Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बाजारपेठेचे खुलले रूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी अवघ्या अकरा दिवसांवर येऊन ठेपली असून, बाजारपेठ या सणाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. कपडे, फटाके, आकाशकंदील, पणत्या, उटणे आदी वस्तूंनी शहरासह उपनगरांतील बाजारपेठा सजल्या आहेत. नोकरदारांच्या हाती बोनस पडण्यास सुरुवात झाल्याने, तसेच विक्रेत्यांनीही विविध ऑफर्स देऊ केल्याने बाजारपेठेत चैतन्य अवतरल्याचे दिसून येत आहे.

प्रकाशाचा उत्सव म्हणजेच दिवाळी. या सणाला भारतीय परंपरेत विशेष महत्त्व आहे. नवीन कपडे परिधान करीत, दारासमोर रांगोळी काढत, दिवे लावत अन् फटाक्यांची आतषबाजी करीत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत दिवाळी सण साजरा करण्यामागील स्वरूप जरी बदलले असले, तरी त्यातील उत्साह कायम आहे. मोठी खरेदी, गोडधोड पदार्थ अन् आनंद द्विगुणित करणारा सण म्हणून दिवाळीकडे बघितले जाते. या कालावधीत शहरात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने रिअल इस्टेट, सराफी पेढ्या, कापड मार्केटपासून लघु उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रांत चैतन्य दिसून येत आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पाऊस चांगला झाल्याने अजूनपर्यंत तरी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मत विक्रेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. विक्रेते दिवाळीसाठी सज्ज असले, तरी ग्राहकांची गर्दी मात्र आगामी आठवड्यापासून बाजारात दिसून येईल, असे मतही वर्तविले जात आहे.


यामुळे वाढतेय रौनक...

बालगोपाळांसाठी विविध प्रकारचे ड्रेस, आकाशकंदील, सजावटीचे साहित्य, रांगोळ्या, पणत्या, बोळकी, फटाके, अत्तर आदींचे स्टॉल्स बाजारपेठेची रौनक वाढवीत असून, मेनरोड, शालिमार, एम. जी.रोड आदी ठिकाणी विशेषतः सायंकाळच्या वेळी ग्राहकांचीही वर्दळ वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सिडको, सातपूर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प आदी उपनगरांतही उत्साह दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहिरीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील तिळवण येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. मात्र विहिरीच्या बाहेर येताच बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. जंगल परिसरात भटकतांना हा बिबट्या एका विहिरीत पडला होता. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर बिबट्याला वाचविण्यात आले.

अनिल गुंजाळ हे गुरुवारी तिळवण किल्ला परिसरातील असलेल्या शेतातील विहिरीतील पंप सुरू करण्यासाठी गेले असता विहिरीतून डरकाळी फोडण्यासारखा आवाज आला. अनिल यांनी विहिरीत डोकावून बघितले असता त्यांना बिबट्या पाण्यात पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ सटाणा येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुचित केले. यावेळी वनाधिकारी वसंतराव पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. वनविभागाच्या पथकाने जमावाला पांगवून विहिरीतील पाण्याचा अंदाज घेतला. विहीर तीस ते चाळीस फूट खोल बिबट्याला काढणे शक्य नसल्याने वनविभागाच्या पथकाने विहिरीत पाणबुडा टाकून पाणी बाहेर काढले. त्यानंतर दोरखंडाच्या सहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. बिबट्याने बाहेर उडी घेताच जंगलात धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा संप राज्य सरकारने बेकायदेशीर ठरवला आहे. संपामुळे अन्न सुरक्षा योजनेखालील लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहिल्यास त्यांना देय असलेल्या अन्न सुरक्षा भत्त्याची रक्कम संपकरी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाईल, असा इशारा सरकारने परित्रपत्रकाद्वारे दिला आहे. सरकारच्या या इशाऱ्यामुळे पुरवठा विभागातील संपकरी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने पुरवठा निरीक्षक पदावर सरळसेवेने भरती करू नये या मागणीसाठी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी ३ ऑक्टोबरपासून संपाला सुरुवात केली आहे. परंतु, त्यांची ही मागणीच सरकारने बेकायदेशीर ठरवली आहे. पुरवठा निरीक्षकांची ५० टक्के पदे सरळ सेवेने, तर ५० टक्के जागा पदोन्नतीने भरावयाचा नियमच आहे. पुरवठा विभागातील गोदामपाल, गोदाम लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक यांना ज्येष्ठता अधिन पात्रतेच्या आधारे पदोन्नती देण्याची तरतूद आहे. त्यामुळे सरळ सेवेने पदे भरू नयेत ही मागणी सरकारने बेकायदेशीर ठरवली आहे. लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहिल्यास त्यांना अन्न सुरक्षा भत्ता देणे कायद्यानुसार अनिवार्य आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अन्न व सुरक्षा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. म्हणूनच लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहिल्यास अन्न सुरक्षा भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात यावी. तसेच गैरवर्तणुकीबाबत संबंधितांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश सहसचिव उ. द. वाळुंज यांनी दिले आहेत. सरकारने काढलेल्या या परिपत्रकामुळे पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पुरवठा विभागाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

राज्य सरकारने काढलेल्या या परिपत्रकाचा महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे. नुकतीच संघटनेची बैठक पार पडली. कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या परिपत्रकांच्या आधारे काढण्यात येणाऱ्या नोटीसांचे भय बाळगू नये, असे आवाहन संघटनेने केले आहे. सरकारने परिपत्रकाबाबत संघटनेशी कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नाही, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदोष वीजबिलांचा ‘शॉक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

एका बाजूला अवेळी लोडशेडिंगचा चटका सोसणाऱ्या परिसरातील वीजग्राहकांना आता वीजमीटरचा सदोष फोटो असलेले बिल देण्याच्या महावितरणच्या अजब पद्धतीमुळे ‘शॉक’ बसला आहे. बहुसंख्य बिलांवरील फोटोच अस्पष्ट असल्याने नागरिकांना तो नेमका आपल्याच मीटरचा आहे का, त्यावरचे रीडिंग किती, हेच समजत नसल्याने, तसेच काही बिलांवर तर फोटोची जागाच रिकामी असल्याने महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे.

आडगाव परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे महापालिकेसह महावितरण कंपनीदेखील सेवा-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. महावितरणकडून होणाऱ्या चुकीच्या वीजपुरवठ्याच्या कारभारामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण आहे. बारमाही तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीच्या नावाखाली वेळोवेळी खंडित होणारा वीजपुरवठा, शहरातील विविध भागात असलेली जुनाट विद्युत यंत्रणा अन् त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांसंदर्भात नागरिकांनी महावितरणकडे जाब विचारल्यास मिळणारा थंड प्रतिसाद प्रतिसाद यामुळे अगोदरच संतापाचे वातावरण आहे. त्यातच मीटरचा फोटो घेण्यास सुरुवात केल्यापासून वाढीव री‌डिंगचा व वाढीव दराचा नागरिकांवर पडलेला भार, अशा अनेक कारणांमुळे महावितरणचा भोंगळ कारभार समोर येत आहे.

--

चुका झाकण्यासाठी लूट

महावितरण कंपनी आपल्या चुका झाकण्यासाठी नवनवीन प्रयोग करून सामान्यांची लूट करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे सलग दोन-चार महिने चुका असलेले वीजबिल पाठविले जात आहे. अनेक बिलांवरील फोटोंची जागाच रिक्त असते, त्यामुळे रीडिंग किती, वीजबिल किती याची माहितीच ग्राहकाला मिळत नाही. त्यामुळे एका महिन्याचे बिल कमी येते आणि दुसऱ्या महिन्यात वाढीव युनिटच्या दराने वीजबिल भरावे लागत आहे. शिवाय त्यात सुधारणा करण्यासाठीदेखील ग्राहकांना महावितरण कार्यालय, मुख्य कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

--

वेळेवर बिलाने मनस्ताप

एकीकडे नागरिकांनी मुदतीत वीजबिल भरलेले नसल्यास तात्काळ कनेक्शन बंद केले जाते. पण, कंपनीच्या चुकांची भरपाई मिळणे दूरच, बिल कमी करण्यासाठीदेखील अर्जफाटे व चकरा माराव्या लागत आहेत. शिवाय वीजबिलदेखील वेळेवर मिळत नाही, शेवटच्या तारखेच्या दिवशी वीजबिल मिळत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

--

जनता दरबारही फेल...

मागील महिन्यात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्राहकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेतला होता. मात्र, काही दिवसांतच महावितरणचा कारभार जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. शिवाय सण-उत्सवांच्या व परीक्षांच्या काळात लोडशेडिंगचा चटकादेखील ग्राहकांना सोसावा लागत आहे. शासनाने याची दखल घेऊन सर्व समस्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

--

व्होल्टेजबाबत तक्रारी

आडगाव जकात नाका परिसरात अनेक घरगुती, व्यावसायिक कनेक्शन्स आहेत. पण, या परिसरात पुरेसे व्होल्टेज मिळत नसल्याने वीजग्राहकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. याबबत महावितरण कार्यालयात विचारणा केली असता तुमचे कनेक्शन दूरच्या अंतरावर आहे, त्यामुळे नवीन डीपी टाकावी लागेल, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याच्या प्रयत्न केला जातो. पण, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, अशा तक्रारी परिसरातून करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेनडेड प्रकरणामुळे अवयवदानाला फटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील ब्रेनडेड प्रकरण संशयास्पदरित्या हाताळले म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने विजन हॉस्पिटल व साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या दोन रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित प्रकरणाची तक्रार अवयवदानाशी संबंधित झोनल समितीकडे झाल्याने नोटिसा दिल्याचा खुलासा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी केला आहे. या संदर्भातील निर्णय व कारवाईचा अधिकार झोनल समितीला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाला अवयवदान चळवळीला फटका बसला आहे.

जया जमादार या जखमी झाल्यानंतर त्यांना विजन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केल्यानंतर संबंधित महिलेला अवयव प्रत्यारोपणाची सुविधा असलेल्या साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संबंधित महिला ब्रेनडेड नसल्याचे समोर आले. त्यावरून गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर संबंधित महिलेला तिसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे संबंधित महिलेचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. संबंधित प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्यावरून महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदानाशी संबंधित असलेल्या झोनल समितीकडे तक्रार केली होती. संबंधित हॉस्पिटल्सनी मात्र यात चूक नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गीता पठण स्पर्धेत नेहा कुऱ्हाडे प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चिन्मय मिशन नाशिकद्वारा आयोजित पंचवटीत‌ील चिन्मय चेतना आश्रमात झालेल्या गीता पठण स्पर्धेत विद्या प्रबोधिनी प्रशाळेच्या नेहा कुऱ्हाडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. आचार्या ब्रह्मचारिणी प्रेरणा चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली.

गीता पठण स्पर्धेत नाशिक शहरासह जिल्ह्यातील मालेगाव, चांदवड येथील १६ शाळांतील ४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावर्षी ही स्पर्धा श्रीमद्भगवत गीतेच्या १७ व्या अध्यायावर चार गटात घेण्यात आली. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे रुपये २ हजार, १ हजार, पाचशे व दोनशे पन्नास तसेच प्रमाणपत्र, मानचिन्ह देण्यात आले. चिन्मय मिशनचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, सेक्रेटरी गावले, विश्वस्त व्ही. एच. पाटील व आचार्या ब्रह्मचरिणी प्रेरणा चैतन्या यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेचा निकाल
- अ गट (बालवाडी ते पहिली) : १) आर्या साखरेकर, २) आरूषी ढगे, ३) नचिकेत महाले, उत्तेजनार्थ : ओवी दीक्षित, रुद्राणी चौधरी
- ब गट (इयत्ता दुसरी ते चौथी) : १) वैद्येही सानप, २) तन्मय काळे, ३) श्रुती शेलार, उत्तेजनार्थ : वेद कापडणीस, समृद्धी उपासनी, स्वरा कुलकर्णी
- क गट (पाचवी ते सातवी) १) चिन्मय गरूड, २) अवी परांजपे, ३) अवनी कोंबडे, उत्तेजनार्थ : श्रेया वांगणेकर, सार्थक चव्हाण
- ड गट (आठवी ते दहावी) : १) नेहा कुऱ्हाडे, २) केतकी देसाई, ३) जीवन गुंजाळ, उत्तेजनार्थ : तितिक्षा येवले, कोशी घाडमोडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भास’ पुस्तकाचे आज प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीमती सिंधूताई मोगल संदर्भ ग्रंथालय, शंकराचार्य न्यास, गौतमी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापिका डॉ. निरुपमा कुलकर्णी लिखित ‘भास एक प्रयोगशील नाटककार’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजता डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह, गंगापूररोड येथे होणार आहे.

संस्कृत भाषा सभेच्या कार्यदर्शिनी सरिता देशमुख, संस्कृत विभागप्रमुख डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. कार्यक्रमास डॉ. मो. स. गोसावी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. संस्कृत साहित्यातील भास या प्रथितयश नाटककाराने चौदा कलाकृती रचल्या. या भासाचे जीवन, काळ यासह बंडखोरी दाखवणाऱ्या १४ नाटकांचा रसग्रहणात्मक परिचय या पुस्तकात आहे.

या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, गौतमी प्रकाशनच्या संचालिका सारिका देशमुख, डॉ. देवदत्त देशमुख, तेजश्री वेदविख्यात, रमेश देशमुख यांसह संस्कृत भाषा सभेतर्फे करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार कविता संग्रहांचे उद्या प्रकाशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिकच्या सुमती पवार यांनी लिहिलेल्या चार कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. ८) रोजी सायंकाळी ६ वाजता रावसाहेब थोरात सभागृहात होणार असल्याची माहिती कवयित्री सुमती पवार यांनी दिली.

सुमती पवार यांनी सांगितले, की एकाच वेळी ‘संस्कार’, ‘सृजन’, ‘शिदोरी’ आणि ‘सुमतीचे श्लोक’ अशा चार कवितासंग्रहांचे प्रकाशन व्हावे ही अनेक दिवसांपासूनच इच्छा होती. पुण्याच्या वैशाली प्रकाशन हे कविता संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या काव्यसंग्रहांचे प्रकाशन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कवी किशोर पाठक हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुमती पवार व वैशाली प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हलाल’साठी पोलिस बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिहेरी तलाकवर आधारित ‘हलाल’ हा मराठी शुक्रवारी शहरातील दोन ते तीन चित्रपटगृहांमध्ये पोलिस बंदोबस्तात प्रसिद्ध झाला. चित्रपटला विरोधी होण्याची शक्यता असल्याने चित्रपटागृहांबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, दिवसभर कुठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही.

तिहेरी तलाक प्रथेबाबत या वर्षात बरीच चर्चा झाली. सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे तसेच अंतिम आदेशामुळे तिहेरी तलाक पद्धतीवर सर्वच बाजुने चर्चा झाली. हाच धागा पकडून हलाल नावाचा मराठी चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. आज तो शहरातील दोन ते तीन चित्रपटगृहांमध्ये झळकला. सदर चित्रपटातील आशयास काही गटांकडून विरोधी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी संबंधीत चित्रपटगृहांना पोलिस बंदोबस्त पुरवला. प्रेक्षकांच्या तपासणीसह चित्रपटगृहातही पोलिस ठाण मांडून होते. दरम्यान एका मल्टिफ्लेक्समध्ये हलालसाठी स्क्रिन उपलब्ध होती. मात्र, सदर चित्रपटाबाबत हायकोर्टात एक याचिका दाखल असून, त्यावर १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. हायकोर्टाचा अंतिम निर्णय आल्यानंतरच सदर चित्रपट प्रसिद्ध करण्याची भूमिका मल्टीप्लेक्स संचालकांनी घेतली. सुरुवातीस येथेही पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनास कोणीही उघड विरोध केल्याचे समोर आले नाही.

चित्रपटाला विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे बंदोबस्त पुरवण्यात आला. सध्यातरी बंदोबस्त कायम असून, हळूहळू तो काढून घेण्यात येईल. शहरात दोन ते तीन ठिकाणी चित्रपट दाखवण्यात येणार होता. मात्र, एका ठिकाणी शो रद्द करण्यात आला.
- श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या टेम्पोला अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील दळवट येथील क्रीडा स्पर्धा आटोपून परतणाऱ्या विद्यार्थ्यांचा पिकअप टेम्पो आणि जनावरांनी भरलेल्या टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात चिंचला येथील शहीद भगतसिंग आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अन्य १८ विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झाले. गुरुवारी (दि.५) रात्री नऊच्या सुमारास सुरगाणा-उंबरठाण रस्त्यावरील म्हैसखडक फाट्याजवळ ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, गुरुवारी आमदार. जे. पी. गावित संचलित चिंचला येथील अनुदानित आश्रम शाळेतील ३२ विद्यार्थी, विद्यार्थीनी दळवट येथील क्रीडा स्पर्धत सहभागी झाले होते. स्पर्धा संपल्यानंतर हे सगळे पिकअप टेम्पोने (जीजे १५ झेड ३५४०) चिंचला येथे परतत असताना रात्री ९च्या सुमारास म्हैसखडक फाट्याजवळ उंबरठाणकडून जनावरे भरून सुरगाण्याकडे येणाऱ्या टेम्पोशी (एम. एच. १५ डीके १४८५) समोरासमोर धडक झाली.

विद्यार्थ्यांचा टेम्पो उलटला झाला तर जनावरे भरलेला टेम्पो झाडावर आदळला. या दुर्घटनेत फुलवंती मनीराम चौधरी (वय १३) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. कल्पेश कनसे (१५), रूक्म‌िणी भोये (१३), गायत्री पवार (१४), राजेंद्र पाडवी (१६), जयश्री निकुळे (१७), मनिषा भोये (१८), गणेश बोरसे (१५), सुशीला भोये (१५), किरण भोये (१६), दिनेश

वाघमारे (१५), वनिता धुळे (१३), सरीता गायकवाड (१३), गिता पाडवी (१५), मोनिका भुसारे १३), महेश निकूळे (१५), अर्चना वाघेरा (१४), राजश्री जाधव(१३) मनिषा पवार(१३) हे जखमी झाले. या सर्व जखमींना खासगी वाहानांनी गुजरात राज्यातील वासदा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

दरम्यान विद्यार्थ्यांसोबत शिक्षक नसल्याने या बाबतची खबर पृथ्वीराज गावित यांनी दिल्यानंतर सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरगाणा पोलिस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली असून, जनावरे वाहतूक करणारा टेम्पोचालक सोमनाथ मुळाणे (रा. गोळशी) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमध्ये कोंबून किंवा जीपगाड्यांच्या टपावर बसवून नेले जाते. या घटनेनंतर तरी विद्यार्थी वाहतुकीत फरक पडणार काय, असा प्रश्न उपस्थ‌ित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात टाकल्यानंतरही ‘पसा’ला दुरवस्थेचे ग्रहण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पारंपरिक जळमटांमध्ये अडकलेल्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. तुटलेल्या खुर्च्या, फाटलेला पडदा, स्वच्छतागृहाची लागलेली वाट अशी सध्या अवस्था असून राज्य नाट्य स्पर्धांसाठी परशुराम साईखेडकर नाट्यगृहालाच पसंती प्रथम देण्यात येते; मात्र अशी अवस्था असल्यास या स्पर्धा तेथे होतील का? अशी शंका आहे.

परशुराम साईखेडकर नाट्यगृह हे सावानाच्या अखत्यारीत येते. अत्यंत माफक भाडे आणि वस्तुंचा, बाहेरील मैदानाचा मुबलक वापर असे स्वरूप असलेल्या ‘पसा’ने गेल्या वर्षीच कात टाकली; मात्र रंगरंगोटी व आतील रचना बदलामुळे नाशकातील आकर्षक वास्तुंपैकी एक अशी ‘पसा’ची झालेली ख्याती आतील मोडकळीस आलेली व्यवस्था पाहिल्यास खोटेपणाची वाटते. नव्याचे नऊ दिवस, त्याप्रमाणे ‘पसा’चेही झाले. ‘पसा’ चे मोडकळीला आलेले दरवाजे सतत उघडे असल्याने त्यातून येणारी दुर्गंधी कार्यक्रमातून निघून जाण्यासाठी भाग पाडत आहे. बाहेरच्या बाजुला असलेली पाण्याची टाकी केवळ शोभेसाठी आहे की काय, असे वाटून जाते. त्यात कधी पाणी असते तर कधी कोरडीठाक? उन्हाळ्याच्या दिवसात पाणी उपलब्ध झाले पाहिजे अशी प्रेक्षकांची ओरड असते. अचानक आग लागल्यानंतर वापरावयाच्या ‘फायर एक्स्टींग्युशर’ची अवस्था पाहिली तर त्याने आग विझेल की नाही अशी शंका येते. अनेक खुर्च्यांना आत टेकवायला जागाच नाहीत. त्यातून करकर आवाज येत असल्याने कार्यक्रम सुरू असताना रसभंग होतो. नूतनीकरण केल्यानंतर काही दिवसांतच ‘पसा’ची ही अवस्था झाली आहे.

तांत्रिक बाबतीत मागेच
कोणतेही नाट्यगृह म्हटले की त्याच्या तांत्रिक बाजू भरभक्कम असतील तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. नाटक सादर करावयाचे म्हणजे त्याला अनेक बाबींचे सहाय्य लागते. स्टेज, स्टेप्स, लाइट्स, साउंड सिस्टिम मजबूत असल्याशिवाय नाटक सादर करणे सहज शक्य होत नाही. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात मात्र नेमके याच गोष्टींची वाणवा आहे. प्रेक्षकांना खुर्चीत बसल्यानंतर सर्वात प्रथम दिसतो तो पडदा. नाट्यगृहाचा पडदा इतक्या ठिकाणी फाटलेला आहे की ‘पसा’ची लक्तरे अशी का टांगली आहे असा प्रश्न पडावा. धुळीने प्रचंड भरलेला हा पडदा म्हणजे प्रथमदर्शनी दिसणारे दारिद्र्य आहे. हा पडदा तात्काळ बदलण्यात यावा, अशी मागणी अनेक रंगकर्मींनीही केली आहे.

... तरीही ‘राज्यनाट्य’साठी पसंती
पूर्वी राज्य नाट्य स्पर्धा कालिदास कलामंदिरात होत. मात्र, समाजकल्याण विभागाने त्यातून अंग काढून घेतल्याने आता या स्पर्धा परशुराम साईखेडकर नाट्यगृहामध्ये होतात. परंतु, या स्पर्धांनाही अनेक बाधा येत आहेत. सभागृह उशिरा ताब्यात मिळणे, तांत्रिक अनेक अडचणी येणे असे प्रकार सुरू झाले आहे तरीही राज्य नाट्यसाठी ‘पसा’लाच पसंती देण्यात येते. यापूर्वी, वीस वर्षे आधीही ‘पसा’मध्येच नाट्यस्पर्धा होत. मध्यंतरी ठिकाण बदलण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा येथे स्पर्धा होत असल्याने आर्थिक हातभार लागतोय.

साउंड सिस्टिम सुधारावे
परशुराम साईखेडकर नाट्यगृहामध्ये अनेक वर्षांपासून अनेक स्पर्धा, नाटके तसेच नृत्याचे कार्यक्रम होतात; परंतु कोणत्याही स्पर्धेला देण्यात येणारे साउंह नेहमीच खराब होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना सारखा व्यत्यय येत असल्याने साउंड सिस्टिम सुधारावे, अशी सूचना प्रेक्षक नेहमीच करीत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘द्वारका’कोंडीवर उतारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी नवा पर्याय शोधला आहे. यासाठी अनेकदा चाचपणी करण्यात आली. नवीन मार्गांनुसार येत्या ९ आणि १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सांयकाळी ४ वाजेपर्यंत वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. त्यानंतर सदर पर्यायांवर शिक्कामोर्तब करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

द्वारकेवरील वाहतूक कोंडी शहरवासीयांसाठी मोठी समस्या ठरली आहे. मुंबई-आग्रा हायवेचे काम पूर्ण होण्यापूर्वीपासून द्वारका सर्कल वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. उड्डाणपूल तसेच नवीन रस्त्यांमुळे द्वारका सर्कल समस्येची तीव्रता कमी होण्याची चिन्हे होती. मात्र, एकंदरीत भोंगळ कारभाराचा फटका नाशिककरांना बसला. याठिकाणी किमान आठ ते दहा वेगवेगळे रस्ते एकत्र येऊन मिळत असल्याने नेहमीच गोंधळ उडतो. त्यातच रस्त्यांची रुंदी, वाहनांची संख्या, रस्त्यांची संख्या यामुळे येथे नक्की काय उपाययोजना राबवाव्यात, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना सतावतो. या पार्श्वभूमीवर, वाहतूक विभागाने या वर्षाच्या सुरुवातीपासून वेगवेगळे प्रयोग राबवले. तसेच काही अधिकाऱ्यांनी अभ्यास केला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनीही १८ जुन रोजी या ठिकाणी पाहणी करून वाहतुकीचे नियोजन करण्याचा पर्याय पडताळून पाहिला. त्यात, द्वारका सर्कल येथे वाहने एकमेकांना क्रॉस करणार नाहीत, या पद्धतीने नियोजन व्हायला हवे, यावर एकमत झाले. त्यानुसार पोलिस, नॅशनल हायवे अॅथोरटी ऑफ इंडिया, तसेच महापालिकेने काही फेरबदल केले. आता नवीन पर्यायानुसार पुण्याकडून येणारी सर्व प्रकारची वाहने वडाळा नाका येथून वळून पुन्हा द्वारकेच्या दिशेने येतील. तर, पुणेकडे जाणारी वाहने ट्रॅक्टर हाउसपर्यंत पोहचून तेथून यू-टर्न घेऊन पुन्हा द्वारकेच्या दिशेने येतील. यामुळे वाहने समोरसमोर येणार नाहीत.

दोन दिवस असेल बदल

वाहतुकीचे बदल प्रयोगिक तत्त्वावर असून, ९ ते १० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. या दरम्यान येणाऱ्या अडचणी, वाहतूक मार्गातील बदलाचा फायदा यांचाही आढावा घेण्यात येणार आहे. या दोन दिवसांतील निष्कर्षाचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

अशी धावणार वाहने

- पुणे बाजुकडून येणारी वाहने द्वारका सर्कल येथे डाव्या बाजुने वळण घेऊन पुढे जातील. वडाळा नाका येथे यू-टर्न घेऊन पुढे नाशिक व धुळे बाजुकडे मार्गस्थ होईल.

- मुंबईकडून द्वारकासर्कलकडे येणारी व पुण्याकडे जाणारी वाहतूक द्वारका सर्कल येथून सरळ पुढे मार्गस्थ होईल. तसेच ट्रॅक्टर हाउस येथून यू-टर्न घेऊन द्वारका येथून डाव्या बाजुला वळेल.

- सारडा सर्कल किंवा नाशिकहून आलेल्या तसेच पुणे वा मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना देखील यू-टर्न घेऊनच पुन्हा द्वारका सर्कलकडे यावे.

- धुळे बाजुकडून येणाऱ्या वाहनांनी द्वारका सर्कल येथून पुढे यावे. तसेच वडाळा नाका येथून यू-टर्न घेऊन नाशिकच्या बाजुस जावे.


मटा भूमिका

द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता आणखी एका प्रयोग केला जात असून त्याचा उद्देश चांगला असला तरी जोपर्यंत बेशिस्त वाहनचालक, सर्विस रोडवरील बेकायदा पार्किंग अन् वाहतूक नियमांना धाब्यावर बसविणारे नागरिक यांना आवर घातला जात नाही, तोपर्यंत या समस्येवर शंभर टक्के उतारा सापडणार नाही. सध्या प्रयोगासाठी जे पर्याय दिले गेले आहेत, त्यातही संबंधित ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन समस्येचे ठिकाण तेवढे शिफ्ट होईल अशीच शक्यता आहे. या चौकातील भुयारी मार्गाचा प्रभावी वापर करण्यासाठी पूर्वीच संबंधित यंत्रणांनी कष्ट घेतले असते तर आज एवढी डोकेदुखी झालीच नसती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी परवानगी, मगच परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी संस्थांमार्फत आयोजित केल्या जात असलेल्या अवांतर परीक्षांवर राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी चाप बसवला होता. आता या निर्णयात सुधारणा करण्यात आली असून त्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. खासगी संस्थांना शाळांमध्ये अवांतर परीक्षा आयोजित करता येतील; पण त्यासाठी या संस्थांना शिक्षण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

राज्यातील अनेक शाळांमध्ये खासगी संस्थांमार्फत अभ्यासेतर, अवांतर परीक्षांचे आयोजन केले जाते. मुख्याध्यापक संघ, अशासकीय संस्था, व्यक्ती आदींकडून या परीक्षांचे आयोजन करण्यात येते. टॅलेंट सर्च, भाषा विषयक, सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षांचा यात समावेश असतो. मात्र, या परीक्षांचे स्वरुप, अभ्याक्रम, गुणांकन अशा पद्धतीने योग्य परीक्षण झालेले नसते. तसेच अनेक संस्था, व्यक्ती या परीक्षांसाठी वेगळे शुल्क देखील आकारतात. या अतिरिक्त परीक्षांमुळे येणारा ताण कमी करण्यासाठी परवानगीशिवाय परीक्षांचे आयोजन करण्यावर निर्बंध असावे असा निर्णय राज्य शिक्षण विभागाने जानेवारीत दिला होता. मात्र, या परीक्षांना विशेष बाब म्हणून परवानगी देण्याची मागणी राज्यातील विविध संस्थांनी केल्यानंतर त्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. यानुसार खासगी संस्था, व्यक्तींना शाळांमध्ये परीक्षा घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

तर अशा परीक्षांवर बंदी

शिक्षण विभागांच्या नियमांचे पालन होत नसल्यास, विद्यार्थ्यांना अशा परीक्षांची सक्ती होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला मिळाल्यास अशा परीक्षांवर थेट बंदी आणली जाणार आहे. त्यामुळे खासगी संस्थांना शिक्षण विभागाच्या अटींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या परीक्षा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेस चालना देणाऱ्या, अवांतर वाचनास प्रोत्साहन देणाऱ्या आहेत की नाही, याबाबतही विचार केला जाणार आहे.

हे महत्त्वाचे

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत, वाचनास प्रोत्साहन देणाऱ्या, राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या, व्यक्तिमत्व विकास घडवणाऱ्या परीक्षा एखाद्या खासगी संस्थेने तयार केली असेल व ही संस्था ना-नफा ना-तोटा तत्वावर काम करणारी असेल तर त्यांना या परीक्षा आयोजित करता येणार आहेत. मात्र, या संस्थांना मागील तीन वर्षांचे वार्षिक ताळेबंद, संस्था निबंधक कार्यालयाकडे सादर करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपमध्ये मालेगावात चुरस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यात एकीकडे ऑक्टोबर हिटने तापमान वाढले असून, नऊ ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. तालुक्यात शिवसेना-भाजपातील संघर्ष वाढत असून, त्यामुळे या निवडणुकीत देखील सेना-भाजपात थेट लढत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे शिवशक्ती पॅनल व भाजप नेते अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पेनलमध्येच मुख्य लढत होत आहे.

तालुक्यातील दहा पैकी एक मोहपाडा ग्रा. प. निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे नऊ ग्रा. प. साठी राजकीय लढाई सुरू आहे. यातील दाभाडी व सौंदाणे ग्रा. प. च्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही गावांमध्ये गेल्या दोन पंचवार्षिकपासून सेनेचा भगवा फडकत आहे. मात्र यावेळी हिरे समर्थकांनी सेनेपुढे कडवे आव्हान उभे केले असून, भुसे समर्थकांनी देखील सत्ता कायम राखण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.

गावपातळीवरील निवडणूक असल्याने सर्वच गावात नातीगोती, भाऊबंदकी हे फॅक्टर महत्त्वाचे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पक्षीय रंग पाहायला मिळत आहेत.

प्रथमच सरपंच पदासाठी थेट निवडणूक होत असल्याने गावपातळीवरील अनेक मात्तबरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दाभाडी येथे सरपंचपदासाठी शिवसेनेच्या वनमाला निकम, भाजपच्या चारुशीला निकम व अपक्ष सुहासिनी निकम यांच्यात तिरंगी लढत आहे. सौंदाणेत शिवसेनेचे चेतन पवार व भाजपचे डॉ. मिलिंद पवार यांच्यात लढत आहे. यासह अन्य दोन उमेदवार देखील रिंगणात आहेत.

दाभाडी व सौंदाणे या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत असून, या नऊही ग्रा. प. च्या निवडणुकीनंतरच शिवसेनेचा गावपातळीवर पाया किती भक्कम आहे व भाजपला शहरानंतर गावात किती जनाधार मिळतो हे स्पष्ट होणार असल्याने तालुक्याचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावात परिवर्तन की प्रगती?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतच्या थेट सरपंच आणि १७ सदस्यांच्या निवडीसाठी शनिवारी मतदान होत असून, दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल आणि भास्कर बनकर यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलमध्ये थेट ासामना होणार आहे.

दोन्ही पॅनलच्या वतीने गत आठ दहा दिवसांपासून शहरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरातील ज्येष्ठ नेते प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी प्रचारात सक्रिय असल्यामुळे दोन्ही पॅनलला ज्येष्ठ नेत्यांचे चांगले पाठबळ मिळाले आहे. गत आठ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सांयकाळी थांबली. मात्र ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळविण्यासाठी दोन्ही पॅनलकडून प्रचाराची राळ उडविण्यात आली होती.

प्रत्यक्ष भेटी, चौकसभा, जाहीर सभा, सोशल मीड‌ियावर झालेला प्रचार व अपप्रचार यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. पिंपळगाव ग्रामपंचायतवर गत तीस वर्षांपासून भास्कर बनकर यांची एकहाती सत्ता आहे. १९९७ चा अपवाद वगळता ग्रामपंचायतच्या प्रत्येक निवडणुकति भास्कर बनकर यांच्या साथीला कधी दिलीप बनकर तर कधी तानाजी बनकर होते. एक निवडणूक तर बिनविरोध पार पडली होती. या निवडणुकीत मात्र भास्कर बनकर यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी शहरातील मातब्बर नेते एकत्र आले आहेत. त्यातच थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत दिलीप बनकर यांनी आपल्या भावजय अलका बनकर यांनाच रिंगणात उतरवल्यानंतर निवडणुकीतील चुरश कमालीची वाढली. दिलीप बनकर यांच्यासोबत ज्येष्ठ नेते प्रताप मोरे, तानाजी बनकर, अशोक शहा, सोहनलाल भंडारी, सुरेश खोडे, सपंत विधाते विश्वास मोरे, सोमनाथ मोरे आदी मातब्बर नेते सक्रिय झाल्याने भास्कर बनकर काहीसे एकाकी पडले असले, तरी निवडणुकीत मतदाराचां कैाल महत्त्वाचा असल्याने भास्कर बनकर यांची भिस्त मतदारांवरच आहे.

अॅड. शातांराम बनकर, पढंरीनाथ देशमाने, चंद्रकांत खोडे, रामराव डेरे, जयमरा खोडे आदी मान्यवरासह दिलीप मोरे यांच्यासारखा हुकुमी एक्का भास्कर बनकर यांच्या साथीला आहे. तर युवा कार्यकर्त्यांमध्ये चांगला प्रभाव असलेले युवा नेते राजेश पाटील सुजीत मोरे, दीपक बनकर, आशिष बागुल, राज गांगुर्डे, रामराव मोरे, विक्रम मोरे, नकुल शिंदे, राहुल बनकर, संदीप बनकर अशी युवा नेत्यांची फौज भास्कर बनकरांच्या पाठ‌िशी आहे. सत्यजीत मोरे, महेंद्र गांगुर्डे, किरण लभडे, लक्ष्मण खोडे, रामराव बनकर आदी बिनीचे शिलेदार भास्कर बनकर यांच्या पॅनलमधुन उमेदवारी करीत आहेत. शिवाय संपन्न राजकीय वारसा असलेल्या नामवंत घराण्यातील महिला संध्या मोरे, शितल बनकर, छाया पाटील, सविता खोडे, सुवर्णा देशमाने आदी भास्कर बनकर यांच्या पॅनलच्या उमेदवार आहेज.

दिलीप बनकर यांच्या पॅनलमधून सतीश मोरे, संजय मोरे, सुनिल गांगुर्डे, गणेश बनकर, सुहास मोरे असे प्रभावी युवा नेते उमेदवारी करीत आहेत. प्रचार काळात दोन्ही पॅनलने आपली भूमिका मतदारापर्यंत पोहचविली आहे. युवा नेत्यांची उमेदवारी दिलीप बनकरांना विजयापथावर पोहचवणार की एकाकी पडूनही भास्कर बनकर मतदारांची सहानुभूती मिळवतात हे निवडणुकीनंतर स्पष्ट होर्इल.

पिंपळगावात ३६ बूथ

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि १७ सदस्य निवडीसाठी शनिवारी मतदान होणार आहे. निवडणूक विभागाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. ए. शेख यांनी दिली. पिंपळगाव ग्रामपंचायतसाठी यंदा प्रथमच थेट सरपंच निवड होत असून सहा वॉर्डातून १७ सदस्य उभे आहेत. सहा वॉर्डात ३६ मतदान बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. या साठी बुथ अधिकाऱ्यांसह तीस महिला कर्मचारी परिश्रम घेत आहेत. पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा वॉर्डातून एकूण मतदार संख्या २७ हजार ९०४ इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मिशन इंद्रधनुष्य’चा रविवारी शुभारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राज्यात ७ ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेतंर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ ८ ऑक्टोबर, रविवारी येथील सामान्य रुग्णालय प्रांगणात होणार आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी दिली.

येथील सामान्य रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाडावी उपस्थित होते. डॉ. डांगे यांनी पत्रकार परिषदेत विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. शहरातील मुस्ल‌िमबहुल भागात आजही लसीकरणाबाबत उदासीनता आहे. देशातील अशा १८७ जिल्ह्यात केंद्रशासनाने ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ मालेगावी होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण मालेगावात केले जाणार आहे. या मोहिमेतंर्गत ऑक्टोबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान दरमहा ७ ते १४ तारखेदरम्यान शहरातील ९ आरोग्य केंद्रांवर ३६२ सत्रात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. तसेच विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी शहरातील १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय तसेच नर्सिंग कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातील तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे. या स्फोटात मार्केटमधील पाच गाळ्यांचं नुकसान झालं आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून प्राथमिक माहिती घेतली जात आहे.

आज पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाला. नुकसान झालेले व्यावसायिक गाळे बंद असल्यानं कुणीही जखमी झालं नाही. हा स्फोट नेमका कशामुळं झाला हे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुख्यमंत्र्यांसह त्यांचे मंत्रीच बोगस’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, अकोले

या पुढील पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीसुद्धा जनतेतून निवडून द्या, म्हणजे या सरकारला कळेल की खरी लोकशाही काय आहे. ६ लाख शेतकरी हे बोगस आहेत, असे सांगणारे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीच बोगस आहेत, अशी टीका माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केली. आज सामान्य शेतकरी, आदिवासी, कामगार, विद्यार्थी या सरकारच्या धोरणाला कंटाळला आहे. हे सरकार नालयक आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अकोले तहसील कार्यलयासमोर धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पिचड बोलत होते. सुरेश गडाख, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, भाऊपाटील नवले, अशोक देशमुख, के. डी. धुमाळ, बाळू भोर, कैलास वाकचौरे, सचिन शेटे, बाळासाहेब वडजे, नामदेव पिचड, परशराम शेळके, कुमोदिनी पोखरकर, चंद्रकला धुमाळ, कल्पना सुरपुरिया, रवींद्र देशमुख, राहुल देशमुख, शंभू नेहे आदी या वेळी उपस्थित होते. सुमारे ३ तास चाललेल्या या धिक्कार मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन विविध घोषणा दिल्या. उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी यांनी बळीराजाचा वेश परिधान करून सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. बैलगाड्या, घोडे, ट्रॅक्टर व त्यावर विविध फळभाज्या बांधून हा मोर्चा मराठी शाळेच्या प्रांगणातून अकोले शहरातून कोल्हार-घोटी रस्त्याने तहसील कचेरीवर नेण्यात आला.

मधुकर पिचड म्हणाले की, आज कधी नव्हे इतके विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थी मनातील भावना मोकळ्या करू लागले आहेत. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असून हे सरकार फुकट खाऊ लोकांचे आहे. राज्यातील ८०० इंजिनीअरिंग कॉलेज बंद पडली असून कंपन्या बंद पडल्या आहेत. जीएसटी आणि नोटबंदीमुळे सामान्य माणूस या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वेठीस धरला जात असून पंतप्रधान मनमानी पद्धतीने देश चालवत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांना बजावल्या नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मालकीच्या तिबेटीयन मार्केटमधील गाळ्यांमध्ये झालेल्या स्फोटाची गंभीर दखल पालिकेनेही घेतली असून, या गाळ्यांच्या मालकांना अग्निशमन विभागाने नोटीस बजावली आहे. तसेच, सोमवारी या गाळेधारकांना आर्थिक नुकसानीबाबतच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत. ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास बंदी असतानाही गाळेधारकांनी त्यात गॅस सिलिंडर ठेवल्यामुळे अटी व शर्तींचा भंग म्हणून हे गाळे जप्त केले जाण्याची शक्यता आहे.

तिबेटीयन मार्केटमधील एका गाळ्यात पहाटेच्या सुमारास संशयास्पदरित्या स्फोट होऊन पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे जवळपास पाच ते सहा गाळ्यांचे नुकसान झाले आहे. ज्वलनशील पदार्थामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पालिकेच्या गाळ्यांचा वापर व्यावसायिक कारणाऐवजी ज्वलनशील पदार्थ ठेवण्यासाठी करणे हा अटी व शर्तीचा भंग आहे. त्यामुळे महापालिकेने चार गाळेमालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अग्निशमन विभागाच्या वतीने या नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांचा तातडीने खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले म्हणून सोमवारी नुकसानीच्या भरपाईसाठी नोटीस देण्यात येणार आहे. तसेच, अटी व शर्तीचा भंग केला म्हणून गाळे जप्तीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, तिबेटीयन मार्केटमधील गाळ्यांचा गैरवापर केला जात असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-पॉस मशिनमध्येही फेरफार

$
0
0

जिल्ह्यात तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकारने रेशन दुकानदारांना पॉईंट ऑफ सेल (ई पॉस मशिन) चा वापर सक्तीचा केला असला तरी या मशिनमध्येही फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दुकानांसह कामात अनियमितता आढळलेल्या एका दुकानाचा परवाना पुरवठा विभागाने रद्द केला आहे.

स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभागाने ई-पॉस मशिनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील दोन हजार ६०९ दुकानांमध्ये हे मशिन्स बसविण्यात आले आहेत. या मशिन्सद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जात आहे. नांदगाव तालुक्यातील खादगाव आणि बोराळे येथील रेशनदुकान क्रमांक १५४ आणि ३७ मधील ई-पॉस मशिन्समध्ये फेरफार करण्यात आल्याचे पुरवठा विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या मशिन्समध्ये सेल क्लोजचे बटण देण्यात आले असून, महिन्याच्या अखेरीस दुकानदारांनी हे बटण दाबून सेल क्लोज करणे आवश्यक असते. दुकानदाराने ही प्रक्रिया करताच संगणकावरून ऑनलाइनने पुरवठा विभागाला त्याची माहिती मिळते. मात्र, दुकान क्रमांक १५४ चे मालक छगन विठ्ठल वडक्ते आणि ३७ चे मालक संतोष भोसले यांनी महिना संपण्यापूर्वीच सेल क्लोजचे बटन दाबून धान्य संपल्याचे संकेत दिले. त्यांच्या या कृतीबाबत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी या दोन्ही दुकानांची तपासणी केली. तेव्हा दुकानदारांकडून हस्तलिखित स्वरूपात धान्याचे वाटप सुरू असल्याचे उघडकीस आले. मशिनमध्ये फेरफार करत अपहार केल्याचा ठपका ठेऊन संबंधित दोन्ही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यांची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त केल्याची माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

२२ तक्रारी पुरवठा विभागाला प्राप्त

ई-पॉस मशिनमध्ये फेरफार झाल्याच्या २० ते २२ तक्रारी पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. मात्र, तपासाअंती त्यात तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाले होते. अधिकाऱ्यांनी संबंधित दुकान मालकांना ताकीद दिली होती. मालेगाव धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या कक्षेतील किरकोळ केरोसीन परवानाधारक हमीद खान शहा मोहमंद यांच्याविरुद्ध तहसीलदारांनी पोल‌सिात तक्रार दिली आहे. अनियमितता आढळून आल्याने पुरवठा विभागाने शहा यांचाही केरोसीन परवाना रद्द केला असून, १०० टक्के अनामत रक्कम जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images