Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्मार्ट सिटी प्रस्तावाची पुनर्मांडणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने स्मार्ट सिटी प्रस्तावातील करवाढीला विरोध केल्याने प्रशासनावर प्रस्तावाची पुनर्मांडणी करण्याची वेळ आली आहे. करवाढ रद्द केल्यामुळे स्मार्ट सिटी प्रस्तावाचे गुणांकन कमी होवू नये, म्हणून पर्यायी स्रोतांवर आयुक्तांनी भर देत प्रस्तावाची फेरमांडणी गुरूवारी सुरू केली. प्रस्तावात अनेक बदल करीत उत्पन्नाच्या पर्यायी स्रोतांचा समावेश करून गुणांकन वाढवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू होती. प्रस्तावाची पुर्नमांडणी करावयाची असल्याने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आता शनिवारी (दि. ५) दाखल केला जाणार आहे.

बुधवारच्या महासभेत आयुक्तांनी सादर केलेल्या स्मार्ट सिटी प्रस्तावातील अनेक मुद्यांवर कात्री लावण्यात आली आहे. करवाढ फेटाळत, एसपीव्ही कंपनीवरही आक्षेप घेतला आहे. करवाढीचे गुणांकन असल्याने आणि नेमका हाच मुद्दा फेटाळला गेल्याने गुरूवारी प्रशासनाच्या वतीने प्रस्तावाची पुर्नमांडणी करण्याचे काम सुरू करण्यात आले. करवाढ फेटाळल्याने पर्याची उत्पन्नाचे स्रोत व त्याची आवके संदर्भातील माहिती या प्रस्तावात नव्याने नमूद करण्याचे काम हाती घेतली आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेवून नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

सचिवांकडून मुदतवाढ

नगरसेवकांनी करवाढीसंदर्भात सुचविलेल्या पर्यायांचा अंतर्भाव करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे प्रस्ताव सादर करण्याची ३ डिसेंबरची मुदत आता उलटली आहे. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव १५ डिसेंबरला सादर करावयाचा आहे. त्यामुळे आयुक्तांनी सचिवांकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. सचिवांनी महापालिकेला ५ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली असून येत्या शनिवारीच हा प्रस्ताव नव्याने सादर केला जाणार आहे. या प्रस्तावाकडे नाशिककरांचे लक्ष लागलेले आहे.

आयुक्तांच्या मेहनतीवर पाणी

सहा महिन्यांपासून आयुक्त व महापालिकच्या अधिकाऱ्यांनी दिवसरात्र करत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र महासभेने त्यात खोडा घालत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि भाजपला पुर्नज्जीवन मिळू द्यायचे नाही म्हणून प्रस्तावातील अनेक बाबीवर आक्षेप घेतला. त्यामुळे प्रशासनावर पूर्ण प्रस्ताव बदलण्याची वेळ आल्याने मेहनतीवर पाणी फिरले आहे. गुरूवारी प्रस्तावात फेरबदल करून तो नव्याने सादर करण्याची सर्कस आयुक्तांसह अधिकाऱ्यांना करावी लागली. प्रशासनाच्या एवढ्या मेहनतीनंतरही स्मार्ट सिटीतल्या समावेशाबद्दल आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केएनडी मंडळाचे पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील के. एन. डी. बहुउद्देशीय मंडळातर्फे महाराष्ट्र स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्कारामध्ये क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्यांचा समावेश आह.े रविवारी (६ डिसेंबर) सकाळी अकरा वाजता पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग या खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणारे बॉक्सर व भारताच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणारे मनोज पिंगळे याना निमंत्रित करण्यात आले आहे.

डॉ. बलवंतसिंग (क्रीडा), डॉ. नितीन नेहेते (वैद्यकीय), डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन (आंतरराष्ट्रीय सायकलपटू), डॉ. पांडुरंग रानमाळ (क्रीडा संघटक), संतोष अस्वर (मैदानी खेळ), समीर आंब्रे (क्रीडा), अनुज सिंग (अर्किटेक्ट), डॉ. श्रद्धा भोमे (पुस्तक प्रकाशन), डॉ. शंकू कुमार सिंग (योगा), डॉ. सुभाष देसाई (सी.ए.), डॉ. भास्कर साळवी (पीएच.डी. गाईड), निलेश बनसोड (क्रीडा), डॉ. संजयकुमार पाल (संस्था चालक), प्रा. संतोष राणे (पुस्तक प्रकाशक), डॉ. वनश्री वेलचा (उच्च अधिकारी), अविनाश दुधाणे (सूर्य नमस्कार) यांचा समावेश आहे.

याचबरोबर छत्रपती पुरस्कार डॉ. उदय डोंगरे, औरंगाबाद, (तलवारबाजी मार्गदर्शक), प्रकाश काटोळे, सोलापूर (तलवारबाजी संघटक), शेषनारायण लोढे, बुलढाणा (क्रीडा संघटक) आणि बळवंत निकुंभ, नंदुरबार (क्रीडा संघटक) यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. तसेच तलवारबाजीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या करण गुज्जर व त्याचे प्रशिक्षक अश्विनी कुमार, दीपक कुमार यांनाही या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोला मिळणार आधुनिक क्रीडांगण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक ४२ मध्ये गुरूवारी तीन कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या अत्याधुनिक क्र‌ीडांगणाच्या कामाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व महापौर अशोक मुर्तडक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. दीड एकर जागेवर जागेवर सुसज्ज क्रीडांगणासोबतच जॉगिग ट्रॅकचीही सुविधा सिडकोवासियांना उपलब्ध होणार आहे.

महापालिकचा स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी विशेष निधीतून तीन कोटी मंजूर करून घेत जुन्या एसटीपी सेंटर येथील जागेत हे क्रीडांगण मंजूर करून घेतले आहे.

सिडको परिसरात अशा प्रकारचे क्रीडांगणाची सुविधा नव्हती. त्यामुळे चुंभळे यांनी पाठपुरावा करून हे क्रीडांगण मंजूर करून घेतले आहे. दीड एकर जागेत क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅक व अद्ययावत उद्यानाचा या प्रकल्पामुळे नवीन नाशिकच सोय होणार असून या प्रकल्पामुळे नाशिक स्मार्ट होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या कालावधीनंतर तुलनेने मंदावलेले वाहनचोरीचे सत्र शहरात पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. शहरातील विविध भागांमधून गुरूवारी दोन मोटारसायकलसह तीन लाख रुपये किमतीचा एक मालट्रक चोरीस गेला आहे.

सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीत माहिती आयोगाच्या कार्यालयासमोरून हिरो होंडा कंपनीची पॅशन गाडी, गंगापूर पोलिसांच्या हद्दीतील कॉलेजरोडवर श्रध्दामॉल येथील रिबॉक शो रूम समोरून हिरो कंपनीची करिझ्मा तर भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील व्दारकेनजीक उड्डाणपुलाच्या खालून टाटा एलपीटी कंपनीचा मालट्रक एमएच ०४ ईएल २९८० हा चोरीस गेला आहे. वाहनचोरीच्या या वाढत्या घटनांमुळे नागरीक हैराण झाले आहे.

रिक्षामध्ये प्रवाशास लुटले

नाशिक : रात्रीच्या वेळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशास शेजारी बसलेल्या चोरट्याने लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली. रात्री ११ वाजेच्या सुमारास रविवार कारंजा परिसरातून एक प्रवासी द्वारका येथे जाणाऱ्या रिक्षामध्ये बसले असता रिक्षा काही अंतरावर गेली असताना मागील सीटवर बसलेल्या सहप्रवाशाने एकास लुटून त्याच्या जवळील २१ हजार रुपयांचा मोबाइल व पैसे लुटले.

घरफोडीच्या घटनांमध्येही भर

नाशिक : शहरातील विविध भागात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. बोधलेनगर परिसरातील श्रीकृष्ण लॉन्स नजीक एका घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी शिरकाव करीत घरातील ४ तोळे ९ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डीफाटा परिसरात घरफोडी

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील मुरलीधर नगर परिसरातील वनश्री सोसायटीमध्ये एक बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला. या घटनेत त्यांनी सुमारे ९० हजार रुपयांचे सोने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागात सर्वोत्तम सेवा पुरविणार

$
0
0

महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या (एमओए) अध्यक्षपदी नाशिकचे डॉ. राजेशचंद्र कनोजीया यांची नुकतीच निवड झाली. यानिमित्त ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि असोसिएशनच्या उद्देशांबद्दल आणि सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद...

'एमओए'चा उद्देश काय आहे?

डॉक्टरांच्या अनेक असोसिएशन आहेत. प्रत्येक शाखेप्रमाणे त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. एमओए म्हणजे महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनही इतर डॉक्टर असोसिएशन सारखीच आहे. ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्या मदतीसाठी त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आणि अडचणीच्या काळात कायद्यापासून सर्वप्रकारच्या मदतीसाठी ही असोशिएशन काम करते. ऑर्थोपेडिक डॉक्टरांमध्ये आपसात सहकार्य वाढावे व त्याचा लाभ पेशंटला व्हावा हा देखील असोशिएशनचा उद्देश आहे.

एमओएचे ध्येय काय आहेत व असतील?

ऑर्थोपेडिक डॉक्टरांना एकत्रित ठेवणे अन् त्यांच्या विकासासाठी काम करणे हे असोशिएशनचे ध्येय आहे. पण हे ध्येय आता पुरेसे नाही. ध्येय काळानुसार ते बदलले अथवा वाढले पाहिजेत. मूळ ध्येय अधिक मजबूत करण्यासाठी ऑर्थोपेडिक डॉक्टरांना संघटना किती आणि कशासाठी महत्त्वाची वाटते हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना संघटनेकडून आधार आणि काम करताना बळ मिळत असेल तर असोसिएशनचे सभासद आपोआप वाढतात ते वाढविण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे जगभरात ऑर्थोपेडिक क्षेत्रात होत असलेले बदल आणि नॉलेज असोशिएशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आणता आले तर दोघांनाही त्याचा फायदा होईल. विशेषत: पेशंटचा अधिक फायदा होईल. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे.

ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे नॉलेज अपडेट कसे करणार?

ऑर्थोपेडिक क्षेत्रात जगभरात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असते. प्रत्येकाला यात सहभागी होण्याची संधी मिळतेचा असे नाही. प्रामुख्याने ग्रामीण अथवा मागास भागातील डॉक्टरांना अशा संधींसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मात्र एमओए आपल्या सदस्यांना दरवर्षी फेलोशिपच्या माध्यमातून अशा संशोधनासाठी प्रोत्साहन देते. त्यामुळे त्यांचा आपल्या क्षेत्राकडे पाहण्याचा व्ह्यू बदलतो अन् याचा फायदा समाजाला होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ तज्ज्ञ, विदेशातील काही तज्ज्ञ असोसिएशनच्या माध्यमातून सेम‌निारसाठी आपल्या शहरांमध्ये बोलविले जातात व त्यांच्या मार्गदर्शनाची सोय ऑर्थोपेडिक डॉक्टरांना उपलब्ध करून दिली जाते. तसेच या क्षेत्रातील संशोधनावर शोधनिबंध मागवून डॉक्टरांना प्रत्यक्ष सहभागी केले जाते. यातून नॉलेज अपडेट ठेवणे अधिक सोपे होते. यासाठी संघटना जाण‌ीवपूर्वक प्रयत्न करणार आहे.

'एमओए'ला समाजभिमुख कसे करता येईल?

डॉक्टर-रुग्णांचा संवाद खुंटतोय याला अनेक कारणे जबाबदार आहेत. मात्र दोघांना हा संवाद सुरळीत व्हावा असे वाटत आहे हेही सकारात्मक आहे. त्यामुळे ऑर्थोपेडिक असोसिएशन समाजभिमुख करण्याचा प्रयत्न करणार आहे. आरोग्य क्षेत्र महागडे होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात संघटनेच्या माध्यमातून चांगल्या डॉक्टरांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. जेणे करून तज्ज्ञ डॉक्टरांची अल्पदरात ग्रामीण व मागास भागातील पेशंटला सेवा मिळू शकेल. पेशंटना ती परवडत नाही त्यावर काय उपाय करता येतील याबात प्रयत्न सुरू आहेत.

आरोग्य सेवा स्वस्त होतील का?

डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यांमध्ये संवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. मात्र आरोग्य सेवा महागड्या होत असल्यानेही यावर परिणाम झालेला दिसतो. वैद्यकीय साधनांचा वाढता खर्च व औषधांच्या वाढत्या खर्चामुळे आरोग्य सेवा स्वस्त कशा करता येतील हा मोठा जटील प्रश्न आहे. मात्र ऑर्थोपेडिक असोसिएशनमधील सर्व सदस्य सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करीत असतात. ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी पेशंटला चांगल्या सुविधा अल्पदरात द्याव्यात अशी अपेक्षा नक्कीच आहे मात्र त्यांच्या अनेक समस्यांकडेही दुर्लक्ष व्हायला नको यासाठीही संघटना प्रयत्न करेल.

ऑर्थोपेडिक डॉक्टरांपुढील आव्हाने?

असोसिएशन आपल्यापरीने शासनाच्या पातळीवर आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अग्न‌शिमन, बायोवेस्ट या समस्यांमुळे डॉक्टरांची पिळवणूक सुरू आहे. याबाबत ठोस विचार व्हायला हवा. बायोवेस्टबाबत वजनाप्रमाणे कचऱ्यावर कर आकारला पाहिजे मात्र हॉस्प‌टिलमधील बेडप्रमाणे बायोवेस्टचा कर आकारला जात असल्याने रिकाम्या बेडवरही कर भरावा लागतो. अशा प्रश्नांवर संघटना काम करीत आहेत. डॉक्टरांना देशविदेशातून घ्याव्या लागणाऱ्या साधनांबाबतही हेल्पडेस्क आणि सपोर्टसिस्ट‌मिची गरज आहे. ही कशी उभी करता येईल, यावरही एमओएच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

(शब्दांकन : रमेश पडवळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदीप देशपांडे यांची तडकाफडकी बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सीआयडीचे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षकपदावर अचानक बदली झाली आहे. यापूर्वी त्यांनी नंदुरबार, धुळे, पुणे या शहरांमध्येही त्यांनी विविध पदांवर काम पाहिले आहे.

दरम्यान, जळगावातील पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या बहुचर्चित आत्महत्या प्रकरणाचा तपास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. सादरे यांनी नाशिकमधील निवासस्थानी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना देशपांडे यांच्या झालेल्या बदलीमुळे पोलिसांच्या चर्चेस गुरूवारी उधाण आले. दरम्यान, देशपांडे यांच्या जागी विनिता साहू यांची नाशिक सीआयडी पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मूळ मध्य प्रदेशातील असलेल्या साहू या २०१० च्या बॅचच्या 'आयपीएस' आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत बहरला रुद्राक्ष वृक्ष

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

देवळालीच्या थंड वातावरण अनेक वृक्षाच्या प्रजाती वाढीस पोषक ठरत आहे. त्यामध्ये देवळालीच्या माजी सनदी अधिकारी भाऊसाहेब धिवरे यांच्या घराच्या अंगणात चक्क पवित्र मानल्या जाणाऱ्या रुद्राक्ष वृक्षाला हजारो रुद्राक्ष फळे लागली आहे.

धिवरे हे स्वतः वृक्षप्रेमी कुटुंब असल्याने त्यांच्या बगिच्यात आणि अंगणात अनेक आयुर्वेद वनस्पती आहेत. यामध्ये तेजपान, अडुळसा यासारख्या औषधी झाडांचा समावेश आहे. सन २००६ साली सहजच म्हणून विकत घेतलेल्या रुद्राक्ष झाड योग्य निगा राखल्याने आता २५ फुटापर्यंत वाढले आहे. या झाडाला वर्षातून किमान २ वेळा रुद्राक्षाची फळे येत आहेत. प्रामुख्याने नेपाळ व उत्तर भारतात आढळणारे झाड देवळालीच्या थंड हवामानामध्ये लिलया वाढले. चतुर्मुखी रुद्राक्षाचे हे झाड धर्म, अर्थ, मोक्ष प्रदान करणारे असून घरामध्ये आनंद निर्मिती करण्यासाठी ते सहाय्यक ठरत असल्याचे धिवरे कुटुंबीय सांगतात. झाडाला येणारे रुद्राक्ष परिसरातील अनेक शिवभक्त घेऊन जातात. त्यामुळे त्यांचाही फायदा होतो. रक्तदाबावर अतिशय उपयुक्त असलेले रुद्राक्ष फळ घेण्यासाठी बऱ्याचदा अनेक रुग्ण धिवरे यांच्याकडे येतात.

रुद्राक्ष झाडाचे फायदे

पवित्र मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षाची निर्मिती ही भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली असल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी या झाडाचा उपयोग होत असतो. सदाहरित प्रदेशातच या 'रुद्राक्ष' वनस्पतीची वाढ होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान या झाडाला फळे (रुद्राक्ष) येतात.

आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना या झाडाचे रुद्राक्ष भेट म्हणून देतो. त्यामुळे अनोखी भेट दिल्याचा आनंदही आम्हाला मिळतो.

- भाऊसाहेब धिवरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिलिटरी स्कूल शिक्षक परीक्षा आजपासून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाईन स्वरुपात असलेली ही परीक्षा सकाळी ९.३० ते १२.३० व २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांमध्ये होणार आहेत. एकूण ६१६ परीक्षार्थी यावेळी परीक्षा देणार आहेत. यासाठी परिक्षार्थींनी कागदपत्र तपासणी, बायोमेट्रिक ओळखपत्र तसेच उमेदवाराचे कॉम्प्युटराईज्ड फोटोसोबत आणायचे आहेत. आर्मी वेल्फफेअर एज्युकेशन सोसायटीचे भारतात एकूण १३५ आर्मी पब्लिक स्कूल आहेत. त्यापैकी २४९ प्री-प्रायमरी स्कूल आहेत. या शाळांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात तर ५ हजार विद्यार्थ्यांचा दरवर्षी प्रवेश होतो. या संस्थेत कार्य करण्याची संधी शिक्षकांना या परिक्षेद्वारे मिळू शकणार आहे.
परीक्षेसाठी उत्तम तांत्रिक सुविधा व गैरप्रकार रोखण्यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. पॉलिटेक्निकचे प्राचार्य मनोज बुरड, उपप्राचार्य सागर पाटील, पंकज महाले, यज्ञेश घमंडी हे परीक्षेसाठी तांत्रिक सहाय्य करणार
आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डब्ल्यूटीओ' विरोधात आज आंदोलन

$
0
0

डब्ल्यूटीओ' विरोधात आज आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येत्या १३ डिसेंबरला नैरोबी येथे आयोजित जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य देशांच्या बैठकीत भारत सरकार उच्च शिक्षणाबाबतीतील करारावर सही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा करार झाल्यास भारतातील उच्च शिक्षण महागाईच्या गर्तेत जाण्याची तसेच परदेशी शिक्षण घेण्याची नाहक वेळही भारतीय विद्यार्थ्यांवर येण्याची भीती आहे. त्यामुळे असा करार करू नये, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
मागील सहा महिन्यांपासून अखिल भारत शिक्षण अधिकार मंच या संघटनेतर्फे देशभर आंदोलन व जनजागृती मोहिम राबविली जात आहे. तसेच ५ ते १३ डिसेंबर या काळात दिल्लीतही धरणे आंदोलन केले जाणार आहे. देशातील विविध संस्था, संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच ही मोहिम राबवित आहे. जिल्हाधिकार्यांना याबाबत निवेदनही दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉगिंग ट्रॅकला फुटले पाय!

$
0
0

सातपूर परिसरात विविध भागातून वास्तव्यासाठी नागरिक आले. यामध्ये बहुतांश कर्मचारी वर्ग आहे. महापालिकेला सर्वाधिक कररुपी उत्पन्न देणाऱ्या सातपूरची नागरी सुविधा मिळण्याबाबत सुरू असलेली उपेक्षा अद्याप थांबू शकलेली नाही. सातपूर विभागात एमआयडीसीतील क्लब हाऊस वगळता अन्यत्र मोठा जॉगिंग ट्रॅकच नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी असलेल्या नागरिकांना जॉगिंगसाठी थेट रस्त्यावरच उतरावे लागते. यात अनेकदा रस्त्यावर जॉ‌गिंग करतांना भरधाव येणाऱ्या वाहनांचा देखील धोका पत्करावा लागतो.

जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था कामगारनगर भागात असलेल्या कॅनल रोड, राज्य कर्मचारी वसाहत अशोकनगर व सातपूर कॉलनीमधील मीनाताई ठाकरे उद्यान याठिकाणी महापालिकेने जॉगिंग ट्रॅक उभारले आहेत. यामध्ये सातपूर क्लब हाऊसच्या जॉगिंग ट्रॅक असमतोल असल्याने त्यावर चालतांना कसरत करावी लागते. तर कामगार नगरच्या जॉगिंग ट्रॅकवर माती उडत असल्याने आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळेस पाणी मारण्याची मागणी व्यायामपटूंनी केली आहे. अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीत असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर मुलांची खेळण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे पायी चालतांना वाट शोधावी लागते. सातपूर कॉलनीतील मीनाताई ठाकरे उद्यानातील जॉगिंग ट्रॅक रोजच टवाळखोरांचा अड्डा भरलेला असतो. जॉगिंग ट्रॅकला बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यात टवाळखोरांनी गायब केल्या आहेत.

पेव्हर ब्लॉकही गायब नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी लाखो रुपये खर्च करीत सातपूर पोलिस स्टेशनला लागून एक किलोमिटरचा जॉगिंग ट्रॅक उभारला होता. मात्र, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा जॉगिंग ट्रॅकच जागेवरून गायब झाला आहे. आता केवळ जाळ्या उरल्या आहेत. तसेच ट्रॅकवरील पेव्हर ब्लॉक देखील गायब झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी निधी येणार कुठून?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी २०० कोटींचा विशेष निधी मंजूर करण्याची तयारी सोमवारच्या (दि. ७) महासभेत सुरू केली आहे. नगरसेवकांना शांत करण्यासाठी हा प्रयत्न असला तरी निधी कुठून येणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

चालू वर्षाचे आर्थिक उत्पन्न १४३७ कोटी अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात ९२६ कोटीच पदरात पडणार असल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळणार आहे. सहाशे कोटी महसूली खर्च तर ३०० कोटींचा स्पीलओव्हर असून २०० कोटींचे देयके अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे रस्त्यांचा निधी हा गाजरच ठरण्याची शक्यता दिसत आहे.

गेल्या साडे तीन वर्षांपासून प्रभागातील कामे होत नसल्याची नगरसेवकांची ओरड आहे. सिंहस्थात शहरात रस्त्यांची कामे झाले असली तरी अतंर्गत रस्त्यांची समस्या कायम आहे. शहरातील अतंर्गत कॉलनी रस्त्यांची अवस्था खराब आहे. खडीकरण व डांबरीकरण होत नसल्याने नगरसेवकांची अडचण वाढली आहे. महापालिका निवडणूक समोर असल्याने या रोषात भर पडण्याच्या धास्तीपोटी सत्ताधाऱ्यांनी अंतर्गत रस्ते व कॉलनी रस्त्यांसाठी २०० ते २५० कोटींचा निधी देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी येत्या सोमवारी महासभा होणार असून त्यात या विषयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

सत्ताधाऱ्यांनी २०० कोटी देण्याची तयारी दर्शवली असली तरी हा निधी येणार कुठून असा प्रश्न उपस्थित केला आहे. जकातीपाठोपाठ एलबीटीही हद्दपार होणार असल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे. चालू वर्षाचे आर्थिक बजेट हे १४३७ कोटी असले तरी मार्चअखेर तिजोरीत ९२६ कोटीच जमा होण्याची शक्यता आहे. या उत्पन्नात खर्चाचा मेळ कसा घालावा असा यक्षप्रश्न प्रशासनापुढे आहे. ९२६ कोटीतून सुमारे ५७५ कोटी रुपये हा महसूली खर्च राहणार आहे. तर सिंहस्थातील रस्ते, कर्जाचा हफ्ता, जेएनयूआरएमचा हफ्ता, चालू विकासकामे, दलित व महिलांसाठी राखीव निधी यासाठी जवळपास ३०२ कोटी रुपये लागणार आहे. तर सिंहस्थाची उर्वरित बिले देण्यासाठी अजून १८१ कोटीची गरज आहे. त्यामुळे उर्वरित कामांसाठी तिजोरीत पूर्ण खळखळाट आहे. सध्याची विकासकामासाठी निधी कुठून आणायचा हा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

कामासाठी वर्षभराची प्रतीक्षा

महासभेने २०० कोटींचा प्रस्ताव पारीत केला तर त्यासाठी हा निधी येणार कुठून असा प्रश्न उभा राहिला आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ पाहता चालू वर्षाच्या निधीतून ही कामे करणे सध्या तरी शक्य दिसत नाही. हा निधी पुढील वर्षाच्या बजेटमध्ये धरावा लागणार असल्याने नगरसेवकांसाठी हे तात्पुरते गाजरच ठरणार आहे. त्यामुळे प्रस्ताव पारित झाला तरी त्याची कामे ही सन २०१६ मध्येच होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूची तीव्रता घटली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीत सप्टेंबर व ऑक्टोबरच्या तुलनेत डेंग्यू व स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. डिसेंबरच्या चालू आठवड्यात शहराच्या हद्दीत डेंग्यूचे केवळ दोनच रुग्ण आढळले असून नोव्हेंबरमध्ये रुग्णांची संख्या रोडावली आहे. दरम्यान, जानेवारीपासून आतापर्यंत शहराच्या हद्दीत ३३५ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात शहरात डेंग्यूचा उद्रेक झाला होता. ऑक्टोबर महिन्यात शहराच्या हद्दीत १०४ डेंग्यूचे पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये मात्र रुग्णांची संख्या कमी झाली आहे. नोव्हेंबरमध्ये १५७ संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ७७ रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले. यात शहराच्या हद्दीतील ६० रुग्ण होते. त्यामुळे ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या निम्म्यावर आल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे. डिसेंबरच्या चालू आठवड्यात १३ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी केवळ २ जणांनाच डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकातील फलक फाडले

$
0
0

बिटको चौक ते देवळालीगावातील महात्मा गांधी पुतळा दरम्यान रस्ता दुभाजकाचे सुशोभीकरणाचे काम महापालिकेत ठरावाद्वारे एका बांधकाम कंपनीला मिळाले आहे. तर शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा दरम्यानच्या दुभाजकाच्या सुशोभीकरणाचे काम एका खासगी शैक्षणीक संस्थेला देण्यात आले आहे. बिटको चौक ते देवळालीगावातील दुभाजकांमध्ये चाफा व इतर शोभेची झाडे लावण्यात आली आहे. त्यांना पाणी घालून त्यांचे संगोपन केल्यामुळे शोभा वाढली आहे. हे काम ज्या कंपनीने केले तीचे फलक दोन दिवसांपूर्वी दुभाजकात लावण्यात आले होते. ते अज्ञात टवाळखोरांनी काढून टाकले.

याकामासाठी पुढाकार घेणाऱ्या नगरसेविका वैशाली दाणी यांनी सांगितले, की महापालिकेकडे विकासासाठी निधी नाही. कुंभमेळ्यात सिन्नरफाटा रेल्वे गेटच्या रस्त्याचे झाले. आता दुभाजक सुशोभीकरणाचे काम झाले आहे. मात्र, हे काम पुरस्कृत करणाऱ्या कंपनीचेच फलक काढून टाकल्याने संबंधित कंपनीचे संचालक नाराज झाले आहे. अन्य मार्गावरील दुभाजकांमध्ये झाडे जळू लागली असून कचरा साचला आहे. दुभाजकाची शोभा वाढली असताना गैरप्रकार होणे चुकीचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोडरोम‌िओंचा उच्छाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रत्यय नाशिककरांना वारंवार येऊ लागला आहे. त्यातच शहराच्या विविध भागातील तरुणी सध्या रोडरोमिओंचे लक्ष्य ठरताहेत. वर्दळीच्या रस्त्यांवरही तरुणींना रोडरोमिओ आणि टवाळखोरांचा सामना करावा लागत असून, याचे गंभीर पडसाद उमटत आहेत. अशा घटनांमुळे तरुणींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होते आहे.

रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणीपेक्षांही गाडी चालवणाऱ्या मुलींना जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गाडी चालवताना पाठलाग करणे, गाडी चालवताना ओव्हरटेक करणे, चारही बाजूंनी गाड्यांचा गराडा घालणे, टोमणे मारणे, अश्ल‌िल भाषा बोलणे अशा प्रकारांना तरुणींना तोंड द्यावे लागते आहे. मागील आठवड्यात अशाच प्रकारामुळे कृषीनगर परिसरात दोन तरुणी अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना घडल्याने पालकवर्गही धास्तावला आहे.

कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, महात्मानगर, कॉलेजरोड, गंगापूररोड, ‌त्रिमुर्ती चौक, पवननगर चौक, सिडकोतील स्टेटबँक चौक, पाथर्डीचौक, आयटीआय सिग्नल ते सातपूर पोलिस चौकी, त्र्यंबकरोड, पेठरोड, दिंडोरीरोड या रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून रोडरोमिओ आणि टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. सायंकाळी आणि कमी गर्दीचा फायदा घेत तरुणींना लक्ष्य केले जात आहे.

मुलींमध्ये भीतीचे वातावरण आपला कुणीतरी पाठलाग करते आहे किंवा आपण टवाळखोरांचे लक्ष्य ठरतो आहोत हे स्पष्टपणे सांगण्यासही मुली घाबरत असल्याची सध्याची परिस्थिती आहे. असा प्रसंग घडल्यावर काय करावे किंवा पोलिसांकडे मदत कशी मागावी याविषयी देखील माहिती नसल्याने मुली तक्रार करणे टाळतात. तसेच आपण तक्रार केल्यास किंवा टवाळखोरांना विरोध केल्यास त्यानंतर काय परिणाम होईल या विचाराने अनेक मुलींना हा त्रास सहन करण्याव्यतिरिक्त पर्याय दिसत नाही.

पथदीप बंद मॉडेल कॉलनी ते कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, एबीबी सर्कल ते सातपूर पोलिस चौकी यांसारख्या बऱ्याचदा भागातील पथदीप बंद नसल्यानेदेखील असे प्रकार वाढले आहेत. ज्या रस्त्यांवर तरुणींची छेड काढण्याचा किंवा त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होतो अशा रस्त्यांवरचे पथदीप

बऱ्याचदा बंद असल्याचे आढळून आले आहे. संध्याकाळी सातनंतर या रस्त्यांवरून वर्दळदेखील कमी होत असल्याने अशा ठिकाणी तरुणींना जाणूनबूजून लक्ष्य केले जाते. त्यामुळेच या रस्त्यांवरचे पथदीप सुरू केव्हा होणार अशीही विचारणा पालकवर्गाकडून केली जाते आहे.

तक्रार करण्याचे आवाहन तरुणींना असे प्रकार घडल्यास पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाइन किंवा एका फोनकॉलमुळे नक्कीच हा त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे अशा घटना घटड असल्याचा अंदाज आल्यास त्वरित तक्रार केल्याने मदत नक्की मिळेल, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र पोलिसांकडूनही अशा रोडरोमिओंवर कडक कारवाई होण्याची गरज आहे.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलवाईंच्या वक्तव्याचा ‘राष्ट्रवादी’कडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मालेगाव

हिंदूंना मक्का या मुस्लिमांच्या धर्मस्थळी प्रवेश मिळवून देण्यासंदर्भात काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगावात शुक्रवारी निषेध केला. संतप्त जमावाने दलवाई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनाचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मालेगावचे माजी आमदार राष्ट्रवादी नेते मौलाना मुफ्ती यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. हिंदूंना मक्का येथे प्रवेश मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे कथित वक्तव्य दलवाई यांनी केल्याने माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. बसस्थानक परिसरात जमावाने घोषणा दिल्या. आंदोलनासाठी पोलिस प्रशासनाकडे पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. आंदोलनाची माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, पोलिस निरक्षक राजमणे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जमावाने दोन वेळा पुतळा जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

यामुळे तणावाची परिस्थिती झाली. जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. मात्र, काही कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे दहन केले. परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी जादा पोलिस कुमक मागविण्यात आली होती. अखेर माजी आमदार मुफ्ती यांच्याशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन लाख रुपयांचे अपंगांना साहित्य वाटप

$
0
0

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ नाशिक आणि नगरसेवक शैलेश ढगे यांच्यातर्फे जेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात अपंगांना तीन लाखांचे साहित्य वाटप झाले. शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शैलेश ढगे व संस्थेचे पदाधिकारी एम. बी. चव्हाण यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये डीजे प्लेअर, स्मार्ट केन, चेस बोर्ड, बेंच पाटी, गणित पाटी, भूमिती साहित्य आदींचा समावेश होता. सतीश शेंडे, हिरामन टिळे, राजेंद्र सोनकर, हिलाल सपकाळ, प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभागात अंध प्रबोधिनीसाठी जागा उपलब्ध करण्याचे आश्वासन ढगे यांनी दिले.

बिटको हॉस्पिटल बिटको हॉस्पिटलमध्ये सुशिक्षत बेरोजगार अपंग संघटनेतर्फे रुग्णांना फळवाटप करून संवाद साधण्यात आला. संघटनेचे अंकुश कुमावत, सुभाष गिते, शिवा गायधनी, दिनेश साखला, स्वप्निल शेळके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेहरु युवा केंद्राचा नवीन उपक्रम, पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्राच्यावतीने 'पडोस युवा संसद कार्यक्रमा'चे आयोजन प्रत्येक तालुक्यात करण्यात आले आहे. भारत सरकारची युवा मंडळ सक्षमीकरणाची ही नवीन योजना आहे.

ही योजना मार्च २०१५ पासून अंमलात आली आहे. गाव तिथे मंडळ स्थापन झाल्यानंतर युवकांना कार्यक्रम आयोजित करण्याकरीता आर्थिक तरतूद म्हणून प्रत्येक गावाकरीता दरमहा शंभर रुपये दिले जाणार आहेत. एप्रिल २०१५ ते ऑक्टोबर २०१५ पर्यंतचे ७०० रुपये प्रत्येक गावातील मंडळांना त्यांच्या बँक खात्यावर नेहरू युवा केंद्राच्या नाशिक शाखेमार्फत देण्यात येणार आहेत. याकरीता युवा मंडळांच्या सभासदांचे वय १३ ते २९ असणे गरजेचे आहे. खेड्यातील मंडळांनाच रक्कम देण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रमात संलग्न मंडळानी सहभागी होवून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई यांनी केले आहे.

या कार्यक्रमात गावातील एक नेता निवडण्यात येऊन तालुक्यातून जिल्हा नेता निवडण्यात येईल. या निवड केलेल्या युवकांना राष्ट्रीय स्तरावर युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या युवा मंडळानी मागील वर्षात स्चच्छ भारत मिशन, बेटी बचाओ बेटी बढाओ, पंतप्रधान जनधन योजना सांसद, आदर्श ग्राम योजना, अटल पेशन योजना गाव पातळीवर राबविण्याकरीता जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होते अशा युवा मंडळाना तालुका स्तरावर ८ हजार रुपये प्रथम पुरस्कार व ४ हजार द्वितीय पुरस्कार सरकारमार्फत देण्यात येणार आहे. तरी गाव स्तरावरील युवा मंडळानी या योजनचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र किंवा तालुका प्रतिनिधींशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील देवस्थानांवर पुरुषांची मक्तेदारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक विभागातील सर्व धर्मियांच्या देवस्थानांवर पुरुषांची मक्तेदारी असून, येथे महिलांना स्थान नाही. तर त्र्यंबकेश्वर व संत निवृत्तीनाथ मंद‌िरात विश्वस्त म्हणून प्रत्येकी एका महिलेला स्थान देण्यात आले आहे. विश्वस्तपदासाठी काही महिलांनी अर्ज केले असता अनेक मंदिरांच्या ट्रस्टींनी त्यांना केराची टोपली दाखवली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश देवस्थानावर पुरुषांचे राज्य आहे. मुळातच महिलांमध्ये धार्मिकता मोठ्या प्रमाणात असल्याने पुरुषांपेक्षा महिलांचा मंदिरांमध्ये जास्त वावर असतो. त्यामुळे मंदिरात काय सुविधा हव्यात हे पुरुषांपेक्षा महिला चांगल्या प्रकारे सांगू शकतात. महिलांना विश्वस्तपदी ठेवण्यास पुरुषांची मानसिकता नाही. त्यामुळे अनेक विश्वस्तांकडे महिलांनी अर्ज करुनही त्याला केराची टोपली दाखवली जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. नाशिक विभागात एकूण १६ हजार ट्रस्ट आहेत त्यातील १ हजार २०० ट्रस्ट हे धार्मिक आहेत. यातील अवघ्या दोन ट्रस्टमध्ये महिलांची नेमणूक केलेली आहे. नाशिक विभागात शिर्डी संस्थान, काळाराम संस्थान, त्र्यंबकेश्वर संस्थान, सप्तऋृंगी ट्रस्ट, कपालेश्वर मंद‌िर ट्रस्ट अशी अनेक नावाजलेली मंद‌िरे आहेत. त्यातील साईबाबा शिर्डी संस्थावर एकाही महिलेची नेमणूक केलेली नाही.

नाशिकच्या काळाराम मंद‌िरात देखील महिला विश्वस्तांची नेमणूक केलेली नाही. त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानचे पदसिध्द चेअरमन न्यायाधिश असतात. या वेळी उर्मिला फलके जोशी या पदसिध्द चेअरमन असल्याने मह‌िला प्रतिनिधी म्हणून त्या काम पहात आहेत. तर कपालेश्वर मंद‌िरातील ट्रस्टच्या अध्यक्षपदी तहसीलदारांची नेमणूक असते. याठिकाणी राजश्री आहिरराव या तहसीलदार असल्याने त्यांची नेमणूक आहे.

कामावर मर्यादा शहरातील अनेक सामाजिक संस्था अस्थापना आणि काही संस्थावर महिलांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तेथील कारभार अत्यंत चोख असून, कुठेही गैरव्यवहार नसल्याचे सिध्द झाले आहे. उलट महिला असल्यावर गैरकारभार करणाऱ्यांना आळा बसत असल्याने महिलांनी विश्वस्त पदी येऊ नये, अशी तजवीज करण्यात येऊन महीलांना ट्रस्टी म्हणून नाकारण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठीउत्पन्नाची जमवाजमव!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीतील प्रस्तावित करवाढीला लोकप्रतिनिधींनी ब्रेक लावल्यानंतर प्रशासनाने उत्पन्न वाढीचे नवे स्मार्ट पर्याय शोधले आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन दिवस मेहनत करून उत्पन्नवाढीचे ६० नवे पर्याय शोधले आहेत. व्यावसायिक करात वाढ करण्यासह, रिकाम्या जागांवर कर, आस्थापना खर्च कमी करणे, करवसुली आऊटसोर्सिगद्वारे, रात्रीच्या वेळी रस्त्यावर पार्क होणाऱ्या वाहनांना कर लावणे आदिंचा त्यात समावेश आहे. महापालिकेच्या शाळासुद्धा खाजगी क्लासचालकांना भाडेतत्वावर देण्याचा पर्याय असून, या स्मार्ट पर्यायांची यशस्वी अंमलबजावणी व लिकेजेस कमी केल्यास वर्षभरात तिजोरीत शंभर कोटींची भर पडणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेची आर्थिक बाजू भक्कम असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने स्मार्ट सिटीत करवाढ सुचविली असली तरी महासभेने ही करवाढ फेटाळून लावली आहे. करवाढीसोबतच एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल)ला खोडा घातल्याने स्मार्ट सिटी प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, प्रशासनाने हार मानलेली नाही. महासभेत सदस्यांनी लिकेजेस शोधण्यासह मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर पाणीपट्टीतील गळती रोखण्याच्याही सूचना केल्या आहे. मात्र, या लिकेजेमधून तातडीने उत्पन्नवाढीची शक्यता नसल्याने ताबडतोब उत्पन्न वाढीच्या पर्यायांकडे प्रशासनाने मोर्चा वळवला आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह पालिकेतील अधिकाऱ्यां दोन दिवस मेहनत करीत तातडीचे ६० पर्याय निवडले असून, त्यांच्या अंमलबजावणीवर मंथन सुरू केले आहे. या पर्यायांचा अवलंब केला तर तातडीने महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

--

स्मार्ट पर्याय

- रात्री शहरात रस्त्यांवर पार्क होणाऱ्या

वाहनांना कर लावणे

- जाहिरातीचे ऑडिट करणे

- तपोवनातील ५४ एकर जागा भाड्याने देणे

- मालमत्तांचे मूल्यांकन करून त्यांच्यावर कर आकारणे,

- निवासी भागात व्यावसायिक भागासाठी पाणी वापरणाऱ्यांना व्यावसायिक पाणी पट्टी आकारणे, वॉटर ऑडिट करणे,

- पालिका शाळा खाजगी क्लासेसाठी भाड्याने देणे

- हॉटेल व व्यावसायिक कचऱ्यासाठी यूजर चार्जेस आकारणे

- नागरी सुविधांवर अधिक कर

- पार्किंग नसलेल्या इमारतींकडून अधिक कर वसूल करणे

- अतिक्रमणधारकाकडून अधिकचा दंड घेणे


ब्रॅन्ड अॅम्बेसिडर असावा

नाशिकचे धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने जगभरातून पर्यटक येतात. नाशिकला भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यास पालिकेच्या उत्पन्नातही भर पडते. त्यामुळे नाशिकचे ब्रॅन्डिंग करण्यासाठी स्वतंत्र ब्रॅन्ड अॅम्बेसिडर असावा अशी प्रशासनाची संकल्पना आहे. कुंभमेळ्यासोबतच कायमस्वरूपी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वंत्रत ब्रॅन्ड अॅम्बेसिडर नेमण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यातूनही उत्पन्न वाढविले जाणार आहे.


प्रस्ताव आज सादर होणार

स्मार्ट सिटी प्रस्तावात लोकप्रतिनिधींनी खोडा घातल्याने प्रशासनाने या प्रस्तावाची पुनर्मांडणी केली आहे. नव्या सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. आता प्रस्ताव सादर करण्याची मुदत उलटली असली तरी आयुक्तांनी विशेष बाब म्हणून शनिवारची मुदत मागून घेतली होती. त्यामुळे आज राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
मध्य रेल्वे प्रशासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) अनुयायासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर ते सेवाग्राम-अजनी-नागपूर अशा अधिकच्या सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. यामुळे मुंबईहून परतणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. खास करुन खान्देश, विदर्भातील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या या गाड्यांचा लाभ होणार आहे.

६ डिसेंबरला सुटणाऱ्या गाड्यांचा तपशील : १) विशेष गाडी क्रमांक ०१०६९ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून सायं ४.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१० वाजता अजनी येथे पोहोचेल. २) विशेष गाडी क्रमांक ०१०७१ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून सायं. ६.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल. ३) विशेष गाडी क्रमांक. ०१०७३ दादर, मुंबई येथून मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ७ डिसेंबरला सायं ०६.०० वाजता नागपूरला पोहोचेल.

७ व ८ डिसेंबरला सुटणाऱ्या गाड्यांचा तपशील : १) विशेष गाडी क्रमांक ०१०७५ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून ७ डिसेंबरला दुपारी १२.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायं ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. २) विशेष गाडी क्रमांक. ०१०८३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ८ डिसेंबरला सायं ६.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल. ३) विशेष गाडी क्रमांक. ०१०८५ दादर, मुंबई येथून ८ डिसेंबरला मध्य रात्री १२.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायं ६.०० वाजता नागपूरला पोहोचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images