. या पार्श्वभूमीवर विविध कर विभागातील वरिष्ठ लिपिक क्षीरसागरने तक्रारदारास जाहिरात करापोटी ११ हजार ५०० रुपये भरण्याबाबत नोटीस पाठवली. नोटीस मिळाल्यानंतर तक्रारदाराने पूर्व विभागात जाऊन प्रत्यक्ष क्षीरसागरची भेट घेतली. मात्र, कर कमी करण्यासाठी क्षीरसागरने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने पडताळणी केली असता क्षीरसागरने पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एसीबीच्या पथकाने लागलीच मेनरोडवरील पूर्व विभागीय कार्यालयाजवळच्या झेरॉक्स दुकानासमोर सापळा रचला. तेथे तक्रारदाराकडून लाचेच पाच हजार रुपये स्वीकारणाऱ्या क्षीरसागरला रंगेहाथ पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल चित्रकारांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि.१२) नंदनवन लॉन्स येथे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.१३) ‘मटा’च्या कार्यालयात ज्येष्ठ चित्रकार द. वा. मुळे यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

‘मटा’तर्फे सोमवारी तीन गटांत झालेल्या चित्रकला स्पर्धेत बच्चेकंपनीने आपल्या कल्पनेतील ‘स्मार्ट सिटी’ चितारून कल्पनाशक्तीची चुणूकच दाखवून दिली. ‘मटा’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बच्चेकंपनीला खास स्थान देण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकला वा. गो. कुलकर्णींपासून ते शिवाजीराव तुपे आदींपर्यंत प्रसिद्ध व दिग्गज चित्रकारांची परंपरा आहे. या परंपरेला सलाम करून शहरात चित्रकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि लहानग्या कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील शाळांचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी नंदनवन लॉन्स हे व्हेन्यू पार्टनर होते.

बक्षिस वितरणप्रसंगी चित्रकार मुळे म्हणाले, कला ही मानवाला मिळालेली देणगी आहे ती मानवाने जोपासली पाहिजे. कला सर्वांना साध्य होत नाही. तुम्हाला ती अवगत झाली हे तुमचे भाग्य आहे. देवाने तुम्हाला दिलेली देणगी आहे. मुलांच्या प्रगतीत पालकांचाही वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांनी यावेळी विविध मान्यवर चित्रकारांची उदाहरणे दिली. नाशिक शहराला अनेक मोठ्या चित्रकारांची परंपरा आहे.

ही परंपरा आपल्याला जोपासायची आहे. प्रत्येकाने जास्तीत जास्त चित्र रेखाटून मोठे चित्रकार व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ चित्रकार अशोक धिवरे म्हणाले की, प्रत्येक मुलाने काढलेले चित्र वेगळे होते. त्याच्यातील आपल्या शहरा बद्दलच्या कल्पना वाखाणण्यासारख्या होत्या.

प्रत्येक चित्रकाराची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यामुळे बक्षीसासाठी निवड करतानाही परिक्षकांचा कस लागला. परीक्षक म्हणून मुळे यांच्यासह अशोक धिवरे, राहुल मुळे, सुनील गवळी, विनोद जांभोरे, मिलिंद टिळे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कलाध्यापक संघाचे पदाधिकारी महादेव जगताप, चेतना बैरागी आदींनी प्रयत्न केले.

यांना मिळाले पारितोष‌िक

पहिला गट - ५ वी ते ६ वी

प्रथम : सिद्धी साहेबराव गुंजाळ, इयत्ता सहावी, मराठा हायस्कूल

द्वितीय : सुजल सुनील धोत्रे, इयत्ता पाचवी

तृतीय : हिमानी विजय माळी, इयत्ता सहावी, सेंट फ्रान्सीस हायस्कूल

उत्तेजनार्थ : पूर्वा महाजन, इयत्ता पाचवी.

उत्तेजनार्थ : आत्मजा भालचंद्र पवार, इयत्ता सहावी, होरायझन अकॅडमी

दुसरा गट - सातवी ते आठवी

प्रथम : भूषण वसंत गायकवाड, इयत्ता आठवी, गुरू गोविंदसिंग हायस्कूल

द्वितीय : कृष्णा दीपक गिरमे, इयत्ता आठवी, न्यू इरा इंग्लीश स्कूल

तृतीय क्रमांक : सृष्टी नरेंद्र नेरकर, इयत्ता आठवी, रचना विद्यालय.

उत्तेजनार्थ : रिद्धी अतुल कुकेकर, इयत्ता आठवी, उत्तेजनार्थ

उत्तेजनार्थ : अनुष्का रवीकुमार गोसावी, निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल

तिसरा गट - नववी ते दहावी

प्रथम : श्रृती संजय बागूल, इयत्ता नववी, केंद्रीय विद्यालय, आयएसपी, नाशिकरोड.

द्वितीय : आदिती अशोक फोफीलीया, इयत्ता नववी, बॉईज टाऊन पब्लिक स्कूल

तृतीय क्रमांक : प्रियंका दत्तात्रय कोठुळे, इयत्ता दहावी, श्रीराम विद्यालय.

उत्तेजनार्थ : ऋषिकेश पाटील, इयत्ता दहावी, पिंपळगाव हायस्कूल, पिंपळगाव बसवंत

उत्तेजनार्थ : अंकीता देवीदास बाविसकर, इयत्ता दहावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा गानतंत्र’मधून गाण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘वर्ल्ड म्युझिक डे’निमित्त (दि. २१ जून) ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गानतंत्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आहे वाचकांमधील गायकांसाठी. तुम्ही बाथरूम सिंगर असा किंवा गृहिणी...गाणं हे तुमच्या-आमच्या सर्वांच्याच मनात येत असते. कुणी गुणगुणते, तर कुणी कट्ट्यावरच्या मित्रांमध्ये ही हौस भागवते. ‘गानतंत्र’च्या निमित्ताने तुमच्यातील गायकाला सर्वांसमोर आणण्याची नामी संधी आहे.

आपल्याकडील सांग‌ितिक वारशाला अभिवादन हा तर या स्पर्धेमागचा हेतू आहेच; त्याशिवायही आतापर्यंत लोकांच्या कानापर्यंत न पोहोचलेल्या उत्तमोत्तम आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही उद्देश यामागे आहे. आपला आवाज उत्तम असूनही आपल्याला केवळ चांगले व्यासपीठ न मिळाल्यामुळे आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचता आले नाही, अशी खंत वाटणाऱ्या सर्वांसाठी ‘गानतंत्र’ ही स्पर्धा आहे.
आपला आवाज मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचावा आणि उत्तमोत्तम तज्ज्ञांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळावे, अशी इच्छा असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी स्वतःच्या आवाजातील एकच गाणे रेकॉर्ड करून mtgaantantra.nsk@gmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ई-मेलवर ध्वनीमुद्रण पाठवण्याची अंतिम तारीख १७ जून आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. ध्वनीमुद्रण एमपी ३ व एमपी ४ या फॉर्ममध्येच असावे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २० गायकांना १९ जून रोजी स्टुड‌िओत गाण्याची संधी मिळणार आहे. त्यातून निवडलेल्या १० स्पर्धकांना २१ जून रोजी होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे रेड‌िओ मिर्ची हे म्युझिक पार्टनर आहेत. स्पर्धेचे परीक्षण प्रथितयश गायक-गायिका करणार आहेत. विजेत्या गायकांना पारितोषिक देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाग्यश्री गितेचे ‘डोळस’ यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

येथील एमआरपीएच कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री गिते या अंध विद्यार्थिनीने ८० टक्के गुण मिळवून दहावीचा गड सर केला आहे. अंध-अपंग विद्यार्थांमध्ये तिचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आला असल्याचे शाळेने सांगितले. भाग्यश्री जन्मांध आहे. तिने जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत ब्रेल लिपी आत्मसात केली. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण आदिवासी सेवा समितीच्या एमआरपीएचकन्या विद्यालयात पूर्ण केले. तिला मुख्याध्यापिका उज्ज्वला पवार यांचे खास मार्गदर्शन लाभले. तिने रायटरच्या मदतीने पेपर सोडवले. गोड गळ्याने गाणाऱ्या भाग्यश्रीची परिस्थिती बेताची अाहे. परंतु, परिस्थितीवर जिद्दीने मात करीत तिने पुढे शिकण्याची जिद्द मनी बाळगली आहे. शिक्षणाधिकारी कनोजे यांनी तिचा सत्कार करीत अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षता पाटील @ ९९.८०%

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या परीक्षेत येथील रचना विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षता देवेंद्र पाटील हिने ९९.८० टक्के मिळवून शहरातून अव्वल क्रमांक पटकावला आहे. या यशाचे श्रेय अक्षताने आई-वडिलांकडून मिळालेल्या पाठबळाला दिले आहे. अक्षताच्या सोबतच तिची जुळी बहीण ऋतुजा शिकते. तिनेही या परीक्षेत रचना विद्यालयातून घवघवीत यश मिळवित ९३.२० टक्के मिळविले आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावर अक्षता हिची आई स्वाती पाटील आणि वडील देवेंद्र पाटील हे जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून सेवा बजावतात. पाटील कुटुंब नाशिक शहरात निवासाला असले, तरीही आई-वडिलांच्या नोकरीच्या दुर्गम ठिकाणामुळे त्यांना शिक्षक असूनही मुलींच्या शिक्षणासाठी वैयक्तिक अन् पुरेसा वेळ देणे शक्य होत नव्हते.

अक्षता आणि ऋतुजा या दोघीही दहाव्या इयत्तेत आल्यानंतर घरात पहिला घडलेला बदल म्हणजे घरातला बंद झालेला टीव्ही. मुलींच्या अभ्यासावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी दिवसभरातील कुठल्याही टीव्ही कार्यक्रमाचा अपवाद न ठेवता पाटील कुटुंबीयांनी दहावीची परीक्षा होईपर्यंत टीव्हीचे कनेक्शनच काढून ठेवले. शाळा, गरजेपुरता क्लास यातील जाणारा वेळ वगळता दिवसभरातून अक्षताने सुमारे पाच तास अभ्यासाला दिले. बाजारातील तयार नोट्सवर अवलंबून न राहता स्वत: काढलेल्या अभ्यासविषयांच्या नोट्सची सवय तिला आत्मविश्वास देऊन गेली. या मुलींच्या वडिलांनाही नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

अक्षता हिला ५०० पैकी एकूण ५९९ गुण पडले. यातील १५ गुण हे क्रीडा आणि कला विषयातील सहभागाबद्दल देण्यात येणारे अधिकचे गुण आहेत, तर या १५ गुणांशिवाय तिला पडलेल्या गुणांची एकूण बेरीज ४८४ होते.

_ _ _ _

शिस्तीच्या शिरस्त्याचा उपयोग

अभ्यासासाठी आई-वडिलांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन, लावलेली शिस्त दहावीच्या यशात उपयोगी आली. दिवसाकाठी सुमारे पाच तासांचा अभ्यास, स्वत:च्या नोट्स काढण्याची सवय फायद्याची ठरली. भविष्यात एमबीबीएसचे शिक्षण घेऊन प्रशासनात अधिकारी बनायचे स्वप्न आहे.

-अक्षता पाटील, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशमंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी नाशिककर भाविकांनी परिसरातील गणपती मंदिरात जाऊन गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. वर्षभरातून दोन अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. ठिकठिकाणी बेल, दुर्वा, नारळ यांच्यासह पेढ्यांचा नैवेद्य बाप्पांना दाखविण्यात आला.
नाशिक शहरात बाराहून अधिक गणपतीची मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये अंगारकी चतुर्थीचा योग साधत भाविकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. शहरातील ढोल्या गणपती, रविवार कारंजावरील चांदीचा गणपती, शहराबाहेरील नवश्या गणपती या ठिकाणी भाविकांनी हजेरी लावली. रविवार कारंजावरील गणपती मंदिरांत दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले. येथे संध्याकाळच्या वेळी गणपतीची आरती होत असल्याने परिसरातील अनेकजण येथे नित्यनेमाने आरतीसाठी येतात. गणपती अथर्वशीर्ष दिवसभर येथे सुरू असते. नवश्या गणपतीला तर यात्रेचेच स्वरूप आले होते. नवश्या गणपती हा पिकनिक स्पॉट झाला असल्याने चतुर्थीच्या दिवशी येथे भाविक मोठ्या उत्साहाने दर्शनला येतात, तसेच दर्शन झाल्यावर येथील निसर्गरम्य परिसरात काही काळ विश्रांती घेतात. आनंदवली येथील नवश्या गणपती हे अत्यंत जागृत स्थान असून अनेक भाविक येथे नवस बोलण्यासाठी येतात. नवस फेडण्यासाठीही येथे गर्दी असते. नवश्या गणपतीला दोरे तसेच घंटी बांधण्याचा नवस बोलला जातो. या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था असल्याने नाशिककरांसाठी संकष्टी चतुर्थी तसेच अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर यात्राच भरते.
नाशिकरोडच्या इच्छामणी गणेश मंदिरातदेखील भाविकांनी हजेरी लावली. अंगारकी चतुर्थीचा योग साधत मुक्त‌िधाम येथेदेखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

दर्शनासाठी गर्दी

नाशिकरोड : नाशिकरोडच्या गणेश मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळपासून रात्री उश‌िरापर्यंत दर्शनासाठी रीघ लागली होती. उपनगर येथील इच्छामणी गणेश मंदिरात सर्वात जास्त गर्दी होते. येथे अंगारकीला जत्रा भरते. फुल हार, नारळाबरोबरच पेढे, घरगुती वस्तू, खेळणी आदी विक्रेत्यांची दुकाने लागलेली असतात. मंदिराचे बांधकाम सुंदर असून मूर्तीही मनोहारी आहे. तसेच आवारात सभामंडप व हिरवळ असल्याने भाविकांचा ओढा या मंदिराकडे असतो. देवळालीगावातील गणेश मंदिरातही भाविकांची गर्दी होती. रोकडोबावाडीतील अण्णा नवग्रह मंदिराचा परिसर औषधी व विविध फुलांच्या रोपांनी बहरला आहे. स्वच्छता व शिस्त वाखण्याजोगी आहे. येथे गणेशाची तीन मुखांची बसलेली प्रचंड मोठी मूर्ती आहे. नवग्रह देवतांची मंदिरे दाक्षिणात्य शैलीत बांधलेली आहेत. नदीकाठचा व शांत परिसर असल्याने भाविकांची येथेही गर्दी होत आहे. चेहेडी, जेलरोडचे चंद्रेश्वरनगर, माडेल कालनी, आंबेडकरनगरसमोरील डीजीपीनगर आदी ठिकाणच्या गणेश मंदिरातही भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्तीतील मृतांच्या कुटुंबीयांना ३२ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या १२ दिवसांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ११ व्यक्ती दगावल्या असून, त्यापैकी आठ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली आहे. याशिवाय ४३ जनावरे (जित्राब) मृत्युमुखी पडली असून, त्यापैकी २२ जनावरांसाठी ५ लाख ६७ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात तीन जून ते १३ जून या कालावधीत अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. वीज अंगावर पडून १० जणांचा, तर दरड कोसळून एक जणाचा मृत्यू झाला होता. यापैकी सर्वाधिक तीन घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडल्या. मालेगाव आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी दोन, तर बागलाण, चांदवड आणि नांदगाव तालुक्यात प्रत्येकी एक घटना घडली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत ११ पैकी आठ जणांच्या कुटुंबीयांना मदत मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित तीन जणांच्या कुटुंबीयांनाही येत्या दोन- तीन दिवसांत मदत मंजूर केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. रघुनाथ कोंडाजी मवाळ (वय ४४) आणि मयूर रघुनाथ मवाळ (वय १८, दोघेही रा. चोंढी, सिन्नर) आणि विठोबा कमू उघडे (वय २५, रा. खेड देवाचीवाडी, इगतपुरी) यांना मदत मिळणे बाकी आहे.

मृत जनावरांसाठी ५.६७ लाख

गाय आणि म्हैस यांसारखी दुधाळ जनावरे नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडली तर त्यासाठीही सरकार आर्थिक मदत करते. अशी सात जनावरे मृत्युमुखी पडली असून, प्रतिजनावर ३० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यानुसार मृत जनावरांच्या मालकांना दोन लाख १० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे, तर शेळीसारखी चार लहान दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. मात्र, त्यांच्या मालकांना अद्याप मदत देण्यात आली नाही. ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये एवढी मदत केली जाते. अशा १९ जनावरांचा मृत्यू झाला असून, १३ जनावरांच्या मालकांना तीन लाख २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. ओढकाम करणाऱ्या छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी १६ हजार रुपये याप्रमाणे ३२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

आपत्तीतील मृतांची नावे

विठोबा कमू उघडे (वय २५, रा. खेड देवाचीवाडी, इगतपुरी), सोनीबाई पुंडलिक आंबेकर (४५, रा. वायघेळपाडा, त्र्यंबकेश्वर), अरुण पुंडलिक आंबेकर (२२, रा. वायघेळपाडा, त्र्यंबकेश्वर), आनंदा पुंडलिक गमे (२४, रा. मेटघर किल्ला), समाधान बहादूरसिंग सुमराव (३०, रा. टोकडे, मालेगाव), सुनंदा दिनकर गायकवाड (३२, रा. गरबड, मालेगाव), जागृती हिरामण बच्छाव (१४, रा. देवळाणे, बागलाण), कविता बापू ठाकरे (३२, रा. उर्धूळ, चांदवड), रामदास पोपट राठोड (३०, रा. कसाबखेडा, नांदगाव), रघुनाथ कोंडाजी मवाळ (४४, रा. चोंढी, सिन्नर), मयूर रघुनाथ मवाळ (१८, रा. चोंढी, सिन्नर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरासह उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव

$
0
0

टीम मटा
गेल्या दोन दिवसांपासून शहरासह उपनगरांमध्ये वीजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच अचानक व्होल्टेज वाढल्याने ठिकठिकाणी विद्युत उपकरणे जळाली आहेत. सातपूरमध्ये दीडशेवर सेटटॉप बॉक्स यामुळे निकामी झाले आहेत.
सातपूर भागात गेल्या महिन्याभरापासून महावितरणकडून ‌विद्युत पुरवठा अनियमित आहे. अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने सातपूरकर त्रस्त झाले आहेत. विजेच्या झटक्याने डेन, पीएमसीएम व हॅथवे कंपनीचे शेकडो सेटटॉप बॉक्सचे नुकसान झाले आहे. अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यावर विद्युत उपकरणांची हानी होत आहे. या विद्युत उपकरणांच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे. वेळेवर विज बिल अदा करूनदेखील अखंडित विज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने सातपूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रोजच अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने दीड हजारांहून अधिक ड‌िज‌िटल सेटटॉप बॉक्सचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक विद्युत उपकरणेही अचानक आलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे जळाली आहेत.

नादुरूस्त फिडरचा फटका
सातपूर भागात विद्युत पुरवठा करणारे फिडरच नादुरूस्त असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, महिनाभरापासून फिडरचे काम का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पंचवटीत खेळखंडोबा
पंचवटी ः सोमवारी पडलेल्या जोरदार पावसानंतर पंचवटी परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला. मंगळवारीही हीच स्थिती होती. सोमवारी पावसाच्या वेळी फारसा वारा नसतानाही विजेचा पुरवठा बंद करण्यात आला. पाऊस थांबल्यानंतरही विजपुरवठा सुरळीत झाला नाही. मंगळवारीही विजेचा पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. दिवसभर सतत विजेपुरवठा खंडित होत होता. या प्रकाराने नागरिकांचे हाल झाले.

सिडकोतही विजेची ये-जा
सिडको ः वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील आठवड्यात वीज पुरवठ्यामुळे उत्तमनगर येथे लाखो रुपयांची विद्युत उपकरणे जळून गेली होती. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले होते. सिडको व इंदिरानगर भागात असे प्रकार वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. त्यातच ब‌िलांचे वाटपही चुकीच्या पद्धतीने होत असून, उशिराने वाटप होत आहे.

डीपीत स्फोटानंतर जेलरोड अंधारात

नाशिकरोड ः जोरदार पावसामुळे जेलरोड परिसरातील वीज पुरवठा खंड‌ित झाला. त्यातच शिवाजीनगर येथील डीपीजवळ प्रचंड मोठा जाळ होऊन स्फोट झाल्यामुळे नागरिकांना किमान पाच तास अंधारात रहावे लागले. जेलरोडच्या शिवाजीनगर येथील परेश सोसायटीसमोर व‌िजेची डीपी आहे. सहाच्या सुमारास येथे प्रचंड मोठा स्फोट होऊन जाळ झाला. त्यामुळे दोन ठिकाणी तारांचे तुकडे झाले. परिसरातील वीजपुरवठा खंड‌ित झाला. रात्री साडेनऊला वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, एका मिन‌िटातच खंड‌ित झाला. कर्मचाऱ्यांनी भरपावसात दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील ४०७ शौचालयांचे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्वच्छ व सुंदर शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये नाशिक शहर आणण्यासाठी आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छतेसाठी अॅक्शन प्लॅन तयार करत सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठीही काम सुरू केले आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण केले जाणार असून, त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरात सध्या एकूण ४०७ शौचालये आहेत. त्यात सुलभ इंटरनॅशनल ८६, सार्वजनिक शौचालय १३२ आणि पे अँड यूजची १८९ शौचालये आहेत. या सर्व शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात या शौचालयांची स्थिती तपासली जाणार असून, अस्वच्छता आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. पे अँड यूज शौचालयांमध्ये पैसे घेऊनही सुविधा दिल्या जात नाहीत. त्यात प्रचंड दुर्गंधी असते. त्यामुळे सर्वेक्षणात आढळलेल्या त्रुटींवर कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत बचत गटांचे खाद्यपदार्थ

$
0
0

सुरेश प्रभूंच्या निर्णयामुळे महिलांना होणार फायदा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांमुळे महिला बचत गटांना रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्गातील दोन व देशातील दहा बचत गटांतर्फे रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचे काम सुरू झाले आहे. सुरेश प्रभू यांच्या दूरदृष्टी व गतिमान निर्णय क्षमतेमुळे रेल्वेने महिला आर्थिक सबलीकरणासाठी टाकलेल्या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत होत आहे.
रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा, स्वच्छता व किमती याबाबत अनेकदा वाद झडत असतात. पंधरा रुपये किमत असलेली पाण्याची बाटली सर्रास वीस रुपयांना विकली जाते. जेवणाचे पदार्थ बऱ्याचदा कच्चेच असतात. या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांना चांगली मागणी मिळू शकते. सामान्य प्रवाशांनाही हे पदार्थ परवडू शकतात. या पार्श्वभूमीवर बचत गटनिर्मित खाद्यपदार्थांची विक्री रेल्वेमध्ये जोमाने सुरू करण्यासाठी गेल्या ११ मे रोजी हिरवळ प्रतिष्ठानने रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली व त्यांना संकल्पना समजावून सांगितली. तसेच उपयुक्त सूचनाही केल्या. प्रभू यांनी त्याच दिवशी सूचनांसंदर्भात चर्चा करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. ८ जूनला इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) चेअरमनच्या अध्यक्षतेखाली देशातील महिला बचतगट प्रतिनिधी व हस्तकला संस्थेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन चर्चा झाली. ९ जूनला स्वतः सुरेश प्रभू यांनी या विषयासंदर्भात चर्चा करुन बचतगटांना खाद्यपदार्थ विक्रीची संधी देण्याचे निर्देश दिले.

भारतात महिला बचतगटांची संख्या वाढतच आहे. त्यातून महिलांना रोजगार मिळून आर्थिक उन्नती होत आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये वस्तूंची विक्री करण्याची सुरेश प्रभू यांची योजना ही खऱ्या अर्थाने महिला गृहउद्योगास चालना देणारी आहे. सुरेश प्रभूंचे रेल्वे मंत्रालयातील निर्णय रेल्वेक्रांती घडवत असून राष्ट्र उभारणीचे काम करीत आहेत, अशी प्रतिक्रिया महिला बचत गटांनी व्यक्त केली आहे. इच्छुक बचतगटांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) संकेत स्थळाला भेट द्यावी किंवा प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्याचा ८९.७९ टक्के निकाल

$
0
0

धुळे : जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी २८ हजार ७३२ विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी २५ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, धुळे जिल्ह्याचा एकूण ८९.७९ टक्के निकाल लागला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात परीक्षेसाठी २० हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १७ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन नंदुरबार जिल्ह्याचा एकूण ८६.३८ टक्के निकाल लागला आहे. मात्र गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा धुळे व नंदुरबारमधील दहावीच्या निकाल चार ते पाच टक्क्यांनी घसरला आहे. तरीही गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीवापरावर शहरात अधिभार लावावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांनी धरणांमधील आपल्या हक्काचे पाणी महानगरांना दिले. मात्र, मोबदल्यात त्यांना काही मिळाले नाही. बस प्रवाशांवर प्रत्येक तिकिटामागे पाच ते दहा पैसे अधिभार लावतात. तसाच अधिभार धरणांतील प्रतिलिटर पाण्यामागे लावावा. हा अधिभार शेतकरी रिलीफ फंड नावाने जमा करून त्या त्या भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी वापरावा, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ल. रा. गव्हाणे यांनी केली आहे. गेली अनेक वर्षे ते यासाठी पाठपुरावा करीत आहेत.

धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी परिचित आहे. तालुक्यातील शेकडो एकर जमिनी अनेक प्रकल्पांसाठी सरकारने संपादित केल्या. मात्र, येथील शेतकऱ्यांच्या भावी आयुष्याचा, त्यांच्या पिढ्यांचा किंचितही विचार झाला नाही. येथील धरणांमधून नाशिकसह मुंबई, अहमदनगर आणि मराठवाड्याला पाणी पुरविले जाते. भूमिपुत्र मात्र पाण्यासाठी वणवण करतात. ही परिस्थ‌िती केवळ इगतपुरी तालुक्यातील नाही. जेथे जेथे अन्य विभागांना पाण्याचे वाटप केले जाते, तेथील लोक उपेक्षित राहिले आहेत. म्हणूनच शेतकरी रिलीफ फंडाची मागणी त्यांनी केली आहे.

गेली नऊ वर्षे यासह आणखी एका मागणीसाठी गव्हाणे पाठपुरावा करीत आहेत. राज्यातील जमिनीची मोजणी होऊन शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला. त्यानुसार जिल्हा, तालुका भूमापन कार्यालयातील नकाशे बनविण्यात आले. गेल्या १०० वर्षांत वाटणीपत्रे, खरेदी-विक्री, तुकडेबंदी असे बरेचसे फेरफार झाले आहेत. शेतांच्या हद्दी निश्च‌ित नसल्यामुळे गैरसमजातून शेतकऱ्यांची आपापसांत भांडणे, मारामाऱ्या होतात. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना भूमिअभ‌िलेख कार्यालयाकडून मोजणी करवून घेण्यासाठी नाहक वेळ, पैसा आणि शारीरिक कष्ट सहन करावे लागतात. या सर्व खटाटोपात भ्रष्टाचारही बोकाळत असून, ग्राहक संरक्षण परिषदेकडे तक्रारींचा ओघही वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक तीस वर्षांनी राज्यातील जम‌िनीची जमाबंदी होणे गरजेचे आहे, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. सरकार स्तरावरील उदासीनतेमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. मात्र, ही मोजणी झाली तर कोर्टात दाखल होणाऱ्या खटल्यांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

दखल घेतली जात नसल्याची खंत

सरकारी यंत्रणा दाद देत नसली तरी गव्हाणे यांनी पाठपुरावा करणे सोडलेले नाही. त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूलमंत्री पतंगराव कदम, कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही या मागण्यांबाबत पत्रव्यवहार केला आहे. काही यंत्रणांनी त्यास प्रतिसाद दिला, तर काहींनी पत्राला उत्तर देणेही टाळले, अशी कैफियत गव्हाणे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images