Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

टर्मिनलसाठी दिग्गज इच्छुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओझर विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलच्या देखभालीसाठी दिग्गज कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळेच ख्यातनाम कंपन्यांनी सोमवारच्या बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला त्याचा अधिक फायदा होणार आहे.

येत्या फेब्रुवारीत एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरची विमानसेवा सुरु होणार आहे. याची दखल घेत हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) टर्मिनलचा सांभाळ करण्यासाठीचे टेंडर काढले आहे. या टेंडरला दिग्गज कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. राजधानी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या टर्मिनलचा सांभाळ जीएमआर ही कंपनी सध्या करीत आहेत. तर, मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अत्याधुनिक टर्मिनलचा सांभाळ जीव्हीके ही कंपनी करीत आहे. या दोन्ही कंपन्यांनी ओझर येथील टर्मिनलच्या देखभालीसाठी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळेच या दोन्ही कंपन्यांचे अधिकारी ओझर टर्मिनलमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीला हजर होते. त्याशिवाय रिलायन्स आणि सोव्हिका समुह यांच्या अधिकाऱ्यांनीही उपस्थित लावली आहे. त्यामुळे यापैकी कुठल्याही कंपनीला देखभालीचे कंत्राट मिळाले तर त्याचा फायदा ओझरच्या विमानसेवेलाच होणार आहे. येत्या जानेवारीपर्यंत एचएएलकडून टेंडरची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे जानेवारीपासूनच टेंडरमध्ये निवड होणाऱ्या कंपनीकडे टर्मिनलचा ताबा दिला जाणार आहे. दरम्यान, येत्या फेब्रुवारीत सेवा सुरु करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ओझर विमानतळाला भेट दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेट टॉप बॉक्ससाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन

$
0
0

नाशिक : जिल्ह्यात २८ ठिकाणांच्या नागरी वस्त्यांमध्ये केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनसाठी जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१५ ही 'डेडलाईन' दिली आहे. प्रत्येक केबल जोडणी धारकाला सेटटॉप बॉक्स लावणे अनिवार्य असुन, मुदतीत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास त्या भागातील अ‍ॅनलॉग सिग्नल बंद करण्यात येणार आहे. केबल चालकांनी ग्राहकांना तत्काळ सेट टॉप बॉक्स उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश करमणुक कर विभागाने दिले आहेत.

शहर तसेच आसपासच्या नागरी भागात डिसेंबर २०१५ पर्यंत तर ग्रामीण भागात डिसेंबर २०१६ पर्यंत केबलचे ड‌िजिटायझेशन पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर केबल टेलीव्हिजन नेटवर्क अधिनियिम, १९९५ नुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांवर अधिकृत अधिकारी म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारक असले तरी त्याचा भुर्दंड ग्राहकांनाच सहन करावा लागणार आहे. जिल्ह्यातील मालेगाव महापालिका, सुरगाणा,सटाणा, नांदगाव, मनमाड, चांदवड, त्र्यंबकेश्वर, भगुर, इगतपुरी, सिन्नर, येवला, पेठ, कळवण, निफाड, दिंडोरी, व देवळा या नगरपंचायतीमध्ये तसेच दयाने, सोयगाव, संगमेश्वर, मालधे, देवळाली, सामनगाव, एकलहरे, घोटी बु., ओझर, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, संसारी या शहरी भागात समाविष्ट गावांमध्येही ३१ डिसेंबर अखेर सेटटॉप बॉक्स बसवावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मुंडेवार यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दप्तराची आज होणार तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक विद्यार्थ्याच्या पाठीवरील जड ओझे ३० नोव्हेंबरपर्यंत कमी व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने शाळांना आदेश दिले होते. त्यानुसार अनेक शाळांमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या गेल्या. या उपाययोजना कितपत सफल ठरल्या, याची शहानिशा आज महापालिका शिक्षणमंडळाकडून केली जाणार आहे.

दप्तराचे ओझे हे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, याची जबाबदारी शिक्षकांनी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. ओझे कमी झाले नाही, तर मुख्याध्यापक व शाळेच्या संचालकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. महापालिका शाळांमध्ये यावर 'मित्र योजना', 'दुहेरी पुस्तक सेट योजना' राबविल्या जात आहेत. मित्र योजनेमध्ये एका बाकावर बसणाऱ्या दोन मुलांपैकी एका दिवशी एकानेच पुस्तक आणून त्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुहेरी पुस्तक योजनेत शाळेतील जुनी पुस्तके वापरात आणली जात आहेत. तसेच काही शाळांमध्ये बाकाच्या खालीच वह्या, पुस्तके ठेवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, पालकांच्या म्हणण्यानुसार दप्तराचे ओझे 'जैसे थे' च असून केवळ घोषणाबाजीमुळे या निर्णयाला रंग चढला आहे.

प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत होईल, यावर काही पालकांनी शंका उपस्थित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधोपचारांसाठी ‘त्यांच्या’ नश‌िबी मुंबईच्या वाऱ्या

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

ना‌शिक : एचआयव्ही पॉझ‌िटीव्हच्या धक्क्याने हादरलेल्या महिलांनी नंतरच्या टप्प्यात धैर्य बाळगून स्वत:ला सावरलेही. परंतु औषधोपचारांसाठी त्यांच्या नशिबी मुंबईच्या वाऱ्या पडल्या आहेत. हे वारीदिव्य टळावे आणि विना दगदगीत नाशिकमध्येच औषधोपचार मिळण्याची अशी आशा एचआयव्ही बाध‌ित महिला व्यक्त करतात.

एचआयव्ही या असाध्य आजाराला धैर्याने सामोरे जातानाही महिलांनी कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी नेटाने संघर्ष सुरू ठेवला आहे. आप्तांच्या आणि समाजाच्या अवहेलना करणाऱ्या नजरा चुकवित त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य केवळ पोटच्या करांसाठी जगण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पाला महिन्द्र अॅण्ड महिन्द्र कंपनी आणि यश फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे पाठबळ मिळाले.

एचआयव्हीग्रस्त समदुखींना एकत्रित आणण्याचे आणि त्यांना धीर देण्याचे काम यश फाऊंडेशनकडून निरंतर सुरु आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणाबरोबरच रोजगाराची संधीही उपलब्ध झाल्याने या महिला स्वावलंबी जीवन जगू लागल्या आहेत. एकीकडे अशा प्रकारे दु:ख बाजूला सारून आनंदवाटा शोधणाऱ्या या महिलांचा औषधे हाच जगण्याचा आधार आहे. मात्र यापैकी अनेक महिलांना औषधे घेण्यासाठी थेट मुंबईला जावे लागत असल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

धोक्याच्या उंबरठ्यावर नसलेल्या एचआयव्हीग्रस्त महिलांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच औषधे मिळतात. मात्र ज्या महिला धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत त्यांना केवळ मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल किंवा औरंगाबाद येथेच औषधे दिली जातात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांना औषधे घेण्यासाठी मुंबईला जावेच लागते. मात्र अनेकदा तेथेही आवश्यक ती सर्व औषधे मिळत नाहीत. त्यामुळे केवळ औषधे घेण्यासाठी मुंबईला महिन्यातून दोन किंवा तीन चकरा माराव्या लागतात, अशी कैफियत त्यांनी व्यक्त केली आहे. औषधांच्या सेवनात सातत्य आवश्यक आहे. मात्र सरकारी अनास्थेमुळेच ते राहात नसल्याचे या एचआयव्ही बाधितांचे म्हणणे असून, त्यामूळे औषधांच्या सेवनातही खंड पडतो आहे. त्याचा विपरात परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होतो आहे. हे औषधोपचार नाशिकच्या सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये मिळावेत अशी या सर्वांची मागणी आहे.

शहरातील विविध भागात राहणाऱ्या महिला रोजगारासाठी जुना गंगापूर नाका परिसरात येतात. प्रत्येक महिलेला प्रवास खर्चापोटी दररोज ३० ते ५० रुपये मोजावे लागतात. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या महिलांना हा खर्चही पेलवेनासा होतो आहे. एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात सवलत मिळावी, अशीही त्यांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिल्हा कोर्टासाठी पर्यायी जागा शोधा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा कोर्टाला आहे ती जागा अपूरी ठरत असून, त्यांना अतिरिक्त पाच एकर जागा हवी आहे. पोलिस मुख्यालयाने त्यांची जागा देण्यास नकार दिला असून, 'कोर्टासाठी जागेचा शोध घ्या' अशा सूचना राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. महापालिका क्षेत्रात एवढी जागा उपलब्ध नसल्याने जागा शोधायची कोठे हा प्रश्न प्रशासनाला सतावू लागला आहे.

१९८५ मध्ये नाशिकमध्ये कोर्ट सुरू झाले. त्यावेळी मुबलक असलेली कोर्टाची जागा आता मात्र अपुरी ठरू लागली आहे. वकील आणि पक्षकारांना वाहने उभी करण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या नाशिक शाखेने कोर्टासाठी प्रशस्त जागेची मागणी केली आहे. पोल‌िस मुख्यालयातील पाच एकर जागा कोर्टासाठी द्यावी, अशी मागणी होत असली तरी या जागेमध्ये चांगल्या स्थितीतील पोलिस वसाहत असल्याने पोलिस प्रशासनाने ही जागा देण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे कोर्टासाठी आता पर्यायी जागेचा शोध घेण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत सोमवारी प्रधान सचिवांनी व्हीडीओ कॉन्फरन्स घेतली. जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर पोलिस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कोर्टासाठी पाच एकर जागेची मागणी आहे. सद्यस्थितीत कोर्टाच्या पश्चिमेकडील पोलिस प्रशासनाची जागा मिळावी, यासाठी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. क. का. घुगे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर योग्य मार्ग काढण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असले तरी या प्रश्नाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. कोर्टासाठी जागा अपुरी ठरत असून, कुटुंब न्यायालय, मोटार वाहन न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय शहरात वेगवेगळ्या ठिकाणी काही अंतरावर भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. त्यामुळे वकिलांची गैरसोय होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुनी तांबट लेनमध्ये दोन लाखांची घरफोडी

$
0
0

नाशिक : जुने तांबट लेनमधील बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील २ लाख २७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जुनी तांबट लेनमधील गजानन कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या मनोज दिनेशकुमार गुप्ता (३६) यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली असून, संध्याकाळच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होता. दरम्यान, गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर लिप‌िकास तीन वर्षाचा कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहाव्या वेतन आयोगानुसार प्रस्ताव तयार करून तो शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर करण्यासाठी १ हजार १०० रूपयांची लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिप‌िकास कोर्टाने दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरी व अडीच हजार रूपये दंड ठोठवला. २०१० मध्ये अंबड पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या या गुन्ह्याबाबत आज, सोमवारी कोर्टाने आपला निर्णय सुनावला.

बाळासाहेब वाल्मिकराव बोरसे असे या शिक्षा झालेल्या लिप‌िकाचे नाव असून, त्यास ३० मार्च २०१० रोजी अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी सिडको परिसरातून लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले होते. तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून, त्यांचा सहाव्या वेतन आयोगानुसार प्रस्ताव तयार करून त्यावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी घेऊन तो प्रस्ताव ​अहमदनगर येथील शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर करण्याचे काम बोरसेने करणे अपेक्ष‌ित होते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील न्यु हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील निवृत्त शिक्षकाचा प्रस्ताव पुढे सरकवण्यासाठी बोरसे याने पैशांची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सिडको परिसरात राहणाऱ्या बोरसेला पैसे घेताना अटक केली. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे के. एन. निंबाळकर यांनी बाजू मांडत सबळ पुरावे कोर्टासमोर सादर केले. हे पुरावे ग्राह्य मानून कोर्टाने बोरसेला शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंगलांच्या अतिक्रमणामुळे बिबटे शहराकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानवाने जंगलांवर केलेले प्रचंड अतिक्रमण, वृक्षतोड, पिण्याच्या पाण्याची कमतरता, आदींमुळे बिबट्या शहराकडे येऊ लागला असून उसाची शेती हे त्याचे आश्रयस्थान बनले आहे, असे मत नाशिकचे लेपर्ड मॅन आणि वन विभागाचे आरएफओ सुनील वाडेकर यांनी व्यक्त केले. नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे आयोजित 'निसर्ग कट्टा' या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर जेष्ठ पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ, पशु वैद्यकीय सहायक आयुक्त डॉ संजय गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा आदी उपस्थित होते. आनंद अकाउंटन्सी क्लासेसच्या किंगफिशर सभागृहात हा कार्यक्रम झाला. वाडेकर पुढे म्हणाले की, 'बिबट्या शहरात आल्यानंतर गर्दी करू नये व त्याला पकडण्याचे धाडसदेखील करू नये. तो अतिशय शक्तिशाली वन्य प्राणी असून असे धाडस करणाऱ्या अनेक लोकांना त्याने जखमी केले आहे.'

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंस्र बिबट्याला माया, प्रेम देखील असते हे सांगणारा लघुपट दाखविण्यात आला. बिबट्या एका वानर मादीची शिकार करतो पण तिच्याजवळ असलेल्या पिल्लाला तो नखदेखील लावत नाही, उलट त्याचा सांभाळ करतो हे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारेच उभे राहिले. या कार्यक्रमात निसर्ग कट्ट्याविषयी माहिती देतांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा म्हणाले की, 'या कट्ट्यावर निसर्ग घडामोडींची चर्चा घडवून आणली जाणार असून निसर्गाशी संवाद साधण्याची संधी यामुळे मिळणार आहे.' शहरात मोठ्या प्रमाणात बिबटे येत असल्याने लेपर्ड सफारी हा प्रकल्प वन विभागाने राबवावा असे पक्षीमित्र अनिल माळी यांनी सुचविले. पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांनी नदी जवळ होणाऱ्या सिमेंटच्या जंगलांच्या अतिक्रमणामुळे वन्य जीवन धोक्यात येत असल्याचे सांगितले तर रमेश वैद्य यांनी वन विभागाने जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट ही योजना प्रामाणिकपणे राबविण्याची सूचना केली तसेच बिबट्या शहरात आल्यावर गर्दी टाळणे, तो परिसर रिकामा करून देणे, अफवा पसरवू नये, बिबट्याशी मस्ती करू नये किंवा त्याला छेडू नये अशा सूचना देखील या वेळी करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक बोरा यांनी केले. सूत्रसंचालन सलोनी वाघमारे यांनी केले. आभार प्रा. कुणाल कुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश नागरे, सागर बनकर, दर्शन घुगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोरपडे बंधुंसह चौघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन धान्य घोटाळ्यात अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या घोरपडे बंधुसह चौघांना विशेष मोक्का कोर्टाने ९ डिसेंबरपर्यंत पोल‌िस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील संशय‌‌ित लक्ष्मण पटेल शनिवारीच कोर्टात शरण आला होता. त्यालाही ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रेशन धान्य घोटाळ्यामधील संशयित संपत नामदेव घोरपडे, विश्वास नामदेव घोरपडे (रा. गोविंदनगर, नाशिक), मगन रतन पवार, रमेश सोमनाथ पाटणकर (दोघेही रा. शिवशक्ती चौक, सिडको) हे चौघे रविवारी वाडीवऱ्हे पोलिसांना शरण आले. तत्पूर्वीच लक्ष्मण धरमसी पटेल (रा़. कल्याण वेस्ट, मुंबई) हा शनिवारी कोर्टात शरण आला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अरुण नामदेव घोरपडे याच्यासह अन्य तिघेजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी कोर्टात युक्तिवाद केला. ते म्हणाले, घोरपडे बंधुंनी संघट‌ितपणे सरकारी धान्याचा काळा बाजार केला असून, प्रचंड संपत्ती कमावली आहे. काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी बोगस कंपन्या स्थापून सुमारे १६५ कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत. या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली पद्धती, कुटुंब‌ियांच्या नावे केलेल्या संपत्तीचा शोध तसेच सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणेच अन्य कुणी आरोपी या प्रकरणात सहभागी आहेत का? याचा शोध घेण्यासाठी २० दिवसांची पोलिस कोठडी द्यावी.

संशयितांचे वकील अ‍ॅड. भानोसे, देशपांडे, भाटे यांनी मात्र पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद केला. संशयितांनी तपासात पोलिसांना सहकार्य केले आहे. संशयित फरार झाले नव्हते तर जामिनासाठीच्या कायदेशीर तरतुदी पूर्ण करण्यात त्यांना वेळ लागल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. त्यावर अ‍ॅड. मिसर यांनी पुन्हा युक्तीवाद केला. संशयित फरार होते म्हणूनच कोर्टाने अटक वॉरंट तसेच मालमत्ता जप्तीचे आदेश काढले.

संशयितांवर विविध पोलिस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल असून, आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. विशेष मोक्का कोर्टाच्या न्यायाधीश उर्मिला फलके जोशी यांनी संशयितांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेती समस्यांवर करावे कृषी विद्यापीठांनी संशोधन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाराही महिने शेतकरी वर्गाच्या पुढ्यात ठाकणाऱ्या कृषी समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहेत. यावर दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. हे उपायांच्या संशोधनाची भिस्त कृषी विद्यापीठांवर आहे, अशी अपेक्षा राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

ह्युमन सर्व्हीस फाऊंडेशन आणि मीडिया एक्झीबिटर्स यांच्या वतीने आयोजित कृषीथॉन प्रदर्शनाच्या समारोपाच्या दिवशी ते बोलत होते. त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम मैदानावर प्रदर्शन झाले. यावेळी थोरात म्हणाले, की कृषीशी संबंधित प्रत्येक घटक दिवसेंदिवस सजग होत आहे. कृषीविषयक अद्यावत माहिती मिळविणे, संशोधन, मार्गदर्शन आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बदलांसदर्भात अद्यावत राहणे ही शेतकऱ्यांना महत्त्वाची गरज वाटते. हे कृषी क्षेत्रासाठी सकारात्मक लक्षण आहे. राज्यातील कृषी विद्यापीठ आणि सरकारने संयुक्तपणे शेतीसमोरील समस्या सोडविण्यावर भर द्यायला हवा.

उपक्रमाचे संयोजक संजय न्याहारकर यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील संकल्पना मांडली. यंदाच्या नियोजनात शेतकरी वर्गाला भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून त्याच अनुषंगाने तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शोभा बच्छाव, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, पोलिस उपायुक्त विजय पाटील, अॅड. जयंत जायभावे, नरेंद्र ठक्कर आदी उपस्थित होते. यावेळी कृषीथॉन स्टार प्लॅटीनम पुरस्काराने महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बीकेटी टायर्स, कलश सीड्स, नाबार्ड, मारुती सुझूकी यांना गौरविण्यात आले. कृषीथॉन स्टार गोल्ड पुरस्काराने ग्राम समृध्दी फाऊंडेशन, एक्स्प्रेस इन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि सन रायसिया रिसर्च लॅब यांना गौरविले.

कृषीथॉन सिल्वर पुरस्कार इंडिलूब, मल्टीमोल मायक्रो फर्टीलायझर, गरवारे वॉल रोप्स, सुविधा ट्रेडिंग एजन्सी, व्हीएनआर नर्सरी, वर्षा एन्टरप्रायझेस, बेदमुथा ग्रुप ऑफ कंपनीज यांना गौरविले. तर फ्रेंड ऑफ यंग फार्मर्स पुरस्काराने सॅमसोनाईट वनराई प्रोजेक्ट, फार्मेक्स अग्रो सायन्सेस आणि ठक्कर डेव्हलपर्स यांना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचपीटी’चा कट्टा होणार स्मार्ट

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

कॉलेजियन्ससाठी कट्टा म्हंटल की चेष्टा-मस्करी अन् कल्ला करण्याची जागा. कट्ट्यावर बसून कॉलेजियन्सचे ग्रुप्स अगदी सिनेमांपासून जागतिक स्तरावरच्या कोणत्याही विषयावर चर्चा रंगवतांना दिसून येतात. हाच कट्टा अधिक प्रगल्भ करण्यासाठी एचपीटी कॉलेज सज्ज झालयं ते 'स्मार्ट कट्टा' या नवीन संकल्पनेमधून.

'एचपीटी'च्या कट्टेकऱ्यांमध्ये हिट असलेला टकला कट्टा, म्हणजेच कॉलेजच्या लायब्ररी समोरच्या कट्ट्यावर आता स्मार्ट कट्टा सुरु होणार आहे. कट्ट्यावर होणाऱ्या ग्रुप्सच्या चर्चेमध्ये आपापसातील वैचारिक संवाद सर्वांसमोर यावा, तसेच कट्ट्यावर मनमोकळी होऊन बोलणाऱ्या तरुणाईने आपले विचार मांडावेत यासाठी ही संकल्पना राबविली जाणार आहे. 'स्मार्ट कट्टा' ही संकल्पना 'एचपीटी'च्या कलामंडळातर्फे आयोजित केली जाणार आहे. जर्नालिझम विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश नखाते, ऐश्वर्या गुजराथी, पुष्कर तिवारी, सागर गायकवाड, भक्ती आठवले हे ही 'स्मार्ट कट्ट्या'ची संकल्पना राबवणार आहेत.

सामाजिक, शैक्षणिक, चालू घडामोडी, क्रिडा, सांस्कृतिक अशा सर्वच विषयांबाबत या स्मार्ट कट्ट्यावर संवाद साधला जाणार असून तज्ज्ञांमार्फत विश्लेषणही करण्यात येणार आहे. यासाठी त्या विषयातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि यंगस्टर्स यांची मुक्त चर्चा इथे होणार आहे. कॉलेजियन्सनी जागरूक आणि संवेदनशील होत त्यांचा विविध विषयांवर सखोल अभ्यास व्हावा हा यासाठी ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

दहा डिसेंबरला सुरुवात

हा स्मार्ट कट्टा दहा डिसेंबर रोजी सुरू होत असून 'पेटंट आणि कॉपीराइट' या विषयवार इथे चर्चा होणार आहे. मृदुला बेळे यावेळी विशेष तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहणार असून प्रत्येक महिन्यात दोन वेळा हा कट्टा भरवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफडीप्रकरणी दोघाजणांना जाम‌ीन

$
0
0

नाशिकरोड : मुदत ठेव कर्ज घोटाळाप्रकरणी बिझनेस बँकेचे तत्काल‌ीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद बाबूलाल बलदेवा आणि मुख्य रोखपाल राजेंद्र चंद्रकांत शहाणे यांना पोलिसांनी आज अटक केली. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.

बिझनेस बँकेत असगर खान यांच्या मुदत ठेवीवर (एफडी) ६११ क्रमांकाचे खाते परस्पर उघडून दोन वेळा २५ लाख रुपये काढून पुन्हा भरल्याचा प्रकार ११ मे २००१ ते ११ मार्च २०१३ दरम्यान घडला होता. उपनगर पोलिस ठाण्यात खान यांनी तत्कालीन अध्यक्ष विजय संकलेचा, उपाध्यक्ष विजय चोरडीया, तत्कालीन संचालक वसंत नगरकर, अशोक तापडीया, सिद्धेश्वर नगरकर, वसंत गुरुनानी, डाॉ. पूनमचंद ठोळे, मोहन लाहोटी, छाया कपोते, सरीता टर्ले, तत्कालीन मॅनेजर प्रल्हाद बलदेवा, मुख्य रोखपाल राजेंद्र शहाणे आदी १७ जणांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे. संचालकांना न्यायालयाने सशर्त जाम‌ीन मंजूर केला आहे. सोमवारी बलदेवा व शहाणे यांना अटक केली व त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिथॉनमध्ये कोट्यवधीची उलाढाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या विद्यमाने आयोजित कृषीथॉन -२०१५ या आंतरराष्ट्रीय कृषि प्रदर्शनात शेती व शेतीपुरक यंत्रसामुग्री, बि-बियाणे, खते इत्यादीच्या खरेदी-विक्रीतून गेल्या पाच दिवसात कोट्यवधीची उलाढाल झाली आहे. त्यामुळे भविष्यात शेती व्यवसायाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास कृषिथॉन प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर यांनी व्यक्त केला.

गेल्या पाच दिवसापासून त्र्यंबकरोड वरील ठक्कर डोम येथे कृषिथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी न्याहारकर बोलत होते. या प्रदर्शनात देश-विदेशातील कृषि व कृषि सलग्न उत्पादने करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यात बि-बियाणांपासून ते अत्याधुनिक कृषि यंत्रे, औषधे, शेंद्रिय शेतीचे तंत्र, जैविक शेती आदी विषयक यंत्र सामुग्रीची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. प्रदर्शनाला केवळ राज्यातूनच नाही तर देशाच्या अनेक भागातून हजारो शेतकऱ्यांनी भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञानाची मा‌हिती जाणून घेतली तसेच खरेदी केली. प्रदर्शनातून शेतकऱ्यांना कमी खर्चातील शेती याबरोबरच ऊस, डाळींब, द्राक्ष या नगदी पिकांसाठी किफायतशीर शेती या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शनासाठी शेतीचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या इस्त्राइलसह सिंगापूर, मलेश‌िया आदी देशातील उत्पादन कंपन्यांनी सहभाग घेऊन भारतातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक कृषि यंत्रणा उपलब्ध करुन दिली होती. यावेळी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आयोजक संजय न्याहारकर यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सस्पेन्स थ्रीलरने परिपूर्ण असलेले ‘अघटीत’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सोवारी जगदंब प्रतिष्ठान, धुळे प्रस्तुत 'अघटीत' हे नाटक सादर करण्यात आले.

पुणे शहरात हे संपूर्ण नाट्य घडते. दहशतवादाच्या मुख्य टारगेटवर असलेल्या पुण्यात सुजाता पाटील, बंगला नंबर २४ मध्ये सुखाने वास्तव्य करीत असते. एक दिवस तिच्या दारावर एक सेल्समन पत्ता विचारत येतो व सरळ घरातच शिरतो. हा सेल्समनवजा व्यक्ती घरातून बाहेर निघायलाच तयार नसतो. सुजाता परोपरीने त्याला समजावून सांगते की तो ज्या व्यक्तीचा पत्ता शोधतोय ते हे घर नाही परंतु स्वत:ला सूर्यकांत म्हणवणारा हा माणूस घरातून जातच नाही आणि सुजाताला कळते की, तो दहशतवादी आहे. सूर्यकांत जेव्हा खिशातून पिस्तुल बाहेर काढतो तेव्हा सुजाता हादरूनच जाते. याचठिकाणी दुसरा दहशतवादीही येणार असल्याचे सूर्यकांत सांगतो. सुजाताचे घर आतंकवादी कारवाईचे ठिकाण म्हणून निवडले असून तिने आता केवळ गप्प रहायचे व या दोघांनाही मदत करायची असे ठरते; परंतु एका अनावधानाच्या क्षणी सुजाताला सूर्यकांतचे पिस्तुल मिळते व ती त्याला पिस्तुलाच्या सहाय्याने घराबाहेर काढते परंतु तितक्यात त्याचा मित्र येतो व तिचा हा डाव फसतो. सुजाताला दुसरा दहशतवादी पहिल्यापेक्षा कमी क्रुर वाटतो. त्यामुळे ती त्याला गुंडाळायचे ठरवते व आपण आपल्या पतीचा खून केलेला असून, जगातील सर्वात अभागी महिला आपण असल्याची ती बतावणी करते. तिच्या या भूलथापांना दुसरा दहशतवादी भुलतो व सूर्यकांतचा तिरस्कार करायला लागतो. इकडे सूर्यकांतला मात्र सुजाता आवडू लागते व तो तिला लग्नाची मागणी घालतो. मात्र त्यामुळे त्याचे व दुसऱ्या दहशतवाद्याचे भांडण होते. त्यात सूर्यकांतला गोळी लागते व तो मरतो. सुजाता शिताफीने दुसऱ्यालाही मारते व बक्षिसाची रक्कम, पत्रकारांना सर्व स्टोरी सांगण्याच्या तयारीला लागते. अशा आशयाचे हे नाटक होते. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन किरण लद्दे यांनी केले. नाटकात सोनाली साळुंके, जगदिश चव्हाण, सुमेध लोंढे, केदार नाईक, किशोरी सातभाई, विशाल बडगुजर यांनी भूमिका केल्या. नेपथ्य हर्षल परदेशी, जगदीश चव्हाण, प्रकाशयोजना किरण लद्दे, संगीत संयोजन अनिकेत मोहिते व रंगभूषा व वेशभूषा शीतल चव्हाण व कस्तुरी नाईक यांची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींच्या उन्नतीसाठी ‘मुक्त’ हस्ते मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुबलक पाऊस असला तरीही पाणी साठवण्याच्या असुविधांमुळे होणारे स्थलांतर, ही आदिवासी बांधवाची एक महत्त्वाची समस्या आहे. यासह आदिवासींच्या अनेक समस्यांचा पर्याय शोधत 'मुक्त विद्यापीठा'च्या 'कृषी विज्ञान केंद्रा'ने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

पेठसारख्या दुर्गम भागात शेतकरीवर्गास शेतीपूरक व्यवसाय उभारता यावा व त्यांची आर्थिक उन्नती साधली जावी, या हेतूने केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जातो आहे. या उपक्रमांतर्गत पेठ तालुक्यातील कायरे येथील शेतकऱ्यांना कुक्कूट पक्षांचे नुकतेच वाटप करण्यात आले. भात आणि नागलीचे पीक सोडले तर या पाड्यांच्या परिसरात वर्षभर काय करायचे असा प्रश्न कायम असतो. परिणामी होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण घटविण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचे विद्यापीठाचे मत आहे. या परिसरात सुमारे ४० शेतकऱ्यांना 'गिरीराजा' जातीच्या कोंबडीच्या पिलांचे वाटप करण्यात आले.

'शेतकऱ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीचे नवनवीन प्रयोग करायला हवेत', असे मत कृषी विज्ञान केंद्राचे शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे पशुसंवर्धन विशेषज्ञ डॉ. शाम कडूस यांनी वाटप केलेल्या कोंबडीच्या नव्या प्रजातीच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या संवाद मासिकाचे सहसंपादक संतोष साबळेही यावेळी उपस्थित होते.

पीक वाढीसाठी उपाययोजना

या परिसरात काजू आणि आंबा पिकांच्या उत्पादनात अडचणी आहेत. त्यावर मात करून या भागात शेतकऱ्यांसाठी लवकरच या पिकांच्या वाढीसाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. शिवाय प्रत्यक्षात उत्पादन मिळण्यासाठी विशेष भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे भात शेती, नागली तसेच कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारी भाजीपाला पिके घेण्यासाठी प्रात्याक्षिके दिली जाणार आहेत.

महिला सबलीकरणावर भर

शेतातील बहुतांश कामे महिला करतात हे लक्षात घेऊन, महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी विविध उपक्रमही विद्यापीठ राबविणार आहे. यात भात कापणीसाठी वैभव आणि लक्ष्मी विळे, तण नियंत्रणासाठी कोनो विडर व सायकल कोळपे, वांगी व भेंडी तोडताना हाताला होणाऱ्या इजा टाळण्यासाठी विशिष्ट हातमोजे व तोडणी यंत्र, तसेच भुईमुग फोडणी यंत्र येथील आदिवासी महिलांना पुरविण्यात आले. पावसाळ्यात भात शेतीमध्ये काम करताना खास डिझाईन केलेला रेनकोटही महिलांना केंद्रामार्फत लवकरच पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुग्ध व्यवसायात येण्यास आयटी तज्ज्ञ इच्छुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काळाच्या एका टप्प्यावर ऐन बहरात असलेल्या दूग्ध व्यवसयाला सुमारे दीड दशकापूर्वी उतरती कळा लागली. या व्यवसायात उतरंड दिसायला लागली. मात्र अल‌ीकडे काही कालावधीत आयटीसारख्या बुध्दीवादी प्रांतातील मनुष्यबळ दूग्धव्यवसायाकडे आकर्षित होत आहे. हा सकारात्मक बदल लक्षात घेऊन दूग्ध उत्पादन आणि नियोजनपूरक वितरण प्रणाली हा विषय दूग्ध उत्पादकांनी समजावून घ्यायला हवा, अशी अपेक्षा परभणी येथील पशू वैद्यकीय कॉलेजचे प्रा. डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केली.

ठक्कर डोम मैदानावर आयोजित कृषीथॉन प्रदर्शनातील 'आदर्श दूध उत्पादनाचे तंत्र' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात पुण्यातील दूग्ध व्यावसायिक अव्देय देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी पशु वैद्यकीय आयुक्त डॉ. झांबरे, चंद्रकांत दीक्षित, डॉ. वसंतराव ढिकले, संगमनेरच्या राजहंस दूग्ध संस्थेचे डॉ. गुंजाळ आदींनी सहभाग घेतला. योगेश पाटील आणि प्रकाश पाटील यांनी या चर्चासत्राचे नियोजन केले.

यावेळी बोलताना डॉ. नितीन मार्कंडेय यांनी दुधाळ जनावरे आणि त्यांच्या संगोपनाची पध्दती कशी चुकीची आहे, मुद्द्यावर बोट ठेवले. ते म्हणाले केवळ योग्य व्यवस्थापनाच्या अभावी या व्यवसायाकडे शेतकरी पाठ फिरवितात तर या व्यवसायाचे उज्ज्वल भवितव्य ओळखून आयटी क्षेत्रातील हुशार मनुष्यबळ याकडे आकर्षित होते, हा विरोधाभास लक्षात घ्यायला हवा, असे आवाहनही यावेळी डॉ. मार्कंडेय यांनी केले.

पंढरीनाथ थोरे म्हणाले, 'शेतकऱ्यांचे नैराश्य घालविण्याची क्षमता या व्यवसायात आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढीला लागल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी सामूहिकर‌ित्या हा व्यवसाय केल्यास त्यांच्या आर्थिक अडचणींवर तोडगा निघणे शक्य आहे. शासनानेही दुधाला देण्यात येणाऱ्या दरांचा विचार करावा, असे आवाहन यावेळी थोरे यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. ढिकले यांनी दूग्ध व्यवसायातील आव्हाने मांडली. तर डॉ. गुंजाळ यांनी या व्यवसायातील यशोगाथा मांडली. यावेळी शहर व जिल्ह्यातून दूग्ध व्यावसायिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचालकांचा जीव टांगणीला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रस्त्यावरून वाहन चालवतांना वारंवार येणारे खड्डे, खड्डे टाळून पुढे जायचे म्हटले तर मध्येच उंचवटे, अनावश्यक गतिरोधक, बेशिस्त वाहतूक तर अगदी डांबरीकरणाऐवजी मातीच्या रस्त्यावर चालताना धूळ आणि प्रदूषणातून वाट काढीत करवा लागणारा प्रवास असा अनुभव सध्या मालेगाव शहराच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत आहे.

मालेगाव मनपा हद्दीतील सर्वच रस्त्यांची दुरवस्था नव्हे तर अक्षरशः चाळणी झाली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत असताना किमान चांगले रस्ते सुद्धा मालेगावकरांच्या नशिबात नाहीत. अत्यंत धोकादायक झालेल्या रस्त्यांवर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. शहरातील जवळपास सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. मालेगाव शहरात येणारे दरेगाव, नवास्टँड, गिरणा पूल, मोसम पूल, टेहरे चौफुली ते मोसम पूल, जुने आरटीओ ऑफिस ते मोसमपूल या भागात ये-जा करणाऱ्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत

रस्त्यांवर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी तर एक किमीपेक्षाही जास्त अंतराच्या रस्त्यांची चाळणी झाली आहे.

शहारांतर्गत भूमिगत गटारी, तारा, पाइपलाइनसाठी वारंवार रस्त्यांचे खोदकाम केल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरी वस्तीतील रस्त्यांवर तर ज्याला वाटेल त्याने गतिरोधक टाकले असल्याने अपघात टळण्यापेक्षा अपघात होण्याचेच प्रकार वाढले आहेत. शहरातील रस्त्यांची इतकी भयावह अवस्था झालेली असताना मालेगाव मनपाकडून मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीचे कोणतेही काम हाती घेण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे सुजाण नागरिक, माध्यमे यांच्यामकडून ओरड, तक्रारी झाल्यास मालेगाव मनपाचे अजब कारभारी सरळ मातीचे ढीगच्या ढीग या खराब झालेल्या रस्त्यांवर टाकून एक प्रकारे भ्रष्ट आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवरच माती ढकलीत असल्याचा प्रकार वारंवार होत आहे. शहरातील रस्ते धुळीचे आणि मातीने आच्छादित झाले असून, रस्त्यावरून वाहन चालवताना दुर्गम भागातील रस्त्यांसारखा अनुभव येत आहे.

सर्वाधिक दुरवस्था दरेगाव ते नवे स्टँड या मुख्य रस्त्याची झाली आहे. या रस्त्यालगत फराण हॉस्पिटल, अनेक व्यापारी संकुल आणि मुस्लिम बहुल वस्ती असल्याने या मार्गावरून शहराबाहेर व आत येणारी वाहनचालकांची चांगलीच कसरत करावी लागत आहेे. धुळे, जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद, भुसावळ, चोपडा या शहराकडे जाणारी एस टी वाहतूक देखील याच मार्गाने होत असल्याने एसटी चालक व इतर खासगी वाहनचालक यांना या खराब रस्त्यावरून प्रवास करताना वादाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते

आहे. शहरातील रस्त्यांच्या या दुरवस्थेबाबत मात्र एकही नगरसेवक व लोकप्रतिनिधी दखल घ्यायला तयार नाही. मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे सध्या मालेगावकरांचा शहरातील प्रवास देखील सुखकर राहिला नसून, जीव मुठीत धरूनच मालेगावकर वाट लागेल्या रस्त्यांवरून प्रवास करीत आहेत.

वाढत्या बेशिस्तीमुळे हैराण

मालेगाव मनपाची हद्दवाढ झाल्याने दिवसेंदिवस शहरात येणारी वाहतूक वाढत आहे. या वाहतुकीला कोणतीही शिस्त नसल्याने शहरात जागोजागी अवैध वाहतूक थांबे, रिक्षा स्टॉप, पार्किंग झाले आहेत. त्यातच रस्ते खड्डेमय झालेले असल्याने अशा अवघड रस्त्यावरून वाट काढताना अनेकवेळा अपघाताचे प्रसंग शहरात घडत असून, त्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावंत बंधूंना अल्बानियात जागतिक पारितोषिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

युरोपातील अल्बानिया देशाच्या तिराना या राजधानीत कल्चरल मिनिस्ट्री ऑफ अल्बानिया, इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी ऑफ अल्बानिया तसेच वीझ आर्ट इंटरनॅशनल वॉटर कलर बीनाले यांच्यातर्फे झालेल्या वर्कशॉपमध्ये चित्रकार राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत यांना 'बेस्ट डेमॉन्स्ट्रेशन ऑफ दि शो' या इंटरनॅशनल अॅवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 'इस्माईल लुलानी' हे जागतिक सन्मान मेडल व प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले.

विशेष निमंत्रणावरुन नाशिकचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सावंत बंधू यांनी हा दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. या आंतरराष्ट्रीय बीनालेत जागतिक विविध देशातील ८ चित्रकारांना जागतिक वॉटर कलर वर्कशॉपसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक चित्रकार म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या सर्व आठ तज्ज्ञ मार्गदर्शक चित्रकारांसह स्थानिक चित्रकारांनी या ठिकाणी आपआपल्या शैलीत प्रत्यक्ष जलरंग चित्र निर्मिती करुन विविध चर्चासत्रात सखोल मार्गदर्शन करुन कला सादर केली. यात जर्मनी, इटली, युक्रेन, भारत, फ्रान्स, यु.के., तुर्की, कॅनडा व अल्बानियातील चित्रकार सहभागी झाले होते.

या सर्वांनी लाईव्ह चितारलेल्या सर्व चित्रांचे परीक्षणही यावेळी जागतिक परीक्षक मंडळाकडून करण्यात आले. यात समोरील तज्ज्ञ मार्गदर्शकाची चित्रकलेसोबत जलरंग माध्यमावरील सखोल अभ्यास, प्रयोगशीलता, स्वत:ची अशी नाविन्यपूर्ण चित्रशैली, कला अध्यापनाची पध्दत व त्याचे जागतिक पातळीवरील आजपर्यंतचे योगदान इ. बाबींचेही निरीक्षण, परीक्षण मंडळाने केले.

या जागतिक पारितोषिक प्राप्त डेमॉन्स्ट्रेशनमध्ये चित्रकार राजेश सावंत यांच्या घोड्यातील क्रिएटिव्ह प्रकारातील भावस्पर्शी चित्रण त्यांच्या परिचित चित्रशैलीत जलरंग माध्यमात तासाभरात साकारले. रंग, आकार, रेषांची मनमोहक रंगसंगती, उष्ण व शीतरंग संगतीचा प्रयोगशील मिलाफ तसेच रंगलेपन पध्दतीच्या नाविन्यपूर्ण वापराने रसिकांसह परीक्षकांची मने जिंकली.

चित्रकार प्रफुल्ल सावंत यांचे जागतिक पारितोषिक प्राप्त डेमॉन्स्ट्रेशन हे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील निसर्ग दृश्याचे होते. जागतिक बीनालेत ५८ देशातील २१० चित्रकारांची जलरंगातील चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. या चित्र प्रदर्शनात चित्रकार सावंत बंधूंची ६ चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. त्यातील चित्रकार राजेश सावंत यांचे 'कॅम्पेनियन' तर चित्रकार प्रफुल्ल सावंत यांचे 'लेन ऍट बनारस' या जलरंगातील चित्रे अल्बानियाच्या शासकीय नॅशनल हिस्टोरिकल म्युझियममध्ये कायमस्वरुपी संग्रहित झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावला मिळाले पहिले आवर्तन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावातील पाणीसाठा अवघे दोन दिवस पुरेल इतका शिल्लक राहिला होता. ही बाब लक्षात घेऊन मालेगाव महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी चणकापूर धरणातून मालेगावसाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी ८०० क्युसेक पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे मंगळवारी (१ डिसेंबर) हे पाणी तलावात पोहचले असून, साधारण तलावाच्या पाणीसाठ्यात १० फुटाने वाढ झाली आहे.

धरणातील उपयुक्त दोन हजार ४०५ दलघफू पाणीसाठ्यापैकी मालेगावसाठीच्या पहिल्या आवर्तनात ३७० दलघफू पाणी सोडले जाईल. या आवर्तनाचा फायदा गिरणा नदीकाठावरील १२ गाव पाणीपुरवठा योजनेसह अनेक पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. सध्या ८०० क्युसेकने पाणी सोडले जात असून, ते ३५० क्युसेकवर नियंत्रित करण्यात केले जाईल. तळवाडे साठवण तलावात ४२ दलघफू पाणीसाठा होईपर्यंत डावा कालवा सुरू ठेवण्यात येणार आहे. शहराचा पाणीप्रश्न गंभीर झालेला असताना चणकापूर धरणातील पाण्याचे पहिले आवर्तन मालेगावकरांना दिलासा देणारे आहे.

हरणबारीतून पाणी सोडण्याची मागणी

यंदा पावसाने ओढ दिल्याने मोसम नदीकाठावरील गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे चणकापूरप्रमाणे हरणबारी धरणातून देखील पहिले आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी जोर धरते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गसंवर्धन मोहिमांचे ‘रामशेज दुर्ग दर्शन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील दुर्गसंवर्धन कार्य करणाऱ्या सर्व दुर्गसंवर्धन मोहिमांची एकत्रित 'किल्ले रामशेज दर्शन' मोहीम रविवारी (६ डिसेंबर) होणार आहे. यावेळी रामशेज किल्ल्यावर होणाऱ्या संयुक्त बैठकीत नियोजित १५ डिसेंबर रोजी नाशिकला होणाऱ्या 'किल्ले वाचवा' या आंदोलनाची तयारी केली जाणार आहे.

दुर्गपंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. ६८हून अधिक गडकोट या भूमीवर आहेत. नाशिकच्या दुर्गांचा इतिहास आणि शूर किल्लेदारांचे बलिदान या संदर्भात जिल्ह्यात अधिक व्यापक माहिती व्हावी, नाशिकच्या किल्ल्यांची झालेली आत्यंतिक दैना दूर व्हावी यासाठी गावोगावी, किल्ले पायथ्याशी वस्तीत, शाळा महाविद्यालयात अधिक जागृतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. किल्ले संवर्धनासाठी शासन, स्थानिक लोकप्रतिनिधींनी अधिक निधी द्यावा, दुर्गसंवर्धन कार्यासाठी नाशिकला संपर्क कार्यालय व्हावे यासाठी अधिक व्यापकपणे प्रयत्न केले जाणार आहे.

या प्रसंगी दुर्गसंवर्धक मोहिमांनी रामशेज दर्शन मोहिमेत सहभागी होण्यासाठी शिवकार्य गडकोट मोहिमेचे संयोजक योगेश कापसे, सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हा संपर्कप्रमुख अजिंक्य महाले यांच्याकडे नावे नोंदवावीत असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images