Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘खाविआ’च्या भूमिकेसाठी पवारांची भेट निर्णायक

$
0
0
लोकसभा निवडणुकीत भाजपाला मदत करावी की राष्ट्रवादी काँग्रेसला, याबाबत खान्देश विकास आघाडीची (खाविआ)ची भूमिका अद्याप तळ्यात-मळ्यातच आहे. मात्र ‘खाविआ’च्या नगरसेवकांची ‘राष्ट्रवादी’चे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत होणारी भेट या दृष्टीने निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

कोण होतास तू, काय झालास तू!

$
0
0
इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. शिवसेनेचे आमदार बबन घोलप हे एका वेगळ्या अर्थाने इतिहास घडविण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने लोकसभेची उमेदवारी तसेच आमदारकीही गमवावी लागल्याने सैरभैर झालेल्या घोलपांनी १९९९ चा फंडा वापरायचा ठरविलेला दिसतो.

आणखी दोन विमान कंपन्या इच्छूक?

$
0
0
जेट एअरवेज या कंपनीने नाशिक विमानतळाची चाचपणी केल्यानंतर अन्य दोन कंपन्यांनीही रस दाखविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एचएएलने हैदराबादच्या एअर शोमध्ये दिलेल्या माहितीनुसारच विमान कंपन्या नाशिककडे आकृष्ट झाल्या आहेत.

ब्रॉडबँडची समस्या संपणार?

$
0
0
शहरातील १४ ठिकाणी ब्रॉडबँडसाठी नकार घंटा वाजविणाऱ्या बीएसएनएलला अखेर केबल प्राप्त होत असून यातील ७ ठिकाणी ब्रॉडबँड देण्यासाठी बीएसएनएलने होकार दर्शविला आहे.

उमेदवारांचे ‘ओह माय गॉड’!

$
0
0
राजसत्ता आणि धर्मसत्ता नेहमी हातात हात घालून चालतात, हा इतिहास आणि वर्तमानही आहे. त्यामुळे बहुतांश बाबा, महाराज, बापूंचा राजकारणी लोकांवर पगडा असतो. आजकाल प्रत्येक महाराजांचा स्वतंत्र संप्रदाय निर्माण झाला असून, त्यांचे लाखो अनुयायी आहेत.

बीएसएनएलचे ४ जी २०१५ अखेरीस

$
0
0
भारत संचार निगम लिमिटेडद्वारे (बीएसएनएल) संपूर्ण महाराष्ट्रात पुढील वर्षा अखेरीपर्यंत मोबाइलवर ४ जीची सेवा दिली जाईल, अशी माहिती मुख्य महाप्रबंधक आनंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी ते नाशिक दौऱ्यावर होते.

शांतता, इलेक्शन चालू आहे!

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख महिनाभरावर आल्याने मतदारसंघातून उमेदवारी करणाऱ्या पक्षांची संपर्क कार्यालये कार्यकर्त्यांनी गजबजू लागली आहेत. मात्र, उमेदवारी करणाऱ्या पक्षांच्या मित्रपक्षात अद्यापही शांतता असल्याचे दिसते. खासकरून काँग्रेससह भाजपच्या संपर्क कार्यालयात तुरळक गर्दी आहे.

जलसंपदाच्या आडमुठेपणाचा कॅम्पवासियांना फटका

$
0
0
देवळाली कॅटोन्मेंट बोर्डाने प्रत्यक्ष वापरलेल्या पाण्याचे पैसे अदा केल्यानंतरही जलसंपदा विभाग पाणी सोडत नसल्याने देवळाली कॅम्पचे ५४ हजार नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. लष्करासारख्या महत्त्वाच्या घटकालाही याची झळ बसलेली आहे.

हॉटेलमध्ये हाणामारी, ३ ठार

$
0
0
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे आरती हॉटेलमध्ये काल (बुधवारी) रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि हॉटेल मालकासह तीनजणांचा मृत्यू झाला.

सावधान ! बायपोलर फोफावतोय

$
0
0
अचानक झालेला वागण्या-बोलण्यातील बदल, सतत खाली मान घालून शांत बसणे, निश्चल व अवती-भोवती काय चालू आहे याचे काहीच देणे-घेणे नसणे, तीन-चारदा विचारूनही प्रतिसाद न देणे, अतिउत्साह किंवा औदासिन्य हे दोन्ही लक्षणे दिसणे, म्लान आणि डोळयांभोवती काळी वर्तुळे तयार होणे ही लक्षणे दिसायला लागली की माणूस डिप्रेशनचा बळी पडतो अन् बायपोलर डिसॉर्डरच्या दिशेने जाऊ लागतो.

भाववाढीमुळे मसाला झाला अधिक तिखट

$
0
0
अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे खोळंबलेले शेवया, कुरडई, मसाला, वडे बनविण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. मात्र, गारपिटीची फटका बसल्याने ग्रामीण भागात या पदार्थांच्या कच्चा मालाच्या खरेदीवर काटकसर केली जात असल्याचे दिसून येत आहे.

नुकसानभरपाई द्या

$
0
0
शासनाने नुकसानग्रस्त सर्वच शेती पिकांचे तातडीने पंचनामे करून लागवड क्षेत्रासाठी उत्पादन खर्चावर आधारित नुकसान भरपाई द्यावी, सर्व शेतकऱ्यांना वीजबिल माफी मिळावी, अशी मागणी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे.

तळवाडे येथील शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

$
0
0
तालुक्यातील तळवाडे परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे कृषी विभागाकडून पंचनामे होऊनही तळवाडे गाव गारपिटीतून वगळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

पाणीटंचाई आराखड्यात ७८ गावे अन् ३७ वाड्या

$
0
0
मार्चच्या प्रारंभपासूनच येवला तालुक्यातील चिचोंडी गावाला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. विशेष म्हणजे चिचोंडी गावचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होवून वीस दिवस उलटले तरी अद्याप गावाला टँकर सुरू झालेला नाही.

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा

$
0
0
कारसूळ (ता. निफाड) येथील परिसरात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तीन वेळेस अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्षासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, महसूल विभागाने या भागातील नुकसानग्रस्त सुमारे पाचशे ते सातशे शेतकऱ्यांच्या पिकांचे अद्यापही पंचनामे केलेले नाहीत.

दारूने घेतला तिघांचा बळी

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाट्याजवळ नाशिक-बलसाड मार्गावरील हॉटेल आरती येथे बुधवारी रात्री ग्राहक व हॉटेल कामगारांची किरकोळ कारणावरून हाणामारीचे वादात रुपांतर झाल्याने तिघांना प्राण गमवावे लागले.

नाशिकला स्मार्ट सिटी बनवणार

$
0
0
सुशिक्षित लोकांनी केवळ राजकारणाच्या गप्पा मारण्यापेक्षा थेट राजकारणात येऊन बदल घडवला पाहिजे या राज ठाकरेंच्या विचाराला साद देत आपण या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी सांगितले.

परिवर्तनाची लाट नाशिकमध्येही आणा

$
0
0
देशात परिवर्तनाची लाट आहे. नाशिकमध्येही ती आणा. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख अजय बोरस्ते यांनी केले. नाशिकरोड येथील पाटीदार भवनमध्ये महायुतीचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

सत्य‌जितराजेंची बंडखोरी, भामरेंसाठी डोकेदुखी

$
0
0
काँग्रेसचे सत्यजितसिंहराजे गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार अमरीश पटेल यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करून बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली असली तरी मराठा फॅक्टरमुळे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनाच मारक ठरणार असल्याचे चित्र आहे.

गर्दीत दर्दी नाही

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या जाहीर प्रचार सभांनी नाशिकच्या निवडणूक वातावरणाचा दणक्यात शुभारंभ झाला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images