Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मोबाइल टॉवर सांगणार पार्किंग, स्नानाचे ठिकाण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मोबाइल कंपन्यांच्या मदतीने आता त्यांचे पार्किंगस्थळ आणि स्नानाचे ठिकाणही सांगितले जाणार आहे. कुंभथॉन उपक्रमांतर्गत शहरातील मोबाइल टॉवर्सवर पिंग नेटवर्क बसविले जाणार आहे. त्यामुळे शहराबाहेरून येणाऱ्यांच्या मोबाइलची नोंदणी होणार असून, त्यांना त्यांच्या इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी व्यवस्था या नेटवर्ककडूनच केले जाणार आहे. त्यामुळे गर्दीच नियोजन होईल असा दावा केला जात आहे.

कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कुंभमेळ्यात किती भाविक येतील, याची नोंदही मोबाइल टॉवरद्वारेच केली जाणार आहे. आता भाविकांची संख्या नोंदण्यासह त्यांना आपल्या इच्छितस्थळी पोहचण्यासाठीसुद्धा मोबाइल कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी पिंग या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. साधूमंहत असो वा सामान्य भाविक, प्रत्येकाजवळ संपर्कासाठी मोबाइल असल्याने शहरात दाखल होणाऱ्यांचा मोबाइल क्रमांक पिंगच्या नेटवर्मध्ये आल्यावर आपोआप नोंदविला जाणार आहे. नोंदणी होताच, संबंधित भाविक ज्या मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये असेल त्याला कोणत्या ठिकाणी वाहन पार्किंग करायचे आणि कोणत्या घाटावर स्नानासाठी जायचे याचाही मॅसेज पाठविला जाणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजनही सोपे जाणार आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवलेंच्या अध्यक्षतेखाली सर्व मोबाईल कंपन्याची एक बैठक झाली असून, त्यात भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी पिंगचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.

भाविकांची संख्या समजणार

कुंभथॉनच्या माध्यमातून स्वतंत्र पिंग नेटवर्क तयार करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या काळात पिंग शहरातील सर्व टॉवर्सवर बसविले जाणार आहे. शहराबाहेरुन येणाऱ्या भाविकाजवळ मोबाइल असेल, त्याची नोंदणी नेटवर्कवर होईल. नोंदणी होताच तो जर पुण्याकडून येणारा भाविक असेल तर त्याला दसकपंचकच्या घाटाकडे जाण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात जवळपास प्रत्येकाकडे मोबाइल असल्याने शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची आपोआपच नोंदणी होणार आहे. दररोज किती भाविक नाशिकमध्ये येतात व शहरातून जातात याची माहितीही नियमितपणे हाती येणार असल्याने नियोजनाच्या कामालाही मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आकाशवाणीवर स्वागतगीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे खास कुंभमेळ्यानिमित्त बनविण्यात आलेल्या कुंभमेळा स्वागत गीताचे बोल आता आकाशवाणीद्वारे संपूर्ण देशभरात गुंजणार आहेत. 'प्रभु राम की जनस्थान मे कुंभ मेला आया रे... साधु संतो के दर्शन का अवसर आया रे... सुस्वागतम' असे या गीताचे बोल आहेत. या गीतातून नाशिककरांचा आवाज संपूर्ण देशभरात जात आहे.

गीतकार मिलिंद गांधी असून, गायक ज्ञानेश्वर कासार, मीना परूळेकर-निकम आहेत. या गीताला प्रसिध्द संगीतकार प्रशांत महाबळ यांनी संगीत दिले आहे. व्हिडिओ चित्रीकरण मधुरा कुंभेजकर यांनी केले आहे. अतिथी देवो भव: या उक्तीनुसार सर्व अतिथींचे आदरातिथ्य करणे हे कर्तव्य समजून या कर्तव्याचा एक भाग म्हणून नाशिककरांना सोबत घेऊन स्वागत ग‌ीताची रचना करण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे स्वागत या गीताद्वारे करण्यात येणार असून, धार्मिकतेची ही भावना संपूर्ण देशभरात पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जेएसजी प्लॅटिनम ग्रुपच्या अध्यक्षा कल्पना पाटणी यांनी दिली. या गीतामध्ये लायन्स क्लब ऑफ कॉर्पोरेट नाशिक, जैन गोल्डन ग्रुप, अग्रवाल महिला मंडळ यासह अनेक संस्थांचा समावेश आहे.

कुंभ स्वयंसेवकांची देवळालीत बैठक

कुंभमेळ्यात पोलिस प्रशासनाप्रमाणेच स्वयंसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी भाविकांशी सौजन्य राखत आपुलकीची वागणूक द्यावी, असे प्रतिपादन देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांनी केले. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभमेळा स्वयंसेवकांची बैठक नुकतीच झाली. यात यावेळी वरिष्ठ निरीक्षक राजेश आखाडे, लिलाधर पाटील आदी उपस्थित होते. शाहीस्नासाठी सात घाट उभारले गेले असून यातील औरंगाबाद मार्गाजवळ देवळाली कॅम्प स्वयंसेवकांसाठी नेमण्यात आले आहे. सहा नंबर नाका प्रेशर पाईंट असल्याने स्वयंसेवकांनी भाविकांना संयमाने उत्तरे द्यावीत. घाटावर एकाचवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेड्सचा वापर करावा. संशयित व्यक्ती, बेवारस वस्तू दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याच्या सूचना आखाडे यांनी दिल्या. बैठकीस वैभव पाळदे आर. डी. जाधव आदींसह स्वयंसेवक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२८ अतिरिक्त रेल्वेगाड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकच्या कुंभमेळ्यानिमित्त मध्य रेल्वेने १२८ अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबईतील प्रसिद्धी विभागाने दिली. या गाड्या १८ डब्यांच्या, फक्त द्वितीय श्रेणीच्या आणि आरक्षण नसलेल्या असतील.

रेल्वेने कुंभमेळ्यासाठी आधीच वीस विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे जाहीर केले आहे. तथापि, भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त १३८ गाड्या सुरू करण्यात येणार आहे. नाशिकरोड-औरंगाबाद, नाशिकरोड-अमरावती, नाशिकरोड-दौंड, नाशिकरोड-इटारसी, देवळाली या दरम्यान या गाड्या धावतील.

देवळाली-वर्धा ०१२५१-१२५२

१२५१ ही गाडी देवळालीहून ३१ व ३१ ऑगस्ट, १४, १५, १९, २०, २६ सप्टेंबरला (१८ फेऱ्या) सकाळी ६.१० वाजता सुटेल.

नाशिकरोड -औरंगाबाद (१६) ०१२५३-१२५४

१२५३ ही गाडी नाशिकरोडहून ३०, ३१ ऑगस्ट तसेच १४,१५,१९,२०,२६, २७ सप्टेंबरला (८ फेऱ्या) सकाळी ७.२० वाजता सुटेल.

नाशिकरोड-औरंगाबाद (२४) ०१२५५-१२५६- ही गाडी नाशिकरोडहून २९, ३०, ३१ ऑगस्ट तसेच १३, १४, १५, १८, १९, २०, २५, २६, २७ सप्टेंबरला (१२ फे-या) सायंकाळी ५.४० वाजता सुटेल.

नाशिकरोड-दौंड ०१२५७,१२५८

नाशिकरोडहून १२५७ ही गाडी २९, ३०, ३१ ऑगस्ट तसेच १३, १४, १५, १८, १९, २०, २५, २६, २७ सप्टेंबरला (१२ फेऱ्या) दुपारी १.५५ वाजता सुटेल.

नाशिकरोड-इटारसी (२४) ०१२६१-१२६२

१२६१ ही गाडी नाशिकरोडहून २९, ३०, ३१ ऑगस्ट तसेच १३, १४, १५, १८, १९, २०, २५, २६, २७ सप्टेंबरला दुपारी ४.१० वाजता सुटेल.

नाशिकरोड-इटारसी (१६) ०१२६५-१२६६

१२६५ ही गाडी नाशिकरोडहून सकाळी ११.३५ ला २९, ३० ऑगस्ट तसेच १३, १४, १८, १९, २५ सप्टेंबर(८ फेऱ्या) सुटेल. इटारसीला रात्री ९.४५ ला पोहोचेल.

नाशिकरोड-अमरावती (८) ०१२६९-१२७०

१२६९ ही गाडी नाशिकरोडहून सकाळी ११.३५ वाजता ३१ ऑगस्ट तसेच १५,२०,२७ सप्टेंबरला सुटेल. तिच्या चार फेऱ्या होतील.

मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी

कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी मार्गदर्शक सूचनांचे फलक लावावेत, माहिती अधिकारी नियुक्त करावा, मालधक्का येथे शौचालयांची संख्या वाढवावी, अशा सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी केल्या आहेत. गोडसे यांनी रेल्वे स्टेशनवरील विकासकामे व सुविधांची पाहणी केली. रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक एम. बी. सक्सेना, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे, शिवसेनेचे नाशिकरोड विभाग प्रमुख नितीन चिडे, नितीन खुर्जुल, गोरख खर्जुल, रमेश गायकर, राजेंद्र तुपे, राजेंद्र पाटील, लकी ढोकणे आदी उपस्थित होते. गोडसे यांनी मुख्य स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मालधक्का येथे पाहणी केली. तेथून ते नव्या चौथ्या प्लॅटफार्मवर गेले. सिन्नरफाटा तिकीट बुकींग कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी सिन्नरफाटा येथे रेल्वेने प्रवेशद्वाराची कमान उभारण्याची सूचना केली. सुभाष रोड मार्ग, पार्किंगचीही त्यांनी माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकपदी भुतांगे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकपदी ज. द. भुतांगे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी विभागाशी कोणताही संबंध नसलेले तंत्रशिक्षण विभागातील प्रमोद नाईक यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे विभागात नाराजीचा सूर उमटला होता.

व्यवसाय शिक्षण विभागाचे संचालकपद आर. आर. आसावा काही दिवसांपूर्वीच निवृत्ती झाले. त्यांच्यापूर्वी या पदावर भुतांगे कार्यरत होते. मात्र, अन्यत्र बदल करून त्यांची जबाबदारी आसावा यांच्याकडे देण्यात आली होती. आसावा यांच्याच कारकिर्दीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील आस्थापना विषयक अधिकार या विभागाशी दूर दूरपर्यंत संबंध नसलेल्या रा. गो. जाधव यांच्याकडे देण्यात आले होते. सहसंचालकपदाचा कारभार स्वत:च्याच सहीने स्वत:कडे घेण्याचा अजब कारभार जाधव यांनी केला होता. जाधव यांचा स्वत:हून स्वत:कडे जबाबदारी घेण्यासह नाईक यांची नियुक्ती या विषयांवर 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राज्य सरकारला आपल्या हातून घेतलेल्या नियमबाह्य कृतीची जाणीव झाली. त्यानुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील संचालकपदाचा सुमारे १५ वर्षांचा अनुभव असलेल्या भुतांगे यांची पुन्हा संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे पाऊल राज्य सरकारने घेतले आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव शु. सु. आगाशे यांनी लेखी आदेश जारी केले आहेत.

विषय कधी लागणार मार्गी?

दीड वर्षात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात अनेक विषय प्रलंबित आहेत. राज्यभरातील 'आयटीआय'मधील निदेशकांच्या विभागांतर्गत बदल्यांचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश दिला जात असला तरी या प्रक्रियेमध्ये अद्याप अनेक त्रुटी आहेत. याचा सर्वाधिक त्रास राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होत आहे. या मुद्यांवर भुतांगे यांच्याकडून ठोस निर्णय घेतले जाणार का? असा प्रश्न पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ हेल्पलाइन

$
0
0

नाशिक - सिंहस्थ काळात लाखोंच्या संख्येने साधू, महंत, भाविक आणि पर्यटक नाशकात येणार आहेत. प्रशासनाने यासाठी योग्य ते नियोजन केले असून विविध प्रसंगी आवश्यक ती मदत पोहचविण्यासाठीचे संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. शाही पर्वणी काळामध्ये अथवा सिंहस्थ काळामध्ये शहारात चुकामूक झाली अथवा मौल्यवान साहित्याची चोरी झाल्यास या हेल्पलाइनवर भाविक आणि पर्यटकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिका हेल्पलाइन

८३९०३००३००

०२५३-६६४२३००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांचा उपद्रव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अन्य राज्यांतून आलेल्या चोरट्यांकडून साधुग्राम प‌रिसरात उपद्रव सुरूच असून पर्यटकाची बॅग चोरणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून बॅगसह १५ हजारांची रोकड, मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

उत्तर प्रदेश, तामिळनाडू सारख्या परराज्यांतून चोरटे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. वाराणसी येथून नाशिकमध्ये आलेले एक कुटुंब साधुग्राम परिसरात फिरत होते. त्यावेळी त्यांची बॅग चोरीस गेली. साधुग्राममध्ये गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने बारा वर्षीय मुलाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडे ही बॅग आढळली. सहायक पोलिस निरीक्षक भाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी मुलाची आई देखील अशा गुन्ह्यांत सहभागी असावी, अशी शक्यता सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी व्यक्त केली आहे.

साधुंच्या वेषात पोलिस

साधुग्राममध्ये गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे शाखेचे काही पोलिस साधुंच्या वेषामध्ये गस्त घालत आहेत. त्यासाठी अनेकांनी साधुंप्रमाणेच दाढी देखील वाढविली आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम या त्यांच्याकडून केले जात आहे. सिंहस्थावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने साधुग्रामची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा बनला आहे. म्हणूनच ही काळजी घेती जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सिंहस्थ काळात साधुग्राम परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलिसांनी सायकलवरून गस्त घालण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ५० सायकली मागविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनावणी लांबली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्रामच्या वादग्रस्त स्वच्छतेच्या कंत्राटासंदर्भात महापालिका प्रशासनाने सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने या प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. आता या प्रकरणाची सोमवारी (दि. २४) सुनावणी होणार असून आठ दिवस मिळूनही प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर न केला नाही.

साधुग्राम स्वच्छतेच्या वादग्रस्त साडेपाच कोटीच्या कंत्राटासंदर्भात सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. वॉटरग्रेस ऐवजी क्रिस्टल'ला कंत्राट दिल्यानंतर उच्च न्यायालयाने पुन्हा स्थगिती देत, प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, सोमवारीही प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. वकिलाकडून प्रतिज्ञापत्राचा ड्राफ्ट सोमवारी आल्याने ते आजही सादर होवू शकले नाही. त्यामुळे महापालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत मागण्यासाठी अर्ज देण्यात आला. त्यावर न्यायालयाने महापालिकेची मागणी मान्य करत, येत्या २४ तारखेला सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

या कंत्राटावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असा संघर्ष पेटला होता. सोमवारी प्रतिज्ञापत्रासाठी आठ दिवसांची मुदत असतांनाही, प्रशासनाने ते सादर केले नाही. त्यामुळे आता हा कंत्राटच दिले जाणार नसल्याची चर्चा आहे. पर्वणी जवळ आल्याने आता प्रक्रिया राबविणे शक्य नाही. त्यामुळे आहे, त्याच स्वच्छता ठेकेदारांकडून कामे पूर्ण केली जात असून यामुळे बाधा येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेकडून सादर केले जाणार आहे. त्यामुळे या कंत्राटाचा विषय आता बंद झाला असून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याची चर्चा आहे.

ध्वजारोहणाची तयारी पूर्ण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्राममधील येत्या १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आखाड्यांचे ध्वजारोहणासाठी आखाडा परिषद आणि महापालिका सज्ज झाली आहे. आखाड्यांच्या ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी दिली आहे. या ध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाह, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. जगतगुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ८ ते ९ वाजेच्या दरम्यान निर्वाणी, निर्मोही, दिगंबर या तीनही आखाड्यांचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महापौर अशोक मुर्तडक असतील. तसेच पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आरपीआयचे नेते रामदास आठवले, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित रहाणार आहेत. ध्वजारोहणासाठी ५१ फुटाचा ध्वजस्तंभ तयार करण्यात आला आहे.

अन्नदान, ज्ञानयज्ञ

नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर श्री कैलासमठातर्फे श्रावण महिनाभर अन्नदान आणि ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मठाचे अध्यक्ष श्री महंत स्वामी संविदानंद सरस्वती महाराज यांनी सोमवारी दिली. श्रावणात रुद्राभिषेक व शिवार्चन होणार आहे. श्रीराम कथेला गुरुवारपासून (दि. २०) सुरुवात होणार आहे. २८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या सोहळ्यात उज्जैन येथील संत मौनीबाबांचे परमशिष्य सुमनभाई सायंकाळी ४ ते ७.३० दरम्यान 'श्रीराम कथा' सांगणार आहेत. तसेच शुक्रवारपासून (दि. २१) श्री ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. लातूरचे स्वामी श्री श्याम चैतन्य महाराज ज्ञानेश्वरी पारायण दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत करतील. दरम्यान कैलास मठास निरंजनी आखाड्याचे सचिव स्वामी रामानंद पुरी, महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी स्वामी यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बम बम भोले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बम बम भोले, शिव हर शंकर नमामि शंकर, ओम नम शिवाय अशा गजरासह पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांनी आनंदी व भावपूर्ण वातावरणात कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होते. पहाटे पाचपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या. याशिवाय शहरातील शंकराच्या विविध मंदिरातही महिला भाविकांनी अभिषेकासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांना सहज दर्शन घेता यावे म्हणून मंदिराच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिला भजनी मंडळाच्या वतीने भजने सादर करण्यात आली. तसेच महिला मंडळाच्या वतीने पारंपरिक गीते सादर करण्यात आली.

'ओम नम: शिवाय', 'कपालेश्वर महाराज की जय' असा जयघोष सुरू होतो. महिला, पुरुष, मुलांची दर्शनासाठी चाललेली धावपळ असे उत्साही वातावरण कपालेश्वर मंदिरात सकाळी पाहायला मिळाले. ढगाळ वातावरण, पावसाचा लपंडाव, शिवनामाचा जयघोष असे आनंदी व उत्साही वातावरण दिवसभर होते. दर्शनासाठी शहरातील मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, रुद्राभिषेक, शिवलीलामृताचे पठण करण्यात आले. याप्रसंगी अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. काही ठिकाणी दानाचे महत्त्व लक्षात घेत खिचडी वाटप करण्यात आले. तरुणाईनेही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रावणात महादेवाला बेल, फूल वाहण्याची प्रथा असल्याने सर्वच मंदिराच्या बाहेर नारळ, बेलपान, फूल इत्यादी साहित्यांचे स्टॉल लागले होते.

कॉलेजरोड येथील शंकराच्या मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त लघुरुद्राभिषेक, नित्याभिषेक करण्यात आला. यावेळी गुरूजींनी शिवपूजेचे महत्त्व विशद केले. श्रावणी सोमवारी पिंड‌ीवर बेलाचे त्रिदळे वाहतात. शिवलीलामृताचे पठण केल्याने मागच्या जन्मातील पाप नष्ट होते, शिवलीलामृतातील सीमंतिनीचे आख्यान अध्ययन केल्याने कुमारिकेस चांगला पती प्राप्त होतो, अशी श्रद्धा असल्याचे गुरूजींनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंतप्रधान खोटारडे

$
0
0

पंतप्रधान खोटारडे; शांतता करार जुनाच - शंकराचार्य अधोक्षाजानंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत सरकार आणि नागालँडच्या नॅशनल सोशलिस्ट कौंन्सिल म्हणजे एनएससीएनमध्ये शांतता करार झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र, हा करार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटेपणा करून त्याचे श्रेय लाटत असल्याचा गंभीर आरोप गोवर्धन पीठाचे पीठाधिपती शंकराचार्य स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ महाराज यांनी केला.

केंद्र सरकार आणि एनएससीएनच्या इसाक-मुईवा गटाच्या नेत्यांनी ३ ऑगस्ट २०१५ रोजी या करारावर स्वाक्षरी केली. मात्र, अधोक्षाजानंद महाराजांनी हा खोटेपणा असल्याचा आरोप केला. देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा ढासळली असून, देशाचे चौकीदार म्हणजेच पीएम मोदी अपयशी ठरले आहेत. मोदींनी स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण पाकिस्थानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाठवले. मात्र, यानंतर पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवाया करीत असून, मोदी हातावर हात धरून बसले आहेत. काश्मिर समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी हुरियत कॉन्फरन्सला चर्चेत सहभागी करावे लागेल, असे विवादास्पद मत महाराजांनी व्यक्त केले. पंतप्रधान होण्यापूर्वी हेच मोदी पाकिस्तानला, दहशतवादी संघटनांना मोडून काढण्याची भाषा करीत होते. मात्र, सत्ता मिळताच मोदींनी पलटी मारली. एवढेच नव्हे तर आरएसएसचे नेते डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या मारेकऱ्यांसोबत भाजपाने सरकार स्थापन केले. ११ मे १९५३ रोजी जम्मू-कश्मीर राज्यात प्रवेश केला म्हणून डॉ. मुखर्जी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला होता. देशातील बंडखोर आणि परकीय आक्रमण यामुळे सर्वसामन्य नागरिक तसेच लष्करी जवान त्रस्त आहेत. या समस्या दूर करण्यात सरकार विफल होत असल्याचा दावा अधोक्षाजानंद यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नक्षलवाद्यांना आवतण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाचा कुंभमेळ्या खऱ्या अर्थाने वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची चिन्हे आहेत. देशभरातील साधू-महंत आणि भाविकांबरोबरच नक्षलवादी तसेच बंडखोर संस्था, त्यांचे प्रतिनिधी कुंभमेळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. गोवर्धन पीठाधिपती शंकराचार्य स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ महाराज यांनी या सर्व संघटनांना निमंत्रण दिले आहे.

नक्षलवादी, बोडो, उल्फा किंवा देशांतर्गत सरकार विरूध्द बंडखोरी करणारे भारतीयच आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी व्यासपीठच नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही बंडाळीग्रस्त राज्याच्या राज्यकर्त्यांना तसेच समाजसेवकांना निमंत्रण पाठवले असून, ते नाशिकमध्ये येतील, अशी माहिती अधोक्षाजानंद यांनी दिली आहे. धर्माच्या मदतीनेच बंडखोरांना मूळ प्रवाहात सामील करणे शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

देशातील सर्व जातीधर्माचे आणि वंशाचे व्यक्ती पुण्यप्राप्तीसाठी नदीकिनारी जमा होतात. स्नान करतात आणि माघारी फिरतात. मात्र, यापासून नक्षलवादी, बोडो, उल्फा यासारख्या संस्था, बंडखोर मानला जाणारा व्यक्ती समुदाय दूर आहे. त्यांच्या स्वतःच्या काही मागण्या आहेत. बंदुकीला बंदुकीनेच उत्तर देण्याची पध्दत चुकीची असून, त्यातून बंडखोरीला चालना मिळते आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकच्या कुंभमेळ्यात बंडखोरीवर चर्चा करण्यासाठी विशेष संमेलन भरवले जाणार असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले.

ज्या राज्यात बंडखोरांचे सर्वांत जास्त प्रमाण आहे, त्या राज्यातील राज्यकर्त्यांना, समाज सेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना संमेलनात सहभागी होण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. अलाहाबाद येथे झालेल्या कुंभमेळ्यात बंडखोरांचे अनेक प्रतिनिधी आले होते. बंडखोरांची लढाई सरकारशी आहे, धर्माशी नाही. त्यामुळे बंडखोरांशी नेहमीच चर्चा होते. त्यांच्या काही मागण्या असून, सरकारने त्यांचा विचार करणे इष्ट ठरू शकते, असा दावा अधोक्षाजानंद महाराजांनी केला.

सरकारकडूनच खतपाणी

एखाद्या राज्यात बंडखोर संघटना तयार करून त्यांना खतपाणी घालण्याचे काम सरकारकडून होत असते. नक्षलवाद हा त्यातलाच भाग असल्याचा दावा शंकराचार्यांनी केला. देशातील अनेक संघटनांना सरकारच्या इंटेलिजन्स संस्थांकडून आर्थिक मदत होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केला होता. या आरोपात तथ्य असून, काश्मिरचे दुखणे, नक्षलवाद, पूर्वोत्तर राज्यातील बंडखोरीत स्वातंत्र्यानंतर वाढ होत असून, त्यामागे हेच कारण असल्याचे अधोक्षाजानंद महाराजांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा कडाडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आणि सामान्यांच्याही जिव्हाळाचा विषय असलेल्या कांदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी कांदा दरात तब्बल सातशे रुपयांची वाढ झाली. जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटलला पाच हजार रुपये दर मिळाला असून, सरासरी भाव ४४०० रुपये इतका राहिला. आवक मंदावल्याने तसेच पावसाने ओढ दिल्याने कांद्याचे बाजारभाव नजीकच्या काळात आणखी कडाडणार आहेत. सध्या किरकोळ बाजारात ४५ ते ५० रुपयांपर्यंत असलेल्या कांद्यासाठी नाशिककरांनाही येत्या दोन-तीन दिवसांत ६० ते ६५ रुपये मोजावे लागण्याची चिन्हे आहेत.

कमी आवकेच्या जोरावर यंदा पुन्हा एकदा उन्हाळ कांदा तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. देशांतर्गत बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यानेही तेजी आली आहे. जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सटाणा, येवला, उमराणा, मनमाड या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सोमवारी प्रति क्विंटल सरासरी ४४०० रुपये भाव मिळाला. सटाणा व येवला बाजार समिती तसेच अंदरसूल उपबाजारात सर्वोच्च पाच हजार रुपये क्विंटलने कांद्याची विक्री झाली.

यंदा पावसाने ओढ दिल्याने लाल कांद्याची अद्याप लागवड होऊ शकलेली नाही. यामुळे दिवाळीत येणारा लाल कांदा फारसा उपलब्ध होणार नाही. परिणामी दिवाळी व दिवाळीनंतरही कांद्याची दरवाढ टिकून राहण्याची शक्यता आहे. सध्या मोठे शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठवलेला कांदा बाजारात येत आहे. साठेबाजीचाही परिणाम कांद्याच्या दरवाढीवर होत आहे. सोमवारी लासलगाव बाजार समितीत साडेआठ हजार, पिंपळगावमध्ये नऊ हजार, येवल्यात तीन हजार, अंदरसूलमध्ये पंधराशे क्विंटल आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत या बाजार समित्यांमध्ये कांदा आवक घटली आहे.

आयात लांबणार

कांद्याचे वाढते दर पाहून केंद्र सरकारने कांद्याची आयात करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठीसात ऑगस्टपर्यंत टेंडर मागविण्यात आले होते. मात्र, कोणीही टेंडर दाखल न केल्याने आयातीचा प्रश्न लांबणीवर पडला आहे. दि. २७ ऑगस्टपर्यंत टेंडरसाठी मुदत दिली आहे. त्यानंतरच कांदा आयातीचा निर्णय होऊ शकणार असल्याने किमान तोपर्यंत तरी कांद्याचे दर चढेच राहणार आहेत.

दिल्लीत ८० रुपये

कांद्याने दिल्लीकरांना पुरते रडवले असून, देशाच्या राजधानीत कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या कांदा उत्पादक राज्यांमधून चढ्या दराने आवक होत असल्याचा हा फटका असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नाफेडने खरेदी केलेला कांदा फक्त दिल्लीसाठीच रवाना करण्यात आला होता. सुमारे अडीचशे टन कांदा दोन आठवड्यापूर्वी दिल्लीसाठी पाठविण्यात आला होता. यामुळे इतर ठिकाणी कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत

पाऊस नसल्याने नागपंचमीला होणारी कांदा लागवड यंदा लांबणीवर पडणार आहे. दिवाळीपर्यंत व नंतरही कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही. आयातीचा निर्णयही २७ ऑगस्टनंतरच समजू शकणार आहे.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

सध्या कांदा निर्यात बंदच आहे. पाकिस्तान, चीनमध्ये कांद्याचे दर कमी असले तरी तेथेच तो विकला जात असून, भारतातील कांद्यापेक्षा तेथील कांदा स्वस्त आहे. कांदा आयातीच्या परवानगीसाठी साधारण पंचवीस दिवस लागतात. - अतुल शहा, व्यापारी प्रतिनिधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षप्रक्रिया मंडळ गुंडाळले

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

शेतीपूरक उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेल्या मंडळांपैकी एक असलेले द्राक्ष प्रक्रिया मंडळ आता नामशेष झाले आहे. देशाची वाइन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्ये हे मंडळ नसण्याचा अधिक प्रभाव जाणवणार आहे. याचाच वेध घेणारी ही मालिका....

भाजपप्रणित मोदी सरकारला द्राक्ष आंबट असल्याची बाब पुढे आली आहे. यूपीए सरकारच्या काळात कार्यरत असलेल्या द्राक्षप्रक्रिया मंडळाचा गाशा मोदी सरकारने गुंडाळला आहे. मंडळाचे पुणे येथील कार्यालयही बंद करण्यात आले आहे.

देशांतर्गत द्राक्ष उद्योगाला वाव देण्यासाठी यूपीए सरकारने तत्कालिन कृषीमंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार भारतीय द्राक्षप्रक्रिया मंडळ (आयजीपीबी) स्थापन करण्यात आले. द्राक्ष हे नाशवंत पिक असल्याने द्राक्षावर प्रक्रिया केल्यास त्याचा विशेष फायदा शेतकऱ्यांना होईल, या हेतूने मंडळ कार्यान्वित राहिल, असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार वाइनसाठीच्या द्राक्षांची निर्मिती, वायनरी उद्योग, बेदाणा उद्योग या सर्वांच्या विकासासाठी देशभरात हे मंडळ सक्रिय झाले. याच मंडळाच्या माध्यमातून मंडळाने भारतीय द्राक्ष महोत्सव नाशिकमध्ये भरविला. वायनरींमध्ये सुरू होणाऱ्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या महोत्सवाला चांगला प्रतिसादही लाभला. मात्र, हे मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच त्याचा गाशा गुंडाळण्यात आला आहे.

मंडळ कार्यान्वित ठेवून देशांतर्गत द्राक्ष प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात शेतकऱ्यांसह देशाचेही हित आहे. - जगदीश होळकर

द्राक्षप्रक्रिया आणि वायनरी उद्योगात मोठी क्षमता आहे. येत्या काही वर्षांत या उद्योगाचा मोठा प्रमाणात विकास होऊ शकतो. त्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान, व्यापार आणि संकल्पनांची जोड मिळणे आवश्यक आहे. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा 'मेक इन इंडिया' या उपक्रमात वाइन उद्योग मोलाचा ठरू शकतो. त्यामु‍ळे या मंडळाचे अस्तित्व अत्यावश्यक असल्याचे मत ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या घरांच्या पुनर्विकासाचे काय?

$
0
0

विवेक जायखेडकर (लेखक आर्किटेक्ट असून, नाशिक रोटरी क्लबचे अध्यक्षही आहेत.)

नाशिकचा विकास होत असताना नाशिकमधील सर्वात जास्त दाट वस्ती असलेले दोन क्षेत्र म्हणजे गावठाण व सिडको (कामठवाडा). त्यामुळे नाशिकच्या विकासाचा विचार करताना या दोन झोनचा आवश्यक तो विचार व्हायला हवा. नाशिकच्या वाढत्या लोकसंखेचा विचार करता सामान्य माणसाला राहण्यासाठी घरांची आवश्यकता आहे. जास्तकरून गावठाणातील मोडकळीस आलेल्या वाडे आणि सिडकोमधील जुने व मोडकळीस आलेल्या घरांचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. या भागात नवीन विकास होताना महापालिकेने व सिडकोने तेथील लोकांची आर्थिक परिस्थिती बघता त्या रहिवाशांच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे.

गावठाणातील बरेचशे वाडे पूररेषेच्या निळ्या रेषेअंतर्गत येतात. आज या वाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. बरेचशे प्रौढ नागरिक आहेत, नवीन वास्तू विकत घेण्याची काहींची परिस्थिती नाही. शासनाच्या हलगर्जीपणामुळे आलेल्या पुराची शिक्षा या मुळच्या नाशिकाराला भोगावी लागत आहे. एकाबाजूला शासन म्हणते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी नवीन घरकूल योजना आणणार आणि इथे जे आहेत जे घर पुनर्विकासित करू इच्छिता त्यांची नाहक अडवणूक करत आहे. पूररेषेमुळे बाधीत असलेले बरेचसे वाडे आज अनेक पुढाऱ्यांनी काबीज करायला सुरुवात केली आहे. या वाड्यांमध्ये बरेच भाडेकरू अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे घरमालक हे त्या भागातील दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला अत्यल्प

किमतीत वाडे विकत असल्याच्याही घटना घडतात. पण जर शासनाने पुढाकार घेऊन ह्या नागरिकांचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिले तर शासनाला नवीन घरकुल योजना आणायची आवश्यकताच पडणार नाही. आज जरी नवीन येऊ घातलेल्या विकास आराखड्यात जास्त एफएसआय देणार असे घोषित केले आहे तरी, त्या जास्त एफएसआयचा खरोखर आर्थिक दुर्बल लोकांच्या पुनर्विकासासाठी उपयोग होईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. जास्त एफएसआय म्हणजे उंच इमारती. उंच इमारत बांधायची म्हणजे लिफ्ट येणार, अग्निशमन करण्यासाठी लागणारी सगळी महागडी सामग्री बसवावी लागणार. मोठमोठ्या पाणी साठवणुकीसाठी टाक्या बांधाव्या लागणार. पार्किंगसाठी जागा सोडावी लागणार, हे सगळं करायचे म्हणजे अमाप पैसे लागणार, यामुळे या घरांच्या किमती सुद्धा अमाप होणार, मग ह्या लोकांचा विकास होणार का? का इतर कोणाचा?

नवीन विकास आराखड्यात सिडकोने विकसित केलेले क्षेत्र येत नाही. पण आज नाशिक मधील सर्वात दाट वस्ती असलेले हे नवीन नाशिक विकसित कसे होणार? सिडकोने भाडेकरारावर दिलेल्या घरांची हालत आपण सगळे रोज जाता-येता बघत आहोत. त्यांची हालत गावातल्या वाड्यांपेक्षा खराब आहे. गावातल्या वाड्यांवर तरी लाकडाची नक्षीकामे वैगरे केलेली दिसतात. पण या सिडकोतल्या घरांकडे तर बघवत पण नाही. सिडकोने दिलेल्या घरांवर लोकांनी अनधिकृत बांधकामे करून ठेवली आहेत. या सर्व सिडकोवासियांना शासनाने सर्व सामान्यांना परवडेल अशी पुनर्विकास योजना आणणे गरजेचे आहे. शासनाने कोणतीही विकास योजना आणताना त्या शहराच्या गरजा व त्या शहराची ओळख लक्षात घेऊनच योजना तयार करावी. एकाच साचा सर्व शहरांवर लादू नये. त्यावरच सर्वंकष विकास शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंदूचा खुराक

$
0
0

डॉ. सुनील गोडबोले

(संशोधन साह्य : डॉ. अश्विनी गोडबोले)

मेंदूविकासाच्या विविध टप्प्यांमध्ये आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. वेगवेगळ्या संशोधकांनी, डॉक्टरांनी विशिष्ट आहारपद्धतींचा उपयोग केला आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

मेंदूचा रस्ता पोटातून जातो. अर्थातच आपल्या मुलांच्या मेंदूचे कार्य, त्यांचा अभ्यास, समज आणि वर्तन यावर आपण काय खातो याचा थेट परिणाम होत असतो. जगभरात यावर अनेक संशोधक वेगवेगळे शोध घेत आहेत. मातेचे दूध वर्ष-दोन वर्ष व्यवस्थित पिणाऱ्या मुलांमध्ये मेंदूची वाढ जास्त होते. इतकेच नाही, तर त्यांच्यामध्ये अस्थिरतेचे, चंचलतेचे प्रमाणही कमी आढळते. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे डीएचए नावाने ओळखला जाणारा ओमेगा-३-फॅटी अॅसिड! स्निग्धतेचा हा विशेष घटक मातेच्या दूधात भरपूर असतो. याच ओमेगा ३ फॅटी अॅसिडमधून आपल्या मेंदूचा चक्क ६० टक्के भाग विकसित होतो. त्याच फॅटमधून आपल्या डोळ्याचा पडदाही तयार होत असतो. मात्र, ही फॅट आपल्या पोटावरच्या चरबीपेक्षा संपूर्ण वेगळी असते. मातेच्या दूधाव्यतिरिक्त तेल निर्माण करणारे मासे, (उदा. सालमन, सार्डीन, ट्यूने इ.) जवस, कॉलीफ्लॉवर, मोहरीचे तेल, लवंग, आंबा, आक्रोड यातूनही ओमेगा ३ फॅटी अॅसिडस मिळतात जे मेंदूचा विकास, स्मरणशक्ती एकाग्रता या सगळ्यांसाठी आवश्यक असतात.

त्याउलट अतिरिक्त फॅट्स विशेषकरून तळणीचे पदार्थ, (फरसाण, चिवडा, वेफर्स इ.) चीज, पनीर, वनस्पती तूप या मेंदूचा वेग कमी करतात. बरोबरीने लठ्ठपणाची भेट मिळते ती वेगळीच. मेंदूचे काम चोवीस तास अव्याहतपणे चालू असते. त्यासाठी 'ग्लुकोज'चा पुरवठाही नियमित लागतो; पण म्हणून जाता येता साखर खाणे मात्र उलटाच परिणाम करते. साखर लगेच पचते. त्यामुळे मेंदूतले साखरेचे प्रमाण अचानक वाढते. त्यातून नको तितक्या उत्तेजना मिळतात. अनेक रासायनिक पदार्थ तयार होतात. परिणामत: चंचलपणा, अस्थिरता आणि नंतर साखरेचे प्रमाण कमी झाल्यावर पाठोपाठ चिडकेपणा, अस्वस्थपणा, एकाग्रतेचा अभाव असला गोंधळ सुरू होतो. म्हणूनच अतिरिक्त साखर देणारे पदार्थ (शीतपेये, बेकरीतले पदार्थ, चॉकलेट, गोळ्या) टाळलेलेच बरे!

मेंदूची साखरेची गरज भागवण्यासाठी तृणधान्यांचा, फळांचा वापर मात्र उपयुक्त असतो.विशेषकरून मैद्याचा वापर न करता कोंड्यासह गहू, ज्वारी, बाजरी, हातसडीचा तांदूळ, ओट्स या सगळ्याचा आहारात समावेश मेंदूचे स्थैर्य वाढवणारा, एकाग्रता वाढवणारा ठरू शकतो. हे पदार्थ हळूहळू पचतात व त्यातून साखरही हळूहळू व बराच काळ मिळते.

लोह आणि एकाग्रतेचा संबंधही थेट असतो. रक्तातील लोहाची मात्रा कमी झाली, की चंचलपणा, एकाग्रतेचा अभाव हे तर जाणवतेच; पण त्याबरोबरीने हट्टीपणा, चिडकेपणा, विसराळूपणा आदी समस्याही लक्षात येतात. हिरव्या पालेभाज्या, गूळ, खजूर, बीट, मनुका आदी पदार्थांमधून लोहाची गरज भागवता येऊ शकेल. लोहाबरोबरच इतरही क्षार (उदा. सेलेनियम, कॉपर इ.) आपल्या मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतात. हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे व मर्यादित स्वरूपातील मांसाहारातून हे क्षार सहज मिळवता येतात.

'अँटिऑक्सिडंट्स' आणि मेंदूविकासाचाही असाच महत्त्वाचा संबंध आहे. हे अँटिऑक्सिडंट्स आपल्या मेंदूला घातक असे 'फ्री रॅडिकल्स' नष्ट करतात. त्यामुळे मेंदू ताजा तवाना राहतो. भरपूर व नियमित फळे, सुकामेवा, कंदमुळे, रंगीत भाज्या, बिया यांचा आहारात समावेश असेल तर मुलांच्या बरोबरीने मोठ्यांच्या मेंदूचेही कार्य उत्तम राहील. मेंदूविकासातील वेगवेगळ्या अडथळ्यांसाठी, आजारांसाठी (उदा. मतिमंदत्व, स्वमग्नता, चंचलता, अध्ययन अक्षमता इ.) वेगवेगळ्या संशोधकांनी, डॉक्टरांनी विशिष्ट आहारपद्धतींचा उपयोग केला आहे. मात्र, त्यावर इंटरनेट किंवा पुस्तके, जाहिराती वाचून प्रयोग करणे घातकच. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक. आपल्या मुलांना स्मार्ट बनविण्यासाठी निसर्गाच्या जवळ जाणारा व विविधता असणारा आहार उपयुक्त, हाच 'स्मार्ट' मंत्र!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झपाटा ऑर्केस्ट्रा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नव्या जुन्या गाण्यांचा समावेश असलेल्या 'झपाटा' या नाविन्यपूर्ण ऑर्केस्ट्रा पाहण्याची व ऐकण्याची संधी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी सवलतीच्या दरात चालून आली आहे. शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा अनोखा कार्यक्रम होणार आहे.

सिंफनी ही संस्था गेले ३८ वर्षे मनोरंजनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संगीत वेडाने वसंत खेर, कृष्णकुमार गावंड, श्रीकांत कुलकर्णी, किरण शेंबेकर यांनी एकत्र येऊन 'याद-ए-शंकर जयकिशन हा पहिला कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे अनेक दौरेही झालेत. स्वत: संगीतकार शंकर यांनी या कार्यक्रमाची स्तुती केली. यानंतर प्रेक्षकांची नाडी ओळखून १९८६ मध्ये झपाटा या ऑर्केस्ट्राची निर्मिती झाली. ऑर्केस्ट्रा क्षेत्रात झपाटाने अक्षरश: क्रांती घडवली. त्यांचे पाच हजाराहून अधिक प्रयोग झालेत. दर्जेदार संगीत, जुनी नवी गाणी, कॉमेडी स्किटस वैविध्यपूर्ण मनोरंजक गोष्टींनी परिपूर्ण असा तो कार्यक्रम होता. नामवंत दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते.

बदलत्या काळाची जाणीव ठेवून वसंत खेर यांचे चिरंजीव आदित्य खेर यांनी झपाटाची नव्या व तरूण स्वरूपात निर्मिती केली. नवीन झपाटाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिरला झाला. नवीन झपाटालाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. झपाटा हा केवळ ऑर्केस्ट्रा नसून पारिवारिक मनोरंजन देणारा कार्यक्रम आहे. नवीन झपाटाची संगीत संकल्पना कमलेश भडकमकर यांची आहे दर्जेदार नवी जुनी गाणी, दीपाली विचारेची नेत्रदीपक कोरिओग्राफी, कॉमेडी स्किटस, आणखीही मनोरंजनात्मक गोष्टींनी या कार्यक्रमाची बांधणी केली आहे. प्रथमेश सावंत यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. अशा या झपाटाचा शुभारंभाचा प्रयोग २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता कालिदास नाट्यगृहात होणार आहे.

या कार्यक्रमासाठी इतरांना २०० तिकिट असून, कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी मात्र १०० रुपये दरात हे तिकीट दिले जाणार आहे. त्यासाठी कल्चर क्लबचे कार्ड दाखवणे आवश्यक आहे. तिकीट विक्री कालिदास कलामंदिर येथे सकाळी नऊ ते बारा सायंकाळी पाच ते साडे आठ या वेळेत सुरू आहे. कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक रसिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


७२ हजार रोपांची लागवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सामाजिक वनीकरण आणि वनविभागातर्फे नाशिक विभागातील ११ हजार ७५५ शाळांमध्ये तर नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ६२० शाळांमध्ये ७२ हजार ४०० रोपांची लागवड करण्यात आली.

शहरातील शासकीय कन्या विद्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक अरविंद सातपुते, प्रादशिक वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, वनसंरक्षक पी. एन. पाटील, उपस्थिती होते.

प्रत्येक शाळेत वीस रोपांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये वड, पिंपळ, अशोक, निलगिरी, कडुनिंब, चिंच, आवळा, कैलासपती आदी झाडांचा समावेश होता. या उपक्रमात वनीकरण विभागाचे संचालक आर. बी. सोनवणे, आर. एम. सानप, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वाय. पी. सातपुते, लागवड अधिकारी शर्मा आदी सहभागी झाले. स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रत्येकी वीस रोपे लावण्यात आली.

अहमदनगर........३,६९०

नाशिक.............३,६२०

जळगाव............१,९५६

नंदुरबार.........१,३९०

धुळे..............१,१०९

एकूण...........११,७५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढली वाहतूककोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील निमाणी बसस्थानक ते पंचवटी कारंजा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंगची जागा नसतांना अनेक जण आपली वाहने रस्त्यालगत उभी करतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दिंडोरी रोडवरून पंचवटी कारंजाकडे येणाऱ्या वाहनांची कायमच गर्दी असते. निमाणी तसेच मेरीमार्गे येणाऱ्या आणि तेथील वाहतूक बेटाला वळसा घालून पेठ रोड व मखमलाबादकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या ठिकाणी वाहतूक बेट आणि छोटे जुने उद्यान आहे. या उद्यानाच्या अर्ध्या भागात काही दिवसांपूर्वीच सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात फारसे कुणी जात नाही. याउलट भिकारी आणि मद्यपींचा तेथे नेहमी गराडा दिसून येतो.

शौचालय बांधल्यामुळे उद्यानाचा वापर कोणी करीत नसेल तर उद्यानाची रुंदी कमी करून वाहनांसाठी जागा उपलब्ध करून द्यावा. या उद्यानाभोवतालचा रस्ता मोठा झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल अशे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने सुरू असलेल्या अनेक कामांमध्ये उद्यान कमी करण्याचेही काम मार्गा लावावे, अशी मागणी नागरिक व वाहनचालक यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर दुरुस्त झाले ड्रेनेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सातपूर येथील शिवाजीनगर भागात सांडपाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने हजारो लिटर सांडपाणी नैसर्गिक नाल्याद्वारे गोदावरीत मिसळत होते. याबाबत मटाने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेची यंत्रणा जागी होत सांडपाण्याच्या ड्रेनेजची दुरुस्ती करत सांडपाणी बंद केले आहे.

गोदावरी नदीमध्ये मिसळल्या जाणाऱ्या या सांडपाण्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता ड्रेनेजचे काम करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, आठ दिवसांपासून हजारो लिटर वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे ध्रुवनगर भागातील रहिवाश्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. नाल्यात असलेल्या ड्रेनेजला वाहत्या पाण्यामुळे तडे गेले. दगड व माती ड्रेनेजमध्ये गेल्याने चोकअप झाल्याने सांडपाणी नाल्यात वाहत असल्याने भूयारी गटारी विभागाचे अधिकारी अशोक मेश्राम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कधी होणार डीपी रस्ता?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर भागातील २० वर्षांहून अधिक काळ उलटूनही आरक्षित असलेले अशोकनगर डीपी रस्तांचे काम प्रलंबित आहे. यासाठी आमदार सीमा हिरे यांनी महापालीका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नुकतीच भेट घेतली. आयुक्तांनी डीपी रस्त्याचे काम मार्गी लागवणार असल्याचे सांगितले. अशोकनगरला पर्यायी असलेला डीपी रस्ता झाल्यास अनेक रहिवाशांना त्याचा लाभ होणार आहे.

सातपूरमधील अशोकनगर रोडबाबत वाहनचालक व रहिवाशांनी रहदारीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे अनेकदा केल्या आहेत. परंतु, २० वर्षांपासून आरक्षित असलेल्या अशोकनगरचा डीपी रस्त्याकडे महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी लक्ष न घातल्याने रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यात पवार संकुल, विश्वासनगर, राधाकृष्णनगर, गंगासागरनगर व श्रमिकनगर भागातील रहिवाशांनी अनेकदा महापालिकेकडे डीपी रोड करण्याची मागणी केली. तत्कालीन महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी रहिवाशांची मागणी विचारात घेता डीपी रस्त्याची पहाणी केली होती. तसेच सिंहस्थ कामात डीपी रस्त्याचे काम हाती घेणार असल्याचेही माजी आयुक्त खंदारे यांनी सांगितले होते. परंतु, अद्याप हा रोडचा विषय मार्ग लागू शकलेला नाही.

यासाठी परिसरातील रहिवाशांनी आमदार हिरे यांच्याकडे मंजूर असलेल्या डीपी रोडची मागणी केली. त्यांनीही महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांची भेट घेत डीपी रस्ता होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. यावर महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांनी डीपी रोडची पहाणी करत लवकरच रस्त्याचे काम हाती घेणार असल्याचे आश्वासन आमदार हिरे यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहरले सांस्कृतिक ऐक्य

$
0
0

प्रवीण बिडवे, त्र्यंबकेश्वर

कुठे गुजरातचा गरबा... तर कुठे महाराष्ट्राच्या ‌झिम्मा फुगड्या.. कोठे बॅण्डच्या दणदणाटाद्वारे देशभक्तीपर गीतांमधून डोकावणारा आवेश तर कोठे तपस्वी साधुंच्या मुखकमलावरून ओसंडणाऱ्या तेजापुढे नतमस्तक भाविक अशा श्रीमंत थाटात निघालेल्या पेशवाईने (मिरवणुकीने) मंगळवारी असंख्य नेत्रांचे पारणे फेडले. हा सोहळा भक्तीचा असला तरी त्यातून सामाजिक संवेदनाच अधिक ओथंबल्या.

शेतकरी आत्महत्यांपासून गोदा स्वच्छतेपर्यंत अन् महिला अत्याचारापासून गोमातेच्या रक्षणापर्यंतचा नारा त्यातून देण्यात आला. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा जागर करणारी त्र्यंबकेश्वरमधील ही पेशवाई अविस्मरणीय सुखसोहळा न ठरेल तरच नवल.

सिंहस्थ महाकुंभानिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झालेल्या देवतांच्या स्वागतासाठी शैव पंथातील एक असलेल्या अखिल भारतीय आनंद आखाडा पंचायतीच्या वतीने मंगळवारी पेशवाई काढण्यात आली. तब्बल बारा वर्षांनी होणाऱ्या या सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरनगरी नववधुप्रमाणे नटली होती. पेशवाई मार्गावर रेखाटलेल्या सुरेख रांगोळ्या, दुतर्फा फडकणारे भगवे झेंडे, ठिकठिकाणी केलेल्या सडा शिंपणांमुळे वातावरण प्रसन्नदायी बनले होते. सूर्यनारायण मंदिरातून पेशवाईला सुरुवात झाली. पुढे चालणारा सूर्यरथ पाठोपाठ घोड्यावर चसेच पायी चालणारे नागा साधू, ढोलताशांचा गजर, त्यावरून आळवले जाणारे भक्तीगीतांचे, देशभक्तीपर गीतांचे सूर, शिस्तबध्द चालणारे महामंडालेश्वर आणि महतांचे रथ अन् पुढे मागे आनंदोत्सव साजरा करणारी भक्तांची मांदियाळी अशा थाटात ही पेशवाई काढण्यात आली.

पेशवेकालीन पोशाखात आबदाण्या, झेंडे हाती घेऊन नृत्यावर ठेका धरणारे तरुण, आदिवासी, टिपरी तसेच गरबा नृत्यातून शिगेला पोहोचलेला उत्साह, तूतारी, शंख तसेच डमरू वादनातून महिलांनी दाखविलेली कलेची चुणूक यांमुळे हा सोहळा अधिकच देखणा झाला.

बळीराजाला दिले धैर्य

सोमेश्वरांनद सरस्वती महाराज यांच्या रथयात्रेपुढे चालणाऱ्या भाविकांनी अनेक सामाजिक प्रश्नांना साद घालून सामाजिक बांधिलकी जपली. 'परमेश्वा तू जरी कोपला पण मी हरणार नाही, संकटांचा धैर्याने सामना करेल फास घेऊन मरणार नाही' असा संदेश देत शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. 'दुध का कर्ज चुकाना है, गोमाता को राष्ट्रीय पशु बनाना है', 'महिला अत्याचार बंद करे', लेक वाचवा अभियानाचे नारे यावेळी देण्यात आले.

शाहीमार्गात त्रुटी

सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही मिरवणूक मार्ग व भाविक मार्गात त्रुटी असल्याचा दावा नागरी सेवा समितीच्या वतीने केला आहे. समिती आणि शहरातील वास्तुविशारदांच्या सयुंक्त पाहणीतून या त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटींमुळे अपघात होण्याची शक्यता आहे, असा दावा समितीचे प्रमुख देवांग जानी यांनी केला आहे. महापौर, उपमहापौर, आयुक्त यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले असून पूनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाहीमार्ग हा वरुणा नदी ओलांडून आहे. चांगला पाऊस आला तरी नदीचे पाणी वाढले तर भाविकांच्या जीवाला धोका होवू शकते. सोबतच दोन्ही मार्ग हे उतारावर आहेत, तर मार्गात अनेक खड्डे आहेत. गटारीचे पाणीही या मार्गावर येवू शकते. त्यामुळे भाविक पायी चालू देखील शकणार नाहीत. भाविकांच्या जिवीताला धोका आहे. या मार्गावरील रस्ते विकसित करणे आवश्यक होते. यामुळे भाविकांसह साधू महंताच्या जिविताला धोका निर्माण होवू शकतो. नदी, नाले तात्काळ स्वच्छ करून शाहीमार्ग व भाविकांच्या मार्गावरील अडथळे दूर करण्याची मागणी जानी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images