Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तिसऱ्या दिवशी हटविली २६ धार्मिक स्थळे

$
0
0



अतिक्रमण निर्मूलन विभागाने सहा जेसीबी, ४ डंपर, ६ ट्रॅक्टर, कॉम्प्रेसर ड्रील मशीन व कामगारांच्या मदतीने ही अतिक्रमणे काढली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, उपायुक्त (अतिक्रमण) रोहिदास बहिरम, नगररचना, बांधकाम अभियंता यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, पोल‌िस अधिकारी व कर्मचारी, महिला पोल‌िस, शीघ्रदल पथक, राज्य राखीव दलाचे पथक अशा प्रचंड ताफ्यात ही कारवाई करण्यात आली.

एकेरी वाहतूक

सकाळी नऊ वाजेपासून अतिक्रमण मोहिमेदरम्यान केटीएचएम कॉलेजपासून अशोकस्तंभाकडे जाणारा एक मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे वाहनांच्या मोठा रांगा बघायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी तत्काळ वाहने अन्य मार्गाने वळविल्याने कोंडी टळली. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य केले.

विश्वस्तांनी काढून घेतले शेड
नाशिकरोड ः धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम नाशिकरोडला सुरू होण्याआधीच काही विश्वस्तांनी स्वतःहून मंदिरे स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे.

नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगाव परिसरात अनाधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात येणार आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच आणि उपनगर पोलिस ठाण्याच्या तेरा अशी एकूण अठरा धार्मिक स्थळे हटविण्याच्या नोट‌िसा महापालिका प्रशासनाने संबंधितांना दिल्या आहेत. नाशिक-पुणे मार्गावरील गांधीनगरसमोर हनुमान मंदिर आहे. त्याच्या शेजारीच गणपतीचे छोटे मंदिर आहे. येथे चतुर्थीला गर्दी होते. मात्र, हे मंदिर रस्त्यालगत असल्याने भाविकांची वाहने वाहतुकीला अडथळा ठरत होती. त्यामुळे हे मंदिर अतिक्रमित ठरवून महापालिकेने ते हटविण्याची नोटीस दिली आहे. मंदिर व्यवस्थापकांनी त्वरित हालचाल करत मंदिराचे पत्रे उतरवले आहेत. मूर्ती व अन्य साहित्य लवकरच स्थलांतरित केले जाणार आहे.

पालिकेचे आवाहन

केवळी रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमित धार्मिक स्थळेच हटविली जाणार आहेत. नाशिकरोडलाही ही मोहिम पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. संबंधितांनी स्वतःहून ही स्थळे हटवावीत, असे आवाहन महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय अधिकारी सोमनाध वाडेकर यांनी केले आहे. स्वतःहून अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याचे नागरिकांनीही स्वागत केले आहे.

इंदिरानगरचे शनी मंदिर तोडले
इंदिरानगर ः शुक्रवारी सायंकाळी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ असलेल्या शनी मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी विरोध केला होता. मात्र, पोलिस आणि महापालिका प्रशासनाने त्यांचा विरोध जुमानला नाही.

नाशिक शहरात गेल्या तीन दिवसांपासून विविध ठिकाणची अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्यात येत आहेत. याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी सायंकाळी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ असलेले मारुतीचे व स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम पाडण्यात आले. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व अनेक वर्षांपासून हे मंदिर या ठिकाणी असल्याने हे पाडू नये यासाठी सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. परंतु, महापालिका प्रशासन व पोलिस यांनी या विरोधकांना अडवले. यावेळी स्टे ऑर्डर आणली असल्याचे सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात ऑर्डर न दाखवल्याने हे बांधकाम तोडण्यात आले. सुमारे दोन तास सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरातील वाहतुकीचा गोंधळ झाला होता. पोलिसांनी हे अतिक्रमण काढण्यापूर्वी वाहतुकीची व्यवस्था न केल्याने बराच काळ या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळी रहदारीच्या वेळेत ही मोहीम केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एलईडी’ खरेदीत भ्रष्टाचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नगरपालिकेतील कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून नाराजीचा सूर आळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी दुपारी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या कारभारावर तोफ डागली. येवला पालिकेच्या वतीने शहरात बसविण्यात येणाऱ्या एलईडी पथदीप कामात सुमारे २२ लाखांचा भ्रष्टाचार केला गेल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला.

नगरसेवकांनी केलेल्या आरोपामुळे शहरात खळबळ उडाली आहे. हे पथदीप चायना मेड असून, अंत्यत हलक्या प्रतिचे आहेत. दोन हजार रुपयांना मिळणाऱ्या एका एलईडीसाठी ११ हजार ७०० रुपये अदा करण्यात आले आहेत, असा आरोप नगरसेवकांनी केला. या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येवला पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी या पत्रकार परिषदेत केली.

येवला नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. संकेत शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे व अपक्षांचे गटनेते रुपेश लोणारी यांच्यासह राष्ट्रवादी नगरसेवक सचिन शिंदे, प्रवीण बनकर, शितल शिंदे, परवीन निसार शेख, रईसा मुश्ताक शेख, शेख तेहसीनबानो, सायबी मो. सलीम, निसार शेख, शिवसेना नगरसेविका छाया देसाई व सरोजिनी वखारे उपस्थित होते.नगर-मनमाड रोडवर पथदीप असनाही सध्या मंजूर असलेल्या यादीतही या रोडवर पथदीप बसवण्याचे टेंडर देण्यात आले आहे. मात्र, हे काम अजून सुरू नाही तोच नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार याच ठिकाणी पुन्हा एलईडी लाइट बसविण्याचा ५० लाख रुपयांचा घाट घालण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीबाधितांच्या पदरी निराशाच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

मदत मिळेल या आशेने आलेल्या समृद्धीबाधित शेतकऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलेच टोलवले. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी तुम्ही एकत्रीत व्हा, असा उलट सल्ला दिला. तुम्ही एकत्रीत येऊन शासनाविरुध्द लढा का देत नाही. तुम्ही एकत्रच येत नाही हे शासनाने ओळखले असून, शासन दबाव तंत्र वापरून भूसंपादन करीत असल्याचे सांगत तब्बल तीन तास ठाकरेंच्या भेटीसाठी ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांना निराश होऊनच त्यांचा निरोप घ्यावा लागला.

शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संघर्ष समितीचे राजू देसले, विनायक पवार, चंद्रकांत भोईर, केरू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या. शासनाकडून हुकूमशाही पध्दतीने जमीनमोजणी आणि संपादन होत असल्याचे सांगितले. इगतपुरी तालुक्यातील एकूण क्षेत्र ८२ हजार ८१२ हेक्टर इतके आहे. त्यापैकी वनक्षेत्र, धरणे, लष्कर सराव, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आणि पेट्रोल पाइपलाइन, औद्योगिक आणि आता समृध्दी महामार्ग यासाठी एकूण ५६ हजार ७४४ हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे. आता केवळ २६ हजार ६८ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. असेच राहिले तर एक दिवस असा येईल की आम्ही नकाशावरच राहणार नाही, अशी खंत याप्रसंगी शेतकऱ्यांनी मांडली.

समिती पदाधिकाऱ्यांची कैफीयत ऐकल्यावर एवढे सगळे होऊन तुम्ही शांत कसे, असा प्रश्‍न राज ठाकरे यांनी उपस्थि केला. महामार्गात जमिनी जात असलेले शेतकरीच भांडत आहेत. इतर शेतकरी कुठे आहेत अशा प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्ही सगळे एकत्र येऊन ताकद उभी करू शकत नाही हे तंत्र शासनाला माहिती झाले आहे. तुम्ही एकत्र येऊन ताकद दाखवा. शासन आपोआप माघार घेईल, असे सांगत राज ठाकरे यांनी प्रशासन आणि शासनाच्या कारभारावर टीका केली.

दिवसा हवेत!

गुरुवारी रात्री पदाधिकाऱ्यांशी जमिनीवर बसून चर्चा केली. मी आता जमिनीवर आलोय असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. परंतु, सकाळी त्याउलट चित्र पहायला मिळाले. समृद्धी बाधितांना सकाळी साडेसात वाजेची वेळ देण्यात आली होती. परंतु, राज ठाकरेंनी या शेतकऱ्यांची भेट साडेनऊ वाजता घेतली. त्यामुळे तब्बल तीन तास वाट बघावी लागली. त्यानंतरही शेतकऱ्यांची निराशाच झाल्याने ठाकरे रात्री जमिनीवर आले अन् दिवसा लगेच हवेत गेले, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार यांचे नाशकात आगमन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे शुक्रवारी सायंकाळी नाशिकला आगमन झाले. दिल्ली येथून आलेल्या कृषी अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी सकाळी ते सह्याद्री अॅग्रो फार्मला भेट देणार आहेत. याअगोदर शरद पवार यांनी २ ऑक्टोबरला या फार्मला भेट दिली होती. आता पुन्हा पवार कृषी अधिकाऱ्यांबरोब येथे भेट देत आहेत.

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेली कंपनी म्हणून सह्याद्री फार्मकडे बघितले जाते. द्राक्षे निर्यातीमध्ये या कंपनीने मोठा पल्ला गाठला आहे. त्याचप्रमाणे विविध फळांवर प्रक्रिया करण्याचा उद्योग येथे सुरू आहे. त्यामुळे या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे यांच्याबरोबर केंद्रीय कृषी अधिकारी चर्चा करणार आहेत. त्यानंतर या कंपनीने केलेल्या कामांची पहाणी करून त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

एमराल्ड पार्क येथे मुक्काम

शरद पवार यांचे आगमन शुक्रवारी सायंकाळी हॉटेल एमराल्ड पार्क येथे झाल्यानंतर त्यांचे स्वागत आमदार हेमंत टकले, जयवंत जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गटनेते गजानन शेलार, नाना महाले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांचे प्रगतिपुस्तक ः मालेगाव मध्य, चांदवड-देवळा

$
0
0

आमदारांचे प्रगतिपुस्तक

--

निधी कोट्यवधींचा, पण शहराचे बकालपण कायम


मतदारसंघ ः मालेगाव मध्य

जिल्ह्यातील एकमेव मुस्लिमबहुल मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघातील मतदारांनी वारंवार लोकप्रतिनिधी बदलले, तरी त्यांचे प्रश्न आजही कायम आहेत. आसिफ शेख यांच्या रुपाने मालेगावला तरुण चेहरा मिळाला असला, तरी विरोधी पक्षात असल्याचा फटका तीन वर्षांपासून त्यांना बसला आहे. तीन वर्षांत मतदारसंघात मोठा प्रोजेक्ट येण्याऐवजी मालेगावची रोजीरोटी असलेला हातमाग व्यवसाय मात्र संकटात आला आहे. शहरात अस्वच्छता, अतिक्रमणे, बकालपणा या समस्या कायम असल्या, तरी भुयारी गटार योजना, उड्डाणपूल, क्रिकेट स्टेडियम, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती यांसारखी विकासकामे मार्गी लावण्यात मात्र त्यांना यश आले आहे. मालेगाव शहराचा चेहरामोहरा बदलावा यासाठी मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला असून, त्या विश्वासावर खरे उतरण्याची जबाबदारी आगामी दोन वर्षांत त्यांच्यावर असेल.

भुयारी गटार, उड्डाणपूल मार्गी

मुस्लिमबहुल व संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे आमदार अासिफ शेख करीत आहेत. माजी आमदार व शहराचे विद्यमान महापौर रशीद शेख यांचे चिरंजीव असलेल्या अासिफ यांना राजकीय वारसा लाभला आहे, तसेच आमदारकीच्या आधीदेखील नगरसेवक, महापौरपदाचा अनुभव असल्याने मुस्लिम समुदायाच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. राज्यात सध्या भाजप-शिवसेनेचे सरकार असताना विरोधी पक्षात असूनदेखील मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शहरात अस्वच्छता, अतिक्रमणे, बकालपणा या समस्या कायम असल्या, तरी भुयारी गटार योजना, उड्डाणपूल, क्रिकेट स्टेडियम, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती यांसारखी कामे मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे.

यंत्रमागधारकांप्रश्नी सजगता

मालेगाव हे यंत्रमागधारकांचे शहर असून, विविध कारणांमुळे या उद्योगाला गेल्या काही दिवसांपासून समस्यांनी ग्रासले आहे. या यंत्रमागधारकांच्या समस्या सोडविण्यास आमदार शेख यांनी निवडून आल्यानंतर प्राधान्य दिले असून, विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी इन्फ्रा २ अंतर्गत शहरात शंभर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले असून, उर्वरितचे काम सुरू आहे, तसेच वीज अनुदान मिळावे यासाठीही त्यांनी आवाज उठविला आहे. यंत्रमाग कामगारांसाठी महामंडळ, घरकुल योजना व्हावी यासाठी त्यांनी भव्य मोर्चा काढला होता. दोन वर्षांत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय, भुयारी गटार पूर्ण करणे, महिलांसाठी ५०० खाटांचे रुग्णालय व जिल्हानिर्मितीच्या प्रश्नावर पाठपुरावा करावा लागणार आहे.

शैक्षणिक विकासासाठी पुढाकार

मुस्लिम मुले, मुली, युवती यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतानाच शाळांना २०० संगणक वाटप, दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप, स्वतंत्र अभ्यासिका, नवीन उर्दू शाळा, अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देणे अशी कामे सातत्याने सुरू आहेत. गेल्या तीन वर्षांत ठळक म्हणता येतील अशी कामे म्हणजे शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी उड्डाणपुलासाठी ३१.७२ कोटींच्या निधीला मंजुरी मिळविली असून, चार कोटी रुपये खर्चातून उर्दू घर, दीड कोटी रुपये खर्चातून क्रिकेट स्टेडियम साकारण्यासह भुयारी गटार योजनेसाठी केंद्राकडून १०० कोटींच्या निधीसही मंजुरी मिळविली आहे. यातील उड्डाणपूल व भुयारी गटारीच्या कामाचा प्रारंभ अद्याप झालेला नाही.

मार्गी लावलेली कामे

--

-उड्डाणपुलासाठी ३१.७२ कोटी

-उर्दू घरासाठी ४ कोटी

-क्रिकेट स्टेडियमसाठी १.५ कोटी

-भुयारी गटारींसाठी १०० कोटी

-महिला रुग्णालयासाठी पाठपुरावा

--

या प्रश्नांकडे दुर्लक्ष

शहरात आजही स्वच्छता, अतिक्रमणे, रोगराई, बेरोजगारी आदी समस्या कायम आहेत. यंत्रमाग उद्योग असला, तरी त्यात नवनवीन तंत्रज्ञान यायला हवे. टेक्स्टाइल पार्क, स्पिनिंग जिनिंग मिल्स, गारमेंट उद्योग नसल्याने कापडावरील प्रक्रिया उद्योगाचा आभाव असून, हे शक्य झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणे शक्य आहे. अल्पसंख्याक समुदायासाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास मुस्लिम समाज मुख्य प्रवाहात येऊ शकेल.

--

विधिमंडळ कामकाजात सहभाग

आमदार शेख यांनी विरोधी पक्षात असतानादेखील विकासाच्या प्रश्नांवर विधिमंडळात सातत्याने आवाज उठविला आहे. यासह मराठा, मुस्लिम आरक्षण, सच्चर समिती, गोरक्षण कायदा यांसारख्या प्रश्नांवर सातत्याने जनआंदोलने करून मुस्लिम समुदायाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वात महापालिकेवर काँग्रेसने सत्ता मिळविली असून, ते स्वतः आमदार, वडील रशीद शेख महापौर, तर आई ताहेरा शेख विद्यमान नगरसेविका असून, सत्तेची अनेक पदे हाती असल्याने शहरातील मुस्लिम बांधवांच्या त्यांच्याकडून विकासाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत.

--

आमदार म्हणतात...

विकास साधण्याचा प्रयत्न

गेल्या निवडणुकीत मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत नेतृत्वाची संधी दिली. विरोधी पक्षात असतानादेखील विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. शहराची स्वच्छता व वाहतुकीच्या दृष्टीने भुयारी गटार व उड्डाणपूल ही महत्त्वाची दोन कामे मार्गी लावण्यात यश आले आहे. यंत्रमागधारकांसाठीदेखील सातत्याने आवाज उठविला आहे. मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जिल्हानिर्मिती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत.

-आसिफ शेख, आमदार, मालेगाव मध्य

--

विरोधक म्हणतात...

जुन्या कामांचे घेताहेत श्रेय

विद्यमान आमदार शेख यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात कोणतीही ठोस विकासकामे झालेली नाहीत. आमच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र विकासकामे सुरूच झालेली नाहीत. शहरातील रोजगारनिर्मिती, आरोग्य, शिक्षण, रस्ते आदी प्रश्न अद्यापदेखील प्रलंबित आहेत. यंत्रमाग उद्योग संकटात असताना त्यासाठी ठोस काहीच झालेले नाही. टेक्स्टाइल पार्क, गारमेंट उद्योगही आलेले नाहीत.

-मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

--

शब्दांकन ः तुषार देसले


----------------------

मतदारसंघ ः चांदवड-देवळा


‘जलयुक्त’मध्ये तिसरा; तरीही तहानलेला...


ज्या तालुक्याच्या भाग्यातच दुष्काळ लिहिलेला आहे, अशा चांदवड-देवळा मतदारसंघात नवीन सरकार येऊन तीन वर्षे झाली तरी पाण्याचा प्रश्न कायम आहे. भाजपचे आमदार राहुल आहेर यांनी दुष्काळाच्या शापातून मतदारसंघाला मुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनांची भरपूर पेरणी केली. त्यामुळे अनेक गावांची तहान भागली असली, तरी आगामी दोन वर्षांत उर्वरित गावांचीही पाण्याची चिंता मिटविण्याचे आव्हान डॉ. आहेर यांच्यासमोर आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर वसलेला हा तालुका राजकीयदृष्ट्यादेखील तितकाच महत्त्वाचा आहे. आमदार आहेर यांना ज्येष्ठ नेते शिरीष कोतवाल यांनी निवडणुकीत कडवी झुंज दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेची सर्वांत जास्त कामे चांदवड तालुक्यात झाली. या योजनेत चांदवड तालुका राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, तरीही या तालुक्यातील काही भागांत पाणीसाठा आहे, तर काही भागांत अजिबात पाणी नाही. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे अनेक भागात पाणी पोहोचले; परंतु काही गावांमध्ये अद्यापही पाणीटंचाई आहे.

रस्त्यांच्या कामांवर भर

‘वसाका’च्या पुनर्वसनाकामी आमदार आहेरांनी पुढाकार घेतला आहे. तालुक्यात खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याच्या पार्श्वभूमीवर उमराणा येथे २ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत क्रीडा संकुल बांधले आहे. तालुक्यातील काही रस्ते राज्यात रोल मॉडेल ठरावेत असे आहेत. तिसगाव ते जोपूळ हा रस्ता ५० कोटी रुपये खर्च करून तयार केला आहे. चांदवड शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी ६७ कोटी रुपयांचा प्रकल्प मार्गी लागला आहे. चांदवड-निफाड मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, अनेक शेतकरी या भागातून आपला माल विक्रीसाठी नेत असतात. या ठिकाणचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने तो आमदार आहेरांनी आपल्या निधीतून तयार केला आहे. त्यासाठी तब्बल ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

डायलिसीस सेंटरची उभारणी

आरोग्याच्या सुविधा ग्रामीण भागात कमी असतात. मात्र, देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार आहेर यांच्या निधीतून डायलिसीस सेंटर तयार करण्यात आले आहे. त्याचा उपयोग परिसरालाच नव्हे, तर इतर तालुक्यांनाही होत आहे. राज्यात तालुक्याच्या ठिकाणी सर्वांत प्रथम डायलिसीस सेंटर सुरू करण्याचा मान आमदार आहेरांनी मिळविला आहे. रामेश्वर धरणाजवळ असलेल्या २० एकर जागेमध्ये अद्ययावत उद्यान तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे करमणुकीच्या साधनांची कमतरताही आमदारांनी भरून काढली आहे. तालुक्यातील नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून ते प्रसिद्ध झाले आहे.

नियोजित पूर्ण करण्याचे लक्ष्य

गेल्या तीन वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती कामे दोन वर्षांत मार्गी लावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यामध्ये प्रामुख्याने चांदवड-देवळा बस स्टॅँडची सुधारणा करणे, चांदवड हाय राइस कॅनॉल सर्वेक्षण करणे, चणकापूर आरबीसी वहन क्षमता वाढविणे, म्हसाड नाला पाणी सीआरबीसीमध्ये वळविणे, परसूल तलावाची उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. आमदार आहेर यांच्याकडे कामाचा उरक असून, विविध योजनाही त्यांच्याकडे आहेत.


मार्गी लावलेली कामे

-उर्ध्व गोदावरी प्रकल्पांना मान्यता ९१७ कोटी रुपये

-आयआरसी मॉडेलरोड तिसगाव-जोपूळ ५० कोटी रुपये

-चांदवड शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना ६७ कोटी रुपये

-चांदवड निफाड रस्ता ६७ कोटी रुपये

-रामेश्वर धरण येथे २० एकरांमध्ये अद्ययावत उद्यान

-नाबार्ड योजनेंतर्गत भऊर-खामखेडा उड्डाणपुलाचे काम ४ कोटी रुपये

-चांदवड व देवळा येथे आधुनिक वाचनालय ५० लाख व १ कोटी रुपये

-‘एमएमजेएसवाय’अंतर्गत ३५ कोटींची कामे

-नदी पुनरुज्जीवनअंतर्गत चांदवडला गोई नदीसाठी ४.६५ कोटी

-नदी पुनरुज्जीवनअंतर्गत देवळ्यात कोलती नदीसाठी ३.४५ कोटी

-चांदवड शहर नगरोत्थानमधून १२ कोटी रुपये

-उमराणा येथे तालुका क्रीडा संकुल २ कोटी रुपये

--

या प्रश्नांकडे दुर्लक्ष

मतदारसंघातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यटन या प्रश्नांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागापर्यंत आरोग्याच्या सुविधा मात्र कमी पोहोचल्या आहेत. तालुक्यातील गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या प्रमाणात सुविधा मिळायला हव्यात त्या प्रमाणात मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चांदवड तालुक्यात पर्यटन केंद्र होऊ शकते. या ठिकाणी रेणुका देवीच्या दर्शनाला राज्यातील अनेक भागातून भाविक येतात. परंतु, येथे मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या आहेत. या परिसराचा विकास होणे गरजेचे आहे. चांदवडमध्येच अहिल्यादेवी होळकर यांचा रंगमहाल आहे. या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. अनेक भागात अजूनही टँकर सुरू आहेत, तेथे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी.

--

विधिमंडळ कामकाजात सहभाग

विधिमंडळात विविध प्रश्नांवर डॉ. आहेर सातत्याने मत मांडत असतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत त्यांनी अभ्यासपूर्वक मतप्रदर्शन केले. त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते नागरिकांना सदैव उपलब्ध असतात. अनेक लोकांना त्यांनी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करवून दिल्या आहेत. लक्षवेधींद्वारे मतदारसंघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

--


आमदार म्हणतात...

इतर गावांचाही विकास

गेल्या तीन वर्षांत चांदवड आणि देवळा तालुक्यात झपाट्याने विकास झाला आहे. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. विकासकामे करताना परिसरातील इतर गावेही विकासाच्या प्रवाहात कशी येतील याचा साकल्याने विचार झाला आहे. आगामी पाच वर्षांत चांदवड आणि देवळा तालुका विकासात अग्रेसर असेल यात शंका नाही. काही दिवसांतच देवळा बस स्टॅँडचे काम सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्यांतील जलसिंचनाची कामे मार्गी लागणार आहेत.

-डॉ. राहुल आहेर, आमदार


--

विरोधक म्हणतात...

ठोस कामांची वानवा

भाजप-शिवसेना सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. मात्र, अजूनही ठोस कामे झालेली नाहीत. आमदार राहुल आहेर यांना करण्यासारखे खूप काम होते. परंतु, त्यांच्या कामाचा वेग व आवाका कमी आहे. चांदवड मतदारसंघात सर्वांत मोठा प्रश्न पाण्याचा आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी, तसेच शेतीसाठी पाणी नाही. त्यासाठी आमदारांनी विविध योजना अंमलात आणायला हव्या होत्या. काळडोह धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. जांबुटके धरणप्रश्नी आमदारांनी काहीही केलेले नाही.

-शिरीष कोतवाल, माजी आमदार

--

शब्दांकन ः फणिंद्र मंडलिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुजोर स्टेशन मास्तरांची रेल्वेकडून होणार चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तक्रारदार नागरिकांना उर्मट भाषेत उत्तर दिल्यामुळे निफाड रेल्वे स्टेशन मास्तरांना चांगलाच फटका बसला आहे. त्यांच्या अशा वर्तवणुकीमुळे खुद्द रेल्वेमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय गाजरे यांनी याबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार केली होती.

पिंपळगाव-निफाड मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे लाइनच्या निफाड स्टेशनच्या फाटकाजवळ दोन्ही बाजूने खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकांना वाहने चालवताना त्रास होतो. फाटकाच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतर रेल्वेच्या हद्दीत येते. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तक्षेप करता येत नाही. याबाबत संजय गाजरे यांनी निफाड रेल्वे स्टेशनला माहिती घेण्यासाठी फोन लावला. तो रिसिव्ह न झाल्याने त्यांनी स्टेशन मास्तर पी. आर. चौबे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. दुबे यांनी गाजरे यांच्यासह त्यांचा पक्ष आणि महाराष्ट्र सरकार यांचा, ‘तुमचा आमचा काय संबंध’ असा प्रतिप्रश्न करत उर्मट भाषा वापरली. त्यामुळे गाजरे यांनी www.pgportal.gov.in या संकेतस्थळावर त्यांची तक्रार नोंदवली.

गाजरे यांच्या तक्रारीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. भुसावळ विभागाचे प्रमुख ए. टी. धार्मिक दुबे यांची चौकशी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज सिझलर मेकिंग वर्कशॉप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. आज शनिवार (११ नोव्हेंबर) रोजी कल्चर क्लबतर्फे सिझलर मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पी. अँड टी. कॉलनी, त्र्यंबक रोड या ठिकाणी होणार आहे.

अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झालेला पदार्थ म्हणजे सिझलर. हॉटेलमध्ये मिळणारे सिझलर आपल्यालाही बनविता आले पाहिजे, असे अनेकांना वाटते. येत्या शनिवारी दुपारी तीन वाजता होणाऱ्या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्यांना सिझलरचे वेगवेगळे प्रकार शिकायला मिळणार आहेत. यात प्रामुख्याने चाट सिझलर, इटालियन सिझलर, मेक्सिकन सिझलर असे प्रकार शिकवले जाणार आहे. वंदना साधवानी या सिझलर्सचे विविध प्रकार शिकवणार आहेत. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मेंबरसाठी १०० रुपये, तर जे मेंबर नाहीत त्यांच्यासाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनच्या काळाबाजाराला बसला चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त धान्य वितरण प्रणालीमध्ये आलेली सुसूत्रता आणि पारदर्शकता यामुळे राज्यात तब्बल १२ लाख रेशन कार्डस् बोगस सापडले आहेत. ही सर्व कार्डस् रद्द करण्यात आली असून, या माध्यमातून होणारा रेशनचा सुमारे चार ते पाच हजार कोटींचा काळाबाजार थांबविण्यात यश असल्याचा दावा अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केला.

नाशिक विभागातील रेशन, मेडिकल आणि फार्मा कंपन्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या सुनावणीसाठी बापट नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या सुनावणीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की सरकारी गोदामांपासून ते स्वस्त धान्य दुकानांपर्यंत धान्य पोहोचविण्याच्या प्रक्रियेवर पुरवठा विभागाची नजर आहे. स्वस्त धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे.

या प्रणालीमुळे एकूणच धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येणार आहे. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने आता ऑनलाइन पद्धतीचा अधिकाधिक वापर सुरू केला असून, रेशन दुकानांवर किती प्रमाणात गहू, तांदूळ, रॉकेल आदींचा साठा आला, किती जणांना त्याचे वितरण झाले आणि किती साठा शिल्लक आहे याची माहिती ग्राहकांना घरबसल्या मिळू लागली आहे.

राज्यात ५२ हजार रेशन दुकानदार असून, आधार लिंकिंगचे ८७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती बापट यांनी दिली. अजूनही १३ टक्के आधार लिंकिंगचे काम प्रलंबित असून, ते पूर्ण झाले की मोठ्या प्रमाणावर बोगस रेशन कार्ड बाद होतील, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील अडचणी होणार दूर

जिल्ह्यात पॉईंट ऑफ सेल मशिन्समध्ये बिघाड होत असून, त्यामुळे धान्य वितरण प्रक्रियेत बाधा निर्माण होत असल्याच्या तक्रारी बैठकीत बापट यांच्याकडे करण्यात आल्या. चार कंपन्यांच्या माध्यमातून या मशिन्स वितरीत करण्यात आली असून, त्यापैकी एका कंपनीच्या मशिन्सला अडचणी आल्याच‌ी कबुली यावेळी बापट यांनी दिली. तेथे दुसऱ्या मशिन्स पुरविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी लवकरच पूर्णवेळ जिल्हा पुरवठा अधिकारी मिळेल, अशी ग्वाहीही बापट यांनी दिली.

मका खरेदीचा निर्णय

राज्यात हजारो क्व‌िंटल मका पडून आहे. त्याची पावडर होऊ नये, यासाठी हा मका रेशन दुकानदारांच्या माध्यमातून वितरीत करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. परंतु, बापट यांच्या या निर्णयाबाबत रेशन दुकानदार संघटनेने आक्षेप नोंदविला आहे. रेशन दुकानदारांकडून मका खरेदी करण्यास ग्राहकांचा तेवढा प्रतिसाद लाभणार नाही, अशी भीती संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी वर्तवली आहे.

सव्वा कोटी व्यवहार पॉस मशिनद्वारे

धान्य वितरण प्रणालीमध्ये सुधारणांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पॉस प्रणाली, वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवणे व संकेतस्थळाद्वारे या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण राखण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. यासाठी रेशन दुकानांना पॉस मशिनचा वापर बंधनकारक करण्यात येत आहे. राज्यभरातील रेशन दुकानांमधून महिन्याला दीड कोटी व्यवहार यातून व्हावे, असे उद्दिष्‍ट असून आतापर्यत एक कोटी १४ लाख व्यवहार पॉस मशिनचा वापर करून करण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. शासकिय स्वस्त धान्य दुकाने-परवानाधारक, औषध विक्री दुकानदार यांनी दाखल केलेल्या अपिलांपैकी अन्नधान्य वितरणाबाबत ४९ अपिलांवर व औषधे वितरणाबाबत १२ अशा एकूण ७० अपिलांवर यावेळी सुनावणी घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत गुटखा विक्री आणि साठेबाजी करणाऱ्यांना किमान दोन वर्षांची शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सुरू केले आहेत. विधी व न्याय विभागाकडे त्याबाबत पाठपुरावा सुरू असून, त्यांची मान्यता मिळताच पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली.

शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गुटखा साठेबाजीचे प्रकार अजूनही सुरू आहेत. अशा गुन्ह्यात सहा महिन्यांची शिक्षा असल्याने संशयितांना जामीनही मिळतो. असा गुन्हा अजामीनपात्र असावा आणि किमान दोन वर्षांची शिक्षा असावी यासाठी कायद्यात सुधारणेची गरज आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती बापट यांनी दिली. त्यासाठी काही कलमांमध्ये सुधारणा करण्याचे आम्ही

प्रस्तावित केल्याची माहिती त्यांनी दिली. हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला असून, त्यावर शिक्कामोर्तबत होताच शासनाची मान्यता घेण्यात येईल.

पेट्रोलपंपावरही ऑडिट

पेट्रोलपंपावर ऑडिट सिस्टिम आणण्यात येणार आहे. पंपास सील बसविण्यात येणार असून, त्यावर कंपनीचे अधिकारी, पंपचालक आणि दुरुस्ती करणारे अशी तिघांची स्वाक्षरी असेल. ते उघडल्यानंतर तिघांनाही याची माहिती मिळेल. त्यांच्याशिवाय सिल पुन्हा बसविता येणार नसल्याने पंपावर चोरीचे प्रकार थांबतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

केटरिंग नोंदणीची सक्ती

अन्नातून होणारी विषबाधा व तत्सम प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने काही उपायोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. केटरिंग व्यावसायिकांना आमच्या विभागाकडे नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे.

लॅबसाठी १३० कोटी

राज्यात विषबाधा व तत्सम प्रकरणात नमुने तपासणीसाठीच्या लॅब खूपच मर्यादित आहेत. त्या वाढविण्याची गरज असून, केंद्रानेही त्यासाठी १३० कोटींचा कार्यक्रम दिला आहे. सध्या काही प्रकरणांत नमुने राज्याबाहेर दिल्लीपर्यंतही पाठवावे लागतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकार सावंत यांना फ्रान्सचे प्रथम पारितोषिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या फ्रान्समध्ये सुप्रसिध्द चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना सर्वोत्तम चित्रकाराचे प्रथम पारितोषिक मिळाले. फ्रान्समधील बोरडॉक्स येथील इग्व‌िलून येथे नुकतेच हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. हे इंटरनॅशनल अॅवॉर्ड हे ‘प्रीक्स ड्यू काउन्स‌िल डिपार्टमेंट ऑफ फ्रान्स’ या शासकीय विभागातर्फे प्रदान करण्यात आले.

या इंटरनॅशनल अॅवॉर्डचे स्वरुप ५०० युरो व प्रमाणपत्र असे असून, फ्रान्सच्या डिपार्टमेंटल काउन्सिलचे अध्यक्ष प‌िरें स‌िमानी यांच्या हस्ते फ्रान्स इग्व‌िलून इंटरनॅशनल वॉटरकलर फेस्ट‌िव्हलच्या उद््घाटन समारंभात प्रफुल्ल सावंत यांना प्रदान करण्यात आले.

फ्रान्समधील या जागतिक आर्ट फेस्ट‌िव्हलसाठी एकूण १५ देशांतील निवडक ५५ चित्रकारांना निवड समितीने विशेष निमंत्रणे देऊन फ्रान्समध्ये पाचारण केले होते. यात इटली, रशिया, स्पेन, फ्रान्स, बेल्ज‌ियम, पेरू, पोर्तुगाल, रुमेनिया, कॅनडा, ग्रीस, तुर्की, सेर्बियासह, भारत या देशांचा समावेश होता. या फ्रान्स आर्ट फेस्ट‌िव्हलअंतर्गत झालेल्या जागतिक चित्र प्रदर्शनात वरील दिग्गज ५५ चित्रकारांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. सर्व चित्रकारांच्या चित्रांचे परीक्षण फ्रान्समधील ज्येष्ठ चित्रकारांच्या परीक्षक मंडळाने केले. त्यात मॉर्टिन जोल‌िट, जेन व‌िगू, जेनेव्ह‌िव्ह बोहेर यांच्यासह फ्रान्स मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या तीन सदस्यांचा परीक्षक मंडळात समावेश होता. चित्रकारांच्या वैविध्यपूर्ण चित्रशैली, जलरंगात विषय मांडण्याची चित्रकाराची प्रयोगश‌िलता, चित्ररसिकांचा प्रतिसाद, चित्रांची कलात्मक उंची व चित्रकाराचे आजपर्यंतचे जागतिक पातळीवरील कलाक्षेत्रातील योगदान इत्यादी निकषांच्या आधारे परीक्षण करण्यात आले होते.

फ्रान्स इंटरनॅशनल वॉटर कलर फेस्ट‌िव्हलमधून जागतिक तीन सर्वोत्कृष्ट चित्रकारांची निवड करण्यात आली. त्यात प्रफुल्ल सावंत व त्यांच्या कलाकृती निकषांवर उत्कृष्ट ठरल्या व परीक्षक मंडळाने एकमताने या वर्षाचा सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाचा जलरंग चित्रकाराचा सन्मान नाशिकच्या प्रफुल्ल सावंत यांना जाहीर केला. जागतिक द्वितीय क्रमांक रोमानियाचे चित्रकार डार्गन तागोव‌िस्टे तर तृतीय क्रमांक इटलीचे चित्रकार रोबेटो कारेनी यांना जाहीर करण्यात आला. जागतिक फ्रान्स चित्रप्रदर्शनात प्रफुल्ल सावंत यांची विविध देशांतील सौंदर्यस्थळांवर आधारित निसर्गचित्रे निवडण्यात आली होती. त्यात इटली, चीनसह भारतातील जोधपूर, नाशिकच्या स्थळांवर आधारित निसर्गचित्रांचा समावेश होता. या सर्व चित्रांनी फ्रान्समधील सर्व रसिकांची, चित्रकारांची, समीक्षकांची मने जिंकली. फ्रान्समधील ‘सुड वेस्ट न्यूज पेपर’, ‘ले रिपब्ल‌िकन’ या वृत्तपत्रांनी प्रफुल्ल सावंत यांच्यावर स्पेशल फिचर्स करून त्यांच्या कलेची दखल घेत भारतीय चित्रकाराला वेगळा सन्मान दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राणे येणार अन् सरकारही टिकणार

$
0
0

संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांची स्पष्टोक्ती

म. टा. प्रत‌निधी, नाशिक

राज्यात युतीचे सरकार अगदी स्थ‌रि असून, काळजी करण्याची गरज नाही. नारायण राणे मंत्रिमंडळात येतील आणि सरकारही आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये व्यक्त केला. मनासारखे झाले नाही की मित्रपक्षांकडून नाराजी व्यक्त होणे स्वाभाविक आहे, असे सांगत, कुणी आला गेल्याचा फरक पडत नाही, असा टोलाही बापट यांनी नाशिकमध्ये लगावला.

आपल्या खात्याशी निगडीत प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी बापट नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांसारखे वागत आहे. त्यामुळे राज्य सरकार अस्थ‌रि असल्याचे चित्र वारंवार निर्माण झाले आहे. शिवसेनेने अनेकवेळा सत्तेतून बाहेर पडण्याचे इशारे दिले. मात्र नुकतीच सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट आणि या भेटीनंतर सेना सत्तेत समाधानी नसल्याचे पवार यांचे वक्तव्य यामुळे पुन्हा सरकार राहणार की जाणार याबाबत तर्कवितर्क लावणे सुरू झाले. या सर्व पार्श्वभूमीवर बापट म्हणाले, की आमच्या सरकारने निवडणुकीपूर्वी जो जाहीरनामा दिला, त्यानुसार कामे सुरू आहेत. त्यामुळे जनतेचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. कुणी आले गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोला बापट यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आम्ही मंत्री करणार आहोत. परंतु, राणे यांना कोणते खाते मिळणार यावर बोलणे बापट यांनी टाळले. मनासारखे झाले नाही की मित्रपक्षात नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा होत असते, अशी माहितीही त्यांनी दिली. उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत उध्दव यांनाच विचारा असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. सेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन तयार आहेत, याकडे बापट यांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र त्यांच्या खिशात काय आहे हे आपल्याला कसे माहीत असणार असा सवाल बापट यांनी उपस्थ‌ति केला.

गत सरकारवर डागली तोफ

काँग्रेस आघाडीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना १८ महिन्यांनी मिळाला. आमच्या सरकारने त्याहून कितीतरी आधी कर्जमाफीचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. फालतू लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून थोडा विलंब लागतो आहे. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे सिंचनक्षेत्र वाढले आहे. त्यामुळे गत सरकारच्या काळात ३०० कोटींवर गेलेला टँकरचा खर्च आम्ही ४९ कोटींवर आणल्याचा दावा करीत बापट यांनी गत सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्रीच घेतील खडसेंचा निर्णय

एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होणार का? याबाबत बापट यांना विचारणा करण्यात आली. कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ समिती आणि मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे खडसे यांच्याबाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील, असे बापट यांनी स्पष्ट केले. खडसे यांनी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते निर्दोष सिध्द होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खडसेंवर अन्याय होणार नाही असे सांगत त्यांनी याबाबत अधिक भाष्य करणे टाळले. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधा केंद्रांवर वॉच?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांना ऑनलाइन सुविधा देण्यासाठी महापालिकेने येस बँकेच्या सहकार्याने सुरू केलेल्या २२ नागरी ई-सुविधा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या नागरी सुविधा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी १२ लाखांचा खर्च केला जाणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर सत्ताधारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

महापालिकेने नागरिकांना विविध नागरी सुविधा देण्याासाठी २२ ठिकाणी नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये जवळपास ४५ नागरी सुविधा दिल्या जात आहेत. नागरिकांना नागरी सुविधा केंद्रांमुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले व परवानग्या उपलब्ध होत आहेत. त्यात काही दाखले ऑनलाइनही घरपोच घेता येत आहेत. या योजनेनुसार जन्म, मृत्यू, मालमत्ता कर, विवाह प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण दाखला, विभागीय दाखला, जोता, बांधकाम वापर परवाना, नळजोडणी, मलवाहिनी जोडणी, मालमत्ता कर भरणा, विविध कर वसुली, डॉग लायसन्स, भोगवटा प्रमाणपत्र, अग्निशमन दल परवाने, हॉस्प‌िटल्स नूतनीकरण आदी दाखले महापालिकेकडून आता नागरिकांना घरबसल्या दिले जात आहेत. येस बँकेच्या सहकार्याने ही सेवा दिली जात आहे.

---

गैरप्रकारांच्या घटनांमुळे निर्णय

शहरातील २२ ठिकाणच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या केंद्रांत गैरप्रकारांच्या घटना मध्यंतरी घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर २२ ठिकाणी सीसीटीव्ही केंद्रे लावण्यासाठी १२ लाखांचा खर्च केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत ठेवण्यात आला आहे. ही केंद्रे सध्या येस बँकेतर्फे चालविली जात आहेत. त्यामुळे महापालिकेने खर्च का करावा, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जाऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौन खनिज वाहतूक कारवायांना ‘ब्रेक’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या गौन खनिज विभागाकडे सुस्थितीतील सरकारी वाहनच नसल्याने अवैध गौन खनिज वाहतुकीवरील कारवाईला ब्रेक लागला आहे. त्यामुळे अवैध गौन खनिज वाहतुकीला अभय मिळत असून सरकारच्या महसुलावरही पाणी सोडावे लागत आहे.

अवैध गौन खनिज वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या वडनेर दुमाला येथील तलाठ्यावर गत आठवड्यात भाभानगर परिसरात जीवघेणा हल्ला झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या तलाठी संघटनेने गौन खनिज विभागाच्या पथकाच्या मदतीशिवाय अवैध वाहतुकीवर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे जिल्ह्यातील वाळू ठेक्यांच्या इ-ऑक्शन प्रक्रियेकडे गौन खनिज वाहतुकदार पाठ फिरवित आहे. मात्र, जिल्ह्यात सर्रास गौन खनिजांची वाहतूक सुरू असल्याच्या प्रकारांना तलाठी हल्ल्याच्या घटनेमुळे पुष्ठीच मिळाली आहे. गौन खनिज विभागाकडूनही अशा अवैध वाहतुकीवरील कारवाया थंडावल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहे. बेकायदेशीर गौन खनिज वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाळू माफियांकडून लक्ष केले जात असल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. महसूल विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्लेही झाले आहेत. अशा घटनांमुळे महसूल कर्मचारी संघटनांनी अवैध वाहतुकीवर कारवाईच न करण्याचा निर्णय घेतला होता.

पथकासाठीचे वाहन नादुरुस्त असून ते अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच धुळखात उभे आहे. त्यामुळे अवैध गौन खनिज वाहतुकीवरील कारवायांनाच ब्रेक लागला आहे. कारवायांसाठी जिल्ह्याच्या अनेक भागांत जावे लागते. त्यामुळे सुस्थितील वाहन असणेच आवश्यक आहे. परंतु, हे वाहन कोणी उपलब्ध करून द्यावयाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणारा गौन खनिज विभाग काही लाखांच्या वाहनासाठी प्रतिक्षेत आहे.

संयुक्त पथक सुस्तावले

तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या आदेशानुसार अशा कारवायांसाठी सर्वसमावेशक संयुक्त पथकाची स्थापना केली. महसूल विभाग, पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. या पथकासाठी गौन खनिज विभागाचे वाहन वापरण्यात आले. या वाहनासाठी महसूल विभागाकडून इंधन पुरविण्यात येते. परंतु, तत्कालीन जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि गौन खनिज अधिकारी बदलून गेल्यानंतर हे पथकही काहीसे सुस्तावले.

वाळूमाफियांचं चांगभलं!

अवैध गौन खनिज वाहतुकीवर तहसीलदार स्तरावर थोड्या फार प्रमाणात कारवाया होत असतात. परंतु, गेल्या अनेक दिवसांत अवैध गौन खनिज वाहतुकीवर कारवाईची मोठी मोहीमच झालेली नाही. अशा कारवायांबाबत जिल्हा प्रशासन उदासीन आहे. याचा फायदा वाळू माफियांना होत असून सरकारचा मात्र मोठा महसूल बुडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदुरमध्यमेश्वरची माहिती येणार अॅपवर

$
0
0


सुनील कुमावत, निफाड

हिवाळ्यात देश विदेशातील पक्ष्यांची मांदियाळीने भरलेले पक्षीप्रेमींचे आवडते तीर्थक्षेत्र नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य आता अधिक ‘स्मार्ट’ झाले आहे. या उभयारण्याची संपूर्ण माहिती मोबाइल अॅपवर उपलब्ध होणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफर प्रवीण दौंड यांनी हे अॅप डिझाइन केले आहे. वने व पर्यावरण मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्या हस्ते या अॅपचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे दौंड यांनी सांगितले.

२४२ प्रकारचे देश विदेशातील पक्षांचा अधिवास नांदुरमध्यमेश्वरच्या पाणवठ्यावर मुक्त विहार करीत असतात. पहाटेपासूनच पक्षीप्रेमींची वर्दळ सध्या पक्षीनिरीक्षणासाठी इथे पाहायला मिळतात. आहे. या विविध आकार, रंग, उंची आणि वैशिष्ट्ये असणाऱ्या पक्षांचे मधुर गुंजन आता अॅप माध्यमातही तयार केले आहे. अॅप तयार करणाऱ्या प्रवीण दौंड यांनी यापूर्वी २०१३ मध्ये त्यांना असलेल्या पक्षीप्रेमामुळे वेबसाइट (संकेतस्थळ) देखील सुरू केले आहे. राज्यासह देशभरातील पक्षीप्रेमी व हौशी पर्यटकांनी या वेबसाइटला भेट देऊन प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

दौंड म्हणाले की नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यच्या निसर्गरम्य परिसरातच निसर्ग वाचवाचे बाळकडू मला मिळत गेले. वडील वनविभागात अधिकारी असल्याने, नांदुरमध्यमेश्वर, संजय गांधी नॅशनल पार्क सोबतच महाराष्ट्रातील इतर अभयारण्य बघता आले. निसर्गाने मुक्तहाताने दिलेले वरदान नांदूरमध्यमेश्वरला मिळाले असतानाही पर्यटकांची ओढ हवी तशी इथे नाही. गुगल वर सर्च केले असता फारच थोडी माहिती नांदुरमध्यमेश्वर विषयी उपलब्ध होती. दौंड यांनी तयार केलेल्या www.nandurmadmeshwar. Com या संकेतस्थळावर नांदुरमध्यमेश्वर बद्दलची सर्व माहिती पुरविण्यात आली आहे. गुगल मॅपवर नांदुरमध्यमेश्वर येथील सर्व प्रेक्षणीय स्थळे दाखविली आहेत. गेट, निसर्ग माहिती केंद्र धरण क्षेत्र, मंदिरे, गेस्ट हाऊस, शुल्क आकारणी वगैरे माहिती यावर पुरविण्यात आली. वेबसाइटनंतर दौंड यांनी अॅप तयार करून त्यात वेबसाइटवरील महितीसोबतच अभयारण्यात काढलेले पक्ष्यांचे २४२ जातींचे फोटो, त्यांची माहिती माहिती आहे.

गेल्या वर्षी २६ हजार पक्षीप्रेमींनी या संकेतस्थळाला भेट दिली. पर्यटकांचा प्रतिसाद मिळायला लागला आहे. ते कधी माहिती विचारतात, तर कधी सूचनाही करतात. आता त्यांना या अॅपचाही फायदा होईल.- प्रवीण दौंड,

वाईल्डलाईफ फोटोग्राफर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदपत्रांसाठी धावाधाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. उमेदवारी अर्जांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुकांची धावपळ उडाली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकृतीचा कालावधी अत्यंत कमी आहे. १६ नोव्हेंबर पासून ते २२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे विद्यमानांसह इच्छुकांमध्ये मोठी चुरस दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. १० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही नगरपरिषदांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकांसाठी ऑनलाइन रज‌स्टिेशन करावयाचे असल्याने उमेदवारांकडे खूपच कमी वेळ आहे. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी आदर्श आचार संहिता राबविण्यासाठी नगरपालिका सभागृहात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावैळी चौरे यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. बैठकीस इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थकांनी गर्दी केली होती. राजकीय पक्षांच्या उमेदवारी सोबतच अपक्ष लढणाऱ्यांची संख्या यावेळेस लक्षणिय असेल, असे सध्याच्या वातावरणावरून दिसत आहे.

नागरिकांमधून थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण १७ सदस्यांचे ६ प्रभाग आहेत. यामध्ये नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे. शहराची मतदार संख्या १०६१४ इतकी आहे. यापूर्वी २००२ मध्ये थेट नगराध्यक्ष निवड झाली होती. तेव्हा देखील बहुसदस्य प्रभाग पद्धत होती. यंदा ही निवडणूक लढविणारे इच्छुक गेल्या वर्षभरापासून तयारीत आहेत.

बैठकीत निरुत्साह

इगतपुरी ः इगतपुरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत आचारसंहिता बैठकीला अवघे ४ राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे यांनी आदर्श आचारसंहितेविषयी मार्गदर्शन केले. या बैठकीला १२ पत्रकारांसह फक्त ४ राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून पालिकेसाठी इच्छुक पक्षश्रेष्ठींकडे संपर्क साधात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव तालुक्यातील १६ शिवार ‘जलयुक्त’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि पावसाचा लहरीपणा यामुळे तालुक्यात सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेने तालुक्यातील गावांचे हे पाण्याचे दूर्भिक्षक मिटले आहे. सन २०१५-१६ मध्ये तालुक्यातील एकूण १६ गावांमध्ये जलयुक्तची एकूण ७३२ कामे पूर्ण झाली असून, या गावांची पाण्याची गरज पूर्ण करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामांची दखल शासनाने घेतली असून, जलयुक्तचा जिल्हास्तरीय पुरस्कार तालुक्यास जाहीर झाला आहे. पुरस्कारार्थी गावात तालुक्यातील गाळणेचा देखील समावेश आहे.

शनिवारी धुळे येथे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तालुक्यात सरासरी ४८० मिमी इतके पर्जन्यमान असल्याने पाण्याची उपलब्धता वाढावी यासाठी जलयुक्त शिवार अभियाअंतर्गत निवडण्यात आलेल्या १६ गावांमध्ये कृषी, लघु पाटबंधारे, लघुसिंचन, वनविभाग, सामाजिक वनीकरण या शासनाच्या विभागांनी एकत्रितपणे सुमारे १५ कोटीची ७३२ कामे पूर्ण केली. शासनाच्या योजना व लोकासाभागातून ही कामे पूर्णत्वास आली. १६ गावे जलयुक्त झाली आहेत. याचा शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. एकूण २१८ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन मिळाले आहे.

गाळणे ठरले मानकरी

जलयुक्तच्या पुरस्कारात तालुक्यातील गाळणे गाव देखील पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सन २०१५ १६ वर्षात कोरडवाहू शेती विकास अभियान निकषानुसार या गावाची जलयुक्तसाठी निवड करण्यात आली होती. कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असलेल्या गाळणेगावाचे चित्र पालटले असून, ते पाणीदार गाव झाले आहे.

कृषी विभागाची आघाडी

तालुक्यात तसेच पुरस्कारप्राप्त गाळणे गावात देखील जलयुक्तच्या कामे करण्यात येथील कृषी विभागाने आघाडी घेतली आहे. तालूक्यातील एकूण ७३२ कामांपैकी ३७३ कामे तर गाळणे येथील ९१ पैकी ५५ कामे ही कृषी विभागाकडून करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला एक खून करायचाय: राज ठाकरे

$
0
0

म.टा.खास प्रतिनिधी । नाशिक

'मोबाइल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे राज्यातील तरुणांची खरी ताकद वाया जात आहे. मला कोणी भेटायला आले तर तो कामाऐवजी पहिले सेल्फी किंवा फोटो काढण्याची विनंती करतो. लोक बोलायचं सोडून फोटोच काढत बसतात. या साऱ्या प्रकाराला मी वैतागलोय. मी आता राष्ट्रपतींची भेट घेऊन मला एक खून माफ करा अशी विनंती करणार आहे. हा खून मोबाइल कॅमेरा बनवणाऱ्याचा असेल,' असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

नाशिकमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना माध्यमांचा जपून वापर करण्याचा सल्ला देताना राज यांनी हे वक्तव्य केलं. राज ठाकरे यांनी आज बंद सभागृहात आपल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहिला निशाना साधला तो, मोबाइल व फोटो काढणाऱ्या आणि सेल्फी घेणाऱ्यांवर. आपल्या भाषणाची सुरुवातच ठाकरेंनी मोबाइल व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणाऱ्या नुकसानीचा दाखला देत केली. 'मी जिथं जातो, तिथं मला कोणी भेटायला आला की पहिला माझ्यासोबत फोटो काढेल, नाहीतर सेल्फी घेईल. अशानं तरुणांची शक्ती वाया जात आहे. मला याचा वैताग आला असून आता मी राष्ट्रपतींचीच भेट घेणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगताच, ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु त्यांनी मी राष्ट्रपतींकडे जाऊन मला एक खून माफ करा, अशी विनंती करणार असल्याचे सांगितल्यावर कार्यकर्ते व पदाधिकारी चकीत झाले. हा खून मी मोबाइलचा कॅमेरा बनवणाऱ्या व्यक्तीचा करणार असल्याचं त्यांनी सांगताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ पसरला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा रोख समजताच त्यांनी स्वत:जवळचे मोबाइल आतमध्ये ठेवले. 'मी बाहेर निघताना कोणीही फोटो काढायला आणि सेल्फी घ्यायला येऊ नका, असा दमही त्यांनी भरला. त्यामुळं त्यांना बैठकीतून सहज बाहेर पडता आले.

माझी खरी ताकद रस्त्यावर

मनसेची खरी ताकद ही रस्त्यावर असल्याचे सांगत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. पक्ष सोडून गेलेल्यांना परत घ्यायला मनसे काय होडी आहे काय असा सवाल त्यांनी केला. ज्यांना पक्षात पुन्हा यायचं आहे, त्यांना पहिल्या पायरीपासून काम करावं लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तची कामे जूनअखेर पूर्ण करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असल्याने या उपक्रमातील २०१७-१८ या वर्षातील सर्व कामे जून, २०१८ अखेर पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण व राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियानाची नाशिक विभागीय आढावा बैठक शनिवारी सकाळी धुळे शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, उज्ज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार डी. एस. अहिरे, आमदार उन्मेश पाटील, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, ए. ए. महाजन, किशोरराजे निंबाळकर, राधाकृष्णन बी. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी तसेच विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेसह संबंधित विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातंर्गत निवड झालेल्या गावांत वॉटर बजेटनुसार नियोजन करावे. या अभियानातील कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. अभियानातील कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी वेळोवेळी पाहणी करावी. तसेच शिल्लक कामे तत्काळ सुरू करावीत. जिओ टॅगिंगची कामे शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करावीत, असेही निर्देश मंत्री प्रा. शिंदे यांनी दिले.

जलयुक्त अभियान हे दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरत असल्याने यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या निधीचा काटेकोरपणे शासन निर्णयानुसार अवलंब करावा. विभागातील प्रत्येक जिल्ह्याने हा निधी तातडीने उपलब्ध करुन मार्चपर्यंत कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही मंत्री प्रा. शिंदे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. एकनाथ डवले म्हणाले, या अभियानात वॉटर बजेटनुसार गावांची निवड करावी. या अभियानाच्या माध्यमातून निवड झालेले गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, असे नियोजन करावे. २०१७-१८ चा आराखडा राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांगलादेशातील द्राक्ष निर्यात घटली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतातून सर्वाधिक द्राक्षाची निर्यात बांगलादेशमध्ये होत होती. पण द्राक्षांच्या निर्यातीवर बांगलादेशमध्ये १०० टक्के इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे. हा कर लावल्यामुळे द्राक्षाची निर्यात घटली. त्यामुळे केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची मागणी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.

राज्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभ्या केलेल्या एक हजाराहून फार्मर्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय कृषी खात्याचे सचिव एस. के. पटनायक यांच्याबरोबर शुक्रवारी सह्याद्री अॅग्रो फार्म येथे झाली. यावेळी या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीसमोरील अनेक प्रश्न मांडले. त्याला कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

२ ऑक्टोबरला मोहाडी येथील सह्याद्री फार्मला शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यानंतर येथील प्रश्न समजून त्यांनी कृषी सचिवांना भेटीचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर ही भेट व चर्चा शनिवारी झाली. यावेळी विविध भागातून आलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी निर्यात, मार्केटींग, बँकिंग, भांडवल व सरकारच्या धोरणाबाबत चर्चा केली. त्याला केंद्रीय स्तरावरुन मदत करणार असल्याचे यावेळी पटनायक यांनी सांगितले. सरकारने ऑनलाईन खरेदी-विक्री करता सोयी उपलब्ध करुन देणे, कृषी खात्याशी संबंधित असलेल्या मंडळात समन्वय असणे, पणन मंडळाच्या सवलतीचा वापर शेतकरी उत्पादक कंपनीना करता यावा. त्याचप्रमाणे हमी भावाची योजना या कंपनीमार्फत राबवावी याविषयावरही येथे चर्चा झाली. या चर्चासत्रात व्यासपीठावर विनायकदादा पाटील, माजी आमदार दिलीप बनकर, सह्याद्री फार्मचे संस्थापक अध्यक्ष विलास शिेंदे उपस्थित होते. या चर्चासत्राचे सुत्रसंचालन रामेतीचे प्राचार्य सुनील वानखेडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत उबदार कपड्यांच्या खरेदीत वाढ

$
0
0

थंडीत वाढ झाल्याने नागरिकांचा प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली शहराचे तापमान दिवसेंदिवस खाली येत असल्याने थंडीत वाढ झालेली आहे. वाढत जाणाऱ्या थंडीमुळे नागरिकांमधून उबदार कपड्यांची मागणी वाढली असून, हिमाचल प्रदेशातून आलेल्या व्यापाऱ्यांसह वूलन गारमेंटस्‌च्या दुकानांत गर्दी वाढली सर्वसामान्य नागरिक 'स्ट्रीट खरेदी'चा पर्याय निवडत असल्याचे दिसून येते आहे. ब्लॅन्केट, शाल, स्वेटर, कानटोप्या, हातमोजे, पायमोजे, मफलर यांच्यासह नवीन चादरी, रजई इत्यादींसारख्या वस्तूंच्या खरेदीत वाढ झाली आहे. तर युवा वर्ग रस्त्याच्या कडेला विक्री करण्यात येणाऱ्या जरकीन्स खरेदीला पसंती देत आहे.

देवळालीसह नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जनजीवनावर होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पारा १० अंशांवर येऊन ठेपला आहे. हे तापमान यावर्षी अधिक झालेल्या पावसामुळे आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. दररोजच तापमान घसरत असल्याने नागरिक उबदार कपडे परिधान करू लागले आहेत.

गल्लीबोळात शेकोट्या पेटल्या

गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी वाढली असून, यामुळे रात्रीच्या वेळी नऊ वाजेच्या सुमारास शहरातील व्यावसायिक घराकडे परतत असल्याने मार्केटमध्ये गर्दी कमी होत आहे. रात्री दहा वाजेच्या नंतर शहरातील मुख्य रस्त्यावर फार कमी प्रमाणात नागरिकांची वर्दळ दिसत आहे. सध्या बोचरी थंडी पडत असल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे. गल्लीबोळातून शेकोट्या पेटविल्या जात असल्याचे दिसत आहे. सर्वजण सायंकाळीच बाहेर पडत असताना अंगात स्वेटर, डोक्‍याला टोपी, मफलर लपेटून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणारे नागरिक, शाळेला जाणारे विद्यार्थीही उबदार कपडे घालत असल्याचे दिसत आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून थंडी वाढली असल्याने उबदार कपडे घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. दिवसातून किमान दहा ते बारा ग्राहक स्वेटर खरेदी करण्यासाठी येत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीचे स्वेटर ठेवावे लागत आहेत.

- भूषण आडके, वूलन व्यावसायिक

दिवसेंदिवस थंडी वाढत असल्याने उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडावे लागत आहे. थंडीचा जरी त्रास वाटत असला तरी थंडी मात्र हवीहवीशी वाटते. ऐन सकाळी कॉलेजला जाताना स्वेटर घालूनच बाहेर पडावे लागते.

- सुरज मोंढे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images