Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सायरा बनल्या ‘त्यांचा’ आधार

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

मनमाडच्या अन्न धान्य महामंडळात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरीस असलेल्या सायरा कय्युम शेख या सर्वसामान्य महिलेने निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून चांदवड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एक लाख रुपये खर्च करून गरीब मुलीचे लग्न लावून दिले. एका सामान्य महिलेने स्वयंप्रेरणेने उत्स्फूर्तपणे दाखवलेले औदार्य मनमाड शहर परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. मदतीची आवश्यकता आहे त्यांना सहानुभूतीचे शब्द नको तर प्रत्यक्ष कृतीतूनच मदत करायला हवी, असा संदेश सायरा शेख यांनी दिला आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील सायरा शेख यांच्या पतीचे निधन झाले असून, त्यांना एक विवाहित कन्या आहे. पतीचे निधन झाल्यामुळे शेख या त्यांच्या जागेवर अन्न धान्य मंडळात नोकरीला हेत्या. अनेक कष्टाची कामे करत कोणत्याही कामाची लाज न बाळगता त्यांनी नोकरी केली. काही दिवसांपूर्वीच त्या निवृत्त झाल्या. त्यांनी मंडळाकडून मिळालेल्या निवृत्तीच्या रक्कमेतून इतरांना मदतीचा हात देत सामाजिक भान जपले.

चांदवड येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी कळताच त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत केली. तसेच आपल्या घराजवळ राहणाऱ्या गरीब गवंड्याच्या मुलीचे लग्न लावून दिले. लग्नाचा सर्व खर्च सायरा यांनी केल्यामुळे त्यामुलीसह तिच्या गरीब पित्याच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली. स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगण्याचा मंत्र देणाऱ्या सायरा शेख यांचे कार्य समाजासाठी नक्कीच आदर्शवत आहे. मनमाड बचाव समितीने शेख यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा नुकताच नागरी सत्कार केला. या सत्कार सोहळ्याला विविध मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपजिल्हा रुग्णालयाची भिंत खचलेलीच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाची संरक्षण भिंत कोसळून दोन वर्ष उलटले मात्र अजूनही या भिंतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेवारस जनावरे, भटक‌ी कुत्री सर्रासपणे ‌रुग्णालयाच्या आवारात भटकत असतात. ही भिंत तत्काळ उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निफाड उपजिल्हा रुग्णालय हे शहराच्या बाहेर नांदुर्डी रस्त्यावर आहे. रुग्णालयाच्या पश्चिम बाजूला शवविच्छेदन कक्ष आहे. या शवविच्छेदन कक्षाजवळील संरक्षण भिंत दोन वर्षांपासून पडलेली आहे. ही भिंत पडल्यामुळे शवविच्छेदन कक्षाची सुरक्षा धोक्यात आली आहे. येथे जर रात्री मृतदेह ठेवले तर त्यांची सुरक्षा कशी राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या परिसरात स्मशानभूमी आहे. जवळूनच विणता नदी वाहते. शिवाय कुत्री आणि डुकरांचाही मुक्त संचार असतो. त्यामुळे मृतदेहाची विटंबना किंवा मृतदेह बाहेर घेऊन जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. भिंत पडून दोन वर्ष उलटली तरीआरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे.

या भिंतीबाबतचा अहवाल आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविला आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने या काम रखडले आहे.

- डॉ. एस. आर. राठोड,
वैद्यकीय अधीक्षक, निफाड रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट नाशिकला बॅनरबाजीचे ग्रहण

$
0
0

वैभव देशमुख, मटा सिटिझन रिपोर्टर

भारतातील स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी योजनेत तिसऱ्या यादीत नाशिकने स्थान मिळविले हे खरे; परंतु, त्यासाठी नाशिक शहर या योजनेच्या निकषांमधेे तंतोतंत किंवा त्यांच्या जवळपास तरी पोहोचेल का हा प्रश्न सद्यःस्थितीवरून पडतो. असा प्रश्न उपस्थित होण्यास सकारात्मक, तसेच भरपूर नकारार्थी कारणेही असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. यात महत्त्वपूर्ण म्हणजे शहरात दाखल होताच विविध चौक, बस स्टॉप, इमारती, गार्डन, शाळा, तसेच कॉलेजची प्रांगणे व इतर बऱ्याच ठिकाणी झळकणारे अवैध बॅनर, होर्डिंग्ज यामुळे सर्वत्र शहर विद्रूप करण्याचा ठेकाच कुणीतरी घेतल्याचे जाणवते. शहराचा विकास करण्याच्या नावाने भीक मागून निवडून आलेले शहरातील विविध राजकीय पक्षांतील काही लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्या समर्थकांकडून वाढदिवस, जनतेच्या पैशातून जनतेसाठी केलेल्या कामांच्या उद्घाटनाच्या नावाखाली चमकोगिरी करताना हे राजकीय नेते आपले मूळ उद्दिष्ट विसरून आपली पाठ थोपटण्यात धन्यता मानत आहेत, ही शोकांतिकाच ठरावी. लोकोपयोगी निधी नेमका प्रभाग, शहरविकासासाठी, की चमकोगिरी करणाऱ्या गुंडांना पोसण्यासाठी आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. ही बाब कमी की काय, म्हणून शहरभर वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीप्रसंगी, तसेच सांस्कृतिक उत्सवाच्या नावाखाली जबरदरस्ती पावत्या फाडून त्या पैशातही होर्डिंगबाजी केली जात आहे. त्यामुळे स्मार्ट नाशिकला जणू बॅनरबाजीचेच ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला दरातील तेजी कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यानंतर बुधवारी रात्री काही भागात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने गुरुवारी बाजारात चांगली आवक होईल अशी शक्यता होती. मात्र, पाऊस ठराविक भागातच झाल्यामुळे आवक रोजच्या प्रमाणेच राहिली. त्यातच मुंबई आणि गुजरात या परपेठेत मागणी असल्याने गुरुवारी दुपारच्या लिलावात फळभाज्यांची तेजी कायम होती.

पहाटे, सकाळी आणि दुपारीही शहर परिसरातील भाजीबाजारातील विक्रेते भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजार समितीच्या आवारात येत असतात. येथे कमी दरात खरेदी केला माल किरकोळ बाजारात जास्त दरात विकला जात असल्याने ग्राहकाला तो जास्त दरात खरेदी करावा लागतो.

लिलावातील गुरुवारचे दर

--

भाजीपाला- आवक (क्विंटलमध्ये) – दर (रुपये प्रतिकिलो)

टोमॅटो - २९५ – ३० ते ७०

वांगी – ११६ – ३० ते ४५

फ्लॉवर – २१७ – ३६ ते ६४

कोबी – ४३७ – ८३ ते १२५

ढोबळी मिरची – ९९ – ३३ ते ४५

दुधी भोपळा – ७ ते १०

कारले – ११६ – ३० ते ४१

दोडका – ९ – २५ ते ४५

गिलके – ७ – २७ ते ३०

भेंडी – १० – २८ ते ३३

काकडी – १९६- १७ ते ३०

---

पालेभाज्या – आवक जुडी - प्रतिजुडी दर

कोथिंबीर – ५० हजार – २० ते ६०

मेथी – १ हजार – १५ ते २७

शेपू – २७ – १७ ते ३५

कांदापात – १२ ते ३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विभागाने चढविला भ्रष्टाचाराचा कोट

$
0
0

नाशिक:

आदिवासी आश्रमशाळेतील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षी खरेदी केलेल्या रेनकोटच्या दरांमध्ये प्रतिनग तीनशे रुपयांची तफावत असल्याचे स्पष्ट होत आहे. नाशिकच्या कळवण या दुर्गम तालुक्यात एक रेनकोटचा १७९ रुपयांमध्ये पुरवठा झाला असताना नाशिक प्रकल्पात चक्क ४९७ रुपयांना पुरवठा करण्यात आला आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने आदिवासी विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे कमी किमतीत चांगला पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला मात्र मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

पारदर्शक कारभाराचा ढोल वाजविणाऱ्या भाजपच्या सत्ताकाळात आदिवासींच्या विकासाला चालना मिळून भ्रष्टाचार थांबेल असे अपेक्षित होते. मात्र, आघाडीच्या काळातील भ्रष्टाचाराची मालिका सुखेनैव पुढे सुरूच आहे. गेल्या वर्षी आदिवासी विकास विभागाअंतर्गत ५४१ आश्रमशाळांमधील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना रेनकोटचा पुरवठा करण्यात आला. त्यासाठी प्रकल्पनिहाय निविदा मागविण्यात आल्या. राज्यस्तरीय स्पर्धा असली तरी ठेकेदारांचे रॅकेट असलेल्या या विभागात मुंबईतील एका ठेकेदाराने चक्क अव्वाच्या सव्वा दरात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचा पुरवठा केला. नाशिक, डहाणू, जव्हार, तळोदा, यावल या प्रकल्पांना पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोटच्या किमती अवाजवी आहेत. या प्रकल्पांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोटची किंमत ४८० ते ४९९ रुपयांपर्यंत आहे. मे. हुसैन ट्रेडर्स, मे. सुपर प्लास्टिक कॉर्पोरेशन, मेसर्स लकी प्लास्टिक मुंबई या कंपन्यांकडून हा पुरवठा करण्यात आला असून, त्यांची किंमत तीन कोटी ७२ लाख रुपये आहे.

एकीकडे या कंपन्यांनी ४८० ते ४९९ रुपयांमध्ये रेनकोटचा प्रतिनग दर दिला असताना दुर्गम भागातील कळवण प्रकल्पात नाशिकच्या के. के. कलेक्शन या कंपनीने मात्र पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १७९ रुपयांपर्यंतच्या दराने पुरवठा केला आहे. या ठिकाणीही निविदा मागवूनच काम झाले असून, त्यांचा पुरवठाही करण्यात आला आहे. कळवणमध्ये १९ हजार विद्यार्थ्यांना ३५ लाखात रेनकोटचा पुरवठा झाला असताना नाशिक प्रकल्पात १७ हजार विद्यार्थ्यांना ८५ लाख रुपयांमध्ये रेनकोट पुरवठा करण्यात आला आहे. राज्यभरातील २९ प्रकल्प कार्यालयांमधील पुरवठ्यात अशीच तफावत असून, यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे कमी दरात पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला अधिकारी व काही ठेकेदारांनीच त्रास दिला असून, पुरवठ्यासाठी त्याला चक्क कोर्टात जाऊन पुरवठा ऑर्डर घ्यावी लागली आहे. त्यामुळे ही खरेदी आता वादात सापडली आहे.

किमतीत तीनशेचा फरक

वेगवेगळ्या प्रकल्प कार्यालयांत रेनकोटच्या दरांमधील तीनशे रुपयांचा फरक संशयास्पद आहे. कळवणच्या आयएएस प्रकल्पाधिकारी डी. गंगाधरण यांनी पारदर्शीपणे खरेदीची प्रक्रिया राबवून प्रकल्पाला ५० लाखांचा फायदा करून दिला. मात्र, इतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी मात्र त्याच रेनकोटची खरेदी अव्वाच्या सव्वा दराने केली. त्यामुळे या रेनकोट खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात असून, त्याची सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डंपिंग ग्राउंड’पासून होईना पेलिकनची मुक्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पुण्याच्या एका कंपनीकडून सिडको भागात अबालवृद्धांच्या विरंगुळासाठी उभारलेले पेलिकन पार्क काही वर्षांपासून सर्वच सिडकोवासीयांची डोकेदुखी ठरत आहे. या पेलिकन पार्कमधील विविध खेळणी तर कधीच गायब झाल्या असून, या पार्कला डंपिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. यासंदर्भात ‘मटा’ने वर्षभरापूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर काही सूत्रे हलली. मात्र, वर्षभरानंतरही या बहुचर्चित पार्कला आलेले डंपिंग ग्राउंडचे स्वरूप काही बदललेेले नाही.

सिडकोचे नेतृत्व सध्या सत्ताधारी भाजपच्या आमदार करीत असून, पेलिकन पार्कचा प्रश्न मार्गी लागल्याची घोषणा मागील महिन्यात सत्ताधारी आमदारांसह नगरसेवकांनी केली होती. मात्र, अजूनही पेलिकन पार्कच्या आवारात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याबाबत कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. सध्या पावसाळा सुरू असून, या ठिकाणी असलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे दिसत आहे.

सिडकोने नाशिक शहरात योजना उभारणीस सुरुवात केल्यानंतर मोरवाडीलगत सुमारे १७ एकरचा भूखंड पार्कसाठी राखीव ठेवला होता. हा भूखंड महापालिकेकडे विकसित करण्यासाठी हस्तांतर करण्यात आला. त्यानंतर महापालिकेने पुण्याच्या पुणे अॅम्युझमेंट पार्ककडून ही जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला. संबंधित कंपनीने या ठिकाणी पार्क उभारलासुद्धा. मात्र, हा पार्क काही काळच सुरू राहिला. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने एका वित्त संस्थेकडून कर्ज घेऊन ही जागाच गहाण ठेवली. मात्र, तरीही हा पार्क फार काळ सुरू राहिला नाही. अखेरीस हा पार्क बंद झाला. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने महापालिकेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यास सुरुवात केली. यामुळे वित्त संस्था, महापालिका व संबंधित ठेकेदार यांचा वाद थेट कोर्टात गेला. अनेक वर्षांपासून हा विषय न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाने या जागेसाठी जैसे थे असा आदेश दिला होता. त्यामुळे या जागेची देखभाल महापालिकेने करणे आवश्यक होते. मात्र, महापालिकेने या जागेकडे लक्ष न दिल्याने या ठिकाणी बसविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खेळणी एक-एक करून चोरीस जाऊ लागल्या. पार्कच्या संरक्षणासाठी लावलेले तारांचे कंपाउंडसुद्धा गायब झाले आणि या जागेवर कचराकुंडी तयार होण्यास सुरुवात झाली. महापालिकेची घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांनी याच खुल्या जागेत कचरा टाकण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला बकाल स्वरूप आलेले आहे.

आता तर ठिकठिकाणचे बांधकामाचे साहित्य, पाडलेल्या वास्तूंचे साहित्य सर्रासपणे येथे आणून टाकले जात आहे. त्यामुळे पेलिकन पार्कची पुढची जागा डंपिंग ग्राउंड होत आहे, तर पेलिकन पार्कचा कचरा डेपो होत आहे. महापालिका निवडणुकीनंतर स्थानिक नगरसेवक व आमदारांनी थेट मंत्रालयात बैठक घेऊन पेलिकन पार्कच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे दाखवून दिले होते. मात्र, प्रत्यक्षात आजही परिस्थिती जैसे थे असून, दिवसेंदिवस येथील कचऱ्याचे ढिगारे वाढत असल्याचे दिसत आहे. पेलिकनच्या जागेचा कायापालट होणे आता गरजेचे झाले आहे. या जागेतील अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी अनेक अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


किमान स्वच्छता तरी व्हावी

सिडकोतून नितीन भोसले हे मनसेचे आमदार असताना महापालिकेत मनसेचीच सत्ता होती व या प्रभागाचे नेतृत्वसुद्धा मनसेचे नगरसेवक करीत होते. मात्र, तरीही हा प्रश्न मार्गी लागला नाही. आताही भाजपचे आमदार आहेत व नगरसेवकही भाजपचेच आहेत. आताही पेलिकनचा विकास होणार असे दर्शविले जात असताना किमान येथील स्वच्छता तरी सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनर्सचा पीएफ कार्यालयावर मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सेवानिवृत्तांना अनेक अडीअडचणींना समोरे जावे लागत असल्याने गुरुवारी पेन्शनधारकांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर धडक मोर्चा काढत हल्लाबोल केला. पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येने पेन्शनधारक मोर्चात सहभागी झाले असल्याने पोलिसांनाही मोर्चावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. क्षेत्र‌िय व्यवस्थापक एम. एस. अशरफ यांना निवेदन देत सरसकट साडेसहाहजार रुपये पेन्शन देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी केली. हजारोंच्या संख्येने आलेल्या पेन्शनधारकांमुळे पीएफ कार्यालय गजबजून गेले होते. यावेळी पेन्शनधारक, पोलिस, पीएफ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वादविवादही झडले.

भारतात पेन्शनधारकांच्या यादीत नाशिक विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. नाशिक विभागात एक लाख ३२ हजार पेन्शनधारक आहेत. त्यातच हयातीचा दाखला वेळेवर न दिल्यास पेन्शन बंद होण्याची टांगती तलवार असते. पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशनने पीएफ कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी ११ वाजताच आयटीआय सिग्नलच्या बाजूला असलेल्या उद्योग भवनासमोर नाशिक विभागातून आलेल्या पेन्शनधारकांनी पीएफ कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी क्षेत्र‌िय प्रबंधक अशरफ यांना दिलेल्या निवेदनात सरसरट साडेसहा हजार रुपये पेन्शन द्यावी, यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचे जिल्हा सचिव सुधाकर गुजराथी यांनी सांगितले.


या आहेत मागण्या

- सरसकट साडेसहा हजार पेन्शन द्यावे

- पेन्शनवर महागाई भत्ता मिळावा

- पेन्शनधारकांच्या फंडात सरकारने ८.३३ टक्के रक्कम भरावी

- पेन्शनर्सना दोन वर्ष वेटेजसचा लाभ मिळावा

- हायर सॅलरी- हायर पेन्शनची सुविधा द्यावी

- कमी पेन्शन असलेल्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा


वाहतूक खोळंबली

पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पेन्शनधारक मोर्चात सहभागी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. काही काळ रस्ता बंद झाल्याने वाहनचालकांना हाल सहन करावा लागले. यानंतर सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश सोनावणे, राजेश आखाडे यांसह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन करत पेन्शन धारकांना बाजूला केला. यानंतर एकाबाजूने वाहने सोडण्यात आली.


बँकांचा असहकार

ज्येष्ठांना बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप यावेळी ज्येष्ठांनी केला. अनेकदा पेन्शनधारकांना हवी असलेली माहिती दिली जात नसल्याचेही सांगितले. चेकबुक घेतल्यास पेन्शनधारकांच्या खात्यावर किमान पाच हजार रुपये जमा ठेवणे सक्तीचे करण्यात आल्याने अडचण होत असल्याचीही समस्या पेन्शनधारकांनी मांडली. त्यातच नव्याने आधार कार्ड लिंकिंग करताना बँकांकडून सहकार्यच केले जात नसल्याची कैफियतही ज्येष्ठांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रमंतीसाठी गेलेले विद्यार्थी घरी परतले

$
0
0

दिंडोरी : दिंडोरीच्या एका शाळेतील नववीच्या वर्गातील चार विद्यार्थी शाळा व क्लासला जातो असे सांगून गुरुवारी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली होती. मात्र, ही मुले स्वत:हून सुखरूप रात्री उशिरा घरी परतल्याने पालकांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला. ते चौघे शाळेला दांडी मारून सापुतारा फिरण्यासाठी गेले होते.

दीपक कडाळे, कुलदीप देशमुख, जीवन बल्हाळ, अमोल चौधरी अशी बेपत्ता झालेल्या चौघा विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांच्यापैकी अमोल आणि कुलदीप हे दोघेजण दिंडोरी येथील खासगी क्लासमध्ये गेले होते. क्लास संपल्यानंतर शाळेत न जाता दिंडोरी बसस्टँडवर आले. त्यांना तेथे दीपक आणि जीवन हे दोघे भेटले. वणी येथे फिरायला जायचे आणि शाळा सुटेपर्यंत घरी परतायचे असे त्यांचे ठरले होते. बसने वणी येथे आल्यानंतर त्यांनी सापुतारा येथे जाण्याचे ठरविले. सापुतारामध्ये फिरल्यानंतर त्यांनी दीपक कडाळेचा नातेवाईक काम करीत असलेल्या ढाब्यावर जायचे ठरविले. पण त्यांना तो ढाबा सापडला नाही. त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. सापुतारा येथील बसस्टँडवरून गुजरात डेपोच्या नाशिक बसने ते रात्री १२ वाजेच्या सुमारास दिंडोरी येथे पोचले.

पाऊस सुरू असल्याने ते दिंडोरी बस स्टँडवर थांबले. घरी गेल्यावर पालक मारतील या भीतीने ते घरी जाण्यास तयार नव्हते. पण तळेगाव येथील अमोल चौधरी खासगी गाडीने रात्री साडेबारा वाजता घरी पोचला. पालक त्याची वाट पाहत होते. अमोलचे वडील सुदाम चौधरी यांनी अमोल घरी आल्याचे पोलिसांना फोन करून कळविले. अन्य तिघांचा पोलिसांनी शोध घेतला. अमोलने ते तिघे दिंडोरी बसस्टँडवर असल्याचे सांगितले. पोलिसांच्या मदतीने अखेर सकाळी सहा वाजता सर्व विद्यार्थी आपआपल्या घरी पोहचले. यासाठी दिंडोरीचे निरीक्षक मधुकर गावित, उपनिरीक्षक पी. यू. पाटील, सहायक डी. एन. आव्हाड, एन. आर. वाघ, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृउबा सभापतींची २० जुलै रोजी निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणल्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी येत्या २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात येणार आहे. या सभेत सभापती आणि उपसभापती यांची निवड करण्यात येईल. पत्रात निवडणुकीचा कार्यक्रमही देण्यात आला आहे.

बाजार समितीच्या १३ संचालकांनी सभापती पिंगळे यांच्या विरोधात अविश्वासाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यामुळे या ठरावाला मंजुरी मिळविण्यासाठी बाजार समितीच्या संचालकांची सभा चार जुलै रोजी बोलवली होती. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पिंगळे यांच्या विरोधात १५ संचालकांनी मत दिल्याने त्यांच्यावर विश्वासाचा ठराव बहुमताने मंजूर झाला.

या रिक्त पदासाठी सभा बोलावण्यात येणार असल्याचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी संचालकांना पाठविले आहेत. अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे शिवाजीराव चुंभळे हे सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांपैकी १५ जिंकून पिंगळे यांच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळविले होते. चुंभळे यांच्या पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. अविश्वास ठरावात पिंगळे पॅनलच्याच संचालकांनी चुंभळे यांना पाठबळ दिले. त्यामुळे चुंभळे यांचे आता बळ वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाल्याची आवक घटली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक शुक्रवारी दुपारी लिलावाच्या वेळी घटली. मात्र, मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची मागणी कमी झाली. परिणामी गुरुवारच्या (दि. १३) तुलनेत भाजीपाल्याच्या भावात घसरण झाली.

पहाटेच्या किरकोळ विक्रीच्या बाजारासाठी गुरुवारी काढण्यात आलेला शेतमाल आला असल्याने त्यावेळची आवक बऱ्या प्रमाणात होते. दुपारी लिलावासाठी शेतातून सकाळी भाजीपाला काढून आणण्यात येतो. मात्र, रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाल्याची काढणी करणेच शक्य झाले नाही. परिणामी भाजीपाल्याची आवक प्रचंड घटली. आवक कमी असली तरी ज्या भागात भाजीपाला पाठवायचा त्या भागातही जोरदार पाऊस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी जास्त प्रमाणात भाजीपाल्याची खरेदी केली नसल्याने गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी दरात घसरणच झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेला हॅट्स ऑफ’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘प्रतीक्षा, मी परिस्थितीने गांजलेली आहे, शारीरिक व्याधींनीही त्रस्त आहे. या सर्वांतून डोके वर काढून पाहताना मला मोकळा श्वास घेण्याची फार उर्मी दाटते. ‘मटा’ नेहमी वाचते; त्यात हेल्पलाइनविषयी वाचले. तुम्हाला मदत करून मोकळा श्वास घेता येईल असे वाटले, तुम्हा सर्वांच्या गरिबीची गाथा वाचली. फारच वाईट पण तुमची शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र हॅटस ऑफच’ या भावना आहेत निवृत्त शिक्षिका लीला भोसले यांच्या.

‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहेच त्यातच एका ‌आजींचे आलेले हे सुंदर शब्दचित्र. शारीरिक व्याधींनी अत्यंत त्रस्त झालेल्या या आजींना असलेल्या वाचनाच्या आवडीतून त्यांनी ‘मटा’ वाचायला घेतला आणि त्यांना हेल्पलाइनची माहिती मिळाली. त्यातून त्यांना प्रतीक्षा गायकवाडची कथा अधिक भावली. कारण त्यांनाही तिच्याएवढीच नात आहे; नातीच्या सोबतीने त्यांचा काळ अत्यंत मजेत जातो. असे असताना आपल्या नातीच्या वयाचीच एक मुलगी शिक्षणासाठी असा संघर्ष करतेय हे त्यांच्या ठळकपणे लक्षात आले. त्यांनी तिच्यासाठी आर्थिक मदत तर दिलीच; परंतु या शब्द ओल्या भावनाही पाठवल्या आहेत. त्या म्हणतात, ‘मटा हेल्पलाइन म्हणजे पवित्र गोदामातेचा प्रवाह आहे. या प्रवाहात आपलाही एक थेंब असावा, या भावनेतून प्रत्येकाने मदत केली आहे. माझी पेन्शन आजारातच खर्च होत असून अनेक आजारांना व उपचारांना सामोरे जाताना मी त्रासलेय; परंतु मदतीच्या या हाकेला ओ देऊन मी स्वत:चेच समाधान करीत आहे. मला त्यामुळे पराकोटीचा आनंद होतोय.’

आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या परंतु सरस्वतीचा वरदहस्त डोक्यावर असलेल्या गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव या दहाजणांपर्यंत हे दान पोहोचविण्यासाठी ‘मटा’ कटिबध्द आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी दान जमावे, यासाठी हे आवाहन करण्यात येत आहे. त्यांची पुढील वाट सुकर व्हावी, म्हणून नाशिककरांनी सढळ हाताने मदत करावी.

दानशूरांना हाक

‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमांतर्गत दानशूर नाशिककरांना हाक देण्यात आली. अत्यंत दानवंत हात लाभल्याने या दानपात्राला चांगले वजनही येत आहे. धनादेश स्वीकारत या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाचा मार्ग ‘मटा’ने बऱ्याच अंशी सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी ‘मटा’ला शहरातील अनेक प्रसिध्द ठिकाणहून हेल्पबॉक्स ठेवण्याची विनंती करण्यात आली. परंतु, ‘मटा’ने काही ठिकाणे निवडत तेथे बॉक्स ठेवले व आर्थिक मदत गोळा केली.

शिवगिरी हास्यक्लबच्या शुभेच्छा

शिवगिरी हास्य क्लबच्या वतीने या विद्यार्थ्यांना करण्यात आलेली मदत वाखाणण्यासारखी आहे. विशेष म्हणजे त्यांनी ज्या पाकिटात मदत दिली आहे, ते उल्लेखनीय आहे. पांढऱ्या कोऱ्या पाकिटावर सुंदर फुले चितारण्यात आली आहे. त्याला डिझाइन करण्यात आलेले असून सुंदर टिकल्या चिकटवण्यात आल्या आहे. हाताने तयार केलेल्या पाकिटात थरथरत्या हाताने तयार केलेले चेक पाहताना या दहा विद्यार्थ्यांना मिळालेला आशीर्वाद लक्षात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सव इकोफ्रेंडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत येत नसल्याने नसल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा (पीओपी) शाडू मातीच्या मूर्तींना गणेशोत्सवात अधिक मागणी राहू शकते. ‘पीओपी’ही स्वस्त होणार असले तरी सूज्ञ नाशिककर शाडू मातीला प्राधान्य देत असल्याने यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सवाचे वातावरण राहणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गणेशाची स्थापना होणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली असून शाडूमातीच्या गणेशाची अधिक चलती आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी शाडू माती ही ‘जीएसटी’च्या कक्षेत नाही. तर मातीशिवाय अनेक मूर्तिकार ‘पीओपी’पासूनदेखील मूर्ती तयार करतात. या ‘पीओपी’च्या मूर्ती तयार करण्यासाठी टेराकोटा व शरीराच्या प्लास्टरसाठी लागणाऱ्या सामानाचा उपयोग सर्वाधिक होतो. ‘जीएसटी’पूर्वी टेराकोटासह प्लास्टरसाठीच्या सामानावर साडेचौदा टक्के व्हॅट होता. आता टेराकोटापासून तयार करण्यात आलेल्या अन्य वस्तू ‘शोभेच्या वस्तू’ अर्थात लक्झरी श्रेणीत येत असल्याने त्यावर २८ टक्के जीएसटी आहे. मात्र, मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे हे टेराकोटा व ‘पीओपी’चे कच्चे सामान पाच टक्के जीएसटीच्या श्रेणीत आहे.

यानुसार गणेशमूर्ती तयार करण्यासाठीचे ‘पीओपी’चे सामान आता तब्बल साडेनऊ टक्क्याने स्वस्त झाले आहे. तरीही १ जुलैपासून कलरचे भाव मात्र वाढल्याने मूर्ती मागच्या वर्षीपेक्षा महाग होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षांच्या अनुभवानुसार शाडू मातीच्या मूर्तींनाच अधिक मागणी असते. मात्र, शाडूच्या मातीचीही कमतरता भासत असल्यामुळे कारागिरांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

शाडू माती साठविण्याकडे कल

इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नेहमीच केले जात असल्याने आणि शाडूच्या मातीपासून तयार झालेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सल्ला पर्यावरणवादी देतात. कारागिरांवर शाडू माती मूर्ती बनविण्यासाठी दबाव असतो. मात्र, शाडूच्या मातीची कमतरता जाणवत असल्याने कारागिरांसमोर यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिकची शाडू माती उपलब्ध करण्याकडे कारागिरांचा जोर आहे. माती साठवण्याकडे कल वाढला आहे. या मातीवर जीएसटी लागू नसल्याने यंदाच्या वर्षी शाडू मातीच्याच अधिक मूर्ती राहतील, असा अंदाज बांधला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूबंदीचा एल्गार पोहोचला जगभर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

‘दारुड्या भावा, आम्ही तुझ्या आया-बहिणी आहोत. आम्हाला दारूच्या दुकानाचा खूप त्रास होतो. या दुकानामुळे आमची मुले खाली खेळू शकत नाहीत. महिला मुक्तपणे फिरू शकत नाहीत, आंदोलनास पाठिंबा द्या’ अशी साद खुद्द मद्यपींनाच घालून फेम थिएटरमागील दारूच्या दुकानासमोर महिलांचे दररोज सायंकाळी धरणे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी हे आंदोलन फेसबुकद्वारे चक्क जगभर लाइव्ह केले गेले. आता तरी येथील समस्या सुटू शकेल, असा आशावाद आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केला.

नाशिक-पुणे महामार्गावरील फेम (विजय-ममता) थिएटरमागील भर वस्तीतील हे दुकान हटविण्यासाठी महिलांना उपनगर पोलिस ठाण्यावर धडक मारली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, कार्यवाही झालेली नाही. आता या महिला दररोज सायंकाळी दुकानासमोर धरणे आंदोलन करीत आहेत. डॉ. स्नेहल पाटील, वैशाली दारोले, नीलम पगारे, मेघा थूल, ज्योती चांदवानी, डॉ. स्नेहल पाटील, समाधान पगारे, संजय दारोले, मुक्तार शेख, नाझिया शेख, जगदीश चांदवानी, कुंदन घडे, नाना पाटील आदींचा त्यात समावेश आहे.

--

कार्यवाहीबाबत दुर्लक्ष

उपनगरच्या नगरसेविका सुषमा पगारे, युगांतर प्रतिष्ठानचे प्रमुख रवी पगारे यांनी फेसबुकच्या माध्यमातून नागरी प्रश्नांवर अनोखे आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार फेम टॉकीजमागील दारूचे दुकान हटविण्याचा प्रश्न घेऊन त्यांनी श्रीगणेशा केला. आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना फेसबुकच्या माध्यमातून जगभर लाइव्ह करण्यात आल्या. कार्यवाही होत नसल्याने या महिलांनी नगरसेविका सुषमा पगारे यांच्या सहकार्याने आपले ठिय्या आंदोलन थेट फेसबुकवर जगभर लाइव्ह पोहोचविले आहे.

--

स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

फेम थिएटरमागील महादेव पार्क सोसायटी परिसरात महाराणी वाइन्स हे दुकान सुरू झाले असून, नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. नागरिकांनी सांगितले, की सह्यांची मोहीम राबवून उपनगर पोलिस ठाणे, पोलिस उपायुक्त कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन दिले आहे. दुकान सुरू करताना सोसायटीच्या रहिवाशांची परवानगी घेण्यात आली नाही. मद्यपींकडून महिला, विद्यार्थी यांना त्रास होत आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे दोन मंदिरे, महिलांचे सभागृह, हॉस्पिटलही आहे. नियम धाब्यावर बसवून येथे दारूचे दुकान सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनचे अध्यक्ष महंत डॉ. बिंदू महाराज यांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यांनीही हे दुकान बंद करण्याची सूचना केली आहे.

--

शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील दारूच्या दुकानांना मान्यता मिळणार असल्याचे समजते. कॉलनीतील दारूची दुकाने लोकवस्तीत नकोत, ती हायवेवर न्यावीत यासाठी शासनाकडे मागणी करणार आहोत. न्यायालयीन स्तरावरही लढा देणार आहोत.

-सुषमा पगारे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकासह महामार्गाची कोंडी लवकरच फुटणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाच्या तांत्रिक चुकीमुळे द्वारकेसह विविध ठिकाणी तयार झालेली कोंडी आता फुटणार आहे. द्वारका चौकातील अंडरपाससह येथील अतिक्रमणामुळे तयार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथील अतिक्रमण व हनुमान मंदिर हटविले जाणार आहे. येथील सब-वे वाढवून फ्री लेफ्ट तयार करून नाशिकरोडकडील वाहनांना बायपास दिला जाणार आहे. सोबतच पंचवटी कॉलेजसमोर बायपास, लेखानगर येथे युटर्न, कमोदनगर येथे सब-वे अशा विविध कामांसाठी ६७ कोटी रुपयांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

शहरातून जाणारा उड्डाणपूल तांत्रिक चुकांमुळे नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरला आहे. विशेषतः द्वारका येथील वाहतुकीचा व्यवस्थित अभ्यास न करताच उड्डाणपुलाचे डिझाईन करण्यात आल्याने येथील कोंडी कायम आहे. लेखानगर, पंचवटी कॉलेज, स्प्लेंडर हॉल, स्टेट बँक चौक, अशा जवळपास बारा ठिकाणी तांत्रिक चुकांमुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला होता. यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या पुलातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली होती. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात खासगी सल्लागार कंपनीकडून सर्व्हेक्षण केले होते. त्यात आढळलेल्या त्रुटी दूर केल्यास वाहतुकीची साडेसाती कमी होईल, असा दावा करण्यात आला होता. गडकरी यांनी या कामांना आता मंजुरी दिली असून, त्यासाठी ६७ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. फरांदे यांनी दिली आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या महिन्यात ही कामे सुरू होणार आहेत.

मंजूर कामे व निधी

पंचवटी कॉलेजसमोर सबवे - दीड कोटी, कन्नमवार नवीन पूल - ८ कोटी, द्वारका कोंडी फोडण्यासाठी - १ कोटी, इंदिरानगर येथील जाळी काढणे - २० लाख, कमोदनगर सबवे - १.५ कोटी, लेखानगर येथे युटर्न - १ कोटी, स्टेट बँक चौक येथे सबवे- १.५ कोटी, गॅबरील कंपनीजवळ एंट्री पॉईंट - ६० लाख

विल्होळी येथे गाड्यांसाठी भुयारी मार्ग - १२ कोटी

नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या कामांसाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. प्रयत्नांना यश येऊन द्वारकेसह या महामार्गावरील कोंडी आता फुटणार आहे.

- देवयानी फरांदे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुठे पाणी, तर कुठे देव पाण्यात

$
0
0

टीम मटा

तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर ‌जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाचे पुनरागमन झाले. शुक्रवारी दिवसभर इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, दिंडोरी, पेठ, सुरगाणा भागात चांगला पाऊस झाला. याउलट मालेगाव, बागलाण, नांदगाव, देवळा, चांदवड, येवल्यात मात्र अद्यापही पावसाने पाठ फिरवली आहे. कसमादे पट्ट्यात शेतकऱ्यांनी पावसासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.

गोदाकाठच्या गावांना अलर्ट

निफाड ः तालुक्यात पावसाचे गुरुवारी रात्रीपासून पुनरागमन झाले. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. गोदावरी व कादवा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांनी दिला आहे.
या पावसामुळे मका, सोयाबीनला जीवदान मिळाले आहे. तालुक्याती काही भागातील शेतात पावसाचे पाणी शिरले होते. निफाड, विंचुर, लासलगाव, पालखेड, शिरवाडे वणी, सायखेडा, चांदोरी, सुकेणे, पिंपळगाव, कुंदेवाडी, उगाव या भागात संततधार पाऊस झाला. दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या तडाख्यात सापडणाऱ्या सायखेडा पुलाच्या कठड्याला पाणवेली अडकल्यामुळे पाण्याचा प्रवाह पुलाजवळ मंदावला आहे. यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. दारणा आणि गोदावरी नदीला पाणी आल्यामुळे नांदूरमध्यमेशवर धरण ओहरफ्लो झाले आहे.

नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी, दारणा नदीला पूर आला. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीला जायकवाडीच्या दिशेने सकाळी ११ वाजता ३७ हजार ५२१ क्यूसेक, दुपारी १२ वाजता ५० हजार २८ क्यूसेक तर दुपारी एकनंतर २२ हजार ३८४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दिंडोरीत पिकांना मिळाले जीवदान

दिंडोरी ः गेल्या पंधरा दिवसांपासून ओढ दिलेला पाऊस परतल्याने तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील नदी, नाले वाहू लागले असून, धरणसाठ्यातही वाढ होत आहे. १५ जुलैपर्यंत गतवर्षीपेक्षा निम्माच पाऊस पडल्याने अजूनही शेतकरी चिंतेत आहे.

तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. तालुक्यात पेरण्या पूर्ण आटोपल्या असून, बहुतांश भागात भाजीपाल्याची लागवड झाली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी खरीप व भाजीपाला पिके संकटात सापडली होती. मात्र या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.
दारणा, भाम, वाकी नद्यांना पूर

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. इगतपुरी, घोटी परिसरासह पूर्ण तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. या जोरदार पावसामुळे दारणा, वाकी, भाम या नद्यांना पूर आला आहे. दारणा नदीचे पूरपाणी परिसरातील शेतांमध्ये शिरल्याने भात पिकांचे नुकसान झाले. इगतपुरी तालुक्यात २४ तासात १९३ मि.म‌ि. पावसाची नोंद झाली.
त्र्यंबकमध्ये मुसळधार

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गुरुवार सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी वेग कायम ठेवला. शुक्रवारी पहाटे पासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. गुरुवार सायंकाळपासून ते शुक्रवार सकाळपर्यंत परिसरात १२५ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी सकाळी तेली गल्ली, मेनरोड आदी भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. गटारी नाल्यांतून पाणी बाहेर फेकले जात असल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. नीलगंगा बाजेने येणाऱ्या प्रवाहात लालमाती वाहून आल्यामुळे मेनरोडवर चिखल झाला होता. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी मनेरोड आणि परिसरात पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेतली.

चांदवड, नांदगावमध्ये दमदार पावसाची गरज

मनमाड ः शहरासह चांदवड व नांदगाव तालुक्यात पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागात समाधान पसरले आहे. भ‌िजपावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, दुबार पेरण्यांचे संकट तुर्तास टळले असले तरी दमदार पावसाची गरत आहे.

कळवणमध्ये संततधार

कळवण ः शहर व तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. लहान मोठ्या धरणांच्या क्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तालुक्यात आतापर्यंत सरासरी १२५.७९ म‌ि.म‌ि. पावसाची नोंद आहे. गुरुवारी रात्रीपासून तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली. कळवण शहरात ५३ मिम‌ि पाऊस झाला असून, तालुक्यातील नवी बेज परिसरात ११, मोकभनगी भागात केवळ तीन मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यातील आभोणा परिसराती ७५ मिम‌ि, कनाशी ५१, दळवट ६० मिमि पावसाची नोंद झाली आहे. चनकापूर धरणक्षेत्रातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे.

येवल्यात तुरळक सरी

येवला ः गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने तालुक्यात काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्या. यामुळे शेतकरी सुखावला आहे. पिकांना जीवदान मिळाले आहे. जूनमध्ये दमदार श्रीगणेशा केल्यानंतर दहा पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र पावसाने पुनरागमन केल्यामुळे दुबार पेरणीचे संकट तूर्तास टळले आहे.

मालेगावात लपंडाव

मालेगाव : गेल्या महिन्यातील जूनच्या दुसऱ्या पंधरवाडापासून शहर व तालुक्यात पावसाने दडी मारली असून, जुलै अर्धा संपला तरीही पावसाचा लपंडाव सुरूच आहे. शहर व तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाचे ढग दिसत असले तरी पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तालुक्यात अनेक गावांतील पेरण्या खोळंबल्या आहेत.

आतापर्यंत सरासरीच्या १०८ मिम‌ि इतका पाऊस झाला असून, गेल्या पंधरा दिवसात फक्त ९ मिम‌ि पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांनी शेतातील ओलचा अंदाज घेवून पेरण्यांना सुरुवात केल्याने जून अखेर ७५ टक्के पेरण्य पूर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे. येत्या दोन दिवसात पाऊस झाला नाही तर संकट गडद होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेड इन चायना’ला नेटिझन्सकडून दणका

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

भारत आणि चीनचे सध्याचे संबंध सध्या जगभरात चर्चेचा विषय झाले आहेत. भारत-चीनच्या सीमेवरून चीनने घेतलेला पवित्रा मोडीत काढण्यासाठी भारतीय सैन्य दल प्रयत्नशील आहे. त्यांना साथ देत नेटिझन्सनेदेखील ‘मेड इन चायना’ला नाकारून चीनला धडा शिकविण्याची मोहीम हाती घेतली आहे. नेटिझन्सनी चीनच्या वस्तूंविरोधात अनोखी मोहीम सुरू केली अाहे. चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंची ऑनलाइन मार्केटमधून ऑर्डर दिली जात असून, या वस्तू पॅकिंग होऊन डिलिव्हरीसाठी यायच्या अगोदरच ती ऑर्डर रद्द केली जात आहे. नेटिझन्सचा हा नवा फंडा चायनामेड वस्तूंच्या ऑनलाइन व्यवहारांना चांगलेच नुकसान पोहोचविताना दिसत आहे.

ऑनलाइन शॉपिंगसाठी असणा-या अनेक वेबसाइटवरून चिनी बनावटीचे मोबाइल, टॉइज, इलेक्ट्रिकल व फॅन्सी वस्तू ऑर्डर केल्या जात आहेत. विशेष म्हणजे ही ऑर्डर केल्यानंतर भारतात वस्तू आल्याचे स्टेटस नेटिझन्सला आल्यावर वस्तूची डिलिव्हरी होण्याअगोदर वस्तूची ऑर्डर रद्द केली जात आहे. ‘सध्या भारत-चीन बॉर्डरवरून चीनची असलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. म्हणून ही ऑर्डर आम्ही रद्द करीत आहोत,’ असे कारण नेटिझन्स कॅन्सल रिझनमध्ये देत आहेत. त्यामुळे चीनमधील ऑनलाइन बाजारपेठांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. यासोबतच ‘चीनला आर्थिकदृष्ट्या झोपवण्याची वेळ आली आहे. चीन भारताची सीमारोषा हळूहळू काबीज करू पाहतोय. गुप्तपणे पाकिस्तानलाही मदत करतोय. तेव्हा आता ही शेवटची वेळ आहे. चीनला गाडून टाकण्यासाठी यापुढे कोणीही चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी करू नये,’ असे मेसेजदेखील व्हायरल केले जात अाहेत.

..

यूसी ब्राउझर अनइन्स्टॉल!

मोबाFल व कॉम्प्युटरवर इंटरनेट सर्फिंगसाठी काहीअंशी यूसी ब्राउझर वापरले जाते. मात्र, ते चीनमध्ये तयार झाले असून, त्याचा सर्व डेटा अॅक्सेस चीनमधूनच होतो. जर भारतीयांनी यूसी ब्राउझर वापरणे बंद केले, तर चीनचे मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे हे ब्राउझर वापरू नका, अनइन्स्टॉल करा, असा मेसेज पाठवत यूसी ब्राउझर अनइन्स्टॉल करून चीनचा निषेध केला जात आहे.

--

चीनमध्ये तयार होणाऱ्या असंख्य वस्तू भारतात वापरल्या जातात. मात्र, चीनच्या सध्याच्या कुरापती पाहता चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणेे गरजेचे आहे.

-साक्षी पाटील, विद्यार्थिनी

--

सर्वच भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. जेव्हा चिनी वस्तूंचा भारतातील खप कमी होईल, तेव्हाच असे घुसखोरीचे प्रकार बंद होतील.

-कैवल्य एखंडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववीच्या पुस्तकांचा तुटवडा

$
0
0

शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पुस्तके नाहीत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता नववीचा अभ्यासक्रम या वर्षापासून बदलला असून, सुधारित पुस्तके तयार करण्यात आली आहेत. मात्र, शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व पुस्तके पडली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सातवीच्या पुस्तकांचे वाटप वेळेत पूर्ण झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पहिल्या दिवशी त्यांच्या हातात पुस्तके असावेत, या उद्देशाने पहिल्याच दिवशी वाटप करण्यात आले. नववी व दहावीची पुस्तके विद्यार्थ्यांना खरेदी करावे लागतात. मात्र, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप सर्व विषयांची पुस्तके मिळालेली नाहीत. बीजगणित, भूमिती, विज्ञान या पुस्तकांचा तर शहरात प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे मागणी असूनही पुस्तक विक्रेत्यांना ती पूर्ण करता येत नसल्याचे उदाहरण आहे.

राज्यभरात हीच परिस्थिती

नाशिकसह मुंबई, पुणे, औरंगाबाद असे राज्यभर नववीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याची परिस्थिती आहे. मराठी माध्यमाचा स्टॉक आहे. मात्र इंग्रजी माध्यमाची पुस्तके नाहीत. सध्या सेमी इंग्रजीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्याने इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांना मोठी मागणी आहे. तसेच सुधारित अभ्यासक्रमांची पुस्तके कशी असणार, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

नववीच्या इंग्रजी माध्यमातील गणित, विज्ञान पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु, आम्हालाच मर्यादित स्टॉक मिळत असल्याने मागणी पूर्ण करता येत नाही.

- अतुल पवार, अध्यक्ष, नाशिक बुक सेलर्स असोसिएशन

सर्व पुस्तके विक्रेत्यांच्या मागणीनुसार आम्ही उपलब्ध करून दिली आहेत. कुमारभारतीच्या पुस्तकांची कमतरता होती, तीदेखील आता मिटणार आहे. बाकी सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. ज्या विक्रेत्यांकडे तुटवडा असेल त्यांनी ती घेऊन जावीत.

- लक्ष्मण डामसे, भांडार व्यवस्थापक, बालभारती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वितीय वर्षे इंजिनीअरिंग प्रवेशाबाबत संभ्रम

$
0
0

डिप्लोमाचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

डिप्लोमा इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर डिग्री अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डीटीई म्हणजे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयानुसार प्रथम वर्ष इंजिनीअरिंगमध्ये नापास झालेल्या विद्यार्थांच्या रिक्त जागांवर डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिले जातात. परंतु, गेल्या वर्षी असा निर्णय असतानाही विद्यार्थांना प्रवेशापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुळे उत्तम गुण मिळूनही विद्यार्थांच्या मनात अशा प्रकारच्या निर्णयांमुळे प्रवेशाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

सर्वसाधारण नियमानुसार प्रथम वर्ष इंजिनीअरिंगमध्ये नापास झालेल्या विद्यार्थांच्या रिक्त जागांवर थेट द्वितीय वर्षासाठी डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थांना प्रवेश दिले जातात. परंतु, या वर्षापासून नापास विद्यार्थांच्या रिक्त जागांवर प्रवेश दिले जाणार नाही, असा नियम करण्यात आल्याने थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगसाठी कमी प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करून लवकरात लवकर थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आमदार सीमा हिरे यांच्याकडे संबंधित विषयाचे निवेदन दिले असून, याविषयी त्या शिक्षणमंत्र्यांशी बोलणार आहेत. यावेळी गुरुमाउली इंजिनीअरिंगचे संचालक तुषार काळोगे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. जास्त जागा उपलब्ध नसल्याने चांगले मार्क्स मिळूनही अॅडमिशनबद्दल शंका वाटू लागली आहे.

- अभिजीत वाघ, विद्यार्थी

डीटीईने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे माझे मत आहे. नापास झालेल्या विद्यार्थांच्या रिक्त जागा तशाच ठेवून उरलेल्या जागांवर प्रवेश देण्याची पद्धत चुकीची आहे. अशा निर्णयामुळे डिप्लोमाला उत्तम गुण मिळूनही विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमधील प्रवेशापासून वंचित रहावे लागणार आहे.

- सौरभ भगत, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीच्या याद्या रखडल्या

$
0
0

सोसायटी सचिवांच्या संपामुळे अचूक आकडे मिळेनात

नाशिक : शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी देण्याच्या घोषणेला २० दिवस उलटूनही लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांनी पुकारलेल्या संपामुळे रखडली आहे. तब्बल १८ दिवसांपासून राज्यातील २१ हजार विविध कार्यकारी सोसायटीचे ६५०० हून अधिक सचिव संपावर आहेत. त्यामुळे खरा आकडा पोहचत नसल्यामुळे शासनाचाही गोंधळ उडाला आहे. केवळ ढोबळ माहितीव्दारे शासन आकडेमोड करीत असून, खरा आकडा येईपर्यंत सचिवांचा संप मिटण्याची वाट बघावी लागणार आहे.

शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्याकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे ९५ टक्के कर्ज या संस्थेमार्फतच वाटप केले जाते. या सोसायट्यांच्या सचिवांनी पुकारलेल्या संपामुळे शासनाला मोठा फटका बसला असून, अचूक माहिती मिळणे अवघड झाले आहे. दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी पक्षांनी कर्जमाफीची यादी जाहीर करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. पण या संपामुळे या याद्या शासनाकडे पोहचणे तूर्त अवघड आहे.

कर्जमाफी करण्याअगोदर शासनाने या विविध कार्यकारी सोसायटीकडून माहिती मागवली होती. त्यात ३१ मार्च २०१६, ३० जून २०१६ व ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा या संस्थांनी दिला. पण कर्जमाफीनंतर शासनाने विविध निकष लावल्यामुळे विविध कार्यकारी सोसायटीचा आकडा हाच महत्त्वाचा असणार आहे. राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या संस्थेमार्फतच राज्यात कर्जवाटप केले जाते. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका असतात पण त्यांचा आकडा खूपच कमी असतो.

शेतकऱ्यांची कॅश बँक

शेती उपयुक्त अवजारे, खते, बी-बियाणे, औषधे यासाठी या संस्थांकडून दरवर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाते. या संस्था राष्ट्रीयकृत बँका व सरकारच्या योजना पोहचवण्याचे कामही मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही कॅश बँकच असते. पण या संस्थेचा कारभारच या सचिवांच्या संपामुळे बंद झाला असून, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील संस्‍थांची आकडेवारी

नाशिक जिल्हा - ११००, गटसचिव - ३११, विविध कार्यकारी सोसायटीचे खातेदार - ७ लाख ९७ हजार ६९७, मार्चअखेर अपात्र खातेदार - १ लाख २० हजार

विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांना शासकीय वेतन द्यावे, त्याचप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे कर्जवाटपावर एक टक्का व्यवस्थापकीय अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्या आहेत. त्याचप्रमाणे विदर्भ व मराठवाड्यात कुठे दीड तर कुठे एक वर्षापासून पगार थकलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात तीन महिने पगार नाही. त्यामुळे आमच्या या मागण्या शासनान मान्य कराव्या. या मागणीसाठी आम्ही १८ तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे आंदोलन करणार आहोत.

- विश्वनाथ निकम, अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फडणवीस वॉटर पार्क’

$
0
0

नाशिकः महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोरील त्र्यंबकेश्वर रोडवर व्हिक्टर कंपनीला लागून तळे साचले होते. साचलेल्या पाण्यात शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. नाशिकला दत्तक घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा ‘फडणवीस वॉटर पार्क’ असा फलक झळकवत घोषणाबाजी केली. तसेच या साचलेल्या पाण्यात टायर टाकून पोहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी सेनेचे महानगरप्रमुख संदीप गायकर यांच्यासह विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images